Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पालकमंत्रीच दंगलीस कारणीभूत- शिवसेनेचा आरोप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव प्रकरणातील पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पालकमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेने आता भाजपला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी थेट पालकमंत्र्यांनाच या दंगलीप्रकरणी जबाबदार धरले असून, मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू लोकांनी वातावरण बिघडवल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपचे नगरसेवक कंबरेला पिस्तूल बांधून फिरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तळेगाव येथील पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अहवाल येण्यापूर्वीच बलात्कार झाला नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे नाशिकमधील वातावरण अधिक चिघळले होते. महाजन यांच्या या वक्तव्याने नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त करत, अशांततेला खतपाणी मिळाले होते. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्हा सलग पाच दिवस धगधगत होता. त्यातच या दंगली प्रकरणात चिथावणी दिल्याप्रकरणी व पोल‌िसांवरच चाकूहल्ला केल्याप्रकऱणी भाजपचा नगरसेवक पवन पवार यास अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या घरातून शस्त्रेही जप्त करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढून पवन पवारचा प्रवेश चांगलाच अंगलट आला आहे.
शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्या व प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेवून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला. नाशिकचे वातावरण बिघडण्यास पालकमंत्री महाजन यांचे वक्तव्यच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅब‌िनेटमध्ये असलेल्या महाजन यांनीच नाशिक भडकवले असा आरोप करत, अहवाल येण्याआधीच त्यांनी वक्तव्य करून जमावाला अशांत केल्याचा आरोप केला आहे. तसेच पवन पवारच्या प्रवेशासह स्थानिक आमदार बाळासाहेब सानप यांच्यावरही त्यांनी आरोप केले आहेत.
निवडणुकीचा रंग
सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना नेत्यांनीच दंगलीसंदर्भात भाजपवर शरसंधान केल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. आगामी काळात नाशिक महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यात भाजप व सेना आमने-सामने लढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोंबडे-बिरारींत बाचाबाची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

वासननगर येथे उभारण्यात आलेल्या क्रीडा प्रबोधिनीच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वीच या प्रबोधिनीच्या नामकरणावरून स्थानिक नागरिक, शिवसेना पदाधिकारी व मनसेच्या नगरसेवकात वादविवाद होऊन शाब्द‌िक चकमक झाली.
यावेळी स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या नगरसेविका व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रबोधिनीचे लोकार्पण करून घेतले. मात्र, संतप्त झालेल्या मनसे नगरसेवकांनी हा लोकार्पण सोहळा चुकीचा असून, शनिवारीच या प्रबोधिनीचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे जाहीर केले.
वासननगर येथे महानगर पालिकेच्या क्रीडांगणाचे आरक्षण असलेल्या जागेवर क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात आली आहे. या प्रबोधिनीचा लोकार्पण सोहळा आज (दि. १५) रोजी होणार असून ‘शिवराज क्रीडा प्रबोधिनी’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र, या नावाला स्थानिक नागरिक व नगरसेविका वंदना बिरारी यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला निवेदनही दिले होते. मात्र, त्या निवेदनाचा उपयोग न होता क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन शनिवारी होणारच असे लक्षात आल्यावर काही स्थानिक नागरिक तसेच शिवसेनेच्या नगरसेविका वंदना बिरारी, माजी नगरसेवक पुंजाराम गामणे, अमोल जाधव, गणेश जाधव, सुदाम डेमसे, रवींद्र गामणे यांनी ‘स्व. मुरलीधर गामणे क्रीडांगण’ अशा नामकरणाचा फलक लावून या त्याचे उद्घाटन केले. यावेळी नगरसेवक सुदाम कोबडे यांनी या क्रीडांगणावर येऊन या नावास विरोध दर्शविला. हे लोकार्पण चुकीचे होत असून, खरे लोकार्पण शनिवारीच होणार असल्याचे जाहीर केले. वाद वाढत जाऊन अखेरीस या दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शिवसेना नगरसेविका वंदना बिरारी यांनी स्थानिक नागरिकांचा विचार करून त्यांना विश्वासात घेऊनच हे नामकरण झाले पाहिजे अशी मागणी करीत अखेरीस या फलकाचे उद्घाटन केले. मात्र, दोन्ही गटातील वाद वाढत असल्याचे लक्षात येताच इंदिरानगर पोल‌िस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाद मिटविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाक‌ीटमार महिलांची टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर बसमधील प्रवाशांचे तसेच बसस्थानकाच्या आवारातील नागरिकांचे पाकीट मारणाऱ्या अहमदनगर येथील तीन संशयित महिलांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गर्दीचा फायदा घेत त्या पुरुषांच्या खिशातील पाकिटावर आणि महिलांच्या पर्सवर डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे.
सुवर्णा विठ्ठल काळे (वय ३०), माया कल्याण भोसले (वय २५) व प्रतिभा प्रवीण काळे (वय २२ रा. इनामदार वस्ती हातगाव नगर, शेगाव, जि. अ. नगर) अशी त्यांची नावे आहेत. बुलढाणा येथील अमजदखान मुनाफ खान यांनी फिर्याद दिली आहे. खान दाम्पत्य गुरुवारी सायंकाळी जुने सीबीएस येथे बसमध्ये चढत असताना संशय‌ित महिलांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील पर्स
हातोहात लांबविली होती. मात्र, ही घटना पत्नीपाठोपाठ बसमध्ये प्रवेश करणाऱ्या खान यांच्या लक्षात आली. पर्समध्ये मोबाइल, मेकअप कीट, रोकड व कागदपत्र असा सुमारे ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविण्यात आल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून महिलांना ताब्यात घेतले. संशय‌ित महिलांनी प्रवासात व शहरातील विविध बसस्थानक आवारात अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

कॅनडा कॉर्नरला घरफोडी
कॅनडा कॉर्नर परिसरातील रामदास कॉलनी भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद नामदेव धोत्रे (रा. साई निवास, रामदास कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. धोत्रे कुटुंबीय मंगळवारी बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने, रोकड व साड्या असा सुमारे ४६ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.

एकास मारहाण
सामायिक विहीरीच्या जागेवरून महिलेसह दोघांनी एकास जबर चोप दिला. या मारहाणीत तरुण जखमी झाल्याची घटना गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमध्ये घडली. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोरख मधू पाटील (रा. यशवंत निवास, गुलमोहर कॉलनी, ध्रुवनगर ) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास पाटील आपल्या घराजवळ उभे असताना हा प्रकार घडला. तुकाराम शांताराम पाटील, गोविंद शांताराम पाटील व लिलाबाई शांताराम पाटील (रा. गुलमोहर कॉलनी) आदींनी पाटील यांना गाठून सामायिक विह‌िरीच्या जागेवरून वाद घातला. शिवीगाळ करीत त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत त्यांच्या हातापायास गंभीर दुखापत झाली.

तरुणाला लुटले
पायी चाललेल्या तरुणाला बेदम मारहाण करीत त्याला लुटण्यात आल्याची घटना मधुबन कॉलनीत घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी लूटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
संदीप कुमार मौर्य (वय १९, रा. कुमावत नगर, पेठरोड) या तरुणाने तक्रार दिली आहे. तो सोमवारी रात्री आठच्या सुमारास मधुबन कॉलनीतील एका बेकरीसमोरून चालला होता. ५ ते ६ जणांच्या टोळक्याने त्याला अडविले. बेदम मारहाण केली. त्याच्या गळ्यातील सोन्याचे ओमपान हिसकावले. तसेच खिशातील मोबाइल आणि पाकिट असा सुमारे ७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एशियन’चे कामगार वाऱ्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीतील नावाजलेल्या एशियन कंपनीतील कामगारांना कामाअभावी वाऱ्यावर भटकण्याची वेळ आली आहे. त्यातच कामगार उपायुक्तांच्या मध्यस्थीने कंपनी व्यवस्थापनाला कामगारांनी राजीनामे सादर केले होते. परंतु, कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा हिशेब न दिल्याने कामगार उपायुक्तांनी कामगारांना राजीनामे परत केले असल्याचे ‘मटा’ला सांगितले. कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी कामगार उपायुक्त जी. जे. दाभाडे यांच्याकडे केली आहे.
एशियन कंपनी व्यवस्थापनाने मे २०१६मध्ये उत्पादन प्रक्रिया बंद करणार असल्याचे सांगत कामगारांना प्रलंबित पगार व हिशेब देण्याचे मान्य केले होते. यानंतर कामगार युनियन व कामगार उपायुक्त यांच्या मध्यस्थीने कामगारांना उर्वरित पगार व हिशोब देण्यात आला. यावेळी भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा हिशोब ४५ दिवसांच्या आत सादर करणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने कामगार उपायुक्तांना लेखी आश्वासन दिले होते. परंतु, ४५ दिवसांहून अधिक दिवस उलटूनही व्यवस्थापनाने कामगारांचा हिशोबच दिला नसल्याने कामगार उपायुक्त दाभाडे यांनी कामगारांचे लिहून घेतलेले राजीनामे परत केले असल्याचे सांगितले. कामगारांनी एशियन व्यवस्थापनाने हिशेब न दिल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

कंपनीची जागा भाड्याने
एशियन कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे. तर दुसरीकडे कंपनीने मुख्य कंपनीची मागील बाजू ई-स्मार्ट नावाच्या कंपनीला भाडेतत्वार दिली असल्याचे कामगार सांगतात. यात नुकतेच भाजपत प्रवेश केलेल्या एका मोठ्या नेत्याचेच कामगार याठिकाणी काम करत आहेत. तसेच एशियनमधील राजीनामे सादर केलेले ७५ कामगारदेखील याच ठिकाणी कामावर घेतले गेले आहेत. परंतु, त्यांना सरकारच्या कामगार कायद्याचा नियम डावलून काम करून घेतले असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगार उपायुक्तांनी लक्ष द्यावे अशीही मागणी कामगारांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅनो टेक्नॉलॉजीवर रविवारपासून कॉन्फरन्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

‘नॅनो टेक्नॉलॉजी’ या अत्याधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाच्या अद्यावत मांडणीसाठी जिल्ह्यातील चांदवड कॉलेजने पुढाकार घेतला आहे. चांदवड येथील श्री. नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या कर्मवीर आबड, लोढा, जैन कॉलेजमध्ये फिजीक्स विषयांतर्गत रविवारपासून (१६ ऑक्टोबर) दोन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या संशोधन प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. एन. आर. मुनीरत्नम हे उपस्थित उपस्थित राहणार आहेत.

‘नॅनो मटेरिअल इम्पॅरिटीव्ह अॅण्ड न्यू मिलीनिअम’ या विषयावर फिजीक्स या विषयांतर्गत ही नॅशनल कॉन्फरन्स चांदवड कॉलेजमध्ये १६ व १७ ऑक्टोबर या दोन दिवशी पार पडेल. अध्यक्षस्थानी बेबीलाल संचेती असतीले. डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होईल. कोरिया विद्यापीठाचे तंत्रज्ज्ञ डॉ. डी. पी. अमळनेरकर यांचे बीजभाषण होईल. मार्गदर्शक म्हणून भारताच्या संशोधन प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. एन. आर. मुनीरत्नम, डॉ. बी. बी. काळे, डॉ. पी. के. खन्ना, प्राध्यापक एम. विठ्ठल, डॉ. एल. ए. पाटील, डॉ. पी. एस. पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. एस. डी. ढोले, डॉ. रामपाल शर्मा, डॉ. एस. पी. गिरी, डॉ. आर. एस. माने या मान्यवरांचा समावेश असणार आहे.

टेक्नॉलॉजीची प्रात्यक्षिके

अद्यावत तंत्रज्ञान म्हणून जागतिक संशोधकांचे आकर्षणकेंद्र असणाऱ्या नॅनो टेक्नॉलॉजी या विषयावरील सादर होणारी प्रात्यक्षिके हे या कॉन्फरन्सचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. ‘नॅनो मटेरिअरलची निर्मिती’ आणि ‘नॅनो मटेरिअलची उपयुक्तता’ या विषयावर तज्ज्ञाद्वारे प्रात्यक्षिके सादर होतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व संशोधकांना प्राध्यापक डॉ. गणेश पाटील यांच्याशी ९४०३०२१३४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलनिर्मितीतून अपंगांना सलामी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केवळ अभ्यासाचा भाग म्हणून प्रोजेक्टकडे व संबंधित विषयाकडे न बघता त्याचा समाजाला उपयोग व्हावा, या विचारांनी मविप्र संचलित कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन सेंटर आर्किटेक्टच्या मोह‌ित हेडा या विद्यार्थ्याने अपंग व विशेषतः पोलिओ बाधितांसाठी तीनचाकी सायकल तयार केली आहे. अपंगांना निश्चित स्थळी कोणत्याही कष्टाशिवाय व सुरक्षितरित्या पोहोचता यावे, या उद्देशाने त्याने हा प्रोजेक्ट तयार केला आहे. ही सायकल पूर्णतः स्वयंचलित आहे, हे प्रोजेक्टचे वैशिष्ट्य आहे.

केंद्र सरकारमार्फत अपंगांच्या सक्षमीकरणासाठी सुगम्य भारत अभियान राबविले जात आहे. यामध्ये तरुणांचा सहभाग देखील सरकारला अपेक्षित आहे. यानुसार हा प्रोजेक्ट महत्त्वाचा ठरत असून, तो अपंग व्यक्तीलाच दान करण्याचा निर्णय मोहितने घेतला आहे. अपंग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रवास करणे त्यांना अधिक खडतर जात असते. यावर उपाय म्हणून हा प्रोजेक्ट साकारण्यात आला आहे.

या प्रोजेक्टसाठी त्याला ३० ते ३२ हजार रुपये खर्च आला आहे. यामधील काही त्रुटी दूर करून तो याचे पेटंट करणार आहे. मोठ्या स्तरावर या प्रोजेक्टची निर्मिती केल्यास २० हजार रुपये प्रति प्रोजेक्टपर्यंत तो देता येईल, असे त्यानी सांगितले. या प्रोजेक्टसाठी त्याला अतुल केडिआ, रोहण पटवा, विभागप्रमुख सुवर्णा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पोलिओबाधित असलेले सुकडू कोळी यांना ही सायकल दान करण्यात येणार आहे.



अशी आहे सायकल

ही सायकल बॅटरीवर असून, चार्ज करावी लागते. पाच तासात बॅटरी चार्ज होते. एकदा बॅटरी चार्ज केली तर २५ ते ३० किमीपर्यंत ही सायकल चालू शकते. त्याबरोबरच सोलर सिस्टीम बसविता येईल, अशी व्यवस्थाही यात करण्यात आली आहे. ही सायकल चालविण्यास अत्यंत सोपी असून, अपंग व्यक्ती कोणतीही हालचाल न करता ही सायकल चालवू शकतो. कोणत्याही वातावरणात चालू शकणारी, अॅडजस्टेबल सिट, हेडलाईट, इंडिकेटर, सीट बेल्ट, लगेज बॉक्स अशा सुविधाही यात आहेत. तसेच पुढील काळात सायकलमध्ये मोबिलिटी डिव्हाईस विकसित करण्यात येणार आहे. जेणे करून या व्यक्तींना आपत्कालीन काळात मदतीसाठी प्रयत्न करता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्याची हागणदारीमुक्तीसाठी निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारीमुक्त स्वच्छ शहर म्हणून नाशिक विभागातून सटाणा नगरपरिषदेची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सटाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण, आमदार दीप‌िका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथील नॅशनल सेंटर अपॉर मध्ये आयोजित या कार्यक्रमास गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, पालिका संचालनायाचे आयुक्त वीरेद्रसिंग उपस्थित होते. सटाणा नगरपरिषदेने हागणदारीमुक्त शहर होण्यासाठी विशेष योजना राबवून शहरवासियांचे प्रबोधन केले होते. पोलिकेने नागरीकांना या अभियानातंर्गत स्वच्छतेची सप्तपदी समजावून सांगितली. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, पाणी व प्रकाश व्यवस्था करून शौचालये वापरण्यायोग्य करण्यात आलीत. शहरातील मालमत्ताधारकांकडे शौचालय नसल्यास रोख १८ हजार अनुदान देऊन लोकसहभागातून शौचालये बांधण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने प्रोत्साहन देण्यात आले होते. दीड वर्षात तीन वेळेस शौचालये उभारणीच्या कामाची शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्यावतीने पाहणी करण्यात आली होती. या सर्व कामांची दखल घेत शासनाने नाशिक विभागातून सटाणा नगर पालिकेची हागणदारीमुक्त स्वच्छ शहर म्हणून निवड केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षांमधील मराठी टक्का वाढणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. हे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रतिवर्षी विविध पदांसाठी अनेक परीक्षा घेतल्या जातात. सनदी परीक्षांमध्ये राज्याचे प्रतिनिधीत्त्व वाढावे, या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी एक समिती गठ‌ित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार मुलांमध्ये न्यूनगंड, परीक्षेची काठीण्यपातळी, माध्यमांबाबत असणारा गैरसमज, परीक्षेतील यशप्राप्तीनंतर उपलब्ध संधींच्या माहितीचा अभाव अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षांबाबत जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे ठरेल, या विचाराने हा उपक्रम येत्या काळात राबविण्यात येणार आहे. विशेषतः माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांमधील विद्यार्थ्यांना शाळेतच याअंतर्गत मार्गदर्शन केले जाणार आहे.

अशी होणार प्रक्रिया

केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरुन व स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधून ही माहिती माध्यमिक शिक्षण विभागांनी संकलित करायची आहे. यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे मार्गदर्शन या विभागाला घेता येणार आहे. ही माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या असणार उपाययोजना

दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी निकालानंतर जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिऱ्यांच्या पुढाकाराने दोन दिवसाचे शिबिर राबविण्यात येणार आहे. यामध्ये करीअर मार्गदर्शन केंद्राच्या प्रमुखांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करावे, या परीक्षांविषयी जागरुकता निर्माण करावी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करावे आदी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यात विशेषतः ग्राणीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकच्या डीपीवर दोनशे हरकती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकच्या प्रस्तावीत विकास आराखड्याबाबत दोनशे पेक्षा अधिक हरकती आल्या आहेत. सर्वाधिक हरकती या रस्ता रंदीकरणाबाबत आल्या आहेत. शुक्रवारी हरकती सूचनांची अंत‌िम मुदत होती. दरम्यान भाजपाचे शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र यांनी हरकती सूचनांसाठी मुदतवाढ मिळावी असा अर्ज दिला आहे.

शुक्रवारी हरकतींसाठी अखेरीच मुदत होती. मात्र शहर आणि परिसरात तळेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर अशांत वातावरण निर्माण झाले असल्याने ग्रामस्थांना हरकती घेण्यासाठी असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे माहिती घेणे याबाबत अडचणी आलेल्या आहेत. त्याकरिता मुदत वाढ मिळावी असा अर्ज गंगापुत्र यांनी दिला आहे. दरम्यान येथे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी हा अर्ज स्वीकारला व नगरविकास विभागाकडे देण्यात येणार असल्याचे सांग‌ितले.

त्र्यंबक नगरपाल‌िकेत शुक्रवारी मतदार नोंदणी अभियानाचा आणि डीपी हरकतींचा अखेरचा दिवस असल्याने ग्रामस्थांची गर्दी झाली होती. सायंकाळी कार्यालयाची वेळ संपत आली तरीही हरकती येत होत्या.

शेवटी छापील हरकत नमुन्यात माहिती भरून देण्यात येत होत्या. सर्वाधिक हरकती या रस्ता रंदीकरणाबाबत आल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर शहर भाजप, ग्राहक पंचायत, आखाडा परिषद आदि संस्थांनी नागरिकांच्या गटांनी आणि नगरसेवकांनीदेखील या डीपीवर हरकती नोंदविल्या आहेत. महिन्या भराच्या मुदतीत वेळेत कागदपत्र न मिळणे, पुरेशी माह‌िती न मिळणे, शासकीय सुट्या, शेवटच्या आठवड्यातील तणावग्रस्त परिस्थिती यामुळे हरकती घेतांना ग्रामस्थांची दमछाक झाली आहे.प्रशासनाने नागरिकांना नाहक तिकीटचा भुर्दंड दिल्याचे स्पष्ट केले आहे.

डीपीवर हरकती आल्या आहेत. त्यांचा विचार होईलच. अर्थात हा प्रारूप विकास आराखडा अधिक रहिवासी क्षेत्र उपलब्ध करणारा असल्याने प्लॉटचे भाव खऱ्या अर्थाने जम‌िनीवर आणणारा आहे. यामध्ये विकासाला अधिक चालना मिळेल. सर्वसामान्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध होईल.

- संतोष कदम,

उपनगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये सात ग्रुप अॅडमिन अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव अंजनेरी येथील घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व्हॉट्सअॅपवरील सात ग्रुप अॅडमिनसह आठ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातील सर्व ग्रुप अॅडमिनना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर केल्याबाबत पोलिसांनी गेल्या पाच ‌दिवसांत ही कारवाई केली आहे. अत्याचाराची घटना ज्या तळेगाव अंजनेरीत घडली तेथील एका ग्रुप अॅडमिनचा यात समावेश असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल उपस्थित होते.

सोशल मीडियाच्या गैरवापरप्रकरणी अंबड पोलिसांनी सर्वाधिक चार जणांना, गंगापूर पोलिसांनी दोघांना, तर सातपूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हे सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन असल्याची माहिती या वेळी पोलिसांनी दिली. दोन समाजांत तेढ निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणे, तसेच दंगा भडकविण्यास कारणीभूत ठरल्याचे व सायबर अॅक्टअंतर्गतचे गुन्हे या सर्व आठ जणांवर दाखल करण्यात आले आहेत. अनेकांनी मेसेज, तसेच फोटोंची खात्री न करता ते पुढील व्यक्तींना पाठवून दिले. त्यामुळे अशा व्यक्तींनाही पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात येऊन समज देण्यात येणार आहे. फेसबुकचाही या काळात गैरवापर करण्यात आला असून, एक गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांनी दिली. मोबाइल इंटरनेटवर शनिवारी दुपारी एकपर्यंत बंदी असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

५३ गुन्हे; ११८ संशयितांना अटक

गेल्या रविवारपासून जिल्ह्यात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शहर व ग्रामीण पोलिसांनी एकूण ५३ गुन्हे दाखल केले असून, ११८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निष्पक्षपातीपणे हे प्रकरण हाताळत असून, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, अशी ग्वाही पोलिस आयुक्त डॉ. सिंघल आणि विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांनी दिली.

अॅट्रॉसिटीचे सात गुन्हे दाखल

तळेगाव अंजनेरी येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे शहरासह जिल्ह्यात जोरदार पडसाद उमटले. ही सर्व परिस्थिती हाताळताना ग्रामीण पोलिसांनी सर्वाधिक २७ गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी २३ प्रकरणांमध्ये ८२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सहा गुन्हे जातिवाचक शिवीगाळीचे आहेत, तर उर्वरित गुन्हे दंगल, सरकारी कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन अशा स्वरूपाचे आहेत.

दंगलीचे व्हिडीओ शूटिंगही!

दंगलसदृश परिस्थितीत शहरात पाच लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोंधळाची, तसेच दंगलसदृश परिस्थिती जेथे जेथे निर्माण झाली त्या ठिकाणचे व्हिडीओ शूटिंग पोलिसांनी केले आहे. त्यावरून संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, संबंधितांवर कारवाई केली जात असल्याची माहिती डॉ. सिंघल यांनी दिली.

दोन अधिकारी रडारवर

शहरात निर्माण झालेली दंगलसदृश परिस्थिती हाताळताना दोन पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद राहिल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. तणाव निवळला की याबाबतची चौकशी केली जाणार आहे. पक्षपातीपणे कारवाया करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सिंगल यांनी दिली आहे.

सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर आम्ही गुन्हे दाखल करीत आहोत. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या जात असतील तर नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी.

- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त


जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्राप्त सूचनांचीदेखील आम्ही निश्चितपणे दखल घेऊ.

- विनयकुमार चौबे, विशेष पोलिस महानिरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबडला मिळावा कायमस्वरूपी तलाठी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड गावात असलेल्या तलाठी कार्यालयात नेहमीच तलाठी उपलब्ध राहत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. परंतु नेमणूक करण्यात आलेले तलाठी गुंढे यांना तीन ठिकाणांचे अतिरिक्त भार सांभाळत काम करावे लागत आहे. यासाठी महसूल विभागाने अंबड गावाला कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नाशिक शहराचा विकास गेल्या काही वर्षांत झपाट्याने झाला आहे. यामुळे शहराला लागून असलेल्या २२ खेड्यांच्या भागातही नागरी वस्ती झपाट्याने वाढली आहे. परंतु यात अनेक गावांमध्ये सातबारा घेण्यासाठी नागरिक गेल्यानंतर तलाठीच उपस्थित राहत नसल्याचे समोर आले आहे. अंबड गावातही नेमणूक करण्यात आलेले तलाठी गुंडे यांच्या प्रभारी तलाठी म्हणून अतिरिक्त भार देण्यात आला आहे.

त्यातच सरकारच्या निवडणुकीचे कामकाजदेखील त्यांनाच पहावे लागत असल्याने पूर्णवेळ तलाठी कार्यालयात त्यांना देणे शक्य होत नाही. यामुळे अनेकदा कामांसाठी येत असलेल्या नागरिकांना खाली हात परतण्याची वेळ येते. अंबड गावात वाढलेली लोकवस्ती पहाता सातबारा उतार घेण्यासाठी नेहमीच तलाठी कार्यालयात गर्दी होत असते. मात्र तलाठी उपस्थित होत नसल्याने त्यांना ताटकळत उभे राहण्याची वेळ येते. यासाठी महसूल विभागाने तत्काळ कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अंबड गावालगत नवीन घरे घेणाऱ्या नागरिकांना लोन घेण्यासाठी नव्याने सातबारा लागत असतो. तो घेण्यासाठी अंबड गावातील तलाठी कार्यालयात अनेकदा चकरा मारल्यानंतर सातबारा मिळतो. यासाठी कायमस्वरूपी तलाठी द्यावा.

साहेबराव दातीर, ग्रामस्थ अंबडगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रासबिहारी’त विद्यार्थ्यांनी साकारले विज्ञानाविष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डोअर अलार्म, प्लाझमा बॉल, व्हॅक्युम क्लिनर, नॅचरल सोप, रोबोनिट्स, मायक्रो फोन, रेन वॉटर हार्वेस्ट, प्रोजेक्टर, सेल द युनिट ऑफ लाइफ अशा तीस वेगवेगळ्या प्रयोगांनी विज्ञानाविष्काराची ओळख करून दिली. निमित्त होते, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे. सिटी सेंटर मॉलमधील ग्रॅण्ड बॉलरुम हॉल येथे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे शनिवारी उद‌्घाटन करण्यात आले.

विद्यार्थ्यांची वैज्ञानिक विषयांप्रती गोडी वाढावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. रविवारी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात रासबिहारी शाळेच्या नववीच्या विद्यार्थिनी कोमल थेटे व सुबोधी कांबळे यांनी तयार केलेली डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारीत चित्रफित दाखविण्यात आली. शाळेच्या इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले ३० प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले आहेत. हायड्रोलिक पंप, क्रिस्टलिझशन, हायड्रो पॉनिकस, इलेक्ट्रोमॅग्नाटिक क्रेन, सिक्युरिटी सिस्टीम, होवेरबोर्ड, अमोनिया फाऊंटन, रोटर व्हील अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचा त्यात समावेश आहे. केटीएचएम कॉलेजच्या प्राध्यापिका सुजाता मगदूम या विज्ञान प्रयोगांचे परीक्षण करणार आहेत. रविवारी निकाल जाहीर होणार असून उत्कृष्ट प्रकल्पासाठी २ पारितोषिके दिले जाणार आहे.

आमदार प्रा. फरांदे म्हणाल्या की, आजकालच्या दैनंदिन जीवनात विज्ञानाशी जोडलेले रहावे लागते. विज्ञान हे मानवाच्या जीवनातील अविभ्याज्य भाग आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. यासाठी परीक्षेतील गुण महत्त्वाचे नसतात तर पाठ्य पुस्तकांव्यतिरिक्त वाचन आणि व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे आहे. शाळेच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका नमिता दास, मुख्याध्यापिका बिंदू विजयकुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. डी. सिंह यांचे या प्रदर्शनास मार्गदर्शन लाभते आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा कदम आणि कोमल थेटे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन के डी सिंह यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या हॉकीपटूंना प्रशिक्षण देण्यास तयार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

नाशिक महापालिकेने सहकार्य केल्यास महिन्यातून एक आठवडा खास नाशिकच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी निश्चित येण्याचा प्रयत्न करीन. कारण नाशिकमध्ये कविता राऊतसारख्या खेळाडू बघावयास मिळत असल्याने अजूनही चांगले खेळाडू येथून तयार करण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनी केले.

पाथर्डी फाटा येथील शिवराज क्रीडा प्रबोधिनीच्या उद्‌घाटनप्रसंगी पिल्ले बोलत होते. या वेळी महापौर अशोक मुर्तडक, नगरसेवक सुदाम कोंबडे उपस्थित होते. वासननगर येथील गामणे मळा परिसरात ही क्रीडा प्रबोधिनी महापालिकेतर्फे साकारण्यात आली आहे. या प्रबोधिनीच्या नावावरून शुक्रवारीच दोन्ही नगरसेवकांमध्ये वादविवाद झाला होता. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पिल्ले यांनी प्रबोधिनीचे उद्‌घाटन केले. या वेळी त्यांनी सांगितले, की भारतात काही खेळांना महत्त्व दिले जात नसून, सर्वांनी बीसीसीआयचा आदर्श घेणे गरजेचे आहे. त्यांनी क्रिकेटसाठी घेतलेले परिश्रम लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवाजी पार्कच्या मैदानावर खेळून सचिन तेंडुलकर मोठा झाला. अशाच प्रकारे सद्यःस्थितीत टेनिस, कबड्डी, धावणे अशा विविध खेळांमध्ये विध्यार्थी लक्ष देऊ लागले आहेत. नाशिकमध्ये एक स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी निर्माण झाली असून, त्याकडे महापालिकेने लक्ष दिले पाहिजे. नाशिकमध्ये चांगले खेळाडू आहेत; पण प्रशासनाने त्यांना सहकार्य केल्यास नाशिकचा लौकिक निश्चितच वाढेल.

या वेळी महापौर मुर्तडक व नगरसेवक कोंबडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रकाश कोल्हे, मनोज पिंगळे, भगवान दोंदे, मोहन मोरे, त्र्यंबक कोंबडे, तानाजी गवळी, रमेश जगताप, अनिल दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कधी मिळणार नवीन घंटागाड्या?

$
0
0

सातपूर परिसरातील नागरिकांचा सवाल; गाडीचालकही हैराण

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत अति महत्त्वाच्या सेवा देणाऱ्या घंटागाड्यांची दयनीय अवस्था झाली आहे. महापालिकेने नवीन ठेकेदाराचीही नेमणूक केलेली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तरीही नवीन घंटागाड्या कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच नादुरूस्त असलेल्या घंटागाड्यांनी चालकदेखील मेटाकुटीस आले आहेत. अतिरिक्त लावण्यात आलेल्या घंटागाड्यांचीदेखील फारशी काही चांगली परिस्थिती नसल्याने महापालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

शहरातील घरोघरी जाऊन घाण-कचरा गोळा करण्याचे काम घंटागाड्यांमार्फत केले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून घंटागाड्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यांची प्रशासनाकडून दुरूस्तीच होत नसल्याने चालकदेखील हैराण झाले आहेत. महापालिकेने नुकताच घंटागाडीचा ठेका दिला असल्याचे जाहीर केले. परंतु नवीन घंटागाड्या कधी येणार, असा सवाल उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत असलेल्या घंटागाड्यांना ‘चल यार धक्का मार’ अशीच परिस्थिती पहायला मिळते. त्यातच अतिरिक्त चालविण्यात येत असलेल्या घंटागाड्या देखील विना छप्परच्या असल्याने पाहिजे तेवढया प्रमाणात कचरा गाड्यांमध्ये घेता येत नाही. छप्पर नसल्याने रस्त्यावरून जातांना कचरा रस्त्यावर पडण्याचे देखील प्रकार घडत असतात. यासाठी महापालिकेने तत्काळ ठेकेदाराकडून नवीन घंटागाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे.

कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

घंटागाड्यांची दुरवस्था असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. घंटागाडीवर काम करणारे कर्मचाऱ्यांना मास्क, गमबूट अथवा सुरक्षेची कुठलीच साधने दिली जात नाही. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. एकीकडे किमान वेतनासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांची युनियन कामगार उपायुक्तांकडे मागण्या मांडत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्यात यावेत, अशीही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांचेच आरोग्य गेल्या काही वर्षांपासून धोक्यात आले आहे. महापालिकेने स्मार्ट सिटीचे स्वप्न पहाताना परिसरासाठी तातडीने नवीन घंडागाड्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

-योगेश आहेर, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर पुन्हा ऑनलाइन

$
0
0

मोबाइल इंटरनेट सुरू; सोशल मीडियाचा जपून करा वापर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाच दिवसांनंतर शनिवारी शहरासह जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या सात ते आठ जणांविरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, सोशल मीडियावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी सामाजिक मर्यादांचे भान ठेवावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आंदोलनाला हिंसक रूप मिळाल्याने दोन समाजात तेढ निर्माण झाला. हा गोंधळ वाढविण्यास सोशल मीडियाने हातभार लावला. पोलिसांनी अशा संशयित आरोपींची शोधमोहीम राबवली. तसेच तपासाअंती भडक पोस्ट करणाऱ्या सात ते आठ संशयितांविरोधात अंबड, सातपूर, गंगापूर पोलिस स्टेशन, ग्रामीण पोलिस हद्दीतील त्र्यंबकेश्वर, वाडीवऱ्हे आदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. नऊ ऑक्टोबर रोजी हिंसक आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे गृह विभागाने नाशिक शहरासह ग्रामीण भागातील मोबाइल इंटरनेट सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांसाठी घेतलेल्या निर्णयात परिस्थितीनुसार वाढ करण्यात आली. शुक्रवारी शहर पूर्वपदावर आले. ग्रामीण भागातील त्या गावांमधील संचारबंदी मागे घेण्याचा निर्णय झाला. तसेच ग्रामीण भागात दैनंदिन कामकाज सुरू झाले. या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय झाला. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोबाइलच्या मेसेज टोन पुन्हा खणखणू लागले. जवळपास सहा दिवस इंटरनेट सेवा बंद असल्याने या दरम्यान सोशल मीडियावर पाठविण्यात आलेले मॅसेज डिलेव्हर होण्यास सुरू झाली. यात अगदी रविवारपासूनच्या संदेशाचा समावेश होता. पैकी काही संदेश जर आक्षेपार्ह असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. यामुळे मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. पोलिसांनी याबाबत सक्त भूमिका घेतली असून, जुने वादग्रस्त मेसेज फॉरवर्ड करण्याचे टाळावे. तसे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

- रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजूनही सात गावांत संचारबंदी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विल्होळी पाठोपाठ शनिवारी इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथील संचारबंदी मागे घेण्यात आली. मात्र तणावपूर्ण परिस्थितीमुळे अन्य सात गावांमध्ये रविवारी सकाळपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

तळेगाव अंजनेरी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर इगतपुरी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्ह्यातील नऊ गावांमध्ये बुधवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. सुरुवातीला ४८ तासांसाठी म्हणजेच शुक्रवारी दुपारपर्यंत संचारबंदी लागू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र संवेदनशील गावांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असल्याने ग्रामीण पोलिसांच्या विनंतीनुसार संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आला. शुक्रवारी दुपारनंतर विल्होळी येथील तणाव निवळला. त्यामुळे तेथील संचारबंदी मागे घेण्यात आली. मात्र उर्वरित आठ गावांमध्ये ती कायम ठेवण्यात आली. शनिवारी दुपारी एकनंतर या गावांमधील संचारबंदी मागे घेतली जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली होती.

मात्र शनिवारी केवळ शेवगेडांग येथील संचारबंदी मागे घेण्यात आली असून, उर्वरित गावांमध्ये ती काहीशी शिथिल करण्यात आली होती. परंतु, सायंकाळी सहापासून पुन्हा १२ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी सकाळी सहापर्यंत वाडीवऱ्हे, तळेगाव, तळवाडे, महिरावणी, सांझेगाव, गोंदे आणि अंजनेरी येथे संचारबंदी कायम राहणार आहे. त्यानंतर परिस्थितीनुरूप संचारबंदी सुरू ठेवावी, की मागे घ्यावी याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरच अॅट्रॉसिटीत दुरुस्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अॅट्रॉसिटी कायदा हा कुणावर अन्याय करण्यासाठी नसून, दलितांना न्याय देण्यासाठी आहे. दलितांवर अत्याचार झालाच नाही, तर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची वेळच येणार नाही. या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल सुचवले तर निर्णय घेतला जाईल असे सांगत दुरुस्तीबाबत सकारात्मक असल्याची तयारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दर्शवली आहे. या कायद्यातील दुरुस्तीबाबत सूचनांचा निश्चितपणे अभ्यास केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तळेगाव येथील घटनेनंतर उद्‍भवलेल्या स्थितीसंदर्भात आठवले यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल करणार नाही, अशी भूमिका मांडणाऱ्या आठवलेंनी यू टर्न घेत कायद्याच्या गैरवापराबाबत दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली. अॅट्रॉसिटी कायद्याचा चुकीचा वापर करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. कोपर्डीच्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चातून अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी झाली आहे. कोपर्डी तसेच नाशिकमधील नराधम आरोपींची जात पुढे आणली जात आहे. मात्र अशा नराधमांना जात नसते, असे सांगून तळेगावच्या घटनेबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. या घटनांमधून मराठा आणि दलितांमध्ये दरी वाढविण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते रोखले पाहिजे. कायद्याचा गैरवापर होऊ नये या मताशी मी सहमत आहे. मात्र ज्यांना वाटते की या कायद्याचा गैरवापर होत आहे, त्यांनी दलितांवर अन्यायच करू नये, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.

शांतता राखा

तळेगाव येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणात आरोपी दलित समाजाचा असला तरी आरोपीला जात नसते, असे सांगत समाजाचा किंवा आरपीआयचा त्याला पाठिंबा नाही. दलित आणि मराठा समाजाने सलोख्याचे संबंध कायम राहण्यासाठी शांतता पाळण्याचे आवाहन आठवले यांनी केले. मराठा आणि दलित समाजात संघर्ष निर्माण होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. या दोन समाजात संघर्ष पेटला, तर राज्याला विकासाला खीळ बसेल. कोपर्डी घटनेनंतर अशा प्रकारचे दंगे राज्यात कोठेही झाले नाही. परंतु, नाशिकमध्ये दोन समाजात अशा प्रकारे तेढ निर्माण होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले. आठवले यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच दंगलीतील जखमींचीही भेट घेऊन विचारपूस केली.

क्रांती नव्हे, शांती मोर्चा

रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगून राज्यभर निघत असलेल्या मोर्चांचे कौतुक केले. मराठा समाजाचे मोर्चे हे क्रांती मोर्चा असले तरी त्यांना मराठा शांती मोर्चा असे म्हणायला हवे. मराठा मोर्चांना आमचा विरोध नसून, या मोर्चांविरोधात प्रतिमोर्चे आम्ही काढलेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. घटनेत ७५ टक्के आरक्षणाची दुरुस्ती करून मराठा समाजाला त्यात १६ टक्के आरक्षण मिळायला हवे असे सांगत, आरक्षणातून मराठा-दलित वाद कमी होईल, असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोजागिरीच्या चंद्रप्रकाशात आनंदाची लयलूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरात दुधास वाढलेल्या मागणीच्या परिणामी या दिवशी विक्रेत्यांनी रोजच्या तुलनेत सुमारे तीनपटींनी अधिक दूध विकले. या दिवशी वाढत्या मागणीमुळे रोजच्या तुलनेत दरामध्ये सुमारे २० टक्के इतकी तात्पुरती वाढ करण्यात आली. शनिवारी रात्री कोजागिरीच्या चंद्र प्रकाशात नाशिककरांनी आप्तेष्टांसोबत दुग्धपान करीत आनंदाची लयलूट केली.

दसरा संपल्यानंतर नागरिकांना वेध लागले होते ते कोजागिरी पौर्णिमेच्या सेलिब्रेशनचे. यातच यंदा कोजागिरीस शनिवार आल्याने अनेकांनी जागरणाचे नियोजन केले. यानुसार शहरातील अनेक मित्रमंडळे, विविध कार्यालयांमधील सहकारी, कॉलेजियन्स, महिलांचे ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप आणि विविध निवासी सोसायट्यांमध्ये जागरण आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शुक्रवारपासूनच दूधबाजारासह शहरातील डेअरी चालकांकडे दुधाची मागणी वाढली होती. बाजारपेठेच्या अपेक्षित मागणीचा अंदाज असल्याने अनेक दूधविक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरुपात दुधाचा साठाही वाढविला होता. यानुसार नेहमी शहरात सुमारे ४५ ते ५५ रुपये लिटर या भावाने विकले जाणारे म्हशीचे दूध शनिवारी ८० रुपये लिटरने विकले गेले. गायीच्या दुधासही सुमारे ५५ ते ६० रुपये प्रति लिटर असा भाव मिळाला. रोजच्या विक्रीपेक्षा सुमारे तीनपट अधिक प्रमाणात दूध विकले गेल्याची माहिती दूधविक्रेत्यांनी दिली.

दुधाच्या उत्पादनात यंदा वाढ

गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेत दुधाची उपलब्धता मुबलक प्रमाणात होती. गेल्या वर्षी जिल्ह्यानेही दुष्काळाचा सामना केला होता. हजारो रुपये खर्चूनही चाऱ्याची उपलब्धता नव्हती. याचा परिणाम दुग्ध उत्पादनावरही झाला होता. यंदा मात्र चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र हिरवळ आहे. जनावरांना चाराही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी जिल्हाभरातूनही कोजागिरीच्या निमित्ताने शहरात दुधाची आवक वाढली होती. दूध विक्रेत्यांनीही प्रासंगिक मागणीमुळे अगोदपासूनच साठ्यात वाढ केल्याने ग्राहकांची निराशा टळली.

कोजागिरीच्या निमित्ताने दोन दिवसांपासून दुधाच्या मागणीत विशेष वाढ झाली. रोज सुमारे ७०० लिटर दूध विकले जाते, तेथे १२०० लिटर दुधाचा पुरवठा करावा लागला. वाढत्या मागणीच्या परिणामी रोजपेक्षा अधिक चांगला भाव दुधाला मिळाला.

- महेश कल्याणकर, दूध विक्रेते, दूधबाजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेचा सर्व्हे जोरात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकला विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी निमा या औद्योगिक संघटनेने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ऑनलाइन सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत हजारो जणांनी यात सहभाग घेतला आहे.

नाशिकच्या विमानसेवेला घरघर लागली आहे. अनेकदा प्रयत्न करूनही त्यास यश मिळालेले नाही. विविध प्रकारच्या अडथळ्यांची मालिका अद्यापही सुरूच आहे. आता निमा या संघटनेने विमानसेवेचे सर्व्हेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन हे सर्व्हेक्षण केले जात आहे. नाशिकमधून किती प्रवासी विमानाने प्रवास करतात, कुठे जातात, परतीचा प्रवासही करतात की केवळ एकाच बाजूने विमानाने जातात, वर्षभरातून किती वेळा विमान प्रवास केला जातो, अशा विविध प्रकारच्या प्रश्नांवर आधारित हे सर्व्हेक्षण आहे. आतापर्यंत हजारो जणांनी या सर्व्हेक्षणात सहभाग घेतल्याची माहिती निमाचे मनिष रावल यांनी दिली. वर्षाकाठी किती जण परतीच्या प्रवासाची तिकिटे बुक करतात, हे सुद्धा सर्व्हेक्षणातून निदर्शनास येत आहे. ओझरहून सेवा सुरू झाल्यास त्याचा नक्की फायदा होईल, असा विश्वास या सर्व्हेक्षणाद्वारे व्यक्त केला जात आहे. सर्व्हेक्षणाचे विमानसेवा सुरू करणाऱ्या कंपनीबरोबर निष्ठा कार्यक्रम राबविला जाणार आहे. याद्वारे विमानाची तिकिटे खरेदी करणे, आवश्यक तो प्रतिसाद देणे याचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववसाहतींना मूलभूत समस्यांचे ग्रहण

$
0
0

कपालेश्वर नगर, कृषी कॉलेजजवळील परिस्थिती

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

परिसरातील कपालेश्वर नगर, के. के. वाघ कृषी कॉलेजसमोरील कॉलनी या नववसाहती मध्ये रस्ते, वीज, पाणी या मूलभूत समस्यांचे ग्रहण लागले आहे. या मूलभूत या समस्यांसह नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

या वसाहतींमध्ये अद्यापही कच्चे रस्ते असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. शिवाय परिसरातील पथदीपदेखील अनेक दिवसांपासून बंदच आहेत. त्याची दुरुस्तीही मनपा प्रशासनाकडून केली जात नाही. त्यासोबतच या परिसरात घंटागाडीचीही दैना आहे. याबाबत वेळोवेळी सांगूनही ती वेळेवर येत नाही. त्यामुळे नागरिक कचऱ्याची विल्हेवाट आजूबाजूच्या परिसरात करतात परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या साचलेल्या कचऱ्याने परिसरात डासांचे प्रमाणदेखील वाढत आहे.

परिसरात कॉलेजांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थी या परिसरात राहतात. पण मुलांना खेळण्यासाठी उद्यान, क्रीडांगण नाही. त्यांच्यासाठी परिसरात अभ्यासिका, वाचनालय अपेक्षित आहे. पण प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. या नवीन वसाहतींना अजून नगरसेवकांचे दर्शनच दुर्लभ आहे, त्यामुळे त्वरित या सर्व समस्यांची दखल घेऊन उपाययोजना करण्यात यावी.

रस्त्यावरील मुरूम वाहून गेल्याने खड्डे पडले आहेत. शिवाय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालय, क्रीडांगण, उद्यान कधी होणार. मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही.

-सचिन खैरे, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images