Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कोर्टाच्या निर्देशांकडे दुर्लक्षानेच फटाका दुर्घटना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी, तसेच इतर काळातही रहिवाशी भागात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा अवैध साठा केला जातो. फटाक्यांचा साठा व वापर याबाबत स्फोटके कायदा, १८८४ व २००८ च्या तरतुदींचे कडक पालन करण्याचे आदेश हायकोर्टासह सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, क्षणिक फायद्यासाठी याकडे दुर्लक्ष केले जाते. पोलिस व महापालिका प्रशासन कारवाई करीत नाही. त्यामुळे औरंगाबादसारखी भीषण दुर्घटना घडली. कोर्टाच्या आदेशाकडे कानाडोळा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई व्हावी, अशी मागणी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या चंद्रकांत लासुरे यांनी केली आहे.

फटाक्यांचा अवैध साठा आणि त्याचा वापर याविषयी सुसूत्रता आणण्यासाठी शहरातील चंद्रकांत लासुरे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. वेळोवेळी त्यांनी पोलिस, तसेच महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी थेट हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान अवघ्या १५ दिवसांपूर्वी हायकोर्टाने महापालिकेसह पोलिसांना फटकारत कायद्याची अंमलबजावणी करताना एकमेकांकडे अंगुलीनिर्देश केलेला खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. फटाक्यांच्या दुर्घटना रोखण्यासाठी पोलिस व महापालिका प्रशासनाने काय केले, याचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले होते. हायकोर्टाचा हा आदेश राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांसाठी लागू करण्यात आला होता. वास्तविक फटाके विक्रेत्यांच्या दुकानांची रचना कशी असावी, याविषयी वेळोवेळी कोर्टाने, तसेच प्रशासनाने सूचना केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. औरंगाबादच्या घटनेने हे सिद्ध केले असून, या घटनेसाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी लासुरे यांनी केली. नाशिक शहरातही नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी निर्देश दिले होते. त्या निर्देशांचे पालन फटाका विक्रेत्यांसह महापालिकेने केले काय, याविषयी हायकोर्टात पुरावे सादर करणार असल्याचे लासुरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आम्हालाही हवाय मतदानाचा हक्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात १६ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत एक लाख ८५ हजार ९३६ नवमतदारांनी नोंद केली आहे. या अर्जांच्या छाननीनंतर पाच जानेवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नवीन मतदारांची नोंदणी करण्याबरोबरच नावात बदल करणे, पत्त्यामध्ये बदल करणे, दुबार आणि मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले. १६ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विशेष मोहीम राबविण्यात आली. सुरुवातीला १४ ऑक्टोबरपर्यंत या मोहिमेची मुदत होती. मात्र, ही मुदत एक आठवड्याने वाढविण्यात आली. २१ ऑक्टोबर रोजी ही मुदत संपली असून, जिल्ह्यात एक लाख ८५ हजार ९३६ नवमतदारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये एक लाख ६२ हजार २ पुरुषांनी, तर ७९ हजार ७२९ महिलांनी मतदार अर्ज भरले आहेत. सध्या जिल्ह्यात ४० लाख २३ हजार ५४९ इतके मतदार आहेत. नाशिक शहरातील चारही मतदारसंघांत मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्यात आली. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक ४९ हजार २२१ नवमतदारांनी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल नाशिक पूर्वमध्ये २८ हजार १०६ मतदारांनी नोंदणी केली आहे. सर्वांत कमी म्हणजे २०४३ मतदारांची नोंदणी सुरगाणा तालुक्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक-पुणे रस्त्यावर गांधीनगर प्रेस वसाहतीत शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अपघात झाला. अपघातात कन्हैया रवींद्र जगदाळे (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला. गांधीनगर प्रेस वसाहतीत राहणारा जगदाळे पंचशीलनगर, टाकळीगाव येथे राहणाऱ्या अक्षय भीमराव भालेराव याच्या दुचाकीवर (एमएच १५/ एझेड २६०८) नाशिककडून नाशिकरोडच्या दिशेने प्रवास करीत होते. नासर्डी पुलाजवळील सिटीकेअर हॉस्पिटलजवळ भरधाव असलेली मोटारसायकल स्लीप झाली. यामुळे मागे बसलेला जगदाळे गंभीर जखमी झाला. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना जगदाळेचा मृत्यू झाला. या प्रकरणी गौरव मधुकर जाधव याने दिलेल्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलिसांनी अक्षय भालेरावविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पानसरे तपास करीत आहेत.

अपघाताची दुसरी घटना पाथर्डी वडनेर रोडवरील दर्ग्यासमोर शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. या घटनेत अंबड एमआयडीसी परिसरातील शांतीनगर झोपडपट्टीतील डोंगर बाब चौक येथील विजय भास्कर आवळे (वय २६) या तरुणाचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी आवळे दुचाकीने (एमएच १५/ईटी ८३९०) वडनेर गेटकडून पाथर्डी चौफुलीकडे जात होता. दरम्यान, पाथर्डी गाव चौफुलीकडून वडनेर गेटकडे भरधाव जाणाऱ्या दुचाकीने (एमएच १५/एफए २३८५) आवळे यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात आवळे गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भास्कर देविदास आवळे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके विक्रीत ५० टक्के घट

$
0
0

नागरिकांचा खरेदीस अल्प प्रतिसाद; विक्रेते हवालदिल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीचा सण म्हणजे फटाक्यांची आतषबाजी हे काही वर्षांपूर्वीचे समीकरण आता पूर्णतः बदलले आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यावर आज प्रत्येकाचा भर आहे. त्यामुळेच यंदा फटाके खरेदीला नाशिककरांनी अल्प प्रतिसाद दिला असून फटाके विक्रेते मात्र हवालदिल झाले आहेत. यंदा ५० टक्क्यांनी विक्री घटली असल्याची माहिती नाशिक फटाका असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.

दिवाळी साजरी करताना फटाक्यांचा होणारा अतिवापर, आतषबाजी यामुळे सर्वच सजीवांना कोणत्या ना कोणत्या हानीला सामोरे जावे लागते. फटाके उडविणे अनेकांच्या जीवावर बेतले असल्याचीही अनेक उदाहरणे दिवाळीदरम्यान घडतात. त्याचबरोबर पर्यावरणाचा मोठा ऱ्हास या फटाक्यांमुळे होत असतो. या व अशा अनेक बाबींविषयी समाजात होत असलेल्या प्रबोधनामुळे फटाक्यांकडे नागरिकांनी पाठ फिरवली.

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करुन पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला गेला. दरम्यान, शाळांमध्येही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये वारंवार प्रबोधन करून त्यांच्यात पर्यावरण संवर्धनाचे बीज रोवण्यात आले. होणाऱ्या नुकसानाची जाणीव त्यांना करून दिली जात असल्याने चिमुकल्यांनी फटाके उडविण्याचा हट्ट कधीच सोडला आहे. परिणामी, यंदा दिवाळी खऱ्या अर्थाने फटाकेमुक्त साजरी करण्यात आली.

याचा मोठा फटका फटाका विक्रेत्यांना मात्र बसला. विक्रीसाठी आणलेल्या फटाक्यांचे पुढे काय करायचे, हा प्रश्न त्यांना सतावत असून गुंतवलेला पैसादेखील मिळणे मुश्किल झाले आहे. उरलेला माल ठेवायचा कुठे, या प्रश्नामुळे व्यथित होत मोठ्या विक्रेत्यांना कमी दरातच फटाके देऊन टाकण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी हलाखीचीच ठरली आहे.


नागरिक पर्यावरणाविषयी जागरुक होत असल्याने फटाके खरेदीला कमी प्रतिसाद मिळाला. आम्ही चायनीज फटाक्यांवर बंदी आणली होती. मात्र काही लोकांना हेच फटाके आकर्षित करत असल्याने इतर फटाक्यांची विक्री झाली नाही.

– जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, नाशिक फटाका असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोभावे ‘लक्ष्मी’पूजन

$
0
0

शहरात दिवाळीचा उत्साह; नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी दिवसभर गर्दी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीपमाळांची रोषणाई, पणत्यांचा झगमगाट, दारासमोरच्या रांगोळ्या, फटाक्यांच्या आतषबाजीत रविवारी (दि. ३०) लक्ष्मीपूजन उत्साहात करण्यात आले. यानिमित्ताने घराघरात, दुकानात, कार्यालयात लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मंद‌िरांमध्येही स्त्रीसूक्त व महालक्ष्मीच्या पाठाचे आयोजन करण्यात आले.

लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवारीच (दि. २९) पासून शहरातील बाजारपेठा फुलल्या होत्या. रविवारीही खरेदीचा ओघ कायम होता. पुजेसाठी लागणाऱ्या केरसुण्या, मीठ, झेंडूची फुले यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. शहरातील रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, अशोक स्तंभ, महात्मा गांधी रोड, सातपूर कॉलनी, सातपूर गाव, सिडकोतील स्टेट बॅँक परिसर, नाशिकरोडच्या उड्डाण पुलाखाली त्याच प्रमाणे देवळाली गाव येथे फुले विक्रेत्यांनी पहाटेपासून झेंडू व अन्य फुलांच्या विक्रीची दुकाने मांडली होती.

दिवसभर घराघरात फुलांचे हार, गाड्यांची सजावट सुरू होती. त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणाऱ्या लाह्या, बत्ताशे व बोळक्याची खरेदी महिलांकडून केली जात होती. बहुतांश नागरिकांनी दिवसभर मुहूर्त असला तरी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले. रविवार पेठेतील व्यापाऱ्यांनीही नेहमीच्या प्रथेप्रमाणे सायंकाळी लक्ष्मीपूजन व चोपडी पूजन केले व एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी धने, गुळ, लाह्या व पेढ्यांचा प्रसादाचे वाटप करण्यात आला. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा असल्याने शहरातील सराफांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, मोबाइल शॉपी, गाड्यांचे शोरूम ग्राहकांनी भरलेले दिसत होते.सकाळी अनेक महिलांनी आपल्या घरासमोर मोठ्या रांगोळ्या काढल्या त्य़ाच प्रमाणे पुरुष मंडळी देखील घराच्या दारांना तोरणं बांधतांना दिसत होती. पूर्वी घराघरात फराळ तयार केला जात असे त्यासाठी आधीपासून तयारी करावी लागत होती. मात्र सध्याच्या जमान्यात घरातील स्त्रीयांना वेळ नसल्याने अनेकांनी फराळ्या जिन्नस बाहेरुनच खरेदी करणे पसंत केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत फराळाच्या खरेदीचा ओघ कायम होता. जुन्या पोलिस आयुक्तालयाजवळ असलेल्या तिबेटियन मार्केटमध्येही कपडे खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रोजच्या वस्तुंसोबतच अनेकांनी थंडीचे कपडेही खरेदी केले.

आज पाडवा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा). श्री विष्णूने ही तिथी बळीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलिप्रतिपदा’ म्हटले जाते. यादिवशी पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात.

यानंतर बलिप्रित्यर्थ दीप अन् वस्त्रे दान करतात. प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करतात. लोक नवी वस्त्रावरणे नेसून सर्व दिवस आनंदात घालवितात. याचदिवशी गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करत मिरवणूक काढतात.

महापालिकेत लक्ष्मीपूजन

नाशिक : महापालिकेच्या वतीने लक्ष्मीपूजनाचा रविवारी (दि. ३०) कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्त कोषागारातील तिजोरीचे महापौर अशोक मुर्तडक यांनी सपत्निक तसेच आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते विधीवत पूजन करून लक्ष्मीपूजन करण्यात आले. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन कोषागार येथे झालेल्या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सलिम शेख, गटनेते तानाजी जायभावे, अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, आर एम बहिरम, रोहिदास दोरकुळकर, शहर अभियंता सुनील खुने आदींसह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...तर शुभ्र शिधाप‌त्रिका मिळवा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे, त्या शिधापत्रिकाधारकांनी सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ न घेणे अभिप्रेत असून, त्यांनी तत्काळ स्वेच्छेने सवलतीच्या दरात अन्नधान्य नाकारावे व तहसील कार्यालयातून शुभ्र शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळविण्यासाठी उत्पन्न मर्यादा विहित करण्यात आली आहे. त्यानुसार वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या कुटुंबांकडे शुभ्र शिधापत्रिका असणे व त्यांनी सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ न घेणे अभिप्रेत आहे. अशा कुटुंबांनी केशरी किंवा पिवळी शिधापत्रिका बाळगून त्याद्वारे शिधावस्तूचा लाभ मिळविणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र शासन (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग) यांच्याकडील शासन निर्णय १३ ऑकटोबर २०१६ अन्वये स्वीकारण्यात आलेल्या धोरणानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचा लाभ घेत असलेल्या नागरिकांना सवलतीच्या दरात मिळणारे धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार ज्या केशरी अथवा पिवळ्या शिधापत्रिकाधारकांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाखांपेखा जास्त आहे, अशा सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांची केशरी अथवा पिवळी शिधापत्रिका तहसील, धान्य वितरण कार्यालयात तत्काळ जमा करून शुभ्र शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी, तसेच सवलतीच्या दरात मिळणारे धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय स्वीकारावा. सवलतीच्या दरात मिळणारे अन्नधान्य आपण स्वेच्छेने नाकारल्यास सदर अन्नधान्य खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.

भविष्यात होणाऱ्या अपात्र शिधापत्रिका शोधमोहिमेत वार्षिक एक लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांकडे केशरी अथवा पिवळी शिधापत्रिका असल्याचे आढळून आल्यास व सदर शिधापत्रिकाद्वारे शिधावस्तूंचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास अशा शिधापत्रिकाधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे तहसीलदार कैलास पवार, धान्य पुरवठा अधिकारी ए.जी. गावित यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावत्र पित्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गांजा पिलेल्या सावत्र पित्याने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी, त्याची पत्नी व १४ वर्षीय मुलगी जयभवानी रोड परिसरातील फर्नांडिसवाडीत राहतात. पती पत्नीचा हा दुसरा विवाह असून, पहिल्या लग्नानंतरची मुलगी आईसोबतच राहते. शुक्रवारी रात्री ४५ वर्षीय संशयित आरोपी गांजा पिऊन आला. रात्री ११ वाजता त्याने भांडणास सुरुवात केली. पीडित मुलीला त्याने आपल्यासोबत राहण्यास सांगितले. रात्री दोन ते तीनच्या सुमारास सावत्र पित्याने पीडित मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार बाजूलाच झोपलेल्या पत्नीच्या लक्षात आला. तिने या घटनेला विरोध केला. संशयित आरोपीने मायलेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असा दम दिला. यानंतर पीडित मुलीने आपल्या आईसह उपनगर पोलिस स्टेशन गाठून सावत्र पित्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग, तसेच लहान बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यातील कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

बनावट इअरफोन विक्री

नामांकित कंपनीचे बनावट इअरफोन विक्री करणाऱ्या प्रधान पार्कमधील भरत मोबाइल व रामदेव मोबाइल या दुकानांवर छापा टाकत पोलिसांनी ७२ हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही दुकानमालकांवर गुन्हा दाखल करून सरकारवाडा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

या बाबत कंपनीचे प्रतिनिधी अजय दत्तात्रेय डापसे यांनी फिर्याद दिली आहे. प्रधान पार्कमधील या दोन्ही दुकानांत नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट इअरफोन्सची विक्री होत असल्याची माहिती डापसे यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी पुराव्यासह ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाल्याने भरत नेथीराम पटेल आणि प्रकाश कसनाराम चौधरी या दुकानमालकांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी फसवणूक, कॉपीराइट अॅक्ट १९५७ च्या ४१ आणि ६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववीची पुस्तके बदलणार

$
0
0

गणित, विज्ञान, इतिहास पुस्तकांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि विज्ञान, भाषा या विषयातील बदलत्या परीक्षा पद्धतीशी सांगड घालता यावी, यासाठी आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत. पुस्तकांच्या नव्या रचनेत रचनावादावर भर देण्यात आला आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० नुसार या पुस्तकांमध्ये बदल करण्यात येत आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या चालू वर्षात सहावीच्या पुस्तकापर्यंत बदल करण्यात आले होते. मात्र यंदा इयत्ता सातवीच्या त्याचबरोबर इयत्ता नववीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार आहे. यात मुख्यतः गणित, विज्ञान, इतिहास या पुस्तकांचा समावेश असणार आहे. नववीच्या पुस्तकातील महत्त्वाचा बदल म्हणजे यात स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा समावेश असणार आहे. तर भाषा विषयाकरिता प्रश्नपत्रिकेऐवजी कृती पत्रिका तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न यामागे आहे. नव्या रचनेत इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर देण्यात आला आहे. आठवी पर्यंतच्या अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी सामान्य तर नववी व दहावीची काठिण्यपातळी जास्त असल्याचा आरोप होत होता. यामध्ये सुसूत्रता आणण्याचाही प्रयत्न या रचनेत करण्यात आला आहे.इयत्ता पहिली ते ज्यूनिअर कॉलेज स्तरांमध्ये अभ्यासक्रमांच्या निर्मितीसाठी यापूर्वी दोन संस्थांकडे विभागून जबाबदारी होती.

यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्या परिषदेच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करण्यात येत होता. प्रत्यक्षात निर्मितीचे काम बालभारतीकडून होत होते. आता मात्र इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत निर्मितीसाठी एकाच अभ्यासमंडळाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता कोठेही मिळणार केरोसिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खुल्या बाजारात केरोसिन आता सहजगत्या उपलब्ध होऊ शकणार आहे. केरोसिन वापरावरील नियंत्रण आणि कमाल किंमत निश्‍चिती धोरणात केंद्र सरकारने सुधारणा केली असून, सार्वजनिक केरोसिनचा साठा, वाहतूक आणि विक्री नियंत्रणमुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता केवळ रेशन दुकाने किंवा केरोसिन परवानाधारकांकडेच नाही तर कुठल्याही दुकानात केरोसिन सहजरीत्या उपलब्ध होऊ शकणार आहे. मात्र, कोटा कमी केल्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या केरोसिन परवानाधारकांसाठी हा निर्णय घातक ठरेल, असे बोलले जाऊ लागले आहे.

राज्य सरकारने नुकतेच याबाबतचा अध्यादेश काढला आहे. बाजारात केरोसिनची समांतर व्यवस्था असावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. केरोसिन नियंत्रणमुक्त केल्यामुळे आता परवानाधारक, रास्त भाव दुकानदारांसह खासगी व्यक्ती आणि दुकानांमध्येही केरोसिन पुरवठा, वितरण, खरेदी-विक्री करता येणार आहे. अल्प उत्पन्न, दारीद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय कार्डधारकांनाच सरकारकडून सवलतीच्या दरात केरोसिन दिले जाते. घरात गॅस कनेक्शन असलेल्या कुटुंबांनाही केरोसिन देणे सरकारने केव्हाच बंद केले आहे. परिणामी, केरोसिन परवानाधारकांकडील रॉकेलचा कोटाही बराच कमी झाला आहे. केरोसिन परवानाधारकांसह, रास्त भाव दुकानदारांनाही मिळणारे कमिशन अगदीच कमी आहे. त्यात उदरनिर्वाह करणेही कठीण झाल्याची तक्रार केरोसिन परवानाधारकांनी अलीकडेच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती. गॅस वितरणाचे सबसेंटर्स द्यावेत, अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे. एकीकडे ते मेटाकुटीला आले असताना आता तर खुल्या बाजारात केरोसिनची विक्री होणार असल्याने केरोसिन परवानाधारकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महाराष्ट्र केरोसिन डीलर्स लायसेन्सिंग ऑर्डरमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार समांतर केरोसिन बाजार व्यवस्थेंतर्गत फ्री-सेल केरोसिनचा पुरवठा, वितरण, खरेदी-विक्री अशा सर्वच बाबी नियंत्रणमुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परवान्याशिवायही केरोसिनची विक्री होऊ शकणार आहे. शिधापत्रिकाधारकांना १० रुपये लिटरने दिले जाणारे केरोसिन काळ्या बाजारात ५० ते ६० रुपये लिटर दराने विक्री होत असे. मात्र, आता खुल्या बाजारात केरोसिन उपलब्ध होणार असल्याने केरोसिनचा काळा बाजार रोखणे शक्य होणार आहे. मात्र, खुल्या बाजारातील केरोसिनची पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ होण्याचीही शक्‍यता बळावली आहे.

परवानाधारकही करू शकतील फ्री-सेल विक्री

परवानाधारक केरोसिन विक्रेते, रास्त भाव दुकानदार, शिधावाटप दुकानांमधूनही फ्री सेल केरोसिनची विक्री करण्याची परवानगी सरकार दिली आहे. मात्र यामुळे सवलतीचे केरोसिनही खुल्या बाजारातून विकले जाण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारातील केरोसिन आणि सवलतीचे केरोसिन यांची भेसळ करता कामा नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसे होणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌शकात हुडहुडी; पारा ११.२ अंशांवर

$
0
0

नाशिक : काही महिन्यांपूर्वी उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नाशिककरांना आता थंडीचा सुखद अनुभव मिळू लागला आहे. दिवाळी सणाचा आनंद लुटणाऱ्या नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवू लागला असून, नाशिकमध्ये चालू हंगामातील यंदाचे सर्वात कमी ११.२ अंश सेल्स‌िअस एवढे तपमान नोंदविले गेले आहे.

अवकाळी पाऊस, उन्हाचा कडाका आणि थंडीचा घसरणारा पारा याचा अनुभव नाशिककर नेहमीच घेत असतात. यंदाही कडाक्याची थंडी पडणार, असे संकेत ऑक्टोबर अखेरमध्येच मिळू लागले आहेत. रविवारी नाशिकमध्ये या हंगामातील सर्वात कमी म्हणजेच ११.२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. शनिवारी हेच तपमान ११.४ अंश सेल्सिअस ऐवढे नोंदविण्यात आले होते. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नाशिककरांना थंडीचा अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळे उबदार कपडे पुन्हा बाहेर निघू लागले आहेत. गेल्या १० दिवसांत तपमानात अनेकदा चढउतार झाले. कमाल तपमान ३०.१ ते ३२.२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले. तर किमान तपमान देखील ११.२ ते १७.० या दरम्यान राहीले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजाराचं दिवाळं केव्हा?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक संघटनांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी अनधिकृत भंगार बाजाराबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर दिवाळीचा ताण संपल्यामुळे आता अनधिकृत भंगार बाजाराचं दिवाळं वाजणार केव्हा, असा सवाल उद्योजकांसह परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिस आयुक्तांच्या यासंदर्भातील आदेशाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. एकेकाळी शे-दोनशे असलेली भंगाराची दुकाने आज हजारोंच्या संख्येने झाली आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त व पोलिस प्रशासनाने यावर निर्णय घेणे गरजेचे असलेल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींच्या अगदी मधोमध भंगार बाजाराची निर्मिती झाली होती. सातपूरला एमआयडीसी सुरू झाल्यावर नंदिनी नदीच्या किनाऱ्यावरच महापालिकेच्या जागेवर पहिल्यांदा अनधिकृत भंगाराची दुकाने सुरू झाली होती. त्यानंतर वाढलेल्या कारखान्यांची संख्या पाहता अंबड लिंकरोड भागात आज हजारोंनी अनधिकृत भंगाराची दुकाने वसली आहेत. विशेष म्हणजे एकेकाळी केवळ भंगाराचा व्यावसाय अंबड लिंकरोड येथील भंगार दुकानांवर होत होता. परंतु, कालांतराने भंगार हा दुय्यम व्यवसाय झाला असून, या ठिकाणी एमआयडीसीला लागणारे सुटे पार्ट बनविले जात आहेत, तसेच घरगुती वस्तूंचे मोठे मार्केटच भंगार बाजारात अनेकांनी उभारले आहे. भंगार बाजार हटविण्याबाबत अनेकदा आंदोलनेदेखील झाली आहेत. परंतु, महापालिका व पोलिस प्रशासनांच्या वादात अनधिकृत भंगार बाजाराचे भिजत घोंगडे अडकून पडले आहे. महापालिकेच्या पूर्व विभागाच्या कार्यालयात बुधवारी अनधिकृत मंदिरांच्या कारवाईबाबत बैठक झाली. त्यातही भंगार बाजाराचा मुद्दा उपस्थित होऊन नगरसेवक विनायक खैरे यांनी भंगार बाजार हटवण्याबाबत महापालिका न्यायालयाचा अवमान करीत असल्याचा आरोपदेखील केला.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निमा या औद्योगिक संघटनेच्या बैठकीत पोलिस आयुक्त सिंघल यांनी लवकरच अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता दिवाळीच्या सणानंतर पोलिस आयुक्त सिंघल अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत कधी निर्णय घेतात, याची चर्चा नागरिकांत होत आहे.

दुकाने जाणार कुठे?

भंगार बाजारात असलेली हजारो भंगार दुकाने हटविल्यास त्यांची सोय कुठे होणार, असा सवालही यानिमित्ताने केला जात आहे. विशेष म्हणजे अनधिकृत भंगार बाजार हटविण्यासाठी महापालिकेने तीन वर्षांपूर्वी भंगार गोळा करण्यासाठी टेंडर नोटीसदेखील काढली होती. परंतु, कुठल्याच भंगार व्यावसायिकाने महापालिकेने काढलेले भंगाराचे टेंडरच भरले नसल्याचे समोर आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको चौक टाकतोय कात

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या बिटको चौकाचे रूप पालटत असून, या चौकात दोन ठिकाणी कामगारांचे नवे पुतळे उभारण्यात आले आहेत. नव्या आयलॅण्मध्ये योगा आणि शाळेला जाणाऱ्या मुलीचे पुतळे आहेत. त्यामुळे हा चौक जणू कात टाकत असल्याची स्थिती दिसून येत आहे.

नाशिकरोडचा बिटको चौक हा बेशिस्त वाहतुकीमुळे नेहमी चर्चेत असतो. चौकाला सर्व बाजूंनी रिक्षाचालकांचा विळखा पडलेला असतो. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक सिग्नल तोडून वाहने पुढे घुसडतात. चौकातील वाहतूक बेटाची माती रस्त्यावर आली आहे. चौकातील पोलिस चौकीसमोर नागरिक सर्रास वाहने लावतात. पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेतात आदी कारणांनी बिटको चौकाची वेगळी ओळख लोकांच्या मनात रुजली आहे.

नाशिकरोडला मध्यमवर्गीयांची व कामगारांची वस्ती जास्त आहे. बिटको चौकात सकाळी हातावर पोट असलेल्या कामगारांची गर्दी असते. रोजगाराच्या आशेने ते येथे जमतात. हे लक्षात घेऊन बिटको चौकात कामगारांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. बिटकौ चौकात दोन नवीन वाहतूक बेटे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. मुख्य चौकातील बेटात हातोडा घेतलला आणि सेफ्टी हेल्मेट घातलेला कामासाठी निघालेला कामगार असा सुंदर पुतळा उभारण्यात आला आहे. जेलरोडला जाणाऱ्या रस्त्यावरील सिग्नलजवळ सफाई मजुराचा पुतळा उभारण्यात आला आहे. शेजारीच असलेल्या नवीन वाहतूक बेटात दोन लहान मुलांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. एक मुलगा योगा करताना दाखवला आहे. योगा करा आणि दीर्घायुषी राहा, असे सुंदर वाक्य पुतळ्याखाली लिहिलेले आहे. या नव्या वाहतूक बेटात दुसरा पुतळा शाळेला निघालेल्या मुलीचा आहे. मी शिकतेय, तुम्हीही शिका असा संदेश या पुतळ्याखाली आहे. या चारही पुतळ्यांमुळे बिटको चौकाला नवे रूप प्राप्त झाले आहे.

---

बेटांचे काम मंदावले

बिटको चौकात नवीन पुतळे उभारण्यात आले असले, तरी दोन्ही वाहतूक बेटांचे सुशोभीकरण मंद गतीने सुरू आहे. बेटात हिरवळ लावणे, रंगरंगोटी बाकी आहे. बेटातील माती रस्त्यावर पसरू लागली आहे. कामाचे साहित्य, डबर तेथेच पडलेले आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्राला नाशिकचा ‘सुवर्ण’टच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकेकाळी उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथे सराफ बाजाराचा दबदबा होता; पण आता नाशिकचा सराफ व्यवसाय आता उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठा व्यवसाय ठरत आहे. जळगावमध्ये ११० सराफी दुकाने असून, नाशकात हीच संख्या एक हजाराच्या आसपास गेली आहेत. विशेष म्हणजे जळगाव, धुळे येथील मोठ्या सराफांसह राज्यातील नामांकित ब्रँड आणि प्रख्यात सराफांनीही नाशिकला शो-रूम सुरू केले आहेत. यामुळे नाशिकमध्ये सुवर्ण व्यवसायाची उलाढाल लक्षणीय वाढली आहे.

शुद्ध सोने व विविध डिझाइन्सच्या दागिन्यांमुळे जळगावने राज्यातही आपला दबदबा निर्माण केला होता; पण आता शुद्ध सोन्याच्या हमीबरोबरच नाशिकमध्ये तब्बल पाच हजारांहून अधिक बंगाली कारागीर नाशिकमध्ये स्थिरावल्यामुळे सराफ बाजारालासुद्धा त्याचा फायदा झाला आहे. एकाच ठिकाणी असलेली जळगावची दुकाने हीदेखील वैशिष्ट्ये या बाजारपेठेची होती; पण नाशिकमध्येही आता कॉलेज रोड ही सराफांची बाजारपेठ होत आहे. आता जुन्या नाशकातील बऱ्याच सराफांनी आपला व्यवसाय येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉलेज रोडप्रमाणेच गंगापूर रोडवरही शो-रूम उघडली असून, भविष्यात येथेही मोठे शो-रूम येण्याची शक्यता आहे. नाशिकरोड, सिडको येथेही मोठ्या सराफांच्या शाखा होत आहेत. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षांत मुंबई, पुणे येथील सराफांच्या व्यावसायिकांनीसुद्धा आपली शो-रूम थाटली आहेत, तर अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनीही आपला व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे नाशिक हे सोने खरेदीचे मोठे खरेदी केंद्र बनले आहे.

घाऊक व्यापारही वाढला

जळगाव हे घाऊक व्यापारासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे येथून अनेक सराफ दुकानदार सोन्याचे दागिने घेत असत; पण आता हीच स्थिती नाशिकची झाली आहे. येथे अनेक जण घाऊक व्यापार करीत आहेत. त्याचप्रमाणे मुंबई जवळ असल्यामुळे त्याचा फायदाही येथे होतो.

डायमंड व्यवसाय जोरात

सोन्याप्रमाणेच डायमंड व्यवसाय येथे जोरात सुरू झाला आहे. नवग्रह व हिऱ्यांच्या विक्रीत येथे वाढ झाली आहे. डायमंड व्यवसाय मुंबईपासून सुरत, बडोदा, अहमदाबाद या भागात मुख्यत्वे असला तरी नाशिक हे या भागाला जवळचे आहे. महाराष्ट्रातील अनेक कुशल कामगार डायमंड क्षेत्रात गुजरातमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे भविष्यात या व्यवसायाची येथे मोठी बाजारपेठ होण्याची शक्यता आहे.

नाशिक शहराची वाढलेली लोकसंख्या व शहरात असलेले पोटेन्शियल यामुळे येथे जळगाव, धुळ्याबरोबरच मुंबई व पुण्याच्या सराफांनी आपल्या शाखा उघडल्या आहेत. पाच हजारांहून अधिक बंगाली कारागीर नाशिकला आहेत.

- राजेंद्र ओढेकर, माजी अध्यक्ष, सराफ असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये सुरेल दिवाळी पहाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे मखमलाबाद येथील यशोदामाई नाना-नानी पार्कमध्ये सकाळी ६ ते ७.३० या वेळेत सुरेल दिवाळी पहाट साजरी करण्यात आली.

सारंग गोसावी, सचिन म्हसाणे, सचिन विधाते, हेमंत भालेराव, स्मृती ठाकूर, सौरव आव्हाड, स्मिता आव्हाड यांनी अनेक लोकप्रिय गाणी सादर केली. एम टीव्ही कलर्स ऑफ यूथमधील गायन स्पर्धेतील उपविजेते सारंग गोसावी यांनी ‘मन शुद्ध तुझे गोष्ट आहे पृथ्वी मोलाची’ व ‘अवघे गरजे पंढरपूर’ ही गीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सर्व गायकांना प्रतीक कुलकर्णी यांनी तबल्यावर व उमेश खैरनार यांनी ऑक्टोपॅडवर साथ केली.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्येष्ठ प्रशिक्षक स्वामी वैशंपायन, स्वामी संतोष, विजय हाके, असे अनेक मान्यवर व स्वयंसेवक आदी सुमारे सहाशे रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याचा निषेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लष्करातील निवृत्त सुभेदार रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी दोनदा ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभर आपला संताप व्यक्त केला आहे. नाशिक येथेही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांना अटक करुन सरकारने हुकुमशाही पध्दत अवलंबली आहे. ही गोष्ट लोकशाहीला घातक आहे. शहीद कुटुंबियांना मारहाण करणे व त्यांना भेटण्यास जाणाऱ्या राहुल गांधी यांना मज्जाव करणे ही गोष्ट निषेधार्हच आहे. केंद्र सरकार मनमानी कारभार करुन लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. राहुल गांधींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे. या देशात आंदोलन करण्याचा व न्याय मागण्याचा सर्व नागरिकांना समान हक्क व अधिकार आहे. या अधिकारावर सरकार सूडबुध्दीने वागणूक देऊन जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आमदार शोभा बच्छाव, उत्तम कांबळे, वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील, शाहु खैरे, लक्ष्मण जायभावे, सुरेश मारु, बबलू खैरे, उध्दव पवार, पांडुरंग बोडके, राहुल दिवे, रईस शेख, वसंत ठाकूर, संतोष लोळगे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सामील झाले होते.


पुतळ्याचे दहन

काँग्रेसने निदर्शने केल्यानंतर युवक काँग्रेसने मात्र आपला संताप व्यक्त करतांना भाजप सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर विविध घोषणा देऊन त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पदवीधर’ची नोंदणी लाखावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी मोहिमेकडे सुरुवातीला पदवीधरांनी पाठ फिरवली असली, तरी दिवाळीच्या सुट्टीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नाशिक विभागाच्या एकूण नाव नोंदणीने एक लाखाचा टप्पा पार केला आहे. पदवीधर मतदार नावनोंदणीकामी दिवाळी पावल्याने आता प्रशासनाच्याही जीवात जीव आला आहे. विभागातून नगर जिल्ह्यात सर्वात जास्त पदवीधरांनी नावनोंदणी केली आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत या निवडणुकीची जुनी मतदार यादी रद्द ठरवत नव्याने यादी तयार करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले होते. त्यामुळे कमी वेळात हे अत्यंत जिकीरीचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर येऊन पडली होती. त्यासाठी विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सुमारे ४०० केंद्रांवर नाशिक पदवीधर मतदार नोंदणीचे कामकाज सुरू झाले होते. परंतु, या नावनोंदणीकडे पदवीधरांनी सुरुवातीला पाठ फिरविली होती. त्यामुळे प्रशासनाने सरकारी सुट्ट्यांच्या दिवशीही मतदार नावनोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली होती. परंतु, या मोहिमेलाही फारसा प्रतिसाद लाभला नव्हता.

दिवाळी पावली

सुरुवातीला पदवीधरांनी नावनोंदणीकडे चक्क पाठ फिरविल्याने पदवीधर मतदारसंघाची यादी पन्नास हजारांपर्यंत पोहचण्याबाबत शंका निर्माण झाली होती. परंतु दिवाळीच्या सुट्टीत मोठ्या संख्येने पदवीधरांनी नावनोंदणीचे कर्तव्य पार पाडल्याने आता एकूण नावनोंदणी १,०९,८२८ वर पोहचली आहे. आणखी दोन दिवसांत मोठ्या संख्येने पदवीधरांचे अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिराणी अजूनही बोलीभाषेच्या कळपातच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अहिराणी भाषेला तिची म्हणून स्वतंत्र लिपी नाही. अजूनही ती बोलीभाषेच्या कळपातच आहे. अहिराणी बोलणारे, तिची परंपरा सांगणारे, तिच्या विषयी अभिमान बाळगणारे कोट्यावधी लोक आहेत. वर्षानुवर्ष आपल्या काळजात आणि ओठावर अहिराणी फुलवणारे आहेत. या भाषेला लिपी लाभली असती तर तिचा आणखी विकास झाला असता, पण तसे घडले नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. खांदेश अहिराणी कस्तुरी मंच महाराष्ट्र आणि नाशिक महापालिका यांच्यातर्फे खांदेश साहित्य, सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कालिदास कला मंदिर येथे झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक उमेशभाई राठी यांच्या हस्ते करण्यात आले. मी मराठी न्यूजचे सल्लागार संपादक तुळशीराम भोईटे, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर गुरुमित बग्गा, अहिराणी अभ्यासक डॉ. उषा सावंत, सदाशिव माळी, मंचच्या महिला प्रदेशाध्यक्ष वंदना वनकर, विजया मानमोडे उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, खान्देशाने जन्माला घातलेली अहिराणी ही अन्य वेगळ्या भाषांपेक्षा पूर्णतः वैशिष्ट्यपूर्ण अशी भाषा आहे. या भाषेच्या जन्मामध्ये अनेकांचा सहभाग असला तरी मराठीची भूमिका अधिक आहे. खान्देशला त्याचा एक भूगोल आहे, एक कृषी संस्कृती आहे. त्याचे एक अर्थकारण आहे. खान्देशची वस्त्रसंस्कृती, अलंकार संस्कृती, नृत्य कला सस्कृती आगळी-वेगळी आहे. अनेकांना ती मोहिनी घालते. अहिराणीच्या व्यासपीठावर अन्य भाषांना निमंत्रित करणे आनंददायी आणि आवश्यक आहे. त्यामुळे भाषा-भाषांमधला भगिनीभाव दृढ होतो.

उद्योजक राठी यांनी विविध पदार्थ एकत्र आल्यानंतर जशी चवदार मिसळ तयार होते, त्याचप्रमाणे विविध भाषा एकत्र आल्यानंतर त्यांच्या जो सुसंवाद होतो तो सर्वांना आवडणार असतो, असे सांगितले.

भोईटे यांनी बोलीभाषेतून बोलण्याचा आनंद आगळावेगळा असतो असे सांगितले. आमदार सानप यांनी बोलीभाषा टिकण्यासाठी त्यांचे संवर्धन होण्यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवाची गरज असल्याचे सांगितले. उपमहापौर बग्गा यांनी शुभेच्छा दिल्या.

सांस्कृतिक क्षेत्रात चाळीस वर्ष योगदान देणारे विश्राम बिरारी यांना जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच योगेश शिरसाठ, अश्विनी कासार, अमोल थोरात, प्रकाश पाटील, आशा रंधे, नाना खेडीकर, रेखा महाजन, भैय्या पाटील, सुनील गायकवाड, पुष्पा ठाकूर, आबा पाटकरी, तनय मल्हारा, विजयराज पाटील, रामदास वाघ, डॉ. रमेश सूर्यवंशी, शाहीर शिवाजी पाटील, किशोर कुलकर्णी, पंकज निकम, सुभाष शिंदे, सुनील ढगे, रजनी घुगे यांना कलाभूषण, कलागौरव, खांदेश भूषण, साहित्यभूषण आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. रेखा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेयवादाचे पॅच-अप; नंतर कौतुकसोहळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ इंज‌िनीअरिंग कॉलेज ते आडगाव मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ होण्याअगोदरच शिवसेना व भाजपमध्ये श्रेयावरुन जुंपल्यानंतर गुरुवारी त्यांच्यात पॅच-अप झाले. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी फोन करून झालेला गैरसमज दूर केला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना कामाचे श्रेय देत एकमेकांकडून कौतुक करुन घेतले. पण हा वाद भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे झाल्याची बाबही समोर आली आहे. सानप यांनी भाजपच्या मेळाव्यात उड्डाणपुलाचे काम भाजपने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच झाले असे म्हटले. त्यानंतर शिवसेनेने व्हॉट्सअॅप व मेलचे ई-बाण सोडून माध्यमांना माहिती पुरवली व दोन्ही पक्षांत नंतर जुंपली.

आमदार फरांदे यांनी इंदिरानगर अंडरपासबाबत पाठपुरावा केला, तर उड्डाणपुलाचा प्रश्न खासदार हेमंत गोडसे यांनी सोडवला. त्यामुळे या कामांचे श्रेय दोघांना असल्याचे या नेत्यांनी कबूल केले. पण वादाची ठिणगी पडली ती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे. ही गोष्ट नंतर दोन्ही नेत्यांच्या लक्षात आली व त्यांनी आमने-सामने होणारा हा सामना गडकरी येण्याअगोदरच संपवला. केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या ५ रोजी या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. त्यांच्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुध्दा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर हा युतीमधील वाद रंगला तर सर्वांचीच पंचाइत होईल, यासाठी हे पॅच-अप करण्यात आले आहे. शिवसेनेने या श्रेयवादावर आक्रमक पवित्रा घेतला व त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनीसुध्दा दोन वर्षे केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. पण एकमेकांचे काम दोघांना मान्य असूनही वाद का झाला, यामुळे नंतर दोन्ही नेते चक्रावले. त्यामुळे गुरुवारी फोनाफोनी झाली व गैरसमज दूर झाला.


खासदार हेमंत गोडसे यांनी उड्डाणपुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला, तर मी इंदिरानगर अंडरपास व इतर कामांसाठी केला होता. या दोन्ही कामांमुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.

-देवयानी फरांदे, आमदार, भाजप


उड्डाणपुलाच्या संदर्भात आमदार देवयानी फरांदे यांचा फोन आला. त्यांनी अंडरपाससाठी मी प्रयत्न केले व उड्डाणपुलाच्या कामासाठी तुम्हीच पाठपुरावा केल्याचे सांगितले. त्यामुळे गैरसमज दूर झाला.

-हेमंत गोडसे, खासदार, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमजीरोडवर वाहतुकीचे तीनतेरा

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

स्मार्ट नाशिकमध्ये सध्या वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अपडेट होत असलेल्या नाशिक शहरात अनेक व्यवसाय देखील कमालीचे वाढत आहेत. मात्र, वाढते व्यवसाय आणि त्यामुळे साहजिकच वाढत ग्राहक यामुळे नाशिककरांना वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील एम.जी. रोड, वकिलवाडी तसेच गोळे कॉलनी परिसरात वाहन धारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मेहेर सिग्नलपासून मेनरोडपर्यंत अनेक लहानमोठ्या दुकानांची गर्दी झाली आहे. इथे असलेल्या अनेक व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने वाहनधारक रस्त्यावर वाहने पार्क करत आहेत. रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांसोबत फळविक्रेते, लहान वस्तूंचे गाडे, खाद्य पदार्थ विक्रेते यांचीही दाटी बघायला मिळत आहे. सोबतच आजूबाजूला असणाऱ्या दुकानांचे माल घेऊन येणारे टेम्पो देखील वाहतुकीस अडथळा ठरत आहे. यामुळे वाहनधारकांसमवेत पादचाऱ्यांनाही या दाटीमधून रास्ता शोधावा लागत असल्याचं नाशिककर सांगतात. वकिलवाडीतील हॉटेल्स, प्रिंटिंग, मोबाइलची दुकाने व कॉम्प्लेक्स यांना पुरेशी पार्किंची सुविधा नाही. यामुळे याही भागात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अस्ताव्यस्थ पद्धतीने वाहनांची गर्दी या दोन्ही भागात होत असल्याने वाहन चालवणे अवघड झाले आहे.

भूम‌िगत पार्किंगची दैना

मेहेर सिग्नल जवळ असलेल्या जिल्हा परिषदेशच्या ग्राऊंडला लागून व्यवसायिकांचे कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सच्या खाली भूमिगत पार्किंगची सुविधा आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून ही पार्किंग दयनीय अवस्थेत आहे. या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा तसेच सांडपाणी साचले आहे. ही पार्किंग पालिकेने सुधारित करून सुरू करावी, अशी मागणी नाशिककर करत आहेत.


टोइंग का म्हणून?
एमजी रोड, गोळे कॉलनी तसेच वकिलवाडी परिसरात पार्किंगची सुविधा नसल्याने वाहने रस्त्यावर पार्क केली जात आहेत. यावेळी ट्रॅफिक पोलिसांकडून बेकायदेशीर पार्किंग अंतर्गत ही वाहने टोइंग केली जातात. मात्र, मुळात पार्किंगची सुविधांच नसल्याने नाईलाजाने वाहनधारकांना वाहने रस्त्यावर लावावी लागत आहेत. मग वाहन टोइंग का म्हणून असा सवाल नाशिककर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या प्रवासात प्रवाशांचे ‘दिवाळे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दिवाळी सणाच्या निमित्ताने गावी आलेले नोकरदार, व्यावसायीक पुन्हा मुंबई, पुण्याकडे निघाले आहेत. मात्र शहर आणि तालुक्यातून मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्याकडे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याकडे अनेकांचा कल असतो. गेल्या दोन ते तीन दिवसात या खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दरात २०० ते ५०० रुपये वाढ झाल्याने दिवाळीनंतर प्रवाशांचे दिवाळे निघत आहे.

दिवाळी सणाच्या सुट्टी निमित्ताने शहर व तालुक्यातून मुंबई, पुणे, नाशिक ठाणे येथे व्यवसाय, उद्योग, शिक्षण, नोकरी निमित्ताने स्थलांतरित झालेली अनेक जण गावाकडे येतात. आता सुट्ट्या संपत आल्याने गावाकडे आलेल्यांना परतीचे वेध लागले आहेत. मालेगाव शहरातून रेल्वेने प्रवास करण्यासाठी मनमाड गाठावे लागते. त्यापेक्षा शहरातून उपलब्ध असलेल्या ट्रॅव्हल बससेवेलाच अनेकांची पसंती असते. थोडे चार पैसे जास्त गेले तरी आरामदायी प्रवास होतो. या उद्देशाने बहुतांशी मुंबई, पुणेच्या दिशेने परतणारे प्रवाशी लग्झरी ने प्रवास करतात. यंदा देखील परतीच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मालेगाव ते मुंबई, पुणे अशी सेवा देणाऱ्या सर्वच ट्रॅव्हल्सचे भाडे चांगलेच वाढले आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने गाड्यादेखील वाढवण्यात आल्या आहेत.

परतीच्या प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी प्रवासी दोन तीन दिवस आधीच सीट आरक्षित करतात. मात्र तिकीट दरात २०० ते ५०० रुपये वाढ झाल्याने दिवाळीनंतर प्रवाशांचे दिवाळे निघत आहे. मालेगाव ते मुंबई एसटीचे भाडे किमान ३६० ते कमाल ५०० इतका आहे. मात्र या तुलनेत खासगी बससेवेचे दर कमालीचे वाढले आहे. मालेगाव ते मुंबईसाठी प्रवाशांना किमान ६०० ते कमाल एक हजार ५०० इतके जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. यातही एसी, स्लीपर, वायफाय यासारख्या अत्याधुनिक सुविधांच्या नावाने प्रवाशांना या दराने तिकीट घेणे भाग पडत आहे. अर्थात परतीच्या प्रवासात एसटीमध्ये देखील गर्दी असल्याने अनेकांनी हा महागडा प्रवास करणेदेखील पसंत केले आहे. रेड बस सारख्या ऑनलाइन बुकिंग साईटवरून तत्काळ तिकीट मिळत असल्याने चार पैसे गेले चालतील पण प्रवासात हाल नको व्हायला, असे म्हणून प्रवासी दिवाळी नंतरचा महागडा प्रवास करीत आहेत. मात्र यामुळे ट्रॅव्हल कंपनी दिवाळी साजरी करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images