Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

येवल्यात केवळ ‘पैठणी’च

0
0

पैठणी पर्यटन केंद्रातील अवांतर साड्यांच्या विक्रीला लगाम

म. टा. वृत्तसेवा, येवला

कुशल कारागिरांच्या अप्रतिम कलाकुसरीने नटलेली प्रसिद्ध पैठणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, पैठणीकडे पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित व्हावेत, त्यातून येवल्यातील विणकरांचे जीवनमान उंचवावे या उद्देशाने राज्य सरकारच्या पर्यटन विकास मंडळांतर्गत येवल्यात पैठणी पर्यटन केंद्र साकारले असले तरी या केंद्रात अवांतर साड्यांचीच अधिक विक्री होत होती. आता या अवांतर साड्यांच्या विक्रीवर लगाम बसला आहे. येवला शहरातील पैठणी विणकरांच्या लेखी तक्रारीवरून पैठणी पर्यटन केंद्र चालवत असलेल्या रा. रा. फाऊंडेशनला पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैठणीव्यतिरिक्त इतर कोणत्याही साड्यांची विक्री न करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार आता ही विक्री बंद झाली आहे.

येवला शहरानजीक अवघ्या दीड किलोमीटरवरील अंगणगाव येथे पर्यटन विकास महामंडळांतर्गत ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्र तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातुन सुरू करण्यात आले होते. या केंद्रात खऱ्या पैठणी विक्री व प्रदर्शनाला चालना मिळून विणकरांना लाभ मिळावा, हा मुख्य उद्देश यामागे होता. प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यात या केंद्राचे उद््घाटन झाल्यानंतर मुंबईच्या रा. रा. फाऊंडेशनने कराराने हे पैठणी केंद्र चालविण्यास घेतले. २०१४ मध्ये हे केंद्र सुरू झाल्यानंतर केंद्राच्या मुख्य हमारतीत प्रवेशद्वारालगतच्या हॉलसह काही कक्षात फाऊंडेशनच्या वतीने जरदोसी वर्कच्या साड्यांसह बनारसी, सुरत, साऊथकडील साड्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या साड्यांच्या विक्रीमुळे पैठणी साड्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ लागला. सरकारच्या मुख्य पैठणी विक्री व प्रदर्शनाच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याने पर्यटकांचीही फसवणूक झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या केंद्रात गेल्या दोन वर्षांत एकही पैठणी प्रदर्शन न झाल्याने शहरातील विणकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. विशेष म्हणजे या पैठणी केंद्रातच पैठणींच्या मोजक्याच डिझाइन विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

येवला शहरातील राष्ट्रपती पारितोषिक विजेते पैठणी उत्पादक व विक्रेते दिगंबरसा भांडगे यांनी याबाबत पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन मिसाळ यांनी नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयात ३ मे रोजी रा. रा. फाऊंडेशनचे प्रतिनिधी, केंद्राचे समन्वयक विक्रम गायकवाड, विणकर मनोज दिवटे, राजेश भांडगे, ललित भांडगे, राजेंद्र नागपुरे आदींच्या उपस्थितीत बैठक घेतली. फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी या वेळी बेकायदेशीररीत्या अवांतर साड्यांची होत असलेली विक्री बंद करण्याचे मान्य केले.

पर्यटन केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैठणीव्यतिरिक्त इतर साड्यांची केंद्रात होत असलेली साड्यांची विक्री बंद करण्याच्या सक्त सूचना दिल्यानंतर शुक्रवारपासून पर्यटन केंद्रातील दोन गाळ्यांमधील जरदोसी व इतर साड्या विक्रीची दालने बंद करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आग सुरक्षा निधीत होणार वाढ?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची महासभा मंगळवारी होत असून या सभेत शहरातील आग सुरक्षा निधीच्या वाढीवर निर्णय घेतला जाणार आहे. सोबतच चीनच्या युंग याँग शहरासोबत सिस्टर सिटी करण्याचा प्रस्तावही चर्चेसाठी येणार असून या प्रस्तावालाही मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

गंगनचुंबी इमारतींच्या आग सुरक्षा निधीत त‌िपटीने वाढ सुचविण्यात आली असून सदस्यांचा या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे लेखापरिक्षण अहवालाच्या आधारे प्रशासनाने हा विषय मंजुरीला ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महासभा होत आहे. त्यात विकासकामांच्या प्रस्तावांसह आग सुरक्षा निधीत वाढ करणे व चीनच्या युंग याँग सिटीसोबत सिस्टर सिटीचा करारनामा करण्याचे दोन महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. आग सुरक्षा निधीच्या वाढीचा विषय स्थायी समितीने महासभेवर पाठवला आहे. आग सुरक्षा निधीत त‌िपटीने वाढ सुचव‌िण्यात आली आहे. त्यातून एक हजार चौरस फुटावरील प्लॉट व १५ मीटर खालील इमारती वगळण्यात आल्या आहेत. लेखा परिक्षणात महापालिका कमी आग सुरक्षा निधी गोळा करत असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे महापालिकेडून

ही वाढ सुचविण्यात आली आहे. या वाढीला नगरसेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तर युंग याँग सिटी सोबतच सिस्टर सिटी करार करण्याच्या प्रस्ताववरही चर्चा केली जाणार आहे.

निमाच्यावतीने हा प्रस्ताव आला असून २५

तारखेला चीनच्या शिष्टमंडळासोबत हा करार केला जाणार आहे. त्यावर महासभेत शिक्कामोर्तब होण्याचा जाण्याची शक्यता आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजारप्रकरणी आयुक्तांना नोटीस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाने भंगार बाजार काढण्यासंदर्भात आदेश देवून महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांकडून भंगार बाजार हटवण्यासंदर्भात कारवाई केली जात नाही. त्यामुळे याचिकाकर्ते दिलीप दातीर यांनी अवमान याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाच्या आदेशाची अमंलबजावणी केली नाही, म्हणून वकिलामार्फत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना अवमानना नोटीस बजावल्याची माहिती याचिकाकर्ते दिलीप दातीर यांनी दिली आहे. तसेच १५ दिवसाच्या आत हटवण्याची कारवाई केली नाही तर शिवसेनेतर्फे आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिका प्रशासन व पोलिस आयुक्त भंगार बाजाराची पाठराखण करत आहेत. वारंवार सूचना व कोर्टाचे आदेश देवून भंगार बाजार हटवले जात नाही. शहरातील अवैध व्यवसायाचा अड्डा हा भंगार बाजार बनला आहे. परंतु, राजकीय वरदहस्तामुळे त्याच्यावरील कारवाई केली जात नाही. त्यामुळे याचिककर्ते दिलीप दातीर यांनी न्यायालयाचा आदेश देवूनही भंगार बाजार हटवले जात नाही. म्हणून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दातीर यांनी वकिलामार्फत आयुक्तांना नोटीस बजावली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड स्थानकाला रिक्षांचा विळखा

0
0
नाशिकरोड बसस्थानकात इन व आउटसाठी सध्या एकाचा मार्गाचा वापर केला जात आहे. मात्र, या स्थानकाला रिक्षांचा विळखा पडत असल्याने बसेसची कोंडी नित्याचीच झाली असून, प्रवाशांची चढ-उतार करण्यासाठी काही बसेस अक्षरशः बसथानकाच्या बाहेरच उभ्या कराव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पेठरोडवरील झाडे ठरताहेत जीवघेणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम पेठरोडवर मध्यभागी असणारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी असंख्य झाडे जीवघेणी ठरत आहेत. अनेक निष्पाप व्यक्तींचा बळी घेणारी व अनेकांना जायबंदी करणारी अशी धोकादायक झाडे येथून काढून त्यांचे पुनर्रोपण करावे, अशी मागणी प्रवासी व वृक्षप्रेमींकडून केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून पेठरोडवरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे पेठरोडचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे अनेक झाडे रस्त्याच्या मध्यभागी आली आहेत. त्यामुळे पेठरोडवरून जाणे जीवघेणे बनले असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून केल्या जात आहेत. गेल्या वर्षभरात अनेक वाहनचालक अशा झाडांवर आदळल्याने काहींना जीव गमवावा लागला असून, अनेक जण जायबंदी झाले आहेत, तर मोठा भुर्दंडही अनेकांना बसला आहे. त्यामुळे या रोडवरील अशी धोकादायक झाडे काढून त्यांचे उद्यानात किंवा अन्यत्र पुनर्रोपण केल्यास अशी झाडेही वाचतील आणि माणसांचा जीवदेखील वाचू शकेल. त्याचप्रमाणे वाहनांचे होणारे नुकसानही टळू शकेल. महापालिकेने वृक्षप्रेमींशी चर्चा करून आणि संबंधित परवानग्या घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे. पवार मार्केटमधून बाहेर पडताना आणि आतमध्ये जाताना मध्यभागी असलेला मोठा वृक्ष वाहतुकीस अडथला बनला आहे. पेठरोडवरून पेठकडे आणि म्हसरूळ व मखमलाबाद गावाकडे जाणारी चौफुली व सिग्नलजवळ अशीच दोन झाडे रोडच्या मध्यभागी आहेत. याशिवाय मेहेरधाम आणि एसटीच्या कार्यशाळेसमोरदेखील भर रस्त्यात अनेक झाडी आहेत. या ठिकाणांवर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे अशा धोकादायक झाडांच्या पुनर्रोपणाची मागणी करण्याची वृक्षप्रेमी, वाचनचालकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाव्या लॉकरमध्येही निघाले सोने

0
0

भाऊसाहेब चव्हाणच्या नामको बँकेच्या खात्यात आढळले सव्वापाच किलो सोने

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केबीसी मल्टिट्रेड अ‍ॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भाऊसाहेब चव्हाणचे आणखी एक लॉकर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी उघडले. या लॉकरमध्ये तब्बल ५ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले. आर्थिक गुन्हे शाखेने आजवर १४ किलो १३४ ग्रॅम वजनाचे सोने व दोन किलो ३०० ग्रॅम वजनाचे दागिने असा मुद्देमाल चव्हाणच्या विविध लॉकरमधून जप्त केले आहे.

राज्यभरातील गुंतवणूकदारांना हैराण करून सोडणा-या भाऊसाहेब चव्हाणला अटक केल्यापासून आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या संपत्तीची शोध मोहीम हाती घेतली आहे. आजवर त्याच्याकडून चार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमत्तीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सोमवारी, आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धनलक्ष्मी बँकेतील लॉकर्सची तपासणी केली. या लॉकरबाबत त्यानेच पोलिसांना माहिती दिली होती. मात्र, त्यात काहीच आढळून आले नाही. पोलिस सातत्याने त्याच्याकडे चौकशी करीत असून, त्यातच त्यांना चव्हाणच्या आणखी एका लॉकरबाबत माहिती मिळाली होती. हे लॉकर नामको बँकत असल्याने पोलिसांनी लागलीच या लॉकरची तपासणी केली. या लॉकरमध्ये ५ किलो ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडून आले.

सिंगापूरवरून परतलेला भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती हे सुरुवातीस पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे चित्र होते. मात्र, हळूहळू चव्हाण तीच तीच माहिती देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आज उघडण्यात आलेल्या सहाव्या लॉकरबाबतची माहिती चव्हाणने पोलिसांना दिलीच नव्हती. भाऊसाहेब चव्हाण लपवाछपवी करीत असल्याने वरिष्ठ अधिकारी सुध्दा त्याच्याकडे वेगवेगळ्या पध्दतीने चौकशी करीत आहेत. सोमवारी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी देखील चव्हाणकडे सखोल चौकशी केली. पोलिसांनी केबीसी कंपनीशी संबंधित सर्व हार्डडिस्क तसेच कागदपत्रे जप्त केली असून, त्या आधारे त्यांच्याकडील माहिती बाहेर काढली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तपासावर एक दृष्टीक्षेप ७ मे रोजी भाऊसाहेब व आरती चव्हाला अटक ८ मे रोजी चव्हाण दाम्पत्यास १३ मेपर्यंत कोठडी ९ ते १० मे या दरम्यान कंपनीच्या हार्डडिस्कसह इतर कागदपत्रे जप्त १३ मे रोजी कोर्टाकडून दोघांच्या कोठडीत १९ मेपर्यंत वाढ

जप्त मालमत्ता दिनांक - बँकचे नाव - उघडकीस आलेली मालमत्ता १० मे - नगर अर्बन को. ऑफ. - ६ किलो ६०० ग्रॅम सोने १० मे - मेरी एसबीआय शाखा - २०० ग्रॅम वजनाचे सोने ११ मे - एसबीआय शाखा, शरणपूररोड - काहीही नाही ११ मे - २ किलो ३५ ग्रॅम वजनाचे सोने व २ किलो ३ ग्रॅम वजनाची चांदी १६ मे - धन लक्ष्मी बँक - काहीही नाही १६ मे - नामको बँक - ५ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने एकूण - १४ किलो १६९ ग्रॅम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीत धमाल नाट्य कार्यशाळेची

0
0

'मटा' आणि लोकहितवादी मंडळाचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स व लोकहितवादी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बालनाट्य शिबिर आणि मोठ्या मुलांसाठी असलेल्या नाट्य कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला. ही दोन्ही शिबिरे राका कॉलनीतील लोकहितवादी मंडळाच्या हॉलमध्ये सुरू असून, ज्येष्ठ दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी आणि डॉ. प्रशांत वाघ शिबिरार्थींना प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पहात आहेत.

या शिबिरात मुलांकडून रोज विविध प्रकारचा नाट्याभ्यास करून घेतला जात आहे. सुरुवातीला पहिल्या दिवशी एकमेकांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर आवाजावर नियंत्रण, स्पष्ट उच्चार, समयसुचकता, वाचिक आणि कायिक अभिनय या गोष्टींवर मार्गदर्शन केले जात आहे. तसेच, बालनाट्य शिबिर पूर्ण करणाऱ्या बालकलाकारांचा एक नाट्यविष्कार पंचवटीतील पलुस्कर सभागृहात १९ मे रोजी आयोजित केला आहे. शिबिरार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे शिबिर ६ ते १९ मे या कालावधीत आयोजित केले आहे. या शिबिरात ५ ते १४ वर्षे वयोगटातील २७ मुला-मुलींना प्रवेश दिला आहे. लहान मुलांप्रमाणेच मोठ्या मुलामुलांसाठीदेखील लोकहितवादी मंडळातर्फे आयोजित कार्यशाळेलादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी काम पहात असून, ही कार्यशाळा ८ मे पासून सुरू झाली आहे २२ मेला समारोप होईल. ज्या मुला-मुलींना या क्षेत्रात करिअर करायचे आहे, अशांसाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे. यात अभिनयाबरोबरच नाट्यसंहिता लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत वेषभूषा, केशभूषा, रंगभूषा, अभिनय इत्यादी तांत्रिक अंगाचे देखील मार्गदर्शन केले जात आहे. या कार्यशाळेतील मुलांना २२ मे रोजी एका विशेष समारंभात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

आम्ही चांगल्या ठिकाणी नाटकाचे धडे घेत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. नाटकात इतका बारिक विचार केला जातो, याचा कधी विचार केला नव्हता. या कार्यशाळेत आल्यानंतर नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. - डॉ. नरेंद्र दाभाडे

फारच सुंदर कार्यशाळा सुरू आहे. वाचिक अभिनयाबरोबरच कायिक अभिनयदेखील आम्हाला शिकवला जात असून, अनेक तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करीत आहेत. - प्राजक्ता इखानकर

खूप खूप मजा येत आहे. रोज शिबिराच्या ठिकाणी कधी येईल असे होऊन जाते. मंडळात आम्ही खूप चांगल्या गोष्टी शिकलो. - रुचा

खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. शाळेत मित्रांशी वागाव कसं, त्याचप्रमाणे अभिनय कसा करावा, मराठी वाचन कसे करावे, याचा छान अभ्यास झाला. - मिताली वाघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील ४६ अवैध धंद्यांवर छापे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या तब्बल ४६ अवैध धंद्यावर छापे मारीत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत अनेकांवर कारवाई केली. सोमवारी दिवसभर सुरू असलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली.

शहरात गुन्हेगारी घटनांनी जोर पकडला असून, पोलिस टीकेचे धनी ठरत आहेत. अवैध धंद्याबाबत ओरड असून, पोलिस संशयितांना पाठीशी घालत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भागात छापे मारून ३३ अवैध मद्य विक्रीची ठिकाणे व १३ जुगार अड्डे उद्ध्वस्त केले. पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे दाबे दणाणले असून, बंद पडलेले अड्डे पुन्हा सुरू होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.

इंदिरानगरला दारूच्या बाटल्या जप्त

वडाळा गावातील अवैध धंद्यावर छापा टाकून हजारो रुपयांचा माल जप्त करून काही संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी वडाळागावातील काही अवैध धंद्यावर छापा टाकला. यावेळी एका अवैधरित्या देशीदारू विकणाऱ्यांवर संशयित आरोपी बबन ठाकरे (वय ४०) यांच्या धंद्यावर छापा टाकला. यावेळी १५ हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या हेत. तसेच, एका मोकळ्या मैदानात जुगार खेळणाऱ्यावरही पोलिसांनी छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी आसिफ शेख, सोयब कुरेशी, पप्पू किर्लोस्कर, मच्छिद्र मुणे यांना ताब्यात घेतले. यांच्याकडेही सुमारे चौदाशे रुपये जप्त करण्यात आले आहे. या छाप्याप्रसंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्यासह इंदिरानगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील इतर भागात पोलिसांनी अवैध धंद्यांवर छापे टाकले. ही मोहीम आणखी काही दिवस सुरू ठेवून अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेलरोडला घरात घुसून महिलेचा विनयभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरात घुसून तिघा संशयितांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना जेलरोड येथील मंगलमूर्तीनगर परिसरात घडली. सॅम पारखे, रॉर्बर्ट पारखे आणि रोहित पारखे व त्यांची आई अलका (पूर्ण नाव समजले नाही) अशी संशयितांची नावे आहेत. विशेष म्हणजे घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना सुध्दा यावेळी धक्काबुक्की करण्यात आली. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयितांनी पीडित महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला. तसेच, तिला मारहाण केली. या प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील या पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, पीडित महिलेने संशयितांविरोधात उपनगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सदाफुले हे काही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यावेळी संशयित सॅम पारेख याच्यासह त्याच्या साथिदारांनी पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. या प्रकरणी सदाफुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा दुसरा गुन्हा दाखल केला.

ब्लेडने वार जुने नाशिक येथील तलवाडी परिसरात एकावर ब्लेडने वार करण्यात आले. इरफान अजगर सैयद (वय ३८) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात अज्ञात संशयिताने काही एक कारण नसतानाही ब्लेडने सैयद याच्या मानेवर, हातावर वार करून दुखापत केली. घटनेनंतर संशयित फरार झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

ट्रकखाली सापडून एकाचा मृत्यू ट्रक पार्क करीत असताना तोल जाऊन खाली पडलेल्या व्यक्तीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना औरंगाबादरोड वरील निलगिरी बागेतील म्हाडा कॉलनी येथे घडली. राजू नंदकिशोर जगताप (वय ३०) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबाद रोडवरील म्हाडा कॉलनी येथे राहणारे जगताप शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घराजवळ ट्रक पार्क करीत असताना हा अपघात झाला. ट्रक पाठीमागे घेत असताना पाठीमागे वळून पाहणाऱ्या जगतापांचा तोल गेला. त्यातच ट्रकचे पाठीमागील चाक छातीवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबीसीनंतर आता ‘ट्रू लाइफ’चा गुंतवूणकदारांना गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुंतवणूकदारांना साखळी पद्धतीने मार्केटिंग करण्याचे व आकर्षक आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या ट्रू लाइफ व्हिजन प्रा. लि. कंपनीच्या सात जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. प्राथमिक तपासात त्यांनी ६,३०० गुंतवणूकदारांची आतापर्यंत तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांतील गुंतवणूकदारांचा समावेश आहे. निराला बाजार येथील सेमिनार संपल्यानंतर रविवारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंपनीचा प्रमुख संचालक नाशिकचा आहे.

ट्रू लाइफ या कंपनीचा रविवारी वर्धापनदिन होता. त्यानिमित्त निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात 'उडाण' नावाने सेमिनार आयोजित करण्यात आला होता. तेथे कंपनीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर दीपक जिभाऊ सूर्यवंशी यांच्यासह इतर उपस्थित होते. या सेमिनारला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हजेरी लावली होती. सुमारे १८०० ते १९०० गुंतवणूकदार सेमिनारला उपस्थित होते. तेथे आकर्षक ब‌क्षिसे देऊन गुंतवणूकदारांचा सत्कार करण्यात आला. प्रभावी भाषणाद्वारे कंपनीला साखळी पद्धतीने ग्राहक मिळवून दिल्यास सभासदांना आकर्षक बक्षिसे व करोडपती बनवण्याचे आमिष दाखविण्यात आले.

सेमिनार संपल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कंपनीचे सीएमडी दीपक सूर्यवंशी (वय ३७, रा. कामटवाडा, नाशिक), शंकर प्रकाश निकम (वय ३६, रा. शेंदूरवादा ता. गंगापूर), राजेंद्र दादासाहेब भुसे (वय ३५, रा. चापटगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर), अरुण चंद्रभान मोगल (वय ३०, रा. शिवाजीनगर, बारावी योजना, औरंगाबाद), परमेश्वर रावसाहेब लोंढे (वय ३५, रा. ‌शिवाजीनगर, जालना), संदीप श्रीधर बांडे (वय २९ रा. निलजगाव फाटा, बिडकीन, ता. पैठण) व रविराज जवाहर राठोड (वय २७ रा. विजयंतनगर, देवळाई चौक, औरंगाबाद) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध ‌गुंतवणूकदार शिवाजी शेनूबा ढाकणे (वय ५३, रा. बजाजनगर) यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहार, फसवणूक, ठेवीदारहित संरक्षण अधिनियम कायदा, माहिती व तंत्रज्ञान कायदा, प्राइज चीट्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम (बॅनिंग) अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे व पीएसआय सुभाष खंडागळे यांनी ही कारवाई केली.

नाशिकच हेडक्वार्टर्स

भाऊसाहेब चव्हाणच्या केबीसी कंपनीचे व दीपक पारखेच्या सुपर पॉवर कंपनीचे हेडक्वार्टर्स नाशिकचेच होते. दीपक सूर्यवंशी याच्या ट्रू लाइफचे मूळदेखील नाशिक शहरात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील गोळेगाव येथील सागर पंढरीनाथ डोंगरे (वय २७, रा. गोळेगाव) या तरुण शेतकऱ्याने रविवारी शेततळ्यामध्ये उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. जिल्ह्यात आतापर्यंत ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यात निफाड तालुक्यात १२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

बागायतदारांचा तालुका अशी निफाडची ओळख आहे. मात्र, याच तालुक्यात चालू वर्षात शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. सागर डोंगरे याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. त्याच्या वडिलांच्या नावे शेती असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. तो विवाहित होता. त्याच्या मागे पत्नी, आईवडील असा परिवार असल्याची माहिती निफाड तहसील कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. डोंगरे कुटुंबांवर कर्ज असावे, असा प्राथमिक अंदाजही प्रशासनाने व्यक्त केला आहे. मेमध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या नऊ घटनांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कर्जबाजारीपणा, दुष्काळी परिस्थिती यांमुळे शेतकऱ्यांचा धीर खचत असून त्यातून दिवसागणिक आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बडगुजर दाम्पत्याचे नगरसेवकपद धोक्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी सिडको

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर व त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बडगुजर यांनी राहत्या घरात व कार्यालयात अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्याने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या दाम्पत्याला अपात्रतेची नोटीस बजावली आहे.

बडगुजर यांना खुलासा करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली असून यामुळे बडगुजर दाम्पत्यावर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान, महापालिकेच्या कारवाईनंतर बडगुजरांनी आपले अतिरिक्त बांधकाम काढण्यास सुरूवात केली होती. परंतु, पालिकेने ही असे न करण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांना बांधकाम तोडडे थांबविले.

सावतानगर येथे बडगुजर यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या गच्चीवर असलेल्या खुल्या जागेत त्यांनी एक खोली बांधली होती. तसेच आपल्या संपर्क कार्यालयातही अतिरिक्त बांधकाम केले होते. या सदंर्भात आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेवून आयुक्तांनी बडगुजर यांच्या घराची व संपर्क कार्यालयाची मोजणी केली होती. सिडको, तहसीलदारांचे प्रतिनिधी, पोल‌सि व पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली होती. त्यात मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त बांधकाम केल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी सिडकोच्यावतीने हे बांधकाम अनाधिकृत असल्याने ते काढून घ्यावे, अशी नोटीस दिली होती. दरम्यान या कारवाईनंतर बडगुजर यांनी अनधिकृत केलेले बांधकाम पाडण्यास सुरुवात केली होती. परंतु, पालिकेने हे बांधकाम पाडू नये अशी तंबी दिली. बडगुजर यांच्या नावावर असलेल्या कार्यालयाचे व हर्षा बडगुजर यांच्या नावावर असलेल्या घराचे अनधिकृत बांधकाम आढळून आल्यानंतर आयुक्त डॉ. गेडाम यांनी बडगुजर दाम्पत्याला नगरसेवक पद रद्द का करू नये, अशी नोटीस दोघांना बजावली असून सात दिवसाच्या आत खुलासा करण्यात सागंण्यात आले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा धरणे कोरडीठाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा सहा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून कोरड्याठाक धरणांची संख्याही आता सहावर पोहोचली आहे. तसेच दहा टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणाऱ्या धरणांची संख्या नऊ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरण समूहातील काश्यपी व गौतमी गोदावरी ही दोन्ही धरणे कोरडी झाल्याने पाणी पुरविण्याची सर्व भिस्त आता गंगापूर धरणावर आहे.

जिल्ह्यात २३ धरणे असून, पाण्याच्या बाबतीत नाशिक समृद्ध मानले जाते. केवळ जिल्हावासीयांची नव्हे, तर अहमदनगर आणि औरंगाबादकरांची तहान भागविणारी हीच धरणे यंदा तहानली आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने ही धरणे गतवर्षी ५० टक्केही भरू शकली नाहीत. धरणांनी गाठलेला तळ आणि भूगर्भात आटलेला पाणीसाठा यामुळे नाशिककरांना भीषण पाणीटंचाईचा सामना सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सात टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. तो एक टक्क्याने कमी होऊन सहा टक्क्यांवर आला आहे. त्यातच मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत हवामान विभागाने दिल्यामुळे जोपर्यंत पावसाला सुरुवात होऊन जलाशयांमधील पाणी पातळी वाढत नाही, तोपर्यंत आहे त्याच पाण्यात प्रशासनाला जिल्हावासीयांची तहान भागवावी लागणार आहे. ग्रामीण भागात पाणी उपलब्धतेची परिस्थिती बिकट असून, तहान भागविण्यासाठी रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागेल. जिल्ह्यात गंगापूर धरण समूहात गंगापूर, काश्यपी आणि गौतमी गोदावरी ही तीन धरणे आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता ९ हजार ३५० दशलक्ष घनफूट आहे. सद्यस्थितीत त्यामध्ये एक हजार ४६४ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी समूहात या कालावधीत ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो निम्म्याहून कमी होऊन १६ टक्क्यांवर आला आहे. काश्यपी धरणात गत महिन्यात ३१ टक्के पाणीसाठा होता तो एक टक्क्यांवर आला आहे.

पालखेड धरण समूहामध्ये सर्वाधिक १४ धरणे असून पालखेड धरणात सर्वाधिक १४ टक्के पाणी शिल्लक आहे. गत महिन्यात २० टक्के पाणी होते. अन्य बहुतांश धरणांमधील पाणी पातळी खालावली आहे. २० हजार २३१ दशलक्ष घनफुट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता असली तरी त्यांमध्ये आजमितीस दोन टक्के म्हणजेच ४८६ दशलक्ष घनफुट पाणीसाठा शिल्लक आहे.

गिरणा खोऱ्यातही अशीच परिस्थिती आहे. या खोऱ्यात सहा धरणे असून नागासाक्या आणि गिरणा धरणातील पाणीसाठा शुन्यावर पोहोचला आहे. महिनाभरात पुनद धरणातील पाणीसाठा ४१ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. चणकापूर धरणातील पाणीसाठाही कमी होऊन २२ टक्क्यांवर आला आहे. मुकणे, नांदूरमध्यमेश्वर आणि भोजापूर ही धरणे कोरडी पडली आहेत. दारणा, भावली, वालदेवी, कडवा, करंजवण या धरणांमध्ये अवघा एक ते पाच टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता ६६ हजार १६१ दशलक्ष घनफूट आहे. गतवर्षी या कालावधीत त्यामध्ये ९ हजार ९२३ दशलक्ष घनफूट म्हणजेच १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, आता ४ हजार २२९ दशलक्ष घनफूट म्हणजेच सहा टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्रू लाइफ’च्या कार्यालयावर छापा

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

गुंतवणूकदारांना साखळी पध्दतीने मार्केटिंग करण्याचे व आकर्षक आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या ट्रू लाइफ व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भाभानगर येथील मुख्य कार्यालय व सिडकोच्या कामठवाडे येथील निवासस्थानी औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी छापा टाकला. या छाप्यात कागदपत्रे, संगणक डाटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी संशयित दीपक सूर्यवंशी हा पोलिसांबरोबरच होता.

भाभानगरच्या नवशक्ती चौकातील जगन्नाथ सोसायटीच्या पवार नामक यांच्या मालकीच्या रो हाऊसमध्ये आठ हजार रुपये मासिक भाड्याने दीपक सूर्यवंशीने कार्यालय थाटले. येथे तीन चार महिला कर्मचारी कार्यालय चालवत होत्या. भाभानगरच्या याच कार्यालयाच्या पत्त्यावर त्याने संस्था व दुकाने नोंदणी शॉप अॅक्ट लायसन्स, भारत सरकारचे कंपनी नोंदणी, आयकर विभागाचे पॅनकार्ड, महाराष्ट्र बँकेचे अकाऊंट आदी काढले असून, या प्रकरणी घरमालकाचे जबाब नोंदविण्यात आले. दरमहा साखळी पध्दतीने साडेचार लाख रुपये कमविण्याचे आमिष दाखवून दीपक गुंतवणूकदारांना आकर्षित करीत होता. आर्थिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक सुभाष खडांगळे व सहकारी यांनी झडतीची कारवाई पूर्ण केली. रात्री उशिरापर्यंत कार्यालय व निवासस्थानाची झडती सुरू होती.

अंगठ्या, ब्रेसलेट, पैठणी साड्या जप्त

भाभानगरच्या नवशक्ती चौकातील जगन्नाथ सोसायटीच्या अगदी रस्त्याच्या दर्शनी भागात एका रो हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर अलिशान तीन रुमच्या कार्यालयातून झडतीच्या वेळी पोलिसांना गुंतवणूकदारांना आमिष म्हणून देण्यात येणारे सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या अंगठ्या, ब्रेसलेट, पैठणी साड्या, सफारी सूट, संगणक व टॅब आदी साहित्य मिळून आले. पोलिसांनी जप्त केलेले साहित्य औरंगाबादला रवाना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांची अतिक्रमणे आयुक्तांच्या रडारवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोरगरिबांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणाऱ्या महापालिकेने आता बड्या राजकारण्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नगरसेवकांना कारवाईच्या रडारवर घेतले आहे. त्याचा पहिला दणका पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना दिला आहे. बडगुजर यांनी आपल्या घर व संपर्क कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांच्यासह त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांच्यावर थेट अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे. बडगुजर यांच्यासोबतच आणखी तीन ते चार नगरसेवक आयुक्तांच्या रडारवर असून, या कारवाईने नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.

डॉ. गेडाम यांनी सिंहस्थापूर्वीच शहरातील अनधिकृत अतिक्रमणे काढण्याचा धडाका लावला होता. सिंहस्थानंतर ही कारवाई थंडावली होती, तसेच लहान- मोठ्या व्यावसायिकांचे व गोरगरिबांचीच अतिक्रमणे काढली जात असल्याचा आरोप महापालिकेवर होत होता. त्यामुळे आयुक्तांनी आता दुसऱ्या टप्प्यात बड्या राजकारणी लोकांची अनधिकृत अतिक्रमणे रडारवर घेतली आहेत. बड्या राजकारण्यांमध्ये त्यांनी पहिला झटका शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर व त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांना दिला आहे. बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयात व हर्षा बडगुजर यांच्या नावावर असलेल्या घरात मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त विनापरवाना बांधकाम केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी बडगुजर दाम्पत्याला थेट अपात्रतेची नोटीस बजावल्याने राजकीय क्षेत्रासह शहरात खळबळ उडाली आहे.
अनधिकृत बांधकाम प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारासह तीन ते चार नगरसेवकांच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. या सर्वांवरही लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांनाही लवकरच नोटिसा दिल्या जाणार असून, बड्या राजकारण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका महापालिका पुसणार आहे. बडगुजरांसारख्या हेविवेट नगरसेवकावरच कारवाई होऊ शकते, तर आपल्यावर का नाही, या भीतीने नगरसेवक आता धास्तावले आहेत. अनेकांनी आपल्या बांधकामांची चाचपणी सुरू केली असून, या कारवाईचा धसका घेतला आहे.

संपर्क कार्यालये अनधिकृत

महापालिकेतील ७० टक्के नगरसेवकांनी अनधिकृत जागेत संपर्क कार्यालये थाटली आहेत. नागरिकांशी संवाद साधण्याच्या बहाण्याने ही संपर्क कार्यालये रस्त्यावरच थाटली असून, त्या संदर्भातही तक्रारी आहेत. मात्र, या बांधकामांवर कारवाईची हिम्मत अद्याप कोणीच केलेली नाही. त्यामुळे अनधिकृत संपर्क कार्यालये उभारणाऱ्या नगरसेवकांवरही आयुक्त कारवाई करतील काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. बडगुजरांवर कारवाई होते, मग अन्य नगरसेवकांवर का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अन्य नगरसेवकांच्या कारवाईकडे नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माणुसकीचा झरा खुला!

0
0

तुषार देसले, मालेगाव

मालेगाव तालुक्यात पाण्याचा भीषण दुष्काळ असला तरी माणुसकी आणि संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारा प्रसंग अशा दुष्काळातही पाहायला मिळत आहे. दुंधे येथील एका शेतकऱ्याने गावातील भीषण पाणीटंचाई पाहून आपले शेततळे, विहिरीचे पाणी मोफत उपलब्ध करून दिले. डाळींब बागेपेक्षा माणसे जगली पाहिजे, असे सांगत त्या शेतकऱ्याने माणुसकीचा झरा खुला करून दिला. मालेगाव तालुक्यातील गावागावात पाणीटंचाई उग्र स्वरूप धारण करीत आहे. प्रशासन टँकरांचे प्रस्ताव मंजूर करीत आहे, पण त्यासाठी लागणारे पाणी आणायचे कोठून हा देखील मोठा प्रश्न आहे. तालुक्यातील दुंधे ,माळीनगर, जवाईवस्ती येथील परिस्थिती देखील याहून वेगळी नाही. हंडाभर पाण्यासाठीचा टाहो गावातीलच प्रगतिशील शेतकरी मधुकर रौंदळ यांना पाहवला नाही. म्हणून त्यांनी थेट आपल्याच शेतातील शेततळे आणि विहिरीतील पाणी गावासाठी मोफत उपलब्ध करून दिले.प्रशासनाने दुंधे, माळीनगर व जावईवस्ती भागात पाण्याचा टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या परिसरात २० ते ३० किमीपर्यंत कुठेही पाणी नसल्याने टँकर भरायचा कोठून, असा प्रश्न निर्माण झाला. मधुकर रौंदळ यांची गावाजनिकच ४० एकर डाळींब बाग आहे. तसेच शेतात दीड एकरावर २००६ साली त्यांनी अनुदानातून केलेले शेततळे आणि विहीरही आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र पाहून त्यांच्यातील माणुसकी आणि संवेदनशीलतेने त्यांना अस्वस्थ करून सोडले. प्रशासन टँकर देत असेल तर शेततळे व विहिरीतील पाणी गावकऱ्यांना मोफत देतो, असा निर्णय त्यांनी घेतला. यातून प्रशासनाचा १५ हजार लिटर क्षमता असलेला टँकर रोज तीन फेऱ्या करून सुमारे ४० हजार लिटर पाण्याचे वाटप गावात करीत असून, पाणीटंचाईच्या या भीषण संकटात त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतीला पाणी देऊन झाडे जगतीलही, पण गावातील माणसे तहानलेली आहेत त्याचे काय? या विचारातून मी शेततळे व विहिरीतील पाणी गावकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला- मधुकर रौंदळ, दुंधे ता. मालेगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात वाढताहेत हॉटेल

0
0

बदलत्या आहार शैलीमुळे नाशकात हॉटेल्सची संख्याही लक्षणीयरित्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ४ वर्षात शहर परिसरात तब्बल १५०० हॉटेल्सची भर पडली आहे. नाशिककर खवय्यांची रसना तृप्त करण्यापासून भरपेट जेवणापर्यंत अनेकानेक हॉटेल्स सेवेत आली आहेत. संडे मिसळचा ट्रेंड नाशकात हिट झाल्यानंतर मिसळ महोत्सव, चौपाटी महोत्सवासारख्या अनोख्या संकल्पनांनाही नाशिककरांनी बळ दिले आहे.

शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढलेली असतांना चार वर्षात नाशिकमध्ये हॉटेलच्या संख्येत १५०० ने वाढ झालेली आहे. बदलत्या खाद्य संस्कृतीमुळे ही वाढ झपाट्याने होत असतांना जगभरातील खाद्यपदार्थ आता नाशिकमध्ये मिळू लागले आहे. विशेष म्हणजे एकेकाळी सायंताराचा साबुदाणा वडा, बुधाजी जिलबी, पांडे मिठाई सारख्या काही खाद्यपदार्थ प्रसिध्द होते. आता मात्र नाशिकमध्ये गल्ली बोळात, चौकाचौकात अनेक खाद्यपदार्थ सहज मिळू लागले आहे. खाऊ गल्लीपासून एसी हॉलमध्ये मिळणाऱ्या या पदार्थांसाठी खवैय्यांनी तितकीच दाद दिल्यामुळे हॉटेलचा धंदाही सध्या तेजीत आहे.

या खाद्यसंस्कृतीत मामाचा मळा, साधना मिसळ, संस्कृती या सारख्या हॉटेलने कृषी पर्यटनांचा आनंद देण्यासाठी आपले वेगळेपण राखत मराठी खाद्य संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. या खाद्य संस्कृतीत काही महत्त्वाच्या ठिकाणी खाऊ गल्ली तर काही चौकात असलेल्या पाणीपुरी, भेळ व पावभाजीच्या गाड्यांनी सुध्दा आपली वेगळी ओळख तयार केली आहे. नाशिकमध्ये जगभरातील पदार्थ मिळत असले तरी मिसळची भुरळ मात्र कमी झाली नाही हे विशेष आहे.

गेल्या पाच महिन्यात शहरामध्ये सुमारे २०० हॉटेल्सची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे व्यवसाय करण्यासाठी शॉप अॅक्ट लायसन्स घेणाऱ्यांची ही आकडेवारी आहे. शॉप अॅक्ट लायसन्स न घेणाऱ्यांची संख्या वेगळी असल्याची शक्यता आहे.

हॉटेलचा परवाना घेण्यासाठी आमच्याकडे अर्ज येतात. योग्य त्या निकष आणि कागदपत्रांच्या आधारे आम्ही परवाने देतो. गेल्या काही वर्षात हॉटेलचे परवाने घेण्यात वाढ झाली आहे. आता या परवाण्यासाठी ऑनलाइन सुविधाही सुरू केली आहे. - रमेश पाटील, शॉप अॅक्ट इनस्पेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभंगलेल्या ओठांवर फुलणार हास्य

0
0

आर्थिक तरतुदीअभावी होऊ न शकणाऱ्या शून्य ते १८ वयोगटातील मुलांवरील विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. दुभंगलेले ओठ, तिरळेपणा यासारख्या रखडलेल्या ५०० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आरोग्य विभागाची नुकतीच बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय सुविधा आणि तत्मस बाबींची आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह महापालिका, जिल्हा परिषदेचे अनेक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. गतवर्षी जिल्ह्यात ७५ मेडिकल पथकांनी १२ लाख मुलांची तपासणी केली. प्रत्येक पथकामध्ये दोन डॉक्टर्स, एक परिचारिका आणि सहायक यांचा समावेश आहे. अंगणवाड्या, शाळांमध्ये जाऊन या पथकाने तपासणी केली. चार वर्षांमध्ये ३०० बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मात्र, या वर्षी किमान १०० शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मुलांच्या शस्त्रक्रिया करण्यास पालक नकार देतात. शस्त्रक्रियेबद्दलची त्यांच्या मनात असलेली भीती घालविण्यासाठी पालकांचे समुपदेशन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दुभंगलेले ओठ, तिरळेपणा यांसारख्या साडेतीन हजार शस्त्रक्रिया जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. मात्र, अजुनही निधीअभावी सुमारे ६०० शस्त्रक्रिया होऊ शकलेल्या नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अशा शस्त्रक्रियांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

स्त्री जन्मदरवाढीबाबत सूचना जिल्ह्यात सिन्नर, येवला, सुरगाणा आणि नाशिक तालुक्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी असल्याची माहिती बैठकीमध्ये पुढे आली. या तालुक्यांमध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचा संशय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार यांनी गोपनीयरित्या तालुक्यांमध्ये अशा प्रकारची तपासणी होत असेल तर पर्दाफाश करावा असे आदेश दिले आहेत. त्यासाठी गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदारांनाही कारवाईचे अधिकार मिळाल्याने कुठल्याही परिस्थितीत हे प्रकार थांबायला हवेत अशी अपेक्षा राधाकृष्णन यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्त चले जाव!

0
0

शहर पोलिसांच्या नाकर्तेपणाबद्दल राजकीय पक्षांमधूनही आता शिमगा सुरू झाला आहे. शहरात खाकीचा दरारा राहिला नसून दररोजच कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. सामान्य नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील शांतता धोक्यात आल्याबद्दल पक्ष प्रमुखांमधून नाराजी आणि संताप व्यक्त होऊ लागला आहे. गुन्हेगारांना धडकी भरविणारा धडाकेबाज पोलिस अधिकारी शहराला लाभायला हवा, अशी अपेक्षा सर्वच पक्षांचे प्रतिनिधी व्यक्त करू लागले आहेत.

शहरात दिवसाढवळ्या खूनासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. साडेचार महिन्यांत खूनाच्या १९ घटना घडल्या आहेत. भरदिवसा खुले आम धारदार शस्त्रांचा वापर होऊ लागला आहे. शहरात दहशत निर्माण करण्याचे काम गुन्हेगारी प्रवृत्तींकडून सुरू असून त्यामुळे नागरिकही भयभीत झाले आहेत. वाहने जाळपोळीच्या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे शहरात खरोखरच पोलिस आहेत का? असा प्रश्न सर्वस्तरातील नागरिकांना पडू लागला आहे. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचे लेणं हिसकावले जात असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाया होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होऊ लागली आहे. वाहनचोरीच्या शेकडो घटना घडत असून चोरीस गेलेली वाहने परत मिळतील, अशी आशा नागरिकांना उरलेली नाही. पोलिस गुन्हे दाखल करीत असले तरी तपास होत नसल्याने नागरिक त्रासले असून ते लोकप्रतिनिधींकडे याबाबत पाठपुरावा करू लागले आहेत.

हवा 'सिंघम' अधिकारी महापालिकेच्या निवडणूका अवघ्या आठ-नऊ महिन्यांवर आल्या आहेत. पक्षांकडून निवडणुकांसाठीची तयारी सुरू झाली असताना वाढती गुन्हेगारी त्यांच्यासाठी देखील डोकेदुखीचा विषय ठरू लागली आहे. राजकीय पक्षांकडून पोलिस आयुक्तांना निवेदने देऊनही गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात सर्वच पक्ष एकवटू लागले आहेत. गुन्हेगारीवर जरब बसविणारा अधिकारी शहराला हवाय, अशी मागणी सरकारमधील मंत्र्यांकडे आता केली जाऊ लागली आहे. पोलिसांची बघ्याची भूमिका व नाकर्तेपणामुळे सरकार बदनाम होत आहे. पोलिस व्यवस्थेने कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले काम चोखपणे पार पाडावे. चुकीचे कामे करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात मोहीम उघडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू, असा इशारा शहर भाजपचे पदाधिकारी व कादवा साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार यांनीही दिला आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिकमध्ये सक्षम पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. पोलिस दलात एवढी हतबलता यापूर्वी कधी पाहिली नव्हती. पोलिसांचे अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. गुन्हेगारी नियंत्रित आली नाही तर लोक रस्त्यावर उतरतील. - जयंत जाधव, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

मी केलेल्या मागणीनुसार मल्हारगेट पोलिस चौकी सुरू करण्यात आली. तेथे दोन पोलिस कर्मचारी नेमले आहेत. हनुमानवाडी येथेही लवकरच पोलिस चौकी सुरू होईल. शहरात पोलिसांचा धाक वाढवावा लागेल. तडीपार गुंड शहरात वावरत असून कोंबिंग ऑपरेशन सारख्या कारवाया मोठ्या प्रमाणात करून जरब निर्माण करावी लागले. - देवयानी फरांदे, आमदार, भाजप

मुख्यमंत्र्यांचा गृह विभागावर वचक राहिलेला नाही. शहरातील भाजपचे तीनही आमदार पोलिसांवर दबाव आणतात. त्यामुळे पोलिस आयुक्तांना अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेता येत नाही. नाशिकचे बिहार झाले आहे. याबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहोत. वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू. - शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

शहरात जंगलराज सुरू झाले आहे. पोलिस चौकीच्या समोर भरदिवसा खून होणे ही गंभीर व शरमेची बाब आहे. या प्रश्नी लक्ष देण्यास पालकमंत्री आणि भाजपच्या तीन आमदारांना वेळ नाही. गुन्हेगारी विरोधात शिवसेनेने महामोर्चा काढला. परंतु, पोलिस व भाजपचे डोळे उघडलेले नाहीत. गुन्हेगारीविरोधात आंदोलन छेडले जाईल. - अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना

काही दिवसांपासून नाशिकमध्ये वाहन जाळपोळ व खुनाच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस आणि राज्य सरकारचा गुन्हेगारीवर वचक राहिलेला नाहीे. गुन्हेगारी प्रवृत्तींचे धाडस वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आली नाही तर मनसे रस्त्यावर उतरेल. - अॅड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणाला मनपाचे अभय?

0
0

गुंठेवारीतील बांधकामांवर नाही कारवाई; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

श्रमिकनगर भागातील खाजगी विकासकाने विकलेल्या गुंठेवारीच्या जागेवर अनधिकृत बांधकामास महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा पाठिंबा तर नाही नां, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण, एकीकडे इमारतींच्या वाढीव पार्किंगच्या तक्रारी अशोकनगर भागात केल्याने पार्किंग शेड जमीनदोस्त करण्यात आले होते तर, दुसरीकडे महापालिकेची कुठलीच परवानगी न घेता गुंठेवारीच्या जागेवर बांधकाम झालेच कसे? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

नाशिक शहरातील काही भागांमध्ये खासगी विकसकांनी त्यांना वाटेल अशा प्रकारे भूखंडांचे वाटप केले आहे. गुंठेवारी पद्धतीने शहराच्या काही भागात भूखंडांवर घरांची पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत नांदूरनाका परिसरातील गुंठेवारीच्या ठिकाणी बांधलेले बंगले जमीनदोस्त करण्यात आले होते. अशाच प्रकारचे घरांचे बांधकाम श्रमिकनगर भागात देखील अनेकांनी कुठलीच परवानगी न घेता केले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरपट्टी घरमालकांना लागू केल्याचेही समोर आले आहे. नगरसेवक लता पाटील यांनी अनधिकृत जागेवर उभारलेले एका ठेकेदाराच्या शेडसह अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली होती.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित शेडचे बांधकाम पाडले परंतु अनधिकृत घरांकडे मात्र, काणाडोळा केला होता. त्याचा फायदा अनेकांनी घेतला. परिणाम पूर्वी एक किंवा दोन पर्यंत मर्यादीत असलेला घरांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या हद्दीत असेलल्या नांदूरनाका शिवारात बंगल्यांचे बांधकाम अतिक्रमण विभागाने काढले होते. परंतु श्रमिकनगर भागातील गुंठेवारीच्या ठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेचा पाठिंबा का असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मागणी नगरसेवका पाटील यांनी केली आहे.

नाशिक महापालिकेने नांदूरनाका येथील गुंठेवारीच्या जागेवर बांधलेले बंगले अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून काढले होते. परंतु श्रमिकनगर भागातील केवळ एकाच शेडचे बांधकाम महापालिकेने काढले. उर्वरीत अनधिकृत बांधकामे महापालिका कधी काढणार? महापालिकेची साथ अनधिकृत बांधकामांना आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.

- लता पाटील, नगरसेविका प्रभाग क्रमांक १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images