Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महासभेत अभूतपूर्व गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महानगरपालिकेच्या महासभेत प्रशासनाकडून मनपा करात सुचवण्यात आलेल्या दोन टक्के करवाढ व अमृत अभियानांतर्गत मंजूर पाणीपुरवठा प्रकल्पाची अंमलबाजावणी या विषयावरून काँग्रेस नगरसेवकांकडून जोरदार विरोध झाल्याने महासभेत प्रचंड गदारोळ झाला. यामुळे महापौर हाजी मो. इब्राहीम यांना महासभा तहकूब करावी लागली.

महासभेच्या प्रारंभीच काँग्रेस नगरसेवक शाकील बेग, ताहेरा शेख, अस्लम अन्सारी यांनी 'नहीं चलेगी नहीं चलेगी घरपट्टी वाढ नहीं चलेगी अशा घोषणा देत प्रवेश केला. त्याचवेळी महासभा वादळी होण्याचे संकेत मिळाले. यानंतर नगरसेवक मलिक इसा यांनी महापौर हाजी मो. इब्राहीम यांना शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत सभागृहात चर्चा करावी, अशी विनंती केली. मात्र, या मोहिमेंतर्गत प्रशासनाकडून अतिक्रमण हटवताना जाणीवपूर्वक भेदभाव केला जात आहे, असा आरोप केला. प्रशासनाने याबाबतीत निःष्पक्ष कार्यवाही करावी, अन्यथा शहरवासीयांच्या विरोधास सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.

सत्ताधारी नगरसेवकांनी विषय पत्रिकेवरील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हावी, असे सुचविले. यावेळी मनपा गृहकर विभागाकडून मनपा करात सुचवण्यात आलेली दोन टक्के वाढ विषय सभागृहापुढे येताच काँग्रेस नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही नगरसेवकांनी महापौरांसमोरील दालनात उतरत निदर्शने केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळातच केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत मंजूर पाणीपुरवठा प्रकल्पविषयी विचार विनिमय व्हावा, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी लावून धरली. मात्र, शहर पाणीपुरवठा अभियंता जहीर अन्सारी रजेवर असल्याचे कारण महापौरांनी दिल्याने काँग्रेसचे नगरसेवक अधिक आक्रमक झाले. मात्र, या गदारोळतच सत्ताधारी नगरसेवक कालिम दिलावर यांनी महासभा तहकूब करण्याची लेखी सूचना केली. त्यास नगरसेवक जमील शेख यांनी अनुमोदन दिले, असे जाहीर करीत महापौर हाजी इब्राहीम यांनी महासभा तहकूब झाल्याचे जाहीर करून राष्ट्रगीत सुरू केले. या सगळ्या गोंधळामुळे मात्र सभागृहात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? असे चित्र पहायला मिळाले.

विरोधकांची टीका महासभेतील गदारोळानंतर काँग्रेस नगरसेविका माजी महापौर ताहेरा शेख, माजी सभापती अन्सारी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महापौरांवर घणाघाती आरोप केले. महापौर मनमानी कारभार करीत आहेत. विरोधक सभागृह चालवण्यास तयार आहेत मात्र, महापौर आणि सत्ताधारी नगरसेवकांना जनतेचे प्रश्न सोडावयाचे नसल्याने ते जाणीवपूर्वक महासभा तहकूब करीत आहेत. शहरातील जनतेस मूलभूत सोई सुविधा मिळत नसताना करवाढीचा बोजा काँग्रेस जनतेवर येऊ देणार नाही.

राजदंड पळवला महासभेत उडालेल्या गोंधळातच काँग्रेस नगरसेवक विठ्ठल बर्वे यांनी महापौरांसमोरील राजदंड पळवला. राजदंड परत आणण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. तर, तिकडे महापौर यांनी सरळ राष्ट्रगीत सुरू केले. मात्र, राष्ट्रगीत सुरू झाल्यावर देखील बहुतांश काँग्रेस नगरसेवकांचा गोंधळ सुरूच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहीद जवानाच्या कुटुंबीयांना सेनेची पाच लाखाची मदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहशतवाद्याशी लढतांना वीरमरण आलेले भयाळे येथील शहीद जवान शंकर शिंदे यांच्या कुटुंबीयांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या आदेशानुसार शिवसेनावतीने पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. आर्थिक मदतीसोबतच शिवसेना शंकर शिंदे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. शनिवारी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगर प्रमुख यांच्या हस्ते हा धनादेश शिंदे यांच्या कुटुंबाला देण्यात आला.

शहीद शंकर शिंदे हे अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी शिवसेनेने त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पाच लाखाच्या मदतीचा धनादेश खा. हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विनायक पांडे, जयंत दिंडे उपस्थितीत शनिवार शहिदांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला. वडील सखाराम शिंदे, आई सुमन शिंदे, पत्नी सुवर्णा शिंदे यांच्या हातात हा धनादेश देण्यात आला. या प्रसंगी शिवसैनिक सुशील भालेराव यांनी शहिदांच्या दोन्ही मुलांच्या पदव्युत्तर शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार असल्याचे सांगितले. तसेच वडाळीभोई येथील शिवसैनिक पिंटूशेट संचेती यांनी देखील अतिरिक्त पाच हजारांचा धनादेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या घटनांत तिघांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ​वेगवेगळ्या भागात तिघा जणांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली. यात एका विवाहितेचा समावेश असून याप्रकरणी मुंबई नाका, म्हसरूळ तसेच उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई नाका परिसरात हॉटेल रूचीमध्ये कूक म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रणजीत सूर्यभानजी भुरभुरे असे या मृत युवकाचे नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील टाकरखेड तालुक्यातील रहिवाशी आहे. हॉटेलमध्ये कूकचे काम करणाऱ्या भुरभुरेने मोटकरीवाडी येथे एका खोली भाड्याने घेतली होती. हॉटेलचे काम संपवून घरी परतलेल्या भुरभुरेने छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आत्महत्येची दुसरी घटना म्हसरूळ पोलिस स्टेशनतर्गंत झाली. के. के. वाघ कॉलेज परिसरातील व्यंकटेश सोसायटीत राहणाऱ्या दगडू शिवाजी जमदाडे (वय ४०) यांनी उंच इमारतीवरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. जमदाडे यांचा एक अपघात झाला होता. अपघातात डोक्याला मार लागल्याने त्यांना त्रास होत होता. या त्रासातूनच जमदाडे यांनी शुक्रारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी सीता दगडू जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. नाशिकरोड परिसरातील विहीतगाव येथील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या सोनाली संदीप उनव्हणे (वय ३०) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनालीने गळफास घेतल्याची बाब शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यानंतर ​बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पानसरेंच्या मारेकऱ्यांवर कारवाई करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ‌

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास जलदगतीने करून त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डाव्या लोकशाही आघाडीने केली आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.

कष्टकऱ्यांचे नेते अशी ओळख असलेल्या पानसरे यांनी अनेक जनआंदोलनांचे नेतृत्व केले. दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. २० फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला. या घटनेला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. अनेक संघटनांनी आजचा दिवस शहीद दिन म्हणून पाळला. मात्र, पानसरे यांच्या हत्येचा तपास ज्या पध्दतीने सुरू आहे, ते पहाता सरकारला खऱ्या गुन्हेगारांना पकडायचे नाही, हे सिध्द होते असा आरोप डाव्या लोकशाही आघाडीने केला. कॉ. पानसरे यांच्या खुनातील साक्षीदारांना खुलेआम धमक्या येत आहेत. मात्र, तरीही धमकावणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कुलबर्गी, रोहित वेमुला यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, अशा घटनांमागील सूत्रधारांवर कारवाई करा, जेएनयूमधील ऑल इंडिया फेडरेशनचा कार्यकर्ता कन्हैय्या कुमार यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा, देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना अटक करा, माकप दिल्ली मुख्य कार्यालयावर हल्ला करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक करा, अशा मागण्या करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन राजू देसले, सुनील मालुसरे, मनिष बस्ते, शरद कोकाटे, महेंद्र दातरंगे आदींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांना स्थायीचा दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या मालकीच्या शहरातील ४३३ गाळ्यांचा फेरलिलाव करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला आहे. गाळ्यांचा फेरलिलाव केल्यास अनेकांवर बेरोजगाची वेळ येईल. त्यामुळे गाळेधारकांना पंधरा वर्षाची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी जाहीर केले आहे. तसेच रेड‌रिेकनरची भाडेवाढही फेटाळून लावली असून, महासभेत प्रलंबित धोरणात्मक निर्णयानुसार या गाळेधारकांना भाडेवाढ लागू करावी, असे आदेशीत केले आहे. त्यामुळे शहरातील गाळेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत शहरातील गाळेधारकांचा तहकूब विषयावर चर्चा झाली. मनसेच्या यशवंत निकुळे यांनी फेरलिलावाला विरोध केला. या निर्णयाने भूमीपुत्रावर अन्याय होईल, त्यामुळे सध्याच्या गाळेधारकांनाच पंधरा वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी केली. शिवसेनेच्या शैलेश ढगे यांनी फेरलिलावाला विरोध करत, पंधरा वर्षाच्या मुदतवाढीची मागणी केली. काँग्रेसच्या राहुल दिवे यांनी या निर्णयाने गोरगरीबांचे नुकसान होणार आहे. तुम्ही गरीबांनाच मारणार का असा सवाल करत, त्यांनी पंधरा वर्ष मुदतवाढ व पाच टक्के भाडेवाढ करण्याची मागणी केली. कुणाल वाघ यांनी मुदतवाढ देण्याची मागणी करत, मिळकत धोरणही गाळेधारकांना दिलासा देण्याची मागणी केली. सुरेखा भोसले यांच्यासह सर्वच सदस्यांनी फेरलिलावा विरोध, करत अव्वाच्या सव्वा भाडेवाढ टाळावी अशी मागणी केली. त्यामुळे सभापती शिवाजी चुंभळे यांनी महापालिकेचे गाळे हे बेरोजगारांना रोजगार मिळावेत यासाठी बांधले आहे. फेरलिलाव केल्यास बेरोजगारी वाढेल. त्यामुळे फेरलिलावाचा प्रस्ताव फेटाळत, सध्याच्या गाळेधारकांनाच १५ वर्षाची मुदतवाढ देण्याचा व रेड‌रिेकनरची भाडेवाढ न करता भाडेवाढ करावी असा धोरणात्मक निर्णय जाहीर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरती-ओहोटी सुरुच असते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'आयुष्यात पराभव चाखणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपण कुठे आहोत आणि आपले कोण आणि परके कोण हे कळत नाही. त्यामुळे मनसेचा झालेला पराभव ही इष्टापत्ती समजा आणि नव्याने जोमाने कामाला लागा,' अशी भावनिक साद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना घातली आहे. सूर्यास्तानंतर सूर्योदय होतो अन् समुद्रात भरतीनंतर ओहोटी अन् ओहोटीनंतर भरती येते हे लक्षात ठेवा, असा संदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसह मनसेवर टीका करणाऱ्या राजकीय पक्षांना दिला आहे. एप्रिलनंतर नाशिकमध्ये मनसेचा चमत्कार बघायला मिळेल असे सांगतानाच, 'मी माझे काम करतो, तुम्ही तुमचे करा' असे आवाहन त्यांनी केले आहे.

नाशिकच्या धावत्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नाशिकमध्ये मनसेचा ढासळलेल्या गड सावरण्यासाठी ठाकरेंनी शनिवारी थेट भावनिक होऊन मनसेच्या नगरसेवकांचे आणि पदाधिकाऱ्यांनी मनोधैर्य उंचावण्याचे प्रयत्न केले. विशेषतः त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उभारी देण्याचे काम केले. पृथ्वी, चंद्र तारे यांचे दाखले देऊन ठाकरेंनी थेट सूर्योदय आणि सूर्यास्ताची आठवण कार्यकर्त्यांना करून दिली. आपण शांत असून, दौरे करीत नसल्याची चर्चा करतात. परंतु, मी सध्या विचार करतोय. राज्य काही मला मिरवायला नको होते. मला राज्य घडवायचे होते असे त्यांनी यावेळी सांगीतले. त्यामुळे पराभवातून शिका. स्वतःला कमी लेखू नका. सहकाऱ्यांना पुढे घेऊन जा. स्वार्थी विचार करू नका. तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. ती निट सांभाळा. नियोजनबद्ध काम करा. मतदारांना काय हवे त्यानुसार निर्णय घ्या. मावळ्यांसारखे काम करा. शिवाजी महाराज आग्रा येथे बंद‌स्ति असताना ते सुटणार नाहीत, अशी शक्यता होती. तरीही मावळ्यांनी गड किल्ले जिंकलेच असे सांगत, 'राजा परत येईल अशा आशेने मावळ्यांनी काम केले. त्यानुसार तुम्हीही काम करा' असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले. सूर्योस्त झाल्यानंतर सूर्योदय येतच असतो. त्याच प्रमाणे भरती व ओहोटीचे असते सांगून एप्र‌लिनंतर नाशिकमध्ये चमत्कार करणार असल्याचा आशावाद त्यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये जागवला आहे.

जायचे त्यांना जाऊ द्या !

मधल्या काळात मनसे सोडण्याच्या तयारीत असलेल्या काही नगरसेवकांनाही ठाकरेंनी टोला लावला. ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, दोन माणसे माझ्याकडे राहिली तरी, त्यांच्या बळावर २० लाख माणसे जमा करण्याची माझी धमक असल्याचे त्यांनी फुटीरांना ठणकावले. 'संकटाच्या काळातच आपले कोण आणि परके कोण हे कळते' असे सांगत, 'निवडणुकांच्या काळात सगळेच जण आपले विश्वासू असल्याचे भासवतात. परंतू नंतर त्यांचे रुप कळते. पराभव व विजय या गोष्टी येऊन जाऊन असतात. त्यामुळे कुठेतरी आग असली पाहिजे, त्याशिवाय धूर दिसत नाही' असे सांगत, ठाकरेंनी बंडखोरांसह नव्या पदाधिकाऱ्यांनाही संदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान अन् मतमोजणी यंत्रणा सज्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि. २१) मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी बाजार समितीची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदानाची वेळ आहे. तब्बल आठ वर्षानंतर मालेगाव बाजार समितीची निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकूण १८ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात असून, तीन पॅनलमध्ये लढत होत आहे.

बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेसाठी शहर व तालुक्यात एकूण नऊ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. शहरात एक तर तालुक्यात आठ मतदान केंद्र आहेत. मालेगाव कॅम्प भागातील संत ज्ञानेश्वर सेमी इंग्लिश स्कूल व विद्या विकास स्कूल येथे एक तर झोडगे, कळवाडी, मळगाव, निमगाव, रावळगाव, सौंदाणे, करंजगव्हाण, वडनेर येथे आठ केंद्र असणार आहेत. सर्वच नऊ केंद्रांवर सोसासटी गट व ग्रामपंचायत गटासाठी मतदान होईल. व्यापारी गटाचे मतदान केंद्र मालेगाव शहरातच असेल. हमाल व्यापारी गटासाठी शहर व झोडगे येथील केंद्रावर मतदान होईल. मालेगाव बाजार समितीचे एकूण तीन हजार ७३५ मतदार आहेत.

दरम्यान, उद्या (दि. २२) सकाळी आठ वाजेपासून येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौतम बलसाने, सहाय्यक सचिव साहेबराव पाटील हे काम पाहत आहेत.

-

मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

मालेगाव बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे शेतकरी पॅनल, भाजप नेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बळीराजा पॅनल निवडणूक रिंगणात असल्याने यावेळी तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेचे बंडू बच्छाव, भाजपचे अद्वय हिरे तर काँग्रेसचे प्रसाद हिरे सोसायटी गटातून आमनेसामने असून, अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

--

उमराणेत दुरंगी लढत

उमराणे बाजार समितीसाठी देखील आज (दि. २१) मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान प्रक्रिया असणार आहे. एकूण १८ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात असून, ५६७ मतदार या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

उमराणे बाजार समितीच्या निवडणुकीत जि. प. सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल, तर विलास देवरे यांच्या नेतृत्वात कर्मवीर पॅनल अशी सरळ दुरंगी लढत होत आहे. मतदान प्रक्रिया उमराणे जि. प. शाळेतील चार मतदान केंद्रांवर पार पडणार आहे. व्यापारी गटात सर्वाधिक २५८ मतदार आहेत. मतमोजणी प्रक्रिया उद्या (दि. २२) सकाळी ८ पासून सुरू होणार आहे.

--

मालेगाव बाजार समिती

गट जागा मतदार

सोसायटी ११ १५४८

ग्रा.पंचायत ४ ११९१

हमाल मापारी १ ३०३

व्यापारी २ ६९३

एकूण १८ ३७३५

उमराणे बाजार समिती

गट जागा मतदार

सोसायटी ११ १००

ग्रा.पंचायत ४ ८०

हमाल मापारी १ १२९

व्यापारी २ २५८

एकूण १८ ५६७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजुरांच्या निवाऱ्यासाठी नाईट शेल्टरची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेठरोड येथे सुनील निकुळे या मजूराचा खून प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्थलांतरीत मजूरांच्या निवाऱ्यासाठी नाईट शेल्टर होम सुरू करावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती संघटनेने केली आहे.

१५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास उघड्यावर झोपलेल्या निकुळे यांचा खून करण्यात आला होता. मात्र या प्रकरणातील संशयितांवर अद्याप कारवाई होऊ शकलेली नाही. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यातील अनेक आदिवासी बांधव रोजगारानिमित्त नाशिकमध्ये येत असतात. अशा बेघर स्थलांतरीत मजुरांना रात्रीचा निवारा (नाईट शेल्टर होम) उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानसागर कांबळे, अरविंद चव्हाण, निलेश सोनवणे, लक्ष्मण गायकवाड आदींनी केली आहे.

याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात दोन मुलींचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या संशयिताविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. रमेश पांडूरंग बेंडकुळे असे या संशयिताचे नाव असून, तो भारतनगर परिसरातील शिवाजीवाडी परिसरात राहतो. येथून जवळच राहणारी एक विद्यार्थिनी तिच्या मैत्रणीसमवेत शाळेत जात असताना संशयिताने अमरधामरोडवरील हरी मंजिल येथे एकटी पकडून विनयभंग केला. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत घडली. २१ वर्षीय पीडित तरुणी कॉलेजला जात संशयित आरोपी सुजय अनिल दिवे हा तिचा दुचाकीने पाठलाग करायचा. मागील चार महिन्यापासून सुजयचा पाठलाग सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही मुलगी नाशिकरोड परिसरातील कॉलेजला जात असताना संशयिताने तिला थांबवून काही सांगण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सदर मुलीने उपनगर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लागलीच गुन्ह्याची नोंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषेच्या पेपरला सापडले जिल्ह्यात २० कॉपीबहाद्दर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्य माध्यमिकउच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेचा दुसरा पेपर शनिवारी पार पडला. भाषा विषयांचे पेपर यादिवशी विद्यार्थ्यांनी दिले असून, जिल्ह्याभरात २० कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना भरारी पथकाने

पकडले आहे. विभागातील कॉपीबहाद्दरांची एकूण संख्या ही २८ आहे.

भाषा विषयाचे पेपर शनिवारी पार पडले. यामध्ये मराठी, गुजराती, बंगाली, सिंधी, पंजाबी, उर्दू, पर्शियन, पाली, मल्याळम, तमिळ, तेलुगू या भाषांचा समावेश होता. विभागात ९३१ कॉलेजांमध्ये २१४ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. त्यापैकी ८४ केंद्र नाशिक जिल्ह्यातील होती. यापैकी चांदवड तालुक्यात १२, सुरगाणा २ व देवळा तालुक्यात ६ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. तर विभागानुसार जळगाव जिल्ह्यात ५ व

नंदुरबारमध्ये ३ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. धुळे जिल्ह्यात एकही कॉपीबहाद्दर भाषेच्या पेपरला निदर्शनास आलेला नाही.

मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जात आहे. सोमवारी (दि.२२) हिंदी, जर्मन, अर्धमगधी, पर्शियन या भाषांचे पेपर होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेत पुन्हा हातचलाखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील काही सराईत गुन्हेगारांनी बँकांमध्ये येणाऱ्या नागरिकांना टार्गेट केले असून, हातचलाखी करीत ते सर्वसामान्य खातेदारांचे पैसे हातोहात लंपास करीत आहेत. अशीच एक घटना दिंडोरीरोडवरील एसबीआयच्या मेरी शाखेत घडली असून, संशयिताने फिर्यादीचे १३ हजार रुपये चोरी केले. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

केतकीनगर परिसरातील गजलक्ष्मी रो हाऊस येथे राहणारा १७ वर्षीय जितेश राजाराम भोये त्याच्या मामाच्या घराच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे आलेल्या दोघा अनोळखी इसमांनी रूमालात ठेवलेले एक लाख रुपये जितेशकडे देऊन त्याच्याकडील १३ हजार रुपये आपल्याकडे घेतले. थोड्यावेळातच दोघा व्यक्तींनी बँकेतून काढता पाय घेतला. यानंतर जितेशने रूमाल उघडून पाहिला असता यात कागद भरले असल्याचे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक दिवस पाणीबंद!

$
0
0


नाशिकमध्ये सोमवारपासून जलकुंभनिहाय वाढीव पाणीकपात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाढीव पाणीकपातीची कोंडी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अखेर फोडली आहे. सर्वपक्षीय सहमतीनंतर शहरात आता सोमवारपासून जलशुद्धिकरण केंद्रनिहाय संपूर्ण एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विभागवार जलकुंभनिहाय पाणीकपातीचे नियोजन पालिकेने केले असून, भविष्यात एकलहरेकडून अजून अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. या निर्णयामुळे दर आठवड्याला १२.३५ दलघफू पाण्याची बचत होणार आहे. वाढीव कपातीच्या निर्णयावर फेरविचार करण्याचा पर्यायही प्रशासनाने ठेवला आहे.

गंगापूर धरणातील उपलब्ध साठा आणि ३१ जुलैपर्यंत पाणीपुवठ्याचे गणित जुळत नसल्याने महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, भाजपच्या आमदारांनी या कपातीला विरोध करीत अतिरिक्त ३०० दलघफू पाणी उपलब्ध करून दिले होते. तरीही २६ दिवसांचा तुटवडा जाणवत असल्याने पाणीकपात अनिवार्य होती. परंतु, या कपातीवरून महापालिकेतील मनसे आणि भाजपमध्ये राजकारण सुरू झाले होते.

आता वाढीव पाणीकपातीला भाजपनेही सहमती दर्शविल्याने आयुक्तांनी शनिवारी पाणीकपातीची घोषणा केली. विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत आमदार, महापौर, आयुक्त यांच्या उपस्थितीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, सर्वपक्षांच्या सहमतीने शहरात आता जलकुंभनिहाय पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करून विभागवार कपातीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आठवड्यातून चार दिवस प्रत्येक विभागात एक दिवस पूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे आठवड्यातून १२.३५ दलघफू पाण्याची बचत होणार आहे.
विभागीय आयुक्तांच्या बैठकीत आमदार, महापौर व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णयाला सर्वपक्षीय सहमती मिळाली आहे. त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकलहरेचे अतिरिक्त पाणी मिळण्याची शक्यता असून, कपातीवर फेरविचार होऊ शकतो.

डॉ. प्रवीण गेडाम,

महापालिका आयुक्त

प्रशासनाने घेतलेला निर्णय हा पाणीकपातीचा नव्हे, तो पाणीबचतीचा आहे. सरकारच्या वतीने वाटल्यास आणखी अतिरिक्त पाणी वाढवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावरून सुरू ठेवलेले राजकारण थांबविले पाहिजे.

प्रा. देवयानी फरांदे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर्सच्या कार्यकर्तृत्त्वाचा गौरव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
समाजाच्या समस्या मांडल्याबद्दल 'त्यांच्या' कार्याचा गौरव 'महाराष्ट्र टाइम्स'ने केला. हा क्षणच त्यांच्यासाठी स्वप्नवत होता. केवळ आपण सांगितलेल्या समस्यांची दखल घेऊन ते प्रसिध्द करणेच नव्हे, तर त्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन त्या मार्गी लावून समस्या आपल्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल आपला सत्कार होतोय ही जाणीव 'त्यांना' सुखावणारी होती. यापुढेही समाजात चालणाऱ्या विविध विघातक गोष्टी 'मटा'च्या नजरेस आणून देऊ, असा पणच 'त्यांनी' केला. पूजा राका, अरूण मिस्त्री व कल्पेश खैरनार हे ते ‌तिघेजण. या ‌तिन्ही सिटिझन रिपोर्टर्सचा गौरव शनिवारी करण्यात आला.

वृत्तपत्राचे वाचक आपल्या अवती-भवती घडणाऱ्या अनेक घटना, समस्या आणि प्रश्नांचे साक्षीदार असतात. त्यांना त्यांचे म्हणणे तीव्रतेने सांगायचे असते, समाजातील घटकांना न्याय मिळवून द्यायचा असतो. ते साध्य व्हावे यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत 'मटा सिटिझन रिपोर्टर' हे 'अॅप' उपलब्ध करून दिले आणि आतापर्यंत अनेक समस्यांना वाचा फुटून त्यांच्यावर मार्गही निघाला. प्रश्नांची तड लावण्यासाठी झटणाऱ्या अशा सामान्यांतील तीन 'मटा सिटिझन रिपोर्टर्स'चा शनिवारी सन्मान करण्यात आला.

गुगल प्ले स्टोअरवरून हे 'अॅप' डाऊनलोड करून 'मटा'च्या वाचकांनी त्याला तुफान प्रतिसाद दिला. फोटो, समस्या, त्यांना 'दिसणाऱ्या' बातम्यांचा ओघ या 'अॅप'वर सुरू झाला. खऱ्या अर्थाने सामान्यांमधील पत्रकारांचा चेहरा या 'अॅप'वर प्रत्येक दिवशी प्रभावीपणे दिसत होता. अशा 'सिटिझन रिपोर्टर्स'पैकी पूजा राका, कल्पेश खैरनार आणि अरूण मिस्त्री या तीनजणांचा 'मटा'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. दर आठवड्याला अशाप्रकारे 'सिटिझन रिपोर्टर्स'ना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे.

'मटा'चेे अॅप डाऊनलोड करून मला खूप आनंद झाला. कारण, आता मी त्यावर बातम्या देऊ शकतो व त्याची दखलही घेतली जाऊ शकते.

कल्पेश खैरनार

प्रत्यक्षात काम होते हे पाहून खूप समाधान वाटले. आता कोणतीही समस्या तडीस लागू शकते, असे काम 'मटा'च करू शकते याबाबत दुमत नाही.

अरूण मिस्त्री

'मटा'ने हे अॅप आणून सामान्य वाचकांवर खूप मोठा विश्वास दाखवला आहे. यातून समस्या सुटू शकतात.
पूजा राका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथक रोखणार पाण्याची नासाडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने विभागानिहाय स्वतंत्र पथक नेमले आहे. त्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पाण्याचा अपव्‍यय निदर्शनास आल्यास त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती देता येणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे उपाययोजना सुचविण्यात आल्या असून, त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

प्रत्येक विभागात पाण्याचे अतिरिक्त दोन टँकर उपलब्‍ध करून देणे. शहरातील मनपाचे हातपंप, बोअरवेल कार्यान्वित करणे. चेहडी पंपिंग स्टेशन येथे पाणी उचलण्यासाठी नदीपात्रातील इनटेक पाइपची लांबी वाढविणे. गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील इनटेक चॅनलमधील गाळ काढणे. गंगापूर धरण पंप‌िंग स्टेशन येथील इनटेक चॅनलमध्ये धरणातील मृत साठ्याचे पाणी पंपिंग करून टाकण्यासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त पंप वापरणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. - विभागनिहाय संपर्क विभागाचे नाव विभागीय अधिकारी (मो.क्र.) उपअ‌भियंता (मो.क्र.) नाशिक पूर्व ९४२३७७७१२५ ९४२०६९१०९९ नाशिक पश्चिम ९४२३१३१३२१ ९४२३१७९१७९ पंचवटी ९४२३१७९१२४ ८२७५०२२७६९ नाशिकरोड ८२७५०१५३९१ ९४२२२२२८४३ नवीन नाशिक ७५८८०३८५८१ ९४२३१७९१५९ सातपूर ९४२३१७९१२१ ९४२३१७९१५३
पाणी बचतीचे नियोजन

सोमवारी पाणी बंद असलेला परिसर *नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक ४१ ते ४९ व ५१ ते ५२. नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक ५१ ते ५२ व ५३ मधील विशाखा कॉलनी, राणेनगर, चेतनानगर, किशोरनगर, रायगड उधाम, भगतसिंगनगर, अल्को मार्केट. प्रभाग क्रमांक ५४ मधील पांडवनगरी, श्रद्धा विहार, शर्वरी नगरी, नाशिक केब्रिंज शाळा परिसर. प्रभाग क्रमांक ६१ मधील वडनेर गेट, पिंपळगाव खांब, गणेशनगर, पोरजे वस्ती, राजपुक कॉलनी. मगंळवार पाणी बंद असलेला परिसर सातपुरमधील प्रभाग क्रमांक १६ ते २१ व ५०. नाशिक पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५ मधील आकाशवाणी केंद्र, आयोध्या कॉलनी, अरिहंत हॉस्पिटल, एसटी कॉलनी व उदय कॉलनी, गितांजली सोसायटी, सहदेवनगर, चिंतामणी मंगलकार्यालय, दादेजी कोंडदेवनगर, सुयोजित संकुल, माणिकनगर, श्रमिक कॉलनी. प्रभाग क्रमांक २२ मधील कृषीनगर, डीसुझा कॉलनी, मॉडेल कॉलनी, महात्मानगर, पारिजातनगर, समर्थनगर. नाशिक पश्चिममधील प्रभाग क्रमांक १३, १४, २३ ते २५. नाशिक पूर्व प्रभाग क्रमांक १५ मधील गितांजली सोसायटी व गंगापूररोड बाजु, जुना गंगापुर नाका, चोपडा लॉन्स व राठी आमराई परिसर. प्रभाग क्रमांक २२ मधील सिद्धार्थनगर, पर्णश्री कॉलनी, लव्हाटे नगर, पीटीसी, उत्कर्षनगर. प्रभाग क्रमांक २६ ते २९, ३९ ते ४०. प्रभाग क्रमांक ३८ मधील साईनाथनगर, अमृतवर्षा कॉलनी, जेएमसीटी वडाळारोड परिसर. प्रभाग क्रमांक ५३ मधील विशाखा कॉलनी, जाखडीनगर, पाटील गार्डन, पेठेनगर इ. प्रभाग क्रमांक ५४ मधील आण्णाभाऊ साठेनगर मेघदुत नगर, घरकुल योजना, कलानगर, रंगरेज मळा. गुरूवारी पाणी बंद असलेला परिसर *पंचवटी प्रभाग क्रमांक १ ते १२. नाशिक पूर्व प्रभाग क्रमांक ३० व चित्रघंटा परिसर. शुक्रवारी पाणी बंद असलेला परिसर *नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक ३२ ते ३६ व ५५ ते ६१. प्रभाग ६१ मधील (पिंपळगाव खांब व वडनेर गेट परिसर वगळून) सर्व प्रभाग. * नाशिक पूर्वमधील प्रभाग क्रमांक ३१, ३७, ३८ संपूर्ण भाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलाखालीच भरतोय बाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या दुतर्फा विविध वस्तू विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. शिवाय वाहने दुभाजकावर चढवून वाहन दुरुस्तीही केली जात आहे. या दुभाजकावर फुले फुलविण्याचा निर्णय महापालिकेमार्फत घेण्यात आला होता. परंतु त्याऐवजी इथे हे उद्योग सुरू झाले आहेत.
फुलझाडे किंवा लहान झुडपांच्या माध्यमातून या दुभाजकांचे सुशोभीकरण करणार असल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले होते. परंतु ते न केल्यामुळे दुभाजकावर विविध विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी पादत्राणे, चादर, ब्लँकेट्स, चिनी कोंबडी पिल्लू, काचेच्या विविध वस्तू, गॉगल्स यासारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दुकाने उभी केली जात आहेत. दुभाजकावर वाहन दुरुस्तीचे गॅरेजही सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी वाहनांचे ऑईल मिश्रित सुटे भाग जाळले जात असल्याने इथे धुरामुळे प्रदूषणाची समस्याही निर्माण होत आहे.
केवळ वाहने दुरुस्ती नव्हे तर काही वाहनचालक शक्कल लढवून दुभाजाकावर वाहने पार्क करताना दिसत आहेत. दुभाजकावर मोठी सपाट लाकडी फळी ठेवून वाहने दुभाजकावर चढविली जातात. रस्त्याच्या दुतर्फा दुभाजाकावर वाहनांच्या या आतिक्रमणाचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे.
या सर्व प्रकारांकडे प्रशासन आणि पोलिस यांचे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. उड्डाणपुलाखालील दुतर्फा दुभाजकावर थाटत असलेली दुकाने हटवून या ठिकाणी फुल झाडे
लावावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​‘गोदेचा श्वास करा मोकळा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
'गोदावरी नदीवर सिमेंटचे बांधकाम केल्याने नदीमधील पाण्याचे जीवंत स्रोत बंद पडले आहेत. सिमेंटचे बांधकाम काढल्यास नक्कीच पाण्याचे स्रोत पूर्ववत होतील. सर्व नाशिककरांनी एकत्र येऊन याबाबत विचार करावा', असे आवाहन महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष दीपक नाईक यांनी केले. गोदाप्रेमी नागरी समितीने आयोजित केलेल्या विचामंथन कार्यक्रमात नाईक बोलत होते.
या समितीमार्फत श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या सभागृहात 'पूर्वीची गोदावरी आणि सध्याची गोदावरी नदी', या विषयावर हे विचारमंथन होते. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'गोदावरीविषयीची नाशिककरांची तळमळ आणि प्रदूषण मुक्तीचा लढा कौतुकास्पद आहे. सिमेंटचे बांधकाम गटारीसाठी असते नदीसाठी नसते. यामुळे नदीचा प्रवाह आणि स्रोत कमी होतात. सिमेंटची कामे उखडून टाकणे गरजेचे आहे.' यावेळी नाशिकच्या विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी गोदावरीच्या स्वच्छतेसाठी आणि प्रदूषण मुक्तीसाठी काय करावे याबाबत सूचना केल्या.
यावेळी रेखा सोमय्या, कृष्णकुमार नेरकर, कल्पना पांडे, सतीश शुक्ल, रवींद्र धरणे, किशोर गरड, नितीन शुक्ला, कैलास यंदे, सुरेश माखनिया यासह अनेकांनी आपल्या सूचना मांडल्या. देवांग जानी यांनी स्वागत व प्रास्ताविक केल तर नंदू मुठे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
उपस्थितांच्या सूचना
१ विविध कंपन्यांमधून नदीत सोडल्या जाणाऱ्या विषारी पाण्यावर बंदी आणावी.
२ निर्माल्य हे निर्माल्य कलशातच टाकले जाईल यांची सर्वांनी दक्षता घ्यावी.
३ नदीच्या पाण्यात गाड्या धुणे आणि कपडे धुणे यावर महापालिकेने बंदी आणावी.
४ नदीतील स्वच्छता वारंवार करावी. पाणवेली काढण्यासाठी कायमस्वरूपी विचार व्हावा.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषेतला डिजिटल बदल

$
0
0

Blackberry, PDA, iPOD, MP3 डिजिटल युगाच्या या काळात हे शब्द जुने वाटावे इतक्या वेगाने तरुणांचे जगणे बदलतेय. what's app च्या हातात हात घालून पुढे जाणारे snapchat, android कडून IOS (i-फोन operating system) बद्दल वाटणारे आकर्षण. APPLE कॉम्प्यूटरला आवर्जून MAC म्हणून संबोधणे. पेन ड्राईव्ह आता जरा बाजूला पडला. I cloud हा त्यासाठी वापरला गेलेला शब्द. video calling हे म्हणणे थोडे गावंढळ. आता फेस टाईम किंवा skype ची आलेली भाषा. बाकी बोलणे तर कधीच कात टाकून बसलेय. जन्मजात शिशूचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकला की त्याखाली शो... श्वीट किंवा आपल्याच मैत्रिणींना बेब इज अ हॉटी असे लिहिणे, दिवसातून एकदा तरी समथिंग कूल किंवा ऑसम, वाऊ.. म्हटल्याशिवाय मैत्रीला रंग न भरणे जुने झालेय. दिवसागणिक त्यात नवनव्या शब्दांची भर पडत जाते. फिल्मफेअर award सारख्या कार्यक्रमात आलिया भट शाहरुख खानला ठणकावून सांगते, या पिढीची भाषा तुला येत नाही, ही भाषा तुझ्या ओळखीची नाही, तू आता निवृत्त झालेले बरे.. हे ही सहजसहज अगदी गमतीत चाललेले असते. पण त्यापाठीमागे जनरेशन एखाद दीड वर्षात बदलू पाहतेय हे लक्षात येते.

आता कॉम्प्यूटरला टेक्नोलॉजी म्हणणे हास्यास्पद झाले आहे. टीव्ही देखील हलकेच बाजूला झाला आणि त्याची जागा इंटरनेटने घेऊन टाकली. ज्याला वास्तव समजतो त्यातही लक्षणीय बदल दिसतो. एखादा गरीब घरातला मुलगा मित्रांबरोबर हॉटेलमध्ये जेवायला गेला तरी तेथे तो, अन्न बऱ्यापैकी टाकून देताना दिसतो. चाटून पुसून ताट साफ केले पाहिजे असे घरात शिकलेला तो, बाहेर गेला की ताटात काही पदार्थ तसेच ठेवतो. आपण फार भुकेलो आहोत असे वाटता कामा नये. हे तो शिकलेला असतो. खाल्ल्यासारखे करणे ही एक वेगळीच स्टाइल. भवताल बदलला म्हणजे नेमके काय झाले. याची आपापली उत्तरे या तरुणांनी शोधली आहेत.

तुम्हाला काय माहित आहे असा प्रश्न या पिढीला न आवडणारा. कुठल्यातरी लढाया किंवा पक्षीय विचारसरणी पाठ करण्यापेक्षा कृतीवर भर असणारे सर्व काही त्यांना करायला आवडते. आपण अभ्यासक्रमात जे शिकतो त्याबद्दल दिवसरात्र कोणी तरी आपली परीक्षा घ्यावी असे त्यांना अजिबातच वाटत नाही. to know पेक्षा to do वर त्यांचा विश्वास. त्यामुळेच मोबाइल चालत नाही, त्याचे अमुक एक फंक्शन बंद आहे अशी वाक्ये कोणत्याही ग्रुपमध्ये ऐकू येणार नाहीत. त्यांना ते नीट करता येते. हे करणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. कोणतेही इव्हेंट असेल तर साऊंड सिस्टीम कोणताही तरुण सहज हाताळू शकतो. त्याला या गोष्टी शिकायला आवडतात. multitasking is a way of life हे त्याचे आग्रहाचे सांगणे असते. त्याला टू व्हीलर घेऊन दिली की फार कमी वेळेस तो दुरुस्तीसाठी गाडी घेऊन जाताना दिसतो. त्याला त्यातील प्रत्येक पार्ट माहित असतो, त्या पार्टची जागा माहित असते. तो केवळ ऐकीव माहितीवर कोणत्याही यंत्रावर अवलंबून नसतो. त्याला laptop आणला, तर त्याला वडिलांची फार कमी वेळेस मदत घ्यावी लागते आणि वडिलांनी स्वत:साठी laptop आणला तर त्यांना मात्र क्षणोक्षणी मुलाची मदत घ्यावी लागते. अर्थात आपण काही निराळे करतो याची जाणीव या तरुणांना करून द्यावीशी वाटत नाही. घरातल्या कोणाचा वाढदिवस असला तर घरच्या घरी एखादे कार्ड प्रिंटरवर ही तरुण मुले करून देतात, तेंव्हा हे काही न समजणाऱ्या अगोदरच्या पिढीला सुखद धक्का बसतो. त्यांचे हस्ताक्षर अजिबात चांगले नसते. स्क्रीनवर मात्र वेगाने त्यांची अक्षरे टाईप होतात. पानेच्या पाने ते उतरवतात, त्यातून ब्लॉग त्यांच्या जवळचा बनतो. तो कोणी वाचेल की नाही ही फिकीर नसते. तुझे लिहिणे, तुझी ही बकवास कोण वाचणार या थोरांच्या प्रश्नावर व्यक्त व्हायला त्यांना आवडत नाही. त्यांच्या प्रोफाईलवर त्यांची स्वत:ची अशी एक निराळीच ओळख असते. आपला मुलगा पोरीबाळीशी दिवसभर chat करत असतो अशी समजूत असणाऱ्या पालकांना हे माहित नसते की मुलाने त्याच्या स्टेटसवर "गर्ल्स attittude इज अंडर माय फूट" असे लिहून मुलगी या विषयाला हद्दपार केले असते.

फक्त मैत्रिणी या सर्वकाही असतात हा त्यांचा समज नसतोच मुळी. त्यांची अक्षरे तासनतास फिरत असतात. कारण त्यांना त्यांच्या जुन्या नव्या मित्रांपासून disconnected व्हायची भीती वाटते. ही असुरक्षितता नकोशी वाटते, कारण समोरची न पाहिलेली व्यक्ती आपण टाकलेली कॉमेंट, पोस्ट वाचते, जे अपलोड करतो त्याला ती दाद देते, हे कौतुक त्याला सर्वाधिक सुखावून टाकते. एकच वेळेस दहा, पंधरा, पन्नास जण आपण ज्या इमेजेस पाठवतोय त्याला लाईक करतात याचा आनंद इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक असतो. नाहीतरी घरात प्रत्येक कृतीला असे का, असे कशासाठी, जायलाच हवे का, करायलाच हवे का असे प्रश्न विचारून भंडावून सोडले जाते.

संक्षिप्त मजकूर आणि केवळ काही अक्षरातून, चिन्हातून व्यक्त होण्याची त्यांना सवय लागते. याचे कारण देखील इतरांशी connected राहिलेच पाहिजे ही तीव्र होत जाणारी भावना. त्याच्या मोबाइलवर तो फार कमी शब्दांचा वापर करतो, कारण त्याला प्रत्येक अक्षरांचे पैसे मोजावे लागतात. J/K म्हणजे just kidding, IMHO-In My Humble Opinion, LOL-Laughing Out Loud किंवा Lots of Love, NP-No Problem हे तो कायम वापरतो, तसे Thank youचे THx किंवा THKS यापेक्षा TLK लिहायला त्याला जास्त आवडते. TENDER LOVING CARE ने तो आपल्या भावना व्यक्त करतो. मोबाइल सतत संशयाने तपासणाऱ्या पालकांना या शब्दांचे अर्थ लागत नाहीत, एखाद्याला Wish You Were Here XOXO हे समजत नाही, X मध्ये दोन्ही हातांनी कवटाळण्याची कृती, O मध्ये होणारा ओठांचा चंबू, HUGS AND KISSES हा त्याचा अर्थ. तर LYLAS वाचून आपल्या मुलीचा चेहरा का उतरतो हे त्यांना कळत नाही, त्या आद्याक्षरांचा अर्थ Love You Like A Sister. भाषेबरोबर भवताल बदलतो, जे अटळ आहे. हा बदल स्वीकारावा लागणार हे नक्की.

(लेखिका साहित्यिक तसेच तरुणांच्या भावविश्वाच्या अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाडके क्रिकेट गुरू

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

आपल्या मुलाने सचिन तेंडूलकर सारखं क्रिकेट खेळावं झहीर खान सारखी बॉलिंग करावी अशी अनेक पालकांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी नाशिकच्या रमेश संवत्सरकरांनी आपल्या मुलांना क्रिकेट शिकवावे यासाठी बहुतांश पालक प्रयत्नशील असतात. वयाची ७६ वर्ष पूर्ण केलेला हा क्रिकेट गुरू रवींद्र विद्यालयात क्रिकेटचे धडे देण्याचे काम करतो आहे. वयाच्या ८० व्या वर्षाकडे वाटचाल सुरू असली तरी ३० वर्षांच्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह आजही वाखणण्यासारखा आहे.

रमेश संवत्सरकर हे इंदूर येथील महुचे रहिवासी. त्यानी आपले शालेय शिक्षण मध्यप्रदेश येथे पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. वडिलांना खेळात फारसा रस नसल्याने त्यांचा कायम खेळाला विरोध असायचा, मात्र संवत्सरकर यांचे काका उत्कृष्ठ क्रिकेटपटू असल्याने त्यांच्या खेळाचा प्रभाव नकळत त्यांच्यावर झाला. त्यानंतर संवत्सरकरांनी क्रिकेटची वाट चोखाळली. पुढे बारावी झाल्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि कोरबा येथील वीज केंद्रात कोल हॅन्डलिंग डिपार्टमेंटमध्ये नोकरीला सुरुवात केली. याचवेळी त्यांचा संपर्क रशियन लोकांशी आला. त्यामुळे रशियन भाषा थोडीफार समजू लागली. दरम्यान १९६४ मध्ये लँग्वेज ट्रान्सलेटर पदासाठी एचएएलची जाहिरात निघाली ती वाचून रमेश सरांनी तेथे अर्ज केला व १९६५ मध्ये ते एचएएलला रुजू झाले.

एचएएलमध्ये खेळाला पोषक असे वातावरण होते. तेथे क्रिकेटच्या मॅचेस होत असे, एकदा टीटीसी विरुध्द एचएएल अशी मॅच आयोजित करण्यात आली. त्यात रमेश सरांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला. हा परफॉर्मन्स पाहून तेथील क्रिकेटपटू दत्तू गोरे यांनी नाशिकला येऊन क्रिकेट खेळण्याची विनंती केली. यावेळी पोलिस परेड ग्राऊंड येथे क्रिकेटच्या मॅचेस होत असे. १९६५ मध्ये नाशिक बाबा इलेव्हन विरुद्ध नाशिक पोलिस अशी मॅच आयोजित केली होती. त्या मॅचसाठी रमेश संवत्सरकरांनी नाशिकच्या संघाकडून खेळावे असे दत्तू गोरे यांनी सुचविले. यावेळी नाशिक बाबा इलेव्हन संघात राजा शेळके, कमरुद्दीन, अख्तर, अन्वर, बाळ डोंगरे, बाळ फडतरे, रमेश वैद्य, दत्तू गोरे असे दिग्गज खेळाडू होते. त्यांच्यात रमेश संवत्सरकर यांचा समावेश झाला. या मॅचमध्ये रमेश संवत्सरकरांनी चांगली कामगिरी करीत ८१ धावा काढल्या. याच मॅचपासून ते नाशिककर खेळाडू झाले. येथे त्यांच्या क्रिकेटला आणखी चालना मिळाली. याच क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण भारतात त्यांनी आपला खेळ दाखवला. १९८४ मध्ये त्यांनी नाशिक संघाकडून शेवटची मॅच खेळली. त्यानंतर संवत्सरकरांनी कोचिंगला वाहून दिले.

रोज सकाळी सात वाजता ते रवींद्र विद्यालयाच्या ग्राऊंडवर हजर राहून मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या मुशीतून अनेक खेळाडू तयार झाले आहेत. सध्याच्या खेळाडूंपैकी मनिष पांडे, अभिषेक राऊत, राजु लेले, मुर्तजा ट्रंकवाला यांच्यासारख्या क्रिकेटपटूंनी प्रशिक्षण घेतले आहे. त्याच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. नाशिकच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट अॅकेडमीच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जास्तीत जास्त चांगले खेळाडू तयार करुन नाशिकचे नाव क्रिकेटच्या क्षेत्रात उंच ठेवायचे अशी आशा ते व्यक्त करतात. सध्या त्यांचे वय ७६ आहे. वयाच्या ८५ व्या वर्षापर्यंत तरी मी ग्राऊंड सोडत नाही असा आशावाद ते व्यक्त करतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश, राजस्थान येथील काही खेळाडू त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात असतात. क्रिकेट हा झटपट आत्मसात होणार खेळ नाही त्याला सरावाबरोबरच अभ्यासाची गरज आहे. खेळाडूंनी खेळात सातत्या राखावे निश्चिच यश पदरात पडेल असे ते सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव, उमराणेत ९८ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव बाजार समिती व उमराणे बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. दोन्ही बाजार समित्यांच्या प्रत्येकी १८ जागांसाठी निवडणूक झाली. मालेगाब बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान झाले, तर उमराणेतही ९९ टक्के मतदान झाले. आज (दि. २२) सकाळी आठ वाजेपासून येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागातील आठ अशा नऊ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. उमराणे येथे देखील चार मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळी थंड प्रतिसाद होता. दुपारनंतर मतदारांचा प्रतिसाद वाढत गेला. सर्वच केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात आणि ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच पॅनल प्रमुख, उमेदवार आणि समर्थकांची गर्दी झाली होती.

राज्यमंत्री दादा भुसे, अद्वय हिरे व प्रसाद हिरे यांनी स्वतः सर्वच मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेनेच्या पॅनलची धुरा राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांभाळली, तर भाजपच्या हिरे पॅनलकडून अद्वय हिरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळीराजा पॅनलकडून प्रसाद हिरे स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मालेगाव आणि उमराणे बाजार समितीसाठी मतदान शांततेत पार पडल्यानंतर आता मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. मालेगाव बाजार समितीची मतमोजणी सकाळी आठपासून येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात होणार आहे. उमराणे येथील जि.प. शाळेतच मतमोजणी होणार आहे.

उमराणे बाजार समिती मतदान गट - एकूण मतदार - झालेले मतदान सोसायटी - १०० - १०० ग्रामपंचायत - ८० - ८० हमाल मापारी - १२९ - १२९ व्यापारी - २५८ - २५१ एकूण - ५६७ - ५६० - मालेगाव बाजार समिती मतदान गट - एकूण मतदार - झालेले मतदान सोसायटी १५४८ - १५४६ ग्रामपंचायत - ११९१ - ११८७ हमाल मापारी - ३०३ - ३०१ व्यापारी - ६९३ - ६६८ एकूण - ३७३५ - ३७०२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव मर्चंटसाठी ८६.२२ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत येथील पिंपळगाव मर्चंट बँकेसाठी विक्रमी ८६.२२ टक्के मतदान झाले. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत ५४३० मतदारांपैकी ४७९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज, सोमवारी सकाळी आठ वाजता येथील चिंचखेड गेटवरील सौभाग्य मंगलकार्यालयात मतमोजणीस प्रारंभ होईल.

पिंपळगाव मर्चंट बँकेसाठी नाशिक व पिंपळगाव ‌हे दोन मतदान केंद्र होते. पिंपळगाव बसवंत येथील मतदान केंद्रावर ४३२६ पैकी ३६८८ मतदारांनी मतदान केले. नाशिक येथे १३२३ पैकी ११०४ मतदारांनी मतदान केले. किरकोळ कुरबुरी वगळता शांततेत मतदान झाले. अशोक शहा, सुमतीलाल सुराणा, सोहनलाल भंडारी, विजय बाफणा, व्दारकानाथ मुंदडा, प्रकाश देशमुख, राजेंद्र बाविस्कर, राजेद्र छाजेड आदी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

अशोक शहा यांचे उत्कर्ष पॅनल तर सुमतीलाल सुराणा यांचे परिवर्तन पॅनल अशी सरळ लढत आहे. गत आठ दिवसांपासून दोन्ही पॅनलने प्रचाराचा धुराळा उडवला होता. दोन्ही पॅनलकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images