Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अध्यक्षपदाकडे बागलाणचे लक्ष

$
0
0

कैलास येवला, सटाणा

तब्बल ४० वर्षांपासून नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापासून वंचित असलेल्या बागलाण तालुक्याने यंदा अध्यक्षपद इतर मागासवर्ग महिला आरक्षित झाल्याने लाल दिव्यासाठी महिला उमेदवारांना रणांगणात उतरविले आहे.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या चारही पक्षांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षित असलेल्या प्रवर्गातील महिलांना उमेदवारी दिल्याने बागलाणला यावेळी मोठी संधी दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल ७ जागा असलेल्या बागलाण तालुक्याला नेहमीच जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या लाल दिव्याने हुलकावणी दिली आहे. १९७४ साली तत्कालीन जि. प. सदस्य मोतीआण्णा सूर्यवंशी यांच्या रुपाने बागलाण तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले होते. यानंतर या पदाची नेहमीच तालुक्याला आस लागून होती.

सन १९९७-९८ मध्ये देखील ठेंगोडा गटाचे जि. प. सदस्य यशवंत पाटील यांना काँग्रेसने अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. त्यावेळी पंढरीनाथ थोरे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. काँग्रेस पक्षातील मत विभागणीचा परिणाम झाल्याने यशवंत पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अवघ्या दोन मतांनी पराभूत व्हावे लागले होते. याचे शल्य आजही तालुकावासियांच्या मनात कायम आहे.यावेळी अध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिला आरक्षित आहे. बागलाण तालुक्यात सात पैकी तब्बल तीन गट या पदासाठी आरक्षित असल्याने राजकीय मातब्बरांनी अध्यक्षपदासाठी परफेक्ट प्लॅनिंग केले आहे.

ठेंगोडा जिल्हा परिषद गटात माजी जि. प. सभापती यशवंत पाटील यांनी पत्नी तथा माजी जि. प. सभापती संगिता पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आहे. याच गटात काँग्रेसचे विद्यमान जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी पत्नी सारिका पाटील यांना उमेदवारी देऊन जि. प. अध्यक्षपदावर डोळा ठेवला आहे.
ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटातही मविप्रचे माजी उपसभापती व भाजपचे उपजिल्हाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव यांनी पत्नी लता बच्छाव यांना रिंगणात उतरवून अध्यक्षपदासाठी रणनीती आखली आहे. याच गटात शिवसेनेचे विद्यमान जि. प. सदस्य प्रशांत बच्छाव यांनीही पत्नी वर्षा बच्छाव यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून लाल दिव्यासाठी जोर जावला आहे. काँग्रेसकडून जायखेडा गटातून महेंद्र भामरे यांनी पत्नी रेणुका भामरे यांना उमेदवारी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला उमेदवारांमध्ये मालेगावात रंगणार लढत

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. अनेक गट-गण महिला आरक्षित झाल्याने प्रस्थापित व इच्छुकांच्या राजकीय महत्वाकांक्षांना ब्रेक लागला. आरक्षणामुळे असले तरी यातून मार्ग काढत हिरमोड झालेल्यांनी आपल्याच घरातील महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावत तिकीट मिळवले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवार जरी महिला असल्या तरी त्यांचे पती, चिरंजीव, वडील, सासरे हेच झेरॉक्स उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.

तालुक्यातून गट गणांसाठी दाखल झालेल्या एकूण १६० अर्जांपैकी ४७ अर्ज हे महिला उमेदवारांचे आहेत. यात पंचायत समितीसाठी ३४ तर जिल्हा परिषदेसाठी १३ महिला उमेदवार रिंगणात आहेत. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी महिला आरक्षण नसलेल्या गट गणातून महिला उमेदवारांना तिकीट देण्याचे धरिष्ठ दाखवलेले नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे.

गटातील उमेदवारांवर नजर टाकली असता ७ पैकी ३ गट महिला आरक्षित आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपने तीन तीन महिला उमेदवार दिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असल्याने काँग्रेसकडे असलेल्या दोन्ही गटात जि.प.साठी एकही महिला उमेदवार रिंगणात नाही. तर राष्ट्रवादीकडे ५ गट असून, त्यापैकी महिला आरक्षित असलेल्या तील गटातूनच महिला उमेदवार दिले आहेत. अपक्ष म्हणून ४ महिला उमेदवार रिंगणात आहेत. गणातूनदेखील महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. १४ पैकी ७ गण महिला राखीव आहेत.

त्यामुळे या सात गणातून सेना भाजपने मातब्बर महिला उमेदवार दिले आहेत. तर आघाडीकडून पाचही गणातून महिला उमेदवार देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीने ९ पैकी ४ जागी महिलांना संधी दिली आहे. गणांतून ९ अपक्ष महिला उमेदवार रिंगणात असून पक्षाकडून तिकीट न मिळालेल्यांची संख्या अधिक आहे. संभाजी ब्रिगेडने देखील तीन गणातून उमेदवार दिले आहेत. त्यापैकी झोडगे व चिखलओहाळ गणातून दोन महिला उमेदवारांना संधी दिली आहे.

दाभाडी, सौंदाणे, कळवाडी गट लक्षवेधी
दाभाडी, सौंदाणे, कळवाडी गट सर्वसाधारण महिला आरक्षित आहेत. कळवाडी गटातून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांदे यांच्या पत्नी अंजली कांदे, भाजपचे लकी गिल यांच्या मातोश्री बलबीरकौर गिल यांच्यात लढत आहे. तर दाभाडी गटात सेनेच्या संग‌ीता निकम, भाजपच्या विद्या निकम, राष्ट्रवादीच्या अंजना देवरे यांच्यात चुरशीची लढत आहे. सौंदाणे गटात सेनेकडून मनीषा रत्नाकर पवार तर भाजपकडून वैशाली सुनील पवार, राष्ट्रवादीकडून पुष्पा देसाई यांच्यात सामना रंगणार आहे. गणात सर्वसाधारण महिला आरक्षित असलेल्या झोडगे, वडनेर, सौंदाणे गणातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये विकास आघाडीचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर निफाड तालुक्याचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहचण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेतील बंडाळी, राष्ट्रवादीतील नाराजी या पार्श्वभूमीवर तालुक्यात विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, तालुक्यातील सर्व गटात विकास आघाडीचे उमेदवार उभे करण्यासाठी यतीन कदम, राजेंद्र डोखळे यांच्यात बैठक घडविण्याचे प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी सुरू केले आहेत.

कदम-डोखळेंची आघाडी निर्माण झाल्यास शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेल्या भास्कर बनकर, जयदत्त होळकर, संदीप टर्ले बाळासाहेब क्षीरसागर आदी नेत्यांना सेनेनेही उमेदवारी बहाल केल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पालखेड, उगाव, चांदोरी गटात कट्टर शिवसैनिक बंडखोरीसाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. बंडखोर शिवसैनिकांनी सेनेच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान दिल्यास निफाड तालुक्यात शिवसेनेला मोठा फटका बसेल अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणूक लक्ष ठेऊन बड्या नेत्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणि त्यांना जि.प. ची उमेदवारी देण्याची खेळी आमदार अनिल कदम यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कदम यांची राजकिय कोंडी करण्यासाठी तालुक्यातील काही नाराज सैनिक सक्रिय झाले असल्याचे समजते. यातूनच यतीन कदम व राजेंद्र डोखळे यांची विकास आघाडी तयार झाल्यास आघाडीला चांगले यश मिळेल, असा सूर कार्यकत्र्यांमध्ये आहे.

यतीन कदम यांनी ओझर गटात उमेदवारी करण्याचा निर्णय घेत कसबे सुकेणे चांदोरी सायखेडा गटात विकास आघाडीचे उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ओझर परिसरात यतीन कदम यांचे प्रभुत्व निवडणुकिसाठी त्यांनी केलेली सज्जता याचा अंदाज घेत आमदार कदम यांनी ओझर गटात शिवसेनेचा अधिकृत उमेदवार देण्याचे टाळले. कदम परिवाराच्या संघर्षात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फायदा नको या विचारातून आमदार कदमांनी अंतर्गत संघर्ष टाळल्याचे बोलले जात आहे. इकडे पालखेड गटात शिवसेनेने भास्कर बनकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक व कारसूळचे उपसरपंच देवेंद्र काजळे यांनी बंडाचे निशाण फडकवत पालखेड गटात आक्रमक प्रचाराचा प्रारंभ केला आहे. उगाव गटातही बाळासाहेब क्षीरसागर यांना सेनेने उमेदवारी दिल्याने आमदार कदमांचे सहकारी राजेंद्र डोखळे यांनी बंडखोरीचे संकेत देत प्रचारास प्रारंभ केला आहे. चांदोरी गटात संदीप टर्ले यांच्या उमेदवारीने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या तालुकाप्रमुख उत्तम गडाख यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस आघाडी किंवा भाजपमध्ये फारशा कुरबुरी नसल्या तरी पालखेड गणात संजय वाळूंज यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर देवगाव गटातही अमृता पवार यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय नाराजांची मोट बांधून संपूर्ण तालुक्यात विकास आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यातून यतीन कदम यांचे नेतृत्व फुलविण्याची राजकिय खेळी या निमित्ताने खेळली जाणार आहे.

आमदार अनिल कदम यांना वेळोवेळी अनेक निवडणुकीत मदत केली. त्यांची पाठराखण केली. मात्र त्यांनी कधीही विश्वासात घेतले नाही. तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांची हीच अडचण असल्याने आमदार कदमांवर तालुक्यात मोठी नाराजी आहे. उगाव गटातून उमेदवारी करणार असून यतीन कदम यांच्या बरोबर युती करून निफाड तालुक्यात विकास आघाडी स्थापन करणार आहे.

- राजेंद्र डोखळे, संचालक, लासलगाव बाजार समिती

ओझर, सुकेणा व चांदोरी गटासाठी आपण विकास आघाडीचे उमेदवार देणार आहोत. चांदोरीत उत्तम गडाख यांच्यांशी बोलणी सुरू आहे. राजेंद्र डोखळे यांच्याशी चर्चा करून पालखेड, उगाव व इतर गटाबाबत विकास आघाडीचे निर्णय घेतला जार्इल.- यतीन कदम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये अपक्षांकडे लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवडमधून विविध गटात व गणात अपक्षांची मोठी रेलचेल असल्याने अपक्ष या निवडणुकीत मोठी भूमिका बजावतील असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे. काँग्रेसचे राहुल कोतवाल, भाजपचे डॉ. आत्माराम कुंभार्डे, शिवसेनेचे शांताराम ठाकरे अशी लढत असून या शिवाय अपक्ष देखील निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणी स्थानिक विकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्नसुद्धा लक्षवेधी आहे. तसे झाल्यास ही आघाडी कोणाला मारक ठरेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

चांदवडमध्ये नगराध्यक्षपद तसेच बाजार समिती सभापतीपद भाजपकडे आहे. जि. प. व पं. स. निवडणुकीत सेनेने व भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आता शिवसेनेला भाजपशी टक्कर द्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने चांदवड तालुक्यात ग्रामीण भागात शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली आहे. बाजार समितीचे उपसभापती नितीन आहेर, उपनगराध्यक्ष कविता उगले यांच्यासह सेनेचे नेते एकहाती सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माजी आमदार शिरीष कोतवाल, उत्तमबाबा भालेराव, राष्ट्रवादीचे डॉ. गायकवाड यांनी आघाडीद्वारे सेना व भाजप समोर आव्हान उभे केले आहे. तर आमदार राहुल आहेर, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व ज्येष्ठ नेत्यांनी तालुक्यात भाजपची सत्ता आणण्याचा चंग बांधला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयमच्या जिद्दीला सागराची गाज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजाराने खचून न जाता त्यावर मात करून सागरालाही आव्हान देणाऱ्या नऊ वर्षीय बालकाच्या जिद्दीने अनेकांना उभारी दिली आहे. संक रॉक ते गेटवे ऑफ इंडिया हे पाच किलोमीटरचे सागरी अंतर पोहण्याचे त्याचे ध्येय असून, ही कामगिरी साधल्यास त्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होऊ शकेल. जन्मतःच डाऊन सिंड्रोमसारख्या आजारावर मात करणाऱ्या स्वयम विलास पाटील याची ही कहाणी.

स्वयम राणेनगरच्या जाजू प्राथमिक विद्यामंदिरात तिसरीत शिकत असून, आजपर्यंत त्याने अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळवली आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी त्याला नुकतीच राज्य जलतरण संघटनेने परवानगी दिली असून, ११ फेब्रुवारी रोजी तो हे अंतर पार करणार आहे. डाऊन सिंड्रोम हा जनुकीय आजार कधीही बरा होत नाही. त्या अनुषंगाने येणाऱ्या शारीरिक व मानसिक व्याधींवर मात करून तो हे रेकॉर्ड करणार आहे. आजपर्यंत हृदय, कान, नाक, घसा याचे ऑपरेशन्स झाले आहेत. त्याचप्रमाणे स्नायूंच्या कमकुवतपणामुळे त्याला रांगणे आणि चालणे या क्रियाही उशिरा करता येऊ लागल्या. कमजोर दृष्टी, एकाग्रतेचा अभाव, हायपर थायरॉइड या आजारांवरही त्याने मात केली आहे.

तो रोज दोन ते अडीच किलोमीटर सराव करतो. औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने गोल्ड आणि सिल्व्हर मेडल जिंकले होते. बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मालवण येथे झालेल्या सागरी स्पर्धेत त्याने दोन किलोमीटर अंतर अवघ्या १७ मिनिटांत पार केले होते. नाशिक येथे झालेल्या अॅक्वाथॉन स्पर्धेत १०० मीटर स्वीमिंग व दोन किलोमीटर रनिंगमध्ये त्याने कांस्यपदक पटकावले होते. आपल्या नावावर रेकॉर्ड असावे असे त्याला या वयातच वाटत होते. त्याच्या आवडीला प्रोत्साहन देण्यचे काम त्याच्या आईवडिलांनी केले आहे. त्याचप्रमाणे त्याच्या सरावासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांनी मेहनत घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५७ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला दांडी मारणे कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवणार आहे. निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला दांडी मारलेल्या ३०० कर्मचाऱ्यांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यापैकी १४३ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली असली तरी अद्याप १५७ कर्मचाऱ्यांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या १५७ कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केली असून, शुक्रवारी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. भारतीय लोकशाही अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार हे गुन्हे दाखल केले जाणार असून, त्यात एक वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

महापालिकेच्या वतीने निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ६४०० कर्मचाऱ्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण कार्यशाळा आयोज‌ित करण्यात आली होती. विविध शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांतील प्राध्यापक, लिपिकांचा समावेश होता. दादासाहेब गायकवाड सभागृह, काल‌िदास कलामंद‌िर, राजे संभाजी स्टेड‌ियममध्ये स्वतंत्रपणे ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. निवडणुकीसाठी जवळपास १६०० पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांना निवडणूकप्रक्रिया हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार होते. मात्र, या प्रशिक्षण कार्यशाळेला जवळपास ३०० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे महापालिकेने या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या होत्या. त्यापैकी १४३ कर्मचाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रमात हजर राहण्याचे महापालिकेला कळवले असून, त्यांचे १२ तारखेला पुन्हा प्रशिक्षण होणार आहे.

एक वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद

नोटिसांकडे १५७ कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून, महापालिकेला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेने या कर्मचाऱ्यांना रडारवर घेत, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. भारतीय लोकशाही अधिनियम १९५१ चे कलम १३४ व राज्य निवडणूक आयोग यांचा २ मार्च १९९५ मधील तरतुदीनुसार हे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या तरतुदीनुसार निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शास्ती किंवा एक वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. महापालिकेच्या वतीने शुक्रवारी हे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करणे चांगलेच भोवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांचा ‘सातबारा’ सार्वजनिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाच्या नियमामुळे उमेदवारांनी आपल्या शपथपत्राचा संगणकीय प्रणालीमधून दिलेला गोषवारा मतदानापूर्वी महापालिकेला एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे हा गोषवारा मतदान केंद्राबाहेर फ्लेक्सच्या स्वरुपात लावणे अनिवार्य केल्यामुळे त्याचाही भुर्दंड महापालिकेला सोसावा लागणार आहे. या निवडणुकीत एका प्रभागात सरासरी ५० मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे याचा खर्च जाहिरातींपेक्षा जास्त असणार आहे.

उमेदवारांच्या शपथपत्राचा गोषवारा सर्वसामान्य मतदारांना कळावा यासाठी ही मोहीम आहे. यात प्रभाग क्रमांक व त्याचा प्रवर्ग, त्यानंतर उमेदवाराचे नाव, शैक्षणिक अर्हता, जंगम व स्थावर मालमत्ता, थकीत रकमा, उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा आठ काॅलममध्ये माहिती देऊन ती प्रसिद्ध करावी लागणार आहे. प्रथमच हा नियम काढल्यामुळे उमेदवारांचा सातबारा प्रकर्षांने सर्वांसमोर येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला कावळ्यांचे गूढ मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
सातपूर गावालगत असलेल्या महादेवनगर भागातील महादेवाच्या मंदिराला लागून असलेल्या वृक्षांवर कावळ्यांची घरटे आहेत. शुक्रवारी सकाळच्या सुमारास अचानक १५ ते २० कावळे एकामागून एक वृक्षावरून पडत बेशुद्ध होत होते. त्यानंतर काही वेळाने त्या कावळ्यांचा मृत्यूदेखील झाला. अचानक कावळ्यांच्या मृत्यूने सातपूरच्या महादेवनगर भागात तर्क वितर्कांना उधाण आले होते. कावळ्यांच्या मृत्यूबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला विचारले असता विषबाधेने कावळे मृत झाले असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महादेवनगर भागात मंदिराच्या शेजारी जुन्या चार वृक्षांवर कावळ्यांची घरटी होती. रोजच पहाटे कावळ्यांची ‘कावकाव’ तेथील रहिवाशांना ऐकू यायची. परंतु, अचानक कावळ्यांचा आवाज बंद कसा झाला, हे पहाण्यासाठी तेथील रहिवाशी विजय आहिरे गेले. मंदिराच्या जवळ आहिरे गेले असता काही कावळे अस्ताव्यस्त अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. त्यांनतर टप्प्याटप्प्याने वृक्षांवर बेशुद्ध अवस्थेत कावळे एकामागून एक पडत असल्याने नेमके काय झाले असावे, याबाबत चर्चा सुरू झाली. अचानकपणे कावळे मरून पडत असल्याची बातमी महादेवनगरला पसरल्यावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता विषबाधेमुळे कावळ्यांचा मृत्यू झाला असावा, अशा शंका त्यांनी व्यक्त केली.


पहाटे अचानक कावळ्यांचा आवाज बंद का झाला हे बघण्यासाठी महादेव मंदिरात आलो होतो. यावेळी वृक्षांवरून कावळे खाली पडत असल्याचे दिसले. यात तब्बल १५ ते २० कावळे मयत झाले आहेत.
- विजय आहिरे, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रसरंगाची करीत उधळण आला वसंत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वृक्षलतांचे देह बहरले,
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिला
आला, आला वसंत ऋतू आला
असं कवींनी वर्णन केलेल्या ऋतुराज वसंताची चाहूल लागली आहे. पळसफुलांचे वृक्ष बहरू लागले असून आंब्यांचाही मोहर ऐन भरात आला आहे. लवकरच वसंताचे आगमन होणार असल्याने वातावरणातील बदल जाणवू लागला आहे. १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वसंताचा भर पहिला दीड महिना राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वसंत ऋतू म्हणजे मोहरलेली आंब्यांची झाडे, पेटत्या पलित्यासारख्या भासणाऱ्या पळसफुलांचे वृक्ष, अंगाला झोंबणारा भरार वारा, कोकिळेचे कुजन, रंगांचा व सुगंधाचा उत्सव. वर्षभरात वैशाखात येणारा ग्रीष्म, आषाढात येणारा वर्षा ऋतू, भाद्रपद महिन्यात येणारा शरद, कार्तिक महिन्यात येणारा हेमंत, पौषातला शिशिर तर फाल्गुनात डोकावणारा व चैत्रात बहरणारा वसंत असे सहा ऋतू असतात. यातील वसंताला ऋतूराज मानले जाते. कारण याच काळात हिरवाई बहरते. झाडांना नवी पालवी फोडणारा असल्याने वसंतात सर्जनशीलतेला वाव असतो. त्यामुळे कवी, लेखक, कलावंत यांची प्रतिभा याच काळात फुलते. वसंतातच अनेक ठिकाणी काव्यगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. इतकेच नाही तर संग‌ीताला वसंत ऋतूने अनोखे वरदान दिलेले असून, वसंत बहार रागाच्या मैफली याच काळात होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला मेगा बूस्ट

$
0
0

महिंद्राची १५०० कोटींची गुंतवणूक

म. टा. खास. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक : नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने पुन्हा एकदा नाशिकला मोठा बूस्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. मेक इन इंडियांतर्गत पुढील वर्षापर्यंत नाशिक आणि इगतपुरीच्या प्लांटमध्ये एकूण १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे प्रत्यक्ष ७००, तर अप्रत्यक्षरित्या शेकडो रोजगार उपलब्ध होऊन नाशिकच्या उद्योगाला चालना मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर नाशिकमध्ये एवढी मोठी गुंतवणूक होणार असल्याने ठप्प झालेला विकास मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.

महिंद्र अँड महिंद्र कंपनीने नाशिक आणि इगतपुरी येथील उत्पादन प्रकल्पात १५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यात कार उत्पादन व इंजिन बनविण्याची क्षमता वाढवली जाणार आहे. या गुंतवणुकीमुळे नाशिकच्या उद्योगांना बूस्ट मिळणार आहे. हा नवा यु ३२१ प्रकल्प असून, महिंद्रच्या नॉर्थ अमेरिकन टेक्निकल सेंटरमध्ये तो विकसित केला आहे. आता तो या वर्षभरात नाशिकमध्ये कार्यान्वित होणार आहे. महिंद्राचे मुंबईतील कांदिवली, पुण्यातील चाकण आणि नाशिक, इगतपुरी येथे प्रकल्प आहेत. यातील नाशिक व इगतपुरी येथील प्रकल्पाची निवड केली आहे. नाशिकच्या प्रकल्पात कंपनीकडून झायलो, क्वांटो ,व्हेरिटो व बोलेरो या व्हेइकलची निर्मिती केली जाते. इगतपुरीच्या प्रकल्पात इंजिन बनविण्यात येते. या नव्या प्रकल्पामुळे ५० हजार कारची निर्मिती होणार आहे. टोयोटाच्या इनोव्हा या कारशी स्पर्धा करणारी नवी कार महिंद्रा बनविणार आहे. महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि समूह अध्यक्ष पवन गोएंका यांनी वर्षभरापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.

असा आहे प्रकल्प
नवा प्रकल्प : यु ३२१, शेकडो रोजगार होणार उपलब्‍ध, ५० हजार कारची निर्मिती होणार, वर्षाअखेरिस प्रकल्प कार्यान्वित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालेकिल्ल्यातच भाजपची कसोटी

$
0
0

बालेकिल्ल्यातच भाजपची कसोटी

Gautam.Sancheti

@timesgroup.com

sanchetigMT

नाशिकच्या सहा विभागांपैकी पंचवटी विभागाची निवडणूक शहरात सर्वाधिक लक्षवेधी राहणार आहे. या ठिकाणी विद्यमान महापौर, उपमहापौरांसह, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार यांचे पुत्र रिंगणात आहेत. भाजपच्या संभाव्य महापाैरपदाचे प्रबळ दावेदारही याच विभागात आहेत. राष्ट्रवीदाच्या विरोधी पक्षनेत्यांचाही हा विभाग असल्यामुळे येथील निवडणूक रंगतदार असणार आहे. नववसाहतींचा मोठा भाग असल्यामुळे येथे धक्कादायक निकालाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचा वरचष्मा असलेल्या या भागात शिवसेना व मनसेने कडवे आव्हान उभे केले आहे, तर काही प्रभागांत राष्ट्रवादीबरोबर निकराची झुंज होणार आहे.

पक्षनिहाय उमेदवार असे

गेल्या निवडणुकीत याच विभागात २४ पैकी भाजप व मनसेने प्रत्येकी सात जागा जिंकत समान ताकद दाखवली होती. त्या खालोखाल राष्ट्रवादीने पाच जागा मिळवून घड्याळाचा गजर केला होता. काँग्रेस व अपक्षांना प्रत्येकी दोन, तर शिवसेनला अवघी एक जागा मिळाली होती. या निवडणुकीत मात्र चित्र वेगळे असून, २४ जागांसाठी सहा प्रभागांतून तब्बल १३७ जण रिंगणात आहेत. त्यात प्रमुख पाच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची संख्या ८३ आहे. त्याचप्रमाणे छोट्या पक्षांचे आठ उमेदवार रिंगणात असून, ४६ अपक्ष उमेदवार आहेत. भाजपने सर्व २४ जागी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्या पाठोपाठ शिवसेनेचे २० उमेदवार असून, तीन जणांना पुरस्कृत करण्यात आले आहे. मनसेच्या पक्ष चिन्हावर २०, तर एक जण पुरस्कृत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी असली, तरी या विभागात राष्ट्रवादीचे १२ व काँग्रेसचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. बसपने आपले चार, तर आंबेडकर राइट, माकप, धर्मराज्य व रासपा यांचा प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे.

आमदारपुत्राला आव्हान

प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक रिंगणात असून, येथे चारही प्रवर्गांत राष्ट्रवादीने आपले उमेदवार दिले आहेत. याच प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांचा एबी फाॅर्मचा गोंधळ झाल्यामुळे येथे तिघांना पुरस्कृत केले आहे. ज्यांचा एबी फाॅर्म फाडला त्या सविता बडवे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. माजी नगरसेवक भगवान भोगे व मनसेतून शिवसेनेत आलेले विद्यमान नगरसेवक डाॅ. विशाल घोलप यांच्या मातोश्री प्रतिभा घोलप यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. हे तुल्यबळ उमेदवार असले, तरी चिन्हाचा फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे भाजपनेही आपले चार उमेदवार येथे रिंगणात उतरवले आहेत. प्रभाग क्रमांक तीनमधील निवडणूक सर्वांचे लक्ष वेधणारी ठरणार आहे. या प्रभागात चार वेळा नगरसेवक झालेले भाजपचे विद्यमान आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आपले पुत्र मच्छिंद्र यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आमदारांसाठी ही प्रतिष्ठेची लढत बनली आहे. गेले काही दिवस आमदारांनी येथे जाेरदार प्रचार करून घरोघरी मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. याच प्रभागात आमदार सानप यांना अडकवून त्यांना जेरीस आणण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी ठाण मांडून शिवेसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याची व्यूहरचना आखली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब सानप यांचे कार्यकर्ते असलेले विलास आव्हाड यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेतल्यामुळे सानप यांच्या पुढील आव्हाने वाढले आहे.

‘एसटी’ प्रवर्गात चुरस

प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या उद्धव निमसेंमुळे ही निवडणूक चर्चेत आहे. येथे भाजप, शिवसेना व मनसेने सर्व प्रवर्गांत उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीने दोन, तर काँग्रेसने एकाच प्रवर्गात उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे निमसे यांच्या प्रवर्गात काँग्रेस व राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही. त्यामुळे येथील निवडणूक काही प्रवर्गातं तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी होणार आहे. या प्रभागात माकप, बसप व अपक्षही रिंगणात आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपच्या रंजना भानसी या पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यामुळे या प्रभागातील निवडणूक त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. भानसी यांच्याविरोधात विद्यमान नगरसेवक गणेश चव्हाण यांनी आपल्या पत्नी जयश्री चव्हाण यांना शिवसेनेकडून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे येथे अटीतटीची लढत आहे. इतर प्रवर्गांतही हेच चित्र आहे. एकूणच सहा प्रभागांत होणाऱ्या या निवडणुकीत गेल्यावेळेसारखे चित्र नसले, तरी भाजपचा वरचष्मा असलेल्या या भागात शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.


पहिला निकाल पंचवटीतूनच!

स्थलांतरित, नववसाहत, झोपडपट्टी, जुने नाशिक असा संमिश्र भाग असलेला हा विभाग क्षेत्रफळानुसार मोठा आहे. पक्षांबरोबरच उमेदवारांनी कंबर कसली असून, घरोघरी प्रचार करून संपर्काची मोहीम वाढवली आहे. निवडणुकीच्या निकालाची सुरुवात याच प्रभागातून होणार असल्यामुळे आेपनिंगला असणाऱ्या या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष आहे. या प्रभागात सर्व राजकीय पक्षांत बंडखोरी व नाराजी आहे. त्यामुळे या बंडखोरांची उमेदवार व पक्ष कशी समजूत घालतात हे महत्त्वाचे अाहे. आघाडी व अपक्षांची डोकेदुखीसुद्धा आहेच. गेल्या वेळेस या विभागात मनसे व राष्ट्रवादीने यश मिळवल्यामुळे शिवसेनेला जोरदार झटका बसला होता. पण, आता भाजप व शिवसेनेने संपूर्ण निवडणूकच प्रतिष्ठेची केल्यामुळे येथे शिवसेना आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जाेरदार कामाला लागली आहे. मनसेचे काही नगरसेवक शिवसेनेला मिळाल्यामुळे त्यांचाही जोर वाढला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी तर आमदारपुत्राच्या प्रभागात ठाण मांडून बसण्याचा इशारा दिल्यामुळे येेथे संघर्ष व स्पर्धा चुरशीची होणार आहे.


महापौर, उपमहापौरांच्या लढती

महापौर अशोक मुर्तडक हे प्रभाग क्रमांक सहामध्ये उमेदवार असून, त्यांची ही पाचवी निवडणूक आहे. यावेळी भाजप व शिवसेनेने त्यांना कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांच्या या प्रवर्गात अपक्ष नगरसेवक असलेल्या दामोदर मानकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने दीपक पिंगळे यांना रिंगणात उभे केले आहे. याच प्रभागात शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपमध्ये आलेले सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकुबाई बागुल या क प्रवर्गात उमेदवारी करीत आहेत. महापौरांप्रमाणेच या विभागात प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी ड प्रवर्गातून उपमहापौर गुरुमित बग्गा रिंगणात आहेत. येथे त्यांचा सामना राष्ट्रवादीचे माजी खासदार माधवराव पाटील यांचे पुत्र संजय पाटील यांच्याबरोबर आहे. त्यांनी भाजपकडून उमेदवारी घेतली आहे. शिवसेनेने या प्रवर्गात अनिल बागुल यांना उमेदवारी केली आहे. या प्रभागात सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार दिले असले, तरी उपमहापौरांनी मनसेचे उल्हास धनवटे, नंदिनी बोडके व काँग्रेसेच्या नगरसेविका असलेल्या अपक्ष उमेदवार विमल पाटील यांना बरोबर घेऊन आघाडी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये गोंधळ कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत उमेदवारी डावलण्यात आल्यावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना इच्छुकांच्या रोषाचा रोज सामना करावा लागत आहे. ध्येयनामा प्रकाशनासाठी भाजप कार्यालयात आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच उमेदवारी डावलेल्या महिलांनी रौद्र रूप धारण करत, उमेदवारी नाकारल्याचा जाब विचारला. त्यामुळे पालकमंत्र्यांनाही या गोधळात बंद खोलीत थांबून राहावे लागले. तिकीट नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या या रणरागिणींनी आपले काय चुकले, असा सवाल करत चुकीच्या लोकांना तिकिटे दिल्याचा आरोप केला, तर आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडताना एका महिलेला तिथेच रडू कोसळले. त्यामुळे भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा खोटा ठरला आहे.

महापालिकेसाठी उमेदवारी वाटपावरून भाजपमध्ये सर्वाधिक गोंधळ झाला. एबी फॉर्म वाटपाच्या वेळेस प्रत्येक उमेदवाराकडून दोन लाख रुपये घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरील वाद शमत नाही तोच दहा लाखांचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना उत्तरे देताना नाकीनऊ आले. निष्ठावंतांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी नाकारल्याचा आरोप होऊन अनेकांनी बंडाचा झेंडा उगारला आहे, तर अनेकांनी पैसे घेऊन तिकिटे विकल्याचा आरोप केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय सावरण्याचा प्रयत्न केल्याने आता वाद थांबतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उमेदवारी नाकारल्याचा उद्रेक शुक्रवारी भाजप कार्यालयात पुन्हा उफाळून आला.

ध्येयनामा प्रकाशित करण्यासाठी भाजप कार्यालयात आलेले पालकमंत्री महाजन यांच्यासमोरच दोन महिलांनी उमेदवारी नाकारल्याचा जाब विचारला. प्रभाग क्र. १२ मधून उमेदवारी नाकारण्यात आलेल्या आशा कांबळे यांनी थेट पालकमंत्री महाजन यांची भेट घेऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भेटू दिले नसल्याने त्यांनी केबिनबाहेरच गोंधळ घातला. या वेळी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. पालकमंत्र्यांना भेटू देण्याचा आग्रह केला. मात्र, कार्यकर्त्यांनी भेटू न दिल्याने त्यांना रडू कोसळले. आपल्याला उमेदवारी का नाकारली, असा प्रश्न उपस्थित केला. माध्यमांचे प्रतिनिधी पोहोचताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सारवासारव करत, कांबळे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, तर प्रभाग क्र. २३ मधून भाजपतर्फे इच्छुक असलेल्या स्मिता बोडके यांनीही या वेळी गंभीर आरोप केले. उमेदवारी देताना मोठा घोळ झाल्याचा आरोप करत, ज्यांना कोणी ओळखत नाही, अशांना उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्या प्रकारामुळे पालकमंत्री महाजन यांच्यावर बंद खोलीत बसून राहण्याची वेळ ओढवली. भाजपमध्ये उमेदवारी वाटपात गडबड झाली नसल्याचा दावा पालकमंत्री करीत असताना, हा गोंधळ झाल्याने भाजपमध्ये अजूनही आलबेल नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कशावर मारू शिक्का?

$
0
0

कशावर मारू शिक्का?

चावडी अन् कट्या-कट्ट्यावर चर्चांचे फड रंगू लागले होते... देशात वा राज्यात काय होणार यापेक्षा आपापल्या प्रभागाचंच प्रत्येकाला पडलं होतं... वर्कर अन् सामान्यांच्याही नसानसात पॉलिटिक्स भिनलेलं असल्यानं दारोदारी अन् घरोघरी त्याची चर्चा होणंही तसं साहजिकच होतं... चावडीवर तर सगळ्यांचीच मापं काढली जात होती...

ग्रामस्थ-१ : आपण उभ्या आयुष्यात लई इलेक्शन पाह्यलं, काही खेळलो बी... पण यंदासारखं किचकट अन् अवघड इलेक्शन नाही पाह्यलं राव... एका माणसाला चार मतं टाकायची आहेत...

ग्रामस्थ-२ : अरं, खेळातसुद्धा पहिले तीनच विनर काढले जातात, इथं तर चौघे काढायचे आहेत... अडाणी माणसाचं कामच राह्यलं नाही मंडळी...

ग्रामस्थ-१ : अरं, यंदा ताई-माई-आक्कावर नेमका कशावर मारू शिक्का, असं म्हणण्याची वेळ आली आहे राव... विचारसुद्धा पक्का व्हायला वेळ लागतोय...

ग्रामस्थ-३ : ह्ये क्लिस्ट इलेक्शन आसलं तरी ते समजून तर घ्यायाला पाहिजेच राव... त्ये डेमो सुरू केलंत ना म्हणे... तिथं बघायचं... नाहीतर नातवाकडून मोबाइलवर शोधायचं कसं व्होटिंग करायचं ते... व्होटिंग तर करावेच लागणार ना भाऊ!

ग्रामस्थ-१ : निवडून येतील चार अन् कामाच्या वेळेला एक नाही हाजिर व्हायचा... वरून ह्या भागातून मतं मिळाली नाही म्हणून काम नाही करणार... तिथं माझे वर्करच नाही, अशी कारणं सांगून चौकडी काम नाही करायची राव!

ग्रामस्थ-३ : सरकार तर म्हणतंय की मोठ्या पॅनेलमुळे प्रभागाचा विकास सोपा होईल…?

ग्रामस्थ-१ : विकासबिकास काही नाही...पण, मोठ्या पार्टीवाल्यांचा विजय नक्कीच सोपा होईल अशी शाळा आहे ही...

ग्रामस्थ-२ : पण यंदा एक लई बरं झालं... पॅनल मोठं झाल्यानं खूप लोकांना चान्स मिळतोय इलेक्शनचा... त्यो आपला बाळ्या आत्ता कुठं पंचविशीत असंल, मिळालं नव्हं त्याला तिकीट... उद्या नगरसेवकसुद्धा होईल...

ग्रामस्थ-३ : व्हय व्हय... यंदा तरणी पोरं लई आहेत इलेक्शनमंधी.. लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट आहे... नवीन लोकांना चान्स मिळायलाच हवा...

ग्रामस्थ-१ ः अरं, सगळी पोरं नाही निवडून येत... काही बरबादसुद्धा होतात यातून... इलेक्शन लई वाईट गोष्ट आहे... त्याची नशा चढली की काही खरं नाही... पंचविशीतली जेवढी पोरं इलेक्शनमंधी उभी आहेत, त्यापेक्षा जास्त पोरं आता बीअर बारच्या बाहेर उभी दिसतात... (सीनिअर मंडळींना हा मुद्दा पक्का पटला होता... नव्या पिढीचं काय होणार हा विचार करीत चार सदस्यीय पॅनल क्लिष्टच आहे, यावर त्यांचं एकमत झालं होतं.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी वाहतूक एेरणीवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नांदूर नाका येथे शालेय वाहनातून पडून एका चारवर्षीय बालकाला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करताना सातत्याने काही ना काही दुर्घटना घडत असल्याने शिक्षण विभागाने याप्रश्नी लक्ष घातले आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडून सोमवारी मुख्याध्यापकांची बैठकही घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता पुन्हा शालेय बसमधूनच मुलगा तोल जाऊन पडल्याची घटना घडली आहे. यात या मुलाला जीव गमावावा लागला आहे. या प्रकरणांतील गांभीर्य पाहत ही बैठक घेण्यात येणार आहे. स्कूल बस, व्हॅन यांमध्ये महिला मदतनीसची नियुक्ती, विद्यार्थ्यांची काळजी अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

घटना घडल्यावरच येते जाग

विद्यार्थी वाहतुकीत सातत्याने होणारे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. परंतु, केवळ असे अपघात घडल्यावरच आरटीओ, पोलिस विभाग, शिक्षण विभाग यांना जाग येत असल्याचे वारंवार दिसून येते. जोपर्यंत परिस्थिती सुरळीत आहे तोपर्यंत या बाबींकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते आणि घटना घडली, की ती ताजी असेपर्यंतच बैठका घेतल्या जातात. या प्रश्नांवर ठोस उपाय निघत नसल्याने पालकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.


यापूर्वीही दुर्घटना

शहर परिसरात यापूर्वीही अनकेदा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना अपघतांच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे. मात्र, तरीही यासंदर्भात पोलिस यंत्रणेसह बहुतांश शाळांचे प्रशासनदेखील पुरेशा उपाययोजना करीत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता या बालकाचा जीव गेल्यानंतर तरी ठोस उपाययोजना होईल का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.


माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीचे नियोजन झाले आहे. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकांचीही बैठक घेण्यात येणार असून, त्यांना विद्यार्थी सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

-रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा बंडखोरांना अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपने कारवाईची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोर उमेदवारांना पक्षाने दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या दोन दिवसांत माघार घेऊन पक्षाच्या उमेदवाराचे समर्थन करा, असे आवाहन करतानाच माघार न घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा भाजपने बंडखोरांना दिला आहे. अशा डझनभर बंडखोरांची यादी तयार करण्याचे काम पक्षीय पातळीवर सुरू झाले आहे.

महापालिका निवडणुकांसाठी यंदा भाजपतर्फे निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने यंदा भाजपकडून महापालिकेसाठी ७०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. मात्र, निवडून येण्याचे मेरिट लक्षात घेऊन भाजपने उमेदवारी वाटप केली. त्यामुळे निष्ठावंत डावलले गेल्यानंतर त्यांनी बंडखोरी केली आहे. जवळपास दहा प्रभागांमध्ये भाजपचे बंडखोर आहेत. या बंडखोरांमुळे भाजपचा ‘शंभर प्लस’चा नारा अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे पक्षाने अशा बंडोबांना थंड करण्यासाठी लागलीच नाशिकमध्ये मुंबईतून निरीक्षक धाडले आहेत. या नेत्यांनी नाराजांना एकत्रित आणत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यातील काहींनी आपला नाराजीनामा मागे घेत पक्षाच्या प्रचारकार्यात सक्रियता दर्शविली, तर काही जण निवडणूक रिंगणात कायम राहिले. त्यामुळे अशा बंडखोरांचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसू नये याकरिता पक्षाच्या वतीने या बंडखोरांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यामध्ये सुरेश पाटील, मधुकर हिंगमिरे, प्रदीप घूमकर यांच्यासह डझनभर बंडखोरांचा समावेश आहे. अशा बंडखोरांनी दोन दिवसांत पक्षाशी चर्चा करून माघार घ्यावी, तसेच आपल्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा; अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चव्हाणांची एंट्री की पवारांचीच चलती!

$
0
0

दीपक महाजन, कळवण

तालुक्यातील कनाशी व अभोणा गटात होणाऱ्या लढती लक्षवेधी ठरणार आहेत. कनाशी गटातून माजी आमदार यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार पुत्र यांच्यात समोरासमोर होणारी लढत म्हणजेच विधानसभेची रंगीत तालीम ठरणार आहे. तर आभोणा गटात ४० वर्षांची आमदारकी ज्या यशवंत गवळींमुळे (तत्कालीन भाजप उमेदवार) पवार परिवाराला गमवावी लागली त्या गवळींविरोधात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी आव्हान उभे केले आहे.

यशवंत गवळी काँग्रेसकडून हक्काच्या अभोणा गटात नशीब आजमावणार आहेत. कळवण तालुक्यातील खर्डेदिगर गटात जयश्री पवार व मानूर गटात डॉ. भारती पवार उभ्या राहणार असल्याने त्यांच्याशी फारशी तुल्यबळ लढत होईल असे चित्र वाटत नाही. यंदाची जिल्हा परिषद निवडणूक माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या कुटुंबातील तिन्ही सदस्यांभोवतीच फिरणार की खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना आपल्या पुत्राच्या माध्यमातून कळवण तालुक्यावर पकड निर्माण करण्याची संधी मिळते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत यशवंत गवळी यांनी विराधाला विराध केल्यामुळे ए. टी. पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभावाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून आभोणा गटात तळामाळापर्यंत आखणी करण्यात आली आहे. तसेच गवळी यांनाही ही निवडणूक आता सोपी न राहिल्यामुळे त्यांनी आपले अस्तित्व राखण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे कळवण तालुक्यातील या गटाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

खर्डेदिगर गटातून राष्ट्रवादीच्या जयश्री पवार, भाजपकडून झेलुबाई ठाकरे, अपक्ष जयमाला खांडवी, माकपकडून लता बर्डे, शिवसेनेकडून मीराबाई पवार, काँग्रेसकडून वंदना बहिरम यांच्यात लढत आहे.

मानूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, माकपाकडून हेमलता दिनेश पवार, अपक्ष बेबीबाई सोनवणे यांच्यात लढत होईल. या गटातील काँग्रेसच्या उमेदवार रंजना पवार यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला. अभोणा गटातून काँग्रेसकडून माजी जि. प. सदस्य यशवंत गवळी, राष्ट्रवादीकडून जयश्री पवार किंवा ऐनवेळी सुभाष राऊत, भाजपकडून जितेंद्र ठाकरे, माकपकडून विश्वनाथ थैल यांच्यात लढत आहे.

लक्षवेधी लढत

कनाशी गटातून राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, भाजपकडून खासदारपुत्र समीर चव्हाण, काँग्रेसकडून पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ गायकवाड, माकपकडून हिराजी चौधरी यांच्यात लक्षवेधी लढत होईल. शिवसेनेकडून बाबुराव कोल्हे यांची उमेदवारी छाननीत बाद ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्मला गावितांची ठाणापाड्यात कसोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील ठाणापाडा गट मातब्बरांच्या लढाईने लक्षवेधी ठरणार अहे. आमदार निर्मला गावित यांचा मुलगा हर्षल गावित रणांगणात उतरल्याने चुरस निर्माण झाली आहे. गावित, भाजपच्या तालुकाध्यक्षा कौशल्या लहारे, राष्ट्रवादीच्या भारती भोये, माकपचे रमेश बरफ यांच्यात लढत रंगणार आहे. तालुका निर्मितीनंतर प्रथम राष्ट्रवादी त्यानंतर माकप व आता काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या गटावर पुन्हा आपलेच वर्चस्व ठेवण्यासाठी स्वतः आमदार पुत्रांना उमेदवारी करावी लागत आहे.

ठाणापाडा गट हा दुर्गम आहे. येथे विकासाचा अनुशेष भरून काढतांना सात वर्षांत आलेल्या अनुभवानुसार जिल्हा परिषद माध्यमातून मूलभूत सुविधा अधिक वेगाने मिळू शकतात. त्यामुळेच या गटासाठी पक्षाला उमेदवार नसल्याने स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. या भागाचे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मांडण्यासाठी हर्षल सक्षमपणे काम करेल, असा विश्वास आमदार गाव‌ित यांनी व्यक्त केला आहे. या गटात पुर्वापार कम्युन‌िस्टांचे वर्चस्व आहे. तालुका निर्मितीनंतर राष्ट्रवादीचा दबदबा निर्माण झाला आहे. तसेच भाजपच्या उमेदवारांसाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी लक्ष घातले आहे. असे असताना काँग्रेसने हर्षल यांना दिलेली उमेदवारी ही खरोखरच अस्तित्त्वाची लढाई आहे. आदिवासी विकास मंत्री सावरा आणि आमदार गावित यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या या लढतीकडे लक्ष आहे. माकप आणि राष्ट्रवादीने दिलेले उमेदवारदेखील त‌ितकेच तुल्यबळ आहेत. माकपचे रमेश बरफ हे त्र्यंबक पंचायत सम‌ितीचे माजी सभापती आहेत. राष्ट्रवादीच्या भारती भोये यांचे पती रघुनाथ भोये हे डॉक्टर आहेत. शिवसेनेचे नितीन लाखन हे सरपंच असून, त्यांचा राजकीय दबदबा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपत्तीत ‘हिरें’ची चमक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघारीकडे सगळ्यांचे लक्ष लागून असले तरी गटातील उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करताना दिलेली संपत्तीचे विवरण पत्रावरील आकडे पाहून लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकाही फिक्या पडतील असे कुणालाही सहज वाटेल.

जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक रिंगणात असलेले उमेदवारांची मालमत्ता मात्र अब्ज आणि कोटीची उड्डाणे घेत असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद गटातील टॉप टेन कोट्याधीश उमेदवारांची संपत्ती सर्वसामान्य मतदारांना अचंबित करणारी आहे. तालुक्यातून निमगाव गटातील भाजपचे उमेदवार जगन्नाथ दशरथ हिरे (जे. डी.) यांची स्थावर व जंगम मालमत्ता मिळून एकूण १ अब्ज ७० कोटीच्या घरात पोहचली आहे. अब्जावधी उमेदवारांच्या रांगेत शिवसेना, भाजपचे उमेदवार आघाडीवर असून काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र लाखातच राहिले आहेत.

गटासाठी दाखल करण्यात आलेल्या ५६ अर्जांमध्ये उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर करताना मालमत्तेचे विवरण दिले आहे. त्यात ही माहिती स्पष्ट झाली आहे. तालुक्यातील ७ गटातील कळवाडी, रावळगाव, दाभाडी, निमगाव व सौंदाणे गटातील भाजप सेनेचे उमेदवारांची मालमत्ता कोटीत आहे. जे. डी. हिरे यांच्यानंतर सौंदाणे गटातील भाजपच्या मनीषा रत्नाकर पवार यांची एकूण मालमत्ता ५६ कोटी ५३ लाख इतकी आहे. तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांदे यांच्या पत्नी अंजली कांदे या कळवाडी गटातून उमेदवारी करीत असून त्यांची एकूण मालमत्ता ३ कोटी ७३ लाख इतकी आहे. उमेदवारांची मालमत्ता कोटीच्या घरात असताना पंचायत समिती गणातदेखील कोट्यधीश असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात पाटणे गणातील भाजप उमेदवार अरुण संतोष पाटील यांची एकूण मालमत्ता ३ कोटी ९५ लाख इतकी आहे. तर झोडगे गणातील भाजपच्या सुवर्णा विजय देसाई यांची एकूण मालमत्ता ३ कोटी ७४ लाख इतकी आहे. सौंदाणे गणातील भाजपच्या संगीता संजय वाघ या देखील ३ कोटी ३३ लाखच्या धनी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार सभांमधून झडणार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मैदान मारण्यासाठी बुलंद तोफा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टार प्रचारकांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात येणार आहे. विविध पक्षांनी त्यासाठीची तयारी केली असून, उद्यापासून या तोफा धडाडण्यास सुरुवात होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, पंकज भुजबळ आणि नवाब मलिक यांच्या सभांचे नियोजन केले आहे.काँग्रेसची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याच सभा जिल्ह्यात व्हाव्यात, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. याखेरीज माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, बाबा सिद्दीकी, राधाकृष्ण विखे पाटील, आमदार भाई जगताप, खासदार मुजफ्फर हुसेन आदींच्या सभांची मागणी करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाने पर्यटन मंत्री जयप्रकाश रावल आणि आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांना प्रचारासाठी मैदानात उतरविले आहे. सध्या तालुका आणि गाव पातळीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू असून, दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभही झाला आहे. शिवसेनेने स्टार प्रचारकांची फौजच प्रचारासाठी उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, एकनाथ शिंदे, दादा भुसे, नीलम गोऱ्हे, आमदार गुलाबराव पाटील, व्याख्याते नितीन बानगुडे पाटील, शरद पोंक्षे, डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभांचे पक्षाकडून नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. ११) रोजी या सभांचा शुभारंभ घोटी येथून होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकीट मशिनद्वारे मतदार स्लिपांचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आपले मतदान केंद्र, अनुक्रमांक याची माहिती कळविण्यासाठी यापूर्वी मतदानाना हाताने लिहिलेल्या स्लिपा पूर्वी घरोघर वाटल्या जात असे. मात्र, कार्यकर्त्यांची कमतरता भासू लागल्याने हेच काम आता तिकीट मशिनद्वारे केले जात आहे. मतदारांच्या दारात तिकीट मशिनच्या सहाय्याने अशा स्लिपांचे वाटप होत आहे.

निवडणुका जाहीर झाल्या की पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे स्लिपा छापून त्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयात लिहून मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार केली जात असे. या स्लिपा तयार करणासाठी अक्षर चांगले असेलेल्यांसह जनसंपर्क चांगला असलेल्या कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपविली जात असे. अनेकदा तयार स्लिपा केवळ कार्यकर्ते न मिळाल्याने मतदारांपर्यंत पोहचत नव्हत्या. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या स्लिपा घरोघर पोहचाव्या यासाठी मतदारांचा डाटा कॉम्प्युटरमध्ये फिड करून स्लिपा तयार करण्याची शक्कल लढविली. मात्र, छापील स्लिपा घरोघरी वाटण्याचे काम कार्यकर्त्यांच्या टंचाईमुळे खंडीत होत असे. स्लिपा न मिळाल्यास अनेक मतदार मतदानाला जाणे टाळत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुन्हा स्लिपा वाटण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, नेहमीऐवजी तिकीट मशिनच्या सहाय्याने स्लिपा तयार केल्या जात आहे. मतदारांचा डाटा तिकीट मशिनमध्ये फिड करून घरोघरी प्रिंट केलेल्या स्लिपांचे वाटप केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images