Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिला गिरवताहेत सभाधीटपणाचे धडे

$
0
0


प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

राज्यभरात महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये महिलावर्गाचा सहभाग ५० टक्के आरक्षणामुळे वाढला आहे. अनेक राजकारण्यांनी आपली पत्नी, मुली, सुनांना राजकारणाच्या आखाड्यात उतरवले आहे. त्यापैकी बऱ्याच महिला स्टेज डेअरिंग व आत्मविश्वासवृद्धीसाठी छोट्या-मोठ्या कोर्सेसना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी असे प्रक्षिक्षण मिळविण्यासाठी नाशिककरांना थेट मुंबई-पुण्यामध्ये जावे लागत होते. मात्र, आता नाशकातही असे कोर्सेस उपलब्ध झाले आहेत. अनेक महिला उमेदवारांना निवडणुकांच्या काळात महत्त्वाची बाब असणारे भाषण येत नसल्याचे व अंगी सभाधीटपणा (स्टेज डेअरिंग) नसल्याचे दिसून येते. अशा राजकारणात उतरणाऱ्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध व्यावसायिक वक्त्यांकडून मार्गदर्शन घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये अशा राजकारण इच्छुक महिलांसाठी खास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन विविध संस्था करीत असून, महापालिका निवडणुकीची चालून आलेली संधी अशा प्रशिक्षण संस्थांकडून कॅश करून घेतली जात आहे. आठवड्यातून दोन तासांच्या प्रशिक्षण वर्गाला अनेक महिला राजकारणी हजेरी लावत आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींकडून त्यांना मार्गदर्शनही मिळत आहे. काही बड्या राजकारण्यांनी तर एकत्रितपणे नको, तर खासगी प्रशिक्षण देण्याची मागणी केली असल्याचे एका संस्थाचालकांनी सांगितले.


हे प्रशिक्षण घेतले जातेय...

या कोर्सेसच्या माध्यमातून आपला आत्मविश्वास वाढीस लागावा याकरिता वक्तृत्व, सभाधीटपणा, मेक-अप, संभाषणकौशल्य, हावभाव, देहबोली, वाचिक अभिनय, शुद्ध भाषा, शब्दोच्चार यांचे प्रशिक्षण घेण्यावर भर दिसून येत आहे. यासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव समोरच्यावर कसा पडेल याकरितादेखील प्रशिक्षण घेतले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.


अनेक महिला राजकारणात आहेत. मात्र, संभाषणकौशल्य व आत्मविश्वासाचा अनेकींमध्ये अभाव दिसतो. अशा कोर्सेसच्या माध्यमातून संबंधित महिलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याचे काम केले जात आहे.

- मधुरा क्षेमकल्याणी, सेलिब्रिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ घंटागाड्यांची ‘स्मार्ट’ सेवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या घंटागाड्यावर स्पीकर लावण्यात आल्याने नागरिकांचे उत्तम प्रकारे प्रबोधन होत आहे. शिवाय गेल्या जानेवारीपासून उपग्रहावर आधारित जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित केल्याने घंटागाड्या स्मार्ट झाल्या असून, कचरा संकलनाबाबतच्या तक्रारी कमी झाल्या आहेत.

नागरिक सुक्या कचऱ्यासोबतच ओला कचरा, खरकटे देतात. त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होऊन त्यांच्या आरोग्यालाही धोका होतो. हे लक्षात घेऊन नागरिकांनी सुका व ओला कचरा वेगळा करून द्यावा, असे आवाहन करणारी कॅसेट घंटागाडीत लावण्यात आली आहे. घंटागाडी आल्यावर घंटा न वाजवता कॅसेट लावली जाते. त्याद्वारे कचरा घंटागाडीतच द्या, ओला व सुकरा कचरा वेगळा करून द्या, असे आवाहन केले जाते.

सकारात्मक परिणाम

विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी ‘मटा’ला सांगितले, की नागरिक सुक्या कचऱ्यासोबतच वरण, पातळ भाज्या, शिळ्या पोळ्या आदी देतात. नाशिकरोडला या सीडीमुळे नागरिकांचे चांगले प्रबोधन होत असून, सुका व ओला कचरा वेगळा करून देण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यांपासून स्पीकर लावून प्रबोधन केल्यामुळे चांगला परिणाम मिळत असून, कचरा संकलनाही वाढले आहे.

स्मार्ट घंटागाड्या

नाशिकरोडला छोट्या तीन व मोठ्या ३२ अशा एकूण ३५ घंटागाड्या आहेत. याशिवाय हॉटेल, डेब्रिज, उद्यानाचा पालापाचोळा, रात्री आणीबाणीच्या वेळी, तसेच जैविक कचरा यासाठी प्रत्येकी स्वतंत्र एक घंटागाडी आहे. नव्या करारानुसार, ठेकेदाराने नवीन गाड्या पुरवल्या आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या कचरा संकलन करतात. महापालिकेने गुगल मॅपनुसार घंटागाडीचा मार्ग ठरवून दिला आहे. त्याप्रमाणे गाडी मार्गाने गेली नाही, तर महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आरोग्य कक्षात संगणकावर ते दिसते. पूर्वी घंटागाडीचालक शॉर्टकट मारायचे. आता तसे केल्यास ऑनलाइन दंड केला जातो. नागरिकांच्या तक्रारीही ऑनलाइन येतात. तक्रारीचा एसएमएस विभागीय स्वच्छता निरीक्षकाकडे येतो. ते तक्रारदाराच्या घरी सुपरवायझर पाठवतात.


लोकसंख्येचा ताण

२०११ च्या जनगणनुसार नाशिकरोडची लोकसंख्या २ लाख ५८ हजार आहे. त्यानुसार नाशिकरोडला १२ प्रभागांसाठी ३५० स्वच्छता कर्मचारी आहेत आता लोकसंख्या वाढली आहे. नवीन लोकवसाहती होत आहेत. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी सफाई कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. कर्मचारी भरती झालेली नाही. नाशिकरोडला उड्डाणपूल, बिटको हॉस्पिटल, जेलरोड, दुर्गा गार्डन, पंचक, देवळालीगाव येथे आठवडेबाजार आहे. त्या ठिकाणचाही कचरा दररोज उचलावा लागतो. कर्मचारी भरती केल्यास सार्वजनिक आरोग्याला त्याचा फायदा होईल.

नाशिकरोडला स्मार्ट घंटागाड्या आल्यापासून कचरा उचलण्याचे प्रमाणही वाढले आहे. जीपीएस सिस्टीम असल्यामुळे घंटागाडीचालकांना ठरवून दिलेल्या मार्गावर जावेच लागते. नागरिकाही ओला व सुका कचरा वेगळा करून सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

-संजय दराडे, विभागीय स्वच्छता निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदामाईला ‘मैलागाडी’ बनवू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गोदावरीला आपण माता म्हणतो. त्यामुळे मातेप्रमाणेच तिचा सन्मान व्हायला हवा. तिला मैला वाहून नेणारी मालगाडी बनवू नका असे कळकळीचे आवाहन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी सोमवारी नाशिकमध्ये केले. निवडणुकीच्या निमित्ताने दारापर्यंत येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडून गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे वचन घ्या, असेही सिंह यावेळी म्हणाले.
गोदावरीच्या जन्मोत्सवानिमित्त कुसुमाग्रज स्मारकामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंह बोलत होते. यावेळी अभिनेता चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, राजेश पंड‌ित, देवांग जानी, डॉ. प्राजक्ता बस्ते, ललिता शिंदे, गोपाळ जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिंह म्हणाले, गोदेचे पावित्र्य राखले जावे यासाठी गोदावरीच्या प्रवाहाजवळ ठिकठिकाणी कुंड बनविले गेले. परंतु, विकासाच्या नावाखाली गोदाघाट परिसरात काँक्रिटीकरण केले गेले. ज्यांच्या मनात गोदेबद्दल प्रेम, आस्था आणि डोळ्यांत पाणी नव्हते, त्यांनीच गोदावरीलाही कोरडे केले. गोदावरी ही माता आहे. तिला मैला वाहणारी मालगाडी बनवू नका, असे भावनिक आवाहन सिंह यांनी केले. गोदावरीचे पूर्वीचे सौंदर्य तिला मिळावे, ती वाहती व्हावी यासाठी काँक्रिटीकरण काढून तिला प्रवाहीत करा, असे आवाहन करण्यात आले. गोदाकाठापासून जवळच्या परिसरात १५० वर्षांहून जुन्या २० विह‌िरी आहेत. या विह‌िरींना पाणी आहे. गोदापात्रात काँक्र‌िटीकरणामुळे नैसर्गिक झऱ्यांचा गळा घोटला गेला असून, भूगर्भातील हे जलस्त्रोत जिवंत करण्याबाबत महापालिकेलाही निवेदन देण्यात आले आहे. डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी गोदावरीचा प्रवाह कसा वाहता करता येऊ शकेल, याबाबतचे प्रेझेंटेशन सादर केले. त्र्यंबकेश्वर येथे ९३ कुंड असून, त्यांचाही काँक्र‌िटीकरणामुळे गळा घोटला जात असल्याकडे ललिता शिंदे यांनी लक्ष वेधले.
गोदावरीला तिचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी जनस्थान परिवारासह अन्य काही घटक एकत्रित आले आहेत. ‘सेल्फी फॉर गोदा’ आणि ‘मी गोदामाई बोलतेय’ असे दोन उपक्रम त्यांनी हाती घेतले असून, प्रत्येकाने गोदामाई पुन्हा वाहती करण्याच्या संकल्पाचा व्ह‌िडीओ फेसबुकवर शेअर करावा, असे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त समारंभ आज मंगळवार, ७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या येथील मुख्यालयात सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. या दीक्षान्त समारंभात यंदा १ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती व दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्र. कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर हे असतील.
यावर्षी पदवी, पदविका घेणाऱ्यांमध्ये राज्यातील १ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, या समारंभात पदवी १ लाख १४ हजार ६४३, पदविका २१ हजार ११, पदव्युतर पदविका ४ हजार ८१३ तर पीएच.डी. चे १७ विद्यार्थी पदवी ग्रहण करणार आहेत. यंदा पदवी, पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पुरुष ५६ हजार २७० तर महिलांची संख्या ८४ हजार १९७ आहे.
यावर्षी पदवी घेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ५५ टक्के तर महिलांचे प्रमाण ४५ टक्के आहे. स्री-पुरुष प्रमाणात सर्वाधिक महिला ९ हजार १८६ नाशिक विभागात आहेत. त्याखालोखाल ७ हजार ९०१ अमरावती आणि ७ हजार ६२७ नांदेड विभाग आहेत. शहरी भागातील विद्यार्थी ४९ हजार असून उच्च शिक्षण समाजाच्या वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय असलेल्या मुक्त विद्यापीठाने ग्रामीण भागातही मोठी विद्यार्थीसंख्या मिळवली आहे. यंदाच्या दीक्षान्त समारंभात पदवी घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८९ हजार ७१ विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. तर आदिवासी भागातील २ हजार ३९४ विद्यार्थी आहेत. याशिवाय ६१ विद्यार्थी बंदिवानांचाही त्यात समावेश आहे.
गेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा यावर्षी पदवीग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुक्त विद्यापीठाने ४०-६० वर्षे वय असलेल्या तब्बल १९ हजार ७९ व्यक्तींना पुन्हा उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. तर ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या तब्बल ११५ व्यक्ती आपले पदवीधर होण्याचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण करीत असून त्यात सर्वाधिक व्यक्ती ४०३१ नागपूर आणि ३०१७ मुंबई विभागातील तर ६० पेक्षा जास्त वय असलेल्या २८ व्यक्ती मुंबई तर २२ व्यक्ती नाशिक विभागातील आहेत. पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांत सर्वात जास्त विद्यार्थी बी.ए. चे ९२ हजार १८४ तर बी.कॉम.च्या ११ हजार ६५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्यासह परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, वित्त अधिकारी मगन पाटील, जनसंपर्क विभागाचे प्रमुख संतोष साबळे उपस्थित होते.
दीक्षान्त समारंभाचे थेट प्रसारण इंटरनेटवरून करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळावर लिंक उपलब्ध असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुत्रप्रेमामुळे नेतेच अडचणीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तीन दिवसांपूर्वीच माजी महापौर विनायक पांडे यांच्या मुलाला उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना झालेली मारहाण राज्यभर चर्चेत आली असताना सोमवारी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुत्र अजिंक्य गोडसे यांना जिल्हा परिषदेत उमेदवारी दिल्यामुळे ग्रामस्थांनी एकलहरे गाव बंद पाडत निषेध नोंदवला. एकामागून एक पुत्राच्या उमेदवारीवरून झालेल्या घटनेमुळे नाशिकच्या निवडणुका पुत्रप्रेमामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. विशेष म्हणजे या पुत्रप्रेमामुळे हे नेतेही अडचणीत सापडले आहेत.

आपल्या मुलाला राजकारणात फ्लॅटफॉर्म निर्माण करून त्यांना पदे मिळवून देणे हे नवीन नाही. एकेकाळी काँग्रेसच्या घराणेशाहीविरुद्ध बोलणाऱ्या विरोधी पक्षांनीसुद्धा तीच री ओढत आपल्या मुलांना सत्तेची दारे उघडून दिली. त्यामुळे नाशिकमध्ये घडलेल्या गोष्टीत नवलाई नसली तरी हे पुत्रप्रेम मात्र या निवडणुकीत चांगलेच चर्चेत आले आहे. या निवडणुकीत केवळ या दोनच घटना घडल्या नाही, तर शहर व जिल्ह्यात या घटना घडल्या व त्यांच्या चर्चाही रंगल्या. भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या मुलीला उमेदवारी न दिल्यामुळे त्या नाराज आहेत, तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपला मुलगा समीरला जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरवल्यामुळे भाजपचे कार्यकर्त्यांतही नाराजी आहे. या चार घटनांबरोबरच शिवसेनेचे नेते सुधाकर बुडगुजर यांचा मुलगा दीपक याला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेली नसताना त्यांनी थेट एबी फॉर्म मिळवून विद्यमान नगरसेवक अरविंद शेळके यांच्या अगोदर नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे शेळके यांची गोची झाली. त्यानंतर ही गोष्ट पक्षाच्या लक्षात आल्यानंतर थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यात लक्ष घालून दीपक यांना माघार घेण्याचे आदेश दिले. एकीकडे या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील यांनी आपल्या काकांविरुद्धच दंड थोपटले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक असलेल्या दिनकर पाटील यांना पुतण्याबरोबरच निवडणुकीच्या रिंगणात सामना करावा लागणार आहे. या काही घटना चर्चेत आल्या असल्या तरी जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी मुलांना रिंगणात उतवल्यामुळे त्यावरही दबक्या आवाजात टीका सुरूच आहे. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात मुलाला प्लॅटफॉर्म करून देणाऱ्या मुलायमसिंह यांना पस्तावा करण्याची वेळ आलेली असताना नाशिकच्या या नेत्यांनी यातून काहीही धडा घेतलेला दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपविरोधात बंडखोरांची आघाडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवारी देण्याचा प्रकार भाजपच्या चांगलाच अंगलट येणार आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून, बंडोबांना शांत करण्याचे भाजपचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहे. विशेषतः मोठ्या पदाधिकाऱ्यांचेच पत्ते कापणे पक्षाच्या अंगलट आले असून, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे सरचिटणीस सुरेश पाटील व कामगार आघाडीचे उपाध्यक्ष गोपाळ पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी बंडखोरांची आघाडी करण्याची योजना सुरू आहे.

महापालिकेसाठी भाजपने उमेदवारी वाटपात मोठा गोंधळ केला आहे. विशेषतः निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने पक्षात मोठी नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच बहुतांश पदाधिकाऱ्यांचीही उमेदवारी कापण्यात आली आहे. प्रदीप पेशकार, गोपाळ पाटील, सुरेश पाटील यांच्या प्रदेश पातळीवर नेत्यांचेही पत्ते कापण्यात आली आहेत. त्यामुळे निष्ठावंत संतापले असून, त्यांनी आता बंडखोरांचीच आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. गोपाळ पाटील प्रभाग क्र. २३ मधून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, तर सुरेश पाटील प्रभाग क्र. १२ मधून रिंगणात उतरणार आहेत. अन्य नाराज नेत्यांसोबतही बोलणी सुरू असून, एकत्र आघाडी करून भाजपला धडा शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निष्ठावंतांची नाराजी भाजपला भोवणार असल्याचे चित्र आहे. माघारीचा दिवस मंगळवारी संपल्यानंतर निष्ठावंत एकत्र येऊन थेट भाजपलाच आव्हान देणार आहेत. त्यामुळे बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप मनसेचे, उत्तर शिवसेनेला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या उमेदवारीसाठी दोन लाखांची मागणी करणारा व दहा लाख रुपये दिल्याचा दावा करणारे भाजपचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पक्षाची बदनामी टाळण्यासाठी सारवासारव सुरू केली आहे. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याऐवजी आमदार अपूर्व हिरे यांनी सोमवारी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. उमेदवारांकडून पक्षाने अधिकृतपणे दोन लाख रुपये घेतल्याचा दावा हिरे यांनी केला असून, हा खर्च उमेदवारांच्या खर्चात धरला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, तर या निवडणुकीत सर्वाधिक गोंधळ हा शिवसेनेत असून, या षडयंत्रामागेही शिवसेना असल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे मनसेने आरोप केल्याने भाजपने मनसेला उत्तर देण्याऐवजी शिवसेनेला उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपचा कारभार चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. भाजप कार्यालयात दोन लाख रुपये उमेदवारांकडून घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची सारवासारव सुरू असतानाच, पुन्हा रविवारी दहा लाखांचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली असून, सोशल मीडियावर भाजप लक्ष्य ठरला आहे. भाजपवर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतानाही, शहराध्यक्ष सानप व पालकमंत्री गिरीश महाजन गप्प आहेत. पक्षाची झालेली बदनामी थांबवण्यासाठी भाजपने अखेर आमदार हिरे यांना पुढे केले आहे. त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या दोन्ही घटनांबाबत सारवासारव केली आहे.

भाजपची उमेदवारयादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक कामाच्या सामूहिक खर्चासाठी प्रत्येक उमेदवाराकडून दोन- दोन लाख रुपये घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा खर्च उमेदवाराच्या व पक्षाच्या खर्चात दाखवला जाणार असल्याचा दावा हिरे यांनी केला आहे. मात्र, उमेदवारांच्या खात्यातून पैसे का घेतले नाहीत, यावर मात्र हिरे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. उमेदवारी वाटप ही सर्व्हेच्या आधारे करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू असून, एबी फॉर्म वाटपात काय झाले, याची सर्वांनाच माहिती असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेने डबल एबी फॉर्म दिले. शिवसेनेनेच भाजपच्या बदनामीचे षडयंत्र रचल्याचे सांगत, जो पक्षच घोळात आहे, ते शहर कोणत्या दिशेनेने नेणार, असा सवाल या वेळी उपस्थित केला. भाजपची बदनामी करण्यापूर्वी शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेची छुपी आघाडी असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.

सीमा हिरेंचे मनोमीलन

पत्रकारांशी बोलताना आमदार हिरे यांनी आमदार सीमा हिरेंची नाराजी दूर झाल्याचा दावा केला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली असून, त्यात सीमा हिरे उपस्थित होत्या. उमेदवारी वाटपात काहींना झुकते माप मिळाले असले तरी उमेदवारी भाजपच्याच कार्यकर्त्याला मिळाली असल्याचे सांगत, माझ्या घरात कोणालाही उमेदवारी दिली नसल्याचा दावा केला. आमदार हिरे यांची नाराजी दूर झाली असून, आता एकदिलाने निवडणुकीचा सामना करण्याचा निर्णय झाल्याचे अपूर्व हिरे यांनी सांगितले.

अपूर्व हिरेंवर जबाबदारी

गेल्या दोन दिवसांपासून पक्षाची बदनामी होत असताना पक्षाची बाजू सावरण्यासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे समोर आल्या होत्या. शहराध्यक्ष तोंड उघडत नसतानाही, त्यांनी एकतर्फी किल्ला लढवला होता. मात्र, आता पक्षाने निवडणूक काळात पक्षाच्या प्रवक्तेपदी आमदार फरांदे यांच्याऐवजी आमदार हिरेंची नियुक्ती केली आहे. निवडणूक काळात पक्षाची मते मांडण्याची जबाबदारी हिरेंवर देण्यात आल्याने त्यांचे आता पक्षात वजन वाढल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराणेशाहीचा डंका

$
0
0

जिल्हा परिषदेसाठी २२८५ अर्ज दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण दोन हजार २८५ अर्ज दाखल झाले आहेत. एकूण ७३ गटांसाठी ८५०, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी तब्बल १४३५ अर्ज दाखल झाले. पक्षांनी सोमवारी झाकली मूठ उघडली, पण उमेदवारी न मिळालेल्या सर्वच पक्षांमधील इच्छुकांनी बंडाचे निशान फडकावले. यंदाही तिकीट वाटपावर घराणेशाहीचाच वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले असून, खासदार हेमंत गोडसे यांच्या मुलास एकलहरे गटातून उमेदवारी देण्यात आल्याने एकलहरेत दुकाने बंद ठेऊन निषेध नोंदविण्यात आला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच इच्छुकांनी तहसील कार्यालयांमध्ये गर्दी केली. या एकाच दिवसात जिल्हा परिषदेसाठी ५५६, तर पंचायत समितीसाठी रेकॉर्डब्रेक ८५० अर्ज दाखल झाले. निफाड तालुक्यात शेवटच्या दिवशी गटासाठी ८६, तर पंचायत समितीसाठी १३६ अर्ज दाखल झाले. सर्वात कमी अनुक्रमे १७ आणि २४ अर्ज सुरगाणा तालुक्यात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिष्ठेच्या बनलेल्या काही जागांवर ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याने अनेक इच्छुकांनी बंडाचे निशान फडकावत अन्य पक्षातून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी अपक्ष अर्ज सादर करीत आपले आव्हान कायम ठेवले आहे. सटाणा येथील जायखेडा गटात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी पत्नीला काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. खासदार हेमंत गोडसे यांचा मुलगा, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची पत्नी आणि मुलगा, आमदार निर्मला गावित यांची मुलगी यांसह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी नातलगांनाच उमेदवारी देऊन घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केले आहे. मनसेने बनावट नोटा प्रकरणातील बहुचर्चित विलास पांगारकर यांना नांदुर शिंगोटे गटातून पुरस्कृत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनधरणी, आश्वासनांचे गाजर अन् सौदेबाजी

$
0
0

महापालिका निवडणुकीत बंडखोरांचा भाव वधारला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी बंडखोरांनी राजकीय पक्षांना माघारीसाठी अक्षरशः झुंजवले असून, विनवण्या करूनही बंडखोर ऐकत नसल्याने नेते बेजार झाले आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शड्डू ठोकलेल्यांची मनधरणी करण्याबरोबरच आश्वासनांचे गाजर दाखवले जात आहे. आश्वासनांची खैरात करूनही ऐकत नसल्याने थेट सौदेबाजी केली जात असल्याने बंडखोरांचा भाव चांगलाच वधारला आहे.

बंडखोरांना आवरण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला जात असून, अनेकांना स्विकृत नगरसेवक, संघटनात्मक जबाबदारी, शिक्षण मंडळ आदींवर नियुक्त्या बहाल केल्या जात आहेत. मंगळवार माघारीचा शेवटचा दिवस असून, या दिवशी अपक्षांचा भाव चांगलाच वधारणार असून, मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडून येण्याचे मेरिट ग्राह्य धरत पक्षाबाहेरून येणाऱ्या आयारामांना मोठ्या प्रमाणावर तिकिटे दिली. त्यामुळे शिवसेना, भाजपात बंडखोरी वाढली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतही तुरळक बंडखोरी आहे. या बंडखोरांनी पक्षाच्याच अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शिवसेना व भाजपची मोठी अडचण झाली आहे. या बंडोबांना थंड केले नाही, तर थेट संभाव्य सत्तेलाच मुकावे लागणार आहे.

बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. या बंडखोरांना पक्षाच्या कार्यालयातून फोन करून चर्चेचे आवतन दिले जात आहे. त्यामुळे काही अपक्ष नॉटरिचेबल झाले आहेत. अनेकांना शिक्षण मंडळ, स्विकृत नगरसेवकाचे गाजर दाखवले जात आहे. काहींना थेट संघटनात्मक पदांची ऑफर दिली जात आहे. काहींना महापालिकेचा ठेका दिला जाईल, असे गाजर दाखवले जात आहे. तसेच महापालिकेत नोकरभरती झाली तर, त्यात तुम्हाला कोटा देऊ असे आश्वासनही दिले जात आहे. मनधरणीने ऐकले नाही, तर थेट सौदेबाजी केली जात आहे. त्यामुळे अपक्षांचा भाव चांगलाच वधारला आहे. उमेदवारीसाठी आम्हाला फिरवले, आता आम्ही तुम्हाला फिरवू असा इशाराच बंडखोर देत आहेत.

तयारीचा खर्च देऊ

भाजपच्या वतीने तर अनेकांना निवडणुकीच्या अगोदरच तयारीला लागण्याचा आदेश नेत्यांकडून देण्यात आले होते. त्यामुळे अनेक इच्छुकांनी तयारी करीत विविध कार्यक्रम घेऊन प्रभागात आपली हवा निर्माण केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खिसाही रिकामा केला. परंतु, आता उमेदवारी मिळाली नसल्याने हा खर्च वाया जाणार आहे. हा खर्च तरी भरून निघावा यासाठी काहींनी अपक्ष म्हणून रिंगणात राहणे पसंत केले आहे. त्यामुळे ज्याला अधिकृत उमेदवारी मिळाली, त्याच्यावर अपक्षांना शांत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अपक्षांचे उपद्रवमूल्य पाहून काहींनी त्याचा खर्च सव्याज परत करण्याचीही तयारी दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये सेनेचा गोंधळ कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत पंचवटी विभागात प्रभाग क्रमांक ४ मध्ये एबी फॉर्मच्या गोंधळामुळे शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. आता या प्रभागात शिवसेनेने चार उमेदवारांना पुरस्कृतच करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यात पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी दिलेल्या सविता बडवे यांचे नाव आता कापण्यात आले आहे. शिवसेनेने घोषित केलेल्या यादीत सविता महेंद्र बडवे यांचे नाव होते. मात्र, त्यांनी आपला अर्ज सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याऐवजी नागरिकांचा मागासवर्ग गटातून भरल्यामुळे त्यांना शिवसेनेने पुरस्कृत केले नाही. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवतात की माघार घेतात हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वांत आधी सविता बडवे यांनी पक्षाकडून एबी फॉर्म मिळवला होता. त्या हा एबी फॉर्म दाखल करणार, तितक्यात शिवसेनेचे या प्रवर्गातून इच्छुक असलेले सतनाम राजपूत यांनी त्यांचा एबी फॉर्म फाडला. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर उर्वरित उमेदवारांचे एबी फॉर्म आले नसल्याचे लक्षात आल्यानंतर गोंधळात आणखी भर पडली. नंतर पक्षाने पुन्हा चार कोरे एबी फॉर्म पाठवले. मात्र, वेळ संपल्यामुळे सर्वच उमेदवारांवर अपक्ष लढण्याची नामुष्की ओढवली आहे. आता या निवडणुकीत शिवसेनेने या चारही उमेदवारांना पुरस्कृत केलेले आहे. मात्र, या निवडणुकीत फॉर्म फाडणारे शिवसेनेचे सतनाम राजपूत यांची उमेदवारी कायम आहे, तर बडवेंचाही अर्ज शिल्लक आहे. त्यामुळे मंगळवारी माघारीनंतर या प्रभागाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विरोधकांचा हात

शिवसेनेच्या या एबी फॉर्मच्या गोंधळात विरोधकांचा हात असल्याचेही आता शिवसेनेकडून बोलले जात आहे. त्यात शिवसेनेचे काही नेते सामील होते व त्यांनीच एबी फॉर्म उशिरा देऊन हा गोंधळ केला. त्यामुळे अशा नेत्यांना शोधून ही फिक्सिंगसुद्धा शोधून काढावी, अशी मागणी शिवसेनेच्या या प्रभागातील कार्यकर्त्यांनी केली आहे.

असे झाले बदल

शिवसेनेच्या अधिकृत यादीत प्रभाग क्रमांक चारमध्ये अ प्रवर्गातून प्रतिभा घोलप, ब प्रवर्गातून वर्षा गिते (पगारे), क प्रवर्गातून भगवान भोगे व ड प्रवर्गातून सविता बडवे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, आता प्रवर्ग डमध्येच भगवान भोगे व सविता बडवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे येथून एकाच उमेदवाराला पुरस्कृत करता येणार आहे. त्यामुळे बडवे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी पक्षाने चांगदेव गुंजाळ यांचे नाव पुढे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराणेशाहीविरोधात कार्यकर्त्यांचे निषेधास्त्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना डावलून घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या एकलहरे गटातून खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य यांना संधी देण्यात आल्याने प्रमुख इच्छुक शंकर धनवटे यांच्या समर्थकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. एकलहरे परिसरात सोमवारी बंद पाळत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.

एकलहरे, पळसे, देवळाली हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. जिल्हा परिषदेच्या एकलहरे गटातून विद्यमान सरपंच शंकर धनवटे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार होते. परंतु, त्यांचा पत्ता ऐनवेळी कट करून खासदार गोडसे यांचे पुत्र अजिंक्य यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे धनवटे समर्थक शिवसैनिक संतापले. एकलहरे गावात सोमवारी बंद पाळून त्यांनी शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वाचा निषेध केला. उमेदवारीसाठी थेट नेतृत्वाविरोधात डरकाळी फोडण्याचा प्रकार ग्रामीण भागात प्रथमच घडला आहे.

भोवली ती निवडणूक
शंकर धनवटे यांनी १९९७ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी ‌मागितली होती. त्यावेळी भाऊसाहेब ढिकले यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यानंतर पुन्हा २००७ च्या निवडणुकीतही धनवटे यांना डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा सामना शिवसेनेचे जगन आगळे आणि मनसेचे हेमंत गोडसे यांच्याशी झाला होता. त्या निवडणुकीत हेमंत गोडसे अवघे १६८ मताधिक्य घेत विजयी झाले. या निवडणुकीत धनवटे यांनी गोडसे यांना विजयासाठी झुंजविले होते. २०१२ च्या निवडणुकीत एकलहरे गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला मेंगाळ निवडून आल्या. आता २०१७ च्या निवडणुकीत खुल्या गटासाठी झाल्याने धनवटे यांनी जोरदार तयारी केली. मात्र, २००७ च्या निवडणुकीतील बंडखोरी त्यांना आताच्या निवडणुकीत भोवली.


विद्यमान खासदारांनी पुत्रप्रेमापोटी निष्ठावंतांना डावलले. शिवसेनेत घराणेशाही मुरत आहे. पक्षाने संधी नाकारली तरी मी अपक्ष लढणार आहे. माझी लढाई शिवसेनेविरोधात नव्हे तर खासदार गोडसे यांच्याविरोधात आहे.
- शंकर धनवटे, इच्छुक उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेचे आंदोलन तर लोकसंग्रामची मेजवानी

$
0
0

पांझरा चौपाटी अतिक्रमणावरून धुळ्य ाात आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या चौपाटीचे अतिक्रमण वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी लोकसंग्रामच्या माध्यमातून ‘खाऊन पिऊन आत्मसंतुष्ट सत्याग्रह’ आंदोलन सुरू केले. तर त्यांच्यासमोर शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

पांझरा चौपाटीवर मंगळवारी (दि. ७) या दोन्ही आंदोलनाच्यावेळी लोकसंग्रामने जोरदार घोषणाबाजी करून आंदोलनाच्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून त्यांचा आस्वाद घेतला. चौपाटीच्या वादावरून शिवसेना व लोकसंग्राम हे आमनेसामने उभे ठाकले आहेत. या दोन्ही आंदोलकांमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रस्ता बंद ठेऊन पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता.

याबाबत लोकसंग्राम पक्षाकडून जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. अमोल सूर्यवंशी, दिलीप साळुंखे, प्रशांत भदाणे, डॉ. अनिल पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तर शिवसेनेकडूनही जिल्हाधिकाऱ्यांना चौपाटी उठविण्याबाबत निवेदन देताना नगरसेवक नरेंद्र परदेशी, फारुक शहा, विष्णू गवळी, भरत मोरे उपस्थित होते.

आरोप करणारे भ्रष्ट

चौपाटीचे अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येणार नाही. पांझरा नदीकिनारी ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. तेथे आमदार गोटे यांनी सुंदर आकर्षक अशी चौपाटी उभारली आहे. आमच्या विरोधात आंदोलन करणारे भ्रष्ट असल्याचा आरोप तेजस गोटे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचा पाठिंबा

आमदार गोटे यांनी शहरातील विविध ठिकाणचे भूखंड हडप केले असून मनपा हद्दीतील जागा बळकावत असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी केला आहे. तसेच कार्यवाहीत दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचा इशारादेखील परदेशी यांनी दिला आहे. तर पांझरा नदीकिनारी उकिरड्यावर असलेली चौपाटी हटविण्याचा घाट शिवसेनेने घातला असताना त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

$
0
0

धुळे ः धुळ्यासह जळगाव, नंदुरबार जिल्हा तसेच गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत ३४ दुचाकी जप्त केल्या आहेत. या टोळीने महिन्याभरात शंभराहून अधिक दुचाकी लंपास केल्या होत्या. या टोळीने तिन्ही राज्यातील पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. चोरांची दुचाकी चोरण्याची पद्धत आगळीवेगळी होती. यामुळे पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागत नव्हते. या टोळीला गजाआड करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या वतीने स्थानिक गुन्हा शाखा तसेच शहर आणि उपनगर पोलिस स्टेशनाच्या कर्मचाऱ्याचे खास पथक तयार करण्यात आले होते. चोरट्यांवर नजर ठेवण्यात आली. टोळीचे धागेदोरे हाती लागल्यानंतर त्यांना अटक केली. नंदुरबार शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ८ उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील १४ तर स्थानिक गुन्हे शाखेने इतर राज्यातील १६ गुन्हे या चोरट्यांकडून उघडकीस आणले आहेत. या टोळीमधील चोरटे हे अठरा ते एकवीस वर्षाच्या वयोगटातील आहेत. आपल्या चैनीच्या वस्तू घेता याव्यात, यासाठी हे दुचाकी चोरी करत असल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. दुचाकीची चोरी केल्यानंतर दुचाकीच्या सुट्या भागांची ते विक्री करत, अशी यांची पद्धत होती. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ते दुचाकी पाचोराबारी गावाजवळील विहिरीत टाकून देत असल्याचे तपासात पुढे आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्येयनाम्याला अल्प प्रतिसाद, तरीही थोपटून घेतली पाठ!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील जनतादेखील शहराच्या विकासाची भागीदार असावी या संकल्पनेतून भाजपकडून ध्येयनामा तयार करण्यासाठी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी भाजपने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. मात्र, गेल्या १३ दिवसांत या पोर्टलवर सुमारे ४३ हजार ६७७ नाशिककरांनी प्रभाग विकासाबद्दल आपल्या सूचना नोंदविल्या आहेत. विशेष म्हणजे शहरात सुमारे ११ लाख मतदार असताना केवळ ४३ हजार इतक्या अल्प मतदारांनीच आपले मत नोंदवले असतानाही मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक भाजप नेत्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. त्यामुळे स्थानिक भाजपेयींकडून मुख्यमंत्र्यांचीच दिशाभूल केली गेल्याचे समोर आले आहे.

महापालिकेत शंभर प्लसचे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. शहराचा लोकाभिमुख विकास व पारदर्शी कारभारासाठी जनतेकडून जाहीरनाम्याबद्दलच्या अपेक्षा जाणून घेण्याचा निर्णय घेत, त्यासाठी मतदारांकडूनच सूचना मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते २६ जानेवारीला ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले होते. या संकल्पनेतून भाजप निवडणुकीसाठी पक्षाचा ध्येयनामा जनतेसमोर सादर करणार आहेत. गेल्या १३ दिवसांत या पोर्टलवर ४३ हजार ६७७ इतक्या नाशिककरांनी प्रतिसाद दिला असून, आपल्या सूचना नोंदवल्या आहेत. शहरात ११ लाख मतदार असताना केवळ ४३ हजार मतदारांनीच या अभियानाला प्रतिसाद दिला आहे. अल्प प्रमाणात प्रतिसाद असतानाही, स्थानिक भाजप नेत्यांनी स्वतःसह पक्षाची पाठ थोपटून घेतली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून या उपक्रमाबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ध्येयनामा येणार शुक्रवारी

नाशिककर जनेतेच्या अपेक्षा व पालकमंत्री, तसेच मुख्यमंत्री यांच्या सूचना लक्षात घेऊन शहरासाठी भाजपचा ध्येयनामा अंतिम करून प्रकाशित केला जाणार आहे. प्रत्येक प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, महिला व तरुण यांच्यामार्फतच त्या त्या प्रभागात १० फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात येईल, असे भाजपच्या शहर शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीला काळजी गोदाप्रदूषणाची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील जनतादेखील शहराच्या विकासाची भागीदार असावी या संकल्पनेतून भाजपकडून ध्येयनामा तयार करण्यासाठी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी भाजपने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. मात्र, गेल्या १३ दिवसांत या पोर्टलवर सुमारे ४३ हजार ६७७ नाशिककरांनी प्रभाग विकासाबद्दल आपल्या सूचना नोंदविल्या आहेत. विशेष म्हणजे शहरात सुमारे ११ लाख मतदार असताना केवळ ४३ हजार इतक्या अल्प मतदारांनीच आपले मत नोंदवले असतानाही मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक भाजप नेत्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. त्यामुळे स्थानिक भाजपेयींकडून मुख्यमंत्र्यांचीच दिशाभूल केली गेल्याचे समोर आले आहे.

महापालिकेत शंभर प्लसचे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. शहराचा लोकाभिमुख विकास व पारदर्शी कारभारासाठी जनतेकडून जाहीरनाम्याबद्दलच्या अपेक्षा जाणून घेण्याचा निर्णय घेत, त्यासाठी मतदारांकडूनच सूचना मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते २६ जानेवारीला ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले होते. या संकल्पनेतून भाजप निवडणुकीसाठी पक्षाचा ध्येयनामा जनतेसमोर सादर करणार आहेत. गेल्या १३ दिवसांत या पोर्टलवर ४३ हजार ६७७ इतक्या नाशिककरांनी प्रतिसाद दिला असून, आपल्या सूचना नोंदवल्या आहेत. शहरात ११ लाख मतदार असताना केवळ ४३ हजार मतदारांनीच या अभियानाला प्रतिसाद दिला आहे. अल्प प्रमाणात प्रतिसाद असतानाही, स्थानिक भाजप नेत्यांनी स्वतःसह पक्षाची पाठ थोपटून घेतली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून या उपक्रमाबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ध्येयनामा येणार शुक्रवारी

नाशिककर जनेतेच्या अपेक्षा व पालकमंत्री, तसेच मुख्यमंत्री यांच्या सूचना लक्षात घेऊन शहरासाठी भाजपचा ध्येयनामा अंतिम करून प्रकाशित केला जाणार आहे. प्रत्येक प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, महिला व तरुण यांच्यामार्फतच त्या त्या प्रभागात १० फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात येईल, असे भाजपच्या शहर शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सराईताची हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीतील तीन ते चार विद्यार्थ्यांनी मिळून एका अल्पवयीन सराईत गुन्हेगाराची भरदिवसा हत्या केली. पंचवटीतील उन्नती शाळेजवळ झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांकडून हत्या होण्याची जिल्ह्यातील आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

ऋतिक उर्फ पाप्या राजू शेरगिल (वय १७, रा. फुलेनगर) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. शेरगिलवर दोन हत्या, तसेच लुटमारीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भक्तिधामसह परिसरात तो सातत्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. अल्पवयीन असल्याने पोलिसांकडून पकडूनही त्याला फारसा फरक पडत नव्हता. यातून पाप्याच्या नावे अनेक गुन्हे जमा झाले. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उन्नतीशाळेजवळ एका वडापावच्या दुकानाजवळ पाप्या थांबलेला असताना तीन ते चार विद्यार्थ्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. चाकूसारख्या धारदार शस्त्राने संशयित मुलांनी पाप्याच्या गळ्यावर सपासाप वार केले. पाप्याला लागलीच खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ऋतिक उर्फ पाप्या राजू शेरगिलवरील हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या मुलांपैकी एकाचे दप्तर घटनास्थळी पडले. पोलिसांनी ते जप्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पाप्याने हल्लेखोर विद्यार्थ्यांपैकी एकास मारहाण केली होती. त्यामागे एका मुलीचे प्रकरण होते. पाप्या सातत्याने परिसरात दहशत निर्माण करीत होता. विशेषतः शाळा परिसरात त्याचे वास्तव्य राहायचे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एका संशयितास ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जाते. सर्व संश​यित फुलेनगर परिसरातील आहेत.

पाप्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल होते. लूटमार, खुनाचा प्रयत्न अशा इतर अनेक गंभीर गुन्ह्यांचाही यात समावेश होता. पाप्याला पोलिसांनी बाल न्यायालयात काही काळापूर्वी हजर केले होते. त्या वेळी त्याने आपल्याला आणखी तीन खून करायचे असून, ते झाल्यानंतरच समाधान मिळेल असे सांगितले होते. पोलिसांनी जप्त केलेल्या दप्तरामध्ये पॅड, क्रीम बिस्कीटचा पुडा, शाळेची पुस्तके सापडली.
हल्ला करणारे शाळकरी विद्यार्थी आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून याकडे पाहावे, असे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिठ्ठी पद्धतीने पदवीधरांची भंबेरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्च विद्याविभूषित आणि विचारी मतदारसंघ म्हणून ओळख मिरविणाऱ्या पदवीधर निवडणुकीत यंदाही पारंपरिक पद्धतीनेच मतदान करावे लागल्याने हजारो टेक्नोसॅव्ही पदवीधर मतदारांची भंबेरी उडाली. या निवडणूक प्रक्रियेसाठी झालेल्या अवाढव्य खर्चाऐवजी इलेक्ट्रॉनिक वोटिंगसाठी प्रयत्न झाले असते, तर १५ हजारांवर उमेदवारांची मतेच बाद ठरली नसती, असा सूर आळवला जात आहे.

निवडणुकीसंदर्भातील प्रचार यंत्रणेपासून तर प्रत्यक्षात मतमोजणीपर्यंत इतर सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्रणा वापरली जाते. पण, नवतंत्रज्ञानविषयक बदलांशी सर्वांत आधी जुळवून घेणाऱ्या पदवीधर मतदारास जुन्याच पद्धतीने मतदान करावे लागले.

एकंदरीतच पदवीधरसोबत जिल्हा परिषद अन् महापालिकेच्या निवडणुकीचा माहोल यामुळे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची पांगापाग झाली. पारंपरिक पद्धतीनेच मतदारयादीतील नाव शोधण्यासाठी किचकट ठरणारी यंत्रणा, याद्यांमधील घोळ, गहाळ झालेली किंवा अन्य केंद्रांवर गेलेली नावे या सर्व प्रक्रियेत कसेबसे मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेल्या उच्चशिक्षित मतदारांनी थोडा वेळ नाव न सापडल्यास थेट काढता पाय घेतला, तर यापैकी काहींनी मोठ्या मुश्किलीने नाव शोधून मतदानाचा हक्क बजावला. पण, यातील अनेकांना मतदान प्रत्यक्षात कसे करावे याची माहिती नव्हती. केंद्रात गेल्यानंतर सुचेल त्या पद्धतीने मतदान करीत सुमारे १५ हजार मतदारांनी मत वाया घालविले. इलेक्ट्रॉनिक वोटिंग असते, तर टेक्नोसॅव्ही तरुणांचा या मतदानाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला असता व इतके मतदानही वाया गेले नसते, असा मुद्दाही आता पुढे आला आहे.

---

आयोगाने बनावे टेक्नोसॅव्ही

एकीकडे निवडणूक आयोग मतदार जागृती कार्यक्रमावर विशेष भर देत आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून विविधढंगी उपक्रमही राबविण्यात येत आहेत. मतदात्यांशी संवाद साधणाऱ्या मोबाइल व्हिडीओपासून सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या साधनांचा उपयोग निवडणुकांसाठी करून घेतला जात आहे. असे असताना मात्र पदवीधर निवडणुकांच्या बाबतीत आयोगाने उदासीनता दाखवून काय साधले, असा सवाल तरुण मतदारांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तरुणांशी संवाद साधून मतदानाद्वारे लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचे माध्यम वापरले. मात्र, पदवीधरमध्ये मत करण्यासाठी पारंपरिक चिठ्ठी पद्धत, मतमोजणीसाठी पारंपरिक पद्धत वापरण्यात आली. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांची नेमणूक, त्यांना देण्यात येणारा विशेष भत्ता, पारंपरिक मतमोजणीसाठी पूरक सामग्री, सुरक्षेसाठी पुरेसे कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

---

औषधालाही नव्हते अॅप

निवडणुकीच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतच्या नियोजनात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण, याला पदवीधर निवडणूक अपवाद ठरली. कुंभमेळ्यासारख्या मेगा इव्हेंटपासून तर महापुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करणारे अॅप्स प्रशासनाने तयार केले आहेत. पदवीधर मतदारांशी संवाद साधणारे अन् मतदान पद्धती स्पष्ट करणारे अॅप आयोगानेही बनविले असते, तर किमान बाद होणारे मतदान रोखण्यासोबतच मतदानाची टक्केवारीही वाढविता आली असती, अशी अपेक्षाही पदवीधर मतदात्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकगठ्ठा मतदानाने एकतर्फी बाजी!

$
0
0



jitendra.tarte@timesgroup.com / Twitter : @jitendratartemt

नाशिक ः राज्य सरकारच्या शिक्षणक्षेत्रातील वादग्रस्त निर्णयांच्या यादीत अलीकडे भर पडत असल्याने शिक्षक संघटनांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी शिक्षणमंत्र्यांचे असेच निर्णय केंद्रस्थानी ठेवत पदवीधरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पारड्यात एकगठ्ठा मतदान टाकल्याने काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांना केवळ एकतर्फी विजयच नाही, तर आघाडीची मतेही मिळाली. त्यामुळे शिक्षक संघटनांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरल्याची चर्चा जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात आहे.

विद्यमान सरकारने कारभार हाती घेतल्यापासून गत सरकारची शैक्षणिक तरतूद पुसून टाकण्याचा आरोप संस्थाचालकांकडून होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये बहुतांश शिक्षण संस्था अन् शिक्षणसम्राट हे काँग्रेस अन् राष्ट्रवादीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निगडित आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्रिपदाचा चार्ज हाती येताच तावडे यांनी लावलेला निर्णयांचा धडाका अगोरदपासूनच या क्षेत्राची नाराजी ओढावून गेला होता. यातील टीका झालेल्या बाबींमध्ये चुकीची शैक्षणिक धोरणे , सातत्याने बदलणारे नवनवे अध्यादेश, शिक्षण क्षेत्रातील जाचक निर्णय, अंशदायीन पेन्शन योजना, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, संस्थाचालकाची स्वायत्ता काढून घेण्याचा प्रयत्न, मुख्याध्यापक अतिरिक्त ठरविणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती थांबविणे, क्रीडा व कलाशिक्षकांची पदे रद्द करणे, शिक्षकांना शाळाबाह्य कामे देणे, २० टक्के अनुदान मूल्यांकन होऊनही न देणे, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मोर्चे, आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करणे आदी मुद्यावरून टीडीएफ (शिक्षक लोकशाही आघाडी)सह विविध संघटनांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक हाताशी घेतली होती. ‘टीडीएफ’च्या जोडीला मुख्याध्यापक संघटना, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आदी संघटनांनी मोट बांधत काँग्रेसच्या दिशेने बहुसंख्य मते वळविली.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांनी तब्बल ४२ हजार ८२५ मतांची आघाडी घेतली. शिक्षक संघटनांच्या भूमिकेमुळे ही लढत शिक्षणमंत्री विरुद्ध शिक्षक संघटना अशी बनत गेली. याचा पुरावाही निकालाअंती मतपेटीने दिला आहे.

_ _ _

जोखीमही ठरली बिनकामाची

भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्र्यांसह सारा लवाजामा घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी विविध शिक्षक संघटना आणि संस्थाचालकांसोबत झालेल्या बैठकीत संस्थाचालकांची नस दाबत शिक्षक भरतीसारखी अप्रत्यक्ष आश्वासने देऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. यावर आचारसंहिताभंगाची तक्रारही दाखल झाली होती. इतकी जोखीम घेऊनही उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळाने शिक्षणमंत्र्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांबोळी नगराला समस्यांचे ग्रहण

$
0
0

कच्च्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

हिरावाडी परिसरातील तांबोळी नगरमधील नागरिक रस्ते, वीज आणि पाणी या मुलभूत समस्यांमुळे त्रस्त झाले आहे. या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेवक व महानगरपालिका प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या समस्यांमध्ये प्रामुख्याने येथील कॉलनी रस्त्यांचे अजूनही डांबरीकरण झालेले नाही. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, आता या रस्त्यावरील माती वाहून गेल्याने रस्त्यावर केवळ दगड गोट्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मोटरसायकल स्लीप होऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

या परिसरातील नागरिकांकडून सर्व कर वसूल केला जातो. तरीही सुविधांच्या बाबतीत टाळाटाळ का, असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. शिवाय या परिसरातील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अनेकवेळा तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. अंधारामुळे चोऱ्या होण्याची भीती असून समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

आमच्या परिसरातील रस्ते कच्चे आहेत, रस्त्यावर दगड गोट्यांचे साम्राज्य पसरले आहे. पथदीप बंद असल्याने रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, घंटागाडीदेखील वेळेवर येत नाही.

-पंकज सोनार, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जू..’ आत्मकथनाला ‘गावगाडा’ पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘जू..’ या आत्मकथनाला वडशिवणे (ता. करमाळा) येथील विश्वकर्मा तरुण मित्रमंडळातर्फे देण्यात येणारा ‘गावगाडा’ साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख ५,५०१ रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निवड समितीतील ज्येष्ठ साहित्यिकांनी एकमताने या पुरस्कारासाठी ‘जू..’ या आत्मकथनाची निवड केली आहे.

साहित्यक्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराने याआधी प्रसिद्ध साहित्यिक पार्थ पोळके यांना ‘आभरान’ या आत्मकथनासाठी तर प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांना ‘सिझर कर म्हणतेय माती’ या कवितासंग्रहासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

येत्या १२ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रदीपकुमार आवटे यांच्या हस्ते, सैराट आणि फँड्री चित्रपटातील अभिनेते डॉ. संजय चौधरी यांच्या अध्यक्षतेत आणि पार्थ पोळके यांच्या प्रमुख उपस्थितीत वडशिवणे येथे पाटेकरांना हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

ऐश्वर्य पाटेकर हे के. के. वाघ कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या ‘भुईशास्त्र’ या पहिल्याच कवितासंग्रहाला साहित्य अकादमीसह अनेक प्रतिष्ठेच्या राज्य पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश झाला आहे. उडिया, बंगाली, उर्दू, इंग्रजी आदी भाषांमध्ये कवितांचे अनुवाद झाले आहे.

ज्या गावगाड्याने दुष्काळाचे अन पाणकळ्याचे धडे माझ्या समोर वाचून माझं अनुभवविश्व समृद्ध केलं. याच गावगाड्याने माती, माणसं, निसर्ग यांची खरीखुरी ओळख करून देत, मला लिहिते केले; त्या गावगाड्याचा हा सन्मान आहे.

-ऐश्वर्य पाटेकर, कवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images