Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘त्रिवेणी संगमा’मुळेच वसाका रुळावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

राज्य सरकारचे थकहमीपत्र, राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जाचे केलेले पुनर्घटन व आर्थिक मदत करून जिल्हा बँकेने दिलेली साथ या त्रिवेणी संगमामुळे राज्यात 'नवीन पॅटर्न' तयार करून वसाकाची चिमणी पुन्हा पेटव‌तिा आली. यासोबतच गेल्या तीन वर्षांपासून कारखान्याच्या कामगारांनी कोणताही मोबदला न घेता कारखाना चालू करण्यासाठी दिलेली मोलाची साथ ही अभिनंदनीय आहे, असे मत कारखान्याचे मुख्य प्राधिकृत अधिकारी तथा आमदार डॉ. राहुल आहेर यांनी व्यक्त केले.

गुरुवारी वसाकाच्या ३० व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ व अखेरच्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते.

गळीत हंगामाच्या अखेरच्या साखर पोत्याचे पूजन आमदार डॉ. राहुल आहेर, प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा आहेर, जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, बाळासाहेब बच्छाव, अभिमन पवार, यांच्यासह कारखान्याचे माजी संचालक व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी संचालक वसंतराव निकम, प्रभाकर पाटील, मधुकर शेलार, शिवाजी सोनवणे ,कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे आदींनी मनोगत व्यक्त करून 'वसाका पॅटर्न'चे कौतुक केले.

आमदार डॉ. आहेर पुढे म्हणाले, सुदैवाने यावर्षी साखरेच्या भावात वाढ झाली असल्याने त्याचा लाभ मिळणार आहे. कारखान्याच्या आदिवासी सभासदांसाठी सरकारकडून एक कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या आगामी वाटचालीस बळ मिळेल. हे सगळे पाहता कारखाना खरेच चालू होईल का? असे म्हणणाऱ्यांना आपण आपल्या कामातून उत्तर दिल्याने आज खऱ्या अर्थाने आनंद होत आहे. वसाकाच्या ३० गळीत हंगामात ९१ हजार ९७७ मेट्रिक टन उसाचे गाळप होवून ९३ हजार ९१० क्विंटल (पोती) साखरेचे उत्पादन होऊन १०.२१ इतका साखर उतारा मिळाला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

याप्रंसगी माजी संचालक संतोष मोरे, रामदास देवरे, फुला जाधव, शांताराम जाधव, पंचायत समितीचे सभापती अशोक बोरसे ,हिरामण पगार, मधुकर पगार, शरद गुंजाळ,विलास निकम ,माणिक निकम, जयवंत पाटील वसाका मजदूर युनियनचे सरचिटणीस रवींद्र सावकार शेतकी अधिकारी संजय दिघे, सभासद, शेतकरी, कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांनी केले. कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाकाठी पारंपरिक वीरांचा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुताऱ्यांसह ढोल-ताशांचा आवाज, त्या आवाजाच्या ठेक्यावर नाचणारे वीर, देवीदेवतांचे रंगवलेले मुखवटे आणि चिमुरड्यांनी केलेल्या विविध वेशभूषा असो माहोल होता, होळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धूलिवंदनाला प्रथेनुसार निघालेल्या वीरांच्या मिरवणुकीत. पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत वीरांची मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकातील होळीभोवती विविध देवदेवतांच्या तसेच महापुरुषांच्या वेशभूषेत सजलेले वीर मिरवणुकीत सहभागी झाले.

सायंकाळी गंगाघाट परिसरात वीरांची मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांसह खंडेराव, श्रीकृष्ण, भगवान शंकर, हनुमान आदी देवदेवतांच्या वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले. वीरांना पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन असते. याच दिवशी बाशिंगे आणि दाजिबा वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. येथील होळीला वीरांकडून प्रदक्षिणा घालण्यात आली. खोबऱ्याच्या वाटीसह नवीन कापडात गुंडाळलेल्या देवतांचे टाक म्हणजेच प्रतिमांना गोदाजलाचा अभिषेक यावेळी घालण्यात आला. लहान मुलांना खांद्यावर घेऊन नागरिक वाद्याच्या चालीवर नाचतांना दिसून आले.

..

रंगली दाजिबा वीराची मिरवणूक (फोटो)

जुन्या नाशकातील बुधवार पेठेतून दुपारी चार वाजता मानाच्या वीर दाजिबा मिरवणुकीला प्रारंभ केला. वाघ्या-मुरळीच्या वाद्यवृंदात नाचत-गाजत वीरांच्या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. परिसरातील युवकांनी नाचत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नवसाला पावणारा म्हणून श्रद्धा असल्याने नागरिकांनी वीराला बाशिंगाचा जोड, हार, नारळ अर्पण केले. बुधवार पेठ, डिंगरअळी, संभाजी चौक, जुनी तांबट गल्ली, म्हसरूळ टेक, तिवंधा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा या मार्गे 'वीर' मिरवणूक गोदाघाटावर पोहचली.

..

वीरांचे जल्लोषपूर्ण नृत्य

गोदाघाटावरील सर्वात मोठ्या होळीभोवती वीर प्रदक्षिणा घालतात. घरातील देव्हाऱ्यात आपल्या वंशपरंपरागत आजोबा आजी यांचे वीर म्हणजेच चांदीचे टाक असतात. हा टाक खोबऱ्याच्या वाटीत टाकून त्याभोवती लाल कपड्याने (बसन) बांधण्यात येते. त्यानंतर ही खोबऱ्याची पाटी घेऊन होळीभोवती प्रदक्षिणा मारण्यात येतात. होळीभोवती फिरणाऱ्या चैतन्यकणांनी अनेक आजार दूर होतात तसेच उत्साह प्राप्त होतो अशी आख्यायिका असल्याने होळीभोवती फेर धरून वीर जल्लोषात नाचले.

..

डफ-सुंदरी वादक उत्साहात

चारही दिशेने येणारे वीर गोदाघाटावर जमा होतात. या वीरांसोबत घरातले वीर नाचविण्याचीही पध्दत असल्याने गोदाघाटाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या ठिकाणी हौशे-नवशे-गवशे जमा झाल्याने प्रचंड प्रमाणात गर्दी झाली. वीर पाहण्यासाठी नाशिककर गोदाघाटावर सजून आलेले होते. यात विशेष म्हणजे चिमुरड्यांची विविध वेशभूषा करून त्यांना नाचण्यासाठी आणण्यात आले. डफ आणि सुंदरी वाजवणारेही या वीरांना नाचविण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना त्यासाठी दहा-वीस रुपये मिळतात. ज्यावेळी घरून कुणी वीर घेऊन येते तेव्हा दोन-पाच मिनिटे या डफवाल्यासमोर नाचायचे, तोदेखील चांगला ताल देऊन वाजवत असतो. त्यानंतर त्याला बिदागी म्हणून काही पैसे द्यायचे असे डफ वाजवणारे गोदाघाटावर विखुरलेले होते.



शिंगवे बहुला येथे वीरांची मिरवणूक

बुधवारी होळी उत्साहात साजरी झाल्यानंतर गुरुवारी शिंगवे बहुला येथे वीरांची मिरवणूक काढण्यात आली. फाल्गुन वद्य प्रतिपदेला वीरांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. घरातील पूर्वजांचे टाक म्हणजेच वीर खोबऱ्याच्या वाटीसोबत बांधून लहान लहान मुलं हे वीर घेऊन नाचतात. यावेळी लहान मुलांनी आकर्षक वेष परिधान केले होते. डोक्यावर आकर्षक फेटे, हातात तलवारी, यांमुळे वीर लक्ष वेधून घेत होते. गावामध्ये या वीरांची मिरवणूक काढून त्यानंतर होळीला पाच प्रदक्षिणा घातल्या गेल्या. त्यानंतर वीरांना सन्मानाने घरी आणून वीरांची तळी भरून खोबरे वाटी प्रसाद म्हणून वाटली जाते. यावेळी गावातील वातावरण उत्साहाने भारून गेले. शेकडो वर्षांपासून गावात ही परंपरा पाळली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घेईल त्याची आडत’ला उपनिबंधकांकडून खतपाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील बाजार समितीत घेईल त्याची आडत पद्धत बेकायदेश‌ीरपणे सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा उपनिबंधकांनी ही पद्धत बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही ही पद्धत सुरू आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच शेत मालाचा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी दाभाडी येथील प्रगतिशील शेतकरी अंबुदास नारायण निकम यांनी केली आहे.

येथील सरकारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मालेगाव बाजार समितिकडून बेकायदेशीर घेईल त्याची आडत पद्धतीला कशा पद्धतीने अभय दिले जाते आणि यामुळे शेतकऱ्याचे कसे आर्थिक नुकसान होते आहे याबाबत माहिती दिली. निकम म्हणाले की, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सहकार पणन कायद्याने बाजार समिती अंतर्गत शेतकरी (विक्रेता) आडत्या (खरेदी विक्री मध्यस्थ) खरेदीदार (व्यापारी) असे तीन घटक अंतर्भूत असतात.

यातील आडत्या हा शेतमालाच्या विक्रीनंतर शेतकाऱ्याला मालाचे पैसे खरेदीदाराच्यावतीने रोख स्वरुपात देतो. या बदल्यात शेतकरीकडून ३ ते १० टक्के आडत कपात केली जाते.

यातून आडत्या कोट्यवधी रुपये कमावतो. ही बाब व्यापाऱ्यांनी लक्षात घेत 'घेईल त्याची आडत' ही बेकायदेशीर पद्धत जन्माला घातली आहे. मालेगाव बाजार समितीत देखील हीच पद्धत सुरू असून लाखो शेतकऱ्यांची लूट होत आहे.

दरम्यान याबाबत आपण अनेकवेळा बाजार समिती प्रशासन सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे वारंवार तक्रार केली आहे.

जिल्हा निबंधकांना माहिती अधिकारात पाठविलेल्या पात्रालाही त्यांनी व्यापऱ्यांच्या हितासाठी केराची टोपली दाखविली आहे. तसेच या प्रकरानवरून गेल्या काही दिवसात जीवे मारण्याच्या देखील धमक्या देण्यात आल्याचे त्यांनी संगितले. मालेगाब बाजार

समितीत सुरू असलेली बेकायदेशीर पद्धत बंद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा विद्यमान सभापती संचालक व सचिव यांच्या

विरोधात कायदेशीरपणे न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा प्रगतिशील शेतकरी अंबुदास नारायण निकम पत्रकार परिषदेत दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व यंत्रणांची माहिती मिळविण्याचा हक्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता यावी, तसेच सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी माहिती अधिकार अधिनियम २००५ ची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय संविधानाद्वारे लोकशाही गणराज्य स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांना या अधिकारामार्फत सर्व यंत्रणांची माहिती मिळवता येऊ शकते किंबहुना तो त्यांचा हक्कच असतो, असे प्रतिपादन माहिती अधिकार तज्ज्ञ अशोक पवार यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत नाशिकमधील मनमाड व येवला येथे कार्यशाळा झाली. समाजातील उपेक्षित घटकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्याप्रसंगी स्थानिकांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये नागरिक व सरकारी माहिती यांमध्ये पारदर्शकता आणणे व त्यातून भ्रष्टाचाराला आळा घालणे आजची गरज आहे. सरकार व त्यांची यंत्रणा प्रजेला जाब देण्यासाठी जबाबदार असते. या अधिकारामार्फत नागरिकांना सर्व कामकाजाची माहिती घेता येऊ शकते. माहिती म्हणजे नोंदी, कागदपत्रे, शेरे, मेमो, इ-मेल्स, सल्ले, मते, प्रसिद्धीपत्रके, आदेश, परिपत्रके, रोजनिशी, करारनामा, अहवाल, कागद, उदाहरणे, नमुने या आणि अशा स्वरूपातील कोणतेही साहित्य तसेच इलेक्ट्रोनिक माध्यमात असलेली कोणत्याही स्वरूपाची खासगी माहिती, जी प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणास जाणून घेण्याचा अधिकार आहे. अशा अनेक माहिती मिळविण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. याशिवाय सामान्य नागरिकाला या कायद्याविषयी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मनमाडचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे होते. डीवायएसपी राहुल खाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन विभागीय सहाय्यक प्रकल्प संचालक श्रीकांत आहेर, प्रकल्प अधिकारी बी. वाय. पाटील व जनसंपर्क अधिकारी पल्लवी पगारे यांचा मार्गदर्शनाखाली तालुक्याचे सामतादूत मनोज पांडव व गणेश बच्छाव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता गनिमी काव्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,येवला

महिलांना मंदिर प्रवेश देण्याबाबत सुरू केलेला लढा हा कुठला धर्म अथवा परंपरेच्या विरोधात नसून वाईट रुढींच्या विरोधात आहे. मंदिर प्रवेशाबाबतची ही लढाई सुरूच राहणार आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिर प्रवेशाचा पहिला प्रयत्न फसला असला तरी भूमाता ब्रिगेडच्या महिला आता गनिमी काव्याने थेट गाभाऱ्यापर्यंत प्रवेश करतील, असा इशारा ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला.

महिलांना विविध ठिकाणच्या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी सर्वांचेच लक्ष वेधणाऱ्या तृप्ती देसाई गुरुवारी दुपारी निफाड तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी जात असतांना काही वेळ येवल्यात थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भारतीय संविधान अत्यंत महत्त्वाचे असून संविधानाने या देशातील महिलांना पुरुषांबरोबर समान हक्क दिलेले आहेत. या हक्कांसाठीच आमची लढाई सुरू असल्याचे देसाई म्हणाल्या.

शनीशिंगणापूर व त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक रहिवाशी महिला ह्या तेथील परंपरेच्या पगड्याखाली दबल्या गेलेल्या आहेत. संपूर्ण देशातील महिलांचा मंदिरासह शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर प्रवेशासाठी भूमाता ब्रिगेडला मोठा पाठींबा मिळत असल्याचा दावाही देसाई यांनी केला. मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, काँग्रेस यांच्यासह मायावती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या पाठीशी असल्याचे त्या म्हणाल्या.

केरळसह इतर काही राज्यांमध्ये काही ठिकाणी पुरुषांना मंदिर प्रवेशास बंदी असल्याचे त्यांनी सांगितले. पुरुषांना त्या मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आपण येत्या एप्रिल महिन्यात कोल्हापूरपासून आंदोलनाला प्रारंभ करणार असल्याचेही त्या म्हणाला. त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाबाबत येत्या ३ एप्रिलनंतर मंदिराच्या विश्वस्तांसह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख आणि भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक जिल्हा प्रशासनाने आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग सुट्यांमुळे कोट्यवधींचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मार्च एण्ड आणि सणासुदीच्या निमित्ताने आलेल्या सलग १२ दिवस सुट्यांमुळे लासलगाव बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा

आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा व धान्य लिलावाचे कामकाज या दिवसात बंद राहणार असल्याने कोट्यवधींचे व्यवहार येत्या ठप्प राहणार आहेत. २३ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत बाजार समिती बंद राहणार आहे. सध्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक सुरू असून ओघ काहीसा थंडावला आहे.

काही दिवसांपासून नवीन उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. मात्र आता मार्च एण्ड व सणानिमित्त सुट्या आल्याने सुटीनंतर पुढील महिन्यात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आवक वाढली की कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दहा दिवसांच्या सुटीत कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

दुष्काळामुळे प्रसंगी टँकरने पाणी आणून उन्हाळ कांद्याला पाणी देऊन पिक जगव‌लिे आहे. याच पिकावर शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न, घरगुती सोहळे, शिक्षण अवलंबून आहे. मात्र १२ दिवसांच्या खंड त्यातच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात येत असलेला कांदा यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ठाणे’दार वाढविणार शिवसैनिकांचे बळ!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेच्या विरोधात भाजपने आमदारांची व वरिष्ठ नेत्यांची फळी मैदानात उतरविल्यानंतर शिवसेनाही जशास तसे उत्तर देणार आहे. भाजप महिला मेळाव्यावरील हल्ल्यानंतर भाजपची आक्रमकता वाढल्याने नाशिकमधील शिवसैनिकांना बळ देण्याची जबाबदारी मातोश्रीवरून ठाण्याचे किल्लेदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिंदे आज, शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत असून, शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शिवाय, कारागृहात असलेल्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह नऊ शिवसैनिकांचीही भेट घेणार आहेत.

पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्या तरी वर्षभरापूर्वीच शिवसेना व भाजपमधील संघर्ष टोकाला पोहचला आहे. शिवसेनेने विविध प्रश्नांवरून मोर्चा काढून भाजपला कोंडीत पकडले आहे. त्यातच मंगळवारी स्वतंत्र मराठवाड्याचे समर्थन केल्यावरून शिवसेना नेत्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह दीडशे शिवसैनिकांनी भाजपचा मेळावा उधळला. त्यामुळे दोन्ही पक्षांतील संघर्ष पोलिस स्टेशनपर्यंत पोहचला. भाजपतर्फे सत्याभामा गाडेकरांसह शिवसैनिकांवर लुटमारीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटक करून त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. भाजपने थेट शिवसेनेची कबर खोदण्याचा इशारा दिला आहे. गृहमंत्रालय मुख्यमंत्र्याकडेच असल्याने सत्तेचा वापर करीत शिवसैनिकांवर अन्याय केला जात असल्याचे भावना निर्माण झाली आहे.

भाजपच्या आक्रमकतेला शिवसेनाही जशासतसे उत्तर देणार असून, त्यासाठी थेट मातोश्रीवरून शिवसेनेचा ठाण्याचा गड शाबूत ठेवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना नाशिकमध्ये धाडण्यात आले आहे. शिंदे शुक्रवारी नाशिकमध्ये येऊन प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते कारागृहात जावून गाडेकरांसह शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवणार आहे. भाजपविरोधातील आक्रमकतेची रणनीती शिंद यांच्या उपस्थितीत आखली जाणार असून, त्यासाठी `ठाणे पॅटर्न` वापरला जाणार आहे. त्यामुळे आता भाजपलाही आक्रमकतेनेच उत्तर मिळणार असल्याने दोन्ही पक्षातील संघर्ष टोकाला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लामकानी’ प्रकरणी पुण्यातून आरोपींना अटक

$
0
0

२८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

ऐन दिवाळी सणात घरासमोरच सराफ व्यावसायिकावर हल्ला करत सोने-चांदी व रोकड घेवून पोबारा करणाऱ्या लुटारूंचा शोध लावण्यात तालुक्यातील सोनगीर पोलिसांना यश आले आहे. गेल्यावर्षी ९ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी लामकानी गावातील सराफ अनिल उत्तमचंद बाफना यांच्यावर अज्ञात दरोडेखोरांनी बंदूकीने गोळ्या मारत त्यांना गंभीररित्या जखमी केले होते. त्यांच्याकडे असलेले दागिने व रोकडे घेवून ते पसार झाले होते.



दिवाळीच्या दिवशी झालेल्या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली होती. त्यात बाफना यांच्यावर गोळ्याही झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी सोनगीर पोलिसांचे पथक या दरोडेखोरांच्या मार्गावर होते. त्यापैकी तीन जणांना पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्यात गोरख गोविंद राठोड, धरतीपूत्र शंकर राजपूत, लवकुश फुला राठोड (सर्व रा. आंबीमावळ, जि. पुणे) यांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ८,३३,५०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.



या घटनेची माहिती सहायक पोलिस निरीक्षक धनजंय पाटील यांना मिळताच वरीष्ठांना माहिती देवून धुळे जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली होती. मात्र तरीही हे दरोडेखोर पोलिसांच्या तावडीतून निसटले होते. त्यांच्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नेमून तपासचक्रे फिरवली. त्यात दरोडखोरांनी वापरलेल्या मोटारसायकली पुणे, पिंपरी चिंचवड भागातील आढळून आल्या. त्यावरुन पुणे येथील आळेफाटा याठिकाणहून तीन आरोपींना पोलिसांनी पकडले. त्यांनी दिलेल्या कबुली जबाबावरुन सोने-चांदीचे दागिणे हे दौंड जि. पुणे येथील एका सराफाला विकले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तीनही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींकडून जिल्ह्यातील इतर दरोड्यांचेही धागेदोरे गवसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोफत पाणी देणाऱ्या सेवाभावींचा सत्कार

$
0
0

खासदार डॉ. हिना गावीत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गावाचा विकासात्मक आराखडा तयार करण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना विश्वासात घ्यावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. हिना गावित शिवजयंती निमित्त इंद्रधनुष्य युवा फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात केले. या वेळी दुष्काळ परिस्थितीत गावात स्वखर्चाने खासगी बोअरवेलमधून पाणी उपलब्ध करून देणाऱ्यांचा खासदार डॉ. हिना गावितांकडून सत्कार करण्यात आला.


संपूर्ण जिल्हाभरात शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी होत असताना, तालुक्यातील धानोरी गावातील इंद्रधनुष्य युवा फाऊंडेशनच्या वतीने शिवजंयती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. खासदार गावीत पुढे म्हणाल्या की, सामाजिक व विकास कामांमध्ये गावाने पुढाकार घ्यावा. तसेच राजकारणाच्या पलिकडे जाऊन गावाचा विकास होत असतो. त्यात युवकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, उत्पादन शुल्क अधीक्षक नंदा पाडवी, ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र दोरकर, तानाजी वसावे, सरपंच ललिताबाई वळवी, सुनिल वसावे, ग्रा.पं.सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महेंद्र चित्ते, राहुल चौधरी, सचिन वरसाळे, जयेश चौधरी, हिरालाल वरसाळे, उमेश वळवी, आशिष शर्मा, राजा चौधरी, सागर भोई, भूषण पाटील, किरण चौधरी, गणेश पाडवी, विशाल चौधरी, गोलु चौधरी, प्रंशात पाटील, चेतन चौधरी, भूषण चौधरी, यांनी परिश्रम घेतले. असई धनगर, उदेसिंग वळवी, मनोज चौधरी, अधिकार बोरसे, दिनेश वळवी यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांच्या चर्चेबाबत मला माहिती नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकूल योजनेचे काम खान्देश बिल्डर्सला दिले हे गोलाणी ब्रदर्सने माझ्या व मनपाच्या निदर्शनास आणून दिले होते. गोलाणी ब्रदर्सला योजनेचे काम मिळाली नाही म्हणून त्यांनी कोणत्याही मंचावर त्याविषयी वाद केला नव्हता. तर घरकूल योजनेच्या कामांच्या वाटाघाटीनंतर निविदेचा दर हा १७.५ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मात्र ज्यावेळी निविदाचा दर खाली आला. त्यावेळी खान्देश बिल्डर्समध्ये काय चर्चा झाली हे सांगता येणार नाही, असेही डॉ. प्रवीण गेडाम यांनी उलटतपासणीत सांगितले.
यासोबतच त्यावेळेस निविदाचा दर कमी केल्यामुळे १८,५२,८२,००० रुपयांचा नगरपालिकेला फायदा झाला होता. हे मात्र खरे नाही. तसेच निशाणी क्रमांक १८०७ च्या नोटीसमध्ये असे नमूद केले आहे की, खान्देश बिल्डर्सचे नगरपालिकेकडे सुमारे ७०५.२५ लाख रुपये घेणे आहे. मात्र घरकूल योजनेचे अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याची परवानगी देण्यात यावी, असेही खान्देश बिल्डर्सने न. पा. ला पत्र दिले होते. हे मला माहित आहे. असे जळगाव मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. आरोपी वाणी यांच्या वकीलांनी गेडाम यांना पुढील प्रश्न विचारले.


प्रश्न - सरकारी निविदेमध्ये पोलाद व सिमेंट हे सरकार पुरविणार होते का?

गेडाम - नाही हे त्या-त्या योजनेच्या प्रकारावर अवलंबून असते. बहुतेक निविदांमध्ये सरकार हे पुरवित नाही.

प्रश्न - याबाबत काही कागदोपत्री पुरावा तुमच्याकडे आहे का?

गेडाम - नाही, या क्षणाला तरी नाही मात्र मी याविषयीचे कागदपत्रे सादर करू शकतो.

प्रश्न - घरकूल योजनेचे काम सुरू असताना १० मे २००१ ला मुख्याधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या कारणास्तव बांधकाम थांबविण्याचे पत्र खान्देश बिल्डर्सला दिले होते का?

गेडाम - हे सांगता येणार नाही, आणि खरे नाही.

प्रश्न - या दोन्ही कारणांमुळे नगरपालिकेने ३१ मार्च २००४ रोजी कामाची मुदतवाढ देण्यासाठी पत्र दिले होते का?

गेडाम - माझ्या माहितीनुसार तथापि नगरपालिकेने पारित केलेल्या ठरावात नमूद केले होते.

प्रश्न - ज्यावेळी काम थांबविण्यात आले होते, त्याचवेळी खाँजामिया परिसरातील झोपडपट्टी धारकांसाठी घरकूल बांधण्याचे काम खान्देश बिल्डर्सला देण्यात आले होते का?

गेडाम - हो, हे बरोबर आहे.

प्रश्न - खान्देश बिल्डर्सने ५० लाखांची ४८० घरकूले बांधलीत पण त्यांची बिले नगरपालिेकेने अदा केली नाहीत का?

गेडाम - आता मला ते आठवत नाही.

प्रश्न - २२ एप्रिल २००२ ला घरकूल योजनेचे ६८.४६ कोटींचे काम राहिले होते. त्यासाठी खान्देश बिल्डर्सने न. पा. ला पत्र दिले होते की, दरमहा ३ कोटी रुपये मिळणे गरजेचे आहे.?

गेडाम - हे, मला माहीत नाही.

प्रश्न - जळगाव नगरपालिकेतील अध्यक्ष के. डी. पाटील यांना याचवेळी लाचलुचपत प्रकरणात गोवण्यात आले होते?

गेडाम - हे मला माहित नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलाढालीला दुष्काळाची झळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याला सोने-चांदी, वाहन किंवा वास्तू खरेदी करण्यात येते. या एका दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यंदा मात्र, सराफ व्यावसायिकांचा बंद आणि दुष्काळ अशा दुहेरी कात्रीत गुडीपाडावा सापडला. वाहन खरेदी, नवीन घरासाठी नोंदणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठात उलाढाल झाली. मात्र, गत वर्षीपेक्षा त्यात काही प्रमाणात घट पहावयास मिळाली. दिवाळी, दसरा तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. सोने-चांदी, वाहन, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक बाजारपेठा गर्दीने फुलून जातात. यंदा मात्र या सर्व व्यवसायांना दुष्काळाची झळ बसली आहे. तसेच, केंद्र सरकारने उत्पादन शुल्कासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सराफ असोसिएशनने बंद पुकारल्याने मार्केटमध्ये अपेक्षित उलाढाल झाली नाही. दिवाळीच्या दरम्यान चारचाकी वाहनांमध्ये सहा लाख रुपयांपेक्षा जास्त ​किमतीच्या कारसाठी चांगली मागणी होती. गुढीपाडव्यादरम्यान मात्र हीच मागणी घटली. सहा लाख रुपयांपेक्षा कमी किमती असलेल्या कारसाठी ग्राहकांनी पसंती दर्शवली. कार आणि दुचाकी मार्केटमधील एकूण उलाढाल सुमारे ५० कोटी रुपयांपर्यंत झाली. काही प्रमाणात मंदीत असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्रात यामुळे चैतन्य पसरले. सध्या, दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी कार तसेच दुचाकी विक्रीने वेग पकडला असल्याचा दावा काही शोरूम चालकांकडून केला जात आहे. चालू वर्षात मोपेड (गेअर नसलेल्या दुचाकी) दुचाकींना चांगली पसंती असून यात लक्षणीय वाढ होऊ शकते, असा दावा आरटीओ अधिकाऱ्यांनी केला. यामुळे वाहन क्षेत्रात तेजी येण्याची शक्यता आहे.

गतवर्षाच्या तुलनेत विक्रीत घट दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या उलाढालीला सुध्दा काही प्रमाणात ब्रेक लागला. यंदा शहरातील वेगवेगवळ्या कंपन्यांच्या शोरूममधून फारतर १ हजार ३०० दुचाकींची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी हाच आकडा १ हजार ८०० च्या दरम्यान होता. पॅसेंजर कार विक्रीचा आकडा ५५० ते ६०० दरम्यान राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात आठ ते १० टक्के घट झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला मंगेशने ओढल्या बारागाड्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूरला गुढीपाडव्यानिमित्त बारागाड्यांची यात्रा उत्साहात झाली. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी यात्रेला हजेली लावली. गणेशाचा मान असलेले मंगेश प्रकाश निगळ यांनी भवानी मातेचे रूप घेत त्र्यंबक रोडवर उभ्या असलेल्या बारा गाड्या ओढल्या. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त होता. सातपूर पंचक्रोशित गुढीपाडव्याला बारा गाड्या ओढण्याची प्रथा आहे. सातपूरमधील निगळ परिवारातील दरवर्षी एका व्यक्तीला गणेशाचा मान देत बारा गाड्या ओढल्या जात असतात. पाडव्याच्या दिवशी सांयकाळी चार वाजेपासून बारा गाड्या ओढणाऱ्या गणेशाला भवानी मातेचा पेहराव चढविला गेला. यानंतर सातपूर गावातून गणेशाची सवाद्य मिरवणूक काढून मारूती मंदिरात नेण्यात आली. प्राचीन मारुती मंदिराचे दर्शन घेतल्यावर गणेशाने त्रंबक रोडवर उभ्या असलेल्या बारा गाड्यांना प्रद‌क्षिणा घालत एमआयडीसीतील सातपूरचे ग्रामदैवत सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. यानंतर पुन्हा त्र्यंबक रोडवर उभ्या असलेल्या बारा गाड्या गणेशाने ओढल्या. पंचक्रोशितील हजारो भाविकांनी मोठ्या श्रध्देने बारा गाड्या यात्रेचा लाभ घेतला. यावेळी आमदार सीमा हिरे, उपमहापौर गुरुमीत बग्गा, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, सातपूर प्रभाग सभापती उषा शेळके, नगरसेवक प्रकाश लोंढे, नगरसेविका सविता काळे, सुरेखा नागरे, नंदिनी जाधव, सातपूर यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक मौले, उपाध्यक्ष गोकुळ निगळ, आयोजक शांताराम निगळ, प्रकाश निगळ, राजाराम निगळ आदी उपस्थित होते.

स्क्रिनने आणली रंगत यंदा बारा गाड्या यात्रेला दोन स्क्रिन लावल्याने रंगत आली होती. स्क्रिनमुळे लहान मुलांसह महिलांनी बारा गाड्या ओढणाऱ्या गणेशाला जवळून पाहता आले. दरवर्षी यात्रा उत्सव समितीने यात्रेत स्क्रिन लावावे, अशी मागणी भाविकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वाहनांच्या अपघातांमध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील मणेगाव येथे राहणारे परशराम सोनवणे (वय ५०) शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कुऱ्हेगाव येथून जात होते. तिथे एका वळणावरून सोनवणेंच्या दुचाकीस अपघात झाला. अपघाताची दुसरी घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील मोराडे मळा येथे घडली. या ठिकाणी दुचाकीवरून (एमएच १५ एफसी ३२१७) जात असताना व्यक्तीचा अपघात होऊन त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यातच तो मृत्युमुखी पडला. या तरुणाची ओळख पटली नाही. अपघाताची आणखी एक घटना आडगाव पोलिस स्टेशन हद्दीत बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. पेठरोड येथे राहणारे विजय एस. म्हस्के हे मोटरसायकल (एमएच १५ सीएक्‍स ३१२२) ओझरकडून नाशिककडे जात असताना हरिसन लॉजसमोर पाठीमागून भरधाव येत असलेल्या वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यात म्हस्केंचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेगवेगळ्या भागात सातत्याने चेन स्नॅचिंग होत असून, या आठवड्यात गुन्हेगारांनी लाखो रुपयांचे स्त्रीधन लुटले. सातत्याने होणाऱ्या घटनांचा माग काढणे पोलिसांना अद्याप शक्य झालेले नाही. शहरात मागील ४८ तासांत तीन ठिकाणी चेन स्नॅचिंगचे प्रकार घडले. शुक्रवारी इंदिरानगर भागातील कलानगर परिसरात सकाळी पाऊणे नऊ वाजेच्या सुमारास वैशाली आसोले (वय ४८) या पायी जात होत्या. यावेळी पत्ता विचारण्याच्या निमित्त्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले. आसोलेंना काही कळायच्या आत भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये ​किमतीची सोन्याची चेन तोडून पोबारा केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी गुरुवारी गंगापूर आणि उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत दोघा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. कॉलेज रोडवरील कारवा सोसायटी येथे राहणाऱ्या नलिनी मधुकर दीक्षित या त्यांच्या मैत्रीण समवेत सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ चौकातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजनाची आणि ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. तिसऱ्या घटनेत मौलाना आझाद चौक येथील सत्यलक्ष्मी सोसायटीतील मलकितसिंग चरणसिंग राणा यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची चेन तोडून नेली. उपनगर येथील छत्रपती शिवाजी हॉल जवळून राणा पायी जात असताना तिथे उभ्या असलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदू नववर्षाचे सेलिब्रेशन सोशल मीडियावरही व्हर्च्युअल गुढीपाडव्याच्या रूपात दिसून आले. परंपरेनुसार चैत्र महिन्यात आपले नवीन वर्ष सुरू होत असते. ते साजरे करण्यात आजच्या धकाधकीच्या 'स्मार्ट' जीवनात यंग इंडियाही मागे राहिलेला नाही. ज्या तत्परतेने यंग ब्रिगेड हॅप्पी न्यू इयरसाठी एसएमएस, व्हॉटस्अॅप, सोशल साइटसवर शुभेच्छा देतात. त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडवाही या सोशल मीडियावर साजरा करण्यात आला. मोबाइल आणि स्मार्टफोनद्वारे आपल्या भावना मित्र, नातेवाइकांना पोहचविण्यासाठी ज्येष्ठांनीही या सोशल मीडिया आणि व्हॉटस्अॅपचा उपयोग करून घेतला. त्यामध्ये काहींनी आपल्याच नावाने संदेश देण्यात धन्यता मानली तर क‌ाहींनी गुढीपाडव्याच्या गुढीसोबत आपला सेल्फी काढत व्हॉटसअॅप आणि सोशल साइटसवर टाकले आहेत. कामाच्या व्यस्ततेत आपण नातेवाईकांना सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करतो.

दुष्काळाची झालर या सर्व गोड शुभेच्छांमध्ये सोशल मीडियावरही बळीराजासाठी आणि पाण्यासाठी या नववर्षात पाणी वाचविण्याचे संदेशही याद्वारे काहींनी दिले. या नवीन वर्षात आपण सर्वांनी पाणीटंचाईमुळे पाणी वाचवत जपून वापर करा, असाही संकल्प देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नववर्षाचे हर्षोल्हासात स्वागत

$
0
0

हजार ढोलांचे वादन नाशिक : ढोलताशाच्या गजरात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आले. गोदावी घाटावरील मंदिरावर रोषणाई करण्यात आली. नववर्षाच्या स्वागतासाठी संस्कृती संवर्धन मंडळातर्फे १ हजार ढोलांचे वादन करण्यात आले. मिरवणुकीत ढोल ताशे, लेझीम, पारंपरिक मर्दीनी खेळ इत्यादींचा समावेश होता.

चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे पाडवा. प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. हिंदू नववर्ष आणि पाडव्याचे औचित्य साधून रामनवमीच्या उत्सावाला पाडव्यापासून सुरुवात झाली. यावेळी काळाराम मंदिरात विशेष पूजा झाली. यावेळी महंत सुधीरदास पुजारी व विश्वस्त अॅड. अजय निकम सहभागी झाले. कपालेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक घालत नवे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावे अशी प्रार्थना करण्यात आली.

गंगापूर रोडला स्वागतयात्रेचा जल्लोष नाशिक : डोंबिवली, पुणे शहरांप्रमाणेच नाशिक येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रांनी एक वेगळेच आकर्षण निर्माण केले आहे. या स्वागत यात्रांमधून परंपरा जपतानाच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही जतन करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. नाशिकमध्ये सर्वप्रथम एकाच परिसरातून सुरू झालेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आता शहराच्या विविध भागांतून निघू लागल्या असून या यात्रांमधील नागरिकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून किमान तीन महिने आधीपासून तयारी केलेली स्वागत यात्रा गंगापूर रोड येथून जाताना हर्षोल्हास देऊन गेली. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आयोजित विविध वेशभूषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सामूदायिक गुढी स्पर्धांनी ही यात्रा गाजली. यात्रेत लेझीम पथक, ढोल पथक तसेच फेटे घातलेले पुरुष-महिला, विविध वेशभूषा केलेले चिमुरडे यांचा सहभाग होता.

बीवायके कॉलेज येथे सकाळी १० वाजता यात्रेचा समारोप झाला. यावेळी प्रा. यशवंत पाठक यांचे व्याख्यान झाले. आमदार सीमा हिरे, महेश हिरे, भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुरेश पाटील, किशोर विग यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत यात्रांसाठी प्रकाश दीक्षित, विवेक पवार, सुहास करंदीकर, अशोक अमृतकर, अतुल देशपांडे, अजित कुलकर्णी तसेच वसुधा लगड यांनी यात्राप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. व्यसनमुक्तीचा संदेश पंचवटी : संस्कृती संवर्धन न्यास संचलित नववर्ष स्वागत समिती व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे पाडवा पहाट, शोभायात्रा व गुढी पूजन झाले. ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे पंचवटी सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी पुष्पा दीदी यांच्या हस्ते गुढीपूजन झाले. संस्थेच्या राजयोग शिक्षिका पूनम दीदी, ब्रह्माकुमारी अनिता दीदी, स्वागत यात्रा समितीचे सदस्य सोमनाथ बोडके, दिगंबर धुमाळ, रुपेश पालकर आदी उपस्थित होते.

नागचौकात गुढी पूजनानंतर शोभायात्रा काट्यामारुती पोलिस चौकी, गजानन चौक, पाथरवट लेन, पंचवटी कारंजा, मखमलाबाद नाका, गंगाघाट या मार्गावरून आल्यानंतर भाजीबाजार मैदानावर समारोप करण्यात आला. तेथे व्यसनमुक्ती विषयावर नाटिका सादर करण्यात आली. तसेच बेटी बचाव आणि पाणीबचतीच्या घोषणा देण्यात आल्या.

देवळालीमध्ये विद्यार्थ्याचा उत्साह देवळाली कॅम्प : संसरीनाका येथील देवळाली प्लाझापासून शुभारंभ झालेल्या शोभा यात्रेस शीतलदास बालानी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश आखाडे, मंगेश गुप्ता, दीपक बलकवडे, कैलास गायकवाड, भगवान कटारिया आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ झाला. नूतन विद्यामंदिर, डॉ. गुजर सुभाष हायस्कूल विद्यार्थ्यांनी लेझीमचे सादरीकरण केले. टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी भजन सादर केले. मराठमोळ्या पेहरावातील महिला पथकातील फुगडी व विविध पारंपारिक खेळांनी देवळालीकरांचे लक्ष वेधले. मिरवणुकीत अग्रभागी देवदेवतांसह राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिकांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी जिवंत देखाव्यांनी शोभायात्रेची शान व हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविले. जीवन गायकवाड, नारायणदास चावला, प्रा. सुनिता आडके आदींनी आयोजक केले. शोभायात्रेस शिक्षण मंडळ भगूरचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, नगरसेवक सचिन ठाकरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, तानाजी करंजकर, दीपक बलकवडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप गायकवाड, विशाल शिरसाठ, लक्ष्मण मुसळे, बाळकृष्ण घोलप, संतोष पिंपळे आदी प्रयत्नशील होते. शोभायात्रेचे देवळालीकरांनी रस्त्यावर ठिककिठकाणी आकर्षक रांगोळ्या रेखाटत स्वागत केले. जुन्या बस स्थानक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. शोभायात्रेत देवळालीकर पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाले होते.

पाणीबचत, आरोग्याची गुढी नाशिकरोड : राजसारथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन देशपांडे आणि महालक्ष्मी मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आढाव यांच्या पुढाकाराने जेलरोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवसंकल्पाची ५१ फुट उंच गुढी उभारण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरसेवक अशोक सातभाई, संभाजी मोरुस्कर, मनसेचे नेते विक्रम कदम, शिव प्रतिष्ठानचे शाम वाघ, उद्योजक धनंजय बेळे, महिला बँकेच्या संचालिका प्रेरणा बेळे प्रमुख पाहुणे होते. महिला सक्षमीकरण, हितसंबंध जोपासणे, योगसाधना, वाचन, अंधश्रद्धा निर्मूलन, पाणीबचत आदींचा संकल्प वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, कलाकार, ज्येष्ठ नागरिक, उद्योजक आदींच्या उपस्थितीत गुढी उभारण्यात आली.

भारत मातेचा जयघोष सिन्नर फाटा : भारत मातेचा जयघोष करीत नाशिकरोड शहरातून हिंदू नववर्ष समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक भगत यांच्या हस्ते गुढीचे पूजन झाले. शोभा यात्रेचे संयोजक उदय शेवतेकर, नाना पाटील, गोपाल लाल, अक्षय एडके, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, आदींनी केले.

शोभायात्रेत ब्रह्मध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक मराठमोळ्या वेषात अश्वारुढ तरुणी, शिवरायांसह स्वामी विवेकानंद, राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या थोर महापुरुषांच्या वेषभूषा व श्री मनकामेश्वर महादेव प्रतिष्ठाणचे ढोल पथकाने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभा यात्रेत के. जे. मेहेता हायस्कूल, इस्कॉन यांनीही सहभाग घेतला. देवळाली गावातून प्रारंभ झालेली शोभायात्रा पुढे लिंगायत कॉलनी, गाडेकर मळा, दत्तमंदिर रोड, राजधानी चौक, आनंद नगर, जगताप मळा, दत्तमंदिर चौक, मोटवाणी रोड या मार्गे जावून पुरुषोत्तम हायस्कूल या शाळेच्या मैदानावर विसर्जित करण्यात आली. शोभायात्रेत सहभागी चित्ररथांनी पाणीबचत व स्त्रीभृणहत्या या विषयांवर संदेश दिला.

मनसेने उभारली महागुढी मनसेच्या वतीने शाळा क्रमांक १२५ जवळील राजधानी चौकात महागुढी उभारली. यावेळी नगरसेविका संगिता गायकवाड, अशोक सातभाई यांच्यासह हेमंत गायकवाड, प्रकाश कोरडे, शाम गोहाड, किशोर जाचक आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंभुनाद ढोल पथकाच्या वादनाने नागरिकांना आकर्षित केले.

जेलरोडला शोभायात्रा तहकूब शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब गाडगीळ यांचे पाडव्याच्या पूर्वसंध्येला अचानक निधन झाल्याने जेलरोडला आयोजित नववर्षाची शोभायात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणचे काही कार्यकर्त्यानी देवळाली गावातील शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला.

सातपूरला तरुणाईचा जल्लोष सातपूर : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सातपूर कॉलनीत स्वागत यात्रा निघाली होती. जुनी कॉलनीतील इच्छामणी गणपती मंदिरावरून सकाळी ७ वाजता निघालेली स्वागत यात्रा मिरवणूक मुख्य रस्त्यांवरून फिरून पुन्हा गणपती मंदिरात आणण्यात आली. स्वागत यात्रे ढोल ताश्यांच्या पथकासह फेटे बांधलेले तरुण, लहान मुले, महिला तसेच भाजपाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. यात्रेचे आयोजन भाजप सातपूर मंडलचे अध्यक्ष राजेश दराडे यांनी केले.

जुने नाशिकमध्ये उत्साहात स्वागत जुने नाशिक : पाडव्यानिमित्ताने हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे सकाळी साडे सहा शोभायात्रा व धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहीद भगतसिंग चोक, श्री टेमब्लाई माता मंदिर, द्वारकापासून तर गंगा घाटपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी रामसिंग बावरी, बाळासाहेब मोरे, प्रसाद बावरी, विजय पवार, दीपक अहिरे, करणसिंग बावरी, अशोक गांगुर्ड, अंकुश राऊत, उमेश चव्हाण आदी सहभागी झाले. शोभायात्रेमध्ये पाच मंडळांचे चित्ररथ सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा सिटीझन रिपोर्टर’ अॅपमुळे मिळाले व्यासपीठ

$
0
0

सिटीझन रिपोर्टर अॅपद्वारे शहरातील समस्यांचे वार्तांकन करणाऱ्या गार्गेय कुलकर्णी, सोनाली शेटे, संतोष पराये व शरदचंद्र भालेराव यांना 'मटा' नाशिकचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. 'मटा'चे हे अॅप आधुनिक पद्धतीने व वापरण्यास अत्यंत सोपे असल्याचे मत या चारही सिटीझन रिपोर्ट्सनी व्यक्त केली. आपली समस्या प्रकाशझोतात आणण्यासाठी हे अॅप अत्यंत प्रभावशाली असल्याचे सांगत याचा वापर करणे शहरासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

पाण्याचा अपव्यव केवळ सिडको वगैरे याठिकाणीच नाही तर कॅनडा कॉर्नरसारख्या मोठ्या भागांमध्येही होत असतो. याविषयीची समस्या प्रकाशझोतात येणे गरजेचे होते. त्यानुसार मी ही बातमी 'मटा'च्या 'सिटीझन रिपोर्टर अॅप'वर टाकली. त्याची तत्काळ दखल घेऊन हा विषय समोर आला, याचा आनंद वाटला. - गार्गेय कुलकर्णी

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होणे ही मोठी बाब असते. मात्र, तरीही शहरात अनेक ठिकाणी याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गंगापूर रोडवरील सावरकरनगर येथेही अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा अपव्यय होत असतो. हे पाहूने, समाजासाठी आपण काहीतरी करावे, असे वाटायचे. मात्र, त्यासाठी मार्ग दिसायचा नाही. 'मटा'ने अॅपमार्फत या बाबी शेअर करण्यासाठी संधी दिली. त्यामुळे अशा गोष्टी आम्हालाही समोर आणता येतील. - सोनाली शेटे

मुंबई नाक्यावरील सर्व्हिस रोडचा प्रश्न गंभीर आहे. अनेक गाड्या येथे उभ्या असतात. तसेच रस्ताही छोटा असल्याने लहानमोठे अपघात घडण्याची शक्यता असते. अशा अनेक बातम्या घरातून बाहेर पडल्यावर दिसतच असतात. काहीवेळा सामाजिक बांधिलकीने आम्हालाही पुढे येणे गरजेचे असते. त्यासाठी 'मटा सिटीझन रिपोर्टर' हे अॅप फायदेशीर ठरत आहे. आम्हालाही समाजासाठी काही करण्याची संधी मिळते. - संतोष पराये

रस्त्याच्या मधोमध चेंबर उघडे असल्याचे दिसून आले. यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे जाणवले. त्यामुळे 'मटा सिटीझन रिपोर्टर अॅप'वर माहिती दिली. त्याची दखल घेतली गेल्याने आत्मविश्वास वाढला आहे. हे अॅप वेगळ्या व अत्याधुनिक पद्धतीचे आहे. कोणालाही सहजरित्या बातम्या कळविता येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनाही व्यासपीठ मिळालेे. - शरदचंद्र भालेराव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरती अंकलीकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

$
0
0


ऋतुरंग परिवारातर्फे झालेल्या पहाट पाडव्यास नाशिकरोड परिसरातील शास्त्रीय गायनाच्या रसिक श्रोत्यांनी गर्दी केली. यावेळी त्यांच्या गायनास वैभव खांडोळकर यांनी तबला, तन्मय देवचके-हार्मोनियम, दिगंबर सोनवणे पखवाज, अमोल पाळेकर-तालवाद्य, अबोली गद्रे, स्वरूपा बर्वे यांनी तंबोऱ्यावर साथ देत सहगायनही केले. आरती अंकलीकर यांनी अहिर भैरव रागात विलंबित तीनताल मध्ये रसिया म्हारा आवोजी मेरे द्वार हि बंधीश, द्रुत तिनताल मध्ये जागो रे माई जागो ही बंदिश सादर केली. ख्यातनाम गायिका किशोरी अमोणकर यांनी संगित बध्द केलेल्या 'अवघा रंग एक झाला' या भैरवीने सुश्राव्य कार्यक्रमाची सांगता झाली. ध्वनी संयोजन पराग जोशी यांनी केले. ऋतुरंग परिवाराचे राजा पत्की यांनी प्रास्ताविक केले. संतोष जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमामुळे रसिकांचा पाडवा गोड झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरड्याठाक रामकुंडात अखेर खळाळले पाणी

$
0
0

पाणी सोडण्याच्या मुद्यावरून श्रध्दा व पर्यावरणवादीमध्ये वादावादी सुरू झाली आहे. गुरूवारी सायंकाळी ७ वाजता रामकुंडात गांधी तळ्याचे पाणी गेटद्वारे सोडण्यात आले. नंतर रात्री बाराच्या सुमारास तीन टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले. गांधीतळ्यात साठलेल्या पाण्यात, टँकरचे पाणी सोडल्यानंतर पाण्याला वास येत असल्यामुळे शुक्रवारी पंचवटी जलकुंभातून शुध्दीकरण केलेल पाणी लक्ष्मणकुंडाशेजारी असलेल्या पाइपलाइनमधून सकाळी ७.३० वाजता सुमारे तास भर पाणी सोडण्यात आले.

महापौर अशोक मुर्तडक यांनी गुरूवारी रामकुंडाची व गाळ हटवण्याच्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर होळकर पुलाच्या पुढील भागात बोअर घेण्याच्या ठिकाणी ते गेले. गोदाकाठच्या सर्व भागाची पाहणी केल्यानंतर टँकरधारकांनी रामकुंडात पाणी सोडावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आजुबाजुच्या विहिरीचे पाणी रामकुंडात आणता येईल का? यावरही त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी रामकुंडात दहाव्याचे पिंड टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही दिला. महापौराच्या भेटीनंतर प्रशासनाने तात्काळ पाणी सोडण्याची कारवाई केली. पहिले गांधी तळ्यात साठलेले पाणी सोडले व रात्री टँकरचे त्यानंतर सकाळी पिण्याचे पाणी सोडले.

असे सुचविले पर्याय पंचवटी जलकुंभ व टँकरने पाणी सोडण्याच्या कृतीला अनेकांनी आक्षेप घेतला असून काही पर्यायांवर चर्चा सुरू झाली आहे. आनंदवल्लीपासून होळकर पुलापर्यंत साठलेले बँकवाँटरचे पाणी रामकुंडात पंपिंगद्वारे सोडता आले असते. तसेच हेच पाणी गांधीतळ्याच्या गेटद्वारेही सोडता आले असते. अरुणानदीचे इंद्रकुंड येथील पाणी पूर्वी रामकुंडात येत होते. पण या नदीच्या मार्गावर रस्ता केल्यामुळे या नदीचा स्त्रोत बंद झाला. त्यामुळे पाणी पंपिंग करून घेता येवू शकते. काँक्रीटीकरणामुळे रामकुंडाशेजारी असलेले १६ कुंड दाबले गेले आहे. या कुंडातच अनेक झरे असून ते मोकळे केल्यास पाण्याच मोठा साठा उपलब्ध होऊ शकतो.

गोदावरीच्या नावावर केल्या जात असलेल्या धार्मिक फसवणुकीला आमचा विरोध आहे. रामकुंडावर पाणी सोडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतांना पंचवटीकरांच्या हक्काचे पिण्याचे पाणी सोडण्यात आले. टँकरचे पाणी नाशिकरांना भीषण पाणीटंचाईत उपयोगात आणता आले आहे. बँक वॉटर व इंद्रकुंडाचे पाणी असे अनेक पर्याय उपलब्ध असतांना हायकोर्टाच्या आदेशाचा अपमान करून लक्ष्मण कुंडाशेजारील पाइपद्वारे पिण्याचे पाणी सोडणे ही दुर्दैवी बाब आहे. - देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी नागरी सेवा समित‌ी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएचआर राज्यातील शाखा करणार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑप सोसायटी (बीएचआर) अवसायानात आल्यानंतर बँकेने आता राज्यभरातील आपल्या शाखेतील लॉकर्स जळगावच्या मुख्य शाखेत जमा करून आपल्या शाखा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे. स्थानिक शाखा कर्ज वसूल करून आपले पैसे देईल या आशेवर असलेल्या काही गुंतवणूकदारांना या निर्णयाचा धक्का बसला आहे. जळगावात मुख्यालय असलेल्या बीएचआरच्या विविध शाखांच्या लॉकर्समधील पैसे व दागिने अनेक ठेवीदारांनी अगोदरच काढून घेतले आहेत. मात्र, यातील काहींनी चाव्या जमा न केल्यामुळे या बँकेचे अवसायक यांनी सात दिवसांच्या आत चावी जमा करण्याची नोटीस दिली आहे. हे लॉकर्स जळगावच्या मुख्य शाखेत जमा करून राज्यभरातील शाखा आता बंद केल्या जाणार आहेत. बीएचआरमध्ये चार महिन्यापूर्वी अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नेमणूक करण्यात आली. आतापर्यंत त्यांनी थकीत कर्जदारांकडून साडेचार कोटी रुपये वसूल केले आहेत. या मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटीत ७०० हून अधिक येणे आहे. बीएचआरमधील पैसे लवकर मिळावे, यासाठी गुंतवणूकदार वारंवार खेटे मारत असताना, त्यांना अद्यापपर्यंत समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. सरकारने अवसायकाची नेमणूक केली असली तरी त्यांचे काम धीम्या गतीने सुरू आहे.

महिनाभरात सॉफ्टवेअर बीएचआरचा डाटा मिळत नसल्यामुळे अनेक गुंतवणूकदार संताप व्यक्त करीत आहेत. मात्र, सर्व डाटा उपलब्ध असून, केवळ कोअर बँकिंग पध्दत नसल्यामुळे हा डाटा एकत्र जमा करता येत नाही. त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित केले असून, महिन्याभरात सुरू होणार आहे.

कर्ज वसुली सुरू आहे. त्यानंतर मालमत्तेचा लिलावही केला जाणार आहे. गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच दिले जातील. कर्जवसुली झाली तर गुंतवणूकदारांचे पैसे ताबडतोब दिले जातील. - जितेंद्र कंडारे, अवसायक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images