सत्ताधारी गटाकडून दबावतंत्र वापरून निवडणूक होत असल्याचा आरोप विरोधी गटाने केला होता. तसेच उमेदवारी अर्ज सादर करतांना गैरहजर असल्याने सत्ताधारी गटातील पांचाळ व कोठावदे यांचे अर्ज बाद करण्याची मागणी विरोधी गटाने केली होती. विरोधकांचा रोष पाहून पोलिसांना बोलावण्यात आले होते. सत्ताधाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. तर पांचाळ व कोठावदे यांचे उमेदवारी अर्ज खोट्या सह्या करून सादर केल्याची तक्रारी विरोधी गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी पोलिसांकडे केली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. चंद्रशेखर यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ब्राह्मणकर, जॉली व अॅड. खर्डे यांनी निवडणूक अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. नवीन निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांची बाजू समजावून घेत शुक्रवारी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. पांचाळ यांचा अर्ज बाद झाल्याने विरोधी गटातील कैलास आहेर यांचा अर्ज शिल्लक राहिला आहे. यामुळे आता केवळ २४ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत.
नवा निवडणूक कार्यक्रम पात्र उमेदवारांचा यादी जाहीर झाल्याने निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. अर्ज माघारीसाठी २९ मे पर्यंत मुदत असून ३० मे रोजी माघारीनंतर पुन्हा उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. ५ जून रोजी मतदान होणार असून ६ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी ब्राह्मणकर यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट