Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बंदीजनांनी अनुभवली बहिणीची माया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावातील नातेसंबंधांची वीण अधिक घट्ट करणारा सण. मात्र, असे काही समाजघटक असतात की, त्यांना या नात्याचे प्रेम मिळत नाही. बंदीजन हा त्यापैकीच एक घटक. आपल्या हातून काहीतरी चुकीचे घडल्यावर कारागृहात असलेल्या बंदीजनांना बहिणीची कमतरता जाणवू नये यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कम्युनिटी हेल्थ फाउंडेशन व डब्ल्यूओडब्ल्यू संघटनेतर्फे मध्यवर्ती कारागृहात भावुक वातावरणात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्या सहकार्याने हा विशेष सोहळा झाला.

महिलांनी बंदीजनांना राख्या बांधून या नात्याला उजाळा दिला. काही कैद्यांना यावेळी गहिवरून आले. या मानलेल्या भावांनी आपल्या वर्तनात सुधारणा करावी, ही ओवाळणी अनेक बहिणींनी मागितली गेली. कम्युनिटी हेल्थ फाउंडेशनच्या अश्विनी न्याहारकर म्हणाल्या की, आज विविध संधी उपलब्ध असताना वाईट घटना टाळता येऊ शकतात. गतकाळातील वाईट गोष्टी व कटू आठवणी मागे टाकून बंदीजनांनी नव्या दमाने व नव्या जोमाने आयुष्याला प्रारंभ करावा. या आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल महिलांचे विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी मेघा मराठे, कामिनी तनपुरे, संगीता गायकवाड, जया आढाव, अश्विनी निकम, स्नेहा वर्मा, सीमा पाटील, प्रतिभा पाटील, नूतन पाटील, अरुणा पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी

न्याहारकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

---

विविध संस्थांनीही घेतला पुढाकार

नाशिकरोड ः मध्यवर्ती कारागृहात शहरातील विविध संस्थांतर्फेदेखील रक्षाबंधन साजरे करण्यात आले. रेणुका महिला औद्यागिक सहकारी संस्थेतर्फे बंदीजनांचे औक्षण करून राखी बांधण्यात आली. यावेळी महिला आघाडी अध्यक्षा मंदा फड, जिजाबाई जाधव, सुनीता जाधव, कल्पना पोटिंदे, कांचन चव्हाण, शिवानी जाधव, दीपाली कुलथे, सुदाम निकम आदी उपस्थित होते. नाशिक सोशल सर्व्हिस सोसायटीतर्फे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. संस्थेचे फादर आल्वीन व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यांनी दोनशे बंदीजनांना राख्या बांधल्या. झेप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुनीता निमसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दीडशे बंदीजनांना राख्या बांधल्या. नाशिकरोडच्या सॅव्ही कालेज आणि युवा मंचतर्फे रक्षाबंधन झाले. संचालिका श्रुती भुतडा, युवा मंचच्या अध्यक्षा स्मिता बोरा आदी उपस्थित होते. त्यांनीही बंदीजनांना राख्या बांधल्या. गोविंदा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र तिवारी यांच्या उपस्थितीत दीडशे बंदीजनांना राख्या बांधण्यात आल्या. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, उपअधीक्षक वैभव आगे, प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरुंगाधिकारी कैलास भवर, एस. एस. कुंवर, जी. ए. मानकर, श्रीमती एन. वाय. गुजराथी, बी. एन. मुलाणी, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुन्हेगारांचे नातेवाईकही पोलिसांच्या रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता विविध गुन्हेगारांचे नातेवाईकही पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठीच पोलिसांनी ही नामी युक्ती शोधली असून, यामुळे गुन्हेगारांना वेसण घालतानाच इतरांमध्येही त्याची जरब बसविण्याचा पोलिसांचा हेतू आहे.
शहारातील राजकीय व्यक्तींचे विविध गुन्ह्यांशी असलेले संबंध लक्षात घेत पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर आता गुन्हेगारांच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी रोख वळविला आहे. गुन्हेगारांची पाठराखण करण्यासाठी थेट पोलिस ठाण्यापर्यंत धाव घेणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांवरच कारवाई करण्याच्या हेतूने पोलिसांनी पावले टाकली आहेत. मुंबई पोलिस अॅक्टचे कलम १२० प्रमाणे पोलिस थेट संबधित गोतावळ्यास अटक करून न्यायालयात हजर करीत असल्याने गुन्हेगारांच्या साथीदारांचे धाबे दणाणले आहेत. नुकत्याच एका कारवाईत पोलिसांनी दहा जणांना अटक केली असता न्यायालयाने त्यांना समज देवून कोर्टात हजेरी लावण्याचा हुकूम केला आहे. दरम्यान या गुन्ह्यात सुमारे ५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद असल्याने त्याचा चांगलाच प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत.
सरकारवाडा पोलिसांनी मतेश जडगुले, पवन आहिरे व सचिन गांगुर्डे या संशय‌ितांना गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. त्यामुळे बुधवारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशय‌ितांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीच्या पाश्वभूमीवर वरिष्ठांच्या आदेशान्वये विनाकारण पोलिस ठाणे आवारात संशयास्पदरित्या वावर ठेवल्याने दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत संशयीतांना अटक करून थेट न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने समज देवून कोर्टात हजेरी लावण्याचा हुकूम केला. यामुळे गुन्हेगारांबरोबरच त्यांच्या समर्थकांचे तसेच त्यांच्या आसपास राहणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्याचा पाठपुरावा करणारे ‘डेटिंग विथ रेन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सत्याला कितीही नाकारले तरी ते पाठपुरावा सोडत नाही. सत्याला सामोरे जाण्याची प्रबळ इच्छा असणारा एक पत्रकार, वेगवेगळ्या परिस्थितीत अडकल्याने सत्याला स्पर्श करू न शकल्याने आतल्या आत घुसमटणारा परंतु या सर्वांतून बाहेर पडून स्वतंत्रपणे काहीतरी करण्याची इच्छा मनी बाळगणारा. असे विविध पैलू घेऊन सादर झाले ते शिवसंघ प्रतिष्ठान निर्मित 'डेटिंग विथ रेन' हे नाटक.
सखाराम पांडुरंग गांगुर्डे हा हाडाचा पत्रकार नाही. तो परिस्थितीमुळे पत्रकार बनलेला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कोणता पेशा स्विकारायचा यातून त्याने पत्रकारितेची निवड केलेली आहे. त्या दरम्यान त्याला भेटलेल्या काही मुलींची कथा म्हणजे डेटिंग विथ रेन. अनेक टक्के-टोणपे खाल्लेला सखाराम गावाला जाण्यासाठी बसची वाट पहात उभा आहे. तेथे एक तरुणी येते. तीदेखील तेथे तिच्या बॉयफ्रेण्डची वाट पहात आहे. अभिलाष कुलकर्णी येईल व तिला त्र्यंबकेश्वरच्या फार्म हाऊसवर घेऊन जाईल अशा गोड समजात ती तेथे उभी आहे. या स्टॉपवरच तिची भेट होते ती सखारामशी. तिच्याकडे बराचसा वेळ असल्याने हळूहळू ती त्याला समजून घ्यायला लागते. त्यातून सखारामला भेटलेल्या चार मुलींची कथा उलगडत जाते.
नाटकाची निर्मिती शिवसंघ प्रतिष्ठानची होती. निर्माते प्रमोद गायकवाड, लेखन दत्ता पाटील तर दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. संगीत लक्ष्मण कोकणे, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा नुपूर सावजी, रंगभूषा माणिक कानडे, नेपथ्य राहुल गायकवाड तर निर्मिती सूत्रधार प्राजक्त देशमुख व सदानंद
जोशी होते. या नाटकात प्रणव बोरसे, प्रफुल्ल दीक्षित, सई आपटे, प्रतिक शर्मा, पल्लवी पटवर्धन, नुपूर सावजी, पीयूष नाशिककर, दत्ता अलगट, प्रज्ञा तोरस्कर, धनंजय गोसावी व राहुल गायकवाड यांनी भूमिका केलेल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दी जीनिअसतर्फे उद्या ‘नाट्यदर्शन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दी जीनिअस व स्मिमाताई हिरे कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स अॅण्ड फॅशन डिझाईन यांच्यातर्फे 'अंतर्वक्र भिंगातून पाहताना : नाट्यदर्शन' या लघुनाट्य महोत्सवाचे शनिवार, २० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. या नाट्य महोत्सवाची सुरुवात दिवाकरांच्या निवडक नाट्यछटांनी होणार आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात, सायंकाळी ६ वाजता हा महोत्सव होणार आहे.

नाट्य छटांच्या प्रांतातील निर्विवाद असे चक्रवर्ती सम्राट दिवाकर हे नाट्यछटेद्वारे मार्मिक विनोद, जगण्यातील विसंगती व तत्कालीन सामाजिक अन्यायाची जाणीव करून देतात. काव्यमय व चिंतनात्मक लिखाणातून लिहिलेल्या या नाट्यछटा आजही समाज जीवनाचं प्रतिबिंब आपल्यासमोर लख्खपणे दाखवून आपलेच दर्शन घडवितात. या नाट्यछटा सुयश लोथे, राजवर्धन दुसाने, चैतन्य देवरे, भूषण आहिरे, श्रद्धा उबाळे, ओवी भालेराव, पल्लवी ओढेकर, रिया हिंगणे, एकता आढाव आणि मनोज गुळवे हे कलाकार सादर करणार आहेत. या नाट्यछटांचे दिग्दर्शन पूर्वा सावजी व सुहास जाधव यांनी केले आहे.

त्यानंतर 'बी. आर. ई गणेश' तसेच 'डिजिटल इंडिया : हेंडल विथ केअर' हे प्रहसन सदर होणार आहेत. अभिषेक रहाळकर, ओवी भालेराव, रिया हिंगणे, एकता आढाव यांनी यात अभिनय केलेला असून त्याचे दिग्दर्शन प्रतिक शर्मा आणि स्वराली हरदास यांनी केले आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरीही माणसांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होत नाही, असे या प्रहसनातून नर्म विनोदी शैलीतून प्रामुख्याने मांडण्यात आले आहे.

यांचे लाभले सहकार्य

देवेन कापडणीस यांनी या लघुनाटकांचे लेखन केलेले असून चेतन वडनेरे, विश्वदीप यादव, अभिषेक रहाळकर, प्रतिक नाईक, प्रशांत सोनवणे, रिया हिंगणे, एकता आढाव यांनी या 'शॉर्ट प्ले'चे दिग्दर्शन केले आहे. आपण अजुनही आपली सरंजामी वृत्ती कशी जोपासली आहे यावर केलेले भाष्य, चौका-चौकातून तयार होणारे राजकारणी, भाई व त्यांनी पसरविलेली दहशत, जुनी माणसे जातात आणि नव्या मुखावट्यांची माणसे येतात अशा आशयांच्या शॉर्ट प्ले बरोबरच सार्वजनिक जीवनात दाखविली जाणारी शिस्त व शुद्धता आतून दांभिकतेने घेरलेली असते. असे कथानक त्यातून येते.

या कार्यक्रमात प्रकाशयोजना रवी रहाणे, आदित्य रहाणे यांची असून संगीत तेजस बिल्दीकर, नेपथ्य गुलाब पवार, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा पल्लवी ओढेकर, दीपक गरुड, प्रीतम खैरनार, चंद्रकांत जाडकर, प्रसाद गर्भे यांची सर्जनशील मदत आहे. लघुनाट्य महोत्सवास प्रवीण काळोखे व रश्मी काळोखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

प्रवेशिका कार्यक्रम स्थळी
कार्यक्रमासाठी प्राचार्या संपदा हिरे, चित्रपट दिग्दर्शक तानाजी घाडगे, मकरंद माने यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यासाठी लक्ष्मण सावजी, रव‌ींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे, प्राचार्य रामदास गायधनी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रवेशिका कार्यक्रमस्थळी एक तास आधी उपलब्ध असतील. जास्तीत जास्त नाट्यप्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीहंडीसाठी गुजरातची घागर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

श्रावण पौर्णिमा आटोपताच सगळ्यांना वेध लागतात ते गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाचे. बालगोपाळांसह गोविंदा पथकांच्या सध्या रंगीत तालमी सुरू झाल्या आहेत. मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशकातही मेगा दहीहंडीच्या तयारीला वेग आला आहे. या उत्सवासाठी गुजरातमधील विविधरंगी घागर बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

शहरात पंचवटीमधील मालेगाव स्टँड परिसरात दहीहंडीसाठी लागणारी विविध रंगातील व पारंपरिक पद्धतीच्या घागरी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आकार आणि रंग-रुपाप्रमाणे घागरीच्या किमती ५० रुपयांपासून सुरू होतात. रंगीत घागरी १५० रुपये ते ४०० रुपयांपर्यंत आहे. ग्रामीण भागातील विविध कुंभारांसह शेजारील गुजरात राज्यातूनही घागरींची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.

ढोल पथकांचा घुमणार आवाज
गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवात डीजेचा वापर केला जात आहे. मात्र, यंदा पुणे-मुंबईच्या धर्तीवर दहीहंडीसाठी ढोल ताशा पथकांना आमंत्रित करून अनोख्या पद्धतीने गोविंदांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध ढोल ताशा पथकांच्या सरावाला वेग आला आहे. नाशिकमधील अनेक अशी ढोलताशा पथकांची मागणी नाशिकसह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश सारख्या राज्यात केली जात असल्याचे ढोल ताशा पथकानी सांगितले.

नाशिकमधील दहीहंडी उत्सवासाठी आता ढोलताशा पथकांना आमंत्रित केले जात आहे. यामुळे पारंपरिक वाद्यकलेला वाव मिळणार आहे.
- ऋषिकेश कालेवार, ढोलताशा पथक मालक

बालगोपाळांसह विविध मंडळाकडून आता दहीहंडी उत्सवासाठी लागणाऱ्या घागरींची मागणी केली जात आहे. अनेक मंडळे ४-५ आकर्षक घागरींची खरेदी करतात.
- अभिजित शिंदे, घागर विक्रेता

निवडणूक पार्श्वभूमीवर गोविंदा पथके जोरात
म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सण उत्सवाने भरगच्च श्रावण महिन्यातील उत्सवात कृष्णजन्माष्ठमीला होणारा दहीहंडीचा उत्सव यंदा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरात होणार आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न केले जात असल्याने दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा आतापासूनच सज्ज झाले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या महिला पथकांनीही सराव करण्यास सुरवात केली आहे.

शहरातील श्रीकृष्ण मंदिर परिसरात भाविकांकडून गोपालकाल्याबरोबरच छोट्या दहीहंडींचे आयोजन केले जाते. ठराविक भागात दहीहंडी उत्सव होतात. नाशिकला होणाऱ्या दहीहंड्यांची उंची मर्यादित असल्याने दहीहंडी फोडण्यास गोविंदाना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत नाही. कृष्ण जन्माष्ठमीच नव्हे तर त्यानंतर विविध मंडळे आपापल्या सोयीनुसार दहीहंडीचे आयोजन करतात.

विद्यमान नगरसेवक आपापल्या प्रभागात दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या तयारीला लागले आहे. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर, कॉलेजरोड आदी भागात दरवर्षी दहीहंडी होत असल्यातरी यंदाच्या उत्सवाचा जोर काही औरच राहणार आहे. प्रत्येक मंडळ दुसऱ्या मंडळापेक्षा मोठ्या प्रमाणात दहीहंडी आयोजन करण्याच्या तयारीत असल्याने यंदाच्या दहीहंड्यांची धमाल बघायला मिळणार आहे.

उत्सुकता महिला गोविंदांची
डोंगरे वसतिगृह मैदानावरील दहीहंडी नाशिककरांसाठी आकर्षणाचा विषय ठरत होता. त्यात महिला गोविंदा पथक नाशिकच्या बाहेरून येतात. अशा प्रकारच्या दहीहंड्यांची यंदाही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिमूर्ती चौकात बस सुसाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

पवननगर येथून पंचवटीकडे जाणाऱ्या शहर वाहतूक बसचे गुरुवारी अचानक ब्रेक फेल झाल्याने दोन दुचाकींसह एका रिक्षाला धडक बसली. यात गाड्यांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. मात्र, या अपघातामुळे शहर बसच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

त्रिमूर्ती चौकातील दिव्या अॅडलब्स येथून जात असतांना बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने ही गोष्ट तातडीने वाहकाला सांगितली. दुर्गानगर ते त्रिमूर्ती चौक हा रस्ता उताराचा असल्याने वेळ न दडविता वाहकाने बसच्या पुढच्या दरवाजात उभे राहून जोरजोराने ओरडत रस्त्यावरील अन्य वाहनांना बाजूला होण्याची सूचना केली. वाहनचालकानेसुद्धा ब्रेक नसतांना गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्रिमूर्ती चौकात सिग्नलपूर्वी बस थांबविण्यात वाहनचालकाला यश आले. गाडी थांबल्याचे पाहून बसच्या मागील बाजूस असलेल्या अन्य काही वाहनांनी बसच्या पुढे जाऊन सिग्नलवर उभे राहणे पसंत केले. मात्र, याचवेळात गाडी अचानकपणे पुन्हा पुढे जावू लागली. यात दोन दुचाकीसह एका रिक्षाला बसची धडक बसली. अचानकपणे झालेल्या या धडकेमुळे परिसरात धावपळ उडाली. मात्र बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस व अंबड पोलिस कर्मचाऱ्यांनी त्रिमूर्ती चौक सिग्नलकडे तत्काळ धाव घेत वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच संपातलेल्या नागरिकांची समजूत काढली. अपघातग्रस्त दोन दुचाकी व एक रिक्षा जवळ असलेल्या पोलिस चौकीत नेण्यात आली.

स्वत:चा वा‌चविला जीव
अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दुचाकीवरून जाणाऱ्या ज्योती चव्हाण या महिलाला किरकोळ दुखापत झाली. रिक्षामध्ये कोणी प्रवासी नव्हते. रिक्षाचालक राजेंद्र परदेशी याने प्रसंगावधार राखत गाडीतून बाहेर उडी घेत स्वत:चा जीव वाचविला. रिक्षाचे नुकसान झाले आहे.

त्रिमूर्ती चौकातील सिग्नलवर थांबलेलो असताना अचानक मागून आलेल्या बसने धडक दिली. खाली पडल्याने मी बसच्या पुढच्या चाकाखालीच जाणार होतो. परंतु, हेल्मेटमुळे बचावलो.
- समाधान हसळकर, अपघातग्रस्त दुचाकीस्वार

नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे आईला सोडायला जात असताना त्रिमूर्ती चौकातील सिग्नलवर थांबलो होतो. केवळ नशीब बलवत्तर असल्याने माझा आणि आईचा जीव वाचला.
- अक्षय चव्हाण, अपघातग्रस्त दुचाकीस्वार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. पलुस्करांचा अनमोल ठेवा नाशिककरांच्या विस्मृतीत

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक ः भारतीय शास्त्रीय संगीत घराघरांत पोहोचवून ज्यांनी अजरामर केले, तुलसी रामायणावरील हस्तलिखित प्रत ज्यांच्यामुळे लिहिली गेली, त्या पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा ९० वर्षांपूर्वीचा हा अनमोल ठेवा नाशिककरांच्या विस्मृतीत गेल्याची खंत संगीतप्रेमींना सतावत आहे. त्यांचा अंगरखा, कुबडी, खडावा या त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आजही जपल्या असल्या तरी नाशिककरांना त्याची माहितीही नाही, अशी स्थिती आहे. पलुस्कर यांनी स्थापन केलेल्या श्री रामनाम आधाराश्रमात हा अनमोल ठेवा उपलब्ध असून, त्याचे जतन होण्याची अपेक्षा त्यांच्या १४४ व्या जन्मदिनी व्यक्त होत आहे. काळाराम मंदिरालगत असलेल्या या आश्रमाचीही दुरवस्था झाल्याची बाब निदर्शनास येत आहे.

नाशिक शहराचे नाव विश्वात पोहोचवणाऱ्या तीन व्यक्ती होत्या- विनायक दामोदर सावरकर, दादासाहेब फाळके आणि विष्णू दिगंबर पलुस्कर. यापैकी दादासाहेब फाळके आणि वि. दा. सावरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाशिक शहरात त्यांची भव्य स्मारके उभी राहिली. मात्र, भारतीय शास्त्रीय संगीतात ज्यांनी अभूतपूर्व कामगिरी केली, त्या पलुस्करांच्या पदरी मात्र निराशा आली. पं. पलुस्कर मुंबईहून नाशिकला स्थायिक झाल्यानंतर त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाला असलेल्या जागेत रामनाम आधाराश्रम या संस्थेची स्थापना केली. येथे त्यांनी अनेकांना संगीताचे धडे दिले.

स्मारकाबाबतही उदासीनता
एकेकाळी राजेशाही थाटात वावरणारे पलुस्कर येथे विरक्तीचे जीवन जगत होते. या जागेत त्यांनी रामायणाचे धडे गिरवले. यासाठी त्यांनी तुलसी रामायणाचे हस्तलिखित तयार करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या तुलसी रामायणाची हस्तलिखित प्रत आजही रामनाम आधाराश्रमात पाहायला मिळते. या ठिकाणी संगीताच्या शिक्षणासाठी लागणारी पुस्तके छापली जात. त्यासाठी पलुस्करांनी संगीत प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली. पलुस्कर ज्या प्रिंटिंग मशिनवर पुस्तके छापत असत ते मशीन आजही या जागेत आहे. रामाच्या भक्ती बरोबरच दत्तात्रेयांची भक्तीही करीत असे. अनेकदा गिरणार पर्वतावर ते जात असे. त्यांना दत्तात्रेयांनी दृष्टान्त दिला व त्यांना कुबडी भेट दिल्याची आख्यायिका आहे. ती कुबडीही या ठिकाणी पाहायला मिळते. या सर्व वास्तू जागतिक ठेवा आहे. तो जपण्यासाठी भव्य स्मारकाची गरज आहे.

त्यांनी तयार केलेले साहित्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे या वस्तू जतन व्हाव्यात अशीही संगीतप्रेमींची अपेक्षा आहे. त्यांच्या संगीतकलेचा वारसा त्यांच्या सून गंगूबाई पलुस्कर यांनी सांभाळला. याच जागेतून त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची धुरा वाहिली. येथे कुलीन स्त्रियांना संगीत शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली. पलुस्करांना थोडा दृष्टिदोष होता. त्यामुळे तुलसी रामायण त्यांनी मोठ्या अक्षरांमध्ये आपल्या शिष्यांकडून लिहून घेतले. त्याची प्रत रामनाम आधाराश्रमात आजही सुस्थितीत आहे. विवेक व सुरेंद्र जालिहालकर व त्यांचे कुटुंब या दुर्मिळ वस्तूंची निगा राखतात. आधाराश्रमात संगीताचे कार्यक्रम आजही होत असतात.

असे आहे हस्तलिखित
- तुलसी रामायणाची प्रत हँडमेड पेपरवर
- २ इंच आकाराची अक्षरे; एका पानावर चार ओळी
- एकूण २ हजारावर पाने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वासुमल श्रॉफ यांना देवळाली गौरव पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

यंदाचा देवळाली गौरव पुरस्कार अनिवासी भारतीय व उद्योगपती वासुमल श्रॉफ यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती सरस्वती मित्र मंडळ विश्वस्त समितीचे निमंत्रक सचिन ठाकरे यांनी दिली आहे. देवळालीच्या जडघडणीत सामाजिक व सांस्कृतिक योगदान देणाऱ्या व्यक्तींना देवळाली गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

देवळालीच्या विकासात सिंहाचा वाटा असणाऱ्या विक्योमल श्रॉफ यांचे ते बंधू असून श्रॉफ परिवाराचा देवळालीत विविध मंदिरे, रुग्णालये, उद्याने, स्मशानभूमी, संसरी व शिंगवे बहुला येथे शाळा अशी विविध विकासकामे केली आहेत. येथील मेन स्ट्रीटवरील श्रीकृष्ण मंदिर येथे बुधवारी (दि. २४) सायंकाळी ७ वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे. श्रॉफ यांना हरिद्वार येथील जुना आखाड्याचे राष्ट्रीय महामंत्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. तसेच याच कार्यक्रमात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत साई दरबार फेम सुप्रसिद्ध गायक बबलू दुग्गल यांच्या 'साई कृष्णलीला' ही संगीत नाटिका व भजन संध्या कार्यक्रम, गुरुवारी (दि. २५) सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवन पवारांचा भाजपमध्ये प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अपक्ष नगरसेवक आणि पवन पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जेलरोड येथे सायंकाळी झालेल्या सभेत भाजपच्या शहरातील सर्वच नेत्यांची भाऊगर्दी झाली होती. दरम्यान, प्रचंड गर्दी, रॅली आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वाहतूक खोळंबली होती.

जेलरोड येथील प्रभाग ३५ ब आणि ३६ ब मध्ये महापालिकेची २८ ऑगस्टला पोटनिवडणूक होत आहे. सर्वच उमेदवारांनी जोर लावल्याने प्रचारात रंगत वाढली आहे. या दोन्ही प्रभागातील भाजपच्या उमेदवार मंदा ढिकले आणि सुनंदा मोरे यांच्या प्रचार कार्यालयांचे उदघाटन आमदार सानप व सीमा हिरे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर झालेल्या सभेत पवन पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पवार यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, माजी आमदार वसंत गिते, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, माजी शहराध्यक्ष विजय साने या बड्या नेत्यांची उपस्थिती होती. यामुळे येथील दोन्ही प्रभागांच्या पोटनिवडणुकीतील चुरस वाढली आहे. याप्रसंगी सचिन हांडगे, प्रा. शरद मोरे, प्रकाश घुगे, हेमंत गायकवाड, रामदास सदाफुले, बाजीराव भागवत, सुनील आडके, सचिन ठाकरे, सुरेश अण्णा पाटील आदींची उपस्थिती होती. महापालिकेतील सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधत, पोटनिवडणूक लादणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन यावेळी भाजप नेत्यांनी केले.

नगरसेवक पवन पवार यांच्यावर हाणीमारीसह, खंडणी असे विविध गुन्हे पोलिसात दाखल आहेत. तसेच त्यांच्या वर यापूर्वी तडीपारीची कारवाई देखील करण्यात आलेली आहे. याशिवाय तडीपार गुन्हेगाराला आपल्या कार्यालयामध्ये आश्रय दिल्याचाही पवार यांच्यावर ठपका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध शस्त्रविक्रीला चाप

$
0
0



प्रवीण बिडवे, नाशिक
शहरात सातत्याने घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांचे मूळ उखडून टाकण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शेजारील मध्य प्रदेशसह बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांतून गावठी कट्टे आणि पिस्तूल यासारखी हत्यारे आणली जात असल्याचे स्पष्ट झाले असून, थेट तेथील अवैध हत्यारे विक्रीवर कारवाई करण्याचा धाडसी निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

गोळीबाराच्या घटनांमुळे नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच नाशिककरांच्या कानठळ्या बसू लागल्या. त्यामुळे यंदाचे वर्ष गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यांनीच अधिक गाजते की काय याची भीती शहरवासीयांना वाटू लागली आहे. नववर्षाच्या स्वागतावेळी सातपूरमधील स्वारबाबानगरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतरही शहरात गोळीबाराचे सत्र सुरूच राहिले. शहरात गावठी कट्टे आणि पिस्तुलसारखी हत्यारे सहजासहजी उपलब्ध होऊ लागल्याने नाशिकचे बिहार होत असल्याची भीती नागरिकांमध्ये बळावू लागली आहे. शहरात जुलै अखेरपर्यंत खूनाच्या २६ तर जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्याही तेवढ्याच घटना घडल्या आहेत. आगॅस्टमध्येही हे सत्र सुरूच असून या आठवड्यात गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गुन्ह्यांत हत्यारे वापरणाऱ्यांमध्ये एक व्यापारी तर एक नोकरदार व्यक्ती असल्याने त्यांना ही हत्यारे कोठून आणि कशी मिळाली हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

मध्य प्रदेशची सीमा असून तेथील उंबरठी या गावातून पिस्तुल, गावठी कट्टा यांसारख्या अवैध शस्त्रांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. याखेरीज गोळीबाराच्या अनेक गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय संशयितांचा सहभागही आढळून आला आहे. असे संशयित बिहार व उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणत असल्याचे निरीक्षण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.

शस्त्रविक्रेत्यांचे रॅकेट
शहरात गावठी कट्टे आणि पिस्टलची विक्री करणारे रॅकेटच कार्यरत असून खबऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने आतापर्यंत अशी २८ शस्त्रे शहर पोलिसांनी जप्त केली आहेत.

गँगस्टर रडारवर
अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टकल्या गँगच्या निसार अहे उर्फ सुलतान मेंबर आणि कर्ला दादा या दोघांना ग्रामीण पोलिसांनी शहरात अटक केली. त्यांच्याजवळून दोन रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली. अशा काही गँगस्टर्सच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिसांकडून सुरू असले तरी आता गुन्हेगारी जगताशी संबंध नसलेल्या नागरिकांकडेही शस्त्रे मिळून येऊ लागल्याने पोलिस यंत्रणा अचंबित झाली आहे. मात्र, पोलिसांनी शस्त्रे विकणाऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंडरपासची कोंडी फुटणार

$
0
0

महापालिका आयुक्त कृष्णा यांनी केली द्वारका अंडरपासची पाहणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका येथील भुयारी अंडरपासची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी द्वारका येथील भुयारी अंडरपासची पाहणी केली असून, त्या ठिकाणचे अतिक्रमण तातडीने काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व 'न्हाई' यांची संयुक्त बैठक घेऊन या मार्गावर लवकर तोडगा काढण्याचे आदेशही दिले. या ठिकाणी असलेली असुरक्षितता दूर करण्याचे आदेश दिल्याने हा मार्ग पुन्हा सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अंडरपास उभारण्यात आला. परंतु, हा अंडरपास चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आल्याचा आरोप झाला. या अंडरपासच्या आजूबाजूला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. तसेच या अंडरपासचा वापर नागरिक करीत नसल्याने तो अडगळीत पडला आहे. अंडरपासवर तोडगा काढण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु, येथील वाहतुकीची कोंडी कायम राहिली. अंडरपासची निर्मितीच चुकीच्या पद्धतीने झाली आहे. या अंडरपामधून प्रवास करणे धोकादायक असून, नागरिकवरील रस्त्याचाच वापर केला जात आहे.

आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह द्वारका अंडरपासची पाहणी केली. या ठिकाणी अंडरपासच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या अतिक्रमणावर चिंता व्यक्त केली. तसेच, पादचाऱ्यांच्या सुरक्षेवरही चिंता व्यक्त करण्यात आली. या ठिकाणी अंधार असून, येथून पादचाऱ्याने सुरक्षित बाहेर पडणेच अवघड असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षेसह अतिक्रमणाच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करीत अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या ठिकाणी साचलेले पाणी तातडीने काढून पादचारी वापर करतील अशी व्यवस्था करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

'न्हाई'सोबत संयुक्त बैठक

द्वारका अंडरपाससंदर्भात तातडीने तोडगा काढण्यासाठी तातडीने न्हाईसोबत बैठक घेण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. महापालिकेचा बांधकाम विभाग व न्हाईचे अधिकारी एकत्रित बैठक घेऊन हा मार्ग वाहतुकीसाठी तातडीने कसा खुला करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रसंगी त्यात काही अंतर्गत बदल करण्याची आवश्यकता भासल्यास तो बदल करण्याचीही तयारी केली जाणार आहे. त्यामुळे या अंडरपासची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. निवडणुकीसाठी प्रभागरचना कार्यक्रम जाहीर

$
0
0

नोडल ऑफिसरचीही नियुक्ती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात २०१७ मध्ये होणाऱ्या २६ जिल्हा परिषद, २९७ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना तयार केली जाणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद, १५ पंचायत समित्या, १४६ गण व ७३ गटांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीसाठीचा प्रारुप प्रस्ताव जिल्हाधिकारी ९ सप्टेंबर २०१६ पर्यन्त विभागीय आयुक्तांकडे सादर करतील. या प्रस्तावाला शुक्रवार २३ सप्टेंबरपर्यंत महसूल आयुक्त मान्यता देतील. २८ सप्टेंबरला आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रातून प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर आरक्षणाची सोडत निघेल. ५ ऑक्टोबरला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी व पंचायत निर्वाचक गणासाठी ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. १० ऑक्टोबर रोजी सोमवारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. हरकती व सूचना १० ते २० ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

१७ नोव्हेंबरला निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचना अतिंम केली जाणार आहे. शुक्रवारी २५ ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे वैदेही, अजिंक्य विजेते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथे शुक्रवारी झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या वैदेही चौधरीने १९ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवले. दुहेरीत नाशिकच्या अजिंक्य पाथरकरने मुंबईच्या अक्षण शेट्टीसोबत खेळताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. स्पर्धेत नागपूरच्या रितिका ठाकरने १७ वर्षांखालील एकेरी, दुहेरी गटातील विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला.

अंतिम सामन्यावेळी नाशिकचे माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू उदय पवार, नाशिकची माजी राष्ट्रीय खेळाडू प्रज्ञा गद्रे उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

नागपूरच्या रितिका ठाकरने एकेरीच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पूर्वा बर्वेला २१-१३, २१-१९ असे पराभूत केले. दुहेरीत रितिका ठाकर आणि सिमरन सिंघी या जोडीने आर्या शेट्टी आणि जान्हवी जगताप या जोडीचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

मुलांच्या १७ वर्षांखालील गटात ठाण्याच्या अमन संजय याने मुंबईच्या अक्षण शेट्टीचे आव्हान २१-१८, २१-११ असे मोडीत काढत विजेतेपदावर मोहोर उमटवली. दुहेरीत नाशिकच्या अजिंक्य पाथरकर आणि मुंबईच्या अक्षण शेट्टी या जोडीने नागपूरच्या गौरव मिथे आणि रोहन गर्बानी या जोडीचा २१-१९, १५-२१, २१-१४ असा पराभव केला.

मुलींच्या १९ वर्षांखालील गटात दुहेरीत रितिका ठाकर आणि सिमरन सिंघी या जोडीने नाशिकच्या अदिती कुटे आणि विशाखा पवार या जोडीवर २१-१२, २१-१७ अशी मात करत विजय मिळवला. मुलांच्या दुहेरीत अनिरुद्ध मयेकर आणि करण जाधव या जोडीने पुण्याच्या देवाशीष नावडीकर आणि हर्ष जगधने या जोडीचा २०-२२, २१-१५, २१-१३ असा फडशा पाडला.

१७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत धमाकेदार विजय मिळवणाऱ्या अमन संजय याला १९ वर्षांखालील गटात अंतिम फेरीच्या सामन्याच्या सुरुवातीलाच गंभीर दुखापत झाल्याने पुण्याच्या आर्य भिवपत्कीला विजयी घोषित करण्यात आले. सामना सोडला तेव्हा अमनकडे ३-० अशी आघाडी होती.

दरम्यान, पारितोषिक वितरण करताना उदय पवार यांनी सांगितले, की या वर्षी पुढील काही महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांत महाराष्ट्राचे खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करतील. प्रज्ञा गद्रे हिने खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले, की बॅडमिंटनमधील करिअर कमी कालावधीचे असल्यामुळे खेळाडूंनी १५ ते २० याच वयात जास्त कष्ट घेण्याकडे लक्ष द्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसपुत्राकडे आढळली तलवार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

शहरातील गुन्हेगारीला वेसन घालण्यासाठी शहर पोलिस कंबर कसून प्रयत्न करीत असताना नाशिकरोड येथे गुरुवारी पहाटे नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांना तिघा संशयितांकडे तलवार आढळली होती. या तिघा संशयितांपैकी एक पोलिसपुत्र, तर दुसरा मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ असल्याचे पोलिस तपासात उघडकीस झाल्याने या पोलिसपुत्राच्या प्रतापाने पोलिस खात्याचाच कपाळमोक्ष झाला आहे.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर नाशिकरोड पोलिस गस्तीवर असताना शिवाजी पुतळ्यासमोर उड्डाणपुलाखाली तिघेजण वाहनासह संशयास्पदरित्या आढळून आले होते. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या तिघांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे एक तलवार आढळून आली. त्यानंतर सुशील किसन कटारे (रा. गोरेवाडी), नीलेश पांडुरंग मुंडे व पवन दिलीप कोऱ्हाटे (दोघेही राहणार जेलरोड) या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याखाली नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर या तिघाही संशयितांचा ताबा उपनगर पोलिसांनी घेतला. सुशील कटारे हा पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा, तर नीलेश मुंडे हा मुंबई पोलिस दलात कार्यरत एका पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती पुढे आल्याने पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या मुलाकडे घातक शस्त्र असण्याचे कारण काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या तिघा संशयितांचा रोकडोबावाडी दुहेरी हत्याकांडाशी काही संबंध आहे का याची शहानिशा करण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांचा रोकडोबावाडी दुहेरी हत्याकांडाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांच्यापैकी एकजण पोलिसपुत्र, तर एकजण पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ आहे.

- अशोक भगर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उपनगर पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलगा दिसताच कळवा अॅपद्वारे

$
0
0

अत्याधुनिक अॅप उपलब्ध, नाशकात पायलट प्रोजेक्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या कुठल्याही भागात शाळाबाह्य मुले दिसतील, तर त्यांची तत्काळ माहिती आपण अॅपद्वारे देऊ शकतो. या माहितीच्या आधारे त्या मुलांच्या जीवनात शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. एनजीओ, कार्पोरेट व सरकारी व्यवस्था यांनी एकत्र येऊन शाळाबाह्य मुलांसाठी अॅप विकसित केले असून, त्याचा दोन टप्प्यात नाशकात पायलट प्रोजेक्ट सुरू झाला आहे.

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे सर्वात मोठे आव्हान शिक्षण विभागापुढे सध्या आहे. हे आव्हान सामाजिक बांधिलकी म्हणून पेलण्यासाठी चाक शिक्षणाची, कलम टीम आणि नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाने एकत्रित येत 'आयडेंटीफाय किड' नावाचे अॅप विकसित केले आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी नाशिकमध्ये दोन टप्प्यात याचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे.

शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी 'एव्हरी चाईल्ड काऊंट' या उपक्रमाद्वारे मागील वर्षी ९०० हून अधिक शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणले होते. त्याच पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या अॅपद्वारे शाळाबाह्य मुलांना शोधण्यात येणार आहे. अनेकदा आपल्याला शाळाबाह्य मुले दिसतात परंतु, त्यांना शिक्षणाची दिशा कशाप्रकारे द्यावी, हे ठाऊक नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. या अॅपच्या साहाय्याने अशी मुले निदर्शनास आणून देण्यास सामान्य व्यक्तीलाही मदत होणार आहे. सध्या नाशिकपर्यंत सीमित असलेले या अॅपद्वारे पुढे राज्यपातळीवर व त्यानंतर देशपातळीवर शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविली जाणार आहे. एनजीओ, कार्पोरेट व सरकारी व्यवस्था हे एकत्रित येत प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवत असल्याची माहिती शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अॅपची वैशिष्ट्ये

शाळाबाह्य मुले दिसल्यास त्वरित नोंद करता येते, शाळाबाह्य मुलाचा फोटो, नाव, पत्ता, शाळा सोडल्याचे कारण आदी माहिती भरता येते, एका मुलाची ड्युप्लिकेट एन्ट्री करता येत नाही. स्थलांतरीत मुलांची माहिती अॅपवर नोंदवता येते, ही सर्व माहिती नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

'कलम' टीमने केले अॅप विकसित

टाटा कन्सल्टंट सर्व्हिस (टीसीएस)ने नाशिकमध्ये 'डिस्क' नावाचे इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे. ज्यामध्ये तरूण विविध विषयांवर संशोधन करून त्यावर उपाययोजना करतात. यातील अपर्णा घटे, कनक जेटली, श्याम किशोर या तीन तरुणांच्या 'कलम टीम'ने हे अॅप विकसित केले आहे. सर्व अँड्रॉईड मोबाइलवर हे अॅप उपलब्ध आहे. मुलांच्या माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी हे अॅप इन्स्टॉल करण्यासाठी आधारकार्ड किंवा पॅन कार्ड नंबर देणे अनिवार्य असणार आहे. 'डिस्क'चे व्हाईस प्रेसिडेंट हसीत काझी आणि मेंटर महादेवन तसेच सचिन जोशी यांचे सहकार्य या तरुणांना लाभले आहे. या अॅपद्वारे ४३१ शाळाबाह्य मुलांना शोधण्यात आले असून त्यातील दोनशे मुलांना विविध शाळांमध्ये प्रवेश घेऊन देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील एकही बालक शिक्षण हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षकांकडून दोनदिवसीय शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, तंत्रज्ञानाची कास धरून हे सर्वेक्षण होणार असून 'आयडेंटिफाय किड' या अॅपची मदत त्यासाठी घेतली जाणार आहे.

'आयडेंटिफाय किड' या अॅपच्या माध्यमातून नाशिक शहरात शाळाबाह्य मुले शोधण्याची दोन दिवसीय मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्डनिहाय एक शिक्षक असे १२८ टेक्नोसॅव्ही शिक्षक व २४ केंद्रप्रमुख यांची टीम शिक्षणमंडळाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या नेतृत्वाखाली नेमली आहे. या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नाशिकमध्ये एकही मुल शाळाबाह्य रहायला नको, हा या मोहिमेमागील उद्देश आहे.

या मोहिमेसाठी १८ ठिकाणे निवडण्यात आली असून पेठरोड, फुलेनगर, गंगाघाट, लेखानगर झोपडपट्टी, नानावली, शिवाजीवाडी, राजीवनगर आदी ठिकाणांचा समावेश आहे. यामध्ये संकलित केलेली माहिती पाच सप्टेंबरला प्रकाशित करून त्याचा अहवाल शिक्षण सचिवांना सादर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सय्यद वस्तीचे आव्हान

वज्रेश्वरी झोपडपट्टी येथील सय्यद वस्तीतील एकही मुल शाळेत जात नसल्याचे चाकं शिक्षणाची या उपक्रमांतर्गत निदर्शनास आले आहे. या वस्तीत सहा महिन्यांपासून चाकं शिक्षणाची यांची बस जात असून, या मुलांना तेथेच शिक्षण दिले जाते. शिक्षणाविषयी प्रबोधन नसल्याने या वस्तीतील अनेक पिढ्या शाळेमध्ये गेलेल्याच नाही. त्यामुळे या वस्तीतील मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाने तीन ठेकेदारांना टाकले काळ्या यादीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वृक्षलागवडीचा ठेका घेऊनही ते वेळेत काम न केल्याप्रकरणी महापालिकेने तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे. शहरात पंधरा फुटी वृक्ष लागवडीचे काम घेऊन वर्ष लोटले तरी, संबधित ठेकेदारांनी काम करण्यास टाळाटाळ केली. तसेच पालिकेने अट शिथिल करूनही काम पूर्ण केले नसल्याने अखेर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे.

महापालिकेने शहरात साडेपाच कोटी रुपये खर्च करून २१ हजार वृक्षलागवडीचे काम हाती घेतले होते. पंधरा फूट उंचीचे वृक्ष लावण्यासाठीची निविदा काढली होती. त्यात सात ठेकेदारांनी सहभाग घेत ठेका घेतला होता. त्यात अर्जुन हरिश्चंद्र फाफळे, पाटील नर्सरी, निसर्ग एंटरप्रायजेस या तीन ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही संबंधित ठेकेदारांनी त्या कामाकडे दुर्लक्ष केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर येवल्यासाठी पालखेडचे पाणी सुटले...

$
0
0

म.टा. वृत्तसेवा,येवला

गेली तीन वर्षे दुष्काळाशी झुंजतानाच यंदाच्या पावसाळ्यातही आतापावेतो अत्यल्प पर्जन्यमान, तालुक्यातील गावोगावच्या जनतेसमोर घोंगावणारे संकट लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने येवला तालुक्यासाठी पालखेडचे पाणी सोडले आहे.

येवल्यातील शिवसेना पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी लावलेला मोठा रेटा, निवेदने अन् पाठोपाठ उपोषणाचा पवित्रा अखेर कामी आला आहे. पालखेड डाव्या कालव्यास पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदयानुसार पाणी टंचाई लक्षात घेवून पालखेडच्या पाण्याने येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डाव्या कालव्याद्वारे ओव्हरफ्लोचे पाणी मिळावे, यासाठी शिवसेनेने गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा चालवला होता. माजी सभापती संभाजी पवार यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी केलेल्या उपोषणाची ग्रामविकास राज्यमंत्री नामदार दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदयानुसार पाणीटंचाई म्हणून येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार शुक्रवारी दुपारी पाणी सोडण्यात आले.

शिवसेनेने पालखेड कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. निवासी जिल्हाधिकारी, अधिक्षक अभियंता यांना तत्काळ लक्ष घालण्यास सांगतानाच उपोषणकर्त्या शिवसेना शिष्टमंडळाशी प्रत्यक्ष चर्चा देखील केली होती. १५ ऑगस्टचा राष्ट्रीय सण असल्याने उपोषण मागे घ्यावे, आपल्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करू असे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेतले होते.

राष्ट्रवादीचा दावा

पालखेड कालव्याला पाणी सोडून येवला व परिसरातील आरक्षित बंधारे भरून देण्यासाठी आमदार जयंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली येवला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळे पालखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असल्याचा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

पाथर्डी फाटा येथील साईराम रो हाऊसमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोघेजण जखमी झाले. पतीने कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. दरम्यान, जिल्हा कोर्टाने पतीला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराम रो हाऊस परिसरात परदेशी दांपत्य राहते. दीपक उर्फ सोनू अशोक परदेशी याचा गुरुवारी वाढदिवस होता. रात्री त्याचा पत्नी कोमल यांच्याशी वाद झाला. यावेळी संतापलेल्या दीपकने शिवीगाळ करून कोमलच्या दिशेने गोळीबार केला. हा प्रकार बघून त्याठिकाणी असलेल्या नागेश्वर बंगाली ठाकूर (२४, रा. शांतीनगर) याने कोमल यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा राग आल्याने दीपकने नागेश्वरवरही गोळीबार केला. या गोळीबारात कोमल आणि नागेश्वर हे दोघेही गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर नागेश्वरने परिसरातील घरांचे दरवाजे ठोठावत मदतीसाठी याचना केली. काही जणांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काही लोकांनी जखमी नागेश्वरला पाहिले आणि इंदिरानगर पोलिसांना घटनेची तत्काळ माहिती दिली. कोमल यांच्या उजव्या डोळ्याला गोळी लागली असून नागेश्वरच्या गालातून शिरलेली गोळी मानेतून बाहेर पडली आहे.

अनैतिक संबंधांचा संशय

गोळीबार झालेल्या घराची तपासणी केली असता त्याठिकाणी दोन गोळ्या झाडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. जखमी नागेश्वरला पोलिसांनी उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी नागेश्वरच्या फिर्यादीवरून दीपकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोमल आणि नागेश्वर यांचे अनैतिक संबंध आहेत का याचा पोलिस शोध घेत आहेत.

जखमी सिव्हिलमध्ये

पोलिस नागेश्वरचा शोध घेत असतांना दीपकने पत्नी कोमलला गाडीवर बसवून सिव्हिलमध्ये नेले. त्यानंतर पोलिसांना जखमी अवस्थेतील नागेश्वर आढळून आला. त्याच्याकडे चौकशी आणि सिव्हिलमधून मिळालेल्या नोंदीवरून पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले. त्यावेळी दीपक सिव्हिलमध्येच होता.

पिस्तूल आलेच कसे?

पाथर्डी फाटा परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशीच असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दीपककडे पिस्तूूल आलेच कसे याचाही पोलिस शोध घेत आहेत. दीपक हा नंदुरबार येथे नोकरीस असल्याचे परिसरातील नागरिकांकडून समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पवन’ला भाजपने केले पावन!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपने शहरातील गुंडांना पावन करण्याची मोहीम सुरू केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, पोलिसाची हत्या प्रकरणात आरोपी असलेला तडीपार व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला नाशिक रोड येथील अपक्ष नगरसेवक पवन पवार याला भाजपने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात प्रवेश देऊन 'पावन' करून घेतले आहे. पवन याच्या पक्षप्रवेशाने मात्र नाशिककरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भ्रष्टाचार, गुन्हेगारांना आश्रय अशा अनेकविध कारणांमुळे मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला धोबीपछाड करत भाजपला भरभरून मते दिली. विशेष म्हणजे गुन्हेगारांच्या आश्रयामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांना नाशिककरांनी घरी बसवले होते. मात्र, सत्तेवर येताच भाजपनेही आता पलटी खाल्ली असून, गुन्हेगारांच्या शुद्धीकरणासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचाच फॉर्म्युला अवलंबला आहे. नाशिक महापालिकेच्या पुढील वर्षी निवडणुका आहेत. त्यात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी थेट गुंडांचीच भरती पक्षात सुरू केली आहे. सत्तेत येताच भाजपने रम्मी राजपूत यांना पक्षात घेऊन थेट पालकमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून बसवले होते. त्यानंतर शहरातील लहान- मोठ्या गुन्हेगारांना पक्षाची कवाडे खुली करण्यात आली. गेल्या महिन्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हेमंत शेट्टी व शेखर निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी भाजपने इतर पक्षांवर गुन्हेगारीच्या बाबतीत आघाडी घेत, पवन पवार याला भाजपमध्ये प्रवेश दिला. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या 'अभूतपूर्व' सोहळ्याने नाशिककरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पोलिस हत्येतील आरोपी

पवन पवार याची नाशिकरोडला चांगलीच दहशत असून, त्याच्यावर नाशिकरोड, उपनगर व देवळाली पोलिस स्टेशनमध्ये जवळपास २० च्या वर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे बीट हवालदार कृष्णा बिडवे यांच्या हत्येचाही त्याच्यावर आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन डीसीपी स्वामी यांनी पवार याला तडिपार केले होते, तर गेल्याच पंधरवड्यात तडीपार गुंड संतोष कुशारे याला आश्रय दिल्याप्रकरणी पवारला अटक करण्यात आली होती. त्यामुळे असे गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पवार याला थेट भाजपने रेडकार्पेट टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images