Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आयारामांसह विद्यमानांना उमेदवारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्बबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसेनेने इतर पक्षातून आलेल्या, तसेच स्वपक्षातील अशा एकूण २७ नगरसेवकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविले आहे. या नगरसेवकांना पुन्हा निवडून आणतानाच स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी ६२ ठिकाणी विजय प्राप्त करण्याचे कसब शिवसेनेला पेलावे लागणार आहे.

शिवसेनेने आपल्या पक्षाचे विद्यमान नगरसेवक मनीषा हेकरे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सचिन मराठे, मंगला आढाव, शैलेश ढगे, शोभना शिंदे, अशोक सातभाई, सूर्यकांत लवटे, नयना घोलप, सुनीता कोठुळे, केशव पोरजे, कल्पना पांडे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, डीजी सूर्यवंशी, वंदना बिरारी यांना पुन्हा संधी दिली आहे. इतर पक्षातून सेनेत दाखल झालेले विद्यमान नगरसेवक संजय चव्हाण, अरविंद शेळके, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, कल्पना चुंभळे, रमेश धोंगडे, रंजना बोराडे, नंदिनी जाधव, यतीन वाघ, योगिता आहेर यांना उमेदवारी बहाल केली आहे.

तर, काही विद्यमान नगरसेविकांऐवजी त्यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेने रिंगणात उतरविले आहे. त्यात नगरसेवक सुरेखा नागरे यांचे पती गोकुळ नागरे, सुमन ओहोळ यांचे पती विजय ओहोळ, नगरसेवक गणेश चव्हाण यांच्या पत्नी जयश्री चव्हाण, शिवाजी चुंभळे यांचे पुतणे कैलास चुंभळे यांना उमेदवारी दिली आहे.

सारेच आयाराम खूश

निवडणुकीपूर्वी विविध पक्षातून शिवसेनेत दाखल झालेल्या आयारामांना सेनेने खूश केले आहे. त्यामु‍ळेच सर्वांना उमेदवारी देऊन शिवसेनेने वेगळा संदेश दिला आहे.

निष्ठावंत कार्यकर्ते नाराज

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेल्या अनेकांना संधी दिलेली नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीच्या तोंडावर दाखल होऊन उमेदवारी दिलेल्यांचा प्रचार आम्ही करायचा का, असा सवालही काही कार्यकर्त्यांनी विचारला आहे.

चुंभळे, चव्हाणांना दोन तिकिटे

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले शिवाजी चुंभळे यांच्या कुटुंबातील दोघांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यात विद्यमान नगरसेवक कल्पना चुंभळे आणि त्यांचे पुतणे कैलास चुंभळे यांना प्रभाग २४ मधून तिकीट देण्यात आले आहे. तर, गुरुवारीच शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक संजय चव्हाण यांना प्रभाग ३० मध्ये, तर त्यांची कन्या डॉ. स्नेहल यांना प्रभाग १३ मध्ये उमेदवारी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पांडेंचा निर्णय उद्धवांकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी महापौर विनायक पांडे यांचे चिरंजीव ऋतुराज यांच्याकडे शिवसेनेबरोबरच भाजपचाही एबी फॉर्म असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी (४ फेब्रुवारी) होणार असल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग १३ मधून ऋतुराज पांडे यांना उमेदवारी देण्यावरून शिवसेनेत शुक्रवारी मोठा राडा झाला. हॉटेल एसएसकेमध्ये झालेल्या बाचाबाची आणि हाणामारीवेळी काही कार्यकर्त्यांनी पक्षाचे एबी फॉर्म पळवून नेल्याचे सांगितले जात आहे. त्यास महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दुजोरा दिला आहे. शिवसेनेने नकार दिल्याने ऋतुराज यांनी भाजपच्या वतीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी भाजपचा एबी फॉर्म प्राप्त केला. मात्र, पळवून नेलेल्यापैकी एक शिवसेनेचा एबीफॉर्म ऋतुराज यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात विनायक पांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाइल स्विच ऑफ होता. सेनेच्या अधिकृत यादीत ऋतुराज यांचे नाव नसून, त्यांनी भाजप व शिवसेना यांचा एबी फॉर्म सादर केला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ते आता कुणातर्फे निवडणूक लढविणार याबाबत साशंकता आहे. मात्र, शिवसेनेचा एबी फॉर्म आणि ऋतुराज यांची शिवसेनेकडील उमेदवारी याबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी घेणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवार, कार्यकर्त्यांमुळे वाहतूक खोळंबली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात शुक्रवारी प्रचंड गर्दी झाली होती. कार्यालयासमोरील रस्त्यावर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहने उभी केल्याने वाहतूक दुपारी तीनपर्यंत खोळंबली होती. काहींनी कार्यालयाच्या आवारातही वाहने उभी केल्याने प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळपासून गर्दी केली होती. सर्वच उमेदवारांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणून शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे बिटको ते देवळालीगाव दरम्यानची वाहतूक सकाळी अकरा ते दुपारी तीन दरम्यान खोळंबली होती. महापालिकेच्या कार्यालयासमोरच दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यात आली होती. काही भाईंनी परवानगी नसताना वाहने महापालिकेच्या आवारात उभी केली. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी ती हटवून बॅरिकेडस् लावली.

नुसती घोषणाबाजी

महापालिकेचे आवार आणि आतील गॅलऱ्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणदणून गेले होते. सगळे नियम, आचारसंहिता धाब्यावर बसवून अनेक उमेदवार अर्ज भरण्यासाठी येत होते. उमेदवारांसह मोजक्याच प्रतिनिधींना मुख्य प्रवेशव्दारातून आत सोडण्याचे नियोजन होते. मात्र, प्रत्येक उमेदवार कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह आत घुसू लागल्याने नेत्यांच्या दादागिरीपुढे व्यवस्थाच कोलमडून पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युद्धाला तोंड फुटले...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्याचा घाट राजकीय पक्षांच्या चांगलाच अंगलट आला. परिणामी, नेत्यांना मारहाण, घेराव, धमक्या, एबी फॉर्मची पळवापळव, पैशांचे आरोप, बंडखोरी अशी जोरदार धुम्मस रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या अभूतपूर्व गोंधळात पक्षांच्या अधिकृत याद्या जाहीर झाल्या तरी त्या निर्दोष नव्हत्या. पक्षाने अधिकृत उमेदवारी नाकारल्यानंतर अनेक नगरसेवकांनी सरड्याप्रमाणे रंग बदलत, थेट दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाऱ्या पदरात पाडून घेतल्या. त्यामुळे शुक्रवारचा दिवस अभूतपूर्व गोंधळाने गाजला असून, भाजप, शिवसेनेत उमेदवारीसाठी हाणामाऱ्या सुरू असताना दुसरीकडे सर्वच पक्षांना पूर्ण उमेदवारही मिळाले नसल्याचे चित्र होते. त्यामुळे या तिन्ही पक्षांवर अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याची वेळ आली.

महापालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस होता. गेल्या सात दिवसांत मनसे वगळता शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी यादी जाहीर केली नाही. मात्र, शेवटच्या क्षणी यादी जाहीर केल्यावरून शिवसेना व भाजपमध्ये आगडोंब उसळला. शिवसेनेने माजी महापौर विनायक पांडे यांचा पत्ता कट केल्याने त्यांनी थेट महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनाच मारहाण केल्याने शिवसेनेला गालबोट लागले, तर दुसरीकडे भाजपमध्येही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होऊन पक्षातील नेत्यांवर घोडेबाजार केल्याचे आरोप झाले. उमेदवारी नाकारल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आमदार बाळासाहेब सानप यांना घेराव घातला.

सर्वांनाच बंडखोरीची लागण

महापालिका निवडणुकीत मनसे वगळता सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे. शिवसेना व भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. या पक्षांना त्यांची मनधरणी करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दीड हजार उमेदवार रिंगणात

महापालिका निवडणुका लढण्यासाठी इच्छुकांचे रेकॉर्डब्रेक अर्ज दाखल झाले आहेत. १२२ जागांसाठी जवळपास दीड हजार अर्ज दाखल झाले असून, ४,४८६ जणांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुमारे दीड हजार उमेदवारांनी २१६१ अर्ज दाखल केले. त्यामुळे महापालिकेसाठी एवढ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेची फायनल यादीही अपूर्णच!

$
0
0

अनेक प्रभागात उमेदवारांची वानवा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी होऊ नये, यासाठी शिवसेनेसह भाजपने एबीफॉर्मचा घोळ शेवटच्या तासापर्यंत कायम ठेवला. शिवसेना-भाजपच्या पवित्र्यामुळे बंडोबांच्या प्रतीक्षेत असलेल्या इतर पक्षांना फटका बसला. सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १२२ उमेदवारही देता आले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १०३ जागांसाठी उमेदवार जाहीर केले.

पक्षाचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्या प्रभागातून अवघे दोन उमेदवार पुढे आले असून, प्रभाग १३ मधून विद्यमान नगरसेविका सुरेखा भोसले एकट्याच किल्ला लढवणार आहेत. पक्षाने पूर्ण क्षमतेने उमेदवार दिले नसून, पॅनल पूर्ण झालेल्या ठिकाणांसाठी पक्षाकडून काय रणनीती आखली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रभाग - वार्ड - नाव

प्रभाग १ : (अ) नंदा थोरात, (ब) जयश्री पवार, (क) सोमनाथ वडजे, (ड) तुषार उखाडे, प्रभाग २ : (अ) सुनिता खरे, (ब) विशाल कोळी, (क) अनंत सूर्यवंशी, (ड) सुवर्णा संधान, प्रभाग ३ : (अ) संदीप भवर, (ब) रेणुका घोडे, (क) ज्योती गांगुर्डे, (क) सोमनाथ बोडके, प्रभाग ४ : (ब) मंदा ओढाणे, (क) भास्कर लोणारे, (ड) अमर बोरसे, प्रभाग ५ : (अ) उल्हास धनवटे, (ब) नंदिनी बोडके, प्रभाग ६ : (अ) चित्रा तांदळे, (ब) शीतल थोरात, (क) छाया काकड, (ड) अशोक मुर्तडक
प्रभाग ७ : (अ) सत्यम खंडाळे, (ब) राणी देवरे, (ड) नितीन जाधव, प्रभाग ८ : (अ) मोनिका वझरे, (क) मोतीराम बिडवे, (ड) मनीषा साळवे, प्रभाग ९ : (अ) अंबादास आहिरे, (ब) जनाबाई दिघे, (क) हिना पथारीया, (ड) महेश आहेर, प्रभाग १० : (अ) फरिदा शेख, (ब) कलावती सांगळे, (क) सोपान शहाणे, (ड) अशोक नागरे, प्रभाग ११ : (अ) सविता काळे, (ब) योगेश शेवरे, (क) सलीम शेख, (ड) अलका निगळ, प्रभाग १२ : (अ) वनिता शेवाळे, (ब) अमर काठे, (क) पक्षा कांबळे, (ड) मिलिंद ढिकले, प्रभाग १३ : (क) सुरेखा भोसले, प्रभाग १४ : (अ) जयश्री साळवे, (क) रूपेश पहाडी, (ड) गोविंदा बिरूटे, प्रभाग १५ : (अ) लता काठे, (ब) स्मिता पाठक, (क) संदीप लेनकर, प्रभाग १६ : (अ) मेघा साळवे, (ब) हेमलता कडाळे, (क) नीलेश सहाणे, (ड) ऋषिकेश गायकवाड, प्रभाग १७ : (अ) प्रमोद साखरे, (क) शीतल आहिरे, (ड) प्रवीण पवार, प्रभाग १८ : (ब) सुलोचना बोराडे, (क) रोहिणी पिंगळे, प्रभाग १९ : (अ) विनायक पगारे, (ब) कल्पना बोराडे, (क) सचिन चव्हाण, प्रभाग २० : (ड) विक्रम कदम, प्रभाग २१ : (अ) प्रेरणा चंद्रमोरे, (ब) अस्लम मणियार, (क) संगीता क्षीरसागर, (ड) अशोक ठाकरे, प्रभाग २२ : (अ) तानाजी सकट, (ब) पुष्पा रोकडे, (क) कविता जाधव, (ड) जयराम हगवणे, प्रभाग २३ : (अ) रंजना जोशी, (ब) मंगला रोडकर, (क) कौशल पाटील, (ड). धीरज भोसले, प्रभाग २४ : (ब) योगेश जगताप, (ड) अक्षय खांडरे, प्रभाग २५ : (अ) अतुल सानप, (ब) सावित्री रोजेकर, (क) कांचन पाटील, (ड) अनिल मटाले, प्रभाग २६ : (ब) कामिनी दोंदे, (क) लता गोवर्धने, (ड) ज्ञानेश्वर बगडे, प्रभाग २७ : (अ) प्रशांत खरात, (ब) लक्ष्मण वाघ, (क) संगीता दातीर, (ड) बेबी दातीर, प्रभाग २८ : (अ) गणेश मोरे, (ब) अनिता दातीर, (क) लताबाई आगळे, (ड) शांताराम मटाले, प्रभाग २९ : (अ) वर्षा वेताळ, (ब) ज्योती शिंदे, (क) सागर कडभाने, (ड) नितीन माळी, प्रभाग ३० : (अ) निकितेश धाकराव, (ब) पद्ममिनी वारे, (क) हर्षा वाघ, प्रभाग ३१ : (अ) ज्योती गायकवाड, (ब) सुमन दहिया, (क) अर्चना जाधव, (ड) भाऊसाहेब तुंगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एबीफॉर्म फाडले!

$
0
0

प्रभाग चारमधील प्रकार; शिवसेना उमेदवारांचा गोंधळ


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी विभागात एबीफॉर्मवरून प्रचंड गोंधळ उडाला. प्रभाग चारमध्ये शिवसेनेकडून इच्छुक असलेले उमेदवार संतनाम राजपूत यांना एबीफॉर्म न मिळाल्यामुळे निवडणूक कार्यालयात जाऊन एबीफॉर्म हिसकावून फाडून टाकले. या गोंधळानंतर पक्षाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चार एबीफॉर्म देण्यात आले. पण वेळ संपल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे कोरे एबीफॉर्म ठेवून घेत कोणताच निर्णय दिला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या या चारही उमेदवारांवर अपक्ष लढण्याची वेळ येणार असल्याची चर्चा आहे.

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले सतनाम राजपूत यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. पण त्यांना एबीफॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार सविता बडवे यांचा एबीफॉम फाडून टाकला. त्यानंतर फाडलेल्या एबीफॉर्मची ती झेरॉक्स असल्याचे बोलले जात असले तरी हा एबीफॉर्मच होता असे शिवसेनेच्या इतर उमेदवारांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राजपूतसह त्यांच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. या प्रभागातून शिवसेनेतर्फे प्रतिभा घोलप, वर्षा पगारे, भगवान भोगे व सविता बिडवे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले होते. पण पक्ष कार्यालयातून केवळ सविता बडगे यांनी आपलाच फॉर्म आणल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. यासाठी भगवान भोगे यांना थेट नाशिकरोड गाठावे लागले. त्यावेळेस त्यांना तुमचे एबीफॉर्म बडवे यांच्याकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी याबाबत बडवे यांना विचारल्यानंतर फॉर्म पोहोचले नसल्याचे समजल्यामुळे अजून गोंधळ वाढला. त्यात राजपूत यांना फॉर्म फाडून त्यात भर टाकली.

एबीफॉर्मचा गोंधळ पक्षानेच वाढवला. शिवसेनेनेतर्फे कोरे फॉर्म देण्यात आले. त्याचा फटका बसला. आता अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात त्यावर ठरवावे लागेल.

- भगनान भोगे, शिवसेना उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ तालुक्यांत आघाडीची शक्यता धुसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होऊन उमेदवारी यादीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सहा तालुक्यांमध्येच आघाडीबाबत स्थानिक पातळीवर एकमत झाले आहे. उर्वरीत नऊ तालुक्यांमध्ये दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण लढत देणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना आणि भाजपचा जिल्हा परिषदेत शिरकाव रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोर लावला आहे. स्वबळ आजमावण्याऐवजी आघाडीच्या माध्यमातून लढणे कधीही चांगले, असा दोन्ही पक्षातील नेत्यांचा एकसूर झाल्याने उमेदवारीबाबत वाटाघाटी सुरू झाल्या. आघाडी करावी की नाही तसेच कोणाला उमेदवारी द्यावी याबाबतचे अधिकार तालुकास्तरावर प्रदान करण्यात आले. त्यासाठी निरीक्षकांची नेमणूकही करण्यात आली. जेथे दोन्ही पक्षांची समसमान ताकद आहे किंवा विरोधकांपेक्षा काहीशी कमी आहे अशा ठिकाणी आघाडीच्या माध्यमातूनच लढा देण्याबाबत एकमत झाले आहे. दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे यासाठी गटामध्ये एका पक्षाचा उमेदवार दिला असेल, तेथे गणात दोन्ही उमेदवार दुसऱ्या पक्षाचे द्यावे असे सूत्र ठेवण्यात आले आहे. मात्र, जेथे एकाच पक्षाचे प्राबल्य आहे, तेथे गटात अधिक जागा मिळणार असल्या तरी गणात मात्र कमी जागा वाट्याला येणार असल्याने आघाडीपुढील अडचणी वाढल्या. जिल्ह्यात मालेगाव, सिन्नर, निफाड, नांदगाव, नाशिक आणि चांदवड या तालुक्यांमध्ये आघाडीचे उमेदवार उतरविण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतची अधिकृत लवकरच केली जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा, कळवण, येवला, बागलाण, देवळा आणि त्र्यंबकेश्वरमधील काही गटांमध्ये दोन्ही पक्ष स्वबळ आजमावणार आहेत. तेथील काही गट आणि गणांमध्ये मैत्रीपूर्ण लढती रंगणार आहेत. दिंडोरी तालुक्यातही आघाडीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेसाठी १०६ अर्ज

$
0
0

म.टा प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याकर‌िता सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. शनिवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी १०६ तर पंचायत समितीसाठी १५० अर्ज दाखल झाले आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकारण्यात येणार असून, सोमवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७३ गट आणि १४६ गणांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असल्याने १ फेब्रुवारीपासून मतदार अर्ज स्वीकृती सुरुवात झाली. पहिले दोन दिवस बहूतांश उमेदवार अर्ज सादर करण्यासाठी तहसिल कार्यालयांकडे फिरकलेच नाहीत. २ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेसाठी दोन तर पंचायत समितीसाठी अवघे तीन अर्ज दाखल झाले. परंतु शुक्रवारी (दि. ३) अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली. शुक्रवारी जिल्हा परिषदेसाठी ३४ जणांनी तर पंचायत समितीसाठी ४५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर शनिवारी जिल्हा परिषदेसाठी ७० तर पंचायत समितीसाठी १०२ अर्ज सादर करण्यात आले आहेत. शनिवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी इगतपुरीत सर्वाधिक १९ अर्ज दाखल झाले आहेत. तर त्याखालोखाल दिंडोरीत १७, मालेगावात १३, येवला आणि निफाडमध्ये १२ जणांनी अर्ज सादर केले आहेत. पंचायत समितीसाठी सर्वाधिक २४ अर्ज निफाडमधून प्राप्त झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ‌जि. प. आणि प. स.साठी एकूण १७८६ ऑनालइन अर्ज आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लांडे मामा आता तरी टोपी घालणार का?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील ज्येष्ठ नेतृत्व मधुकर लांडे यांनी आमदार निर्मला गावित यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्याचे सांग‌ितले तेव्हापासून शहरात चर्चा सुरू झाली ती एकच की, ‘लांडे मामा आता टोपी घालणार का?’ याचीच.

लांडे मामा टोपी का घालत नाही याची पार्श्वभूमी अत‌िशय रंजक आहे. मधुकर लांडे हे काँग्रेसचे निष्ठावंत, सलग पंधरा वर्ष अंजनेरीचे सरपंच राहीलेले. लांडे यांनी आमदारकीच्या निवडणुका लढविलेल्या आहेत. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी जिजाबाईंना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाले. मात्र निर्मला गावित यांना उमेदवारी देण्यात आल्याचे समजताच लांडे आणि समर्थकांना धक्का बसला. आपल्याला डावलले गेले म्हणून मधुकर लांडे पक्षापासून दूर गेले. तेव्हापासून त्यांनी टोपी घालणे सोडले. बोडख्या डोक्याने फिरणारे ऐटबाज लांडेमामा लक्ष वेधून घेत. ‘बाहेरच्या उमेदवारस तुम्ही निवडून दिले म्हणून मी सुतक पाळतो’, असे सांगत त्यांनी चर्चा निर्माण केली. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा चर्चा झाली. परंतु गावित विजयी झाल्या. आता वय वर्ष ७५ असलेले लांडे यांनी आमदार गावित यांची भेट घेत काँग्रेसचा झंझावात निर्माण करण्याचे अश्वासन दिलेे. अर्थात लांडे आता टोपी घालणार की बोडख्या डोक्याने प्रचार करणार याचे अद्याप स्पष्टीकरण झाले नाही. तथापि काँग्रेसच्या वरिष्ठांनी आणि आमदारांनी लांडे मामांना ‘टोपी घातली’ अशी चर्चा मात्र सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको-द्वारका उड्डाणपूल कधी?

$
0
0

वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; अहवाल सादर करण्याचे केंद्राचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वर्दळ आणि प्रदुषणाने ग्रासलेल्या द्वारका-दत्तमंदिर मार्गाला न्याय हवा आहे. एकूण ५.९ किलोमीटरच्या या मार्गावर उड्डाणपूल (फ्लायओव्हर) त्वरित उभारावा, अशी मागणी जोर धरत आहे. हा उड्डाणपूल उभारण्यासाठी सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला नुकतेच दिल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नाशिक-पुणे मार्गावर नाशिकरोड ते द्वारकादरम्यान वाहतुकीची कोंडी होत असते. सिन्नर, नगर, पुणे, शिर्डीला जाणारे भाविक या मार्गाचा वापर करतात. सातपूर, अंबडला जाणाऱ्या नोकरदरांना हा जवळचा रस्ता आहे. नाशिकरोडचा संपर्क व व्यवहार प्रामुख्याने याच मार्गाने होतो. त्यामुळे रहदारी वाढून वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. या मार्गावर सेंट झेवियर्स, बिटको कालेज, के. जे. मेहता, महाराष्ट्र हायस्कूल आदी शैक्षणिक संस्था, गांधीनगर विमानतळ, बिर्ला हास्पिटल, पासपोर्ट ऑफिससारख्या संस्था आहेत. याशिवाय सराफी व अन्य व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहेत. उपनगर, आंबेडकरनगर, दत्तमंदिर चौकांसारख्या बसस्टॉपमुळे कोंडीत भरच पडली आहे. द्वारका, आंबेडकरनगर, उपनगर, दत्तमंदिर आदी ठिकाणी होणाऱ्या अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. याशिवाय प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे.

तब्बल सहा सिग्नल

नाशिकरोड ते द्वारकादरम्यान वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सहा सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. साडेपाच किलोमीटरच्या या टप्प्यात बिटको चौक, उपनगर, आंबेडकरनगर, विजय ममता चौक, काठे गल्ली आणि द्वारका येथे सिग्नल सुरू करूनही वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. सिडको ते आडगाव उड्डाणपूल होऊनही ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आता द्वारका-नाशिकरोड उड्डाणपूल तयार करून सिडको-आडगाव उड्डाणपूल त्याला जोडल्यास वाहतूक कोंडी सुटू शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

उड्डाणपुलाचे फायदे

या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. उपनगर, घंट्या म्हसोबा, दत्तमंदिरचौक, बिटको चौक, सिन्नरफाटा येथे अनेक बळी गेले आहेत. नाशिकरोड-द्वारका उड्डाणपूल झाल्यास बाहेरगावच्या प्रवाशांचा वेळ व इंधन यांची बचत होईल. या मार्गावरील वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी टळेल. गंभीर झालेली प्रदूषणाची समस्या सुटण्यास मदत होईल. द्वारका, बोधलेनगर, घंट्या म्हसोबा, दत्त मंदिर चौक, बिटको चौक येथील अपघातांचे प्रमाण घटणार आहे. तसेच अनेक संसार उघड्यावर येणार नाहीत. वाहतूक पोलिसांवरील वाढलेला ताण कमी होईल. वादविवाद टळतील.



कृतीत रुपांतर व्हावे

गेल्यावर्षी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे द्वारका ते दत्त मंदिर चौकादरम्यान उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी खासदार गोडसे यांनी केली होती. केंद्रीय रस्ते महामार्ग विभागाला याबाबत पत्रही पाठवले होते. ५ नोव्हेंबरला केंद्रीयमंत्री गडकरी नाशिकला आले असता गोडसे यांनी उड्डाणपुलाचा विषय मांडला. त्यावर द्वारका ते दत्तमंदिर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करत उड्डाणपुलाचा सुमारे पाचशे कोटींचा खर्च करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच उड्डाणपुलाचा सविस्तर अहवाल बनविण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहे. हा अहवाल केवळ अहवाल न राहता त्याचे कृतीत रुपांतर व्हावे, अशी मागणीही आता केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोऱ्या फॉर्ममुळे शिवसेनेचे चारही उमेदवार अपक्ष

$
0
0

एबी फॉर्म फाडल्याने झाली पंचाईत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील प्रभाग चारमध्ये शिवसेनेच्या चार उमेदवारांनी वेळ संपल्यानंतर कोरे एबी फॉर्म सादर केल्यामुळे या उमेदवारांवर आता अपक्ष निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. या प्रभागात छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या उमेदारांना कोणतीही सवलत दिली नाही. त्यामुळे त्‍यांचा हिरमोड झाला.

प्रभाग चारमध्ये एबीफॉर्म वाटपावरून चांगलाच गोंधळ उडाला होता. या प्रभागातून इच्छुक असलेले उमेदवार संतनाम राजपूत यांना एबीफॉर्म न मिळाल्यामुळे निवडणूक कार्यालयात जाऊन एका उमेदवाराकडून एबीफॉर्म हिसकावून फाडून टाकले होते. असे घडूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणतीच सवलत दिली नाही. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळूनही या सर्वांना आता अपक्ष म्हणून वेगवेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे.

या प्रभागातून शिवसेनेतर्फे प्रतिभा घोलप, वर्षा पगारे, भगवान भोगे व सविता बडवे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले होते. पण पक्ष कार्यालयातून केवळ सविता बडवे यांनी आपलाच फॉर्म आणल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर राजपूत यांनी बडवे यांचाही एबीफॉर्म फाडून टाकला. ही गोष्ट पक्षाकडे गेल्यानंतर त्यांनी नवीन चार कोरे एबीफॉर्म पाठवले. पण त्यावेळेस एबीफॉर्म स्वीकारण्याची मुदत निघून गेली होती. या सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कोरे फॉर्म दिल्यामुळे हा गोंधळ अधिक वाढला. या सर्व प्रकारानंतर उमेदवारांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर संताप व्यक्त केला. केवळ नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे हा गोंधळ झाला.

महापालिकेच्या या निवडणुकीत सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उशिरा सर्व उमेदवारांना एबीफॉर्म दिले. त्यामुळे अनेकांची धावपळ झाली. त्यात शिवसेनेच्या महानगरप्रमुखांना मारहाण झाल्यामुळे या एबीफॉर्मचा गोंधळ आणखी वाढला. त्यामुळे प्रभाग क्रमांक चारच्या या उमेदवारांना हा फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरसाठी उद्या अंबडला मतमोजणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

प्रतिष्ठेच्या बनलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या मतदानानंतर आता मतमोजणीकडे पाचही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. उद्या, सोमवारी अंबड एमआयडीसीतील वेअर हाऊस येथे सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांचे मिळून सुमारे ३० टेबल्स आणि सुमारे शंभरावर कर्मचारी येथे उपस्थित असणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची टक्केवारी यंदा चांगलीच घसरली. विभागात अवघे ५४ टक्के मतदान झाले. यात नाशिकमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे ४८ टक्के मतदान नोंदविले गेले. नंदुरबारसह धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यात नाशिकपेक्षा जास्त मतदान झाले. यामुळे उपलब्ध टक्केवारीवर विजयाचे दावे प्रतिदावे करण्यात तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांचे समर्थक गुंतले आहेत. या मतदारसंघात एकूण १७ उमेदवार रिंगणात असले तरीही राष्ट्रीय पक्षांचे तीन उमेदवार आहेत. यातही मुख्य लढत ही काँग्रेस आघाडीचे डॉ. सुधीर तांबे व भाजपचे डॉ. प्रशांत पाटील यांच्यात होत आहे. यामुळे आता मतदानाच्या उपलब्ध आकडेवारीच्या समीकरणांवर कार्यकर्त्यांचे विश्लेषण सुरू आहे.

मतमोजणी केंद्रातील पूर्वतयारीचा आढावाही विभागीय आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी घेतला. यावेळी त्यांच्या समवेत उपआयुक्त ज्ञानेश्वर खिल्लारी, संजय कोलते, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे, तहसीलदार एस. डी. मोहिते, गणेश राठोड आदी उपस्थित होते. दरम्यान आज (५ फेब्रुवारी) पुन्हा मतमोजणीसाठी आढावा घेण्यात येणार आहे.

पाचही जिल्ह्यांसाठी रचना

शहरातील अंबड येथे होणाऱ्या मतमोजणीसाठी ३० टेबल्सची रचना पाचही जिल्ह्यांसाठी असणार आहे. यात प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी कार्यरत राहतील. याप्रमाणे प्रत्यक्षात मतमोजणीसाठी टेबलवर सुमारे ९० कर्मचारी नियुक्त आहेत. विभागातील एकूण ३५३ मतदान केंद्रांची मतमोजणी येथे होईल. या मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी २०० कोटी

$
0
0

केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद; उद्योगक्षेत्राला फायदा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिककरांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी नुकतीच दिली.

या रेल्वे मार्गासाठी राज्य व केंद्र सरकारचा प्रत्येकी ५० टक्के सहभाग राहणार आहे. त्यामुळे केंद्राने तरतूद केल्यानंतर राज्यानेही आपल्या अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद करावी, अशी मागणी करणारे पत्र खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी, अशी मागणी गोडसे यांनी गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पावेळी केली होती. त्यानुसार त्या अर्थसंकल्पात नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आली होती. सोबत टोकन रक्कम म्हणून एक कोटीचा निधीही देण्यात आला होता.

त्यामुळे या रेल्वेमार्गाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. हा अहवाल मार्च २०१७ अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती उपमुख्य अभियंता म्हस्के यांनी दिली आहे. या अहवालास तयार झाल्यानंतर वित्त व प्रशासकीय मान्यता लागणार आहे.

आता ही प्रक्रिया झाल्यानंतर येणाऱ्या आर्थिक वर्षात या कामासाठी निधीची तरतूद कमी पडू नये, अशी मागणीही गोडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

राजधानी गाडी हवी

या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेमार्गाने दिल्लीला जाणारी राजधानीसारखी जलद एक्स्प्रेस मिळावी. ती मिळाल्यास ठाणे, कल्याण, नाशिक, धुळे, जळगाव, भुसावळ या शहरांना लाभ मिळेल. तसेच नाशिक-भुसावळ दरम्यान तेजस किंवा हमसफर ही गाडी सुरू करावी, नाशिक रेल्वे कारखान्याचे विस्तारीकरण व्हावे, या मागण्याही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

रेल्वे मंत्रालयाने देशभरातून ४०० रेल्वे स्थानके विकसित करण्याचे ठरविले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात २५ रेल्वे स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात जून-जुलैमध्ये नाशिक रेल्वेस्थानक विकसित करण्याची घोषणा होईल, असा विश्वास वाटतो.

-हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेसाठी ४५७० बॅलेट युनिट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली असून, मतदानासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. रविवारी साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदानासाठी १६०० टीम तयार करण्यात आल्या असून, त्यांना दोन सत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान, मतदानासाठी साडेचार हजार बॅलेट युनिट प्राप्त झाले असून, उमेदवारांच्या संख्येनुसार आणखी बॅलेट पेपर मागवले जाणार आहेत. मुख्य निरीक्षक दीपक कपूर यांनी शनिवारी नाशिकमधील निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

अर्ज छाननी व माघारीची धामधूम संपताच मतदानासाठीची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी रविवारी (०५) साडेचार हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दादासाहेब गायकवाड, कालिदास कलामंदिर व संभाजी स्टेडियम येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच केंद्राध्यक्ष सहाय्यक केंद्राध्यक्षांना स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांनतर १२ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. मतदानासाठी महापालिकेला १६२० कंट्रोल युनिट, ४५७० बॅलेट युनिट व १५९५ मेमरीकार्ड प्राप्त झाले आहेत. उमेदवारांची संख्या पाहून अजून बॅलेट युनिट मागवले जाणार आहेत.

महापालिकेसाठी नियुक्त केलेले मुख्य निरीक्षक दीपक कपूर यांनी शनिवारी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. कपूर यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासोबतच शनिवारी सहा विभागीय कार्यालयांना भेटी देऊन अर्ज छाननी प्रक्रियेची पाहणी केली. तसेच, आयुक्तांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पार पाडण्यासह आचारसंहितेच्या तक्रारी तत्काळ सोडवण्याचे निर्देश दिले.

आचारसंहिता कक्ष २४ तास

राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता कक्ष २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेनेही पालिकेतील आचारसंहिता कक्ष २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारीसाठी २३१७६०६ हा स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर नागरिक थेट आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस थांब्यांना अवकळा

$
0
0

परिवहन महामंडळ लक्ष देणार का; प्रवाशांचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसबाबत नेहमीच प्रवासी तक्रारी करत असतात. परंतु, आता शहरात असलेल्या बस थांब्यांच्यादेखील अडचणी प्रवाशांना सहन करण्याची वेळ येत आहे. महात्मानगरच्या दोन्ही बाजूंना असलेल्या बसथांब्यांना अवकळा आलेली आहे.

यामध्ये महात्मानगर साईडला असलेले बस थांबा मोडकळीस आला आहे. तर महात्मानगरच्या समोरच्या बाजूला त्र्यंबकरोडला असलेले बस थांब्याची आसन व्यवस्थाच चोरट्यांनी गायब केली आहे. यामुळे केवळ नावालाच बस थांबा उरल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. परिवहन मंडळ याकडे कधी लक्ष देणार असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

शहराच्या वाढत्या लोकवस्तीत चारही बाजूंनी रहिवासी भाग झपाट्याने वाढला आहे. वाढत्या लोकवस्तीत शहर बससेवादेखील पुरविण्याचा प्रयत्न परिवहन महामंडळाकडून केला जातो. परंतु, रुंद झालेले रस्ते व लांबीने मोठी असलेल्या सिटी बस यामुळे अनेकदा चालकदेखील हैराण होत असतात. त्यातच शहरी बसच्या अनेकदा प्रवाशीच तक्ररी करत असतात. आता शहरी बस थांब्यानाच अवकळा आली असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या महात्मानगरच्या बस थांबा मोडकळीस आला आहे. हा थांबा असलेले निवारा शेडच कधीही पडून प्रवाशांना दुखापत होण्याची शक्यता आहे. यामुळे बस थांब्यात न उभे राहता प्रवाशी निवारा शेड बाहेरच उभे राहणे पसंत करतात. त्यातच त्र्यंबकेश्वरला जाताना दुसऱ्या बाजूला असलेल्या बस थांब्याचे आसनच चोरट्यांनी लंपास केले आहे. यामुळे महात्मानगरचे दोन्ही बस थांबे केवळ नावालाच राहिल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. परिवहन महामंडळाचे अधिकारी बस थांब्याच्या दुरवस्थेकडे कधी लक्ष घालणार, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. मोडकळीस आलेल्या निवारा शेड तरी हटविण्यात यावे, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.

महात्मानगरच्या दोनही बस थांब्यांना अवकळा आली आहे. बस थांब्यावर प्रवाशी न बसता बाहेरच उभे राहणे पसंत करतात. मोडकळीस आलेला हा बस थांबा दुरूस्ती करण्याची गरज आहे. तर चोरट्यांनी लंपास केलेली आसन व्यवस्था एसटी महामंडळाने बसविली पाहिजे.

-महेश देसले, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हिडीओवरून भाजपवर सर्वपक्षीय हल्लाबोल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुशासन आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या फुशारक्या मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा आज समोर आल्याचा आरोप मनसेसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला कात्रीत पकडले आहे.

साम, दाम, दंड भेद वापरून इतर पक्षातले उमेदवार फोडून वाट्टेल त्या मार्गाने भाजप सत्ता मिळवत असून हा भयानक आजार त्यांच्याच पक्षाच्याच मुळावर कसा उठलाय हे नाशिकमध्ये घडलेल्या व्हिडीओमधून दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणाऱ्या भाजपची आता पोल खुलल्याचे मनसेचे प्रवक्ते अविनाश अंभ्यंकर यांनी म्हटले आहे.

नाशिकच्या भाजप मध्यवर्ती कार्यालयात इच्छुकांना निवडणुकीचा अर्ज देण्यासाठी उघडपणे दोन लाख रुपये मागितले जात होते. भाजप पदाधिकारी नाना शिलेदार आणि अरुण शेंदुर्णीकर यांचे प्रताप व्हिडिओत शूट झालेत. त्यावर प्रतिक्रिया देतांना अभ्यंकर यांनी कोणत्याही कृतीचे समर्थन करण्यात भाजपचा हात कोणीही धरू शकत नसल्याचे सांग‌ितले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे म्हणतात, की हे पैसे इच्छुकांकडून चेकच्या स्वरुपात माग‌ितले आहेत आणि हा पक्षनिधी आहे. पक्षनिधी भाजपने कसा जमा करावा ही त्यांची अंतर्गत बाब आहे, पण भाजपकडून ७०० इच्छुक उमेदवार आहेत. २ लाख प्रमाणे ही रक्कम १४ कोटींच्या घरात जाते. ही रक्कम निवडणुकीचा अधिकृत निधी म्हणून दाखवणार का? जर इच्छुकांकडून इतकी रक्कम घेतली जात असेल तर ज्यांना तिकिट दिले गेले आहेत त्यांच्याकडून किती पैसे घेतले जातात? खचितच भाजप नाशिकमधून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अशी रक्कम गोळा करत असणार हे मानायला जागा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आर्थिक क्षमता हाच भाजपचा उमेदवारीचा निकष मानायचा का? आणि हे जनतेसमोर मान्य करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टी करणार का? नाशिकमधील दुसऱ्या आमदार सीमा हिरे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मग भाजपची खरी भूमिका कोणती? का भाजपच्या शिरस्त्याप्रमाणे ही पण धूळफेक? सत्ते आल्यापासून भाजपने लोकशाहीची क्रूर थट्टा सुरू केली आहे. पण ही घटना म्हणजे कळसच गाठला.

उमेदवारीसाठी पैसे मागणाऱ्या भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. नगरसेवकापासून ते केंद्रातील मंत्र्यांपर्यंत सर्वजण भ्रष्टाचारात सहभागी आहेत. अशांना सत्तेवर बसविल्यास लोकांचे काय हाल होतील हे सांगायला नको.

शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

नाशिक भाजप सुध्दा बंगारू लक्ष्मण यांचाच पक्ष आहे. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नव्हती. माजी राष्ट्रीय अध्यक्षांचीच री कायम ठेवण्यात आली आहे. जनतेने आता योग्य निर्णय घ्यावा. तसेच निवडणूक आयोगाने या प्रकाराची दखल घ्यावी.
रंजन ठाकरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शिवीगाळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी विभागात प्रभाग क्रमांक चारमधून अपक्ष उमेदवार कविता पवार यांचे नामनिर्देशनपत्र छानणीत नामंजूर केल्यामुळे त्यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गावंडे यांना शिवीगाळ केली. यावेळी पवार व त्यांच्यासोबत आलेल्या केतन पगारे यांनी गोंधळ घातल्याने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळपासून पंचवटी विभागात तिसऱ्या मजल्यावर प्रभाग क्रमांक ३, ४ व ५ मधील उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्राची छानणी सुरू होती. त्यात प्रत्येक प्रभागाचे प्रवर्गानुसार उमेदवारांना सोडले जात होते. पवार यांच्या प्रभागाचा नंबर आल्यानंतर त्या गैरहजर होत्या, पण त्यानंतर त्या कार्यालयात आल्या. त्यावेळेस त्यांनी आपला अर्ज नामंजूर का केला असे विचारल्यानंतर त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारणे सांगितली. पण, त्यांना ही सर्व कारणे न पटल्यामुळे त्यांनी शिवीगाळ करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी गावंडे यांनी पोलिसांना सकाळी शिवीगाळ करून गोंधळ घातल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.

व्हिडीओ क्लिप

हा सर्व प्रकार झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या सर्व प्रकारची व्हीडीओ क्लीप मागवली असून, त्यानंतर सविस्तर तक्रार नोंदविण्यात येणार आहे.

यामुळे फेटाळला अर्ज

पवार यांच्या नामनिर्देशनपत्रात त्यांनी सुचक व अनुमोदक दुसऱ्या प्रभागाचे टाकले, तर प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे त्यांचा हा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना थेट अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यामुळे पोलिसांनीही संताप व्‍यक्त केला. दोघांना व्हॅनमध्ये बसवून पोलिस स्थानकात नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छाननीनंतर १०३५ उमेदवार रिंगणात

$
0
0

उमेदवार व कार्यकर्त्यांची गर्दी, रात्री उशिरापर्यंत अर्ज छाननी सुरू;‌ चोख पोलिस बंदोबस्त

टीम मटा

महापालिकेच्या सहाही प्रभागात किरकोळ वाद वगळता शांततेत अर्ज छाननी पार पडली. सुमारे १०६ अर्ज अवैध ठरले असून, ३१ प्रभागांच्या १२२ जागांसाठी अर्ज छाननीनंतर आता १०३५ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत अर्ज छाननी सुरू होती. चार प्रभागांच्या अर्जांची छाननी प्रलंबित आहे. यामुळे उमेदवारांची संख्या वाढणार आहे.

पंचवटीत उशिरापर्यंत छाननी

पंचवटी विभागातील ६ प्रभागातील २४ जागांवरील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पाडली. या छाननीत प्रभाग ४, ५ व ६ मधील छाननी साडेचारपर्यंत संपली. पण प्रभाग १, २ व ३ मधील छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

काँग्रसेच्या उमेदवार विमल पाटील यांनी ए फॉर्मबरोबर बी फॉर्म न भरल्यामुळे त्यांना पक्षाची उमेदवारी गमवावी लागली. राष्ट्रवादीच्या उमेदवार सोनाली काळे यांनी उमेदवारी अर्जात पक्षाचे नाव न टाकल्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. या विभागात प्रभाग क्रमांक ४, ५ व सहामध्ये पाच उमेदवाराचे अर्ज बाद झाले. दोन ठिकाणी नामनिर्देशनपत्र भरलेल्या सात उमेदवारांचे एकच अर्ज ठेवण्यात आले. त्यामुळे या विभागात ९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यात प्रभाग ४ मध्ये ४०, प्रभाग ५ मध्ये २८, प्रभाग ६ मध्ये ३० उमेदवार असणार आहेत. या विभागात अवैध ठरलेल्या नामनिर्देशनपत्रात कविता पवार, नवनाथ जीवराम जाधव, सविता मोठे व हेमंत वाघ यांचे अर्ज अवैध ठरवले. सुनीता काकड यांनी जातप्रमाणपत्राची पोहच न लावल्यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर केला.

‘पूर्व’मध्ये दोन अर्ज अवैध

नाशिक पूर्वमधील सहा प्रभागांमधून दोन अर्ज छाननीत बाद करण्यात आले. प्रभाग चारमधील शिवसेनेच्या तीन उमेदवारांचा एबीफॉर्म झेरॉक्स असल्याने त्यांना अपक्ष ठरवण्यात आले असून, संजय चव्हाण यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, काही समर्थकांनी कार्यालयाबाहेर एकच गर्दी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

नाशिकपूर्व मध्ये प्रभाग १३, १४, १५ तसेच १६, २३, ३० असे सहा प्रभाग आहेत. संजय चव्हाण यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार असली, तरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कागदपत्र स्वीकारणार नसल्याचे सांगून त्यांना गॅसवर ठेवले आहे. माजी महापौर यतीन वाघ व नगरसेवक मुशीर सैय्यद यांच्यावरील हरकती फेटाळण्यात आल्या. प्रभाग २३ अ मधील रुपाली गांगुर्डे या उमेदवाराचे पती हे मनपा ठेकेदार असल्याची तक्रार रुपाली निकुळे यांनी केली. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. प्रभाग १६ मधील रेखा गांगुर्डे यांचे कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. प्रभाग ३० मधील शिवसेनेचे उमेदवार संजय चव्हाण, रशिदा शेख, शकुंतला खोडे, नीलेश चव्हाण यांचे एबीफॉर्म हे झेरॉक्स होते. तसेच झेरॉक्सवरच काळ्या पेनाने सह्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, संजय चव्हाण यांच्या वकिलाने आक्षेप घेतला. तसेच सुनावणीसाठी वेळ मागितली.

नाशिकरोडला २७ अर्ज अवैध

नाशिकरोड प्रभागात दाखल झालेल्या ३१८ उमेदवारांच्या अर्ज छाननीत विविध कारणांनी २७ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र बाद झाले असून, २९१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. छाननीनंतर नाशिकरोडमधील प्रभाग १७, १८ व २० मधून मनसे व प्रभाग १८ व २० मधून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आपले पॅनलही पूर्ण करू न शकल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेला २३ पैकी ६, तर आघाडीला ३ जागांवर आपले उमेदवारच देता आलेले नाहीत. प्रभाग १८ मधून बाबुराव आढाव यांनी दिनकर आढाव यांच्या एबी फॉर्ममध्ये व्हाईटिंग लावून खाडाखोड केलेला असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा, अशी मागणी केली. प्रभाग १८ मधून अशोक सातभाई व सुनील बोराडे यांच्या अर्जांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सातभाईंनी अगोदर आपला अर्ज सादर केल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला.


पश्चिमच्या तीन प्रभागांत ९० उमेदवार

अर्ज छाननीनंतर पश्चिम विभागातील प्रभाग सात, १२ आणि २४ मध्ये एकूण ९० उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी कोण माघार घेते याकडे सर्वांचे लक्ष असून, त्यानंतरच या प्रभागातील खरे चित्र स्पष्ट होईल. सर्वाधिक उमेदवार प्रभाग २४ मध्ये आहेत.

पश्चिम विभागातील तीन प्रभागांसाठी तब्बल १७२ अर्ज सादर झाले होते. अनेक उमेदवारांनी दोन ते तीन ठिकाणाहून किंवा एकाच जागेसाठी अर्ज सादर केले होते. ते सर्व अर्ज छाननीत बाद झाले. त्यानंतर तब्बल ९० उमेदवार रिंगणात आल्याचे दिसते. यात, अपक्षांचाही भरणा मोठा असून, अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरी लढत सुरू होईल. निवडणूक अधिकाऱ्यांनी सकाळी छाननी प्रक्रिया सुरू केली. काही किरकोळ हरकती समोर आल्या. मात्र, त्यांचा लागलीच निर्णय झाला. दुपारी अडीच वाजेपर्यंत छाननी प्रक्रिया पूर्ण झाली होती. प्रभाग ७ अ मधून चार, ब मधून नऊ, क साठी तीन तर ड मधून १० उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग १२ च्या अ, ब, क आणि ड मध्ये अनुक्रमे नऊ, सहा, पाच आणि आठ इतके उमेदवार आहेत. सर्वांचे लक्ष असलेल्या प्रभाग २४ च्या अ मध्ये पाच, ब मध्ये पाच, क मध्ये नऊ तर ड मध्ये तब्बल १३ उमेदवार आहेत.

सातपूर प्रभागात तीन अर्ज बाद

नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शनिवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये तीन उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहेरे यांनी सांगितले. यामुळे सातपूरच्या चार प्रभागांत १६ जागांसाठी १८५

उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

सातपूर विभागातील चार प्रभागांची अर्ज छाननी विभागीय कार्यालयातील निवडणूक विभागात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी बेहेरे यांनी सकाळी ११ वाजेपासून छाननीला सुरुवात केली. यात प्रभाग ८ अ मधून मीना डोळस यांचा उमेदवारी अर्ज जात प्रमाणपत्र नसल्याने बाद करण्यात आला. प्रभाग ९ अ मधून सदावर्ते परमेश्वर यांचेही जात प्रमाणपत्र नसल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. प्रभाग ११ अ मधून आशा शेलार यांना तीन अपत्य असल्याने उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

अर्ज छाननीला सकाळी ११ वाजेच्या आतच चारही प्रभागातील उमेदवारांनी गर्दी केली होती. उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने पोलिसांच्या मदतीने उमेदवाराचे नाव वाचून दोन जणांनाच प्रवेश देण्यात आला. अर्ज छाननीत तीन अर्ज बाद झाल्याने आता १६ जागांसाठी तब्बल १८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतरच उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल.

सिडकोत हरकतींचा निर्णय प्रलंबित!

महापालिकेच्या निवडणुकीसाठी सिडकोतील दोन प्रभागांमध्ये शिवसेनेचे पंधरा, तर भाजपचे दोन एबीफॉर्म आले असल्याने या हरकतींवरून सिडकोतील विभागीय कार्यालयात सकाळपासूनच उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी केली होती. या हरकतींबाबत सर्वच उमेदवारांचे मत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाणून घेतले. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला नाही.

सिडकोतील प्रभाग २८ मध्ये शिवसेनेचे सात, तर भाजपचे दोन एबीफॉर्म दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या जादा तीन एबीफॉर्मबद्दल हरकती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये २८ अ मधून विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या विरोधात स्वीकृत नगरसेवक माणिक सोनवणे यांनी हरकत घेतली असून, प्रभाग २८ ब मधून नगरसेविका शीतल भामरे यांच्या विरोधात सोनाली काकडे यांनी, क गटातून नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्या विरोधात रेणुका गायधनी यांनी एकमेकांविरोधात हरकती घेतल्या आहेत. या प्रभागातील क गटातून भाजपच्या विद्या लगड व अपर्णा गाजरे यांनी एकमेकांविरोधात हरकती घेतल्या आहेत. प्रभाग २९ अ मधून सुमन सोनवणे यांनी माधुरी खैरनार यांच्या विरोधात, तर ब गटातून नगरसेविका रत्नामाला राणे यांनी माजी नगरसेविका सुमन सोनवणे यांच्या विरोधात, तसेच क गटातून नगरसेवक अरविंद शेळके यांनी भूषण देवरे यांच्या विरोधात, ड गटातून दीपक बडगुजर व सतीश खैरनार यांच्या परस्परविरोधात हरकती दाखल केल्या आहेत. त्याचप्रमाणे ब गटातून भाजपच्या संगीता बरके व सोनाली मंडलेचा यांनीही परस्परविरोधात हरकती दाखल केल्या आहेत. शिवसेनेच्या वंदना बिरारी यांच्या विरोधात सर्वच उमेदवारांनी जात प्रमाणपत्राची हरकत घेतली आहे. उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी विचारात घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबतचा निकाल हा ई मेलद्वारे देण्यात येणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना तोंडघशी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंडाळी टाळण्यासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचे वाटप करणे शिवसेनेसह भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीला भोवले आहे. छाननीप्रक्रियेत शिवसेनेला सर्वाधिक फटका बसला असून, पक्षाच्या डझनभर उमेदवारांवर अपक्ष लढण्याची वेळ आली आहे. भाजपनेही दोन प्रभागांमध्ये घोळ घातल्याने पक्षाची अडचण झाली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराला अपक्ष लढवे लागणार आहे. रात्री उशिरापर्यंत हरकतींवर सुनावणी सुरू होती. एकूण २७ प्रभागांत १०६ अर्ज अवैध ठरले.

अर्ज छाननीचा फटका दिग्गजांना बसत असताना नाशिकरोडला दोन प्रभागांमध्ये हाणामारीचे गालबोट लागले आहे. दरम्यान, माजी महापौर विनायक पांडे यांनी शनिवारी मातोश्री गाठत हाणामारीच्या घटनेवर पडदा टाकला आहे. तर भाजपने दोन दोन लाखात उमेदवारी विकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पक्षाची बदनामी झाली. सोबत आमदार व पदाधिकाऱ्यांनी थेट

पक्षनेत्यांविरोधात बंड पुकारले आहे.

शिवसेनेने कोरे एबी फॉर्म दिल्याने प्रभाग क्रमांक ४ मधील चारही उमेदवार अपक्ष ठरले आहेत. तर प्रभाग क्रमांक ३० मध्ये झेरॉक्स एबी फॉर्म दिल्याने चारपैकी तीन उमेदवार अपक्ष ठरले आहेत. संजय चव्हाण यांचाही अर्ज अपक्ष ठरण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये शिवसेनेचे सात एबी फॉर्म आले आहेत. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृतचा गोंधळ वाढला आहे. भाजपनेही प्रभाग २७ मध्ये दोन एबी फॉर्म दिले आहेत. तर २४ मध्येही एका उमेदवारीचा वाद निर्माण झाला आहे.

मनसेशी छुपी युती

अनेक प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर मनसेने छुपी युती केल्याचे पहावयास मिळत असून, प्रभाग १३ मध्ये तर त्यांनी एकत्रच अर्ज सादर करून व मनसेने तेथे तीन उमेदवार उभे न करून या युतीला दुजोरा दिला. पक्षाच्या शहराध्यक्षांच्या प्रभागातही उममहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह मनसेचे दोघे, तर काँग्रेसच्या विमल पाटील या विद्यमान नगरसेविका असे पॅनल झाले आहे. पाटील यांच्या तांत्रिक चुकीमुळे त्यांना पंजा हे अधिकृत चिन्ह मिळणार नाही. ही चूक जाणूनबुजून केली गेली असावी असा कयास आहे. एकीकडे उमेदवारीसाठी मारामारी चालू असतांना राष्ट्रवादीचे विक्रांत मते या विद्यमान नगरसेवकाने मात्र तिकीट नाकारण्याचा, तर पक्षाचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनीही आघाडी व्हावी यासाठी आपल्या मातोश्रींचा अर्ज सादर न करण्याची भूमिका घेतली.

१०६ अर्ज अवैध

महापालिकेच्या दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सकाळी ११ वाजेपासून छाननीची प्रक्रिया सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत जवळपास चार प्रभागातील अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू होती. ३१ प्रभागांपैकी २७ प्रभागांची छाननी पुर्ण झाली असून, त्यात १०६ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे १०३५ उमेदवारांचे १७१६ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. तर चार प्रभागांच्या अर्जांची छाननी प्रलंबित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्युशय्येवरील अश्वाला जीवदान!

$
0
0

satish.kale@timesgroup.com

Tweet : @Satishkalemt

अश्वासारख्या उमद्या प्राण्याच्या रुपड्यावर कुणाचंही मन बसतं. पण, हाच उमदा अश्व मृत्यूच्या खाईत सापडतो तेव्हा त्याचा अभिमान बाळगणाऱ्या मालकाच्या आश्रयालाही पारखा होतो... असाच दाहक अनुभव काही प्राणीमित्रांनी घेतला. मात्र, यावर हळहळत न बसता मृत्यूशी झुंजणाऱ्या अश्वाला डॉक्टरांच्या मदतीने नवा जन्मच काही प्राणीमित्रांनी दिला आहे. अपघातातल्या माणसाकडेही पाठ फिरविण्याच्या काळात मुक्या प्राण्याच्या दु:खावर फुंकर घालत ‌काही प्राणीमित्रांनी माणुसकीचा वस्तुपाठच दिल्याची घटना म्हसरूळला घडली.

म्हसरूळ परिसरात अज्ञात मालकाने आजारी अवस्थेतील घोडा वर्षभरापूर्वी बेवारस सोडून दिला होता. ही माहिती संवेदनशील नागरिकांनी एका प्राणीमित्राच्या कानावर घातल्यानंतर सुरू झाली ती एका अश्वाच्या जीवन-मरणाची संघर्षगाथा. सिडकोतील रहिवासी पुरुषोत्तम आव्हाड या प्राणीमित्राने या घोड्याला सिडकोतील आपल्या मंगलरूप गोवत्स सेवा संस्थेत दाखल करून देखभाल सुरू केली. पशुवैद्यकांकडून त्याची तपासणी करून घेतल्यानंतर हा घोडा वर्षापासून कॅन्सरने पीडित असल्याचे त्यांना समजले. यातच त्याचा उजवा डोळाही निकामी झाला होता. क्षणाक्षणाला वेदना सहन करणाऱ्या या घोड्याची अवस्था बघून प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड आणि पक्षीमित्र उमेशकुमार नागरे यांनी शासनाच्या सर्व पशुचिकित्सालयात या घोड्यास दयामरण देण्याची विनंती डॉक्टरांना केली. काही गंभीर घटनांमध्ये डॉक्टरांनाही अशा पशूंना दयामरण द्यावे लागते. मात्र, अखेरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या घोड्याच्या डोळ्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली अन् चमत्कारिक गोष्ट म्हणजे ती यशस्वीही झाली. या उपचारांदरम्यान पशुचिकित्सालयातील सुनील गायकवाड, हर्षल सैंदाणे, अमर सोनटक्के, चैतन्य यादव, सुनील यादव, आकाश ठाकरे, सचिन कोदे आदींनी मदत केली.

दीड महिन्यापासून या घोड्याच्या डोळ्यात कॅन्सर पसरत होता. त्यामुळे या घोड्याला वाचवणे अशक्य होते. परंतु, आम्ही या घोड्याचा डोळा पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर औषधोपचार केले. त्यामुळे शरीरात पसरणारा कॅन्सरचा धोका टळला आहे. सध्या या घोड्याची प्रकृती स्थिर आहे.

-डॉ. संजय महाजन, पशुधन अधिकारी, पशुचिकित्सालय

बेवारस स्थितीत मिळालेल्या या घोड्याला मी वर्षभरापासून सांभाळत आहे. आजपर्यंत बऱ्याच प्राण्यांचे संगोपन करून त्यांच्यावर उपचार केले आहेत. सध्या तीस ते पस्तीस प्राण्याचे संगोपन करीत आहे. त्यासाठी मला दिवसाला तीन हजार रुपये खर्च लागतो. परिस्थिती नसतानाही मी प्राण्यांच्या प्रेमापोटी खर्च करतो.

-पुरुषोत्तम आव्हाड, प्राणीमित्र, मंगलरूप गोवत्स सेवा संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images