Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मोर्चासंदर्भात पिंपळगावी ग्रामस्थांना मार्गदर्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिकमध्ये येत्या शनिवारी (दि. 24) होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची मालेगाव तालुक्यात जय्यत तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव (दा.) येथे ग्रामस्थांना मराठा मोर्चासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

समाजाच्या या विशाल मोर्चात पिंपळगाव परिसरातून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. जयंत पवार, विजय पवार, सुरेश पवार, सरपंच प्रशांत पवार यांनी बुधवारी झालेल्या

बैठकीत केले.

यावेळी महामोर्चाबाबतची भूमिका व नियोजन या संदर्भात उपस्थित ग्रामस्थांना डॉ. जयंत पवार यांनी मार्गदर्शन केले. नाशिकला मोर्चात सहभागी होण्यासाठी काय नियोजन केले आहे, याबाबतही माहिती देण्यात आली. मोर्चात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बैठकीस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


त्र्यंबक ग्रामस्थ सुविधा पुरविणार

त्र्यंबकेश्वर : क्रांती मूक मोर्चास तालुक्यातून भरपूर पाठिंबा मिळतो आहे. त्र्यंबक ग्रामस्थ या मोर्चात पिण्याचे पाणी, वाहतुकीचे नियाेजन या सेवा सुविधा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मराठा समाजबहुल असलेली सतरा गावे आहेत. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी ठाकूर समाजाचा पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मोर्चाला दत्ता जोशी यांनी भाजपदेखील पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले आहे. तालुक्यातील नियोजनाची महत्त्वपूर्ण सभा गुरूवार (दि. २२) रोजी येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात होणार आहे.

िसन्नरला नियोजन बैठका

सिन्नर : मराठा क्रांती मोर्चासाठी सिन्नर तालुक्यात ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन होत असून गावागावातून मराठा समाजाच्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव बंद ठेवून सहभाग नोंदवण्याचा निर्धार कोनांबे ग्रामस्थांनी केला. गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात नियोजन बैठका, आवाहन सुरू

0
0

टीम मटा, नाशिक

नाशिकला शनिवारी (दि. २४ सप्टेंबर) रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चासाठी जिल्ह्यातूनही जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी नियोजन बैठका घेऊन मोर्चासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मालेगाव, कळवण, सटाणा, निफाड, सिन्नर याठिकाणी नियोजन बैठकांचे आयोजन करून याबाबतचे आवाहन करण्यात आले.

कळवण : तालुक्यात मराठा क्रांती मोर्चासाठी सोमवारपासून गावनिहाय नियोजन बैठका सुरू आहेत. यामध्ये मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने बैठकींना उपस्थित राहून नाशिकच्या मोर्चाला जाण्याचा निर्धार करीत आहेत.

मराठा इतरांसाठी लढला, मातीसाठी लढला आता स्वत:च्या अस्तित्वासाठी रस्त्यावर यावे लागते, ही खंत व्यक्त करत महामोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांनी निवाणे, कनाशी, बेलबारे, अभोणा येथील बैठकीत केले. यावेळी ओतूर, वाडी येथे बैठकीत मार्गदर्शन करताना शिवसेनेचे कारभारी अहेर यांनी मार्गदर्शन केले.

तालुक्यातील पाळे खुर्द,पाळे बुद्रुक येथेही विराट मराठा क्रांती मूक मोर्चासंदर्भात बैठक घेण्यात आली. यामध्ये आपली जबाबदारी ओळखून ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, तरुण, तरुणी, विद्यार्थी यांनी सर्वांनी आवर्जून सहभागी होऊन हा मोर्चा अतिविराट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांनी केले.

देवळ्यात मोटरसायकल रॅली

मोर्च्याच्या समाजजागृतीसाठी देवळा तालुक्यातून बुधवारी (दि. २१) मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला देवळा येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरातून जनाबाई आहेर यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी उरी येथील पाकिस्तानी दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहीद भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी योगेश आहेर, जितेंद्र आहेर, लक्ष्मीकांत आहेर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार चव्हाणांचा पाठिंबा

सटाणा : या मोर्चास बागलाणचे आमदार दीपिका चव्हाण यांनी पाठिंबा दर्शविला आहे. आपण वैयक्तिक पातळीवर मराठा समाजासोबत असून सरकारने उपरोक्त मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा यासाठी मुख्यमंत्र्याची भेट घेवून निवेदन देणार असल्याचे आमदार दीपिका चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. प्रसिद्धीपत्रकात आमदार चव्हाण यांनी, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाची केलेली मागणी ही मराठा समाजाची मागणी महत्त्वाची आहे.

मालेगावात मोर्चेबांधणी

मालेगाव ः नाशिक येथे होणाऱ्या शनिवारी (दि. २४) मराठा क्रांती मोर्चासाठी मराठा समाजबांधवांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. तालुक्यातील दाभाडी, झोडगे, रावळगाव आदींसह विविध गावांमध्ये मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या वतीने अखरेच्या बैठका घेण्यात येत असून समाजबांधवांना मोर्चात सहभागी होण्याची आचारसंहिता, पार्किंग व्यवस्था तसेच अन्य नियोजनाबाबत माहिती दिली जात आहे. या मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय नेतेदेखील सक्रिय झाले असून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधवांनी नाशिक येथील मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.मोर्चा दरम्यान मराठा समाजाचे एकजुटी दाखवून द्यावी, असे आवाहन करण्यात आले. हा मोर्चा शांततेत व इतरांनासाठी आदर्श ठरेल असा प्रयत्न सगळ्यांनी करावा, असे आवाहन सुभाष निकम यांनी केले. यासोबतच शनिवारी गाव बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीस शशिभाऊ निकम, मनोज हिरे, संजय देवरे, अॅड सुधाकर निकम, अरुण देवरे आदींसह गावातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोर्चासाठी गावातील जिरे माळी संघ, गोसावी समाज विकास मंडळ, प्रभू विश्वकर्मा युवा संघ, लाडशाखीय वाणी समाज, संतसेना नाभिक संघटना आदींनी पत्र देवून पाठिंबा जाहीर केला आहे.

बाजार समितीचे व्यवहार बंद

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार शनिवारी बंद राहणार असल्याची माहिती समितीचे उपसभापती सुनील देवरे यांनी कळविली आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी नाशिक येथे जाणार असल्याने बाजार समिती मधील व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. तसेच झोडगे व मुंगसे येथील व्यवहारदेखील बंद राहतील. त्यामुळे बाजार आवारात शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे करू नये असे, आवाहन सचिव अशोक देसले यांनी केले.

मुस्लिम बांधवांचा पाठिंबा

येथील आमदार आसिफ शेख यांनी देखील मराठा क्रांती मोर्चाबाबत आपला पाठिंबा असल्याचे निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मराठा समाजाचे आंदोलन हे कुठल्याही पक्षाच्या नेत्यापासून दूर आहे. मराठा समाजात किती अस्वस्थता व असंतोष आहे हे यात सहभागी लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीवरून लक्षात येत आहे. त्यामुळे मराठा समजाच्या मागण्यांना मुस्लिम बांधवांचादेखील पाठिंबा आहे. तरी सरकारने याबाबर गांभिर्याने विचार करून मराठा समाजास न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी शेवटी केली.

ओसवाल ट्रस्टचा पाठिंबा

येवला ः लढाऊ बाण्याचा इतिहास असलेला मराठा समाज भगवान महावीरांच्या अंहिसा धर्म पद्धतीने आपल्या न्याय व हक्कासाठी मोर्चा काढत असल्याकडे लक्ष वेधत येवल्यातील श्री ओसवाल समाज पंच ट्रस्टने नाशिकमध्ये निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चास आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक बनले देशाचे एव्हिएशन हब

0
0

संरक्षण प्रकल्पांना सुट्या भागांचा पुरवठा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशाची वाइन कॅपिटल, देशाचे किचन अशी ओळख असलेल्या नाशिकच्या नामाभिधानात आणखी एक वाढ झाली आहे, ती म्हणजे एव्हिएशन हबची. ओझर येथील हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसह देशभरातील संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पांना नाशिकमधील विविध उद्योगांमधून सुट्या भागांचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नाशिकच्या उद्योगांचा देशभरात वरचष्मा आहे.

नाशिक शहरातील सातपूर, अंबडसह सिन्नर तालुक्यात उद्योग बहरलेला आहे. याच उद्योगांमधून विविध प्रकारची उत्पादने देशाच्या विविध भागात, तसेच परदेशातही पुरविली जातात. आता एव्हिएशन क्षेत्रातही नाशिकमधील उद्योगांच्या उत्पादनांनी बाजारपेठ काबीज केल्याचे दिसून येत आहे. ओझर येथे एचएएलमध्ये मिग, तसेच सुखोई या लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाते. तसेच, याच एचएएल कॅम्पसला लागून हवाई दलाचे केंद्रही आहे. याच केंद्रात मिग विमानांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. एचएएलने हवाई दलासाठी लागणाऱ्या विविध उपकरणे आणि सामग्रीचे पूर्णतः स्वदेशीकरण करण्याचा निर्णय ९०च्या दशकात घेतला. त्यास हळूहळू प्रतिसाद लाभत आता ९५ ते ९६ टक्के स्वदेशी उत्पादनांद्वारे लढाऊ विमाने, तसेच संरक्षण सामग्रीचे उत्पादन केले जात आहे. ओझरच्या केंद्रातही खासगी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडून विविध प्रकारच्या सुट्या भागांची खरेदी केली जाते. गेल्या काही वर्षात हे सुटे भाग पुरविणाऱ्या उद्योगांची संख्या नाशिकमध्ये लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यामुळेच केवळ ओझरच नाही तर देशातील विविध संरक्षण उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांना नाशिकमधूनच सुट्या भागांचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नाशिक हे एव्हिएशन हब झाले आहे. त्यास ओझरच्या हवाई दल केंद्राचे कमांडर ग्रुप कॅप्टन पी. के. आनंद यांनी दुजोरा दिला. एकट्या एचएएलचेच नाशिकमध्ये शंभराहून अधिक नोंदणीधारक उद्योग आहेत. येत्या काळात नाशिकमध्ये संरक्षण सामग्रीसाठी पुरवठा करणाऱ्या उद्योगांचा विस्तार होण्याची दाट शक्यता असल्याचेही आनंद यांनी सांगितले.

हवाई दल सज्ज

जम्मू काश्मीर येथील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे १८ जवान शहीद झाले. तसेच तेथे अजूनही चकमकी चालू आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकचे हवाई दल केंद्र सज्ज आहे. आदेश मिळताच हवी ती सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे आनंद यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चासाठी एकजूट

0
0

शहरासह जिल्हाभरातून मूक मोर्चाला वाढता पाठिंबा; इतर समाजांचाही सहभाग

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

समाजातील महिला व मुलींना सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई होण्यासाठी महिलांनी शनिवारी (दि. २४) तपोवनातून निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिकरोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी केले.

गणेश आराधना महिला मंडळातर्फे जेलरोड येथील गणेश व्यायामशाळेत मराठा क्रांती मोर्चोच्या नियोजनासाठी बैठक झाली. त्यावेळी गायकवाड बोलत होते. बैठकीला नगरसेविका रंजना बोराडे, संगीता गायकवाड, गणेश आराधना मंडळाच्या अध्यक्षा सारिका बने, शिल्पा सावंत, मनीषा शेळके, शारदा जाधव, सुशीला मुरकुटे, जयश्री सोनवणे, अर्चना शेळके, माधुरी वाजे, कामिनी आहेर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मोर्चात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चा अन् विद्यापीठाची परीक्षा

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

नाशिकमधील अनेक कॉलेजेसमध्ये सध्या परीक्षेचा माहोल दिसत आहेत. पुणे विद्यापीठाच्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या परीक्षा १९ सप्टेंबरपासून सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शनिवारी (२४ सप्टेंबर) देखील विद्यार्थ्यांचा पेपर आहे. नाशिकमध्ये शनिवारी आयोजित क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.

यामुळे कॉलेजियन्सला पेपरसाठी कसे पोहोचायचे याचा संभ्रम निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्रीपासून तपोवनपासून मध्य नाशिक व मोर्चा मार्गाकडील रस्ते बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे कॉलेजियन्सला लांबच्या रस्त्याने कॉलेजला पोहोचावे लागणार आहे. रिपीटर विद्यार्थ्यांसमवेत अनेक कॉलेजेसमध्ये शेवटचे प्रॅक्टिकल्स बाकी असल्याने त्याही विद्यार्थ्यांना कॉलेजला उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. कोणत्या मार्गाने कॉलेजला जाता येईल, याच्या चर्चा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

BJP च्या नगरसेविकेवर दारोदार फिरण्याची वेळ!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात सत्ताबदल झाला असला तरी पोलिस कारभार बदलला नसल्याचा अनुभव सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेलाच येत आहे. नाशिकच्या कारभाराची सूत्रे हाती असलेल्या भाजप आमदार बाळासाहेब सानप यांच्यासोबत महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. आता गांगुर्डे यांनी न्यायासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा करताना त्यांनी पालकमंत्र्यांना मात्र लांब ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपच्या सत्ताकाळात आदिवासी नगरसेविकेलाही न्याय मिळत नसल्याचे र्दुदैवी अनुभव गांगुर्डे घेत आहेत.

माजी नगरसेवक अर्जुन गांगुर्डे यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले असावे, असा खळबळजनक आरोप त्यांची पत्नी नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांनी केला आहे. गांगुर्डे यांना काही व्यक्तींकडून जीवे मारण्याची धमकी आली होती, असेही त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गांगुर्डे यांच्या मृत्यूबाबत अद्याप धागेदोरे हाती लागले नसून, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेलाच न्यायासाठी पोलिसांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.

माजी नगरसेवक अर्जुन किसन गांगुर्डे यांचा १७ सप्टेंबर रोजी पेठरोड परिसरात मृतदेह आढळला होता. विच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असला तरी गांगुर्डे यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही. पतीच्या अकाली निधनामुळे ज्योती गांगुर्डे आणि त्यांचे कुटुंबीय अद्याप सावरू शकलेले नाहीत. मृत्यूच्या दोन तीन दिवस अगोदर याच घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर अर्जुन यांचे काही व्यक्तींशी वाद झाले होते, अशी माहिती नगरसेविका गांगुर्डे यांनी म्हसरूळ पोलिसांना निवेदनाद्वारे दिली. कांतीलाल देवरे, संजय जाधव आणि राठोड नामक व्यक्ती ठेकेदार असून, त्यांची सिंहस्थ कामातील बिले महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय बाबींचा हवाला देऊन रखडवली होती. अर्जुन गांगुर्डे यांचा या बिलांच्या देयकाशी काही संबंध नव्हता. मात्र तरीही संबंधित व्यक्ती घरी येऊन किंवा फोनवरून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गांगुर्डे गेले काही दिवसांपासून तणावाखाली असल्याने ते सतत घराबाहेर राहात असत. संबंधित व्यक्तींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती असे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याचा दावा ज्योती गागुर्डे यांनी केला आहे. या चिठ्ठीमध्ये संबंधित तीन व्यक्तींच्या नावाचा आणि मोबाअल क्रमांकांचा उल्लेख आहे.

जनआंदोलनाचा इशारा

पोलिसांकडे चार दिवस पाठपुरावा करूनही अद्याप अर्जुन गांगुर्डे यांच्या मृत्यूबाबत ठोस धागेदोरे हाती न लागल्याने गांगुर्डे कुटुंब व्यथीत झाले आहे. हेतुपूरस्सर अपमान करणे, निवासस्थान सोडण्यास भाग पाडणे अशा कृत्यांबद्दल अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, तसेच गांगुर्डे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयितांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी ज्योती गांगुर्डे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन थेट मुख्यमंत्री, पोलिस महासंचालकांना पाठविण्यात आले आहे. संशयितांवर कारवाई न केल्यास आदिवासी महादेव कोळी समाज विकास संघटना तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कडाळे, पृथ्वीराज अंडे, देवीदास वाटाणे आदींनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चाला विविध समाजांतर्फे पाठिंबा

0
0

टीम मटा नाशिक

नाशिक शहरात शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात विविध समाज, संघटनांतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. विविध समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचाही निर्णय घेतला आहे.

'शिंपी समाजोन्नती'तर्फे पाठिंबा

नाशिक ः मराठा क्रांती मोर्चास शहरातील शिंपी समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिक प्रांतिक नामदेव शिंपी समाजोन्नती संस्थेचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांच्या अध्यक्षततेखाली झालेल्या बैठकीत ठराव करून हा निर्णय घेण्यात आला. या वेळी प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंपी, सरचिटणीस सतीश भांबारे, कैलास निरगुडे, संजीव तूपसाखरे, दत्ता वावधाने, रत्नाकर लुंगे, सुभाष लचके, सचिन निरगुडे, रवींद्र रहाणे, प्रवीण पवार, योगेश वारे आदी उपस्थित होते.

वारकरी मंडळाचा पाठिंबा

शहरात शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला अखिल भारतीय वारकरी मंडळाने पाठिंबा दर्शविला आहे. यासाठी वारकरी मंडळाकडून नुकतेच एक पत्रक काढण्यात आले. त्यात ही माहिती देण्यात आली. मराठा क्रांती मोर्चासाठी वारकरी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, प्रदेशाध्यक्ष शिवाजी महाराज देशमुख येणार असल्याचीही माहिती यात देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत चुंचाळे येथील वारकरी शिक्षण संस्थेत होणार आहे. जनार्दन काकडे, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर यांनी ही माहिती दिली.

कोळी समाजाचा पाठिंबा

त्र्यंबकेश्वर ः मीटिंग सुरू असताना तेली समाज, ब्राह्मण, महादेव कोळी, ठाकूर, नाभिक समाज, कांदडी समाजांनी निवेदन देऊन मोर्चास पाठिंबा जाहीर केला आहे. या वेळी उपनगराध्यक्ष संतोष कदम, मधुकर लांडे यांनी उपस्थित होते. बैठकीत मोर्चाच्या दिवशी शहर व तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले.

आज प्रचार रॅली

पंचवटी : मराठा क्रांती मोर्चाच्या प्रचारासाठी २३ सप्टेंबर रोजी नांदूर नाका येथून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी आठला निघणारी ही प्रचार रॅली नांदूरगाव, मानूरगाव, विडी कामगार वसाहत, माडसांगवी, आडगाव, कोणार्कनगर येथे जाणार आहे. आडगाव येथील प्रचार रॅली मविप्र संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयापासून निघणार आहे. ही रॅलीही सकाळी आठला निघेल.

मारवाडी, गुजराती समाजाचा पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाला अखिल भारतीय मारवाडी, गुजराती समाजाचा पाठिंबा असल्याची माहिती अखिल भारतीय मारवाडी, गुजराती मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित बागमार यांनी पत्रकाद्वारे दिली. मोर्चाला आमच्या समाजाचा पाठिंबा असून, या मोर्चाचे दिव्य संघटन व एकजुटीचा इतर समाजाने आदर्श घ्यावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पत्रकावर दिग्विजय कापडिया, प्रदीप बूब, कमलेश लुणावत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आमदार गावितही सहभागी होणार

त्र्यंबकेश्वर ः मराठा क्रांती मोर्चात आमदार निर्मलाताई गावित सहभागी होणार असून, त्यांनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. मोर्चास आमच्या गावित कुटुंबीयांकडून पूर्णपणे पाठिंबा असून, मोर्चात आम्ही सहकुटुंब सहभागी होणार असल्याची माहिती आमदार गावित यांनी सांगितले. आमदार गावित म्हणाल्या, की कोपर्डी येथे झालेली घटना मानवतेला काळिमा फासणारी असून, या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात शनिवारी (दि. २४) प्रस्तावित असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दहा ठिकाणी नो व्हेईकल झोन जा‌हीर केले आहे. तर मूक मोर्चासाठी येणाऱ्या मराठा समाजबांधवांच्या वाहनांसाठी पार्किंगची सात ठिकाणे निश्चित झाली आहेत.

१. मालेगांव-बागलाण

देवळा-चांदवड-पिंपळगाव-ओझर :

या मार्गावरून येणाऱ्या वाहनांना रासबिहारी स्कूल येथून डावीकडे वळून नीलगिरी बाग येथील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२. दिंडोरी-कळवण

या मार्गावरील वाहनांना मार्केट यार्ड-दिंडोरी रोड- महालक्ष्मी टॉकीज समोर व मेरीच्या जागेत पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर आंदोलनकर्त्यांना पायी तपोवनात जायचे आहे किंवा पंचवटी करंजा येथे मोर्चात सहभागी होता येणार आहे.

३. पेठ-हरसूल-गिरणारे-मखमलाबाद
वरील मार्गावरून येणाऱ्या वाहनांना शरदचंद्र पवार बाजार समिती, आरटीओ समोर वाहने पार्क करून तपोवनात यायचे आहे.

४. निफाड-येवला-नांदगाव-लासलगाव-चांदोरी-सायखेडा
मुख्यतः औरंगाबाद हायवेने येणाऱ्या वाहनांना हॉटेल मिर्ची येथून डावीकडे वळून जय शंकर फेस्टीव्हल लॉन्स (जेजुरकर मळा) येथील मैदनात पार्किंग करावे लागेल.

५. सिन्नर-भगूर-देवळाली-नाशिकरोड
या मार्गावरील वाहने पुणे रोडने विजय-ममता टॉकीजपासून उजवीकडे वळून तपोवन रस्त्याने मारुती वेपर्स चौकातून लक्ष्मीनारायण पुलाशेजारील गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील मैदानात पार्किंग करतील.

६. त्र्यंबकेश्वर मार्ग
या मार्गावरून येणारी वाहने अंबड टी पाँईट, पपया नर्सरी येथून उजव्या बाजूकडे वळून अंबड लिंकरोडने एक्सलो पाँईटवरून गरवारे टी पाँईट येथे पोहचतील. यानतंर उजव्या रॅमने चढून वाहने उड्डाणपुलावर येतील. ही वाहने द्वारका येथे उतरतील. येथून पंचवटी कॉलेज येथे उजव्या बाजुला वळतील. पुढे तपोवन रस्त्याने आठवन लॉन्स येथे डाव्या बाजूला वळून चव्हाण मळ्यातील मैदनात पार्किंग करतील.

७. इगतपुरी-घोटी मुंबई आग्रा हायवेने मोर्चासाठी येणारे समाजबांधव हे उड्डाण पुलावरून द्वारका चौकात खाली उतरतील. येथून मार्ग़े येणारी वाहने मुंबई-आग्रारोडने फ्लाईओवर वरून द्वारका चौकात खाली उतरून हायवे पंचवटी कॉलेज येथे उजव्या बाजुला वळतील. पुढे तपोवन रस्त्याने आठवण लॉन्स येथे डाव्या बाजूला वळून चव्हाण मळ्यातील मैदानात पार्किंग करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थायीचा विकासाला खो!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या बांधकाम व्यवसायाची वर्षभरापासून सुरू असलेली कोंडी फोडण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना स्थायी समितीने गुरूवारी खो घातला. प्रशासनाने युद्धपातळीवर खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवल्यानंतर त्याला तत्काळ मंजुरीची अपेक्षा होती. मात्र, शहरातील बांधकाम व्यवसायाची कोंडी सोडविण्याबाबत गंभीर नसलेल्या सदस्यांनी 'अभ्यासा'साठी खत प्रकल्पाच्या खासगीकरणाचा विषय तहकूब ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहर विकासाबाबत सदस्यांच्या या अनास्थेची चर्चा आता अधिकाऱ्यांसह बिल्डरांमध्ये रंगली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खत प्रकल्पातील अनास्थेमुळे शहरातील नवीन बांधकामांवर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) बंदी घातली होती. खत प्रकल्प बंद असल्याने नवीन बांधकामे करू नका, असे 'एनजीटी'ने आदेशित केले होते. त्यामुळे कपाटामुळे अगोदरच अडचणी आलेला बांधकाम व्यवसाय 'एनजीटी'च्या आदेशाने पुरता ठप्प झाला. खत प्रकल्प कार्यान्वित होत नाही; तोपर्यंत बंदी न उठविण्याची भूमिका कोर्टाने घेतली होती. त्यामुळे खत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी 'जीआयझेड'शी चर्चा करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा तसेच त्याची दुर्दशा करणाऱ्यांची चौकशी प्रस्तावित केली होती. त्यांच्या बदलीनंतर आलेल्या अभिषेक कृष्णा यांनीही 'एनजीटी'ला आदेशाला प्राधान्य देत, खत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले.

दोन महिन्यांच्या प्रयत्नांनतर कृष्णा यांनी खत प्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला. संबंधित प्रकल्प हा पुण्याच्या मेकॉन आयकॉस कंपनीला ३० वर्षे चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. गुरुवारच्या बैठकीत संबंधित हा प्रस्ताव मंजूर होऊन प्रकल्प लवकर कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र, सभेत घडलेच उलटेच. सदस्यांनी अमरधामच्या ३७ लाखांच्या ठेक्यावर तब्बल दीड तास चर्चा केली. या ठेक्याची चिरफाड करतांना भरपूर वेळ घेतला. परंतु, दुसरीकडे शहराच्या विकासाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या खत प्रकल्प खासगीकरणाकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केल्याने सदस्यांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तहकुबीचे 'राज' काय?
गुरूवारी हा प्रस्ताव मंजूर झाला असता, तर प्रशासनाने तत्काळ प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी संबंधित कंपनीसोबत करार केला असता. त्यामुळे लवकर हा प्रकल्प मार्गी लागला असता. मात्र, या बैठकीत अधिक अभ्यासासाठी हा विषय तहकूब ठेवून विशेष सभेची मागणी करण्यात आली. त्यामुळे या प्रस्तावाचा मार्गही घंटागाडी ठेक्याप्रमाणेच होतो की, काय असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील वाहतुकीत बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातून जाणाऱ्या अवजड व शहरांतर्गत फिरणाऱ्या वाहनांच्या मार्गात लक्षणीय बदल करण्यात आला आहे. मूक मोर्चासाठी लाखो मराठा समाजबांधव हजेरी लावण्याची शक्यता असून, शनिवारी आंदोलनकर्ते माघारी फिरेपर्यंत वाहतुकीतील बदल लागू असणार आहे.

मोर्चातील वाहने वगळून इतर वाहनांना व अवजड वाहनांना खालील मार्गांचा अवंलब करावा लागेल.

- औरंगाबादकडून पुणे व मुंबई बाजूकडे जाणारी अवजड वाहने नांदूर नाका, जेल रोड, बिटकोमार्गे नाशिक रोडकडून पुण्याकडे व नाशिक रोड, तसेच सम्राट कॉर्नर येथून डावीकडे वळून डीजीपीनगरमार्गे वडाळा गाव व पुढे पाथर्डी फाटा, मुंबईकडे जातील.

- औरंगाबादकडून धुळे बाजूकडे जाणारी अवजड वाहने नांदूर नाकामार्गे हॉटेल जत्रा व पुढे धुळ्याकडे जातील.

- धुळे बाजूकडून पुणे व मुंबईकडे जाणारी अवजड वाहने जत्रा हॉटेलमार्गे नांदूर नाका, जेलरोड, बिटकोमार्गे पुण्याकडे जातील, तर मुंबईकडे जाणारी वाहने सम्राट कॉर्नर येथून डावीकडे वळून डीजीपीनगरमार्गे वडाळा गाव व पुढे पाथर्डी फाटा असे जातील.

- दिंडोरी बाजूकडून धुळे, औरंगाबाद, पुणे व मुंबईकडे जाणारी अवजड वाहने हे आरटीओ कॉर्नरमार्गे रासबिहारीमार्गे धुळे बाजूकडे जातील. औरंगाबाद, पुणे व मुंबईकडे जाणारी अवजड वाहने हे जत्रा हॉटेलमार्गे नांदूर नाका येथून औरंगाबादकडे तर बिटको चौकातून पुणेच्या दिशेने जातील. मुंबईकडे जाण्यासाठी सम्राट कॉर्नर येथून डावीकडे वळून डीजीपीनगरमार्गे वडाळा गाव व पुढे पाथर्डी फाटा असे जातील.

- पेठ बाजूकडून धुळे, औरंगाबाद, पुण्याकडे जाणारी अवजड वाहने पेठ रोड, राऊ हॉटेल, म्हसरूळ, आरटीओ कॉर्नर, रासबिहारमार्गे नांदूर नाका येथे जातील. तर, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी शरद पवार मार्केट चौकातून उजवीकडे वळून ड्रीम कॅसल सिग्नल, चोपडा लॉन्स, गंगापूर नाका सिग्नल, जेहान सिग्नल, बारदाण फाटा व तेथून डावीकडे वळून अंबड टी पॉइंट येथून हायवेला जातील.

- गंगापूर रोडने मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बारदाण फाटा येथे डावीकडे वळून अंबड टी पॉइंट येथून गरवारेमार्गे मुंबईकडे जाता येईल. तर, धुळे, औरंगाबाद, पुणेकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, ड्रीम कॅसल सिग्नल, मखमलाबाद रोडने शरदचंद्र पवार मार्केट, आरटीओ कॉर्नर, रासबिहारी स्कूल व जत्रा हॉटेल असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

- त्र्यंबकेश्वरकडून औरंगाबाद, धुळेच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना अंबड टी पॉइंटवरून गरवारे व उड्डाणपुलावरून इतरत्र जातील. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पाथर्डी फाटा, वडनेरगेट, विहीतगाव, बिटको चौक मार्गे पुण्याकडे जावे.

-मुंबईकडून धुळ्याकडे जाणारी वाहने उड्डाणपुलाचा वापर करतील. तसेच पुण्याकडे जाणारी वाहने ही पाथर्डी फाटा, वडनेर गेट, विहीतगाव, बिटको चौक मार्गे पुण्याकडे मार्गस्थ होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्गांमध्ये बदल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठा क्रांती मोर्चामुळे बस प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने मार्गात बदल केला आहे. तर जुने व नवीन सीबीएस हे बस स्थानक मोर्चाकाळात बंद राहणार आहे. त्याऐवजी महामार्ग बसस्थानकावरून पुणे, मुंबई बसेससाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तर डोंगरे वसतिगृह मैदानावर तात्पुरते स्वरुपाचे बसस्थानक होणार आहे. शहर बससेवेसाठी सुध्दा सहा विविध ठिकाणांहून जादा बसेस सुटणार आहेत.

डोंगरे वसतिगृह मैदान येथून बसेस चोपडा लॉन्स, रासबिहारी शाळा मार्गे बस पाठविल्या जाणार आहे. मालेगाव, मनमाड, ओझर, पेठ, सटाणा, कळवण, पिंपळगाव, मनमाड, नांदगाव, येवला मार्ग असणार आहे. पुणे येथून जाणाऱ्या सर्व बसेस महामार्ग बसस्थानकावरून सुटतील. मुंबई, पुण्यासह धुळे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ बस थांबविली जाणार आहे. साक्री, नंदुरबारकडून पुणेकडे जाणाऱ्या बसेस द्वारका पूलावरून उतरतील. नगर ते सेलवास जाणाऱ्या बसेस नाशिकरोड, पाथर्डी रोड मार्गे अंबड लिंकरोडने त्र्यंबककडे जातील.

प्रवाशांसाठी बससेवा
मोर्चकरी व प्रवाशी यांच्यासाठी सकाळी ६ वाजेपासून मोर्चा सुरू होईपर्यंत महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी गरजेनुसार बससेवा ठेवण्यात आली आहे. त्यात नाशिकरोड ते तपोवन मार्गे नांदूर नाका, नाशिकरोड ते द्वारका मार्गे तपोवन, भगूर ते द्वारका मार्गे तपोवन, श्रमिकनगर ते तपोवन, उत्तमनगर ते तपोवन, ओझर ते तपोवन अशा बसेस असणार आहे.

परतीसाठीही बससुविधा

महामार्ग बस स्थानकावरून तपोवन, सिन्नर, नाशिकरोड, ओझर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी शहर बस वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मायको सर्कल व डोंगरे वसतिगृह येथून सातपूर श्रमिकनगर, उत्तमनगर, गिरणारे मार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शहर बससेवेवर परिणाम
मोर्चामुळे शहरातील बससेवेवर थेट परिणाम होणार असून त्याचे नियोजन वेळवरच केले जाणार आहे. मोर्चाला किती वेळ लागतो व कोणते मार्ग अगोदर मोकळे होतात यावर हे नियोजन असणार आहे. पोलिसांनी काही मार्गावर वाहतूक बंद केल्यामुळे ती सुध्दा बससेवेला सुरू ठेवण्यात अडचण होणार आहे. तसेच मोर्चा केव्हा सुरू होतो व केव्हा संपतो, सुटल्यानंतर रस्त्यावरून गर्दी कशी असते, याचा अंदाज घेतल्यानंतर वेळेवर बसचे नियोजन होणार आहे.

मार्गदर्शनासाठी नियंत्रक
मोर्चाला जिल्ह्यातून होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होणार आहे. या सर्वांचा अंदाज घेऊन हे बदल केल्याचे पत्रकच एसटीमहामंडळाने जारी केले आहे. प्रवाशांना मार्गदर्शनासाठी द्वारका चौक, मिनाताई ठाकरे स्टेडियम, मायको सर्कल व बिटको चौक येथे वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून प्रवाशांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडला शनिवारी लिलाव बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चांदवड येथील बाजार समितीत शेतीमालाचे लिलाव व खरेदी-विक्री बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर यांनी दिली.

मोर्चात विविध जिल्ह्यांतून समाजबांधव येणार असून, मुंबई-आग्रा महामार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. चांदवड बाजार समिती या महामार्गालगत असल्याने शेतीमाल आणताना शेतकरी वर्गाला अवघड होणार आहे. वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. वेळीच लिलाव करणे अशक्य असून, लिलावात सहभागी होणारे घटक मोर्चात सहभागी होणार असल्याने शनिवारी लिलाव बंद ठेवावेत, अशी मागणी समितीकडे यापूर्वी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. कुंभार्डे, आहेर यांनी सांगितले. मुख्य बाजार, वडनेरभैरव उपबाजार, रायपूर खरेदी-विक्री केंद्र शनिवारी बंद राहील, असे चांदवड बाजार समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल रॅलीने केली वातावरणनिर्मिती

0
0

टीम मटा

नाशिकसह जिल्हाभरात मोटारसायकल रॅलीने मराठा क्रांती मोर्चाची वातावरणनिर्मिती करण्यात आली. पाथर्डी, सातपूरसह मालेगाव दाभाडीत रॅलींमध्ये हजारो तरुणाईने सहभाग नोंदवला. रॅलीत भगव्या ध्वजांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

मालेगाव दाभाडीत रॅली

मालेगाव ः नाशिक येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी दाभाडीत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तनिष्का निकम हिच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुभाष निकम यांनी मोर्चाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या व नियोजनाबाबत माहिती स्पष्ट केली.

मोर्चाच्या पूर्वनियोजनासाठी यापूर्वी दाभाडीत तीन ते चार बैठकी घेण्यात आल्या होत्या. शिवाजी पुतळा ते ग्रामपालिका कार्यालय, नवीन गाव, न्यू प्लॉट, जवाहरनगर, इंदिरानगर, गिसाका, रोकडोबानगर, पाच डिव्हिजन असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीत काळे टी-शर्ट परिधान करण्यात आले होते, तर प्रत्येकाच्या हाती भगवे झेंडे होते. सुमारे पाचशे मोटारसायकलींचा समावेश होता. या वेळी अमोल निकम, हरी निकम, आबा सोनवणे, पुरुषोत्तम निकम, मंगेश निकम, सुधाकर निकम, विजय निकम, किशोर निकम, संजय निकम, अंबू निकम, नकुल निकम, बापू निकम, गब्बर निकम, अमोल हिरे, राजेंद्र निकम आदी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर येथे बैठक

त्र्यंबकेश्वर ः त्र्यंबकेश्वर येथील जनार्दन स्वामी आश्रमात मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनासाठी सभा झाली. या वेळी माजी खासदार देविदास पिंगळे यांनी मोर्चाचा उद्देश समजून सांगितला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबविणे व महिलांच्या सुरक्षिततेसह विविध मागण्यांसाठी शनिवारी मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यांनी दिली.

शहिदांना श्रद्धांजली

दरम्यान, काश्मीरमधील उरी येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व कोपर्डी प्रकरणात बळी ठरलेल्या मुलीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांती मोर्चाची नोंदणी करा ऑनलाइन!

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. हिंगोलीपासून सुरू झालेल्या या मोर्चाचे राज्यभरात अनेक ठिकाणी आयोजन केले गेले आहे. शनिवारी (२४ सप्टेंबर) नाशिकमध्येही मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चाची पार्श्वभूमी सर्वांपर्यंत पोहोचावी, तसेच सर्वांना यात सहभागी करून घेता यावे, यासाठी आता अॅपची मदत घेतली जात आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे अॅप तयार करण्यात आले आहे. अँड्रॉइड मोबाइल, तसेच स्मार्टफोन असणाऱ्यांना या अॅपचा वापर करून घेता येणार आहे. गुगल मार्केटवर उपलब्ध असलेल्या मराठा क्रांती मोर्चा अॅप बहुतांश लोकांनी डाऊनलोड केले आहे. १२ सप्टेंबर रोजी हे अॅप गुगल प्लेवर अपलोड करण्यात आले होते. आतापर्यंत झालेल्या सर्व मोर्चांमध्ये या अॅपचा सहभागासाठी वापर करण्यात आला होता. नाशिकमध्ये शनिवारी होत असलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन म्हणून या अॅपची लिंक शेअर केली जात आहे. गुगल प्लेमधून अॅप डाऊनलोड केल्यानंतर नाव, नंबर आणि मोर्चात सहभागी होणाऱ्या शहराचे नाव टाकायचे आहे. यानंतर 'आय सपोर्ट' म्हंटल्यावर आतापर्यंत झालेल्या व होणार असलेल्या मोर्चांची यादी अॅप युजरला दिसते. सहभागी बांधवांचा डाटा मिळवण्यासाठी या अॅपचा टेक्नॉसॅव्ही वापर करून घेतला जात आहे. नाशिकनंतर इतरही मोर्चांसाठी या अॅपचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण शेड्युल या अॅपवर देण्यात आले आहे. शहरातील अनेकांनी हे अॅप डाऊनलोड करून मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. अॅपसोबतच ७६२०९००३०० या क्रमांकावर मिस-कॉल देऊनही आपला सहभाग नोंदवता येत आहे.

मॅपद्वारे सहभागाची माहिती

मराठा क्रांती मोर्चात सहभाग कसा असावा, याबाबतची माहिती अॅप डाऊनलोड करताना मॅपद्वारे दर्शवली जात आहे. त्यानुसार मोर्चात, 'विद्यार्थिनी- महिला- महिला नेत्या- विद्यार्थी- युवक- राजकीय नेते- स्वच्छता कार्यकर्ते- नियोजन कार्यकर्ते' अशा पद्धतीने सहभाग असावा असे सांगण्यात आले आहे.


अॅपमध्ये नियमांची माहिती

- इतर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मोर्चात सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये.
- मोर्चात कोणत्याही घोषणा देऊ नये.
- शिस्तीचे पालन करावे.
- पोलिस व इतर समाजार्थींसोबत सहकार्याने वागावे.
- अफवांवर विश्वास ठेवू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चासाठी पोलिसही सज्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी तगड्या बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. दादासाहेब गायकवाड सभागृहात गुरुवारी पोलिसांचे मार्गदर्शन शिबिर झाले. त्यात पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले.

मराठा क्रांती मोर्चासाठी लाखो समाजबांधव एकत्र येण्याची शक्यता आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असेल. यासाठी शहर पोलिसांनी चार पोलिस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलिस उपायुक्त, २६ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ९७ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच पोलिस उपनिरीक्षक, ८४६ पोलिस कर्मचारी, तसेच २५२ महिला पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात केला आहे. याव्यतिरिक्त मराठा समाजातर्फे मोठ्या संख्येने स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. हे स्वयंसेवक पोलिसांना मदत करतील. दरम्यान, मराठा समाजाच्या मोर्चाच्या बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी पोलिस आयुक्त सिंघल यांनी मार्गदर्शन केले. बंदोबस्तासाठी तैनात कर्मचारी वा अधिकाऱ्यांनी काय करावे, तसेच काय करू नये, याविषयी आयुक्तांनी सूचना केल्या. मोर्चावर पावसाचे सावट असून, त्याबाबत पोलिसांनी काय खबरदारी घ्यावी हे या वेळी सांगण्यात आले.

आज रंगीत तालीम

मोर्चाचे आयोजन शनिवारी होणार असून, बंदोबस्ताचे नियोजन पारखण्यासाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहर पोलिस रंगीत तालीम घेणार आहेत. मॉक ड्रीलच्या माध्यमातून बंदोबस्तात काय सुधारणा करायला हव्यात, याचाही आढावा घेतला जाईल. मॉक ड्रील संपल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार आहे. मॉक ड्रीलमध्ये समोर आलेल्या त्रुटी व जमेच्या बाजू यावर चर्चा करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा मोर्चातून नाशकात ‘अर्थ क्रांती’

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्यातील इतर शहरांपाठोपाठ नाशिकमध्येही शनिवारी (दि. २४) निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सुमारे २० लाख येणार असल्याचा अंदाज आहे. जिल्हाभरातून जमणाऱ्या या जनसमुदायाच्या अनेक गरजांसाठी लहान व्यवसाय तेजीत आले आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने शहरातील अनेक महत्त्वाचे व्यवसाय शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस तेजीत राहणार आहेत.

हॉटेल्स
तपोवन, जुने नाशिक, सीबीएस, मुंबई नाका तसेच मध्य नाशिकमधील अनेक ठिकाणचे हॉटेल्स मोर्च्यासाठी सज्ज झाले आहेत. मार्चाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांनी जेवणाच्या सोयींसाठी दक्षता घेतली आहे. शहरात येणाऱ्या सर्वांना जेवणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व हॉटेल व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली आहे. छोटे हॉटेल्स तसेच नाश्ता सेंटरचाही यात समावेश आहे.

लॉजिंग
मोर्चासाठी शहरात मोठा जनसमुदाय येणार म्हणजे त्यांच्या लॉजिंगची सोय असणे महत्त्वाचे असणार आहे. पंचवटी तसेच मध्य नाशिकमधील अनेक लॉज शुक्रवारपासूनच बुक करण्यात आले आहेत. तसेच हॉटेल व्यवसायिकांसोबत लॉज मॅनेजर्सदेखील मोर्चासाठी येणाऱ्या लोकांच्या राहण्याच्या सोयीसाठी सज्ज झाले आहेत. शुक्रवारी तसेच शनिवारी शहरातील अनेक लॉज बुक असणार आहेत.

खासगी वाहतूक
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते असणार आहेत. मात्र, शहरात इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी विद्यार्थी किंवा इतरांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे. मोर्चाच्या रस्त्या व्यतिरिक्त भागातून जाण्यासाठी रिक्षा तसेच इतर खासगी वाहनांची मदत नाशिककरांना घ्यावी लागणार आहे. सोबतच बाहेरगावाहून मोर्च्यासाठी येणारे नागरिकांनाही या खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे. यामुळे दोन दिवस खाजगी वाहतुकदारांना जास्तीचे प्रवासी मिळणार आहेत.

पाणी बॉटल्स
मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी मार्गात पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी अनेक मराठा आणि गैरमराठा संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्याम‌ुळे पाणी बॉटल्स तसेच जारची खरेदी करण्यात आली आहे. शहरातील अनेक वॉटर डिस्ट्रिब्युटर्सचा व्यवसाय यामुळे तेजीत झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या पावसाने तारांबळ

0
0

जिल्ह्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

परतीच्या पावसाने गुरुवारी पुन्हा हजेरी लावल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. शहर परिसरात दिवसभर ऊन आणि पावसाचा खेळ सुरू होता. जिल्ह्यातील अनेक भागात तसेच शहर व नाशिकरोडसह अन्य काही भागात जोरदार पाऊस बरसल्याने अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले होते. परतीच्या पावसाने गंगापूर धरणातून पाणी सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

गंगापूर धरणाची पातळी ९३ टक्केवर पोहचली असून, उपयुक्त साठा ५ हजार २२२ घनफुटापर्यंत पोहचला आहे. गंगापूर धरण समुहातील आळंदी धरण अगोदरच १०० टक्के भरले आहे. काश्यपी धरण ९९ टक्केपर्यंत पोहचले आहे तर गौतमी गोदावरी धरणाची पातळी ८९ टक्के आहे. त्यामुळे गंगापूर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात १६४.८ मिमी पाऊस झाला. त्यात सर्वाध‌िक पाऊस हा येवला येथे झाला आहे. सप्टेंबर महिन्यात २२ दिवसात संपूर्ण जिल्ह्यात १८३४ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील धरणाच्या साठ्याची टक्केवारी ८५ टक्केपर्यंत पोहचली आहे. गेल्यावेळेस हाच साठा ४९ टक्के होता त्यात आता ३६ टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मोठे व मध्यम अशा एकूण २४ धरणात आता ५५ हजार ७५८ दशलक्ष घनफूट साठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाथर्डी फाटा : परप्रांतीय तरुणाची हत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पाथर्डी फाटा परिसरातील दामोदरनगर भागात राहणाऱ्या परप्रांतीय तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी मिळालेल्या बॅटने हा खून झाल्‍याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. हा खून कोणी व का केला याबाबत तपास सुरू आहे.

आकाश कुवरप्रताप वर्मा (२८, ट्विंकल अपार्टमेंट, दामोदरनगर, पाथर्डीफाटा, मूळ रा. बिहार) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो अन्य चार मित्रांसमवेत राहत होता. ते सर्व जण एकाच कंपन्यांमध्ये कामाला असून त्यांच्या प्रत्येकाची ड्युटीला जाण्याची वेळ वेगवेगळी आहे. बुधवारी रात्री याच खोलीत राहणारा अविनाश तावडे घरी आला. त्याला खोलीत आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. जवळच एक बॅट पडलेली होती. त्याने तातडीने आजूबाजुच लोकांना बोलावले. तसेच इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी अविनाश तावडेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, खोलीत राहणाऱ्या एका तरुणाशी आकाशचे वारंवार भांडण होत असल्याचे समजते. घटनेनंतर संबंधित तरुण फरार असून पोलिसांनी अन्य मित्रांची चौकशी सुरू केल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त श्रीकांत धिवरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या सुटकेसाठी OBC ची मोर्चा बांधणी

0
0

गिते-खैरेंची बैठक; ३ ऑक्टोबरला करणार आंदोलन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे व कारागृहात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर नाशिकमधील भुजबळ समर्थकांना बळ आले आहे. गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांनी भाजपचे नेते व माजी आमदार वसंत ग‌िते यांच्या समवेत बैठक करून भुजबळांच्या सुटकेसाठी येत्या ३ ऑक्टोबरला काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चासंदर्भात चर्चा केली. भुजबळांवरील कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा असल्याचे सांग‌ितले जात असले तरी, राज्यभर निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चांना प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसींचा संघटन बांधण्याचा प्रयत्न असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यभर मराठा क्रांती मोर्चामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सरकारचीही कसोटी लागली असतानाच अचानक पंकज मुंडे यांनी बुधवारी छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्य सरकारनेच भुजबळांना पूर्ण डॅमेज केल्यानंतर अचानक मुंडेच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या प्रकाराने नाशिकमधील त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून, त्यांनी अचानक भाजपमधील ओबीसींच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. समता परिषदेचे नेते व राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिलीप खैरे यांनी गुरूवारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत ग‌ितेंची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकारकडून भुजबळांवर केल्या जाणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ येत्या ३ ऑक्टोबरला ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात भुजबळांच्या सुटकेसाठी शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. भुजबळांसाठी सर्व पक्षातील ओबीसींना एकत्रित करण्याचा हा प्रयत्न असला तरी, यामागे राज्य सरकारचीच चाल असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.

भाजप नेते संभ्रमात

भाजप सरकारनेच भुजबळांचा भ्रष्टाचार बाहेर काढत, त्यांना सध्या जेलमध्ये पाठविले आहे. असे असतांनाही भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या भेटीपाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची भेट घेऊ लागले आहेत. महामोर्चा काढण्याची तयारी असली तरी यात भाजप नेते सहभागी होतील काय, याबाबत शंका आहे. फडणवीस सरकारनेच त्यांना जेलमध्ये पाठविले असतानाच भाजपचे नेते सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर आल्यास जनतेत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या भूमिककडे आता लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानी संघटनेतर्फे जोडे मारो आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक

भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान आतंकवाद बंद करो, नवाज शरीफ मुर्दाबाद, पाकिस्तानी अतिरेक्यांचा धिक्कार असो' अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेतर्फे काश्मिरमधील उरी येथे अतिरेकी हल्ल्याचा शुक्रवारी निषेध करण्यात आला. यावेळी पाकचा ध्वज व पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करीत निषेध करण्यात आला.

युवा संघटनेचे महानगरप्रमुख नितीन रोठे पाटील यांच्या नेतृत्तवाखाली दुपारी शालिमार चौकात उरी येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तानचा निषेध करीत पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन झाले. यावेळी पुतळासह पाकचा ध्वज जाळण्यात आला. या निषेध आंदोलनात नितीन रोठे पाटील यांच्यासह नीलेश कुसमोडे, प्रफुल वाघ, सलिम शेख, बशीर शेख आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images