Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दिवाळीला जोड डाएट फराळाची

$
0
0


सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

दिवाळी म्हटल्यावर घरी आलेल्या पाहुणेमंडळींच्या गाठीभेटींत चार घास जास्तच खाल्ले जातात. बदलती जीवनशैली, बैठे काम, तसेच व्यायामाच्या अभावामुळे तेल, तुपाचे, तसेच गोड पदार्थ असलेल्या दिवाळीचा फराळ शरीरास त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे दिवाळसणाला आरोग्याला हितकारक फराळाची चव चाखता यावी यासाठी डाएट फराळाची मागणी वाढत आहे. या फराळाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी डाएटीशनकडे नाशिककरांचा ओघ वाढला आहे. अनेक जण आपली शंका विचारून घेत नेमका काय फराळ असावा, हे आहारतज्ज्ञांना विचारत आहेत.

शहरात अनेक ठिकाणी डाएट फराळ विक्रीस उपलब्ध झाला आहे. तयार फराळ खरंच डाएटफुल असेल का याची शाश्वती नसल्याने गृहिणी आचाऱ्यांकडून डाएट फराळ बनवून घेत आहेत. हेल्थ कॉन्शियस व्यक्तींनाही या डाएट फराळाचा आस्वाद घेता येणार आहे. दिवाळीच्या फराळात तेलातुपाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याच घरांमध्ये फराळ तयाराना विशेष काळजी घेतली जात आहे. बाजारात डाएटचे पदार्थ मिळू लागल्याने डाएट करणाऱ्यांसाठी या ऑइल फ्री फराळाचा पर्यायाला पसंती मिळत आहे. दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेताना आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होता कामा नये, यासाठी डाएट फराळाबरोबरच शुगर फी मिठाईदेखील बाजारात उपलब्ध आहे. या फराळाच्या किमती अन्य फराळाच्या तुलनेत १० टक्क्यांनी जास्त आहे. महिला गृहोद्योग, बचत गट यांनीही यंदा मागणीनुसार डाएट फराळ बनविले असून १००-१५० रुपयांना लहान पॅकेटमध्ये हे फराळ बाजारपेठेत उपलब्ध आहेत. डाएट फराळामध्ये कमी कॅलरीज असलेल्या करंज्या, गव्हाचे व नाचणीचे पौष्टिक लाडू, मेथी-पालकचे शंकरपाळे यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

आरोग्यास बाधा आणत चविष्ट फराळावर ताव मारण्यापेक्षा फराळाच्या ताटापासून लांब राहिलेलेच परवडते. मात्र, डाएट फराळ उत्तम पर्याय आहे. हवी तशी चव बनवून घेत आरोग्य नीट राखता येते. इको फ्रेंडलीप्रमाणे डाएट आहाराची दिवाळी साजरी व्हावी.

- चारुलता नेमाडे, गृहिणी

---

डाएटचा फराळ खाताना किती प्रमाणात खात आहोत याकडे लक्ष दिले जावे. डाएट फराळ आचारी माणसाकडून स्वतः बनवून घ्यावा. शरीराची काळजी घेत डाएट फराळाचा आस्वाद घेणे चांगलेच. पण त्याचाही अतिरेक नको.

- डॉ. निशिगंधा वझे-दिवेकर, आहारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्किन बँकांना जनजागृतीचा लाभ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जळितांच्या दुखण्यावर फुंकर ठरलेल्या स्किन बँकेला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून, समाजात केलेल्या जनजागृतीचा लाभ होत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मे महिन्यात नाशिकमध्ये सुरू झालेल्या स्किन बँकेत ११ मृत व्यक्तींची त्वचा दान करण्यात आली. याद्वारे तीन जळीत रुग्णांना जळालेल्या त्वचेपासून मुक्त करण्यासाठी त्याचा लाभही झाला आहे. राज्यात एकूण पाच स्किन बँका असून, नाशिकला मिळणारा प्रतिसाद सर्वोत्तम असल्याचे मत प्लास्टिक सर्जन डॉ. राजेंद्र नेहेते यांनी व्यक्त केले आहे.

जळितांच्या घटनांमधून येणारे अपंगत्व, विद्रुपपणा यामुळे जळीत लोकांमधील आत्मविश्वास घटण्याचे प्रमाण मोठे आहे. या घटना घडल्यानंतर पुन्हा मानसिकदृष्ट्या पूर्ववत होण्यासही बराच काळ जातो. शिवाय, या त्वचेमुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो तो वेगळाच. या प्रकारांना आळा घालण्यासाठी रोटरी क्लबच्या वतीने व प्लॅस्टिक सर्जन डॉ. राजेंद्र नेहेते यांच्या सहकाऱ्याने ही स्किन बँक मे महिन्यात नाशिकमध्ये साकारण्यात आली. मात्र, नेत्रदान, रक्तदानाविषयी असलेल्या जागरुकतेच्या तुलनेत त्वचा दानाविषयी समाजात माहितीच नसल्याने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे सर्वात मोठे आव्हान बँकेसमोर होते. नाशिकमधील ही पहिलीच स्किन बँक असल्याने वेगवेगळी शिबिरे, बैठकींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिकला मिळणारा प्रतिसाद उत्तम असल्याचे डॉ. नेहेते यांनी सांगितले. येत्या काही महिन्यात औरंगाबाद, जळगाव येथेही ही बँक सुरू होणार आहे.


समाजात जनजागृती येतेय ही सकारात्मक बाब आहे. आमच्याकडील केसेसच्या तुलनेत दान करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जास्त स्किन आमच्याकडे असल्यास ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटर येथे आम्ही पाठवतो.

- डॉ. राजेंद्र नेहेते, प्लास्टिक सर्जन

---

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींसाठीच ही बँक कार्य करते. येत्या काळात आम्ही हॉस्पिटल्स, अमरधाममध्येही जनजागृतीपर फलक लावणार आहोत.

- विवेक जायखेडकर, माजी अध्यक्ष, रोटरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा डॉ. धोंडगेंना पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

२०१५ या वर्षासाठी उत्कृष्ट मराठी वाङ्मयनिर्मितीसाठी देण्यात येणारे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यात ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. दिलीप धोंडगे यांचा समावेश आहे. ना. गो. नांदापूरकर यांच्या नावाने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर, नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी यांच्यासह ३२ मान्यवर लेखकांचा समावेश आहे. डॉ. दिलीप धोंडगे यांना ‘तात्पर्य’ या लेखनकृतीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांची शैलीविज्ञानावर खास पकड आहे. डॉ. धोंडगे यांची शैलीमिमांसा, तुका म्हणे खंड १, २ हरवले गाव, यासह १२ हून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

आनंद वाटला. मोठा पुरस्कार आहे, पुरस्काराचे स्वरूपही चांगले आहे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला त्या महनीय व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच कालक्रमण सुरू असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप धोंडगे यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रकाशयात्रा आठवणींची’ कार्यक्रम आज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराचा सांस्कृतिक वारसा तसेच कला जोपासण्यासाठी कार्यरत असलेल्या अथवा मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक संस्था आहेत. या संस्थांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या दिवंगत व्यक्तींच्या स्मृतींचा एक आकाशकंदील व एक पणती उजळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन आज (दि. २८) सायंकाळी ६ वाजता कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड नाशिक येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना विनायक रानडे यांची असून सूत्रधार कैलास पाटील आहेत. दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले असून दिवाळी फराळाची व्यवस्था विश्वास ठाकूर, अतुल कुलकर्णी यांनी केली आहे. कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक पी. टी. पाटील आहेत. दृकश्राव्य तंत्र लक्ष्मण कोकणे, सचिन शिंदे, विद्युत रोषणाई देवांग ठाकूर, सी. एल. कुलकर्णी यांनी केली आहे. पणत्यांची रोषणाई सौमित्र कैलास पाटील आणि अपर्णा पंकज क्षेमकल्याणी यांनी केली असून दीपमाळ शंकराचार्य न्यास यांच्यातर्फे उभारण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी राजा पाटेकर, नवीन तांबट, राजू पत्की, सदानंद जोशी यांचे सहकार्य असून भूषण मटकरी, मनीष चिंधडे, श्रीया कुलकर्णी, नुपूर सावजी, सुहास जाधव यांचे निवेदन आहे.

कार्यक्रमाचे नियोजन विनायक रानडे, कैलास पाटील, सचिन शिंदे, मनीष चिंधडे, शाम पाडेकर, सी एल कुलकर्णी, सदानंद जोशी, संतोष जोशी तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सेवक वर्गाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहाट-सांज पाडवा रंगणार

$
0
0

शहरात बहुविध कार्यक्रमांची मेजवानी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाडवा पहाट म्हणजे रसिकांच्या हृदयामध्ये मानाचं स्थान मिळवलेली मैफल. नाशिककरांची पाडवापहाट उजळते ती पिंपळपारावर. पाराची संकल्पना उचलून नंतरच्या काळात ठिकठिकाणी पहाट, सांज रंगू लागली. यंदाच्या वर्षी निवडणुकींच्या फिव्हरमुळे गल्लोगल्ली कार्यक्रम आखण्यात आले आहे. शहरातील काही प्रमुख ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

अर्शद अली खाँ यांची मैफल

पिंपळपारावरच्या ‘पाडवा पहाटे’त यंदा, सोमवारी (दि. ३१) किराणा घराण्याचे अर्शद अली खाँ यांची मैफल रंगणार आहे. उस्ताद मशकूर अली खाँ, उस्ताद मुबारक अली खाँ यांच्याकडून गुरू-शिष्य परंपरेने तालीम घेतलेल्या अर्शद अली खाँ यांना भारतीय संसद उत्कृष्ट गायक, जादूभट पुरस्कार, एनसीपीएचा विद्यासागर पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मैफलीचा आस्वाद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.

बारा वर्षांपासून ‘संस्कृती नाशिक’ नाशिकच्या सांस्कृतिक जडणघडणीतील अविभाज्य घटक बनले आहे. आतापर्यंत ‘संस्कृती नाशिक’च्या व्यासपीठावर पंडित संजीव अभ्यंकर, पंडित शौनक अभिषेकी, पंडित श्रीनिवास जोशी, पंडित सुरेश वाडकर, शुभा मुद्गल, स्वरसम्राज्ञी किशोरी आमोणकर, पंडित राजनसाजन मिश्रा, अश्विनी भिडे-देशपांडे, उदय भवाळकर, पंडित मुकुल शिवपुत्र, पंडित गुंदेचा बंधू, पंडित भुवनेश कोमकली, पंडित जयतीर्थ मेवुंडी यांसारख्या दिग्गज कलावंतांनी ‘पाडवा पहाट’च्या माध्यमातून नाशिककरांना मंत्रमुग्ध केले आहे.

महाजन गार्डनमध्ये जयतीर्थ मेवुंडी

आमदार देवयानी फरांदे यांच्यावतीने दरवर्षी पाडवा पहाटचे आयोजन करण्यात येते. या शृंखलेत यंदाच्या वर्षी सोमवारी, ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता प्रमोद महाजन गार्डन, गंगापूर रोड येथे पंडित जयतीर्थ मेवूंडी यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. प्रमोद महाजन गार्डनमध्ये अनेक प्रथितयश गायकांनी आतापर्यंत हजेरी लावली असून यात पंडिता देवकी पंडित, पंडित हृदयनाथ मंगेशकर यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

रागिणी कामतीकर यांची मैफल

स्वराजित संस्थेतर्फे सोमवार, ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता पाडवा पहाटेचे आयोजिन करण्यात आले आहे. या पहाटमध्ये रागिणी कामतीकर यांचे गायन होणार आहे. सुमधूर भक्तीगीते व भावगीतांची ही मैफल गणपती मंदिर, महात्मा नगर येथे होणार आहे. यावेळी रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

नाशिकरोडला प्रांजली बिरारी यांचे गाणे

प्रभाग क्रमांक २३ मध्ये पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. जागृती प्रतिष्ठान सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळ, जागृती बहुउद्देशीय महिला मंडळ बचत गट, टागोर नगर, श्री नंदकिणे ज्येष्ठ नागरिक संघ, टागोरनगर आणि सुविचार फ्रेंड सर्कल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी, पहाटे ५ वाजता होणाऱ्या या मैफलीत प्रांजली बिरारी-नेवासकर यांचे गायन होणार आहे. विजय ममता फेमच्या पाठीमागे, श्री श्री रविशंकर मार्ग, नाशिकरोड येथे हा कार्यक्रम होईल.

सातपूरला आज कार्यक्रम

श्री सिध्द हनुमान मंदिर भजनी सेवा समितीतर्फे रवि शेट्टी प्रस्तुत सांजपाडवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज, शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राज्य कर्मचारी वसाहत आणि हुतात्मा अनंत कान्हेरे मित्र मंडळ यांच्या सहकार्याने ही मैफल होणार असून शशिकांत जाधव या कार्यक्रमाचे आयोजक आहे.

कॉलेजरोडला सोमवारी सांजपाडवा

गोदा श्रद्धा फाऊंडेशनतर्फे सांजपाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे हे १४ वे वर्ष असून सोमवारी (दि. ३१) सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बॉईज टाऊन स्कूल ग्राऊंड, विसे मळा, कॉलेजरोड येथे आयोजित या कार्यक्रमात जसराज जोशी, प्रसन्नजीत कोसंबी, कविता निकम, संकर्षण कऱ्हाडे यांचे गाणे होणार आहे. भाजपचे सरचिटणीस सुरेश पाटील यांच्या वतीने हा कार्यक्रम होणार आहे.

नसती उठाठेवतर्फे दीपावली पहाट

नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे यंदाही दीपावली पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, (दि. ३०) रोजी पहाटे ५.३० वाजता संकटमोचन हनुमान मंदिर, नरसिंह नगर, गंगापूर रोड येथे ही मैफल होणार आहे. यंदाच्या वर्षी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित यशवंतबुवा जोशी यांचे शिष्य ओमकार दादरकर, कोलकाता यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी साथीला तबल्यावर तालयोगी सुरेशदादा तळवलकर यांचे शिष्य, पुणे येथील चारूदत्त फडके तर संवादिनीवर सुभाष दसककर राहतील. मंडळाचे यंदा दीपावली पहाटचे पंधरावे वर्ष असून यापूर्वी पंडित अजित कडकडे, पंडित राजाभाऊ काळे, पंडित शौनक अभिषेकी, पंडित संजीव अभ्यंकर, पंडित राम देशपांडे, पंडित रतन मोहन शर्मा, पंडित भुवनेश कोमकली, पंडित प्रसाद खापर्डे, पंडित विजय कोपरकर, पंडित कुमार मरडूर, पंडित झोकरकर आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांचे गायन झालेले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष बापू कोतवाल, सुनील अहिरे, प्रशांत काटकर आदि प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकाश्रय मिळाला तरच मराठी भाषा टिकेल

$
0
0

प्रा. बाळासाहेब गुंजाळ यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मराठी भाषेचा गोडवा समजण्यासाठी ग्रंथवाचन करुन चिंतन आणि मनन केले पाहिजे. टीव्ही, इंटरनेटच्या सहाय्याने नव्हे तर वाचनाने ज्ञान प्राप्त होते. मराठी भाषा गल्लीनुसार बदलत जाते. त्यामुळे बोलीभाषा टिकणे ही काळाची गरज आहे. मराठी भाषेला लोकाश्रय व राजाश्रय मिळाला तरच ती टिकेल, असे प्रतिपादन मराठीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब गुंजाळ यांनी केले.

दहावीत मराठीत शाळेत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मसापच्या नाशिकरोड शाखेतर्फे आर्टिलरी रोडवरील जैन भवनमध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी अॅड. नितीन ठाकरे, कार्यवाह रवींद्र मालुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उन्मेष गायधनी म्हणाले की, चित्रपटातील हिरो-हिरोईन लक्षात राहतात. मात्र, दिग्दर्शक लक्षात राहत नाही. तसेच हुशार विद्यार्थी लक्षात राहतात. पण त्यांना घडविणारे शिक्षक लक्षात राहत नाहीत. म्हणून मसाप शिक्षकांचीही गौरव करते. यावेळी मराठी माध्यम, इंग्रजी, उर्दू, हिंदी माध्यम शाळांच्या ४८ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षिका जुईली शेरीकर, (कोठारी कन्या), कल्पना जाधव (र. ज. चौहान), मनीषा सेवलीकर (देवळाली हायस्कूल) यांचाही सत्कार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ चेहऱ्यावर उमलले हसू

$
0
0

शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने गरजूंची दिवाळीही होतेय गोड


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फटाक्यांची आतषबाजी, फराळाची लगबग, कपड्यांची खरेदी अशा थाटात सधन कुटुंबांमध्ये दिवाळी साजरी होत असली तरी अनेक गरजू, गरीब कुटुंबे मात्र हे सण साजरा करण्यापासून वंचितच राहतात. या व्यक्तींनाही दिवाळी थाटात साजरा करण्याचा अधिकार असून त्यांना तो मिळवून देण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गरजू व्यक्तींची दिवाळी यावेळी गोड होताना दिसत आहे. यामुळे या सर्वांच्या चेहऱ्यांवर हसू उमलले होते.

युथ फॉर युनिटी

नाशिकमधील युथ फॉर युनिटी ही सेवाभावी संस्था वेगवेगळी प्रयोग करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेतर्फे दिवाळीनिमित्त आदिवासी भागातील विविध पाड्यांवरील आदिवासी बांधव तसेच अनाथ बालकांसमवेत दिवाळी साजरी केली. कपडे, फराळाचे वाटप करण्यात आले. या संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून दिवाळीला विविध वस्तूंचे संकलन केले जाते. यामध्ये कपडे, दिवाळीचा फराळ, विद्यार्थ्यांसाठी शालेय, दैनंदिन वापराच्या वस्तू यांचे वाटप करण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मास्तरवाडी, पहिने, भिलमाळ यांसह विविध आदिवासी गावांमध्ये याचे वाटप करण्यात आले. त्याबरोबरच श्रीमती गार्डा अनाथाश्रम आणि जय महाराष्ट्र ओम त्र्यंबकराज निराश्रीत अनाथ बालगृहातही हे वाटप करण्यात आले. या वेळी मनोज टाटीया, लोकेश जैन, वैभव शर्मा, चिराग परमार, अॅड. भूषण टाटीया, रितेश सुराणा आदी उपस्थित होते.

आनंद महिला परिषद

आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व गरजूंना दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तू व दिवाळी फराळ देऊन त्यांची दिवाळी आनंदमय करण्याचे काम जैन श्रीसंघ संचलित आनंद महिला परिषदेच्या वतीने करण्यात आले.

इगतपुरी तालुक्यातील वैतरणा डॅम येथील शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना नवीन सँडल्स, कपडे, फराळ भेट म्हणून देण्यात आले. परिसरातील गरजू पुरुष आणि महिलांना साताऱ्याचे संतोष लुणावत यांच्या मोरगाव ग्रुपच्या वतीने नवीन कपडे, साडी वाटप करण्यात आले. कार्यक्रमात स्थानिक विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे कलादर्शन घडव‌िले. या वेळी परिषदेच्या संस्थापिका डॉ. सुषमा दुगड, अध्यक्षा शोभा संचेती, प्रतिभा भटेवरा, उषा खिंवसरा, प्रिती जैन, निता जालोरी आदी उपस्थित होते.

नामको चॅरिटेबल ट्रस्ट

नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एसजीएस कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती व अन्नपूर्णा योजना समिती यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.

रुग्णांना शर्ट - पॅन्ट पिस, साडी, आरोग्यदायी उटणे, सुगंधी आयुर्वेदिक तेल, साबण तसेच बुंदीचे लाडू, चिवडा, शंकरपाळे यांचे वाटप करण्यात आले. यामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. जनकल्याण समितीच्या शोभा कुलकर्णी व सुधाकर नेवे यांनी अभ्यंग स्नान, उटणे यामागील आयुर्वेदिक संकल्पना समजावून सांगितल्या. तसेच आजारातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. या वेळी नामको ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, आत्माराम शेटे, शशिकांत कुलकर्णी, प्रमोद मोहरीर, चंद्रशेखर विंचूरकर, प्रदीप निकम आदी उपस्थित होते.

स्वराज प्रतिष्ठान

स्वराज प्रतिष्ठान आणि सॅव्ही कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कपडा बँक या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या हस्ते करण्यात आला. या बँकेद्वारे सामाजिक बांधिलकी जपत या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी स्वराज्य प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करीत आगामी काळात प्रतिष्ठेच्या वतीने शहरात सामाजिक चळवळ उभी करण्याचे आवाहन केले. या वेळी मिसेस इंटरनॅशनल नमिता कोहोक, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. नंदकिशोर भुतडा, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, नगरसेविका समीना मेमन, योगिता आहेर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, विभागप्रमुख नेहा खरे आदी उपस्थित होते. निखिल मुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर सॅव्ही कॉलेजच्या प्रमुख श्रृती भुतडा यांनी आभार मानले.

मानिनी ग्रुप

साप्ते या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शंभर गरीब मुलांना महिलांच्या वॉव ऑर्गनायझेशनच्या मानिनी ग्रुपतर्फे फराळ, कपडे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

ग्रुपच्या जयश्री आढाव, शिल्पा गायकवाड, अनिता पाटील, स्मिता पाटील, संगीता जाधव, वैशाली सोनवणे, विद्या मुळाणे, संगीता जाधव आदींचा सहभाग यावेळी होता. मुलांकडे जाऊन त्यांना भेटवस्तू देत दिवाळी साजरी करण्यात आल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. गरीब पाड्यावरील मुलांनाही सधन कुटुंबाप्रमाणे यांचीही दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, या हेतूने मानिनी ग्रुपतर्फे दिवाळी साजरी करण्यात आली. शाळेचे शिक्षक देवेंद्र पाटील व स्वाती पाटील यांनी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना पिंपळाच्या पानावर शुभेच्छा लिहून आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा तीन स्पा सेंटरवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील त्रिमूर्ती चौक, पंड‌ित कॉलनी तसेच प्रसाद सर्कल येथे सुरू असलेल्या तीन स्पा सेंटर्सवर क्राइम ब्रँचने छापे मारीत अनैतिक व्यवसायाचे अड्डे उद्ध्वस्त केले. पोलिसांच्या या कारवाईने स्पा किंवा मसाजआड सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांचे मोठे रॅकेट कोलमडून पडले असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी व्यक्त केली.

याबाबत, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. यावेळी पोलिस उपायुक्त दत्तात्रक कराळे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे तसेच क्राइम ब्रँचच्या तिन्ही युनिटचे पोलिस निरीक्षक हजर होते. कॉलेजरोडवरील इन्जी या स्पावर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली. यानंतर, अनैतिक व्यवसाय चालवत असलेल्या स्पा सेंटर्सला पोलिसांनी लक्ष केले. मात्र, असे उद्योग करणाऱ्या स्पा मालकांनी काही दिवस शटर डाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलिस दुसऱ्या कामात असल्याचे लक्षात येताच त्रिमूर्ती चौक येथील ग्लोअप स्पा, पंड‌ित कॉलनीतील शुभांगी ब्युटी पार्लर तसेच प्रसाद सर्कल येथील आयुर्वेदीक मसाज सेंटर या तीन ठिकाणी अनैतिक व्यवसाय सुरू झाले. याची माहिती मिळाल्यानंतर क्राइम ब्रँचच्या तिन्ही युनिटच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त शोध मोहीम हाती घेतली. ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्पा सेंटर्सची पोलिसांनी झडती घेतली. यात वरील तीन सेंटरवर गडबड असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून पुढील कारवाई केली. ग्लोअप स्पा येथील छाप्यात निशा ज‌ितू सोनवणे (रा. त्रिमूर्ती चौक) या स्पा चालवणाऱ्या महिलेसह प्रशांत रघुनाथ पर्वते (मदतनीस), सूर्यभान वामन सांगळे (ग्राहक) आणि सुनील निवृत्ती खैरनार (ग्राहक) यांना अटक केली. पंड‌ित कॉलनीतील शुभांगी ब्युटी पार्लर येथे प्रिती उर्फ जया अनिल कुमावत या स्पा चालक महिलेस पोलिसांनी अटक केली. तर प्रसाद सर्कल येथील मसाज सेंटर येथून मनीषा शरद पवार या स्पा चालक महिलेसह गोपीचंद सुरेश गायकवाड या ग्राहकास ताब्यात घेण्यात आले. या स्पा सेंटर्समधून १२ मुलींची सुटका करण्यात आली असून, त्यांची रवानगी वात्सल्य महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. संशयित आरोपींविरोधात पिटा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर व्यावसायिकांना मिळालेले लायसन्स रद्द करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. याबरोबर, या कामासाठी जागा भाड्याने देणाऱ्या मालकांवर कारवाई करण्यात येईल. संशयास्पद मसाज सेंटरबाबत नागरिकांना काही तक्रार असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.

-डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तळेगाव प्रकरणी सव्वातीनशे पानी दोषारोपपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, या प्रकरणी आज, गुरुवारी कोर्टात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. साधारणतः ३०० ते ३२५ पानी हे दोषारोपपत्र असून, यात त्रुटी राहू नये म्हणून स्क्रुट‌िनी कमिटीने त्याची छाननी केली. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर लवकरच खटल्याची सुनावणी होऊ शकते. घटनेच्या १९ व्या दिवशी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

तळेगाव येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर तेथीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी घडली होती. यानंतर मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जवळपास आठ गावांमध्ये पोलिसांना संचारबंदी लागू करावी लागली.

नाशिक जिल्ह्यात सतत आठ दिवस तणाव निर्माण झाला होता. या काळात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी पीड‌ित मुलीची भेट घेतली. सदर संशयितांवर पंधरा दिवसांत कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. पोलिसांनीदेखील एकीकडे दंगल काबूत आणत दुसरीकडे तपास सुरू ठेवला. त्यामुळे १५ दिवसांच्या आत या घटनेचा तपास पूर्ण झाला. संशयित आरोपी अल्पवयीन असून, त्याला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दोषारोपपत्र तयार केले.

सरकारी वकिलांच्या अध्यक्षतेखाली समिती

मात्र, यात त्रुटी राहून त्याचा थेट फायदा संशयिताला मिळू नये यासाठी जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या अध्यक्षतेखाली एक स्क्रुट‌िनी कमिटी स्थापन करण्यात आली. यात एका महिला वक‌िलासह तपास अधिकाऱ्याचाही समावेश होता. साधारणतः ३२५ पानी दोषारोपपत्राची स्क्रुट‌िनी कमिटीने बारकाईने तपासणी करीत त्यात आवश्यक बदल केले. लवकरच प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात होणार असून, नाशिकसह राज्याचे लक्ष खटल्याच्या निकालाकडे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फराळासाठी आचारी दुर्मिळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीसाठी घरोघरी फराळ तयार होत असल्याने शहरातील आचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी आचारी मिळणे दुर्मिळ झाले असून त्यांचा मोबाइल नॉटरिचेबल लागत आहे.

पूर्वी घरोघरी फराळाचे पदार्थ तयार केले जात होते. जसा काळ बदलला तसे त्यातही अमुलाग्र बदल होऊ लागले. फराळाचे पदार्थ बाहेरून विकत आणण्याची क्रेज सुरू झाली. बाहेरील पदार्थांत वापरण्यात येणारा कच्चा माल निकृष्ट प्रतीचा असल्याचा ग्राहकांना संशय आल्याने फराळाचे पदार्थ घरीच आचाऱ्यांकडून तयार करण्याची प्रथा सुरू झाली. गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये आचारी घरोघरी जाऊन पदार्थ बनवून देऊ लागले. सप्टेंबर व ऑक्टोबर हे महिने पूर्वी आचाऱ्यांच्या दृष्टीने कमी महत्त्वाचे होते. या दिवसात लग्नकार्य नसल्याने हा ऑफ सिझन होता. मात्र, काही दिवसांपासून घरीच आचाऱ्यांकडून पदार्थ बनवण्याची पध्दत रुढ झाल्याने त्यांच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. आचाऱ्यांनीही घरोघरी जाऊन पदार्थ तयार करण्याऐवजी सामुदायिकरित्या पदार्थ तयार करण्यावर भर दिला. एका सोसायटीत फराळाचे पदार्थ तयार करायला सुरुवात केल्यास परिसरातील लोक आपोआप त्या ठिकाणी माहिती विचारला येतात. आपल्यासमोर पदार्थ तयार होत असल्याने ग्राहकांनीही चांगली पसंती दिली. जागोजागी आचारी पदार्थ तयार करीत असून इतर कामांसाठी आचारी मिळतच असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

आचाऱ्यांच्या व्यवसायाला शाश्वत उत्पन्न नसल्याने व काम जोखमीचे असल्याने या व्यवसायात यायला आजची तरुण पिढी तयार नाही. त्यामुळे आचाऱ्यांना मागणी जास्त आहे. दुसरीकडे आचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आचारी मिळणे अवघड होऊन बसले आहे.
- मनसुख महाराज, आचारी

आपल्या डोळ्यादेखत पदार्थ तयार होत असल्याने गेल्या काही वर्षापासून आम्ही आचाऱ्यांकडूनच फराळाचे पदार्थ तयार करून घेतो. मात्र, गेल्या दोन वर्षात आचाऱ्यांना शोधणे हे मोठे काम झाले आहे. शोधूनही वेळेवर येतीलच याची गॅरंटी नाही.
- शुभांगी विभांडिक, गृहिणी

दिवाळी कालावधीत फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी आचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे केटरिंगच्या लहान-मोठ्या कामांसाठी आचारी मिळणे कठीण झाले आहे. साधारण अजून आठ दिवस आचारी जागोजागी बुक आहेत.
- प्रसाद जोशी, कॅटरिंग व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ उटणे विक्रीमधून ग्राहकांची फसवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उटणे हे नैसर्गिक घटक द्रव्य आहे. त्यात २२ नैसर्गिक घटकांचा समावेश होत असतो. सध्या बाजारात उपलब्ध उटण्यांमध्ये केवळ एक-दोन घटक आढळतात. डाळीचा पिठात अनैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. उटण्याला सुगंध यावा यासाठी पिशवीच्या बाहेरून सेंट मारला जातो. हे उटणे असली की नकली हे सर्वसामान्य नागरिकांना ओळखणे कठीण असते. हर्बल उटणे म्हणून डाळीच्या पिठाचा वापर करणे हे कॉमन भेसळ झाली आहे. त्यामुळेच बाजारात ती स्वस्त दरात उपलब्ध आहे.

दीपावलीत अभ्यंग स्नानाला महत्त्व दिले जाते. अभ्यंग स्नान करण्याअगोदर सर्वांगाला उटणे लावण्याची प्रथा आहे. चंदन, दौना, मारवा, नागरमोथा या सारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या उटण्यांचा परिणाम दीर्घकाळ जाणतो. त्वचेला तजेला आणि मुलायमपणा देण्याबरोबरच मासपेशी आणि हाडे बळकट करण्याचे काम उटणे करतात.

उष्णता, थंडी अशा बदलत्या वातावरणात त्वचेवर होणारे परिणामाला प्रतिबंध होतो. उटण्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे त्याचा वापर केल्यानंतर लक्षात येऊ लागले आहे.

नाशिकमध्ये थोड्याफार प्रमाणात उटणे बनविणारे लोक आहेत. ते साधारणतः विजयादशमीच्या आसपासच्या काळात पिठाच्या गिरणीतून उटणे दळून घेतात. उटणे तयार करण्यासाठी नेमके काय वापरले जाते. मात्र, हे लोक कळू देत नाहीत. नाशिकमध्ये अनेक विक्रेते पुणे, मुंबई आदी शहरातून उटण्याची सुटी पावडर विकत घेतात. या पावडरचे ५० ते १०० ग्रॅमच्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये पॅकिंग करतात. ही पॅकिंग साधारणतः ५० ग्रॅमला २० रुपये अशा दरात विकली जातात.

उटण्यामध्ये चंदन, दौना, मारवा, नागरमोथा या सारख्या नैसर्गिक द्रव्यांचा वापर केला जातो. ही नैसर्गिक द्रव्ये महागडी असल्याने असली उटण्याची किंमतही महागच असते, सध्या बाजारात स्वस्त मिळणारी उटणे ही भेसळयुक्त असू शकतात.
- वैद्य विक्रांत जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोवळ्या मनावर पोलिसांचा आसूड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

परीक्षा संपवून घरी जात असलेल्या निष्पाप अल्पवयीन मुलाला देवळा पोलिसांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे मारहाण केली. त्यामुळे या मुलाचे मनोबल खालावले आहे. त्याच्या पालकांनी आडगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा मांडली. ती ऐकल्यानंतर अधीक्षकांनी पोलिसांची झाडाझडती घेतली. दोषी पोलिसांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुलाचे वडील प्रकाश जाधव (गुंजाळनगर, देवळा) यांनी पोलिस अधीक्षकांना झालेल्या प्रकारासंदर्भात लेखी निवेदन दिले. देवळा येथील हर्षल प्रकाश जाधव (वय १५ वर्षे) हा २२ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अकरावीचा शेवटचा पेपर देऊन घरी जात होता. कॉलेज गेटवर विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू होते. हर्षल तेथे न थांबता मित्राला सोडविण्यासाठी बसस्टॉपवर गेला. तेथे नीलेश सावकार हे पोलिस बसलेले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या वादात सहभागाच्या संशयावरून हर्षलला पकडले. त्याला लोकांसमोर मारहाण केली. मोटारसायकलवर बसवून देवळा पोलिस ठाण्यात नेले. तेथे इतर पोलिसांनीही हर्षलला सराईत गुन्हेगाराप्रमाणे बेदम मारले. जीवाचा आकांत करीत तो आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले. उलट यथेच्छ मारून झाल्यानंतर त्याला सराईत गुन्हेगारांसमेवत कोठडीत ठेवले. हर्षलच्या आई आशाबाई यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आपला मुलगा निर्दोष असल्याचे त्यांनी पटवून दिल्यानंतर पोलिसांना चूक उमगली. ‘गव्हाबरोबर किडेही रगडले जातात’, असे निर्लज्जपणे सांगून पोलिसांनी नंतर हर्षलला सोडून दिले.

अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन
देवळा पोलिस निरीक्षकांना आशाबाई जाधव यांनी अर्ज देऊन संबंधित दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली. मात्र, त्यांनी ठोस कारवाई न केल्याने जाधव कुटुंबियांनी आडगाव येथे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांची भेट घेतली आणि कारवाईसाठी अर्ज दिला. शिंदे यांनी सर्व माहिती घेतल्यावर पोलिसांची हजेरी घेतली. सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्यास सांगून जाधव कुटुंबाना आठवडाभरात न्याय देण्याचे आश्वासन दिले.

सीसीटीव्ही फुटेज तपासा
हर्षलवर पोलिसांची प्रचंड दहशत बसली आहे. त्याने कॉलेजमध्ये जाण्यास नकार दिला आहे. कॉलेजगेट आणि बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवून आपले निर्दोषत्व सिद्ध करणार असल्याचे हर्षल व त्याच्या पालकांनी ‘मटा’ला सांगितले.

बिटकोत दाखल
देवळ्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये एकच कर्मचारी होता. त्याने तांत्रिक कारणास्तव उपचारास नकार दिल्याने जाधव कुटुंब हर्षलला नाशिकरोड येथील नातेवाईकांकडे घेऊन आले. त्यांनी नगरसेवक अशोक सातभाई यांची भेट घेतली. त्यांच्या मदतीने हर्षलला नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी संघर्ष उमेदवारीसाठी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोडमधील पूर्वीचा प्रभाग क्रमांक ३४ व ५७ मिळून नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रभाग क्रमांक १९ मध्ये विद्यमान नगरसेवकांसह प्रस्थापितांना इच्छुकांच्या भाऊगर्दीचा सामना करावा लागत आहे. इच्छुकांनी विद्यमान व प्रस्थापितांचे ‘कर्तृत्व’ उजेडात आणण्यासाठी कंबर कसली आहे. या प्रभागातील प्रस्थापितांना निवडून येण्यापूर्वी उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

नवीन प्रभाग रचनेनुसार नाशिक महपालिकेत दोन प्रभाग तीन सदस्यीय असून बाकी सर्व प्रभाग चार सदस्यीय आहेत. या ‌तीन सदस्यीय प्रभागांमध्ये १९ चादेखील समावेश होतो. यातील एक जागा अनुसूचित जाती पुरुष, एक जागा इतर मागासवर्ग महिला व एक जागा जनरल पुरुष असे आरक्षण आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणात शेती शिवार व स्लम विभाग असल्याने मतदार विखुरलेले आहेत. चेहेडी, चाडेगाव, गोरेवाडी, चेहेडी पंपिंग, सिन्नर फाटा, अरिंगळे मळा, चेहेडी शीव, भोर मळा, गाडेकर मळा अशा विस्तृत भागाचा यात समावेश होतो.

पक्ष एक; इच्छुक अनेक
जुन्या दोन प्रभागांचा एकच प्रभाग झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षातील उमेदवारांची पहिली लढाई आपल्याच पक्षातील इच्छुकांशी लढावी लागणार आहे.

कोण मारणार बाजी?
माजी नगरसेविका व शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या पदाधिकारी सत्यभामा गाडेकर तसेच माजी नगरसेविका भारती ताजनपुरे यांच्यात शिवसेनेकडून उमेदवारीसाठी चूरस आहे. दोघींनाही राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. कार्यकर्त्यांची फौज त्यांच्याकडे आहे. गाडेकरांचे महिला संघटन विशेष उल्लेखनीय आहे. विद्यमान नगरसेविका वैशाली भागवत व माजी नगरसेवक शिवाजी भागवत देखील प्रबळ दावेदार आहेत. परंतु, पक्षबदलूपणाचे धोरण त्यांना अडचणीत आणू शकते. उमेदवारी न मिळाल्यास त्यांची अपक्ष लढण्याचीही त्यांची तयारी आहे. याशिवाय खासदार हेमंत गोडसे यांचे समर्थक आणि शिवशाही प्रतिष्ठानचे नितीन खर्जुल यांनीही पत्नी जयश्री यांच्यासह मैदानात शड्डू ठोकला आहे. माजी नगरसेवक पुंडलिक अरिंगळे यांनीही मतदारांपुढे शुभेच्छांच्या पायघड्या घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे. मुळात हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिलेला आहे. परंतु, आपापसातील स्पर्धा व जातीपातीचे राजकारण यामुळे हा हक्काचा प्रभाग शिवसेनेच्या हातून गेल्यावेळी गेला होता.

मनसेला कोण तारणार?
मनसेने गेल्या वेळच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. त्यानंतर पुन्हा पाच वर्षे मनसेला या प्रभागात कोणी वालीच राहिले नव्हते. त्यामुळे आता मनसेला कोण तारणार हा खरा प्रश्न आहे. गेल्या वेळचे मनसे उमेदवार विनायक पगारे, लिलाबाई खर्जुल यांच्यासह साहेबराव खर्जुल, केशव बोराडे, भाऊसाहेब ठाकरे आदी मोजकी नावे मनसेच्या गोटातून डावपेच आखत आहेत.

भाजपचा गनिमी कावा
राजकीय वातावरण तातू लागले असले तरी भाजपाने मात्र अजुन आपले पत्ते उघड केलेले नाहीत. कोणत्याही उमेदवाराने भाजपकडून उमेदवारीचा दावा केलेला नाही. काही महिन्यांपूर्वीच सर्व राजकीय पक्षांची परिक्रमा पूर्ण करून भाजपच्या गोटात सामील झालेले विद्यमान नगरसेवक कन्हैया साळवे यांच्यासह पंडित आवारे यांचे नाव चर्चेत आहे. महिला उमेदवाराच्या बाबतीत मात्र अजून फारशी हालचाल दिसून येत नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येही चुरस
विद्यमान नगरसेवक हरीश भडांगे व शोभा आवारे यांचा सामान्यांशी संपर्क राखला असला तरी त्यांच्यापुढे आता इच्छुकांचे मोठे आव्हान आहे. माजी नगरसेविका सुशिला सातपुते यांच्यासह आमदार जयंत जाधव यांच्याशी निष्ठावान असलेले विकी खेलुकर या इच्छुकांनी कडवे आव्हान उभे केले आहे. याशिवाय उच्च शिक्षित असलेल्या व प्रशासकिय कामकाजातून या प्रभागात आपली छाप उमटविणाऱ्या प्राचार्या मनीषा विसपुते यांच्याही उमेदवारीची तयारी सुरु आहे. याशिवाय सचिन आहेर, विजय भागवत यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यक्रमाला जावे कोठे?

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकसाठीची प्रभागरचना जाहीर झाल्याने सध्या इच्छुकांनी जनसंपर्काची वेगवेगळी हत्यारे उपासली आहेत. त्यातच दिवाळीची पार्श्वभूमी लाभल्याने आता तर इच्छुकांनी गुडघ्यालाच बाशिंग बांधले असून, जनसंपर्कासाठी गल्लोगल्ली पाडवा पहाट, सांजपाडवा मैफलींचे आयोजन करण्यात आलेले आहे. सरासरी एकाच प्रभागात तब्बल चार-चार ठिकाणी अशा मैफली रंगणार असल्याने कार्यक्रमाला जावे कोठे, असा प्रश्न रसिकांना पडला आहे.

प्रभागरचना जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहणारे ती जाहीर झाल्यानंतर आपापल्या उमेदवाऱ्या स्वत:च जाहीर करून बसले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक जाहीर कार्यक्रमांचा आसरा घेतला असून, तेथे जाऊन नमस्कार घालण्याची अहमहमिका सुरू आहे. आता त्यात मणिकांचन योग म्हणजे दिवाळी आली आहे. दिवाळी म्हणजे घराघरांतल्या सर्वांनाच आकर्षित करण्याची संधी मानून इच्छुकांनी प्रत्येकाला आपल्याकडे ओढण्याचा विडाच उचलला आहे. त्यासाठी पाडवा पहाट, सांजपाडवा हे कार्यक्रम प्रत्येक इच्छुक आयोजित करीत आहे.

मात्र, यात प्रत्येकानेच कार्यक्रम करण्याची इच्छा बाळगल्याने कार्यक्रमांची संख्या अधिक आणि रसिकांची संख्या कमी, असे झाले असल्याने यातील कोणत्या मैफलीला जाऊन बसावे, असे रसिकांना झाले आहे. पाडवा पहाट कार्यक्रम पहाटे साडेपाच वाजता असल्याने त्याला कितीजण हजेरी लावतात, हा संशोधनाचा विषय आहे. आधीच रसिक कमी, त्यात कार्यक्रम भरमसाट असल्याने जावे कोठे, असा प्रश्न रसिकांना पडला आहे.

कलाकारांचे शुल्क वाढले

नाशिक शहर म्हणजे कलावंतांची खाण आहे. शहरात नेहमीच गाण्यांच्या मैफली होत असतात. एका मैफलीसाठी साधारण पाच ते सात हजार शुल्क आकारणारे ग्रुप नाशिकमध्ये आहेत. सध्या महापालिका निवडणुकीतील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले असल्याने या वाहत्या गंगेत कलाकारही आपले हात धुवून घेत आहेत. पाच हजारांची जागा आता वीस ते तीस हजारांनी घेतली आहे. त्यापेक्षा अधिक बजेट असणाऱ्यांनी, तर पन्नास हजारांपर्यंत आपला कार्यक्रम नेऊन ठेवला आहे. यात थोडी घासाघीस करून तीस हजारांपर्यंत का होईना कार्यक्रम आपल्या पदरात पाडून घेताना अनेक जण दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचकांसाठी साहित्याचा फराळ!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी सण म्हटला की फराळ, फटाके आठवतातच. मात्र, मराठी वाचनप्रिय मंडळींना दिवाळी म्हटले, की उत्सुकता असते ती दिवाळी अंकांची. दिवाळीचा खुसखुशीत फराळ करताना विनोदी, चुरचुरीत वाचायला मिळावे ही वाचकांची अपेक्षा दिवाळी अंक पूर्ण करतात. आजच्या संगणक युगात, ई बुक्सच्या जमान्यातही वाचकांमध्ये दिवाळी अंकांची अजूनही क्रेझ असून, मार्केटमध्ये बरेचसे वाचनीय अंक उपलब्ध झाले आहेत.

मराठी दिवाळी अंकांना १०५ वर्षांची दीर्घ परंपरा आहे. ‘मनोरंजन’पासून सुरू झालेला दिवाळी अंकांचा प्रवास आज अगदी वेगवेगळ्या विषयांवर विशेषांक काढण्यापर्यंत आलाय. ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी संपादित ‘मेरी सहेली’ हा महिलावर्गात प्रसिद्ध आहे. धार्मिकमध्ये अक्कलकोट स्वामी दर्शन, ओंकार, मंत्र-तंत्र-तोडगे, अमृतघट, सद्गुरू साईकृपा, सोहं भगवती, ग्रहसंकेत हे अंक उपलब्ध आहेत. खाद्यसंस्कृती जपण्यासाठी जे दिवाळी अंक काढण्यात येतात त्यात दिवाळी फराळ, चटपटीत, नॉनव्हेज मेजवानी, श्री व सौ, रुचिरा या अंकांनी लवकर पदार्पण केले आहे. अंतरंग, सौंदर्यस्पर्श, सौंदर्य, छंद, इब्लिस, आरोग्यासाठीचा शतायुषी, थँक्यू डॉक्टर, तर भटकंती विषयावरील पर्यटन हे अंक व मेनका, पोलिस टाइम्स, नवल, गृहलक्ष्मी, रांगोळी, मेळ ग्रंथांचा, ग्रहसंकेत, गृहशोभा, श्यामची आई हे अंकही वाचकांसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय दर्जेदारमध्ये महाराष्ट्र टाइम्स, अक्षर, मौज, ललित, साप्ताहिक सकाळ, शब्द, अक्षरगंध, मिळूण साऱ्याजणी, शतायुषी, अंतर्नाद, इत्यादी, निवडक अबकडई, ‍अनुभव, चिन्ह, माहेर, मुशाफिरी, अनुवाद, खेळ, वनौषधी, अभिधानंतर, अभिजात, पद्मगंधा, छंद, निहार, किस्त्रिम, मेनका कालनिर्णय, अमृत, किशोर यांसह अनेक अंक बाजारात आले आहेत.

विनोद, बच्चेकंपनीस प्राधान्य

दिवाळीचा विनोदी अंक ही वाचकांसाठी खास मेजवानी असते. त्यात हसवंती, जत्रा, हा हा हा, हसू नका इत्यादी अंक आले आहेत. बालवाचकांसाठी चंपकने चंपक या नावानेच दिवाळी अंक आणला असून छोटू, फुलपाखरू हेही अंक बच्चेकंपनीसाठी आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयटीआय’च्या निदेशकांची कसोटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयटीआय या संस्थेतून कौशल्य विकासाचे धडे गिरविणाऱ्या उमेदवारांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, यासाठी सरकारी व खासगी आयटीआयच्या निदेशकांना (शिक्षक) नव्या कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. शिक्षकांच्या कौशल्य विकसनासाठी यापूर्वी घेण्यात येणाऱ्या पाच परीक्षांची संख्या पंधरा करण्याचा निर्णय नुकताच उद्योजकता विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.

दर वर्षी मे आणि जून महिन्यात या परीक्षांच्या आयोजनाच्या सूचना उद्योजकता विभागाच्या वतीने ‘आयटीआय’ला देण्यात आल्या आहेत. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील निदेशकांचे ज्ञान अद्ययावत राहावे, यासाठी पाच अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र, नव्या निर्णयामुळे आता शिक्षकांना आता दहा वाढीव परीक्षा द्याव्या लागणार आहेत. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर अशा तीन स्तरांवर या परीक्षा पार पडणार आहेत. जोडारी, मशिनिस्ट, कातारी, वीजतंत्री, मोटरगाडी फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आदी पंधरा प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांतून या परीक्षा घेतल्या जातील.

कौशल्यविकासावर भर

केंद्र सरकारच्या मेक इन इंडियासह विविध उपक्रमांचा कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मितीवर भर आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर देशात परकीय गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. या स्थितीत अधिकाधिक कुशलतापूर्ण मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी ग्रास रुटपर्यंत व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत आयटीआय अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसादही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.

परीक्षांना प्रॅक्टिकलचे स्वरूप

या कौशल्य स्पर्धा परीक्षा प्रात्यक्षिक स्वरूपात होणार आहेत. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी तीनशे आणि नॉन इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी शंभर गुण निश्चित करण्यात आले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी जिल्हा स्तरावर ७० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावर पात्र ठरलेले पहिल्या तीन क्रमांकांचे उमेदवार विभागीय परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. या परीक्षांसाठी होणारा खर्च संस्थांनी त्यांच्या मंजूर अनुदानातून करण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत. परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना पारितोषिक देऊन गौरविण्यातही येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदेशीर टपऱ्यांचे पेव

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महापालिकेची प्रशासकीय मान्यता न घेताच केवळ स्थायी समितीच्या ठरावाच्या आधारे शहरातील मुक्तिधाम परिसरातील रस्त्यावर टपऱ्या उभारल्या जात असल्याने या भागात बेकायदेशीर टपऱ्यांचे जणू पेवच फुटले आहे. विशेष म्हणजे काही स्थानिक नगरसेवकही अशा अनधिकृत टपऱ्या उभारण्याला उघड उघड पाठिंबा देत असल्याने संपूर्ण मुक्तिधामला अशा टपऱ्यांचा विळखा पडला असून, फुटपाथवरही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मतदारांना खुश करण्याच्या नादात बेकायदेशीर टपऱ्यांचे समर्थन करण्याचा काहींनी चंगच बांधल्याची चर्चा रंगत आहे.

नाशिकरोडमधील मुक्तिधाम, टिळकरोड, वॉस्को चौक या मुख्य बाजारपेठेच्या भागात अनधिकृत टपरीधारकांचा सुळसुळाट झाला आहे. मुक्तिधामजवळील सोमाणी गार्डनजवळ गेल्या काही दिवसांपासून मुख्य रस्त्याच्या फुटपाथवरच नवीन टपऱ्या उभारल्या जात आहेत. या टपऱ्यांवर स्थानिक नगरसेवकाच्या पत्राच्या संदर्भाचा स्थायी समितीचा ठरावदेखील चिकटवलेला आहे. विशेष म्हणजे या बेकायदेशीर टपऱ्यांना विद्युत विभागाने अधिकृत वीज कनेक्शनही दिलेले आहे.

या टपऱ्यांना महापालिकेची प्रशासकीय मान्यता नसल्याने या सर्व टपऱ्या अनधिकृत असूनही महापालिकेचा स्थानिक अतिक्रमण विभाग मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. सोमाणी गार्डनच्या कंपाऊंडलगत, प्रवेशद्वारालगतच अशा टपऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

स्थानिक नगरसेवकांचे राजकारण

काही स्थानिक नगरसेवकच या व्यावसायिकांना लेखी पत्र देत असल्याने स्थायी समितीही या पत्राच्या संदर्भाने व्यावसायिकांना सुशिक्षित बेरोजगार म्हणून ठराव देत आहे. या टपऱ्या चक्क मुख्य रस्त्यांच्या फुटपाथवरच उभारल्याने फुटपाथ दिसेनासे झाले आहेत. शिवाय या व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने थेट रस्त्याच्या कडेलाच पार्क केली जात असल्याने वाहतुकीचाही दररोज खेळखंडोबा होत आहे. या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करून स्थानिक नगरसेवक व्यावसायिकांना पत्र देत आहेत. महापालिका निवडणूक जवळ आल्याने काही स्थानिक नगरसेवक या प्रश्नाचे राजकारण करीत आहेत, असा आक्षेप घेतला जात आहे.

---

नगरसेवक, अधिकारी मिलिभगतचा संशय

मुक्तिधाम व सोमाणी गार्डन येथे फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या काही टपऱ्या या काही विद्यमान व माजी नगरसेवकांच्याच आहेत. याशिवाय काही टपऱ्या महापालिका सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या आहेत. त्यांनी या टपऱ्या संबंधित व्यावसायिकांना ८ ते १० हजार रुपये मासिक भाड्याने चालविण्यास दिलेल्या आहेत. पदाचा व अधिकारांचा गैरवापर करुन अशा बेकायदेशीर टपऱ्या उभारणाऱ्या नगरसेवक व महापालिका अधिकारी यांची महापालिका आयुक्त चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करतील का, असा प्रश्नही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मुक्तिधाम, सोमाणी गार्डनभोवती नव्याने बेकायदेशीर टपऱ्या उभारल्या जात आहेत. त्यामुळे या भागातील रस्त्यांच्या फुटपाथवर अतिक्रमण वाढले आहे. शहरातील हे ओंगळवाणे चित्र महापालिका प्रशासन कसे खपवून घेते, हा खरा प्रश्न आहे.

-अॅड. शांतारामबापू कदम, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांसाठी दुसरे पार्किंग कार्यान्वित

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रेल्वे प्रवाशांसाठी दिवाळीची खुशखबर आहे. त्यांच्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये दुसरा पार्किंग तळ सुरू करण्यात आला आहे. नवे पार्किंग हे तिकीट विक्री केंद्राच्या शेजारीच असल्याने प्रवाशांचा वेळ आणि मनस्ताप वाचणार आहे. ‘मटा’ने पार्किंग प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला होता.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनला पूर्वेचा सिन्नर फाटा सोडल्यास अन्य तिन्ही दिशांनी अतिक्रमणे आणि वाहनांची गजबज आहे. त्यामुळे नातेवाईकांना रेल्वे स्टेशनमध्ये सोडण्यास आलेल्यांना वाहने उभी करण्यास जागाच नाही. रेल्वे प्रवेशव्दार, रेल्वेचा पोर्च, पार्सल विभाग, सुभाषरोड अशा सर्वच ठिकाणी अनधिकृत पार्किंग केली जाते. यामध्ये प्रवाशांचा दोष नाही. कारण, बसस्थानक व अतिक्रमणांमुळे वाहने उभी करण्यास जागाच राहिलेली नाही.पार्किंग फुल्ल

देवी चौकात रेल्वेचे अधिकृत पार्किंग आहे. तेथे सुमारे दीड हजार दुचाकी पार्क करता येतात. मात्र, येथे वाहनांची एवढी गर्दी झाली आहे की, प्रवासी परतल्यानंतर त्याला वाहन शोधावे लागते. ते बाहेर काढणे हे वेगळे दिव्य असते. गाड्यांवर प्रचंड धूळ साचलेली असते. तसेच, या पार्किंगपासून रेल्वे स्टेशन दीडेशे-दोनशे मीटर दूर आहे. रोज अप-डाऊन करणारे येथे गाड्या लावतात. सकाळी गाडी पकडण्यासाठी व तिकीट काढण्यासाठी त्यांची प्रचंड ओढाताण होते. हा त्रास टाळण्यासाठी काही जण देवी पुलाचा आधार घेतात.

नवे पार्किंग जवळच

रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयामागील पटांगणाचे कुंभमेळ्यात सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. तेथे अनधिकृत पार्किंग होत होती. ते टाळण्यासाठी एस. पी. कुटे एंटरप्राईजला पार्किंगचा ठेका देण्यात आला आहे. येथे अडीचशे दुचाकी उभ्या करता येतात. काही दिवसांपासून हे पार्किंग सुरू झाले आहे. तिकीट व्रिक्री केंद्राशेजारीच हे पटांगण आहे. त्यामुळे प्रवाशांची ओढाताण कमी होणार आहे.

...असे आहेत दर

हे पार्किंग फक्त दुचाकींसाठीच आहे. चारचाकी वाहनांना येथे प्रवाशांना उतरवून परतण्यास मुभा आहे. पार्किंगचे दर परवडणारे आहेत. सहा तासांसाठी दहा रुपये, सहा ते बारा तास पंधरा रुपये, बारा ते चोवीस तासांसाठी वीस रुपये पार्किंग दर आहेत. नियमित प्रवाशांसाठी पाचशे रुपयांचा, तर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अडीचशे रुपयांचा मासिक पास आहे.

सुरक्षा ठेव प्रचंड

नवीन पार्किंगचा ठेका १४-०४-२०२० पर्यंत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अडीचशे वाहन क्षमतेच्या या पार्किंगसाठी ५ लाख ४७ हजार ५०० रुपये लायसन्स फी आणि २६ लाख ४९ हजार ९०० रुपयांची सुरक्षा ठेव घेण्यात आल्याचे परवानगीपत्रात नमूद केले आहे. हा तळ जरी मोठा असला, तरी पार्किंगसाठी मर्यादित क्षेत्र देण्यात आले आहे. त्यामुळे कमी जागेत ठेकेदार टार्गेट कसे गाठणार, हा प्रश्नच आहे.

‘मटा’चा पाठपुरावा

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील अनधिकृत पार्किंग समस्येवर ‘मटा’ने अनेकदा आवाज उठवला होता. पार्किंगला जागा नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी थेट प्लॅटफॉर्मवर दुचाकी, चारचाकी वाहने उभी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे दहशतवादी विस्फोटक पदार्थ थेट रेल्वेपर्यंत नेण्याचा धोका होता. त्याचे वृत्त ‘मटा’मध्ये आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने कार्यवाहीचे आदेश दिले होते. बातमीचे कात्रण मुंबई व भुसावळ कार्यालयाकडे गेल्यानंतर नवीन वाहनतळ सुरू करण्याचे नियोजन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठ झळाळली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी, अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्र आणि अलंकाराची खरेदी करणे शुभ असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. शहरात किमान ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाहन, घरे, होम अॅप्लायन्सेस आणि डिजिटल उपकरणांची बाजारपेठ तेजीत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. येते तीन दिवस बाजारपेठ अशाच पद्धतीने फुललेली राहिल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दिवाळीतील धनत्रयोदशी हा दिवस सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जात असला तरी सराफ बाजाराबरोबरच इतर बाजार व दुकानेही गर्दीने गजबजली आहेत. धनतेरसचा मुहूर्त साधत आज मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी व इलेक्ट्रॉनिक्स व गृहउपयोगी वस्तूही खरेदी करण्यासाठी झुंबड उडत आहे. त्यामुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी औद्योगिक कामगारांनी मोठी गर्दी केल्यामुळे रस्ते फुलले होते. आजही खरेदीसाठी ठिकठिकाणी ही गर्दी

दिसत होती.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेले फेस्टीवल अॅडव्हान्स व पगार, औद्योगिक कामगारांना मिळालेला बोनस, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने केलेल्या घोषणा व पगार याचे प्रतिबिंब आपसूकच मार्केटमध्ये उमटले. यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे त्याचाही परिणाम धनतेरसच्या गर्दीमध्ये दिसत होता. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करण्याचा दिवस असतो तर सोने खरेदीसाठी हाच दिवस उत्तम मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सकाळपासूनच सराफांच्या दुकानात गर्दी होती. दिवाळीच्या या महत्वाच्या मुहूर्तावर सोने बाजाराची उलाढाल सर्वाधिक होती. हा दिवस व्यापारी वर्गासाठी सुध्दा महत्त्वाचा असल्यामुळे त्यांनी सुध्दा संपत्तीची पूजा केली. त्याचप्रमाणे हिशेबासाठी नवी वही वापरण्यासही सुरूवात केली.

वाहनांसाठी रांगा

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन वाहन घेण्याची परंपरा आहे. त्यानुसार दुचाकी आणि चारचाकी वाहनांची बाजारपेठेने वेग घेतल्याचे दिसून आले. मोपेड, फोर स्ट्रोकसह विविध प्रकारच्या चारचाकी, बुलेट या वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे वाहन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तर नवनवीन ऑफर्समुळेही वाहन खरेदीकडे कल असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

गृहखरेदीला बूस्ट

शहर परिसरात तब्बल पाच हजार सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दिवाळीच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिकांनी दिलेली सूट, विविध ऑफर्स यामुळे अनेकांनी नवीन घरांची खरेदी केली आहे. सदनिकांची चौकशी, सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी गर्दी आणि प्रत्यक्ष बुकिंग अशा विविध पातळ्यांवर धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. बांधकाम व्यवसायातील मरगळ या उत्साहामुळे दूर होईल, असे चित्र शहरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगाव प्रकरणाचे खापर प्रभारी पीआयवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव येथे अल्पवयीन बालिकेवरील अत्याचारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचे खापर केवळ एका प्रभारी पोलिस निरीक्षकावर फोडण्यात आल्याचा आश्चर्यकारक प्रकार पुढे आला आहे. ञ्यंबकेश्वर पोल‌िस स्टेशनचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, या कारवाईबाबत त्र्यंबकेश्वरवासियांमध्ये तीव्र नाराजी आहे. देशमुख यांना बळीचा बकरा बनविला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, या कारवाईचा पोलिसांच्या मनोधैर्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
तळेगाव अंजनेरी येथील घटनेनंतरचा तणाव निवळत असताना पोल‌िस निरीक्षक देशमुख यांच्यावर ही कारवाई झाली आहे. त्यांची तडकाफडकी बदली नागरिकांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे. कोणाची चूक आणि शिक्षा कोणाला अशा स्वरुपाच्या चर्चेलाही त्यामुळे उधाण आले आहे. तळेगाव अंजनेरी घटनेचा सोशल मीड‌ियाद्वारेच अधिक प्रसार झाला. लोक त्र्यंबकेश्वर पोल‌िस स्टेशनमध्ये जमू लागले. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभारी निरीक्षक देशमुख यांनी तातडीने गुन्हा दाखल केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही घटनेची माहिती दिल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
घटनेचे पडसाद उमटू लागल्याने पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले. अतिप्रसंग झाला नाही, केवळ प्रयत्न झाला असे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे जमाव अधिक हिंसक झाला. तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा आता पोलिसांसह विविध स्तरातील लोक करू लागले आहेत. मात्र, या घटनेत नाशिक जिल्ह्याची झालेली बदनामी पाहून देशमुख यांचा बळी देण्यात आल्याचा दावा आता नागरिकच करू लागले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. दोन गट आमने-सामने आले. मोटारसायकलींवरून झुंडीने येणाऱ्यांकडून लाठ्या-काठयांसह पेट्रोलच्या बाटल्या आणि अर्वाच्च्य भाषेचा वापर करण्यात आला. ही परिस्थिती थोपविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असताना काही समाज कंटकांकडून दंगलखोरांना प्रोत्साहन दिल्याचाही दावा होऊ लागला आहे. तरीही देशमुख यांच्यावर कारवाई हा चोर सोडून संन्याशाला फाशी असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरवासी करीत आहेत. त्यांच्या कार्यकाळात श्रावण सोमवार, गणेशोत्सव, सरपंचपदाच्या निवडणुका सलोख्यात संपन्न झाल्या असताना ही कारवाई धक्कादायक असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे.
तळेगाव घटना आणि त्यानंतरची दंगल याचा बारकाईने अभ्यास होणे आवश्यक असून राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. देशमुख यांच्या बदलीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून, या संबंध प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे व्हायला हवा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images