Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शुभेच्छापत्रांतून वाहतूक सुरक्षेवर जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत, दक्षता घेण्याबाबत विश्वास बँकेने तयार केलेल्या अभिनव दिवाळी शुभेच्छापत्राचे प्रकाशन करण्यात आले. नुकतेच हे शुभेच्छापत्र प्रकाशित करण्यात आले आहे. ही संकल्पना विश्वास ठाकूर यांची आहे.

तिडके कॉलनी येथील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कच्या सभागृहात झालेल्या खास समारंभात पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर अशोक मुर्तडक, पोलिस उपायुक्त विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी यांच्या हस्ते शुभेच्छापत्राचे प्रकाशन करण्यात आले.

नाशिकच्या वाढत्या रहदारीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे, तसेच याच सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे विश्वास ठाकूर यांनी सांगितले. या वेळी विश्वास बँकेतर्फे पन्नास हजार रुपयांची देणगी या उपक्रमासाठी देण्याचे ठाकूर यांनी जाहीर केले.
जनसामान्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती व सजगता निर्माण व्हावी व त्यासाठी विश्वास को-ऑप. बँकेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी या वेळी व्यक्त केले. वाहतुकीविषयी रस्ता ओलांडण्याचा प्रभावी जागृतीपर संदेश शुभेच्छापत्रातून देण्यात आला आहे.

बँकेने ‘मतदान’ करण्याविषयी जनजागृतीपर संदेश दिला होता. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व त्याचेही समाजातील सर्व थरातील जनतेने स्वागत केले. याबरोबरच ‘मतदान’ करणाऱ्या बँकेच्या सभासदांना आकर्षक भेटवस्तू म्हणून पैसे साठविण्याचा डबा देण्यात आला. सुमारे ५००० खातेदारांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

या शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून बँकेने नेहमीच समकालीन विषयांचे प्रबोधनपर संदेश दिलेले आहे. ‘स्वाइन फ्लू’ रोगाविषयक प्रतिबंधक उपाय म्हणून माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. सुमारे तीन लाखांहून अधिक पत्रके शाळा-महाविद्यालये, मेडिकल स्टोअर्स, बस/रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी वाटप करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन, ध्वनिप्रदूषण, मोबाइल वापरताना घ्यावयाची काळजी, रोज चालण्याचे फायदे, हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, पाण्याची बचत, रस्ता सुरक्षा अशा अनेक विषयांवर लोकप्रबोधनात्मक जाणिवेतून याआधी शुभेच्छा कार्ड तयार करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीपोत्सवासाठी सजल्या बाजारपेठा

$
0
0

आकाशकंदील, दिव्यांनी बाजारात झगमगाट

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाची लगबग शहर व तालुक्यात सर्वत्र सुरू झाली असून दिवाळी आणि खरेदी हे समीकरण पक्के असल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा देखील सजल्या आहेत. दिवाळी म्हटले की दिव्यांचा उत्सव! यंदाही बाजारात आकर्षक आणि वेगवेगळ्या आकारातील मातीच्या दिव्यांना मोठी मागणी आहे. सोबतच आकाशकंदिल, रांगोळी, फराळ आदींच्या खरेदीसाठी बाजारपेठांत नागरिकांनी गर्दी केली आहे.

शहरात दिपावलीच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. दीपावलीत दिव्यांना विशेष महत्त्व असल्याने बाजारात विविध प्रकारचे दिवे विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी ठेवले आहेत. यात मातीच्या दिव्यांना विशेष मागणी आहे. यासोबतच बाजारात देशी बनावटीचे प्लॅस्टिक, कागदी आकाशकंदील व चायनामेड लायटिंगने बाजारपेठा चमकत आहेत.

‘चीनी मालवर बहिष्कार!’ असा सोशल मीडियावर प्रचार होत असला तरी या लाइटींग स्वस्त, आकर्षक असल्याने त्यांना ग्राहकांची अधिक मागणी आहे. त्या १०० ते ५०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. यासोबतच दिवाळीच्या निमित्ताने रांगोळी खरेदीसाठी बाजारात पहायला मिळतो आहे. रांगोळी विक्रेत्यांनी रांगोळीचे कोन, ठसे, पुस्तिका विक्रीस ठेवल्या आहेत. मागणीत वाढ झाल्याने दरही वाढवले आहेत.

फराळासाठी लगबग

दिवाळीच्या फराळासाठी देखील शहरातील हलवाई, फरसाण विक्रेते, हॉटेल व्यावसायिक कामाला लागले आहेत. हल्ली रेडीमेड फराळ घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याने ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत. शेव, चकल्या, मिठाई, चिवडा असे गोड-तिखट पदार्थ बनवून घेण्यासाठी गर्दी होत आहे. बच्चे कंपनीसाठी फटाक्यांची दुकानेही लावण्यात येत आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने कपडे व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीचा मुहूर्त अनेक ग्राहक निवडतात. त्यामुळे शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रेत्यांनी खास दिवाळी ऑफर सुरू केल्या असून खरेदीवर खास सूट दिली आहे. तसेच टू व्हीलर, फॉर व्हीलर विक्रेत्यांनी विविध आकर्षक ऑफर्स देऊ केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅप्पी संडेची ‘हेल्दी’ सुरुवात

$
0
0

नाशिककरांसाठी पोलिस आयुक्तालयाकडून ‘लास्ट संडे ऑफ दि मंथ’ उपक्रमाचे आयोजन

कॉलेज क्लब रिपोर्टर

शहरातील आबालवृद्ध जॉगिंग सूट घालून रविवारी (दि. २३) सकाळी आसारामबापू पुलाजवळ गोदा पार्कवर रनिंग करताना दिसून आले. सोबतच अनेक पोलिस कर्मचारी व अधिकारीदेखील नाशिककरांसमवेत धावत होते. संडे मॉर्निंगच्या या आल्हाददायक वातावरणात नाशिककर धावणं एन्जॉय करत होते. निमित्त होते ते ‘लास्ट संडे ऑफ दि मंथ’ उपक्रमाचे. एवढ्या सकाळी जॉगिंग करत हॅप्पी संडेची हेल्दी सुरुवात झाल्याचं नाशिककर सांगतात.

नाशिक पोलिस आयुक्तालय यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात ‘लास्ट संडे ऑफ दि मंथ’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विदेशात काही शहरात महिन्याच्या सुरुवातीस शेवटच्या रविवारी सामूहिक क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. याच धर्तीवर नाशिकमध्येही ‘लास्ट संडे ऑफ दि मंथ’ (एलएसओएम) या उपक्रमाची सुरुवात रविवारी करण्यात आली.

हॅप्पी स्ट्रीट या अभिनव धर्तीवर एलएसओएम हा उपक्रम घेण्यात आला. सकाळी ६.३० वाजता दहा किमी जॉगिंगची सुरुवात नाशिक पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल व उपायुक्त विजय पाटील यांनी ध्वज फडकवून केली. यावेळी ‘लास्ट संडे ऑफ दि मंथ’ च्या फलकाचेही अनावरण करण्यात आले. येत्या काळात ‘एलएसओएम’ शहरात अनेक ठिकाणी राबविला जाणार असून त्याचे स्वरूप, जागा यात बदल केला जाईल. हा उपक्रम नागरिक व पोलिस यांच्या एकत्रित उत्साहासाठी असेल, असेही सिंघल यावेळी म्हणाले.

यानंतर नाशिककरांसमवेत पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक उपायुक्त तसेच अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी जॉगिंग एन्जॉय केली. मोठ्या संख्येने नाशिककर या उपक्रमात सहभागी झाले होते. लहानग्यांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनी यावेळी ‘स्टे फिट’ म्हणत धावण्याचा आनंद घेतला. जॉगिंग नंतर स्ट्रेचिंग करत सायकलिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सायकलिस्ट सहभागी झाले होते. नाशिककरांना पोलिस आयुक्तालयातर्फे अल्पोपाहार यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पसला जडला एक्झाम फिव्हर

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

सध्या शहरातील अनेक कॉलेजेसमध्ये विद्यापीठस्तरीय परीक्षा सुरू झाल्या आहेत. कॉलेजमधील स्कॉलर, पुस्तकी ज्ञान असलेल विद्यार्थी मात्र परीक्षेच्या एक महिन्याआधीपासूनच जोरदार तयारी सुरू करतात. तर याउलट बऱ्याच मंडळींना आपला रोल नंबर काय आहे? आपले विषय कोणते आहेत? इथपासूनची तपासणी आता करावी लागत आहे. कॅम्पसमध्ये सध्या परीक्षा सुरू झाल्याने एक्झाम फिव्हर पाहायला मिळत आहे.

कॉलेजियन्स आपापल्या नोटस् जमा करणं, असाईनमेंट्स पूर्ण करणं, फायली, जनरल्स, प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं काम रात्रंदिवस करण्यात गुंग झाले आहे. यासोबतच कट्टयावर बसत लेक्चर्स बंक करणाऱ्या कॉलेजियन्सला काही नोट्स फक्त स्कॉलर्सच मंडळी देऊ शकतात हे कळाल्याने कट्टेकरी या स्कॉलर्सला जणू आपल्या ग्रुपचाच भिडू असल्यासारखं बोलावून त्याला मस्का मारत आहेत.

नेहमी ओस पडलेल्या लायब्ररीत आता मात्र कॉलेजियन्सची अचानक गर्दी वाढलेली दिसून येत आहे. वर्गातले स्कॉलर वगळता इतर विद्यार्थ्यांनी झेरॉक्सच्या दुकानात नोट्स कॉपी करण्यासाठी गर्दी केली आहे. दिवसभर नोटस् मिळवून होईपर्यंत कधी सायंकाळ होते हेच कळत नाही. त्यामुळे नाइट स्टडीचा पर्याय यंगस्टर्स वापरत आहे.

एक पेपर झाला की, लागलीच दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पेपरच्या ताणात कॉलेजियन्स अडकत आहेत. तसेच पेपर हातात पडेपर्यंत मनातली हुरहुर कायम असल्याचेही यंगस्टर्स सांगतात. परीक्षेच्या अगोदर एकमेकांना मेसेजेस करत, ‘मग तुझं किती झालं, माझं एवढं झालं’, ‘जाम टेन्शन आलय...’, ‘असं रात्रभर जागरणं करून मला तर केटी लागणार यार’ असे संवाद सध्या ऐकायला मिळत आहे.

दिवाळी जाणार स्टडिमय

सर्व शाखांच्या विद्यापीठस्तरीय परीक्षा सुरू झाल्या असून त्या २७ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच ७ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी व्हेकेशन आहे. पुन्हा उर्वरित पेपर ७ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार असून काही परीक्षा १५ नोव्हेंबरला सुरू होत आहेत. या शेड्युल नुसार सर्व कॉलेजियन्सची दिवाळी स्टडीमय जाणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या दिवाळीत अभ्यासाचा आनंद घेणे त्यांना क्रमप्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षण हाच शांततेसाठी राजमार्ग’

$
0
0

जगभरात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांच्या वतीने पुरस्कृत अन् वर्ल्ड काँग्रेस ऑफ इंटरनॅशनल असोसिएशन फॉर वर्ल्ड पीस (आयएइडबल्यूपी) आणि एचपीटी, एसएमआरके कॉलेजच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आज (दि. २४) गोखले सोसायटीच्या आवारात होत आहे. ‘पीस एज्युकेशन फॉर गुड गव्हर्नन्स अँड नॉन व्हायोलन्स’ या विषयावर ही परिषद होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा ७१ वा स्थापना दिवस आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत परिषदेचे यजमानपद गोखले एज्युकेशन सोसायटीस मिळाले आहे. या निमित्ताने संस्थेचे सचिव व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांच्याशी साधलेला संवाद ...


•प्रश्न : शांतता प्रस्थापनेसाठी जगभरात पराकोटीचे प्रयत्न विविध मार्गांनी सुरू आहेत. यात ‘शिक्षणाद्वारे शांतता’ ही अनोखी संकल्पना का निवडण्यात आली ?

उत्तर : जगभरातील सर्व स्तरांमधील देशांसमोर आजमितीस शांतता स्थापनेचे आव्हान उभे आहे. यासाठी विविध मार्गांनी पराकोटीचे प्रयत्नही होत आहेत. मात्र, शांतता प्रस्थापनेसाठी शिक्षण हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमत आहे. यामुळे या माध्यमातून शांतता प्रस्थापनेच्या जागतिक चळवळीस गती देता येणे शक्य असल्याचे वाटल्याने या विषयाची निवड केली गेली.•प्रश्न : संयुक्त राष्ट्र पुरस्कृत या परिषदेचे यजमानपद नाशिकमधील शैक्षणिक संस्थेस मिळणे हे राज्यासाठी अभिमानास्पद आहे?

उत्तर : होय, संयुक्त राष्ट्रांच्या स्तरावर शांतता हा अजेंड्यावरील महत्त्वाच्या उद्देशांपैकी एक आहे. ही परिषद यापूर्वी भारतात केवळ दोनदा बेंगळुरू आणि वाराणसी या शहरात झाली आहे. या शहरांपाठोपाठ नाशिकमध्ये ही परिषद आता होते आहे. यातही शैक्षणिक संस्थेत या परिषदेच्या आयोजनाचा मान मिळणे ही परिषदेच्या इतिहासात पहिलीच घटना आहे. नाशिकच्या निमित्ताने महाराष्ट्राला या परिषदेचे यजमानपद पहिल्यांदाच मिळते आहे. निश्चितच राज्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद घटना आहे.•प्रश्न : गत शतकाच्या तुलनेत शिक्षणाच्या विस्तारानंतरही जगभरात अशांतता आणि असमाधान आहे?

उत्तर : शिक्षणाची एकांगी वाढ हे यामागील कारण असू शकते. शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारानंतरही जगभरात अशांतता आणि असमाधानात वाढ झाली असली तरीही शिक्षणामुळे नागरी जीवनात निर्माण झालेली शांतता, विकास आणि समृद्धी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिक्षण हे शांतता प्रस्थापनेसाठी अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकते. हाच संदेश या परिषदेतून जगास देण्याचा हेतू आहे.•प्रश्न : विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनाही अपप्रवृत्ती अशांतता पसरविण्यासाठी लक्ष्यगट म्हणून उपयोगात आणतात ?

उत्तर : अलिकडील काही घडामोडी या मुद्द्यास समर्थन देणाऱ्या ठराव्यात. मात्र, आशावाद आणि विधायक विकासाचे वाहक असलेला, राष्ट्राची खरी संपत्ती असणारा विद्यार्थी अशा अपप्रवृत्तींच्या प्रभावाखाली येऊन चूकीची पावलं टाकू नये यासाठी जागतिक स्तरावर शांततेचा अभ्यासक्रम निर्मितीचा प्रस्ताव या परिषदेतील सार एकत्रित करून संयुक्त राष्ट्रांसमोर मांडण्यात येईल. आपल्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी अशा गटांचा लक्ष्य होऊ नये, यासाठी त्याला दहावीपर्यंत शांतता आणि समन्वयाचे शिक्षण मिळायला हवे. जेणेकरून त्याच्यावर तरुणाईत अपप्रवृत्तींचा प्रभाव पडणार नाही.•प्रश्न : असमतोल सामाजिक वातावरणाचा मोठा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो आहे का?

उत्तर : असा परिणाम विद्यार्थी दशेतील प्रत्येकावर होणे स्वाभाविकच आहे. याच्या परिणामी विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढीला लागली आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातला विद्यार्थी याला अपवाद नाही. गुरूदेव रविंद्रनाथ टागोरांच्या म्हणण्यानुसार, ‘शिक्षण हे भीतीमुक्त व्हायला हवे’ , जे शिक्षण आज भीतीयुक्त बनते आहे. तर विद्यार्थी खऱ्या विकासाच्या प्रवाहात येईलच.•प्रश्न : शांतता आणि विकास प्रस्थापनेच्या दृष्टीने आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही त्रुटी आहेत?

उत्तर : अनेकदा विद्यार्थी हा अनुकरण शील असतो. त्यामुळे त्याच्या समोरील शिक्षकांची फळी ही आदर्शवाद पेरणारी आणि त्याप्रमाणे जगणारी असण्याची काळजी व्यवस्थेने घ्यायला हवी. या अपेक्षेच्या तुलनेत आज या व्यवस्थेने शिक्षक बनण्याच्या संधीच हिरावून घेण्यास सुरुवात केल्याची वस्तुस्थिती आहे. तरीही, शिक्षण क्षेत्रात बाह्य क्षेत्रांमधील २० टक्के तज्ज्ञांचा थेट संवाद विद्यार्थ्यांशी घडवला. त्यांना जगाची अन् त्यांच्या कार्य प्रांताची व्याप्तीची जाणीव करून दिली.•प्रश्न : अशांत प्रदेशांमध्ये शिक्षण हे दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरते आहे ?

उत्तर : शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो. तो विध्वंसाच्या वाट्याला न वळता चर्चेला प्राधान्य देतो. हे दहशतवादी प्रवृत्ती जाणून आहे. त्यामुळे देशातील अशांत अन् धुमसणाऱ्या प्रदेशात अनेकदा शिक्षणही या हल्ल्यांमध्ये भरडले जाते. मात्र परिवर्तनासाठी शिक्षणास पर्याय नाहीच. जगात चर्चेची प्रवृत्ती वाढते आहे. हे पंतप्रधानांच्या दौऱ्यांना मिळणाऱ्या जागतिक सकारात्मक प्रतिसादावरून लक्षात येईल.•प्रश्न : शांततेच्या प्रवाहात महिलांचे स्थान महत्त्वाचे आहे?

उत्तर : स्त्रियांमध्ये ज्ञानदात्रीची भूमिका बजविण्याची मोठी क्षमता दडली आहे. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या माध्यमातून त्यांचे योगदान वगळून चालणार नाही. शांतता प्रस्थापित करण्याच्या या प्रवाहात सहभागी होणाऱ्या महिला या प्रयत्नांची मोठी ताकद आहे. समाजाने त्यांना पाठबळ द्यायलाच हवे.•प्रश्न : एकंदरीत ‘समन्वय’ हा या परिषदेचा कळीचा मुद्दा आहे?

उत्तर : ज्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य या परिषदेस लाभले ते नामदार गोपाळकृष्ण गोखले हे अंतिमत: ‘समन्वय साधणे’ या मुद्द्याभोवती केंद्रित होतात. यामुळेच शांततेसाठी समाज परिवर्तनाचा हा प्रयत्नही ‘समन्वय’ या मुद्द्यांशी येऊन थांबतो.

(शब्दांकन – जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पेशल बीएडला दृष्टीबाधितांची पसंती

$
0
0

नॅब व मुक्त विद्यापीठातर्फे पहिली बॅच सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) यांच्या वतीने मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या स्पेशल बीएड पदवी अभ्यासक्रमाला दृष्टी बाधित विद्यार्थ्यांची चांगली पसंती मिळते आहे. या अभ्यासक्रमासाठी असलेल्या २५ जागांपैकी २२ जागांचे प्रवेश झाल्याने त्यांच्या तासिकाही नियमित सुरू आहेत. एकीकडे पारंपरिक डी. एड, बी. एड अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असताना दृष्टीबाधितांची मात्र या अभ्यासक्रमाला चांगली पसंती असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी दिली आहे.

दृष्टी बाधितांना विविधांगी शिक्षण मिळावे, यासाठी स्पेशल बी. एड. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ५ वर्षांपासून संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जात होते. भारतीय पुनर्वास परिषद व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून या अभ्यासक्रमास मान्यता मिळाली. हा अभ्यासक्रम दृष्टी बाधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेतर्फे अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार २०१६-१७ या कोर्सच्या पहिल्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. हा कोर्स अडीच वर्षांचा असून या कोर्सची पहिली सेमिस्टर सध्या सुरू आहे. राज्यभरात नाशिक, नंदुरबार, नागपूर, अमरावती या चार ठिकाणी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

-------------------------

इतर केंद्रांच्या तुलनेत नाशिकला मिळालेला प्रतिसाद चांगला आहे. हा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इतर बी. एड. झालेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे जॉबची संधी मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

- रामेश्वर कलंत्री, अध्यक्ष, नॅब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी विद्यार्थ्यांचा दिवाळी स्नेहमेळावा

$
0
0

शतक महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे शतक महोत्सवी वर्ष २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षात साजरा होणार असून संस्थेच्या या महोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवी वर्षात पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुळकर्णी यांनी केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये रविवारी (दि. २३) पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांच्या दिवाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना कुळकर्णी यांनी आवाहन केले.

या वेळी कुळकर्णी यांनी पॉवरपॉईंटच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेला २०१८ साली शंभर वर्ष पूर्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव साजरा केला जाणार आहे, असे ते म्हणाले. यापूर्वी शिक्षक पी. पी. कुळकर्णी यांनी प्रार्थना घेतली. यात बेल झाल्यानंतर सर्व माजी विद्यार्थी सभागृहात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, प्रार्थना, ओमकार म्हटले. शाळेमध्ये उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गांना भेटी देऊन शाळेविषयी प्रेम व्यक्त केले. व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, शाळा समिती अध्यक्ष व संस्था माजी विद्यार्थी प्रमुख जयंत मोंढे, प्राचार्य प्र. ला. ठोके, माजी विद्यार्थी निमंत्रक श्रावण सूर्यवंशी उपस्थित होते. प्राचार्य प्र. ला. ठोके यांनी मेळाव्याचा उद्देश सांगितला. या मेळाव्यास महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, शरद पोटे, राजेश आढाव, पंकज मालपाणी, गणेश कळमकर, शरद निकम, पोपट टिळे, पुष्पलता बोराडेसह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली झोडगेकर व स्वाती धारकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये होणार ४० कोटींची कामे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर विकासास केंद्राचा प्रसाद मिळावा, याकरिता विश्वस्त मंडळाचे नेटाने प्रयत्न सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसराचा केंद्र सरकारच्या पर्यटन विकास खात्याने प्रसाद योजनेत समावेश केल्याने येथे पहिल्या टप्प्यात ४० कोटींची कामे होणार आहेत. यामधून श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर आणि परिसर विकास होणार आहे. खासदार हेंमत गोडसे यांनी प्रयत्नाने हा निधी आणला आहे.

निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधी मंदिराची वास्तू जीर्णोध्दाराच्या प्रतीक्षेत आहे. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी विश्वस्त मंदिर वास्तू एकमेवाद्वितीय व्हावी, याकरिता प्रयत्नशील आहेत. यापूर्वीच्या मंजूर विकासकामांना गती दिली आहे. संत गजानन महाराज मंदिर शेगाव, स्वामी नारायण मंदिर गुजरात आणि आणखी काही मंदिरांच्या वास्तू विशारदांचे अभिप्राय, मार्गदर्शन घेऊन आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिराची वास्तू काळ्या पाषाणात व्हावी, तिला पुरातन वैभवाचा साज द्यावा आणि हजार वर्षे पुढे हे वैभव चिरंतन राहील याकरिता आराखडे तयार करण्यात आले आहेत. या वास्तुचा प्राथमिक खर्च अंदाजे ५० कोटींपर्यंत येऊ शकतो. निर्मिती अवस्थेत यामध्ये वाढ होणार आहे. त्याकरिता वारकरी प्रयत्न करीत आहेत.

प्रसाद फलद्रूप व्हावा

केंद्राने प्रसाद योजना जाहीर केली आणि दोन महिन्यात पहिल्या फेजमधील काम व्हावे म्हणून पर्यटन खाते गतिमान झाले आहे. गोव्याचे सुप्रसिध्द वास्तुविशारद मिलिंद रमाणी यांची नेमणूक करण्यात आली आहे. येथे पाहणीसाठी ते आले असता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलीक थेटे, जयंतमहाराज गोसावी आणि सर्व विश्वस्तांनी मंदिर वास्तू निर्मिती आणि परिसर विकास यांच्या संकल्पना त्यांच्यापुढे मांडल्या.

आणखी किती उपेक्षा?

पौष वारीस येथे पाच लाखांपेक्षा अधिक भाविक येतात. केवळ पायी येणारे वारकरी दोन लाखांच्या दरम्यान असतात. दशमी दे द्वादशी त्यांना येथे पाणी, निवारा अशा सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे. बारा वर्षांनी एकदा येणाऱ्या कुंभमेळयास साडेतीन हजार कोटी रुपये खर्च होतात, तर दरवर्षी होणारा हा वारकरी महामेळा उपेक्षित का? असा सवाल भाविक उपस्थित करतात. येथे कायमस्वरूपी सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. भाविकास हे वारकरी आद्यपीठाची साक्ष मिळावी, अशी आपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक नियुक्तीवरून रंगला वाद

$
0
0

नामपूर जिल्हा परिषद शाळेतील प्रकार; आठ दिवसांनंतरही शाळेला कुलूप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निलंबित शिक्षक पंडित कापडणीस यांच्या नियुक्तीवरून सुरू झालेला वाद अजूनही मिटला नाही. नामपूर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत वादग्रस्त शिक्षकाच्या नियुक्तीने गावातील सरपंच सोनाली निकम, जिल्हा परिषद सदस्या सुनीता पाटील, उपसरपंच मंगल सावंत, पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. संबंधित शिक्षक हा वादग्रस्त असून, जोपर्यंत त्या शिक्षकाची नियुक्ती रद्द होत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला.जवळपास ३५० विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत आहे.


आठ दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारचा निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थी वर्गाबाहेर बसून आहेत. आजपासून शाळांना दिवाळीच्या सुट्या लागत आहेत. त्यामुळे हा विषय पुन्हा लांबणार आहे. विद्यार्थ्यांची संकलित चाचणी परीक्षा पार पडल्याने त्यांना पेपरदेखील शाळेच्या आवारात बसून द्यावे लागले. या सर्व प्रकाराला राजकीय रंग देण्यात येत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. विद्यार्थ्यांना उन्हात शाळेच्या आवारात बसावे लागत आहे. शाळेवर गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, गटशिक्षण अधिकारी साहेबराव बच्छाव, विस्तार अधिकारी प्रवीण जाधव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पालकांशी संवाद साधला. मात्र, नियुक्ती रद्द करण्याबाबत पालक ठाम असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले.

विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या लागणार असल्याने आता या प्रकरणाचा निकाल पुन्हा रेंगाळणार आहे, असे दिसते. यातून शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या संपूर्ण वादावर त्वरित तोडगा निघावा, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.


ग्रामस्थांचा त्या शिक्षकांवर रोष असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाला दुसरी शाळा देण्यासाठी आम्ही सीईओंकडे अर्ज सादर केला आहे. या शिक्षकाच्या जागी दुसरा शिक्षक नियुक्त केला जाईल.

- प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

-------------------------------------

प्रत्यक्ष शाळेवर जाऊन आम्ही पालकांशी संवाद साधला. मात्र, ते नियुक्ती रद्दच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सीईओना आम्ही कळवले आहे. त्यांनीदेखील आदेश बदलण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच संबंधित शिक्षकाला शाळेवर रुजू न होण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत.

- साहेबराव बच्छाव, गटशिक्षण अधिकारी

-------------------------------------

संबंधित शिक्षक हा वादग्रस्त असून आधीच्या शाळेवरदेखील त्यांच्याबाबत अनेक तक्रारी असल्याने त्यांची या शाळेवर नियुक्ती होऊ नये. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

- प्रभाकर सावंत, पालक

-------------------------------------

माझ्याविरोधात हे सर्व षडयंत्र रचण्यात येत असून, या संपूर्ण प्रकाराला राजकीय रंग चढला आहे. मला मिळालेल्या आदेशाप्रमाणे मी शाळेवर रुजू झालो आहे.

- पंडित कापडणीस, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांचा कल रेडिमेड फराळाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच पाहुण्यांच्या पुढ्यात ठेवण्यात येणाऱ्या फराळासाठी नाशिकमधील मिठाईची दुकाने सजली आहेत. वैविध्यपूर्ण आणि चविष्ट अशा मिठाईची भुरळ ग्राहकांना सहजच पडत असल्याने त्याची खरेदी-विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

नागरिकांना कामाच्या व्यापामुळे सर्व पदार्थ घरी बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे नोकरी करणाऱ्या कुटुंबांना बाहेरून फराळ घेणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे हे पदार्थ बाजारात विकत घेण्याकडे नागरिकांचा जास्त कल आहे. शहरात अनेक ठिकाणी फराळाच्या पदार्थांचे स्टॉल लागले असून, त्यातील निवडक दुकानांमध्ये फराळासाठी गर्दी होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिठाईची विक्रीत वाढ झाल्याचे स्थानिक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांतच घरांमध्ये दिवाळीचे आगमन होणार आहे. त्यासाठी विविध प्रकारची मिठाई तयार करण्याला गती आली असून, लाडू, शंकरपाळे, अनारसे, करंजी, चिरोटे, खोबरा बर्फी, बालुशाही शेव, चिवडा, चकली या पदार्थांना मागणी आहे, तर विविध प्रकारच्या चिवड्यांना नाशिकबरोबरच बाहेरगावच्या ग्राहकांची मागणी आहे. सणाच्या कालावधीत घरोघरी पाहुण्यांची वर्दळ असते. त्यांच्या पाहुणचारासाठी विविध प्रकारच्या चिवड्यांनाही चांगली मागणी आहे. पातळ पोहे, भाजके पोहे, दगडी पोह्यांचा चिवडा, नाशिक चिवडा, मका चिवडा बाजारात उपलब्ध आहे. फरसाणचे विविध प्रकारही बाजारात उपलब्ध आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा भावात किरकोळ वाढ झाली आहे.

बचतगटांचा फराळ

शहरातील बचतगटांनी जागोजागी फराळाचे स्टॉल लावले आहेत. त्यांच्याकडे तयार फराळ घरगुती असल्याने त्याला नागरिकांची अधिक पसंती आहे. बचतगटांकडील फराळाला मोठ्या कंपन्यांकडूनही मागणी आहे. शहरातील इंदिरानगर, राजीवनगर, मेनरोड, भाभानगर, जेलरोड येथे बचतगटांनी स्टॉल टाकले आहेत.

फराळासाठी सेंट्रल किचन

नाशिकरोड, सिडको, इंदिरानगर भागातील अनेक ठिकाणी फराळासाठी सेंट्रल किचन ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. सर्वानुमते आचारी ठरवायचा, त्याला फराळ तयार करण्यासाठी सोसायटीच्या पार्किंगमध्ये जागा करून द्यायची, किलोप्रमाणे भाव ठरवायचा व सोसायटीतल्या सर्व सभासदांनी त्याच्याकडून पदार्थ बनवून घ्यायचे, असा पायंडा सध्या उपनगरांमध्ये आहे. फराळासाठी घरातील कच्चा माल असल्याने व पदार्थ आपल्यासमोर तयार होत असल्याने अनेकांनी याला प्राधान्य दिले आहे. वस्तूंप्रमाणे भाव असून, साधारणतः ८० रुपये किलो असा त्याचा दर आहे.

सरसावल्या कुरिअर कंपन्या

आपल्या नातेवाइकांना परदेशात दिवाळी साजरी करता यावी, फराळाची मजा घेता यावी, यासाठी कुरिअर कंपन्यांनी विशेष योजना जाहीर केली आहे. आपण कुरिअर कंपनीत जाऊन पैसे भरायचे आणि किती किलो फराळ पाठवायचा आहे आणि तो कुठे पाठवायचा आहे ते सांगायचे. त्याप्रमाणे फराळ आपल्या नातेवाइकांकडे पोहोचतो. ऑर्डरप्रमाणे कंपन्यांनी पॅकिंग तयार केले असून, पाहिजे त्या देशात पाठविण्याची व्यवस्था केली आहे.

पदार्थांचे भाव

चकली ः ३२० रुपये किलो, चकली तुकडा ः २४० रुपये किलो, अनारसे ः ३२० रुपये, करंजी ः ३२० रुपये, चिरोटे ः २४० रुपये, रव्याचे लाडू ः २०० रुपये किलो, बुंदीचे लाडू ः ३०० रुपये किलो, डिंक लाडू ः ५५० रुपये किलो, शंकरपाळे ः २०० रुपये किलो, चिवडा ः २२० रुपये किलो, बटाटा चिवडा तिखट, गोड ः २२० रुपये किलो, शेव फरसाण ः २०० रुपये किलो, आम्रखंड ः २४० रुपये किलो, सुकाजाम ः २४० रुपये किलो, मलई पेढा ः ३०० रुपये किलो, खोबरा बर्फी ः २४० रुपये किलो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या डागडुजीला सापडला मुहूर्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागलेली असताना प्रशासन त्याकडे काणाडोळा करीत होत. याबाबत ‘रस्त्यांची लागली वाट’ या मथळ्याखाली महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारपासून तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू झाली आहे.

तालुक्यातील राज्य महामार्ग, खेडे गावात जाणारे रस्ते, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खड्ड्यांबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून प्रवासी वर्गाचे हाल आणि वाढलेले अपघात याची वस्तुस्थ‌िती ‘मटा’ने मांडली होती. निफाड सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तालुक्यातील खडी, कच, आणि डांबर टाकून खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू केली आहे.

बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता महेश पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील आमच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यांवर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ओझर, सायखेडा, विंचूर लासलगाव, लासलगाव लोणवाडी या रस्त्यांसह इतर रस्त्यांची दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या रस्त्यांच्या डागडुजीची कामे सुरू केली असली, तरी राष्ट्रीय मार्ग असणाऱ्या नाशिकल-औरंगाबाद महामार्गावरील पिंपळस ते निफाड आणि निफाड ते विंचूरपर्यंत चौपदरी मार्गावरील मोठे खड्डे अजूनही बुजवण्याचे चिन्ह नाही. या दरम्यानचा रस्ता उखडला आहे. चौपदरी असल्याने वाहने भरधाव असतात. अचानक खड्डा आल्याने वाहने उसळी मारतात आणि अपघात होतात. याची देखभाल बांधकाम विभागाच्या बीओटी विभागाकडे आहे. या विभागाकडे निफाड नगरपंचायत, अनेक राजकीय पक्षांनी निवेदन दिले. परंतु या विभागाच्या अभियंत्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे.

निफाड तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार आहोत. यावेळी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने खड्डे पडले आहे. या सर्व खड्ड्यांची नोंद घेतली असून, त्याच्या दुरुस्तीचीही कार्यवही सुरू झाली आहे. पिंपळगाव-निफाड रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही दोन दिवसात सुरू होणार आहे.

- महेश पाटील,

सहाय्यक अभियंता बांधकाम

राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबरअखेर सर्व खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन दिले आहे. याचा अर्थ या विभागाला निधीची तरतूद असेल. बांधकाम विभागाने तालुक्यातील रस्त्यांसाठी जास्तीचा निधी आणावा.

- अॅड. श्रीकांत रायते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवाडीकरांना हवाय नवीन जलकुंभ

$
0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

पाण्याचा जुना जलकुंभ मोडकळीस आला असून, तो केव्हाही जमीनदोस्त होऊ शकतो. म्हणूनच नवीन जलकुंभ बांधून द्यावा, अशी मागणी मालेगाव तालुक्यातील कळवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी घंटीनाद आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता आणि पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयातही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कळवाडी गावाची लोकसंख्या सध्या १० हजार आहे. १९८० मध्ये गावाची लोकसंख्या चार हजार असताना गावात जलकुंभ बांधण्यात आला होता. मात्र त्यावेळी राबविण्यात आलेल्या पाणी योजनेची आता प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. जलकुंभ जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळू शेकतो. २००५ मध्ये सरकारने नवीन पाणी योजना मंजूर केली. परंतु, अजूनही पाइपलाइन व तत्सम कामे पूर्ण झालीच नाहीत. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देण्यात आले. या आंदोलनात सरपंच पुष्पा मरसाळे, उपसरपंच शिवाजी पाटील, मधुकर देसले, जगदीश देसले, मुकुंदा मरसाळे, सुरेश पाटील, गुलाब देसले, रंगराव देसले, वाल्मिक खैरनार, वाल्मिक देसले, यशवंत देसले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’तर्फे आज फराळ स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे वाचकांसाठी नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त फराळ स्पर्धा आयोजित केली असून ही स्पर्धा चित्पावन मंगल कार्यालय एकमुखी दत्त मंदीर, अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ येथे आज दुपारी ३ ते ५ यावेळेत होणार आहे.

स्पर्धा म्हटली की, स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन पदार्थ बनविणे आलेच, त्यासाठी लागणारा सर्व लवाजमा कसा जमा करायचा असा प्रश्न पडला असेल ना, स्पर्धकांची ही अडचण ओळखून पदार्थ घरी करून आणायची सवलत स्पर्धकांना देण्यात आली आहे. स्पर्धकांनी या स्पर्धेत फक्त खुसखुशीत, खमंग, चविष्ट आणि जरा हटके अशी शेव बनवून आणायची आहे. घरून तयार करून आणलेली शेव या ठिकाणी प्रदर्शित केली जाणार आहे.

सहभागी झालेल्या स्पर्धकांनी ही शेव आपण कशी बनवली याचे साहित्य, कृती एका कागदावर सुवाच्य अक्षरात लिहायची आहे. या कागदावर आपले नाव, पत्ता, फोन नंबर लिहणे गरजेचे आहे. स्पर्धा ३ ते ५ या कालावधीत जरी असली तरी स्पर्धकांनी वेळेआधी तेथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. एस.आर. केटरर्स, रविवार कारंजा यांच्या व्यवस्थापनाखाली असलेले चित्पावन मंगल कार्यालय हे या स्पर्धेचे व्हेन्यू पार्टनर आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. ज्यांना कल्चर क्लबचे सभासद व्हायचे आहे किंवा नूतनीकरण करायचे आहे अशांनी १९९ रुपयांचा चेक घेऊन यावा. या स्पर्धेची नाव नोंदणी पूर्ण होत आली असून ज्यांनी नाव नोंदणी केलेली नाही अशा स्पर्धकांनी वेळेवर नाव नोंदणी केली तरी चालेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आई-वडिलांनी मुलांचे बालपण जपावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलांचे बालपण त्यांच्या कायम लक्षात राहावे याची काळजी आई-वडिलांनी घेण्याची गरज आहे. यासाठी बालभवनसारख्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने त्यांना सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय बालभवन साने गुरुजी कथामालेचा पहिल्या सत्राच्या पावसाळी कविता गायन, शुद्धलेखन, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आकाशकंदील, भेटकार्ड इत्यादी स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून झळके यांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की, आपल्या या उपक्रमात इतक्या मोठ्या संख्येने मुलांनी पारितोषिके मिळवली याचा अतिशय आनंद होत आहे. सार्वजनिक वाचनालयासारख्या संस्थेने बाल भवनचा उपक्रम नेटाने चालविला आहे. त्याबद्दल आजची मुले भविष्यकाळात सावानाबद्दल नेहमीच कृतज्ञ राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या शंकाचे निरसन करून त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.अनेक विनोद सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना हसवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुर्ग संवर्धन’ला मिळाली दीडशे वर्षांपूर्वीची बखर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे दुर्मिळ वस्तू जमा करून जतन करण्याचा उपक्रम सुरू आहे. यात नाशिकच्या निसर्गप्रेमी प्रमिला पाटील यांनी त्यांच्याकडे परंपरेने चालत आलेली दीडशे वर्षांपूर्वीची दुर्मिळ बखर या उपक्रमासाठी भेट दिली.

शिवकालीन वस्तू, पुस्तके, नाणी, दगड, संकलन करून त्याचे संग्रह करून या वस्तू शाळांमधील विद्यार्थांना दाखवून गड किल्ल्यांची माहिती देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम दुर्ग संवर्धन तर्फे सुरू करण्यात आला आहे. दुर्ग संवर्धनने आतापर्यंत जिल्ह्यातील ३४ किल्ल्यांवर श्रमदान मोहीम राबविली आहे. यावेळी अनेक दुर्गप्रमींनी शिवराय मधील दुर्मीळ वस्तू ज्या विविध ठिकाणी विखुरल्या गेल्या आहेत. त्या गोळा करून त्याचा संग्रह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या दिशेने संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या उपक्रमात त्यांना ही बखर मिळाली आहे.

विविध घराण्यांची माहिती

बखर बघितल्यावर ती इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिली असावी असा अंदाज आहे. मूळ हस्त लिखितावरून ही प्रिंटिंग त्याकाळी केली गेली असावी. यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर माहिती दिली गेली आहे. या बखरीची मोठी रक्कम मिळत असतानादेखील पाटील यांनी ती विकली नाही. या बखरीमध्ये छत्रपती घराणे, बडोद्याच्या घराण्याची माहिती आहे.

तसेच शेवटच्या पेशव्यांचे झालेले हालदेखील या बखरीत वाचायला मिळतात. सन सव्वाशे पंचाहत्तरपासून ते एकूणऐंशी पर्यंतचे या बखरीत वाचावयास मिळते. या बखरीचे ३१ भाग असून हा भाग अठरावा आहे. शिवकालीन वस्तू, पुस्तके, नाणी, अवजारे किंवा इतर वस्तू असतील तर त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन आनंद बोरा यांनी केले आहे.

विश्रामगडावर दुर्गदर्शन

नाशिक : शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने ४० वी दुर्गदर्शन मोहीम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विश्रामगड येथे पार पडली. यावेळी दुर्ग संवर्धकांनी किल्ले वाचवा, आपला इतिहास वाचवा असा संदेश किल्ल्यावर दुर्गप्रेमी व पर्यटकांना दिला.

या विश्रामगड (पट्टागड) दुर्गदर्शन मोहिमेच्या प्रारंभी सिन्नर येथील हजारो वर्षापूर्वीचे गोंदेश्वर महादेव मंदिराची गडकोट संवर्धकांनी पाहणी केली. यावेळी संकेत नेवकर यांनी ‘जेव्हा गड बोलू लागला’ हे एकपात्री सादर केले. मोहिमेत राम खुर्दळ, प्रा.सोमनाथ मुठाळ, डॉ. अजय कापडणीस, के. सी. विसपुते, योगेश अहिरे आदी गडकोट संवर्धक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हंडाभर चांदण्या ‘भारंगम’ महोत्सवात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राची मराठी रंगभूमी गाजवत असलेल्या नाशिकच्या ‘हंडाभर चांदण्या’ या दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित प्रायोगिक नाटकाच्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिल्लीच्या एनएसडी अर्थात राष्ट्रीय नाट्यशाळेच्या वतीने १ फेब्रुवारी २०१७ पासून सुरू होणाऱ्या १९ व्या भारत रंग (भारंगम) महोत्सवासाठी या नाटकाची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून या वर्षीच्या ‘भारंगम’साठी निवड झालेले हे एकमेव मराठी प्रायोगिक नाटक आहे.

एनएसडीचा यंदाचा १९ वा ‘भारंगम’ महोत्सव असून, तो १९९९ मध्ये सुरू झाला आहे. आशिया खंडातील हा सर्वात मोठा नाट्योत्सव आहे. दि. १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या या फेस्टिवलमध्ये ५ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ४ वाजता दिल्लीतील एसआरसी अर्थात श्रीराम सेंटर ऑडिटोरियम येथे नाशिकच्या ‘हंडाभर चांदण्या’चा प्रयोग रंगणार आहे. प्रश्नांसह जगणाऱ्या आणि त्यातही लय, ताल शोधत जगणं सहज करून घेणाऱ्या आपल्या ग्रामीण भागातील हुंकार आता राजधानीतही उमटणार असून, यातील मास्तर, संभासकट डफडी-तुणतुण्याचे सूरही दिल्लीकरांच्या काळजात घर करणार आहेत.

‘हंडाभर चांदण्या’ने मुंबईतील आविष्कार, साहित्य संघ आणि चाळीसगावमधील महोत्सव गाजवला आहे. नुकताच नाट्यनिर्माता संघाच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचा एक लाख रुपयांचा कै. मोहन वाघ पुरस्कारही पटकावला असून, लेखन दिग्दर्शनासह सात वैयक्तिक पारितोषिकेही पटकावली आहेत.

भारत आणि विदेशातून आलेल्या तब्बल ६०० प्रस्तावांतून भारतीय ५०, तर विदेशातील १९ नाटकांची यंदा निवड झाली आहे. भारतातील रंगभूमीवरील ३२ तज्ज्ञ, समीक्षक आणि ज्येष्ठ अभ्यासकांच्या निवड समितीने ही निवड केली. ‘हंडाभर चांदण्या’च्या या यशाचे श्रेय खऱ्या अर्थाने संपूर्ण टीमवर्कला असल्याची प्रतिक्रिया लेखक दत्ता पाटील व दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी व्यक्त केली.

या दीर्घांकात प्राजक्त देशमुख, प्रणव प्रभाकर, गीतांजली घोरपडे, नूपुर सावजी, अरुण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. निर्मितीप्रमुख लक्ष्मण कोकणे असून, नेपथ्य ईश्वर जगताप व राहुल गायकवाड, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा श्रद्धा देशपांडे, रंगभूषा माणिक कानडे, संगीत रोहित सरोदे यांचे आहे. निर्मितीव्यवस्था सदानंद जोशी व कैलास पाटील यांची आहे.

असे आहे कथानक

नाटकात पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट यात मांडली आहे. लोकसंगीताच्या प्रभावी माध्यमातून सद्यःस्थितीवर साध्या जगण्यातून उपहासात्मक आणि टोकदार भाष्य करणारा हा दीर्घांक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्के वैरी आता सख्खेे मित्र!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर सिडको व इंदिरानगर परिसरात झालेल्या पक्षांतरांमुळे गेल्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढणारे आता गळ्यात गळे घालून एकत्र लढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पूर्वीचे विरोधक आता मित्र झाल्याचे चित्र मतदारांना दिसत आहे.

मागील महापालिका निवडणुकीत सिडकोत ११ प्रभाग असून २२ नगरसेवक कार्यरत आहेत. तसेच इंदिरानगर भागात तीन प्रभाग असून येथे सहा नगरसेवक कार्यरत आहे. आता सिडकोत सहा प्रभाग झाले असून इंदिरानगरमध्ये तीन प्रभाग झाले आहे. त्यामुळे सिडको व इंदिरानगर परिसरात नऊ प्रभाग मिळून ३६ नगरसेवक या भागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यंदा चार उमेदवारांचा प्रभाग असल्याने व प्रभागाचे भौगोलिक क्षेत्रही मोठे असल्याने अनेकांनी आपल्या सोयीने पक्षप्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. मनसेसह अन्य पक्षातून शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. या पक्षप्रवेशामुळे मात्र मागील निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरणारे आता गळ्यातगळे घालून निवडणूक लढणार असल्याचे ‘सख्ये वैरी पक्‍के मित्र’ असे काहीसे चित्र सिडको इंदिरानगर भागात निर्माण झाले आहे.

डॉ. हिरेंचे शहाणेंना बळ!
सिडकोत स्थायीचे माजी अध्यक्ष शिवाजी चुंभळे यांच्या विरोधात दोनदा लढणारे रमेश उघडे हे यंदाही शिवसेनेकडून इच्छुक आहेत. मात्र, आता चुंभळे यांनी शिवसेनत प्रवेश केल्यामुळे उघडे आणि चुंभळे एकाच पक्षाचा प्रचार करणार; हे मात्र निश्चित आहे. तसेच माजी नगरसेविका सुमन सोनवणे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या विरोधात लढणाऱ्या विद्यमान नगरसेविका कल्पना चुंभळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्याच्या प्रभाग ४६ मधून मनसेचे उमेदवार मुकेश शहाणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मागील निवडणूक डॉ. अपूर्व हिरे यांच्या विरोधात लढल्यानंतर आता शहाणे डॉ. हिरे यांच्यासोबत निवडणुकीत उतरू शकतात.

---

डॉ. कुलकर्णी-पाटील सोबत

इंदिरानगरच्या सध्या प्रभाग ४० मधून निवडून आलेल्या मनसेच्या डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्या विरोधात भाजपकडून असलेल्या राजश्री शौचे यांनी निवडणूक लढविली होती. आता मात्र डॉ. कुलकर्णी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कुलकर्णी व शौचे एकत्र प्रचार करतांना दिसणार आहे. अशी परिस्थिती सध्याच्या प्रभाग ५३ मध्ये आहे. तेथे गेल्या वेळी विजयी झालेले सतीश सोनवणे यांच्या विरोधात भाजपचे गोपाळ पाटील रिंगणात होते. आता मात्र नगरसेवक सोनवणे यांनीही भाजपात प्रवेश केल्याने दोघे विरोधात एकाच पक्षात आल्याचे या भागात दिसून येत आहे.

---

उमेदवारीबाबत अस्पष्टता

पक्षात नव्याने आलेले व सध्या पक्षात असलेले हे एकमेकांबरोबर एकाच प्रभागात लढणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही निश्चितता नाही. पूर्वीचे विरोधक आता एकाच पक्षात आल्याने येत्या काळात विरोधक मित्र झाल्याचे चित्र येत्या प्रचारात दिसणार आहे. अजूनही बरेच जण प्रवेश करू शकतात. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी डॉ. अपूर्व हिरे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपचा सिडकोत एक नगरसेवक गणला जातो, तर शिवसेनेची ही नगरसेवक संख्या सातवरून १२ पर्यंत गेली आहे.

---

निष्ठावंतांची वाढती खदखद

निवडणुकीपर्यंत अजून कोण कितीतरी पक्षांतर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या पक्षप्रवेशांमुळे वर्षांनुवर्षे निष्ठावंतांवर अन्याय होणार असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. पक्षश्रेष्ठींनी भेदभाव न करता उमेदवारी देतांना आपला कौल द्यावा, असे मत आता निष्ठावान कार्यकर्ते व्यक्‍त करीत आहेत. तसेच अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षांतर करावे की काय याबाबतच्या बैठका सुरू केल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर मलनिस्सारण केंद्रासाठी २९ कोटी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक दिवसांपासून निधीअभावी रखडलेल्या गंगापूर गाव येथील १८ दशलक्ष लिटर क्षमतेचा मलनिस्सारण केंद्राचा समावेश केंद्राच्या अमृत योजनेत झाला आहे. सोमवारी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीने या एसटीपी केंद्रासाठी २९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे १९ दशलक्ष लिटर क्षमतेचा हा प्रकल्प कार्यान्वीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी मार्च २०१५ मध्येच जागा ताब्यात घेण्यात आली आहे. हा प्रकल्प कार्यान्वीत झाल्यास गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीत मोठा वाटा उचलला जाणार आहे.
गंगापूर येथील १८ दशलक्ष क्षमतेच्या मलजल शुद्ध‌िकरण केंद्रासाठी मार्च २०१५ मध्ये तब्बल साडेनऊ कोटी रुपये देऊन भूसंपादन करण्यात आले. परंतु निधीअभावी हा प्रकल्प रखडला होता. मध्यंतरी सिंहस्थाच्या शिल्लक निधीतून हा प्रकल्प करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु राज्य सरकारने तो फेटाळला होता. त्यामुळे अमृत योजनेत या प्रकल्पाचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केला जात होता. सोमवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अमृत योजनेची बैठक झाली. त्याला आयुक्त अभिषेक कृष्णा व अधीक्षक अभियंता यू. बी. पवार उपस्थित होते.
या बैठकीत अमृत योजनेत गंगापूर एसटीपीचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली. हे केंद्र उभारण्यासाठी २९ कोटींच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. अमृत योजनेत हे केंद्र उभारण्यासाठी राज्यसरकार १७ टक्के तर केंद्र सरकार ३३ टक्के वाटा उचलणार आहे. तसेच ५० टक्के वाटा महापालिकेला उचलावा लागणार आहे. या भागात एमआयडीसीचे दूषित पाणी येते. त्यामुळे नदीचे प्रदूषण होते. आता हा प्रकल्प मार्गी लागल्यास नदीचे प्रदूषणही कमी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील पुलांच्या ऑडिटचा धडाका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मान्सून परतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेतले आहे. महाड येथील दुर्घटनेनंतर अशा प्रकारच्या ऑडिटची घोषणा करण्यात आली होती. जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक पुलांचे ऑडिट झाल्यानंतर त्यांची सद्यःस्थिती स्पष्ट होणार आहे.
महाड येथील पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्ट्रक्चरल ऑड‌िटचे आदेश दिले. त्यानंतर धोकादायक पुलासह इतर पुलांचीसुध्दा तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली. त्याला दोन महिनेही उलटत नाही तोच आता पोस्ट मान्सूनमुळे पुन्हा त्याच पुलांची तपासणी करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे. त्यात मायनर, मेजर व लाँग ब्र‌िजचा समावेश आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत ही तपासणी पूर्ण केली जाणार आहे.
पुलाबाबत दुर्लक्ष केल्यामुळे महाडची दुर्घटना घडली व त्यानंतर संपूर्ण शासकीय यंत्रणाच कामाला लागली. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास एखाद्या दुर्घटनेची जबाबदारी आपल्यावर येऊ शकते, ही जाणीव सार्वजनिक बांधकाम विभागाला झाल्यानंतर खाते आता जागृत झाले आहे. दरवर्षी प्री-मान्सून आणि पोस्ट मान्सून अशी पुलांची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात असली, तरी तो सोपस्कारच होता. पण आता याबाबत शासनानेसुध्दा निधीसाठी हात ढिला सोडल्यामुळे धोकादायक पुलांचे काम करणे आता अधिकाऱ्यांना सोपे जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात नाशिक विभागात मायनर ८९४ ब्र‌िज आहेत, तर मेजर ब्र‌िजची संख्या १४२ आहे. त्यानंतर लाँग ब्र‌िजची संख्या तीन आहे. यात नऊ पूल ब्रिट‌िशकालीन आहेत. त्यामुळे या सर्व पुलांबरोबरच छोट्या पुलांचीही तपासणी केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे आता पुढील वर्षात हीच तपासणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग होणार असून, त्यानंतरही या पुलांची नियमित तपासणी केली जाणार आहे. त्यात नियमित निरीक्षणे, संरचनात्मक व बांधकाम या विभागामार्फत सद्यस्थितीविषयक तपासणी, नवीन पुलांचे काम केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या सुट्या घटल्या; विद्यार्थी, पालक नाराज

$
0
0

शाळा यंदा केवळ पंधरा दिवसच राहणार बंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या सुट्यांमध्ये घट झाल्याने यंदा विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. सोमवारी, शाळेच्या शेवटच्या दिवशीही शाळांबाहेर पालक व विद्यार्थ्यांमध्ये याबाबतच चर्चा असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे यंदा वेगवेगळ्या शिबिरांवरदेखील त्याचा परिणाम होणार आहे.

वर्षभरात सहामाही परीक्षेनंतर मिळणाऱ्या दिवाळीच्या सुट्या व वार्षिक परीक्षेनंतर मिळणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्यांचे विद्यार्थ्यांना विशेष आकर्षण असते. दरवर्षी साधारणपणे बावीस दिवस दिवाळीच्या सुट्या दिल्या जातात. या सुट्यांचा अंदाज घेऊनच कुटूंबांचे सहली, शिबिरे यांचे नियोजन केले जाते. मात्र, यंदा या सुट्या तेरा ते पंधरा दिवसांवर आल्या आहेत. दरवर्षीच्या तुलनेत सुट्यांचे प्रमाण कमी झाल्याने ही नाराजी आहे.

मागील वर्षीही कुंभमेळ्यात दिलेल्या सुट्या भरून काढण्यासाठी दिवाळीच्या सुट्यांमध्ये घट करण्यात आली होती. तर यंदाही विविध कारणांनी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेखातर दोन दिवस सुटी, मराठा मोर्चा, औरंगाबादला विनाअनुदानित शाळा शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ, नाशिक विभागातील शिक्षकांच्या मोर्चामुळे, तळेगाव येथील बालिका अत्याचार प्रकरण यांचा समावेश होता. तसेच प्राथमिक शाळांसाठी वर्षभरात २१० दिवस व माध्यमिक शाळांसाठी २३० ते २४५ दिवस कामकाज बंधनकारक आहेत. हे दिवस भरून काढण्यासाठी ही घट करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images