Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘नोकरी मागणारे न बनता देणारे बना!’

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपली अर्थव्यवस्था ग्रामीण भागावर अवलंबून असून, शेतकरी या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी, शेतीवर आधारित उद्योग-धंदे वाढीस लागणे काळाची गरज आहे. युवकांनी नोकरीमागे न धावता शेती आधारित उद्योगांना प्राधान्य द्यावे. नोकरी मागणारे न बनता नोकरी पुरविणारे बना, अशी ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत ‘जनावरांचे आरोग्य व्यवस्थापक’ आणि ‘आळंबी उत्पादन’ या दोन विषयांवर आजपासून प्रत्येकी ३० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील आणि आडगाव येथील पशुधन व्यवस्थापन पदविका विद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर परदेशी उपस्थित होते.

कौशल्य हे यशस्वी उद्योजक बनण्याची पहिली पायरी असल्याचे मत, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी यावेळी व्यक्त केले. महिनाभर चालणाऱ्या या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींनी संपूर्ण कौशल्य प्राप्त करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. वित्त अधिकारी मगन पाटील यांनी शेतमाल उत्पादनाच्या विपणनाकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज बोलून दाखविली.

या प्रशिक्षण कालावधीत जनावरांची निगा, लसीकरण, विविध आजार व त्यांचे निदान, प्राथमिक औषधोपचार, तसेच उत्पादनवाढीसाठी शास्रीय दृष्टिकोनासंबंधी संपूर्ण प्रशिक्षण ‘जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन’ याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. आळंबीचे प्रकार, स्पॉन तयार करणे, माध्यमे बनविणे, रोगांचे व्यवस्थापन, वातावरणातील घटक नियंत्रण, बेड भरणे व एकूणच आळंबी उत्पादन करणे यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. पशुसंवर्धनतज्ज्ञ डॉ. श्याम पाटील, गृहविज्ञानतज्ज्ञ अर्चना देशमुख मार्गदर्शन करतील. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. पशुसंवर्धनतज्ज्ञ डॉ. श्याम कडूस यांनी आभार मानले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील ४० प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला आहे.


तांत्रिक ज्ञान पुरविणार

डॉ. म्हैसेकर म्हणाले, की युवकांनी स्वयंरोजगार निर्माण करावेत. स्वयंरोजगाराची गरज ओळखूनच कृषी विज्ञान केंद्रामार्फत कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. ज्ञान आणि कौशल्य यांची सांगड घालून यशस्वी उद्योजक बनता येते, याची प्रचीती केंद्राने यापूर्वी राबविलेल्या प्रशिक्षणातून तयार झालेल्या प्रशिक्षणार्थींना पाहून येते. आज ते मोठे व्यावसायिक बनले असून, ग्रामीण भागातील महिलांना व ग्रामीण युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरवीत आहेत. आगामी काळात ग्रामीण युवकांनी उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत तांत्रिक ज्ञान पुरविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रचार करावा तरी कसा?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रंगात आली असली तरी उमेदवारांपुढे एकच प्रश्न उभा आहे, तो म्हणजे प्रचार कसा करावा?. माघारीपर्यंत म्हणजेच १३ तारखेपर्यंत सर्वकाही गपगार होते. आता मतदानास अवघे चार दिवस उरले असता धावपळ उडाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी घेतलेले अद्यापही वरपासून काही रसद मिळेल या आपेक्षेवर आहेत. रोजच होत असलेल्या चर्चा, आदळआपट अथवा भ्रमणध्वनी केलेला त्रागा यामधून जाणवत आहे, उमेदवारांची निधीसाठीची घाळतेळ जाणवत आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत असून अव्वाच्या सव्वा अश्वासनांची खैरात होत आहे. तथापि प्रचरात मुक्त हस्ते होणारा खर्च हा प्रमुख विषय असतो. नोटाबंदीमुळे याचा थेट परिणाम जाणवत आहे.

त्र्यंबक तालुक्यात तीन गट आहेत. मतदार संख्या सरासरी ३० हजारांच्या आसपास आहे. तथापि भौगोलीक विस्तार मात्र मोठा आहे. धुमोडीपासून देवगाव येल्याची मेटपर्यंत पसरलेला अंजनेरी गट, हरसूल गटाचा अर्धा भाग वाघेरा घाटाच्या वर आणि अर्धा अधिक घाटाच्या खाली, ठाणपाडा गटात दुर्गम विखुरलेल्या वस्ती यामुळे या तिनही गटात प्रचारासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारांची दमछाक होत आहे. एका टोकापासून निघाल्यास दुसऱ्या टोकास संपर्क साधायचा कसा, त्यात मोबाइल रेंजचा प्रश्न आहेच.

या सर्वांवर मात करत हरसूल ठाणापडा भागात उमेदवार गेले तर तेथे स्थलांतराची समस्या जाणवते. एकट्या ठाणापडा गटातून १७ हजार मतदार रोजगारासाठी बाहेर गेले आहेत, असे एका कार्यकर्त्याने चर्चेत सांग‌ितले. तरी एवढ्या मतदारांना वाहनाने आणायचे कसे, जो आणेल तो त्यांची पानसुपारी आणि प्रवास खर्च करून आणेल, अशीदेखील चर्चा आता होत आहे. प्रचारासाठी वाहनांच्या झुंडी फिरतात. वाहनात असलेली कार्यकर्त्यांची फौज रॅलीची शोभा वाढवते. घरोघर लहान मुले, चकीत होऊन या प्रचारकांकडे पाहणारी लहान उघडी नागडी मुले, एखाद दुसरा वयोवृद्ध इसम किंवा घराला लागलेले टाळे असेच दृष्य ग्रामीण भागात दिसून येत आहे.

तहसील कार्यालयाने चेकपोस्ट सुरू केल्याने वाहनातून जाणाऱ्या प्रचारक कार्यकर्त्यांची पंचाईत झालेली पहावयास मिळत आहे. वाहनांचा फौजफाटा सोबत असतो. त्यामध्ये प्रचार साहित्य, झेंडे, स्टिकर लावलेले असल्याने गाडी तपासणी होताच कार्यकर्त्यांचे धाबे दणाणत आहे. कागदपत्र दाखवत अधिकाऱ्यांची समजूत काढतांना नाकीनऊ येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबे-सुकेणेत शिवसेनेपुढे आव्हान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील राजकीय पटलावर कसबे-सुकेणे गट हा सर्वच पक्षाच्या वतीने महत्त्पूर्ण मानला जातो. आरक्षणामुळे काहीसा निरुत्साह असलेल्या या गटात पक्षीय पातळीवर तिरंगी त्यातच नागरी विकास आघाडीनेही उमेदवार दिल्याने चौरंगी लढत रंगणार आहे. दरम्यान या गटात विद्यमान आमदार अनिल कदम यांच्या विरोधात स्व. आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र यतीन कदम यांनी रणशिंग फुंकले असून, नारायणगाव गणात मोगल घराण्यातील राजकीय वारसा लाभलेल्या दोन स्नुषा आमनेसामने आहेत. त्यामुळे यंदा या गटात भाऊबंदकीत राजकारण तापणार आहे.

कसबे-सुकेणे गटावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या गटात कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओने, दिक्षी, नारायणगाव (खेरवाडी), साकोरे मिग अशी राजकीय दृष्ट्या सजग असलेली गावे येतात. यंदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे येथील प्रस्थापित पुढाऱ्यांची गैरसोय झाली असली तरी पक्षीय पातळीवर स्थानिक पुढाऱ्यांनी उमेदवार दिले आहेत. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या गटात सेनेने ओझरहून दीपक शिरसाठ यांना आयात करून उमेदवारी दिली आहे. तर आघाडीने बाणगंगा काठाच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मोट बांधीत कसबे सुकेणेचे प्रकाश धुळे यांना रिंगणात उतरविले आहे. तिकडे शिवसेनेने तिकीट नाकारल्याने निफाड पंचायत समितीच्या माजी सभापती लता गाढवे यांनी सेनेला रामराम ठोकत भाजपकडून उमेदवारी मिळवली आहे. संपूर्ण ज‌िल्ह्याचे लक्ष असलेल्या ओझरच्या भाऊबंदकीने आता सिमोउल्लंघन केले असून, रावसाहेब कदम यांचे पुत्र यतीन कदम यांनीही या गटात लक्ष केंद्रित करून शिवसेनेला रोखण्यासाठी रमेश जाधव यांना पुरस्कृत करीत नागरी आघाडीने शिवसेनेसह आघाडीला आव्हान दिले आहे. याशिवाय विमल धुळे आणि संजय माळी हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. या गटात सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी सर्वाधिक प्रबळ असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या पुढाऱ्यांनी नारायणगाव गणाकडे लक्ष ठेवले आहे. कसबे सुकेणे गट सेनेकडून ताब्यात घेण्यासाठी सेनेविरुद्ध सर्व अशीच लढाई राहणार आहे.

या गटात ओझर-सुकेणे-पिंपळस, कोकणगाव-सुकेणे-चांदोरी, वडाळी आदी प्रमुख रस्त्यांचा प्रश्न, कसबे सुकेणेत अद्यावत जलशुद्धीकरण केंद्र, शिवार रस्ते, उच्च शिक्षणाच्या सोयीत मागे पडलेले कसबे सुकेणे आणि शेतीशी निगडित प्रश्न, बाणगंगा नदीवरील नादुरुस्त बंधारे, ओने, दात्याने येथील प्रलंबित पूल, पिण्याचे पाणी, गावांतर्गत असलेल्या मूलभूत सुविधा आदी प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचे आहेत. यतीन कदम यांनी सर्वप्रथम प्रचाराचा शुभारंभ करून आरोप प्रत्यारोपणाच्या फैरी झाडल्या आहेत. तर आघाडीने वैयत्तिक प्रचारास भर दिला आहे. कसबे सुकेणे गटात कसबे सुकेणे व नारायणगाव हे दोन गण असून याठिकाणी नारायणगाव गण निर्णायक ठरणार आहे. कसबे सुकेणेसह खेरवाडी, मौजे सुकेणे आणि दिक्षी आणि खेरवाडी या गावांची भूमिका या गटात महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदापट्ट्यात आता आत्महत्या सत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी भाव कोसळल्याने पाच एकर क्षेत्रातील कांदा जाळल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच या तालुक्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पिंपळगाव जलाल येथील संतोष भाऊसाहेब आवारे (२५) याने शेततळ्यात उडी घेतली, तर राजापूर येथील अशोक मांजरे (२७) याने विषप्राशन करून आत्महत्या केली.

गेल्यावर्षी जिल्ह्यात ८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर यंदा दीड महिन्यात ही सहावी आत्महत्या आहे. जिल्ह्यात एकीकडे महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे प्रशासनही हादरले आहे. एकाच वेळी घडलेल्या या घटनेमागे नेमके कारण पुढे आलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंगरे यांच्या शेताची बुधवारी पाहणी करून जळालेला कांदा मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचे सांगत आपला संताप व्यक्त केला होता. जिल्ह्यात दीड महिन्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, यातील बहुतांश आत्महत्या कांदा पिकणाऱ्या तालुक्यात झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होय, पक्षासाठी घेतला आम्ही निधी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी दोन लाख रुपये घेतल्याच्या त्या व्हिडीओ प्रकरणी भाजपने आचारसंहिता कक्षाकडे अखेरीस आपला कबुलीजबाब दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारांकडून पेसे घेतल्याची कबुली दिली असून, हा पैसा पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. पक्षाकडून त्याचा रीतसर हिशेब आयोगाला सादर केला जाणार असल्याने या व्हिडीओची हवा आता निघून गेली आहे. दरम्यान, काही जणांकडून रोकड स्वरूपात घेतलेल्या पैशांबाबत आयोगाकडून त्यांना पुन्हा विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांसाठी तिकीटवाटपावेळी भाजप कार्यालयात प्रत्येक उमेदवाराकडून दोन लाख रुपये मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे भाजपची चांगलीच अडचण होऊन उत्तरे देताना तारांबळ उडाली होती. भाजपने तिकिटासाठी पैसे घेतल्याचा आरोप पक्षातीलच काही नाराजांनी केला होता, तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत आचारसंहिता विभागाने आमदार सानप यांना नोटीस बजावत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सानप यांनी खुलासा सादर केला आहे. त्यात उमेदवारांकडून दोन- दोन लाख रुपये घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र, हा निधी पक्षाच्या प्रचारासाठी वापरला जाणार असल्याचा दावा केला आहे. पक्षाकडून प्रचारासाठी सामूहिक खर्च केला जाणार आहे. त्यासाठी हा निधी वापरला जाणार असून, त्याचा खर्च मुदतीत आयोगाकडे सादर केला जाणार असल्याचे स्पष्टीकरण सानप यांनी आयोगाच्या सरिता नरके यांच्याकडे केली आहे.

रोकडसंदर्भात विचारणा

आमदार सानप यांनी सादर केलेल्या खुलाशावर आयोगाकडून अभ्यास सुरू आहे. भाजपने काही उमेदवारांकडून रोख स्वरूपात पैसेही घेतले आहेत. त्यामुळे या रोकडसंदर्भात आमदार सानप यांनी पुन्हा विचारणा केली जाण्याची शक्यता आहे. सोबतच काही उमेदवारांनीही आपला खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. वेळेत त्यांनी आपला खर्च सादर केला नाही तर थेट निकाल थांबवण्याचाही इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे, तसेच दहा लाखांच्या व्हिडीओबाबतही भाजपला दिलासा मिळाला असून, हा व्हिडीओ बनावट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोष्ट असह्य वेदनेच्या सुसह्य प्रवासाची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत/ निफाड

असह्य मरणकळा, सोबतीला आई, मामी आणि गाठीशी अवघे पाचशे रुपये... गरीब गर्भवतीच्या जिवावर बेतणारा हा प्रसंग... वेदनेच्या कळा थांबत नव्हत्या. अशा परिस्थितीत कळवण रुग्णालयाने नाकारले आणि नाशिकच्या सिव्हिलनेही झिडकारले आणि गर्भवतीच्या पोटात असह्य कळ उमटली... आई, मामी भेदरल्या, त्यात रात्रीचा प्रसंग. मरणकळेच्या प्रवासाने अखेर माहेरची वाट धरली. मात्र, एका स्पीडब्रेकरने असह्य कळ उठली आणि या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला... सुदैवाने नॅच्युरल डिलीव्हरी झाली असली नामपूरजवळील शारदा गावातील मोलमजुरी करणाऱ्या माई रवी गायकवाड या महिलेच्या वाट्याला आलेला मरणकळांचा हा प्रवास अंगावर शहारे आणणारा आहे. अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा असल्या तरी शासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांच्या प्रसूती अशा राम भरोसेच सुरू असल्याचे धक्कादायक वास्तवही या निमित्ताने समोर आले आहे.

नामपूरजवळ शारदा या गावातील मोलमजुरी करणारी माई रवी गायकवाड या महिलेचे पहिलेच बाळंतपण होते. असह्य वेदना सहन करत बुधवारी ही महिला कळवण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. मात्र, हृदयविकार आणि रक्तदाबाचे कारण सांगित तिला नाशिक सिव्हिलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, तेथेही या महिलेला तोच अनुभव आला. गर्भ व आईच्या जिवाला धोका असल्याचे सांगत तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला नाशिक सिव्हिलने दिला. सोबतीला आई कल्पना काशिनाथ बर्डे व मामी लीलाबाई भागा पवार या दोघीच होत्या आणि हातात अवघे पाचशे रुपये. त्यात नाशिक सिव्हिलने नाकारल्याने खासगी रुग्णालयाचा खर्च कसा परवडणार? हतबल झालेल्या या महिला रात्रभर नाशिक रुग्णालयाबाहेर जीव मुठीत धरून थांबल्या. एकीकडे मुलीच्या वेदना, दुसरीकडे उपचाराचा प्रश्न. अखेर त्यांनी देवाच्या भरवशावर गर्भवतीला सटाणा तालुक्यातील सौंदाणे येथे माहेरी नेण्याचा निर्णय घेतला. गर्भवतीचे दिवसही पूर्ण झाले होते. अशा अवस्थेत मरणकळा सोसणाऱ्या मुलीला घेऊन त्या पहाटे नाशिक-अक्कलकुवा बसमध्ये बसल्या. गर्भवतीच्या वेदनांचा प्रवास थांबला नाही.

स्पीडब्रेकरच्या धक्क्याने प्रसूती!

पिंपळगाव बसवंतजवळ कोकणगाव येथील स्पीडब्रेकरवर भरधाव बस आदळली आणि या महिलेची प्रसूती झाली. ही बाब लक्षात येताच बसचालक व वाहकांनी बस थेट पिंपळगाव बसवंत येथे सकाळी सहा वाजता आणली. पेपर विक्रेते संजय साळुंके यांच्या मदतीने बस पिंपळगावच्या रुग्णालयात नेली. तेथे डॉ. रेखा सोनवणे, डॉ. अश्विन काकड यांच्यासह कल्पना ठाकरे, गणेश जाधव, डोंगरे आदींनी महिलेची योग्य काळजी घेत उपचार सुरू केले. मुलगा झाला व बाळाची आई सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आईच्या जिवात जीव आला. एक प्रकारे हा दोन जिवांचा जन्म होता.

पिंपळगावात माणुसकीचा प्रत्यय

या महिलेच्या मदतीला गावातील अनेक जण पुढे आले. पिंपळगाव बसवंतचे सराफ व्यावसायिक प्रमोद आहेरराव ज्वेलर्स यांनी या महिलेला साडीचोळी व बाळंतविडा असे सर्व साहित्य दिले. संजय साळुंके, जगन आंबेकर, श्रावण मोरे, नीलेश सोनवणे, प्रदीप जोशी यांनी मदतीची जबाबदारी उचलली. दोन रुग्णालयांनी नाकारून अखेर बसमध्ये सुखरूपपणे प्रसूती झालेल्या या महिलेला पिंपळगाव बसवंतमधील माणुसकीने गहिवरून आले. तिच्या आरोग्याची व घरापर्यंत पोहोचविण्याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन डॉ. रेखा सोनवणे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार निर्लज्ज!, उद्धव ठाकरेंचा घणाघात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार हे निर्लज्ज आहे, अशा शब्दांत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे जाहीर सभेत भाजपवर तोफ डागली. गोल्फ क्लब मैदानावर गुरुवारी सायंकाळी अर्ध्या तासाच्या भाषणात उध्दव यांनी प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांना कांदा जा‍ळावा लागतो आहे. सरकारने याची जबाबदारी घ्यावी. शरद पवार मंत्री होते तेव्हा कांदा फेकला आता सरकार आले आहे, तेव्हा जबाबदारी घेऊन निर्णय घ्या, असे आव्हान उद्धव यांनी दिले.

नोटाबंदीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून, त्याला संकटाच्या खाईतून काढणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच शिवसेनेचे सर्व मंत्री खिशात राजीनामे ठेवून आहेत. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती आणि पुन्हा शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज द्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास तेथील शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याची घोषणा भाजप सरकार करीत आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात सत्ता असताना येथे का कर्जमुक्ती करीत नाहीत, असा सवाल करीत उद्धव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांनी केवळ आता आयकर भरायचा आहे, हीच घोषणा आता बाकी राहिली आहे, असे उद्धव म्हणाले. भाजप देशात व राज्यात फसगत करीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेप्रमाणे सर्वांनी फसगतीविरुद्ध एकत्र या, असे आवाहन उद्धव यांनी केले. उद्धव यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे पुत्र प्रितेश छाजेड यांनी या वेळी शिवसेनेत प्रवेश केला. छाजेड यांच्यासह गोकुळ पाटील, बापू निमसे, अभय गुंजाळ आदींनी उद्धव यांच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला.

मनसेला सॉफ्ट कॉर्नर

नाशिकमध्ये सत्ताधारी असलेल्या मनसेला उद्धव यांनी लक्ष्य केले नाही. गेल्या पाच वर्षातील नाशिकच्या स्थितीबाबत भाष्य करण्याच त्यांनी टाळले. त्यामुळे आपले चुलत बंधू राज यांना आणि त्यांच्या पक्षाला उद्धव यांनी सॉफ्ट कॉर्नर दिल्याची चर्चा होत होती.

उद्धव यांची आश्वासने

> नाशिकमध्ये महापालिकेचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून त्याद्वारे नाशिककरांना मोफत आरोग्य सेवा देणार

> शहरात बससेवा सुरू करून वाहतुकीचा प्रश्न सोडवू

> गोदावरीला प्रदूषणमुक्त करू

> स्वतः जातीने नाशकात येवून नाशिककरांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार

> नाशिकचा टीडीआर प्रश्न, झोपडपट्टी निर्मूलन हे प्रश्न सोडविणार

> मनपा शाळेत व्हर्च्यूअल क्लासरूम, विद्यार्थ्यांना टॅब देवू


सुरक्षेसाठी एन्काऊंटर करा

नाशिक शहरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडगिरी वाढल्याने असुरक्षा वाढली आहे. नाशकात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रसंगीत एक-दोन जणांचे एन्काउंटर केलं पाहिजे, असे वादग्रस्त विधान ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांनी या वेळी केले. उध्दव साहेब तुम्ही केव्हाही सांगा. राजीनामा खिशात आहे. मंत्री म्हणून दिलेल्या घरात माझे केवळ ३ ड्रेस आहेत. ते आमदार निवासात घेऊन येईन, असे भुसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमित शहांची संपत्ती वेबसाइटवर: दानवे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती जाहीर करा, अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेवर भाजपनं आज जोरदार पलटवार केला. अमित शहा यांची संपत्ती जाहीर करायची गरज नाही. शहा यांची संपत्ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आधीच जाहीर करण्यात आलेली आहे. पण तुमची संपत्ती शोधायची कुठे? असा बोचरा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी दानवे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'अमित शहा यांच्या संपत्तीची चिंता करू नका. ती वेबसाइटवर मिळेलच; पण तुमची संपत्ती आहे किती? आणि ती कुठं ठेवली आहे? याचाच शोध घ्यायची वेळ आल्याचा टोला दानवे यांनी हाणला.

'भाजपच्या यशानं शिवसेनेच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत. पण ही टीका आमच्यावर नसून जनतेवर आहे. आम्हाला निवडून दिल्यामुळे ते जनतेला शिव्या घालत आहेत. 'लेकी बोले, सुने लागे'सारखा हा प्रकार असून जनता शिवसेनेला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला. 'भाजपची बदनामी करणारे खोटे मेसेज शिवसेना सोशल मीडियावरून फिरवत आहे. मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे,' असंही ते म्हणाले.

काँग्रेस-शिवसेनेची छुपी युती

'काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती असल्याचा आरोपही दावने यांनी केला. रायगडमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे फोटो एका बॅनरवर झळकले यावरूनच शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर काम करते हे स्पष्ट होत असल्याचं दानवे म्हणाले.

मनमोहन सिंग यांना कोणी ओळखत नव्हतं!

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही त्यांनी आगपाखड केली. भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची जागतिक पातळीवर ओळख होती. देश-विदेशात त्यांना कोणी ओळखत नव्हतं, असं सांगतानाच, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ही ओळख बदलली. त्यामुळेच त्यांच्या स्वागताला बराक ओबामांनाही विमानतळावर यावं लागलं,' असं दानवे यांनी शेवटी स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


होय, हे आम्ही केलं!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘माझा शब्द व होय, आम्ही हे केलं’ अशी टॅगलाइन वापरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला सहा पानी जाहीरनामा अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रसिद्ध केला. केलेल्या कामांचे निवडक फोटो व छोटेखानी निवेदन देत दुसऱ्या पर्वाची सुरुवात करायची आहे, तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे सांगत मतदारांना साद घातली आहे. या जाहीरनाम्यात केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या प्रकल्पावर भर न देता सर्वसामान्यांच्या प्रश्नावर भर देण्यात आला आहे.

प्लास्टिकमुक्त नाशिक, पायाभूत सुविधा, महिलांसाठी धोरण, मुबलक पाणीपुरवठा, आरोग्य, घरकुल योजना, सुरक्षितता, ई-गव्हर्नन्स, पर्यावरण, नाशिकच्या पुढील पिढीसाठी व्हर्च्युअल क्लासरुम्स, युवकांसाठी आयटी पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, क्रीडाधोरण, नाशिकच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी योजना, ब्रॅँण्ड नाशिकसाठी काय करणार या मुद्द्यांचा समावेश केला आहे.

त्याचप्रमाणे होय, हे आम्ही केलं यात उत्तम दर्जाचे खड्डेविरहीत रस्ते, मुकणे धरणातून थेट पाइपलाइन, जीपीएस सुसज्ज घंटागाड्या, घनकचऱ्यावर प्रक्रिया करून खत प्रकल्प, जकातीचे खासगीकरण रद्द, वाहतूक बेटाचं सुशोभीकरण, बोटॅनिकल गार्डनचा कायापालट, चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय, गोदापात्रात राज्यातलं सगळ्यात उंच कारंजा आणि वॉटर कर्टन, कुंभमेळ्याचं उत्कृष्ट नियोजन, भ्रष्टाचारमुक्त कारभार याचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे विविध विकासकामांच्या फोटोमध्ये यातीलच काही कामांचे निवडक फोटोही छापण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या अडथळ्यांचा उल्लेख

या जाहीरनाम्यात पाच वर्षे काराभार हा अडथळ्यांची शर्यत ठरला आणि खेदाने सांगावसं वाटतं, की हे अडथळे अनेकवेळा राज्य सरकारकडूनच निर्माण केले जात होते. तरीही आम्ही आमचा शब्द पाळला अशी खंत राज ठाकरे यांनी दुसऱ्या पर्वाच्या निवेदनात केली आहे.

प्रत्येक प्रश्न सुटल्याचा दावा नाही

नाशिकमधला प्रत्येक प्रश्न सुटलाच आहे, असा दावा मी करीत नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी आपल्या या निवेदनात पण तो कसा सुटू शकेल याचं प्रारूप या पाच वर्षांत मी नक्की मांडले, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

के. के. वाघ उड्डाणपुलासाठी ४०४ कोटी मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

के. के. वाघ ते जत्रा हॉटेलदरम्यान उड्डाणपुलासाठी ४०४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २७ फेब्रुवारीला त्याची निविदा प्रसिध्द होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

के. के. वाघ महाविद्यालयाजवळ शेकडो विद्यार्थी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. याठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे आंदोलनेही होत असतात. या ठिकाणी उड्डाणपूल होण्याची मागणी होती. खासदार गोडसे यांनी या मार्गाची पाहणी करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला त्रुटी दाखवून दिल्या होत्या. के. के. वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेलदरम्यान उड्डाणपुलाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास सरकारने तत्वतः मान्यता दिली होती. आज प्राधिकरणाच्या बैठकीत ४०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

वाहतुकी कोंडी सुटणार

नाशिक उड्डाणपूल तयार होऊनही द्वारका सर्कल, इंदिरानगर, लेखानगर, के. के. वाघ कॉलेज, अमरधाम क्रॉसिंग, जत्रा हॉटेल येथे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाहनचालक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होतो. अमरधाम क्रॉसिंग आणि के. के. वाघ कॉलेजसमोर शेकडो विद्यार्थी जीव धोक्यात घालून राष्ट्रीय महामार्ग ओलांडतात. शहराचा अंतर्गत तीस मीटर रिंगरोड या महामार्गाला क्रॉस होतो. तसेच जत्रा क्रॉसिंगला बाह्य मार्गावरील नाशिक शहराचा साठ मीटर रिंगरोड महामार्गाला क्रॉस होतो. त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत.


आराखड्यात त्रुटी

खासदार गोडसे यांनी विभागीय अभियंता राजीव सिंग, प्रकल्प अधिकारी खोडसकर आदींसमवेत के. के. वाघ-जत्रा हॉटेल मार्गाची पाहणी करुन आराखड्यातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. या सर्व क्रॉसिंगवर किती अपघात झाले व किती जणांचे बळी गेले हे आडगाव व पंचवटी पोलिसांच्या लेखी पुराव्यासह दाखवून दिले होते. त्यानुसार अनेक सूचना करण्यात आल्या होत्या. तसा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला होता. त्याचा पाठपुरावा गोडसे यांनी केला. ६ जुलै २०१६ च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ३१ कोटी ३५ लाखांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. यातून काही सब वे, हायमास्टही मंजूर करण्यात आले होते. तसेच के. के. वाघ आणि जत्रा हॉटेलपर्यंतच्या २.३ किमी अंतरासाठी उड्डाणपुलाला मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी अंदाजे २१२ कोटी रुपये लागणार असून सविस्तर अहवाल बनविण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामे ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येणार आहेत. के. के. वाघ उड्डाणपुलाचा सविस्तर अहवाल तयार झाला असून, प्राधिकरणाच्या बैठकीत ४०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.



के. के. वाघ कॉलेजजवळ उड्डाणपूल झाल्यावर अनेक संभाव्य अपघात टळणार असून, अनेकांचे जीवही वाचणार आहेत. हा उड्डाणपूल लवकरात लवकर करुन वाहतूक कोंडी दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी दिल्लीपर्यंत पाठपुरावा करत आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिधन मेळाव्यात दीड कोटींची बक्षिसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची माहिती देण्यासाठी आणि अशा व्यवहारांची भीती मनातून घालविता यावी यासाठी फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला डिजिधन मेळावा होणार आहे. या मेळाव्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नागरिक आणि व्यापाऱ्यांना एकूण दीड लाख रुपयांच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी दिली.
मेळाव्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसीलदार सी. एस. देशमुख, लीड बँक मॅनेजर अशोक चव्हाण, बीएसएनएलचे व्यवस्थापक सुरेशबाबू प्रजापती आदी उपस्थित होते.
यावेळी राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारासंबंधी जागृती निर्माण करणे आणि त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देणे हा मेळावा आयोजनाचा उद्देश आहे. मेळाव्याला केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांसाठी आधार नोंदणी, बँक खात्याशी आधार कार्ड किंवा मोबाइल क्रमांक संलग्न करणे आदी सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डिज‌िटल व्यवहार करणाऱ्या नशिबवान ग्राहकांना एक कोटी रुपयांपर्यंतची तर व्यापाऱ्यांना ५० लाखांपर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा जाहीरनामा शहराचा रोडमॅप!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शहरातील वेगवेगळ्या घटकांशी चर्चा करून तयार केलेला जाहीरनामा हा शहर विकासाचा रोडमॅपच असल्याची भावना सर्वपक्षीय शहराध्यक्षांनी व्यक्त केली. महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा संकल्पही जाहीरनामा प्रकाशन वेळी त्यांनी सोडला. शहराचे ब्रँडिंग, पर्यटनवाढीसाठी प्रयत्न, उत्पन्नाचे स्रोत, नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी सर्वांनीच नाशिककरांना दिली. ‘मटा’च्या या स्तुत्य उपक्रमावर सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने शहरातील विविध घटकांना आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. निवृत्त पोलिस अधिकारी-कर्मचारी, रिक्षा व टॅक्सी संघटना, पर्यटन, ग्राहक पंचायत, व्यापारी व व्यावसायिक, औषधविक्रेते, गृहनिर्माण सोसायट्या, क्रीडा क्षेत्र, गणेश मंडळे, पर्यावरण क्षेत्र, बार असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक, सहकारी बँका, हॉटेल व्यावसायिक, क्रेडाई, आर्किटेक्ट, टाऊन प्लॅनर्स, संरक्षण क्षेत्र, वृत्तपत्र विक्रेते, कामगार व कष्टकरी वर्ग आदी घटकांनी महापालिका व निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. जवळपास एक महिना हा उपक्रम सुरू होता.

मटा जाहीरनामा या सदरातून त्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यांचे संकलन करून तयार केलेल्या समग्र पुस्तिकेचे प्रकाशन शुक्रवारी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, मनसेचे गटनेते अनिल मटाले, माकपच्या सरचिटणीस डॉ. वसुधा कराड, माकपचे गटनेते तानाजी जायभावे, नगरसेवक सचिन महाजन, प्रकाश म्हस्के यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘मटा’च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वपक्षीयांनी स्वागत केले. आपला पक्ष सत्तेवर आल्यास या आराखड्याची विकासाचा रोडमॅप म्हणून अंमलबजवाणी करणार असल्याची ग्वाही या नेत्यांनी यावेळी दिली.


सर्वपक्षीय जाहीरनाम्यात प्रतिबिंब

‘मटा’ने महिनाभर राबविलेल्या मटा जाहीरनामा या उपक्रमाचे सर्वच पक्षांनी स्वागत करीत आपल्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश केला आहे. शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेस, माकप या पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यासाठी मटा जाहीरनाम्यात विविध घटकांनी अपेक्षित केलेल्या सूचनांचा समावेश केला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय जाहीरनाम्यात मटा जाहीरनाम्याचे प्रतिबिंब उमटले आहे.


सुसंवादाने रंगत

मतदानाला अवघे तीन दिवस बाकी असताना शहराध्यक्षपदावर असणाऱ्या नेत्यांना तसा प्रचारातून वेळ काढणे अवघडच. पण, या व्यस्त शेड्यूलमधून हे नेते आले व त्यांनाही परस्परांच्या दुर्मिळ भेटीचा वेगळा अनुभव आला. राजकारणात मतभेद असले, तरी राजकीय व्यक्ती एकमेकांच्या वैरी नसतात. त्यामुळे हे नेते एकमेकांशी सहज बोलले व आपल्याला निवडणूक काळात आलेल्या तिकीट वाटपापासून प्रचारापर्यंतच्या गोष्टींतले किस्सेही त्यांनी गमतीने सांगितले. विशेष म्हणजे सर्वांचे अनुभव सारखेच होते. त्यामुळे सर्वच नेत्यांना हायसे वाटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुसदस्यीय पद्धतीने दमछाक

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे उमेदवारांची दमछाक होत असताना सर्वच पक्षांच्या शहाध्यक्षांनीसुद्धा या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ‘मटा जाहीरनामा’च्या प्रकाशनानिमित्त एकत्र आलेल्या शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी या पद्धतीमुळे मतदानापासून तर कामापर्यंत कशा अडचणी येणार आहेत, यावर मत व्यक्त करीत त्यावर काही उपाय शोधल्याचेही सांगितले.

सत्ताधारी-विरोधकांचे झाले एकमत

महापालिकेच्या निवडणुकीत कधी एक सदस्यीय तर कधी दोन, तीन सदस्यीय पद्धत आतापर्यंत करण्यात आली. पण, यावेळी चार सदस्यीय पद्धतीमुळे सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. या पद्धतीत नेमक्या काय अडचणी येतात व त्याचा काम करताना कसा त्रास होते, यावर सर्वांचे एकमतही यानिमित्ताने पुढे आले. विशेष म्हणजे सत्ताधारी व विरोधी पक्षात असलेल्या सर्वच शहराध्यक्षांनी या पद्धतीमुळे निवडणुकीत होणारी दमछाकही सांगितली.

मतदार नाराजीची भीती

बहुसदस्यीय पद्धतीत सर्वच पक्ष वेगवेगळ्या भागातून उमेदवार देतातच असे नाही. पण, निवडणुकीत त्याच भागाच्या उमेदवारांना प्राधान्य व मते दिले जातात. त्यामुळे इतरांना तेथील मते मिळतीलच असे होत नाही. त्याचप्रमाणे आपण नेमके कोणाला काम सांगावे हाही प्रश्न असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदार नाराज होण्याची भीतीदेखील यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी व्यक्त केली.

ग्रुप लीडरची जबाबदारी

आता या बहुसदस्यीय पद्धतीला सामोरे जाताना आम्ही मात्र आता जो ग्रुप लीडर असेल त्याला कामे सांगा, असे सांगून मतदारांचे समाधान करीत आहोत. त्यामुळे कोणाची जबाबदारी असा प्रश्न आला, की एकाचे नाव आम्ही सांगतो. त्यामुळे पुढील काळात या ग्रुप लीडरची जबाबदारी जास्त राहणार आहे, असेही सर्वपक्षीय शहराध्यक्षांनी स्पष्ट केले.


प्रश्न जाणण्यात अडचणी

एक सदस्यीय पद्धतीत निवडणुकीला सामोरे जाताना थेट संपर्क असतो व त्यातून मतदारांच्या अडीअडचणी सहज समजतात. निवडणूक संपल्यानंतर त्यावर उपाय शोधून त्या सोडवल्याही जातात. त्याचप्रमाणे मतदारही थेट कनेक्ट असतो व तो सहज आपल्या नगरसेवकांना आपल्या अडचणी सांगू शकतो. बहुसदस्यीय पद्धतीत मात्र प्रभाग मोठा असल्यामुळे सर्वांचे प्रश्न समजून घेणे अवघड असते. निवडून आल्यानंतर ते कोणी सोडवावेत, हा प्रश्नही असतो. त्यात चार सदस्य असल्यामुळे एकमेकांवर काम ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे कामांच्या श्रेयाचेही शेअरिंग बरोबर होत नाही.

---
पक्ष वेगवेगळे, नेते मात्र एकत्र!

महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांचे उट्टे काढून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा जाहीरनामा’च्या प्रकाशनानिमित्त शहरातील प्रमुख राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व नेते शुक्रवारी एकत्र आले. निवडणुकीच्या धामधुमीत असे नेते एकत्र येणे तसे अवघड असते. पण, ‘मटा’च्या निमित्ताने एकत्र आलेल्या या नेत्यांनी निवडणुकीतील गमतीजमती शेअर करीत मनमोकळा संवाद साधला. यावेेळी सृदृढ लोकशाहीचे दर्शन घडवत त्यांनी एकमेकांना चिमटेही काढले.

मतदानानंतर भेटणार...

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निकाल येण्यापूर्वी मधल्या दिवसात पुन्हा एकत्र भेटण्याचा कार्यक्रम या सर्व नेत्यांनी निश्चित करत लोकशाहीतील एक उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याच्या निर्णय घेतला. आता ही भेट व त्याचे ठिकाण निश्चित नसले, तरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी ही जबाबदारी घेतली आहे. मतदान संपल्यानंतर पुण्यातील वैशाली हाॅटेलमध्ये सर्वपक्षीय नेते एकत्र भेटतात, तोच कित्ता आता नाशिकला गिरवला जाणार असून, त्याला सर्वच शहराध्यक्षांनी होकारही भरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभराची नोट!

$
0
0

शंभराची नोट!

बाज्याच्या घरी त्याचं स्नान आटोपण्यापूर्वी चार उमेदवार येऊन टेकले होते... बाहेर रंगीबेरंगी झेंडे लावलेल्या त्यांच्या महागड्या वाहनांचा ताफा रांगेत उभा होता... दारापुढं पहिल्यांदाच एवढ्या गाड्या पाहून बाज्याला एकदम झकास वाटत होतं... आपण बी समाजातील प्रतिष्ठित अन् महत्त्वाचं मान्यवर असल्याचं जाणवल्यानं त्याची छाती आज जरा जास्तच फुगली होती...

भाऊ लक्ष असू द्या, असं म्हणत ही मंडळी बाज्याच्या घरच्या धार्मिक मंडळींना साकडं घालत होती... निवडून आलो तर हरिनाम सप्ताह, साई भंडारा, देवीच्या कार्यक्रमांना भरघोस वर्गणी अशी आश्वासनं दिली जात होती... आम्ही स्वतःसाठी कधी कोणाचा एक रुपया घेतला नाही, असं बाज्या त्यांना अभिमानानं सांगत होता... त्यातच मावशीच्या आशीर्वादामुळंच आपण मागल्या खेपेला नगरसेवक बनल्याचंही एक उमेदवार सांगत होता... त्याच्या या वाक्यानंतर उरलेल्या तिघांनीही पटापट बाज्याच्या आईचे पाय धरले होते... ‘मावशी आशीर्वाद द्या’, असं ते म्हणत होते... बिचारी आजी चष्मा सांभाळत ‘तू कोणाचा रे’ म्हणत क्रमाने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवत होती...

आपल्या मताला किती किंमत आहे हे बाज्याच्या आज लक्षात आलं होतं... चार-चार उमेदवार घरी आल्यानं त्याची कॉलर एकदम टाइट झाली होती... तो सारखा दारातून बाहेर जाऊन आपल्या घराकडं कोण कोण बघतंय हे न्याहाळत होता... गल्लीतली पोरं बाहेरच उभी असल्याचं त्यानं आधीच पाहिलं होतं... उमेदवार आल्यावर त्यांच्याकडं पिण्याच्या पाण्यापासून ते घटांगाडीच्या तक्रारी करायच्या, हे वहिनींनी बाज्याला बजावून ठेवलं होतं... पण, अशा वेळेला कशाला समस्या सांगायच्या म्हणून बाज्यानं ते टाळलं होतं... वहिनी डोळे मोठे करून बाज्याला बोलण्यासाठी खुणावत होत्या... पण, तो त्यांच्याकडं दुर्लक्षच करीत होता... अर्थात, नंतर त्याबद्दल बरंच ऐकण्याची तयारी त्यानं ठेवली होती... शेवटी नाइलाजने वहिनींनीच उमेदवारांना चार शब्द ऐकवले होते... त्यावर ‘वहिनी, एवढ्या वेळी घ्या सांभाळून. निवडून आल्यावर तुमच्यासाठी पाण्याची नवी लाईन देऊ,’ असं म्हणत त्यांनी मान सोडवली होती…

उमेदवारांची चर्चा सुरू असतानाच वहिनींनी देवघरातून ओवाळणीचं ताट आणलं होतं... त्यांनी चारही उमेदवारांचं औक्षण करून त्यांच्यावरून ताट ओवाळलं होतं... ताट रिकामं जायला नको म्हणत चौघांपैकी एकानं लागलीच शंभराची एक नवी कोरी नोट ताटात ठेवली... पाठोपाठ

इतरांनीही तोच कित्ता गिरवला... बाज्याची आता ट्यूब पेटली होती... बायकोनं सकाळी-सकाळी बारा-पंधरा नारळं का मागवली, याचं कोडं त्याला उमगलं होतं... बायका पुरुषांपेक्षा हुशार असतात, हेही त्याला मनोमन पटलं होतं...

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडीचा सुटेना विळखा...

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा विळखा काही केल्या सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याची स्थिती आहे. येथील वाहतुकीचे नियोजन करण्याचा प्रयत्न होऊनदेखील हा प्रश्न सुटत नसतानाच एसटीच्या बसथांब्यामुळे येथील कोंडीत भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. येथील बस थांब्याचे स्थलांतर करावे, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

नाशिकरोडहून निघाल्यानंतर दत्त मंदिर चौक, उपनगर आणि फेम टॉकीजजवळ वाहतूक कोंडीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. काठे गल्ली सिग्नलचे दिव्य पार केल्यावर ही वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. कसाबसा द्वारका चौक ओलांडल्यावर सारडा सर्कलकडे जाताना नवे संकट वाहनचालकांपुढे उभे राहते, ते म्हणजे येथे थांबणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांचे. एकामागोमाग एक बस येथे उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडत असल्याचे चित्र या भागात दिसून येते. येथे एका रांगेत दोन-तीन बस उभ्या राहिल्यावर द्वारका चौकातून निघालेल्या वाहनांना थांबण्याशिवाय पर्यायच राहत नाही. बहुतांश बस अचानक थांबतात. त्यामुळे मागील वाहनांना त्यांना वळसा मारून सारडा सर्कलकडे जावे लागते. या एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या न प्रवासी उतरेपर्यंत भर रस्त्यातच उभ्या राहतात. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होतोच, पण मागे द्वारका चौकातही गोंधळ उडतो. परिसरातील संपूर्ण वाहतूकच ठप्प होते. काही जण वाहने विनाकारण रेस करतात. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढते, तर बहुतांश वाहनचालक हॉर्न वाजवीत असल्याने ध्वनिप्रदूषणातही भर पडते. त्यामुळे येथील एसटीचा थांबा अन्यत्र हलविल्यास हा त्रास कमी होईल, अशी भावना वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

चोहोबाजूंनी कोंडी

नाशिकरोडकडे जाताना द्वारका चौकात हॉटले द्वारकासमोर रिक्षाथांबा आहे. त्याच्यापुढे अनधिकृत वाहन पार्किंग आहे. पुढे काठे गल्लीचा सिग्नल ओलांडल्यावर जीप आणि छोटे ट्रक व्यावसायिक वाहने उभे करतात. त्यामुळे या मार्गावरील रिक्षाथांबा हटवावा, अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. असाच प्रकार कन्नमवार पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर होत आहे. येथील सर्व्हिसरोडवर वाहने उभी असतात. चहा, वडापाव व अन्य व्यावसायिक व्यवसाय करतात. द्वारका हॉटेलशेजारी असणाऱ्या सर्व्हिसरोडवरही असेच चित्र आहे. नाशिकरोडहून द्वारकाला आल्यावर हनुमान मंदिराशेजारून जिल्हा बँकेसमोरील सर्व्हिसरोडवरही वाहने, व्यावसायिक असतात. या सर्व समस्येवर तातडीने कायमची उपाययोजना शोधण्याची मागणी होत आहे.



स्थलांतरने मिळेल दिलासा

हा बसस्थांबा त्वरित पेट्रोलपंपाच्या पुढे स्थलांतरित केल्यास या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकेल. या थांब्याशेजारीच रिक्षांचाही थांबा आहेत. मात्र, मंजूर संख्येपेक्षा जास्त रिक्षा येथे उभ्या असतात. त्याचेही स्थलांतर करणे आवश्यक आहे. एसटी महामंडळ आणि वाहतूक पोलिसांनी ही कार्यवाही तातडीने केल्यास सर्वांचाच मनस्ताप दूर होईल. वाहतूक कोंडी झाल्यावर पोलिसही हतबल होतात. कारण, त्यांना एसटी बसमुळे झालेली कोंडी सोडवायची, की द्वारका चौकाकडे लक्ष द्यायचे, असा प्रश्न पडतो. सारडा सर्कलहून द्वारका चौकात आल्यावर तेथे देवीच्या मंदिराशेजारीही एसटी व शहर बस उभ्या राहतात. त्यामुळे तेथेही कोंडी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस चौकीत मद्यपींचा अड्डा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

काही वर्षांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडलेल्या दसक येथील पोलिस चौकीकडे पुन्हा पोलिस न फिरकल्याने सध्या ही पोलिस चौकी ओस पडल्याची स्थिती आहे. पोलिस येथे येणे टाळत असले, तरी मद्यपींचा मात्र या पोलिस चौकीत बिनधास्त वावर असून, या पोलिस चौकीच्या वरच्या मजल्यावर मद्यपींचा रात्रीच्या वेळी अड्डा जमत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

दसक भागात महालक्ष्मीनगर येथे ही पोलिस चौकी आहे. उपनगर पोलिस ठाण्याची निर्मिती होण्यापूर्वी ही पोलिस चौकी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत होती. मात्र, उपनगर पोलिस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर दसकची पोलिस चौकी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट झाली. या पोलिस चौकीत काही वर्षांपूर्वी एका पोलिस उपनिरीक्षकाने स्वतःकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून पोलिसांनी या पोलिस चौकीच्या वास्तूकडे काणाडोळा केला आहे. त्यामुळे सध्या ही पोलिस चौकी पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. एकीकडे पोलिसांना कामकाजासाठी बऱ्याच पोलिस ठाण्यांत पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे दसक येथील सुसज्ज पोलिस चौकीची वास्तू मात्र पोलिसांनीच बहिष्कृत केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या पोलिस चौकीत काही वर्षांपासून फर्निचर व कागदपत्रे बेवारस पडून आहेत. या साहित्याचीही काळजी शहर पोलिसांनी या आत्महत्येच्या घटनेनंतर घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे.


पोलिसांतही अंधश्रद्धेचे खूळ?

भल्या भल्या गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडण्याची क्षमता असलेल्या पोलिसांना मात्र सध्या दसक पोलिस चौकीत पाय ठेवायलाही भीती वाटत असल्याची परिसरात चर्चा आहे. या पोलिस चौकीची वास्तू शापित असल्याच्या अंधश्रद्धेचे खूळ पोलिसांच्या मानगुटीवर बसलेले आहे. त्यामुळे ही पोलिस चौकी बेवारस झाली असल्याचेही नागरिकांत चर्चिले जात आहे.

दसक पोलिस चौकीची इमारत काही वर्षांपासून वापराविना पडून आहे. या इमारतीत एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती, तेव्हापासून पोलिसही या वास्तूला अशुभ समजत असावेत. परंतु, मद्यपींचा मात्र येथे सर्रास वावर असतो.

-अमोल भोसले, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काही झाले ‘सैराट’ तर कुणी ‘गोंधळी’

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी येत्या २१ फेब्रुवारीला मतदान होत असून, उमेदवारांकडे प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कमी वेळेत मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराच्या पारंपरिक पद्धतीसह अनेक हटके फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे.

भाजप उमेदवारांकडून प्रचारासाठी सैराट सिनेमाच्या गितांवरील ध्वनीफीत बनवण्यात आली आहे. तर शिवसेनेनेदेखील गोंधळ या पारंपरिक लोककलेचा आधार घेऊन प्रचारात रंगत आणली आहे. कमी वेळेतसुद्धा आपण आणि आपली निशाणी मतदारांपर्यंत पोहचावी यासाठी पक्षांनी गावागावात ध्वनीक्षेपकावरून ‘ताई माई आक्का विचार करा पक्का’ या नेहमीच्या स्टाइलसह चित्रपट गीते, नेत्यांची भाषणे तसेच गोंधळाच्या माध्यमातून मतदारांना आम्हालाच मत द्या, असे साकडे घातले जात आहे.

सैराट सिनेमातील गाणी चांगलीच लोकप्रिय झाली असल्याने भाजपकडून खास या गाण्याच्या चालींवर प्रचारगीत बनवण्यात आले आहे. भाजप उमेदवारांचा प्रचारासाठी ते वाजव‌िण्यात येत आहे. या गाण्यामुळे प्रचार फेरीतील तरुणांचा उत्साह वाढत असल्याचे उमेदवार सांगतात. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्व. गोपिनाथ मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील भाषण ऐकव‌िले जात आहे. प्रचारात भाजप ‘सैराट’ झाला असेल तर सेना देखील कशी मागे राहणार. शिवसेनेकडूनदेखील मग गावागावात गोंधळी लोकांकडून ग्रामीण शैलीत गीत सादर करून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील पुरेमेपाडा येथील गोंधळी कलावंत यासाठी बोलावण्यात आले आहेत. पारंपरिक गीतांच्या चालीवर शिवसेना आणि उमेदवारांच्या नावासह हे कलावंत गोंधळ सादर करून मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. एरवी कौटुंबिक धार्मिक सोहळ्यातच या गोंधळींना बोलावले जाते. मात्र, निवडणूक प्रचारातदेखील त्यांच्या गोंधळाने रंगत भरली आहे. तर प्रचार सभांच्या आधी वातावरण निर्मितीसाठी खास हायटेक पद्धतीने तयार केलेले प्रचार रथ दाखल झाले आहेत. यावर खास स्क्रीन जोडण्यात आले आहे. यावर स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यमंत्री दादा भुसे यांच्या भाषणासह प्रचार गीत ऐकवले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौरंगी लढतीचे बनकरांपुढे आव्हान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील पाच गटांसह पंचायत समितीच्या दहा गणांसाठी राजकीय रणसंग्रामातील प्रचाराचा धुराळा आता चांगलाच उडू लागला आहे. त्यातच तालुक्यातील पाटोदा गटातील लढतीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. अनेक इच्छुकांचा टोकाचा विरोध झुगारून अंबादास बनकर यांचे पुत्र संजय बनकर यांना राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी, शिवसेनेने गट व गणात दिलेले तगडे उमेदवार आणि निवडणूक फडात भाजप व काँग्रेसने घेतलेली उडी यावरुन पाटोदा गटातील ‘चौरंगी’ लढतीत बनकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गत पंचवार्षिक निवडणुकीत काबीज केलेला हा गट व त्यातील गण राखण्याचे शिवसेनेपुढे आव्हान, तर राष्ट्रवादी हा गट खेचण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

गेल्या निवडणुकीत येवला तालुक्यातील पाच गटांपैकी चार गट जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला पाटोदा गटासह त्यातील पाटोदा व धुळगाव या दोनही गणात पराभव पत्करावा लागला होता. यावेळी हा गट सर्वसाधारण असून, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस अशी चौरंगी लढत या गटात आहे. राष्ट्रवादीने संजय बनकर यांना मैदानात उतरविले आहे. गटातील राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच इच्छुकांनी बनकर यांच्या उमेदवारीला विरोध करूनही ते यशस्वी झाले. ‘बनकर यांना उमेदवारी नकोच’ अशी आठ इच्छुकांच्या मागणीला पक्षश्रेष्ठींनी दाखवलेली केराची टोपली बघता आता हे पक्षातील नाराज काय भूमिका घेतात? यावरही बनकर यांचे यशापयश अवलंबून आहे.

शिवसेनेने सर्वसाधारण पाटोदा गटातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पक्षाचे माजी तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे यांना रिंगणात उतरविले आहे. कोंढरेंचे जनसंपर्काचे जाळे भेदण्यात बनकर कसे यशस्वी होतात अन् बनकर यांचे तालुक्यातील स्वपक्षीय नेत्यांशी असलेले सख्य? नेमका कुठला मार्ग धरते यावरही बनकरांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. भाजपनेही पाटोदा गावाचे सरपंचपद भूषविलेल्या सूर्यभान नाईकवाडे यांच्या हाती ‘कमळ’ सोपवले आहे. तर याच गावातील उस्मानभाई शेख या आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला काँग्रेसने मैदानात पुढे केले आहे. नाईकवाडे अन् शेख पाटोद्यातील किती मतांवर डल्ला मारतात यावर देखील या गटातील निवडणूक निकालाचे गणित अवलंबून असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये मतविभागणीचा फायदा कुणाला?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यावर असलेले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने गट आणि गणातील लढत प्रतिष्ठेची केली आहे. विविध समाजांचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतविभागणीचा फायदा नेमका कुणाला होतो हे लवकरच कळणार आहे.

हरसूल गटात अभियंता असलेल्या माळेकर आणि भाजपचे पीएचडी असलेले प्राचार्य देशमुख यांनी दुर्गम भागातून उच्च शिक्ष‌ितांचे प्रतिनिधीत्व अधोरेखीत केले आहे. अंजनेरी गटात काँग्रेसच्या शकुंतला डगळे आणि शिवसेनेच्या सविता कडाळी यांच्यात प्रमुख लढत होईल. यामध्ये सामाज‌िक मतांचा आधार ठाकूर समाजाच्या असलेल्या कडाळी यांना आहे. तर काँग्रेसच्या डगळे यांना महादेव कोळी समाजाच्या मतविभागणीची भीती आहे. अंजनेरी गट आणि विशेषतः गणात शिवसेनेचे पॉकेट वोट आणि ठाकूर समाजाची लक्षणीय मते यांच्या बळावर काँग्रेसपुढे अव्हान उभे आहे. आमदार गावित यांची विकास कामे आणि संपतराव सकाळे यांचा दबदबा त्यातच गतवेळेस विरोधात असलेले मधुकर लांडे, कैलास चव्हाण, पोपट चव्हाण यावेळेस काँगेसच्या जोडीला आले आहेत. या सर्वांचा एकत्र‌ित परिणाम शकुंतला डगळे यांना विजयाकडे नेणार की राष्ट्रवादीच्या छाया बदादे आणि भाजपच्या अलका झोले मतविभागणी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार हे मतामोजणी नंतरच दिसून येईल.

हरसूल गटात राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवारी आता काँग्रेसच्या देवीदास जाधव यांच्यापुढे आव्हान निर्माण करणारी ठरली आहे. अर्थात येथे भाजपचे मोतीराम देशमुख यांची उमेदवारीदेखील प्रमुख लढतीत आहे. काँग्रेसचे जाधव आणि अपक्ष माळेकर यांच्यातच प्रमुख लढत होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. आव्हान परतवतांना माळेकर आणि देशमुख यांची कसोटी लागणार आहे.
ठाणापाडा गटात आमदार पुत्र हर्षल गावित काँग्रेसकडून उमेदवारी करीत आहेत. त्यांची राष्ट्रवादीच्या भारती भोये, माकपचे रमेश बरफ यांच्याशी प्रमुख लढत होणार आहे. माकपची वोट बँक बरफ यांना विजयाकडे नेणार की स्थानिक उमेदवाराच्या मुद्यावर राष्ट्रवादी आणि माकप यांची मतविभागणी काँग्रेसला तारून नेणार हे लवकरच समोर येणार आहे. येथे भाजपच्या तालुकाध्यक्षा कौशल्या लहारे यांचीदेखील उमेदवारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारकडून जनतेचा विश्वासघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

‘अच्छे दिन’ दाखविणाऱ्या भाजप सरकारने अडीच वर्षांत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेची पसवणूक केली आहे. जनतेच्या विश्वासाला हे सरकार अपात्र ठरल्याने या निवडणुकीत त्यांना हद्दपार करण्याची नामीसंधी साधावी, असे आवाहन धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व पक्षनिरीक्षक शामकांत सनेर यांनी केले.

काँग्रेसचे ठेंगोडा, ताहाराबाद व जायखेडा गटातील उमेदवार सारीका पाटील, रेखा पवार, मनिषा भामरे तसेच पं. सं. चे उमेदवार कमल अहिरे, व प्रतिक खरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत सनेर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार बापू चौरे होते. सनेर म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या ध्येय धोरणांची अमंलबजावणी करणाऱ्या सरकारने कोणतेही नवीन निर्णय घेतले नाहीत. उलट नोटाबंदीसारखा जहाल निर्णय घेवून शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला खाईत लोटले. परिणामी बाजारात रोजगार कमी होवून बेरोजगारी वाढली.

बापू चौरे यांनी ठेंगोडा गटातील उमेदवार सारीका पाटील उच्चविद्याविभूषित असून, सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची त्यांना जाण आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या तळमळीची तळमळ जाणीव ठेवावी असे आवाहन केले.तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरीया, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन यशवंत अहिरे, पंचायत समितीचे माजी सभापती दौलतराव देवरे, रवींद्र पवार, जि. प. सदस्य अनिल पाटील, धुळे लोकसभा अध्यक्ष सचिन कोठावदे, महेंद भामरे, यशवंत पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती परशुराम अहिरे, पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images