Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनमाडकरांनाही हवी ‘जलदूत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या आणि जंक्शन म्हणून अवघ्या देशभरात परिचित असलेल्या मनमाड शहराला लातूरप्रमाणे रेल्वेच्या जलदूत वाहिनीने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात शुक्रवारी दाखल केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अशोक परदेशी व सचिन कासार यांनी ही याचिका दाखल केली आहे. महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने लातूर शहर यंदा चर्चेत आले आहे. मात्र, गेल्या ३० वर्षांपासून मनमाड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागत आहे. आताही महिन्यातून केवळ एकच वेळा मनमाडवासीयांना पाणी मिळत आहे. जंक्शन असूनही केवळ पाणी उपलब्ध होत नसल्याने रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाच्या मदतीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.

जलवाहिनी फुटली

निफाड ः लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठा योजनेच्या सदस्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पिण्याच्या पाण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचे आवर्तन मिळवले होते. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे सोळा गाव पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरातील दिंडोरी तास शिवारात फुटल्याने ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. ही जलवाहिनी फुटली की फोडली याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही. मात्र, ही जलवाहिनी वारंवार फुटते, असे निदर्शनास आणूनही अधिकारी दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दिंडोरी तास येथील आबा तासकर यांच्या द्राक्षबागेत लासलगाव सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी तासकरांच्या द्राक्षबागेत पसरल्याने या बागेचे तळ्यात रूपांतर झाले आहे. यामुळे बाग कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहन तपासणीला ‘ब्रेक’

$
0
0

स्पीड गर्व्हनन्सबाबत वाहनमालकांमध्ये नाराजीचा सूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने मोटार वाहन नियमात केलेल्या बदलानुसार बहुतांश मोठ्या वाहनांना स्पीड गर्व्हनन्स बसवणे अनिवार्य आहे. स्पीड गर्व्हनन्स नसेल तर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) वाहनाला फिटनेस सर्टीफिकेट दिले जात नाही. तसेच, योग्यता प्रमाणापत्र नूतनीकरणासाठी स्वीकारण्यात येत नाही. सरकारच्या या निर्णयामुळे स्पीड गर्व्हनन्सचा नियम लागू असलेल्या वाहनमालकांनी तपासणीसाठी आरटीओ कार्यालयाकडेच पाठ फिरवली आहे. हे काम अप्रत्यक्षरित्या बंद पडले आहे.

रस्ते अपघातातील एक महत्त्वाचे कारण म्हणून वाहनांच्या वेगाकडे पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ११८ च्या पोटनियम १ मध्ये सुधारणा केली आहे. या तरतुदीनुसार १ एप्रिल २०१६ पासून संबंधित वाहनांना एआयएस ०१८/२००१ नुसार स्पीड गर्व्हनन्स बसवावे लागणार आहे. या तरतुदीनुसार साधारणतः साडेतीन हजार किलोग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेल्या वाहनांना स्पीड गर्व्हनन्स बसवणे आवश्यक आहे, अशी माहिती आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबर २०१५ पूर्वीची वाहने फिटनेस तपासणीसाठी पुढे येणे जवळपास बंद झाले आहे. नवीन नियमाच्या तरतुदीनुसार सर्व स्कूल बसेसला ४० किलोमीटर प्रति तास इतकी कमाल मर्यादा ठरली आहे. घातक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहनांना ६० किलोमीटर प्रतितास तर डंपर्स व टँकर्ससाठी सुध्दा ६० किलोमीटर प्रतितास इतकी मर्यादा नि​श्चित करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त परिवहन संवर्गातील इतर वाहनांना ८० किलोमीटर इतकी वेग मर्यादा असणार आहे. परिवहन विभागाच्या या निर्णयाविरोधात वाहनमालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. फोर लेन व त्यापेक्षा मोठे रस्ते बांधायचे, टोल वसूल करायचा आणि दुसरीकडे स्पीड गर्व्हनन्सचे भूत वाहनचालकांच्या मानगुटीवर बसवायाचे असा दुहेरी छळ सुरू असल्याचा आरोप वाहनमालकांकडून होत आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून कुठलेही निर्देश मिळालेले नसल्याने मोठ्या वाहनांच्या फिटनेस चाचणीनंतर सर्टीफिकेट दिले जात नसल्याचे या वाहनमालकांनी सांगितले.

स्कूल बससाठी स्पीड गर्व्हनन्स बसवावे, हे समजण्यासारखे आहे. मात्र, इतर वाहनांना स्पीड गर्व्हनन्स का? एकीकडे मंत्री दररोज कित्येक किलोमीटरचे महामार्ग तयार करीत असल्याचे सांगतात. अन् दुसरीकडे वेगावर नियंत्रण आणण्याचा घाट घातला जात आहे. अपघातांच्या मुख्य कारणांकडे दुर्लक्ष करून देशाची अर्थव्यवस्था ठप्प करण्याचा हा प्रयत्न आहे. लाखो वाहनांना स्पीड गर्व्हनन्स बसवावे लागेल. तेवढी उपलब्धता नाही. - तेजींदरसिंग ​बिंद्रा, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेना

अत्याधुनिक वाहने बाजारात येत आहेत. त्यांची क्षमता चांगली असून, स्पीड गर्व्हनन्स बसवल्याने अनेक अडचणी निर्माण होतील. वाहनचालकास टॉप गेअरसुध्दा टाकता येणार नाही. यामुळे डिझेलची मागणी वाढेल. व्यवसायच धोक्यात येईल. अपघातासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. त्याचा सरकारने विचार करावा. - दिलीपसिंग बेनिवाल, खासगी वाहतूक संघाचे पदाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीमुळे उद्याने झाली हाऊसफुल!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शाळांना सुटी लागल्याने उपनगरांमधील उद्याने चिमुकल्यांनी फुलू लागली आहेत. यामुळे सुटीच्या काळात महापालिकेने उद्यानांच्या सुविधांमध्ये वाढ करता येईल का? याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. मोडकळीस आलेली खेळणी, खेळण्याची अपुरी संख्या तसेच इतर सुविधांची वानवा असल्याचे याचा फटका सुटीत मौजमजेसाठी आलेल्या चिमुकल्यांना बसत आहे.

सातपूरमधील अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीतील उद्याने गर्दीने हाऊस फुल झाले आहे. जेष्ठ नागरिकांसह महिला व चिमुकल्यांची उद्यानात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. अशोकनगर भागात चिमुकल्यांना खेळण्यासाठी एकमेव राज्य कर्मचारी उद्यान असल्याने सातपूर भागातील पालक मुलांना घेऊन राज्य कर्मचारी उद्यानात येत असतात. तर अंबड, कामटवाडे परिसरातील लहान उद्यानांमध्येही चिमुकले दिसू लागले आहेत. मात्र अनेक उद्यानांमध्ये पुरेशी खेळणी नसल्याने चिमुकल्यांची निराशा होत आहे. सुटीच्या काळात महापालिकेने उद्यानांकडे लक्ष दिल्यास चिमुकल्यांचा हिरमोड होणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या सातपूर प्रभागात मुलांना खेळण्यासाठी मैदानांची वाणवा आहे. त्यातच महापालिकेने ठिकठिकाणी अनेक उद्याने निर्माण केली आहेत, परंतू वाढती लोकवस्ती व वाढलेली वाहनांची संख्या यामुळे उद्याना भवती वाहनांची गर्दी अधिक दिसू लागली आहे.

सातूपर भागात अनेक मोठी उद्याने आहेत; परंतु त्यांची देखभाल महापालिकेकडून व्यवस्थीत न झाल्याने ती बकाल झाली आहेत. परिसरातील राज्य कर्मचारी वसाहतीतील उद्यानात सुस्थितीत असल्याने येथे चिमुकल्यांची गर्दी असते. त्यामुळे उद्यानात खेळण्याची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. सातपूर भागातील सातपूर कॉलनी, सावरकरनगर, अशोकनगर, पवार संकुल, राधाकृष्णनगर येथून पालक आपल्या मुलांना राज्य कर्मचारी वसाहतीतील उद्यानात खेळणी खेळण्यासाठी घेऊन येतात.

सातपूर भागात राज्य कर्मचारी वसाहतीतील उद्यानात सर्व प्रकारच्या खेळणी व स्वच्छता असल्याने मुलांचा खेळण्यासाठी आग्रह असतो. परंतु महापालिकेच्या सातपूर विभागातील इतर उद्यानांची देखभाल महापालिकेने केल्यास त्याचा लाभ त्याभागातील रहिवाशांना होईल. याकडे महापालिकेने लक्ष घालण्याची गरज आहे.

कृष्णा चौघुले, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकी खापरी धरणग्रस्तांच्या मागण्या लागणार मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी बंद पाडल्यानंतर नांदूरमधमेश्वर प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता एच. के. गिते यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत खुलासा वजा निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. त्यात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली आहे.

पुनर्वसन, भूसंपादन अंतिम टप्यात असून, पाणीसाठा होण्यापूर्वीच सर्व मागण्या मार्गी लागणार आहेत. या मागण्यांबाबत शासनस्तरावर व महामंडळाकडे पाठपुरावा सुरू आहे. या कामासाठी निधी उपलब्ध असल्याने मागण्या लवकरच पूर्ण होतील. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रश्न सोडवले जाणार नाही, ही भीती निराधार असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.

धरणासाठी संपादन करावयाच्या एकूण १०२३ हे खासगी क्षेत्रापैकी ९९७ चे संपादन पूर्ण झालेले असून, अंतिम निवाड्यांप्रमाणे संबधितांना मोबदला अदा करण्यात आलेला आहे. उर्वरीत क्षेत्र सरळ खरेदीने संपादित करावयाचे काम प्रगतीपथावर असल्याचे म्हटले आहे.

संपादीत क्षेत्रावर मूळ जमिनीचा संपूर्ण मोबदला यापूर्वीच अदा केला आहे. कलम १८ अन्वये न्यायालयाने निश्चित केलेला वाढीव मोबदला व त्यावरील व्याजाची रक्कम ६१.३१ कोटी असून, यातील निधी उपलब्धप्रमाणे आजपर्यंत ३० कोटी अदा करण्यात आले आहेत. उर्वरीत रक्कम निधी उपलब्धेप्रमाणे अदा करण्यात येणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डासांवरून महासभेत रणकंदन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाढलेल्या डासांच्या उपद्रवाचे तीव्र पडसाद महापालिकेत उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरात वाढलेल्या डासांवरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. भाजपचे नगरसेवक कुणाल वाघ यांनी सभागृहात मच्छरदाणी पांघरुन आंदोलन सुरू केले. डासांच्या प्रश्नावर भाजपने आक्रमक होत सभागृहात बराच गदारोळ केला. परंतु भाजपच्या या आंदोलनासह आक्रमनाची धार अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांनी बोथट केली. पेस्ट कंट्रोलचा ठेका कुणाल वाघ यांच्या पत्रामुळे अडकल्याची चिरफाड संजय चव्हाण यांनी पत्रानिशी

केल्याने भाजपचे सदस्य तोंडघशी पडलेत. दरम्यान डास प्रतिबंधक फवारणी वाढव‌िण्यासह नगरसेवकांची नाराजी थांबवण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

शहरात वाढलेल्या डासांच्या त्रासावरून महासभेत सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले होते. कुणाल वाघ यांनी शहरात वाढलेल्या डासांमुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी थेट मच्छरदाणी पांघरुन सभागृहात आले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे सभागृहाचे लक्ष वेधले गेले. प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार केला असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वाघ यांनी केला. नदीकाठावरील एसटीपी प्लँट बंद करा, अशी मागणी करत डासांचा उपद्रव कमी झाला नाही तर एसटीपीला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी दिला. नगरसेवक उद्धव निमसे यांनीही डासांच्या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरले. आरोग्य अधिकारी फिल्डवर येत नसल्याचा आरोप करत कार्यालयात बसून डास कसे कमी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे महापौरांनी नगरसेवकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत नदीकाठावर धूर फवारणी करण्याचे आदेश दिले. शहरातील डास उत्पत्ती केंद्रे बंद करण्यासह आरोग्य, पाणी, वीज याबाबतीत खातेप्रमुखांनी नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, अशी काळजी घेण्याच्या सूचना केल्या. सोबतच नगरसेवकांची नाराजी थांबवा, असे आदेश दिले.

एसटीपी ठेकेदाराला दंड

दरम्यान, नगरसेवकांच्या उद्रेकावर आयुक्तांनी स्पष्टीकरण देत एसटीपीचे काम ध‌िम्या गतीने सुरू असल्याने डासांची संख्या वाढल्याचा दावा त्यांनी केला. डास प्रतिबंधासाठी अळ्या मारणे हाच उपाय असल्याचे सांगत, एसटीपीच्या ठेकेदारांकडे बांधकाम व देखभाल दोन्हीही असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नसल्याचा दावा केला. संबंध‌ित ठेकेदाराना दहा टक्के रकमेचा दंड करण्यात आला असून काम पूर्ण करण्यासाठी नोट‌िसाही बजावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच पानवेली काढण्याचे कंत्राट फायनल होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात काम करून घेतले जाईल. तसेच नदी प्रवाहीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा दावा त्यांनी केला. धूरफवारणी होते की नाही याची चाचपणी करण्यासाठी पालिकेची टीम गठीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांग‌ितले.

चव्हाणांनी सादर केले पत्र

डासांच्या प्रश्नावरून भाजपने सत्ताधारी मनसेला घेरण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांनी भाजपला चांगलेच तोंडघशी पाडले. डांसाच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या प्रा. कुणाल वाघ यांचे पेस्टकंट्रोल ठेक्याला विरोध करणारे पत्र चव्हाण यांनी सभागृहात सादर करताच वाघ यांच्या अनोख्या आंदोलनाची हवाच निघाली. वाघ यांनी स्थायी समिती सदस्य असतांना प्रशासनाने निश्चित केलेल्या पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला थेट मुख्यमंत्री कार्यालयातच विरोध केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. त्यामुळे भाजप एकीकडे डासांवर आंदोलन करतेय तर दुसरीकडे शहराला वेठीस धरत असल्याचा आरोप त्यांनी केला. पेस्ट कंट्रोलचा ठेका हा वाघ यांच्यामुळेच रखडल्याचा आरोप पत्रानिशी करत त्यांनी भाजपसह वाघ यांना तोंडघशी पाडले.











मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या बदलीविरोधात सर्वपक्षीय एकजूट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका आयुक्तांच्या बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपची महासभेत सर्वपक्षीयांनी कोंडी केली. विशेष म्हणजे आतापर्यंत आयुक्तांच्या कार्यशैलीवर टीका करणाऱ्या नगरसेवकांनीही आयुक्तांना पाठ‌िंबा देत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यामुळे नगरसेवकांचे आयुक्तांवर खरच प्रेम आहे की केवळ भाजपच्या विरोधासाठी राजकारण केले जात आहे, अशी चर्चा सभागृहात रंगली.

शनिवारच्या महासभेत महत्त्वाच्या विषयांना बगल देत आयुक्तांच्या बदलीवर सखोल चर्चा झाली. भाजपकडून आयुक्तांच्या बदलीसाठी प्रयत्न केले जात असल्याचा खुला आरोप करत सर्वच सदस्यांनी आयुक्तांच्या पाठ‌ीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प सोडला. ऐवढेच नव्हे तर आतापर्यत आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर ट‌ीका करणारे व नगरसेवक निधीवरून आयुक्तावर ताशेरे ओढणारे अचानक आयुक्तांच्या प्रेमात पडल्याचे दिसले. शहरातील प्रश्न सुटत नसल्याने आयुक्तांना अनेकदा धारेवर धरले गेले. परंतु केवळ भाजपच्या विरोधापायी सर्वपक्षीयांना विरोध केला. आयुक्तांच्या बदलीवरून लोकांमध्ये संभ्रम आहे. बऱ्याच वर्षांनंतर सक्षम अधिकारी लाभला आहे. बदली झाली तर शिवसेना रस्त्यावर उतरेल.

- अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

महापालिकेतील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदलीचा घाट घातला जात आहे. परंतु डॉ. गेडाम हे नाशिकला हवे आहेत. त्यामुळे त्यांच्या बदली विरोधात ठराव करून तो सरकारला सादर केला पाहिजे.

- कविता कर्डक, विरोधी पक्षनेत्या,मनपा

डॉ. गेडाम यांनी सिंहस्थात उत्तम कामगिरी केली आहे. आयुक्तांची नाशिकला गरज असून मनसे आयुक्तांच्या बदलीच्या विरोधात आहे.

- अशोक सातभाई, सदस्य,स्थायी समिती

आयुक्तांच्या बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचा आरपीआयतर्फे निषेध करतो. आयुक्तांसोबत मतभेद असले तरी, त्यांची शहराला गरज आहे.

- प्रकाश लोंढे, गटनेता ,आरपीआय

कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांच्या विषयी भाजपलाही आदर आहे. सध्या त्यांच्या बदलीचा कोणताही विषय नाही. - सतीश कुलकर्णी, गटनेता भाजप





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीतील वादातून विंचूरला हाणामारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रामनवमीच्या निमित्ताने विंचूर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजेवर गाणे वाजविण्याच्या कारणावरुन पंचायत समिती सदस्य व येथील सरपंच यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी होऊन चारजण गंभीर जखमी झाले. दोन्ही गटांनी परस्पराविरुद्ध तक्रार दिली असून लासलगाव पोलिस ठाण्यात पंचविस ते तीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अटकसत्र राबविण्यास सुरुवात केल्याने पुढील अनर्थ टळला. प. स. सदस्य राजाराम दरेकर व ग्रामपालिका सरपंच शकुंतला दरेकर या दोन्ही गटाच्या समर्थकांविरुद्ध जमावबंदीचे उल्लंघन केल्याने दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. योगेश राजाराम दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादित १९ जणांची नावे दिली आहे. तसेच विलास रत्नाकर दरेकर यांनी आपल्या फिर्यादित पंधरा ते वीस जणांची नावे दिली आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्रामची जागा मिळणार भाडेतत्त्वावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थासाठी महापालिकेडून तयार करण्यात आलेले साधुग्राम आता सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर मिळणार आहे. शनिवारी झालेल्या महासभेत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सिंहस्थ कालावधी वगळता या ५४ एकरच्या जागेवर आता सभा, मेळावे, उत्सव, प्रदर्शने, क्रीडास्पर्धा, वाहनतळ करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या जागेतून महापालिकेला आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे.

साधुग्राममध्ये महापालिकेच्या मालकीची ५४ एकर जागा आहे. सिंहस्थानंतर ही जागा रिकामी राहत असून त्यावर स्थलांतरीत आक्रमण करतात. पालिकेच्या मालकीची ही जागा पडून असते. त्यामुळे ही मोकळी जागा सार्वजनिक वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर ठेवला होता. सिंहस्थ कालावधी व्यत‌िरिक्त आरक्षित जागा ही सार्वजनिक सभा, मेळावे, उत्सव, प्रदर्शने, क्रीडास्पर्धा, खुले वाहनतळ, मनोरंजन, मैदान, सर्कस खेळाचे मैदान यासाठी भाडे आकारून देण्याबाबतचा हा धोरणात्मक प्रस्ताव होता. या प्रशासनाच्या प्रस्तावाला महासभेनेही हिरवा कंद‌ील दाखव‌िला आहे. सार्वजनिक वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्यास महासभेने देण्यास होकार दर्शविल्यास सार्वजनिक हितासाठी या जागेचा वापर होणार आहे.

ही जागा सार्वजनिक वापरासाठी भाडेतत्त्वावर दिली जाणार असल्याने त्यातून पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. शहरात दरवर्षी पक्षाचे मेळावे, सभा, कार्यक्रम जास्त होतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरही त्याचा ताण येतो. त्यामुळे पक्षांचे मेळावे, सभा व कार्यक्रम या ठिकाणी झाल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताणही कमी होणार आहे. त्यामुळे ही जागा सार्वजनिक वापरासाठी देण्याचा महापालिकेचा उद्देशही सफल होणार आहे. या निर्णयासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाच कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चासही महासभेने मंजुरी दिली. त्यामुळे घरकुलांचाही मार्ग मोकळा होणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसेचे प्रेम मराठीवरच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील सत्ताधारी मनसेचे मराठीप्रेम पुन्हा जागृत झाले असून त्याचा प्रत्यय महासभेत आला. शहरातील पूररेषेसंदर्भात निरीने तयार केलेला इंग्रजीतील अहवाल मराठीत सादर करण्याचे आदेश महापौरांनी संबंध‌ित विभागाला दिले आहेत. तर दुसरीकडे चिल्ड्रन पार्कमधील इंग्रजी पाट्यांसदर्भातील वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केल्याची दखल पक्षाने घेतली आहे. पक्षाचे राज्य सचिव प्रमोद पाटील यांनी या पाट्या तत्काळ बदलण्याचे आदेश महापौरांना दिले आहेत.

मराठीप्रेमासाठी राज्यात मनसेची ओळख आहे. मराठीच्या प्रश्नावर मनसे नेहमीच आक्रमक राहिली आहे. राज्यात सर्वत्र मराठीतच पाट्या लागाव्यात, असे पक्षाचे धोरण असून त्यासाठी मनसेकडून अनेकदा खळखट्याक आंदोलन केले गेले आहे. परंतु मनसेच्या सत्तेतील महत्त्वाच्या चिल्ड्रन पार्कमध्येच इंग्रजी पाट्या असल्याचे वृत्त 'मटा'ने शनिवारी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे पक्षाने या वृत्ताची गंभीर दखल घेत संबंध‌ित यंत्रणेला पाट्या बदलण्याचे आदेश दिले आहेत. मनसेचे मराठी पाट्यांसदर्भातील धोरण बदलले नसल्याचा दावा मनसेचे प्रदेश सचिव प्रमोद पाटील यांनी केला आहे. मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक असून या प्रकल्पातही लवकरच बदल दिसेल असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे चिल्ड्रन पार्कमधील पाट्या आता लवकरच मराठीत झळकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात धावताहेत पाण्याचे टँकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या अनेक वर्षांपासून टँकरमुक्त असलेल्या सटाणा शहराला यंदा तीव्र पाणीटंचाईने घेरल्याने शहरात रस्तोरस्ती पिण्याच्या पाण्याचे टँकर धावताना दिसत आहेत. पाणीटंचाईच्या झळांनी शहरवासीय होरपळून निघाले आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा नदीपात्राबरोबरच शहरातील आरम नदी पात्र कोरडेठाक झाल्याने शहराला महिनाभरापूर्वी एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता तब्बल सहा दिवसाआड झाल्याने पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत.

येत्या आठवड्याभरात साठवणुकीतील पाणी देखील संपुष्टात येणार असल्याने पुढील आठवड्यात शहरात तब्बल दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा होण्याचा धोका पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील जनतेला पिण्याच्या पाण्याचे चटके जाणऊ लागल्याने पालिका प्रशासनासह खासगी टँकर वाहतुकदारांकडून पाणी विकत घेतले जात आहे.

७५० रुपयात एक टँकर तर शंभर रुपयात ५०० लिटर पाणी विकत घेण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. अनेक ठिकाणी खासगी वाहनांवर पाण्याचे ड्रम टांगून पाण्याचा शोध घेताना नागरिक दिसत आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाड कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

$
0
0




दिंडोरी : तालुक्यातील वाघाड कालव्यास हक्काचे सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शनिवारी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयास शेतकऱ्यांनी चार तास घेराव घालत आंदोलन केले.

दिंडोरी येथील बाजार समितीच्या प्रांगणातून कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, वाघाड पाणीवापर संघाचे अध्यक्ष श्रीमती पार्वताबाई शिंदे, कार्याध्यक्ष रामनाथ वाबळे, संचालक शहाजी सोमवंशी चंद्रकांत राजे यांच्या नेतृत्त्वाखाली उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. श्रीराम शेटे म्हणाले, वाघाड धरणातील पाणी हे आरक्षित असते तरीही शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हे फक्त सरकारने केलेल्या चुकीच्या धोरणामुळे होत आहे. जर शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही तर शेतकरी कर्जबाजारी होईल. शहाजी सोमवंशी, पं. स. सदस्य भास्कर भगरे, बाबा पिंगळे यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी वाघाड क्षेत्रातील वाघाड पाणीवापर महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, खासदार हरिशचंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, धनराज महाले यांनी जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांची भेट घेत राखीव पाणी सोडण्याची मागणी केली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतप्त ग्रामस्थांनी ठोकले पंपिंग स्टेशनला कुलूप

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, निफाड

नांदुरमध्यमेश्वर धरणावर असलेल्या लासलगावसह १६ गाव पाणिपुरवठा योजनेची जलवाहिनी वारंवार फुटून शेतमालाच्या नुकसानीला वैतागून प्रशासनाच्या निषेधार्थ दिंडोरी तासच्या शेतकऱ्यांनी सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या पंप‌िंग स्टेशनला शुक्रवारी रात्री कुलूप ठोकले होते. याप्रकाराची प्रशासनाने दखल घेत तत्काळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

लासलगावसह सोळागाव पाणीपुरवठा योजना गेल्या चारपाच दिवसांपासून दिंडोरी तास शिवारात फुटली असल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत

झाला. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने शुक्रवारी रात्री सोळा गाव पाणी

पुरवठा योजनेच्या पंपिंग स्टेशनलाच दिंडोरी तास येथील शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले.

शनिवारी दुपारी बारा प्रशासनाने या प्रकाराची दखल घेत या जलवाह‌िनीची दुरुस्ती सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नमते घेत पंपिंग स्टेशनला लावलेले कुलूप काढून घेतले.

जलवाहिनी फुटल्याने सतत नुकसानीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र जिवन प्राधिकरणकडे यात लक्ष घालून जलवाह‌िनीचे नुतनीकरण करण्याची मागणी केली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५ उमेदवारांची लेखी परीक्षेला दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील ३१ रिक्त पदांसाठी शनिवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी ६४४ उमेदवारांपैकी ४५ उमेदवारांनी दांडी मारली. ही परीक्षा पोलिस मुख्यालयाच्या बॅरेक्समध्ये पार पडली. परीक्षेची उत्तरतालीका नाशिक शहर पोलिसांच्या वेबसाइटवर उपलब्ध असून, परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

नाशिक शहर पोलिस दलातील रिक्त ३१ पोलिस शिपाई पदांसाठी गेल्या महिन्यात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा शनिवारी दुपारी पार पडला. ३१ रिक्त पदांसाठी तब्बल चार हजार ९१६ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते. २९ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. गैरहजर उमेदवार वगळता कागदपत्रांची छाननी झालेल्या व शारीरिक चाचणी परीक्षांमध्ये सहभाग नोंदवलेल्या उमेदवारांची गुणांकन यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीनुसार लेखी परीक्षेसाठी ६४४ उमेदवार पात्र ठरले. संबंधित पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा शनिवारी पोलिस मुख्यालयातील विविध बॅरेक्समध्ये शांततेत पार पडली. १०० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेचे चार संच तयार करण्यात आले होते. दरम्यान, पोलिस भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा साधारणतः मोकळ्या मैदानात घेतली जाते. यंदा, शहर पोलिसांनी उन्हाचा ताप लक्षात घेता, पोलिस मुख्यालयातील बॅरेक्सचा वापर केला. यामुळे लेखी परीक्षेसाठी हजर असलेल्या उमेदवारांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

उत्तर तालिकेसाठी वेबसाइट संबंधित प्रश्न पत्रिकेची उत्तर तालिका तयार असून, नाशिक शहर पोलिसांच्या http://nashikpolice.com/wp-content/uploads/2016/04/ANSWER-KEY-POLICE-BHARTI.pdf या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघे आठ टक्के पाणी!

$
0
0

आठ दिवसांत चार टक्क्यांनी धरणसाठ्यात घट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात २३ धरणे असून, पाण्याअभावी त्यांचाच घसा सुकू लागला आहे. अवघे आठ टक्के पाणी धरणांमध्ये शिल्लक असून, त्यावर पुढील पावणे दोन महिने तहान कशी भागणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. धरणांमधील पाणीसाठा आठ दिवसांत चार टक्क्यांनी कमी झाला आहे. धरणे कोरडी पडू लागल्याने जलसंकट अधिकच गहिरे होत असल्याचे स्पष्ट संकेत एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच मिळू लागले आहेत.


जिल्ह्यात एक दोन नव्हे तर २३ धरणे आहेत. तरीही दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा पाण्यासाठी दाही दिशा वणवण करण्याची वेळ जिल्हावासीयांवर आली आहे. धरणांचा जिल्हा अशी ख्याती असलेल्या जिल्ह्यात पिण्याचे पाणीही टँकरने पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाला पार पाडावी लागत आहे. पालखेड कालव्यातून अलीकडेच पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. मात्र डोळ्यादेखत मान टाकणारी पिके जगावीत यासाठी प्रवाहालगतच्या शेतकऱ्यांनी पाणी चोरले. त्यामुळे यंदा प्रथमच पाणी चोरीचे गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. येवला, नांदगाव, बागलाण, सिन्नर, देवळा या तालुक्यांमध्ये दुष्काळाची अत्यंत भीषण परिस्थिती असून, तेथील धरणांनीही तळ गाठल्याने पुढील किमान पावणेदोन महिने या भागातील रहिवाशांना तीव्र जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.

जिल्ह्यात गंगापूर धरण समूहात तीन, पालखेड धरण समूहात सर्वाधिक १४ तर गिरणा खोऱ्यात सहा धरणे आहेत. २३ धरणांपैकी मोठ्या धरणांची संख्या ७ असून, त्यांची पाणी साठवण क्षमता ४८ हजार २९१ दशलक्ष घनफूट आहे. मध्यम प्रकल्प १६ धरणे असून, त्यांची साठवण क्षमता १७ हजार ८७० एवढी आहे. या सर्व धरणांची एकूण साठवण क्षमता ६६ हजार १६१ दशलक्ष घनफूट असली तरी आजमितीस त्यामध्ये केवळ पाच हजार ५२६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण साठवण क्षमतेच्या केवळ आठ टक्के पाणी धरणांमध्ये शिल्लक आहे.

पालखेड धरण समूहात चार टक्के पाणी पालखेड धरण समूहात करंजवण, दारणा, मुकणे, पालखेड, ओझरखेड यांसह एकूण १४ धरणे आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता २० हजार २३१ दशलक्ष घनफूट आहे. गेल्यावर्षी या धरणसमूहात आजमितीस ५०५२ दशलक्ष घनफूट पाणी होते. मात्र, यंदा त्यामध्ये केवळ ७९२ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहिले आहे. गतवर्षी २५ टक्क्यांवर असणारा हा पाणीसाठा अवघ्या चार टक्क्यांवर आल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यातही भोजापूर आणि तिसगाव ही धरणे पूर्णत: कोरडी पडली असून, मुकणे आणि पुणेगाव धरणही लवकरच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे.

गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच पाणी शहरवासीयांना होणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी ८५ टक्के पाणी एकट्या गंगापूर धरणातून पुरविले जाते. पाच हजार ६३० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात सध्या एक हजार ५७२ दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत धरणात ५९ टक्के पाणी होते. ते निम्म्याहून कमी झाले असून, सध्या धरणात २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. शहरवासीयांची तहान भागेल एवढे पाणी धरणात असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे.

धरण समूह उपलब्ध पाणी(दलघफू) साठा गंगापूर १५१२ २८ पालखेड ७९२ ४ गिरणा खोरे १९७४ ८

धरण पाणीसाठा टक्केवारी पाणीसाठा टक्केवारी (वर्ष २०१५) (वर्ष २०१६) गंगापूर ५९ २८ कश्यपी ५६ १६ गौतमी गोदावरी १३ ० पालखेड ४९ २८ करंजवण १३ ६ वाघाड १७ १० ओझरखेड २६ ८ पुणेगाव १० २ तिसगाव १३ ० दारणा ३२ ४ भावली १६ ६ मुकणे २६ १ वालदेवी १६ ४ आळंदी ३७ १७ पुनद ५७ ५२ नागासाक्या १ ० गिरणा १६ ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्हा बँकेची मालमत्ता जळून खाक

$
0
0

राष्ट्रवादीने आग लावल्याचा आमदार अनिल गोटेंचा आरोप

म. टा. वृत्तसेवा,धुळे

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर रविवारी, सकाळी शॉटसर्किटने आग लागली. या आगीत बँकेतील संगणक, कागदपत्रे व अन्य साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असले, तरी आज (दि. १८) सकाळी साडेदहा वाजेपासून बँकेचे कामकाज होणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली. दरम्यान, आगीच्या निमित्ताने स्थानिक नेत्यांमध्ये आरोपाचे राजकारणदेखील सुरू झाले आहे.

बँकेत आग लागली असल्याचे सर्वात प्रथम बँकेजवळील व्यायामशाळेतील मुले आणि सुरक्षारक्षकांना समजले. त्यांनी तातडीने पोलिस व महापालिकेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन बंब पोहचत नाहीत तोवर आगीने रौद्र रूप धारण केले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. धुळे टोल प्लाझा, शिरपूर, अमळनेर, मालेगाव, पारोळा येथूनही अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले होते. आग विझविण्यासाठी बंबांच्या ६० ते ६५ फेऱ्या झाल्या. साधारणतः साडेतीन ते चार लाख लीटर पाणी लागले असल्याचा अंदाज आहे.

बाबूभाई व सहकाऱ्याची अमूल्य मदत मनपा अग्निशमन विभागाकडे चार बंब आहेत, मात्र प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. आग विझविण्यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रसाम्रुगीदेखील नाही. त्यामुळे मनपातील झाडे तोडणारे बाबूभाई व त्यांच्या सहकाऱ्याने बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनच्या सहाय्याने चढून आग विझविण्यास अमूल्य मदत केली. आग विझविण्याचे काम सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यत सुरू होते.

शंभर जणांचे प्राण वाचले आग लागलेल्या मजल्यावर बँकेचे शंभरावर कर्मचारी काम करायचे. याच मजल्यावर बँकेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक यांची दालने होती. रविवारची सुटी असल्याने यापैकी कुणीही कार्यालयात हजर नव्हते.

राष्ट्रवादीने आग लावल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसने बँक जाळण्याचे हे कृत्य केले आहे, असा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. बँकेला आग लागल्याची घटना दिवसा घडली. मनपाची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्याने अग्निशमन बंब वेळेत पोहचू नयेत अशीच व्यवस्था करण्यात आली होती, असाही आरोप गोटे यांनी केला. बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणी काही अधिकारी, पदाधिकारी आणि बँकेच्या आजी-माजी अध्यक्षांवर गुन्हे दाखल आहेत. या संशयितांची चौकशी पूर्ण झाली असून, लवकरच त्यांची रवानगी तुरुंगात होणार असल्याचा दावा आमदार अनिल गोटे यांनी केला.

त्यांना आरोप करू द्या!

आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपासंदर्भात बोलताना बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे म्हणाले की, त्यांना आरोप करू द्या. बँकेच्या चौकशीबाबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रति राज्य सरकारकडे व तक्रारदारांकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे चौकशीत खंड पडणार नाही. जिल्हा बँकेची सीबीएस प्रणाली असून, ती नाशिक येथून नियंत्रित होते. त्यामुळे शनिवारपर्यंत झालेल्या सर्व कामकाजाची नोंद आहे. ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोमवारी, जिल्हाभरातील बँकेच्या सर्व ९० शाखांचे काम सुरू राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाचखोर लिप‌िक अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेतील प्रकल्प विभागात कार्यरत असलेले लिपिक तथा समूह संघटक रामराव सोनवणे यांनी कंत्राटी कामगाराकडून १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोनवणे यांना अटक केली आहे.

मनपात सन २०१५ मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काही युवकांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आले होते. या कामाचा मोबदला देण्यासाठी मनपाने एक लाख ७१ हजार ९०० रुपयांचा धनादेश एका बचतगटाच्या नावे काढला. बचतगटाकडून ही रक्कम लिपिक रामराव सोनवणे यांनी स्वतःकडे ठेवून घेतली. कंत्राटी कामगाराने त्याच्या कामाचा मोबदला मागितला असता, सोनवणे याने त्यांच्याकडून दहा टक्के रक्कम म्हणजे १८ हजार रुपयांची मागणी केली.

कंत्राटी कामगाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचून सोनवणे याला अटक केली. पोलिस अधीक्षक डॉ. डिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शिवाजी बुधवंत, निरीक्षक विजय चौरे, कर्मचारी अरुण पाटील, जितेंद्र परदेशी, संतोष माळी, संदीप सरग, कैलास शिरसाठ, किरण साळी, संदीप पाटील आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल घोटाळा प्रकरणात डॉ. गेडामांची उलटतपासणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नगरपालिका आणि वास्तुविशारद यांच्यातील झालेल्या करारनाम्याला 'आऊटसोर्स' म्हणता येत नाही. २००२ पासून माझ्या प्रशासकीय क्षमतेमध्ये मी आऊटसोर्स केल्याच्या घटना झालेल्या आहेत, मात्र असे मी जळगाव मनपा येथे केल्याचे आढळून आले नाही. तसे, माझ्या कार्यकाळात संशयित परेदशी हे नगरसेवक होते का? आणि ते कोणत्या राजकीय पक्षाचे होते हे मला आत सांगता येणार नाही, अशी माहिती तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी संशयित क्रमांक ३१ अशोक परदेशी यांचे वकील सागर चित्रे यांना दिली. या प्रकरणी पुढील उलटतपासणीचे कामकाज मंगळवारी होणार आहे.

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी धुळे जिल्हा विशेष न्यायालयात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता कामकाज सुरू झाले. यावेळी खटल्यातील संशयित क्रमांक ३१ अशोक परदेशी यांचे वकील सागर चित्रे यांनी उलटतपासणी केली होती. यावेळी खटल्यातील सर्व संशयित न्यायालयात हजर होते. यानंतर संशयित शिवचरण ढंढोरे, सरस्वताबाई रामदास कोळी, साधना राधेशाम कोगटा यांच्यावतीने अॅड. जितेंद्र निळे यांनी डॉ. गेडाम यांना प्रश्न विचारले.
खटल्यातील संशयित माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे वकील धैर्यशील पाटील यांनी डॉ. गेडाम यांच्या उलटतपासणीला सुरुवात केली. तेव्हा गेडाम म्हणाले की, घरकुल योजना ज्याठिकाणी होणार होती त्याठिकाणच्या काही भागातील झोपडपट्ट्यांतील जागांना दहा वर्षापूर्वी भेटी दिल्या होत्या. आज त्या कोणत्या परिस्थितीत आहेत ते सांगता येणार नाही. तसेच, या योजनेच्या जागांवर मी ५ ते ४० मिनिटे थांबलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत मनपा अभियंता भोळे, इतर अभियंते व कर्मचारी होते. त्यावेळेस नागरिकांशी चर्चा करुन विविध जागांच्या पायांची पाहणी करून चौकशी केली होती, अशी माहिती तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्हा बँकेचे व्यवहार सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य इमारतीला रविवारी सकाळी अचानक शॉटसर्किटमुळे आग लागली होती. यात बँकेचा मुख्य प्रशासकीय विभाग जळून खाक झाला. त्यामुळे आता बँक बंद होईल, अशी विरोधकांनी आवाज उठविला होता. मात्र सोमवारपासून सकाळी नियमित वेळेनुसार बँकेच्या ९० शाखांचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले.


यात बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी स्वत: बँकेच्या कामकाजाचा आढावा घेत सर्व शाखांमधील व्यवहार सुरळीत असल्याची माहिती दिली. जिल्हा बँकेच्या इमारतीला लागलेल्या आगीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे टेबल, एसी, संगणक, लॅपटॉप जळाले होते. या आगीची झळ कमी अधिक प्रमाणात झाली होती. सद्यस्थितीत आगीच्या नुकसानीचा आकडा हा लाखो रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक भालचंद्र चौधरी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाच्याच घरी चोरट्यांची हातसफाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

मुसळगाव वसाहतीतील पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घराच्या किचनचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने, मनगटी घड्याळ आणि मोबाइल असा एकूण ७४ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील खर्जे मळ्यात घडली. मुसळगाव वसाहतीतील पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या किशोर अशोक सानप (वय ३३) रा. खर्जे मळा, सिन्नर या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी चोरीचा प्रकार घडला. किशोर सानप हे खर्जे मळ्यातील भगवान सानप यांच्या इमारतीत पहिल्या माळ्यावर वास्तव्यास आहेत. रविवारी संध्याकाळी ते रात्रपाळीस कामावर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा किचनचा दरवाजा तोडून प्रवेश केला. सानप यांच्या पत्नी वंदना यांच्या पर्समधील हजार रुपये रोख, मंगळसूत्र आणि इतर दागिने तसेच सोनाटा कंपनीचे घड्याळ, सॅमसंग कंपनीचे दोन मोबाइल असा एकूण ७४ हजारांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. घरातून नेलेल्या कपड्यांची बॅग अंगणात टाकून चोरटे फरार झाले. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांत अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

टेम्पोचालकास मारहाण सिन्नर तालुक्यातील दोडी येथील टेम्पोचालकास अज्ञात व्यक्तींनी वाहनास कट मारल्याचे कारण सांगून जबरी मारहाण केली. तसेच, त्याच्याकडील रोख २५ हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. या घटनेत दोडी येथील कृष्णा रामचंद्र गोसावी (वय ५०) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोसावी हे नाशिक येथून टेम्पो घेऊन सिन्नरकडे परतत असताना सिन्नर फाट्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना कट का मारला म्हणून हटकले. मात्र, आपण कट मारला नसल्याचे सांगून गोसावी सिन्नरकडे निघाले. याच दरम्यान चिंचोली येथून एका रिक्षाने त्यांचा पाठलाग सुरू केला. सिन्नर महाविद्यालयाजवळ रिक्षा आणि इतर वाहनातून आलेल्या चौघांनी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गोसावी यांना टेम्पोतून खाली ओढत लाथाबुक्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. तसेच, त्यांच्या खिशातील रोख २५ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याचे गोसावी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

सरकारी डॉक्टरांकडून शाळेत विद्यार्थ्यांची होणारी तपासणी म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना हे केवळ सोपस्कार किंवा नसती उठाठेव असेच वाटते. मात्र, मनमाड उपजिल्हा रुग्णालयाने धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयाच्या सहाय्याने नांदगाव तालुक्यातील शाळांमध्ये राबविलेल्या तपासणी मोहिमेतून पाच चिमुकल्यांना जीवदान मिळाले आहे. तपासणीअंती हाती आलेले रिपोर्टस् आणि त्यानंतर संबंधित रुग्णालयाने हाती घेतलेल्या मोह‌िममुळे आज ही पाचही मुले निरोगी आयुष्याकडे वाटचाल करीत आहेत.

'सरकारी काम सहा महिने थांब' असे नेहमी विनोदाने म्हंटले जाते. सरकारी योजना कागदावरच राहतात, त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाहीत, अशीही ओरड ऐकू येते. पण मनमाड उपजिल्हा रुग्णालयाने एसएमबीटी रुग्णालयाच्या मदतीने नांदगाव तालुक्यातील काही शाळांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. व्ही. के. जमधाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विशाल जाधव, डॉ. स्नेहल आहेर, डॉ. सागर बोबडे, डॉ. रवींद्र क्षीरसागर, डॉ. वृषाली जोशी, डॉ अनिमेष दुबे, जस्मीन पठान या टीमने बालस्वास्थ्य कार्यक्रमाला मूर्त रूप देण्याचे काम केले.

राजीव गांधी योजनेंतर्गत विविध शाळांतील ० ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची या टीमने तपासणी केली. यात जातेगाव, रोहिले, पिंजारवाडी, भोसलेवाडी या ठिकाणी राहणाऱ्या ५ विद्यार्थ्यांना हृदयाच्या झडपेचा विकार असल्याचे निदान झाले. या पाचही मुलांची (चार मुले, एक मुलगी) हृदयाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे हाते. मात्र, त्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती बिकट असून सगळ्यांचेच पालक ऊसतोड करतात. त्यामुळे त्यांना हा खर्च झेपणारा नव्हता.

डॉक्टरांच्या या टीमने विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्या पालकांशी संवाद साधला. त्यांना शस्त्रक्रियेसाठी तयार केले. धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये विभाग प्रमुख डॉ. गौरव शर्मा आणि डॉ. अनिमेष दुबे यांनी मोफत हृदय शस्त्रक्रिया केली. आज ही मुलं मोठ्या आनंदाने आयुष्य जगत आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images