Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

थत्तेंनी अजिंठ्याला ओळख दिली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अजिंठा लेण्यांची देशासह जगाला खरी ओळख करून देण्यामध्ये विख्यात शिल्पकार स्व. राम थत्ते यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे आदरार्थी उद्गार जळगाव येथील विख्यात उद्योजक अशोक जैन यांनी काढले.
‘अजंठा’ या शिल्पकार राम थत्ते लिखीत पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्ती प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अॅण्ड मॅनेजमेंट येथे हा कार्यक्रम पार पडला.
अजिंठ्यासारख्या अव्द‌ितीय कलाकृतींवर दुर्मिळ संदर्भ जागतिक मान्यता असणाऱ्या इंग्रजी भाषेत प्रकाशिक करण्याचे हे निमित्त चांगल्या कार्यास हातभार लावत आहे, असेही जैन यावेळी म्हणाले. ते म्हणाले, अजिंठ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वाकोद या गावी विख्यात उद्योजक स्व. भंवरलाल जैन यांचा जन्म झाला. त्यामुळे अजिंठ्याशी जैन परिवार व उद्योग समूहाचे नाते अतूट आहे. अजिंठा लेण्यांचे अभ्यासक व भाष्यकार शिल्पकार स्व. राम अनंत थत्ते यांच्यासोबतचे नातेही बरेच जुने आहे. इंग्रजी भाषेतील या पुस्तकामुळे अजिंठ्याची महती पाश्चात्य अन् चिकीत्सक पर्यटकांपर्यंत सक्षमपणे पोहचेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित वास्तुविशारद अरुण काबरे म्हणाले, राम थत्ते व अजिंठ्याची चित्रे ही समरस झाली आहेत. त्याची प्रच‌िती मी अनेकवेळा घेतली आहे. नाशिकच्या सौंदर्यातही त्यांनी मोलाची भर घातली असून त्यांनी निर्माण केलेले बाबुभाई राठी चौकातील हाताचे शिल्प, कालिदास कलामंदिरावरील कालिदास, धामणकर कॉर्नर तसेच त्र्यंबक रोड ते जव्हार फाट्यापर्यंत अनेक रेखीव शिल्पे याची आजही साक्ष देतात असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना छायाचित्रकार प्रसाद पवार म्हणाले, तत्त्वज्ञान , कला, अलंकार, जीवनशैली यांचा दोन हजार वर्षे जुना संवाद अजिंठाच्या मार्फत होतो. कलेला राजाश्रय असला की कला लोकांपर्यंत पोहचते याची प्रचिती आज येते. अजिंठ्याची सध्या मोठ्या प्रमाणात झीज आली आहे. जुन्या काळातील जवळपास ६४ टक्के भाग आज बघता येत नाही. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याकरता प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रख्यात आहारतज्ज्ञ व राम थत्ते यांची नात अवंती दामले यांनी मनोगत मांडले. त्या म्हणाल्या, ‘एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन ती जिद्दीने पुढे कशी न्यायची याची शिकवण राम थत्ते यांनी दिली आहे. ती निश्चितच लक्षात राहील.’ आभार प्रदर्शन अभिजित थत्ते यांनी केले. तर सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटेवर मंगलयानाच्या चित्रामुळे अंतराळप्रेमी आनंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन हजार रुपयांच्या नवीन नोटेबद्दल सर्वांमध्येच मोठे आकर्षण असताना अंतराळप्रेमींनादेखील या नोटेनी आकर्षित केले आहे. या नोटेवर असलेले मंगळयानाचे चित्र हे त्यांच्यासाठी आकर्षणाचे ठरले असून अंतराळक्षेत्राला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही चांगली सुरुवात असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहे. अंतराळ क्षेत्राविषयी जनसामान्यांमध्ये प्रबोधन करण्यासाठी मोलाचे पाऊल ठरणार असल्याची भूमिका त्यांनी यानिमित्ताने मांडली आहे.

चलनातून पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा गेल्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. या निर्णयानंतर चांगले-वाईट पडसाद, प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद, व्यवहारात अडचणींनादेखील सामोरे जावे लागले. तर अनेकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. नवीन नोटा केव्हा हातात येतात, अशी भावनाही उत्सुकतेपोटी अनेकांची निर्माण झाली होती. त्यातच पाचशे रुपयांपेक्षा दोन हजार रुपयांच्या नोटेबद्दल असणारे आकर्षण मोठे होते. या नोटेचा रंग, आकार, त्यावरील भाषा, स्वच्छ भारताविषयी केलेले आवाहन हे सर्वच आकर्षणाचे व चर्चेचे विषय ठरले. यामध्ये नोटेच्या मागील बाजूस असलेले मंगळयानाचे चित्र हादेखील मोठा आकर्षणाचा विषय ठरला आहे. अंतराळक्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय असल्याच्या प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त केल्या जात आहेत.



नोटेवर दिलेले मंगळयानाचे चित्र ही अतिशय चांगली संकल्पना आहे. शहरांपासून ग्रामीण भागातील सुशिक्षित, अशिक्षित व्यक्ती ज्यांच्या हातात ही नोट जाईल. त्या सर्वांनाच अंतराळ क्षेत्रातील आपल्या देशाच्या प्रगतीची माहिती मिळू शकेल.

- अविनाश शिरोडे, अध्यक्ष, नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) इंडिया, नाशिक चॅप्टर

पैसे हे दैनंदिन वापरात येत असल्याने त्यावरील मंगळयानाचे चित्र अंतराळ क्षेत्राविषयी प्रबोधन करण्यासाठी मोलाचे ठरणार आहे. तंत्रज्ञ, संशोधक, तसेच प्रत्येक भारतीयासाठी ही गौरवाची बाब आहे. अंतराळ क्षेत्राविषयी जनसामान्यांमध्ये आत्मविश्वास रुजविण्यासाठीही हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

- डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, शास्त्रज्ञ

नोटेवरील मागील बाजूस असलेले मंगळयानाचे चित्राने आमच्यासारख्या अंतराळप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंतराळक्षेत्राला याद्वारे प्रोत्साहन मिळणार असून सामान्यांपर्यंत हे क्षेत्र पोहोचत असल्याची सकारात्मक बाब याद्वारे दिसून येत आहे.

- अपूर्वा जाखडी, नासा, स्पेस एज्युकेटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल भरा पाचशे, हजारचेच!

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

मंगळवारी रात्री पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाला आणि लोकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली. शहरातील सगळ्याच पेट्रोलपंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. पेट्रोल भरण्यासाठी रांगाच रांगा लागल्या. मात्र, पेट्रोलपंपचालकांनी सध्या नवा फंडा वापरायला सुरुवात केली आहे. पेट्रोल भरायचे असेल तर पाचशे रुपयांचेच भरा, नाही तर भरूच नका असा पवित्रा पेट्रोलपंपचालकांनी घेतला असून, यात सामान्य नागरिक भरडले जात आहेत.

पाचशे आणि हजारच्या नोटा रुग्णालय, पेट्रोलपंप यांसारख्या ठिकाणी वापरण्यास १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देऊनही पेट्रोलपंपावर पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यास साफ नकार दिला जात आहे. पेट्रोल घ्यायचे तर पाचशेचेच घ्या; अन्यथा घेऊ नका, अशा पेट्रोलपंपचालकांच्या पवित्र्यामुळे सामान्य नागरिक वेठीस धरले जात असून, मजूर, कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

१०० च्या नोटा गायब?

अनेक पेट्रोलपंपचालक मुद्दाम ही परिस्थिती निर्माण करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शंभराच्या नोटा पंपचालक कामगारांकडून काढून घेऊन मुद्दाम शंभराच्या नोटांचा तुटवडा निर्माण केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाचशेच्या बदल्यात शंभराच्या नोटा कमिशन घेऊन देण्याचे प्रकारही सुरू असून, नेमक्या १००, ५० च्या नोटा जातात कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शंभराच्या नोटा जमा करा

पेट्रोल विक्रीदरम्यान जमा होणाऱ्या शंभराच्या नोटा ग्राहकांना देण्याऐवजी लगेचच कार्यालयात जमा करा, असे फर्मानच काही पेट्रोलपंप मालकांनी कर्मचाऱ्यांना सोडल्याने नोटांच्या तुटवड्यात भरच पडते आहे. बाजारपेठेत शंभराच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, बँका आणि एटीएम सेंटर्सवर नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल खटल्याचा पहिला टप्पा पूर्ण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळाप्रकरणी धुळे विशेष न्यायालयात साक्षीपुरावे नोंदवून घेण्याचे काम सोमवारी पूर्ण झाले. यामुळे या खटल्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याचे मानले जात असून, पुढील कामकाज २१ नोव्हेंबरला होणार आहे.

धुळे जिल्हा विशेष न्यायालयात घरकुलचा खटला वर्ग झाल्यानंतर पावणेदोन वर्षात या खटल्याशी संबंधित ५० जणांची साक्ष सरकार पक्षाकडून नोंदविण्यात आली. काही महत्त्वाची कागदपत्रे पुरावे म्हणून सादर करण्यात आली. या साक्षी व कागदपत्रांद्वारे संशयित आरोपींबाबत प्रश्न काढून पुढील कामकाज केले जाणार आहे.

या खटल्यात ५७ संशयित आरोपी आहेत. त्यापैकी पाच मृत झाले आहेत. इतर ५१ आरोपींविरूध्द खटला चालविण्यात येत आहे. फिर्यादी डॉ. प्रवीण गेडाम, तपासी अधिकारी अपर पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्यासह शासकीय अधिकारी, नगरपालिका व जळगांव जिल्हा मध्यवती बँकेचे अधिकारी आदी ५० जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी सात साक्षीदारांची फेरसाक्ष सरकार पक्षाच्या विनंतीनुसार नोंदविण्यात आली आहे. या खटल्यातील साक्षीपुरावा नोंदविण्याचे कामकाज सोमवारी पूर्ण झाले. आता पुढील कामकाज २१ नोव्हेंबरपासून होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रथोत्सवाने दुमदुमला आसमंत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शतकांची परंपरा असलेला त्र्यंबकनगरीचा रथोत्सव उत्साहात झाला. दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दीडशे वर्षांपूर्वीच्या भव्य रथातून कुशावर्तावर प्रस्थान करते झाले तेव्हा शंखनादात अवघे अासमंत दुमदुमले. या उत्सवात शहरातील सर्वस्तरातील नागरिक सहभागी झाले होते. भाविकांची संख्या लक्षणीय होती.

कार्तिक पौर्णिमेच्या निम‌ित्ताने होत असलेल्या रथोत्सवात भगवान त्र्यंबकराजाचा सुवर्ण मुकुट सुमारे दीडशे वर्षापूर्वीच्या ३१ फूट उंच सुशोभीत शिसवी लाकडापासून बांधलेल्या रथातून तीर्थराज कुशावर्ताकडे निघाला तेव्हा भाविकांनी एकच जयघोष केला. मंगलवाद्यांच्या गजरात शंख तुतारीच्या निनादात अग्रभागी त्र्यंबकराजाची पालखी होती. पालखीमध्ये चांदीचा मुखवटा ठेवलेला होता. रथास माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, प्रगतशील शेतकरी विष्णू गाजरे तसेच शिखरे यांच्यासह चार बौलजोड्या जुंपलेल्या होत्या. रथ मार्गावर नागरिकांनी फुलांचे गालीचे तयार केले होते. तर रथावर इमारतींच्या सज्जातून पुष्पवृष्टी केली जात होती. कुशावर्तावर विधीवत पूजा झाली. हजारो पणत्यांनी कुशावर्त उजळले होते. सायंकाळी सहावाजेच्या सुमारास रथ पुन्हा मंदिराकडे प्रस्थान करता झाला तेव्हा विद्युत रोषणाईने झगमगणारा रथ विलोभनीय दिसत होता. रथाच्या सोबत विश्वस्त कैलास घुले, अॅड. श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर, ललिता शिंदे आदींसह विश्वस्त सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे भाजपचे शहर अध्यक्ष शामराव गांगपुत्र, माजी ज‌ि. प. उपाध्यक्ष संपतराव सकाळे आदी मान्यवर सहभागी झाले होते. देवस्थान संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजभाऊ जोशी, प्रशासन अधिकारी समीर वैद्य, सहायक अधिकारी यादव भांगरे आणि कर्मचारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थ‌िती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामदेवीच्या मिरवणुकीत रमले भक्तगण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

कार्तिक पौर्णिमेस ग्रामदेवता महादेवीस सवाद्य मिरवणुकीने नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. गावावरील अरिष्ट टळावे म्हणून सुमारे साडेतीनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून ही प्रथा सुरू आहे. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तीर्थराज कुशावर्त येथून बळीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कुशावर्त तिर्थावर विधीवत पूजाविधी करून ग्रामस्थांनी जमा केलेला सुमारे सव्वाशे किलो तांदुळ शिजवण्यात आल. बह्मवृंदांच्या मंत्रघोषात हा नैवेद्य बैलगाडीत ठेऊन मंगलवाद्यांच्या गजरात शहराच्या उत्तरेस असलेल्या ग्रामदेवता महादेवीस अपर्ण करण्यात आला. याप्रसंगी बळीच्या प्रतिकात्मक म्हणून कोहळा हे फळ कापण्यात आले. येथील पेंडोळे कुटूंबीय हा बळी प्रदान करतात. पुरोहित किरण नरेंद्र पेंडोळे आणि बंधू यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा तांदूळ शिजवून अर्पण केला. वतनदार पुरोहित देशमुख, महाजन यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी गंगापुत्र मशाल घेऊन उभे असतात. पुर्वपरंपरेप्रमाणे रेड्याने हा गाडा ओढला जायचा. मात्र काही वर्षांपासून रेड्यांची संख्या कमी झाली आहे. म्हणून बैलगाडीने हा गाडा ओढला गेला. त्र्यंबक काणकाटे यांची बैलगाडी यासाठी जुंपण्यात आली होती. नंदकुमार मोरे यांचे मंगलवाद्य पथक होते. मंत्रघोष करणारे पुरोहित त्याचप्रमाणे महादेवीचे पूजक गाजरे बंधू, विश्वस्त मंडळ आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थ‌ित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिर्याद देईपर्यंत भांडण थांबेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका परिसरातील टॅक्सी स्टँडवर झालेल्या भांडणानंतर फिर्याद देण्यासाठी आलेल्या सात ते आठ जणांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये वाद सुरू केला. शिवीगाळ सुरू झाल्यानंतर पोलिसांनी संबंधितांविरोधातच गुन्हा दाखल केला.

शरीफ शेख फरीद (वय ४२, भद्रकाली), अश्पाक सय्यद अब्बास (३०, वडाळागाव), रईस शरीफ शेख (२८, दीपालीनगर,) जुबेर कादर शेख (३९), अजीन इस्माईल शेख (२८, पठाणपुरा), शरफी इस्माईल शेख (३९) व अन्य एक व्यक्ती अशी संशयितांची नावे आहेत. या व्यक्तींमध्ये रविवारी दुपारी द्वारका टॅक्सी स्टँड येथे काही कारणास्तव वाद झाला. त्यानंतर तक्रार देण्यासाठी सर्व जण मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. मात्र, तिथेही एकमेकांमध्ये त्यांनी शिवीगाळ करीत दमदाट्या केल्या. पोलिसांसमोर आणि पोलिस स्टेशनच्या आवारात सुरू असलेल्या या गोंधळाची वरिष्ठांनी तत्काळ दखल घेत संबंधितांविरोधात कलम २९८ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिस हवालदार एस. पी. क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार युनूस शेख तपास करीत आहेत.

खात्यातील २९ हजारांवर डल्ला

इंटरनेट बँकिंगचा वापर करीत बँक खात्यातील तब्बल २९ हजार रुपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणी जेल रोड परिसरातील मंगलमूर्तीनगर येथील रजनिगंधा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नीलेश विलास चौधरी यांनी तक्रार दिली आहे. चौधरींचे अॅक्सिस बँकेत खाते असून, बँकेच्या खात्यात २९ हजार रुपयांची रक्कम होती. मात्र, सायबर चोरट्यांनी चौधरी यांच्याकडील ओटीपी कोडचा इंटरनेटच्या माध्यमातून वापर करीत ही रक्कम परस्पर दुसऱ्या व्यवहारांसाठी खर्च केली. ही बाब १२ नोव्हेंबर रोजी चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत तपास करीत आहेत.

दुचाकीची चोरी

शताब्दी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी वाहनचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या चोरीबाबत गंजमाळ येथील भीमवाडी परिसरात राहणाऱ्या इम्रान बच्चू पठाण यांनी तक्रार दिली आहे. वाहनचोरीची घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. एएसआय आवारे तपास करीत आहेत.

विहिरीत तरुणीचा मृतदेह

विंचूरदळवी येथील दोनवाडे परिसरातील विहिरीत १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. या तरुणीने आत्महत्या केली, की तिचा घातपात झाला, याची चौकशी पोलिस करीत आहेत. या प्र्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कल्पना सखाराम रोहिमल (१९, दोनवाडे, पो. विंचूर दळवी, ता. नाशिक) असे मृत तरुणीचे नाव आहे. धोंडीराम कांगणे यांच्या विहिरीत रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कल्पनाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पीएसआय अनवणे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोर्तुगाल विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू

$
0
0

सपकाळ नॉलेज हबमध्ये सुविधा; स्कॉलरशीपही देणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगाच्या सोबत स्पर्धा करणारे शिक्षण देण्याच्या उद्देशाने सपकाळ नॉलेज हब व सीईएसपीयू या पोर्तुगाल विद्यापीठासोबत काही महिन्यांपूर्वी झालेल्या करारानुसार त्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम नाशिकमध्ये सुरू झाला आहे. काही महिन्यांपूर्वी या संदर्भात घोषणा करण्यात आली होती. फार्मसी विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक पालक बैठकीत नुकतीच ही माहिती देण्यात आली.

कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे पालक शिक्षक मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी फार्मसी विद्या शाखेच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्ष बी. फार्मसीचे विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. मेळाव्यासाठी पालक व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या व त्यातून पाल्याचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याबाबत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. अविनाश दरेकर यांनी पालकांना कॉलेजतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

प्राचार्य डॉ. आर. बी. सौदागर यांनी कॉलेजमध्ये होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेची नियमावली व फार्मसी क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन केले. पालक प्रतिनिधी या नात्याने डॉ. आदिनाथ मोरे यांनी आपल्या भाषणात संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा बद्दल आभार मानले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. रवींद्र सपकाळ यांनी ट्रस्ट मार्फत हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना २१ हजार रुपये व शिष्यवृत्ती, ब्लू क्रॉस लॅब, मुंबई, गीता इस्त्राणी स्कॉलरशीपमार्फत पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास उपाध्यक्ष कल्याणी सपकाळ, कॅम्पस प्रमुख प्रा. ए. के. मन्सुरी, प्रा. डॉ. एस.बी. धांडे, प्रा. डॉ. व्ही. जे. गोंड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्कर्षा कोशिरे यांनी केले तर प्रा. एस. बी. गोंदकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डी. जी. उमाळकर, डॉ. आर. एस. बच्छाव, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालदिनानिमित्त पोलिस ठाण्याला भेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

माजी पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड परिसरात बालदिन सोमवारी (दि. १४) उत्साहात साजरा झाला. उपनगर पोलिस ठाण्याला शाळेच्या मुलांनी भेट देऊन माहिती घेतली.

उपनगर पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, युवराज बोरसे व सहकाऱ्यांच्या मदतीने उपेक्षित मुलांना मिठाई वाटप केले. पोलिस ठाण्याचे कामकाज कसे चालते याची उत्सुकता बालकांना असते. त्यासाठी सेंट फिलिमेना, सेंट झेवियर्स, बार्न्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपनगर पोलिस ठाण्याला भेट दिली. पोलिसकाका कसा तपास करतात, त्यांची दैनंदिनी व कामकाजाची माहिती घेतली. या वेळी पोलिस निरीक्षक अशोक भगत, युवराज बोरसे, उपनिरीक्षक इंगळे, पाटील, पवार आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

राजगर्जनाचा उपक्रम

जेलरोड येथील राजगर्जना सामाजिक संघटनेतर्फे परिसरातील बाळ गोपाळांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. जेलरोडला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चॉकलेट, बिस्किट,पेन व पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी नितीन धानापुणे, सागर दाणी, गुड्डू शेख, संदीप आंबेकर उपस्थित होते.

वस्तुसंग्रहालयाची सफर

सिन्नर फाटा : विद्यार्थ्यांना भारतीय संरक्षणदलांबाबत माहिती व्हावी या उद्देशाने या संवर्धन बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्यावतीने शहरातील सुमारे ४५० विद्यार्थ्यांना आर्टिलरी सेंटर येथील तोफखाना वस्तुसंग्रहालयाची सफर घडवून आणली. या बालमहोत्सवात चेहेडी, पंपिंग, सिन्नर फाटा, चाडेगाव, गोरेवाडी, सामनगाव, अराठा कॉलनी, भोर मळा या भागातील ४५० विद्यार्थ्यांनी सहभागी होत तोफखाना वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. यावेळी या विद्यार्थ्यांनी सैन्यदलातील विविध युद्धसाहित्य, रणगाडे, विमाने, हेलिकॉप्टर्स, चित्रप्रदर्शन व युद्धाच्या प्रसंगावर आधारित ३० मिनिटांचा लघुपटाचा आनंद लुटला.

विभागीय आयुक्तालय

सिन्नर फाटा : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस बालदिनी येथील विभागीय आयुक्तालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी, तहसीलदार विजय सोनार, सुभाष गायकर आदींसह इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

इंदिरा गांधी विद्यालय

सातपूर : शिवाजीनगरच्या इंदिरा गांधी विद्यालयात पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्ताने बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अरूण नवले यांनी बालदिनाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.

बालकांची धमाल

नाशिक : डी फोर डान्स अकॅडमी आणि सेंट्रल मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिन साजरा करण्यात आला. नाशिक येथील पिनॅकल मॉलमध्ये बालदिनानिमित्त विविध गेम्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. केक कापून बालदिनाला सुरुवात करण्यात आली. डीजेवर लहानग्यांनी मनसोक्त डान्सचा आनंद घेतला. डी फोर अकॅडमी, पोद्दार स्कूल, पेठे शाळा आणि इसपोनियल या शाळेच्या मुलांनी सहभाग घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीची सुटी संपली; आजपासून शाळा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फराळ, फटाके, सहली, दिवाळीच्या सुट्यांची अशी धमाल लुटल्यानंतर आजपासून (दि.१५) माध्यमिकच्या शाळा उघडणार आहेत. दिवाळीच्या सुट्यांमध्ये मुक्या झालेल्या शाळेच्या भिंती त्यामुळे आता पुन्हा खुलणार आहे. मागील आठवड्यात प्राथमिक शाळा उघडल्या असून त्यापाठोपाठ आता माध्यमिक शाळा दिवाळीची सुटीनंतर आजपासून सुरू होणार आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर नवीन अभ्यासक्रम, नवे शिक्षक यामध्ये जुळवून घेईपर्यंतच विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा दिवाळीदरम्यान येऊन ठेपते. विद्यार्थ्यांच्या या व्यग्र शेड्युलमध्ये आराम मिळण्यास व पुन्हा वार्षिक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी दिवाळीची सुटी मोलाची ठरते. २०१६-१७ हे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या विविध प्रश्नांमुळे सुट्या देण्यास आल्या होत्या. त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्येही यंदा घट करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्यानंतर १६ नोव्हेंबरला शाळा उघडणार, असे माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र, द्वितीय सत्र १७ नोव्हेंबर ते १ मे २०१७ असे असल्याचे विभागाला कळविण्यात आल्यानंतर एक दिवसाची सुटी रद्द करुन १५ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नेट’च्या अर्जांसाठी उद्या अंतिम मुदत

$
0
0

२२ जानेवारीला होणार परीक्षा; नाशिकमध्ये परीक्षा केंद्राची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय स्तरावर अधिव्याख्याता पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी नेट (नॅशनल इलीजिबीलीटी टेस्ट) या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास बुधवार (दि. १६) अंतिम मुदत देण्यात आली आहे. ही परीक्षा २२ जानेवारी २०१७ रोजी घेण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून यूजीसीने या परीक्षेच्या समन्वयाचे काम सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ) कडे दिले आहे. सीबीएसईच्या वेबसाईटवर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी http://www.cbsenet.nic.in या वेबसाईटवर लॉगइन करावे.

या परीक्षेसाठी जनरल गटातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये , ओबीसी गटासाठी ३०० रुपये तर एससी, एसटी गटासाठी १५० रुपये फी आकारण्यात येईल. ऑनलाइन माध्यमातून हे चलन स्वीकारण्यासोबतच राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरण्यात येणार आहे.



उत्तर महाराष्ट्रात जळगाव एकमेव केंद्र

नेट (नॅशनल इलीजिबीलीटी टेस्ट) ही परीक्षा राज्यात ८ केंद्रांवर पार पडेल. यात नाशिकचा समावेश नाही. राज्यात केवळ अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, सोलापूर, पुणे या शहरांमधील केंद्रांवर परीक्षा पार पडेल. उत्तर महाराष्ट्रासाठी जळगाव हे एकमेव परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. प्रत्यक्षात नाशिक व जळगाव यातील अंतरही मोठे आहे व या परीक्षार्थींची नाशिकमधील संख्याही लक्षणीय आहे. याशिवाय नाशिक हे उत्तर महाराष्ट्रास मध्यवर्ती ठिकाण पडते. यादृष्टीने उत्तर महाराष्ट्रातून या परीक्षेसाठी युजीसी व सीबीएसईने आणखी एक परीक्षा केंद्र द्यावे, अशा जुन्या मागणीने या निमित्ताने पुन्हा डोके वर काढले आहे.

या आहेत महत्त्वाच्या तारखा

नेटचा अर्ज भरण्यास सीबीएसईने सुमारे महिनाभराचा अवधी उमेदवारांना दिला होता. ती मुदत बुधवारी संपणार आहे. उमेदवारांना २१ डिसेंबरला अ‍ॅडमिट कार्ड ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे. तर २२ जानेवारी २०१७ रोजी ही परीक्षा पार पडेल. यानंतर मार्च २०१७ मध्ये उत्तरपत्रिका आणि ओएमआरशीट जाहीर करण्यात येईल. तर या परीक्षेचा निकाल मे २०१७ मध्ये प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्या पैशांअभावी मधुर फळे झाली कडू...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सरकारने ५०० व १००० रुपये मूल्याच्या नोटा भारतीय चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असले, तरी सामान्य नागरिक व व्यावसायिक मात्र या निर्णयामुळे काकुळतीला आले आहेत. शहरातील फळ बाजारातील किरकोळ विक्री या निर्णयानंतर जवळपास ठप्प पडल्याने मोठ्या प्रमाणात फळे खराब होऊन फळविक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सुट्या पैशांअभावी मधुर फळांची चवही कडू झाली आहे.

सरकारने भारतीय चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद केल्यापासून सामान्य नागरिकांकडे सुट्या पैशांची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम फळांच्या खरेदी व विक्रीवरही झाला आहे. बुधवारपासून शहरातील फळविक्रेत्यांकडील किरकोळ विक्रीला पूर्णतः ब्रेक लागला आहे. त्यामुळे फळविक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हीच परिस्थिती अजून दोन ते तीन दिवस राहिली, तर फळविक्रेत्यांकडील सर्व फळे खराब झाल्याने फेकून द्यावी लागणार आहेत.

विक्रीअभावी फळे खराब

फळ बाजारात काही दिवसांपासून फळांची किरकोळ विक्री संपूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे नाशवंत फळे सडली आहेत. अनेक विक्रेत्यांवर सडलेली फळे फेकून देण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय काही फळे सुकू लागली आहेत. पपई, सीताफळ, अननस, आयात द्राक्षे, संत्रा, आलूबुखार, केळी यांसारखी फळे सडल्याने असंख्य विक्रेत्यांनी ती फेकण्यास सुरुवात केली आहे.

उधारीने विक्री

काही ठिकाणी ओळखीमुळे उधारीवर फळांची विक्री केली जात आहे. नेहमीप्रमाणे सकाळी फळांच्या खरेदीला बाजारात होणारी गर्दी काही दिवसांपासून दिसून येत नाही. त्यामुळे फळविक्रेते हातावर हात ठेवून ग्राहकांची प्रतीक्षा करीत आहेत. सुट्या पैशांच्या टंचाईमुळे सामान्य नागरिकांना फळांची मधुर चव चाखणे अवघड झाले आहे.त्यामुळे एरवी फळांची मधुर असलेली चव आता कडवट झाली आहे.

काही दिवसांपासून फळांची किरकोळ विक्री बंदच आहे. आयात केलेली महागडी फळे सुकली आहेत. पपई, सीताफळ, खरबूज, सफरचंद, केळी, संत्रा यांसारखी फळे फेकण्याची वेळ आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

-लियाकत सय्यद, फळविक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा, धान्य लिलाव आजपासून बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

बाजार समितीत कांदा, धान्य विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यासाठी व्यापाऱ्यांकडे पुरेसे चलन नसल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा आणि धान्य लिलाव मंगळवारपासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने कळविले आहे.

लासलगाव बाजार समितीसोबतच विंचुर उपबाजार अवरताही कांदा, धान्य लिलाव होणार नसल्याने लासलगाव व्यापारी असोसिएशनने बाजार समितीला पत्र दिले आहे. बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू राहणार असल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांकडे लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना नियमानुसार रोख स्वरूपात देण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. नाशवंत प‌िकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. लासलगाव बाजार समिती बंद राहिल्याने कांदा विक्री करता येईना आणि दुसरीकडे हा कांदा साठवला तर खराब होण्याची भीती असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादुई काठीच्या स्पर्शानेच गारद होतील गुन्हेगार

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com

Twitter : @jitendra.tartemt

काळासोबत अद्ययावत होत जाणाऱ्या गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलिसांनांही तितकेच अद्ययावत व्हावे लागणार, ही गरज लक्षात घेत संदीप फाऊंडेशन इन्स्ट‌िट्यूट आणि रिसर्च सेंटरच्या एका विद्यार्थ्याने जादूई काठी अर्थात, मल्टी फंक्शनल स्ट‌िक विकसित केली आहे. या स्ट‌िकमध्ये समाविष्ट विशेष पाच वैशिष्ठांच्या आधारावर गुन्हेगाराला घटनास्थळी कोंडीत पकडण्यासोबतच काही क्षणांसाठी बेशुद्ध करण्याची क्षमताही, या जादुई काठीमध्ये दडली आहे.

येथील संदीप फाऊंडेशन या शिक्षण संस्थेत हा चेतन नंदाणे हा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन (इ अँड टीसी) या शाखेत तृतीय वर्षात पॉल‌िटेक्नीक अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे. अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट तयार करावे लागतात. या प्रोजेक्टपासून प्रेरणा घेत चेतन याने वैयक्तिक स्तरावर मल्टी फंक्शनल स्टीकचा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पास कॉलेजनेही वेळोवेळी गरजेनुसार मदत व मार्गदर्शन केले.

काय आहे मल्टी

फंक्शनल स्ट‌िक?

एक पाच मेगापिक्सेल कॅमेरा, एक व्हॉईस रेकॉर्डर, पाच एलईडी (लाईट इमिटींग डायोड), एक मेटल डिटेक्टर आणि एक जीपीएस ट्रॅकर (ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम) आणि त्या सोबत १२ व्होल्ट क्षमतेच्या लो इंटेनसिटी शॉक देण्याची क्षमता या स्टीकमध्ये असल्याची माहिती चेतन याच्या मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. गायत्री फडे यांनी दिली.

तीन तासांच्या बॅटरी बॅकअपसह यातील एलईडीची पोहोच ४५ अंश कोनात व २० ते ४० मीटर दूरपर्यंत असणार आहे. तर यातील कॅमेरा आणि व्हॉईस रेकॉर्डरमुळे घटनस्थळाहून संशयिताविरोधात पुरावे जमा करण्यास पोलिसांना मदतच होईल, असा संशोधकाचा दावा आहे. शिवाय ज्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हाती ही काठी राहील त्यावर त्याचे नाव, पत्ता, रक्तगट आणि महत्वाचा तपशील त्या काठीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे.

पोलिस महासंचालकांसमोरही सादरीकरण

चेतन नंदाणे याने हा प्रयोग माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह मुख्यमंत्र्यांसमोरही सादर केला असल्याची माहिती, मार्गदर्शक प्रा. गायत्री फडे यांनी दिली. सुरूवातीच्या टप्प्यावर या स्टीकमध्ये केवळ दीवे बसविण्यात आले होते. मात्र दीक्षित यांनी काही बदल सुचविल्यानंतर यावर गांभीर्याने काम करत चेतन याने ‘मल्टी फंक्शनल स्टीक’ आकारास आणली.

प्रयोग पोहचेल मोठ्या स्तरावर

या धर्तीवर परदेशामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या स्टीक्स पुरविल्या जातात. आपल्या देशात मात्र अद्याप पोलिस दलात तसा ट्रेंड नाही. रात्री पेट्रोलिंगसाठी कार्यरत असणाऱ्या किंवा एखाद्या अपघाती प्रसंगांमध्ये कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हाती असे साधन उपलब्ध झाल्यास घटनेच्या तपासात महत्वाचे सहकार्य होईल. भविष्यात या प्रयोगाची दखल राज्यात मोठ्या स्तरावर घेण्याची अपेक्षा असल्याची माहिती संस्थेतील प्राध्यापकांनी दिली.

विद्यार्थ्यांमध्ये अमाप उर्जा आणि बुध्दीमत्ता दडली आहे. अभ्यासक्रमातील प्रोजेक्ट सादरीकरणातून अनेक विद्यार्थी चांगली प्रेरणा घेतात. ‘मल्टी फंक्शनींग स्टीक’ चा प्रयोगही विद्यार्थ्यांची उर्जा सकारात्मक दिशेने घेऊन जाणारा आहे.

डॉ. प्रशांत पाटील, प्राचार्य,

संदीप फाऊंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्ग आळेफाटामार्गे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नाशिक जिल्ह्यात विरोध होऊ लागल्याने हा महामार्ग अन्य मार्गाने वळविता येईल का, याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केला आहे. घोटी, सिन्नरऐवजी आळेफाटा, अहमदनगरमार्गे हा प्रकल्प घेऊन जाण्याची चाचपणी सुरू झाली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाप्रमाणेच हा प्रकल्पही पळविला गेल्यास नाशिकचा विकास खुंटण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

नागपूर आणि मुंबई अशा दोन महानगरांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाच्या रूपाने साकारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात ९६ किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे. इगतपुरी तालुक्यातील २०, तर सिन्नर तालुक्यातील २६ गावांचा या प्रकल्पात समावेश आहे. त्यासाठी साधारणत: १८५१ हेक्टर जमीन संपादित करावी लागेल, असा प्रशासनाचा अंदाज होता. सरकारने जमिनींच्या मोबदल्यात मुबलक मोबदल्याची ग्वाही दिली असली तरी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. या प्रकल्पात वडिलोपार्जित जमिनी, घरे, विहिरी जातील या भीतीपोटी काही भागात शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे, तर या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा होणारा फायदा त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या जनजागृतीवर प्रशासनाने भर दिला आहे. या महामार्गाचे काम मार्गी लागावे, यासाठी जिल्ह्यातील दहाहून अधिक गावांमधील २८ किलोमीटरहून अधिक क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले.

अन्यथा पर्यायी मार्ग

नेमकी कुठली आणि किती जमीन महामार्गात जाणार, याचा अचूक अंदाज येण्यासाठी डीमार्केशनचे कामही प्रशासनाने हाती घेतले. मात्र, प्रशासनाकडून हे प्रयत्न होत असताना या प्रकल्पाला शेतकऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचाही विरोध होऊ लागला आहे. हा विरोध मावळावा यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोध मावळला नाहीच तर पर्यायी मार्गांचा विचारही सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केला आहे. नगर ते कल्याण मार्गाचा हा समृद्धी महामार्ग साकारण्यासाठी विचार होऊ शकतो. कल्याण, माळशेज घाट, आळेफाटा आणि अहमदनगरमार्गे औरंगाबादपर्यंत हा महामार्ग घेऊन जाता येईल का, याचा विचार सुरू करण्यात आला आहे. सिन्नर, घोटीमार्गे औरंगाबादपर्यंतचा हा महामार्ग ३३५ किलोमीटर लांबीचा आहे. आळेफाट्यामार्गे औरंगाबादपर्यंत हे अंतर ३१ ‌किलोमीटरने वाढले असून, हा महामार्ग ३६६ किलोमीटर लांबीचा होणार आहे. यापूर्वी नाशिक- मुंबई द्रुतगती महामार्गालाही नाशिकमधून विरोध झाल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच नाशिकमध्ये जाहीर केले. त्यामुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग विकसित करण्यात आला. त्यानंतर दिल्ली- मुबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्येही नाशिक सहभागी होऊ शकले नाही. शेतकऱ्यांचा विरोधही रास्त असला तरी आता हा महामार्ग नाशिकमधून जाणार की आळेफाट्यावरून, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शेतकऱ्यांचे समुपदेशन सुरूच ठेवणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.

असा आहे महामार्ग

९६ किलोमीटरचा महामार्ग
४६ गावे जाणार प्रकल्पात
१८५१ हेक्टर जमीन लागण्याची शक्यता
२८ किलोमीटरहून अधिक क्षेत्राचे सर्वेक्षण

का आहे विरोध?

प्रकल्पात वडिलोपार्जित जमिनी, घरे, विहिरी जातील या भीतीपोटी काही भागांत शेतकऱ्यांचा विरोध.

सरकार, प्रशासनाचे प्रयत्न

- मुबलक मोबदला देण्याची ग्वाही
- शेतकऱ्यांच्या समुपदेशनावर भर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीओ मालामाल; दिवसभरात ५८ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनांवरील थकीत टॅक्स वसूल करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सोमवारी सुरू ठेवण्याचा निर्णय चांगलाच पथ्यावर पडला. दिवसभरात नाशिक आरटीओ कार्यालयात ३८ लाख रुपये जमा झाले. नाशिक विभागातील श्रीरामपूल, अहमदनगर आणि मालेगावचा विचार करता हा आकडा ५८ लाखांच्या घरात पोहोचला आहे.

देशात हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आल्यापासून थकीत कर भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. महापालिका, महसूल, नगरपालिका, वीज मंडळाकडे थकबाकीदारांच्या रांगा लागल्या आहेत. थकीत कर भरताना चलनातून बाद झालेल्या हजार व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात असल्याने थकबाकीदारांच्या दृष्टीने ही बाब सोयीची ठरली आहे. याच पद्धतीने वाहनावरील थकीत टॅक्स संकलित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सोमवारी सुटीच्या दिवशी आपली कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. ट्रक, बसेस व इतर व्यावसायिक वाहनांना दर तीन महिन्यांनी किंवा वार्षिक पद्धतीने आरटीओ कार्यालयात टॅक्स जमा करावा लागतो. यात परमिट टॅक्स, पर्यावरण टॅक्स, रिपासिंग टॅक्स अशा अनेक टॅक्सचा समावेश होतो. दरवर्षी या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल सरकारदरबारी जमा होतो. मात्र, अनेकदा वाहनचालक असा टॅक्स भरण्यास काही कारणांमुळे चालढकल करतात. अशा वाहनचालकांनी सोमवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर आपल्याकडील थकीत टॅक्स आरटीओ कार्यालयात जमा केला. नाशिक प्रादेशिक कार्यालयात दिवसभरात ३४ लाख ९१ हजार ५७५ रुपयांचा महसूल याद्वारे जमा झाला. गस्ती पथकाने केलेल्या कारवाईत ४ लाख ६४ हजार ८४१ रुपयांचा दंड वसूल केला. नाशिकमध्ये जवळपास ३९ लाखांचा महसूल जमा झाला. नाशिक विभागातील मालेगाव, श्रीरामपूर आणि अहमदनगर या कार्यालयांतदेखील थकीत टॅक्स भरण्यासाठी वाहनमालकांची गर्दी होती. नाशिक व इतर तीन उपप्रादेशिक कार्यालये मिळून दिवसभरात तब्बल ५८ लाख रूपयांचा महसूल जमा झाला आहे.

नाशिक
३४,९१,५७५ रुपये

गस्ती पथक
४,६४,८६१ रुपये

मालेगाव
८,६७,१२७ रुपये

श्रीरामपूर
५,०६,७५१ रुपये

अहमदनगर
४,९४,६७३ रुपये

एकूण
५८,२४,९९८ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी आश्रमशाळांना बायोमेट्र‌िक, आधारशिवाय अनुदान नाही

$
0
0

अनुदान हवंय? बायोमेट्रीकचा ‘आधार’ घ्या!

vinod.patil@timesgroup.com
Tweet : @VinodPatilMT

नाशिक : आदिवासी विभागातर्फे चालणाऱ्या खासगी आश्रमशाळांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी विभागाने आता या आश्रमशाळांभोवती फास आवळण्यास सुरूवात केली आहे. खासगी आश्रमशाळांमधील काही संस्थाचालक विभागाचे अनुदान लाटण्यासाठी बोगस विद्यार्थी दाखवत असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. त्यामुळे आदिवासी विभागाने राज्यातील ५५६ खासगी अनुदानीत आश्रमशाळांना विद्यार्थी अनुदानासाठी आता आधारकार्ड, तसेच बायोमेट्र‌िक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आता आधारकार्डशिवाय दिले जाणार नसल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी स्पष्ट केले असून, दररोज बायोमेट्र‌िक हजेरी सादर करण्याची जबाबदारीही या संस्थाचालकांवर असणार आहे. त्यामुळे खासगी आश्रमशाळांमधील बनवेगिरीला लगाम लागणार आहे.

बुलढणा जिल्ह्यातील पाळा येथील खासगी आश्रमशाळेमध्ये लैंगिक शोषणाची घटना उघडकीस आल्यानंतर आदिवासी विकासमंत्र्यांसह आदिवासी आयुक्त राजीव जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. या खासगी आश्रमशाळा संस्थाचालकांकडून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांनाच आता चाप लावला जाणार आहे. ५५६ खासगी आश्रमशाळांमध्ये जवळपास २ लाख ४० हजारांच्यावर विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु यातील बहुसंख्य आश्रमशाळांमध्ये बनावट विद्यार्थी असल्याचे अनेकदा केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी व शाळा सुरू ठेवण्यासाठी मराठी शाळांचे विद्यार्थीही काही ठिकाणी आश्रमशाळांमध्ये दाखवले जातात. विभागाकडून प्रतिविद्यार्थी दरमहा ९०० रुपये दिले जातात. तर दरवर्षी संस्था चालवण्यासाठी ५ लाख ते २५ लाखांपर्यंतची विविध अनुदाने दिली जातात. त्यामुळे या आश्रमशांळावर दरवर्षी साधारणत: दीडशे कोटींच्या आसपास खर्च होतो.

आश्रमशाळा संस्थाचालकांना आतापर्यंत खातरजमा केल्याशिवायच अनुदान दिले जात होते. परंतु आता डोळेझाक करून अनुदान दिले जाणार नसून, या अनुदानाला चाळणी लागणार आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अनुदान आवश्यक असेल तर आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

आश्रमशाळांचे अनुदान थेट आधार नंबरशी जोडले जाणार आहे. विद्यार्थ्याचा आधार नंबर असेल तरच संबंधित शाळेला अनुदान वितर‌ित करण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत या संस्थाचालकांना सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आदिवासी आयुक्तालयाकडे सादर करावे लागणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांकडून बनावट विद्यार्थी उभे करून अनुदान लाटण्याचे प्रकार थांबणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला ‘बीओटी’मुक्त करणार

$
0
0

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहराचा विकास केला असं ते म्हणतात. मात्र शहराची आजची खरी परिस्थिती बघता शहरात त्यांनी नेमका कुठे कुठे विकास केला आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. ‘बांधा, वापरा अन् हस्तांतरीत करा’ (बीओटी) या योजनेंतर्गत शहराचा विकास राष्ट्रवादीने केला असेल, तर पालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर शहर बीओटीमुक्त करू, अशी ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

येवला नगरपालिका निवडणुकीसाठीचा शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ राज्यमंत्री भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख सुहास सामंत, विधानसभा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, माजी आमदार मारोतराव पवार, कल्याणराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे आदींच्या प्रमुख उपस्थित फोडण्यात आला.

शहरातील बाजारतळावरील सिध्दिविनायक गणेश मंदिरात हा शुभारंभ झाल्यावर नजीकच्या शनिपटांगणावर युतीची छोटेखानी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे यांनी तब्बल दहा वर्षांपेक्षा अधिक काळ येवला पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर आसूड ओढले. विकासाची कास धरणारी अन् तळमळ असलेली माणसे आम्ही पालिका निवडणुकीत सेना-भाजप युतीच्या वतीने उमेदवार म्हणून दिली आहेत. येवला पालिकेवर युतीचा फगवा फडकेल हे सांगण्यासाठी कुणा भविष्यकाराची गरज नसल्याचेही भुसे यावेळी म्हणाले.

येवला ही इतिहास घडविणारी भूमी असल्याने पालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवून जनता इतिहास केल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार हरिश्चंद्र चव्हाण म्हणाले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत, माजी आमदार मारोतराव पवार, कल्याणराव पाटील यांचीही भाषणे झाली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार बंडू क्षीरसागर, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची भाषणे झाली.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस बापू पाटील, शिवसेनेचे संभाजी पवार, जिल्हा बँक संचालक किशोर दराडे, जिल्हा उपप्रमुख वाल्मीक गोरे, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, भाजपचे मंडळ प्रभारी दिनेश देवरे, राजेंद्र पवार, कुणाल दराडे, माणिक लोणारे, शिवसेनेचे मतदारसंघ प्रमुख अनिल कोकिळ आदींसह युतीचे उमेदवार उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाजपचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी केले.

पाणीप्रश्नावर ठेवले बोट

उपस्थितांना शहराला किती दिवसाआड पाणी येते, असा सवाल भुसे यांनी यावेळी केला असता उपस्थितांतून तीन दिवसाआड असे उत्तर नागरिकांनी दिले. विकास झाला म्हणतात तर मग शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा का? असाही प्रश्‍न यावेळी भुसे यांनी केला. त्यामुळे युतीच्या उमेदवारांना जनतेने आशीर्वाद देऊन सेवेची संधी द्यावी, अशी सादही भुसे यांनी घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नावर मागणार मतांचा जोगवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यात धरणांची संख्या मुबलक, तसेच पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणावर असूनही आजही नांदगावमध्ये २० ते २२ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत पाण्याची वितरण व्यवस्था आणि नियोजन हा घटक कळीचा मुद्दा ठरेल, असे चित्र आहे.

धरणांचा तालुका असूनही नांदगावमध्ये जनतेला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नगरपालिका निवडणुकीत पाणीप्रश्न महत्त्वाचा असल्याने तो सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या पक्षाला निवडणुकीत झुकते माप मिळेल, अशी नागरिकांची धारणा आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत पाणीप्रश्नांसह मूलभूत सोयी सुविधा हेच मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.

१७ जागा अन् ६१ उमेदवार

नांदगाव नगरपालिकच्या ८ प्रभागातील १७ नगरसेवकांच्या जागांसाठी तब्बल ६१ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या जोडीने अपक्ष ही मोठ्या प्रमाणावर रिंगणात आहेत.

भाजप-सेना स्वबळावर

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोघे स्वतंत्ररित्या निवडणूक लढवीत असून, त्यांची फारकत एकत्रित निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या पथ्यावर पडेल का?, हाच नांदगावमध्ये कुतूहलाचा विषय आहे. मात्र शिवसेना व भाजप यांची युती नसली तरी स्वतंत्रपणे लढून आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असा विश्वास दोन्ही पक्षाचे नेते स्वतंत्ररित्या सांगत आहेत. मतांचे विभाजन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लाभदायी ठरेल, असे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर यांच्यामुळे आघाडी भक्कम असल्याचा व त्याचा फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे, तर नांदगावमध्ये सहकारमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्याने सेनेत आलेले चैतन्य या गोष्टी आज शिवसेनेसाठी तारक ठरतील, असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाऊ, पाचशेच्या नोटा आणता का बदलून!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

उमेदवार मतदारांना भेटून त्यांच्या अपेक्षा विचारत आहेत. आम्ही काय केले पाहिजे. मतदारांना काय हवे आहे, असा एकूण त्यांच्या बोलण्यातील सूर आहे. एका उमेदवाराने एका महिला मतदाराला नमस्कार करीत मावशी काय अपेक्षा आहेत. काय करू तुमच्यासाठी सांगा, असे विचारले. लगेच ती महिला म्हणाली बँकेत गर्दी आहे, माझ्या पाचशेच्या नोटा बदलायच्या होत्या. देता का आणून? हे ऐकून सर्वांनाच हसू फुटले. तेव्हा तो उमेदवार मावशींना हळूच म्हणाला. अहो मलाच माझ्या नोटा बदलायच्या आहेत, पण रांगेत उभे राहायला वेळ नाही. प्रचार महत्त्वाचा असं म्हणत त्याने पुढची वाट धरली.

चिन्हाने केली पंचाईत

सटाणा शहर विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारापासून, तर आघाडीच्या ११ नगरसेवकपदाच्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एकसमान चिन्ह नाकारल्याने वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची वेळ आल्याने मोठी पंचाईत झाली आहे. सटाणा शहर विकास आघाडीने उमेदवारी अर्ज नामांकनात नारळ या चिन्हाला पसंती दिली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या अध्यादेशामुळे गैरसोय झाल्याने आघाडीच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हामुळे मोठी पंचाईत झाली आहे. थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवारांना जग हे चिन्ह मिळाले असून, प्रभागातील दोन उमेदवारांचे चिन्हदेखील वेगवेगळे असताना मतदारांपुढे तीन चिन्ह सांगतांना उमेदवारांची दमछाक होत आहे.

अहो, फौज कुठे आहे?

नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मनमाडमध्ये एका उमेदवाराने कार्यकर्त्यांसह प्रचारफेरी काढली. त्याच्यासोबत पाच सहा कार्यकर्ते होते. ते पाहून एका ज्येष्ठ नागरिकाने विचारले का हो तुमच्याकडे एवढीच फौज? आणि तुमच्या घरातले तर कोणीच नाही का बरोबर तुमच्या?, मग घरचीच मते दिसत नाही मग आम्हाला का मत मागता? तेव्हा गडबडून तो उमेदवार उत्तरला अहो काका त्यांना दुसऱ्या गल्लीत पाठवले आहे. प्रचाराला हा प्रभाग मोठा आहे ना म्हणून.. यावर काकांनी काय सांगता? असं म्हणत असा चेहरा केला की उमेदवाराने तडक प्रचारासाठी शेजारचे घर गाठले.

उमेदवारांची कैफियत

कार्यकर्ते सांभाळताना उमेदवारांना खूप कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. प्रचाराला येणाऱ्या व उमेदवारासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला किमान चहा-नाश्ता तरी मिळावा म्हणून उमेदवार ही काळजी घेत आहेत. पण काहींची नोटांमुळे अडचण झाली आहे. नगरपालिकेत एकमेकांना भेटलेले दोन उमेदवार चर्चा करीत असताना एकाने आपली कैफियत सांगितली. तो म्हणाला अहो पाचशेच्या नोटा होत्या तेव्हा ठीक होतं हो! आता इतका प्रॉब्लेम चालू आहे, की चहा-नाश्ता करण्यासाठी दोन हजाराची नोट द्यावी लागतेय आणि कार्यकर्ते पुन्हा पैसे परत आणतच नाहीत. जेवणच उरकून येत आहेत. आता सांगता कोणाला? शंभराच्या नोटा शोधतोय मी आता.. आणि हे ऐकून दुसरा म्हणाला माझेही हेच दुःख आहे दोस्ता... आणि असं म्हणत निवडणूक विषयसोडून दोघे नोटबंदीचे तोटे यावर बोलू लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images