Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘जीआर’चा प्रश्न दिल्लीदरबारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील लष्करी हद्दीलगतच्या मिळकतींसाठी अडचणीचा ठरलेला संरक्षण मंत्रालयाने नुकताच जारी केलेला शासकीय आदेश रद्द व्हावा, या मागणीसाठी बाधित मिळकतधारकांचे शिष्टमंडळ खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संरक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहे. याशिवाय हा प्रश्न थेट लोकसभेत उपस्थित करण्याचे आश्वासनही खासदार हेमंत गोडसे यांनी शनिवारी दिले.

संरक्षण मंत्रालयाच्या या वादग्रस्त ‘जीआर’मुळे बाधित होणाऱ्या मिळकतधारकांची नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे शनिवारी दुपारी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. शहरातील संरक्षण विभागाच्या हद्दीलगतचे बहुतांश मिळकतधारक या बैठकीस उपस्थित होते.

या मिळकतधारकांवर संरक्षण मंत्रालयाच्या ‘जीआर’मुळे अन्याय होणार असल्याची बाब या बैठकीत अधोरेखित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ‘जीआर’संदर्भात अधिक विचारविनिमय करून पुढील धोरण आखण्यासंदर्भात शनिवारी इच्छामणी लॉन्स येथे मिळकत बाधितांची बैठक झाली. यावेळी नगरसेवक केशव पोरजे, प्रशांत दिवे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, तसेच नरेश कारडा, माजी नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे आदी उपस्थित होते.


असा आहे ‘जीआर’...

संरक्षण मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका ‘जीआर’नुसार नाशिकमधील लष्करी हद्दीपासून १०० मीटरपर्यंत बांधकामांना प्रतिबंध, तर ५०० मीटर पर्यंत १५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकामांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. या निर्णयाचा फटका नाशिकमधील लष्करी हद्दीलगतच्या शेतकऱ्यांसह व्यावसायिक, उद्योजक, शासकीय व निमशासकीय संस्थांना बसणार आहे.

...आता बंधने अयोग्य

सन १९९३ व २०१३ या वर्षाच्या नाशिक महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याच्या मान्यतेवर संरक्षण खात्याने हरकत घेणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळे यलो झोनमध्ये नागरिकांनी मिळकती विकत घेतल्या. आता या मिळकतींवर अशा प्रकारची बंधने संरक्षण मंत्रालयाने घालणे अयोग्य असल्याची ठाम भूमिका याप्रसंगी उपस्थित मिळकतधारकांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्लासेसच्या प्रवेशांवर पालकांची नजर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावी व बारावीच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात असून या विद्यार्थ्यांना लवकरच सुट्या लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा शुक्रवारीच संपल्या आहेत. तर दहावीचाही केवळ संस्कृतचा पेपर होणे बाकी आहे. या परीक्षानंतर पुढे काय करायचे?, याची दिशा अनेक विद्यार्थ्यांनी निश्चितही केली असून त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. निश्चित शाखेनुसार अनेक विद्यार्थी, पालक शहरातील नावाजलेल्या क्लासेसमध्ये चौकशी करीत असून त्यांच्या नजरा अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यावर खिळल्या असल्याचे दिसून येत आहे.
दहावी व बारावी हे दोन्ही वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. या वर्षांतील मार्कांवरच कोणत्या क्षेत्रात करिअर करता येणार याची दिशा निश्चित होत असते. या परीक्षा संपल्या की विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील ताण हलका होतो. वर्षभर या परीक्षांच्या चिंतेमुळे कधी एकदा या परीक्षा होतायेत, अशी अनेकांची भावना झाली होती. त्यामुळे या परीक्षांच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थी निर्धास्त होत आहेत. परंतु, आजच्या स्पर्धेच्या युगात करिअरच्या पुढील टप्प्यांचे नियोजनही लवकरात लवकर करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे व ज्यांच्या करिअरच्या दिशाही निश्चित आहे, असे विद्यार्थी थेट अकरावी, बारावीच्या वर्गांसाठी क्लासेसच्या पॅकेजची चौकशी करीत आहेत.
हल्ली कॉलेजपेक्षा विद्यार्थी क्लासेसमधील लेक्चर्सवर अधिक लक्ष केंद्रीत करीत असतात. सायन्स या शाखेसाठी अनेक प्रचलित क्लासेस शहरात असून या परीक्षा झाल्या की ताबडतोब अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याची चौकशी करून ठेवली जात आहे.



टायअपचं काय?
गेल्या काही वर्षांपासून क्लासेस आणि कॉलेजांचे टायअप हा विषय समोर आला आहे. दहावीतून अकरावीत गेलेल्या विद्यार्थ्यांनी अशा एखाद्या प्रचलित क्लासमध्ये प्रवेश घेतला की त्यांचा प्रवेश क्लाससोबत टायअप केलेल्या कॉलेजमध्येही निश्चित होतो. तसेच त्यांना कॉलेजांमध्ये उपस्थित राहण्याची सक्तीही नसते. मात्र, अशा नियमबाह्य पद्धतींमुळे प्रवेशांचा अतिरिक्त भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून अशा कॉलेजांवरही कारवाई केली जाईल, अशी तंबी शिक्षण विभागाने दिली होती. येत्या काळात अशा क्लासेसवर खरेच कारवाई होते की नाही, हेदेखील दिसून येणार आहे.



क्लासचालक प्राध्यापकांवर आक्षेप
कॉलेजांमध्ये चांगल्या वेतनावर काम करूनदेखील काही प्राध्यापक बाहेरही खासगी क्लासेस चालवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. खासगी क्लासेस संघटनांनी या विरोधात अनेकदा आक्षेपही घेतला आहे. त्यामुळे सजग पालक या बाबींची शहानिशाही करताना दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यात वीजखांबांचा अडथळा

$
0
0

नाशिकरोड परिसरातील स्थिती; प्रशासनाकडे खांब हट‌विण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी पथदीपांचे खांब रस्त्यात आल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. रस्त्यामध्ये असलेले हे विजेचे खांब रात्री दिसत नसल्यामुळे त्यांना वाहने धडकून चालक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे हे खांब त्वरित स्थलांतरित करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

जेलरोड येथील इंगळेनगर चौकातून पवारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण होऊन दोन वर्षे झाली तरी रस्त्यातील दोन डझन खांब हटवण्यात आलेले नाहीत. महापालिका आणि महावितरणकडे नागरिकांनी मागणी केल्यानंतर लवकरच खांब हटविले जातील असे सांगण्यात आले. परंतु, दोघांनीही अद्याप नागरिकांना दिलेला शब्द पाळलेला नाही. हा रस्ता भरपूर रुंद झाला आहे. तसेच खड्डेही बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे.

अपघाताचा धोका

इंगळेनगर चौकातून उपनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरही विजेचे खांब आता रस्त्याच्या मध्यभागी आले आहेत. या रस्त्यावरील पथदीपे अनेकदा बंद असतात. तसेच रस्त्यात खड्डेही आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. परिसरातील सिन्नरफाटा, जयभवानीरोड, विहितगाव, देवळालीगाव, जेलरोड पवारवाडी, एकलहरे या ठिकाणी रस्त्यात येणाऱ्या खांबामुळे अपघात होऊन अनेक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकी आणि चारचाकी वाहने या मार्गावरून वेगाने जातात. खांब न दिसल्यामुळे अपघात झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पवारवाडी रस्त्यावर महिनाभरापूर्वी महिला दुचाकीस्वार

खांबाला धडकून जखमी झाली. नेहरूनगरमधून शिखरेवाडीकडे जाताना असाच एक वीजेचा खांब अऩेक वर्षांपासून रस्त्याच्या मध्यभागी उभा आहे. नवीन वसाहतींमध्ये अशा खांबांची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे अशा अपघातग्रस्त विजेच्या खांबांचे सर्वेक्षण करून ते त्वरित हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिकरोड, उपनगर, टाकळीसह शहरातील विविध भागातील कालन्यांमधील रस्त्यात आलेले पथदीप हटविणे महावितरण आणि महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे ते हटविणे आवश्यक आहे. अपघात झाल्यास प्रशासनच त्याला जबाबदार राहील.

-सोपान वाटपाडे, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षांचा धोका रोखणार कोण?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक महापालिकेने शहरातील रस्त्यात येणाऱ्या वृक्षांना हटविण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. परंतु, असे असतानादेखील रस्त्यात येणाऱ्या वृक्षांमुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातच शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या गंगापूररोडवर वृक्षांचा धोका रोखणार कोण, असा सवाल वाहनचालकांसह रहिवाशी उपस्थित करत आहेत. महापालिका आयुक्तांनी नव्याने वृक्षांची लागवड करण्यासाठी ठेकेदार नेमला असताना मोडकळीस आलेल्या वृक्ष हटविण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. तसेच रस्त्यात येणाऱ्या वृक्षांचा कायमस्वरूपी अडथळा दूर करण्यासाठी नव्याने वृक्ष लागवड सुरू करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ अशी म्हण अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात वृक्षांचे सर्वंधन करण्यासाठी ऐकत असतो. परंतु, तेच वृक्ष सर्वसामान्यांच्या जिवावर उठल्यावर काय म्हणायचे असाही प्रश्न समोर उभा राहतो. वृक्ष लागवड केली पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु, रस्त्यात येणारी वृक्ष कोणाच्या जिवावर बेतत असतील तर त्यावर उपाय करण्याचीदेखील गरज आहे.

शहरातील गंगापूररोडवर गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यात येणाऱ्या वृक्षांवरून वाहनचालक व रहिवाशी नाराजी व्यक्त करत असतात. त्यातच अनेकवेळा झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राणदेखील गमवावे लागले आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्तांनीच रस्त्यात येणारी वृक्ष हटविण्यासाठी नव्याने वृक्ष लागवडीचे काम ठेकेदाराला दिले आहे. नेहमीच होत असलेल्या अपघातांमुळे गंगापूररोडला अपघात रोड म्हणून जणू काही ओळखच निर्माण झाली आहे. यासाठी महापालिकेने तत्काळ रस्त्यात येणारी वृक्ष हटवून वाहनचालकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महापालिकेने गंगापूररोडवरील अतिक्रमण मोहिम हटविताना रस्त्यात येणारी वृक्ष मात्र हटवली नाहीत. यामुळे अनेकदा अपघात होत असल्याने त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. मोळकळीस आलेल्या वृक्षांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची गरज आहे.

-गजानन गायकवाड, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णसेवा पूर्ववत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारल्यानंतर दोन दिवस शहरातील दवाखाने बंद होते. पण, शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व हाॅस्पिटल्स व दवाखाने सुरू झाल्यामुळे रुग्णसेवा पूर्ववत झाली आहे. नाशिकमध्ये काही डाॅक्टरांनी शुक्रवारी सायंकाळपासूनच सेवा सुरू केली होती. मात्र, रुग्णांना माहिती नसल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. पण, शनिवारी दोन दिवसांच्या बंदनंतर अनेक दवाखाने व हाॅस्पिटल्समध्ये गर्दी दिसून आली.

गुरुवारी जिल्ह्यात अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे असंख्य रुग्णांना दवाखान्यांतून उपचारांविना परतावे लागले होते. काम बंद केलेल्या डॉक्टरांनी सर्व रुग्णांना आम्ही महापालिका व जिल्हा रुग्णालयात पाठवत असल्याचे सांगितल्यामुळे रुग्णांमध्ये प्रचंड संताप होता. अगोदर हे आंदोलन तीन दिवस सुरू ठेवण्याची घोषणा डाॅक्टरांनी केली, त्यानंतर बेमुदत आंदोलन करण्याचे सांगितले. त्यामुळे रुग्णांचा प्रश्न तीव्र झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा अतिदक्षता विभाग सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. पण, डाॅक्टारंनी पूर्ण बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यावर सर्व स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सरकारने पुढाकार घेतला. डॉक्टर्स संघटनांची मुख्यमंत्र्यांसमवेतची बैठक शुक्रवारी यशस्वी झाल्याने काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. मुंबईत झालेल्या या निर्णयानंतर जिल्ह्यातील डाॅक्टरांनी तातडीने सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल पाच हजार डाॅक्टर्स व ९०० हून अधिक दवाखान्यांची सेवा पूर्ववत झाली आहे.

--

मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारपासून आम्ही आंदोलन मागे घेऊन रुग्णसेवा सुरू केली. त्यानंतर शनिवारी सर्वांना माहिती झाल्यानंतर सर्वच ठिकाणी गर्दी होती. रुग्णांना चांगली सेवा देण्याची आमची प्राथमिकता आहे.

-अनिरुद्ध भांडारकर, अध्यक्ष, आयमा

--

‘सिव्हिल’मध्ये सशस्त्र पोलिस तैनात

नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणारी अरेरावी मोडून काढण्यासाठी दोन सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी याबाबत निर्णय झाला होता. रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मार्ड संघटनेसह खासगी डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत बंदचे हत्यार उपसल्यानंतर पोलिस संरक्षण पुरविण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच येथे एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे आदींनी शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. गजानन होले आदींशी चर्चा करीत लागलीच दोन सशस्त्र पोलिस पुरविण्याची हमी दिली, तसेच पोलिस बीट मार्शल दर दोन तासांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी दोन बंदूकधारी पोलिस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजर झाले. खासगी हॉस्पिटल्समधील डॉक्टरांना पोलिस अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक देण्यात आले असून, अनुचित घटनेची जाणीव होताच संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारी व खासगी डॉक्टरांनी संप पुकारला होता. यामुळे सर्वांचे हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वासंती दुर्गापूजा २ एप्रिलपासून

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तपोवनातील भारत सेवाश्रम संघातर्फे श्री श्री महाशक्ती वासंती दुर्गा पूजा आणि हिंदुधर्म महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ६ एप्रिल या दरम्यान हा सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमात रोज सकाळी ७ वाजता भक्तांना दीक्षा, साधना व उपदेश प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी रविवारी (२ एप्रिल) रोजी महाषष्ठीपूजा होणार असून श्रींना आमंत्रण व अधिवास देण्यात येणार आहे. ३ एप्रिलला पूजा, पुष्पांजली, आरती, भंडारा, महाप्रसाद वितरण तसेच सायंकाळी ७ वाजता नृत्यांगण डान्स अकादमीतर्फे सृष्टी ग्रुपद्वारे डान्स हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता शर्मिष्ठा सरकार यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच संधीपूजाही होईल. ५ एप्रिल रोजी महानवमी पूजेत नाशिक बंगीय परिषदेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता रामकुंडात देवी मूर्ती विसर्जन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी परिपूर्णानंद महाराज यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुरट्या चोरट्यांनी पळविल्या कोंबड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चोरीचे अनेक प्रकार नागरिकांनी अनुभवले आहेत. चोरटे काय पद्धत वापरून चोरी करतील, याचा काही नेम नाही. मात्र, दागिने अथवा रोकड सोडून थेट कोंबडी पळवणाऱ्या चोरट्यांबाबत सध्या चर्चा सुरू आहे. बॉयलर कोंबड्यांचे वितरण सुरू असताना टेम्पोमधील ४४ कोंबड्या दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी पळविल्याची घटना वडाळानाका भागात घडली आहे.

मझहर अमान खान (रा.सारडा सर्कल) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. मझहर खान चिकन सेंटर्सला बॉयलर कोंबड्या पुरवण्याचा उद्योग करतात. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वडाळानाका भागातील रजा ट्रेंडर्स येथील हबीब शहा मार्केटमध्ये ते कोंबड्या पोहचविण्यासाठी गेले होते. तिथे कोंबड्याचे वितरण करीत असताना त्यांनी कोंबड्यांनी भरलेला टेम्पो (एमएच ०४ सीपी २७४८) रस्त्याच्या कडेला उभा केला होता. टेम्पोजवळ कोणी नसल्याची संधी साधत मोपेडवर आलेल्या भामट्यांनी चार हजार रुपये किंमतीच्या ४४ कोंबड्या चोरी करीत पोबारा केला. मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुल्फीतून ५५ जणांना विषबाधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील बहिराणे, चिराई व महड येथे कुल्फी खाल्याने जवळपास ५५ जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. यात सर्वाधिक लहान बालकांचा समावेश आहे. त्यांना नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनील मोराणकर यांनी सांगितले.

बागलाण तालुक्यातील बहिराणे, महड, चिराई येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सायकलीवरून परप्रांतीय फेरीवाला कुल्पी विकण्यासाठी या परिसरात आला होता. वरील तीनही गावातील लहान, मोठ्यांनी सबंधित कुल्पी विक्रेत्यांकडून शुक्रवारी दुपारी मटका कुल्पी खाल्ली. त्यांनतर सायंकाळी त्यांना अचानक उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास जाणवू लागला. गावातील लोकांनी तत्काळ नामपूर रुग्णालयाच्या १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून बाधितांना रात्री आठच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विषबाधित रुग्ण व कसांत त्याची वय सिंधुबाई अहिरे (५५), भरत अहिरे (३३), चेतन अहिरे (५), कुसुम अहिरे (४५), सोनाली आहिरे (२२), कल्पना खैरनार (२४), पृथ्वीराज खैरनार (४), नंद‌िनी निकुंभ (४०), सुनीता शिंदे (२२), हर्षदा शिंदे (६), निकीता अहिरे (१०), मनोहर धोंडगे (१०), प्रसाद धोंडगे (६), मेघशाम धोंडगे (५५), गिरीश धोंडगे (१२), भैरव धोंडगे (३), अमोल सोनवणे (५), गोकुळ सोनवणे (४) आदींना उपचारासाठी नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. याशिवाय आणखी काही मुलांनादेखील विषबाधा झाली असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची जायखेडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कुल्फी विक्रेता अखिलेश रामप्रसाद कुमावत यास ताब्यात घेण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समित्यांचा विकास आराखडा कागदावरच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सहकार चेहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने चार वर्षांपूर्वी आगामी पाच वर्षांसाठीचा आराखडा पणन महामंडळाला सादर करण्याचे निर्देश दिले. पण हे आराखडे नंतर कागदी घोडेच ठरले. त्यानंतर पुन्हा नियमात बदल केले. त्यामुळे या बाजार समितीची परिस्थिती दयनीय तर आहेच पण त्याकडे आजही सरकार गांभीर्याने बघत नाही. या आराखड्यात कृषी मालाची खरेदी-विक्री होणाऱ्या बाजार समित्यांनीही बदलांचा वेध घेत त्यांचा व्यवसाय विकास आराखडा तयार केला होता. पण त्यावर १० टक्केही काम झाले नसल्याचे समोर आले आहे.

२०१३ साली राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आगामी पाच वर्षांचा व्यवसाय विकास आराखडा (बिझनेस डेव्हलपमेंट अॅक्शन प्लॅन) तयार केला होता. त्यात उत्तर महाराष्ट्रातील ३८ बाजार समित्यांनी त्यांचे आराखडे पणन महामंडळाला सादर केले. हा आराखडा पणन मंडळाद्वारे राज्य सरकारला पाठविण्यातही आला. पण त्यानंतर त्यावर ठोस कामच झाले नाही. तोट्यात असणाऱ्या बाजार समित्यांना या आराखड्याचा विशेष फायदा झाला असता, पण सरकारी कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार घडला. याला चारवर्षे उलटली पण त्यावर ना विरोधक बोलले ना सत्ताधारीने कधी आवाज उठवला. विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीनेही कधी याबद्दल कधी विचारणा केली नाही.

काय होते आराखड्यात?

प्रत्येक बाजार समितीकडे सद्यस्थितीत किती पायाभूत सुविधा आहेत, समितीची सद्यस्थिती काय आहे, उत्पन्नाचे स्त्रोत कुठले आहेत, बाजार समिती आगामी पाच वर्षात टप्प्याटप्प्याने कुठल्या पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे, त्यासाठी त्यांच्याकडे निधी कोठून येणार आहे, यासह विविध बाबींवर प्रकाश टाकणारा हा आराखडा होता.

कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन महामंडळाकडे आराखडा पाठवला. पण नंतर दुष्काळ व बाजार समितीची आर्थिक स्थितीही खालावली. त्यामुळे हा विकास आराखडा कागदावरच राह‌िला.

-अशोक देसले, सचिव, कृऊबा, मालेगाव

सत्ता बदलली की पॉलिसी बदलते. त्यामुळे पाच वर्षाचा विकास आराखड्यात काही कामे झाली. आम्ही प्राथमिकतानुसार आराखडा तयार करतो व त्यावर काम करतो.

- योगेश अमृतकर, कृऊबा नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नास्तिकतेची लढाई समाजातील कट्टरतेविरुद्ध!

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्ञानावर आजवर धर्मसत्तेचे नियंत्रण राहिल्याने मानवी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ईश्‍वर ही मानवी कल्पना असल्याचे नास्तिकांचे ठाम मत असले, तरी नास्तिकांची लढाई धर्माविरुद्ध नसून धर्माच्या नियंत्रणाविरुद्ध, त्यातील कट्टरतेविरुद्ध असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत इरफान इंजिनीअर यांनी केले.

विवेकधारा संघटनेच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित तिसऱ्या नास्तिक मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. नास्तिकांच्या ‘ब्राइट’ संघटनेचे संस्थापक कुमार नागे, निखिल जोशी, चैताली शिंदे, प्रमोद सहस्रबुद्धे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह लोकेश शेवडे, दीप्ती राऊत, उद्योजक संदीप भावसार आणि विवेकधाराचे प्रवर्तक अमित जोजारे विचारमंचावर उपस्थित होते.

यावेळी इंजिनीअर यांनी जगातील तत्त्वज्ञानाचे प्रवाह, धर्मसत्ता, नास्तिक विचारधारा याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले. ते म्हणाले, की जगात आदर्शवादी (आयडियालिस्ट) व भौतिकतावादी (मटेरियालिस्ट) असे तत्त्वज्ञानाचे दोन प्रवाह कार्यरत असून, त्यापैकी आदर्शवादी तत्त्वज्ञानाची विचारधारा ‘ब्रह्म सत्य, जगत् मिथ्या’ अशी आहे, तर भौतिकतावादी विचारधारा अनुभवावर आधारित आहे. आदिम काळापासूनच आदर्शवादी विचारधारा उदयास आली. धान्य, पाणी, हवा देणारा निसर्ग हा अतिवृष्टी, दुष्काळासारखी संकटेही आणतो, ही गोष्ट तेव्हाच्या लोकांच्या आकलनापलीकडची होती. त्यामुळे निसर्ग प्रसन्न होतो तेव्हा तो सुख देतो आणि कोपतो तेव्हा संकटे आणतो, अशी समजूत रुढ झाली. मग निसर्गाची कृपा पदरात पाडून घेण्यासाठी कर्मकांडे होऊ लागली.

समाजातील एका विशिष्ट वर्गाने याला बळकटी दिली. प्रारंभी ३३ कोटी देव असल्याचे मानले जाऊ लागले, पुढे ही संख्या तीनवर व नंतर एकेश्‍वरवादावर येऊन ठेपली. ईश्‍वर ही संकल्पना दिवसेंदिवस बदलत गेली, हा ईश्‍वर ही मानवी कल्पना असल्याचा पुरावाच मानायला हवा.

पुरातन काळापासून ज्ञानावर धर्मसत्तेचे नियंत्रण राहिल्याने मानवी समाजाचे मोठे नुकसान झाले; अन्यथा सद्यस्थितीपेक्षा मानवाने अधिक प्रगती केली असती. मात्र, धर्मसत्तेविरुद्ध बोलणाऱ्यांना राक्षस वा कनिष्ठ जातीचे म्हणून हिणवले गेले. चार्वाक, बुद्ध, जैन या विचारधारेने हा समज खोडून काढत समाजाला तर्काच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला. धर्माचे केंद्र ईश्‍वर नव्हे, तर नैतिकताच असायला हवे. सध्याच्या काळात लोक असुरक्षित झाले असून, तर्कसंगत समाजनिर्मितीसाठी शोषितांचे जीवन सुसह्य करणे ही गरजेची बाब झाली आहे, असेही इंजिनिअर म्हणाले.

दरम्यान, अमित जोजारे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी मेळाव्यामागील भूमिका स्पष्ट केली. श्यामला चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रसाद भट्टड यांनी जाहीरनाम्याचे वाचन केले. प्रियदर्शन भारतीय यांनी सूत्रसंचालन केले. भाविन पाटील यांनी आभार मानले.

धर्मनिरपेक्षता ही पाश्‍चात्त्य संकल्पना असल्याची टीका संघ व हिंदुत्ववादी नेहमी करीतात. मात्र, धर्मनिरपेक्षता व त्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्ये बौद्ध तत्त्वज्ञान व भारतीय श्रम परंपरेतून घेतल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता ही विदेशी नव्हे, तर संपूर्णत: भारतीय संकल्पना असल्याचे इंजिनिअर यांनी यावेळी स्पष्ट केले.

नास्तिकता जीवनशैली!

मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात निखिल जोशी व चैताली शिंदे यांच्या मुलाखतीतून नास्तिक जीवनशैलीचा प्रवास उलगडला. दीप्ती राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. नास्तिक व्यक्तींना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी व त्यावर केलेली मात यावर या मुलाखतीतून प्रकाश टाकण्यात आला. याच सत्रात कुटुंबातील नास्तिकता, भारतीय कायद्यात नास्तिकांना अपेक्षित बदल, बुद्धिप्रामाण्याचा प्रचार-प्रसार, नास्तिकतेशी सुसंगत जीवनपद्धती, संयुक्तिक काय? अज्ञेयवाद की नास्तिकता? या विषयांवर गटचर्चा झाली. चैताली शिंदे, निखिल जोशी, प्रमोद सहस्त्रबुद्धे, संदीप भावसार, लोकेश शेवडे यांनी चर्चेची सूत्रे सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेट्रीचंड उत्सवाचे बुधवारी आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

भगवान झुलेलाल यांचा जन्मदिन व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिंधी बांधवांच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या चेट्रीचंड उत्सवाचे आयोजन बुधवारी (दि. २९) करण्यात आले आहे. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसाचे औचित्य साधून महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते यांचा सत्कार केला जाणार आहे.

भगवान झुलेलाल मंदिरात सकाळी आरती व अन्य कार्यक्रम पार पडतील. बुधवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात होईल. सकाळी साडेदहा वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून दुचाकी वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी साडे चार वाजता शालिमार येथील झुलेलाल मंदिरापासून रामकुंडापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी बेराणा साहेब पूजन केले जाणार असून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त रामकुंडावर रात्री आठ वाजता आयोजित कार्यक्रमात महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते तसेच अन्य मान्यवरांचाही सत्कार यावेळी केला जाणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधी पंचायत समितीचे अध्यक्ष नानिकराम मदनानी, नानीक मदनानी, दीपक पंजाबी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकअपसह कोंबड्यांची चोरी

$
0
0

नाशिक ः कोंबड्यांची चोरी झाल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. चोरट्याने पीकअप व्हॅनसह तब्बल दीड लाख रुपयांच्या कोंबड्यांची परस्पर विल्हेवाट लावली. मौसीन शेख अब्दुल शेख (शहाजनी मशीद, जीपीओ रोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी तौफीक मो. हुसेन अख्तार याने तक्रार दिली आहे. २४ मार्च रोजी संशयित आरोपीकडे फिर्यादीने पीकअप व्हॅनमध्ये प्रत्येकी दोन किलो वजनाच्या ९०० कोंबड्या दिल्या होत्या. या कोंबड्या चालक शेखला गुजरात राज्यात घेऊन जायच्या होत्या. मात्र, रस्त्यातच शेखने कोंबड्याची परस्पर विल्हेवाट लावत पीकअप व्हॅनही पळवली. यापूर्वी, व टेम्पोमधील ४४ कोंबड्या दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी पळविल्याची घटना वडाळानाका भागात शनिवारी घडली होती.

आडगावात ट्रकची चोरी

आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनलसमोरील राजस्थान ट्रान्सपोर्ट येथे पार्क केलेली ट्रक चोरट्यांनी लंपास केला. आडगाव पोलिसांनी २० मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. किसानसिंग राजपूत (२६, ग्रामदेवराज, जोधपूर, राजस्थान) याने या प्रकरणी तक्रार दिल आहे. चोरट्यांनी घटनेच्या दिवशी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास १० चाकी ट्रक लंपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कार्यालयातच घुसखोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शरणपूररोडवरील जुने पोलिस आयुक्तालयात काही नागरिकांनी घुसखोरी करीत कार्यालयाच्या काचा फोडल्या. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. संबंधित नागरिकांना पोलिसांनी लागलीच अटक करीत त्यांची जामिनावर सुटका केली.

जुने पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीत सध्या, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आणि वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. ही जागा एका ख्रिश्चन मिशनरीच्या मालकीची असून, या बाबत पोलिस आणि संबंधितांमध्ये भाडेकरार झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा भाडेकरार काही वर्षांपूर्वी संपुष्टात आला. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गंगापूररोडवरील पोलिस मुख्यालयाच्या जागेवर पोलिस आयुक्तालयाची इमारती बांधली. मात्र, पोलिस आयुक्तालय स्थलांतरीत होऊनही पोलिसांनी शरणपूररोडवरील जागा खाली केली नाही. या पार्श्वभूमीवर, शनिवारी (२५ मार्च) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ऑस्टो स्कूल मागे, मिशनमळा येथे राहणाऱ्या लता अनिल मकासरे, मंदा प्रमोद मकासरे, मंदाकिनी मनोवेल हिवाळे, प्रमिला बाळासाहेब व्हसाळे, संगिता अनिल गायकवाड, राजेश तिमती गायकवाड, सुनील राठोड, मासापा बिचप्पा मिनगिरे, रिझवान चौधरी, जितेंद्र सुकलाल कौल तसेच राजकुमार पंडित आदींनी पोलिस उपायुक्ताच्या कार्यालयावरच मोर्चा काढला. यावेळी सर्वांनी ‘राहण्यासाठी घर पाहिजे’ अशा घोषणा देत थेट पोलिस कार्यालयातच ठाण मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यालयाची खिडकी तोडून नुकसान केले. यानंतर, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे आदींनी संबंधितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सर्व संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करीत जामिनावर सुटका करण्यात आली.


दोन ठिकाणी घरफोडी

बंद घराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी घरातील मुद्देमाल चोरी केल्या प्रकरणी अंबड आणि उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. उत्तमनगर येथील एन ५३, एसएफ ६३/६५ येथे राहणाऱ्या दत्तात्रय किसन सोपे यांच्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी २५ मार्चच्या मध्यरात्री साडेतीन ते साडेपाच वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराच्या मागील दाराला छिद्र पाडून आतील कड्या उघडल्या. यानंतर, घरातील लोखंडी कपाटत ठेवलेले चार तोळे वजनाचे मंगळसूत्र, एक तोळ्याची सोन्याची चेन कानातील कर्णफुले तसेच पाच हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरी केला. अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पीएसआय गांगुर्डे करीत आहे. दरम्यान, उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतील सायखेडारोडवरील विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या मंगेश संपतराव थेटे यांचेही घर चोरट्यांनी फोडले. २३ ते २४ मार्च दरम्यान हा प्रकार घडला. चोरट्यांनी थेटे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले ६० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच एक मोबाइल चोरी करून नेला. घटनेचा अधिक तपास पीएसआय एस. बी. पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणूकदारांची दुहेरी फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेला हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंटचा (एचओआय) मुख्य सूत्रधार आणि संचालक विनोद पाटील याने फरार झाल्यानंतर दिल्लीतील एका कंपनीचे तब्बल तीन कोटी रुपयांचे शेअर्स विकण्याचे कंत्राट घेतले होते. यातील पावणेदोन कोटी शेअर्स त्याने पूर्वीचाच गुंतवणुकदारांना विकले. एकदा फसवणूक झाल्यानंतर पुन्हा शेकडो गुंतवणुकदारांनी पाटीलकडून कोट्यवधी रुपयांचे शेअर्स घेतले. ‘एचओआय’च्या घोटाळ्यानंतर आणखी फटका गुंतवणुकदारांना बसला आहे.

‘एचओआय’ कंपनी डबघाईस आल्यानंतर मुख्य संचालक विनोद पाटील फरार झाला. तब्बल सहा महिने तो मुंबईतील मलाड येथे उमेश संपत शिंदे असे नाव बदलून राहिला. या काळत त्याने दिल्लीतील दी व्हीनस फॅब्रिक या कंपनीच्या संचालकाची भेट घेतली. तुमच्या कंपनीचे तीन कोटी शेअर्स विक्री करून देतो, त्या मोबादल्यात कमिशन देण्यात यावे, अशी अट त्याने कंपनीसमोर ठेवली. सदर कंपनीने त्यास हिरवा कंदील दर्शविला. यानंतर, पाटीलने ‘एचओआय’च्या गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. गुंतवणुकदाराला जेवढे पैसे घ्यायचे त्याच्या १० टक्के शेअर्स विकत घ्यावे लागतील, अशी अट त्याने ठेवली. ‘पैसे परत मिळतील’ या अपेक्षाने गुंतवणूकदारांनी सरासरी ४०० रुपये दराने शेअर्स खरेदी केले. तब्बल एक कोटी ८२ लाख शेअर्स पाटीलने गुंतवणुकदारांच्या गळी उतरवले. मात्र, हा प्रकार सुरू असतानाच आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्यात. सध्या, ४०० रुपये शेअर्सची किंमत १७४ रुपये इतकी झाली असून, यात गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

ओळख बदलून दोन कंपन्या सुरू

संशयित विनोद पाटीलने साधारणतः चार वर्षांपूर्वी हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट (एचओआय) या गुंतवणूक कंपनीची स्थापना केली होती. यानंतर, त्याने परदेशात, जमिनीत तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा व्याजाचे अमिष गुंतवणूकदारांना दाखवले. मात्र, काहीच दिवसात कंपनीचे व्यवहार गोत्यात आले. गुंतवणुकदारांनी तगदा व पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर पाटील मुंबईत फरार झाला. मात्र, फसवणुकीच्या एवढ्या मोठ्या प्रकारानंतरही तो थांबला नाही. तिथे त्याने ऑरेंज कॅपिटल आणि आणखी एक गुंतवणूक कंपनी सुरू केली. यासाठी त्याने मलाडमध्ये एवर शाईन या इमारतीत एक गाळा भाड्याने घेतला होता. मागील दोन महिन्यांपासून गाळामालक पोलिस व्हेरीफिकेशन आणि करारासाठी मागे लागूनही पाटीलने यात चालढकल केली.

चेक बाऊन्सप्रकरणी कारवाईची शक्यता

गुंतवणूक कंपन्या थाटणाऱ्या विनोदने दुसरीकडे परदेशी पर्यटकांसाठी गाईड म्हणून काम केले. यासाठी पाटीलने एका ब्रोकरकडून कार खरेदी केली. आगाऊ रक्कम म्हणून त्याने एक लाख रुपयांची रोकड दिली तर एक लाख रुपयांचा चेक दिला. हा चेक ‘एचओआय’ कंपनीच्या खात्याशी निगडीत होता. त्यामुळे सहाजिकच तो वठला नाही. आता या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन पाटीलवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत गुंतवणुकीच्या नावाखाली पाटीलने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष तक्रारदार समोर आला नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी जाचातून मोहाची फुले ‘मुक्त’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोहफुलांना सरकारी जाचातून मुक्त करण्यात येत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात त्याचा फायदा होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत नुकतेच मोह फुले हे वनोपज वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात आदिवासी बहुल भागात मोह वृक्षांची संख्या जास्त आहे. यापासून तयार होणारे वनोपज मोह फुले हे खाद्य पदार्थ असून त्यापासून शेतीपूरक व्यवसायही करता येतो. त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. राज्यात मोहफुलांची शेती केली जाते. त्यापासून वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून याची बाजारपेठही तयार राज्यात इतर ठिकाणी झाली आहे. अशीच व्यवस्था जिल्ह्यातही करून तेथील आदिवासीनाही त्याचा फायदा मिळणार आहे. मोह फुलांवरील कायदेशीर बंधनामुळे त्याचा व्यवसायासाठी वापर होत नव्हता. त्याचा फायदाही स्थानिकांना होत नव्हता. यासाठी ‘मोह फुले’ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार मोह फुलांच्या वाहतुकीसाठी वाहतुकीचे नियम लागू राहणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय, मोह फुले साठवणूक क्षमतेबाबतची बंधने शिथिल करणे व व्यापार खुला करणे याबाबतची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लवकरच करण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात एक लक्ष टन उत्पादन असून त्यामुळे येथे मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. मोहा फुलापासून शेतीपूरक जोडधंदा केल्यास सरबत, मुरब्बा, जामजेली, सॉस, चटणी आणि लाडू आदीसारखे पदार्थ बनविता येतात. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना हर्ब प्रकल्पात अशी कामे सुरू आहेत. अशीच कामे नाशिक जिल्ह्यामध्येही होऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मूकमोर्चातून चपराक!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘या ठिकाणी सिग्नल बसविले असते तर माझ्या भावांनो मी आज तुमच्यात असते’, ‘आई तू घरी का नाही आलीस परत?’ अशा हृदयाला हात घालणाऱ्या फलकांद्वारे गंगापूररोड परिसरातील रहिवाशांनी ढिम्म प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर आणखी बळी जाऊ नये, यासाठी सिग्नल बसवा तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने करा, अशी आर्त विनवणी अपघातातील मृत महिलांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी पोलिस आयुक्तांसह स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली.

अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोडवर जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाघ गुरूजी शाळेजवळील चौफुलीवर गुरूवारी झालेल्या अपघातात एका प्राध्यापिकेने जीव गमावला. अशाच एका अपघातात नीलिमा चौधरी या महिलेनेही अलिकडेच जीव गमावला. गंगापूर रोडवरील या जीवघेण्या अपघातांची मालिका थांबावी, अशी परिसरातील रहिवाशांची आंतरिक तळमळ आहे. म्हणूनच रविवारी सायंकाळी मृत महिलांच्या नातलगांसह शेकडो रहिवाशी रस्त्यावर उतरले. जेहान सर्कल चौकात हे सर्व लोक एकत्रित जमले. त्यामध्ये महिला आणि तरुणींचेच प्रमाण अधिक होते. रस्त्यावर पडलेली माती बाजूला करीत त्यापैकी काही जणांनी सिग्लनची प्रतिकृती हाती धरली. तर अन्य नागरिक मानवी संवेदना जागविणारे फलक हाती घेऊन शांतपणे उभे राहीले. सायंकाळी या चौकात मोठी वर्दळ असते. हे नागरिक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. घटनास्थळी हजर असलेल्या पोलिसांनी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याची काळजी घेतली.

लेवा सखी मंडळाच्या महिला तसेच परिसरातील रहिवाशी हाती फलक घेऊन शांतपणे थांबल्या होत्या. अशा किती बहिणी आणि भाऊ आपण अपघातांमध्ये गमावणार आहोत, किती जणांचे संसार उघड्या डोळ्यांनी उध्वस्त होताना पहाणार आहोत, असा सवाल या महिला आणि तरुणी अबोलपणेच करीत होत्या. ‘प्रिय मोना तुला जगायचे होते ना?’, ‘पुन्हा अशी कोणी मोना जाऊ नये’, ‘आई तू घरी का आली नाहीस ग परतून’, यांसारख्या फलकांद्वारे आता तरी वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असा संदेश प्रत्येक वाहनधारकाला दिला जात होता. आमदार सीमा हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ यावेळी उपस्थित होते.

पोलिस आयुक्तांना घेराव

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल जेहान सर्कल चौकात आले. त्यांना नागरिकांना गराडा घातला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी सिंगल यांच्याशी संवाद साधला. यापुढे पुन्हा अशा प्रकारे कुणाचा अपघाती मृत्यू होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा, असे आर्जव केले. पोलिसांकडे अधिकार आहेत. त्यांनी त्याचा प्रभावीपणे वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सिग्नल, सीसीटीव्ही बसविण्याची कामे प्रस्तावित आहे. याबाबत मनपा आयुक्तांशी चर्चा करू, अशी ग्वाही सिंगल यांनी दिली.

जेहान सर्कल ते शहीद चौकापर्यंत कॅन्डल मार्च
मार्चमध्ये महिला, तरुणींचा लक्षणीय सहभाग
प्रतिकात्मक सिग्नलची उभारणी
हृदयाला हात घालणाऱ्या घोषवाक्यांद्वारे जनजागृती
सफेद कपडे परिधान करून बहुतांश नागरिक रस्त्यावर
मूकमोर्चाद्वारे निषेध
गंगापूर रोडवर सिग्नल्स, दुभाजकांची मागणी
पोलिस आयुक्तांना मृत महिलेच्या कुटुंबीयांचा घेराव
पुन्हा कुणाचा जीव जाऊ नये, अशी अपेक्षा
वाहतूक नियोजनासाठी कठोर पाऊले उचलण्याची नागरिकांची मागणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टमनचे धरणे आंदोलन

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस येथील डाक कर्मचारी व पोस्टमन यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी आखिल भारतीय डाक कर्मचारी पोस्टमन संघटना वर्ग-४ आणि ऑल इंडिया पोस्टल एम्प्लाईज युनियन पोस्टमन व ग्रूप-डी आणि आखिल भारतीय डाक कर्मचारी संघटना वर्ग-३ यांच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन मुख्य पोस्ट ऑफिसबाहेर करण्यात आले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानुसार, आऊट सोर्सींग पोस्टल एजंट योजना करा करण्यात यावी, पोस्टमन व एमटीएसच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात, नोडल वितरण व्यवस्थेबाबत संघटेशी चर्चा करून बदल करावा, नवीन भरती होईपर्यत रोजंदारी कर्मचारी लावण्यावरील निर्बंध उठविण्यात यावे, रविवार व सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामावर बोलविणे थांबविण्यात यावे, कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळोवेळी बैठका घेवून त्यातील निर्णयाची अंमलबजावणी करावी.

यासह विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे आर.ए. पाटील, डी.एल. पाटील, डी.ए. सैंदाणे. पी.के. जोशी. ए.बी. बागूल, एस.आर. पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीची तोडफोड

$
0
0

धुळ्यातील प्रकार; तक्रार दाखल

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या महिंन्द्रा बोलेरो गाडीवर रविवारी (दि. १९) रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दगड मारून काच फोडल्याचा प्रकार घडला आहे. हे राजकीय विरोधकांनी केले असून माझ्या कामांवरून मला विचलित केले जात आहे, असा आरोप हिलाल माळी यांनी केला आहे. शिवसेना पक्षात असलेले शिवसैनिक खचून जात नाही. मात्र पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माळी यांनी बोलताना केली. याप्रकरणी माळी यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

शहरातील जुने धुळे भागात राहत असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या महिंन्द्रा बोलेरो क्रमांक (एमएच १८ एजी - ९००९) या गाडीचा मागील काच रविवारी, मध्यरात्री दोनच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी दगड मारून फोडला. काच फुटल्याच्या आवाजाने नागरिक जागे झाले असता त्यांना दुचाकीवर दोनजण जाताना दिसून आले. मात्र नेमके कोण होते ते मात्र समजू शकले नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना असे प्रकार विरोध केल्याशिवाय राहत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विरोध जाणीवपूर्वक त्रास देत आहेत, असे हिलाल माळी म्हणाले. परंतु, हे प्रकार यापुढे पुन्हा घडले तर यावर काहीतरी उपाय शोधल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी संघटनेचे भजन आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने लेखणी बंद आंदोलनाच्या सहाव्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन म्हणून आंदोलन करीत सरकारचा निषेध व्यक्त केला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले आहे.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेतर्फे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भेदभावाची वागणूक दिली जात आहे. समान न्याय व संधी या मागणीसह विविध मागण्यासाठी दि. १५ मार्चपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा सोमवारी (दि. २०) सहावा दिवस होता. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन पुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. सी. राजपूत यांनी सांगितिले. यावेळी सी. जी. देवरे, नंदकिशोर चौधरी, सुशील सोनवणे, विरेंद्र सावळे, डी. एम. पाटील, प्रकाश बोरसे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविणार

$
0
0

पोलिस अधीक्षकांची वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. रोहन म्हामूनकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तेथील सुरक्षा व्यवस्थेचा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी मंगळवारी (दि. २१) पोलिस अधिकाऱ्यांसह आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करून त्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबतही महाविद्यालय प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणीही वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक चैतन्या एस. उपपोलिस अधीक्षक हिंमत जाधव, पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांच्यासह अन्य जणांनी मंगळवारी (दि. २१) महाविद्यालयाची पाहणी केली. या पाहणीनंतर सविस्तर चर्चा करून वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे आश्वासन पोलिस विभागाकडून वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आले आहे. तर खासगी सुरक्षारक्षकांचीदेखील नेमणूक करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रकरणातील अपघातात जखमी झालेल्या राजू लष्कर नावाच्या युवकावर उपचार करण्याच्या वादातून जमावाने निवासी डॉक्टर रोहन म्हमूनकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यांना झालेल्या बेदम मारहाणीच्या प्रकरानंतर राज्यातील सर्व डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. या मारहाणीच्या विरोधात मोर्चे काढून त्याचा निषेधही व्यक्त केला होता.

डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा

पोलिस अधिक्षक चैतन्या. एस यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी रुग्णांकडून होणाऱ्या त्रासाबाबत आपल्या भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडल्या. तसेच यावेळी संपूर्ण महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. डॉक्टरांवर होणारे हल्ले कसे रोखता येतील यावर तात्काळ सुरक्षाव्यवथा आणि इतर गोष्टीची माहिती मिळवून बंदोबस्त करण्यात येतील असेही पोलिस अधिक्षकांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. रुग्णालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याने उपचार करणाऱ्या डॉक्टराशी वाद घालू नये. रुग्णाला कोणतीही तक्रार करावयाची असल्यास अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांच्याकडे करावी, असे पोलिस अधीक्षकांनी रुग्णाशी भेटीदरम्यान त्यांच्या नातेवाईकांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images