Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उपनगराध्यक्ष, स्वीकृतसाठी चुरस

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात महिनाभरापूर्वी झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता पहिली विशेष सर्वसाधारण सभा आज, शुक्रवारी (दि. ३०) होणार आहे. त्यात उपनगराध्यक्षपदाची निवड व स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार असून, त्यासाठीची चुरस पाहायला मिळणार आहे. उपनगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र स्थानिक पातळीवर भरले जाणार आहे, तर स्वीकृत नगरसेवकपदासाठी गुरुवारी सहा नगरपालिकांच्या १४ जागांसाठी २३ नावांची शिफारस करण्यात आली असून, त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात तपासून ते नगराध्यक्षांकडे सकाळी पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर गटनेत्यांच्या शिफारशीनुसार तौलनिक बळानुसार या सदस्यांची नियुक्ती होणार आहे.

जिल्ह्यातील मनमाड, सिन्नर, नांदगाव व भगूर या नगरपालिकांत शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले असून, येवला येथे भाजपला संधी मिळाली आहे, तर सटाणा येथे विकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे. या सहाही नगरपालिकांत काही ठिकाणी संख्याबळ कमी-अधिक प्रमाणात सत्ताधारी गटाकडे आहे. त्यामुळे शुक्रवारच्या या निवडणुकीत उपनगराध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे स्वीकृत सदस्यपदासाठीही इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सत्ताधारी गटाप्रमाणे विरोधी गटाचीही अडचण झाली आहे. त्यामुळे तौलनिक संख्याबळापेक्षा जास्त अर्जांची शिफारस गटनेत्यांनी केली आहे.

स्वीकृत सदस्यत्वासाठी गटनेता देणार नाव

स्वीकृत सदस्यांच्या तौलनिक बळानुसार गटनेता नगराध्यक्षांना नाव देणार असून, त्यानंतर नगराध्यक्ष त्याला संमती देणार आहेत. त्यामुळे तौलनिक संख्याबळानुसारच ही नियुक्ती होणार आहे.


...यांनी दाखल केलेत अर्ज

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी मनमाड नगरपालिकेतून महेश बोरसे, गंगाभाऊ त्रिभुवन, सतीश शर्मा, नरेश फुलवाणी व शेख नझीम अफजल यांनी अर्ज दाखल केले. सिन्नर नगरपालिकेतून भवरलाल कलंत्री, विजय जाधव, मंगला शिंदे, रामानाथ भाऊशेठ लोणारे यांनी अर्ज दाखल केले. सटाणा नगरपालिकेतून मनोहर दगाजी देवरे, विद्या मनोहर सोनवणे, फारुक नूर मोहंमद शेख यांनी अर्ज दाखल केले. भगूर नगरपालिकेतून फरिद बापू शेख यांचा अर्ज दाखल झाला. येवला नगरपालिकेतून अजय भागचंद जैन, पंकज पारख, सुनील काबरा, हुसेन शेख, रुपेश दराडे, राजेंद्र लोणारी, योगेश पाटील यांनी अर्ज दाखल केले. नांदगावमधून महावीर पारख, अरुण पाटील व मोकळ यांनी अर्ज दाखल केले. यातील काही अर्ज उशिरापर्यंत भरणे सुरू होते.


नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सभा

नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर पहिली सभा जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत आतापर्यंत होत होती. पण, यावेळी थेट नगराध्यक्षांना अधिकार देण्यात आल्यामुळे ही सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, त्यात उपनगराध्यक्षपदाची निवड व स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.


सर्व सभा एकाच तारखेला

थेट नगराध्यक्षांना सभेचे अधिकार दिल्यामुळे जिल्ह्यातील सहाही सभा वेगवेगळ्या तारखांना होतील, असे संकेत होते. पण, या सर्व नगराध्यक्षांनी एकमेकांना विचारून एकच तारीख निवडल्यामुळे या सभा एकाच वेळी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेरच्या सभेलाही नगरसेवकांची दांडी!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिडको

आगामी महापालिका निवडणुकांमुळे राजकीय वारे वाहत असताना दुसरीकडे सिडकोतील २२ पैकी तब्बल १६ नगरसेवकांनी गुरुवारी शेवटच्या प्रभाग सभेला दांडी मारल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रभाग सभेत केवळ दोनच विषय असतानाही अवघे सहाच नगरसेवक उपस्थित राहिले. वेळेपेक्षा तब्बल एक तास उशिराने झालेल्या या सभेत उपस्थित नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचे आभार मानून आचारसंहितेत जनतेची कामे करण्याची सूचना केली.

सिडको प्रभाग समितीची बैठक प्रभाग सभापती अश्विनी बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लक्ष्मण जायभावे, उत्तम दोंदे, अॅड. अरविंद शेळके, रत्नमाला राणे, कांचन पाटील, शोभा फडोळ आदी सदस्यांसह विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ही बैठक तब्बल एक तास उशिराने सुरू झाल्यानंतर या सभेतील विषयपत्रिकेतील दोन विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी नगरसेवक जायभावे यांनी सिडकोत अद्यापही नवीन घंटागाडी सुरू झाली नसल्याची खंत व्य‍क्त केली. त्याचबरोबर सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक ठिकाणी अनधिकृत फलक लावले जात असून, त्याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना केली. पाच वर्षांच्या काळात कोणा अधिकाऱ्यांना विकासकामांवरून बोललो असेल, तरी त्याचा अधिकाऱ्यांनी राग मानू नये, असे आवाहनही केले. अॅड. शेळके यांनी सोनवणे चाळीतील ड्रेनेजचा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर यावेळी त्यांनीही अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्याचबरोबर राणे, फडोळ यांनीही अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी प्रभाग सभापती बोरस्ते यांनी पाच वर्षांत नगरसेवकांना चांगलेच सहकार्य केले आहे. मात्र, उद्यान विभागाने झाडे लावण्याचा दिलेल्या ठेक्याबाबत नगरसेवकांना माहिती दिली नसल्याची खंत व्यक्‍त केली. उद्यान विभागाकडून केवळ कागदपत्रेच रंगविली जात असून, प्रत्यक्षात वृक्षारोपण चुकीच्या पद्धतीने झाल्‍याचा आरोप सभापतींनी केला. अखेरीस उपस्थित सदस्यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले.अखरेच्या सभेचा समारोप केला.

अनेक महिन्यांपासून दुर्लक्ष

चालू पंचवार्षिकातील अखेरच्या प्रभाग सभेकडेही सिडकोतील बहुसंख्य नगरसेवकांनी पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्‍त करण्यात आले. त्याचबरोबर मागील महिन्यांतही अशाच प्रकारे नगरसेवकांची वाट पाहून सभा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात व पंचवार्षिकच्या शेवटच्या टप्प्यातच हा प्रकार घडला असला, तरी पुढे असे प्रकार घडू नयेत, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाराशे विद्यार्थ्यांचे थेट पंतप्रधानांना पत्र...

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकलहरे येथील सध्या अस्तित्वात असलेला औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद करण्यात येऊ नये व नव्याने प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्प रद्द करण्याऐवजी लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आता एकलहरे येथील माध्यमिक विद्यामंदिर व कॉलेजचे विद्यार्थीही सरसावले आहेत. येथील तब्बल १२०० विद्यार्थ्यांनी आपला आवाज थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी चक्क त्यांना पत्राद्वारेच साकडे घातले आहे.

एकलहरेतील या शाळेतील बहुतांश विद्यार्थी एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील कामगारांचे पाल्य आहेत. बुधवारी दुपारी हा अनोखा उपक्रम शाळेत झाला. शाळेतील १२०० विद्यार्थ्यांनी प्राचार्य पोपट आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली थेट पंतप्रधानांनाच पत्र लिहून आपल्या भावना कळविल्या आहेत.

एकलहरे येथे सध्या प्रत्येकी २२० मेगावॅट क्षमतेचे औष्णिक वीजनिर्मितीचे तीन संच कार्यान्वित आहेत. या तीनही वीजनिर्मिती संचांची मुदत सन २०१९ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे २०१९ नंतर येथील वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे.

याशिवाय एकलहरे येथेच नव्याने ६६० मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्पही प्रस्तावित आहे. परंतु, या नव्याने प्रस्तावित वीजप्रकल्पाला आवश्यक अशा २८० मीटर उंचीची चिमणी उभारण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या ना हरकत दाखल्याची अद्यापही प्रतीक्षा आहे. त्यामुळे नवीन प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्पाचेही भवितव्य तळ्यात-मळ्यात आहे.

या दोन्हीही प्रकल्पांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी नाशिकच्या लोकप्रतिनिधिंकडूनही काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु, त्यांनाही अद्याप यश मिळालेले नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन एकलहरे येथील सागर जाधव, नीलेश छाजेड, नवनाथ टिळे, एल. एन. सानप, व्ही. जे. आघाव, आदींच्या सहकार्याने या शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाचे गाऱ्हाणे थेट पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मांडले आहे.


पत्रातून मांडलीय वस्तुस्थिती...

या पत्राद्वारे या विद्यार्थ्यांनी एकलहरेचा सध्या सुरू असलेला प्रकल्प बंद करण्यात येऊ नये व प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी लवकरात लवकर हिरवा कंदील द्यावा, अशी मागणी केलेली आहे. तसे न झाल्यास या प्रकल्पातील वीज कामगारांची कुटुंबे रोजगाराअभावी उद््ध्वस्त होणार असल्याची व या प्रकल्पावर आधारित असलेले छोटे-मोठे रोजगारही संपुष्टात येणार असल्याच्या वस्तुस्थितीची कल्पना या पत्रांतून दिलेली आहे. ही सर्व पत्रे एकलहरे व नाशिकरोड येथील पोस्ट कार्यालयातून पोस्ट करण्यात आली.

---

एकलहरे वीजनिर्मिती प्रकल्प बंद करण्यात येऊ नये व नव्याने प्रस्तावित ६६० मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी करणारे पत्र १२०० विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आपल्या कुटुंबाच्या भावनाही मांडल्या आहेत.

-एस. एन. वाघ, शिक्षक

एकलहरे येथील सध्याचा प्रकल्प बंद करण्याविषयी अथवा प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याविषयीचे केंद्र शासनाचे कोणतेही आदेश नाहीत. सध्याच्या प्रकल्पाची मुदत मात्र २०१९ मध्ये संपत आहे. परंतु, नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. चिमणी उभारणीसाठी संरक्षणमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे.

-हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकरच्या वक्रदृष्टीची गोल्डन बाबालाही धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वरमधील काही पुरोहित मंडळींची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असतानाच, शहरात दाखल झालेले बहुचर्चित सुधीर कुमार मक्कड ऊर्फ गोल्डन बाबा यांनी या कारवाईची चांगलीच धास्ती घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अंगावर तब्बल १५ किलो सोने मिरविणारे गोल्डन बाबा आता अवघ्या चार किलो सोन्यासह त्र्यंबकनगरीत मिरवत आहेत.

जुन्या आखाड्याचे महंत असलेले गोल्डन बाबा सिंहस्थ कुंभमेळ्यात आकर्षणाचे केंद्र ठरले होते. मूळचे उद्योजक असलेले हे बाबा काही वर्षांपूर्वी महंत बनले. सोन्यात आपल्या देवता वास करीत असल्याने ते आपण जास्त प्रमाणात परिधान करीत असल्याचा त्यांचा दावा आहे. पण आता बाबांच्या अंगावर कमी झालेले सोनेपाहून भाविकांसह त्र्यंबकवासीयही आश्चर्यचकीत झाले आहेत. काही भाविकांनी बाबांना गराडा घालून त्यांच्याकडे विचारणाही केली. मात्र, बाबांनी अधिक बोलण्यास नकार दिला. प्राप्तिकर विभागाची वक्रदृष्टी कधीही पडू शकते यामुळेच गोल्डन बाबांनी सोनं घटवल्याची चर्चा शहरात होत आहे.

अंगावर सोन्याच्या मोजक्या दागिन्यांसह गोल्डनबाबांनी त्र्यंबकेश्वराजाच्या गर्भगृहात जाऊन पूजा-अभिषेक केला. सोन्याच्या जादा वजनामुळे मानेला त्रास होत असल्याने ते साडेअकरा किलोन चार किलोपर्यंत कमी केल्याचा दावा गोल्डनबाबांनी ‘मटा’कडे केला. मानेच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठीच आपण त्र्यंबकेश्वरमधील फरशीवाला बाबांकडे उपचारांसाठी आल्याचेही त्यांनी नमूद केले. बाबा त्र्यंबकराजाचा अभिषेक करून नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांसाठी नवी दिल्ली येथे परतणार आहेत.

माझ्याजवळ सध्या अंगावर आहे तेवढेच सोने आहे. या सोन्याचा कर मी शासनाला जमा केलेला आहे. संपत्तीकरसुद्धा मी भरलेला आहे.

- गोल्डनबाबा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरेच्या कोठडीत वाढ यांना मिळाली कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीड कोटी रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला मुख्य सूत्रधार छबू नागरेसह ११ संशयितांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने २ जानेवारीपर्यंत पाच दिवसांची वाढ केली आहे. संशयितांविरोधात आणखी काही कलमांचा वापर झाला असून, बँक खात्यांची माहिती घेण्याची प्रक्रिया अद्याप संपलेली नाही.

बनावट नोटांची निर्मिती करून त्याद्वारे कमिशन एजंटाना लुटण्याचा डाव आखणाऱ्या छबू नागरेसह रामराव पाटील-चौधरी, रमेश पांगरकर व इतर आठ जणांना आडगाव पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री जत्रा हॉटेलसमोर अटक केली होती. या प्रकरणी कोर्टाने संशयितांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. छबू नागरेच्या विविध बँकांमध्ये १२ पेक्षा अधिक सेव्हिंग, तसेच कंरट खात्यात सुमारे ५७ लाख रुपये आढळले असून, नागरेची सर्व खाती सील केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजन बंधूंंची 'गोल्डन क्वाड्रिलॅटरल’ मोहीम फत्ते

$
0
0

१० दिवस २० तासात ६ हजार किमीचे अंतर पार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेस अॅक्रॉस अमेरिका या जगातील अत्यंत खडतर अशा समजल्या जाणाऱ्या स्पर्धेचे विजेते डॉ. हितेंद्र आणि महेंद्र महाजन बंधूंनी नाशिकच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला आहे. त्यांनी 'गोल्डन क्वाड्रिलॅटरल ऑफ इंडिया’ ही देशासाठी समर्पित असलेली ६ हजार किलोमिटरची मोहीम त्यांनी १० दिवस २० तासात वेळेआधी पूर्ण केली आहे.

ही स्पर्धा वेळेत पूर्ण करणारे महाजन हे भारतातील एकमेव स्पर्धक ठरले आहेत. या मोहिमेला १८ डिसेंबरपासून गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून सुरुवात करण्यात आली होती. भारतीय नागरिकांना नियम पाळण्याविषयीचे प्रबोधन या मोहिमेत करण्यात आले. या मोहिमेत रोज ५०० किलोमीटर याप्रमाणे १२ दिवसात ६ हजार किलोमीटर अंतर कापण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले होते. मात्र महाजन बंधूंनी ६ हजार किलोमीटरचे अंतर १० दिवस २० तासात वेळेआधी पूर्ण केली आहे.

गुरुवारी, पहाटे ३ वाजता महाजन बंधुंचे गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन झाले. तेथे केक कापून त्यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर महाजन बंधू नाशिकला आले परंतु, क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी त्यांना तातडीने बोलावून घेतल्याने २९ तारखेला त्यांना पुन्हा मुंबईला जावे लागले आहे. या मोहिमेत महाजन बंधुंनी ७ राज्यांमधून सायकल चालवली. सुरुवातीची ३० किलोमीटर्सचे अंतर महाजन बंधूंनी सोबत कापले. व नंतर महेंद्र महाजन विश्रांतीसाठी युटिलीटी वाहनात विश्रांती घेण्यासाठी थांबले. पहिल्या दिवसाच्या प्रवासात बेळगावपर्यंत पोहचण्याचे ठरविण्यात आले होते. अनेक ठिकाणी त्यांना थंडी, ऊन, वारा, अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. कानपूर ते दिल्ली या अंतरावर मोठ्या प्रमाणात धुके असल्याने हे अंतर कापण्यास त्यांना सर्वाधिक वेळ लागला होता.

बिगबींकडून दखल

महाजन बंधुंच्या या मोहिमेची सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही दखल घेतली. त्यांनी ट्विटरवरून त्यांचे अभिनंदन केले आहे. खुद्द अमिताभने या उपक्रमाची दखल घेत महाजन बंधुच्या पुढील कारकिर्दीबद्दलही शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटला लाखो लोकांनी रि-ट्विट केले असून तितक्याच लोकांनी लाइक केले आहे.

सायकल चळवळीला ‘बुस्ट’

या मोहिमेमुळे नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचे पहाटे आगमन होताच त्यांच्या सिडको येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या या मोहिमेमुळे नाशिकच्या सायकल चळवळीला पुन्हा एकदा बुस्ट मिळेल असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृह मोठा; नाही समस्यांचा तोटा!

$
0
0

नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा

मोबाइल फोनचे घबाड आढळून आल्यानंतर नाशिकरोड कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेची प्रतिमा नजरेत मलीन झाली आहे. या संदर्भातील गुन्हे दाखल करायला जातांना कारागृहाच्या अधिकाऱ्यांवर तोंड झाकून पोलिस ठाण्यापर्यंत जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारागृहात मोबाइल फोनचा अक्षरशः पाऊस पडत आहे. परिणामी कारागृहाची सुरक्षा व्यवस्था केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे मानले जात आहे.

राज्यातील सर्वांत जास्त कैद्यांची क्षमता असलेल्या नाशिकरोड कारागृहात काही एका दिवसांत मोबाइल आढळून आलेले नाहीत. त्याची सुरुवात एप्रिलमध्येच झाली होती, असे दाखल गुन्ह्यांवरून दिसून येते. मात्र, यावर कडक उपाययोजना न झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड झालाआहे. कारागृहाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या या घटनांना सुरक्षा व्यवस्थेचा गाफिलपणा कारणीभूत ठरला आहे.

कारागृहाची क्षमता ३१९० कैद्यांची आहे. राज्यातील इतर कोणत्याही कारागृहांच्या क्षमतेपेक्षा ती अधिक आहे. मात्र, सध्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी कारागृहात आहेत. असे असतांनाही प्रत्यक्ष मंजूर सुरक्षा कर्मचारी कारागृहाला आतापर्यंत मिळू शकलेले नाहीत. आहे त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी बऱ्याचदा इतर छोट्या मोठ्या तुरुंगांच्या सुरक्षेसाठी बाहेर असतात. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतो. या सुरक्षा कर्मचा-यांना अद्यापही गस्ती वाहन नाही. त्यामुळे त्यांची रोजची पायपीटी चुकत नाही.

तटबंदीची उंची कमी

कारागृहाच्या तटबंदीबाहेर प्रतिबंधित क्षेत्र नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना थेट कारागृहाच्या भिंतीपर्यंत पोहचता येते. त्यातच तटबंदीची उंची कमीच आहे. परिणामी आक्षेपार्ह वस्तू या तटबंदीवरून सहज आत फेकता येतात. सुरक्षा मनोरे असले तरी अपुऱ्या मनुष्याबळामुळे ते बऱ्याचदा रिकामेच असतात. स्थानिक पोलिसांकडूनही कारागृहातील गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य दिले जात नाही. प्रशासकीय बाबींची आडकाठी असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. तटबंदीची उंची अधिक वाढविण्याची गरज आहे.

(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांदूळ महोत्सव ७ जानेवारीपासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने येत्या ७ जानेवारीपासून तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे ग्राहकांना या महोत्सवाची उत्सुकता असते.

नाशिकमध्ये दरवर्षी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि ग्राहक शिक्षण व संशोधन संस्था यांच्या विद्यमाने तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले जात असते. या महोत्सवाचे हे तिसावे वर्ष आहे. ग्राहकांना विविध प्रकारचे तांदूळ तसेच तूर, मूग आणि उडीद या महोत्सवात उपलब्ध होतात. उत्तम आणि खात्रीशीर दर्जा आणि रास्त किंमत या वैशिष्ट्यांमुळे नाशिककर ग्राहक या तांदूळ महोत्सवाची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी तांदूळ महोत्सव दि. ७ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७ या काळात लायन्स क्लब हॉल, नवीन पंडित कॉलनी येथे आयोजित केलेला आहे. ७ जानेवारीला दुपारी ४.०० ते सायंकाळी ८.०० आणि इतर दिवशी दररोज दुपारी ३.०० ते सायंकाळी ८.०० या वेळात ग्राहकांना तांदूळ महोत्सवाचा लाभ घेता येईल, असे प्रा. दिलीप फडके यांनी सांगितले आहे. नाशिककर ग्राहकांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तांदूळ महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन, ग्राहक पंचायतीचे दिनेश म्हात्रे, पुरुषोत्तम लेले यांनी केले आहे. महोत्सव यशस्वीतेसाठी पंचायतीचे प्रकाश सोनी, प्रकाश कुलकर्णी, अरूण भिडे, सुभाष देशपांडे, अरूण गद्रे आदी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिकिटाचा वाद थेट पोलिस ठाण्यात

$
0
0

पंचवटी-म्हाडा बसमधील प्रकार, प्रवाशांना समज

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड-लिंकरोडवरील म्हाडा संकुलासाठी स्थानिक नगरसेवकांनी वेळोवेळी मागणी केल्यानंतर पंचवटी ते म्हाडा शहर बससेवा सुरू करण्यात आली होती. परंतु, विद्यार्थी आणि प्रवाशांच्या नेहमीच होणाऱ्या वादाने म्हाडा बसला वाहकच नकार देताना दिसतात. त्यातच गुरुवारी (दि. २९) बस तिकिटाचा वाद थेट सातपूर पोलिस ठाण्यात गेल्याने बसचालक व वाहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी नेहमीच बसचालक व वाहकाशी वाद घालत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. शेवटी पोलिसांनी संबंधित वाद घालणाऱ्या विद्यार्थिनीला व तिच्या नातेवाईकांना समन्स देत भांडण न करण्याचा सल्ला दिला.

म्हाडा संकुलासाठी शहर वाहतूक बससेवा असावी, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. यानंतर स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा करून बससेवा सुरूही केली. मात्र या बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नेहमीच चालक व वाहकाला त्रास देण्याचे काम होत आहे, असे दिसून आले आहे. त्यामुळे बसचालक व वाहक या बससाठी जाण्यास नेहमीच नकार देत असतात. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काही वाहक व चालक सेवा देण्याचे काम करताना दिसतात. परंतु, म्हाडा बसमध्ये रोजच शेकडो विद्यार्थी प्रवास करत असल्याने मोठी कसरत करून चालकाला बस चालवावी लागते. तर वाहकालादेखील मोठ्या जिकिरीने प्रवाशांची तिकिटे व विद्यार्थ्यांचे पास तपासावे लागतात. गुरुवारी सीबीएसवरून बसलेल्या एका विद्यार्थिनीने सातपूर येईपर्यंत तिकीटच काढले नाही. यात सातपूरला महामंडळाच्या चेकिंग पथकाने उतरलेल्या प्रवाशांची तिकिटे तपासत बस पुढे जाऊ देण्यास सांगितले. यानंतर सीबीएसवरून बसलेल्या विद्यार्थिनीचे महिला वाहकाकडे तिकिट मागितले. या वेळी विद्यार्थिनीला, अगोदरच तिकिट का नाही काढले, असा जाब विचारला असता मनात राग धरला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदान वारीने सर केले अमरावती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवयवदान व देहदानाचा प्रचार करण्यासाठी नाशिक-नागपूर-आनंदवन अशी पदयात्रा करण्याचा संकल्प नाशिकचे सुनील देशपांडे यांनी केला आहे. त्यांची ही अवयवदान वारी गुरूवारी अमरावतीपर्यंत पोहोचली आहे. गाडगे बाबांच्या आश्रमापासून या पदयात्रेला नाशिकमधून २५ नोव्हेंबर रोजी सुरू झाली होती.

सुनील देशपांडे हे ११०० किलोमीटरचे अंतर पायी कापणार असून मजल दरमजल करीत त्यांचा मुक्काम अमरावती येथे पोहोचला आहे. तेथे सकाळी रोड शो तसेच पथनाट्य झाले. दंत महाविद्यालय आणि अमरावती महाविद्यालयातर्फे तेथील राजकमल चौकात पथनाट्य घेण्यात आले. तसेच रात्रीच्या सत्रामध्ये अवयवदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते. ही वारी शुक्रवारी (दि. ३०) मोझरी येथे पोहोचणार असून अमरावतीपासून हे ठिकाण ३४ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांची समाधी असून येथे अवयवदान विषयावर व्याख्यान होणार आहे.

जिल्ह्यात सगळीकडे या वारीचे अत्यंत उत्सफूर्तपणे स्वागत झालेच; परंतु जिल्हा सोडल्यावरही वारीचे कौतुकच झाले. प्रत्येक गावात गेल्यावर तेथे रॅली काढण्यात आल्या. गावागावातील शाळा व कॉलेजांमध्ये सुनील देशपांडे यांचे अवयवदान या विषयावर व्याख्यान झाले. प्रत्येक गावातून अवयवदानाचा संकल्प फॉर्म भरून घेण्यात येत आहे. जेथे रोटरी क्लब आहे तेथे त्यांची मदत होत असून गावातील लोकही देशपांडे यांना सहाय्य करीत आहेत. यातील अनेक लोकांना अवयवदानाबाबत काहीही माहीत नाही, अनेकांना कुतूहल आहे तर अनेकांना प्रक्रियाच माहीत नाही, अशा लोकांचे प्रबोधन देशपांडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचा उद्योगांवर जादा करांचा बोजा

$
0
0

घरांप्रमाणे अतिरिक्त कर लादल्याने उद्योजकांत संताप

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने महापालिका स्थापन झाल्यापासून औद्योगिक कारखान्यांनाही घरांच्याच घरपट्टीचे प्रमाण ठेवले आहे. यात घरपट्टीत कारखान्यांना अतिरिक्त लादण्यात आलेले कर हटविण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. एकीकडे अग्निशमन यंत्रणा कारखानदारांना उभारण्याची सक्ती केली जात असताना घरपट्टीत पुन्हा आग निवारण कर लादण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरात सातपूर व अंबड या दोन एमआयडीसी आहेत. याठिकाणी अडीच हजारांच्यावर मोठे, मध्यम व लघू उद्योगांचे मोठे जाळे एमआयडीसीत पसरले आहे. अंबडला अतिरिक्त एमआयडीसीलादेखील मान्यता देण्यात आली आहे. महापालिका कारखानदारांकडून वर्षांला घरपट्टी वसूल करत असते. परंतु, कारखान्यांनाही घरांच्या घरपट्टीच प्रमाण का लावण्यात येते, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे. घर आणि कारखाना यांच्यात मोठा फरक असताना दोन्ही घटकांना एकच घरपट्टी लावण्याचे कारणच काय, असाही प्रश्न उद्योजक उपस्थित करत आहेत. यासाठी घरगुती व कारखान्यांना स्वतंत्र घरपट्टी लागू करण्याची गरज आहे, अशी मागणी केली जात आहे.

महापालिकेकडून घरगुती व कारखान्यांना देण्यात येणारी घरपट्टी जवळपास सारखीच आहे. यात केवळ कारखान्यांना रोजगार हमी कर लावला जातो. महापालिकेने दिलेल्या घरपट्टीत सर्वसाधारण कर, आग निवारण कर, वृक्षसंवर्धन कर, जल लाभ कर, स्वच्छता कर, मलनिसाःरण कर, पथ कर, मनपा शिक्षण कर, सरकारी शिक्षण कर व रोजगार हमी असे कर लावण्यात आले आहेत.


अतिरिक्त कर हटविण्याची गरज

दरम्यान, कारखान्यांना सरकारी शिक्षण कर, मनपा शिक्षण कर, रोजगार हमी कर, मलनिसाःरण कर, जल लाभ कर, आग निवारण कर, वृक्षसंवर्धन कर व स्वच्छता कर हे अतिरिक्त लादले जात असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. महापालिकेने संबधित कर तत्काळ हटवावे, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. घरगुती व कारखान्यांना घरपट्टीत एकच घरपट्टी देणे चुकीचे आहे. यासाठी कारखान्यांना घरपट्टीत लादण्यात आलेले अतिरिक्त कर हटविण्याची गरज आहे. जेवढ्या जागेचा वापर कारखानदार करतात त्यावरच घरपट्टी महापालिकेने दिली पाहिजे.

महापालिका व एमआयडीसीकडे घरपट्टी किंवा भाडेकरी असलेल्यांची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र विभाग आहेत. परंतु, सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत ५० टक्के एमआयडीसी भाड्याने असल्याचे समोर आले आहे. याबाबत महापालिका व एमआयडीसीचे कर्मचारी आर्थिक देवाणघेवाणीतून भाड्याने असलेल्या कारखान्यांची माहिती सादर करत नसल्याचे जाणकार उद्योजकांचे म्हणणे आहे. एका उद्योजकांच्या तब्बल वीसहून अधिक कारखाने भाडेतत्त्वावर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु, संबंधित वादग्रस्त उद्योजक महापालिका व एमआयडीसी यंत्रणेचे हात ओले करून कारवाईपासून नेहमीच वंचित राहत असल्याचा आरोप काही उद्योजकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅप’ जपणार पर्यावरण

$
0
0

नाशिक : हवामानातील बदल, जागतिक तापमान वाढ यासारख्या पर्यावरणीय समस्यांप्रती जनजागृती करतानाच त्या सोडविण्यासाठीचे पर्याय सांगण्यासाठी इयत्ता बारावीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी अनोख्या मोबाइल गेमची निर्मिती केली आहे. नाशिककर कुश खानोलकरसह अन्य दोघांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे, या त्रिकुटाने या संशोधनाबद्दल अमेरिकेतील दोन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकही पटकावला आहे.

ढासळत्या पर्यावरणाबाबत केवळ नाराजी व्यक्त करून हतबल राहण्यापेक्षा याबाबत ठोस काही करण्याच्यादृष्टीने फार कमी जण आग्रही असतात. अमेरिकेच्या वॉशिंग्टन स्टेटमधील रेडमंड शहरातील टेस्टा स्टेम हायस्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकणाऱ्या कुश खानोलकर, अभिनव सिंग आणि चीनचा कॉन अकोई या त्रिकुटाने मात्र मोठी कमाल केली आहे. जागतिक तापमान वाढ, हवामानातील बदल यासारख्या वैश्विक समस्या का निर्माण झाल्या आहेत आणि या समस्यांच्या निराकरणासाठी काय करायला हवे याची जनजागृती करणारा मोबाईल गेमच विकसीत केला आहे. ‘कोड कार्बन’ नावाचा हा गेम स्मार्टफोनवर खेळताना विविध पॉईंटस मिळवतानाच पर्यावरणीय उकलही त्यातून होते. आजची पिढी ही स्मार्टफोन वापरत असल्यानेच या त्रिकुटाने या भन्नाट गेमद्वारे जनजागृती सुरू केली आहे. अमेरिकन सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच ‘काँग्रेशनल अॅप चॅलेंज’ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत ‘कोड कार्बन’ या गेमच्या संकल्पनेला पहिले पारितोषिक मिळाले आहे. विशेष म्हणजे, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या स्पर्धेतही या गेमला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

वाढती लोकसंख्या, सातत्याने होणारे विविध प्रकारचे प्रदूषण, ऊर्जेचा वापर या तीन मुख्य मुद्द्यांभोवती हा गेम आहे. गेम खेळणाऱ्याला विविध प्रकारचे पॉईंटस तर मिळतातच पण पारंपरिक ऊर्जा वापरातून काय होते हे सांगतानाच अपारंपरिक ऊर्जा वापरली तर अधिक पॉईंटस कसे मिळतील याचे कसबही त्यात पणाला लागते. सध्या हा गेम अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. आता हा गेम आयफोन आणि आयओएसवर उपलब्ध करून देण्यासाठी हे त्रिकुट प्रयत्नशील आहे. कुशने गेल्या वर्षी रोबोटिक्समध्ये वॉशिंग्टन राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीत इंटर्नशीप करण्याची संधीही कुशला मिळाली आहे. स्टॅन्फोर्ड विद्यापीठात प्रवेश घेऊन संशोधन करण्याचा कुशचा मानस असून त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुशच्या या यशामुळे नाशिकचे नावही जागतिक पातळीवर नावाजले गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगराध्यक्ष बिनविरोध

$
0
0

टीम मटा
जिल्ह्यातील येवला, भगूर, सिन्नर, सटाणा, मनमाड, नांदगाव या नगरपालिकांमध्ये शुक्रवारी उपनगराध्यक्षांची आणि स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. सहापैकी चार पालिकांमध्ये शिवसेनेचे उपनगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. तर येवल्यात दहा नगरसेवक असूनही राष्ट्रवादीने माघार घेत उमेदवारच न दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली

मनमाडचे उपनगराध्यक्षपद रिपाइंकडे
मनमाड नगरपालिकेच्या शिवसेना-रिपाइं युतीच्या नूतन नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी शुक्रवारी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर स्वीकृत नगरसेवकपदी सेना-रिपाइं युतीचे मयुर बोरसे, गंगाभाऊ त्रिभुवन व काँग्रेसचे नाझीम शेख यांची निवड झाली. दुपारी बारा वाजता पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही सभा झाली. शिवसेना-रिपाइं युतीचे गटनेते म्हणून माजी नगराध्यक्ष व नगरसेवक गणेश धात्रक तर काँग्रेसच्या गट नेतेपदी नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, राष्ट्रवादी च्या गटनेतेपदी नगरसेवक कैलास पाटील यांची अधिकृत निवड करण्यात आली.

नांदगाव उपनगराध्यक्षपदी शोभा कासलीवाल
नांदगाव नगरपालिकेचे नवे नगराध्यक्ष राजेश कवडे व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी झाला. नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शोभा कासलीवाल यांची निवड झाली. तर स्वीकृत नगरसेवकपदी महावीर पारख यांची निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष कवडे यांनी केली.

नगराध्यक्ष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीनंतर प्रथमच पालिकेची सभा बोलावण्यात आली. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष कवडे यांनी काम पाहिले. नांदगाव पालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी पदाची सूत्रे हाती घेऊन नांदगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपनगराध्यक्ष कासलीवाल यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. स्वीकृत सदस्यपदी महावीर पारख यांची निवड करण्यात आली. आणखी एक स्वीकृत सदस्य शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत निवडला जाणार होता. मात्र नव्या नियमानुसार गटनेत्यां कडून जिल्हाधिकाऱ्यांकडे नावे पाठवून तिथे छाननी होऊन अंतीम नावे नगराध्यक्षांकडे येणार होती. पण अंतिम यादीत महावीर पारख यांचेच नाव आल्याचे सांगितले जात आहे. आणखी एका स्वीकृत सदस्याची निवड पुढील सभेत शक्य असल्याचे मुख्याधिकारी दातीर यांनी सांगितले.


येवल्यात राष्ट्रवादीची माघार!
आजवर बेरकी अन् तिरक्या चालीच्या राजकारणाची मोठी खासियत असलेल्या येवला पालिकेच्या राजकारणात अनेक वर्षांनंतर नेत्यांमध्ये सहमतीचे राजकारण घडून येताना पक्षीय मतभेदाच्या शृंखला गळून पडल्या. राष्ट्रवादीचे स्थानिक ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या खेळीने दहाचे संख्याबळ पाठीशी असलेल्या राष्ट्रवादीतर्फे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारच न दिला गेल्याने बिनविरोध झालेल्या शिवसेनेच्या सुरज उर्फ सनी पटणी यांच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडली. स्वीकृत नगरसेवक पदाच्या तीन जागांवर शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, राष्ट्रवादीचे अजय जैन व भाजपचे रुपेश दराडे यांची निवड झाली. शहर विकासासाठी आगामी पाच वर्षांसाठी युतीला राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अॅड. माणिकराव शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला.

नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे व नगरसेवक सुरज पटणी, भाजपचे प्रमोद सस्कर तर पाच अपक्षांच्या शहर विकास आघाडीच्या वतीने पद्मा सुनील शिंदे असे चौघांचे अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादीकडून कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे माणिकराव शिंदे यांच्या मनात नेमकं काय? याबद्दल सर्वांनाच उस्तुकता होती. दुपारी १२ वाजता सभेला सुरुवात झाल्यावर उपाध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या चार उमेदवारी अर्जांची छाननी झाली. सर्व अर्ज वैध ठरताना अध्यक्षांनी माघारीसाठी १५ मिनिटांची वेळ दिली. याचवेळी उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले नगरसेवक दयानंद जावळे, त्यांच्या पत्नी नगरसेविका किरणबाई जावळे हे सभेसाठी सभागृहात हजर नसल्याने सर्वांच्याच नजरा जावळे यांच्याकडे लागल्या होत्या. माघारीची ५ मिनीटे उलटून गेल्यानंतरही सभागृहात उपस्थित असलेले उपाध्यक्षपदासाठीचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले नगरसेवक कुठलाही निर्णय घेत नसल्याचे दिसून येताच नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर हे स्वत: आपल्या खुर्चीवरून उठले. त्यानंतर प्रथमतः अपक्ष गटाच्या पद्मा शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. माघारीसाठी अवघे पाच मिनिटे शिल्लक राहिले असता जावळे पती-पत्नीचे सभागृहात आगमन झाले. सेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणारे गटनेते दयानंद उर्फ झामभाऊ जावळे, सुरज पटणी, भाजपच्या वतीने अर्ज दाखल करणारे प्रमोद सस्कर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी आदींची पालिकेच्या एका बंद दालनात चर्चा झाली. त्यानंतर जावळे व सस्कर यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. परिणामी शिवसेनेच्या सुरज पटणी यांच्या उपाध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

सिन्नरचे उपनगराध्यक्षपद शिवसेनेकडे
सिन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रमोद चोथवे यांची निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदी माजी नगरसेवक विजय जाधव व माजी नगराध्यक्षा मंगलताई शिंदे, रामभाऊ लोणारे या तिघांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेत शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाचे १८ नगरसेवक निवडून आले असून, नगराध्यक्षपदी किरण डगळे हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाचे १० उमेदवार निवडून आले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आ. वाजे यांनी आ. कोकाटे गटाकडून सत्ता खेचून आणली. मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवडणुकीत दोन्ही गटाकडून एक एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे दुर्वास यांनी जाहीर केले. याप्रसंगी शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे, संपर्क प्रमुख संजय चव्हाण यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. शिवसैनिकांनी गुलाल उधळत जल्लोष केला. विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. उदय सांगळे, दीपक खुळे उपस्थित होते.


सटाण्यात भाजपच्या न‌िर्मला भदाणे
नगरपालिकेच्या उपगराध्यक्षपदी भाजपच्या न‌िर्मला भदाणे यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी शहरविकास आघाडीच्या प्रचारक डॉ. विद्या सोनवणे व भाजपच्यावतीने दक्षिण सोसायटीचे माजी सभापती मनोहर देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीनंतर भगूर नगरपालिच्या पहिल्याच बैठकीत नगराध्यक्षा अनिता करंजकर यांच्या अध्यक्षते पार पडली. उपनगराध्यक्षपदी मनीषा कस्तुरे तर स्वीकृत नगरसेवक म्हणून फरीद शेख व पंकज कलंत्री यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने कस्तुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेनेचे बहुमत असल्याने नगरपालिकेचे गटनेते व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून फरीद शेख व पंकज कलंत्री यांची नावे सुचविली. त्यावर पीठासन अधिकारी यांनी शेख व कलंत्री यांची निवड झाल्याचे जाहीर केले. नगरसेवक दीपक बलकवडे, माजी नगराध्यक्षा रोहिणी गायकवाड, संग्राम करंजकर, जगन्नाथ धात्रक, उत्तम पाटील, श्रीराम कातकाडे आदींनी आपल्या मनोगतातून नवनिर्वाचितांना शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
सभेचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड झाली. शहर विकास आघाडीने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व राजकीय घडामोडींमागे नगराध्यक्ष सुनील मोरे यांची भूमिका निर्णायक ठरली आहे.

सर्वप्रथम उपनगराध्यक्षपदासाठी मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्याकडे उपगनराध्यक्ष पदासाठी पाच सदस्यांनी अर्ज दाखल केले. यात भाजपकडून न‌िर्मला भदाणे, राष्ट्रवादीकडून शमा आरीप मन्सुरी, नितीन सोनवणे, अपक्ष उमेदवार सुवर्णा नंदाळे यांनी अर्ज दाखल केले. माघारीसाठी पंधरा मिनीटांचा कालावधी दिल्याने तीन सदस्यांनी माघार घेतली. निर्मला भदाणे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने यांची बिनविरोध निवड झाल्याचे मोरे यांनी जाहिर केले.
स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांसाठी भाजपकडून किशोर भांगडिया, सुहास पवार, मनोहर देवरे आघाडीकडून डॉ. विद्या सोनवणे, राष्ट्रवादीकडून फारूक शेख यांनी यांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत भांगडिया, पवार, शेख या तिघांचे अर्ज अवैध ठरले. स्वीकृत नगरसेवकपदी मनोहर देवरे व डॉ. विद्या सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे मोरे यांनी घोष‌ित केले.

भगूरच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या कस्तुरे
निवडणुकीनंतर भगूर नगरपालिच्या पहिल्याच बैठकीत नगराध्यक्षा अनिता करंजकर यांच्या अध्यक्षते पार पडली. उपनगराध्यक्षपदी मनीषा कस्तुरे तर स्वीकृत नगरसेवक म्हणून फरीद शेख व पंकज कलंत्री यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने कस्तुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेनेचे बहुमत असल्याने नगरपालिकेचे गटनेते व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून फरीद शेख व पंकज कलंत्री यांची नावे सुचविली. त्यावर पीठासन अधिकारी यांनी शेख व कलंत्री यांची निवड झाल्याचे जाहीर केले. नगरसेवक दीपक बलकवडे, माजी नगराध्यक्षा रोहिणी गायकवाड, संग्राम करंजकर, जगन्नाथ धात्रक, उत्तम पाटील, श्रीराम कातकाडे आदींनी आपल्या मनोगतातून नवनिर्वाचितांना शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकाजवळील कोंडी सुटेना

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील नवीन बसस्थानक परिसरात सर्वाधिक वाहतूक आणि वर्दळ असल्याने या कोंडीतून बस सुरक्षित बाहेर काढणे वाहकांसाठी दिव्यच असते. बस वाहतूक, शहरात येणारी खासगी अवजड वाहने, रिक्षाचालक, मालवाहतूक करणाऱ्या रिक्षा, विद्यार्थी, सायकलस्वार अशी मोठी गुंतागुंत असल्याने येथे रोजच वाहनांमध्ये धडक होणे, एकमेकांना कट मारणे असे अपघात होतात. बस स्थानकासमोरील कोंडी फोडून येथील वाहतूळ सुरळीत करणे पोलिस प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे.

रिक्षाचालकांकडून नियमांचा भंग
बसस्थानक परिसरात सखावत हॉटेल ते अग्नीशामक केंद्र दरम्यान कोणतेही दुभाजक नाहीत. त्यामुळे रिक्षाचालक बेशिस्तपणे रस्ता ओलांडतात. बसस्थानकाच्या गेटमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना आपल्याच रिक्षात बस असा आग्रह करणारे रिक्षाचालक थेट रस्त्याच्या मधोमध केव्हाही यू टर्न घेतात. या परिसरातून भंगार बाजार, किडवाई रोड, हजार खोली, कॅम्प, जुना बस स्थानक, कुसुंबा रोड, दरेगाव अशा वेगवेगळ्या भागात रस्ते जातात. त्यामुळे प्रवासी वाहतुकी बरोबरच मालवाहतूक, खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणत होत असते.

नवे बसस्थानकातून धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या बस सुटतात. शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर वाहतुकीची वर्दळ असते. पहाटेपासून येथे वाहतूक कोंडी ठरलेली असते. बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना आणि चालकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. कुसुंबा रोडलगत असलेले रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण, फळविक्रेते, मालवाहक रिक्षाचालक, दुचाकीस्वार या सगळ्यांचा सामना करत ही बस रस्त्यावर आणताना वाहकांची नाकीनऊ येतात. या सगळ्यात अनेक वेळा वाहनांना धक्का लागल्यास मुजोर वाहनचालकांची दादागिरीदेखील सहन करावी लागते. शहरातील मुख्य बसस्थानक परिसर या सगळ्या प्रकारामुळे बेशिस्त आणि मुजोर वाहतुकीच्या सापळ्यात अडकले आहे.

या रस्त्याच्या कडेच्या हॉटेल व्यावसाय‌िकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होते. भर रस्त्यावर हॉटेल व्यावसायिकांनी बस्तान मांडले असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. मनापाकडून अधूनमधून अतिक्रमण हटाव मोहिमेची नौटंकी केली जाते. परंतु काही दिवसात परिस्थिती जैसे थे होते. वाहतूक कोंडीचा प्रश्न आजही कायम आहे. मनपाकडून लावण्यात आलेले बॅरिकेट केवळ नावालाच उरले आहे. सकाळपासून हॉटेल व्यावसायिक बॅरिकेटच्या पुढे रस्त्यावर खुर्च्या टाकून निर्धास्तपणे व्यवसाय करतात.

नवे बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा असलेले हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण. या परिसरात चार प्रमुख शाळा असून सुमारे चार हजार विद्यार्थी याच मार्गाने रोज ये-जा करतात. या भागातील समस्यांबाबत वारंवार आंदोलने केली आहेत. पालिकेने बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटवले आहे. मात्र संपूर्ण अतिक्रमण काढणे, रिक्षाचालकांवर कारवाई, दुभाजक आणि उड्डाणपूल होणे हेच येथील वाहतूक कोंडी सोडवण्याचे उपाय आहेत.

- रिजवान बेटरीवाला, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरतीचा मार्ग मोकळा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील जम्बो नोकरभरती प्रतीक्षेत असली, तरी अत्यावश्यक बाब म्हणून ३२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाणीपुरवठा, वीज विभागासाठी ६८ पदांची भरती करण्यास राज्य सरकारपाठोपाठ महासभेनेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मिनी नोकरभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने तात्पुरत्या स्वरूपात हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यातील नोकरभरतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, नगररचना विभागातील विविध प्रकल्पांसह रस्त्यांच्या डिमार्केशन व सर्व्हेक्षणासाठी पाच कोटींच्या प्रस्तावालाही महासभेने मंजुरी दिली आहे.

नाशिक महापालिकेचा समावेश क वर्गातून ब वर्गात झाला असला, तरी सरकारकडून रिक्त जागांच्या भरतीसाठी परवानगी मिळत नाही. सध्या १४ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना केवळ साडेपाच हजार कर्मचाऱ्यांवर महापालिकेचा गाडा हाकावा लागत आहे.

महापालिकेने नोकरभरती करावी, असा ठरावही करून शासनाला पाठविला होता. परंतु, महापालिकेने आउटसोर्सिंगवर कामे करावीत, अशा सूचना सरकारने केली आहे. मात्र, वैद्यकीय विभाग, वीज, पाणीपुरवठा व बांधकाम विभागांत मोठ्या प्रमावर पदे रिक्त आहेत. अगोदरच ३७७ पदासांठी राबविण्यात आलेली भरतीप्रक्रियाही थंड बस्त्यात आहेत. त्यामुळे अत्यावश्यक पदांसाठी तरी भरती करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्याला सरकारने आता होकार दिला आहे.

सर्व्हेक्षक सल्लागार मंजूर

महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सर्व्हेक्षण कामासाठी सल्लागार सर्वेक्षक एजन्सीच्या पाच कोटींच्या प्रस्तावालाही महासभेने उपसूचनेसह मंजुरी दिली आहे, तसेच सर्व्हेक्षण कामासाठी ९० लाख रुपयांच्या तरतुदीलाही मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. रस्त्यांचे डिमार्केशन, कम्पाउंड सर्व्हेक्षण, पाइपलाइन, मलवाहिनी डिमार्केशन, नद्या, पूल, महापालिकेचे विविध प्रकल्पांचे सर्व्हेक्षण, कॅनॉल, चाऱ्या यांचे सर्व्हेक्षण, नोटीस दिलेल्या जागांचे सर्व्हेक्षण, केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेतील विकासकामांचे प्राकलन तयार करण्यासाठी सदरील सल्लागार सर्व्हेक्षकाची आवश्यकता आहे. पाच वर्षांसाठी सदरील सर्व्हेक्षकासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तसेच मार्चपर्यंत आपत्कालीन खर्चासाठी ९० लाखांची तरतूद नगररचना विभागासाठी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नद्याच नव्हे, लोकांनाही नद्यांशी जोडा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नद्यांची काळजी घेणे हे माणसाचे कर्तव्य आहे. त्यासाठी जलक्रांती ही काळाची गरज आहे. केवळ नद्याजोड नको, तर लोकांनाही नद्यांशी जोडा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे राजेंद्रसिंह यांचा ‘चाय पे चर्चा’ हा संवादपर कार्यक्रम झाला. नाशिकरोड परिसरातील पर्यावरणप्रेमी यावेळी उपस्थित होते. कवी प्रशांत केंदळे यांनी स्वागत केले. शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्रसिंह म्हणाले, की नद्याजोड प्रकल्प राबविताना नागरिकांनाही नद्यांशी जोडले पाहिजे. आभाळातून येणारे पाणी इंद्रजल आहे, तेच पाणी जमिनीवर वाहायला लागल्यावर वरुणदेवता होते. मातीला जीवन पाण्यामुळे मिळते. वातावरणात अनियमितता आल्यावर ढगांचे नियंत्रण राहत नाही. पाणी हा शरीराचा आत्मा आहे. पाणी जपून वापरले नाही, तर मानवी जीवन नष्ट होईल. शरीरातील नसा जसे शरीरातील रक्त प्रवाह सुरू ठेवतात, तसेच पाण्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह नियमित राहण्यास मदत होतो. म्हणून रोज चार लिटर पाणी शरीरात गेले पाहिजे. अॅड. मुकुंद आढाव, सुदाम सातभाई, अश्विनी दापोरकर, शिवाजी हांडोरे, कामिनी तनपुरे यांच्यासह नाशिकरोड परिसरातील पर्यावरणप्रेमी यावेळी उपस्थित होते.


प्रश्नांद्वारे शंकासमाधान

यावेळी उपस्थितांनी राजेंद्रसिंह यांना पर्यावरणाबाबत प्रश्न विचारून शंकासमाधान करून घेतले. भूगोल, तसेच आदर्श विद्यामंदिराचे विद्यार्थीदेखील संवादपर कार्यक्रमात सहभागी झाले होते. आदर्श विद्यामंदिरची विद्यार्थिनी रितिका गायधनीने विषयाचे विवेचन केले.

---

‘गोदा, नंदिनी स्वच्छतेसाठी नाशिककरांनी यावे एकत्र’

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरातून जाणारी गोदावरी नदी अत्यंत पवित्र नदी असून, गोदावरीप्रमाणेच नंदिनी ही नदीसुद्धा नाशिक शहरातून वाहत आहेत, मात्र या नद्यांच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, येत्या काळात नाशिककरांनीच या नद्यांचे रुपडे पालटण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आता रचना व संघर्ष अशा प्रकारचे दोन ग्रुप तयार करण्यात आले असून, येत्या काळात या नद्यांच्या स्वच्छतेबरोबरच पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी नाशिककरांनी पुढे यावे, असे आवाहन जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केले.

शहरातील ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाने पाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन यावर वर्षभर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून स्वच्छता व पाण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. त्याचा पुढील टप्पा म्हणून मंडळाचे सचिव गोपाळ पाटील यांनी पुढाकार घेऊन शहरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आता या कचरा आणि पाण्याच्या व्यवस्थापनात सामावून घेण्याच्या उद्देशाने एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या राजेंद्रसिंह यांनी पत्रकार परिषदेत त्यांचे विचार मांडले. यावेळी सिंह यांनी सांगितले, की राज्यात दुष्काळ व अन्य कारणांनी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात. मात्र, या ठिकाणी सर्वाधिक पाणी असतानाही केवळ त्याचे नियोजन शासनाकडून होत नसल्याने शेतकरी अडचणी सापडत असतो. पाण्याचा मुबलक साठा असूनही त्याचे योग्य नियोजन आपण करीत नाही व पुढच्या पिढीलाही त्याचे महत्त्व सांगत नाही हे चुकीचे आहे. त्यामुळे आता पुढच्या पिढीला पाण्याचे महत्त्व समजून देण्यासाठी शालेय स्तरावर प्रबोधन होणे आवश्यक आहे. पाण्याचे ज्ञानच नसल्याने पाणीटंचाई भासत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यावेळी नाशिक शहरातील विविध शाळांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर यावेळी राजेश पंडीत हे सुद्धा उपस्थित होते.

चिन्मय झाला आक्रमक

विविध कार्यक्रमांत सहभागी असणारा नाशिकचा कलाकार चिन्मय उद्‌गीरकर यावेळी चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून आले. या दोन्ही नद्या स्वच्छ करण्याची आपली इच्छा नसेल, तर आपण नाशिककर म्हणवून घेणेच चुकीचे असल्याचे मत चिन्मयने व्य‍क्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाला सापडेना ‘खुष्कीचा मार्ग’!

$
0
0


नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासन सध्या आपली उरलीसुरली प्रतिष्ठा टिकविण्यासाठी घायकुतीला आले आहे. कारागृहात बेकायदेशीर मोबाइलचा खजिना बघून कारागृह प्रशासनाला कपाळमोक्ष करून घेण्याची वेळ आली आहे. परंतु, मोबाइल कारागृहात पोहोचविण्याचा खुष्कीचा मार्ग शोधण्यात कारागृह सुरक्षा व्यवस्थेला गेल्या वर्षभरात यश आलेले नाही. कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी कारागृह सुरक्षा यंत्रणेची असली, तरी कारागृहात घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी मात्र स्थानिक पोलिसांची असते. त्यामुळे या कारागृहात गुन्ह्यांच्या ढगफुटीला या दोन्हीही यंत्रणा एकमेकांना जबाबदार धरत आलेल्या आहेत. परिणामी कारागृहात कैद्यांची तुरुंगाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याइतपत मजल गेली आहे. असे असले, तरी आतापर्यंत कारागृहाशी संबंधित दाखल गुन्ह्यांपैकी एकाही गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. यात दोष कुणाचा, हा खरा प्रश्न आहे.

विसंवादाचा परिणाम

कारागृह सुरक्षा यंत्रणेचे कार्यक्षेत्र केवळ कारागृहांच्या चार भिंतींच्या आतील असते. त्यामुळे बाहेरील बाजूस काय चालते याकडे कारागृह सुरक्षा यंत्रणा नको कटकट म्हणून साफ दुर्लक्ष करीत असते. परिणामी कारागृहाच्या तटबंदीपर्यंत पोहोचण्याचा गुन्हेगारांना मार्ग आपोआप मोकळा होतो. याउलट जोपर्यंत कारागृह प्रशासनाकडून तक्रार येत नाही तोपर्यंत स्थानिक पोलिस कारागृहाकडे फिरकतही नाहीत. या दोघांच्या भांडणात कैद्यांचे मात्र आयते फावते.

तांत्रिक प्रक्रियेचा फटका

कारागृहात गेल्या वर्षभरात तब्बल ४९ मोबाइल आढळून आले. त्यातील बरेचसे मोबाइल कैद्यांच्या राहत्या खोलीतील फरशीखाली, संडासच्या भांड्यात अशा ठिकाणी आढळले, तर काही बॅरेकच्या परिसरात बेवारस आढळून आल्याची नोंद आहे. यातील काही मोबाइलमध्ये सिम कार्डही आढळून आले आहेत. सिम कार्ड आढळून आले असले तरी अद्यापही साधे हे सिम कार्ड कुणाचे याचा शोध पोलिस लावू शकलेले नाहीत. यामागेही अनेक तांत्रिक कारणे आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांना त्यांची जबाबदारी तात्काळ पार पाडता येत नाही. मुळातच यातील जवळजवळ सर्वच गुन्हे हे अज्ञातांविरोधात दाखल केलेले आहे. त्यामुळे नेमकी चौकशी कुणाची करायची, असा मोठा प्रश्न स्थानिक पोलिसांपुढे आ वासून उभा असतो. एखादा गुन्ह्याच्या चौकशीकामी कारागृहात जाण्यासाठी स्थानिक पोलिसांनाही मोठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही कैद्याला अटक करून पोलिसांना आपल्या ताब्यात घेता येत नाही. त्यामुळे त्यांचे फावते.

वेळखाऊपणा मुळावर

दुसरीकडे कारागृह सुरक्षा यंत्रणेला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे इतिकर्तव्य पार पाडल्यानंतर या गुन्ह्यांचे विस्मरण होते. त्यांच्याकडूनही तपासाबाबत पोलिसांना विचारणा होतच नाही. गुन्हा घडल्यानंतर तातडीने त्याची माहिती पोलिसांना देणे आवश्यक असतानाही मोबाइल प्रकरणातील गुन्हे प्रत्यक्ष घडल्याची वेळ व पोलिसांत गुन्हे नोंदविल्याची वेळ यात कित्येक तासांचे अंतर दिसून येते. गुन्हा दाखल करण्यासाठी कारागृह सुरक्षा यंत्रणेचा हा वेळखाऊपणा कारागृह सुरक्षा यंत्रणेकडेही बोट दाखविण्यास पुरेसा ठरणारा नक्कीच आहे. मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा यंत्रणा, तसेच स्थानिक पोलिस यंत्रणा या दोन्ही यंत्रणा एकमेकांना पुरेसे सहकार्य करण्यात कमी पडत असल्याने या कारागृहात गेल्या वर्षभरात गुन्ह्यांच्या प्रकारांत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. सरत्या वर्षात धुळीला मिळालेली अब्रू निदान नव्या वर्षात तरी कमावण्याची सुबुद्धी या दोन्हीही यंत्रणांना आली म्हणजे कमावले.


तपासाबाबत मिळावी मोकळीक

दुसरी बाब म्हणजे पोलिसांना आधीच हातातील काम निपटताना घामाघूम होण्याची वेळ आलेली असते. त्यात पुन्हा कारागृहातील गुन्ह्यांची भर पडते. इतर गुन्हे सामान्य नागरिकांशी संबंधित असल्याने साहजिकच पोलिस त्यांना प्रथम प्राधान्य देतात. परिणामी कारागृहातील गुन्ह्यांचा तपास बासनात गुंडाळला जातो. या कारागृहात गेल्या वर्षात एका कैद्याचा दुस-या कैद्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यूही झाला होता. एकाचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत सापडला होता. धुळे येथून मिळालेल्या अहवालात त्या कैद्याचा खून झाल्याचे नमूद होते. परंतु, त्याचा खुनी मात्र अद्यापही उजेडात आला नाही. असेच काहीसे अनेक गुन्ह्यांच्या बाबतीत घडत आलेले आहे. त्यासाठी तपासाबाबत पोलिसांचे हात जरा मोकळे सोडणे आवश्यक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२५ जण प्राप्तिकरच्या रडारवर

$
0
0

बँक खात्यांवर भरल्या एक कोटींपेक्षा अधिक जुन्या नोटा

Tushar.pawar@timesgroup.com

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील तब्बल १२५ लोकांनी एक कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या जुन्या नोटांचा बँक खात्यांमध्ये भरणा केला आहे. ही सर्व मंडळी आता प्राप्तिकर विभागाच्या रडावर असून, त्यांच्या बँक खात्यांची तपासणी करून हा पैसा हिशेबी आहे, की बेहिशेबी याचा शोध घेतला जात आहे.

प्राप्तिकर विभागाने पहिल्या टप्प्यात या १२५ पैकी ४० बँक खातेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. खात्यात जमा केलेल्या रकमेच्या उत्पन्नाचे स्त्रोत उघड करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. या धनाढ्य मंडळींनी पाचशे व हजार रुपयांच्या १ ते ७ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यात एक कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या जुन्या नोटा बँक खात्यांमध्ये जमा करणारे १२५ लोक आम्ही शोधले असून, त्यापैकी ४० जणांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्ह्यातील आयटी विभागातील सूत्रांनी दिली. या सर्व जणांना त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोतांचा तपशील देण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

हा पैसा बेहिशेबी असेल, तर अशा लोकांवर आयटी कायद्यानुसार कारवाई करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. उर्वरित लोकांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू असून, या लोकांचा तपशील बँकेकडून मागविण्यात आला आहे. ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खात्यांवर जमा करणाऱ्या लोकांचा इत्यंभूत तपशील जमा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने प्राप्तिकर विभागाला दिले असल्याची माहितीही एका अधिकाऱ्याने दिली.

`त्या` बिल्डरने जमा केले सात कोटी

नाशिकातील एका बिल्डरने आपल्या बँक खात्यांवर तब्बल ७ कोटी रुपयांच्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या आहेत. प्राप्तिकर विभाग या रकमेचा स्त्रोत शोधत असून, ही रक्कम बेहिशेबी असेल तर या बिल्डरवही कठोर कारवाई करणार असल्याचे प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी सांगितले. या बिल्डरला नोटीस बजावण्यात आली असून, हा सर्व पैसा आपल्याला आपल्या ग्राहकांकडून मिळाला असल्याचा दावा या बिल्डरने प्राप्तिकर विभागाला दिलेल्या खुलाशात केला आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाने एका रिएल इस्टेट फर्मची चौकशी केली आहे. बिल्डरांबरोबरच ज्वेलर्स, बँका, व्यापारी, उद्योजक आणि पुरोहितही प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. मंगळवारी त्र्यंबकेश्वरमधील दोन पुरोहितांच्या घरी मारलेल्या छाप्यात प्राप्तिकर विभागाने साडेचार किलो सोने तसेच दोन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. तसेच नऊ जणांना नोटिसाही बजावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साध्या फोनद्वारे बँकिंग दृष्टिपथात

$
0
0


सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

ज्यांच्याकडे साधा फोन आहे त्यांनाही आता नेट बँकिंग करता येणार आहे. बल्क मेसेजच्या स्वरूपात नेट बँकिंगला जोडले जाण्यासाठी आम्ही नवी प्रणाली कार्यरत केली आहे. ‘यूएसएसडी’ असे या कार्यप्रणालीचे नाव असून, साध्या फोनवरही मनी ट्रान्सफर व इतर व्यवहार करता येणे शक्य आहे. त्यामुळे आता सर्वजण नक्कीच कॅशलेस व्यवहार करून भ्रष्टाचाराला आळा घालू शकतात, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत शुक्रवारी सकाळी दहा वाजता वेबकास्ट कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्फरन्सचे प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गाडे आदी व्यासपीठावर होते. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिक, पुणे, अहमदनगर या तीन शहरांच्या तरुणाईसोबत संवाद साधण्यासाठी या खास वेबकास्टचे आयोजन करण्यात आले होते. नोटाबंदी होऊन चलनबदलीची मुदत संपूनही अद्याप व्यवहाराची परिस्थिती जेमतेम आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी कॅशलेस व्यवहारांकडे वळावे, असे आवाहन मोदी सरकारकडून करण्यात येत आहे. लेसकॅश असताना कॅशलेस कसं व्हायचं यासाठी कॉलेजियन्ससोबत चर्चा करण्यात आली.

यावेळी जावडेकर म्हणाले, की कॅशलेस व्यवहार आता सर्वत्र होत असून, साठ टक्के जनता याचा उपभोग घेत आहे. कॅशलेस व्यवहार करताना आता सर्व अॅप्स उपलब्ध आम्ही करून दिले आहेत. या माध्यमातून सर्व प्रकारचे व्यवहार सहज शक्य आहेत. सोबतच सर्व बँकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्किम्स आम्ही राबवत असून, अनेक प्लास्टिक कार्ड आणणार आहोत. आधार कार्डवरूनही खरेदी-विक्री करता येईल, याची सुविधा आम्ही केली आहे. यासोबतच जावडेकरांनी विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांना उत्तरे देत कॅशलेस जगायचे धडे दिले.


या कॉलेजेसमध्ये साधला संवाद

तरुणाईच देश चालवणार आहे असं म्हटलं जातं असल्याने आता मोदी सरकारने थेट तरुणाईलाच आपलंसं करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. पुण्यातील एसीपी, फर्ग्युसन, सिंहगड, नाशिकमधील एचपीटी-आरवायके, केटीएचएम, नगरमधील न्यू आर्टस अशी तब्बल पंधरा कॉलेजेस वेबकास्टद्वारे एकमेकांना जोडली गेली होती. ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या सर्व कॉलेजेसमधील विद्यार्थी, तसेच प्राध्यापक, प्राचार्यांसमवेत मंत्री जावडेकरांनी विद्यापीठातून चर्चा केली. देशभरातील सर्व विद्यापीठांतून त्यांच्या अंतर्गत कॉलेजेसमध्ये ‘वेबकास्ट पे चर्चा’ लवकरच होणार आहे.


हे कार्ड वापराचे आवाहन

प्रीपेड कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, डिजिटल पे, तसेच आता पुढे गिफ्ट देताना असे कार्ड द्या. सोबतच यूएसएसडी सिस्टिम वापरण्यासाठी *९९# हे सध्या मोबाइलवर डायल करा. सर्व माहिती मोबाइलवर दिली जाईल.


आणखी जादू होणार...

जावडेकरांनी वेबकास्टच्या चर्चेत आणखी जादू होणार आहे, असे सांगितले आहे. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी यूथ हे आमचे मिसाइल असून, लवकरच देश भ्रष्टाचारमुक्त होणार आहे. खेड्यांतही आता तंत्रज्ञान विकसित होऊन देशात परिवर्तन होतेय. आमची लढाई आता तरुणाईला चालवायचीय. यासाठी आम्ही आणखी जादूमय योजना आणणार आहोत. अनेक योजनेंतर्गत डिस्काउंट दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेरच्या दिवशी २०० कोटींहून अधिक रक्कम जमा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या रद्द नोटा जमा करण्यासाठी अखेरच्या दिवशी नागरिकांनी बँकेत गर्दी केली होती. जिल्ह्यात या अगोदरच सात हजार कोटींहून अधिक रद्द नोटा जमा झाल्या आहेत. त्यात शेवटच्या दिवसातील रक्कम सुमारे २०० ते २५० कोटी असल्याचा अंदाज बँकांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत किती नोटा बँकेत जमा झाल्या याचा हिशेब केला जात होता. मालेगावमध्ये रद्द झालेल्या नोटा भरण्यासाठी स्टेट बँकेसह इतर बँकांमध्ये मोठी गर्दी होती.

रद्द झालेल्या नोटांचा हिशेब करून या नोटा शनिवारी सायंकाळपर्यंत करन्सी चेस्टला पाठवायचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले असल्यामुळे बँकेला पुन्हा मोठे काम लागले आहे. रद्द नोटा भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे नेहमीपेक्षा गर्दी वाढल्याने बँक कर्मचाऱ्यांवर ताण पडला होता. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या ५२५ शाखा असून, त्यांना यापुढे रद्द नोटा जमा करून त्यांचा हिशेब ठेवण्याचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुस्कारा सोडला असला तरी नवीन अजून काय निर्देश येतात याचे दडपण मात्र सर्वांवर आहे. गेल्या पन्नास दिवसांत बँकांना रद्द झालेल्या नोटा जमा करून घेताना त्यांच्या तपशीलसह विविध कागदपत्रे घेण्याचे काम वाढले होते. त्यामुळे जबाबदारी वाढली होती.

अनेकांना वाटले हायसे

गेले काही दिवस विविध नियम व कारणांमुळे आम्ही पैसे भरले नाही, पण आता हे पैसे भरणेच हातात होते. त्यामुळे पुढे आता जे काही होईल ते होईल, पण आजचा दिवस आनंदाचा व भार कमी करणारा होता, अशा प्रतिक्रिया पैसे भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या.

खात्यांची शोधाशोध
आपल्या खात्यात जास्त पैसे भरता येणार नाहीत. त्यामुळे काही खातेदारांनी आपले मित्र व नातेवाईकांना फोनाफोनी करीत किती पैसे भरले याची विचारपूस केली. ज्यांच्या खात्यात पैसे भरता येणार शक्य आहे, तेथे पैसे भरल्याची चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images