Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सटाणा शहरातील घंटागाड्यांना जीपीएस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

‍नगर परिषदेच्यावतीने स्वच्छ व सुंदर सटाणा शहाराची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी शहरातील नववसाहतीतील वाढलेले झुडपे, गवत काढून मैदाने व भूखंड स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील घंटा गाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

निवडणुकीत दिलेल्या वचनाचा शहरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यात प्रभाग एक आणि तीनमधील कामांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोरे म्हणाले, स्वच्छ व सुंदर सटाणा शहराची संकल्पना ही पूर्णतः साकार करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील नागरिकांची देखील आम्हास मदत लागणार आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रत्येक घरनिहाय शौचालयांच्या पाइपांना जाळी बसविण्यात येणार आहे. गटारींची स्वच्छता करण्यात येवून वाहत्या गटारी करण्यात येतील. घरातील कचरा, घाण वाहून नेण्यासाठी घंटागाडी कार्यरत असली तरीही प्रशासनाकडून आगामी काळात या गाड्यांना जीपीआरएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. नागरिकांची तक्रार आल्यास हे अ‍ॅप मदत करेल असाही विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष निर्मला भदाणे, शहर विकास आघाडीचे गटनेते संदीप सोनवणे, मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हायवे सहावर कामबंद पाडणार

$
0
0

पंकज काकुळीद, धुळे

धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या आहेत. त्याचा सरकारने योग्यरितीने दिला नसल्याचे वृत्त ‘मटा’ने दि. २८ फेब्रूवारीला प्रसिद्ध केले होते. त्यामुळे महामार्गालगत चौपदरीकरणासाठी भूसंपादन जमीन केलेल्या जमिनीचे मालक व शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला न मिळाल्याने शेतकरी दि. २४ मार्चपासून कामबंद पाडणार असून त्याठिकाणी कुटुंबासह बेमुदत आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यानंतर अखेर ‘मटा’चे भाकित खरे ठरले असून, शेतकऱ्यांनी नवापूर ते धुळे तालुक्यातील मुकटीपर्यंतच्या तब्बल साठ गावांतील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधून आंदोलनाची दिशा ठरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याची सविस्तर माहिती तालुक्यातील संग्राम पाटील व शिष्टमंडळाने ‘मटा’शी बोलताना दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्यालगत जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून जमिनीचे अधिग्रहण करून सरकारकडून मोबदला देण्यात आला आहे. मात्र ज्यावेळी जमीन भूसंपादित करण्यात आल्या त्यानुसार काही शेतकऱ्यांना जुन्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला एकपट मिळाला. मात्र उर्वरित शेतकऱ्यांना मोबदला नवीन कायद्यानुसार चारपट देण्यात आला. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना समन्यायी पद्धतीने मोबदला न देता शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रिय रस्ते विकास व बांधकाम मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता. याप्रसंगी संग्राम पाटील, शामकांत शिंदे, शेतकरी संघटनेचे बाळू सोनवणे, गोकूळ खिवसरा, संजय शिंदे, फकिरा चौधरी, पंकज खैरनार, विलास पाटील उपस्थित होते.



पोलिस कारवाईस सामोरे जाण्यास तयार

जवळपास १५० किलोमिटरच्या अंतरावरील ६० ते ७० छोटे-मोठ्या गावातील शेतकरी कुटुंबासह ज्या-ज्या ठिकाणी महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी शेतकरी कुटुंबासह आंदोलनाला बसणार आहेत. आंदोलनात काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही वाहन न अडवत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये ज्याठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जाणार आहेत त्याठिकाणीच आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत सरकार यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल. पोलिस कारवाई जरी झाली तरी त्यास सामोरे जाण्यास शेतकऱ्यांची तयारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा वसतोय भंगार बाजार...

$
0
0

महापालिका आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी; मोहीम केवळ नावालाच

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने मोठ्या अथक प्रयत्नानंतर सातपूर अंबड-लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटवला आहे. परंतु, भंगार बाजार हटविल्यावर पुन्हा भंगाराची दुकाने वसली आहेत. यामुळे अनधिकृत भंगार बाजार हटवला असताना पुन्हा भंगाराची दुकाने जैसे थे कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्वतः याकडे लक्ष घालावे, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींच्या अगदी मध्यभागी भंगार बाजाराची दुकाने थाटली होती. ही दुकाने अंबड-लिंकरोडवर होताना बोटावर मोजण्याइतकीच संख्या होती. परंतु, कालांतराने शेकडोच्या घरात भंगाराची दुकाने झाली. यानंतर भंगार बाजारात अनेक व्यवसायच सुरू झाले होते. त्यातच तब्बल तीस वर्षांपासून अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत कारवाई सुरू झाली. महापालिकेनेदेखील अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत आदेशीत केले होते.

महापालिका आयुक्त कृष्णा यांनी पोलिसांची मदत घेत भंगार बाजाराचे अतिक्रमण जमीनदोस्त केले होते. परंतु, अनधिकृत भंगार बाजार हटविल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी उभा राहत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.

रहिवाशी भागासाठी आरक्षित असलेल्या ठिकाणी पुन्हा भंगार बाजार जैसे थे कसा, असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अंबड-लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटविल्यानंतर दुकाने थाटलेल्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शेड उभारणीचे कामे जोरात

अनधिकृत हटविण्यात आलेल्या भंगार बाजारात पुन्हा शेड उभारणीचे कामे जोरावर असल्याचे पाहायला मिळत आहे. जागेची मोजणी केल्यावर महापालिकेच्या नगररचना

विभागाकडून परवानगी भंगार व्यावसायिकाला दिली जाणार आहे. त्यातच रहिवाशी असलेल्या जागेवर भंगाराचे दुकान नसणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले गेले आहे. असे असतानाही हटविण्यात आलेल्या भंगार बाजाराच्या जागेवर पुन्हा शेडची उभारणी कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे हटविण्यात आलेल्या भंगार बाजाराची अतिक्रमण मोहीम केवळ नावालाच का असाही प्रश्न निर्माण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी कर्मचाऱ्यांना मिळाले वेतन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत नविन घंटागाड्या दाखल झाल्यानंतर किमान वेतनही कर्मचाऱ्यांना लागू झाले होते. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेतनाअभावी उपासमारीची वेळ आली होती. घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत ‘मटा’ने लक्ष वेधल्यानंतर महापालिका ठेकेदाराने तात्काळ शनिवारी (दि. ४) १ महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना अदा केला आहे. उर्वरित दोन महिन्यांचा पगारदेखील लवकर ठेकेदार देणार असल्याचे घंटागाडी कामगार संघटनेचे म्हणणे आहे. परंतु, अति महत्त्वाची सेवा करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिकेने वेळेवर अदा करावे, अशी सार्थ अपेक्षा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

‘घंटागाडी येता घरा कचरा टाका भरा-भरा’ असे ब्रीदवाक्य घेत महापालिकेने यशस्वीरित्या घंटागाडीची अभिनव योजना राबविली आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून घंटागाड्याच नादुरूस्त झाल्याने महापालिकेने नवीन घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. या घंटागाड्यांनादेखील मुहूर्त लागायला उशीर झाल्याने त्याचा रोष नगरसेवक व अधिकाऱ्यांना सहन करावा लागला. आता घंटागाड्या सुरळीत सुरू झाल्या असताना घंटागाडी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतनच ठेकेदाराने दिले नसल्याने उपासमारीचे संकट ओढवले होते.

काही दिवसांपूर्वी ‘मटा’ने कैफियत मांडली होती. यानंतर यंत्रणा जागी होत ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले.

ठेकेदाराने शनिवारी, एक महिन्याचे वेतन घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकल्याने सर्व कामगारांनी ‘मटा’चे आभार मानले. उर्वरित दोन महिन्यांचे वेतन लवकरच देण्यात येणार असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. गल्लीबोळात जाऊन वेळेवर रहिवाशांचा कचरा गोळा करणाऱ्या अतिमहत्त्वाची सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर अदा करावे, अशी अपेक्षाही

त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांनी अर्जांसाठी शनिवारची सुटी घालवली रांगेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीला शनिवारी सुट्टी असल्याने सिडको व सातपूर महापालिकेच्या कार्यालयात कामगारांची घरकुलाचे अर्ज घेण्यासाठी तोबा गर्दी वाढली होती. शनिवारी (दि. ४) सुट्टीने अर्ज घेताना महापालिकेच्या कार्यालयात रांगा लागल्या होत्या. उन्हात उभे राहत कामगारांनी अर्ज घेण्यासाठी धडपड सुरू होती.

एकीकडे महापालिका पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज ग्राहकांना देताना दुसरीकडे अनेकांनी महा ई-सेवा केंद्रावर ऑनलाइन घरकुलांच्या अर्जांची नोंदणी केली आहे. यामुळे साहजिकच ज्यांनी घरकुलांची नोंदणी केली असेल त्यांना अतिरिक्त २० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. याबाबत महापालिकेने जनजागृती करावी, अशी अपेक्षा महा ई-सेवा केंद्र चालकांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यातच ही योजना लागू केली होती. यानंतर गरजूंनी तसेच महिलांनी महा ई-सेवा केंद्रांवर गर्दी केली होती. यामध्ये केंद्रांकडून तब्बल दोन लाख घरकुलांच्या अर्जांची नोंदणी केली असल्याचे ‘मटा’ला सांगितले होते. परंतु, यानंतर गेल्या चार दिवसांपासून महापालिकेनेदेखील पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज सहा विभागात विक्रीसाठी ठेवले. यामुळे महापालिकेच्या सहाही विभागात अर्ज घेण्यासाठी गर्दी झालेली पहायला मिळाली. त्यातच शनिवार हा औद्योगिक कामगारांचा सुट्टीचा दिवस असतो. सिडको व सातपूर भागात बहुतांश कामगार भाड्याने खोली घेऊन राहत असतात. सुट्टीचा दिवस असल्याने या भागातीन महापालिका कार्यालयांमध्ये घरकुलांचे अर्ज घेण्यासाठी कामगारांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.


पंचवटीत रेटारेटी, झुंबड

पंचवटी : पंतप्रधान आवास योजनेअर्तंगत पंचवटी विभागीय कार्यालयात अर्ज घेण्यासाठी शनिवारीही प्रचंड गर्दी झाली. अर्ज घेण्यासाठी बेशिस्तपणे केलेल्या रांगांमुळे अडचणी येत होत्या. महिलांनी एकाच ठिकाणी गर्दी केल्यामुळे नेमकी रांग कोणती आहे हे कळत नव्हते. रेटारेटी व धक्काबुक्की मुळे अर्ज वितरण करण्याच्या कामाला अडचणी येत होत्या. व्यवस्थित रांगा लावण्यात आल्या तर अर्ज वितरण सोपे होईल असे वारंवार सांगूनही महिला ऐकत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे अर्ज मिळण्यास विलंब होत होता.

या योजनेअंतर्गत मोफत घरकुले मिळणार असल्याची अफवा पसरली असल्याने अर्ज मिळाला म्हणजे घर मिळाले असा अनेक झोपडपट्टीवासीयांचा समज झालेला आहे. त्यामुळे घाईघाईत कोणत्याही प्रकारे अर्ज मिळविण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली आहे. विभागीय कार्यालयात या रांगा व्यवस्थित करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी लावलेले असतानाही त्यांनाही महिला दाद देत नसल्याचे दिसत होते. लांबवर लागलेल्या अस्ताव्यस्त रांगामुळे अर्ज मिळणे मुश्किल होत होते. गडबड, रेटारेटी, आरडाओरडा, वादविवाद यांच्यामुळे गोंधळ वाढत होता. पुरुषांची रांग शिस्तबद्धपणे असल्याने त्यांच्या अर्ज वितरणाचे काम सोपे झाले होते. सकाळपासून उपाशी रांगांमध्ये असलेल्या महिला आणि पुरुष तसेच त्यांच्यासोबत असलेली लहान मुले तहान व भूकेने कासाविस होत होते. पाववडे विक्रेते त्यांची भूक भागविण्याचे काम करीत होते.

महिलांचा उत्साह

सिन्नर फाटा : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी सर्वेक्षण मागणी अर्ज खरेदीसाठी शनिवारीही मनपाच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी, ४०० अर्जांची विक्री झाल्याने नाशिकरोड कार्यालयातून आतापर्यंत नेलेल्या अर्जांची संख्या १४६५ वर पोहचली आहे. शनिवारी दिवसभर अर्ज घेण्यासाठी महिला रांगेत उभ्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी १३७ कोटी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटीसाठी पहिला हफ्ता महापालिकेला आता मिळणार आहे. केंद्र सरकारने आपल्या हिश्श्यातील ९० कोटी आणि राज्य सरकारने ४५ कोटींचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून हा निधी आता नाशिक म्युनसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता स्मार्ट सिटीच्या कामांचा श्रीगणेशा होणार आहे. दरम्यान, महापालिकेला आपल्या हिश्श्यातील ४५ कोटी रुपये मार्चपर्यंत उभे करावे लागणार आहेत. सध्या आर्थिक स्थिती बिकट असल्याने हा निधी उभे करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नाशिकची निवड झाली होती. या निवडीमुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळणार होती. स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी एसपीव्ही ही स्थापन करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी निधीची प्रतीक्षा असल्याने पाच महिन्यांपासून कामकाज ठप्प होते. महापालिका निवडणुका संपताच केंद्र व राज्य सरकारने स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी निधी रिलीज केला आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील आपल्या हिश्श्यातील ९० कोटी, तर राज्य सरकारचा ४५ कोटींचा हिस्सा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. प्रशासकीय कामकाजासाठी दोन कोटींचा निधीही वितरित केला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी पालिकेला तब्बल १३७ कोटी रुपये मिळणार असून, स्मार्ट सिटीच्या विकासकामांचा श्रीगणेशा होणार आहे. हा निधी फक्त स्मार्ट सिटीच्या कामांसाठी वापरावा लागणार आहे. हा निधी स्मार्ट सिटी वगळता अन्य कामांसाठी वापरला, तर थेट आयुक्तांवरच कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे.

४५ कोटींची कसोटी

दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारने आपला हिस्सा दिल्यानंतर महापालिकेलाही आपला ४५ कोटी रुपयांचा हिस्सा मार्चपर्यंत जमा करावा लागणार आहे. मात्र, सध्याची पालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यातच विविध योजनांचा भारही महापालिकेवर असून, ४५ कोटी रुपये ३१ मार्चपर्यंत उभे करण्यासाठी पालिकेची कसोटी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचतगट अधिक सक्षम करणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ई-पोर्टलच्या माध्यमातून महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच बचतगटांसाठी विभागीय आणि फिरत्या विक्री केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढीत तीन वर्षांत राज्याच्या प्रत्येक घरात एक तरी सदस्या महिला बचतगटाची सदस्य असेल. महिला सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असून, बचतगटांच्या सक्षमीकरणाचे कार्य सातत्याने करत राहणार आहे. प्रत्येक कुटुंबातील स्त्रीला प्रशिक्षित करून स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांतर्फे विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचतसमूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सव, तसेच विभागीय महिला मेळावा शनिवारी डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर झाला. त्याचे उद््घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, की आतापर्यंत महिलांनी बचतगटासांठी घेतलेले एकही कर्ज बुडवले नाही. त्याची त्यांनी परतफेड केली. त्यामुळे शून्य व्याजदराची योजना सरकारने सुरू केली असून, त्यालाही प्रतिसाद मिळत आहे. बचत गटासाठी असलेल्या महिलांच्या हातात बांगडी असली तरी मनगट बळकट आहे. पायात पैंजण असले तरी तिचे पाऊल प्रगतीकडे जाण्यासाठी तिला सर्वांनी मदत केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये आता कॅशलेस दान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात आता कॅशलेस दान करता येणार आहे. ऑनलाइन देणगीची सुविधा यापूर्वीच सुरू करण्यात आली असून, मंदिरात आता शनिवारपासून ई-हुंडीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते या ई-हुंडीचे उद््घाटन झाले. भट्टाचार्य यांनी स्वतःचे डेबिट कार्ड स्वाइप करून १०१ रुपये देवस्थानला देणगी म्हणून दिले व त्याची प्रिंटेड पावती घेतली.

एसबीआयचे चीफ जनरल मॅनेजर दीपनकर बोस, जनरल मॅनेजर सलानी नारायण, तसेच इतर अधिकारी आणि त्र्यंबकेश्वर शाखेच्या प्रमुख सीमा पहाडी या वेळी उपस्थित होत्या. मंदिराचे विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर, जयंतराव शिखरे, व्यवस्थापक राजाभाऊ जोशी, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य उपस्थित होते. पाचोरकर यांनी मंदिरास कॅश डिपॉझिट मशिन मिळावे म्हणून मागणी केली होती. तांत्रिक कारणास्तव ते मिळाले नाही. मात्र ई-हुंडी देण्यात आली. येथे दोन स्वाइप मशिन दोन वर्षांपासून देणगी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहेत. ऑनलाइन देणगी अकाऊंटदेखील यापूर्वीच सुरू झाले असल्याचे पाचोरकर यांनी सांगितले. सर्व अभ्यागतांचे स्वागत अॅड. श्रीकांत गायधनी आणि विश्वस्तांनी केले.

ग्रामीण भागात कनेक्टीव्हिटी हवी

भट्टाचार्य यांच्याशी संवाद साधला असता, ग्रामीण भागात कॅशेलस होण्यासाठी अगोदर कनेक्टीव्हिटी हवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये डिपॉझिट वाढले आहे. ते कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ते सेव्हिंग खात्याकडे अधिक वर्ग होत असल्याने व्याजासह सर्वच खर्च वाढत असल्याने बँका अडचणीत येत आहेत. ट्रांझॅक्शन चार्जेस आकारावे लागतील. कारण खर्च वाढतो आहे. सरकार नोटा छापणे, त्या वितरित करणे या करिता मोठ्या प्रमाणात खर्च करत असते. हा खर्च ई बँकिंग, कॅशलेस यामुळे कमी होणार आहे. त्यामधून बँकांना सहाय्य मिळाल्यास ग्राहकावरील बोजा टळू शकतो.

बँकांचे एकत्रीकरण अपरिहार्य

बँकांचे एकत्रीकरण आता अपरिहार्य ठरले आहे. बँकांच्या एकत्रीकरणाने अधिक चांगल्या सुविधा देता येणार आहेत. सर्व ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना आपल्या बँकेत सामावले जाईल व त्यांना सुविधा देण्यात येणार आहेत. नव्याने बँकेशी जोडले जाणारे ग्राहक आणि कर्मचारी यांना आपण बाहेरून आलेलो नाही तर एकाच परिवारातील आहोत, अशा प्रकारे सेवासुविधा मिळतील, याची खात्री भट्टाचार्य यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीपी साहेब, एक झटका द्याच!

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

‘‘सीपी साहेब, कर्तव्यदक्ष कप्तान अशी तुमच्याबद्दलची प्रतिमा आम्ही अंतःकरणात जपली आहे. आमचा वाढदिवस तुम्हीच आपुलकीने साजरा केलात. तुमच्यामुळेच आम्हाला कुटुंबासह चित्रपट पाहता आला. म्हणूनच तुमच्यातील मानवतेला आमचा सॅल्युट. साहेब, पोलिस दलातील काही महत्त्वाच्या पदांवर वर्षानुवर्षे तेच ते कर्मचारी गोचिडासारखे चिकटून आहेत. पैशाचा माज आणि पोलिस असल्याची मस्ती त्यांच्या डोक्यात भिणलीय. त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होऊन प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा विश्वास ढेपाळतोय. साहेब, अशा कर्मचाऱ्यांना एक झटका द्याच... ’’ वर्षानुवर्षे साकळलेली ही मनातली खदखद पोलिस कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे व्यक्त केलीय थेट पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याकडे.

राज्य पोलिस दलातील दमदार वरिष्ठ अधिकारी म्हणून सिंघल यांची ख्याती आहे. शहरात जनरल ड्युटी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी थेट त्यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडले आहे. एरवी पीएसआयसह सर्वच वरिष्ठांच्या आदेशाला झुकणाऱ्या ‍बापुड्या कर्मचाऱ्यांना अन्याय आता असह्य होऊ लागला आहे. म्हणूनच त्यांनी थेट सीपी साहेबांकडे गाऱ्हाणे मांडण्याची पहिल्यांदाच हिंमत केली आहे.

पोलिस आयुक्तांसारखा वजनदार अधिकारी आपल्या तक्रारींकडे कशासाठी लक्ष देईल, अशी साशंकता असल्याने कर्मचारी आतापर्यंत निमूटपणे अन्याय सहन करीत राहिले. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था होती. मात्र, कर्मचाऱ्यांना सिंघल यांच्यात अन्याय दूर करणारा आशेचा किरण दिसू लागला आहे. वर्षानुवर्षे मलईदार कामांवरच ताव मारणाऱ्या आणि अधिकाऱ्यांचे कान आणि खिसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांची या पत्रातून पोलखोल करण्यात आली आहे. पोलिस दलात प्रामाणिक, कार्यतत्पर आणि जिगरबाज पोलिस कर्मचाऱ्यांची कमी नाही. ते न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची जाणीव सिंघल यांना करून देण्यात आली आहे.

क्राइम राइटर, हजेरी मास्तर, ठाणे अंमलदार, डीबी कर्मचारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे राइटर, बीट मार्शल अशा विशिष्ट जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वर्षानुवर्षे गोंजारण्याचे काम शहरात सुरू आहे. त्यांची लवकर बदलीच होत नाही. झालीच तरी तेथेही त्यांना सुभेदारीच मिळते. यातून अन्य कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखविला जात असल्याची खंत पत्रातून व्यक्त झाली आहे. मुख्यालयातील तीन आणि तांत्रिक शाखेतील दोन कर्मचाऱ्यांवर सरकारवाडा आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अलीकडेच गुन्हे दाखल झाले. डोक्यात पैशांची हवा गेल्याने काही कर्मचाऱ्यांना माज आला असून, त्यामुळेच पोलिसांच्या हातून गंभीर गुन्हे घडतात हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न पत्रातून करण्यात आला आहे. चमचेगिरी करणारे आणि त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक झटका द्याच अशी विनंती नाराज कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आता विश्वासाला जागण्याची वेळ

पोलिस कर्मचाऱ्यांप्रती सिंघल यांनी नेहमीच आपुलकी जपली. कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चित्रपट दाखविणे, नववर्ष सेलिब्रेशन असो किंवा आरोग्य तपासणी त्यांनी विधायक उपक्रम राबवून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे मलाईदार खुर्च्यांवर बसणारे, तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात सणसणीत पत्र लिहिण्याचे धाडस या कर्मचाऱ्यांनी दाखविले आहे. सिंघल ही तक्रार गांभीर्याने घेणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनैतिक संबंधांतून हमालाचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांच्या बाजारात साईनाथ व्हेजिटेबल कंपनीत हमालीचे काम करणाऱ्या दीपक दगडू अहिरे (वय २८) या युवकाचा शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खून झाला. बाजार समितीच्या दक्षिणेच्या प्रवेशव्दाराजवळील न्यू उत्तम हिरा या हॉटेलच्या समोर ही घटना घडली. त्याच्या डोक्यात, पाठीवर आणि पोटावर धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून अनैतिक संबंधातून झालेला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
विडी कामगार नगरजवळील निलगिरी बाग येथील घरकुलात राहणारे दीपक अहिरे हा रोजच्याप्रमाणे शनिवारी रात्री बाजार समितीतील पालेभाज्यांच्या लिलावानंतरचे हमालीचे काम आटोपून त्याच्या पल्सर (एमएच-१५, सीएच- ६३७३) मोटारसायकलवरून बाहेर जात असताना एकाशी बोलण्यासाठी थांबला. त्यावेळी चार जण तेथे आले. त्यातील एकाने दीपकच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि दुसऱ्यांनी त्याच्या पाठीत, डोक्यावर आणि पोटावर धारधार शस्त्राने वार केले. पाठीत आणि पोटात एकाचवेळी झालेल्या वारामुळे दीपक खाली कोसळला. तो खाली पडताच हल्ला करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दीपकचे वडील दगडू तोलाराम अहिरे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. चार ते पाच जणांनी मिळून हा हल्ला केल्याचा अंदाज असून, तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष मतदार नोंदणीचा श्रीगणेशा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ऑल वूमेन्स बाइक रॅलीच्या ठिकाणी महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदार नोंदणीचे ५३९ अर्ज येथे जिल्हा प्रशासनाद्वारे वितरित करण्यात आले. त्यापैकी १५ महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह लगेचच अर्ज जमाही केले.

महिला दिनाचे औचित्य साधून यंदा प्रथमच जिल्हा प्रशासनाने महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरासह तालुक्यांमध्येही हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचा श्रीगणेशा रविवारी (दि. ५) भोसला मिलिटरी कॉलेजच्या प्रवेशद्वारावर झाला. महाराष्ट्र टाइम्स आणि जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बाइक रॅलीतील सहभागी महिलांसाठी मतदार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. या अभियानाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बहुतांश महिलांनी जिल्हा प्रशासनाच्या स्टॉलला भेट दिली. काही महिलांनी आमची मतदार नोंदणी पूर्वीच झाली असल्याचे सांगितले, तर काहींनी बाइक रॅलीच्या निमित्ताने मतदार नोंदणीचीही पर्वणी साधली. कुणी स्वत:साठी, कुणी बहिणीसाठी, कुणी मुलीसाठी, तर कुणी आपल्या अन्य नातलगांसाठी मतदार नोंदणी अर्ज घेतला. सकाळी पावणेआठ ते पावणेअकरा या तीन तासांत तब्बल ५३९ अर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार सुरेश कांबळे यांनी दिली. त्यापैकी १५ महिलांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडून अर्ज जमाही केले. हे अभियान यशस्वीतेसाठी अतुल पेठकर, अशोक संसरे, विनायक बोरसे, विजय वाघ आदींनी प्रयत्न केले.

येथे स्वीकारणार अर्ज

नवीन नावनोंदणीसाठी फॉर्म क्रमांक ६, मतदार ओळखपत्रातील नाव व पत्ता दुरुस्तीसाठी फॉर्म ८ आणि ८ अ बाइक रॅलीच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. बहुतांश महिलांनी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे आणली नव्हती. त्यांना आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील नाशिक तहसीलदार कार्यालयात अर्ज जमा करता येणार आहेत. अर्जासोबत अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो, आधार कार्डची छायांकित प्रत, वीजबिल किंवा दूरध्वनी देयकाची छायांकित प्रत, १ जानेवारी २०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण झाल्याबाबतचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माच्या दाखल्याची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेट्यांचा तुरा बाइकचा रुबाब!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरजरी नऊवारीचा साज जपत, मस्तकावरील फेट्याचा रूबाब सांभाळत विविधरंगी, विविधढंगी वेशभूषेसह संवेदनशील सामाजिक संदेशांमुळे रविवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ऑल वूमेन्स बाइक रॅली शहरात चर्चेचा विषय ठरली. भोसला कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास रविवारी हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या उपक्रमास बहार आली. अगदी कॉलेजकन्यकांपासून ते साठी उलटलेल्या आजीबाईंपर्यंत सर्वांनी विविध प्रकारच्या बाइकवर स्वार होत, आपल्यातला उत्साह, उमेद दाखवून दिली आणि जबरदस्त जल्लोष केला.

वेशभूषेसाठी पारंपरिक थीमसह वेस्टर्न लूकवरही भर देत अनेक महिला वूमेन्स डेनिमित्त आयोजित या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. हाती असणाऱ्या स्कूटीपासून, तर रॉयल एनफ‌ल्डिपर्यंत विविध गाड्या रुबाबदारपणे चालवत महिलांनी उत्साही जल्लोष केला. सीएचएमई सोसायटीच्या विद्या प्रबोधिनी शाळेच्या (कॉलेजरोडकडील गेट) मैदानावरून सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास या रॅलीला सुरुवात झाली. महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुम‌ति बग्गा, माजी मिस फेम‌निा उत्तरा खेर, आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, क्रीडा प्रशिक्षक विजयेंद्र सिंग, ब्रह्माकुमारी परिवारातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या उपक्रमात सहभागी महिलांनी त्यांच्या वाहनांची कल्पकतेने सजावट करत सामाजिक संदेशांचे फलक हाती घेतले होते. पारंपरिक वेशभूषेतील महिलांच्या सहभागाने या उपक्रमात रंगत आणली.

भोसला मिलिटरी कॉलेजपासून सुरू झालेल्या रॅलीचा कॉलेजरोडमार्गे डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूररोड, जेहान सर्कल, नवश्या गणपती, बारदान फाटा, साधना मिसळ, मोतीवाला कॉलेज, त्र्यंबकरोड, एबीबी सर्कल असे सुमारे बारा किलोमीटरचे अंतर पूर्ण करून पुन्हा भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानावर समारोप झाला.

संदेशांतून समाजप्रबोधन

घराच्या उंबरठ्यापासून तर प्रत्येक आघाडीवर लढणाऱ्या महिलांनी या उपक्रमात सहभागी होताना सामाजिक संवेदनाही जागविल्या. यावेळी ‘मुलगी वाचवा’, ‘पर्यावरण, पाणी वाचवा’, ‘वाहतूक नियम पाळा’, ‘सार्वजनिक स्वच्छता’ यांसारख्या विविध सामाजिक विषयांबाबत प्रबोधन करणारे संदेश दिले.

ड्रेसकोडने वेधले लक्ष

या उपक्रमात अनेक महिलांनी नावनोंदणी ही समूहानेच केली होती. समूहाने सहभागी होताना वेशभूषा, केशभूषा, ड्रेसकोडची थीम, सामाजिक संदेशांच्या संकल्पना यावेळी महिलांनी मांडल्या. यात ब्रह्माकुमारी परिवारातील साधक महिलाही सहभागी झाल्या होत्या. याशिवाय महिलांसाठी कार्यरत विविध संघटनाही रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. ग्रुपमधील महिलांच्या विविध ड्रेसकोडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

कॅप अन् फेट्यांची भुरळ

बाइक रॅलीत सहभागी अनेक तरुणी आणि महिलांनी छाप पाडण्यासाठी वेगवेगळे शिरस्त्राण परिधान केले होते. हेल्मेटसोबतच वेगवेगळ्या रंगांचे फेटे, राजस्थानी पगडी घालून महिला या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. सोबतच पुणेरी पगडी, गांधी टोपी, ट्रॅव्हल कॅप, ट्रॅडिशनल रेट्रो कॅप यांचीही कमालीची चलती बाइक रॅलीत बघायला मिळाली. कॅप आणि फेट्यांमुळे प्रत्येकीचा लूक हटके दिसून येत होता.

हटके बाइक्सला पसंती

बाइक रॅलीमध्ये बुलेट, रॉयल एन्फिल्ड, यामाहा आरएक्स १०० या विंटेज बाइक्स आकर्षण ठरत होत्या. त्याचबरोबर रॅलीत सहभागी अनेक तरुणींनी यावेळी स्पोर्टस बाइकला पसंती दिली. कावासाकी निन्जा, यामाहा एफजी, करिझ्मा या बाइक्सवर स्वार होऊन तरुणींनी आपली वेगळी झलक दाखवून दिली. याचबरोबर गॅझेट क्लाउड ही ऑफ रोड बाइकही या रॅलीत आकर्षणाचा विषय ठरली. रोजच्या वापरातील मोपेड, बाइक्ससोबत गीअर बाइक्सचा अफलातून अनुभव घेत सर्वांनी बाइक रॅलीत कल्ला केला.

मराठमोळा तोरा...

नऊवार साडी, डोक्यावर फेटा, गॉगल, कोल्हापुरी चप्पल असा मराठमोळा तोराही यावेळी दिसून आला. बहुतांश महिला, तरुणींनी ही वेशभूषा साकार करून मराठी संस्कृतीचे दर्शन दाखवून दिले. विविधरंगी फेट्यांमधूनही महिलांची विविधतेत एकता यावेळी दिसून आली. महिला सक्षमीकरणासाठी भारतमाता, मदर तेरेसा यांच्या वेशभूषा महिलांनी साकारल्या होत्या. त्याचबरोबर एका चिमुकलीने गीता फोगट या कुस्तीपटूची वेशभूषा करून ‘छोरिया छोरों से कम नहीं’ असा फलक हातात घेऊन सामाजिक संदेश दिला.

नारीशक्तीचा दिला नारा

बाइक रॅली म्हणजे केवळ आनंद, उत्साह असे न माय़ता यापलीकडे सामाजिक जबाबदारीचे भानही महिलांमध्ये दिसून आले. आपल्या गीअर, मोपेड बाइक्स, टी-शर्ट, कॅपवर प्रत्येकीने संदेश लिहून आणला होता. तसेच, रॅलीमध्येही नारीशक्तीचा नारा या महिलांनी दिला. बेटी बचाओचा संदेश देण्यापासून ते सेफ ड्रायव्हिंग, पर्यावरण संरक्षण, सामाजिक विषयांना हात घालणाऱ्या घोषणा या महिला देत होत्या. या संदेशांनी बघ्यांची मने जिंकली.

ग्रुप्समुळे दिसले एकीचे बळ

बाइक रॅलीत आकर्षणाचा महत्त्वाचा भाग ठरला तो महिलांचे विविध ग्रुप्स. या ग्रुपमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीपासून ते पन्नाशी ओलांडलेल्या महिलांचा सहभाग होता. या प्रत्येक ग्रुपने आपले वेगळेपण दाखवून देण्याचा प्रयत्न यावेळी केला. प्रत्येक ग्रुपने आपली एकी दाखवून स्त्रिया सक्षम आणि खंबीर असल्याचे दाखवून दिले. वेगवेगळे ग्रुप्स असले, तरीही महिला सक्षमीकरणासाठी एकत्र येऊन एकीचे बळ महिलांनी दाखवून दिले.


झुम्बा डान्स अन् कौतुक

या रॅलीच्या समारोपाच्या सत्रात झुम्बा डान्स आकर्षण केंद्र ठरला. सहभागी सर्वच महिलांनी झुम्बाच्या तालावर ठेका धरत जोरदार जल्लोष केला. यावेळी रॅलीत सहभागी महिलांचे उत्कृष्ट पोशाख, उत्कृष्ट वाहन सजावट, चांगले सामाजिक संदेश आदी वर्ग करून त्यांच्यातील निवडक महिलांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.


बक्षिसांद्वारे कौतुक...

रॅलीत सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध बक्षिसे यावेळी देण्यात आली. यामध्ये सर्वांत जास्त वय असलेल्या प्रमिला पाटील यांना विशेष बक्षीस देण्यात आले. तसेच, ब्रह्माकुमारी ग्रुपलाही वेशभूषा आणि सामाजिक संदेशाबद्दल बक्षीस देण्यात आले. यावेळी ‘टाइम्स ग्रुप’च्या नाशिक रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


या ठरल्या बेस्ट

बेस्ट वेस्टर्न कॉश्च्युम - जुईली पानसे

बेस्ट ट्रेडिशनल कॉश्च्युम - ईशा कुमावत

बेस्ट डेकोरेटेड हेल्मेट - डॉ. मनीषा रौंदळ

बेस्ट डेकोरेटेड बाइक - दीप्ती पुराणिक

बिगेस्ट ग्रुप - ठेवा संस्कृतीचा ग्रुप

बेस्ट मेसेज - आय अॅक्टिव्ह ग्रुप

---

मान्यवरांकडून दाद

‘महाराष्ट्र टाइम्स’चा हा उपक्रम म्हणजे महिलांसाठी जणू एक पर्वणीच असते. मी तर म्हणेण, फक्त महिला दिनानिमित्त नाही तर विविध कारणांनी महिलांनी एकत्र यावे, जेणेकरून खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरण होईल. ‘महाराष्ट्र टाइम्स’वर्षभर असेच उपक्रम राबवावेत, असे मनापासून वाटते.

- अशोक मुर्तडक, महापौर

महाराष्ट्र टाइम्सची वूमेन्स बाइक रॅली म्हणजे एकप्रकारे नाशिकच्या महिलांसाठी एक सणाचा आणि आनंदाचा माहोल असतो. त्याचमुळे महिलांच्या एकीचे दर्शन आपल्याला घडते. इतक्या महिलांना एकत्र आणण्याचे काम सोपे नसते. भविष्यातही ‘मटा’ने असेच उपक्रम घेऊन महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.

- गुरुमित बग्गा, उपमहापौर

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या इतक्या मोठ्या उपक्रमात सहभागी होऊन खूप छान वाटले. अगदी सर्वच वयोगटांतील सहभागाने महिलांची एकी दिसून आली. अनेक मुली स्वतः सजून आल्या होत्या. काहींनी आपली बाइक सजवली होती, हे बघून महिला कुठेच मागे राहिलेल्या नाहीत हे दिसले.

- मोनिका आथरे, धावपटू

नाशिकच्या मुलींमधील स्पार्क बघता पुढील वर्षी मोपेडपेक्षा गीअर बाइक्सची संख्या जास्त असेल यात शंका नाही. ‘मटा’ बाइक रॅलीच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात. नवीन ओळख होते, अनेकांना नवीन मैत्रिणी भेटतात, सोबतच ऑफीस आणि घरच्या कामातून काही तरी हटके करायला मिळते, हे या वूमेन्स बाइक रॅलीमुळे शक्य होते.

- उत्तरा खेर, माजी मिस फेमिना

--


सहभागींचे बोल...

बाइक रॅलीने आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले असून, सामाजिक संदेश देण्यासाठी व सामाजिक उपक्रमांसाठी ‘मटा’ची वूमेन्स बाइक रॅली’ एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या रॅलीत सर्व महिला एकमेकींची तारीफ करीत प्रोत्साहित करत होत्या. वूमेन्स युनिटीची पॉवर या रॅलीतून नक्कीच सर्वांना समजली आहे.

- जयश्री पेखळे

यंदा बाइक रॅलीत सहभागी होण्याचे दुसरे वर्ष होते अन् पुढील वर्षीही नक्की येणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हायला हवे. बाइक रॅलीमुळे उत्साह दुणावतो हे नक्कीच. बाइक रॅलीत नारीशक्तीचा जल्लोष वाखाणण्याजोगा होता. अनोखा महिला दिन साजरा करता आल्याने ‘मटा’ला खूप धन्यवाद.

- दीप्ती भुतडा

महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीसाठी आधीपासूनच खूप उत्सुक होते. रॅलीचा एकूणच अनुभव खूप छान, रिफ्रेशिंग अन् जबरदस्त होता. रोजच्या धावपळीतून उसंत काढत महिला बाइक रॅली एन्जॉय केली. महिलांसाठी बाइक रॅली क्वचितच असते. वुई आर स्पेशल ही जाणीव नव्याने झाली.

- डॉ. रुपाली खैरे

आम्ही या बाइक रॅलीमधून ब्रेस्ट कॅन्सरबाबतचा सामाजिक संदेश देत रॅली फुल टू एन्जॉय केली. वूमेन्स बाइक रॅलीमुळे आम्हाला एक नवा प्लॅटफॉर्म मिळाला आणि यातून समाजात एक नवी चेतना निर्माण होऊ शकेल. महिलांना एकत्र आणणारे चांगले व्यासपीठ ‘मटा’ने उपलब्ध करून दिले असल्याचे मला वाटते.

- स्नेहल पुराणिक

‘मटा’च्या वूमेन्स बाइक रॅलीमध्ये आम्ही ग्रुपने खूप धम्माल केली. जागतिक महिला दिनानिमित्त बाइक रॅली घेऊन सामाजिक संदेश देण्यासाठी एकत्र आल्याने अभिमान वाटला. महिलांसाठी असे व्यासपीठ कायम उपलब्ध करून देण्यात यावे.

- गौरी मेतकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइकर्णींनी जिंकली मने

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नऊवारी साडी, डोक्यावर फेटा, डोळ्यांवर गॉगल अन् हातात बुलेट, निंजा अशा बलदंड गाड्या... महिला आणि मोपेड यांचे समीकरण मोडीत काढत नाशिककर महिला या गाड्या शिताफीने चालवत ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘ऑल वूमेन्स बाइक रॅली’त सहभागी झाल्या होत्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानापासून ही रॅली काढण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या रॅलीत दिमाखदारपणे बाइक्स चालविणाऱ्या महिलांनी नाशिककरांचा संडे स्पेशल केला.


उत्साहामुळे चैतन्य

मराठीबाणा जपत त्याला दिलेली साहसाची जोड आकर्षक ठरत होती. पारंपरिक पोषाखाबरोबरच लेदर जॅकेट्स, शूज अशा आधुनिक पोशाख केलेल्या महिलादेखील दिमाखाने रॅलीत सहभागी झाल्या होत्या. अठरा वर्षांच्या तरुणींपासून अगदी वयाची साठी पार केलेल्या महिलांच्या उत्साहामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. मोपेड, बुलेट, स्पोर्टस बाइक असो वा मॉडिफाइड बाइक, महिला तितक्याच शिताफीने त्या चालवू शकतात, याचे दर्शनच त्यांनी यावेळी घडवले.


सेल्फीची भुरळ

रॅलीत नऊवारी, पैठणी, फेटा, पगडी यांसह जिन्स अन् टी शर्टपर्यंत विविधांगी ड्रेसकोडमध्ये सहभागी महिला अन् युवतींना सेल्फी घेण्याची भुरळ पडली. काहींनी बाइकवर स्वार होत सेल्फीचा आनंद लुटला. या माहोलमध्ये निमंत्रित पाहुणे असलेले महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांनाही सेल्फीचा मोह आवरला नाही.


पोशाख, संदेश, बाइक्सचे वैविध्य

केवळ मौज म्हणून नव्हे तर अनेकींनी या रॅलीतून सामाजिक संदेशही दिले. ‘हेल्मेट इज माय क्राऊन’, ‘साँसे हो रही है कम, आओ पेड लगाये हम’, ‘महिलाओं को दे शिक्षा का उजियारा, पढ लिखकर करे रोशन जग सारा’ आदी वेगवेगळ्या विषयांवरील प्रभावी सामाजिक संदेशही महिलांनी दिले. अनेकींनी तर वेशभूषादेखील संदेश दर्शविणाऱ्या परिधान केलेल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण रॅलीभर नजर जाईल तेथे पोशाख, संदेश, बाइक्स यांच्यातील वैविध्यच बघायला मिळाले होते. नारी शक्तीचा विजय असो, अशा घोषणा देत आपल्या एकजुटीचे बळही त्यांनी दाखवून दिले. भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानावर पूर्ण झालेल्या या रॅलीच्या शेवटी झुम्बा इन्स्ट्रक्टर प्रज्ञा तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी झुम्बा डान्सचा आनंदही लुटला. बक्षीस वितरणाने रॅलीचा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईपीओएस कार्यान्वयाचे आव्हान

$
0
0

पुरवठा सचिव पाठक यांनी घेतला आढावा; मार्चअखेरपर्यंतचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे स्वस्त धान्य वितरणातील काळाबाजार थांबेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी व्यक्त केला. ही यंत्रणा नाशिक विभागात तीन टप्प्यात कार्यान्वित होणार असून, मार्चअखेरपर्यंत नाशिक जिल्ह्यातही सुरू करा, असे आदेश पाठक यांनी दिले. परंतु, इंटरनेट कनेक्शनसह अनेक अडचणींमुळे हे उद्दिष्ट कसे साध्य करणार याची चिंता पुरवठा अधिकाऱ्यांना सतावू लागली आहे.

पुरवठा विभागाच्या ई-पीओएस या ऑनलाइन प्रणालीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पाठक रविवारी नाशिकमध्ये आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही आढावा बैठक झाली. यावेळी पुरवठा विभागाचे उपायुक्त रघुनाथ गावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके तसेच अन्य जिल्ह्यांचे पुरवठा अधिकारी, धान्य वितरण अधिकारी उपस्थित होते.

पाठक म्हणाले, सरकारी गोदामांमधून धान्याच्या उचलीबाबत ग्रुप एसएमएस केले जातात. यापुढे जाऊन आता कार्डधारकाने किती धान्याची उचल केली, याबाबतचा एसएमएसही त्याला प्राप्त होईल. स्वस्त धान्य दुकानदाराने गोदामातून किती धान्याची उचल केली याची नोंद ई-पीओएस मशिनमध्ये ऑनलाइन केली जाईल. मार्च अखेरपर्यंत बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरीत करता यावे, यासाठी ई-पीओएस मशिनचा वापर सुरू करण्यात आला आहे.

नाशिक विभागात ही प्रणाली तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून ,पहिल्या टप्प्यात नंदुरबारमध्ये ही प्रणाली विकसित करण्याचे आव्हान आहे. दुसऱ्या टप्प्यात जळगाव तर तिसऱ्या टप्प्यात नाशिक, अहमदनगर आणि धुळे या तिनही जिल्ह्यांत ही प्रणाली कार्यान्वित करावी लागणार आहे. तांत्रिक अधिकाऱ्यांचे ई-पीओएस मशिनचे प्रशिक्षण पूर्ण करणे, हे मशिन कार्यान्वित करतेवेळी येणाऱ्या अडचणी दूर करणे, कार्यान्वित रेशन दुकानांची संख्या, एकूण शिधापत्रिकांची संख्या, शिधापत्रिकांवरील सदस्य संख्या इत्यादींचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना आढावा बैठकीत पुरवठा अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

रेशन दुकानदार होणार बँक एजंट

रेशन दुकानदारांवरील अनेक निर्बंधांमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य गमावण्याची भीती वाटू लागली आहे. म्हणूनच बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी (बिझनेस करस्पाँडन्स) म्हणून काम करण्याची संधी रेशन दुकानदारांना केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. बँकेच्या ठेवी गोळा करणे, कर्जदार शोधणे व कर्जवसुलीसारखी कामे ते करू शकणार असून, त्यावर त्यांना मानधन मिळणार आहे.

२५ दिवसांत कशी होणार सेवा सुरू?

ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा मिळत नाही. विभागात नंदुरबार आणि नाशिक हे आदिवासीबहूल जिल्हे आहेत. तेथील अनेक गावांपर्यंत पायाभूत सुविधादेखील पोहोचू शकलेल्या नाहीत. त्यामुळे तेथे अवघ्या २५ दिवसांत इंटरनेट सेवा कशी पोहोच करणार असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. त्याबाबतचा सविस्तर आढावा केंद्र सरकारला सादर केला असून, अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सरकारी स्तरावर सुरू असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारीही मिळाले लर्निंग लायसन्स

$
0
0

आरटीओचे कामकाज सुटीच्या दिवशीही सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक काळात सुटीमुळे नागरिकांची झालेली गैरसोय टाळण्यासाठी पेठरोड येथील नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय रविवारी (५ मार्च) देखील सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे नियोजित वेळी लर्निंग लायसन्स न मिळू शकलेल्या १२५ नागरिकांच्या हाती रविवारी लर्निंग लायसन्स पडले.

निवडणूक काळात आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली होती. उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या वाहनांची तपासणी करून त्यांना परवानगी देण्याची जबाबदारी पार पाडावी लागली. या कामासाठी आरटीओचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी तालुक्याच्या गावांनाही जात होते. त्यामुळे पेठरोड येथील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. २१ फेब्रुवारी रोजी महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी मतदान असल्याने या दिवशीदेखील सुटी देण्यात आली होती.

परिणामी या सुटीच्या कालावधीत ऑनलाइन अपॉईंटमेंट घेणाऱ्या नागरिकांना लर्निंग लायसन्ससाठीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या नागरिकांची परीक्षा घेणे आवश्यक असल्याने संबंधित कामकाज पाहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रविवारी कार्यालयात कामावर यावे, असे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी कार्यालयीन वेळेत लर्निंग लायनस परीक्षा तसेच लायसन वितरणाचे काम सुरू ठेवण्यात आले.

नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन रविवारी कामकाज सुरू ठेवण्यात आले. हा निर्णय आम्ही आमच्या स्तरावर घेतला. १२५ नागरिकांनी लर्निंग लायसन्ससाठी आज ऑनलाइन परीक्षा घेतली.

- भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आवकेमुळे येवला बाजार समिती हाऊसफुल्ल

$
0
0

पुन्हा कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी नाराज

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या काही दिवसांत लाल कांदा आवकने बाजार समित्या गजबजून गेल्या असतांनाच कांदा लिलावासाठी बाजार समिती शुक्रवारी (दि. ३) अगदी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बाजार समितीची वाट धरल्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती अक्षरशः हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसले.

येवला बाजार समितीच्या मुख्य आवारात बाराशेच्या आसपास ट्रॅक्टर्स कांदा लिलावासाठी दाखल झाल्याने आवारात ट्रक्टर्स मावेनासे झाले होते. शनिवारीदेखील कांदा घेऊन आलेल्या पिकअप रिक्षांमुळे बाजार समिती तुडुंब भरली होती. येवल्यात शुक्रवार व शनिवार या दोनच दिवसांत तब्बल ८२ हजार क्विंटलच्या वर लाल कांद्याची आवक झाली.

रविवारच्या (दि. ५) साप्ताहिक सुटीमुळे या शुक्रवारी, शनिवारी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला अन् साहजिकच प्रचंड कांदा आवक झाल्याचे चित्र येवल्यात समोर आले. शनिवारीदेखील पुन्हा भाव पडल्याने कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे चेहरे पडले होते. येवला बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल ५४३ (सरासरी ५००) असा बाजारभाव मिळाला होता. शनिवारी तो किमान ३०० ते कमाल ५२० (सरासरी ४९० रुपये) असा झाला.

दोन लाख क्विंटल आवक

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात शुक्रवारी, जवळपास अकराशे ते बाराशे ट्रॅक्टर्समधून ४० हजार क्विंटल, तर अंदरसूल उपबाजार आवारात सहाशे पिकअप रिक्षांमधून जवळपास १० हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. शनिवारी येवला आवारात सुमारे ९०० पिकअप रिक्षांमधून जवळपास १२ हजार क्विंटल, तर अंदरसूल उपबाजार आवारात ७०० ट्रॅक्टर्समधून सुमारे २० हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. चालू सप्ताहात येवला मुख्य आवार व अंदरसूल उपबाजार आवारात तब्बल एकूण १ लाख ९५ हजार ७३१ क्विंटल इतकी लाल कांद्याची आवक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची चाहूल

$
0
0

पंचायत समितीकडून आराखडा तयार; होळीपूर्वीच टँकरचे प्रस्ताव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

मार्च महिना लागताच त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. होळीपूर्वीच टँकरचे प्रस्ताव येण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात यापूर्वी जानेवारी अखेरपासूनच सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र दोन महिने उशिराने सुरू झाले आहेत. हा परिणाम यावेळेस चांगला पाऊस आणि काही वर्षात जलसंधारणाची झालेल्या कामांमुळे आहे. वर्षानुवर्षे त्र्यंबकच्या काही भागात पाणीटंचाईचे संकट कायम राहिले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच त्र्यंबक पंचायत समितीकडे सोमनाथ नगर, मेटघर किल्ल्याचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरावर व दरी खोऱ्यातील भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो व सरळ वाहून जातो. त्र्यंबक पंचायत समितीने पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या टंचाई आराखड्यात तीन टप्पे करण्यात आले आहे.

या आराखड्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देवगावच्या ढोलेवाडी, लचकेवाडी, खरशेतचे पांगूळघर जांभूळपाडा, सारवण, कसोली, मुरुमहट्टी, शेंद्रीपाडा, सादडपाडा, करंजपाणा, चौरापाडा, वळण सावरपाडा, बोरपाडा, डगळे वाडी, बोरीपाडा, भानसमेट, बोर्डींगपाडा, मेटघर किल्ला आदी २० गावे व ७७ वाड्यांचा समावेश आहे. अद्याप तिसऱ्या टप्प्यातील गावांचे प्रस्ताव आले नसले तरी एप्रिल मे पर्यंत येतीलच. दरम्यान, अशा परिस्थितीत या सर्व पाड्यांवर सध्याला अनेकठिकाणी विंधन विहिरींची उपाययोजना सुचविली आहे. तर ५ गावे ३० वाड्यांना टँकरने व ज्या ठिकाणी टँकर जात नाही तेथे बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार ‘प्रगतीत आहे’, ‘पाइपलाइनचे काम बाकी आहे’, ‘विद्युत पुरवठ्याचे काम बाकी आहे’ असे शेरे मारून वर्षांपासूनचे कामे अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाईवर उपाययोजना केवळ कागदावर न करता त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्र्यंबकेश्वरजवळील ग्रामस्थांसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्यास ही पाणाटंचाई जाणवणार नाही. आणि येणाऱ्या महिन्यांमध्ये पाणाटंचाई भेडसावणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदे वाचवण्यासाठी विकतचे पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळग्रस्त चांदवड तालुक्यात आता कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात विहिरी आटत चालल्याने कांद्याचे पीक वाचवण्यासाठी पैसे देऊन टँकरचे पाणी आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे चित्र आहे.

एकीकडे कांद्याचे भाव कोसळत असताना शेतात लावलेले कांद्याचे पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चांदवड तालुक्यात निमोणसह विविध ठिकाणी विकत पाणी आणून कांद्याला दिले जात आहे. मार्चमध्ये ही अवस्था असल्याने पुढील दोन महिन्यात काय घडणार, या प्रश्नाने शेतकरी काळजीत सापडला आहे. चांदवड तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मार्च महिन्यातच कडाक्याच्या उन्हाने नागरिकांना त्रस्त केले आहे. त्यातच ग्रामीण भागात विहिरी व बोअरवेल आटत चालल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे सध्या निमोणसह तालुक्यात विविध भागात अनेकांनी कांद्याचे पीक घेतले आहे.

उन्हाळ कांद्याची लागवड बऱ्यापैकी आहे. त्या कांद्याला पाणी देण्यासाठी ५०० रुपये देऊन खासगी टँकरने पाणी आणले जात आहे. ज्या शेतकऱ्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर आहे, त्यांना २०० रुपये देऊन पाणी टँकरने आणावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कांद्याला मिळणारा भाव व कांद्यासाठी होणारा खर्च याचा मेळ बसत नसल्याने आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता पाण्यावरील खर्चाने भंडावून सोडले आहे. खर्च किती? पैसे मिळणार किती? आणि उरणार काय? या सर्व प्रश्नांनी शेतकरी ग्रासले आहेत. पुढील दोन महिने कसे काढायचे? या विवंचनेत शेतकरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सॅनिटरी नॅपकिन विक्रीचा प्रस्ताव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या वापरात वाढ व्हावी यासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होण्यासाठी अस्मिता योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. बचतगटांच्या माध्यमातून होणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र असावे, यासाठी विभागीय पातळीवर त्याचे एक मॉडेल नागपूरला प्रायोगिक तत्त्वावर उभारले जाणार असून, त्यानंतर राज्यात सर्वच विभागात ते उभारले जातील. त्याचप्रमाणे या वस्तूंची विक्री करण्यासाठी चीनसारखे कायमस्वरूपी फिरते प्रदर्शन करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बचतगटासाठी असलेल्या आपल्या आगामी योजना सांगितल्या.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांतर्फे विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचतसमूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सव, तसेच विभागीय महिला मेळावा शनिवारी डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर झाला. त्याचे उद््घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. दरम्यान, उत्तर महाराष्ट्राचे विभागीय महिला मेळाव्यासाठी २५ हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती. डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर ३ मार्चपासून सुरू झालेल्या बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीमहोत्सव १० मार्चपर्यंत असणार आहे. बचतगटांना व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. तर विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी, नाशिक विभागात वीस हजारांपेक्षा जास्त बचतगट असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचतगटाच्या उत्पादनांची भूरळ

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डोंगरे वसतीगृहाच्या मैदानावर आयोजित केलेल्या महिला बचत गटांच्या महोत्सवात उत्तर महाराष्ट्रातल्या विभागाच्या पाचही जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या बचत गटांतील महिलांनी विक्रीसाठी अनेक वस्तू ठेवल्या आहेत. पाच मोठ्या मंडपात विभागलेल्या या प्रदर्शनात २५० स्टॉल्सची जिल्हानिहाय उभारणी करण्यात आली आहे. लोणचे, पापड, ढोकळा, डोसा आदी पीठ, हातसडीचे तांदूळ, मूग, मटकीसारखे कडधान्यच एवढेच नव्हे तर कपडे, पर्स, चपला आदी साहित्य देखील इथे विक्रीला आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या लाकडी वस्तू, दैनंदिन विविध पदार्थ, कपडे आदी खरेदी करण्याची संधीदेखील नागरिकांना आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी शासकीय विभागाच्या स्टॉल्सद्वारे विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.

राज्य ग्रमीण जीवनोन्नती अभियानांतर्गत डोंगरे वसतीगृह मैदान येथे १० मार्चपर्यंत विभागीय बचतगट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी आलेल्या बचतगटांमधील महिला सदस्यांमध्ये दिसणारा आत्मविश्वास त्यांचा आर्थिक प्रगतीचा आलेख दर्शवणारा होता. उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून

आलेल्या या महिलांनी बनवून विक्रीसाठी आणलेल्या वस्तू महत्त्वपूर्ण होत्या.

दैनंदिन वापरामधील पदार्थ आणि वस्तूंना विक्रीसाठी ठेवताना गुणात्मक दर्जा आणि कलाकुसरीद्वारे हे प्रदर्शनात सहभागी बचतगट ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. विभागीय प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक प्रगतीची संधी उपलब्ध झाली आहे. खरेदीदारांसाठी ‘पॉस’ मशीन सुविधा, पेटीएमचा वापर करता येईल, असेही येथे स्टॉल आहेत. नाशिकसह मुंबई, नागपूर, पुणे, नंदूरबार, अहमदनगर अशा ठिकाणच्या प्रदर्शनांमध्ये भाग घेणाऱ्यांनी येथे स्टॉल लावले आहेत.


सेंद्रीय गूळला मागणी

सेंद्रीय गूळही येथे विक्रीला असून, दुधाची साय, एरंड तेल यांचा गूळ बनवण्यासाठी वापर केला जातो पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रियेमध्ये कोणत्याही केमिकलचा वापर होत नसल्याने लोक मोठ्या आवडीने हा गूळ घेत असल्याचे पहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images