दुष्काळा व वाढत्या तापमानाचा भाजीपाला आवकेवर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. सर्वच पालेभाज्यांचे दर ३० रुपये जुडी पलिकडे गेले असून फळभाज्यांचे दर ७० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मात्र, दर वाढल्याने भाजीपाला उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भाजीपाल्याचे दर कडाडल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. सर्वसामान्यांना तर हिरवा भाजीपाला घेणे दुरापास्त झाले आहे. शंभर रुपयात एक किंवा दोन भाज्या घेणे त्यांना परवडत नाही. त्यातच डाळींच्या किमतीही कडाडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य कात्रीत सापडले आहेत. मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, कांदापात या पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. गिलके, कारले, दोडके, गवार यांचे दर जैसे थे आहेत.
किलोचे दर कारले - ७० ते ८०, गिलके - ७० ते ८०, दोडके - ७० ते ८०, मिरची - ७० ते ८०, गवार - ६० ते ७०, वांगे - ४०, कोबी - १० ते १५, वर - २० ते २५, शेवगा - ५० ते ६०, कांदे - १५, बटाटे - २०, काकडी - ३०, टोमॅटो - १५ ते २०, मेथी - ३० ते ३५, कोथिंबीर - ४० ते ५०, शेपू - १५ ते ३५, पालक - १० कांदापात - २० ते ४०
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट