Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रूढी परंपरेत अडकलेले ‘३०२ प्रश्नचिन्ह’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कितीही पूरक, सकारात्मक घटना घडल्या तरी समाजातील रूढी परंपरा काही केल्या नष्ट होणार नाहीत. तसेच नकारात्मक घटना घडल्यावर मात्र त्याची तत्काळ दखल घेत त्यावर जातपंचायत बसवून निर्णय दिला जाईल. त्यामुळे कुणाचे आयुष्याचे नुकसान झाले तरी त्याची पर्वा समाज करीत नाही ही वस्तुस्थिती मांडणारे ‘३०२ प्रश्नचिन्ह’ हे नाटक शनिवारी सादर झाले.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५६ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मयूर थोरात लिखित ‘३०२ प्रश्नचिन्ह’ हे नाटक सादर झाले. हे नाटक रंगकर्मी थिएटर्स संस्थेच्यावतीने प्रस्तूत करण्यात आले होते. ‘३०२ प्रश्नचिन्ह’ हे सामाजिक विषयावर भाष्य करणारे नाटक होते. गावाच्या भल्याचा विचार करणारे गुरूजी आपण बाप होणार या आनंदात असतात. मात्र त्यांचा आनंद पत्नीच्या निधनाने मावळून जातो. तरी मुलीची जबाबदारी ते पार पाडतात. एका आयाकडे मुलगी सांभाळण्यासाठी देतात. दिवसांमागून दिवस जातात. मुलगी मोठी होते. कॉलेजला जाते. परंतु, तिला बाप कधी वेळ देत नाही. यामुळे ती नेहमी नाराज असते. त्यात तिचे एका मुलावर प्रेम जडते. मुलगा जातीचा नसल्याने गुरूजींशी तिचे भांडण होते. त्यातून तोल जाऊन ती पडते व तिचा मृत्यू होतो. तिच्या मृत्यूला स्वत:ला कारणीभूत मानून गुरूजी जेलमध्ये जातात. पुढे त्यांचा न झालेला जावई त्यांची केस लढतो व न्यायालयाला त्यांची माफी मागावयास भाग पाडतो. पुन्हा एका मुलीची किंकाळी येते, पुन्हा जातपंचायत, पुन्हा रूढी परंपरा.

या नाटकात ऋचा वैद्य, तेजस बिल्दीकर, रेणुका पोतदार, जयदीप लखलानी, सुप्रिया अमृतकर, अभिजीत धारणे, सागर शिंदे, वैदेही जोशी, उत्तम लबडे, निशिगंधा उपासनी, सौरभ अमृतकर, जयश्री साळुंके, केतन औसकर, वैभव उगले, काव्या धारणे, तनिष्का धारणे यांनी भूमिका केल्या. नेपथ्य निवेदिता कस्तुरे, भूषण क्षिरे यांचे होते. प्रकाशयोजना जयदीप पवार यांची होती. संगीत अभिजीत धारणे यांचे, तर संगीत संयोजन रोहित सरोदे यांचे होते. वेशभूषा प्रथमेश कपोते, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. दिग्दर्शन मयूर थोरात यांनी केले होते. रंगमंच सहाय्य पंकज बिल्दीकर, शामली देवरे यांचे होते.

आजचे नाटक

पराग घोंगे लिखित ‘वाळुचे घर’परशुराम साईखेडकर नाट्यगृह, सायंकाळी ७ वाजता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहुजन एकवटले...

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दलितांच्या संरक्षणार्थ असलेला अॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करावा यासह विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला लाखोंच्या जनसमुदायाने शनिवारी नाशिककरांचे लक्ष वेधले. डोक्यावर निळी टोपी, गळ्यात निळे पट्टे आणि ठिकठिकाणी लावलेले निळे झेंडे यामुळे अवघे शहर निळेमय झाल्याचे नाशिक‌करांनी अनुभवले. ‘मी भारतीय प्रथमत: आणि अंतिमत:’ असा एकात्मतेचा संदेश देतानाच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. तब्बल तीन ते चार तासांनी या महामाेर्चाची गोल्फ क्लब मैदानावर सांगता झाली.

सकाळी दहापासूनच गोल्फ क्लब मैदानावर मोर्चेकरी जमण्यास सुरुवात झाली होती. नाशिकमधूनच नव्हे, तर धुळे, अहमदनगर, मुंबईपासून बौद्ध, तसेच अन्य समाजबांधव या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी भल्या सकाळीच नाशिकनगरीत दाखल झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्ररथासह वाजतगाजत अबालवृद्धांचे घोळके शहराच्या विविध भागांतून गोल्फ क्लब मैदानावर पोहोचत होते. बसेस, रिक्षा, जीप, ट्रक अशा अनेक प्रकारच्या वाहनांमधून मोर्चेकरी शहरात दाखल होत होते. वाहनांतळांवरून पायीच ते गोल्फ क्लब मैदानाकडे निघाल्याने शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोर्चेकऱ्यांची गर्दी होती.

महामोर्चा सकाळी अकराला सुरू होईल असे सांगण्यात आले असले, तरी दुपारी साडेबाराला महामोर्चाला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चित्ररथ, पाठोपाठ भगवी वस्त्रे प‌रिधान केलेली आणि हाती विविधरंगी छत्री असलेले भन्ते, पाठोपाठ सफेद शर्ट, खाकी पॅन्ट आणि निळी टोपी परिधान केलेले स्वयंसेवक, त्यामागोमाग महिला आणि युवती, अन्य नागरिक आणि सर्वांत शेवटी विविध समाजांतील मान्यवर प्रतिनिधी या क्रमाने मोर्चेकरी मार्गस्थ झाले. मोर्चेकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मात्र, त्याच वेळी शांतता, शिस्त, संयम आणि एकात्मतेचे दर्शन मोर्चेकऱ्यांकडून घडविले जात होते. मोर्चात बौद्ध, एस.सी.-एस.टी., व्ही.जे.एन.टी, ओबीसी, अल्पसंख्याक, ख्रिस्ती, मुस्लिम आणि अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘मी भारतीय प्रथमत: आणि अंतिमत:’ या घोषवाक्यासह विविध मागण्या असलेले झेंडे हाती घेऊन मोर्चेकऱ्यांची पावले जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होत होती. वाटेत काही ठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी अल्पोपाहार आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

गर्दीमुळे मोर्चाच्या मार्गात बदल होऊ शकतो असे संयोजकांकडून सांगण्यात आले होते, तरी ठरल्याप्रमाणे गडकरी चौक, सारडा सर्कल, गंजमाळ, शालिमार, रेड क्रॉस सिग्नल, एम.जी.रोडमार्गे दुपारी दोनच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. तेथे दुपारी सव्वादोनच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

रस्त्यांवर तोबा गर्दी

मोर्चामध्ये लाखो बांधव सहभागी झाल्याने मोर्चाचा मार्ग, तसेच अन्य रस्ते मोर्चेकऱ्यांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. एम. जी.रोडवरील रेड क्रॉस सिग्नल ते त्र्यंबक नाक्याच्या सिग्नलपर्यंत नजर पोहोचेल तेथे मोर्चेकरीच पाहावयास मिळत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोर्चा मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे ५०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरविण्यात आले होते. मोर्चा मार्गावर वाहनांना मज्जाव करण्यात आल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती.

रुग्णवाहिकांसाठी केला रस्ता मोकळा

मोर्चाच्या मार्गावर वाहतुकीला बंदी होती. मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी एकही वाहन या मार्गावर येऊ दिले नाही. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केले असले, तरी रुग्णवाहिका, पोलिसांच्या वाहनांना ये-जा करण्यास मुभा होती. दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला, त्याचवेळी काही रुग्णवाहिका सीबीएसकडून अशोकस्तंभाकडे चालल्या होत्या. बाजूला होत मोर्चेकऱ्यांनी या रुग्णवाहिकांसाठी रस्ता मोकळा करून दिला.

महापुरुषांना अभिवादन

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाल्यानंतर जिल्हा परिषदेजवळ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शालिमार येथे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला, शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला, तर सीबीएस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला संयोजकांच्या वतीने दीपछंद दोंदे, नानासाहेब भालेराव, अण्णासाहेब कटारे, सुरेश मारू, गुलाम शेख, सुरेश दलोड, रवी जाधव आदींनी अभिवादन केले.

आनंद शिंदेंचाही सहभाग

गायक आनंद शिंदे हेदेखील आंदोलकांचा उत्साह वाढविण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी झाले. मोर्चा संयोजकांच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे व्यासपीठ उभारण्यात आले होते. मात्र, या व्यासपाठीवर केवळ मुलींनाच प्रवेश देण्यात आला. मोर्चाचे संयोजक, तसेच अन्य कुणीही व्यासपीठावर गेले नाही.

उपस्थितीबाबतचे दावे...

या महामोर्चाला १० लाख बांधवांची उपस्थिती असल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला, तर पोलिस प्रशासनाकडून सुमारे सव्वादोन लाख बांधव मोर्चात सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.

---
उपनगरांतून प्रतिसाद

शहरातील सिडको, सातपूर, देवळाली कॅम्प, जुने नाशिक आदी उपनगरांतून महामोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सिडको व इंदिरानगर परिसरातून मोठ्याप्रमाणावर कार्यकर्ते व नागरिकांना सकाळपासूनच मोर्चासाठी जाताना दिसून आले. अचानकपणे नागरिकांच्या गर्दीमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती. महामोर्चात सातपूरमधील बहुजनांचाही मोठा सहभाग दिसून आला. सातपूर राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तरुणांसह महिलादेखील मोर्चात सहभागी झाल्या. देवळाली कॅम्प परिसरासह ग्रामीण भागातून हजारो युवकांसह महिला, पुरुष व बालगोपाळांनी 'नाशिक जिल्हा- भीमाचा किल्ला' यासह अनेक घोषणा देत रॅलीद्वारे महामोर्चामध्ये सहभाग नोंदवला. जुने नाशिक परिसरातून ममहमोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. परिसरातील रस्ते बंद केल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा ओळंबा झाल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष पडले महाग

$
0
0



Gautam.Sancheti@timesgroup.com

एटीएममधून स्वाइप केल्यानंतरही पैसे न मिळाल्यामुळे ग्राहकाने केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या युनियन बँकेला जिल्हा ग्राहक न्यायमंचाने १०० रुपये रोज याप्रमाणे ३७० दिवसांचा ३७ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या निर्णयात रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाचा आधार घेण्यात आला असून, त्यामुळे बँकेला ग्राहकाच्या तक्रारीकडे केलेल दुर्लक्ष महागात पडले आहे. या दंडाबरोबरच न्यायमंचाने मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्जाचा खर्च दोन हजार असे सात हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक येथील काॅलेजरोडवर राहणारे संजय विठ्ठल देवरे यांनी याबाबत जिल्हा ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी माझे युनियन बँकेत खाते असून, मी मालेगाव येथे एटीएममधून १५ हजार रुपये काढण्यासाठी कार्ड स्वाइप केले. पण, एटीएममधूून रक्कम निघाली नाही. मात्र, मला एसएमएस प्राप्त झाला व त्यात माझी रक्कम माझ्या बॅलन्समधून वजा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा स्वाइप केले, पण पैसे निघाले नाहीत. त्यामुळे युनियन बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर त्याची तक्रार केली. त्यानंतर ही रक्कम जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मला तीस हजार रुपये मिळालेले नसतानादेखील खात्यातून ही रक्कम डेबिट झाली. मात्र, तक्रार करूनही पैसे न मिळाल्यामुळे मी लेखी अर्ज करून सीसीटीव्ही व फुटेजची तपासणी करून रक्कम मिळावी, अशी मागणी केली. त्यानंतर बँकेने पंधरा हजार रुपये जमा केले व उर्वरित रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली. नंतर मी पुन्हा पत्र देऊन पंधरा हजार रुपये व रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाप्रमाणे १०० रुपये नुकसानीची रक्कम मिळावी, असे सांगितले. या तक्रारीनंतर युनियन बँकेतर्फे युक्तिवाद करताना सांगण्यात आले, की फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा केली आहे. पण, नंतर कोणतेही ट्रान्झॅक्शन फेल झालेले नसल्यामुळे नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी नाही.

दुर्लक्षाची किंमत ४४ हजार!

जिल्हा न्यायमंचाने निकाल देताना सांगितले, की रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने वेळोेवेळी डायरेक्शन्स दिलेले आहेत. याची जाणीव असतानादेखील बँकेने विवादित ट्रान्झॅक्शनची दखल न घेता रक्कम देण्यास नकार दिला व ग्राहकास वेठीस धरल्याची बाब अतिशय गंभीर असून, ही सेवेतील कमतरता आहे. २५ जानेवारी २०१५ रोजी तक्रार केल्यानंतर रक्कम ७ एप्रिल २०१६ रोजी जमा केली आहे. त्यामुळे या काळातील ३७० दिवसांचे दररोज १०० रुपयाप्रमाणे ग्राहक ३७,००० रुपये मिळण्यास पात्र आहे. त्यामुळे त्यांना ही रक्कम अदा करावी, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या दंडाबरोबरच न्यायमंचाने मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्जाचा खर्च दोन हजार असे सात हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेला तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याची किंमत ४४ हजार रुपये पडली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी व कारभारी जाधव यांनी दिला.

०००

काही ठिकाणी गैरसोय

काही बँकांनी ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग न केल्यामुळे अनेकांना ज्येष्ठ खातेदारांना डिपाॅझिट व पैसे काढण्याच्या रांगेतच उभे राहावे लागले. त्यामुळे ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली. बँकेत आलेल्या ज्येष्ठांना दोन हजारांच्या नोटा देऊन शाई लावली जात असल्यामुळे फक्त दोन हजारांच्या नोटा कशा बदलून देता, असा प्रश्न अनेकांनी विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांची रांगांतून सुटका!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी शनिवारी बँकांमध्ये केवळ खातेदार, तसेच ज्येष्ठांसाठीच कामकाज झाले. इंडियन बँक्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे बँकांत ज्येष्ठ नागरिकांना सुलभतेने नोटा बदलून घेणे शक्य होऊन त्यांची भल्या मोठ्या रांगांतून सुटका झाल्याचे दिसून आले. पैसे डिपाॅझिट करणे व खात्यावरून काढण्यासाठी मात्र सर्वत्र रांगा होत्या. त्यामुळे बँकांतील गर्दी नवव्या दिवशीही कायम होती.

नोटा रद्द झाल्यानंतर आता ही गर्दी कमी होईल, असे चित्र कोठेच दिसले नाही. सर्वच बँकांत गर्दी कायम असल्यामुळे बँकांनी सेवा दिली असली, तरी सर्वच बँकांना शनिवारी आपल्या खातेदारांना सेवा देण्याचे समाधान लाभले. गेले आठ दिवस कोणत्याही बँकेचे खातेदार बँकेत येत असल्यामुळे आेळख नसलेल्या ग्राहकांशी फारसा संवादही साधता येत नव्हता. पण, शनिवारी मात्र बँकेचे खातेदार असल्यामुळे त्याचा फायदा बँकेला झाला. अनेकांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्याला काय अडचणी झाल्या याची माहिती बँकेच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना सांगत त्यांच्याकडे भावना व्यक्त केेल्या. बँकेनेही आमच्याकडे रिझर्व्ह बँकेचे निर्देश असल्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी अडचण आल्याचे मनमोकळेपणाने सांगितले.

माहितीचा गोंधळ

खातेदारालाच बँकेत पैसे बदलून देण्याचे निर्देश दिल्यानंतरही बहुतांश बँकांला याबाबत माहिती होती. पण, काही बँकांना त्याबाबत माहिती नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. अनेक बँकांनी आपल्या विभागीय कार्यालयाशी संपर्क करून त्याबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत नियम लागू केले.

ग्राहकांनाही नाही पत्ता

सरकार रोजच नियम बदलत असल्यामुळे ग्राहकांना त्याची माहिती नसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. कोणत्याही बँकेत पैसे बदलून मिळेल, असे समजून ते बँकेत येत होते. पण, बँकेत तुमचे खाते कोठे आहे, याची विचारपूस केली जात होती. त्यानंतर मात्र त्यांना त्यांच्या बँकेत जाण्याचे सांगण्यात येत होते. अनेक जण रांगेत उभे राहिल्यानंतर नंबर आल्यानंतर त्यांना हा बदल कळला, त्यामुळे त्यांच्या संतापात वाढ झाली.

बँक कर्मचाऱ्यांशी हुज्जत

ज्या बँकेत खाते आहे तेथेच पैसे बदल करून मिळतील, असे जाहीर केल्यानंतर त्याची माहिती सर्वांपर्यंत न पोहोचल्यामुळे अनेकांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यावेळी रोजच नियम कसे बदलतात, असे प्रश्नही त्यांना विचारले गेले. पण, बँक कर्मचाऱ्यांनी, आम्ही काय करणार, वरतून जो आदेश येईल तो आम्हाला पाळावाच लागणार, असे सांगितले.

दोन हजारांचे सुटे

अनेक जणांना बँकेने दोन हजारांच्या नोटा दिल्यामुळे या नोटांचे सुटे पैसे मिळावेत यासाठी काहींनी बँकेत विचारणा केली. बाहेर त्याचे सुटे कोणीच देत नसल्यामुळे या ग्राहाकांनी थेट बँकेतच चकरा मारणे सुरू केेले. त्यामुळे बँकेसमोरही सुट्या नोटांचा प्रश्न कायम होता. काहींनी दोन हजाराच्या नोटा मिळता आहेत म्हणून पैसेच काढले नाहीत.

एक्स्चेंज नोटा नाहीच

खातेदारच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही बँकांनी एक्स्जेंच नोटा देण्यापेक्षा खातेदारांना पैसे खात्यात जमा करा व पैसे घ्या, असा सल्ला दिला. केवळ ज्येष्ठ नागरिकांना पैसे बदलून दिले. पण, त्यांचे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे एक्स्जेंच नोटांचा त्रास बँकेत कमी होता.

कॅश शाॅर्टेज कायम

सर्वच बँकांना कॅश पुरवठा करण्याचा निर्णय शुक्रवारी सर्व बँकांच्या बैठकीत ठरलेला असताना अनेक बँकांत कॅश शाॅर्टेजचा प्रश्न कायम होता. त्यामुळे अनेकांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही बँकांनी मात्र कॅश संपपर्यंत आपले काउंटर सुरू ठेवले. गेल्या रविवारी काम करावे लागल्यामुळे या रविवारी बँकेला सुटी देण्यात आल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याचा आनंद दिसून आला. गेले अनेक दिवस आम्ही काम करीत असल्यामुळे ही सुटी आनंददायी व टेन्शन फ्री असणार असल्याचे कर्मचारी सांगत होते.

नाशिकरोडला दिलासा

नाशिकरोडच्या राष्ट्रीय बँकांमध्ये शनिवारी फक्त बँकेच्या ग्राहकांचेच कामकाज झाले, तसेच फक्त ज्येष्ठांनाच नोटा बदलून देण्याची सोय करण्यात आली होती. रांगेत फार वेळ उभे राहावे लागत नसल्याने गेल्या काही दिवसांच्या गैरसोयीनंतर ज्येष्ठांना प्रथमच दिलासा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ धुळे जिल्हा बँक नोटांपायी अडचणीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत दर दिवशी होत असलेल्या वेगवेगळ्या सरकारी निर्णयांचा फटका धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेला बसला आहे. या गोंधळात डिसेंबरअखेर बँकेला अपेक्षित सीआर रेट साधता न आल्यास बँकिंग परवाना धोक्यात येऊ शकतो अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान बाद नोटा स्वीकारण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार १४ नोव्हेंबरपासून या नोटा बँकेत स्वीकारणे बंद करण्यात आले. तीन दिवस पाचशे आणि हजाराच्या नोटा बँकेत स्वीकारण्यात आल्या, त्यावेळी बँकेत ३७ कोटी रूपयांचे व्यवहार झाले. त्यात चार कोटी २९ लाख रुपये गेल्या तीन वर्षांपासूनची कर्जवसुली होती. वीबिल भरण्यापोटी दोन कोटी २० लाख रुपये, ३१ कोटी २५ लाखांचा खातेदारांनी पाचशे व हजाराच्या नोटांचा भरणा केला. या व्यवहारांमुळे बँक सुस्थितीत येणार होती. परंतु बँकेने जुन्या नोटा स्वीकारू नयेत, असे आदेश झाल्याने जिल्हा बँक अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे बँक प्रशासनाचे म्हणणे आहे.

पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकेला केलेले मनाई आदेश अद्यापही कायम असल्याने गेल्या पाच दिवसांपासून बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे डिसेंबर २०१७ अखेर बँकेचा सीआर नऊ टक्के गाठता आला नाही, तर बँकेची परवानगी रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ राज्यातील सर्व जिल्हा बँकांमधून जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश पारित करावेत, असेही चेअरमन कदमबांडे यांनी मटाशी बोलताना सांगितले. चालू वर्षात जिल्हा बँकेने एक लाख २५ हजार सभासदांना २१५ कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आणि गेल्या तीन वर्षापासून कर्जदाराकडे थकीत असलेली रक्कम ३१२ कोटी रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता नव्हे, पार्किंग प्लेस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड हे राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, महामार्ग वाहतूक, व्यापार व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. परंतु, महापालिका व पोलिस प्रशासनाकडून येथील वाहतुकीच्या प्रश्नावर कोणतेही ठोस नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी येथील रस्त्यांवर खुलेआम पार्किंग होत असून, रस्ते जणू अनधिकृत पार्किंगला आंदणच दिल्याची स्थिती दिसून येते. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व वेगवान करण्यासाठी प्रशासनाला नव्याने गृहपाठ करावा लागणार आहे.

रेल्वे स्टेशन ते शिवाजी पुतळा, शिवाजी पुतळा ते दत्त मंदिर चौक, बिटको चौक ते नाशिकरोड पोलिस ठाणे, सुभाषरोड, देवळाली कॅम्परोड, बिटको चौक ते दसक आदी सर्वच रस्त्यांवर अनधिकृत पार्क केलेली वाहने दिवसभर आढळून येतात. त्यातच रिक्षांची भर पडत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसते. विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये बरेचसे रिक्षाचालक रिक्षाथांब्याशिवाय भररस्त्यात थांबलेले दिसतात.

पोलिसांचा काणाडोळा

दत्त मंदिर, बिटको चौक व रेल्वे स्टेशन या तीनच ठिकाणी वाहतूक पोलिस नेमणुकीस आहेत. त्यांच्याकडून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न कधीही होताना दिसून येत नाही. रहदारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना साधे हटकण्याचीही तसदी हे वाहतूक पोलिस कर्मचारी घेत नाहीत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचेदेखील हातगाडी व्यावसायिक, फुटपाथवर होणाऱ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती दिसून येत आहे.

व्यावसायिकांचा ताबा

शहरातील व्यावसायिक इमारतींच्या पार्किंगची जागा त्याच इमारतीतील व्यावसायिकांकडून आपल्या व्यवसायासाठी वापरली जात आहे. त्यामुळे या व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांना आपली वाहने नाईलाजास्तव सार्वजनिक रस्त्याच्या कडेला उभी करावी लागत आहेत.

परिसरातील बहुसंख्य बसथांब्यांवर रिक्षाचालकांनी अतिक्रमण केलेले असल्याने असंख्य बसथांबे केवळ नावालाच उरले आहेत. त्यामुळे बसचालक व बस प्रवासीही त्रस्त झालेले आहेत. बसेस तर प्रवाशांची चढ-उतर करण्यासाठी रस्त्याच्या मधोमधच उभ्या राहताना दिसून येतात.

या उपायांाची अपेक्षा...

नाशिकरोड परिसराची वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिसरात रिक्षाथांबे वाढवावेत, अनधिकृत पार्क केलेल्या वाहनधारकांवर नियमित कारवाई व्हावी, गायकवाड मळा ते रेजिमेंटल प्लाझा, मशिद ते शिवाजी पुतळा आदी रस्त्यांवर एकेरी वाहतूक करावी, व्यावसायिक इमारतींच्या पार्किंग जागेवर ऑफ स्ट्रीट पार्किंगची सुविधा करण्यात यावी, सर्व रस्त्यांचे फुटपाथ रिकामे करण्यात येऊन त्यांना लोखंडी बॅरिकेड्स लावावेत, जेलरोडवरील अवजड वाहतूक दिवसा बंद ठेवण्यात यावी, वाहतूक शाखेचे स्वतंत्र पोलिस ठाणे व्हावे, मनुष्यबळ वाढविण्यात यावे, रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरील रिक्षाथांबा अन्यत्र स्थलांतरित करावा, हॉकर्स झोन घोषित करून रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या हातगाडी व भाजीपाला व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवावे, उड्डाणपुलाखालील भाजीबाजार व टेम्पो स्टॅण्ड सिन्नर फाटा येथे स्थलांतरुत करण्यात यावे, सैलानीबाबा चौक, इंगळेनगर, सिन्नर फाटा, देवळालीगाव महात्मा गांधी पुतळा, शिवाजी पुतळा येथे नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यन्वित करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


अवजड वाहनबंदीकडे डोळेझाक

जेलरोडमार्गे अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र, वाहतूक पोलिसांसमोरच यामार्गे अवजड वाहतूक दिवसभर सुरू असते. त्यामुळे या मार्गावर झालेल्या अपघातांत आतापर्यंत शाळकरी मुले, नागरिक, नोकरदार यांचा हकनाक बळीही गेला आहे.

---

पुणे-मुंबई शहरांच्या धर्तीवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व्हायला हवे. रिक्षा व दुचाकी वाहनांसाठी एक मार्गिका राखीव ठेवली पाहिजे. रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हायला हवी.

-अहमद शेख

बस व रिक्षाथांबे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होताना दिसत नाही. रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर केली पाहिजेत. शहरात ४५० रिक्षाथांब्यांची गरज असून, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

-शिवाजी भोर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहाच्या पैशांना प्रतिज्ञापत्र!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
विवाह समारंभ असेल त्यांना अड‌ीच लाख रुपये काढता येतील, असे उपसचिव शक्तिकांत दास यांनी जाहीर केल्यानंतर आता त्याचे फॉर्म बँकेला पाठवण्यात आले आहे. त्यात पॅनकार्ड सक्तीचे केले असून त्यात प्रतिज्ञापत्रही द्यावे लागणार आहे.
राष्ट्रीयकृत व खासगी बँकेने बहुतांश खातेदारांचे पॅनकार्ड घेतल्यामुळे त्यांच्या अडचणी कमी होणार असल्या तरी ज्यांच्याकडे नाही त्यांना पॅनकार्ड काढावे लागणार आहे. मुलीच्या विवाहाला स्वत:चेच पैसे काढण्यासाठी हा त्रास आता लग्नाच्या इतर कामबरोबर वाढणार आहे. एकूणच या निर्णयामुळे थोडासा दिलासा मिळाला असला तरी त्याबद्दल नाराजीसुध्दा आहे. या निर्णयात अडीच लाखांची मर्यादा असल्यामुळे त्याबद्दलही अनेकांच्या तक्रारी आहेत.
केंद्र सरकारने विवाहसोहळ्यासाठी अडीच लाख देण्याची घोषणा केल्यानंतर बँकेला कोणतीही लेखी सूचना न पोचल्याने अनेक बँकांमध्ये पैसे काढण्यावरून सुरुवातील एक दोन दिवस वाद झाले. त्यानंतर बँकेला एक फॉर्म देण्यात आला आहे. त्यात नाव, विवाह असलेल्याबरोबरचे नाते, पूर्ण पत्ता, पिनकोड व फोन नंबर, त्याचप्रमाणे पॅन कार्ड नंबर, त्यानंतर कोणत्या अकाऊंटमधून पैसे काढणार त्या खात्याचा नंबर, किती पैसे काढणार त्याचा आकडा ही माहिती भरून प्रतिज्ञापत्र भरायचे आहे.
प्रतिज्ञापत्रात भरावी लागणार ही माहिती
लग्नासाठी पैसे काढतांना प्रतिज्ञापत्रात वरील माहिती खरी आहे असे लिहलेले आहे.त्यानंतर सदर पैसे हे विवाहच्या कारणासाठी काढत आहे. माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या सवलतीचा उपयोग करणार नाही. त्याचप्रमाणे जर मी या सवलतीचा गैरवापर केला तर तर माझ्यावर केंद्र किंवा राज्य शासनाने कारवाई करावी असेही टाइप केले असून त्यावर सही करायची आहे. त्यानंतर ठिकाण व तारीख लिहायची आहे.
शेतकऱ्याची आत्महत्येची धमकी
निफाडच्या एका शेतकऱ्याने तर बँक पैसे देत नसल्यामुळे आत्महत्या करण्याची धमकी शनिवारी दिली होती. त्यानंतर त्याने वरिष्ठांना फोन केले. पण बँकेचे अधिकारी त्याची दखल घेत नव्हते. त्यानंतर हा फॉर्म आल्यानंतर तो देऊन पैसे देण्याचे कबूल केल्यानंतर त्याचा संताप कमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात वर्षांतील उच्चांकी दंडवसुली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहतूक पोलिसांनी गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दंड नुकत्याच संपलेल्या ऑक्टोबरअखेर वसूल केला आहे. पोलिसांनी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत एक कोटी ८९ लाख ९७ हजार १०० रुपयांचा दंड बजावून घेतला आहे.
वाहनांच्या तुलनेत कमी पडणारे रस्ते, वाहनचालकांची मानसिकता तसेच वाहनांची वाढती संख्या यामुळे मागील सात वर्षातील दंड वसुलीतील सर्व रेकॉर्ड मोडीत काढण्याची कामगिरी वाहतूक पोलिसांनी बजावली आहे. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत एक लाख ७९ हजार ८८९ वाहनचालकांवर कारवाई झाली असून, यापोटी एक कोटी ८९ लाख ९७ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त बेशिस्त वाहनचालकांना कोर्टाने तब्बल १२ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.
शहरातील औद्योग‌िक व आधुनिक शेतीप्रधान संस्कृतीमुळे प्रगतीची नवी दालने खुली होत आहेत. याबरोबर पर्यटन क्षेत्र देखील बहरत आहे. सर्वांचा आर्थिक स्थर उंचावत असल्याने शहरातील वाहनांची संख्या वर्षागण‌िक वाढत आहे. नाशिक शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांतील लाखो वाहने दररोज रस्त्यावर धावतात. याशिवाय, राष्ट्रीय व राज्य महामार्गांचा वापर करीत मोठ्या प्रमाणावर वाहने शहरातून मार्ग काढत पुढे जातात. या सर्वांचा ताण शेवटी रस्त्यांवर पडतो. त्यातच मुख्य शहरातील स्थापत्य रचना वाहनांच्या जास्त संख्येसाठी तयार झालेली नाही. या सर्वांचा परिणाम वाहतूक कोंडी, अपघात, रॅश ड्रायव्हिंग, वाहतूक नियमांची पायमल्ली यांसारख्या घटकांमधून प्रतिबिंब‌ित होतात. त्यातच गेल्या काही वर्षांत वाहतूक नियमांची पायमल्ली करणे हा वाहनचालकांचा हक्क झाल्यासारखे चित्र निर्माण झाले. झेब्रा, सायलन्स झोन, लेन कटिंग यांसारखे नियम तर वाहनचालकांना माहित असतात का, असा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर २०१२पासून वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई वाढवण्यावर भर दिला आहे.
दंडाच्या रकमेतदेखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. २०११मध्ये जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यांत वाहतूक विभागाने प्रथमच एक लाख १० हजार ८४ वाहनांवर कारवाई करीत एक कोटी २२ लाख चार हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला होता. शहर वाहतूक विभागाची स्थापना झाल्यापासून प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरुपाची कारवाई झाली होती. त्यानंतर २०१२मध्येदेखील बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येवर परिणाम झाला नाही. उलट या वर्षात शहर पोलिसांनी एक लाख ५२ हजार ३१२ वाहनचालकांवर कारवाई करीत एक कोटी ८३ लाख ४३ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला. २०१६मध्ये वाहतूक विभाग बेशिस्त वाहनचालकांविरोधात सुरुवातीपासून आक्रमक राहिला. आर्थिक झळ बसली तर वाहनचालक नियम पाळतील, अशी पोलिसांची अपेक्षा होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पोलिसांनी एक लाख ७९ हजार ८८९ वाहनचालकांवर कारवाई करीत विक्रमी एक कोटी ८९ लाख ९७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. याच वर्षात कोर्टात पाठवण्यात आलेल्या ६८२ पैकी ५६६ वाहनचालकांना कोर्टाने १२ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा दंड सुनावला आहे.

वाहनांची वाढती संख्या आणि त्यात बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण यामुळे दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढले आहे. आता तर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठी रक्कम दंड स्वरुपात आकारली जाणार आहे. वाहनचालकांनी नियमांचे कसोशिने पालन करणे, हेच उत्तम आहे. पोलिस टार्गेटनुसार नाही, तर वाहनचालकांच्या बेशिस्तीनुसार कारवाई करतात.
-जयंत बजबळे,
सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रक्षोभक पोस्टप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी एका युवकास अटक केली आहे. त्याच्याविरोधात कलम २९५ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश पाटील असे संशयित युवकाचे नाव आहे. पाटीलने १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एक प्रक्षोभक मजकूर फेसबुकवर पोस्ट केला. याची माहिती उपद्रेंनगर येथील साईग्राममध्ये राहणाऱ्या स्वप्नील पंड‌ित तायडे यांना समजताच त्यांनी अंबड पोलिस स्टेशनला माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ पाटीलविरोधात गुन्हा दाखल करीत फेसबुकवरील ती पोस्ट हटवली. यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. घटनेचा अधिक तपास पीएसआय चव्हाण करीत आहे.
पाथर्डी फाट्याला घरफोडी
पाथर्डी फाटा येथील विक्रीकर भवनरोडवरील प्रशांतनगर येथील बंद बंगल्याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील एलईडी टीव्ही, गॅस सिलेंडर, ड‌िज‌िटल कॅमेरा, रोख रक्कम असा मिळून ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी सुनील दिगंबर क्षीरसागर यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
देशी-विदेशी मद्य जप्त
मद्य विक्रीस बंदी असताना अवैध पध्दतीने देशी विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या दोघांना नाशिकरोड तसेच म्हसरूळ पोलिसांनी गजाआड केले आहे. शहरात शनिवारी सर्व प्रकारच्या मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली होती. मात्र, दसक-जेलरोडवरील मामाज् हॉटेलशेजारी एका पत्र्याच्या टपरीलगत विजय सुरेश बुऱ्हाडे मद्यविक्री करताना आढळून आला. बुऱ्हाडेकडे १० व्हिस्कीच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिस नाईक भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत. अवैध मद्यविक्रीचा आणखी एक गुन्हा म्हसरूळ पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी क्रांतीनगर येथील उद्य कॉलनीत राहणाऱ्या राकेश साहेब आंधळेवर मद्यविक्री प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक शरद लहू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आंधळेवर म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाचडगावचा बिबट्या अखेर सरकारी पाहुणचारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

तालुक्यातील उमराळे बुद्रुक व चाचडगाव परिसरात तीन जनावरे फस्त करत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला आहे. मात्र, अजूनही बिबट्याची भीती ग्रामस्थांमध्ये कायम आहे.
गेल्या महिनाभरात दोन वासरे व एका बैलाची या बिबट्याने शिकार केले होती. त्यामुळे परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चाचडगाव येथील विलास पेलमहाले यांच्या मळ्यात एकाच आठवड्यात दोन वासरे व एक बैल बिबट्याने ठार केला होता. त्यानंतर येथील भागात पिंजरा लावण्यात आला होता. उमराळे शिवारात नाशिक-पेठ महामार्गालगत वास्तव्य असलेले शेतकरी अशोक गायकवाड यांच्या शेतानज‌िकच्या गोठ्याजवळ गाई-बैल बांधण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास या बैलावर बिबट्याने हल्ला चढवत त्यास ठार केले. सकाळी ही बाब लक्षात येताच गायकवाड यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाचे कर्मचारी महाले यांनी पंचनामा केला होता. अखेर चाचडगाव येथील विलास पेलमहाले यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी सायंकाळी अंदाजे चार वर्ष नर बिबट्या अडकला. त्यामुळे नागरिकांनी तुर्तास सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी, अजूनही बिबट्या असू शकतो अशी भीती कायम आहे. शेतमळ्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून पिंजरा कायम ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटे-वाजे गटाची प्रतिष्ठा पणाला

$
0
0

सिन्नरमध्ये भाजपचा प्रभागांमध्ये प्रचारसभांवर जोर; ‌शिवसेनेचा मात्र चौकसभांवर भर

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपालिका निवडणुकीत भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रभागांमध्ये सभा घेण्याचा धडाका लावला आहे. तर, शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे हे वैयक्तिक गाठीभेटी घेऊन भ्रष्टाचारमुक्त नगरपालिकेच्या कारभारासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत.

सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला असून, माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. यामुळे आमदार राजाभाऊ वाजे यांनीही कंबर कसली असून, आक्रमक पवित्रा घेत चौक सभांवर जोर देत आहेत. कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियाचा आधार घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप यांच्या युतीतर्फे जिल्हा नेत्यांची पहिली नारळ वाढवण्याची सभा वागळता उमेदवारांनीच वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत प्रचार सुरू ठेवला आहे. मनसेने नगराध्यक्षपदांसह काही ठिकाणी उमेदवार दिलेले असताना आजपर्यंत कोणताही जिल्हा नेता या निवडणुकीत प्रचारासाठी आलेला नाही. त्यातच मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी सिन्नर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसैनिक सैरभैर झाले आहेत.

या निवडणुकीत नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यातर्फे माजी नगरसेवक अशोक मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने नवीन व शिक्षित चेहरा किरण डगळे यांना निवडणुकीत उतरवले आहे. काँग्रेस आघाडीतर्फे विद्यमान नगरसेविका लता हिले यांना उमेदवारी दिली असून, त्या माणिकराव कोकाटे यांच्या समर्थक नगरसेवक होत्या. भाजपतर्फे उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी केलेली आहे. मनसेतर्फे राजेंद्र बोरसे या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली. अपक्ष म्हणून वसंतबाबा नाईक रिंगणात आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपद खेचून घेण्यास कोकाटे व वाजे गटांनी मोठी ताकद लावली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक मोरे यांना निवडून द्यावे, यासाठी कोकाटे यांनी प्रचारावर जोर दिला आहे. किरण डगळे यांच्यासाठी वाजे यांनी वजन खर्ची घातले आहे.

बहुरंगी लढत

सिन्नरची ही निवडणूक बहुरंगी होत असून भाजप, शिवसेना समोरासमोर ठाकले आहेत. त्यांच्या समोर काँग्रेस, राष्ट्रवादी व माकप यांची युती तर मनसेचे काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात प्रचाराने धरला जोर

$
0
0

उमेदवारांकडून मतदारांना साद

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या लढतीबरोबरच १२ प्रभागातील नगरसेवकपदाच्या एकूण २४ जागांसाठी आता प्रचाराचा ज्वर दिवसागणिक वाढू लागला आहे. निवडणूक मैदानात उतरलेल्या जवळपास सर्वच उमेदवारांचा फौजफाटा आता प्रचारासाठी रस्त्यावर उतरला आहे. आपापल्या प्रभागातील घर अन् घर अक्षरशः पिंजून काढतानाच ‘ताई, मावशी, आक्का...भाऊ, दादा, काका’ अशी साद कानी पडत आहे. निवडणुकीतील या रणसंग्रामातील प्रचाराची लगीनघाई चांगलीच जोम धरू लागतानाच अनेकांच्या प्रचाराचा रथदेखील दारोदार धडकताना दिसत आहे. ध्वनीक्षेपकावरून या प्रचाररथाद्वारे मतदारांना साद घातली जात आहे.

येवला नगरपालिकेची यावेळची पंचवार्षिक निवडणूक लक्षवेधी ठरतानाच सध्या प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीसह पालिकेच्या नगरसेवकपदाच्या एकूण २४ जागांसाठी एकूण १०३ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी गेल्या काही दिवसांत आपल्या पायाला जणू काही भिंगरी बांधल्याचं चित्र उडालेल्या प्रचाराच्या धुराळ्यातून स्पष्ट दिसत आहे. प्रचारातील घरोघरच्या या भेटीत प्रभागातील मतदारांना आपलंस करण्यासाठी वेगवेगळे फंडेदेखील वापरतानाचे चित्र दिसत आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीसह

अनेक प्रभागांमध्ये मोठी रस्सीखेच होणार आहे.

काँग्रेसचे उमेदवार एजाज शेख यांनी तर गेल्या दोन-चार दिवसात प्रचारात मोठी मुसंडी मारल्याचेही दिसत आहे. एजाज शेख यांनी प्रचारादरम्यान मुस्लिम व्होटबँकेवर मुख्यत्वे डोळा ठेवल्याचे बोलले जात आहे. पालिकेत सत्तारूढ असलेल्या राष्ट्रवादीने विकासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालवला आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीने राष्ट्रवादीच्या गेल्या दहा वर्षांतील सत्ता काळात न सुटलेले अनेक प्रश्न व समस्यांकडे बोट दाखवत युतीला साथ देण्याचे शहरवासीयांना साकडे घातले आहे. येवला शहरात मुस्लिम समाजाची जवळपास नऊ हजारांच्या आसपास एकगठ्ठा मते असून, या मतांच्या एकगठ्यावर नेमका कोण डल्ला मारतो, यावरच निकालाचं गणित अवलंबून असणार आहे.

पालिकेच्या मोजक्या काही प्रभागातच दुरंगी व तिरंगी लढती होत असून, अनेक प्रभागात चौरंगी, पंचरंगी लढती नजरेत दिसत आहेत. काही ठिकाणी बहुरंगी लढतीमुळे मतविभागणी ही निर्णायक ठरणार असल्याने नेमकी कुणाची मतविभागणी कुणाच्या पथ्यावर पडते याबद्दल शहरवासीयांना मोठी उत्कंठा आहे. बारा प्रभागातील २४ जागांवर रिंगणात असलेल्या १०३ उमेदवारांपैकी अनेक चेहरे हे नवीन असून, यापैकी बहुतांश उमेदवार केवळ रिंगणात आहेत. विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतेमंडळींनी देखील आपापल्या उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी केली असून, पालिकेच्या या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागण्याचे स्पष्ट दिसत आहे. मोठ्या भुजबळांशिवाय होणारी ही निवडणूक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे. यामुळे या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरंगी लढतीमुळे चुरस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १५ प्रभागांच्या ३१ नगरसेवकपदांसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. शहरातील प्रभाग ११ अ मधील महिला राखीव गटातील लढत लक्षवेधी होणार असल्याची चिन्हे आहेत. या प्रभागात तीन महिला निवडणुकीत आमनेसामने असून, या तिरंगी लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग ११ अ मध्ये मध्यमवर्गीय नोकरदार, सुशिक्षित मतदारांचा समावेश आहे. मनमाडमधील शिवाजीनगर, संभाजीनगर, हुडको, आठ हजार विभाग, फिल्टर हाऊस, आनंद विहार असा मोठा भाग या प्रभागात सामावलेला आहे. विविध जाती-धर्मांच्या मतदारांचा सहभाग हे या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे. संमिश्र अशा या प्रभागात यंदा महिला राखीव गटात राष्ट्रवादीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार व विद्यमान नगरसेविका रुपाली पगारे या नगरसेवकपदासाठी पुन्हा नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या काजल नारायण पवार आणि अपक्ष उमेदवार शोभा दिलीप नरवडे यांनी आव्हान उभे केले आहे. तिन्ही उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी उघडून आपली दावेदारी उभी केली आहे.

तिन्ही उमेदवार तुल्यबळ

तिरंगी लढतीत राजकीय हितसंबंध व ताकद यात तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. भाजपसाठी झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा काजल पवार यांची जमेची बाजू आहे. तर या प्रभागात नवरात्र, गणेशोत्सव उपक्रमांनिमित्त जमवलेला जनसंपर्क राजाभाऊ पगारे यांचे सर्व जाती धर्मातील लोकांशी असलेले संबंध ही रुपाली पगारे यांना तारक ठरू शकते. अद्याप पालिकेत निवडून न गेलेला नवा चेहरा या आपल्या वेगळेपणाचा फायदा शोभा नरवडे किती उठवतात, शिवसेनेची त्यांना कशी साथ मिळते यावर या प्रभागाचे गणित अवलंबून आहे. नरवडे किती मते घेतात यावर पगारे व पवार यांचे भवितव्य अवलंबून आहे. प्रस्थापित की नवा उमेदवार हा मुद्दा या तिरंगी लढतीत कळीचा ठरू शकेल.

राजकीय वारसा

रुपाली पगारे यांना राजकीय वारसा आहे. त्यांचे सासरे डी. के. पगारे हे शहराचे माजी नगराध्यक्ष होते. तसेच पती राजेंद्र पगारे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष आहेत. काजल पवार यांचे पती भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, भाजप शहराध्यक्ष ते भाजप जिल्हा चिटणीस असा त्यांचा यशस्वी प्रवास आहे. शोभा नरवडे यांचे पती दिलीप नरवडे हे रिपाइंचे शहराध्यक्ष असून, शिक्षण मंडळ सभापती म्हणून त्यांनी पद भूषविले आहे. एकूणच ११ अ मधील तिन्ही महिला उमेदवारांचा राजकारणाशी जवळचा संबंध असून, ही लढाई दिग्गजांची लढाई मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयकर विभागाच्या जिल्ह्यात नोट‌िसा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्राप्तीकर विभागाने सक्रिय होऊन मोठ्या रकमा बँकेत जमा करणाऱ्यांना नोट‌सिा धाडणे सुरू केले आहे. संबंध‌ति खातेधारकांना शनिवारीच नोटीसा पाठवण्यात आल्याच्या चर्चेने खळबळ निर्माण झाली आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मात्र आयकर विभागाने दिली नाही. ‘बँकेत जमा केलेल्या पैशांचा स्रोत काय’, अशी विचारणा करण्यात आली असल्याचे बोलले जात असले तरी त्या नोट‌सिा नेमक्या कोणाला पाठवण्यात आल्या हे गोपनीय ठेवण्यात आले आहे.

प्राप्तीकर विभागाने चौकशीचा धडाका सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक खातेधारकांना धडकी भरली आहे. काहींनी अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम खात्यावर भरले असल्याने त्यांना पैशांच्या स्त्रोताबाबत विचारणार करण्यात आली आहे. प्राप्तीकर कायद्याच्या कलम १३३ (६) (माहिती मागविण्याचा अधिकार) अंतर्गत खातेधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. अडीच लाखांहून अधिकची जमा झालेली रक्कम अनियमित किंवा संशयित वाटणारी विशिष्ट प्रकरणे बँकांनी कळवल्यानंतर या नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात या अगोदर अघोषित उत्पन्न योजनेत प्राप्तीकर विभागाने सर्व्हे केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर पुन्हा या नोट‌सिा पाठव‌ण्यिात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ फाइल प्रकरणात एफआयआर नाहीच

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयातील एका वादग्रस्त फाइलमधील तब्बल १८० पाने चोरीला जाऊन २५ दिवस उलटल्यानंतरही या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही. एमआयडीसीने सातपूर पोलिस स्टेशनमध्ये केवळ तक्रार अर्ज देऊन जबाबदारी झटकली आहे. मात्र यामुळे पोलिसांनाही तपासात अडचणी येत आहेत. या प्रकरणात एमआयडीसीने एफआयआर द्यावी, असे पोलिस सांगत असले तरी महामंडळातील अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलून या प्रकरणी बचावत्मक भूमिका घेत असल्यामुळे फाइल घोटाळा चांगलेच रंगू लागले आहे. दरम्यान या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय कारवाईची मागणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई येथील कार्यालयात केली असली तरी एफआयआरबाबत अधिकारी मात्र गप्प आहेत.

विशेष म्हणजे महामंडळातून फाइल चोरीला गेली असल्याची माहिती महामंडळाकडे असताना पोलिसांना मात्र गहाळ झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आरोपी असून, त्यात फाइल गायब करणारा, चावी देणारा व त्यानंतर ज्यासाठी ही फाइल गायब केली तो आरोपी आहे. याबाबत पोलिसांनी जुजबी माहिती गोळा केली असून, त्यात ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, कोट्यवधीचा घोटाळा झालेल्या या प्रकरणात कसून चौकशी करून संबंधितावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी काही उद्योजकांनी केली आहे. या कागदपत्र गहाळ प्रकरणी मुंबई मुख्यालयातील मोठे अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल असल्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे. तर आतापर्यंत कार्यालयात अशी अनेक प्रकरणे घडली असून या प्रकरणांचीही चौकशीची मागणी आता उद्योजक करत आहेत.

एमआयडीसी अगोदरच विविध भूखंड घोटाळ्यामुळे अडकली असताना आता हा कागदपत्र घोटाळा नेमका काय यावर चर्चा रंगत आहे. थकबाकी किंवा बांधकाम संबंध‌ति एमआयडीसीची कारवाई सुरू असते ही कारवाई थांबवावी, यासाठी फाइल गायब झाल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​‘सनदी अधिकाऱ्यांचे वेतन वसूल करा’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू झाला असून, राज्य सरकारच्या तिजोरीतून हे वेतन दिले जात आहे. राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांनाही सरकारने आयोगानुसार वेतन देऊ नये, अशी स्पष्ट भुमिका महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने घेतली आहे. अशा अधिकाऱ्यांना वितरीत केलेले वेतन टप्प्याटप्प्याने वसूल करा, अशा मागणीचा ठराव करीत या संघटनेने आयएएस, आयपीएस लॉबीलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांत खटके उडण्याची शक्यता बळावली आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक रविवारी नाशिकमध्ये सरकारी विश्रामगृहावर पार पडली. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ग. दि. कुलथे यांनी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीमध्ये अनेक ठराव करण्यात आले. मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे कुलथे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. केंद्राप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा करावा, सातवा वेतन आयोग येण्यापूर्वी विद्यमान वेतन अडथळे दूर करावेत, प्रशंसनीय कामाबद्दल २००६ पासूनच्या आगाऊ वेतनवाढी सुरू कराव्यात, राजपत्रित अधिकाऱ्यांचे पगार वाढवावेत, सेवानिवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० वर्षे करावे, पेन्शन योजना सुरू ठेवावी आदी मागण्यांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. आयएस अधिकाऱ्यांना दिलेले वेतन टप्प्याटप्प्याने वसूल करावे, अशी मागणी कुलथे यांनी केली.

पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीला अध्यक्ष मनोहर पोकळे, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष विनोद देसाई, शिवाजी मानकर, विनायक लोहाडे, डॉ प्रमोद रक्षमवार, महिला उपाध्यक्ष डॉ. सोनाली कदम, शितल सेवतकर, नाशिक विभागाचे बाळासाहेब घोरपडे, प्रदीप जायभावे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात नेत्यांची वाढली गर्दी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात सहा नगरपालिकेच्या निवडणुका व आगमी पाच महिन्यात होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यात नेत्यांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याने जिल्ह्याचे वातावरणही निवडणूकमय झाले आहे. गेल्या काही दिवसापासून नोटांच्या विषयामुळे निवडणुकीच्या चर्चेला ब्रेक लागला असला तरी जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांमुळे रंग भरले जाऊ लागले आहेत.

जिल्ह्यातील या सहा नगरपालिकांत थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्यामुळे यात स्टार प्रचारक उतरले असून, आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडेसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेसह मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेसह सर्वच पक्षाचे स्टार प्रचारक

येणार आहेत.

नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन व घोषणा करुन निवडणुकीची चाहुल लागल्याचे संकेत दिले आहेत. जिल्ह्यात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप व सेनेला जनेतेने कौल दिला, पण विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपाचे प्रत्येकी चार आमदार निवडून आले तर काँग्रेसचे दोन आमदार विजयी झाले. या निवडणुकीत माकपने एक जागा पटकावली. त्यामुळे संम‌श्रि असलेल्या वर्चस्वामुळे कोणत्याही एकाच पक्षाला सत्ता आजही मिळेल, असे चित्र नाही. नगरपालिकेचे निकाल स्थानिक प्रश्नावर असणार आहेत, तर जिल्हा परिषदेचे सम‌ीकरण वेगळे आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपात काटेकी टक्कर होणार आहे. तर विरोधीपक्ष म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेसने अगोदरच मोट बांधली असून, त्यात इतर मित्र पक्ष साम‌ील करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होईल हे आज सांगणे अवघड आहे.

एकूणच जिल्ह्यात या चारही निवडणुकांमुळे नेत्यांची गर्दी येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुध्दा झडणार आहेत. श्रेयवादावरूनही मित्र पक्षाबरोबच विरोधीपक्षही झगडताना दिसेल. त्यामुळे मतदारांचा गोंधळही उडणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकींना अवघा आठवडा बाकी आहे. त्यामुळे त्यांचे निकाल आल्यानंतर एकूण राजकीय वातावरणात बदल होणार आहे. त्यानंतर महागरपालिका, जिल्हा परिषदेच्या आगमी निवडणुकांचे आराखडे व प्रचाराची पूर्वतयारीसाठी विकासकामांचे उद्घाटन सोहळे सगळीकडे दिसू लागतील. लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अडीच वर्षाच्या अंतरानंतर जिल्ह्यातील प्रत्येक मतदार निवडणुकीसाठी मतदान करणार असल्यामुळे त्यातून जनतेच्या कौलाची दिशाही स्पष्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये दर चार दिवसांनी जुळी!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक ः बाळ जन्माला येण्याची नैसर्गिक प्रक्रिया आधुनिक काळात जेवढी सुलभ, तेवढीच गुंतागुंतीची होते आहे. गेल्या सहा वर्षांत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तब्बल ५८८ जुळ्यांनी जन्म घेतला असून, वर्षागणिक हे प्रमाण वाढत आहे. मूल होण्यासाठी दीर्घकाळ औषधोपाचारामुळे जुळे होण्याची शक्यता ९५ टक्के अधिक असते. नैसर्गिक पद्धतीने जुळे होण्याचे प्रमाण अवघे पाच टक्के असते.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची भावना अनेकांना सहन होत नाही. सरकारी काम अन् पाच महिने थांब, अशी सार्वत्रिक समज सिव्हिल हॉस्पिटलबाबत मनात डोकावली नाही तर नवलच! मात्र, याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २०१०-११ ते २०१५-१६ या कालावधीत तब्बल ४०५ जुळ्यांनी जन्म घेतला. विशेष म्हणजे या प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्या आहेत. याच कालावधीत १८३ जुळ्यांनी सिझेरियननंतर पहिला श्वास घेतला. सरासरी चार दिवसांनी जुळ्यांचा जन्म झाल्याचे दिसते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दरवर्षी सरासरी सात हजार प्रसूती होतात. त्यात जुळ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले. गर्भाशयात जुळे तयार होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही वर्षांपासून त्यावर औषधांचा विपरित परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक अवघ्या पाच टक्के केसेसमध्ये नैसर्गिक पद्धतीने जुळे तयार होतात. मूल होण्यासाठी घेतली जाणारी औषधे, तसेच इंजेक्शनमुळे जुळे तयार होण्याची शक्यता ९५ टक्क्यांपर्यंत वाढते. अनेकदा अत्यंत गुंतागुंतीच्या किंवा शेवटच्या क्षणी पेशंटला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. त्या वेळी जीव वाचवण्यास प्राधान्य म्हणून सिझेरियनचा पर्याय वापरला जातो; अन्यथा जुळे किंवा तिळे असले तरी आम्ही नैसर्गिक प्रसूतीवरच भर देत असल्याचे डॉ. लहाडे यांनी सांगितले.

सर्वाधिक जुळ्यांचे गाव कोडिन्ही!

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही हे आशियातील सर्वाधिक जुळ्यांचे गाव आहे. दोन हजार लोकवस्तीच्या या गावात ३५० जुळी मुले आहेत. या गावात एक हजार मुलांमागे ४५ जुळी जन्मतात. मात्र, येथे जुळी मुले होण्याचे कारण दीर्घकाळ औषधोपचाराचे नसून, नैसर्गिक आहे. या गावात जुळ्यांचे प्रमाण एवढे जास्त का आहे, यामागचे कारण अद्याप उकललेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर केव्हा होणार जागे?

$
0
0


वसंत कुरुप, मटा वाचक

मी जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये फिरतो, तेव्हा तेव्हा मला असंख्य नाशिककरांच्या वागणुकीचे आश्चर्य वाटते. खरे तर नाशिकवर कोणीही मनापासून प्रेम करताना दिसत नाही. बहुतांश नेते, लोक, महापालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन हे अापापले काम पुरेशा जबाबदारीने करताना दिसत नाहीत. त्यामुळेच नाशिकची एवढी दुरवस्था होत आहे.

मी आतापर्यंत पाच-सहा वेळा ‘मटा’च्या सिटीझन रिपोर्टर अॅपच्या माध्यमातून काही विषय मांडले होते. पण, त्यांची योग्य दखलच घेतली गेलेली नाही. आजही महापालिकेचे कर्मचारी असंख्य ठिकाणी कचरा रस्त्यावरच जाळतात. गुरे-ढोरे रस्त्याच्या मध्येच बसलेली दिसतात. लोक जेथे ‘कचरा टाकू नये’ अशी पाटी लावलेली आहे तेथेच कचरा आणून टाकतात. गोदावरी नदी व तिच्या तीरावर किती तरी वेळा स्वच्छता अभियान राबविले गेले. कोर्टनेही आदेश दिलेला आहे. पण, तरीही गोदावरीकडे बघवत नाही. कोणत्याही सिग्नलवर असंख्य वाहनचालक सिग्नल तोडताना दिसतात. हे कशामुळे घडत आहे? जर यासाठी यंत्रणा असेल, तर ती सुस्त, आळशी व बेजबाबदार झालेली आहे, याचेच हे द्योतक म्हणावे लागले. मुख्यमंत्री, व्हीआयपी येणार असे कळले, तर सर्व रस्ते साफ, चकाचक होतात. त्यावेळी सर्वजण कसे आपापले कर्तव्य बरोबर पार पाडतात? याचा अर्थ इतर वेळी मनापासून कोणीही काम करत नाही. आपण नाशिककर फार भाग्यवान आहात. नाशिकसारखी हवा, पाणी, निसर्गसौंदर्य कोठेच नाही, त्यामुळे मी सर्व नाशिककरांना विनंती करू इच्छितो, की नाशिक आपले आहे व मी यावर नितांत प्रेम करतो, अशा भावनेला बळकटी द्या. येथील नद्या, रस्ते, गल्ली, चौक कोठेही घाण-कचरा टाकणार नाही व कोणालाही टाकू देणार नाही, सिग्नल तोडणार नाही आदींची सुरुवात स्वतःपासूनच करून सुंदर नाशिक बनविण्यासाठी पुढाकार घेईन, असा निर्धार करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीमुळे शहर विकासाला खीळ

$
0
0

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी गत दोन वर्षांपासून विकासकामांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविलेले नाहीत. त्यामुळे शहर विकासासापासून दूर राहिले. आपण मुख्यमंत्र्यांकडून शहरविकासासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून, अवघ्या काही दिवसांत हा विकासनिधी पालिकेत सत्ता स्थापन करणाऱ्या येणाऱ्या नव्या सत्ताधारी पक्षाकडे येईल, असा आत्मविश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.

सटाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब जगन्नाथ सोनवणे व प्रभागतील २१ उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयेजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव होते.

डॉ. सुभाष भामरे म्हणाले, गत दोन वर्षांत आपण सटाणा शहरासह तालुक्यात विकासकामांसाठी सर्वाधिक निधी दिला आहे. मात्र पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असल्याने त्यांनी विकासकामांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले नाहीत. लोकप्रतिनिधी या नात्याने शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने लवकरच शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. शहरातील बहुचर्चित बायपास प्रश्नासाठी निधी मंजूर केला आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे त्यालाही खीळ बसला आहे. शहरातून लवकरच आता चौपदरी महामार्ग जात असून, बायपासलादेखील मंजुरी मिळाली आहे.

तालुक्यातील हरणबारी डावा उजवा कालवा, तळवाडे भामेर पोहच कालव्यासाठी निधी मंजूर केला आहे. शहरातील आरम नदीवर पाच केटीवेअर मंजूर केले असून ते देखील लवकरच उभारण्यात येतील. पालिकेची सत्ता भाजपच्या हाती दिल्यास निश्चितपणे शहराचा विकास बघावयास मिळेल, असा आशावाद डॉ. भामरे यांनी शेवटी व्यक्त केला. पालिकेतील माफियाराज व झेरॉक्स नगरसेवकांनी शहर विकासाची वाट लावली असल्याचा आरोप नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब सोनवणे यांनी केला. दादा जाधव, डॉ. विलास बच्छाव, हिरामण गवळी, मुन्नादादा रावल, गटनेता साहेबराव सोनवणे यांची भाषणे झाली. व्यासपिठावर बाजार समिती सभापती रमेश देवरे, समकोचे माजी चेअरमन श्रीधर कोठावदे, बिंदूशेठ शर्मा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images