Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

छाप्यातील रक्कम १० लाखांची

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्राप्तिकर विभागाने रविवारी टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपये जप्त केल्याची चर्चा असली तरी प्राप्तिकर विभागातून दहा लाखांच्या आसपास नोटा जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांच्याकडे हा छापा पडला, त्यांनी सांगितले, की आमच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये जप्त केले. त्यामुळे यात नव्या नोटा किती मिळाल्या, याबद्दल दिवसभर संभ्रम होता. गेल्या काही दिवसांत कोट्यवधीच्या नव्या नोटा विविध कारवाईत देशभर सापडल्यानंतर नाशिकमध्ये सापडलेल्या या नोटांचा विषय सर्वत्र चर्चेला आला.

रविवारी टाकण्यात आलेल्या छाप्यात तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांना चौकशीनंतर सोडण्यात आले. मात्र, या प्रकरणी त्यांना नोटीस दिली असून, मंगळवारी ते खुलासा सादर करणार आहे. या छाप्यात बसपकडून लोकसभा निवडणूक लढवणारे महंत सुधीर पुजारी, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पांगारकर व कांदा व्यापारी लुंकड यांचा समावेश आहे. इंदिरानगर परिसरातील एका हॉटेलमध्ये हा नोटाबदलीचा प्रकार सुरू असताना प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केली आहे. त्यात मोबाइल, टॅब जप्त करण्यात आले आहेत. त्या आधारे आता प्राप्तिकर विभाग कसून चौकशी करत असून, आणखी कोणते व्यवहार यापूर्वी झाले का, याचा शोध घेत आहे. सोमवारी सुटी असतानाही प्राप्तिकर विभागाचे अधिकारी कार्यालयात आले व त्यांनी अत्यंत गोपनीयता पाळत कामकाज केले. नव्या नोटा कशा मोठ्या प्रमाणात बाहेर येतात, याचा शोध ते घेत असून, त्यात बँकांचा सहभाग आहे का, या दिशने तपास केला जात आहे.

यापूर्वी नाशिकच्या दोन जणांना सुरत येथे नोटा बदलीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यात पोलिसांनी नव्या दोन हजारच्या ७६ लाखांच्या नोटा शुक्रवारी जप्त केल्यामुळे नाशिक कनेक्शन पुढे आले होते. विशेष म्हणजे पकडलेल्या गाडीवरील नंबरही नाशिक पासिंगचा होता. त्यानंतर दोन दिवसांनीच हा प्रकार पुढे आला. त्यामुळे संशयाची सुई बँकेकडे जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

लोक रांगेत, पैसे दलालांच्या खिशात

नोटाबंदीला ३२ दिवसांहून अधिक दिवस झाले असले तरी बँकेकडून पुरेसे पैसे दिले जात नसताना मात्र दलालांकडे इतके पैसे कसे आले, असा प्रश्न आता सामान्यांना पडला आहे. एकीकडे बँका पैसे नाहीत असे सांगतात, तर दुसरीकडे इतके पैसे बाहेर कसे जातात, याचा शोधही आता प्राप्तिकर विभाग व पोलिसांनी घ्यावा, तरच कॅशशॉर्टेजचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एक राजकीय महंत, एक सामाजिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष व एक कांदा व्यापारी असला तरी त्यांचा आमच्याशी काहीही संबंध नाही. आमची या हॉटेलमध्ये मीटिंग होती. त्यामुळे आम्ही तेथे होतो. त्या वेळी हा छापा पडला. आम्ही त्या व्यापाऱ्यांनाही ओळखत नाही. केवळ आम्ही तेथे उपस्थित होतो म्हणून आमचे साक्षीदार म्हणून नाव घेतले आहे. आम्ही खुलासा करणार आहोत.
- विलास पांगारकर, जिल्हाध्यक्ष, छावा संघटना

प्राप्तिकर विभागाच्या छाप्याशी आमचा काहीही संबंध नाही. मी तेथे विलास पांगारकर यांना भेटायला गेलो होतो. हे पैसे व्यापाऱ्याचे आहे व ते त्यांनी कबूल केले आहे. त्याबाबत आम्ही पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहोत.
- महंत सुधीर पुजारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमधील २११ शाळा मुख्याध्यापकांविनाच

0
0

ashwini.kawale@timesgroup.com
tweet : @ashwinikawaleMT

नाशिक : विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणसंस्था यांसाठी मुख्याध्यापक हे पद महत्त्वाचे असले तरी मनपा कार्यक्षेत्रातील २११ खासगी विनाअनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक केवळ बाहुले म्हणून त्या पदावर असल्याचे समोर येत आहे. शहरातील या शाळांना मान्यताप्राप्त मुख्याध्यापकच नसून, शाळा प्रशासन व मुख्याध्यापकांची बेजबाबदारी या प्रश्नास कारणीभूत असल्याचे मत याविषयी मनपा शिक्षण समितीकडून व्यक्त करण्यात आले आहे, तसेच या शाळांना याप्रश्नी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

शिक्षण क्षेत्रासमोर आज एक ना अनेक प्रश्न आजमितीला उभे असून, खासगी शाळांचे व प्रामुख्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अनेक प्रश्न समोर येत आहेत. शाळांना मान्यता नसणे, अव्वाच्या सव्वा फी आकारणे आदी बाबी यातून वेळोवेळी समोर येत आहेत. याबरोबरच मुख्याध्यापकही मान्यताप्राप्त नसल्याने शाळांमध्ये शैक्षणिक विषयाबद्दल खरेच गांभीर्य आहे का, हा प्रश्नदेखील पुढे आला आहे. मुख्याध्यापक व संस्थांच्या बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत ठरला आहे. केवळ आर्थिक अहवालांवर, तसेच पद भरण्यापुरती मुख्याध्यापकांची भरती करण्यात आली असून, त्यांना कोणतेही अधिकार शिक्षण संस्थांनी बहाल केलेले नाहीत. मुख्याध्यापकही केवळ वेतन वेळेत होते, म्हणून मान्यतेच्या फंदात पडत नसून, त्यांचा निष्काळजीपणा त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. याप्रश्नी शिक्षण संस्थांशी संवाद साधला असता, हल्ली शाळेशी निगडित शालेय पोषण आहार, वाहतूक, शिष्यवृत्ती आदी प्रत्येक बाबीशी मुख्याध्यापकालाच जबाबदार धरण्यात येत असल्याने आहे त्या स्थितीत पदावर काम करण्याची तयारी मुख्याध्यापकच दर्शवित आहेत, तर शिक्षण विभागाकडूनही दोन वर्षांपासून मान्यता प्रक्रियेसाठी कोणतेही कॅम्प लावले जात नसल्याची खंत मुख्याध्यापकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ते केवळ नामधारीच

मुख्याध्यापकपदासाठी सरकारची मान्यता घेतल्यास त्या दर्जाचे वेतन संस्थांना देणे बंधनकारक ठरते. हे पैसे वाचविण्यासाठी व यापासून पळ काढण्यासाठी संस्थाचालकही मान्यता घेण्याचे टाळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचा अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांवर होत असून, ज्या बाबींची जबाबदारी मुख्याध्यापकावर देण्यात आली आहे तेदेखील मान्यता नसल्याच्या नावाखाली अशा जबाबदारींमधून पळ काढत असल्याची गंभीर बाबही समोर येत आहे.

मान्यताप्राप्त मुख्याध्यापक नसलेल्या शाळा खासगी विनाअनुदानित असून, अनुदानित शाळांमध्ये ही समस्या नाही. शाळा प्रशासन आणि स्वतः मुख्याध्यापकांच्या बेजबाबदारपणामुळे ही परिस्थिती आहे. या विषयाचे गांभीर्य त्यांना समजण्यासाठी शाळांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. हे प्रमाण एकूण शाळांच्या ८७ टक्के आहे.
- नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांनो, उद्या पाणी नाही!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्त्या केल्या जाणार असल्यामुळे गुरुवारी, १५ डिसेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

गंगापूर धरणाच्या पंपिंग स्टेशन येथील १२०० मिमी लाइनवरील रिड्युसर बदलणे, पॅनल दुरुस्तीसह जलशुद्धीकरण केंद्रावर दिवसभर काम केले जाणार आहे. या कामांसाठी महावितरणचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत बंद राहणार असल्याने गुरुवारी संपूर्ण शहराचा दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे. धरणाच्या पंपिग स्टेशनमधून रॉ वॉटर पंपिंग होणार नसल्याने दिवसभराचा पाणीपुरवठा बंद राहील. मात्र, शुक्रवारी पाणीपुरवठा होणार असला तरी तो दिवसभर कमी दाबाने असेल.
शहरात जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्त्या केल्या जाणार असल्यामुळे गुरुवारी, १५ डिसेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. गंगापूर धरणाच्या पंपिंग स्टेशन येथील १२०० मिमी लाइनवरील रिड्युसर बदलणे, पॅनल दुरुस्तीसह जलशुद्धीकरण केंद्रावर दिवसभर काम केले जाणार आहे. या कामांसाठी महावितरणचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत बंद राहणार असल्याने गुरुवारी संपूर्ण शहराचा दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे. धरणाच्या पंपिग स्टेशनमधून रॉ वॉटर पंपिंग होणार नसल्याने दिवसभराचा पाणीपुरवठा बंद राहील. मात्र, शुक्रवारी पाणीपुरवठा होणार असला तरी तो दिवसभर कमी दाबाने असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदाराकडून कामगारांची फसवणूक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेत कार्यरत असलेला ठेकेदार कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोप सदस्यांनी स्थायी समितीत केला आहे. ठेकेदार कामगारांना किमान वेतनाप्रमाणे १३ हजार ५०० रुपयांचे वेतन देत असला तरी, कर्मचाऱ्यांकडून साडेपाच ते सहा हजार रुपये परत घेत असल्याचा आरोप काँग्रेसच्या लक्ष्मण जायभावे यांनी केला आहे. त्याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे व खासगी ठेकेदारांकडून वितरीत होणाऱ्या वेतनावर समितीमार्फत निगराणी करावी असे आदेश सभापती सलिम शेख यांनी दिले आहेत.
महापालिकेला विविध सेवा सुविधा पुरवणाऱ्या ठेकेदारांना आता किमान वेतन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. किमान वेतनाची रक्कम पालिकेकडून घेतलीही जाते. परंतु संबंधित ठेकेदार ही रक्कम देताना कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोप सदस्याने केला आहे. काही ठेकेदार हे कर्मचाऱ्यांना १३ हजार ५०० रुपये देतात. तेवढी रक्कम बँकेत जमाही केली जाते. परंतु त्यांनतर त्यांच्याकडून पाच ते सहा हजारांची रक्कम परत घेतली जाते. कर्मचाऱ्यांना केवळ सात ते आठ हजारांची रक्कमच दिली जाते, असा आरोप लक्ष्मण जायभावे यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या या आर्थिक फसवणुकीची गंभीर दखल घेण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर सभापतींनीही लेखी तक्रार आहे का, अशी विचारणा केली. त्यावर कर्मचारी ठेकेदाराला घाबरतात, असे उत्तर त्यांनी दिले. सभापती सलिम शेख यांनी प्रशासनाने कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून या तक्रारीची दखल घेण्याचे आदेश दिले. तसेच असे प्रकार करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश देत एका समितीमार्फत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर निगराणी ठेवण्यात यावी असे निर्देश दिले. ठेकेदाराने नियमानुसार आठ तासांचे वेतन देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होस्टेलचे विद्यार्थी ‘टार्गेट’

0
0


म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव परिसराची शैक्षणिक हब अशी ओळख रूजली आहे. या परिसरात के. जी.पासून पी. जी., एमबीबीएस, इंजिनीअरिंग आदी सर्व शाळा-कॉलेजेसची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यासह परगावचे हजारो विद्यार्थी शाळा-कॉलेज जवळ असल्याने या परिसरात होस्टेलवर अथवा शेअरिंगने राहतात. मात्र, परिसरातील टवाळखोरांकडून अशा विद्यार्थ्यांना वेळोवेळी टार्गेट केले जात असल्याने या विद्यार्थ्यांत दहशत दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील टवाळखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी विद्यार्थीवर्गाकडून केली जात आहे.

आडगाव परिसरात मविप्रचे मेडिकल कॉलज, डी फार्मसी, नर्सिंग कॉलेज, मेट भुजबळ नॉलेज सिटीचे इंजिनीअरिंग, फार्मसी, डिप्लोमा कॉलेज, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल, के. के. वाघ इंग्लिश मीडियम स्कूल, के. के. वाघ आर्ट्स-कॉमर्स-सायन्स, अॅग्रिकल्चर कॉलेज, रयत शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल, शायनिंग स्टार स्कूल, सेंट पीटर, मातोश्री जनाबाई स्कूल आदी शाळा-कॉलेजेस या परिसरात आहेत.

सरस्वतीनगर येथील के. के. वाघ कॉलेजजवळील परिसर हा टवाळखोरांचा अड्डा आहे. या परिसरात शाळा-कॉलेजेस असल्यामुळे विद्यार्थ्यांना या टवाळखोरांच्या त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः होस्टेल व शेअरिंगने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात असून, विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकारही अनेकदा घडत असल्याच्या तक्रारी आहेत. खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांना टवाळखोर पैशांसाठी दमदाटी करतात. त्यामुळे त्रास होऊ नये म्हणून अनेक विद्यार्थ्यांना टवाळखोरांना पैसेदेखील द्यावे लागत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.


पोलिसांची उदासीनता

परिसरात कॉलेजची संख्या लक्षणीय असल्याने खासगी होस्टेल व कॉलेजेसची होस्टेल्स आहेत. या होस्टेल्समध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, त्यांना अनेकदा टवाळखोरांचा त्रास होतो. जवळच धात्रक फाटा पोलिस चौकी आहे. पण, या ठिकाणी कधीही पोलिस दिसत नसल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. तक्रारीसाठी गेल्यावर पोलिसदेखील उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये जाणे टाळावे लागत असल्याची व्यथा विद्यार्थ्यांनी मांडली.

--

बऱ्याचदा टवाळखोरांकडून दमदाटी करून आमच्याकडे पैशांची मागणी केली जाते. काही टोळकी कॉलेजजवळ उभी राहून मुलींची छेडछाड करतात. पण, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे कॉलेजच्या परिसरात गस्त वाढवून टवाळखोरांचा बंदोबस्त करावा.

-उमेश माळी, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा जाळण्यास अधिकारी जबाबदार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
दंडाची तरतूद करूनही महापालिकेच्या कर्मचाऱ्यासह नागरिकांकडून शहरात कचरा जाळण्याच्या प्रकाराची आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी आयुक्तांनी आरोग्य व उद्यान विभागाची बैठक घेऊन कचरा जाळणाऱ्यांची यापुढे गय न करण्याचे आदेश दिले आहेत. कचरा जाळण्याचे प्रकार कमी करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांसह स्वच्छता निरीक्षक व उद्यान निरीक्षकावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. कचरा जाळल्याचे आढळल्यास त्या भागातील स्वच्छता निरीक्षक व उद्यान निरिक्षकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कचरा जाळण्याच्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेतील दोन्ही अतिरिक्त आयुक्तांना सकाळी शहरात फेरी सक्तीची करण्यात आली आहे.
शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार समोर येत असून, त्यामुळे प्रदूषण होत आहे. महापालिकेने यापूर्वीच कचरा जाळणाऱ्यांना पाच हजारांचा दंड करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच असून माध्यमांमध्ये येणाऱ्या फोटोंमुळे आयुक्तच व्यथित झाले आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच कचरा जाळला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी कचरा जाळण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कचऱ्यासंदर्भात त्यांनी आता थेट विभागीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उद्यान निरीक्षकांवरच जबाबदारी निश्चित केली आहे. ज्या ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार समोर येतील त्या उद्यान निरीक्षकासह स्वच्छता निरीक्षकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरात कचरा जाळण्याचे प्रकार कमी होतील असा दावाही केला जात आहे.
कचरा जाळण्याचे प्रकार रोखण्यासाठी आयुक्तांनी पालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनाही सकाळची प्रभागफेरी सक्त‌िची केली आहे. अतिरिक्त आयुक्तांनी सकाळच्या सुमारास फेरफटका मारून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोन्ही आयुक्तांचे नियंत्रण आता कचरा जाळण्यावर राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महंत सुधीर पुजारी, पांगारकरांची चौकशी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चलनातील नव्या नोटा सापडल्याप्रकरणी आयकर विभागाने काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीर पुजारी आणि छावाचे जिल्हाध्यक्ष विलास पांगारकर यांची मंगळवारी कसून चौकशी केली. तब्बल तीन तास चाललेल्या या चौकशीनंतर दोघांना पुन्हा चौकशीस बोलविण्यात येण्याची शक्यता आहे.

रविवारी रात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा हायवेवरील एका शहरात नोटांच्या बदलीचा प्रकार होत असल्याची बाब कळताच आयकर विभागाने तेथे छापा टाकला. या ठिकाणी ७ लाख ७० हजार रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा आढळून आल्या. या ठिकाणी उपस्थित असलेले महंत पुजारी आणि पांगारकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर आयकर विभागाने दोघांनाही सोमवारी नोटीस बजावली. त्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी आणि चौकशीसाठी मंगळवारी दुपारी दोघेही गडकरी चौकातील आयकर विभागाच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी आयकर विभागाने दोघांची चांगलीच झाडाझडती घेतली. विविध बँकांमध्ये असलेली खाती, त्यात असलेली रक्कम, उत्पन्नाचे स्त्रोत, गेल्या काही वर्षांमध्ये भरलेला आयकर, त्याचे विवरण, हॉटेलमध्ये त्याचवेळी उपस्थित असण्याचे कारण आदींसंदर्भात तब्बल तीन तास दोघांचीही चौकशी करण्यात आली. चौकशीत मिळालेली माहितीच्या आधारे तपास करण्यात येणार असून, दोघांना पुन्हा चौकशीस बोलविण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, संबंधित रक्कम ही लुंकड या व्यापाऱ्याची असल्याचे सांगण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाम तपासणी पूर्ण; माहिती गुलदस्त्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा येथील रेशन धान्य घोटाळ्यासह अन्य घोटाळ्यांची पार्श्वभूमी आणि रेशन धान्य वितरणाबद्दलच्या तक्रारी या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात धान्य गोदामांची तपासणी मोहीम सुरू होती. ही मोहीम पूर्ण झाली असून, त्यामध्ये नेमके काय आढळून आले याची माहिती गुलदस्त्यात आहे. मंत्रालयीन स्तरावरून ही तपासणी झाल्याने प्रशासनातील स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.

धान्य गोदामांची नियमित तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र त्यास फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळेच घोटाळेबाजांना प्रोत्साहन मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेली अनेक वर्षे गोदाम तपासणीला वरिष्ठ स्तरावरून फारसे महत्त्व दिले जात नव्हते. परंतु, सुरगाणा आणि वाडीवऱ्हे येथे उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या रेशन धान्य घोटाळ्यानंतर राज्य सरकारला अशा तपासणीचे महत्त्व पटले आहे. जिल्ह्यात दोन वर्षांपासून धान्य गोदामांची नियमित तपासणी होत आहे. अशी तपासणी करण्यासाठी मंत्रालयीन स्तरावरून एक पथक नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांनी एफसीआयची गोदामे, शहर आणि तालुक्यांच्या गोदामांमधील धान्याची तपासणी केली.

ताळेबंदीची घेतली मा‌हिती

गेले तीन ते चार दिवस सर्वच गोदामांची तपासणी सुरू होती. नाशिकरोड, नाशिक तालुका आणि शहरातील इतर गोदामांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे पथकात ८ ते १० जण असल्याने दोन-दोन जणांनी एकाच वेळी विविध तालुक्यांतील गोदामांची पाहणी केली. त्यात गोदामातील शिल्लक माल, प्रत्यक्षात आलेला आणि वितरीत केलेला माल आणि या सर्वांच्या ताळेबंदाची माहिती घेतली.

ही माहिती घेतली जाणून

गोदामांना सरकारकडून किता धान्य मिळाले. दुकानदारांना किती धान्य वितरीत करण्यात आले. किती धान्य शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत धार्मिक स्थळे कारवाईला स्थगिती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
हायकोर्टाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात महापालिकेने सुरू केलेली कारवाई १५ डिसेंबरपर्यंत स्थग‌ित ठेवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. शिवसेनेच्या वतीने दिलीप दातीर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. व्ही. एन. कानडे यांच्या पीठाने अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईबाबत ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत. महापालिकेने पहिल्या टप्प्यात ८४ तर दुसऱ्या टप्प्यात ५७ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. परंतु अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्व्हेक्षण हे चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, त्यांसदर्भात थेट हायकोर्टात जनह‌ित याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होऊन हायकोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर गुरूवारी पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश कानडे यांनी दिले असून, तोपर्यंत कारवाई स्थगित ठेवा असे निर्देश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅग लिफ्टिंगला ब्रेक; चेन स्नॅचिंग सुसाट

0
0

नोटाबंदीनंतर चोरट्यांनी बदलली कार्यपध्दती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीनंतर सैरभैर झालेल्या चोरट्यांनी सध्या सोन्या-चांदीच्या दागिन्याकडे मोर्चा वळवला आहे. चलनी नोटांचा तुटवडा असल्याने घरफोडीच्या घटनांना अल्पविराम लागला असून, मागील काही दिवसांत चेन स्नॅचिंगच्या तब्बल १३ पेक्षा अधिक घटना शहर परिसरात घडल्या आहेत. याउलट, बॅग लिफ्टिंगसारखे गुन्हे बंद झाले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सराईत गुन्हेगारांच्या बदललेल्या ‘मोडस ऑपरेडीं’चे संशोधन पोलिसांना करावे लागत आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांनी जोर पकडला आहे. मंगळवारी दिवसभरात मुंबई नाका व पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या. गतवर्षाच्या तुलनेत चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वाढ झालेली दिसते. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत ९४ घटना घडल्या होत्या. या वर्षात हेच प्रमाण १०४ पर्यंत पोहोचले आहे. लग्नसराई आणि नोटांच्या तुटवड्यामुळे आगामी काही दिवस चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ८ नोव्हेंबरपूर्वी बॅग लिफ्टिंग, डिक्कीतील पैशांची चोरी, मदत करण्याच्या बहाण्याने बँकेत आलेल्या ग्राहकाच्या पैशांची चोरी असे प्रकार सर्रास घडत होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मात्र अशा गुन्ह्यांचे प्रमाण थेट शुन्यावर आले. दुसरीकडे घरफोडीच्या घटनांनासुध्दा काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. घरफोडीदरम्यान सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाल्याच्या काही तक्रारी समोर येत असल्या तरी चोरट्यांना मोठा हात मारता आलेला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत रात्रीच्या घरफोडीच्या २३१ घटना घडल्या होत्या, तर दिवसाढवळ्या ४८ वेळा चोरट्यांनी घर साफ केले होते. यंदा दिवसाच्या घरफोडींची संख्या २१९ वर स्थिरावली असून, दिवसाच्या घरफोडीची संख्या ४२ इतकी राहिली आहे. याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, यंदा घरफोडीचे प्रमाण कमी आहे. काही घटनांमध्ये सोने-चांदीचे दागिने चोरी झाल्याचे दिसते. मात्र, तुलनेत हे प्रमाण कमी आहे. ८ नोव्हेंबरनंतर गुन्हेगारांची मानसिकता बरीच बदलली असून, नोटांची उपलब्धता हे ही कारण त्या मागे असू शकते, असे गोरे यांनी स्पष्ट केले.
अवघे २२ टक्के गुन्हे उघडकीस

एकीकडे चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढीस लागलेले असताना झालेले गुन्हे शोधून काढण्यात पोलिसांना तितकेसे यश आलेले दिसत नाही. यंदाच्या १०४ गुन्ह्यांपैकी अवघ्या २३ घटनांच्या मुळापर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले आहे. तेच गत वर्षातील ९४ पैकी तब्बल ४४ गुन्हे पोलिसांनी शोधून काढले होते. एकंदरीत सर्व गुन्हे तपासाची मात्र टक्केवारी ६२ इतकी चांगली आहे. नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत सर्व प्रकारच्या तीन हजार २०३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गत वर्षी हेच प्रमाण तीन हजार ३२० इतके होते. या वर्षात गुन्ह्यांची संख्या ११७ ने कमी झाली असून, गुन्हे तपासाची टक्केवारी ५७ वरून ६२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

कोट

नोव्हेंबर महिन्यात चेन स्नॅचिंगच्या १३ घटना घडल्या. घरफोडी वा बॅग लिफ्टिंगसारख्या गुन्ह्यांपेक्षा चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वाढ झाली असून, त्यादृष्टीने उपाययोजना राबवल्या जात आहेत. लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोटांची उपलब्धता कमी असल्याने चोरट्यांनी आपल्या कार्यपध्दतीत बदल केला असावा.

- सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त

गुन्ह्याचा प्रकार - २०१५ - २०१६

गुन्हेदाखल - गुन्हे उघडकीस - गुन्हे दाखल - गुन्हे उघडकीस

चेन स्नॅचिंग - ९४ - ४४ - १०४ - २३

दिवसा घरफोडी - ४८ - ७ - ४२ - ९

रात्री घरफोडी - २३१ - ७५ - २१९ - ५२

इतर चोऱ्या - ४९२ - १०२ - ३९० - १०६

(आकडेवारी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीतील)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंबर दुरुस्तीसाठी प्राण पणाला

0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने गोदावरी व नंदिनी नदीत सांडपाणी मिसळू नये यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकत सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली आहे. परंतु, अनेक ठिकाणी काही जणांकडून सांडपाण्याची लाइनच फोडण्याचे प्रकार होत असतात. यात सातपूर भागात फोडलेल्या चेंबरचे पाणी बंद करण्यासाठी कामगारांचा जीवघेणा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरात चेंबर साफ करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. महापालिकेची स्थापना झाल्यावर गोदावरी व नंदिनी नदीत मिसळणारे सांडपाणी बंद करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले होते. त्यासाठी शहरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली होती. ड्रेनेजचे सांडपाणी गोदावरी व नंदिनीच्या किनाऱ्यालगत पाइपलाइन टाकत थेट तपोवनातील मलनिःसारण केंद्रात सोडण्यात आले आहे. परंतु, अनेक ठिकाणी नदी किनाऱ्यालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाइपलाइन तोडण्याचे प्रकार होत असतात. त्यामुळे पाइपलाइनद्वारे वाहून जाणारे सांडपाणी नदीत मिसळत असते. नदीत सांडपाणी मिसळत असल्याने अनेकदा गोदावरी बचाव कृती समितीकडून महापालिकेकडे तक्रारी केल्या जातात. त्यासाठी ज्या ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर तोडले जातात, तेथून बाहेर पडणारे सांडपाणी महापालिकेच्या गटार विभागाकडून बंद केले जाते. परंतु, फोडण्यात आलेल्या चेंबरचे पाणी बंद करण्यासाठी कुठलीच सुरक्षेची उपाययोजना करता कामगार चेंबरमध्ये उतरताना दिसतात. चेंबरमधून बाहेर पडणारे सांडपाणी बंद करण्यासाठी जीवघेणा प्रयत्न कामगारांकडून केला जात आहे. यात एखाद्यावेळी चेंबरमधून बाहेर पडणारे सांडपाणी बंद करताना जीवित हानी झाल्यास यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेने संबंधित यंत्रणेला पुरेशी सुरक्षा साधने पुरविण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

गोदावरी व नंदिनी नदीच्या किनाऱ्यालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइनची व्यवस्था महापालिकेने केली आहे. परंतु, अनेक ठिकाणी ड्रेनेज फोडण्याचे काम होते. तेथून सांडपाणी नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी कामगार जिवाची पर्वा न करता चेंबरमध्ये उतरतात. त्यांच्या सुरक्षेचे पुरेसे उपाय योजण्याची गरज आहे.

-गोरख आहेर, सातपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वेच्छानिधी कामांना ब्रेक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी तीन महिने अगोदरच नगरसेवकांच्या स्वेच्छानिधीच्या कामांना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी आजपासून (१४) करण्यात येणार असल्याने नगरसेवकांनी मंगळवारीच आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी धावपळ केली. महापालिकेत नगरसेवकनिधी दिला जात नसला तरी, विकासकामांसाठी दिला जाणारा निधी मतदारांवर प्रभाव पाडणार आहे. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविले आहे. त्यासंदर्भातील पत्र रवाना झाले आहे.
महापालिकेची मुदत संपण्याच्या तीन महिने अगोदरपासूनच आदर्श आचारसंह‌िता लागू करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. विशेषतः मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी नगरसेवकांच्या स्वेच्छानिधीलाच तीन मह‌िने अगोदर ब्रेक लावला आहे. स्वेच्छानिधीची कामे १४ डिसेंबरपासून बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पालिकेला दिले आहेत. त्यासंदर्भातील पत्रच आयुक्तांनी सर्व विभागांना दिले आहे. त्यामुळे बुधवारपासून सर्वच कामांना ब्रेक लागणार असल्याने नगरसेवकांनी मंगळवारीच ही कामे मार्गी लावण्यासाठी पालिकेत गर्दी केली होती. फटका बसू नये म्हणून नगरसेवकांनी स्वतः फाइल्स फिरवून अधिकाऱ्यांकडून त्या मंजूर करून घेतल्या. त्यामुळे मंगळवारी नगरसेवकांची गर्दी पहायला मिळाली. आपली कामे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकू नयेत, म्हणून त्यांनी मंगळवारीच शिल्लक कामांचे कार्यारंभ आदेश घेतलेत.
स्वेच्छानिधीच्या कचाट्यात नगरसेवकांची ५० लाखांची कामे अडकली आहेत. जवळपास विकासनिधीची निम्मी कामे ही पाइपलाइनमध्ये आहेत. त्यामुळे या कामांना आता अचानक ब्रेक लागणार आहे. दोन वर्ष भांडून मिळवलेला निधी हा आचारसंह‌ितेमुळे वाया जाणार आहे. महापालिकेत नगरसेवकनिधी नगरसेवकांना दिलाच जात नाही. त्याऐवजी विकासनिधी दिला जातो. त्यामुळे आचारसंहितेच्या कचाट्यात हा निधी येतो का, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने आता प्रयत्न सुरू झाले आहेत.

अर्धा निधी वाया जाणार?
आजपासून कोणत्याही विकासकामांचे कार्यारंभ देता येणार नाहीत. तसेच विकासकामांचे नारळही फोडता येणार नाही. बहुतांश नगरसेवकांची विकासकामे ही अजूनही पाइपलाइनमध्ये आहेत. बजेट उश‌िरा मंजूर झाल्याने निधीही उश‌िराच मिळाला आहे. त्यामुळे मंजुरी, निविदा या प्रक्र‌ियेला बराच वेळ गेला. त्यात आता आचारसंह‌िता आडवी आल्याने अर्ध्याहून अधिक नगरसेवक कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांवर आता पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढाब्यांवर एक्साइजचे छापे

0
0

मद्य विक्रीप्रकरणी दोन मालकांसह ग्राहकांना अटक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महामार्गावरील हॉटेल आणि ढाब्यांवर विनापरवाना मद्यविक्री होत असल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी कारवाई केली. पाथर्डी फाटा येथील एका हॉटेल व ढाब्यावर छापा टाकून एक्साईजने दोघा मालकांसह सात ग्राहकांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, एक्साइजने ही कारवाई तीव्र करण्याची मागणी केली जात आहे.

विलास शेलार व अजितकुमार मंडल या हॉटेलचालकांसह किरण ठाकूर, विजय झुटे, अक्षयकुमार जैन, योगेश मैंद, विक्रम वलदे, संतोष आहेर व संतोष गोली अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. एक्साईजच्या छाप्यादरम्यान वरील संशयित अवैधरित्या मद्य प्राशन करताना आढळून आले. अवैध पध्दतीने होणारी मद्याची विक्री रोखण्यासाठी सरकारने एक्साईज विभागाला आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्गावरील हॉटेल आणि ढाब्यांवर शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत निरीक्षक पी. एच. कस्तुरे व ब विभागाचे निरीक्षक यू. आर. आव्हाड यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (दि.१३) ही कारवाई केली. पाथर्डी फाटा येथील हॉटेल साईकिरण व चांगलंचुंगलं या ढाब्यावर छापा टाकला असता, पथकाला सात ग्राहक मद्य प्राशन करताना आढळून आले. या प्रकरणी दोघा हॉटेलचालकांसह मद्यसेवन करणाऱ्या सात ग्राहकांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून दोन हजार १०० रुपयांचा विदेशी मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. या पथकात दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे, पी. एस. कडभाने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक चव्हाणके, जवान भांगरे, पानसरे, पवार व अस्वले आदींनी सहभाग नोंदवला.

अवैध विक्री राजरोसपणे

हॉटेल आणि धाब्यांवर विनापरवाना मद्यविक्री करणे आणि मद्यसेवन करणे कायद्याने गुन्हा आहे, असे फलक दर्शनी भागात लावलेले असताना अवैध मद्यविक्री आणि राजरोसपणे मद्य सेवन सुरू असल्याचे या कारवाईतून पुढे आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमणूक कर शाखा होणार इतिहासजमा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षानुवर्षे कोट्यवधींचा करमणूक कर वसूल करणारा जिल्हा प्रशासनाचा करमणूक कर विभाग लवकरच बंद होणार आहे. या कराचा अंतर्भाव वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) होणार असल्याने एप्रिल २०१७ पासून करमणूक करवसुली सेल्स टॅक्स (विक्रीकर) विभागाकडून केली जाणार आहे. त्यामुळे करमणूक कर विभाग इतिहासजमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करमणूक कर शाखेचे स्वतंत्र दालन आहे. अनुज्ञेय असलेल्या करमणुकीच्या साधनांपासून मिळणारा कर वसूल करणे, महसूल गळती रोखणे व वाढविण्यासाठी करमणुकीच्या साधनांना वेळोवेळी भेट देऊन तपासणी करणे, करमणुकीच्या साधनांना विविध कायद्यान्वये अनुज्ञेय परवानग्या देणे, तसेच त्यांच्या नूतनीकरणाचे काम करमणूक कर शाखेकडून केले जाते. दर्जेदार हिंदी, इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झाले, की सरकारलाही मोठ्या प्रमाणात करमणूक कर मिळतो. या करवसुलीचे काम करमणूक कर शाखेकडून केले जाते. सशुल्क मनोरंजन करणाऱ्यांकडून प्राधान्याने कर आकारला जातो. चित्रपटगृहे, केबल, व्हिडीओ गेम पार्लर, वॉटर पार्क्सकडूनही नियमितपणे कर आकारणीचे काम या शाखेकडून केले जाते. करमणूक कराची वसुली करतानाच अनधिकृतपणे करमणूक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ठिकाणांचा शोध घेणे, त्यांची तपासणी करून दंडात्मक कारवाईची जबाबदारी या शाखेकडून पार पाडली जात होती. याशिवाय केबल व्यवसायाचीही कोट्यवधीची वसुली या शाखेकडून केली जाते. मात्र, विक्री व सेवाकरात (जीएसटी) करमणूक कराचा समावेश झाल्याने एप्रिलपासून ही जबाबदारी विक्रीकर विभागाकडे वर्ग होणार आहे.

येथून मिळतो कर

जिल्ह्यात सहा मल्टिप्लेक्स थिएटर्स असून, २० चित्रपटगृहे आहेत. याशिवाय २६ व्हीडिओ हॉल असून, दोन वॉटर पार्क आहेत. या सर्वांकडील करवसुलीचे काम करमणूक शाखा करते. याखेरीज सुला फेस्टिव्हल, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या कार्यक्रमांची करवसुली करमणूक कर शाखेकडूनच केली जात असे. मात्र, नवीन जीएसटी धोरणामुळे आता ही जबाबदारी विक्रीकर विभागाकडे वर्ग होणार आहे. करमणूक कर शाखेत २५ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना महसूल विभागातील अन्य शाखांमध्ये समायोजित केले जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात बँकांबाहेर पैशांसाठी लांब रांगा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नोटाबंदीच्या काळात सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून बँका सुरू झाल्यामुळे ग्राहकांनी एकच गर्दी केल्याने बँक प्रशासनाची धांदल उडाली. शहरातील सर्वच बँकासमोर रोख रक्कमेसाठी मोठे संकट उभे ठाकल्याने ग्राहकांना ताटकळत बसावे लागले.

पाचशे व एकहजार रुपयांचा नोटा बंद केल्यानंतर सर्वत्र आर्थिक व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. किरकोळ दुकानदारांपासून तर थेट मोठमोठ्या मॉल्सपर्यंत ही आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हातात पैसा नसल्याने व्यापारातील मंदी मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील स्टेट बँक, देना बँक, महाराष्ट्र बँक, कार्पोरेशन बँक, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, बॅक ऑप इंडिया या राष्ट्रीयकृत बँक सह एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, सटाणा मर्चटस्, नाशिक मर्चटस्, हस्ती कॉ. ऑप बँक या व्यापारी बँकामध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. ग्राहकांना दोन ते पाच हजार रुपयांपर्यत रोख रक्कम देण्यात येत होती. मात्र आता तीही मंदावली असल्यामुळे आर्थिक उलाढालींवर आता निर्बंध आले आहेत.

गत तीन ते चार दिवसांपासून घरात किराणा व जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने हाल होत आहेत. सकाळी ९ वाजेपासून इतर कामधंदा सोडून पैसे काढण्यासाठी रांगेत उभा आहे. दुपारचे तीन वाजेपर्यंत नंबर आलेला नव्हता.

- नाना वानखेडे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिर्डीप्रमाणे त्र्यंबकलाही हवे टोकनद्वारे दर्शन!

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शिर्डी साईबाबा देवस्थानप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिरातही टोकन पद्धतीने दर्शन सुरू करावे, अशी नागरिकांची अपेक्षा असून, याबाबत सोशल मीड‌ियातून चर्चा घडत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे दररोज दहा हजारांच्या दरम्यान भाविक येत असतात. या भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात. दर्शनासाठी कधी कधी तर चार तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामळे त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्गाच आनंद घेण्यासाठी पर्यटक, भाविकांना वेळ अपूर्ण पडलो. वाहनतळावर वाहन उभे केल्यानंतर तसेच, बस स्थानकापासून थेट मंदिराकडे हे भाविक धाव घेतात. मात्र दर्शनबारीतच त्यांचा बराच वेळ जातो. वास्तव‌िक पाहता त्र्यंबकेश्वर येथे अती प्रचीन मंदिर, कुंड तलाव आहेत. येथे ८०० वर्षांचा वारसा सांगणारी संस्कृती पर्यटक भाविकांनी सतत खुणावत असते. यामध्ये वारकरी संप्रदायाचे आद्य संस्थापक संत निवृत्तीनाथ महाराज यांचे संजिवन समाधी मंदिर आहे. गोदावरीचे उमगस्थळ, कुशावर्त हे देखील भाविकांसाठी आकर्षणा मुद्दा आहे. त्याचलगत गंगा गोदावरीचे मंदिर आहे. हजार पाचशे किलोमीटर प्रवास करून आलेल्या भाविकांना मात्र या निसर्गाचा, येथील वास्तूंचा आनंद घेण्यासाठी वेळच शिल्लक राहत नाही.

व्यवसायास चालना मिळेल

भाविकांनी वाहनातून उतरून थेट दर्शनरांगेत धाव घेतल्याने जसे भाविकांसाठी समस्या निर्माण होतात तसे येथील व्यवसाय‌िकांच्याबाबतही आहे. दररोज हजारो भाविक येतात. मात्र वाहतळ ते मंदिर याच एकमेव मार्गावरील व्यवसाय‌िकांना फायदा होत असतो. शहरात इतरत्र शुकशुकाट असतो. परीणामी वाहनतळ ते मंदिर रस्त्यावर व्यवसाय‌िक जागांचे भाडेही गगणाला भिडले आहे. त्याच्याच परिणामामुळे या रस्त्यावर अतिक्रमणही वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आघाडीसाठी जोर; युती काडीमोडच्या उंबरठ्यावर

0
0



म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नगरपरिषद निवडणुकीनंतर आता तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांच्या निवडणुकीने जोर धरला आहे. तालुक्यातील सात जि. प. गट व पंचायत समितीचे चौदा गण ताब्यात घेण्यासाठी पक्षीय पातळीवर आतापासूनच रणनीती निश्चित होऊ लागली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची निर्मितीची शक्यता बळावली असताना युतीचे पुन्हा एकदा काडीमोड होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नाशिक जिल्ह्यात क्रमांक दोनच्या जिल्हा परिषदेच्या सात गटांचा समावेश बागलाण तालुक्यात होतो. गट व गणांच्या सर्वाधिक जागा या ठिकाणी असल्याने जिल्हा परिषदेतील सत्तेची बहुतांश मदार या तालुक्यावर अवलंबून असते. नाशिक जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा एकदा बहुमान या तालुक्याला मिळाला आहे. आगामी काळातील नवीन आरक्षण हे महिला सर्वसाधारण गटातील असल्याने नवीन गट-गण रचनेत दोन गट महिला सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने राजकीय लढाई रंगणार आहे.

बागलाण तालुक्यात पठावे दिगर, जायखेडा, ताहाराबाद, नामपूर, वीरगाव, ठेंगोडा व ब्राह्मणगाव या सात जिल्हा परिषद गटांचा समावेश होतो. सद्यस्थितीत पठावे दिगर, जायखेडा, ठेंगोडा हे तीन गट राष्ट्रवादीकडे, ताहाराबाद व वीरगाव गट काँग्रेस, नामपूर भाजप व ब्राह्मणगाव गट शिवसेनेकडे आहे. यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या जि. प. निवडणुकीत या सातही गट आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपच्या एकला चलो रे या भूमिकेतून पक्षीय कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी युतीची काडीमोड घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तालुक्यातील सातही गटांचे नव्याने आरक्षण बदलेले आहे. पठावे दिगर हा गट यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. यामुळे या गटातून महिला व पुरूष उमेदवारी करू इच्छित असल्याने राष्ट्रवादीच्या विद्यमान सदस्या सिंधुताई सोनवणे यांचे पती संजय सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक सचिन सावंत, कळवणचे सदस्य रवींद्र पगार यांची नावे चर्चेत आहेत.

ताहाराबाद गट अनुसूचित जमाती गटासाठी राखीव झाला आहे. काँग्रेसचे जि. प. सदस्य प्रशांत सोनवणे यांची या ठिकाणी पंचाईत झाली आहे. या ठिकाणी आदिवासी समाजाला प्राधान्य मिळणार आहे.

जायखेडा गट सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. विद्यमान राष्ट्रवादीचे सदस्य यतीन पगार यांना या ठिकाणी पक्षातूनच आव्हान मिळणार आहे. तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, विनोद ठाकरे, दिनेश सावळा, इच्छुक आहेत. भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष संजय भामरे, नवलसिंग खैरणार, भाऊसाहेब भामरे यांच्यात लढत रंगणार आहे. नामपूर गट हा अनुसूचित जमातीकरिता राखीव झाला आहे. यामुळे विद्यमान भाजप सदस्या सुनीता पाटील यांनादेखील उमेदवारी थांबवावी लागणार आहे.

वीरगाव गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. यामुळे काँग्रेसचे विद्यमान सदस्य प्रा. अनिल पाटील यांना उमेदवारी करण्यासाठी आपला गट बदलण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी आदिवासी महिला आरक्षण झाल्याने आदिवासी समाजाला प्राधान्य मिळणार आहे.

ठेंगोडा सर्वसाधारण गट हा सर्वसाधारण स्त्री गटासाठी राखीव झाला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य शैलेश सूर्यवंशी यांची पंचाईत झाली आहे. त्यांनी आपल्या पत्नी हेमलता सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू केला आहे. काँग्रेसच्या वतीने माजी जि. प. सभापती यशवंत पाटील यांनी आपल्या पत्नी माजी सभापती संगीता पाटील, विद्यमान जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी आपल्या पत्नीला, तर राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष धर्मराज खैरणार व शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी आपल्या पत्नी अर्चना सोनवणे यांच्यासाठी या गटात चाचपणी सुरू केली आहे.

ब्राह्मणगाव गट सर्वसाधारण महिला गटासाठी खुला झाला आहे. यामुळे शिवसेनेचे विद्यमान सदस्य प्रशांत बच्छाव यांनी आपली पत्नी वैशाली बच्छाव यांना पुढे केले आहे. मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव यांनी आपला हा पूर्वाश्रमीचा गट असल्याने माजी जि. प. सभापती लता बच्छाव यांनी उमेदवारी निश्चित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुजन क्रांती मोर्चा नियोजनासाठी बैठक

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

समाजातील बहुजन आणि वंचितांच्या न्याय हक्कासाठी येत्या तीन जानेवारी रोजी नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी येत्या रविवारी (दि. १८) छत्रपती हॉल, सेवाकुंज, पंचवटी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, मोर्चासाठी संयोजकांची अशोकस्तंभ येथे आढावा बैठक झाली.

अॅट्रॉसिटी कायदा कडक करण्यात यावा, अॅट्रॉसिटीसाठी स्वतंत्र न्यायालय व स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा, कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, ओबीसींची जातनिहाय जनगणना करून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, भटक्या विमुक्त जाती जमातींना अॅट्रॉसिटी कायद्याद्वारे संरक्षण द्यावे, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, नोकऱ्यांमधील राखीव जागांचे अनुशेष तत्काळ भरावे, ओबीसी व आदिवासींच्या आरक्षणातील घुसखोरी थांबवावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मुस्लिम समाजाला सच्चर कमिशन लागू करून आरक्षण द्यावे, बहुजन समजातील राजकीय नेत्यांवर आकसापोटी केलेली कारवाई थांबवावी, भूमिहीनांना शासकीय जमीन वाटप करण्यात यावी, ख्रिश्चन जनसमुदाय व चर्चवरील हल्ले थांबवावे, शेतमालाला हमी भाव द्यावा आणि स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद करावी, अश्या विविध मागण्यांवर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीत अॅड. सुजाता चौदन्ते, विराज दाणी, शिवराज जाचक, सिद्धार्थ ढेंगळे, अक्षय अहिरे, गौतम जाधव, सागर साळवे, सागर पवार, रोशन चव्हाण, सोमनाथ खरात, विलास गांगुर्डे, तेजस ढेंगळे, सचिन दप्तरे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅटक्षेत्र कमी देणे भोवले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करारनाम्यात ९०८ चौरस फूट बिल्टअप एरिया दाखवून प्रत्यक्षात १०९.२२ चौरस फूट बांधकाम कमी दिल्यामुळे ग्राहक न्यायमंचाने बिल्डरला दणका देत कमी क्षेत्राचे २ लाख ३१ हजार ५४६ रुपये फ्लॅटधारकाला देण्याचे आदेश दिले. तसेच फ्लॅटचे अंतिम हस्तांतरण एका महिन्याच्या आत करून देणे याशिवाय पार्किंगमधील पेव्हरब्लॉकचे लेव्हलिंग व मुख्य प्रवेशद्वाराजवळ काँक्रिटीकरण करून देणे, वनटाइम मेन्टेनन्ससाठी बँकेत खाते उघडून ३५ हजार रुपये जमा करण्याचे आदेश देत बिल्‍डरला २५ हजार रुपये दंड ठोठावला.

मालेगाव स्टॅण्ड येथे राहणाऱ्या तुळशीराम बैरागी व प्रेरणा बैरागी यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात केलेल्या तक्रारीनंतर हा निकाल देण्यात आला. या तक्रारीत बैरागी यांनी म्हटले, की आम्ही बिल्डर पूनम वर्धमान गांधी यांच्याकडून कमल कांती अपार्टमेंटमध्ये १९ लाख २५ हजाराला फ्लॅट विकत घेतला. वनटाईम मेन्टेन्सपोटी ३५ हजार रुपये दिले. त्यानंतर फ्लॅटचा कब्जा मिळाल्यानंतर ९०८ चौरसफूटचा फ्लॅट ७९८.७८ असल्याचे मोजमाप केल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे १०९.२२ चौरस फूट इतके क्षेत्र कमी दिल्यामुळे त्याच्या प्रति चौरसफूट २१२० दराप्रमाणे २ लाख ३१ हजार ५४६ रुपये मिळावे. डीड ऑफ डिक्लेरेशन, क‌‌‌म्प्लिशन सर्टिफिकेट इ. मिळाले नाही. पेव्हरब्लॉक निकृष्ट दर्जाचे बसवले व मुख्य प्रवेशद्वाराजवळ क्राँक्रिटीकरण केले नाही. इतरही काही काम बाकी आहे.

या तक्रारीवर युक्तिवाद करताना बिल्डर गांधी यांनी फ्लॅटधारक बैरागी यांनी सदनिकेच्या मूळ किमतीतील ८५ हजार रुपये वीजमीटर, डीपीचार्जेस ही रक्कम दिली नाही. त्यामुळे अंतिम हस्तांतरण करून दिले नाही. सदनिका ताब्यात देताना तिचे मोजमाप करून देण्यात आले आहे. बैरागी यांनी २५ टक्के अधिक बिल्टअप क्षेत्र अशी मोजणी केलेली आहे. ती चुकीची आहे. वास्तविक सदरची मोजणी ३५ टक्के अधिक बिल्टअप क्षेत्र करणे आवश्यक आहे. असे असताना केवळ आपल्याकडे असलेली रक्कम द्यावी लागू नये म्हणून ही खोटी तक्रार केल्याची बाजू मांडली.

सेवा देण्यात कुचराई
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने आपल्या निकालात सेवा देण्यास कुचराई केल्याचे कारण देत लोडिंग पर्सेंटेज नमूद न करता करारनाम्यात मोघम बिल्टअप व कार्पेट एरिया नमूद करण्यात येतात. अशा प्रकारे प्रतिचौरस फुटाप्रमाणे फ्लॅटची किंमत आकारणे ही अनिष्ठ व्यापारी प्रथा आहे. त्यामुळे दोन्ही बाजू व पुरावे बघितल्यानंतर बिल्डरने कमी क्षेत्र दिल्यापोटी २ लाख ३१ हजार ५४६ रुपये द्यावे, तसेच एक महिन्याच्या आत हस्तांतरण दस्त व पार्किंगमधील पेव्हरब्लॉक लेव्हलिंग व मुख्य प्रवेशद्वाराजवळ काँक्रिटीकरण करून द्यावे. तसेच ३५ हजार रुपये वनटाइम मेन्टेनन्सचे खाते उघडून जमा करावेत. तक्रारदाराला शारीरिक व मानसिक त्रासापोटी १५ हजार व अर्जाचा खर्च १० हजार रुपये द्यावा. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी व कारभारी जाधव यांनी दिला. बैरागी यांच्याकडून अॅड. के. बी. चांदवडकर यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकमुखी दत्त मंदिरात उद्यापासून दत्तयाग

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

श्री एकमुखी दत्त मंदिरातर्फे आयोजित श्रीदत्त जयंती सोहळ्याच्या सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. दत्तयाग शुक्रवारपासून (दि. १६) सुरू होणार आहे. दरम्यान, दत्तवाडी, रविवार कारंजा येथील श्री एकमुखी दत्त मंदिरातर्फे आयोजित श्रीदत्त जयंती सोहळ्यात मंगळवारी सायंकाळी दत्त जन्मोत्सव उत्साहात करण्यात आला. मुख्य पूजारी मयूर बर्वे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावरील श्री समर्थ सद्गुरू ढगे महाराज समाधी मंदिरात ढगे महाराज पुण्यतिथी आणि श्री दत्त जयंती उत्सव घेण्यात आला. येथे पादुका पूजन, दत्त मूर्ती पूजन, मंगलस्नान, रुद्राभिषेक, पालखी मिरवणूक, ज्ञानेश्वरीताई यांचे काल्याचे कीर्तन, महाआरती, महिला भजनी मंडळाचे भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले. श्री समर्थ सद्गुरू ढगे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष श्रीपत देशमुख, अनंता ढगे, श्रीकांत ढगे, शरदराव धोंगडे आदींनी परिश्रम घेतले.

अमृतधाम परिसरातील शिवगोरक्ष योगपीठात विविध उपक्रम घेण्यात आले. भगवान महाराज ठाकरे व शिवानंद महाराज यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात विडीकामगार नगर, तुलसी कॉलनी आदी भागातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. जगन पगार, संदीप नाठे, विनोद बनकर आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images