Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नगरपालिका निवडणुकांचा वाजणार बिगुल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

प्रशासनाने नाशिक विभागातील २९ नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद व नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेस अंत‌मि मान्यता देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने यावेळी अ, ब, क वर्गाच्या नगरपालिका व नगरपंचायतींचे प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी ही मुख्याधिकाऱ्यांवर तर प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता देणे, प्रसिद्ध करणे, प्राप्त हरकतींवर व सूचनांवर सुनावणी देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर टाकली आहे. सुनावणीअंती जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त अहवालानुसार अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्याचे अधिकार महसूल आयुक्तांकडे सोपविण्यात आले आहेत.

नाशिक विभागातून निवडणुका होत असलेल्या २९ नगरपालिकांच्या हद्दीतील एकूण लोकसंख्या १५ लाख ५८ हजार ८ इतकी असून त्यापैकी १ लाख ७७ हजार १५८ अनुसुचीत जाती व ८३ हजार ७५३ इतकी अनुसुचित जमातीची लोकसंख्या आहे. या सर्व नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात एकूण ३०२४ प्रगणक गटांची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत नाशिक विभागात भुसावळ ही सर्वात मोठी नगरपालिका असून या नगरपालिकेची लोकसख्या तब्बल १ लाख ८७ हजार ४२१ इतकी आहे. केवळ १२ हजार ३५० इतकी लोकसंख्या असलेली भगुर नगरपालिका विभागातील सर्वात लहान नगरपालिका आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांचे घंटानाद आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागासवर्गीय बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया न्यायपद्धतीने राबविली जात नसल्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य रोष्टर चळवळीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. विभागाकडून देण्यात आलेल्या विविध आश्वासनांवर विश्वास ठेवून स्थगित केलेले हे आंदोलन सोमवार (दि.२३) पासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते.

महाराष्ट्र राज्य रोष्टर चळवळ या संघटनेने मागासवर्गीय बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया न्यायमार्गाने राबविण्याची मागणी केली आहे. नाशिकमधील रिक्त जागांवर सामावून घ्यावे, अशी या संघटनेची मागणी आहे. याविषयी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्याशी चर्चा करूनही तोडगा निघत नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्हा परिषदेसमोर बसून १८ एप्रिलला घंटानाद आंदोलन करण्यास शिक्षकांनी सुरुवात केली होती. तसेच, २६ एप्रिल ते ५ मे यादरम्यान मागण्यांसाठी उपोषणही केले होते. नाशिक जिल्ह्यात पंचायत राज कमिटी येणार असल्याने या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन शिक्षकांना देण्यात आले होते. त्यानुसार १० मेपासून आंतरजिल्हा बदली कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भात पदस्थापन आदेश देण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, या बाबी केवळ आश्वासनापुरत्याच मर्यादित राहिल्याने स्थगित केलेले हे आंदोलन २३ मेपासून पुन्हा तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य रोष्टर चळवळचे अध्यक्ष संदीप फणसे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होत आहे. यावेळी कार्याध्यक्ष महेंद्र अहिरे, राज्य उपाध्यक्ष गोविंदा कोळी, जितेंद्र मानकर, राजेंद्र सरक, मधुकर धनगर, रत्नाकर गांगुर्डे विभागीय अध्यक्ष संतोष गांगुर्डे आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या

१०० टक्के बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांना रिक्तपदांनुसार तत्काळ पदस्थापन देण्यात यावे. रिक्तपदांवर प्राधान्याने आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना देण्यात यावी. नाशिक जिल्हा परिषदेतून जाणाऱ्या उपशिक्षकांना त्वरित एनओसी देण्यात यावी.

नाशिक जिल्हा परिषदेत मागासवर्गीयांच्या प्रवर्गातील सुमारे ३३५ जागा रिक्त आहेत. तरीदेखील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. कोणत्याही अडचणी नसताना आम्हाला नाशिकमध्ये का रुजू केले जात नाही, हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे.

- संदीप फणसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रोष्टर मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव पोलिसांना आली जाग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव-सटाणा रस्त्यावर सोमवारी झालेल्या भीषण अपघातानंतर अवैध वाहतुकीबाबत निद्रावस्थेत असलेली शहर वाहतूक पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून अपर पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांच्या कारवाईत ५५ रिक्षाचालकांवर आणि ३०० हून अधिक दुचाकीस्वारांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या अपघातानंतर पोलिस यंत्रणा जागी झाली खरी, मात्र कारवाईत सातत्य राखावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सोमवारी मालेगाव-सटाणा रस्त्यावर भरधाव वेगात असलेली इंडिका व अॅपे रिक्षा यांच्यात अपघात झाला होता. यात ६ प्रवाशांना प्राण गमवावे लागले तर ९ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर शहर व तालुक्यातून अॅपे रिक्षा व अन्य खासगी वाहनांतून होणारी अवैध प्रवाशी वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहर वाहतूक पोलिसांनी अखेर धडक कारवाई सुरू असून बुधवारी शहरातील विविध एंट्री पॉईंटवर नाकाबंदी करण्यात येवून ५५ हून अधिक अॅपेरिक्षा, कालीप‌िली आदी खासगी वाहने ताब्यात घेण्यात आली. परवानापेक्षा अधिक प्रवासी भरणे, परवाना नसणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आदींमुळे ही कारवाई करण्यात आली. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. दंड आकराल्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.

मालेगाव शहरात बुधवारी सहा ठिकाणी पोलिस निरीक्षक राम भलसिंग, इंद्रजीत विश्वकर्मा, बी. एस. भापकर, शिरसाठ यांच्या मार्गदर्शनखाली सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. कॅम्प, छावणी, तालुका पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे येथे ३०० हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देसाईंना कपालेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाहीच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांसाठी मंदिर प्रवेशावरून वादग्रस्त ठरलेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना शहरातील कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नसल्याचे संकेत पोलिसांनी हाय कोर्टाच्या दाखल्याकडे निर्देश करत दिले आहेत. परिणामी, गुरूवारी (दि.२६) गाभारा प्रवेशासाठी आंदोलनाच्या भूमिकेत असलेल्या देसाई व त्यांच्या समर्थकांना भाविकांसह प्रशासन आणि पोलिसांकडूनही कडवा विरोध होण्याची चिन्हे आहेत.

कपालेश्वर मंदिरप्रवेशाचा देसाई यांचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा गाभारा प्रवेशासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर भाविकांचे मत जाणून घेण्यासाठी खांदवे सभागृहात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेतही भाविकांच्यावतीने देसाई यांच्या भूमिकेस कडवा विरोध दर्शविला गेला.

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरुषांना मंदिरात जेथपर्यंत प्रवेश असेल तेथपर्यंतच महिलांनाही प्रवेश असवा, असे कोर्टाचे आदेश आहेत. यानुसार पुरुषांना गाभाऱ्याच्या दरवाजापर्यंतच प्रवेश असल्याने मलिंनाही तेथूनच दर्शन घेऊ दिले जाईल अन् कोर्टाच्या आदेशाचे पालन केले जाईल अशी पोलिसांची भूमिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका ट्विटने काढला ‘त्या’ दोघींचा माग!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

बारावीत कमी मार्क्स मिळतील या भीतीने पश्चिम बंगालमधील दोन मुली घरातून पळाल्या. रेल्वेने त्या प्रवास करीत असल्याचे ट्विट एका व्यक्तीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना बुधवारी केले. त्यानंतर प्रभू यांच्या ट्विटर सेलने दिलेल्या माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी त्या दोघींचा शोध घेतला. रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक जुबेर पठाण यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकात त्या दोघींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघींना पालकांच्या हवाली करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमधील नॉर्थ परगाणा येथील कचरापाडातील रमेश गोस्वामी रोडवरील तनिषा चंद्रकांत छात्रज आणि याच परिसरात राहणारी त‌िची मैत्रिण अनिदिता स्वपन भौमिक या सीबीएससी बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थिनी आहेत. बारावीत कमी मार्क्स मिळतील. या भीतीने या १८ वर्षांच्या विद्यार्थिनी घरातून २३ मे रोजी मुंबईला निघाल्या. कचरपाडा पोलिस ठाण्यात पालकांच्या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. रेल्वेच्या व्टिटरवरुन रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक ए. के. सिंग यांनी ही माहिती देशभरात पोहचवली होती. या मुली मुंबईला गीतांजली एक्सप्रेने निघाल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या झोनल कार्यालयाने नाशिकरोडला कळविली.

रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक जुबेर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहाय्यक राजश्री आहेर, व्ही. एन. आठवले आदींनी ही गाडी नाशिकरोडला येताच या मुलींना ताब्यात घेऊन आपल्या कार्यालयात आणले. त्यांनी आपले नाव व पत्ता सांगताच त्यांच्या पालकांशी संपर्क करण्यात आला.

अन् दाटले अश्रू

तन‌िषाचे वड‌ील चंद्रनाथ छात्रज यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधताच ते तातडीने विमानाने मुंबईला पोहचले व तेथून नाशिकरोडला आले. दोन्ही मुली सुखरुप पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. रेल्वे सुरक्षा दलाने कचरापाडा येथील पोलिसांशी संपर्क साधून खात्री केली. कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दोन्ही मुलींना तन‌िषाचे पालक चंद्रकांत यांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर हे सर्वजण बंगालला रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेय गुंतवणूकदार सापडले पेचात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मैत्रेय कंपनीचे संचालक आ​​णि पोलिस कोर्टाच्या निर्णयाआड एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. पैशांच्या प्रतीक्षेत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी मात्र 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील महिन्यात कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार असून, त्यात काय निर्णय होतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. मैत्रेय कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कंपनीची सर्व मालमत्ता सील केली. महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. कंपनीचे सर्व कार्यालये बंद असून, नाशिकमधील गुंतवणूकदारांच्या ठेवींच्या सुरक्षेसाठी सुमारे दोन कोटी रुपये इस्क्रो खात्यात जमा करण्यात आले आहे. दिवसेंदिवस तक्रारदारांच्या संख्येत वाढ होत असून, फसवणुकीचा आकडा आता सहा कोटींच्या पुढे सरकला आहे. या प्रकरणी पुढील महिन्यात २० तारखेला महत्त्वाची सुनावणी होणार असून त्यावर मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकरांसह इतरांच्या जामिनांचे भवितव्य नििश्चत होईल. तसेच उर्वरित ४ कोटी रुपये इस्क्रो खात्यात जमा होणार का? याचेही उत्तर मिळेल. इस्क्रो खात्यात जमा करण्यात आलेले पैसे गुंतवणूकदारांना कसे व कधी मिळणार याची निश्चित माहिती समोर येत नाही. अर्थात यावर कोर्टच निर्णय घेणार असून, सध्या तरी पोलिस आणि मैत्रेयचे संचालक एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र आहे. मैत्रेय कंपनीचे लाखो गुंतवणूकदार असून, या कंपनीची मालमत्ता १ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. नाशिकमधील गुंतवणूकदारांची संख्या मात्र काही हजारात आहे. सध्या आम्ही कोर्टाच्या माध्यमातून समोर आलेल्या तक्रारदारांना त्यांची रक्कम परत मिळावी, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. नाशिक पोलिसांकडे तक्रार नसलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याची जबाबदारी कंपनीचे आहे. त्यात पोलिस हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर, दुसरीकडे कार्यालये बंद असून मालमत्ता खरेदी-विक्री करण्यास मनाई करण्यात आल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना पैसे कसे परत करणार असा प्रश्न मैत्रेयच्या संचालकांकडून उपस्थित करण्यात येतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परमेश्वराला जाणणे म्हणजे ब्रह्मविद्या

$
0
0

म.टा.खास प्रतिनिधी, नाशिक ब्रह्म म्हणजे परमेश्वर आणि विद्या म्हणजे ज्ञान. परमेश्वराचे ज्ञान होणे म्हणजे ब्रह्मविद्या. या ब्रह्मविद्येचा सुकाळू व्हावा अशी ज्ञानदेवांनी प्रार्थना केली होती. परमेश्वरावर विश्वास असो किंवा नाही, परंतु निसर्गावर मात्र विश्वास असणे गरजेचे आहे, असे मत ब्रह्मविद्या साधक जयंत दिवेकर यांनी व्यक्त केले. ९५ व्या वसंत व्याख्यानमालेत 'गुरूकिल्ली तुमच्या आरोग्याची आणि यशाची' या विषयावरील सव्विसावे पुष्प जयंत दिवेकर यांनी गुंफले. हे पुष्प स्मिता चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. गोदाघाट येथील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे. दिवेकर पुढे म्हणाले की, सर्वव्यापक असल्याने परमेश्वराचा अनुभव येण्यासाठी आपल्याला लांब जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या आतल्या परमेश्वराचा अनुभव घेता आला पाहीजे. परमेश्वर ही व्यापक संकल्पना आहे. गीतेत १८ अध्यायांमध्ये परमेश्वराचे स्वरूपच समजावून सांगण्यात आलेले आहे. ब्रह्मविद्या या शब्दाचे उगमस्थान गीता हेच आहे. ब्रह्मविद्येमुळेच आपल्याला आपल्यातील प्राणाचा अनुभव येऊ शकतो व योगशास्त्रामुळे आत्मतत्त्व समजण्यासाठी मदत होते. परमेश्वराच्या प्राप्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठी आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे कारण आरोग्य चांगले असले तर त्यापलिकडे काय आहे हे पाहण्याची शक्ती आपल्याला आपोआपच प्राप्त होईल, असेही दिवेकर म्हणाले. जयंत दिवेकर यांचा परिचय श्रीकांत बेणी यांनी करून दिला. मधुकर झेंडे यांनी स्मिता चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी मोहिनी दिवेकर, वैद्य विक्रांत जाधव, निलिमा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुपारनंतर पुन्हा धावाधाव...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी कपालेश्वर परिसरात सकाळी घडलेल्या प्रकारानंतर दुपारी तीनला देसाई पुन्हा येणार असल्याची कळाले. सोशल मीडियावरून ही बातमी काही क्षणांत पसरली आणि थोड्याच वेळात धावाधाव होऊन पुजारी, गुरव आणि भक्त मंडळी यांची गर्दी कपालेश्वर मंदिराजवळ जमू लागली. त्यांना पुन्हा मंदिरात जाऊ द्यायचे नाही अशी खूणगाठ बांधूनच ते आले होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही रामकुंड परिसरात जमले. सकाळी आलेल्या पोलिसांच्या व्हॅन पुन्हा कपालेश्वर मंदिराकडे बोलावण्यात आल्या. पोलिसांचा बंदोबस्त वाढू लागल्याने देसाई पुन्हा येणार हे निश्चित झाले होते. पोलिस आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी देसाई यांच्या लोकेशनची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सिन्नर फाटा येथे पोलिसांनी रोखल्याचे कळाले. त्यामुळे पुजारी, गुरव आणि भक्त मंडळी यांनी आनंद व्यक्त केला. सायंकाळी उशिरापर्यंत त्या येणार, तर कधी त्या नाही येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पोलिसांच्या व्हॅन रामकुंड परिसरात थांबून होत्या. दरम्यान, सकाळच्या प्रकारामुळे गुरुवारी दिवसभर मंदिराच्या सभामंडपात भाविकांना धार्मिक विधी करता आले नाहीत. परगावच्या भाविकांनाही गैरसोय सहन करावी लागली. मात्र, सभामंडपात सकाळपासून ब्रह्मवृंदांच्या वतीने मंत्रजागर करण्यात येत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शैक्षणिक गुणवत्तेसाठी हवी व्हाऊचर सिस्टिम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक परदेशातील व्हाऊचर्सच्या यश-अपयशाच्या गुणदोषांची चर्चा करण्यापेक्षा शासनाने भारतीय शिक्षणपद्धतीचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी व्हाऊचर सिस्टिम सुरू करायला हवी. शिक्षणातील चढ-उतार वर्षानुवर्षे तसाच राहिल्याने इंडिया-भारत यातील अंतर हे भारताच्या जीवनशैलीवर परिणाम करीत आहे. विशेष म्हणजे, राज्यातील प्राथमिक शिक्षणाची अवस्था अत्यंत दुर्दैवी असून, सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि युवक बिरादरी स्नेह छावणीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 'भारतीय शिक्षणपद्धतीचे मूल्यमापन' या विषयावर ते बोलत होते. हेरंब कुलकर्णी म्हणाले की, राज्यातील आश्रमशाळांतील शिक्षणाचा दर्जा खालावला असून, बहुतेक शाळांतील शिक्षकांनाच शिकविता येत नाही. त्यामुळे आता अशा शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. आजही देशातील ३ कोटींहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित असून, त्यात बालकामगारांची संख्या ४३ लाख असून, सुमारे दीड कोटी मुले रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांची आहेत. शिक्षण हे सर्वांसाठी समान असून, त्यात गरीब आणि श्रीमंत अशी दरी राहता कामा नये. यासाठी शासनाने व्हाऊचर सिस्टिम सुरू करावी, असे ते म्हणाले. बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी प्रबंधक राजन लोंढे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वयंरोजगाराकडे वळून नोकरी देणारे बनण्याची आवश्यकता आहे, असे सांगून बँकिंग क्षेत्रातील सुविधांच्या लाभ घेण्याचे आवाहन केले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण उद्योजक अपूर्व मंकड यांनी उद्योजक बनण्यासाठी आजच्या तरुणांनी पुढे येण्याची गरज प्रतिपादित केली. तसेच, व्यवसाय करण्यासाठीचे विविध मंत्रही दिले. सिकॉमचे निवृत्त अधिकारी मधुसूदन सोहोनी यांनी बँकिंग क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले. या वेळी युवक बिरादरीचे संस्थापक क्रांती शाह व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मंत्र्यांनी लावावा वीज प्रकल्प मार्गी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर २८ मे रोजी भगूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दिवशी त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नूतनीकरण केलेल्या जन्मवास्तूचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्ताने एकलहरेतील प्रस्तावित ६६० मेगावॅट वीज प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे. या वीज प्रकल्पाला मे २०१६ अखेर लष्कराचा ना हरकत दाखला मिळणार होता. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नाशिक दौऱ्यात त्वरित दाखला मिळण्याची कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रकल्पाच्या चिमणीच्या उंचीला लष्कराने हरकत घेतल्याने प्रकल्प रखडला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी देवळाली कॅम्पमधील लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चिमणीपासून एक किलोमीटरचा परिसर नो फ्लाइंग झोन जाहीर करण्याची मागणी केली होती. दरम्यान, एकलहरेतील प्रस्तावित वीज प्रकल्प लवकर सुरू व्हावा यासाठी वरर्षभरापासून प्रयत्न करीत असून, संरक्षणमंत्र्याच्या भगूर दौऱ्यावेळी हा प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅटफॉर्मवरील पार्किंग अखेर हटविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील पार्किंगची समस्या गंभीर झाली असतानाच प्रवासी व रेल्वे कर्मचा-यांनी थेट रेल्वे फ्लॅटफॉर्मवर वाहने पार्क करण्यास सुरुवात केली होती. म.टा.मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच दिल्लीतून सूत्रे हलली आणि भुसावळ मुख्यालयाने आदेश देऊन येथील पार्किंग हटविले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने सर्व बाजूंनी बॅरिकेडस लावले असून, तीन जणांवर कारवाई केली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर खासगी वाहने नेण्यास किंवा उभी करण्यास बंदी आहे. मात्र, नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाच्या मागेच वाहने लावली जात होती. येथून थेट प्लॅटफॉर्मवर गाडी नेली जात होती. कुंभमेळ्यावेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या मागील मैदान काँक्रिटीकरण करून पोलिस बंदोबस्तासाठी उपयोगात आणले होते. आता तेथे वाहनांचा तळ झाला आहे. काही जण तेथून थेट प्लॅटफॉर्मवर वाहने लावत असल्याचे वृत्त म. टा.मध्ये प्रसिद्ध झाले होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाजवळ व मागील जागेत, नवीन पादचारी पुलाखाली वाहने पार्क केल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली होती. घातपातासाठी एखादी व्यक्ती स्फोटके भरलेले वाहन थेट रेल्वेजवळ नेण्याचा धोका होता. प्रश्न सोडवावा रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक जुबेर पठाण यांनी रेल्वेचा इंजिनीअरिंग विभाग, स्थानकप्रमुख, वाणिज्य निरीक्षक यांना तातडीने पत्र लिहून स्थानक परिसरातील पार्किंगचा प्रश्न त्वरित सोडविण्याची विनंती केली. पार्किंगसाठी प्रशस्त जागा द्या, अनाधिकृत पार्किंगचे सात-आठ एन्ट्री पाइंट आहेत, ते बंद करावेत, अशी मागणी त्यात केलेली आहे. पार्किंगला जागाच नाही पार्किंग रेल्वे प्लॅटफॉर्मवर होऊ लागल्याने रेल्वे सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि भुसावळ मुख्यालयाला फोटोंसह मटाचे वृत्त पाठवले. त्याची तातडीने दखल घेऊन पार्किंगला प्रतिबंध करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार हा तळ वाहनांना बंद करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक जुबेर पठाण, सहाय्यक निरीक्षक गांगुर्डे यांनी बंदोबस्त तैनात केला आहे. पार्किंग प्रकरणी तीन जणांवर रेल्वे कायदा कलम १५९ नुसार कारवाई करण्यात आली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकात देवी चौकात दुचाकी व पार्सल ऑफीसजवळ चारचाकीचे अधिकृत पार्किंग आहे. बस्ट स्टँड आणि रेल्वेस्थानक आवारात रिक्षाचालक व व्यावसायिकांचे अतिक्रमण असून, जागा मिळेल तेथे तसेच रेल्वेस्थानक आवारात दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. तरीही वाहन उभी करण्यास जागाच राहिली नसल्याने चालकांनी थेट प्लॅटफॉर्मवर पार्किंग सुरू केली होती. रेल्वे सुरक्षा दलाने अपुरे मनुष्यबळ असतानाही स्वतंत्र व्यक्ती पार्किंगच्या ठिकाणी दिली आहे. यापुढे प्लॅटफॉर्मवर वाहने येणार नाही याची काळजी घेऊ. - जुबेर पठाण, निरीक्षक, आरपीएफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृतधाम चौफुलीवर कसरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावनाका ते आडगावदरम्यानच्या अमृतधाम चौफुलीवर दररोज सायंकाळी पाच वाजेच्या नंतर होणारी वाहतूक कोंडी जीवघेणी ठरत आहे. या ठिकाणी वर्षभरापासून मागणी करूनही वाहतूक पोलिस थांबत नसल्याने वाहतूक कोंडीचा सर्व प्रवाशांना सामना करावा लागत आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी कायमस्वरूपी वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमावेत, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. महामार्गावरील सर्वात मोठी समजली जाणारी आणि अनेक रस्त्यांना जोडणारी महत्त्वपूर्ण अशी अमृतधाम चौफुली आहे. या ठिकाणी रोज सायंकाळी २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. प्रत्येकाला घाई असते आणि आपले वाहन पुढे काढण्याचा प्रयत्न करीत असताना होणाऱ्या वाहतूक कोंडीचा व परिणामाचा कोणताही वाहनचालक विचार करीत आणि आणि सौजन्य दाखवत नाही. याचा परिणाम म्हणून कोंडी होते आणि सर्वांना याचा प्रचंड त्रास होतो. गुजराथ, दिंडोरी, पेठ, पुणे, औरंगाबाद आणि मालेगाव व मुंबई आदी ठिकाणाहून वाहने सतत ये-जा करीत असतात आणि त्यात अवजड वाहने व लांबलचक वाहनांची खूपच गर्दी असते व त्यामुळे कोंडी होते. अमृतधामजवळ कोंडी होत असताना काही वाहतूक पोलिस रासबिहारी चौफुली आणि रासबिहारीरोडवर वसुलीचे जोरात काम करीत असतात. पण, त्यांना या कोंडीचे काही एक सोयरसुतक नसल्याचे चित्र अनेक वेळा दिसते. हा महत्त्वाचा महामार्ग आहे. अनेक प्रकारची अवजड वाहने येतून ये-जा करीत असतात. अनेक वेळा अपघात झाले आहेत. यावर उपाय म्हणून उड्डाणपूल वाढवावा किंवा भुयारी मार्ग काढावा. - डॉ. सुभाष भालेराव शाळकरी मुलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे रोड ओलाडताना खूप हाल होतात. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस कर्मचारी नेमण्याची गरज आहे. त्यामुळे कोंडी सुटण्यासह अनेकांचा त्रास कमी होईल. - प्रा.अशोक अहिरे नागरिकांना कायमच आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. वाहतूक पोलिसांची नेमणूक केल्याने वाहने सावकाश जातील आणि कोणी आगळीक करणार नाही व कोंडीदेखील होणार नाही. - संतोष पगारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून गाळ काढण्यात सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम 'जलयुक्त शिवार' अभियानाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात कळवण तालुक्यातील २१ गावांची निवड करण्यात आली. या गावातील विविध यंत्रणांनी सुचवलेल्या कामांचा आराखडा जिल्हास्तरावर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यासंदर्भात या गावात कामला सुरुवात झाली असून त्यात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये गोबापूर येथील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात नुकतीच आमदार जे. पी. गावित यांच्या हस्ते करण्यात आली.

कळवण तालुक्यातील विविध गावांमध्ये या कामात लोकसहभाग लाभला. यात प्रामुख्याने कुंडाणे येथे पाझर तलावातील लोकसहभागातून महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानामार्फत गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सध्या २५ ट्रॅक्टर व तीन जेसीबी, १ डंपर यांच्याद्वारे गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याचे काम सुरू आहे. तर दरेगाव वणी या गावात नालाखोलीकरणाचे काम सुरू असून यात शेतकरी धनराज राऊत, सोमनाथ गवळी, कैलास गवळी, पोलिस पाटील या कामी सक्रीय सहभाग नोंदवला आहे.

दरेगाव येथील नाला खोलीकरण कामास नाशिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. जलयुक्त शिवार योजनेतील, कामाचे तालुका समितीचे अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी गंगाधारण डी., तहसीलदार अनिल पुरे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या गाळ काढण्याच्या कामाचे नियोजन विभागीय मंडळ कृषी अधिकारी पी. जे. पाटील, गिरासे, कृषी पर्यवेक्षक आर.एम. निकम, भरते, बागुल, तसेच कृषी सहाय्यक आर. के. सावंत, महाले, कला पवार, पालवी, कुपर, आक्लाडे, के. पी. पवार, योगेश वाघ, आहेर आदि करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

केंद्रात आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार चांगले काम करीत असून आगामी नगरपालिका व पदवीधर मतदार संघ निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मनमाड येथे केले.

आगामी पालिका निवडणूक व नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक नियोजन या विषयावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यकर्त्यांची बैठक मनमाड येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल आहेर, ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, संघटन महामंत्री बापूसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाऊराव निकम, नारायण पवार, युवा मोर्चाचे समीर चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. नितीन पांडे यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष जय फुलवाणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी केले. यावेळी बापूसाहेबपाटील, उमाकांत रॉय, भीमराव बिडगर, केशवराव पाटोळे, जय फुलवाणी, वाल्मिकी समाजाचे प्रमुख राजाभाऊ पवार यांनी मार्गदर्शन केले. अंकुश जोशी व महेंद्र गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

दरम्यान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भीमसेनेचे राजाभाऊ निरभवणे, एकलव्य संघटनेचे रमेश मोरे, संतोष बागुल, अलीम शेख, मनोज खरात, फारुक शेख, सोमनाथ गायकवाड, हबीब मिस्तरी, दीपक गायकवाड, जगन गवळी आदींनी भाजपात प्रवेश केला. या वेळी फिरोज शहा यांची युवा मोर्चा चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या वेळी रंगनाथ कीर्तने, कांतीलाल लुनावत, गुरुजीतसिंग कांत, नीलकंठ त्रिभुवन, सुभाष संकलेचा, पंकज खताळ, बबन आव्हाड, संदीप नरवडे, ललित भंडारी, सचिन संघवी, अंकुर लुनावत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंवर्धनासाठी सरसावले पोलिसही

$
0
0

मनमाड पोलिस ठाण्यात स्वखर्चातून उपक्रम
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
मनमाड शहर परिसरातील पाणीटंचाई तसेच शहरविकासाला बसणारी खीळ याबाबत थेंब थेंब पाण्याचे मोल नागरिकांना कळावे, यासाठी शहर पोलिसांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी पोलिस ठाण्यात रेन हार्वेस्टिंग उपक्रम राबविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. याद्वारे 'पाणी वाचवा' हा संदेश आधी आपण अमलात आणायचा आणि मग लोकांना जागरूक करायचे ही पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांची कल्पना सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात आणली आहे.
पोलिस म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती कायदा आणि सुव्यवस्था मात्र सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद असलेले खाकी वर्दीतील शिलेदार सामाजिक बांधिलकी जपत आहेत. पाणी बचतीसाठी आपल्या खिशातून व श्रमदान करून रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवित आहेत. पोलिसांनी कोणताही प्रायोजक न शोधता किंवा दुसऱ्यांवर विसंबून न राहता पोलिस कर्मचाऱ्यांच्या खर्चातून व श्रमदानातून हा प्रकल्प साकारला जात असल्याने तो दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर इतरांनाही 'पाणी वाचवा पाणी जिरवा' हा मूलमंत्र देणारा ठरला आहे. पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकाराने आता नेहमी लोकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे पोलिस आता पाणाटंचाईसाठीही आपली सामाजिक जबाबदारी या उपक्रमातून पार पाडताना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तृप्ती देसाई यांच्यावर सिन्नर येथे उपचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक येथील कपालेश्वर महादेव मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करण्यासाठी गेलेल्या पुणे येथील भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मंदिराच्या गाभा-यात प्रवेश नाकारल्यानंतर झालेल्या धरपकडीत ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या डोक्याला मार लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुण्याकडे घेऊन जात असताना उपचारांसाठी सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथील प्राथमिक उपचारांनंतर त्या कार्यकर्त्यांसह पुन्हा नाशिककडे रवाना झाल्या. सिन्नर येथील रुग्णालयात डॉ. नामदेव लोणारे यांनी त्यांच्यावर उपचार केले. प्राथमिक उपचारांनंतर पोलिसांनी नाशिक येथे न जाण्याची केलेली विनंती धुडकावत त्यांनी पुन्हा नाशिककडे प्रयाण केले. या वेळी पत्रकारांशी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, कपालेश्वर मंदिराच्या ट्रस्टने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून दर्शन घेण्याची संमती दिलेली असताना व कायद्याने मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली असताना आम्हाला विनाकारण पोलिसांच्या मदतीने रोखले गेले. या वेळी पोलिसांनी अतिरेकी वागणूक देत धक्के देऊन बाहेर काढल्याबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला. जेथे दर्शनासाठी पुरुष जातात तेथे महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे, असे सांगून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील काळाराम मंदिरात केलेल्या आंदोलनाचा दाखला देत त्या म्हणाल्या की, कपालेश्वर मंदिरात महिलांना आजही प्रवेश नाकारला जाणे खेदजनक आहे. आम्हाला रोखणा-या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली. या मंदिरात सर्वांना प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी आपले आंदोलन सुरूच राहणार असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने आदेश द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉश गुंतविणार यंदा ३०० कोटी

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : नाशिकच्या उद्योग जगतात काहीशी मरगळ आली असताना जर्मन कंपनी असलेल्या बॉशने नाशिककरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. नाशिकसह कर्नाटकातील बिडदी आणि बंगळूरु येथील प्रकल्पात एकूण ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक यंदाच्या आर्थिक वर्षात करण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यातील जवळपास ३०० कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये होणार असल्याने शहराच्या उद्योगांना बूस्ट मिळेल.

बॉशचे जर्मनीबाहेरील सर्वात मोठे विकास केंद्र भारतात आहे. बॉश ग्रुपच्या भारतात सहा कंपन्या आहेत. त्यातील बॉश लिमिटेड ही एक कंपनी आहे. ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान, औद्योगिक तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू आणि बांधकाम तंत्रज्ञान व्यवसायात ही कंपनी कार्यरत आहे. भारतात बॉशने १९५३ मध्ये प्लाण्ट सुरू केला. भारतात कंपनीचे १३ निर्मिती कारखाने आणि ४ विकास केंद्र आहेत. बॉश लिमिटेडची वाढती उलाढाल पाहता भारतातील विस्तारासाठी कंपनी विशेष प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनी सातत्याने गुंतवणूक वाढवित आहे. कंपनीने यापूर्वीच नाशिकमधील प्रकल्पात किमान ३०० कोटी रुपये गुंतविले आहेत. आशिया खंडातील अर्थव्यवस्थांचा मोठा विकास होत असून, लहान आणि कमी किंमतीच्या गाड्यांची मागणी लक्षणीयरित्या वाढत आहे. हा ट्रेण्ड लक्षात घेऊनच कंपनी भारतातील विस्ताराला प्राधान्य देत आहे. नाशिक, जयपूर आणि अहमदाबाद येथील उत्पादन क्षमता वाढविण्यात येत आहे.

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बॉशला ३७६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात नाशिकसह कर्नाटकातील बिडदी आणि बंगळूरू येथील आर अँड डी सेंटरमध्ये एकूण ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे बॉशने मुंबई स्टॉक एक्सचेंजला कळविले आहे. यातील जवळपास ३०० कोटी रुपये नाशिकला येण्याची दाट शक्यता आहे. नाशिकच्या प्रकल्पातून डिझेल इंजेक्टरचे उत्पादन केले जाते. भारतांतर्गत व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढत असल्याचे बॉशचे एमडी स्टीफन बर्न्स यांनी कळविले आहे.
सिन्नर प्रकल्प पुढील वर्षी

सिन्नर येथील रतन इंडियाच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प सज्ज आहे. कोळशाच्या पुरवठ्याअभावी सध्या हा प्रकल्प बंद आहे. मात्र, येत्या आर्थिक वर्षात (२०१७ मध्ये) आम्ही हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत सुरू करू, असे रतन इंडिया पॉवरचे एमडी राजीव रतन यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख विद्यार्थ्यांची होते धोकादायक वाहतूक

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : शहरात तब्बल २ लाख विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच समोर आली आहे. आर्थिक व इतर काही कारणांमुळे पालक हतबल असून, बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाचेही काही चालत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची कोर्टाने वारंवार दखल घेतली असताना, यंदा अवैध विद्यार्थी वाहतुकीवर बडगा उगारला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एकूण ७७१ वाहनांची नाशिक आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आली आहे. यात स्कूलबस आणि व्हॅनचा समावेश आहे. नाशिक आरटीओ कार्यालयात येणाऱ्या काही तालुक्यांना वगळले तर शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या ७०० पर्यंत पोहचते. हा आकडा अधिकृत असून, अनधिकृत वाहनांची संख्या चार हजारांच्या पुढे जाते. शहरात ५१८ शाळा असून, यात २ लाख ९४ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी शिक्षण घेतले. चालू वर्षी हा आकडा तीन लाखांच्या पुढे सरकेल. एकूण शाळांमध्ये महापालिकेच्या १२८ शाळांचा समावेश असून, यात जवळपास ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तीन लाखांमधून हे ३० हजार विद्यार्थी वगळले तर जवळपास दोन लाख ७० हजार विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी पालक, एसटी महामंडळ, स्कूलबस, व्हॅन किंवा रिक्षांवर अवलंबून राहावे लागते. शहरात ५०० स्कूल बसेस आणि २०० व्हॅनचे रजिस्ट्रेशन असल्याचे मानले तर यातून जास्तीत जास्त २७ हजार विद्यार्थ्यांची वाहतूक शक्य आहे. ४० ते ५० हजार विद्यार्थ्यांना शाळा जवळ असल्याने किंवा त्यांचे पालकच त्यांना शाळेत सोडत असल्याचा फायदा मिळतो. म्हणजेच सुरक्षेच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करणाऱ्या हजारो वाहनांमध्ये दररोज दोन लाख विद्यार्थ्यांची धोकादायक पध्दतीने वाहतूक होते आहे. याविषयी सर्वच स्तरात चिंता व्यक्त केली जाते आहे.

याबाबत नाशिक विभागाचे प्रादेशीक परिवहन अधिकारी जीवन बनसोड म्हणाले,'विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महिन्याभरापासून मोहीम हाती घेतली आहे. स्कूलबस, व्हॅन किंवा रिक्षा असे कोणतेही वाहन असले तरी त्यांनी विद्यार्थी वाहतुकीचा परवाना घेणे आवश्यक आहे. हा परवाना घेण्यासाठी स्पीड गर्व्हनन्स बसवणे, ठराविक रंग देणे व सुरक्षेच्या दृष्टीने इतर उपाययोजना राबवाव्या लागतात. वाहनचालकांनी हे पाळले तर सर्वांच्या दृष्टीने ते सोयीस्कर होऊ शकते.' अनेकदा विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले वाहन जाताना दिसते. मात्र, अशा वाहनाचा पाठलाग करणे धोकादायक ठरू शकते, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.

स्कूल बससह शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. ३१ मेपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली असून, नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. काही संघटनांच्या प्रतिनिधींनी भेटून मुदतवाढ मागितली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

- जीवन बनसोड, प्रादेश‌ीक परिवहन अधिकारी, नाशिक

बेकादेशीर वाहतूक स्वस्त

शाळांच्या स्कूलबस विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरच सोडतात. तिथून पालकांना त्यांना घेऊन परतावे लागते. याउलट परवाने नसलेले रिक्षा किंवा व्हॅन चालक विद्यार्थ्याला घरासमोर सोडतात. तसेच पैशांच्यादृष्टीने पालकांना हे परवडणारे ठरते. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्याला दृष्टीआड करून बेकायदा वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत असल्याचा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिक्रिया आरटीओसह पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

नाशिक प्रादेश‌‌ीक कार्यालयाकडे नोंदणीकृत वाहने - ७७१

शहरातील वाहनांची संख्या - सुमारे ७००

सर्व प्रकाराच्या शाळा - ५१८

विद्यार्थ्यांची संख्या - दोन लाख ९४ हजार ४७४

बेकादेशीर वाहतूक होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या - सुमारे दोन लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर विरोधकांची खैर नसती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जर दाऊदचा आणि माझा संबंध असता, तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांची काय गत झाली असती. भारतातल्या सर्व लोकांबाबत आरोप करून थकले म्हणून दाऊदचे नाव शोधून काढले. माझा निवडणुकीत कुणीही पराभव करू शकले नाही, म्हणून शकुनी नीतीचा वापर केला जात आहे, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.

मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्यावतीने सुभाष चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खडसे बोलत होते. सरकारच्या कार्याची माहिती देणाऱ्या सभेत मोदी समर्थक कमी आणि एकनाथ खडसे समर्थक जास्त अशी स्थिती होती. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या खडसेंच्या बचावाची ही सभा होती की काय, असे चित्र दिसत होते.

खडसे पुढे म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी विरोधक खालच्या पातळीवर उतरले आहेत. जेव्हा एखाद्या पैलवानाला कुस्तीत हरविले जात नाही तेव्हा कुटनीतीचा वापर केला जातो. विरोधकांनी पुरावे दिले, तर मी राजीनामा देईन, नाहीतर त्यांंनी तोंड काळे करून माझ्याजवळ बसावे.

सभेचे प्रमुख वक्ते एकनाथ खडसे, गिरीष महाजन असे सांगण्यात आले असले तरी महाजन सभेस उपस्थित नव्हते. भाजपचे जिल्हा, तालुका पदाधिकारी, दूधसंघ संचालक, भाजपचे आमदार सुरेश भोळे, हरीभाऊ जावळे यांची उपस्थिती होती. सभेची वेळ सायंकाळी सहाची असली तरी रात्री सव्वा आठ वाजता सभा सुरू झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या दणक्यात खडसेंचे स्वागत झाले. आमदार भोळे म्हणाले, खडसेंवर होत असलेले आरोप विरोधकांना त्यांनी केलेल्या विकासावर बोलता येत नसल्याने होत आहेत. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी सर्व्हे ऑनलाइन वेटींगवरच

$
0
0

नाशिक तालुक्यातील सातबारा जूनअखेर ऑनलाइन होणार असला तरी शहराच्या सिटी सर्व्हेचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन होण्यास अजून प्रतीक्षाच करावी लागणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील सातबारा ऑनलाइन झाल्यानंतर सिटी सर्व्हेचा डाटा अपलोड केला जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन सिटी सर्व्हेला नक्की किती काळ लागेल, याबाबत संदिग्धता आहे.

सिटी सर्व्हेचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन नसले तरी त्याचे संगणीकृत काम यापूर्वीच झाले आहे. त्यामुळे या कार्यालयात गेल्यानंतर एखाद्या मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड मिळवणे सोपे झाले आहे. पण ते ऑनलाइन झाल्यास कोणत्याही प्रॉपर्टीची माहिती घरबसल्या मिळणार आहे. ऑनलाइनसाठी नाशिकच्या सिटी सर्व्हे कार्यालयाने प्रॉपर्टी कार्डचा डाटा सप्टेंबर पर्यंत युनिकोडमध्ये रुपांतर केला आहे. त्यात नऊ महिन्यात झालेले फेरफार टाकणे बाकी आहे. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत संगणकीकृत सातबाराच्या डेटाचे अद्ययावतीकरण करणे, महसूल विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय व नगर भूमापन अधिकारी कार्यालय हे स्टेट डेटा सेंटरबरोबर सुरक्षित संगणकीय कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्याचे २०१४ पर्यंत नियोजन होते पण दोन वर्षानंतरही हे काम रखडले आहे.

या भागाचा अंतर्भाव नाशिक शहराचा ६० ते ७० टक्के भाग हा सिटी सर्व्हे अंतर्गत आहे. तर इतर भागाचे भूमापानाचे काम चालू आहे. सध्या शहरातील नाशिकरोड, पंचक, दसक, नांदूर, आगारटाकळी, सातपूर, कामटवाडे, पाथर्डी, दाढेगाव, चिंचाळे, पिंपळगाव बहुला, आनंदवल्ली, गंगापूर असा भाग आहे.

सिटी सर्व्हेत हा भाग नाही शहरातील पाथर्डी ते काठेगल्ली, आडगाव शिवपर्यंत तसेच सिडको, म्हसरुळ, मखमलाबाद, अंबडसह बराच भाग अजूनही सिटी सर्व्हेकडे नाही. त्यामुळे बराच गोंधळही उडतो. या सर्व भागाचे भूमापन सुरू असून त्यानंतर हा सर्व भाग सिटी सर्व्हेमध्ये येणार आहे. सध्या शहरातली काही प्रॉपर्टी सिटी सर्व्हेकडे तर काही तहसील कार्यालयाकडे असल्यामुळे बराच गोंधळ उडतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images