Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विसरवाडीत कॉप्यांचा पाऊस

$
0
0

धुळे : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे माजीमंत्री माणिकराव गावित विद्यालयात मंगळवारी, दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉप्याचा पाऊस पडला. या परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी सुरू असल्याचे समजताच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण विभागातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. सकाळी अकरा वाजता विसरवाडी येथील गावित विद्यालयात अचानक कॉपी पुरविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली तर गाईड, झेरॉक्स प्रती व इतर साधनाचा आधार घेत वर्गात पेपर सोडविण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस व शिक्षण विभागातील यंत्रणेने मात्र बघ्याची भूमिका घेतली. हा सर्व प्रकार परीक्षा केंद्रात सुरू असताना शाळेतील पथक आणि भरारी पथक नेमके काय करत होते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागतिक महिलादिनानिमित्त धुळे महापालिकेतर्फे महापौर महिला मॅरेथॉन

$
0
0

धुळे : जागतिक महिलादिनानिमित्त धुळे महापालिकेतर्फे महापौर मॅरथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक धाव स्त्री सन्मानासाठी’ हे घोषवाक्य ठेऊन तसेच ‘बेटी बचाओ’चा संदेश जनमानसात देण्यासाठी जागतिक महिलादिनी नारीशक्ती एकवटली होती. बुधवारी (दि. ८) सकाळी सात वाजता मनपा आवारातून शेकडो महिलांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत १८ ते ६५ वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. विजेत्या महिलांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत महापौर कल्पना महाले, आयुक्त संगीता धायगुडे, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्यासह शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तर स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या. एस, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखणीबंद आंदोलन १५ मार्चपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा परिषद व पंचायत समितीत कार्यरत विविध लेखा संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.१५ मार्चपासून लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने दिला आहे. हे आंदोलन संपूर्ण राज्यभरात राज्याध्यक्ष विजयसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात कर्मचारी संघटनेकडून आज (दि. १०) ते मंगळवार (दि. १४) या कालावधीत काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रेड पे, पदोन्नती कोटा वाढ करणे, राजपत्रित दर्जा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनास विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. वारंवार मागणी व पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणविरोधी मोहीम लांबणीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पांझरा चौपाटीबाबत येथील स्टॉलधारक को-ऑपरेटिव्ह सोसायटीने महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चौपाटी नियमानुकूल करण्यास नकार दिल्याच्या निर्णयावर पुनर्विलोकन अर्ज राज्य सरकारकडे दाखल केला होता. त्यावर नैसर्गिक न्याय तत्वानुसार १ एप्रिलला सुनावणी होईल. त्यामुळेच १ एप्रिलला निर्णय जाहीर होईपर्यंत जिल्हा महसूल यंत्रणेने आज (दि. १०) चौपाटीवर होणारी अतिक्रमण निर्मुलन मोहीम तूर्त थांबवावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी (दि. ९) सायंकाळी दूरध्वनीद्वारे दिले आहेत. त्यामुळे स्टॉलधारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे चौपाटीवरील कारवाई करू देणार नाही, अशी भूमिका लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्टॉल धारकांनी गुरुवारी (दि. ९) सकाळी घेतली. तेजस गोटे यांच्या नेतृत्वाखाली चौपाटीवर स्टॉल धारकांनी कुटुंबासह आंदोलनाला सुरुवात केली आहे. पांझरा किनारी आमदार अनिल गोटे यांनी उभारलेल्या चौपाटीवर अतिक्रमण ठरवून तेथील ५३ स्टॉल, ९० बाक, पाण्याच्या टाक्या आणि बांधकाम हटविण्याची नोटीस महापालिका प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे. या नोटिसीनंतर आमदार गोटे आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे शहरात चांगलेच राजकीय वातावरण तापले होते.


पक्षांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

या सर्व प्रकाराबाबत धुळेकरांमधून निरनिराळ्या प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, प्रशासनाने चौपाटीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाचे पाच ट्रॅक्टर, पाच ट्रक, १ जेसीबी, क्रेन, ५ ब्रेकर, कटर या साहित्यासह ३० कामगारांची व्यवस्था केली आहे. आता या कारवाईच्या स्थगितीचे आदेश आल्यानंतर मनपा आणि महसूल विभागाची तयारी सध्या तरी थांबवावी लागणार आहे. त्यामुळे आज (दि. १०) पांझरा चौपाटीवरील अतिक्रमण काढण्यासाठी विरोध करणारे आमदार गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाची काय भूमिका असले याकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळे अतिक्रमण निघत असल्याचा आरोपदेखील केला आहे. आता स्थगितीनंतर भूमिका काय, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटकेनंतर जवान चंदू उद्या धुळ्यात येणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। धुळे

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून सुटका होऊन आपल्या मायदेशी परतलेला '३७ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण तब्बल दीड महिन्यांनंतर म्हणजेच उद्या, शनिवारी धुळ्यातील आपल्या बोरविहिर या गावी येणार आहे. आपला चंदू गावी येणार हे समजताच त्याचे कुटुंबीय आणि गावकरी यांना एखादा सण असल्यासारखे वाटत आहे. त्यांनी जवान चंदूच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. जवान चंदू ज्या मार्गाने गावात प्रवेश करेल तो मार्ग रांगोळीने सुशोभित करण्यात येणार आहे. शिवाय त्याचे औक्षणही करण्यात येणार आहे.

याबरोबर, बोरविहिर गावच्या महिला मंडळींनी जवान चंदूच्या आवडीच्या जेवणाचा खास बेत देखील आखला आहे.

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी जवान चंदू चव्हाण नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानाच गेला होता. चंदूला भारताच्या ताब्यात देण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. चंदूच्या सुटकेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ. सुभाष भामरे काही कारणास्तव धुळ्यात येऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदू चव्हाण आज धुळ्यात परतणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या कचाट्यातून सुखरूप परतलेला धुळ्याचा जवान चंदू चव्हाण आज, शनिवारी धुळ्यात परतत आहे. चंदू गावी येतोय असे कळताच संपूर्ण खान्देशमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

चंदूला पाकिस्तानच्या सैन्याने पकडले असे कळताच मानसिक धक्का बसून त्याची आजी लिलाबाई यांचे निधन झाले. मात्र चंदू परत येणार की नाही याविषयी खात्री नसतानाही त्याचा भाऊ, आजोबा यांनी चंदूच आजीच्या अस्थींचे विसर्जन करेल असे ठरविले होते. त्यानुसार आता उद्या, रविवारी चंदूच्या हस्ते आजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे, असे चंदूचा भाऊ भूषण चव्हाण याने सांगितले.

भारतीय सैन्यदलाच्या प्रयत्नांमुळे ३७, राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू सुखरूप भारतात परतला. तब्बल नऊ महिन्यांनंतर तो शुक्रवारी सायंकाळी दिल्ली येथून विमानाने भाऊ भूषणसह इंदूर येथे आणि तेथून कारने बोरविहीर गावी परतणार आहे. आज दुपारपर्यंत चंदू धुळ्यात पोहोचेल. त्यानंतर गावामध्ये त्याची मिरवणूकही काढण्यात येणार आहे.‍

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात परतताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। धुळे

पाकिस्तानच्या तावडीतून सहिसलामत सुटलेला '३६ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण याने आपल्या धुळ्यातील बोरविहीर या गावी आज तब्बल नऊ महिन्यांनी परतला. बोरविहीर गावच्या भूमीत पाऊल ठेवताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला आणि चंदूला अश्रू अनावर झाले. चंदूला पाहताच चंदूच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या महिलांचे डोळेही पाणावले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे देखील चंदूसोबत होते.

धुळ्यात पोहोचताच चंदूचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र धुळ्यात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम चंदूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन केले आणि त्यानंतर तो बोरविहीर या आपल्या मूळ गावी रवाना झाला. बोरविहीर गावात पोहोचताच चंदूला आपल्या दिवंगत आजीची आठवण झाली. चंदूला पाकिस्तानने ताब्यात ठेवल्याचे कळताच चंदूच्या आजीचे धक्क्याने निधन झाले होते. जो पर्यंत चंदू परतत नाही, तो पर्यंत आजीच्या अस्थींचे विसर्जन करणार नाही असे चंदूच्या भावाने म्हटले होते.

सर्जिकल स्ट्राइकनंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी चंदू नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा देशसेवेसाठी राहीन तत्पर

$
0
0

पाकिस्तानातून सुखरूप परतलेल्या चंदूचा विश्वास; बोरविहीर ग्रामस्थांचा जल्लोष

म. टा. वृत्तसेवा, धुळे

‘माझी पाकिस्तानातून सुटका करण्यासाठी देशातील सैन्य दलासह, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे मोठे योगदान आहे. मात्र मी देशाच्या रक्षणासाठी पुन्हा तयार आहे. लवकरच सैन्याच्या सेवेत हजर होऊन पुन्हा देशसेवेसाठी तत्पर राहील’, अशी प्रतिक्रिया चंदू चव्हाण यांनी धुळे तालुक्यातील बोरविहीर गावी त्याच्या घरी परतल्यानंतर दिली.

पाकिस्तानातून सुखरूप सुटका झालेला भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण याचे शनिवारी (दि. ११) दुपारी साडेबारा वाजता धुळे शहरातील मालेगाव रोडनजीक शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आगमन झाले. त्याच्यासोबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे होते. डॉ. भामरे यांनी जवान चंदू चव्हाणची सुटका करून नातेवाईकांसह जिल्हावासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली. चंदू गावी येणार म्हणून गावातील तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिकांनी बोरविहीर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी केली होती. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन चंदूला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी चंदूच्या गावी येथे डॉ. भामरे व चंदूचे औक्षण करण्यासाठी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवान चंदू हा धुळे शहरात दाखल झल्यानंतर त्याठिकाणी भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, गोपाळ केले, अरविंद जाधव, संजय बोरसे आणि धुळे शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे स्वागत केले.

आपण चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांना दिलेला शब्द पाळला असून, त्याची पाकिस्तानच्या ताब्यातून सुखरूप सुटका करून घरी परत आणण्यात यश मिळवले आहे.

डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळेः रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धिंगाणा घातल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे. त्यांच्या मारहाणीत डॉक्टर रोहन मामूनकर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्यानं, त्या फूटेजच्या आधारे पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा २० वर्षांचा तरुण दुचाकी अपघातात जखमी झाला होता. त्याला धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण तो वाचू शकला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय बिथरले आणि त्यांनी या मृत्यूचं खापर डॉक्टरांवर फोडत हॉस्पिटलमध्ये धुडगूस घातला. ऑपरेशन थिएटरमध्ये तोडफोड करत त्यांनी डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. त्यात डॉ. रोहन मामूनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.


या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन डॉक्टरांनी मारहाण करणाऱ्यांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत निर्माण करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे तसेच डॉक्टरांवरील हल्ला प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पोलिसांनी २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी नऊ जणांची रवानगी १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.


मारहाणीच्या घटनेनंतर स्थानिक डॉक्टरांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला आहे. या मारहाणीचे पडसाद राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये उमटू लागलेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला अमानुष मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला म्हणूनसंतप्त झालेल्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टर रोहन मामुनकर यांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या नातेवाईकांनी रुग्णालयातील पलंग, खुर्च्यांसह इतर साहित्याची मोडतोडही केली असून, याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यातील एका संशयित आरोपीने मंगळवारी पोलिस कोठडीतच आत्महत्या केल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.

चैत्राम उर्फ राजू शिवाजी लष्कर (वय २१, रा. चक्करबर्डी परिसर धुळे) हा तरुण रविवारी मोटारसायकलवरून जात असताना, मोटारसायकल घसरून गंभीर जखमी झाला. होता. त्यावेळी त्याला तत्काळ जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सिटीस्कॅननंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला न्युरोतज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र, जिल्हा रुग्णालयात न्युरोतज्ज्ञ नसल्याने जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यादरम्यान राजू लष्कर याचा मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयात न्युरोतज्ज्ञ नसल्याच्या रागातून राजूच्या नातेवाईकांनी निवासी डॉ. रोहन मामुनकर यांना बेदम मारहाण केली. तसेच रुग्णालयातील पलंग, खुर्च्यांसह इतर साहित्याचीही तोडफोड केली.

संशयित आरोपीची कोठडीत आत्महत्या

डॉक्टरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्यांपैकी प्रदीप वेताळ याने मंगळवारी, शहर पोलिस ठाण्यातील कोठडीतील शौचालयाच्या खिडकीला चादर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे प्रदीपचे संतप्त नातेवाईक व इतरांनीही शहर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडार समाजाचे प्रशासनाला निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात रविवारी (दि. १२) निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाला संशयित आरोपीच्या आत्महत्येने नवीन वळण मिळाले आहे. पोलिस ठाण्यातच आत्महत्या केलेला संशयित प्रदीप वेताळ आणि चैत्राम शिवाजी लष्कर या दोघांच्या मृत्यूने वडार समाज संप्तत झाला आहे. या दोन्ही घटनांना डॉ. रोहन म्हामूनकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत बुधवारी (दि. १५) वडार समाजाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शहरातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सर्वोपचार रुग्णालयातील अपघात विभागात रविवारी, रात्री निवासी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन म्हामूनकर यांना जमावाने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वडार समाजातील २५ जणांवर गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली होती. अटक केलेल्यांपैकी प्रदीप सदाशिव वेताळ या तरुणाने मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात पोलिस कोठडीत आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत प्रदीपच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात आंदोलन केले. दरम्यान, पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या सर्व घडामोडीनंतर वडार समाजातर्फे बुधवारी (दि. १५) सकाळी दोन्ही तरुणांच्या मृत्यूला डॉ. रोहन म्हामूनकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात, डॉ. म्हामूनकर हे सर्वोपचार रुग्णालयात कामावर कार्यरत असताना, दारूच्या नशेत होते. त्यांनी उपचार करण्यास नकार दिला होता. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करा, असे सांगण्यात आले. त्यामुळे तरुणावर उपचार न झाल्याने संप्तत झालेल्या नातेवाईकांनी डॉ. म्हामूनकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, हा सर्व प्रकार झाल्यानंतर प्रदीप वेताळसह सर्वांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. प्रदीप हा सुशिक्षित तरुण होता. परंतु, पोलिसांनी त्याला अटक केल्याने तो घाबरला आणि निराश होऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोपही वडार समाजाने केला आहे. या प्रकरणात डॉ. म्हामूनकर दोषी असून त्यांच्यावर ३०४ व ३०२ नुसार गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

कोट

पोलिस कोठडीत आत्महत्या केलेल्या प्रदीप वेताळ या तरुणाचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी या अहवालानुसार गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करकण्यात आली आहे.

- दिवाणसिंग वसावे, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात डॉक्टरांचा मूकमोर्चा

$
0
0

जिल्हा प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे


धुळे शहरासह जिल्ह्यातील डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात सुरक्षारक्षक आणि विशेष बंदोबस्त कायमस्वरुपी तैनात करावा, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशने बुधवारी शहरातून मूकमोर्चा काढला. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात डॉक्टरांवरील हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्या, या घटनेत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर झालेली कारवाई रद्द करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

जिल्हा रुग्णालयाच्या तातडीच्या सेवा मूकमोर्चाच्या काळात सुरू होत्या, तर उर्वरित सुविधा बंद ठेवून पुन्हा सुरू करण्यात आल्या. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने ठोस उपाय योजना कराव्या, वैद्यकीय महाविद्यालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवावी, या घटनेत महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी ज्यांच्यावर कारवाई झाली ती रद्द करण्यात यावी, यासारख्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

यावेळी ‘आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, ‘महाराष्ट्र आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, डॉ. पार्थिव संघवी, डॉ. मंगेश पाटे, डॉ. निसार शेख, डॉ. विजया माळी, डॉ. सविता नाईक, डॉ. गिरीश मोदी यांच्यासह सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलसह वाहनचोरीचा जाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूरच्या भाजीबाजारात मोबाइल आणि वाहन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. बाजारातून ग्राहकांसह विक्रेत्यांच्याही मोबाइल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून परिसरातील व्यावसायिकांनी ‘मोबाइल व मोटारसायकल सांभाळा’ असे फलकच उभारले आहेत. पोलिसांनी मोबाइल व वाहन चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी सातपूरवासीयांकडून केली जात आहे.

एमआयडीसीला लागून असलेल्या सातपूर गावात केवळ एकच भाजी मार्केट होते. छत्रपती शिवाजी मंडईत एकेकाळी गंगापूररोड भागातून ग्राहक भाजीपाला घेण्यासाठी येत असत. शिवाजी मंडई व रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांमध्ये नेहमीच वाद होतात. परंतु, आता या बाजारात मोबाइल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावर भाजी विक्रेत्यांकडे भाजीपाला घेण्याच्या बहाण्याने मोबाइल चोरीचे प्रकार वाढले आहेत. तसेच भाजी विक्रेत्यांकडे भाजीपाला घेणाऱ्या ग्राहकांचाही मोबाइल हातोहात लंपास होतात. विशेष म्हणजे बुधवारी व शनिवारी चोरीचे प्रमाण अधिक असते.

दुचाकीही लक्ष्य

सातपूर गावाच्या त्र्यंबकरोडलगत असलेल्या दुकानदारांकडे ग्राहक वस्तू खरेदीसाठी आल्यावर दुचाकी रस्त्यालगतच उभी करतात. या गाड्या हातोहात लांबविल्या जात आहेत. असे प्रकार सातपूर बाजारात सातत्याने होत आहेत. मोबाइल चोरट्यांची टोळीच भाजीबाजारात सक्रिय असल्याचे विक्रेत्यांसह ग्राहकांचे म्हणणे आहे.

सातपूर गावात सायंकाळी अंधार पडल्यावर भाजी विक्रेते व ग्राहकांचे मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहे. मोबाइल चोरींच्या सक्रिय झालेल्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्याची गरज आहे.

- सुनील पालवे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमिकनगरला तरुणीचा विनयभंग

$
0
0



रंग लावण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून एकाने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना श्रमिकनगर येथे घडली असून, या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संशयितास गजाआड केले आहे. बाळा उर्फ रोहित मेहंदळे (२९, रा. हनुमान मंदिराजवळ,श्रमिकनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. रंगपंचमीनिमित्त शुक्रवारी (दि. १७) तो परिसरातील एका दुकानात शिरला होता. मायलेकींना रंग लावण्यासाठी गेलेल्या संशयिताने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना लक्षात येताच तरुणीच्या आईने जाब विचारला. मात्र, संशयितांने दोघा मायलेकींना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित मेहेंदळेस अटक केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर तालुक्यात मुलींचा जन्मदर फक्त ८४४!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने सोनोग्राफी सेंटर्सवर लादलेल्या अटी जाचक ठरू लागल्याने नाशिकमध्ये काही वर्षांत तब्बल १५१ सोनोग्राफी सेंटर्स डॉक्टरांनी बंद केली आहेत. अशा सेंटर्सचे परवाने कायमस्वरूपी रद्द होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात दरहजारी मुलांमागे ९२५ मुलींचा जन्मदर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, सिन्नर तालुक्यात सर्वांत कमी ८४४ पर्यंत मुलींचा जन्मदर घसरला आहे. पेठसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात मात्र मुलींचा जन्मदर सर्वाधिक १०३२, तर त्याखालोखाल येवला तालुक्यात ९७० एवढा आहे.

सोनोग्राफी सेंटर्स चालकांकडून गर्भलिंगनिदान चाचण्या, तसेच मुलीचा गर्भ आढळल्यास गर्भपाताचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे मुलींचा जन्मदर घसरत असून, प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गर्भातच कळी खुडण्यास सोनोग्राफी सेंटर्स कारणीभूत ठरत असून, असे अक्षम्य गुन्हे रोखण्यासाठी सरकारही कठोर पावले उचलू लागले आहे. सोनोग्राफी सेंटरवर येणारी प्रत्येक गर्भवती महिलेची माहिती एफ फॉर्ममध्ये भरणे आवश्यक असून, ती माहिती प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.

गर्भलिंग निदानासाठी येणाऱ्या महिलेकडून रेडिओलॉजिस्टला एफ फॉर्म, संमतीपत्र, जाहीरनामा भरून घ्यावा लागतो. अशा कारकूनी कामात काहीवेळा महिलेची स्वाक्षरी, तपासणीची तारीख अशा किरकोळ त्रूटी राहतात. संबंधित डॉक्टरांना दोषी धरून त्यांच्यावर सरसकट फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. आरोग्य विभागाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक डॉक्टरांनी सोनोग्राफी सेंटर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ६१८ नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर्स आहेत. त्यापैकी ३६७ केंद्रच कार्यान्वित असून ८४ सेंटर्स तात्पुरते तर १५१ सेंटर्स कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहेत. ते सर्व महापालिका क्षेत्रातील आहेत. १० सोनोग्राफी सेंटर्सच्या बाबतीत न्यायालयीन प्रकरणांचा अडसर निर्माण झाला आहे.

एकीकडे शहरात अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात मुलींचा जन्मदर ९२५ एवढा आहे. सिन्नर तालुक्यात हा जन्मदर अवघा ८४४ आढळून आल्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्याखालोखाल चांदवडमध्ये ८५८ एवढा जन्मदर आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर ९२५ पेक्षा कमी आहे. सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव या तालुक्यांमध्ये तो ९२५ ते ९५३ या दरम्यान असून येवल्यात ९७० आणि पेठमध्ये १०३२ एवढा मुलींचा जन्मदर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नाशिक शहरात हाच जन्मदर ९३५ एवढा आहे.

तालुका मुलींचा जन्मदर

सिन्नर ८४४, चांदवड ८५८, इगतपुरी ८७८, त्र्यंबकेश्वर ८८७, मालेगाव ८९९, दिंडोरी ९११, नाशिक ९२०, सुरगाणा ९२०, निफाड ९२३, सटाणा ९२९, कळवण ९३२, ‍नाशिक शहर ९३५, नाशिक ब्लॉक ९३६, देवळा ९४६, मालेगाव शहर ९४७, मालेगाव ब्लॉक ९५३, येवला ९७०, पेठ १०३२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइल चोरांचा सुळसुळाट

$
0
0

सिडको, इंदिरानगर परिसरात वाढलेल्या घटनांनी पोलिसांना आव्हान

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोसह इंदिरानगर परिसरात मोबाइल चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या घटनांकडे पोलिस अधिक गांभीर्याने पहात नसल्याने चोरांचे धाडस वाढत आहे. मोबाइल चोरट्यांना जेरबंद करीत त्यांच्याकडून मोबाइल हस्तगत करण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

सिडकोतील त्रिमूर्ती चौक भाजी मार्केट, शिवाजी चौक, पाथर्डी फाटा किंवा इंदिरानगर परिसरातील बापू बंगल्याजवळील भाजीबाजारांसह वर्दळीच्या ठिकाणी मोबाइलची चोरी होत असल्याचे दिसत आहे. पायी चालणारी व्यक्ती मोबाइलवर बोलत जात असेल तर भरधाव वेगाने गाडीवरून येऊन तो मोबाइल चोरी करण्याचेही प्रकार सर्रास बघावयास मिळत आहेत. चेनस्नॅचिंग प्रमाणेच मोबाइलच्याही चोऱ्या वाढू लागल्या आहेत.

मोबाइलला विमा संरक्षण

महागड्या किंमतीचे मोबाइल खरेदी केल्यानंतर अनेक जण मोबाइलचा विमा सुद्धा घेत असल्याचे काही विक्रेत्यांकडून समजते. अनेक कंपन्यांनी आता मोबाइलचा विमा सुरू केला असला तरी सर्वजण त्याचा लाभ घेत नाही. परिणामी मोबाइल चोरांचे फावते. मोबाइलचा विमा असले तर चोरीस गेल्यावर त्याचा परतावा विमा कंपनीकडून मिळतो. मात्र, विमा खरेदीकडे ग्राहकांचे दुर्लक्ष असल्याचेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

मोबाइलचोरांची साखळी?

मोबाइल चोरीनंतर त्यातील सिमकार्ड तातडीने काढून टाकले जाते. सिमकार्ड काढल्यामुळे संबंधित व्यक्ती आपल्या मोबाइलवर फोन करतो तर तो बंद आढळून येतो. त्यानंतर हे मोबाइल फोन्स काही ठराविक विक्रेत्यांकडे विक्री केले जातात. विक्रेतेसुद्धा अत्यल्प किंमतीत मोबाइल खरेदी करून काही काळानंतर त्याची सेकंड हॅण्ड म्हणून विक्री करतात. त्यामुळे या विक्रेत्यांचीही चौकशी पोलिसांकडून झाली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीतील तिघे जेरबंद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मेळा बस स्थानकाजवळ थांबलेल्या पाच पैकी तीन जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. सरकारवाडा पोलिसांच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली असून संशयितांच्या ताब्यातून देशी बनावटीचा पिस्तुलासह दुचाकी आणि दरोड्यात वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

सागर गणपत बोडके (१९), प्रकाश गुलाब रणमाळे (१८, रा. दोघे फुलेनगर, पंचवटी) व आदित्य श्याम पाटील (१९ रा. गिरणारे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. शनिवारी (दि. १८) पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संशयीत व त्यांचे दोन साथिदार ठक्कर बाजार ते सीबीएस दरम्यान दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शाईन (एमएच १५ एफजे ३७४२) गाडीजवळ थांबले होते. सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पीएसआय सोनोने, हवालदार पंकज पळशीकर, वसंत पांडव, पोलिस नाईक प्रवीण वाघमारे, राजेश शेळके, प्रशांत मरकड, हेमंत पाटील, धनंजय शिंदे हे रात्री एक वाजेपासून गस्तीवर होते. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान, पीएसआय सोनने यांना सदर संशयितांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने मेळा बस स्थानक परिसरात छापा मारला. यावेळी मेळा बसस्टॉपच्या कॉर्टरजवळील रोडवर पाच व्यक्ती संशयास्पद दिसून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला असता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांच्यापैकी तिघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतुसे, फायटर, लोखंडी सुरा, मिरची पुड असा ऐवज सापडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

नोकराकडूनच गंडा

वाहन बॅटरी वितरकास एका नोकरानेच तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश दत्ताराव इक्कर (रा. महात्मानगर, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. थत्तेनगर येथील राजेंद्र मुलचंद हे वाहनातील बॅटरीचे मुख्य वितरक आहे. तर योगेश इक्कर हा त्यांच्याकडे वितरण आणि वसुलीचे काम करतो. त्याने तीन महिन्यात नाशिकसह भगूर परिसरातील वितरकांकडून सुमारे दोन लाख ९२ हजार २३२ रुपयांची वसुली केली. मात्र, ती रक्कम कंपनीत अथवा गोठी यांच्या बँक खात्यात न भरता परस्पर अपहार केला. संशय आल्याने गोठी यांनी सबडिलरकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

शरयू पार्कमध्ये घरफोडी
आडगाव शिवारातील शरयू पार्क भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी लॅपटॉप चोरी केला. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुश्मिता श्रीपती चंद्र (रा. मढवई हाईटस, शरयू पार्क) यांच्या तक्रारीनुसार, गुरूवारी (दि. १६) कामानिमित्त घराबाहेर गेल्या. या काळात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून हॉलमध्ये ठेवलेला १५ हजारांचा लॅपटॉप चोरी केला.

वाहनांचे नुकसान

नवरात्रोत्सवातील वर्गणीच्या कारणातून दाम्पत्यास धक्काबुक्की करीत तिघांनी वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी एकास अटक केली आहे. संशयितांचे दोन साथिदार फरार असून, ही घटना सावरकरनगर येथे घडली आहे. स्वप्निल शांताराम आव्हाड (रा. राजश्री पार्क, सावरकरनगर) असे संशयिताचे नाव आहे. रवींद्र भास्कर धुमाळ (रा. मृत्युंजय अपार्ट. सावरकरनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. शुक्रवारी (दि. १७) दुपारी धुमाळ सावरकरनगर येथे आपल्या घरासमोर उभे असतांना संशयित व त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांनी धुमाळ यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच मधे आलेल्या धुमाळ यांच्या पत्नीला दूर लोटले. तिघांनी दगडफेक केल्याने घराबाहेर असलेल्या कारच्या व खिडकीच्या काचा फुटल्या. या प्रकरणी सातपूर पोलिसांत नोंद झाली आहे.

रेल्वेच्या धडकेने मृत्यू

मनमाड : गोवा रेल्वे एक्स्प्रेसची धडक बसल्याने ५५ वर्षीय व्यक्ती ठार झाल्याची घटना शनिवारी नांदगाव येथे घडली. शंकर तुकाराम पुंडे (रा. कोपरगाव) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. साकोरे (ता. नांदगाव) येथे त्यांची सासुरवाडी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिटिझन रिपोर्टर’ प्रभावी व्यासपीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’ने उपलब्ध करून दिलेल्या सिटिझन रिपोर्टर्स अॅपमुळे आमच्या परिसरातील समस्या प्रशासनासमोर आणणे सहजशक्य झाले आहे. या अॅपची परिणामकारकता मोठी असून, त्याद्वारे समस्या ताबडतोब सोडविल्या जात असल्याचे अनुभव आम्हाला येतात. या अॅपमुळे सामान्य नागरिकांना प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे, अशा भावना ‘मटा सिटिझन रिपोर्टर्स’नी व्यक्त केल्या.

शहरात विविध ठिकाणी जाणवणाऱ्या सार्वजनिक समस्या प्रशासनापर्यंत प्रत्यक्ष जाऊन निदर्शनास आणून देणे शक्य नसते. मात्र, या समस्या सोडविणे प्रत्येक नागरिकासाठीच आवश्यक आहे. या दृष्टीने सिटिझन रिपोर्टर अॅपची मोठी मदत होत आहे. त्यामुळेच कमी कालावधीत हे अॅप लोकप्रिय झाले आहे. याद्वारे येणाऱ्या समस्या, तक्रारी या नाशिक प्लस पुरवणीत दररोज प्रसिद्ध केल्या जातात. दर आठवड्याला निवडक मटा सिटिझन रिपोर्टर्सचा गौरवही करण्यात येतो. शनिवारीही ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक कार्यालयात पाच सिटिझन रिपोर्टर्सना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संजय फडोळ, आकाश तोटे, परवेझ शेख, दर्शन देवरे व लक्ष्मण खडके यांचा यात समावेश होता.

नाशिकच्या महापौरांपासून देशाच्या पंतप्रधानांपर्यंत भाजपची सत्ता आल्याने आता सत्कार पुरे करून, समस्या सोडवा, असे वृत्त संजय फडोळ यांनी, तर आकाश तोटे यांनी शिवाजी चौकात किल्ला बांधून शिवजयंती साजरी केल्याचे वृत्त अॅपद्वारे कळविले होते. इंदिरानगर येथे भर उन्हाळ्यात पाण्याअभावी झाडांच्या दुर्दशेवर परवेझ शेख यांनी प्रकाश टाकला होता. दर्शन देवरे यांनी उपेंद्रनगर येथे भरदिवसा पथदीप सुरू असल्याचे निदर्शनास आणले होते. लक्ष्मण खडके यांनी रेल्वेच्या जनरल बोगींची सद्यस्थिती समोर आणली होती. आपापल्या भागात किंवा शहरात वावरताना जाणवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाबद्दल त्यांनी ‘मटा’चे आभार मानले, तसेच यापुढेही या अॅपद्वारे आम्हाला जाणवणाऱ्या समस्या आम्ही समोर आणू, असा निर्धारही त्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेने वृद्ध महिला ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील उत्तमनगर येथील गतिरोधकावर तोल गेल्याने आणि मागून आलेल्या ट्रकच्या धडक बसल्याने एका वृद्ध महिला शुक्रवारी (दि. १७) ठार झाली. शोभा जयप्रकाश भांबेरे (६२) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेमंत जयप्रकाश भांबेरे हे आई शोभा यांना दुचाकीवरून (एमएच १५ बीटी ६४७७) घेऊन घरी जात होते. यावेळी उत्तमनगर येथे त्यांची दुचाकी गतिरोधकावर आदळली. गतिरोधकांची उंची अधिक असल्याने शोभा यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर खाली पडल्या. याच वेळी मागून आलेल्या आयशर ट्रकच्या (एमएच ४ सीजी ३०६६) त्या चाकाखाली आल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भांबेरे कुटुंबीय सिडकोतील श्रीरामनगर परिसरात राहतात. या अपघातासंदर्भात अंबड पोलिसांनी ट्रकचालक अप्पा बच्छाव (रा. महाले फार्म, सिडको) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गरज पट्टे आखण्याची
काही दिवसांपूर्वी लेखानगर येथे अशाच प्रकारे अपघात झाला होता. गतिरोधकांमुळे होणारे अपघात सध्या वाढत आहेत. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची गरज निर्माण झाली. लेखानगर येथे झालेल्या अपघातानंतर आम आदमी पार्टीच्या वतीने पांढरे पट्टे मारण्यात आले होते. महापालिकेकडून गतिरोधकांवर असे पट्टे मारले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात स्वाइन फ्लूबाधित १७ रुग्ण असून, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार रोखता यावा, तसेच रुग्णांना तत्काळ योग्य उपचार मिळावेत, यासाठी आयसोलेटेड स्वाइन फ्लू कक्ष सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यात १६ हजार टॅमी फ्लूच्या गोळ्या उपलब्ध आहेत.

स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक-दोन दिवसांपूर्वी नाशिकला स्वाइन फ्लूच्या बाबतीत संवेदनशील जिल्हा म्हणून घोषित केले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे १६ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यंदादेखील हे प्रमाण अल्पसे वाढल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यंदा स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण आढळले. त्यापैकी सात रुग्ण धुळे, अहमदनगर, औरंगाबाद आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील असून, त्यांच्यावर नाशिकमध्येच उपचार सुरू आहेत. सहा रुग्ण नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात आढळले असून, ग्रामीण भागात चार रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी निफाड तालुक्यात दोन, तर सिन्नर व नांदगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या १७ रुग्णांपैकी चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्यामध्ये सिन्नर आणि महापालिका क्षेत्रातील एकाचा समावेश आहे.

उपाययोजनांवर भर

स्वाइन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी यंत्रणेला दिले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वाइन फ्लू कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिकेनेही स्वाइन फ्लू संशयितांवर उपचारांसाठी उपाययोजना केल्या आहेत. स्वाइन फ्लूवर टॅमी फ्लूची गोळी उपयुक्त मात्रा ठरत असून, जिल्ह्यात १६ हजार गोळ्या उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.

खासगी हॉस्पिटलनाही परवानगी

सर्व वैद्यकीय साधनसामग्रीने सज्ज खासगी हॉस्पिटल्सना स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. हॉस्पिटल्सना तशी परवानगी असली तरी संबंधित रुग्णावर कोणते उपचार सुरू आहेत, किती दिवस उपचार सुरू राहणार आहेत यासह संबंधित रुग्ण दगावल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images