Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वकिलांनी चौकस दृष्ट‌िकोन ठेवावा

$
0
0

सत्र न्यायाधीश पी. एच. काळे यांचा सल्ला

म. टा. वृत्तसेवा, धुळे

वाढत्या स्पर्धेत व‌किली क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वकिलांनी चौकस दृष्ट‌िकोन ठेऊन या क्षेत्रात पदार्पण करण्याची आवश्यकता आहे. स्पर्धात्मक जगाची गरज म्हणून प्रत्येकाने या दृष्टीने विचार करूनच या क्षेत्रात उतरले पाहिजे, असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एच. काळे यांनी व्यक्त केले.

शहरातील पश्चिम खान्देश दलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. बाबासाहेब स्मृती विधी महाविद्यालयात ‘वकिली व्यवसायातील संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद््घाटन न्यायमूर्ती काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी अॅड. जितेंद्र निळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयातील अॅड. राहुल सावंत, प्राचार्य व्ही. वाय. बहिरम, अॅड. महेंद्र निळे उपस्थित होते.

न्यायमूर्ती काळे यांनी, वाढत्या विस्तारीकरणात प्रत्येक वकिलांनी आपल्या ज्ञानकक्षांमध्ये वाढ केली पाहिजे. दररोज आपले ज्ञान वृद्धिंगत करावे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांचा अंगीकार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. अॅड. सावंत यांनी, वकिली व्यवसायात पदार्पण करणाऱ्या तरुणांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत पदार्पण करावे, असे सांगितले. त्यांनी अथक परिश्रम, संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे, उच्च न्यायालयात कामकाज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी या संधीला सामोरे जाण्यासाठी स्वत:ला सज्ज ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात अॅड. एस. डी. पाटील यांनी ‘दिवाणी दावे आणि प्रक्रिया’ या संदर्भात तर जिल्हा सरकारी वकील सुनील जैन यांनी ‘फौजदारी खटले आणि कामकाज’ या संदर्भात मार्गदर्शन केले. परिषदेच्या समारोपप्रसंगी पोलिस उपअधीक्षक हिम्मतराव जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवाजवी शुल्क वाढीबाबत निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

वाहनाचा परवाना मिळविण्यासाठी तसेच त्याचे नूतनीकरण करताना परिवहन कार्यालयातर्फे अवाजवी शुल्क आकारण्यात येते. हे अन्यायकारक असून ही अवाजवी शुल्कवाढ मागे घेण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात येईल, असे निवेदन मोटार वाहन स्कूल संचालक व नागरिकांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे दिले आहे.

या निवेदनात, परिवहन विभागाने वाहनांचा परवाना, नूतनीकरण व इतर गोष्टींसाठी शासकीय शुल्क मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे. या शुल्क वाढीसंदर्भात मोटार वाहन स्कूल संचालक व नागरिकांना कार्यालयात नोटीस बोर्डावर कोणतीही सूचना अथवा माहिती दिलेली नाही. तसेच दि. २९ डिसेंबर २०१६ ते ७ जानेवारी २०१७ या कालावधीत जुन्या दराप्रमाणेच शुल्क मोटार वाहन स्कूल संचालक व एजंट यांच्याकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन नियमाविषयी कोणतीही पूर्वसूचना परिवहन विभागातील कार्यालयाकडून न मिळाल्याने शुल्क हे जुन्या दरानेच भरण्यात येईल, असे यात म्हटले आहे. यावेळी मिलींद बैसाणे, सुनील चौधरी, शरद गोसावी, शोभा आखाडे, दीपक बोरसे, अनिल चौधरी, सागर शिंदे, बापू साळवे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेक्नोफेअर’ तंत्रस्पर्धेत भावी अभियंत्यांचे तंत्र अाविष्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तंत्रनिकेतने व अभियांत्रिकी कॉलेजेस अन् त्यातील भावी अभियंत्यांच्या तंत्रबुद्धीतून साकारणारी विविध ‘मॉडेल’ म्हणजे तंत्रयुगाच्या वाटचालीवरील श्रीगणेशा. त्यामुळेच अशा तंत्रनिकेतनासह अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या तंत्रस्पर्धा भावी अभियंत्यांच्या दृष्टीने एक मोठं व्यासपीठ असतात.

येथील मातोश्री तंत्रनिकेतन कॉलेजला नुकतेच राज्यस्तरीय ‘टेक्नोफेअर’ तंत्रस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे एकापेक्षा एक सरस असे तंत्र अाविष्कार समोर केल्याचे चित्र दिसले. याप्रसंगी राज्य उद्योग विभागाचे सहसंचालक प्रवीण देशमुख, नगरसेवक रूपेश दराडे, प्राचार्य गीतेश गुजराथी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद््घाटन करण्यात आले.

या स्पर्धेत राज्यातील वीसपेक्षा अधिक तंत्रनिकेतन कॉलेजेसच्या सहाशेच्या वर भावी अभियंत्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात प्रामुख्याने मोटो जीपी, ब्रिज मेनिया, सी कम्पायलेशन, तंत्र प्रश्नमंजुषा, इलेक्ट्रिकल वायरिंग डिझाइन अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बक्षीस वितरणाला डॉ. हरी कुदळ, हरिनारायण, प्राचार्य अनिल कपिले, अनंत जोशी, प्राचार्य जयप्रकाश कोकणे उपस्थित होते. सूत्रसंचालन भाविका गायकवाड यांनी केले. तर आभार प्रा. हेमंत गायकवाड यांनी मानले. संदीप कोल्हे, बाळासाहेब तांबे, सोमनाथ गाडे, यशवंत हिरे आदींनी संयोजन केले.


‘उद्योजक होण्यासाठी स्पर्धांचा मार्ग धरा’

विविध उद्योग सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक पाऊल पुढे टाकावे. नवीन कल्पना, तंत्रज्ञान तसेच तंत्रशिक्षण यांची सांगड घालून जास्तीत जास्त उद्योजक घडविण्यासाठी कॉलेजेसनी प्रयत्नशील राहून सातत्याने विविध स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी केले. अशा स्पर्धांमधूनच विद्यार्थ्यांची प्रेरणाशक्ती वाढताना भावीकाळात उद्योजक निर्माण होत असतात, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरितसेनेत या, निसर्ग वाचवा!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet : @FanindraMT

राज्य सरकारची अनोखी मोहीम

महावृक्षलागवडीचे उद्दीष्ट साध्य करताना सर्वसामान्यांना त्यात सहभाही करुन घेण्यासाठी राज्य सरकारने नामी युक्ती योजली आहे. हरित सेनेसाठी ऑनलाइन सभासदत्व घेण्याबरोबरच त्याचे प्रमाणपत्रही ऑनलाइन मिळविण्याची मोहीम राज्य सरकारने आखली आहे. त्यासाठी सोशल मीड‌ियाचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन तसेच, सर्वसामान्यांनाच थेट कृतीयुक्त करण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने हरित सेना उपक्रम राबविला असून, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना व संस्थांना विशेष पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली. राष्ट्रीय वननीतीनूसार राज्याचे ३३ टक्के भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि राज्यात हे प्रमाण वीस टक्के असल्याने यात वाढ करण्यासाठी तीन वर्षात एकूण ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. ही वृक्ष लागवड करण्यासाठी अपुऱ्या पडणाऱ्या मनुष्यबळाकरिता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला. यात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना विशेष पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार वन, वन्यजीव, पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यांवर सोपविण्यात आली आहे. याशिवाय वन, वन्यजीव, नदी, तलाव या सारख्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच प्राणिमात्रांबाबत आदर बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. या करता महाराष्ट्र हरित सेना कार्य करणार आहे. महाराष्ट्र हरित सेनेत समाजातील सर्व स्तरातील घटक जोडण्याकरिता ऑनलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, सरकारी कर्मचारी, अधिकारी, खाजगी संस्थांचे कर्मचारी, अधिकारी व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक इत्यादी सहभागी होणार आहेत. याकरता महाराष्ट्र हरित सेनेच्या सदस्यत्वासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून, यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, शालेय-महाविद्यालयीन ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक केले आहे. या उपक्रमातील स्वयंसेवकांना वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वनांच्या संरक्षणाकरीता सामूह‌िक गस्त, वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग, वन्यप्राणी प्रगणनेमध्ये सहभाग, वन विभागामार्फत साजऱ्या केल्या जाणाऱ्या वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागत‌िक वन दिन इत्यादी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. जे स्वयंसेवक वर्षभर सक्रीय सहभाग घेतील, त्‍यांची सरकारतर्फे विशेष दखल घेऊन त्‍यांना प्रमाणपत्र किंवा पारितोषिक देऊन पुरस्कृत केले जाणार आहे. तसेच स्वयंसेवकांना विविध वन क्षेत्र, अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पात लागणाऱ्या प्रवेश शुल्कात व इतर शुल्कात सवलत देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ठेकेदाराने बुजवले खड्डे

$
0
0

ग्रामपंचायत प्रशासनाकडून दखल

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

शहरातील शिवाजीनगर भागात भूमिगत गटाराचे काम करणारा ठेकेदारच भूमिगत झाल्याचे वृत्त शुक्रवारी (दि. ३) ‘मटा’ने प्रकाशित केले होते. हे वृत्त झळकताच येथील ग्रामपंचायत प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तातडीने संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी खोदलेली गटारीसाठीची नाली तसेच खड्डे जेसीबीने बुजविली आहेत. नागरिकांत याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या शुक्रवारी, या संदर्भातील वृत्त ‘मटा’ने प्रकाशित केले होते. त्या वृत्ताचा परिणाम होत या संबंधित ठेकेदाराला प्रशासनाकडून चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यानंतर ठेकेदाराने लगेच जेसीबी मशीनसह आपले कामगार पाठवून गटारीसाठी खोदलेली नाली तातडीने बुजवून टाकली. यामुळे तातडीने शिवाजीनगर भागातील नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

येथील शिवाजीनगर परिसरात गत तीन चार आठवड्यापासून भूमिगत गटारांचे काम सुरू होते. या परिसरातील एका लेनमध्ये ठेकेदाराने पंधरा दिवसापूर्वी पाइप टाकण्यासाठी जेसीबीने नाली खोदली. नालीत पाइप टाकल्यानंतर चेंबर बांधले मात्र, नाली न बुजवताच ठेकेदार व त्याचे कामगार या भागात दिसेनासे झाले होते. या नाली आणि रस्त्यावर पडलेल्या मुरूमामुळे नागरिकांना व वाहन धारकांना त्रास सुरू झाला होता. त्यातच जेसीबीने अनेक नागरिकांचे नळ कनेक्शनही तोडून टाकले. त्यामूळे या भागातील नागरिकांमध्ये नाराजीची व संतापाची भावना होती. नागरिकांच्या नाराजीला लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने नाली बुजविण्याचे व नळ कनेक्शन दुरूस्तीसाठी तातडीने पाऊले उचलली. यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्रेय’चे एक वर्ष सरले!

$
0
0

८५०० गुंतवणूकदारांना पैशांचे वाटप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात गाजलेल्या मैत्रेय घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल होऊन वर्ष उलटले. तपास आणि निकाल या दोन्हींसाठी आव्हानात्मक ठरलेल्या गुन्ह्याची चांगली सोडवणूक करण्यात पोलिस यशस्वी ठरले. ऑगस्ट ते जानेवारी या महिन्यात आठ हजार ५०० गुंतवणूकदारांना तब्बल पाऊणे सात कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

जादा व्याजाचे आमिष आणि रिअल इस्टेटमध्ये आलेली मंदी यात मैत्रेय ग्रुपच्या दोन ते तीन कंपन्या सापडल्या. शेकडो गुंतवणूकदारांना पैसे मिळणे मुश्किल झाल्याने संतापाची प्रतिक्रिया उमटली. गेल्यावर्षी २ फेब्रुवारी रोजी अशाच काही गुंतवणूकदारांनी होलाराम कॉलनीतील कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला होता. यानंतर काही गुंतवणूकदारांनी तत्कालीन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना भेटून आपली कैफियत मांडली. त्यानंतर ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीस सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत लागलीच मुंबई गाठली. ४ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना अटक करण्यात आली.

राज्यभरात गुंतवणुकदारांचे जाळे पसरलेल्या कंपनीवर कारवाई झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल झाली होती. पोलिसांवर विश्वास दाखवावा की कंपनीवर, या गोंधळात असलेल्या काही गुंतवणुकदारांनी ५ फेब्रुवारी रोजी कोर्टात गोंधळ घातला होता. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय पन्हाळे आदींनी कंपनीकडील हार्डडिस्क आणि इतर पुराव्यांचा बारकाईने तपास केला. गुंतवणूकदारांना तत्काळ पैसे मिळावेत यासाठी कोर्टात पाठपुरावा केला. पैसे मिळण्याची शक्यता असेल तरच सत्पाळकरांना जामीन देण्यात यावा, यासाठी पोलिसांनी कोर्टात भक्कम बाजू मांडली. सत्पाळकरांनी यास होकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१९ जागांसाठी २७३८ इच्छुक

$
0
0

जिल्हा परिषद व पंचायत समितीतही बंडखोरी वाढण्याची शक्यता

Pravin.bidve

@timesgroup.com

Tweet : @bidvepravinmt

नाशिक : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून स्थानापन्न होण्यास तब्बल २७३८ इच्छुक आहेत. गट आणि गणांमधील एकूण २१९ जागांसाठी हा रणसंग्राम होत आहे. प्रत्येक जागेवर सद्यस्थितीत तब्बल १२ इच्छुकांनी दावा केला असून, बंडाळी अटळ मानली जात आहे. पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याने उमेदवारांचा राष्ट्रवादीकडील ओढा कमी झाल्याचे पहावयास ‌मिळत आहे.

जिल्हा प‌रिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आखाडा तापू लागला आहे. आपल्या पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. ७३ गट आणि १४६ गणांसाठी ही निवडणूक होत असून, शिवसेना आणि भाजपने वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात घालून आघाडीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा सोमवार (दि. ६ फेब्रुवारी) शेवटचा दिवस असला तरी अद्याप बहुतांश पक्षांनी आपले पत्तेच उघड केलेले नाहीत. बहुतांश पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असून, बंडखोरीची भीती पक्ष पदाधिकाऱ्यांना सतावत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्याची संधी मिळावी यासाठी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षांकडे

उमेदवारीची मागणी केली आहे. शिवसेनेकडून सर्वाधिक ७८४ इच्छुक असून, त्या खालोखाल भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी ७५० जणांनी मुलाखती दिल्या आहेत. काँग्रेसकडून ५५० हून अधिकजण इच्छुक असून, राष्ट्रवादीत अवघे २५० इच्छुक आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेही २५० इच्छुक असले तरी ते फारतर १६५ जागा लढविणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणूक संग्रामात उडी घेतली असून, ते १८ जागा लढविणार आहेत. बहुजन समाज पक्षानेदेखील जिल्ह्यात २० गटांमध्ये आणि ४० गणांमध्ये कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मारामार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ कारावासात असून, पक्षाची प्रतिमा मलीन करणाऱ्या काही घटना गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात घडल्या. माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते देवीदास पिंगळे हे बेहिशेबी मालमत्तेप्रकरणात अडकल्याने पक्षाच्या अडचणी अधिकच वाढल्या. या सर्व प्रकारामुळे पक्षाचा जिल्ह्यातील दबदबा कमी झाला असून, पक्षाला निवडून येण्याची क्षमता बाळगणाऱ्या उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे. अन्य पक्षांमध्ये शेकडो इच्छुक असताना राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या तोकडी आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार जिल्ह्यात आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्यामुळे ऐन निवडणूक काळात पक्षाने अविश्वास दाखवित त्यांना उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवले आहे.

पक्षनिहाय इच्छुक

काँग्रेस : ५५०ए भाजप : ७५०, शिवसेना : ७८४, मनसे : २५०, राष्ट्रवादी काँग्रेस : २५०, स्वाभिमानी संघटना : १८, रिपब्लिकन पक्ष : २१, बहुजन समाज पक्ष : ६०, राष्ट्रीय समाज पक्ष : ५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज स्वीकृतीचा आज शेवटचा दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज (दि. ६ फेब्रुवारी) अखेरचा दिवस असून, रविवारी सुटीच्या दिवशीही अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचा ओघ वाढला होता. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी २९१, तर पंचायत समितीसाठी ५०८ अर्ज प्रत्यक्ष दाखल झाले आहेत. ऑनलाइन अर्जांची संख्या हजारांपर्यंत पोहोचली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या उमेदवार गर्दी करतात. त्यामुळे उमेदवारांची प्रचंड गैरसोय होते. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कामाचा अधिक ताण पडतो. गैरसोय टाळता यावी, यासाठी रविवारी सुटीच्या दिवशीदेखील अर्ज स्विकृती सुरू ठेवा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले होते. त्यानुसार रविवारी सर्व तहसील कार्यालयांमध्ये सकाळी ११ ते दुपारी तीन यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. शनिवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी १०६, तर पंचायत समितीसाठी १५० अर्ज प्रत्यक्ष दाखल झाले होते. रविवारी अर्ज दाखल करण्यासाठी अधिक गर्दी झाली. जिल्हा परिषदेसाठी १८७ तर पंचायत समितीसाठी ३४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. १ ते ५ फेब्रुवारी या पाच दिवसांत २९१ उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी, तर ५०८ उमेदवारांनी पंचायत समितीसाठी प्रत्यक्ष अर्ज सादर केले आहेत.

आज उमेदवारीचा फैसला

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. सर्वच पक्षांमध्ये शह काटशहाचे राजकारण सुरू असून, गट आणि गणांमधून कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याचा निर्णय आज (दि. ६ फेब्रुवारी) होणार आहे. सर्वच पक्षांनी अद्याप उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. ज्या जागांवर एकपेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत तेथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी उफाळून येऊ नये यासाठी काही पक्षांनी अद्याप एबी फॉर्मचे वाटपच केलेले नाही. ऐनवेळी या फॉर्मचे वाटप केले जाणार असल्याने उमेदवारी नाकारलेल्या इच्छुकांकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदवीधरचा आज फैसला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

विधान परिषदेसाठी प्रतिष्ठेची लढत बनलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (६ फेब्रुवारी) सकाळी अंबड वेअर हाऊस येथे होणार आहे. त्यामुळे या केंद्रास छावणीचे स्वरूप आले आहे. रात्री उशिरापर्यंत या निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

रविवारी दुपारी येथे विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यंत्रणेचा आढावा घेतला. पाच जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली येथे एकूण ३० टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी होणार मतमोजणी

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सर्व मतपत्रिकांची मोजणी करण्यात येईल. यानंतर मतपत्रिकांचे ५०-५० या संख्येनुसार गठ्ठे तयार केले जातील. येथे विशिष्ट मतसंख्येचा कोटा ठरवून त्या दिशेने मतमोजणीस पुढील टप्प्यात सुरुवात होईल. यानंतर दुसऱ्या फेरीत प्रत्येक टेबलवर एक एक हजार मतपत्रिका दिल्या जातील. या हजार पत्रिका उमेदवारनिहाय मोजण्यात येतील. यानुसार प्रत्यक्ष मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार आहेत. यातून पहिल्या क्रमांकाचे मतदान मोजले जाईल. कोटा गाठला नसल्यास पुन्हा नंतरची फेरी पार पडेल. त्यात सर्वात कमी मतदान पडलेल्या उमेवाराचे दुसऱ्या क्रमांकापासून पुढील क्रमांची मते मोजली जातील. यानंतर सर्वात अखेरच्या उमेदवाराकडून मतमोजणीस सुरुवात होईल. अखेरीलाही कोटा न गाठला गेल्यास सर्वाधिक मते पडलेल्या उमेदवारास विजयी घोषित करण्यात येईल. या निवडणुकीतील चिठ्ठीपध्दती लक्षात घेता अंतिम निकाल हाती येण्यासाठी मध्यरात्रही उलटण्याची शक्यता आहे.

छावणीचे स्वरूप

आज होणाऱ्या मतमोजणीसाठी अंबडला रविवारपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रापासून १०० मीटर अंतरापर्यंत निवडणूक अधिकारी, कर्मचारी, निवडणूक आयोगाकडून पास मिळालेले पत्रकार, पोलिस आणि उमेदवारांचे पासधारक प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे लढविणार १६५ जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर लढण्याची इच्छा तब्बल २५० कार्यकर्त्यांनी दाखवली असली तरी १६५ जागांवरच उमेदवार देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

नाशिककरांनी शहरात यापूर्वी मनसेचे तीन आमदार निवडून दिले आहेत. इतकेच नव्हे तर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्यादेखील पक्षाने विश्वासाने मनसेच्या हाती दिल्या आहेत. परंतु, जिल्हा परिषदेत अद्याप मनसेला करिश्मा दाखवता आलेला नाही. यंदा मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जोरदार मुसंडी मारू, असा विश्वास मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. महापालिका क्षेत्रात मनसेने चांगली कामे केल्याचा डंका जिल्हाभरात वाजवला जात असून, या कामांचेच निवडणूक प्रचारात भांडवल केले जात आहे. जिल्ह्यात २५० इच्छुकांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अन्य पक्षांकडून तिकिटे न मिळाल्यास मनसेची वाट धरण्याची तयारी अनेक इच्छुकांनी ठेवली आहे. त्यामुळे मनसेलाही गट आणि गणांमध्ये प्रबळ दावेदार मिळण्याची शक्यता बळावली असून, मनसे मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. निफाडमधील एका जिल्हा परिषद सदस्याने शनिवारी मनसेमध्ये प्रवेश केला.

उमेदवारी यादी आज जाहीर करणार

पक्ष ७४ पैकी ५५ गटांमध्ये उमेदवार उभे करणार आहोत. त्यापैकी ४० गटांमधील उमेदवारांना पक्षाकडून एबीफॉर्मचे वाटपदेखील करण्यात आले आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि सिन्नर वगळता अन्य तालुक्यांमध्ये एबीफॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १५ गटांमधील उमेदवार सोमवारी निश्चित होणार आहेत. याखेरीज मनसेने ११० गणांमध्ये उमेदवार देण्याची तयारी ठेवली असून, सोमवारी उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला आम्ही सक्षमतेने सामोरे जाणार आहोत. ५५ गट आणि ११० गणांमध्ये उमेदवार देण्याची मनसेची तयारी आहे. ४० गटांमधील उमेदवारांना एबीफॉर्मचे वाटप करण्यात आले असून आज, उमेदवारी यादी जाहीर केली जाईल.

- रतन इचम, मनसे जिल्हाप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी प्रभागात बंडखोरी कोणाच्या पथ्यावर?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवारीसाठी लागणाऱ्या एबी फार्मच्या गोंधळामुळे भाजप आणि शिवसेनेची अब्रू चव्हाट्यावर आली. बंडखोरांमुळे या पक्षांनी आपल्याच हाताने आपल्याच पायावर जणू कुऱ्हाड मारून घेतली. भाजप आणि शिवसेनेने केलेल्या चुकांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे लाभ घेण्याची संधी चालून आलेली आहे.

निवडणुकीपूर्वीच पंचवटी परिसरात मुख्य लढत भाजप आणि शिवसेना यांच्यातच होईल असे चित्र उभे करण्यात आले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांच्या नगरसेवकांनी भाजप व शिवसेनेची वाट धरली. असे होत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ बघ्याची भूमिका घेतली. पंचवटीत प्रभाग एकमध्ये काँग्रेसने सुरेखा बदादे व वसंतराव मोराडे, तर राष्ट्रवादीने साहेबराव मोराडे व दीप्ती हिरवे यांना उमेदवारी दिली आहे. दोनमध्ये काँग्रेसने ऋषिकेश फुलकर व सारिका जेफ यांना, तर राष्ट्रवादीने सोनाली जगताप व डॉ. अनिता लभडे यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग तीनमध्ये काँग्रेसने गणेश मंडलिक, राष्ट्रवादीने समाधान जाधव, सुनीता शिंदे, गौरव गोवर्धने यांना तर प्रभाग चारमध्ये कविता कर्डक, राजश्री जाधव, राजेश माने व सागर लामखडे या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना संधी दिली. प्रभाग पाचमध्ये काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका विमल पाटील यांनी ए फार्म सोबत बी फार्म जोडला नसल्याने त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या पाटील यांच्याकडून ही हेतूपुरस्कर चूक केल्याची चर्चा आहे. मनसेचे उल्हास धनवटे आणि नंदिनी बोडके यांच्यासह अपक्ष गुरुमित बग्गा यांनी आघाडी करून प्रचारही सुरू करीत काँग्रेसपासून चार हात दूर राहणे पसंत केले. प्रभाग सहामधून राष्ट्रवादीचे उमेदवारी मिळालेल्या सोनाली काळे यांनी अर्जात पक्षाचे नावच टाकले नसल्याने त्यांना अपक्ष लढावे लागणार आहे. या प्रभागात राष्ट्रवादीच्या कविता आव्हाड आणि काँग्रेसच्या वैशाली गवळी या रिंगणात आहेत.

मुर्तडकांच्या खांद्यावर पॅनल िवजयाचे शिवधनुष्य

मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झालेले बहुतांशी नगरसेवकांनी पक्षांतर केले. अशा परिस्थिती मनसेचे निष्ठांवत कार्यकर्ते आजही पक्षातच दिसत आहे. त्यातील बऱ्याच जणांना उमेदवारी मिळाली आहे. महापौर अशोक मुर्तडक प्रभाग सहामधून मनसेकडूनच उमेदवारी करीत आहेत. त्यांना स्वतःसह पक्षाच्या अन्य उमेदवारांना निवडून आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

शिवसेनेचा उतावीळपणा

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी एबी फार्म पाठविण्याची चूक करणाऱ्या शिवसेनेला प्रभाग चारमधून अधिकृत उमेदवार देता आले नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे घाईघाई अर्ज देताना त्यावर नाव टाकण्याचे भानही शिवसेना नेत्यांना राहिले नाही. त्यामुळे प्रभाग चारमध्ये पक्षाला अधिकृत उमेदवार देता आले नाही.

मराठा मतदार नाराज

प्रभाग तीनमध्ये आमदार व भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे. मात्र, या प्रभागात सर्वसाधारण एक आणि सर्वसाधारण महिला राखीव असे सर्वसाधारण तीन गट असताना भाजपने एकही मराठा उमेदवाराला संधी दिली नाही. या प्रभागात मराठा मतदारांची संख्या सर्वात जास्त असतानाही इच्छुक मराठा उमेदवारांना डावलण्यात आले. त्यामुळे मराठा मतदारांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष पत्रक प्रसिद्ध करून व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर हे पत्रक व्हायरल झाल्याने शहराध्यक्ष सानप पुन्हा अडचणीत आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्कारांचा पडला विसर

$
0
0

जलसंपदा खात्याला सापडेना मुहूर्त; पाणीवापर संस्था नाराज

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्य सरकार कितीही गतिमान प्रशासनाचा डांगोरा पिटत असले तरी सिंचन व्यवस्थापनातून पाण्याचे काटकसरीने व नेमक्या प्रमाणात वापर करण्यास प्रोत्साहन देणारे पाणीवापर संस्थांना मिळणाऱ्या पुरस्कारांचा राज्य सरकारला विसरच पडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे पुरस्कार दिले गेले नसल्याने राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठीची उदासीनता दिसून आली आहे. सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.

सहभागी सिंचन यशस्वी होण्यासाठी पाणीवापर संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षम असणे व संस्थांनी स्वबळावर सुदृढ होणे आवश्यक असते. सिंचन व्यवस्थापनात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील पाणीवापर संस्थांना राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणीवापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार देण्यात येतो.

राज्याच्या जलनितीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. आघाडी सरकारने महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ सरकारने पारित केला होता. त्यानुसार सिंचन क्षेत्रात कार्यक्षमपणे काम करणाऱ्या पाणीवापर संस्थांना राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरावर पुरस्कार देण्यात येतात.

आघाडी सरकार असतांना राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारीला सिंचन दिनी हे पुरस्कार वितरित केले जातात. तर कधी ऑगस्टमध्येही या पुरस्कारांचे वितरण झालेले आहे. परंतु, राज्यात सत्ताबदल झाल्यावर सध्याच्या सरकारला या पुरस्कार वितरणाचा विसरच पडला आहे. त्यामुळे येत्या सिंचन दिनी अर्थात २६ फेब्रुवारीला तरी राज्य सरकारला या पुरस्कार वितरणाचा मुहूर्त मिळेल का, असा प्रश्न पाणीवापर संस्थांना पडला आहे.


शेतकऱ्यांप्रती अनास्था

राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर गेले दोन वर्षे या महत्त्वाच्या पुरस्कारांचे वितरणच झालेले नाही. विशेष बाब म्हणजे सन २०१४-१५ साठीच्या पुरस्कारांची घोषणा होऊनही राज्याच्या जलसंपदा खात्याला या पुरस्कार वितरणाचा मुहूर्तच सापडलेला नाही. यावरून भाजपप्रणीत सरकारचा गतिमान शासन व्यवस्थेचा दावा किती फोल ठरला आहे, याची प्रचिती राज्यातील सिंचन पाणीवापर संस्थांना आली आहे. परिणामी, राज्यातील पाणीवापर संस्थांमध्ये राज्य सरकारच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर उमटला आहे. या प्रकारातून शेतकऱ्यांप्रती अनास्थाही समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना अडचणीत

$
0
0

उमेदवारांच्या अपात्रतेसह बंडखोरीचा प्रश्न

नाशिक : महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निश्चय करणारी शिवसेना अडचणीत सापडल्याची चिन्हे आहेत. शहरातील पक्षाच्या तब्बल नऊ उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याची बाब पक्षाने गंभीरतेने घेतली असून, या साऱ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे. तर, या साऱ्या प्रक्रियेत दिरंगाई नडल्याचा ठपकाही शिवसेनेच्या नेत्यांनी ठेवला आहे.

महापालिका निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारी घोषित करण्याच्या आणि एबी फॉर्म वाटपाचा गोंधळ शिवसेनेच्या अंगाशी आला आहे. त्यामुळे शहरात तब्बल नऊ उमेदवार अपात्र ठरले असून, एका उमेदवारावर सोमवारी (६ फेब्रुवारी) निर्णय होणार आहे. तसेच, शहरांतर्गत नाराजीचा फटकाही शिवसेनेला बसणार आहे. युती तुटल्यानंतर शहरातील १२२ जागांसाठी तब्बल ८२३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. उमेदवारी घोषित न करता थेट शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देण्यात आले. माजी महापौर विनायक पांडे यांचे चिरंजीव ऋतुराज यांना उमेदवारी नाकारण्यातून राडा झाला. या साऱ्या प्रकरणात महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना बेदम मारहाणही झाली. त्यानंतर पांडे यांचे बंड शमले असले तरी या साऱ्या प्रकारावेळी एबी फॉर्म पळवून नेल्याचा प्रकारही घडला. त्यामुळेच शहराच्या विविध भागात अधिकचे एबी फॉर्म आढळून आले. काही उमेदवारांनी दोन फॉर्म सादर केले. या साऱ्या गोंधळाचा मोठा फटका शिवसेनेला बसला आहे. पंचवटीतील प्रभाग चारमध्ये शिवसेनेच्या चारही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. प्रभाग ३०मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी एबी फॉर्मऐवजी झेरॉक्स जोडल्याचा प्रकार घडला. येथीलच उमेदवार संजय चव्हाण यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. प्रभाग १२मध्येही उमेदवाराचा अर्ज बाद ठरवला आहे. तर, रविवारी झालेल्या सुनावणीत प्रभाग २९मध्ये विद्यमान नगरसेवक अरविंद शेळके यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे शहरात एकूण नऊ शिवसेना उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. या साऱ्यांना आता धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविता येणार नाही. त्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. त्यातही प्रभाग ३०मध्ये सोमवारच्या सुनावणीनंतर सेनेची आणखी एक जागा कमी होणार की नाही, हे स्पष्ट होईल.

गोंधळाच्या या साऱ्या प्रकाराचा परिणाम सेनेच्या सत्ता उद्दिष्टावर होणार आहे. याची गंभीर दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असून, या साऱ्या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. तसेच, या गोंधळामुळे सेनेंतर्गत बंडाळी पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. अर्ज बाद होताच सेनेतील धुसफूस बाहेर येत आहे.

दरम्यान, माजी महापौर विनायक पांडे यांचे भाचे कैलास शिंदे हे सिडकोतील प्रभाग २४मध्ये इच्छुक होते. त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी पत्नीसह भाजपात प्रवेश केला. तेथे भाजपाने अर्चना शिंदे यांना पुरस्कृत उमेदवार घोषित केले आहे.

पक्षाचे अधिकृत उमेदवार बाद झाल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार गंभीर आहे. या साऱ्या प्रकाराची चौकशी केली जाईल.

- अजय चौधरी,

संपर्क प्रमुख, शिवसेना

उमेदवारी घोषित करण्याबाबत मोठा हलगर्जीपणा झाला. एकेक जागा महत्त्वाची असताना नऊ उमेदवार बाद झाले आहेत. मुंबईत उमेदवार निश्चितीनंतर कोअर कमिटीची बैठक घेऊन अंतिम निर्णय होणे आवश्यक होते.

- बबन घोलप, उपनेते, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये नव्या व्हिडीओने खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजपमध्ये उमेदवारीसाठी दोन लाख रुपये मागितले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपविरुद्ध आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. दहा लाख रुपये देऊनही उमेदवारी दिली जात नसल्याचा आरोप गोपाळ पाटील यांनी केल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाल्याने राजकीय आखाडा आरोप-प्रत्यारोपांनी रंगला आहे. मात्र, गोपाळ पाटील यांनी हे आरोप फेटाळले असून, हा व्हिडीओ जाणीवपूर्वक तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्कनेते अविनाश अभ्यंकर यांच्या विरोधात पाटील यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या घटनेसंदर्भात कोणत्या कलमांचा वापर करावा, याबाबत पोलिस खल करीत आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर सुरू झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याने तिकिटासाठी दोन लाख रुपये मागितल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. भाजपला याचे उत्तर देताना नाकीनऊ आले. पक्षनिधीसाठी हे पैसे होते असे सांगत भाजपने आरोपांचा धुरळा खाली बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोच इंदिरानगर परिसरातील भाजपचे पदाधिकारी गोपाळ पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. दहा लाख रुपये देऊनही पक्षाने तिकीट दिले नसल्याचा आरोप पाटील करताना दिसले.

त्या व्हिडीओचे जाणीवपूर्वक एडिटिंग

या व्हिडीओ प्रकरणानंतर पाटील यांनी व्हॉट्सअॅपचे काही ग्रुप शोधून काढले. पाटील यांनी सांगितले, की मला तिकीट नाकरण्यात आले, अन्याय झाला हे खरे असले तरी माझ्याकडे पैशांची मागणी करण्यात आलेली नव्हती. या व्हिडीओत एडिटिंग करण्यात आले आहे. मूळ संवाद वेगळाच होता. मनसेचे संपर्क नेते अविनाश अभ्यंकर यांनी तो टाकल्याचे दिसते. त्याचे काही पुरावे समोर आल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, यासाठी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये अर्ज सादर केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या गुन्ह्याबाबत कोणते कलम वापरावे, यासाठी पोलिस खल करीत होते. याबाबत अभ्यंकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अभ्यंकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. मी सध्या मुंबईत असून, माझ्याकडे हा व्हिडीओ आला. त्याची चौकशी करण्याची जबाबदारी मी पार पाडली. गोपाळ पाटील ज्येष्ठ नेते असून, जाणीवपूर्वक मी किंवा माझा पक्ष कोणतेही चुकीचे काम करीत नसल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कैची’च्या मदतीने प्रचाराला ‘धार’

$
0
0

Arvind.jadhav@timesgroup.com
Tweet : @ArvindJadhav

नाशिक: निवडणूक काळात मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी इच्छुक उमेदवार काय क्लुप्ती करतील याचा नेम नाही. सोशल मीडियाचा वापर, सणासुदीला भेट, स्वत:चे प्रेझेन्टेशन याद्वारे एक छाप सोडण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जातो. असाच एक अभिनव उपक्रम पाथर्डी फाटा परिसरातील इच्छुकाने हाती घेतला आहे. कैची कंगव्याच्या मदतीने सदर उमेदवार मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत असून, सध्या हा विषय चर्चेचा ठरतो आहे.

गरमागरम चर्चा झडण्याचे ठिकाण म्हणून चौकातील सलूनच्या दुकानाकडे पाहिले जाते. विविध वयोगटातील आणि विविध जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्ती काही दिवसांनी सलूनमध्ये येतातच. सलूनमध्ये फक्त कामाशी काम होत नाही. बोलणाऱ्याचे कुळीद विकले जातात, ही म्हण कोणत्याही सलूनमध्ये सार्थच ठरते. चर्चा मग ती कोणत्याही विषयाची असो, तिथे जमलेले आपली मते व्यक्त करतात. त्यात निवडणुकीचे वातावरण असेल तर विचारायलाच नको. सलूनमध्ये सततची गर्दी आणि तीही त्याच परिसरातील असते. पब्लीक कनेक्टसाठी ही जागा खरोखर प्रभावी ठरते. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हा मार्ग सोपा असून, त्याची जाणिव झालेल्या एका उमेदवाराने चक्क सलूनमधूनच प्रचाराचा श्रीगणेशा केला. ‘सलूनमध्ये आलेल्या ग्राहकांचे हार्दीक स्वागत, ग्राहकांचे समाधान हीच आमची संपत्ती’ असा मॅटर असलेले प्रचार पत्रक पाथर्डी फाट्यापासून चार्वक चौकापर्यंतच्या सलूनमध्ये लावण्यात आले. सर्वांत खाली पक्षाची निशाणी आणि उमेदवाराचे नाव टाकण्यात आले. साधारणत‍ः सलूनमध्ये असे प्रचार पत्रक लावण्याचा विचार कोणी करणार नाही, याची जाणीव संबंधित उमेदवाराला होती. यासाठी चक्क कैची, कंगवे, लेझर असे एक कीटच संबंधित उमेदवाराने सलून मालकांना भेट दिले.
---------

१०० दुकानांमध्ये साहित्यवाटप

पाथर्डी फाटा ते चार्वाक चौक या परिसरातील सुमारे १०० दुकानांमध्ये हे साहित्य देण्यात आले आहे. अवघ्या ३० हजार रुपयांत मतदारांच्या मोठ्या संख्येपर्यंत संबंधित उमेदवाराला पोहचता येत असल्याची प्रतिक्रिया एका व्यावसायिकाने दिली. आता उमेदवाराचे तिकीट पक्के झाले असून, कैचीच्या माध्यमातून प्रचाराला मिळालेली धार प्रत्यक्ष मतदानातून दिसणार काय, याची चर्चा इंदिरानगर परिसरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मद्य व्यावसायिकांचे मंत्री डॉ. भामरेंना साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर आतमध्ये असलेल्या परवानाधारक मद्य व्यावसायिकांच्या परवाना नूतनीकरणात जे निर्बंध लादण्यात आले आहेत. ते अन्यायकारक असून त्यामुळे भविष्यात अशा परवाना धारकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारचाही महसूल बुडणार आहे. यासाठी धुळे शहर बार असोसिएशनकडून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना निवेदनाद्वारे नियमित व्यवसाय करू देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार दि. १५ डिसेंबरला हा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय अन्यायकारक असून त्यामध्ये परवानाधारकांच्या परवान्यांचे नूतनीकरणाविषयीही निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर मद्याचे चिन्ह व मद्य जाहिरातीवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हजारो व्यावसायिकांवर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सरकारने मद्य विक्रेते व परवानाधारकांवर लादलेले निर्बंध मागे घेऊन त्यांना नियमित व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन बार असोसिएशनतर्फे देण्यात आले. यावेळी सी. पी. गलाणी, सुधाकर बेंद्रे, अशोक सुडके, लोकेश चौधरी, देवा सोनार, छोटू चौधरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरांवरील कारवाई तातडीने थांबवावी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील देवपूर भागात असलेल्या गट नंबर नऊमध्ये रमाबाई आंबेडकर नगरात नागरिकांची घरे अतिक्रमण ठरवून पाडण्यात येत आहे. ही कारवाई तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सोमवारी (दि. ६) या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

देवपूरातील रमाबाई आंबेडकरनगर ही वसाहत पन्नास वर्षांपूर्वीची आहे. ‘स्लम एरिया’ म्हणून हा भाग जाहीर झाला आहे. या ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोकांची वस्ती आहे. या भागातील नागरिक मनपाची घरपट्टी, पाणीपट्टी तसेच वीजबिल भरत असल्याने या नागरिकांना या सुविधा मिळत आहेत. ही घरे पाडून या जागेवर आम्हाला, पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचे सांगितले जात असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रमाबाई आंबेडकर नगरात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकारी पंकज चौबळ यांना हे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेसोबत सत्याग्रह आंदोलन करू

$
0
0

पांझरा चौपाटीबाबत आमदार गोटे आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारने अतिक्रमित ठरविलेली पांझरा चौपाटी बचावासाठी आता आमदार अनिल गोटे यांनी उडी घेतली आहे. याबाबत आमदार गोटे गेल्या आठवड्यापासून आक्रमक झाले आहेत. ‘तीन दिवसांत काय तीन जन्मातदेखील चौपाटी निघू शकणार नाही’, असे खुले आव्हान आमदार गोटेंनी विरोधकांना देत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘तुम्ही धरणे आंदोलन करा, आम्ही धुळेकरांना सोबत घेऊन चौपाटीवर सत्याग्रह आंदोलन करू’, असेदेखील आमदार गोटेंनी विरोधकांना सुनावले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक नुकतेच त्यांनी जाहीर केले आहे.

आमदार गोटेंनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात, महापालिका म्हणजे काही भामट्यांसाठी जगण्याचे साधन झाले आहे. धुळेकर जनतेने कररूपाने भरलेल्या पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारायचा हेच त्यांचे उपजीविकेचे साधन आहे. ठेकेदारांच्या नावावर स्वत: रस्ते गटारींची कामे घेत लूट करायची हा बिनभांडवल धंदा दिवाळखोरीत गेल्यामुळे पोटभरूंना चिड निर्माण झाली आहे, असेही आमदार गोटेंनी यात म्हटले आहे. माता-भगिनींनो, आपल्या बालकांचा आनंद हिरावून घेणाऱ्यांचा शांततेने मुकाबला करण्यासाठी आणि विकासाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी घरून जेवणाचा डबा घेऊन सर्वांनी सायंकाळच्या भोजनपंक्तीत सहभागी व्हावे. तसेच सत्याग्रहाचे आंदोलन हसतखेळत साजरे करावे, असे आवाहनही आमदार गोटेंनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे धुळेकरांना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच चिन्हासाठी फिल्डिंग

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी ४८५, तर इतर छोट्या नोंदणीकृत पक्षांनी ५० च्या आसपास उमेदवारांना निवडणुकीत उमेदवारी दिल्यामुळे ८३० उमेदवार अपक्ष म्हणून या निवडणुकीत रिंगणात आहेत. यातील काही जण दोन दिवसांत माघार घेणार असले, तरी याची संख्या ५०० हून अधिकच राहणार आहे. त्यामुळे या अपक्षांना मोठ्या प्रभागात प्रचार करणे अवघड असल्यामुळे आपल्या जोडीला इतर उमेदवार असावेत यासाठी चार अपक्षांनी एकत्र येत स्थानिक आघाडी तयार केली आहे. पण, या आघाडीला राज्य निवडणूक आयोगाच्या नियमामप्रमाणे एकच चिन्ह मिळणार नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सोमवारी अशा अनेक अपक्षांच्या आघाडीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एकच चिन्ह देण्याची मागणी प्रभागासाठी केली. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याला सपशेल नकार दिला. विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर सर्वांच्या संमतीने याला होकार दिला असता, तरी इतर उमेदवारांनी तो मान्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे या अपक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना-भाजपच्या मातब्बर उमेदवारांना शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेकडे काही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार नाहीत. त्याचप्रमाणे प्रभागात एकाच पक्षाच्या उमेदवारांना मते मिळणे अवघड आहे. त्यामुळे अनेकांनी स्थानिक गणित मांडत चार भागांचे विविध पक्षांचे, पण अपक्ष म्हणून उमेदवारी करणारे उमेदवार एकत्र करून आघाडी करण्याचा पर्याय निवडला आहे. त्यात विद्यमान उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पहिला प्रयोग आपल्या प्रभागात अगोदरच केला. त्यानंतर विविध प्रभागांत हा प्रयोग केला जात असून, त्यातही प्रबळ उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अपक्षांचे बळही वाढणार आहे.


शिवसेनेची अडचण

शिवसेेनेने उमेदवारी देऊनही स्थानिक पातळीवर एबी फाॅर्मचा गोंधळ झाल्यामुळे १० उमेदवारांवर अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. आता या १० उमेदवारांना केवळ त्या प्रभागात एकच चिन्ह मिळावे यासाठी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली. पण, आयुक्तांनी हा प्रश्न निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे टोलवत त्यांना नकार दिला. त्यामुळे शिवसेनेचे पुरस्कृतही आता वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवणार आहेत.


लक्षात ठेवणे अवघड

स्थानिक आघाडीचे उमेदवार एकत्र प्रचार करणार आहेत. पण, या सर्वांना वेगवेगळे चिन्ह मिळणार असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडणार आहे. चार चिन्हे लक्षात ठेवून मते देणे अवघड होणार असल्यामुळे त्याचा फटकासुद्धा या उमेवदारांंना बसू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बडगुजरपुत्राचा पत्ता कट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शिवसेनेने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसतानाही एबी फॉर्म सादर करणारे दीपक बडगुजर आणि मनसेतून शिवसेनेत आलेले भूषण देवरे यांना पक्षाने माघार घेण्याचे फर्मान काढले आहे.
प्रभाग क्रमांक २९ मध्ये मनसेतून शिवसेनेत आलेले विद्यमान नगरसेवक अरविंद शेळके, तसेच रत्नमाला राणे, तसेच माजी नगरसेवक सतीश खैरनार व सुमन सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी एबी फॉर्मचा गोंधळ झाला. या सर्व प्रकारात शेळके आणि खैरनार यांची उमेदवारी अडचणीत आली. या दोघांच्याही सेनेकडील उमेदवारीवर हरकत घेण्यात आली. त्यास एबी फॉर्मचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. अखेर उमेदवारी छाननी आणि सुनावणीत या दोघांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे आता या दोन्ही उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे. या साऱ्या प्रकारात महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेनेने बडगुजर यांचे पुत्र दीपक आणि भूषण देवरे यांना उमेदवारी दिली नसतानाही त्यांनी त्यांच्या अर्जासोबत एबी फॉर्म सादर केले. त्यामुळे या दोघांचेही अर्ज वैध ठरले. अखेर पक्षाचे सचिव अनिल देसाई नाशिकमध्ये आले असता त्यांनी हे प्रकरण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले. अखेर पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यानुसार दीपक बडगुजर आणि भूषण देवरे हे दोन्ही उमेदवार त्यांचे अर्ज मागे घेणार असून, या प्रभागात शेळके, खैरनार यांना शिवसेनापुरस्कृत केले जाणार आहे.
बडगुजरांची खेळी
शिवसेनेने सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांची पत्नी हर्षा बडगुजर यांना प्रभाग २५ मधून उमेदवारी दिली. मात्र, आपले पुत्र दीपक याला प्रभाग २९ मधून उमेदवारी मिळावी, यासाठी बडगुजर प्रयत्नशील होते. पक्षाने पुत्राला उमेदवारी नाकारली असली तरी एबी फॉर्मच्या गोंधळात दीपक यांनी तो मिळवून सादर केला. सेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील सेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची जबाबदारी बडगुजर यांच्यावर सोपविण्यात आली. मात्र, विद्यमान नगरसेवक शेळके यांचा पत्ता कट करून दीपक यांनी एबी फॉर्म सहीसलामत दाखल केल्याचे उघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images