Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्हाभरात आचारसंहिता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता जिल्हाभर लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्या, गाफील राहू नका, असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत. सणासुदीच्या निमित्ताने उमेदवार कुठल्या ना कुठल्या प्रकारे मतदारांना प्रलोभने दाखवितात. मात्र त्यावर होणारा खर्चही निवडणुकीच्या खर्चात मोजला जाईल, असे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजला असून, रविवारी २७ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमधील १३२ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणुकीचा कालबध्द कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नाशिक जिल्ह्यात भगूर, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड आणि सटाणा या सहा नगरपालिकांमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एका जिल्ह्यात चारहून अधिक नगरपालिकांमध्ये निवडणूक होत

असल्याने आयोगाच्या निर्देशानुसार पूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिली. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. ही निवडणूक तसेच आयोगाचे निर्देश गांभीर्याने घ्या, अंमलबजावणीचे काटेकोरपणे पालन होईल याची काळजी घ्या, असे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निवडणूक प्रक्रिया अन त्या अनुषंगाने येणाऱ्या आचारसंहितेबाबत माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे आदी उपस्थित होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ही आचारसंहिता असणार आहे. महापालिका क्षेत्रासह ती संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.

तपासणीसाठी पथक

आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होतेय की नाही हे तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे फ्लाईंग स्कॉड, व्हीजिलन्स स्कॉड, अकाउंटिंग टीम कार्यरत राहणार आहे. झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

अशी असेल आदर्श आचारसंहिता
सभेच्या ठिकाणांचे सर्व पक्षांना समन्यायी पध्दतीने वाटप, प्रचारकाळात हेलिकॉप्टरचा वापर झाल्यास उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समावेश, झेंडे, खुर्च्या, व्यासपीठाचा खर्चही लावण्यात येणार, प्रसिध्दी पत्रकांवर छापील पत्रकांची संख्या आणि मुद्रकाचे नाव बंधनकारक, मुद्रकाचे नाव नसल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई, प्रचारासाठी तीन वाहने वापरण्यास परवानगी, बल्क मेसेजेसचा खर्चही मोजला जाणार, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्यास कारवाई, मंदिर व तत्सम धार्मिक स्थळांवर सभा घेण्यास मज्जाव, परीक्षाकाळात शाळा, महाविद्यालयांजवळ सभेला परवानगी नाही, पक्ष, उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभने दाखविण्यास मज्जाव, परवानाधारक उमेदवारांना शस्त्र जमा करावी लागणार, रात्री १० नंतर सभेला परवानगी नाही, सरकारी विश्रामगृह, सरकारी वाहनांचा वापर करता येणार नाही, नव्याने निविदा काढता येणार नाही,

अधिकाऱ्यांसाठी आदेश

मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाला भेट देऊन सूक्ष्म नियोजन करा. निवडणुकांच्यादृष्टीने आवश्यक पथके तयार करा. मतदार जागृतीवर विशेष भर द्या. नगरपरिषदेच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापित करा. सभास्थळ अथवा इतर कोणत्याही परवानगी देताना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य द्या.
सर्व उमेदवारांना समान न्याय या तत्त्वाचे पालन करा. महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती आदींकडील पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली वाहने ताब्यात घ्या. प्रचार सभा किंवा जाहिरातीतून सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारीत होणार नाहीत यावर लक्ष ठेवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुखांच्या राशी

$
0
0


प्रत्येकासाठी दिवाळी म्हणजे आनंद पेरणारा सण. श्रीमंतांच्या दारी डोळे दिपवणारी तोरणे झुलतात, मध्यमवर्गीय आपल्या ऐपतीनुसार दीपोत्सवाचा आनंद लुटतात. सर्वांचीच दिवाळी सुख-समृध्दी घेऊन यावी यासाठी या चिमुकलीने मातीची पारंपरिक बोळकी बनविली. इतरांसाठी फारसे मूल्य नसले तरी तिच्यासाठी ही बोळकी म्हणजे सुखाच्या राशीच आहेत.
(आदित्य वायकुळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस लाखांचा फ्लॅट परस्पर विकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बनावट कागदपत्रे बनवून नांदूर-दसक शिवारातील २० लाख रुपये किमतीचा फ्लॅट संशयित चौघांनी विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गीता घनश्याम खोब्रागडे (वय ६३, रा. दुर्गानगर, के. के. वाघ कॉलेजमागे, पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. खोब्रागडे यांच्या नावे नांदूर-दसक शिवारात फ्लॅट आहे. या फ्लॅटच्या विक्रीसाठी बनावट पॅनकार्ड नोंदवून संशयित अनोळखी महिलेसह शशिकांत हरिश्चंद्र परदेशी (रा. देवळाली गाव, कुंभार गल्ली, नाशिकरोड, संजय काशिनाथ साळुंखे (रा. स्नेहनगर, म्हसरुळ), पवन जाधव (रा. बोरगड, म्हसरुळ) या संशयितांनी हा फ्लॅट संदीप बागड यास विकण्याच्या व्यवहारात सहभाग घेतला. तर बागड यानेही फ्लॅट इतरांना विक्री केला आहे. याप्रकरणी संशयित अनोळखी महिलेसह चौघांविरोधात आडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

एकाची आत्महत्या

जुना सायखेडा रोड परिसरात एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रामभाऊ जानकिशन साळवे (वय ५५, रा. गुरूकृपा रो-हाऊस, जुना सायखेडा रोड, जेलरोड) यांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणातून गळफास घेतला. नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कॉपर वायर चोरीस

गंगापूर गावात उभारण्यात आलेल्या रिलायन्स कंपनीच्या टॉवरवरील कॉपर वायर चोरीस गेली आहे. गंगापूर गावातील पेठ गल्लीत हा टॉवर उभारला आहे. अमोल आत्माराम पाटील (रा. इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टॉवरला बसविलेली कॉपर केबल वायर चोरून नेली. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


संशयित ताब्यात

त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉल परिसरातून मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय संशयिताला जागरुक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. म्हसरूळ टेक परिसरातील किरण प्रभाकर बैरागी गेल्या सोमवारी दुपारी त्र्यंबकनाका येथील उपनिबंधक कार्यालयात कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी मोटरसायकल पार्किंगमध्ये लावली. संशयित आकाश इश्वरीप्रसाद नामदेवे (रा. मोहननगर, छत्तीसगड) याने त्यांची मोटरसायकल चोरून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र जागरूक नागरिकांनी त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेडभैरवला ग्रामस्थाच्या मृत्यूनंतर तणाव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घोटी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खेडभैरव गावात ग्रामस्थाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मारहाण केल्यानेच ग्रामस्थाचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला. तर भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पाहून पळालेल्या ग्रामस्थाचा पडून मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येतो आहे.

पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या गावातील चार ते पाच जणांची आपापसात भांडणे चालली होती. भांडणे सोडविण्यासाठी घोटी पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी या गावात गेले. मात्र, पोलिसांनी पाहून संबंधित लोक पळू लागले. याचवेळी पळताना पडून डोक्याला मार लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याचे शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी मारहाण केल्यानेच संबंधिताचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत धार्मिक स्थळांना अंत‌िम नोट‌िसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यांसदर्भात हायकोर्टाने दिलेली डेडलाईन जवळ आल्याने या धार्मिक स्थळांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिकेने धावपळ सुरू केली आहे. शहरात सन २००९ नंतर असलेली ३१६ अनधिकृत धार्मिक स्थळे स्थलांतर करण्यासाठी अंतिम नोट‌िसा बजावल्या जाणार आहेत. ही धार्मिक स्थळे काढण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार असून, या नोट‌िसा थेट धार्मिक स्थळांवरच चिकटवल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.

हायकोर्टाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात महापालिकांना डेडलाईन दिली आहे. त्यानुसार महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात एकूण १२६९ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली आहेत. सन २००९ पूर्वीची १०६४ तर सन २००९ नंतरची ३१६ धार्मिक स्थळे आहेत. पहिल्या टप्प्यात २००९ नंतरची ३१६ ही धार्मिक स्थळे ऑक्टोबरपूर्वी काढायची आहेत. त्यामुळे पालिकेने ही धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात कारवाई सुरू केली आहे. ही सर्व स्थळे हटविण्याबाबत यापूर्वीच हरकती मागव‌िण्यात आल्या होत्या. परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळाला होता.

ही स्थळे हटविण्याची डेडलाईन जवळ आल्याने पालिकेने धावपळ सुरू केली आहे. बुधवारी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या अनधिकृत धार्मिक स्थळांना अंतिम नोट‌िसा दिल्या जाणार आहे. या धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींना शेवटची संधी म्हणून १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला जाणार आहे. त्यांसदर्भातील नोट‌िसा धार्मिक स्थळावर चिटकव‌िल्या जाणार असून, पंधरा दिवसात स्थलांतरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ही धार्मिक स्थळे हटविण्याची मुदत आता ऑक्टोबर ऐवजी डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.

धार्मिक तणावाचा अडसर

अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यासाठी पोलिसांची मदत लागणार आहे. परंतु, नुकतेच तळेगाव येथील घटनेने नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा धार्मिक स्थळाविरोधात कारवाई सुरू केली तर, जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कारवाईबाबत महापालिकेसह पोलिसांमध्येही धास्ती आहे. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी पुन्हा सरकारकडेच निर्णय जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीड‌ियाद्वारे दिलीप खैरेंची बदनामी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांच्याबद्दल सोशल मीडियांवर अफवा पसरविल्यामुळे पंचवटी पोल‌िस स्थानकात शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप खैरे हे शिवसेनेत जाणार असल्याची अफवा सोशल मीड‌ियावर पसरविण्यात आली आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या काही समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे हे देखील येत्या १ नोव्हेंबर रोजी ३५ गावांतील कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश करणार आहे, अशा आशयाची खोटी माहिती व्हॉट्स अॅप व तत्सम सोशल माध्यमातून पसरविली जात आहे. राजकीय बदनामी करण्याच्या हेतूने काही जणांकडून मुद्दाम ही माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी पंचवटी पोल‌िस स्थानकात खोटी माहिती पसरविणाऱ्यांच्या विरोधात सायबर क्राईमअन्वये पंचवटी पोल‌िस स्थानकात गुन्हा दाखल गुन्हा करण्यात आला आहे. यावेळी रायुकाँ अध्यक्ष अंबादास खैरेंसह नगरसेवक समाधान जाधव, विशाल जेजुरकर, समाधान जेजुरकर, स्वप्नील वाघ, संतोष पुंड, संदीप खैरे, किशोर शेवाळे, दिलीप रावत आदींसह कार्यकर्ते पोल‌िस स्थानकात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरसाठी दोन दिवस नोंदणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश भारत निवडणूक आयोगाने दिले असल्याने या कामाला गती मिळावी व जास्तीत जास्त मतदारांना नाव नोंदणीची संधी मिळावी यासाठी येत्या शनिवारी (दि.२२) व रविवारी (दि.२३) प्रशासनामार्फत विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त तथा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी एकनाथ डवले यांनी ही माहिती दिली.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार यादी तयार करण्यासाठीचे अभियान सुरू आहे. या मतदार नोंदणी अभियानाला गती मिळावी यासाठी येत्या शनिवारी व रविवारी शासकिय सुट्टी असूनही या दोन्ही दिवशी नाशिक विभागातील सर्व पदनिर्देशित अधिकारी व सर्व महसूल मंडळ कार्यालयांत पदवीधर मतदार नोंदणी सुरू राहणार आहे.

मतदारांत निरुत्साह

गेल्या एक ऑक्टोंबरपासून नाशिक पदवीधर मतदार नोंदणी अभियान सुरू झाले आहे. अद्याप या आभियानाला पदवीधर मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कमी कालावधीत सुमारे ३ लाख ५० हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, बॅंका व इतर आस्थापनांचे कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पदवीधर अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मतदार नोंदणीचा फॉर्म नं १८ भरून घ्यावेत व सोबत जोडावयाच्या आवश्यक त्या साक्षांकित कागदपत्रांसह जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


नोंदणीबाबत प्रशासनच उदासीन
नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी रद्दबादल झाल्याने ही मतदार यादी नव्याने तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले असले, तरी नोंदणीच्या प्रचार-प्रसाराच्या बाबतीत खुद्द प्रशासनच उदासीन असल्याचा आरोप पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेले सचिन चव्हाण यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदार नोंदणीसाठी ज्याप्रमाणे ब्रॅण्ड अम्बेसिडरद्वारे प्रचार प्रसार केला जात आहे. त्याप्रमाणे पदवीधरच्या मतदार नोंदणीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न होतांना दिसून येत नाही. पदवीधरची मतदार यादी नव्याने करावयाची आहे. याबद्दल हजारो पदवीधर अद्यापही अनभिज्ञच असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लेखक होण्यासाठी सतत वाचत रहा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

चांगला लेखक व्हायचे असेल तर जे पुस्तक मिळेल ते वाचून काढले पाहिजे. त्याचबरोबर माणसांचे सुद्धा वाचन केले पाहिजे. पुस्तक वाचण्यातून समाज घडविणारी मूल्ये रुजली जात असल्याचे प्रतिपादन कवी किशोर पाठक यांनी केले. येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दीन कार्यक्रमात ‘लेखकाचे व्याख्यान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे होते.

या प्रसंगी बोलतांना किशोर पाठक म्हणाले की, जगातील सर्व साहित्यातातील मूल्ये सर्वत्र सारखीच असतात. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे कवीसुद्धा होते. त्यांचे वाचन प्रचंड होते. त्यांच्या प्रमाणेच आजच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सुद्धा दररोज वाचन केले पाहिजे. आपण पिढी घडवतोय याचा शिक्षकांना अभिमान वाटला पाहिजे. हे स्पष्ट करतांना त्यांनी उपस्थितांना धार्मिक ग्रंथापासून ते इतर गद्य व पद्य लेखनांचे पुरावे दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीलीप धोंडगे म्हणाले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कवी व लेखक यांच्यावर निस्सिम प्रेम होते.

प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. गुंजाळ, एन. डी. ततार उपस्थित होते. सुत्रसंचालन एस. पी. कांबळे यांनी तर आभार प्रा. एस. सी. शेलार यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शांततेसाठी दारूबंदी कायम ठेवावी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

तळेगाव (अंजनेरी) येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्हाभरात जनक्षोभ उसळला होता. यावर सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय कायमस्वरूपी लागू करून नाशिक जिल्ह्यात दारूबंदी करावी, अशी मागणी महाराष्ट्र दारूबंदी जनआंदोलन समितीचे अध्यक्ष गणेश कदम यांनी केली आहे.

संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा आग्रह समितीच्या

माध्यमातून गणेश कदम यांनी राज्य सरकारकडे धरला आहे. या दारूबंदीच्या लढ्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर यांनीही समर्थन दिले आहे.

जिल्ह्यातील बिघडलेली कायदा व सुरक्षा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवेवर तात्पुरते निर्बंध घातले होते. याशिवाय या तणावाच्या काळात मद्य विक्रीही बंद ठेवली होती. याचा अर्थ शांतता राखण्यासाठी मद्य विक्री बंद ठेवणे आवश्यक असते.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच जाहिररित्या कबूल केले होते. म्हणजेच राज्यात शांतता कायम रहावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दारूबंदी होणे आवश्यक आहे. म्हणून समितीच्या वतीने सुरू असलेल्या लढ्याचा राज्यातील सरकारने गांभीर्याने विचार करावा व संपूर्ण राज्यात कायमस्वरूपी दारूबंदी लागू करावी, अशी मागणी गणेश कदम यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत सांडपाणी बेततंय नागरिकांच्या जिवावर

$
0
0

जामा मशिद परिसरातील परिस्थिती

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील वॉर्ड क्रं. ६ मधील जामा मशिद परिसर गेल्या तीन ते चार वर्षांपासून गटारीच्या वाहत्या पाण्याच्या समस्येने हैराण आहे. याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी अनेकदा केली असून येथील नगरसेवकांनाही अनेकदा सांगूनदेखील किरकोळ काम करून नागरिकांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे आता या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष देत समस्येची सोडवणूक करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

जामा मशिद परिसर सुमारे ३५० नागरी वस्तीचा असून या भागात सर्वाधिक प्रमाणात मुस्लिम बांधव राहतात. येथील उघड्या गटारीचे पाणी साचून थेट नागरिकांच्या घरात प्रवेश करीत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य होत असून मच्छरांचा उपद्रवही वाढला आहे. अनेकवेळेस नागरिकांना रस्त्याने चालताना दुर्गंधीने तब्येत खराब झाली आहे.

भूमिगत गटारी कराव्यात

यावर उपाय म्हणून हे दुर्गंधीचे पाणी काढून देण्यासाठी भूमिगत गटार असावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अनेकदा प्रशासनाच्या आरोग्य विभागास याबाबत सांगून देखील केवळ अधिकारी येऊन पाहणी करतात. पुढे मात्र कोणतीही कार्यवाही होत नाही. यामुळे डासांच्या उत्पत्तीत आणखी वाढ होऊन घरातील मुले आजारी पडली आहे. तरी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे असून लवकरात ही समस्या मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा कर्मचाऱ्यांचा ‘स्मार्टलेस’ कारभार

$
0
0

मनपा शाळा क्र. १२५ च्या मैदानालगतच जाळला जातोय कचरा

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकीकडे आपल्याला पालिका प्रशासन स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवत असले तरी दुसरीकडे पालिकेचेच कर्मचारी स्मार्टलेस वागत असल्याचे चित्र शहरात वारंवार दिसून येत आहे. नाशिकरोडच्या मनपा शाळा क्र. १२५ च्या मैदानालगतच्या मोकळ्या भूखंडाचा वापर घंटागाडी कर्मचारी सर्रासपणे कचरा जाळण्यासाठी करीत असल्याचे आढळत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणीय समस्यांत भर पडत असून पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांचा ‘स्मार्टलेस’ कारभारही उघड झाला आहे.

आनंदनगर भागात मनपा शाळा क्र. १२५ च्या मैदानालगत मोठा मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडूपे, गवत वाढलेले आहे. या परिसरात मनपाच्या घंटागाडीचे कर्मचारी शहरात जमा झालेला व स्थानिक कचरा या भागातील रस्त्याच्या कडेलाच जाळण्याचा प्रकार वारंवार करीत आहेत. त्यामुळे या भागात पर्यावरणीय समस्या निर्माण झाली आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

या मैदानावर दररोज शेकडो नागरिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करुन घाम गाळत असतात. नेमक्या याच मैदानालगत घंटागाडी कर्मचारी बऱ्याचदा जमा केलेला कचरा उचलून नेण्याऐवजी रस्त्याच्या कडेलाच जाळून टाकताना आढळून आले. या प्रकाराकडे पालिकेच्या स्वच्छता विभागाचे अधिकारीही डोळेझाक करित असल्याने कचरा जाळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अशाप्रकारे कचरा जाळण्यातून या भागात धुराचे प्रमाणही वाढलेले असते. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणारे, मैदानावर व्यायाम व चालण्यासाठी येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.

जमा केलेला कचरा जागेवरच जाळणे चुकीचे आहे. घंटागाडी कर्मचारी असा प्रकार करत असतील तर स्वच्छता अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

-सोमनाथ वाडेकर,

विभागीय अधिकारी, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’

$
0
0

दुरुस्तीसाठी बांधकाम विभाग शोधतोय मुहूर्त

सुनील कुमावत, निफाड

तालुक्यातील चारही दिशांना जाणाऱ्या राज्य मार्गासह, खेड्यापाड्यातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून, या रस्त्यांची कामे ज्यांनी करायची तो बांधकाम विभाग मात्र पावसाळा कधी थांबतो, या प्रतीक्षेत आहे. त्यांच्या या अट्टहासामुळे मात्र वाहनधारंकासह प्रवाशांचे कंबरडे मोडले जात आहे.

तालुक्यातील लासलगाव, विचार परिसर, गोडाकाठ भाग, पिंपळगाव निफाड, खडक-माळेगाव, वनसगाव या गावांतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. सायखेडा-चाटोरी या रस्त्यावर तर दीड फुटापर्यंत खड्डे आहेत. गुजरात-शिर्डी हा मार्गावर पिंपळगाव-निफाड दरम्यानही रस्ता उखडला आहे. निफाड बसस्थानक ते शांतीनगर चौफुली या काँक्रिटीकरणाचे गज उघडे पडले आहे.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पिंपळस ते निफाड चौपदरीकरण केलेला रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकदा निवेदन देवूनही अभियंत्यांना हा मार्ग कोणता आणि कुठे हेच अजून माहीत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे अली आहे. सरकार बदलल्यामुळे विकासकामे होतील अशी आशा असलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. राज्याच्या बांधकाम विभागामार्फत राबवलेल्या खड्डेमुक्त अभियानाच्या वेळी निफाड तालुक्याला वगळले होते की काय असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे.

या खड्ड्यांतून प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन त्यांना अपंगत्त्व आले आहे. पाऊस सुरू असल्याने रस्त्यांची कामे बंद होती. २० नोव्हेंबरपासून राज्य महामार्ग आणि १५ डिसेंबरपासून एन. डी. आर.च्या कामांची सुरुवात होईल. खड्डे लवकरच बुजवले जातील.

- महेश पाटील, सहाय्यक अभियंता, सा. बां. नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडून लढण्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पार्टीची बैठक निफाड येथे झाली. या बैठकीत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. सर्वात जास्त जि. प. गट आणि गण संख्या निफाड तालुक्यात असल्याने इच्छुकांची संख्या अधिक आहे.

१० गट आणि २० गण असल्यामुळे जवळपास प्रत्येक ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी तीन ते चार जण इच्छुक आहेत. भाजपचे नेते सुरेशबाबा पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्र व राज्यात सत्ता असून तालुक्यातही जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपची सत्ता येण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन सुरेशबाबा पाटील यांनी केले. माजी आमदार कल्याणराव पाटील, नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार,

जिल्हा सरचिटणीस बापूसाहेब पाटील, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष संजय वाबळे, संजय गाजरे, दिलीप कापसे, मनोहर गायकवाड आदींनी भूमिका व्यक्त केली. बहुमताने विजय मिळव‌िण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पाटील यांनी गट आणि गणातील इच्छुकांची मनोगते ऐकून घेतली.

याप्रसंगी निफाड तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शिवसेनेचे भास्कर डेर्ले, सुरेश माळी, विंचुरच्या शकुंतला दरेकर, अमोल सानप, विजय तलवारे, सचिन दरेकर, रत्नाकर दरेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी युवा अध्यक्ष आदेश सानप, कैलास सोनवणे, सतीश मोरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिला राज’साठी देवळ्यात चाचपणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी गावागावात जाऊन मतदारांची चाचपणी सुरू केली आहे. पहिल्यांदाच तालुक्यातील लोहोणेर व नव्याने अस्तित्त्वात आलेला वाखारी हे दोन्ही जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने कधी नव्हे इतकी चुरस निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या राजकारणात गेल्या तीस वर्षांपासून देवळा तालुक्यातील राजकारण्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गुडग्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांची हिरमोड झाला असला तरी पर्याय म्हणून आपल्या सौभाग्यवतींना संधी देण्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवार सरसावले आहेत. तालुक्यातील लोहोणेर, वाखारी गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून उमराणा गट अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. जिल्हास्तरावरच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ‘जिल्हा विकास आघाडी’ निर्माण करण्याच्या हालचाली चालू झाल्या असून देवळा तालुक्यात त्याचीच पुनरावृत्ती होते की पक्षीय चिन्हावर निवडणूक लढविली जाते याबाबत सर्वांना उत्कंठा लागली आहे. केदा आहेर यांच्या पत्नी तथा देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा धनश्री आहेर यांचे नाव दोन्ही गटातून चर्चेत आहे. वाखारी गटातून माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांच्या स्नुषा, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांच्या पत्नी लीना आहेर यांचेही नाव चर्चेत आहे. शांताराम आहेर यांचा तालुक्याच्या राजकारणात अजूनही दबदबा कायम आहे. मितभाषी स्वभावाच्या योगेश आहेर यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संपर्क कायम ठेवल्याने व गटातील असलेल्या नात्यागोत्यामुळे लीना आहेरांना ती एक जमेची बाजू आहे. वाखारी गटातून सुनील आहेर यांच्या पत्नी नूतन आहेर, रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार यांच्या पत्नी वर्षा पगार, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा पंचायत समितीचे माजी सभापती अशोक आहेर यांच्या पत्नी भारती आहेर, गुंजाळनगरच्या विद्यमान उपसरपंच सुजाता गुंजाळ, देवळ्याचे माजी सरपंच जितेंद्र आहेर यांच्या पत्नी सुलभा आहेर, खर्ड्याच्या उपसरपंच प्रमिला जगताप, वत्सला देवरे, बांधकाम सभापती लक्ष्मीकांत आहेर यांच्या पत्नी सरोज आहेर आदींचीही नावे चर्चेत आहेत. लोहोणेर गटातून देवळ्याच्या नगराध्यक्षा धनश्री आहेर यांच्या बरोबरच शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख, पंकज निकम यांच्या पत्नी सुरेखा निकम, खालपचे भूमिपुत्र अरविंद सूर्यवंशी यांच्या पत्नी अलका सूर्यवंशी, लोहोणेरच्या विद्यमान सरपंच तथा युवानेते दीपक बच्छाव यांच्या पत्नी जयवंता बच्छाव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांच्या पत्नी सरला निकम आदींचीही नावे चर्चेत आहेत. उमराणा गट अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांच्या गटांकडून प्रबळ उमेदवार उभा केला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोवासीयांची दैना मिटणार!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पायाभूत सुविधांसह अतिक्रमण, तसेच विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या सिडकोवासीयांची अखेर सिडकोच्या प्रशासकीय जाचातून सुटका झाली आहे. सिडकोने नवीन नाशिकमधील सर्व सहा योजनांचे महापालिकेकडे हस्तांतरण केले असून, यापुढे सिडकोचे नियोजन प्राधिकरण हे आता महापालिका असणार आहे. त्यामुळे जवळपास पाच लाख सिडकोवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच सिडकोतील बांधकामांच्या परवानग्या देण्याचे हक्कही पालिकेच्या नगररचना विभागाला मिळाले असून, पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे. दुसरीकडे, या निर्णयामुळे सिडकोवासीयांवर करांचा बोजाही वाढणार असून, अतिक्रमणाच्या फेऱ्यातूनही सुटका होणार आहे.

सिडकोच्या सहाव्या योजनेचे नुकतेच महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्या हस्तांतरणावेळी सिडकोचे नियोजन प्राधिकरणाचे हक्क आमच्याकडे असावेत, अशी अट महापालिकेने घातली होती. सिडकोने शहरात आतापर्यंत सहा योजना तयार केल्या आहेत. या योजनांमध्ये रस्ते, पाणी या सुविधा महापालिकेडून दिल्या जात असल्या तरी सर्व कागदपत्रांची पूर्तता मात्र रहिवाशांना सिडकोकडेच करावी लागत होती. तसेच या ठिकाणी घर घेणाऱ्यांना सिडकोच्या अटी व शर्थीतच घरे घ्यावी लागत होती. सिडको पूर्ण सुविधा देवू शकत नसल्याने या योजनाच बकाल झाल्या होत्या. तसेच सिडकोतील रहिवाशी इमारतींचे रुपांतर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक मालमत्तेत झाले असून, पूर्ण परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. सिडकोचे मुख्यालय हे औरंगाबादला असल्याने नागरिकांना कामांसाठी औरगांबादला चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे सिडकोचे हस्तांतरण महापालिकेकडे व्हावे अशी नागरिकांचीही इच्छा होती.

सिडको प्राधिकरणाने अखेर महापालिकेची मागणी पूर्ण केली असून, प्राधिकरणाचे पूर्ण अधिकार आता महापालिकेला बहाल केले आहेत. १४ ऑक्टोबरपासून सिडकोचे विशेष नियोजन प्राधिकरणाचे हक्क संपुष्टात येत असल्याचा अध्यादेश सिडकोने काढला आहे. त्यामुळे सिडकोच्या विकासाचे पूर्ण अधिकार महापालिकेला मिळाले आहेत. इमारत बांधकामाचा परवाना आता नगररचना विभागाकडून दिला जाणार आहे. तसेच या भागातील अतिक्रमण काढण्याचे अधिकार महापालिकेला मिळाले आहेत. सोबतच या भागातील पाच लाख नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी आता महापालिकेवर येणार आहे. सिडकोचे रिकामे भूखंड महापालिकेच्या ताब्यात येणार असून, या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करता येणार आहे.

अतिक्रमणातून मुक्तता होणार

सिडको मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. हे अतिक्रमण काढण्याची व्यवस्था सिडकोकडे नाही. त्यामुळे या भागाला अतिक्रमणमुक्त करण्याची जबाबदारी आता महापालिकेवर आली आहे. त्यामुळे सिडको अतिक्रमणमुक्त होण्याच्या दृष्टीने पावले उचलणार आहे.

-

करांचा बोजा वाढणार

सिडकोचे नियोजन प्राधिकऱण म्हणून महापालिकेला पूर्ण अधिकार प्राप्त झाल्याने घरपट्टी व पाणीपट्टीचे दर या भागाला लागू होणार आहेत. सिडकोपेक्षा महापालिकेचे कर जास्त आहेत. त्यामुळे सिडकोवासीयांवर करांचा बोजा पडणार आहे. बकाल झालेल्या सिडकोला पूर्ववत आणण्यासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार येणार आहे. हा भार उचलण्यासाठी सिडकोतील नागरिकांवर करांचा बोजा टाकावा लागणार आहे. त्यामुळे दिलासा मिळणार असला तरी,नागरिकांवर अतिरिक्त करांचा भार पडणार आहे.

काय साध्य होणार?

- बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेडे

- पायाभूत सुविधांची जबाबदारी महापालिकेची असणार

- कर लावण्याचे अधिकार महापालिकेला मिळणार

- सिडकोची अतिक्रमणातून सुटका होणार

- सिडकोचे रिकामे भूखंड पालिकेला मिळणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदगाव पालिकेसाठी राष्ट्रवादीने कसली कंबर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता असल्याने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीकडे पालिकेची सत्ता जाईल, या दिशेने प्रयत्न करण्याची तसेच राष्ट्रवादीची ताकद सिद्ध करण्याची खूणगाठ नांदगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधली. इच्छुक उमेदवार रणनीती आणि समविचारी पक्षांबरोबर युती याबाबत विचार विनिमय करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पुन्हा विशेष बैठक घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

राष्ट्रवादीच्या नांदगाव येथील संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष गुप्ता होते. यावेळी पालिका निवडणूक इच्छुक उमेदवार चाचपणी सत्ता टिकविण्यासाठी धडपड यावर बैठकीत चर्चा होऊन समविचारी पक्षांशी युती जागा वाटप रणनीती याबाबत मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलवण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीत संतोष गुप्ता अरूण पाटील, शिवाजीराव पाटील दिलीप इनामदार विष्णू निकम, डॉ. वाय. पी. जाधव, रमेश पगार, बाळकाका कलंत्री, सचिन मराठे, देविदास भोपळे, इंदिरा बनकर आदींची भाषणे झाली राष्ट्रवादीची पालिकेतील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकलच्या जागांची यादी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सद्यस्थितीत टॉप डिमांड असणाऱ्या मेडिकल शाखेंतर्गत विद्यार्थ्यांची काही कॉलेजांकडून होणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या सन् २०१६-२०१७ या वर्षासाठीच्या अंतिम मान्यतेच्या संदर्भांनुसार विद्यापीठाने संलग्नित मेडिकल कॉलेज, त्यांच्याकडील उपलब्ध जागा व अभ्यासक्रम यांचा तपशीलच वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे.

गेल्या वर्षीही मेडिकल विद्याशाखेंतर्गत एमबीबीएस, डेंटल, आयुर्वेदीक, होमिओपॅथी आणि युनानी या अभ्यासक्रमांतर्गत अनेक कॉलेजेसमधील काही जागांवर एमसीआयने मर्यादा आणल्या होत्या. याची माहिती कॉलेजेसने विद्यार्थ्यांना न देताच प्रवेश निश्चित करून घेतल्यानंतर मात्र विद्यापीठ स्तरावर या विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नव्हती. याप्रकरणी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठासच जबाबदार धरले होते. या पार्श्वभूमीवर यंदा विद्यापीठाने ही माहिती वेबसाईटद्वारे जाहीर केली आहे.

विद्यार्थ्यांचा संभ्रम टाळण्यासाठी आरोग्य विद्यापीठाने संलग्नित कॉलेजेसची यादी जाहीर केली आहे. या यादीत डीम्ड विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजेसचा समावेश करण्यात आलेला नाही. सन् २०१६-१७ या वर्षासाठी ही यादी ग्राह्य राहणार आहे. राज्यात खासगी मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही यादी मार्गदर्शक ठरणार आहे. संबंधित कॉलेजांचे इन्स्पेक्शन पार पडल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरसह विविध शैक्षणिक गुणवत्तेशी निगडीत कारणांहून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ( एमसीआय ) जागांच्या उपलब्धतेत दरवर्षी बदल करत असते. एमसीआयने चालू वर्षात केलेल्या बदलांची माहिती न देता अनेक कॉलेजेस केवळ आर्थिक लाभापोटी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतात. या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात मात्र विद्यापीठाच्या परिक्षेला बसता येत नाही. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळीच जागरूक रहावे, यासाठी विद्यापीठाच्या वतीने संलग्नित कॉलेजेस, त्यांच्याकडील अभ्यासक्रम व उपलब्ध जागा यांची माहिती या यादीद्वारे दिली असल्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी दिली.

२१४ कॉलेजेसचा तपशील

या अद्यावत यादीमध्ये यंदा बदललेले जागांचे समीकरण आणि बदलत्या अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली आहे. यानुसार ३८ एमबीबीएस कॉलेजेस, २८ डेंटल कॉलेजेस, ३५ आयुर्वेदीक आणि युनानी कॉलेजेस, ६ होमिओपॅथी कॉलेजेस, २३ फिजीओथेरपी कॉलेजेस, २१ बीपीएमटी कॉलेज, ६ ऑप्टोमेट्री आण ऑप्थोल्मीक सायन्स कॉलेज व १ पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे कॉलेज आणि ५६ नर्सिंग कॉलेजेसचा समावेश आहे. ही एकूण संख्या २१४ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-आग्रा महामार्गाची चाळण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील रस्त्यांची चाळण झालेली असताना तालुक्यातील अनेक गावांना शहाराशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग तीनवर देखील जागोजागी खड्डे पडले आहेत. दररोज हजारो वाहनांची यावरून वाहतूक होत असते. त्यामुळे नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने तालुक्यातील लोक याच महामार्गाने प्रवास करीत शहरात दाखल होत असतात. मात्र सध्या धुळे-मालेगाव दरम्यान या महामार्गावर खड्डेचखड्डे झाल्याने प्रवाशांना हा नक्की महामार्ग आहे की खड्डेमार्ग असा प्रश्न पडतो आहे.

राष्ट्रीय महामार्ग तीन मालेगाव शहारातून जातो त्यामुळे दररोज येथून हजारो वाहनांची, प्रवाशी, मालवाहतूक होत असते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागते आहे. विशेषतः तालुक्यातील झोडगे ते मालेगाव दरम्यानचा २० किमी अंतरावर तर खड्ड्यामुळे महामार्गाची चाळण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने अत्यंत वेगाने वाहने येथून ये-जा करीत असतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. महामार्ग असल्याने वाहनधारकांना यावर खड्डे असतील याची कल्पनादेखील करवत नाही. त्यामुळे अत्यंत वेगाने वाहन चालवताना अचानक खड्डे आल्याने वाहने खड्ड्यात आदळतात. अनेकवेळा अवजड मालवाहतूक करणारे कंटेनर, मालट्रक चालक खड्डे टाळण्यासाठी अचानक लेन बदलतात यामुळे दुचाकी तसेच छोट्या वाहनांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागते. खड्ड्यामुळे वाहने अचानक वळवली जात असल्याने अनेकवेळा मागून वाहने धडक देत असल्याने अपघातचे देखील प्रसंग ओढवले आहेत. राष्ट्रीय महामार्ग असून देखील खड्ड्यामुळे त्याची दुरवस्था झाल्याने यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशीच उद्विग्न प्रतिक्रिया यावरून नियमित प्रवास करणारे प्रवाशी देतात. दरम्यान पावसाळ्यात ठिकठिकाणी महामार्गवरील खड्डे तात्पुरते बुजवण्यात येत होते मात्र आता पावसाळा उलटला असला तरी या खड्ड्याचा कायमस्वरूपी बुजवण्याचा मुहूर्त संबंधित कंपनीला अद्याप सापडत नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान याबाबत धुळे टोल प्लाझा येथील कार्यालयाशी नागरिकांनी संपर्क केला असता ‘काम सुरू आहे’ असे शासकीय उत्तर मिळत आहे. नागरिकांकडून या महामार्गवरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

झोडगेनजीक कामे खोळंबली

महामार्गावर मालेगावापासून २० किमी अंतरावर असलेल्या झोडगे गावालगत गेल्या तीन महिन्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. गावाच्या प्रवेशद्वारासमोर वारंवार खड्डे पडत असल्याने येथील डंबरीकरण काढून सीमेंटचा रस्ता करण्याचे काम कंपनीकडून ऐन पावसाळ्यात हाती घेण्यात आले. त्यामुळे बरेच दिवस हा मार्ग एकेरी झाल्याने वाहतूक खोळंबा होत असे. आता तीन महीने उलटून देखील हे दुरूस्तीचे काम अर्धवटच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरी भागासाठी किफायतशीर घरे

$
0
0

शहरी भागासाठी किफायतशीर घरे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रत्येकाला राहण्यासाठी चांगले घर मिळायला हवे यासाठी ‘प्रधानमंत्री आवास’ योजना सुरू केली आहे. याच संकल्पनेवर आधारित घरे बनविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आयडीया कॉलेज २१ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत काम सुरू करत आहे. यात अनेकदा शहरांमध्ये कमी जागेत सर्व सुविधांनी परिपूर्ण आणि किफायतशीर घरे कशी बनवता येतात याचे प्रत्यक्ष सादरीकरण कॉलेजमधील विद्यार्थी करणार आहे.

विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या मार्फत इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हार्मेंट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया कॉलेज कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी कॉलेजकडून नेहमीच उपक्रम राबविले जातात. याअंतर्गत ‘व्हर्टिकल स्टुड‌िओ’ चे आयोजन केले जाते. यात विद्यार्थी थेट ऑफिस थाटून व्यवसायिक पद्धतीने काम करतात.

यंदा व्हर्टीकल स्टुड‌िओसाठी ‘शहरी भागात किफायतशीर घरे’ असा विषय निवडण्यात आला आहे. आजच्या काळाची गरज ओळखून महाविद्यालयाने याबाबत मुलांना प्रत्यक्ष कार्यानुभव देण्याचे ठरविले आहे.

यंदा दिनांक २१ ते २४ या कालावधीमध्ये व्हर्टीकल स्टुड‌िओचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे सोडत पद्धतीने ग्रुप बनवून संपूर्ण माहिती दिली जाईल. पुढे दोन दिवस विद्यार्थी त्यावर प्रत्यक्ष काम करतील. आणि शेवट्या दिवशी त्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात येईल. या संपूर्ण कामांमध्ये विद्यार्थ्यासोबत बाहेरून आलेले व्यवसायिक आर्किटेक्ट सुद्धा त्याच्यासोबत दिवसरात्र काम करणार आहे. यंदा प्रतिक धानमेर (डहाणू), विनित निकुंभ (मुंबई), यतिन पंड्या (अहमदाबाद), मनोज कुमार (तिवेद्रम) आणि जय(मुंबई) आणि नम्रता कपूर (मुंबई) येत आहेत. ही सहा तज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. ५० विद्यार्थांचा ग्रुप असे त्याचे स्वरूप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्या ज‌िवांची माय गेली…

$
0
0

खारूताईच्या पिलांची कहाणी; नेचर क्लबकडून मायेची ऊब

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खारूताईची अवघ्या तीन दिवसांची आठ पिलेे…शहरातील एका बंगल्याच्या आवारात बेवासरपणे आढळतात…काही सुजाण नागरिक त्या इवल्याशा ज‌िवांना आसरा देतात, दूधही पाजतात…मात्र खूप शोध घेऊनही त्यांची आई सापडत नाही…ती इटुकली पिटुकली पिले आईसाठी कासावीस होतात…आई-आई करीत त्यातील दोन पिले जीव सोडतात…मात्र तरीही आई काही नरजेस पडत नाही…शेवटी शेडमधील नळीच्या होलमध्ये दोन खारूताई मृतावस्थेत आढळतात…अन् पोरक्या झालेल्या पिलांच्या आईचा शोध थांबतो…आईव‌िना जगू पाहणाऱ्या या पिलांना एका संस्थेच्या सानीध्यात सोडले जाते…कुणाच्याही डोळ्यात सहज पाणी आणणारी ही करूण कहाणी घडली शहरातील गंगापूररोडवरील माणिकनगरजवळील एका बंगल्याच्या आवारात.

शहराच्या धकाधकीच्या जीवनात खारूताईला स्वच्छंदपणे बागडणे दुरापास्त झाले आहे. शहरात होणारी प्रचंड वृक्षतोड, वाढत्या सिमेंटच्या जंगलाचे प्रमाण, वाडे संस्कृतीचा ऱ्हास आदी कारणांमुळे खारींची संख्या कमी होत आहे. त्यातच आठ पिलांना जन्म देणाऱ्या खारूताईंचा अंत झाला आहे. गंगापूर परिसरात खारूताईच्या पिलांबाबत ही धक्कादायक घटना घडली. परंतु वेळीच लक्षात आल्याने काही पिलांना वाचविण्यात यश आल्याने परिसरात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

माणिकनगरजवळील बंगल्याच्या आवारात खारूताईची अवघ्या तीन दिवसांची आठ पिल्ले घरमालकाला दिसली. त्यांनी नेचर क्लब ऑफ नाशिकला संपर्क साधला असता संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, सागर बनकर व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन त्या ठिकाणी पोहचले. ज्यावेळी त्या ठिकाणी गेले तेव्हा ती आठही पिल्ले जिवंत होती. त्यांना अलगद उचलून घरात आणले व डॉक्टर महाजन यांनी त्यांना ड्रोपरने दूध पाजले. ही पिल्ले अवघी चार ते पाच दिवसाची असावी.

एका खारूताईला दोन ते तीन पिल्ले होतात मग एकाच ठिकाणी आठ पिल्ले कशी आली हे शोधण्यासाठी संस्थेने प्रथम त्या परिसरात घरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेडमधील नळीच्या होलमध्ये दोन खारूताई मृत दिसल्या. तकाही विषारी अन्न खाल्याने त्या दगावल्या असतील, असा अंदाज आहे. ती पिलेे त्या नळीत ठेवून खूप वेळ वाट बघूनही तिथे एकही खारूताई फिरकली नाही. त्या पिल्लांना एक एक तासाने दूध पाजणे आवश्यक होते, यामुळे सायंकाळी त्यांना पुन्हा खोक्यात ठेवून संस्थेचे कार्यकर्ते उमेश नागरे यांच्या घरी नेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images