Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रब्बीची १०० टक्के पेरणी

$
0
0

कडाक्याच्या थंडीचा मालेगाव तालुक्यातील पिकांना फायदा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

यंदा पावसाने मेहरबानी केल्याने खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातदेखील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मालेगाव तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणीची कामे पूर्ण झाली असून, दोन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्के पेरणी झाली आहे. यंदा थंडीचा जोर चांगला वाढल्याने रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, कांदा पिकांची लागवड झाल्याने शेत पुन्हा हिरवीगार दिसू लागली आहेत. रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने ८ हजार ५१० हेक्टर इतके सर्व साधारण पेरणी उद्दिष्ट निश्चित केले होते. प्रत्यक्ष पेरणीत मात्र ८ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याने दोन वर्षांनंतर पेरणीचा आकडा १०१ टक्क्यांवर गेला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांनी दिली.

हरभरा पिकाची प्रत्यक्ष ४ हजार ११३ हेक्टरवर पेरणी झाली असून, ३१३ हेक्टर इतकी वाढ झाली आहे. त्या खालोखाल गव्हाचे क्षेत्र आहे. यात ३ हजार ८०० हेक्टरवर लागवड करण्यात आली असून, गव्हाचे क्षेत्रदेखील ३०० हेक्टरने वाढले आहे.

मंडळनिहाय विचार करता दाभाडी मंडळ क्षेत्रात सर्वाधिक ९८५ हेक्टरवर गहू लागवड करण्यात आली आहे. झोडगे मंडळ क्षेत्रात हरभरा पिकाची सर्वाधिक १ हजार ५७ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गहू, हरभरासोबत मक्याची ६९५ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. कांदा पिकाचे खरीब व रब्बी हंगाम मिळून एकूण १५ हजार हेक्टरवर लागवड होते. यातील ४ हजार हेक्टर लागवड या रब्बी हंगामात झाली आहे. पावसाने यंदा चांगली साथ दिल्याने रब्बी हंगामातील पिकाचे उत्पादन चांगले येईल. यामुळे शेतकरीदेखील समाधानी आहे.

तापमान टिकून

यंदा थंडीत कमालीची वाढ झाली आहे. पारा ९ ते १३ अंश सेल्सिअसदरम्यान राहत असल्याने या कडक्याच्या थंडीने रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे यंदा सर्वच पिके जोमात असून, उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दोन विवाहित महिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. निमगुले येथील शीतल प्रशांत कदम (वय २५), तर जेऊर येथील रोहिणी बाबाजी सांगळे (वय २२) अशी या मृत विवाहितांची नावे आहेत. निमगुले येथील मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने, तर जेऊर येथील मृत विवाहितेच्या नातेवाईकांनीही गर्दी केल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तालुक्यातील खायदे येथील शरद कौतिक देवरे यांची कन्या शीतल हिचा २०१३ मध्ये निमगुले येथील पोलिसपाटील प्रशांत गंगाधर कदम याच्याशी विवाह झाला होता. मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्या वैवाहीक जीवनात तणाव निर्माण झाले होते. शनिवारी (१० डिसेंबर) रात्री शीतल हिची प्रकृती खराब झाल्याचे कारण देत उपचारासाठी तिला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. याबाबत शीतलच्या बहिणीस फोनवरून माहिती दिली. यानंतर तिचे आईवडील अन्य नातेवाईक रुग्णालयात रात्री उशिरा पोहोचले असता, डॉक्टरांनी उपचार सुरू असल्याचे सांगत तिला भेटण्यास नकार दिला. या दरम्यान शीतलने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सासरच्या मंडळीकडून सांगण्यात आले. रात्री उशिरा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, रविवारी (११ डिसेंबर) सकाळी तिचा मृतदेह सासरच्या मंडळीने शवविच्छेदानासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात आणला. यावेळी मृत महिलेचे नातेवाईक व सासरच्या मंडळीत वादावादी झाली. मृत विवाहितेचे वडील, आई, मावशी यांनी सासरच्या लोकांनी शीतलला फास लावून खून केल्याचा आरोप करीत तिचा नवरा व सासरच्या मंडळीना अटक करावी. शवविच्छेदन करू नये, अशी भूमिका घेत ठिय्या मांडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर यांनी मृत महिलेच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, तसेच मृत्यूचे खरे कारण समजण्यासाठी शवविच्छेदन करू द्यावे असे सांगितले. यानंतर नातेवाईकांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते.

जेऊर येथेही विवाहितेचा

दुसरी घटना जेऊर येथे घडली. विवाहित रोहिणी बाबाजी सांगळे (वय २२) हिचा देखील विहिरीत पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.तिचा मृतदेह शवविच्छेदानासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी पिंपळकोठे येथील माहेरच्या नातेवाईकांनी रुणालयात गर्दी केली होती. दुपारी उशिरा तिचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांवर आली टोमॅटो फेकण्याची वेळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्या टोमॅटोला दर मिळत नसल्याने वाहतूक खर्चही सुटत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे. बाजार सुधारेल केवळ या आशेवर झाडे जगवण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहेत.

गतवर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. यावर्षी पाऊस चांगल्या झाल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. या भरवशावर मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड झाली. बाजारात टोमॅटो व्रिकीसाठी आले आणि नोटाबंदी झाली. परिणामत: बाजारात टोमॅटोसह सर्वच शेतमालाचे दर कोसळले आहेत. टोमॅटोच्या प्रति जाळीला १० ते २० रुपये मजुरी खर्च तर वाहतूक खर्च २० रुपये येतो. अशा प्रकारे टोमॅटोची जाळी बाजारात नेईपर्यंत किमान ४० रुपये खर्च होता. मात्र बाजारात एका जाळीला अवघा १० ते २० रुपये भाव मिळत आहे. एकूणच वाहतूक खर्चदेखील निघत नसल्याने टोमॅटो जागेवर फेकले जात आहेत. टोमॅटो पीक लागवडीसह देखभाल करताना खर्चिक आहे. बाजारात औषधांच्या किंमती भरमसाट वाढल्या आहेत. यामुळे खर्च वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या खूनप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोडवरील तुळजाभवानी नगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. त्यापैकी दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, एका अल्पवयीन संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

परिसरातील अ‍ॅक्वा इमारतीसमोर शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अक्षय नाना घुले (रा. उगले चाळ, हमालवाडी, पेठरोड) धारदार हत्याराने निर्घृणपणे वार करण्यात आले. या हल्ल्यात अक्षयचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री उश‌िरा सागर रामेश्वर आंबेकर, आकाश सुभाष खैरनार आणि अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. त्यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले. सागर आणि आकाश यांना सात दिवस पोलिस कोठडी तर अल्पवयीन संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्पवयीन संशयित आरोपींपैकीच एकाचा भाऊ आहे.

तुमचा मित्र आमच्या बहिणीची छेडछाड काढतो आणि तुम्ही त्याला मदत करता, असे म्हणत संशयितांनी अक्षय याच्यासोबत वाद घातला. हा वाद वाढल्याने त्यांनी अक्षयवर धारधार शस्त्राने वार केले. पूर्वीही त्यांची आपापसात भांडणेही झाली होती, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय वेळेनंतर बँक सुरू ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हजार आणि पाचशेच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना गेल्या महिनाभरापासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिक्षक वर्गही या समस्येने हैराण झाला असून बँकेत पगार जमा झाला असूनही हातात पैसा नसल्याने दैनंदिन खर्चावरही बंधने येत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दैनंदिन कामकाज सोडून बँकांच्या रांगांमध्ये उभे राहणे शक्य नसल्याने शालेय वेळेनंतर बँकांची सुविधा शिक्षकांना मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेने केली आहे.

डिसेंबरच्या १-२ तारखेलाच शिक्षकांचे पगार वर्ग होऊनही आपलेच पैसे काढण्यासाठी बंधने येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. शालेय अध्यापनाचे दैनंदिन कामकाज सोडून तास न् तास बँकेच्या रांगेत उभे राहणे शक्य होत नसल्याने जिल्हा बँकेच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत बदल करून शालेय वेळेनंतर शिक्षकांना आर्थिक व्यवहारासाठी सायंकाळचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रा शाम पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल निकम, कोष्याध्यक्ष मधुकर पवार, एनडीएसटी सोसायटीचे अध्यक्ष हेमंत देशमुख आदींनी केली आहे. सरकारच्या सातत्याने बदलणाऱ्या शैक्षणिक धोरणांमुळे दैनंदिन कामाचा अतिरिक्त भार शिक्षकांना सांभाळने एकीकडे अवघड झाले असतांना त्यामध्ये बँकेतून पगार काढण्यासाठी शालेय वेळेत बँकेत जाऊन रांगेत पैसे काढणे शक्य होत नसल्याने, पगार खात्यावर जमा असूनही हाताशी मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे दैनंदिन जीवनात अनेक आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत असल्याने शिक्षक वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याला पर्यायी व्यवस्था म्हणून बँकेच्या वेळेत बदल करून कर्मचाऱ्यांचा पगार अदा करण्याची व्यवस्था करावी अन्यथा जिल्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तीव्र आंदोलन पुकारुन रस्त्यावर येतील असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीवदया’तून होतेय पक्षी संवर्धन

$
0
0

वडनेर खाकुर्डीत केली घरटे आणि दाणापाण्याची सोय

तुषार देसले, मालेगाव

खाकी वर्दीतील माणुस म्हटले, की अत्यंत कठोर आणि कायद्याचे रक्षक अशी एक प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. पण याच खाकीवर्दीतही संवेदनशील माणूस दडलेला असू शकतो. अशाच एका खाकीवर्दीतील माणसाच्या संकल्पनेतून पोलिस ठाण्याच्या परिसरातील पक्षांना हक्काचे घरटे आणि दाणापाणी देणारा जीवदया उपक्रम सुरू झाला आहे. यामुळे कायद्याचे रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांची निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षक अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे.

तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याच्या परिसरात सध्या जागोजागी लावण्यात आलेली कृत्रिम घरटी आणि दाणादानी (बर्ड फिडर) अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहेत. या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या संकल्पनेतून वेगळ्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. नुकतेच वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक नखाते यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

करंजगव्हाण येथील एका गोशाळेला भेट दिल्यावर येथील पक्षांचा वावर आणि चिवचिवाटाने सुखावलेल्या बोरसे यांना आपल्या कार्यक्षेत्रातदेखील पक्षांसाठी आपण काही तरी करायला हवे असे वाटले. पोलिस ठाण्यातील उद्यानाचे उद्घाटन तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यांनी यासाठी प्रेरणा दिली. यातूनच मग जीवदया या उपक्रमाला सुरुवात झाली.

पक्षांसाठी कृत्रिम घरटे तयार करण्यासाठी डाळिंबासाठी लागणारे कागदी खोके शेतकऱ्यांनी दिली. त्यांचा पुनर्वापर करून यातून छानशी घरटी तयार करण्यात आली. यावर पक्षी वाचवण्यासंबंधीची बोधवाक्य लिहून ते अधिक आकर्षक बनविण्यात आली. बाजारात रेडिमेड दाणादाणी(बर्ड फिडर) उपलब्ध होत असतात. त्याचेच डिझाइन घेत वापरात नसलेल्या वॉटर बॉटलचा वापर करून ही दाणादाणी तयार करून घेतली. आज वडनेर खाकुर्डी गावातील गणेश मंदिर, महादेव मंदिर, शासकीय दवाखाना परिसरात हे शंभरहून अधिक घरटे व दाणी लावण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून, यासाठी गावातील डॉ. गणेश पाटील, चेतन देवरे, प्रफुल्ल जैन, पवन ठाकरे, जितू पाटील, चेतन देवरे, संजय पवार, अनिल शोरोळे, डाळिंब उत्पादक शेतकरी, पोलिसमित्र यांनी सहकार्य केले आहे. यामुळे परिसरातील पक्षांचा वावर हळूहळू वाढू लागला आहे.

विज्ञान युगात माणूस निसर्गापासून दुरावत चालला आहे. याचा फटका प्राणी-पक्षांनादेखील बसला आहे. कावळा, चिमणी यासारखे पक्षीदेखील दुर्मिळ होत आहेत. या विचारातून पर्यावरण आणि पक्षीसंवर्धन व्हावे, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

- संदीपकुमार बोरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक

गावपरिसरात कायदा सुव्यवस्था सांभाळताना भूतदया भावनेतून पोलिसांनी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. यासाठी गावकऱ्यांनीदेखील योगदान दिले आहे. यामुळे परिसरातील पक्षांचा वावरदेखील वाढला आहे.- चेतन देवरे, ग्रामस्थ

बोधवाक्यांनी आवाहन

या उपक्रमात तयार करण्यात आलेली बोधवाक्यदेखील अर्थपूर्ण आहेत. तुमच्या प्रगतीने आमची पिढी कमी झाली, तुमच्या मुलांना पुन्हा चिवचिवाट ऐकवायचा असेल तर आम्हाला जगावा अशी वाक्य घरट्यांवर लावण्यात आली आहेत. हा उपक्रम सोशल मीडियावरही व्‍हायरल झाला असून, बोधवाक्याच्या इमेज अनेकांनी शेअर करून सेव्ह ट्री, सेव बर्ड असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्यांमुळे एटीएम कॅशलेस!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तीन दिवसांच्या सलग सुट्या आल्यामुळे एटीएमवर भिस्त असलेल्या कार्डधारकांची रविवारी घोर निराशा झाली. शहरातील बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे खडखडाट होता. काही एटीएमवर कॅश असली तरी तेथे मोठ्या रांगा होत्या. त्यामुळे सुटीच्या दुसऱ्याच दिवशी शहरात कॅश शॉर्टेजमुळे अडचणींत भर घातली. शनिवारी सुरू असलेले एटीएम रविवारी बंद असल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला.

सुटीच्या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्टेट बँकेसह काही बँकांनी एटीएम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पण तो दुसऱ्याच दिवशी फोल ठरला. पाचशे व हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर रिकॅलिब्रेशनच्या नावाखाली जिल्ह्यातील ९०३ एटीएमपैकी बँकांच्या शाखांजवळ असलेली एटीएम सुरू झाली. त्यानंतर काही एटीएमचे रिकॅलिब्रेशन झाले पण बँकांतील कॅश शॉर्टेजमुळे १० टक्केच एटीएम सुरू होऊ शकले. त्यानंतर हे एटीएम पुन्हा बंद पडल्यामुळे ग्राहकांचा संताप वाढला आहे. एटीएम केंद्रात दोन वेळा कॅश टाकली तर एटीएम केंद्र दिवसभर सुरू असते. पण बहुतांश एटीएम केंद्रांवर एकाच वेळेस कॅश टाकली जात होती. त्यामुळे ती लवकर संपून जात होती.

नोटा रद्द झाल्यानंतर पहिल्याच पगाराचे बँकेत पुरेशी कॅश नसल्यामुळे वेतनदारांना रेशनिंगने पैसे मिळाले. त्यामुळे कॅशची चणचण सर्वांना भासत असताना सर्वांनाच एटीएमचा आधार होता. त्यात रविवार असल्यामुळे अनेकांकडे पैसे काढण्यासाठी वेळ होता. पण एटीएमची स्थिती बघून त्यांचाही हिरमोड झाला. सोमवारी ईदमुळे सुटी आहे. त्यानंतर मंगळवारी बँका सुरू होणार असून, त्यावेळीही प्रचंड गर्दी असणार आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहारावरच आता सर्वांची भिस्त असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे मार्गावर वाहतूक तीन तास ठप्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राख वाहून नेणाऱ्या ट्रकचा पाटा चेहेडी येथील दारणा नदीच्या पुलावर तुटल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक रविवारी दुपारी तीन तास ठप्प झाली. यामुळे प्रवाशी आणि वाहनचालकांचे हाल झाले.

रविवारी दुपारी नाशिकरोडहून सिन्नरकडे राख वाहून नेणाऱ्या ट्रकचा दारणा नदीच्या पुलावर पाटा तुटल्याने तो जागेवरच थांबला. चालकाला ट्रक पुढे नेणे अवघड झाले. पुलावरच ट्रक अडकल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. चेहेडी पूल ते सिन्नर फाटा, शिंदे, पळसेपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. नाशिकरोड पोलिस, वाहतूक शाखेचे कर्मचारी व बीट मार्शल यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे खासगी वाहनांतील तसेच एसटी बसच्या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. ट्रकच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर तब्बल तीन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. दारणावरील हा पूल जुना झाला असून, त्याचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे शेजारीच नवा पुल उभारला जात आहे. तथाप‌ि, त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी नेहमीचीच झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समृद्ध जीवन’वर नाशकातही गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभर गाजत असलेला समृद्ध जीवन मल्ट‌ि स्नेहसृष्टी कंपनीच्या विरोधात ३६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद गारला पांडू दोंदे होके (रा. वृंदावन नगर, डीजीपीनगर, कामटवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने वेळोवेळी समृद्ध जीवन मल्ट‌ि स्नेहसृष्टी पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी या कंपनीमध्ये १३ महिन्यांच्या गुंतवणुकीवर १२ टक्के व्याजदराच्या परताव्याच्या आमिषाने ३६ लाख ४० हजार ६५५ रुपये गुंतविले. परंतु कंपनी व संचालकांनी व्याजासह मुद्दल रक्कम परत न करता तिचा अपहार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. संशयित महेश मोतेवार, सचिन देवरे (समृद्ध जीवन सोसायटी, मंजिल प्लाझा, दुसरा मजला, गोंविंदनगर) यांच्या विरोधात मुंबई नाका पोल‌िसांनी गुन्हा दाखल केला आहे.


गंगापूर रोडवर चेन स्नॅचिंग

गंगापूररोडलगतच्या पंपिंग स्टेशन परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दोघा चोरट्यांनी हिसकावून नेले. वंदना विलास लोखंडे (रा. शालिमार सोसायटी, गंगापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्या पंपिंग स्टेशन परिसरातील एका खासगी हॉस्पिटलसमोरून चालल्या होत्या. पायी आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यानंतर चोरटे मोटारसायकलवरून पळून गेले. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


इंदिरानगरात मोबाइल चोरी

इंदिरानगर परिसरातील इमारतीच्या फ्लॅटमधून चोरट्याने मोबाइल चोरून नेला. आकाश दीपक जाधव (रा. लक्ष्मी दर्शन अपार्टमेंट, रथचक्र चौक, इंदिरानगर) याने फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास चोरट्याने फ्लॅटचा दरवाजा उघडा असताना १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जादूटोणाप्रकरणी तिघांवर गुन्हा

नाशिकरोड येथील विवाहितेला तिच्या नवऱ्याविरोधात फितवून लग्नासाठी धमकावणे व जादूटोणा केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित रिजवान सादीक मन्सुरी उर्फ पिंजारी (वय २५, रा. इरम प्लाझा, वडाळा-अशोका रोड, नाशिक), शोएब (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुझा नवरा तुझ्यावर जादूटोणा करतो. तो तुला मारून टाकेन असे सांगून संशयितांनी तिचा विश्‍वास संपादन केला. तसेच, सतत पैशांची मागणी करून लग्न करण्याबाबतही धमकावले. वणी येथील जादूटोणा करणाऱ्या बाबाकडे तिला घेऊन गेले. मंतरलेला ताईत व पाणी देऊन शरीरसंबंध व लग्नासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु विवाहितेने त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी तिच्या नवऱ्याचा खून करण्यासाठी सुपारी देण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी वणी येथील जादूटोणा करणाऱ्या बाबासह तिघांविरोधात नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


सराफ दुकानातून दागिने चोरीस

सराफ बाजारातील आडगावकर ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोघींनी कामगाराची नजर चुकवून २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. प्रसाद गजानन आडगावकर यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या १८ ऑक्‍टोबर रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन महिला सोने खरेदीसाठी आल्या होत्या. यापैकी बॉयकट असलेल्या महिलेने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता तर दुसरीने निळ्या रंगाची जिन्स व त्याच रंगाचा टॉप परिधान केला होता. या दोघींनी दुकानातील कामगार पंकज कुलकर्णी याची नजर चुकवून २७ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे गंठन चोरून नेले. ही बाब आता लक्षात आल्यामुळे सरकारवाडा पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.


विजेच्या धक्क्याने युवक ठार

औरंगाबाद नाका येथील हॉटेलसमोर डेकोरेशन करीत असताना विजेचा धक्का बसल्याने युवकाचा मृत्यू झाला. कुलदीप राधेशाम पासवाल (वय २१, रा. औरंगाबाद नाका) असे मृत युवकाचे नाव आहे. तो शनिवारी (दि. १०) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास डेकोरेशनचे काम करीत होता. त्यावेळी त्याला विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.


व्हॉटसअॅपवरून विनयभंग

सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीविषयी अश्‍लिल शब्दप्रयोग करून विनयभंग केल्याप्रकरणी नाशिकरोडच्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. संशयित स्वप्निल संजय वाघ (वय २१, रा. साईकृपा सोसायटी, नाशिकरोड) याने अंकुश सोमनाथ घरावणे याच्या मोबाइलवर व्हॉटस्‌ऍप या सोशल मीडियावर पीडित मुलीस उद्देशून अश्‍लिल शब्दप्रयोग केला. अंबड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल ‘कांदा’ करी पुन्हा ‘वांधा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या वर्षीच्या दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजासमोर यंदा पुन्हा कांदा बाजारभावाचं संकट उभे ठाकले आहे. लाल कांद्याला म्हणावा तसा बाजारभाव मिळत नसल्याने, नव्हे तर आहे तोही बाजारभाव दिवसागणिक खाली खाली येत असल्याने उत्पादक शेतकरी कांद्याच्या गणितात पुन्हा एकदा फसला आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल उपबाजार आवारात गेल्या आठवड्यात लाल कांद्याच्या बाजारभावाचा आलेख सातत्याने घसरता दिसून आला. लाल कांद्याच्या या ढासळत्या बाजारभावामुळे बळीराजाच्याच्या चेहऱ्यावर लाली मात्र हरपली आहे.

यावर्षी आतापर्यंत टिकून राहीलेली उन्हाळ कांद्याची आवक यासह इतर राज्यात वाढलेले लाल कांद्याचे उत्पादन, बाजारात नसलेली मागणी अशी अनेक कारणे लाल कांदा बाजारभाव घसरणीमागे दिली जात असली तरी नेमकं कुठे बिघडलेय? हा गहन प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नव्या लाल कांद्याने सुरुवातीलाच बाजारभावाबाबत केलेला अपशकून बळीराजाच्या चेहऱ्यावर निर्माण झालेले निराशेचे भावच सांगून जात आहे.

नुकत्याच संपलेल्या सप्ताहात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य आवार व अंदरसूल उपबाजारात नवीन पोळ अर्थातच ‘लाल’ कांद्याच्या आवकेस सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीलाच बाजारभावाने उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. गेल्या सप्ताहात लाल कांदा बाजारभावाचा आलेख सातत्याने घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लाल कांद्याला मिळणारा किमान, सरासरी तसेच कमाल बाजारभाव बघता शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चदेखील पडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.



येवला बाजार

एकूण आवक १५ हजार ७०० क्विंटल

बाजारभाव २०० ते १०१५ (सरासरी ७५०) प्रतिक्विंटल


अंदरसूल उपबाजार

एकूण आवक १२०० क्विंटल

बाजारभाव १५० ते ९०० (सरासरी ७००) प्रतिक्विंटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज पुन्हा उसळणार गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पैशांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून बँका बंद असल्यामुळे एटीएमच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. उद्या, मंगळवारी बँका सुरू होणार असल्याने पुन्हा एकदा गर्दी उसळणार असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी पैसे काढण्यासाठी शहरातील स्टेट बँकेकेच्या एटीएमसमोर नागरिकांची रांगा लावल्या होत्या.

शनिवारपासून सुटी असल्याने सोमवारपर्यंत नागरिकांना केवळ एटीएमचा आधार घ्यावा लागला. मात्र तेथेही कदी नेकवर्ट प्रॉब्लेम तर कधी रोकड संपणे अशा अचडणी आल्यामुळे नागरिकांचा मनस्ताप झाला.

नोटबंदीचा निर्णय जाहीर होऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे. या काळात नागरिकांना बँकेत असलेला आपलाच पैसा काढण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. १० ते १२ डिसेंबर या काळात बँकांना सलग सुट्या आल्या. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी लागणारा पैसा उपलब्ध होण्यात अडचणी आल्या. पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना केवळ दोन हजार रुपये हाती येत असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. काही एटीएममधील रोकड काही तासांत संपली. रविवारी एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे मिळत असल्याने तेथे दिवसभर नागरिकांची रांग लागल्याचे दिसून आले. बहुतेक एटीएम केंद्रावर एटीएम बंद असल्याचा फलक झळकत होता. वास्तविक सुट्यांच्या कालावधीत एटीएममध्ये रोकड उपलब्ध करून देण्यात येईल, असे बँकांच्या वतीने शुक्रवारीच सांगण्यात आले होते. तरीही या एटीएममधून केवळ दोन हजार रुपयेच उपलब्ध होत आहेत. त्यातही काही ठराविक ठिकाणी असलेल्या एटीएमवर नागरिकांची जास्त गर्दी झाल्याने त्या ठिकाणी असलेली रक्कम लगेच संपली. मात्र, त्यानंतर बराच वेळ वाट पाहूनही त्या एटीएममध्ये रक्कम टाकण्यात आली नाही.

त्यामुळे त्या ठिकाणी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना अन्य एटीएमच्या शोधात वेळ घालवावा लागला.

हाती पैसे, तरीही डोकेदुखी

शनिवारी आणि रविवारी बऱ्याच ठिकाणी एटीएममधून केवळ दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा हाती येत होत्या. त्यामुळे आता या दोन हजार रुपयांचे सुटे कोठून आणायचे, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला होता. बऱ्याच ठिकाणी व्यावसायिकही ग्राहकांकडे सुटे आहेत, काय याची खातरजमा करूनच साहित्य विक्री करत असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे दोन हजारांच्या नोटेचे सुटे करण्यासाठी अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

नियोजन कोडलमडले

नागरिकांकडे असलेले पाचशे आणि हजारच्या नोटा जमा करण्यासाठी आता काही दिवसचीच मुदत आहे. त्यातच गेल्या तीन ‌दिवसांपासून बँकांना सुटी आल्याने नागरिकांनी उधार उसणवारीवर दिवस काढावे लागले. उद्या मंगळवारी बँका पुन्हा सुरू होणार असल्याने तेथे गर्दी उसळण्याची शक्यता आहे. लग्नसराई, सुट्यांचा मोजम, बाहेरगावी जाण्यचे नियोजन आणि त्यातच काही दिवसांवर येवून ठेवलेला ३१ डिसेंबर यामुळे रोकड मिळविण्यासाठी नागरिक अनेक युक्ती लढवित आहेत. त्यामुळे मंगळवारी बँक‌ेतून पैसे काढण्यासाठी गर्दी उसळणार आहे.

भेटवस्तूंचे प्रमाण वाढले
नोटाबंदीनंतर झालेल्या विवाहसोहळ्यांवर या मंदीचे सावट दिसून आले. परिसरातील लॉन्सवर झालेल्या अनेक विवाहांमध्ये वधू वरांना पाकिटातून आहेर ‌देण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे कार्डद्वारे भेटवस्तू खरेदी करूनच वधूवधरांच्या हातात गिफ्ट बॉक्स देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसात नऊ लाखांची देणगी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सलग शासकीय सुट्यांनी त्र्यंबकनगरी गजबजली असून, भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. देवस्थान ट्रस्टला देणगी दर्शनाने तीन दिवसात जवळपास ९ लाख रुपये मिळाले आहेत. नोटाबंदीच्या महिन्यानंतर प्रथमच देणगी दर्शनासाठी रांग लागली होती.

१० डिसेंबरला १ लाख ८० हजार, ११ डिसेंबर ५ लाख, १२ डिसेंबर २ लाख रुपये देणगी मिळाल्याचे देवस्थान ट्रस्ट यांचेकडून सांगण्यात आले. वाहनतळ ते मंदिर परिसर येथील व्यवसाय‌िकांचादेखील व्यवसायाला गती मिळाली. अर्थात सुट्या नोटा नसल्यामुळे व्यवसायात थोडा घाटा आला. जर पुरेसे चलन हाताशी असते तर यया तीन दिवसांत चांगला व्यवसाय झाला असता असे व्यापाऱ्यांनी सांगितले. किरकोळ विक्री, चहापान आदी दुकांनाना मात्र नोटाबंदीचा चांगलाच फटका बसला आहे. तरीदेखील मंदिराचे समोरील रस्त्याला गेल्या तीन दिवसांपासून चौपाटीचे स्वरूप आले आहे.

वाहनतळ गजबजले
गेल्या महिनाभरापासून तुरळक प्रमाणातच वाहने असणारे वाहनतळ गेल्या तीन दिवसात ओव्हर फ्लो झाले आहे. येथे वाहन लावण्यास जागाच शिल्लक राहत नाही. नगर पाल‌िकेला वाहनतळ फी माध्यमातून बरघोस उत्पन्न मिळत असून, गेल्या महिनाभरापासून यात चांगलीच घट आली होती. त्यामुळे येणारा नाताळ आणि ३१ डिसेंबरची सुटी पाहता त्र्यंबकेश्वर येथील व्यवसाय वाढीस लागणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजाराची नोट झालीय नकोशी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, घोटी

बँका आणि एटीएममधनू हातात पडणारी दोन हजार रुपायांची नोट आता नागरिकांना नकोश झाली आहे. सुरुवातीला आकर्षण वाटणारी ही दोन हजाराची नोट आता पाकिटात जड होत आहे. कोणीही सुटे देण्यास तयार नसल्याने नागरिकांची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. घोटी सारख्या ग्रामीण भागात सुट्यांसाठी सगळीकडेच शोधाशोध सुरू आहे.

केंद्र सरकार व अर्थ मंत्रालयाने नोटबंदीचा निर्णय जाहीर करुन सामान्य जनतेच्या अडचणीत भर घातली आहे. हा निर्णय स्तुत्य व चांगला असला तरी सामान्य जनतेला मात्र त्रासदायक ठरू पाहत आहे. शासनाने दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली तरी पाचशेची नोट मात्र अद्यापही व्यवहारात आली नसल्याने आर्थिक व्यवहारांना गती मिळत नाही.

इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्याला व प्रख्यात घोटी सारख्या बाजारपेठांना या आर्थिक नोटबंदीची झळ बसली आहे. बाजारात सुटे मिळत नसल्याने दोन हजाराची नोट नकोशी वाटू लागली आहे. व्यवहारांना गती मिळण्यासाठी पाचशेची नोट हवीहवीशी वाटू लागली आहे. मात्र या तालुक्याच्या बाजारपेठेत अद्यापही पाचशेच्या नोटा न आल्याने जनता हवालदिल झाली आहे.

बँकामध्येही रांगा अन् एटीएमला शटरच

नोटबंदीचा निर्णय होऊन महिना लोटला तरीही बँक आणि एटीएमबाहेरची गर्दी कमी झालेली नाही. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर कमालीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अजूनही पहाटेपासूनच सामान्य खातेदार बँकेच्या दारात आपले पैसे घेण्यासाठी उभे राहिलेले दिसत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनाही आर्थिक उसनवारी करुण घोटी-इगतपुरीला बँकेत यावे लागत आहे. त्यातही पैसे काढण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावे लागत असल्याने या तापदायक स्थितीचे समर्थन कसे करावे असा प्रश्न व्यक्त केला जात आहे. घोटी शहरात अनेक बँका व वित्तीय संस्थांच्या अनेक एटीएम अस्तांनाही केवळ स्टेट बँकेचेच एटीएम सुरू आहे. अन्य बँकांचे एटीएम अनेक दिवसापासून बंद आहेत. एटीएमचेही शटर खाली असल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाल राज्य नाट्य महोत्सवाचा समारोप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बाल राज्य नाट्य महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी विविध कलागुण प्रदर्शन करणारी नाटके शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्य स्पर्धेचा समारोप सोमवारी झाला.

तिसऱ्या दिवसाच्या नाटकांमध्ये ‘शाळा आजोबांची’, ‘अब्बु हसन’, ‘ओम मित्राय नम:’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘परिवर्तन आणि कलीची किमया’ ही सहा नाटके सादर करण्यात आली. प्रबोधिनी विद्यामंदिरतर्फे सादर करण्यात आलेले शाळा आजोबांची हे नाटक लहानपण देगा देवा या संकल्पनेवर आधारित होते. लहानपणी आपणावर कुठलीच जबाबदारी नसते. परंतु पालक मात्र लहान मुलांना सारखे हे करू नको, ते करू नको असे बजावत असतात. अशाने मुले चिडचिडी होतात. नैराश्याने ग्रासली जातात त्यावरील उपाय म्हणजे आजोबांची शाळा. या नाटकाची निर्मिती रमेश वनीस यांनी केली होती. लेखन मनिषा नलगे, दिग्दर्शन कांचन इप्पर, नेपथ्य मिल‌िंद मून, संगीत विनोद देवठक तर रंगभूषा नारायण देशपांडे, प्रकाशयोजना हेमंत देशपांडे यांची होती. नाटकात नयन निकम, कांचन पवार, हिमांशू गोस्वामी यांच्यासह बालकलाकारांनी काम केले.

अब्बु हसन नाटक प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे सादर करण्यात आले. लेखन गिरीश सहदेव, दिग्दर्शन गजानन वाल, प्रकाशयोजना रोहित पगारे यांची होती. एकमेकांचे दु:ख समजून ते दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्बूची ही कथा असून, एका दिवसाच्या राजपदाचा तो यथायोग्य उपयोग करतो आणि त्यातुन शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतो, अशा आशयाचे हे नाटक होते.

ओम मित्राय नम: हे बालनाट्य पर्यावरणावर आधारित होते. एकांकिकेतून वृक्ष हे आपले मित्र असून, त्यांच्यामुळेच आपले जीवन आहे. त्यामुळे वृक्षतोड करू नये व सृष्टीचा विनाश टाळावा, यासाठी झाडे लावा व झाडे जगवा हा संदेश एकांकिका देते.

विठ्ठल तो आला आला ही एकांकिका स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूलने सादर केली. विठ्ठल रिकाम्या गाभाऱ्याला कंटाळून शेटजी, डॉक्टर, वकील, शिंपी यांच्याकडे काम मागतो; मात्र आपले काम किती कठीण आहे हे प्रत्येकजण त्याला पटवून देतो. शेवटी विठ्ठल आपल्या गाभाऱ्यात परत जातो. पु. ल. देशपांडे लिखित या एकांकिकेचे दिग्दर्शन मनिषा एकबोटे यांनी केले. नेपथ्य शशिकांत सोनार, संगीत प्रतिक्षा एकबोटे तर वेशभूषा हेमा कांबळे यांनी केली. पार्थ पाटणकर, सर्वेश बोके, आयुष पाटील, आशिष कुलकर्णी अथर्व क्षीरसागर यांनी भूमिका केल्या.

श्रीमती र. ज. चौहान बिटको ग्लर्स हायस्कूलतर्फे परिवर्तन हे बालनाट्य सादर करण्यात आले. डोंबाऱ्याचा खेळ करणारी मुले शिक्षणप्रवाहात आली तर ऑलिम्पिकमध्ये नाव कमावतील, असा आशय घेऊन ही एकांकिका सादर झाली. लेखन व दिग्दर्शन गौरी काळे यांचे होते. नेपथ्य मोहन दळवी, संगीत प्राची सराफ, वेशभूषा सुरेखा पगारे, रंगभूषा गौरी जोशी यांची होती.

श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिर यांच्यातर्फे कलीची किमया हे बालनाट्य सादर करण्यात आले. राजा लहरी असली की प्रजेचे कसे हाल होतात हे या नाटकातून दाखविण्यात आले. लेखन शीला सामंत, दिग्दर्शन शोभा बिल्लाडे, नेपथ्य शीला सामंत, संगीत केतकी देशपांडे, ध्वनीसंयोजन अनुराधा कुलकर्णी यांचे होते. नाटकात सनी पाटील, वैष्णवी चव्हाण, यश नाईक, अभिषेक देशमाने यासह बालकलाकारांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदयात्रींनी जिंकली मने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पायाने अपंग असूनदेखील व्हीलचेअरद्वारे चित्तथरारक नृत्य करणारी प्राजक्ता, गतीमंद असूनही आपल्या सुमधूर आवाजाने गीत गायन करणारी सोनू, मंददृष्टीकडे पाठ करून गिटार ढोलकी अगदी तलासुरात वाजणारा मिस्टर अमोल… या आणि अशा दीडशेहून अधिक अपंग कलावंतांनी आपल्या बहारदार कला सादरीकरणाने मालेगावकरांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते येथील आधार अपंग शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंदवन येथील कलावंतांच्या स्वरानंदनवन संगीत रजनी कार्यक्रमाचे.

येथील आधार शाळेच्या वतीने जागतिक अपंग दिन निमित्ताने अपंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप रविवारी सायंकाळी संगीत रजनी कार्यक्रमाच्या सादरीकरणाने झाला. यात समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘स्वरानंदवन’ संगीत रजनी कार्यक्रमात आनंदवनातील ११० अपंग, मुकबधीर, कुष्ठरोगी, अनाथ कलावंतांनी गायन, वादन व नृत्य कलेच्या सादरीकारणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महापौर हाजी मोहम्मद इब्राहीम, आयुक्त रवींद्र जगताप, पोलिस उपधीक्षक गजानन राजमाने उपस्थित होते. कार्यकामादरम्यान अनेक दानशूर व्यक्ती तसेच संस्थांनी देणगी देऊ केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार संस्थेचे संजय फतनानी, अजय मंडावेवाला, सतीश कसलीवाल, ओम बाहेती, पंकज कोठारी, अरुण तापडे, दर्शन पटेल, निरूपमा कसलीवाल, वैशाली देवरे यांनी परिश्रम घेतले.

आनंदवन एक सामाजिक कुटुंब

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. विकास आमटे म्हणाले, स्वर्गीय बाबा आमटे यांनी आनंदवनच्या माध्यमातून समाजाने नाकारलेल्या या महारोगींना आपलेसे केले. त्यांच्यावर केवळ सहानुभूती न दाखवता त्यांना स्वावलंबी करीत त्यांच्यातील आत्मविश्वास जागवला. त्यांच्या याच प्रेरणेतून आज हजारो अपंग, महारोगी उभे आहेत. आनंदवन ही आमटे कुटुंबीयांची खासगी मालमत्ता नाही, तर हे एक सामाजिक कुटुंब आहे. याच अपंगांमधील कलविष्काराला स्वरानंदनवनच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाले असून त्यांच्याही जगण्याचे गाणे झाले आहे.

उपस्थितांचे हरपले भान

कार्यक्रमाची सुरवात मुक्तांगणात ‘यारे, आनंद सागरात या यारे’ हे ग.दी. माडगूळकर लिखित गाणे अंध युवतींनी सादर केले. यानंतर आनंदवनातील कुष्टरोगी दाम्पत्यांच्या कन्यांनी गणेशवंदना नृत्य सादर केले. दृष्टीहीन आणि गतीमंद असेलेल्या कुमारी सोनू हीने दिल चीज क्या हैं, ही वाट दूर जाते, या गीतांचे आपल्या अत्यंत गोड आवाजात सादरीकरण केले. प्रत्येक सादरीकरणाराला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली. आनंदवन कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मेड इन इंडिया’ गाण्यावर केलेला ब्रेक डान्स चित्तवेधक ठरला. डोला ते डोला गीतावरील व्हीलचेअरवरील तरुणींनी सादर केलेल्या नृत्य पाहताना उपस्थितांचे भान हरपले होते. सुधीर कुमार या कलाकाराने प्राणी, पक्षी तसेच सिने कलावंतांचे हुबेहूब आवाज काढीत उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमात व्हीलचेअरवर असलेले आनंदवन येथील सुधीर कदम यांनी आपल्या बहारदार सूत्रसंचालनतून कार्यक्रमात रंग भरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकरावीचे प्रवेश यंदा ऑनलाइन

$
0
0


कॉलेज क्लब रिपोर्टर
सन २०१७ च्या शैक्षणिक सत्रातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अकरावीचे प्रवेश घेताना दहावी पास विद्यार्थ्यांची प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळे अर्ज भरण्यासाठी होणारी दमछाक यंदापासून टळणार आहे. अनेक कॉलेजेसमध्ये फॉर्म भरताना निर्माण होणाऱ्या त्रुटी व अन्य समस्यांवर उपाय म्हणून केंद्रीयकृत ऑनलाइन प्रवेश नाशिकमध्ये सुरू व्हावेत, अशी मागणी गेल्या वर्षीपासून होत होती. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर अकारावीचे प्रवेश ऑनलाइन करण्यात यावेत याबाबतचे सविस्तर वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केले होते. आता यासंदर्भात निर्णय झाल्याने नव्या कॉलेजिन्सची गैरसोय टळणार आहे.
सध्या प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळा ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यामुळे असे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून पुन्हा कॉलेजमध्ये जमा करण्यासाठी साधारणपणे एका कॉलेजसाठी विद्यार्थ्याला १०० रुपये खर्च होतो. हा खर्च सर्वच विद्यार्थ्यांना परवडणारा नसतो. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्तर महाराष्ट्रातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याने त्यांना नाशिकची पुरेशी माहीती नसल्याने त्यांना प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरणे शक्य नसते. असंख्य विद्यार्थिनींनाही प्रत्येक कॉलेजमध्ये जाणे शक्य होत नाही. सोबतच ऑफलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे अनेक कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणावर दलालीचे प्रकार होऊन गैरमार्गाने प्रवेश देण्यात येत असल्याचे आढळून आलेले आहे. अनेक ठिकाणच्या कॉलेजेसचे मेरिट अर्ज प्रवेश करवणारे दलाल कॉलेजबाहेर जास्त किंबहुना दुप्पट किमतीने विक्री करतात. अनेक खासगी क्लासेस नॉन ग्रँट कॉलेजेससोबत टाय-अप करत विद्यार्थ्यांची अडवणूक करीत असल्याचेही दिसून येत असल्याने नाशकात अकरावी प्रवेशात होणारे गैरप्रकार थांबवत एक खिडकी, एक केंद्रीय पद्धतीने प्रवेश देणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीयकृत ऑनलाइन प्रवेश यावर्षी जून १७ पासून देण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केल्याने अनेक गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
...
फक्त आदेशाची गरज...
यंदा ऑनलाइन पद्धतीनेच आम्ही अकरावीत प्रवेश देणार आहोत. नाशिकमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीयकृत म्हणजेच एक फॉर्म भरत ऑनलाइन स्वरूपात देण्यासाठी शहरातील कॉलेजेसच्या प्राचार्यांसोबत मीटिंग्ज झाल्या असून, ऑनलाइन प्रवेशप्रक्रियासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. केंद्रीयकृत प्रवेश देण्यासाठी पुण्यातही प्रस्ताव पाठवला असून, आम्ही सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. राज्य सरकार व शिक्षण विभागाकडून आदेश आल्यानंतर लगेचच ही प्रक्रिया सुरू होईल.
-रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग
....
ऑनलाइन प्रवेशाचा फायदा
--
-सर्व कॉलेजेसमध्ये अर्ज भरावे लागणार नाहीत.
-एकाच अर्जावर सगळीकडे प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
-सध्या विद्यार्थ्यांचा होणार खर्च आणि वेळही वाचेल.
-दलालांना अटकाव होऊन प्रवेश पारदर्शक होतील.
-सर्व जागा, कॉलेजेसची माहिती, एकूण मिळालेले प्रवेश एका क्लिकवर उपलब्ध होतील.
-नॉन ग्रँट, मॅनेजमेंट कोटा यातील प्रवेशातील भ्रष्टाचार थांबेल.
-सर्व विद्यार्थ्यांना सुलभतेने प्रवेश मिळेल.
-काही क्लासेस व नॉन ग्रँट कॉलेजेसच्या टाय-अप सिस्टिमला तडा जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तीन पायांची शर्यत’ला दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एखाद्या घटनेतील सत्य घडामोडींचा मुळापर्यंत जाऊन वेध न घेता कधी कधी त्यातील अर्धसत्यच अधोरेखित केले जाते. याला पोलिस आणि लेखकांसारखेही जबाबदार घटक काही घटनांमध्ये अपवाद ठरत नाहीत. परिणामी, यातून चुकीचा संदेश जाऊन निरपराधांचेच बळी जाण्याच्या घटना समाजमनाला चटका लावून जातात. मात्र, सत्य उघडकीला येते तोपर्यंत हातून वेळ निघून गेलेली असते, असा संदेश ‘मटा कल्चर क्लब’ प्रायोजित ‘तीन पायांची शर्यत’ या नाटकाने दिला.
महाकवी कालिदास कलामंदिरातील रंगमंचावर रविवारी या नाटकाच्या प्रारंभाच्या प्रयोगाचे सादरीकरण झाले. सुयोग आणि झेलू एन्टरटेन्मेंटने हे नाटक प्रस्तुत केले.
मूळ इंग्रजी नाटक ‘दी बिझनेस मर्डन’ याहून ‘तीन पायांची शर्यत’ या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. या कथानकातील थरार अनुभवताना नाट्यगृहातील वातावरण गंभीर झाले होते. प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे व मधुकर रहाणे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. मंगला केंकरे यांनी वेशभूषा केली. कांचन भट हे नाटकाचे निर्माते आहेत, तर अभिजित गुरू यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. यात शर्वरी लोहकरे, लोकेश गुप्ते आणि संजय नार्वेकर या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
_ _ _
सेलिब्रिटींसोबत फोटो अन् गिफ्ट्स!
या नाटकाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सेलिब्रिटीज््च्या हस्ते नव्याने ‘मटा कल्चर क्लब’चे मेंबर होणाऱ्या सदस्यांना भेटवस्तू अन् कार्ड वितरित करण्यात आले. यावेळी या भाग्यवन सदस्यांना सेलिब्रिटींसोबत फोटोसेशनचीही संधी देण्यात आली. किरण समेळ, अनंत सोनवणे, श्यामल राव, शिवानी मिसाळ, कंचन शहा, श्रीरंग वाकचौरे, यशवंती नाईक, शोभा शहा, दीपा अमोणकर आदी सदस्यांना ही संधी मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पोर्टस मेडिसिन’ची मात्रा बेदखलच!

$
0
0

राज्यात केवळ एकमेव कोर्स

Jitendra.tarte@timesgroup.com

Tweeter : mtjitendratarte

नाशिक : क्रीडाक्षेत्राचा विकास होत असताना या क्षेत्रातील खेळाडूंचे आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्पोर्टस मेडिसिन’कडे मात्र गांभीर्याने पाहिले जात नसल्याची बाब समोर येत आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद आहे. राज्यात केवळ एकमेव फेलो अभ्यासक्रम नाशिकमध्ये उपलब्ध झाला आहे. वाढती मागणी आणि खेळातील आरोग्य सांभाळण्यासाठी या कोर्सची संख्या वाढवण्याची गरज दुर्लक्षिली जात आहे.

दिग्गज खेळाडूंना ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये पोहोचविण्यासाठी पडद्यामागची भूमिका बजाविणारे स्पोर्टस मेडिसिन विषयातील तज्ज्ञ तयार व्हावेत, यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नतेने देशभरात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या ‘स्पोर्ट मेडिसिन’ या विषयातील पदव्युत्तर दर्जाचा फेलोशीप अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. भारतीय खेळाडूंचे जिगर जागतिक स्पर्धांमध्ये कुठेही कमी पडत नसले तरीही त्यांची कामगिरी उंचाविण्यासाठी स्पोर्ट मेडिसिन सेंटरसारख्या पाठिंब्याची गरजही काही माजी ऑलिम्पिक खेळाडूंनी यापूर्वी व्यक्त केली आहे. या धर्तीवर तीन वर्षांपूर्वी पुण्यामध्ये असे सेंटरही साकारले गेले. सद्यस्थितीत नाशिकमध्ये अशा सेंटर स्थापनेची आशा दुर्मिळ असली तरीही स्पोर्टस मेडिसिन पीजी फेलोशीपच्या रूपाने अवघी एक जागा उपलब्ध झाली आहे. मात्र, ते पुरेसे नसल्याचे क्रीडातज्ज्ञांना वाटते.

आतापर्यंत क्रीडा वैद्यकाशी संबंधित संशोधन हे बहुतांशी लष्करी खेळाडूंपुरताच मर्यादित होते. पण अलिकडील सरकारी धोरणांनंतर याचे लाभार्थी नागरी खेळाडूही बनत आहेत. लाभार्थ्यांचे हे प्रमाणही अत्यल्प आहे. नाशिकमधील डॉ. मिलिंद पिंप्रीकर यांच्या रुग्णालयात आरोग्य विद्यापीठाच्या सहकार्याने स्पोर्टस मेडिसिनचा फेलोशीप अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तेथे वर्षभराच्या अभ्यासक्रमासाठी अवघी एकमेव जागा उपलब्ध आहे. ऑर्थोपेडिक्समधील पदव्युत्तर शिक्षणाचे क्वालिफिकेशन पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांकडून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, क्रीडा क्षेत्राकडे वाढणारा कल, सद्यस्थितीतील राज्यासह देशभरातील खेळाडूंची संख्या आणि येत्या काळात येऊ घातलेले खेळाडू हे सारे पाहता या कोर्सला चालना देण्याची आवश्यकता क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

‘ते’ घेतात लाभ

आशिया किंवा आफ्रिका खंडासारख्या प्रदेशातून येणाऱ्या खेळाडूंच्या नैसर्गिक शारीरिक क्षमता इतर खंडांच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त असतात. मात्र, केवळ उच्च दर्जाच्या बाह्य सुविधा आणि स्पोर्ट मेडिसिनसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रांचे नसणारे पाठबळ किंवा या तंत्राच्या उपलब्धतेसाठी अनुकूल नसणारी सरकारी मानसिकता याच्या परिणामी हे खेळाडू जागतिक स्पर्धांमध्ये पिछाडीवर फेकले जातात. अन् याच दुर्मिळ तंत्राच्या उपलब्धतेवर प्रगत अन् सुखवस्तू देशातील खेळाडू जागतिक स्पर्धांवर ठसा उमटवितात, असेही निरीक्षण एका क्रीडा अभ्यासकांनी ‘मटा’ शी बोलताना मांडले.

स्पोर्टस मेडिसीनसारख्या विषयांचे शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यापीठ यांची कमतरता आणि सरकारी धोरणांवरील उदासीनता मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. स्पोर्टस मेडिसिनला चालना देणे अगत्याचे आहे.

- डॉ. भीष्मराज बाम, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूलचे अधिकारी रडारवर

$
0
0

विभागीय आयुक्तांकडून २७ अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी काम आणि बारा महिने थांब या उक्तीचा अनुभव सामान्य नागरिकांना नेहमीच येत असतो. महसूलमधील तब्बल २७ अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आता थेट राज्य सरकारकडेच दाद मागण्यात आली आहे. महसूल विभागाच्या सचिवांनी या तक्रारी कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविल्या असून, या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. प्राप्त तक्रारींपैकी निम्म्या तक्रारी एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.

किरकोळ कामांसाठी नागरिकांना तलाठी कार्यालयापासून विभागीय आयुक्तालयापर्यंत अनेक कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात. वारंवार हेलपाटे मारूनही नागरिकांची कामे मार्गी लागत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कनिष्ट अधिकाऱ्यांकडून समाधान झाले नाही, की लोक जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत धाव घेतात. परंतु, तेथेही पदरी निराशाच पडू लागल्याने लोक थेट पत्रव्वहाराद्वारे राज्य सरकारकडेच कैफियत मांडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील २७ महसूल अधिकाऱ्यांबाबत राज्य सरकारला तक्रारी प्राप्त झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामध्ये सर्वाधिक १३ अधिकारी अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल विभागातील आहेत. याखेरीज नाशिकमधील सहा, जळगावमधील चार, धुळे जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याचा त्यामध्ये समावेश आहे. विभागीय आयुक्तांकडून याबाबत चौकशी होणार असल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

संबंधित तक्रारदारांच्या अर्जावर विभागीय पातळीवरून कार्यवाही केली जाणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

अहमदनगर - १३, नाशिक - ६, जळगाव - ४, धुळे व नंदुरबार - ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबवा

$
0
0

विश्व हिंदू परिषदेची मागणी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत २९ सप्टेंबर २००९ रोजी दिलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून सध्या प्रशासनातर्फे मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्याची वेगाने कारवाई सुरू आहे. ही कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात राज्य सरकारांनी सरकारी जागेवर अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत सुयोग्य पावले उचलावित, असे निर्देश दिलेले आहेत. त्यांनी कोठेही सरसकट धार्मिक स्थळे पाडा असे म्हटलेले नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने गृहविभागाने ५ मे २०११ रोजी काढलेला आदेश हा सरकारी जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित अथवा निष्कासित करण्याबाबत आहे. हा जीआरी खासगी जागेवरील व टर्स्टच्या मालकीच्या व निमशासकीय जागांना लागू नाही. तथापि, या जीआरमध्ये एक त्रूट आहे, ती म्हणजे सर्वप्रथम शासनाने अधिकृत आणि अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणजे काय याची व्याख्या करणे आवश्यक होते. ती व्याख्या न केल्यामुळे प्रशासनामार्फत सर्व मंदिरांना नोटिसा बजावून कारवाई चालू आहे. प्रशासनाच्या खालच्या स्तरावर त्यांना जसे आकलन होईल तसा सोयीचा अर्थ घेऊन कारवाई चालू आहे. अगदी प्राचीन पुरातन मंदिरे अनधिकृत ठरवून त्यातील काही नियमित, तर काही पाडण्याच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत, असे गायकर यांनी सांगितले.

अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे श्री वटवृक्ष स्वामी मंदिर अनधिकृत ठरवून ते नियमित करण्याचा प्रस्ताव केला आहे. भारतीय राज्यघटना अस्तित्वात आलेली नव्हती, कोणते कायदे नव्हते, तेव्हा बांधलेली मंदिरे अनधिकृत ठरविण्याच अधिकार प्रशासनाला आहे काय? या प्रश्नाचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. पंढरपूर येथील ग्वाल्हेर संस्थानचे व्दारकाधीश मंदिर, हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर, अहिल्यादेवी होळकर वाडा, मंदिरदेखील अनधिकृत यादी आहे. वेळापूर येथील भव्यदिव्य शिल्पकलेचा नमुना असलेले अर्धनारी नटेश्वर मंदिर अनधिकृत यादीत आहे. ही फक्त नमुनादाखल उदाहरणे प्रशासनातील गोंधळ लक्षात येण्यासाठी दिलेली आहेत, असे ते म्हणाले.

नाशिकमधील ७३ मंदिरे पाडली असून, आणखी काही मंदिरे पाडणार आहेत. पुण्यातील २०, अकोल्यातील ४० मंदिर, नागपूर, वर्धा, नगर, धुळे, औरंगाबाद, नवी मुंबई, मुंबई येथील मंदिरे पाडलेली आहेत. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा मंदिरांना भेटत आहे. हा गोंधळ वेळीच थांबला नाही, तर हजारो मंदिरे पाडली जाऊन भरून न येणारे नुकसान हेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुनर्विचार याचिका दाखल

२००९ च्या पूर्वी अनधिकृत मंदिरे होती, ती मंदिरे शासनाने स्वखर्चाने पुनर्बांधणी करून जनतेस न्याय द्यावा. अनधिकृत व अधिकृत मंदिरे म्हणजे काय आणि खासगी जागेवरील निमशासकीय जागेवरील व ट्रस्टच्या मालकीची मंदिरे अनधिकृत यादीमध्ये घेऊ नयेत. याबाबत स्पष्ट निर्देश देणे, याबाबत या निर्णयावर विश्व हिंदू परिषदेने न्यायालयात पुनर्विचाराकरिता जनहित याचिका दाखल केली असल्याचे गायकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images