Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनसेच्या वर्धापन दिनावर पराभवाचे सावट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्याच प्रयत्नात तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता देणाऱ्या नाशिकमध्येच मनसेचे अस्तित्व अवघ्या अकरा वर्षांतच क्षीण झाले आहे. महापालिकेत सत्तेनंतर नाशिककरांनी मनसेला विरोधातही शिल्लक न ठेवल्याने या पराभवाचे सावट पक्षाच्या अकराव्या वर्धापन दिनावर दिसून आले. पक्ष कार्यालयात दिवसभर शुकशुकाट पहायला मिळाला, तर पदाधिकारी मुंबईच्या कार्यक्रमासाठी निघून गेले होते. त्यामुळे मनसेच्या अकराव्या वर्धापन दिनी नाशिकमध्येच पक्ष संपला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशकात पक्ष पुन्हा उभा करायचा असेल, तर राज ठाकरेंना तळापासून पक्षाची पुनर्रचना करावी लागणार आहे.

मनसेची स्थापना झाल्यानंतर पक्षाला सुगीचे दिवस आले ते नाशिकमध्येच. पहिल्याच प्रयत्नात नाशिकमध्ये पक्षाचे बारा नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ नाशिककरांनी तीन आमदार निवडून दिले. त्यानंतर गेल्या महापालिका निवडणुकीत तब्बल ४० नगरसेवकांचे दान मनसेच्या पदरात टाकले होते. त्यामुळे मनसेची राज्यातील पहिली सत्ता ही नाशिकमध्ये आली होती. एकदा भाजप व एकदा आघाडीच्या मदतीने नाशिकमध्ये दोनदा मनसेचा महापौर झाला. त्यामुळे नाशिकमध्ये मनसे हा पक्ष बहरला. राज ठाकरेंच्या पदरात नाशिककरांनी भरभरून दिले. त्याचप्रमाणे नाशिककरांच्या मोठ्या अपेक्षाही उंचावल्या. गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात राज ठाकरेंनी सीएसआरमधून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा विकास नाशिककरांना आवडला नाही. तीन आमदारांच्या पराभवानंतर महापालिकेतही मनसेचा दारुण पराभव झाला. या पराभवाचे सावट मनसेच्या अकराव्या वर्धापन दिनावर दिसून आले.

पक्षाच्या स्थापनेवेळी असलेले सर्व पदाधिकारी पक्षाला सोडून गेेले आहेत.त्यामुळे पक्षाला पुन्हा नाशिकमध्ये उभारी द्यायची असेल तर, कार्यकर्ता ते पदाधिकारी असा नवा पूल बांधावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लेखणीबंद आंदोलन १५ मार्चपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा परिषद व पंचायत समितीत कार्यरत विविध लेखा संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.१५ मार्चपासून लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने दिला आहे. हे आंदोलन संपूर्ण राज्यभरात राज्याध्यक्ष विजयसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात कर्मचारी संघटनेकडून आज (दि. १०) ते मंगळवार (दि. १४) या कालावधीत काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रेड पे, पदोन्नती कोटा वाढ करणे, राजपत्रित दर्जा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनास विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. वारंवार मागणी व पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तींना राज्य सरकारने प्रोत्साहन देऊ नये, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे.

कागदाच्या लगद्यापासून प्रदूषण होत नाही, असा अपप्रचार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आला होता. त्याचा प्रभाव पडून राज्य सरकारने ३ मे २०११ या दिवशी काढलेल्या पर्यावरण विभागाच्या ‘सणांचे पर्यावरणपूरक साजरीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना’, या आदेशात ठिकठिकाणी ‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती यांना प्रोत्साहन मिळावे, अशा प्रकारच्या मूर्ती सर्वत्र उपलब्ध व्हाव्यात यांसाठी पुढाकार घ्यावा अथवा त्यांना विशेष सवलत द्यावी’, असे नमूद केले होते. हा निर्णय चुकीचा आहे, असा निकाल राष्ट्रीय हरित लवादाने दिल्याची माहिती हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दिली.

माहिती अधिकारात काढलेल्या माहितीमध्ये शासन निर्णय काढताना कोणताही अभ्यास करण्यात आलेला नव्हता, हे पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ या दोहोंनीही मान्य केले होते. त्यानंतर सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने साधा कागद पाण्यात टाकून आणि त्यानंतर मुंबईतील ‘रसायन तंत्रज्ञान संस्था’ यांनी ४ कागदी लगद्यापासून बनलेल्या मूर्ती घेऊन या विषयाचे संशोधन केले.

रसायन तंत्रज्ञान संस्थेने सांगितले की दहा किलो कागदी मूर्तीमुळे एक हजार लिटर पाणी प्रदूषित होऊ शकते. या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅडमियम, टायटॅनिअम ऑक्साइड असे अनेक विषारी धातू त्यात मिळून आले.

डॉ. सुब्बाराव यांनी या प्रकरणात संशोधन करताना डिस्ट‌िल्ड वॉटरमध्ये कागद विरघळवून प्रयोग केला होता. कागद विरघळवलेल्या या पाण्यात ऑक्सिजनची मात्रा शून्यावर आल्याचे त्यांच्या प्रयोगात स्पष्ट झाले.

कागदाचा लगदा पाण्यात गेल्यावर त्याचे बारीक कण होतात. मासे त्यांच्या कल्ल्यांद्वारे श्‍वसन करीत असतात. हे कागदी लगद्याचे बनलेले बारीक कण या कल्ल्यांमध्ये अडकून त्यांच्या श्‍वसनप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असेही निदर्शनास आले आहे.

अंनिससारख्या संस्थांच्या सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात, जेणेकरून शासनाला पुन्हा तोंडघशी पडावे लागणार नाही, असे आवाहनही हिंदू जनजागृती समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना राहणार तटस्थ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेला भाजपला स्पष्ट कौल दिला असल्याने आम्ही निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची घोषणा शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. शिवसेना पालिकेत प्रबळ विरोधी म्हणून भूमिका बजावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेनेही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपचा विजय सोपा होणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याने नाशिकमध्ये शिवसेना भाजपला पाठिंबा देईल अशी चर्चा होती. भाजपलाही तेच अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. त्यामुळे भाजपसोबत न जाता तटस्थ भूमिका घेतल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले. सकाळी शिवसेनेने नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांची मते जाणून घेतली. जनतेने विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला असल्याने भाजपसोबत फरफटत न जाता विरोधी पक्ष म्हणून काम करायचे. तसेच, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सोबत न जाता महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मनसेही विरोधातच

गेल्या वेळी पालिकेत सत्तेत असलेल्या मनसेचे आता अवघे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने त्यांना मनसेच्या पाठिंब्याची गरज नाही. मनसेकडून गेल्या वेळची उतराई म्हणून भाजपला पाठिंबा देण्याचा विचार सुरू होता. मात्र, मुंबई महापालिकेत मनसेने मतदानावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिकमध्येही आम्ही तटस्थ राहणार असल्याची घोषणा मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी दिली आहे. महापालिकेत मनसे विरोधकांसोबत प्रबळ विरोधकाची भूमिका बजावणार असल्याचे शेख यांनी सांगितले. भाजपने मनसेला चुचकारले नसल्यानेच मनसे विरोधात गेल्याची आता चर्चा आहे.

अपक्ष शिवसेनेच्या गोटात?

महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. दोघांचा प्रवेश तर निश्चित झाला असून, एकासोबत शिवसेनेची बोलणी सुरू आहे. निवडणुकीत विश्वासात न घेतलेले आरपीआयचे एकमेव नगरसेवकही शिवसेनेच्या गोटात जाण्याच्या तयारीत आहे. भाजपसोबत जावून काहीच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने अपक्षांनी आता शिवसेनेच्या गोटात जाऊन एकादे पद पदरात पाडून घेण्याचा आटापीटा अपक्षांनी सुरू केला आहे. तीन अपक्षांपैकी दोन अपक्षांनी शिवसेनेसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तर एका अपक्षासोबत चर्चा सुरू आहे. आरपीआयच्या एका सदस्यालाही आपल्या गटात घेण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. किमान स्थायी समिती सदस्य पद तरी मिळेल यासाठी अपक्षांचा खटाटोप सुरू आहे. भाजपसाठी हा मोठा झटका असणार आहे. ‌‌शिवसेनेसोबतच्या घरोब्याबाबत अपक्षांचा शुक्रवारी निर्णय होणार असल्याचे समजते.

पारदर्शक कारभारावर लक्ष ठेवणार

निवडणुकीत भाजपला जनाधार मिळाला असल्याने आम्ही तटस्थतेची भूमिका घेतली असल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले. आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावणार असून, महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवार देणार नाही. विरोधकांची मोट बांधून शिवसेनेचे ३५ शिलेदार भाजपच्या पारदर्शक कारभारावर लक्ष ठेवणार असल्याचेही बोरस्ते यांनी स्पष्ट केले. येत्या काळात सभागृहात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना दिसून येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन नाशिक’चा ढोल मुंबईत

$
0
0

नाशिक

नाशिक दत्तक घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर महापालिकेत आलेल्या सत्तेमुळे ‘मेक इन नाशिक’च्या संकल्पनेला मोठे बळ मिळाले आहे. सरकारी यंत्रणा त्यासाठी झटून कामाला लागल्या आहेत. मे महिन्यात मुंबईमध्ये होणाऱ्या सोहळ्यात तब्बल दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबईत मेमध्ये होणाऱ्या ‘मेक इन नाशिक’ कार्यक्रमात नाशिकचे औद्योगिक महत्व सांगण्यासाठी एमआयडीसीने प्रेझेन्टेशन तयार केले असून, त्यात जिल्ह्याची वैशिष्ट्ये व इतर माहिती देण्यात आली आहे. अद्याप यावर बरेच काम बाकी असले तरी प्राथमिक प्रेझेन्टेशनचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे.

जगभरातील उद्योजकांना नाशिकचे महत्त्व सांगण्यासाठी हा कार्यक्रम मेमध्ये मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये होणार आहे. दोन दिवसांचे नियोजन असलेल्या या कार्यक्रमाचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले असून, यात सर्व मोठ्या उद्योजकांना आमंत्रित करण्यात येणार असल्यामुळे शासकीय पातळीवरही या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांनी पाठ फिरवल्यामुळे उद्योग क्षेत्र चिंतेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठे उद्योग सुरू व्हावेत व १० हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक व्हावी, असे टार्गेट ठरवत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उद्योजकांची संघटना असलेल्या ‘निमा’ने पुढाकार घेतला असून, त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे.

एमआयडीसीने केलेल्या या प्रेझेन्टेशनमध्ये जिल्ह्यात उद्योगासाठी येवला, मालेगाव, सिन्नर, दिंडोरी या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा, रोड, रेल्वे व एअर कनेक्ट‌िव्हीटी, पाणी व विजेची उपलब्धता, उपलब्ध कामगार, वातावरण व धार्मिक क्षेत्राची माहिती यात असणार आहे. त्यात औद्योगिक माहितींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रेझेन्टेशन सर्वांना आकर्षित करणारे ठरावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे यात महसूलच्या मोठ्या अधिकाऱ्यांनीही लक्ष घातले आहे.

मुंबईत मेमध्ये ‘मेक इन नाशिक’चा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी हे प्रेझेन्टेशन तयार केले असून, त्यात अधिकाधिक गोष्टी सर्वांना कळाव्यात यासाठी विशेष काम केले जात आहे.

-हेमांगी पाटील-भामरे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात सुकेणेचे दोघे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कसबे-सुकेणे ते निफाड कारखाना रस्त्यावर बुधवारी सायंकाळी झालेल्या कार अपघतात सुकेणे येथील वस्तीवर राहणाऱ्या दोन युवकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या दोघांची मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली. या अपघातात इतर दोघे जखमी आहेत.

कसबे-सुकेणे येथील निफाड साखर कारखाना रस्त्यावर ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्टो कार (एमएच ०२ एके ७७२६) कारखान्याकडून वस्तीकडे भरधाव जात असतांना चालक सागर संजय वाघ (वय २३) याचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्यावर पलटली आणि १०० फूट फरपटत गेली. यात चालक सागर, शेजारी बसलेला रवींद्र एकनाथ पैठणे (वय २२) या दोघांना जबर मार बसला. कसबे सुकेणे येथील आरोग्य केंद्र आणि निफाड उप-जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. कारमध्ये मागे बसलेले अन्य दोघे जण (नाव समजू शकले नाही) किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, ही घटना समजल्यानंतर अपघातातील मयतांच्या घराशेजारी राहणारे माधव खेताडे (वय ६२) यांना धक्का सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे कसबे-सुकेणेत शोककळा पसरली. घराशेजारी राहणारे तरुण मुले गेल्याचे कळताच खेताडे यांना मोठा धक्का बसला. पोल‌िस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहाय्यक पोल‌िस उपनिरीक्षक आर. बी. मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत युवक हे द्राक्ष बागांमध्ये मजुरी करत होते. यातील सागर वाघ विवाहित आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी बापुरावांचा उलटा पायी प्रवास

$
0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

गेले काही दिवस मराठा आरक्षणासाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने निघणारे समाजबांधवांचे मोर्चे लक्षवेधी ठरले आहेत. मोर्चे निघूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही. आरक्षणाच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘त्या’ अवलियाने मात्र अनोखा मार्ग अवलंबला आहे. पुणे येथील ५७ वर्षीय बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी पुणे ते दिल्ली उलटा पायी प्रवास सुरू केला आहे. या अनोख्या प्रवासादरम्यान बापूराव झोडगे गावी मुक्कामाला आले होते.

वेगवेगळ्या कारणासाठी पायी प्रवास करणारे अनेकांनी पहिले असतील. परंतु, मराठा आरक्षणासाठी उलटा पायी प्रवास करणारे बापूराव मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चात ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा चांगलीच लोकप्रिय ठरली. याच घोषणेने बापूराव प्रभावित झाले आहेत. ५ मार्च रविवार ते झोडगे येथे मुक्कामी आले होते. झोडगे येथील तरुणांना त्यांच्या या प्रवासाची माहिती सोशल मीड‌ियावर मिळाल्याने त्यांना भेटण्यासाठी सगळेच उत्सुक होते. त्यांनी मराठा आरक्षणासोबत विविध विषयांवर आपले मते व्यक्त केले.

लक्षवेधी वेशभूषा

गुंड यांनी परिधान केलेली वेशभूषा देखील लक्षवेधी आहे. जाडजुड पिळदार मिशा, डोक्यावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला टोप, कळ्यात लाल तबकडी माळा, हातात भगवा झेंडा, अंगात खास आरक्षणाच्या संबंधी विविध मागण्या असलेला टी शर्ट असा हटके लूक आहे.

मराठा आरक्षणाबाबत पायी प्रवास करण्याचे मनात होते. परंतु, मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा उलटा पायी प्रवास सुरू केला आहे. या प्रवासा दरम्यान गावागावात स्वागत होत आहे. लोकांशी संवाद साधला की ऊर्जा मिळते.

- श्रीपतराव गुंड

असा आहे प्रवास…

पुणे ते दिल्ली १ हजार १०० किमीचा प्रवास

२२ फेब्रुवारीपासून फुरसिंगी येथून प्रवासाला सुरुवात

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत केंद्र सरकारला निवेदन देणार

पुणे ते झोडगे ४०० किमीचा टप्पा १५ दिवसात केला पार

साधारण ५० दिवसात दिल्लीला पोहचण्याचे लक्ष

दिवसभरात २५ किमी अंतर चालतात

रस्त्यावरील गाव, वस्ती कुठेही मुक्काम करतात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटकेनंतर जवान चंदू उद्या धुळ्यात येणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। धुळे

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून सुटका होऊन आपल्या मायदेशी परतलेला '३७ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण तब्बल दीड महिन्यांनंतर म्हणजेच उद्या, शनिवारी धुळ्यातील आपल्या बोरविहिर या गावी येणार आहे. आपला चंदू गावी येणार हे समजताच त्याचे कुटुंबीय आणि गावकरी यांना एखादा सण असल्यासारखे वाटत आहे. त्यांनी जवान चंदूच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. जवान चंदू ज्या मार्गाने गावात प्रवेश करेल तो मार्ग रांगोळीने सुशोभित करण्यात येणार आहे. शिवाय त्याचे औक्षणही करण्यात येणार आहे.

याबरोबर, बोरविहिर गावच्या महिला मंडळींनी जवान चंदूच्या आवडीच्या जेवणाचा खास बेत देखील आखला आहे.

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी जवान चंदू चव्हाण नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानाच गेला होता. चंदूला भारताच्या ताब्यात देण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. चंदूच्या सुटकेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ. सुभाष भामरे काही कारणास्तव धुळ्यात येऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीस्वार तरुण अपघातामध्ये ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगातील दुचाकीसमोर कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर, अन्य एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही शरणपूररोडवरील राजीव गांधी भवन जवळ घडली. जखमी विद्यार्थ्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघात गुरुवारी मध्यरात्री घडला.

सागर नारायण कडभाने (२४, रा. रामनगर, सायखेडा, ता. निफाड) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचा देवेन माळी हा मित्र जखमी झाला आहे. गंगापूररोडवरील मोतीवाला कॉलेजचे हे दोघे विद्यार्थी आहेत. गुरूवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास सीबीएसकडून शरणपूररोडमार्गे ते दुचाकीने (एमएच ४६ एएल ५४१६) कॅनडा कॉर्नरकडे येत असतांना ही दुर्दैवी घटना घडली. राजीव गांधी भवन परिसरातील तनिष्क शोरूमसमोर त्यांच्या भरधाव दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा गेल्याने अपघात घडला. यामुळे भरधाव वेगातील दुचाकी दुभाजकावर आदळली आणि हेल्मेट परिधान न केलेले सागर कडभाने व त्याचा मित्र देवेन माळी दूरवर फेकले गेले. कडभानेच्या डोक्यासह इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्यात. अतिरक्तश्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला. माळी देखील गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास उपनिरीक्षक धर्मेंद्र माळी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदू चव्हाण आज धुळ्यात परतणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या कचाट्यातून सुखरूप परतलेला धुळ्याचा जवान चंदू चव्हाण आज, शनिवारी धुळ्यात परतत आहे. चंदू गावी येतोय असे कळताच संपूर्ण खान्देशमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

चंदूला पाकिस्तानच्या सैन्याने पकडले असे कळताच मानसिक धक्का बसून त्याची आजी लिलाबाई यांचे निधन झाले. मात्र चंदू परत येणार की नाही याविषयी खात्री नसतानाही त्याचा भाऊ, आजोबा यांनी चंदूच आजीच्या अस्थींचे विसर्जन करेल असे ठरविले होते. त्यानुसार आता उद्या, रविवारी चंदूच्या हस्ते आजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे, असे चंदूचा भाऊ भूषण चव्हाण याने सांगितले.

भारतीय सैन्यदलाच्या प्रयत्नांमुळे ३७, राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू सुखरूप भारतात परतला. तब्बल नऊ महिन्यांनंतर तो शुक्रवारी सायंकाळी दिल्ली येथून विमानाने भाऊ भूषणसह इंदूर येथे आणि तेथून कारने बोरविहीर गावी परतणार आहे. आज दुपारपर्यंत चंदू धुळ्यात पोहोचेल. त्यानंतर गावामध्ये त्याची मिरवणूकही काढण्यात येणार आहे.‍

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदाराला गंडविण्याचा प्रयत्न

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सनद घेतलेली नसताना वकिली करून सामान्यांना गंडा घालणाऱ्या तोतया वकिलाच्या अटकेनंतर अनेक कारनामे समोर येत आहे. तोतया वकिलाने काही वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक व विद्यमान आमदार सीमा हिरे यांनाही याचिका मागे घेण्यासाठी ब्लॅकमेल करीत तब्बल ५० ते ६० लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी आमदार हिरे यांच्या तक्रारीनुसार, गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, यामुळे खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब अनंत चौधरी उर्फ गोपाळ अनंत अडावदकर (रा. मंदार सोसा., गोळे कॉलनी) असे संशयित तोतया वकिलाचे नाव आहे. वकिलीची पदवी नसताना चौधरीने जिल्हा तसेच हायकोर्टात व्यवसाय करीत असल्याचे चित्र रंगवून ज्येष्ठ वकिल रमेश बाफना यांना लाखो रुपयांना गंडविले आहे. अनेक वर्षे मालमत्तेच्या वादात बाफना यांचे हायकोर्टात चौधरीने काम पाहिले. या काळात त्याने बाफना यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. चौधरीची तोतयागिरी लक्षात आल्यानंतर अ‍ॅड. बाफना यांनी त्याच्या पदवीवर आक्षेप नोंदवित कायदेशीर लढा सुरू केला. यात चौधरीचे पितळ उघडे पडले. कोर्टाने त्याच्या वकिलीस प्रतिबंध घालून अटक करण्याचे आदेश सरकारवाडा पोलिसांना दिले होते. सध्या चौधरी नाशिकरोड कारागृहात आहे. दरम्यान चौधरीचा पर्दाफाश झाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये चौधरीविरोधात फिर्याद दिली.

२०१२ मध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत असललेल्या हिरे यांच्या समर्थ महिला मंडळाविरोधात चौधरीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. जागेच्या वापराबाबत हा मुद्दा होता. या याचिकेत चौधरीने निवृत्त आयकर आयुक्त, नवी दिल्ली व लिगल प्रॅक्टीशिनल असल्याची नोंद नमुद करून याचिका मागे घेण्याच्या बदल्यात ५० ते ६० लाख रुपयांची लाच मागितली होती. ही जनहित याचिका अद्यापही हायकोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, चौधरीला कोणतेही अधिकार नसताना फसवणुकीच्या दृष्टीकोनातून त्याने संपर्क साधल्याचे समोर आल्याने आमदार हिरे यांनी गंगापूर पोलिसांकडे फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदेश पातळीकडे सर्वांच्या नजरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेत प्रमुख राजकीय पक्षांनी स्थानिक युती व आघाडी करून सत्ता स्थापनेचे मनसुबे आखले असले तरी प्रदेश पातळीवर होणाऱ्या निर्णयामुळे त्यांना ब्रेक लागला आहे. राज्य पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपाने व शिवसेनेबरोबर प्रदेश पातळीवर युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात काय निर्णय होतो यावरच जिल्हा परिषदेच्या सत्तेचा मार्ग सुकर होणार आहे.

जिल्हा परिषदेसाठी प्रदेश पातळीवर होणाऱ्या निर्णयामुळे सर्वांचा तूर्त तरी सर्वांचा गोंधळ वाढला आहे. शिवसेनेची या संदर्भात बुधवारी मुंबईत बैठक झाली असून अद्याप चर्चाच सुरू आहे.तर भाजपाच्या तीन बैठका जिल्हा परिषदे संदर्भात झाल्या आहे. आता अंतिम निर्णय घेण्यासाठी एक बैठक होणार आहे. त्यानंतर राज्याबरोबरच नाशिकचे चित्र स्पष्ट होणार आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेने काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या तर भाजपने राष्ट्रवादी बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे आखले. पण या सर्व पक्षाच्या या हालचालीला तूर्त प्रदेश पातळीमुळे ब्रेक लागला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ सदस्यांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य निवडून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे १८, भाजप १५, काँग्रेस ८, माकप ३, अपक्ष ४ सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनासाठी ३७ मॅजिक फिगर लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेने आपल्या २५ सदस्याबरोबर काँग्रेसचे ८ सदस्य बरोबर घेऊन अपक्ष व माकपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. तर दुसरीकडे भाजपने आपल्या १५ सदस्याबरोबर राष्ट्रवादीचे १८ सदस्य बरोबर घेऊन अपक्षांशी बोलणी पूर्ण केली. त्यामुळे ऐनवेळी प्रदेश पातळीवर स्थानिक नेत्यांना अधिकार दिल्यास ही आघाडी व युती प्रत्यक्षात येणार आहे. राज्यात काही ठिकाणी शिवसेना व भाजपला एकमेकांची गरज आहे. आघाडीचीही तशीच स्थिती आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवर होणारे निर्णय भाजप-शिवसेनेला एकत्र करणारा असला तरी राष्ट्रवादी व काँग्रेसची अडचण होणार आहे. शिवसेनेला मात्र निर्णय काही झाला तरी सत्ता स्थापनेची संधी आहे.

पंचायत सभापतीची मंगळवारी निवड
जिल्ह्यात आघाडी व युतीच्या हालाचील सुरू असून १५ पंचायत समितीतही सभापतीच्या हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक तालुक्यातील तेथील राजकीय समीकरण लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे तूर्त ठरले आहे. येत्या मंगळवारी (दि. १४) या निवडणुका होणार असून प्रत्येक तालुक्यात पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार असणार आहे.

स्थानिक पातळीवर आम्ही तयारी केली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख काय निर्णय देतात त्यावर सर्व अवलंबून आहे. त्यांच्याकडून निर्णय झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली गतिमान होतील.
- दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री

जिल्हा परिषदेची सर्व जबाबदारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे. याबाबत रविवारी (दि. १२) चित्र स्पष्ट होईल. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, त्यावर सर्व अवलंबून आहे.
- दादा जाधव, जिल्हाध्यक्ष भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरणारा फरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरगुती सिलिंडरमधील गॅस अवैधरित्या वाहनात भरीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता संशयित रिकामी व भरलेले सिलिंडर तसेच मशिनरी सोडून फरार झाल्याची घटना बागवानपुरा भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, १४ हजाराच्या साहित्यासह घटनास्थळी उभी असलेली शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी मारुती व्हॅन पोलिसांनी जप्त केली आहे.

बागवानपुरा येथील सार्वजनिक ठिकाणी घरगुती सिलिंडरमधून वाहनात अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी पोलिसांनी छापा मारला. मात्र, पोलिस येत असल्याचे समजताच संशयित फरार झाला. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या रिकाम्या व भरलेल्या टाक्या, इलेक्ट्रिक मोटार, लोखंडी टॉलवर मशिन असे वाहनात गॅस भरण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. सुमारे १४ हजार रुपयांच्या या मुद्देमालासह घटनास्थळी उभी असलेली शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी मारुती व्हॅन पोलिसांनी जप्त केली. या व्हॅनच्या मालकाचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लांडे करीत आहेत.

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ
नाशिकरोड उड्डाणपूल येथे काही महिन्यापूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी व्हॅन गॅस लिक झाल्याने जळून खाक झाली होती. सुदैवाने चालकाला विद्यार्थ्यांना वेळीच व्हॅनमधून बाहेर काढता आले. यानंतर, पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाने अनधिकृत गॅस कीट वा इंधन वापर करणाऱ्या चालकांना रडारवर घेतले. मात्र, ही कारवाई थंडावताच पुन्हा अलबेल झाल्याचे चित्र बागवानपुरा येथील कारवाईमुळे समोर आले आहे. भद्रकाली पोलिस जप्त केलेल्या स्कूल व्हॅनच्या मालकाचा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिकाऊ मेकॅनिक सुसाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शिकाऊ मोटार मेकॅनिककडून अनियंत्रित झालेली बस पंचवटी डेपोतील वाहन परीक्षक कक्षात शुक्रवारी शिरली. या अपघातात पाच जण जखमी झाले. यातील एकास जबर मार लागला आहे. दरम्यान, बस चालविणारा संबंधित मेकॅनिक फरार झाला असून त्याचा उशिरापर्यंत तपास लागला नव्हता.

पंचवटी डेपोत शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. डेपोतील वाहन परीक्षक कक्षात सकाळी साडेनऊच्या सुमारास अरविंद राजे, नानासाहेब पाटील, सतीश कोळी हे आपापली कामे करीत असताना शिकावू मोटार मेकॅनिकने दुरुस्तीसाठी आलेली बस (एमएच १५ एके ८०७१) चालविण्याचा प्रयत्न केला. त्याला मुळात बसचा चालविण्याचा अनुभव नव्हता. तरीही तो बस सुरू करायला गेला. यावेळी सुरू केलेल्या बसवर त्याला नियंत्रित मिळविता आले नाही. वेगाने निघालेली बस थेट समोर असलेल्या वाहन परीक्षक कक्षाला थेट जाऊन धडकली. बसचा आघात इतका जबरदस्त होता की यात पक्के बांधकाम असलेल्या वाहन परीक्षक कक्षाची भिंत कोलमडून पडली. तसेच या कक्षाशेजारीच उभी असलेली मोपेड गाडी या भितींखाली दबली गेली.बसची पुढील काच फुटली. वाहन परीक्षक अरविंद राजे, नानासाहेब पाटील, वाहन नियंत्रक सतीश कोळी, चालक सुनील शिंदे आणि भास्कर साळवे हे पाच जण जखमी झाले. यापैकी राजे यांना जबर मार लागला असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्वरित हलविण्यात आले. अपघाताची बातमी परिसरात वेगाने पसरली. त्यामुळे अनेकांना पंचवटी डेपोमध्ये गर्दी केली. अपघातानंतर शिकाऊ मोटार मेकॅनिकने तेथून पळ काढला. तो अद्याप सापडला नव्हता.

मेकॅनिकचे नाव कळेना!
शिकाऊ मोटार मेकॅनिकचे नेमके नाव काय? तो मूळ कुठला? तो किती दिवसांपासून पंचवटी डेपोमध्ये गाड्या दुरुस्तीचे काम करतो? याबाबत कोणतीही माहिती सायंकाळी उशिरापर्यंत एसटी महामंडळाकडून देण्यात आली नाही. विशेष म्हणजे पोलिसांकडेही माहिती नव्हती. त्यामुळे या प्रकरणी लपवाछपवी तर केली जात नाही ना, अशी एसटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

बाहेर अपघात झाला तर आम्ही तातडीने कारवाई करतो. पण हा अपघात आमच्याच डेपोमध्ये झाला आहे. त्यामुळे अंतर्गत विषय असल्याने घटनेची अगोदर चौकशी केली जाईल. कोणी व्यक्ती दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल. बस दुरुस्तीसाठी डेपोत आलेल्या बसकडून हा अपघात झाला आहे.
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंग होमवर पालिकेची वक्रदृष्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्यभरातील सर्व नर्सिंग होम व खासगी रुग्णालयांच्या परवानग्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने जाब विचारल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. मॅटर्निटी, नर्सिंग होम व हॉस्प‌िटल्स चालवण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून परवाना नूतनीकरण करणे आवश्यक असतानाही शहरातील तब्बल ३८३ हॉस्प‌िटल्सनी नूतनीकरण केलेले नाही. पालिकेच्या वैद्यकीय विभागानेच ही आकडेवारी जाहीर केल्याने ही हॉस्प‌िटल्स बेकायदा सुरू असल्याचे समोर आले आहे.
शहरातील ५६६ मॅटर्निटी, नर्सिंग होम व हॉस्प‌िटल्सपैकी केवळ १८३ जणांकडेच परवाना आहे. २७१ हॉस्पीटल्सनी परवानगीसाठी अर्ज केले असले तरी, वैद्यकीय विभागाने त्यांना अद्याप परवाना दिलेला नाही. विशेष म्हणजे १५३ हॉस्पीटल्सनी अद्याप नूतनीकरणासाठी अर्जच केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागासह हॉस्प‌िटल्सची बेफिकीरी समोर आली आहे.
राज्यातील अनधिकृत मॅटर्निटी, नर्सिंग होम्स व हॉस्प‌िटल्सच्या परवानगीसंदर्भात पुण्यातील अतुल भोसले यांनी अॅड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी ती दाखल करून सरकारचा राज्यातील किती हॉस्पिटल्स परवानाधारक आहेत, याची आकडेवारी कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. म्हैसाळ येथील घटनेनंतर या परवानग्यांचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग जागा झाला आहे. मुंबई शुश्रृषागृहे अधिनियम, १९४९ व सुधारीत नियम, २००६ अन्वये महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेली रुग्णालये व प्रसुतीगृहांना नर्सिंगहोम रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. दर तीन वर्षांनी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
वैद्यकीय विभागाने शुक्रवारी शहरातील मॅटर्निटी, नर्सिंग होम्ससह हॉस्प‌िटलच्या नूतनीकरणाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात शहरात ५६६ एकूण हॉस्पीटल्स असून, त्यात १८२ मॅटर्निटी होम व ३८४ हॉस्प‌िटल्स आहेत. परंतु, १८२ मॅटर्निटी होमपैकी १०५ मॅटर्निटी होमनीच नूतनीकरण केले आहे. ७७ मॅटर्निटी होम हे नूतनीकरणाविना सुरू आहेत. ३८४ हॉस्प‌िटल्सपैकी केवळ ७८ हॉस्प‌िटल्सनीच आपला परवाना नूतनीकरण केला आहे. ३०६ हॉस्प‌िटल्स विनापरवाना सुरू आहेत. नूतनीकरण केलेल्या ३८३ पैकी २३० हॉस्पिटल्सनी नूतनीकरणासाठी अर्ज केले असून, ते पाइपलाइनमध्ये आहेत. १५३ हॉस्प‌िटल्सनी अद्याप अर्जच केलेले नाहीत.
फायर अॅक्टची अडचण
दरम्यान, परवान्यांच्या नूतनीकरणाला नवा फायर सेफ्टी अॅक्ट कारणीभूत ठरला आहे. कोलकाता येथील दुर्घटनेनंतर आलेल्या या अॅक्टमध्ये हॉस्प‌िटल्सच्या परवानग्या अधिक कडक करण्यात आल्या असून, त्यात २० हजार लिटर पाण्याची टाकी, रस्ता रुंदीसह अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. त्या अटी बहुसंख्य हॉस्प‌िटल्सना पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे काही जणांनी कोर्टातही धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकमध्ये मिशन वसुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेने शुक्रवारी सायंकाळपासून विविध मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कर थकीत असलेल्या अनेक इमारती सील करण्यात आल्या. या धडक मोहिमेने थकबाकीदार धास्तावले आहेत.

नगरपरिषदेने यापूर्वी नोट‌िसा बजावल्या होत्या. त्यानंतर सार्वजन‌िक ध्वनीक्षेपकावरून ८ मार्चपर्यंत बाकी भरण्यासाठी अखेरची मुदत दिली होती. ध्वनीक्षेपकावरून कर थकीत मालमत्ताधारक, भाडे थकीत असलेले व्यवसाय‌िक गाळेधारक यांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे थकबाकीदारांची झोप उडाली. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा असल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात ध्वनीक्षेपकावरून नावे उच्चारणे थांबविले होते.

नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे विभागीय कार्यालय येथील टिळक संकुल इमारतीत आहे. त्यांनी गाळा भाडे भरलेले आहे. मात्र, घरपट्टी भरलेली नाही म्हणून त्यांचे गाळे सील करण्यात आले.
याचसोबत वाणी धर्मशाळा, लाडशाखीय धर्मशाळा, गाडेबाबा धर्मशाळा यांनाही कारवाईस सामोरे जावे लागले. सार्वजन‌िक ध्वनीक्षेपकावरून तसे घोष‌ितदेखील करण्यात आले.

दोन हजार ६३९ मोठे थकबाकीदार

शहरात २ हजार ६३९ मोठे थकबाकीदार आहेत. यामध्ये ५० हजारांपेक्षा जास्त बाकी असेलेल्यांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. यापुढे त्प्रमुख चौकात नावांचे फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. आदिवासी सेवा सम‌िती, गजानन महाराज संस्थान, स्वामी समर्थ सेवेकरी इमारत अशा संस्थांकडे लाखोंचे कर थकले आहेत. त्यासोबत शैलेश शाह, सानपंत निंबेकर, युवराज कदम, दिनकर सूयर्वंशी अशी काही टॉप थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेल्वेच्या सहकार्याने योजना मंजूर करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शहरासाठी करंजवण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करताना, जीवन प्राधिकरण विभागाला निधी देताना शहराचा घटक असलेल्या रेल्वे विभागालाही या योजनेत सामावून घेण्यात यावे. तसेच रेल्वेच्या सहकार्याने वरील योजना मार्गी लावण्याचा निर्णय मनमाड पालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पद्मावती धात्रक होत्या. या सभेत मनमाड पालिकेच्या नवीन फिल्टर प्लांटला स्वयंचलित यंत्रणा बसवणे, पाणीपुरवठा विभाग व पथदिवे संदर्भात आवश्यक कामांना मंजुरी देणे, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून पाणी पुरवठाविषयक कामे करणे या कामांना मंजुरी देण्यात आली. मनमाड येथे दर्ग्याचे अतिक्रमण काढताना पालिका प्रशासनाने नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप विरोधी गटाचे नगरसेवक कैलास पाटील अमजद पठाण नगरसेविका रुपाली पगारे यांनी केला तसेच अतिक्रमण काढताना प्रशासनाकडून नगरसेवकांची नावे का सांगितली जातात असा सवाल उपस्थित केला. यावेळी सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी पालिका प्रशासनाची भूमिका मांडत काही मुद्द्यांचे खंडन केले. यावेळी अतिक्रमणे नवीन पुतळे कचरा व्यवस्थापन या विषयी चर्चा झाली. नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, प्रमोद पाचोरकर, महेंद्र शिरसाठ, मयुर बोरसे यांनी चर्चेत सहभाग घेतला. बायोगॅसपासून वीज निर्मिती हा विषय स्थगित ठेवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना घरे ‌मिळाली, ना गुन्हा दाखल झाला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घरखरेदी केल्यानंतर जीवन सार्थक होण्याचा आनंद कुटुंबाला मिळतो. गरीब असो वा श्रीमंत, घराची ऊब प्रत्येकासाठी महत्वाची असते. मात्र, सध्या पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांना घरखरेदीचे हेच स्वप्न त्रासदायक ठरू पाहत आहे. पोलिसच पोलिसांची तक्रार दाखल करून घेत नाहीत. वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून, लवकरच हा प्रश्न कोर्टापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
आडगाव परिसरातील पोलिस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर पोलिसांसाठी एैसपैस संकुल असावे, यासाठी २०१० मध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सोसायटी स्थापन केली. तब्बल २९४ सदनिका उभारण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक मिलिंद भारांबे यांनी पुढाकार घेतला. भारांबे सध्या मुंबईत पोलिस महानिरीक्षक म्हणून वाहतूक विभागाचा कार्यभार पाहतात. भारांबे सोसायटीच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष झाले. स्वतः भारांबे यांनी अग्रस्थानी असल्याने महाराष्ट्र तसेच मुंबई पोलिस सेवेतील तब्बल २८८ जणांनी घरे बुक केली. यात कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश होता. बांधकामाचे भूम‌िपूजन झोकात झाले. २०१२च्या अखेरीस पोलिसांना घर मिळणे अपेक्ष‌ित होते. मात्र, अद्याप सोसायटीने किंवा बिल्डरने सदस्यांना घरांचा ताबा दिलेला नाही. घरांसाठी नाशिकरोड येथील एका राष्ट्र‌ियीकृत बँकेकडून बहुतांश सदस्यांनी कर्ज घेतले. कर्जाचे हप्ते देखील सुरू झाले. एकीकडे घराचा ताबा मिळत नाही, तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते भरावे लागत असल्याची खंत काही सदस्यांनी बोलून दाखवली. या प्रकरणात मोफ्फा कायद्याचे उल्लंघन केल्याचे अनेक पुरावे सदस्य असलेल्या पोलिसांकडे आहेत. मात्र, यात भारांबे यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव येत असल्याने कारवाई होत नाही. सोसायटीचे सचिव असलेले पोलिस निरीक्षक देवीदास शेळके यांचीही आता दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली आहे.

आमच्याकडे व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्सची अतिरिक्त रक्कम मागितली जात आहे. २०१२ मध्ये घरे ताब्यात मिळाली असती, तर हे नवीन कर आमच्या माथी आले नसते.
- विनय केदार, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे मनपात समाजवादीचे अनोखे आंदोलन

$
0
0

कार्यकर्त्याने साकारला पिसाळलेला कुत्रा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील नागरिक सध्या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील कुत्र्यांचा आणि डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या नगरसेवक आमिन पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनपात लक्षवेधी आंदोलन केले.

या अनोख्या आंदोलनात एका कार्यकर्त्याने अंगावरील कपडे काढून पिसाळलेल्या कुत्र्याची भूमिका मनपा आवारात साकारली. कुत्रे पिसाळल्यानंतर काय अवस्था होते याचे विविध प्रात्यक्षिके समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करून दाखविले आणि शहरातील समस्येची वस्तुस्थिती दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

धुळे शहरात विविध ठिकाणी पिसाळलेल्या व रोगट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिला, तरुणी व वृद्धांच्या अंगावर कुत्रे चावा घेण्यासाठी धाव घेतात. अशा घटना दररोज घडत आहेत. मनपाच्या यंदाच्या आर्थिक संकल्पात मोकाट कुत्रे व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करणारे निवेदन महापौर कल्पना महाले यांना यावेळी देण्यात आले.

शहरातील नागरिकांच्या समस्येकडे मनपाचे लक्ष वेधण्यासाठी समाजवादी पक्षाचे नगरसेवक आमिन पटेल व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन मनपात केले. जर मनपाकडून येत्या आठ दिवसांत मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर यापुढे मनपातील अधिकाऱ्यांच्या दालनात पिसाळलेले व मोकाट कुत्रे आणून सोडण्यात येतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवमोगरा देवीच्या यात्रेस सुरुवात

$
0
0

नंदुरबार जिल्ह्यातील बर्डीपाडा येथे तयारी जोरात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्डीपाडा येथील देवमोगरा देवीचे मंदिर विसरवाडी गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ताही नाही. अशा ठिकाणी हे देवमोगरा मातेचे मंदिर उंच डोंगरावर वसलेले आहे. पायथ्यापासून सुमारे २६४० फूट अंतर पार करून या देवीच्या दर्शनाला जावे लागते. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमधील मराठी माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या आमावस्येला देवमोगराच्या मोगीची यात्रा भरते, याची तयारी आता सुरू झाली आहे.

गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील देवमोगरा मातेची ही प्रतिकृती नंदुरबारमधील बर्डीपाडा येथे पाहायला मिळते. तसेच आदिवासी भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला साकडे घालायला या ठिकाणी येतात. कणीपूजन करून मंडल शिवारातील देव देवतांचे पूजन करतात. या यात्रेसाठी आदिवासी बांधव १५ दिवसांपासून तयारीला लागतात. मोगी ही आदिवासी समाजाची कुलदेवता असून, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात. मंदिराच्या पायथ्याशी सुरू होणाऱ्या पायऱ्यांपासून केलेल्या कच्च्या रस्त्याची पायवाट आहे. तेथूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक मार्गस्थ होतात.

देवमोगरा देवीला आदिवासी भाषेत ‘याहा मोगी’ म्हटले जाते. ‘याहा’ म्हणजे आई असा अर्थ आहे. महादुष्काळात याहा मोगीच्या या उदात्त आणि मानवतादी कार्यामुळेच त्यांना याहा, लोकमाता, कणी, कन्सरी आपली सर्व पालनहार संबोधून देवत्व बहाल केले. आदिवासी भाषेतच देवीचे पारंपरिक पद्धतीने पूजा-विधी होतात. आजही धान्य, वन भाजी, तांदळाची व ज्वारीची भाकरी आणि मव्हाच मद्य (दारू) असा नैवेद्य देवीला दिला जातो. त्यामुळे आदिवासी भाषेतच मंदिराचे पुजारी ग्रामदैवत देवमोगरा देवीची माहिती सांगतात.

प्रशासनाची उदासीनता

आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख असून, नवापूर तालुक्यातील आदिवासींचे ग्रामदैवत असलेल्या मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग पहाडातून आणि दऱ्या, खोऱ्यातून, कच्या रस्ताने भाविकांना खडतर प्रवास करावा लागतो. येथेही सरकारी यंत्रणेची उदासीनता पाहायला मिळते. तरी देवदर्शनासाठी प्रवास सुखकर व्हावा, अशीच अपेक्षा आदिवासी बांधवांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images