Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आयफोनचा विमा नाकारणे महागात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चोरीला गेलेल्या मोबाइलचा विमा नाकारणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायमंचाने दणका देत ४४ हजार ४४२ रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पाच हजारांचा अतिरिक्त दंडही ठोठावला आहे. त्यामुळे विमा काढूनही त्याचा क्लेम नाकारणाऱ्या कंपन्यांना आता जरब बसणार आहे. विशेष म्हणजे आपली बाजू मांडण्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडून कोणीच न आल्यामुळे न्यायमंचाने हा एकतर्फी निर्णय दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील ओढाजवळील शिलापूर येथील दिगंबर हरिश्चंद्र कहांडळ यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दिल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. कहांडळ यांनी अॅमेझॉन इनमार्फत अॅपल कंपनीचा आयफोन ४४ हजार ४४२ रुपयात घेतला. त्यानंतर त्यांनी सिस्का गेज सिक्युर कंपनीकडे १४९९ रुपये भरून विमा काढला. मात्र, ओढा येथे भाजीबाजारात त्यांचा आयफोन चोरीला गेला. त्याबाबत उगाव पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली व सिस्का कंपनीला त्याबाबत टोल फ्री क्रमांकावर कळवले. त्यानंतर कागदपत्राची पूर्तता सुध्दा करून दिली. पण सिस्का कंपनीने मेसेजद्वारे क्लेम नामंजूर केल्याचे कळविले. त्याविरोधात कहांडळ यांनी तक्रार केली.

तक्रारीनंतर ग्राहक न्यायमंचाने कोणतेही सबळ कारण नसतांना क्लेम नामंजूर केल्याचा निष्कर्ष काढत हा निर्णय दिला आहे. कहाडंळ यांच्याकडून अॅड. टी. एस. थेटे यांनी युक्तीवाद केला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी निकाल दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सलग तीन दिवसांत भूकंपाचे सात धक्के

$
0
0

कळवण तालुक्यातील ओतूरकर धास्तावले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कळवण तालुक्यातील ओतूर येथे गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत असल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. नाशिक शहरापासून सरासरी ८४ किलोमीटरवर हे धक्के बसले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सलग सात वेळा धक्के बसल्याने परिसरातील रहिवाशांनी भूकंपादरम्यान विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुक्यातील जिरवाडा, चिंचपाडा, अभोणा, कनाशी, जामले, हातगड, करंभेळ, शिंगाशी, बोरगाव, खिराड, वेरुळे, बापखेडा, देसगाव, जामले, बोरदैवत, देवळीवणी आदी गावांमध्ये अनेकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. दळवट आणि ओतूर येथे तर नेहमीच भूकंपाचे सौम्य धक्के बसत असतात. गेले तीन दिवस ओतूर गाव आणि आसपासच्या परिसरात सातवेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. शुक्रवार (दि.२१) रोजी सायंकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी २.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा ते रात्री अकरा या कालावधीत भूकंपाचे तीन धक्के बसले. २.१ ते २.८ रिश्टर स्केलचे हे धक्के होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिली. पुन्हा रविवारी पहाटे सव्वातीन ते पहाटे चार या वेळेत दोन, तर दुपारी एकच्या सुमारास भूकंपाचे धक्क्यांची भूकंप आधार सामग्री पृथ्थकरण कक्षाने नोंद केली आहे. अनुक्रमे २.७, २.१ आणि २.७ ‌रिश्टर स्केलचे हे धक्के होते. नाशिक शहरापासून ७६ ते ९६ किलोमीटर या अंतरात हे धक्के जाणवल्याची नोंद मेरी येथील भूकंपमापन वेधशाळेने केली आहे.

भूकंपात ही काळजी घ्या

भूकंप जाणवल्यास मोकळया जागी जावे. भूकंपादरम्यान वाहनात थांबू नये. गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर बंद करावे. बॅटरी, टॉर्च, प्रथोमोपचार पेटी जवळ बाळगावी. भूकंपादरम्यान फोटो फ्रेम व जड वस्तुंजवळ उभे राहू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानगी फास्ट ट्रॅकवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागातील बांधकाम परवानगीचा संथ प्रवास नवीन वर्षापासून संपणार आहे. ‘नगररचना’च्या सर्व परवानग्या फास्ट ट्रॅकवर येणार आहे. ऑनलाइन परवानग्यांसाठीची ऑटो डीसीआर यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. विशेष म्हणजे ‘नगररचना’मधील बांधकाम परवानगी फाइल्सचा प्रवास १५ दिवसांत संपेल. तसेच आपल्या फायलींचा प्रवास व त्यासंदर्भातील माहिती बिल्डरांसोबतच ग्राहकांनाही ऑनलाइन पाहता येणार आहे.

महापालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी, अभिन्यास मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्रासह अनेक परवानगर ‘नगररचना’तर्फे दिल्या जातात. परंतु, या विभागात केवळ ‘वजनदार’ फाइलींचाच प्रवास सुसाट होत असल्याची ओरड आहे. फाइल्स मंजूर करण्यासाठी वेगवेगळे फंडे या विभागात अवलंबले जातात. त्यामुळे हा विभाग नेहमीच वादात असतो. त्यामुळे या विभागातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परवानगी या ऑनलाइन देण्याचा निर्णय आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतला आहे. स्थायी समितीने यासाठी एक कोटी ३३ लाखांचे काम दिले आहे. पुण्यातील सॉफ्टेक इंजिनीअर्स प्रा. लि. कंपनीला काम देण्यात आले आहे. संबंधीत कंपनीकडून या प्रणालीचे आयुक्तांच्या उपस्थितीत मंगळवारी सादरीकरण करण्यात आले.

ऑटो डीसीआर प्रणाली इमारत आराखडा अर्ज व नकाशे ऑनलाइन सादर करता येणार आहे. बिल्ड‌िंग बायलॉजनुसार आपोआप मंजुरी मिळणार आहे. तसेच एफएसआय तपासणी संगणकाद्वारेच केली जाणार आहे. इमारत आराखड्याची छाननी, मंजुरी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर एसएमएस व इमेल अलर्ट, साईट व्हिजिट, सर्व शुल्क ऑनलाइन जमा होणार अशा सुविधा असणार आहे. त्यामुळे बिल्डरांची व सर्वसामान्यांची ‘नगररचना’च्या जाचातून सुटका होणार आहे. एखाद्या अभियंत्याने कामाला उशीर केल्यास ऑटोमॅटिक अलर्ट जनरेट होऊन संबंधीताला नोटिसही बजावली जाणार आहे. त्यामुळे ‘नगररचना’च्या कामात गतिमानता, पारदर्शकता येऊन महसुलाचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे.

नागरिकांनाही कळणार स्टेट्स
महापालिकेची ऑटो डीसीआर यंत्रणा आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली राहणार आहे. निश्चित कालावधीत प्रकरण मंजुरीची जबाबदारी अधिकाऱ्यांवर राहणार आहे. सर्वसामान्यांना घरबसल्या आपल्या संगणकावर गुगल मॅपिंगद्वारे बिल्डींगचे आराखडे पाहता येणार आहेत. तसेच संबंधित बिल्डिंगची स्थिती, बिल्डरांना टाकलेला प्लॅन याची इत्यंभूत ग्राहकांना पाहता येणार आहे. त्यासाठीची एरिया सर्च ही स्वंतत्र व्यवस्था या प्रणालीत करण्यात येणार असल्याने बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे.

ऑटो डीसीआर यंत्रणा स्वंयचलित असून त्यामुळे कारभार पारदर्शक होणार आहे. प्रक्रिया एका क्लिकसरशी आपल्या मोबाइल व कॉम्प्युटरवर पाहता येणार असल्याने सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टळणार आहे.
- अभिषेक कृष्णा, आयुक्त, महापालिका

प्रणालीचा असा होणार फायदा
बिल्डिंग नकाशांची स्वयंचलित छाननी
परवानग्या ६० ऐवजी १६ दिवसांत मिळणार
महापालिकेच्या उत्पन्नात होणार वाढ
बिल्डिंग नकाशे व आराखडे ऑनलाइन सादर होणार
गुगलबेस मॅपिंग होणार
नागरिकांना ऑटो सर्चची सुविधा
बिल्डिंगचे स्टेटस नागरिकांना वेळोवेळी समजणार
बिल्डर, अधिकाऱ्यांसाठी एसएमसएस अलर्ट सुविधा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ साक्षीदारांची साक्ष आजपासून

$
0
0

सरकारी पक्षाच्या अर्जास विशेष न्यायालयाची मंजुरी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकुल घोटाळा खटल्यात पूर्वी तपासलेल्या आठ साक्षीदारांची साक्ष पुन्हा तपासणीबाबत सरकारी पक्षाने न्यायालयात अर्ज केला होता. त्याला विशेष न्यायालयाने मंजुरी दिली. मात्र, या निर्णयाविरुद्ध बहुसंख्य आरोपी उच्च न्यायालयात गेले होते. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सरकार पक्षाकडून आजपासून या आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेशही न्यायाधीशांनी आरोपींच्या व‌किलांना दिले आहेत.

सरकार पक्षाच्या अर्जावर दिलेल्या निर्णयाविरुद्ध बहुसंख्य आरोपींकडून उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. त्यावर २४ व २५ ऑक्टोबरला कामकाज झाले. मात्र, आरोपीचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

मात्र, या प्रकरणातील सिंधू कोल्हे यांच्याविरुद्ध स्वतंत्र खटला चालविण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या खटल्याला नवीन क्रमांक दिला जाणार आहे. यासाठी पुन्हा सर्व आरोपींना न्यायालयात आज, बुधवारी उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. न्यायालयाकडून आरोप मान्य आहे किंवा नाही हे यावेळी ऐकून घेतले जाईल. यामुळे बुधवारी न्यायालयात सरकार पक्षाकडून या साक्षीदारांची साक्ष नोंदविली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयाचे न्या. आर. आर. कदम यांच्यासमोर काम झाले. या वेळी सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व आरोपीत गुलाबराव देवकर, राजेंद्र मयूर हेच आरोपी न्यायालयात उपस्थित होते. बुधवारी मात्र, सर्व आरोपींनी न्यायालयात उपस्थित राहावे, अशी सूचना न्या. कदम यांनी आरोपींच्या वकिलांना केली आहे.

सिंधू कोल्हेंचा खटला स्वतंत्रपणे

घरकुल घोटाळ्यात न्यायालयासमोर माजी नगराध्यक्षा सिंधू कोल्हे यांनी माफीचा साक्षीदार म्हणून कबुली जबाब देण्यात नकार दिल्याने त्यांना आरोपी करण्यात आले. मात्र त्याबाबतचा कोल्हे यांचा खटला स्वतंत्रपणे चालवण्यासाठी त्यांच्या वकिलांकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. अखेर तो मंजूर करून या खटल्याच्या स्वतंत्र गुन्हा क्रमांकासाठी आज कामकाज होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोइंग कारवाईत दुजाभाव का?

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलसमोरच्या रस्त्यावर टोइंग व्हॅनचालकांकडून केवळ दुचाकींवरच कारवाई केली जात असून, येथे उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांकडे सर्रास डोळेझाक केली जात असल्याचा आरोप दुचाकी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. येथे कारवाई करताना दुजाभाव का केला जातो, असा सवाल करून पोलिस प्रशासनाने शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्यांवर सरसकट कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त दुचाकीचालकांकडून केली जात आहे.

उंडवाडी पुलाला लागून असलेल्या या रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही असंख्य चारचाकी व दुचाकी वाहने सर्रासपणे येथे उभी केली जात असल्याचे चित्र आहे. येथील दुभाजकांच्या दोन्ही बाजूंना सर्वाधिक चारचाकी वाहनांच्याच रांगा लागलेल्या असतात. मनाई असतानादेखील उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांकडे पोलिस प्रशासनाने नेमलेल्या टोइंग व्हॅनचालकांकडून काणाडोळा केला जात असून, त्या ठिकाणी दुचाकी वाहने उभी राहिल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जात असल्याचा आरोप होत आहे. दुचाकी वाहनांपेक्षा अधिक जागा चारचाकी वाहनांना लागत असताना दुचाकी वाहनांवरच कारवाई का? असा सवाल दुचाकीचालकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात अन्यत्रदेखील थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असून, पोलिस प्रशासनाने सरसकट सर्वच वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कारवाई केवळ नावालाच

उंटवाडी परिसरातील या रस्त्याच्या दुभाजकांच्या दोन्ही बाजूंना चारचाकी वाहने रस्त्यांवर उभी राहत असतात. यात अनेकदा वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते खरी. परंतु, ती केवळ नावापुरतीच असल्याचा आरोप दुचाकीचालकांकडून केला जातो. दुचाकींप्रमाणेच चारचाकीदेखील या रस्त्यावर उभ्या असल्यास पोलिसांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---

या रस्त्यावर सुटीच्या दिवशी मोठी गर्दी असते. अनेक जण जागा मिळेल तिथे दुचाकी पार्क करतात. परंतु, येथे कारवाई करताना टोइंग व्हॅनकडून केवळ दुचाकी उचलल्या जातात. त्यामुळे चारचाकी वाहनांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न पडतो.

-गणेश पाटील, दुचाकीचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार घरफोड्यांत लाखोंचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीची लगबग सुरू असताना चोरटे सक्रिय झाले आहेत. सोमवारी दिवसभरात म्हसरूळ, तसेच जेलरोड परिसरातील दोन सोसायट्यांमधील चार फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. भरदिवसा आणि अल्पवधीत झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

दिंडोरीरोडवरील प्रभातनगर भागात भरदिवसा झालेल्या वेगवेगळ्या दोन घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे अलंकार चोरून नेले. ही घरफोडी एकाच इमारतीतील दोन फ्लॅटमध्ये झाली असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. जितेन सुरेश विचारे (शिवदशर्न अपा. वरद विनायक मंदिराजवळ, प्रभातनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विचारे कुटुंबीय व त्यांच्या शेजारी राहणारे कुटुंबीय सोमवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर चोरट्यांनी हात साफ केले. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. विचारे यांच्या घरातील बेडरूममधील कपाटातून रोकड व सोन्या-चांदीचे दागिणे असा सुमारे एक लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज, तर फ्लॅट क्रमांक तीनमधील कपाटातून दहा हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

जेलरोडला दोन ठिकाणी

भीमनगर येथील एकाच इमारतीतील दोन घरे फोडून चोरट्यांनी दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना सोमवारी भरदिवसा घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीदास दत्तू रणशूर (श्रीराम सोसायटी, बेला डिसुझारोड, भिमनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी रणशूर व शेजारी राहणारे विजय मुरलीधर जाधव यांचे कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेले असता चोरट्यांनी दोन्ही घरांचा कडी कोयंडा कापून कपाटातील रोकडसह सुमारे एक लाख ६० हजार ५०० रुपये किमतीचे दागिणे चोरून नेले.

कुरिअर बॅगवर चोरट्यांचा डल्ला

दुचाकीस लावलेली कुरिअरची बॅग चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना गंगापूररोड भागात घडली. या बॅगेत ग्राहकांचा सुमारे १२ हजार ६०४ रुपयांचा ऐवज होता. प्रवीण अंबादास बोराडे (पारिजातनगर, जेलरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. व्हेनेक्स कुरिअर कंपनीत कामास असलेले बोराडे सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आपले काम करीत असताना ही घटना घडली. नेर्लेकर हॉस्पिटल परिसरातील साईदर्शन सोसायटीत ते पार्सल देण्यासाठी गेले असता चोरट्यांनी दुचाकीस लावलेली व्हेनेक्स कंपनीची कुरिअर पार्सल बॅग चोरून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधर मतदार नोंदणीत अहमदनगरची आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी करण्यास आता दहाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत ५८ हजार ६०४ पदवीधरांनी नोंदणी केली असून, नाशिकपेक्षाही अहमदनगर जिल्ह्यात मोहिमेला प्रतिसाद चांगला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पदवीधर मतदारसंघासाठी नववर्षाच्या सुरुवातीला निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी जुन्या मतदार याद्या रद्द ठरविण्यात आल्या असून, नव्याने मतदार नोंदणीचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. १ ऑक्टोबरपासून नावनोंदणीला सुरुवात झाली. नोंदणी ५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार असून, मोहिमेला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. म्हणूनच २२ आणि २३ ऑक्टोबरला प्रशासनाने विशेष मोहीम राबविली. उत्तर महाराष्ट्रात या विशेष मोहिमेत १० हजार १६ अर्ज जमा झाले. त्यापैकी ४ हजार ३१५ अर्ज नगर जिल्ह्यात जमा झाले. त्या खालोखाल जळगावात एक हजार ९०६ अर्ज जमा झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात मात्र एक हजार ६९० अर्ज जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. धुळ्यात १२९०, तर नंदुरबारमध्ये ८१५ पदवीधरांनी मतदार नोंदणी केली.

उत्तर महाराष्ट्रात १ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत ५८ हजार ६०४ पदवीधरांनी मतदार नोंदणी केली आहे. सर्वाधिक १९ हजार ६४९ मतदार नोंदणी नगर जिल्ह्यात झाली असून, खालोखाल नाशिक जिल्ह्यात १४ हजार ५०८ जणांनी नोंदणी केली आहे. सर्वात कमी ६ हजार ३६८ मतदारांची नोंदणी नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. अधिकाधिक पदवीधरांनी जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच मंडल अधिकारी कार्यालयांत पोहोचून मतदार नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी डॉक्टरला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना परिचारिकेवर बलात्कार करून तिचा गर्भपात केला, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पंचवटीतील डॉ. चेतन सुभाष तांबे यास सत्र न्यायाधीश सुचेता घोडके यांनी दहा वर्षे सक्तमजुरी, तसेच पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार जुलै २०१३ मध्ये पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार, तसेच अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार (प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांनी केला. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, पंचवटीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या पीडित तरुणीला आरोपी तांबेने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी संबंध प्रस्थापित केले. गर्भधारणा झाल्यानंतर तांबेने पीडित मुलीचा गर्भपात घडवून आणला. मुलीने वेळोवेळी लग्नाची मागणी केली. मात्र, आरोपीने ती धुडकावून लावत तिला जातीवाचक शिवीगाळ केली. पीडित मुलीने पंचवटी पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली होती. न्यायाधीश सुचेता घोडके यांच्या कोर्टात सदर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ एकलहरे प्रकल्पग्रस्तांना १५ हजारांची वेतनवाढ

$
0
0


एकलहरे प्रकल्पग्रस्तांना १५ हजारांची वेतनवाढ

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकलहरे येथील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना १५ ते १८ हजार रुपयांची वेतनवाढ देण्याची मागणी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मान्य केली आहे. तसेच या प्रकल्पग्रस्तांच्या अन्य काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

एकलहरे प्रकल्पग्रस्त व कामगारांच्या प्रश्नावर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मंत्रालयात आमदार बाळासाहेब सानप यांच्या

नेतृत्वाखाली एकलहरे प्रकल्पग्रस्त कृती समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, कार्यकारी संचालक बोंद्रे आदी

अधिकारीही उपस्थित होते. महानिर्मितीच्या नवीन भरतीत प्रगत कुशल प्रशिक्षणार्थिंना ५० टक्के आरक्षण देणे, बीटीआयआय विद्यार्थ्यांचा

आयटीआयमध्ये समावेश करून घेणे, प्रकल्पग्रस्त कुशल प्रशिक्षणार्थींना वयाच्या ५८ वर्षांपर्यंत सेवेत ठेवणे, प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेप्रमाणे

महावितरणच्या वित्त वा इतर आस्थापनांत सामावून घेणे आदी विषयांवर चर्चा होऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तंत्रज्ञ-३ ची परीक्षा

पास न होणाऱ्या प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना कंत्राटी कामगार म्हणून सेवेत समाविष्ट करून घेणे, महानिर्मिती कंपनीच्या वसाहतीतील व

प्रकल्पबाधीत गावांतील विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी बोर्डाची शाळा सुरू करणे, जानेवारी २०१७ मध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी महावितरणमध्ये १००० जागांची भरती होत असल्याने या भरतीत सर्व प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देणे आदी निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस नाशिकरोड भाजप मंडलाध्यक्ष बाजीराव भागवत, कोटमगावचे सरपंच दिनेश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तानाजी गायधनी, हेमंत

गायकवाड, कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत म्हस्के आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकांचे गुडघ्याला बाशिंग

$
0
0

निवडणूक रंग : पंचवटी

---

रामनाथ माळोदे, पंचवटी

नाशिक महापालिकेच्या १९९२ ते २००७ या चार पंचवार्षिकच्या काळात एकदा, दोनदा किंवा तीन वेळा नगरसेवकपद भूषविणारे अनेक जण आहेत.

वेगवेगळ्या कारणांनी त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यातील काहींना आरक्षणामुळे संधी मिळाली नाही, तर काहींनी पुन्हा पुन्हा प्रयत्न

करूनही मतदारांनी त्यांना नाकारले. मात्र, चार सदस्यीय प्रभाग रचनेत निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध झाल्याने असे अनेक माजी नगरसेवक

गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. नशीब आजमावण्यासाठी त्यांनी सारी शक्ती पणाला लावण्याची तयारी केली आहे.

पहिल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये वॉर्डस्तरीय रचना होती. नंतर तिसऱ्या पंचवार्षिकला त्रिसदस्यीय प्रभाग रचना झाली. चौथ्या पंचवार्षिकला पुन्हा

वॉर्डरचना झाली, पाचव्या पंचवार्षिकला दोन सदस्यांची प्रभाग रचना झाली होती आणि आता थेट चार सदस्यीय प्रभाग रचना झाल्याने प्रभागाचा

विस्तार आणि मतदारांची वाढलेली संख्या यांना तोंड देण्यासाठी परिचित उमेदवारांना चांगली संधी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेली काही

वर्षांपासून पदापासून वंचित राहिलेल्या माजी नगरसेवकांनी जय्यत तयारी करण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

दहा वर्षांनंतर पवार

२००२ च्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत अरुण पवार निवडून आले होते. त्यानंतर त्यांचा भाग हा महिलांसाठी राखीव झाला. त्यामुळे त्यांच्या पत्नी

शालिनी पवार यांनी दहा वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व केले. येत्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग एकमधील एक जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी

असल्याने अरुण पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

भोगे, कोशिरे यांचे काय?

१९९२ च्या पहिल्या पंचवार्षिकनंतर ज्या काही निवडणुका लढविल्या त्यात भगवान भोगे यांना पराभवाचेच धनी व्हावे लागले. मात्र, त्यांच्या पत्नी (कै.)

आशा भोगे आणि कन्या रिमा भोगे यांच्या हाती मतदारांनी सत्ता दिली. २०१२ च्या निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभूत झालेले शरद कोशिरे यांनी पुन्हा

लढण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र, ते ज्या भागातून निवडणूक लढवित आहेत. त्या भागातील महापालिका निवडणुकीचा इतिहासाकडे वळून

बघितले असता या भागात राहणाऱ्या नगरसेवकाला पराभवच पत्करावा लागलेला आहे.

कर्डक-धोत्रे-भोगे पुन्हा एकदा

एकेकाळी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या फुलेनगरसारख्या झोपडपट्टीच्या भागात भाजपच्या तिकिटावर रुख्मिनी कर्डक यांनी १९९७ मध्ये विजय मिळविला

होता. त्यानंतर मात्र त्या पराभव पत्करावाला लागला. लक्ष्मण धोत्रे हे काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांनी येत्या निवडणुकीची तयारी अगोदरपासून सुरुवात

करताना भाजपची वाट धरली आहे. रिमा भोगे या भागातून पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागल्या आहेत.

संधीचे सोने करण्याची आस!

२०१२ च्या निवडणुकीसाठी महिला राखीवतेमुळे कमलेश बोडके यांची संधी हुकली. मात्र, तेथून त्यांनी मातोश्री फुलावती बोडके या निवडून आल्या. येत्या

निवडणुकीत त्यांना संधी मिळणार असल्याने त्यांची तयारी सुरू झाली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये हरिभाऊ लासूरे नगरसेवक होते.

त्यांना या निवडणुकीत लढण्याची जय्यत तयारी केली आहे. २००२ च्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत उल्हास धनवटे आणि वॉर्डरचनेत महिला राखीव

झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री धनवटे यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर झालेल्या पक्षबदलामुळे त्यांना तिकिटापासून वंचित राहावे लागले

होते. चार सदस्यीय प्रभाग रचनेत त्यांना संधी मिळणार आहे.

तांदळे, खोडे, बागूल यांना संधी

२०१२ च्या निवडणुकीसाठी अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी जागा राखीव झाल्यामुळे डॉ. जगन्नाथ तांदळे यांची संधी हुकली होती. येत्या निवडणुकीत

ही संधी चालून आलेली आहे. दोनदा नगरसेवक झालेले पुंडलिक खोडे हे १० वर्षांपासून सत्तेपासून दूर आहेत. त्यांच्या २०१२ मध्ये पराभवाचा धक्का

बसलेले संजय बागूल यांना प्रभाग सहामधून निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली आहे.


शिंदे, खेताडे, सूर्यवंशी यांच्याकडे लक्ष

शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर तिनवेळा नगरसेवक झालेले अॅड. जे. टी. शिंदे यांनी १९९२, १९९७ आणि २००७ या पंचवार्षिकमध्ये आडगावचे

प्रतिनिधित्व केले. या तिन्हीही निवडणुका वॉर्डस्तरीय होत्या. २००२ च्या त्रिसदस्यीय प्रभाग निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. तसेच २०१२

च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी पुष्पावती शिंदे यांचा पराभव झाला होता. प्रभागरचनेत त्यांचा प्रभाव कमी पडत असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या

स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच पोटनिवडणुकीत सुरेश खेताडे यांनी विजय मिळवून राष्ट्रवादीचे खाते उघडले. त्यानंतर २००२ च्या निवडणुकीतही त्यांचा

विजय झाला होता. २०१२ च्या निवडणुकीत पराभूत झालेले अनंत सूर्यवंशी हे देखील तयारीला लागले आहेत. त्यांच्यासह खेताडे, अॅड. शिंदे या माजी

नगरसेवकांकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने नव्याने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर मंगळवारी शेवटच्या दिवशी २२ हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या. त्यामुळे हरकतींची संख्या आता ३२ झाली आहे. या हरकतींवर सुनावणींसाठी कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची आयोगाने नियुक्ती केली असून, सुनावणीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

विद्यमान नगरसेविका वैशाली भागवत यांच्यासह शिवसेनेचे माजी सभागृहनेते भगवान भोगे यांनी हरकत घेतली आहे. महापालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रभार रचना जाहीर झाल्यानंतर सध्या हरकती व सूचना मागविल्या आल्या होत्या.

चार सदस्यीय प्रभागरचनेवर आक्षेप घेण्यासह प्रभागांमधील अदलाबदल तसेच संपूर्ण प्रभागरचनेवरच हरकतींचा समावेश आहे. शेवटच्या दिवशी भगवान भोगे यांनी पूर्ण प्रभागरचनेवरच आक्षेप घेतले

असून प्रभाररचना ही जातीच्या आधारे व राजकीय दबावाखाली केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर रमेश कडलग (प्रभाग क्र. ८), सुरेश देवरे (प्रभाग क्र. २१ व २९), सुधीर डोळस (संपूर्ण प्रभागरचना), राजेंद्र जाधव (प्रभाग क्र. २०), निवृत्ती अरिंगळे (प्रभाग क्र. १९), वैशाली भागवत (प्रभाग क्र. २२), बंडू जाधव (प्रभाग क्र. २२ व ३१), अमोल कांदे (प्रभाग क्र. ६), कल्पना पाठक (चार सदस्यीय प्रभागरचना), तेजस गायकवाड (प्रभाग क्र. ७), नंदन भास्करे (प्रभाग क्र. ७ व १४), तेज शिरसाठ (प्रभाग क्र. १४), उद्धव वाघुळे (प्रभाग क्रं. १७) यांनी दाखल केल्या आहेत. या हरकतींच्या सुनावणीसाठी दीपक कपूर यांची नियुक्ती झाली आहे.

---

भगवान भोगेंचा भाजपवर वार

शिवसेनेचे माजी सभागृह नेते भगवान भोगे यांनी संपूर्ण प्रभागरचनेवरच आक्षेप घेत, ही प्रभागरचना जातीय आधारावर व राजकीय दबावाखाली तयार केल्याचा आरोप केला. पंचवटीतील काही प्रभागांमध्ये विशिष्ट जाती, भाषिक मतदारांचा समावेश केला आहे. काही ठिकाणी नैसर्गिक तत्वे पाळण्यात आलेली नाहीत. छोट्या प्रभागांचा फायदा भाजपला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. प्रभाग क्र. १५ हा माजी आमदार वसंत गिते यांच्यासाठी लहान करण्यात आला आहे. निवडक पदाधिकाऱ्यांना निवडून येणे सोपे होण्यासाठी काही ठिकाणी स्लमचे विभाजन करण्यात आले. प्रभागरचना ही अगोदरच फोडण्यात आल्याचा आरोप भोगे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यभेसळीवर नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत (एफडीए) अन्न पदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांच्या तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत २९ ठिकाणी कारवाई करण्यात येऊन अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मोहिमेअंतर्गत खवा, मावा, बर्फी, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप आदि अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. नाशिक विभागात खवा, मावा आणि मिठाईचे ८५ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी १२ ठिकाणी १२ लाख ८ हजार किमतीचा १० हजार ५९८ किलो साठा जप्त करण्यात आला. खाद्यतेल, वनस्पती आणि तुपाचे १०४ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी १७ ठिकाणी कारवाई करून ४४ लाख ६९ हजार रुपयांचा २४ हजार ८८५ किलो साठा जप्त करण्यात आला. मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी मिठाई ताजी असल्याची खात्री करून खरेदी करावी. माव्यापासून तयार केलेली मिठाई २४ तासाच्या आत तर बंगाली व तत्सम मिठाई ८ ते १० तासाच्या आत सेवन करावी. खराब मिठाई नष्ट करावी. तेल-तूप खरेदी करताना त्यावरील दिनांक पाहूनच खरेदी करावे, असे आवाहन ‘एफडीए’ने केले आहे.

अन्नपदार्थांविषयी करा तक्रार
अन्नपदार्थ खरेदी करताना शंका असल्यास सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, उद्योग भवन, ५ वा मजला कक्ष क्रमांक २१ सातपूर रोड नाशिक येथे प्रत्यक्ष किंवा २३५१२००, २३५१२०१, २३५१२०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

वजनमापांसंबंधी तक्रार
दुकानदारांविषयी तक्रार असल्यास विभागीय महसूल कार्यालयातील वैध मापन यंत्रणा विभागात लेखी तक्रार अथवा कार्यालयीन वेळेत ०२५३-२४५५६९६ या नंबरवर संपर्क साधून तक्रार करू शकतात. नाशिकसाठी मेरी येथील कार्यालयात किंवा कार्यालयीन वेळेत ०२५३-२५३१९३९ या क्रमांकावर तक्रार दाखल करू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौघांना सव्वा कोटीला चुना

$
0
0

वेगवेगळ्या चार घटनांमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जमीन खरेदी-विक्री, सरकारी नोकरीचे आमिष तसेच औषध खरेदी अशा वेगवेगळ्या चार घटनांमध्ये संशयितांनी तब्बल एक कोटी १७ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुंतवणूकदारांसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.

फसवणुकीची एक घटना आडगाव शिवारात घडली. येथील जमीन विक्रीच्या व्यवहारात प्रारंभी २५ लाख रुपये देऊन नंतर व्यवहार पूर्ण न करता फसवणूक करण्यात आली, अशी फिर्याद भागवत अभिमन बंड (रा. लोकमंगल सोसायटी कोनार्कनगर) यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. या प्रकरणी कमलेश मांगिलाल चोपडा यांनी २५ लाख रुपये व्यवहारापोटी घेतले, तर किर्ती चोपडा आणि योगेश निकम यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. मात्र तिघांनीही व्यवहार पूर्ण केलेला नाही, असे बंड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

कृषी विक्रेत्याला गंडा

ठगांनी दिंडोरी नाका येथील कृषी औषधे विक्रेत्याला अडीच लाख रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी क्रिस्ट स्टोम्प, डॉ. लुईस, डॉ. कॉसमॉस आणि नेहा पटेल या चौघांनी अकपका औषधाची मोठ्या खरेदीची ऑर्डर नोंदवली आणि त्यापोटी अडीच लाख रुपये घेऊन सर्वजण फरार झाले. यानंतर, पाटील अॅण्ड सन्सचे संचालक संदीप विक्रम पाटील यांनी संशयितांशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यास प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे समजल्याने पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पैशांबाबत चौकशी केली की संशयित उडवाउडवीची उत्तरे देत असे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादींनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा बांधकाम व्यावसायिकांविरोधात उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वसिम इस्माईल शेख (श्यामकुंज रो हाऊस लॅमरोड) आणि विलास मारुती पाटील (प्रियंका टॉवर, जुना सायखेडारोड) अशी संशयित व्यावसायिकांची नावे आहेत. सन २०१३ ते २०१६ या काळात दसक शिवारातील मिळकतीबाबत लॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट करूनही ते पूर्ण केले नसल्याची तक्रार विजय आढाव (रा. कैलास सोसायटी जेलरोड) यांनी उपनगर पोलिसांकडे दिली. त्यानुसार, पोलिसांनी संशयिताविरोधात महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट तसेच रेग्युलेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ फ्लॅट अ‍ॅक्ट २०१६ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नोकरी लावून देण्याच्या नावाखाली लूट

फसवणुकीची आणखी एक घटना इंदिरानगर परिसरात घडली. येथील गजानन महाराज मंदिर भागात राहणाऱ्या महिलेस पोलिस खात्यात नोकरीस असल्याचे भासवून महिलेच्या सुनेला नोकरीस लावण्याच्या आमिषाने दोन लाख रुपये घेतल्याची तक्रार कलावती रतन निकुंभ यांनी इंदिरानगर पोलिसांकडे दिली. देवीदास खराटे, ज्ञानेश्वर खराटे, जयश्री खराटे आणि सखुबाई खराटे (सर्व रा. आकृती बिल्डिंग, सुचितानगर) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, संशयितांनी सुनीता कुलाल यांच्याकडून तीन लाख रुपये आणि सुनील बाथम यांच्याकडून अडीच लाख रुपये या प्रमाणे सात लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. पोलिस असल्याचे भासवून व पोलिसात नोकरी लावून देतो, असे सांगत वरील संशयितांनी फिर्यादींकडून पैसे उकळले. मात्र, पैसे दिल्यानंतर अनेक महिने कोणालाही नोकरी लागली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी साजरी करणार काळी दिवाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहकारी बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना सावकारांच्या दारी जावे लागत आहे. सरकार वाऱ्यावर सोडत असल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकरी काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा जिल्हा विविध विकास सेवा सहकारी सोसायटी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. शेतकरी, तसेच ‌सहकारी सोसायट्यांच्या हिताचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर केंद्र तसेच राज्य सरकारच्या मंत्र्यांसमोरच जिल्ह्यात शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे.

राज्यात गावपातळीवर विविध विकास सेवा सहकारी सोसायटीमार्फत कर्जपुरवठा केला जातो. आशिया खंडात सर्वाधिक कर्जपुरवठा करणारी सहकारी बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचा लौकीक आहे. यंदा आतापर्यंत १७४० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले असून कर्जवाटपाचा आराखडा राज्य सरकार, सहकार विभाग राज्य सरकारी बँकेस तसेच नाबार्डला सादर करण्यात आला. जिल्ह्यातील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत कर्जवाटप करायचे होते. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत कर्जवाटप करणे आवश्यक असून जिल्ह्यातील एक लाख शेतकरी कर्जापासून वंचित आहेत. या कर्जाचे वाटप केले जावे यासाठी चार महिन्यांपासून विविध संघटना शेतकरी, जिल्हा बँक संचालक आमदार, खासदार तसेच सहकार मंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करीत आहेत. वंचित एक लाख शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करता यावा, यासाठी ४५० कोटींची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कर्ज रक्कम जिल्हा बँकेला उपलब्ध झाली नसल्याची खंत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना ८० टक्के कर्जपुरवठा करावा असे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी स्पष्ट निर्देश दिले असतांनाही अद्याप कर्ज वितरणासाठीचे ४५० कोटी रुपये राज्य सरकारने बँकेमार्फत उपलब्ध करून दिलेले नाहीत. विविध कार्यकारी सोसायट्यांना उत्पन्न मिळवून देणारे आणि मुदतीत कर्ज भरणारे २५ हजार शेतकरी कर्जाअभावी अडचणीत आले आहेत.

द्राक्षबागा संकटात

द्राक्षबाग छाटणी, डिपींग, फवारे, औषधे यांसाठी शेतकऱ्याला कर्जाची अत्यंत गरज आहे. एकीकडे मुठभर उद्योगपतींना एक लाख २३ हजार कोटींची सवलत दिली जात असताना अडचणीत आलेल्या आणि शेतकऱ्यांना सातत्याने मदत करणाऱ्या सहकारी बँकांना वाऱ्यावर सोडल्याने आंदोलनादरम्यान निषेध नोंदविण्यात आला. विविध विकास सोसायट्या आणि सहकार चळवळ वाचविण्यासाठी जिल्ह्यातील वंचित एक लाख शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्या, अशी मागणी संघटनेने केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत गायखे, राजू देसले, सुरेश रायते, संपतराव वक्ते, मधुकर शिंदे, राजाराम रायते, सचिन खालकर आदींसह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगा, उमेदवारी अर्ज भरावा तरी कसा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालिका निवडणुकीसाठी यंदा ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार असले तरी या वेबसाईटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने उमेदवारांना अर्ज सादर करताना अडचणी आल्या. विशेष म्हणजे ऑफलाइन अर्ज भरून घेण्याचीही परवानगी नसल्याने सांगा आम्ही अर्ज तरी कसे भरावे, असा सवाल उमेदवारांकडून उपस्थित होऊ लागला आहे. अर्ज भरण्यासाठी आता अवघे चारच दिवस उमेदवारांच्या हाती ‌शिल्लक आहेत.

जिल्ह्यात सहा नगरपालिकांच्या निवडणुका होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाला नाही. मंगळवारी हा अर्ज ज्या वेबसाईटवरून भरावा लागणार आहे, त्या वेबसाईटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाले. त्यामुळे दुपारपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. ऑफलाइन अर्ज भरून घेण्याबाबतही निवडणूक आयोगाचे निर्देश नसल्याने अर्ज कसा भरावा याची विचारणा करण्यासाठी काही उमेदवारांनी थेट याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे (प्रांताधिकारी) धाव घेतली. त्यांनीही जिल्हा निवडणूक विभागाशी संपर्क साधला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत यावर तोडगा निघेल, असे प्रशासनाकडून त्यांना सांगितले जात होते.

येत्या २७ नोव्हेंरबला होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोगाच्या वेबसाईटवर नामांकन दाखल करणे अनिवार्य आहे. अर्ज दाखल केल्यानंतर पोचपावती निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे.

उमेदवारांची धावपळ

यंदा पहिल्यांदाच हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे उमेदवारांची धावपळ होत आहे. काही उमेदवारांनी सोमवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. मात्र वेबसाईटवर माहितीच उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले. याबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातीय तणावामागे मुख्यमंत्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना, त्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यापेक्षा मुख्यमंत्री या मोर्चामुळे दलित समाज घाबरलाय असे सांगत मराठा व दलित समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा घणाघाती प्रहार काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला.

भाजप व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ गुंडांना हाताशी घेऊनच राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचे काम करत असून, मुख्यमंत्री मराठा व बहुजनद्वेषी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वेळीच निर्णय घेतला नाही तर, पुढचा टप्पा व उद्रेक मुख्यमंत्र्यांसह सर्वांनाच पचवता येणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.

आमदार राणे यांनी मंगळवारी तळेगाव येथे जाऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पीड‌ित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत आमदार राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजप व शिवसेनेवर शरसंधान साधले. मराठा समाजाचे २९ मोर्चे निघालेले असतानाही मुख्यमंत्र्यांना जाग आलेली नाही. अजूनही ते समाजाने चर्चेसाठी पुढे यावे असे सांगत आहेत. आता पुरे झाल्या चर्चा. निवेदनातून मागण्या पोहचलेल्या आहेत. त्यावर निर्णय घेऊन मराठा सामाजाला आरक्षण द्या अन्यथा मोर्चाचा उद्रेक होईल असा इशारा त्यांनी दिला. समाजाची अस्वस्थता मोर्चातून व्यक्त होत असताना मुख्यमंत्री काहीही करत नसून, वेळकाढू धोरण राबवित असल्याचे ते म्हणाले. ‘ऐ दिल है मुश्किल’ची मांडवली करण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ मिळतो, पण मराठा समाजाच्या मागण्या सोडविण्यास वेळ नाही का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मराठा समाजाचे मोर्चे शांततेच्या मार्गाने निघत असताना या मोर्चामुळे दलित समाज घाबरला असल्याचे खुद्द मुख्यमंत्रीच सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीच मराठा व दलित समाजात तेढ निर्माण करत आहेत. गुंडांना हाताशी धरून भाजप व संघ जातीय तणाव निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्र्यांनीच ओतले तेल

तळेगाव प्रकरणाला जातीयतेचा रंग देण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले असून, झालेल्या उद्रेकास पालकमंत्री गिरीश महाजन जबाबदार असल्याचा आरोपही राणे यांनी केला. पालकमंत्र्यांनी गुंड पवन पवार यास हाताशी धरून जातीय दंगली घडविल्या तसेच आगीत तेल ओतून मुंबईला पळून गेल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात जाब विचारणार असून, या प्रकरणावर पालकमंत्र्याना हटविण्याची मागणी करणार असल्याचे राणे म्हणाले.

युतीमुक्तीशिवाय खड्डेमुक्ती नाही

मुंबईच्या खड्ड्यांवर राणे यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युती पैसा खात असल्याचे सांगत, ही युती मुक्त केल्याशिवाय मुंबई खड्डेमुक्त होणार नसल्याचे नितेश म्हणाले. मुंबईतील हवामान पेंग्विनला मानवणारे नाही. केवळ करदात्यांच्या पैशांवर बालहट्ट पुरविले जात असल्याचा टोला त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅशनल कामगार पॅनलचे प्रेस ईपीएफमध्ये वर्चस्व

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रेस व मिन्ट महामंडळातील ईपीएफ ट्रस्टच्या पंचवार्षिक निवडणुकीत नॅशनल कामगार पॅनलचे ज्ञानेश्वर जुंद्रे (आयएसपी, नाशिकरोड ४४६९), सुनील आहिरे (नाशिकरोड सीएनपी, ४४०५), नवरत्न (देवास प्रेस ४४५०), समीर शर्मा (कोलकाता प्रेस ३९५०), डी. सुरेश (हैदराबाद प्रेस ३८८५) हे उमेदवार बहुमताने विजयी झाले. नाशिकरोड प्रेसमध्ये नॅशनल आपला पॅनलचे उमेदवार सुरेश बोराडे (११६९) व सतीश निकम (१०००) हे पराभूत झाले. देशात नॅशनल कामगार पॅनलची सलग दुसऱ्यांदा सत्ता आली.

देशभरातील एकूण पाच जागांसाठी तीन अपक्षांसह तेरा उमेदवार होते. देशभरात मिळून ७७२९ मतदार होते. नाशिकरोड प्रेसमधून नॅशनल कामगार पॅनलचे जुंद्रे व आहिरे तर देवास प्रेसमधून श्री नवरत्न, कोलकता प्रेसमधून समीर शर्मा, आणि हैदराबाद प्रेसमधून डी. सुरेश विजयी झाले. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जल्लोष करण्यात आला. नंदू पाळदे, माधवराव लहागे, राजेश टाकेकर, दिनकर खर्जुल, उत्तम रकिबे, उल्हास भालेराव, शिवाजी कदम, जयराम कोठुळे, रमेश खुळे, इरफान शेख, ज्ञानेश्वर गायकवाड, अशोक आहिरे, अशोक पेखळे, डा. चंद्रकांत हिंगमिरे, साहेबराव गाडेकर, भगवान मोरे, गणेश काळे, रमेश जाधव, उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी कमी; प्रस्ताव अधिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच आमदार झपाटून कामाला लागले आहेत. आमदार निधीपेक्षा अधिक कामांचे प्रस्ताव आमदारांनी दाखल केले असून, या कामांद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच, यानिमित्ताने का असेना येत्या काळात विविध विकास कामे मार्गी लागणार आहेत.

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यातील आमदारांनी आर्थिक वर्ष संपण्याअगोदर आपल्या निर्धारीत निधीपेक्षा जास्त कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पाठवले आहेत. येत्या पाच महिन्यात जिल्ह्यात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे मुक्त हाताने या निधीचे प्रस्ताव देण्यात आले आहे.

आमदारांबरोबरच जिल्ह्यांतील खासदारांनी आपल्या पाच कोटीच्या निधीतून बरेच प्रस्ताव दिले असले, तरी आमदारांच्या तुलनेत ते कमी आहेत. विशेष म्हणजे यात पाच कोटीची मर्यादा अद्याप ओलांडली नाही. त्यामुळे मार्च अखेर हे प्रस्ताव दिले जाणार आहेत. आमदारांनी दिलेले जास्तीचे प्रस्ताव चक्रावून टाकणारे आहेत. आमदार निधीतून दरवर्षी दोन कोटी रुपये खर्च करण्याची मर्यादा असली तरी त्यापेक्षा जास्त प्रस्ताव याअगोदरही दिले गेले आहेत. पण यावेळेस त्याची संख्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढली आहे.

या निवडणुका मार्च अखेर होणार असल्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असल्यामुळेच ही घाई कऱण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकांमुळे त्या-त्या पालिकांचे क्षेत्र सोडून जिल्ह्यात आचारसंहिता लागू केलेली नाही. त्यामुळे आमदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर महानगर पालिकेच्या निवडणुका आहे.त्यामुळे त्याची आचारसंहिताही नाशिकपुरती असेल. पण याकाळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निधी अगोदरच खर्ची करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. सर्वाध‌िक प्रस्ताव बागलाण तालुक्यातून आले असून ते ३ कोटी १८ लाखाच्या आसपास आहे. तर सर्वाधीक कमी प्रस्ताव मालेगाव बाह्य, कळवण व चांदवड येथून आल्याचे नियोजन भवनाचे अधिकारी यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकळ्या भूखंडांना वाली कोण?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहराची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींतील वापराविना पडून असलेल्या असंख्य भूखंडांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झालेले आहे. मात्र, त्याबाबत, तसेच अन्य मोकळ्या भूखंडांच्या वापराबाबत ‘एमआयडीसी’ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ठोस निर्णयच होत नसल्याने अशा मोकळ्या भूखंडांना वाली कोण, असा सवाल उद्योजकांसह कामगारवर्गातून उपस्थित होत आहे. मोकळ्या राखीव भूखंडांवर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीकडून वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकर घेतला जात असताना ‘एमआयडीसी’कडून मात्र नकार दिला गेल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अशा भूखंडांवरही झोपड्यांचे अतिक्रमण झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नाशिकला औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यावर अंबड व सातपूर गावांतील हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनाने ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर कारखान्यांचे मोठे जाळे सातपूर व अंबड ‘एमआयडीसी’त पसरले होते. परंतु, ‘एमआयडीसी’ स्थापन झाल्यापासून शासनाच्या ताब्यातील अनेक मोकळ्या भूखंडांना वाली कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे ‘एमआयडीसी’तील अनेक मोकळ्या भूखंडांवर झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे, तर दुसरीकडे असंख्य मोकळ्या भूखंडांचा वापर सर्रासपणे वाहने पार्किंगसाठी केला जात असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मोकळे भूखंड ओस पडून असल्याने महिंद्रा कंपनीने वृक्षारोपणासाठी ‘एमआयडीसी’कडे मागितले असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, ‘एमआयडीसी’ने महिंद्रा कंपनीला वृक्षारोपणासाठी भूखंड देण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे अतिक्रमणांची शक्यता बळावली असून, केवळ कागदी घोडे नाचवून काहीजण औद्योगिक विकास थांबविण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोपही केला जात आहे. एका बाजूला नाममात्र दराने राखीव भूखंड ‘एमआयडीसी’ देत असताना दुसऱ्या बाजूला पडून असलेल्या भूखंडांवर वृक्षारोपण अथवा गार्डन्स का उभारली नाहीत, असा सवालही उपस्थित होतो.

---

अनधिकृत पार्किंगचे गौडबंगाल

‘एमआयडीसी’ स्थापन झाल्यापासून पडून असलेल्या भूखंडांवरील अनधिकृत पार्किंगबाबत आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आरोप केला जात आहे. उद्योगांसाठी राखीव भूखंड उपलब्ध नसल्याचे ‘एमआयडीसी’कडून नेहमीच सांगितले जाते. परंतु, आरक्षित भूखंडांना तरी ‘एमआयडीसी’ने कुंपण घालण्याची कृपा करावी, अशी अपेक्षा शेतजमिनी दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

---

‘एमआयडीसी’ची स्थापना झाल्यावर माझ्या घरातील दीडशे एकर शेतजमीन गेली होती. त्यातच महापालिकेने पुन्हा माझ्याच शेतजमिनीवर आरक्षण टाकले आहे. मराठी माणसाला भूमिहीन करण्याचाच प्रयत्न तर सरकार करत नाही ना, असा माझा सवाल आहे.

-गोरख सोनवणे, शेतकरी, सातपूर

---

अंबड ‘एमआयडीसी’तील केमिकलमिश्रित पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी दूषित झाल्या आहेत. उद्योगांसाठी दिलेल्या शेतजमिनींचे अनेक भूखंड आजही पडून आहेत. असे भूखंड शेतकऱ्यांना पुन्हा परत केले पाहिजेत. जेणेकरून तेथील अतिक्रमण टळू शकेल.

-रामदार दातीर, शेतकरी, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांचा ‘सोशल’ उतावळेपणा!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिका निवडणुकीसाठी उतावीळ झालेल्या इच्छुक उमेदवारांनी आता व्हॉट्सअॅपसारख्या सोशल म‌ीडियाच्या माध्यमातून चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅपवर नियोजनपूर्वक वर्षभर नागरिकांशी संपर्क ठेवल्यानंतर आता तुमच्या प्रभागातून तुम्ही कोणाला नगरसेवक म्हणून निवडून द्याल? असे प्रश्न विचारून जनता-जनार्दनाचा कौल जाणून घेण्यावर भर दिला जात आहे.

मार्गदर्शनासाठी घरी

सोशल मीडियाद्वारे ओपिनिअन पोलवर कल जाणून घेतल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्येष्ठ नागरिक, मीडिया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत. या उमेदवारांच्या व्यथा (डायलॉग) सारख्याच असतात. आम्ही प्रचार सभांमध्ये काय कायम खुर्च्याच उचलायच्या का? आम्ही पाच वर्षे राबायचे आणि आयात उमेदवारांना उमेदवारी द्यायची, हा कुठला न्याय? तुमचा आशीर्वाद असू द्या, मी यंदा लढणारच आहे, अशी साद मतदारांना घातली जात आहे.

अशी होते ओपिनिअन पोल टेस्ट

व्हॉट्सअॅप, फेसबुकवरील ओपिनिअन पोलमध्ये वेबसाइट दिलेली असते. उमेदवाराने स्वतःसह प्रभागातील इतर पक्षांतील स्पर्धकांची नावे क्रमाने लिहिलेली असतात. ‘नगरसेवक म्हणून आपण कोणाला मत द्याल?’, असे आवाहन करून व्होटच्या बटणाावर क्लिक करण्यास सांगितले जाते. पोल घेणाऱ्यांमध्ये नवखे जास्त आहेत. मुरब्बी नेत्यांसह सुजान नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पोल घेणारे आपल्या समर्थकांना मतदान करायला सांगतात. घरबसल्या करमणूक होत असल्याने मतदार एकाला मतदान केल्यानंतर थोड्यावेळाने दुसऱ्याला मतदान करतात. नव्या रचनेनुसार एका प्रभागाची लोकसंख्या ४० ते ४५ हजार आहे. ओपिनिअन पोलला हजार-दोन हजार लोकही प्रतिसाद देत नाहीत. म्हणजेच रिसर्चचे सॅम्पल पाच टक्केही नाही. तसेच निकाल आणि खरा कलही उघड होत नाही.


आधीपासूनच फिल्डिंग

निवडणूक तीन महिन्यांवर असली, तरी इच्छुक व नगरसेवकांनी दोन वर्षांपासूनच फिल्डिंग लावली आहे. ‘प्रभागात आज पाणी येणार नाही’ असा मेसेज तर व्हॉट्सअॅपवर न चुकता येतो. राष्ट्रपुरुषांबरोबरच सामान्यांना ज्ञात नसलेल्या व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथीचे मेसेज, सणांच्या शुभेच्छा आपल्या फोटोसह मतदारांपर्यंत पोहोचतील, अशी व्यवस्था उमेदवारांनी दीड-दोन वर्षांपासून केली आहे. स्वातंत्र्य, प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्र दिनाला तर उमेदवारांना देशभक्तीचा उमाळाच येत असल्याचे दिसून येते.

टेक्नोसॅव्ही जोरात

इच्छुक उमेदवार आणि नगरसेवक फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इंटरनेट समर्थपणे हाताळू शकतात त्यांचीच चलती जास्त आहे. ओपिनिअन पोलचे खूळ त्यांच्याच सुपिक डोक्यातून आल्याचे समजते. त्याचा धसका घेत सोशल मीडियाचा गंध नसलेल्या उमेदवार व नेत्यांनी सायबरतज्ज्ञ युवकांची फौज बाळगण्यास सुरुवात केली आहे. या सायबरतज्ज्ञांच्या मदतीने ओपिनिअन पोल घेण्यास सुरुवात केली आहे.


एका दगडात अनेक पक्षी

ओपिनिअन पोल घेऊन एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे काम इच्छुक करीत आहेत. या पोलमुळे आपण प्रभागात कितपत परिचित आहोत, आपली लोकप्रियता किती आहे, हे ते चाचपून पाहत आहेत. तसेच पक्षश्रेष्ठींना आपणही स्पर्धेत आहोत हे दाखवून देणे, यंदा नाही तर पुढच्या वेळी तरी आमचा विचार केलाच पाहिजे असा दबाव आणणे, संभाव्य अधिकृत उमेदवाराशी आर्थिक तडजोडी करणे, विरोधी पक्षातील इच्छुकांमध्ये चर्चा घडवून आणणे आदी उद्देश या पोलमागे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images