Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाद उद्योजकांचा; वैताग अधिकाऱ्यांना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

दोन उद्योजकांमधील वादाने सातपूरमधील एमआयडीसी कार्यालयातील कर्मचारी ‘कामाला’ लागले आहेत. दोघा अधिकाऱ्यांकडून निव्वळ आपला स्वार्थ साधण्यासाठी माहिती अधिकाराचे अस्त्र वापरले जात आहे. त्यांना माहिती पुरवितांना अधिकाऱ्यांची मात्र धावपळ उडाल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) भूखंड मिळविण्यासाठी दोन उद्योजकांमध्ये चढाओढ सुरू आहे. मात्र, त्याचा त्रास उद्योग भवनातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातील काही अधिकारी व कर्मचारी बदलीसाठी प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. स्थानिक लोकप्रतिनीधींनी यात लक्ष घालून चुकीचे काम करणाऱ्यांना रोखावे अशी अपेक्षा प्रामाणिक उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

‘एमआयडीसी’कडून भूखंड मिळविण्यासाठी उद्योजकांमध्ये चढाओढ लागली आहे. यातून अनेकदा उद्योजकांमध्ये वादही होतात. परंतु, त्यांच्यातील वादाचा परिणाम एमआयडीसीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना होऊ लागला आहे. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर होत असल्याचे म्हणणे काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे.
अनेकदा माहिती देण्यास उशीर झाल्यावर अपिलमध्येही जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उद्योगांच्या समस्या सोडविण्याऐवजी माहितीच्या अधिकाराचे काम करण्यात अधिक वेळ द्यावा जात असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
0000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेना-रिपाइं गटनोंदणी फेटाळली

$
0
0

स्थायी समितीचे गणित बदलले; शिवसेना जाणार हायकोर्टात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेतील स्थायी समितीची राजकीय गणिते बदलवणाऱ्या शिवसेना आणि आरपीआयची गट पुनर्नोंदणी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी फेटाळून लावली आहे. मुंबई प्रांतिक अधिनियम, १९४९ च्या कलम ३१ (अ) नुसार मह‌िनाभरात गट पुनर्नोंदणी करण्याची तरतूद असतानाही ती फेटाळण्यात आल्याने शिवसेना आता बुधवारी हायकोर्टात धाव घेणार आहे.
प्रशासनावर दबाव आणून भाजपने ही गट पुनर्नोंदणी फेटाळल्याचा आरोप शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि गटनेते विलास शिंदे यांनी केला आहे. या निर्णयामुळे स्थायी समितीवर भाजपचे बहुमत होणार आहे. त्यामुळेच राजकीय जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे स्थायी समितीचा त‌िढा पुन्हा हायकोर्टात अडकण्याची शक्यता आहे.
महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, अपक्ष आणि आरपीआय सदस्यांच्या खेळीने स्थायी समितीतील भाजपचे गणित बिघडले आहे. तीन अपक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेसोबत घरोबा करत गटनोंदणी केल्याने स्थायीमध्ये त‌िघांचे प्रत्येकी एक सदस्य जाणार आहे. संख्याबळानुसार सुरुवातीला भाजपचे नऊ तर शिवसेनेचे चार सदस्य जाणार होते. परंतु, आरपीआयच्या सदस्या दीक्षा लोंढे यांनी शिवसेनेसोबत गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भातील अर्ज शिवसेनेच्या वतीने डवले यांच्याकडे पुनर्नोंदणीसाठी करण्यात आला होता.

शिवसेनेचा गाफिलपणा नडला

शिवसेनेने निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने घाईगडबडीत आपल्या ३५ सदस्यांची गटनोंदणी करून घेतली. सुरुवातीला भाजपचे ९ तर शिवसेनेचे ५ सदस्य स्थायीत जाणार होते. मनसेचे ५ सदस्य असल्याने त्यांचा सदस्य जाणार नव्हता. परंतु, त्यानंतर मनसेने अपक्ष सदस्याला सोबत घेऊन स्थायीत एण्ट्री केली. त्यामुळे शिवसेनेचे गणित बिघडले. स्थायी समितीतल्या गणिताचा अभ्यास न करताच गटनोंदणी केली. शिवसेनेचे नेते गाफिल राहिल्यानेच भाजप व मनसेने डाव साधल्याचे बोलले जात आहे.

भाजपने प्रशासनावर दबाव टाकला असून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. घटनेने अधिकार दिला असतानाही, त्याची पायमल्ली केली जात असून, याविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत.
-अजय बोरस्ते,
महानगरप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज नववर्षारंभ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चैत्राची सुरुवात ज्या दिवसाने होते तो गुढीपाडवा. या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडव्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. पाडव्यानिमित्त होणाऱ्या उलाढालीसाठी विक्रेत्यांनी तयारी केली आहे.
गुढीपाडव्याला आनंदाचे प्रतीक म्हणून घरादाराला आंब्याची तोरणे बांधतात, फुलांच्या माळांनी घर सजवतात. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे.
कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.

अशी करा पूजा

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढी उभी करावी. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे. तिच्यावर कोरे कापड (खण)चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडुनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. गुढीला ब्रह्मध्वजही मानतात. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात. त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीगावात ५१ फुटांची गुढी

$
0
0

नाशिकरोड ः शिवसेनेच्या शिवकल्याणी महिला मंडळातर्फे देवळाली गावात आज सकाळी नऊ वाजता गुढी सन्मानाची उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी दिली. नदी, नीर, नारी यांच्या सन्मानार्थ ही ५१ फुटांची गुढी असेल. देवळाली गावातील ११ मंदिरांवर गुढी उभारली जाईल. यावेळी प्रभाग २२ मधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही होईल.

पंचवटीत स्वागत यात्रा

पंचवटी ः नववर्षाची स्वागत यात्रा पंचवटीतील आयुर्वेद महाविद्यालयातपासून सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी काढण्यात येणार आहे. त्यात राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदिदी, महंत रामसनेहीदास महाराज, महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज, योगगुरु अरुण एकबोटे, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी सक्षमतेला प्राधान्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आदिवासी विकास विभागासमोर अनेक आव्हाने आहेत. ती स्वीकारून आदिवासींना विकासाकडे नेण्यासाठी सेवाभावी लोकांचे आणि संस्थांचे सहकार्य मिळत आहे. त्यांच्या सूचनांनुसार आदिवासी विकास काम करीत राहणार आहे. आदिवासी सक्षम होण्यासाठी त्यांच्यासाठी असलेल्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याचे काम प्राधान्याने करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले. आदिवासी विकास विभागातर्फे २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांच्या आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या समारंभास ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महापौर रंजना भानसी, आमदार निर्मला गावित, जे. पी. गावित, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव, सचिव मनीषा वर्मा, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, किसन तडवी आदी उपस्थित होते. मंत्री सावरा म्हणाले, की आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना असल्या, तरी त्यांचा विकास झालेला नाही. यंदापासून २५ हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याचा आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. वसतिगृहात प्रवेश मिळत नसलेले आदिवासी विद्यार्थी स्वतंत्र खोली घेऊन राहत असतील, तर त्यांना राहण्याचा खर्च शासनातर्फे देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘विकासाआड लांडगे’

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आपल्या छोट्याशा भाषणात मंत्रालयातील आदिवासी विभागात कार्यरत बाबूशाहीवर तीव्र टीका केली. राज्य सरकार आदिवासींच्या विकासासाठी भरपूर योजना तयार करते. हे पुरणपोळीचे ताट आदिवासी मंत्रालयात तयार होते. परंतु, प्रत्यक्षात आदिवासींपर्यंत पोहोचत नाही. काही लांडगे मध्येच ते पुरणपोळीचे ताट गिळंकृत करतात, असा टोला मारत त्यांनी मंत्रालयातील लालफितीचा कारभार व भ्रष्ट कारभारावर तीव्र टीका केली. आदिवासींच्या विकासासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.


कविता ‍राऊतला देणार संधी

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात सेवेची संधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केली. आदिवासी विकासमंत्री सावरा यांनी त्यांच्या भाषणात कविताला कामाची संधी देण्यात येणार आहे. याविषयीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या संधीमुळे क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.


आदिवासी सेवक पुरस्कारार्थी

प्रमोद गायकवाड (नाशिक), रमेश रावले (कळवण, नाशिक), बापूराव साळवे (पिंपळगाव, अहमदनगर), डॉ. कांतिलाल टाटिया (शहादा, नंदुरबार), सरस्वती भोये (विक्रमगड, पालघर), लक्ष्मण डोके (जव्हार, पालघर), हरेश्वर वनगा (डहाणू, पालघर), मनोहर पादिर (कर्जत, रायगड), रामेश्वर नरे (महाड, रायगड), भगवान देशमुख (नांदेड), पूर्णिमा उपाध्ये (गारखेडा, अमरावती), सुनील देशपांडे (लवादा, अमरावती), सदाशिव घोटेकर (सरपधरी, यवतमाळ), सुखदेव नवले (कारकीन, औरंगाबाद), प्रमोद पिंपरे (गडचिरोली) या आदिवासी सेवकांना २५ हजार रुपये, सन्मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.


पुरस्कारार्थी आदिवासी सेवा संस्था

शाश्वत संस्था, मंचर, जि. पुणे, विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचालित राष्ट्र सेवा समिती, ग्रामविकास केंद्र, वसई, जि. पालघर, डॉ. हेगडेवार सेवा समिती, नंदुरबार, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा, जि. गडचिरोली, वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रदेश, सुयश चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबिवली, ता. मुळाशी, जि. पुणे या संस्थांना ५० हजार रुपये, सन्मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

आयुक्तच आदिवासी सेवक

आदिवासी विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी आयुक्तपद बाजूला ठेवून आदिवासी सेवकाची भूमिका निभावली. विभागातील इतर अधिकारी ऐटीत बसले असताना जाधव यांनी मात्र प्रोटोकॉल बाजूला ठेवून पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन केले. पुरस्कारार्थींना स्टेजवर कसे आणायचे इथपासून तर पुरस्कारार्थींना दिले जाणारे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह स्वतः हातात घेऊन ते नेत्यांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले. पुरस्कारार्थींना व्यासपीठावरून खाली उतरण्याचाही मार्गदर्शनाचे कामही त्यांनीच केले. त्यांनी थेट कार्यकर्त्याचीच भूमिका निभावल्याने जाधवच आदिवासी सेवक झाल्याची चर्चा रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलची प्रतिमा बदलून देणार नवा चेहरा

$
0
0

नाशिकरोड येथील सेंट्रल जेल अनेक कारणांनी प्रकाशझोतात असते. एकाच महिन्यात चाळीस मोबाइल सापडणे किंवा कर्मचारी-अधिकाऱ्यांवर हल्ले या कारणांनी जेल जसे चर्चेत असते, तसेच राज्यातील सर्वांत जास्त महसूल मिळविणारे, योग प्रशिक्षक कैद्यांची देशातील पहिली बॅच घडविणारे कारागृह अशा विधायक उपक्रमांनीही हे जेल चर्चेत असते. राजकुमार साळी या खान्देशच्या सुपुत्राकडे सध्या या जेलची सूत्रे आली आहेत. विविध उपाययोजना करून या जेलची प्रतिमा बदलून नवा चेहरा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.

जेलमध्ये मोबाइल, गांजा नियमितपणे सापडतात. शिस्त लावण्यासाठी काय करणार?

पहिल्या दिवशी मी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वेळेवर कामावर येण्याच्या सूचना दिल्या. रात्र पहारेकरी (निळी टोपी) आणि सिद्धदोष अन्वेषक (वॉर्डर) यांना शासकीय पगार मिळतो. त्यांनाही अॅलर्ट राहण्याचे आदेश दिले. आक्षेपार्ह घटना घडल्यास रात्री-अपरात्री कधीही माझ्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. मी स्वतः ६३ एकर जेलचा प्रत्येक कोपरा नजरेखालून घालत आहे. जेलचा कारभार पारदर्शी होईल, असा माझा प्रयत्न आहे.

जेल आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काेणत्या उपाययोजना करणार?

कैद्यांकडून हल्ले व मानसिक ताणामुळे कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण झाले आहे. मी मासिक बैठक घेऊन त्यांना नवा आत्मविश्वास दिला आहे. ड्युटीवर असताना कैद्याकडे मोबाइल सापडल्यास आपण निलंबित होऊ, ही भीती कर्मचाऱ्यांच्या मनात असते. त्याचा गैरफायदा कैदी घेतात. कर्मचाऱ्यांच्या मनातील ही भीती मी काढली आहे. जेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून ड्युटी करण्याच्या कडक सूचना केल्या आहेत.

नाशिकरोड जेलमध्ये नवीन फाशी यार्ड कधी होणार?

फाशी यार्ड सुरू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. शासन स्तरावर लवकरच कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

नाशिकरोडला ११३ एकरमधील खुले कारागृह कधी साकारणार?

सध्या पैठणला खुले कारागृह आहे. त्यासाठी वेगळे बांधकाम केलेले आहे. नाशिकला तसे नाही. नाशिकरोडला खुले कारागृह सध्या सुरू आहेच. परंतु, त्याचे आकारामान छोटे आहे. त्यासाठी वेगळे बांधकाम झालेले नाही.

जेलचा महसूल वाढविण्यासाठी काय उपायोजना करणार?

महसूल उत्पादनात नाशिकरोड जेल राज्यात आघाडीवर आहे. महसूलवाढीसाठी कर्मचाऱ्यांना मार्केटिंगचे प्रशिक्षण देणार आहे. तसेच, नवीन उपाययोजना करण्याचाही विचार आहे.

कैद्यांच्या आरोग्याचे काय?

कैद्यांसाठी सध्या दोन डॉक्टर जेलमध्ये आहेत. महिला कैद्यांसाठी महिला डॉक्टर नाही. त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. आणखी वैद्यकीय स्टाफ उपलब्ध व्हावा आणि दवाखाना अद्ययावत व्हावा यासाठी माझे प्रयत्न आहेत. कैद्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी गळाभेट, नातेवाइकांना थेट फोन या सुविधा सुरूच आहेत.

कैद्यांच्या आहाराच्या दर्जाबाबत तक्रारी आहेत...

आहार चांगला असेल, तर आचार आणि विचार चांगले राहण्यास मदत मिळते. जेलमधील कैद्यांच्या जेवणाचा दर्जा वाढविण्यात येईल. पोषक आहार मिळेल, याकडे लक्ष दिले जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने किचन सुधारणार आहे.

व्हीसी सुविधा व जॅमर सुरू आहेत का?

कैद्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी व्हीसी सुविधा सुरू आहे. मोबाइलला अटकाव करणारे जॅमर बसविलेले असले, तरी त्यांची रेंज कमी आहे. त्यामुळे अधिक क्षमतेचे जॅमर बसविणार आहे.

कैद्यांना पॅरोल, रजा मिळत नाही, अशी तक्रार आहे...

पॅरोलचे व रजेचे अर्ज पेंडिंग आहेत. विभागीय आयुक्तांना भेटून प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कैद्यांचा असंतोष कमी होईल. न्यायालयात व दवाखान्यात कैदी नेण्यासाठी पुरेसे पथक उपलब्ध करावे, यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.

जेलच्या निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा केव्हा घेणार?

याबाबतची कारवाई शासनाने केली आहे. शासनच याबाबत निर्णय घेईल.

जेल कर्मचारी निवासस्थाने मोडकळीस आली आहेत...

याबाबत शासनाला मी विनंती करणार आहे. पालकमंत्र्यांची भेट घेऊन कर्मचारी निवासस्थांसाठी ग्रँट देण्याची विनंती करणार आहे. जेलभोवती नवीन तट बांधणार आहे.

(शब्दांकन ः डॉ. बाळकृष्ण शेलार)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाटकोंडी अखेर फुटणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षांपासून शासनदरबारी पडून असलेला कपाटांचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तांत्रिक अडचणीत अडकलेल्या कपाटांचा प्रश्‍न नव्याने मंजूर झालेल्या अतिरिक्त एफएसआय व साडेसात मीटर रस्त्यांची रुंदी वाढविण्याच्या पर्यायातून सुटू शकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १५ टक्क्यांपर्यंत एफएसआयचा वापर करून आणि हार्डशिप प्रीमियमच्या मदतीने कपाटकोंडी फोडण्याचा क्रेडाईचा प्रस्ताव महापालिका प्रशासन सरकारकडे सादर करणार आहे. सरकारने नियमावलीत दुरुस्ती केल्यानंतर शहरातील जवळपास ७० टक्के कपाटांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दरम्यान, संरक्षक भिंतीमुळे टीडीआर शिल्लक असलेल्या टीडीआरधारकांना दिलासा देण्याचा आणि २४ मीटरपर्यंतच्या बांधकामाची अग्निशमनच्या परवानगीपासून सुटका करण्याचा निर्णय झाला आहे.

शहराच्या नव्या विकास नियंत्रण नियमावलीतील जाचक तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी आयुक्तांमार्फत शासनाला प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. क्रेडाई आणि महापालिका प्रशासनात झालेल्या समझोत्यानुसार सोमवारी क्रेडाई आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये दुसरी बैठक झाली. आयुक्त अभिषेक कृष्णा, नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे, सहाय्यक संचालक नगररचना आकाश बागुल, कार्यकारी अभियंता संजय घुगे, मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी प्रशासनाच्या वतीने, तर क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, आर्किटेक्‍ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप काळे, विजय सानप, चारुदत्त नेरकर, रवी महाजन, विवेक जायखेडकर, योगेश महाजन, ऋषीकेश पवार, हेमंत दुग्गड, कृणाल पाटील आदींनी भूमिका मांडल्या. नव्या डीसीपीआरमध्ये सर्वच रस्त्यांवर दहा टक्के वाढीव एफएसआय व पाच टक्के अतिरिक्त बाल्कनी क्षेत्र मंजूर केले आहे. या १५ टक्के अतिरिक्त एफएसआयच्या आधारे मंजूर कपाटांशिवाय बांधलेल्या अतिरिक्त क्षेत्रावर तोडगा काढण्याचा प्रस्ताव क्रेडाईने दिला, तसेच हार्डशीप प्रीमियमचा आधार घेऊन व प्रीमियम दंडाची रक्कम लावून ते नियमित करण्याचा हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आहे. त्यामुळे बहुतांश कपाटांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता.

नवीन नियमानुसार टीडीआरची प्रकरणे मार्गी लावताना करारातील अटी-शर्तींप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. त्यामुळे संरक्षक भिंत उभारल्यास उर्वरित टीडीआर प्राप्त करून घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, डीपीरोड म्हणून समाविष्ट झालेल्या रस्त्यांना टीडीआरचा लाभ मिळणार नाही. सहा व साडेसात मीटर रस्त्यावर टीडीआर प्रस्तावित नसल्याने अनेक रस्त्यांवर इमारत बांधकाम करताना अडचण येणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठराविक अंतर सोडण्यास अनुकूलता दर्शविण्यात आली. पुणे शहराप्रमाणेच नाशिकमध्येही पार्किंग, बाल्कनी, सामासिक अंतरांबाबत नियम अंतर्भूत करण्याची मागणी करण्यात आली असून, त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.


२४ मीटरपर्यंत नो परवाना

महाराष्ट्र फायर अॅक्ट, नॅशनल बिल्डिंग कोड, जुनी व नवीन विकास नियमावली या सर्वांचा आधार घेत विविध अंगांनी चर्चा झाली. त्यावर आयुक्तांनी चोवीस मीटर उंचीपर्यंत संपूर्ण रहिवासी असलेल्या इमारतीला अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचा प्रचंड वेळ व पैसा वाचणार आहे. पंधरा मीटर ते चोवीस मीटरपर्यंतच्या इमारतींना अग्निशमन उपकरणे लावणे बंधनकारक राहणार आहे. चोवीस मीटर उंचीवरील इमारती व नियमावलीतील विशेष इमारतीच्या व्याख्येत येणाऱ्या इमारतींना मात्र अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला घ्यावा लागणार आहे. पण, हॉस्पिटल, शैक्षणिक या विशेष इमारतींना फायर ब्रिगेडची परवानगी आवश्यक असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. वीस हजार चौरस मीटरवरील इमारतींना सांडपाणी व्यवस्था करणे बंधनकारक राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील अमृतवृक्षांना संजीवनीची प्रतीक्षा...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अमृतवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडुनिंबाच्या झाडांनाच सध्या संजीवनीची गरज भासत असल्याची स्थिती शहरात दिसून येत आहे. हल्ली गुढीपाडव्यालाच आठवण येणाऱ्या कडुनिंबाच्या झाडांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. नाशिक-पुणे महामार्गासह सर्वच महामार्गांवरील कडुनिंबाच्या झाडांची सर्रास कत्तल झाली आहे.

नाशिकरोडला द्वारका ते सिन्नर दरम्यान कडुनिंबाची असंख्य झाडे होती. रस्ता रुंदीकरणात ती तोडण्यात आली. तशीच परिस्थिती शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा आणि नाशिक-औरंगाबाद मार्गावरील कडुनिंबाच्या झाडांची झाली आहे. ही झाडे तोडण्यात आल्यानंतर पुन्हा त्या जागी विदेशी झाडे लावण्यात आली आहेत. तीदेखील पुरेशी वाढलेली नाहीत.

चुकीचा वापर

बाजार समित्यांमध्ये अनेक शेतकरी क्रेटमध्ये टोमॅटो, वांगी व अन्य फळभाज्या वाहनांमधून घेऊन येतात. या भाज्या टिकाव्यात, त्यांना ऊन लागू नये म्हणून कडुनिंबाचा पाला मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात लोकाश्रय लाभलेल्या कडुनिंबाला आता शहराप्रमाणे खेड्यातही जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. फळबाजारांमध्येही असेच चित्र आहे.

औषधी गुणधर्म

कडुनिंबांचे अनेक गुणकारी उपयोग आहेत. त्यामुळे त्याला अमृतवृक्ष म्हटले जाते. कडुनिंबाची पाने गुढीला बांधतात. सायंकाळी गुढी उतरवल्यावर गुळासोबत कडुनिंबाचे एक पान तरी खातात. त्यामुळे रोगराई दूर होते, अशी धारणा आहे. ग्रामीण भागात मरीआईच्या यात्रेत कडुनिंबाचे डहाळे घेऊन देवीची मिरवणूक काढली जाते.

नाशिकरोडला काही समाज ही प्रथा पाळतात. कडुनिंबाच्या धुराने डास पळविले जातात. निंबोळ्यांचा साबणामध्ये उपयोग केला जातो. दातांच्या आरोग्यासाठीही कडुनिंबाचा उपयोग टूथपेस्टमध्ये अनेक कंपन्या करतात. ग्रामीण भागातही शेतीकामात कडुनिंबाचा वापर केला जातो.

नाशिकरोडला मोजकीच झाडे

द्वारकापासून उपनगरपर्यंत मोजकीच कडुनिंबाची झाडे राहिली आहेत. फेम सिनेमागृहासमोर (विजय-ममता) पाच-सहा झाडे तेवढी शिल्लक आहेत. पुढे उपनगरच्या सिग्नलजवळ तीन झाडे आहेत. त्यानंतर बिटको चौक येईपर्यंत कडुनिंबाचे झाडच नाही. दत्त मंदिर चौकातील वाहतूक बेटावर निंबाचे एक झाड तग धरून आहे. लष्करी हद्दीत आणि नाशिकरोड प्रेस व गांधीनगर प्रेसच्या आवारात कडुनिंबाची काही झाडे आहेत. सिन्नर फाटा ते संगमनेरदरम्यान कडुनिंबाची भरपूर झाडे होती. आता रस्ता रुंदीकरण सुरू झाल्याने ती सगळी तोडण्यात आली आहेत. नावालाही कडुनिंबाचे झाड पुण्यापर्यंत पाहायला मिळत नाही, याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरही हीच परिस्थिती आहे. नाशिकच्या गावठाण भागात चाळी व जुनी घरे पाडून इमारती बांधल्या जात आहेत. त्यावेळीही पहिला घाव कडुनिंबावरच पडत आहे.


कडुनिंबाची पाने, साल, निंबोळ्या या सर्वांत औषधी गुणधर्म आहेत. कडुनिंबाच्या पानांचा रस पोटातील कृमींचा नाश करणारा, कफनाशक, रक्तशुद्धी करणार आहे. पिंपल्सपासून सोरायसीपर्यंतच्या आजारावर तो उपयोगी आहे. अंगात उष्णता जास्त असेल किंवा खाज सुटली असेल, तर कडुनिंबाच्या रसाने आराम पडतो.

- वैद्य राहुल सावंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाट्यसंमेन 'तापणार' दुपारी ठेवणार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनेक वादाच्या विषयांमुळे आणि एकमेकांवरच्या कलगीतुऱ्यामुळे संमेलनांचा पारा चढलेला महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मात्र, यंदा उस्मानाबाद येथे रंगणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा उन्हाच्या तडाख्याने पारा चढणार आहे. त्यामुळेच संयोजकांनी दुपारी एक ते चार या वेळेत संमेलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाच्या झळांमुळे यंदाही नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार संमेलनाकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २४ ते २६ एप्रिल दरम्यान उस्मानाबाद येथे पार पडणार आहे. दर वर्षी नाट्यसंमेलन फेब्रुवारी महिन्यात होते. यंदा राज्यातल्या निवडणुका लक्षात घेऊन संमेलन पुढे ढकलण्यात आले. उस्मानाबादमध्ये उन्हाळ्यात तापमानाचा पारा कायम ४० अंशांच्या वर असतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुलनेने कमी त्रास होईल, या कारणाने सुरुवातीला पहिल्या आठवड्यातच संमेलन घेतले जाणार होते; परंतु परीक्षांचा काळ मध्येच आल्याने संमेलन अखेर २४ ते २६ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आता ऐन उन्हाळ्यात आणि त्यातही उस्मानाबादमध्ये संमेलन होणार असल्याने संमेलनावर उन्हाळ्याचे सावट आले आहे. ही बाब लक्षात घेऊन संयोजकांनी दुपारी एक ते चार दरम्यान संमेलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, बाहेरगावाहून येणारे नाट्यरसिक दुपारच्या वेळेत संमेलन स्थळ सोडून कुठे जाणार? त्यांच्यासाठी संयोजकांकडून काही व्यवस्था करण्यात आली आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, हिवाळा असो वा उन्हाळा कधीही संमेलन घेतले तरी त्याकडे पाठ फिरवणाऱ्या नाट्यसृष्टीतील कलाकारांना यंदा ‘आयते कोलीत’ हातात मिळाले आहे. कायम ‘एअर कंडिशन’ मध्ये राहणारे कलाकार ४५ अंश तापमान असलेल्या प्रदेशात तग धरणार का, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.


१५ते १९ एप्रिलमध्ये नाट्य महोत्सव

नाट्यसंमेलनापूर्वी १५ ते १९ एप्रिल दरम्यान उस्मानाबाद येथे नाट्य महोत्सव रंगणार आहे. त्यामध्ये ‘मोरूची मावशी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘तो मी नव्हेच’ अशा गाजलेल्या नाटकांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या ‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाने होणार आहे.


उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता संमेलनात दुपारी एक ते चार दरम्यान कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्याऐवजी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालतील. तशी परवानगी घेण्यात आली आहे. कलाकारांची उपस्थिती वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू असून सर्वांना पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. या संमेलनात यंदा कलाकारांची लक्षणीय उपस्थिती असेल- दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी उधळली स्ट्रिप्टीज पार्टी

$
0
0

मुंबई मिरर वृत्त । नाशिक

ऐन मध्यरात्री मोठ्या आवाजातील गाण्यांसह सुरू असलेल्या स्ट्रिप्टीज पार्टीवर छापा टाकून नाशिक पोलिसांनी १३ तरुण-तरुणींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश असून त्यांना जामिनावर सोडण्यात आलं आहे. पार्टीच्या ठिकाणांहून पोलिसांनी अनेक वाहनंही ताब्यात घेतली आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील एका अलिशान बंगल्यात मोठमोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याची तक्रार रविवारी मध्यरात्री एका इसमानं पोलिसांना केली. तक्रारीनंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा संबंधित बंगल्यामध्ये अनेक तरुण-तरुणी डीजेच्या तालावर थिरकत होते. हे सर्व लोक अमली पदार्थ व दारूच्या नशेत धुंद होते. तिथं स्ट्रिप्टीज पार्टी सुरू असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी लगेचच सर्वांना ताब्यात घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांमध्ये वाहतूक सहपोलीस आयुक्त, औरंगाबादचे सहाय्यक जिल्हाधिकारी, ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याचा मुलगा व नागपूरच्या पोलीस उपायुक्तांचा भाच्याचा समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण-तरुणींना पोलीस ठाण्यात घेऊन येताच पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई, नागपूर व पुण्याहून आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन येऊ लागले. 'मुंबई मिरर'ला मिळालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये पोलीस घटनास्थळी येताच तरुणी कपडे घालताना दिसत आहेत. पार्टीत उपस्थित असलेले युवक अंमली पदार्थ आणि दारूच्या नशेत धुंद झाले होते. पकडल्या गेलेल्या तरुणांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यानंतरच यावर अधिक बोलणं योग्य होईल,' असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

ही बातमी हिंदीत वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिअल इस्टेटमध्ये उलाढालींची गुढी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात रिअल इस्टेट क्षेत्रालाही झळाळी मिळाली आहे. त्यामुळेच शहर परिसरातील विविध प्रकल्पांमध्ये किमान शंभर फ्लॅटचे बुकिंग झाले आहे. रेडिरेकनरचे दर जैसे थे राहिल्यास येत्या काळात या क्षेत्राला आणखी फायदा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्राला काहीशी मरगळ आली आहे. कपाटांचा प्रश्न, रेडिरेकनरचे दर, परवडणारी घरे अशा विविध कारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात काहीसे मंदीचे वातावरण आहे. मात्र, गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही मरगळ दूर होईल, अशी शक्यता होती. त्यानुसार नवीन वर्षारंभी रिअल इस्टेटची गुढी शहरात लागल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटकांना ३० ते ६० चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळापर्यंत नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घराची वाढ करण्यासाठी बँकांमार्फत कर्ज मिळणार आहे. अत्यल्प व्याज दराने ६ लाख रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या कर्जावरील ६.५ टक्के व्याज केंद्र सरकार भरणार आहे. मुंबईसह राज्यातील ५१ शहरांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठीही नाशकात अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळेच १५ ते २५ लाख रुपये किंमतीच्या फ्लॅट तसेच घरांना मागणी असल्याचे दिसून येत आहे. मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्ताने आपल्या मनातील घर खरेदीला नाशिककर पसंती दिल्याचे दिसून येत आहे. पाथर्डी फाटा, आडगाव, इंदिरानगर, मखमलाबाद रोड, कामटवाडे, तिडके कॉलनी अशा शहराच्या विविध भागात अनेक अपार्टमेंट उभ्या राहिल्या असून, त्या ग्राहकांना खुणावत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिकांनी विविध ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यासही प्रतिसाद लाभला आहे. शहराच्या अनेक भागातील प्रकल्पांमधील घरे पाहण्यासाठी तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी ग्राहक जात असल्याचे दिसून आले. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण होते.

सराफ बाजाराने साधला मुहूर्त

गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून नाशिककरांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली. नववर्षाच्या सुरुवातीला बहुतेकजण किमान एक ग्रॅम तरी सोने खरेदी करतात. मागील वर्षी एक्साइज ड्यूटी माफ व्हावी यासाठी सराफांनी केलेल्या आंदोलनामुळे या मुहूर्तावर ग्राहकांना सोने खरेदी करता आले नव्हते. त्या खरेदीची कसर यंदा ग्राहकांनी भरून काढली. मंगळवारी नाशिकच्या सराफ बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी उसळली होती. उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी लोकांनी सकाळीच बाजारात जाणे पसंत केले. दुपारी सराफ बाजारात शांतता होती. सायंकाळी पुन्हा उत्साह दिसून आला.

इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला झळाळी

नाशिकरोड ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेला झळाळी मिळाल्याचे दिसून आले. नाशिकरोडसह शहरातील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. शहरातील मॉल्सही त्याला अपवाद नव्हते. अनेकांनी ऑनलाइन शॉपिंगलाही प्राधान्य दिले. स्मार्ट मोबाइल खरेदीची सर्वांत जास्त क्रेझ दिसून आली. मंगळवारी पाडव्याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी एसी, टीव्ही, फ्रीज आणि मोबाइल यांना प्राधान्य दिले. या वस्तूंना चांगली मागणी होती, असे सूत्रांनी सांगितले. ब्रॅन्डेड टीव्हीची किमत १५ हजारापासून लाखापर्यंत असल्याने मध्यमवर्गीयांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांनीच त्याची खरेदी केली.






मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात उभारली शौर्याची गुढी

$
0
0

धुळे : सैन्य दलातील धुळे तालुक्यातील बोरविहीर गावातील जवान चंदू चव्हाण यांच्या घरी जावून पुण्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी उभारली शौर्याची गुढी उभारली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी चंदू चव्हाण, भूषण चव्हाण, बहिण रुपाली, आजोबा चिंधा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पुण्यातील अमित बागुल व सहकारी गुढी उभारण्यासाठी पुण्याहून ४०० कि.मी. थेट धुळ्यात दाखल झाले होते.

धुळे शहरात नववर्षानिमित्त मंगळवारी (दि. २८) सकाळी महात्मा गांधी पुतळ्यापासून तरुणी-महिलांनी भगवे फेटे परिधान करून मोटारसायकल रॅली काढली. शहरातील चौका-चौकात तरुणांनी नववर्षानिमित्त गुढी उभारली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा शहरात उलटला ट्रक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गुजरातकडून कनार्टककडे रंगाचे डबे घेऊन जाणारा ट्रक सटाणा बसस्थानकाजवळील दुभाजकाला धडकून उलटला. सुदैवाने कोणतीही जीव‌ितहानी झाली नाही. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मात्र यामुळे दिवसभर शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला.

अंकलेश्वर येथून एशियन पेन्ट्स कंपनीच्या रंगाचे डबे घेऊन जाणारा मालवाहू ट्रक (एमएच १२/ईएच ९७६५) बंगळुरूकडे निघाला होता. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा ट्रक शहरातील बसस्थानकाजवळील दुभाजकावर आदळला. या अपघातात ट्रकची पुढची चाके निखळली. त्यामुळे ट्रक महामार्गावरच उलटला. ट्रकमधील रंगांचे काही डबे उघडल्याने महामार्गावर रंगचरंग दिसू लागला. मध्यरात्री महामार्गावर कुत्रे आडवे आल्याने अपघात झाल्याचे ट्रक चालकाने सांगितले. अपघातामुळे राज्यमहामार्गावरील वाहतूक दिवसभर एकेरी ठेवण्यात आली होती. ट्रकमधील रंगाचे सर्व डबे दुसऱ्या मालवाहू ट्रकमध्ये टाकल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक उभा केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्यांवरून झेडपीमध्ये रस्सीखेच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या ५ एप्रिल रोजी होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सत्ताधारी व विरोधी गटाने या समितीत्यावर आपलेच वर्चस्व राहणार असल्याचा दावा केला आहे. ७३ सदस्य असलेल्या या निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आघाडीने ३७ सदस्यांनी एकत्र येत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले. पण आता या आघाडीत काँग्रेसच्या दिंडोरी येथील एका सदस्याने सभापत‌िपद न मिळाल्यास आघाडीत बंडखोरी करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण, अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण या महत्त्वपूर्ण समित्या आहेत. यातील अर्थ व बांधकाम समितीवर आजपर्यंत उपाध्यक्षांना देण्याचा पायंडा असल्यामुळे त्यात काय निर्णय अध्यक्ष घेतात हे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे पाच समित्या असल्या तरी चार समितीसाठीच मतदान होणार आहे.

बुधवारी (दि. ५) होणाऱ्या या निवडणुकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. त्यांनी याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यासाठी सर्व सदस्यांना विशेष सभेचा अजेंडा पाठवण्यात आला आहे. सकाळी ११ ते १ दरम्यान सभापतीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देण्यात आली असून, त्यानंतर १ ते २ दरम्यान छाननी होणार आहे. दुपारी २ वाजता आवश्यक वाटल्यास मतदान होणार आहे. या समित्यांच्या सभापतिपदी आपली वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी पक्षात जोरदार रस्खीखेच सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व माकप व अपक्षांचे दोन सदस्य यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर माकपने आपल्या दोन सदस्यांची हकालपट्टी केली. राष्ट्रवादी व भाजपला बाजूला ठेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने सर्व तडजोडी स्वीकारत अपक्ष व माकपच्या हकालपट्टी झालेल्या सदस्यांना सभापती पदासाठीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हातात चारपैकी केवळ दोनच समितीचे सभापतीपद असणार आहे. या दोन समितत्यासाठी शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खातेदारांनी ठोकले बँकेला टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसह नोकरदारांना गत तीन महिन्यांपासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सटाणा शहर शाखेतून पगाराची रक्कम पूर्ण स्वरुपात न देता अवघे दोन हजार रुपयांची रोखीने दिले जात आहेत. जिल्हा बँकेचे धनादेश अन्य बँकेत वटत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनी बुधवारी शहर शाखेस टाळे ठोकून आंदोलन केले. संतप्त खातेदारांनी विभागीय अधिकारी एस. बी. अहिरे यांच्याशी चर्चा केली. जिल्हा बँकेला निधी प्राप्त होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत असून, निधी मिळताच गैरसोय दूर करण्याचे आश्वासन दिल्याने टाळे उघडण्यात आले.

सटाणा शहरातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शहर शाखेत राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसह कर्मचारी व पगारदारांचे खाती आहेत. त्याचबरोबरच सर्वसामान्य ग्राहकांना दैनंदिन व्यवहार करतांना नोटाबंदी प्रकरणापासून गैरसोय निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेच्या शाखेतून होणारे पगार नियमित न करता पगारादारांना अवघे दोन हजार रुपये रोख देवून रवाना करण्यात येत आहे. यामुळे रोख दोन हजार रुपयांत कुटुबीयांच्या गरजा भागविणे शक्य नाही. त्यातच जिल्हा बँकेचे धनादेश वटणे बंद झाल्याने ग्राहकांनी बुधवारी जिल्हा बँकेच्या शाखेस टाळे ठोकले. यावेळी विभागीय अधिकारी अहिरे यांनी वरिष्ठांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संतप्त शिक्षक संघटनेचे विनायक बच्छाव, चंद्रकांत सोनवणे, सी. डी. सोळुंखे, उदय आहेर, पी. आर. जाधव, सुवर्णा मराठे, शरद बेडसे, एस. आर. पाटील, इम्तीयाज अन्सारी, इम्रान सैय्यद, योगेश मोरे, एच. एन. कोर, हरीनाम देवरे, स्वप्नील सोनवणे, विकास चव्हाण, वाय. एन. देवरे, एस. टी. गरूड आदी शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रदूषण रोखण्यासाठी गोदावरी कक्ष कार्यान्व‌ित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीसह त‌िच्या उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने अखेर गंभीरपणे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी निवृत्त सैनिकांच्या पथकांची स्थापना करण्यापाठोपाठ महापालिकेतील बंद असलेला गोदावरी संवर्धन कक्ष पुन्हा नव्याने कार्यान्व‌ित करण्यात आला आहे. उपायुक्त रोहीदास दोरकुळकर यांच्याकडे या कक्षाची जबाबादारी देण्यात आली असून त्यांच्या दिमतीला दहा अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

या कक्षात गोदावरीसोबतच नासर्डी आणि वाघाडीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे आपले नियम‌ित काम सांभाळून हा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीच्या ध्येयनाम्यात भाजपने गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीवर भर दिला होता. महापालिकेत सत्तारुढ झाल्यानंतर भाजपने गोदावरीसह नासर्डी व वाघाडी या त‌ीनही नद्यांच्या प्रदूषणाचा विषय गंभीरपणे घेतला आहे. हायकोर्टानेही गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात वेगवेगळे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गेल्याच आठवड्यात गोदावरी नदीत प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर दंडाची तरतूद केली आहे. सोबतच गोदावरीत प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी निवृत्त सैनिकांचे पथक स्थापण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भातील अंमलबजावणी ही १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ आता गोदावरी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांनी गोदावरीसह तीनही नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी गोदावरी संर्वधन कक्ष नव्याने स्थापन केला आहे. उपायुक्त रोह‌िदास दोरकुळकर यांच्याकडे या कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, सहाय्यक आयुक्त निर्मला गायकवाड यांच्याकडे गोदावरी कक्षाचेही सहाय्यक आयुक्तपद देण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांच्याकडे समन्वय अधिकारी हे पद देण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता एस. आर. वंजारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तीन स्वच्छता निरीक्षकांसह दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीच्या प्रयत्नांना हातभार लागणार आहे.

नं‌द‌िनी, वाघाडीसाठी अधिकारी

गोदावरी सवंर्धन कक्षाअंतर्गतच गोदावरी, नं‌द‌िनी, वाघाडी या त‌िच्या दोन उपनद्यांच्या प्रदूषणासाठीही स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन स्वच्छता निरीक्षकांकडे स्वतंत्रपणे काम देण्यात आले आहे. स्वच्छता निरीक्षक सुधाकर शिंदे यांच्याकडे गोदावरी तीर, संजय गांगुर्डे यांच्याकडे नासर्डी तीर, के. टी. मारू यांच्याकडे वाघाडी तीराच्या प्रदूषणमुक्तीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तीनही नद्यांच्या काठावरील प्रदूषण रोखण्याची जबाबदारी या त‌िघांवर स्वंतत्रपणे राहणार आहे.

नियुक्तीवरून नाराजी

दरम्यान, नियम‌ित कामकाज सांभाळून यातील काही अधिकाऱ्यांकडे गोदावरी संवर्धन कक्षाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच परस्पर आरोग्य अधिकाऱ्यांनी नावे दिल्यावरून नियुक्त अधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. शहराच्या आरोग्याचे प्रमुख काम सांभाळून गोदावरीच्या प्रदूषणाचे काम कसे सांभाळणार, असा संभ्रम या अधिकाऱ्यांमध्ये असून, आरोग्य अधिकाऱ्याच्या परस्पर उद्योगांमुळे नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलशाली हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी संघट‌ित व्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राष्ट्र निर्मितीसाठी संत महंत कोठडी आणि जेलमध्येदेखील जायला तयार आहेत. मात्र समाजातील सज्जनांनीदेखील सक्रीय होणे काळजी गरज आहे. सज्जन निष्क्रिय असल्यानेच देशद्रोहींचे थैमान वाढले आहे. भविष्यातील शक्तिशाली व बलशाली हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी सगळ्यांनी संघट‌ित व्हावे, असे आवाहन स्वाध्वी प्राचीदीदी यांनी केले.

शहरातील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने डी. के. चौक मैदानात आयोजित विराट हिंदू संत संमेलनात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आचार्य जितेंद्र, शामजी महाराज, ह. भ. प. निवृत्ती बाबा वक्ते, सुरेश चव्हाणके, विहपचे जिल्हा सहमंत्री मच्छिंद्र शिर्के, महेश व्यास आदींसह संत मंडळी उपस्थित होते. यावेळी शामजी महाराज यांनी गो, गंगा, गायत्री व रामंदिराला विरोध करणारे देशद्रोही आहेत. तसेच शहरात सुरू असलेले बेकायदेशीर कत्तलखाणे बंद झाले पाहिजेत, अशी मागणी केली. तर संजय चव्हाणके यांनी औवेसी, आझमखान, संजय निरुपम आदींसह काँग्रेस नेत्यांवर टीका केली. संजय चव्हाणके यांना हिंदूवीर पुरस्कार देण्यात आला. विहपचे विभागममंत्री शैलेश भावसार, संघाचे प्रदीप बच्छाव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१९ हॉस्प‌िटल्समध्ये अनियम‌ितता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विभागाच्या आदेशानंतर पालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील ५६६ रुग्णालये, ७२७ क्लिनिक, २५५ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाने ५९२ रुग्णालये, क्लिन‌िक व सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली असून, त्यापैकी २१९ ठिकाणी अनियम‌ितता आढळून आली आहे.

नियमानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ नसणे, हॉस्प‌िटल्सची नोंदणी नसणे, औषधांसाठी योग्य नियम न पाळणे, प्रमाणपत्र नसणे यांसारख्या गंभीर त्रुटी या तपासणीत आढळून आल्या आहेत. १५ एप्र‌िलपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेदरम्यान अचानक तपासणी करण्यात येऊन वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णालयांच्या विविध कायद्यांनुसार आवश्यक असलेली नोंदणी प्रमाणपत्रे, वैद्यकीय परिषदेचे प्रमाणपत्र, विविध आवश्यक सुविधांची तपासणी करुन दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई शुश्रुषागृहे अधिनियम, १९४९ व सुधारित नियम, २००६ नुसार ही तपासणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ पार्टीबाबत लपवाछपवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरीत रविवारी (ता. २६) अर्धनग्न बारबालांसह सुरू असलेल्या बॅचलर पार्टीवर कारवाई करणारे नाशिकचे ग्रामीण पोलिसच आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलिस तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जवळचे नातलग हाती लागल्याचे लक्षात आल्यानंतर दबावतंत्रांच्या मोहिमेमुळे या मंडळीवर पोलिसांनी गुन्हेच दाखल केले नसल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणात नेमका कुणी, कोणावर दबाव आणला याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

निसर्गरम्य स्थळ म्हणून लौकीक मिळविणाऱ्या इगतपुरीला स्ट्रीपटीज पार्टीसारख्या गैरप्रकारांमुळे कलंक लागला आहे. लोणावळ्याप्रमाणेच पर्यटन हब बनू पाहणाऱ्या इगतपुरीवर अभिनेत्री लैला खान हत्येच्या प्रकरणानंतर लागलेला कलंक मिटला नसतानाच, आता पुन्हा अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या पार्ट्यांमुळे हा तालुका बदनाम होऊ लागला आहे. गैरप्रकारांसाठी निमित्त ठरणाऱ्या ठिकाणांच्या तपासणीचे कष्टच पोलिस आणि संबंधित यंत्रणा घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी स्ट्रीपटीज पार्टी व तत्सम गैरप्रकारांना पाठबळ मिळत असून, लोणावळ्यापाठोपाठ इगतपुरीही बदनाम होऊ लागले आहे.

‘मुंबईच्या दगदगीला शिणला असाल तर इगतपुरीत या ’ अशा जाहिराती मुंबईकरांना इगतपुरीकडे आकर्षित करू लागल्या आहेत. निरव शांततेचे निसर्गरम्य स्थळ म्हणून मुंबई, ठाणेकरांसह राज्याच्या इतर भागातील लोकांनाही इगतपुरीची भुरळ पडू लागली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील लोणावळ्याप्रमाणेच नाशिक मुंबई महामार्गावरील इगतपुरीत पर्यटकांचा राबता वाढला असून, गैरप्रकारही वाढू लागले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिकपासून जवळ तुलनेने कमी भावात आदिवासींच्या जमिनी पदरात पाडून घेता येत असल्याने अशा रिसॉटर्स, फार्म हाऊसेसची संख्या वाढतेच आहे. विशेष म्हणजे अवैध पार्ट्यांना प्रोत्साहन देणाऱ्या फार्म हाऊसेसचा तपशीलच महसूल तसेच पोलिस यंत्रणेकडे नाही. त्यामुळे तेथे तपासणी तसेच कारवाई करण्यातही कमालीची उदासीनता असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबई पुण्यात स्थिरावलेले पार्टी कल्चर इगतपुरीतही बाळसे धरू लागले आहे. पर्यटकांसाठी आणि त्यातही पार्टी कल्चरमध्ये रुळणाऱ्यांसाठी लोणावळ्याप्रमाणेच इगतपुरी हाही समर्थ पर्याय ठरू लागल्याने येथे गैरप्रकारांना चालना मिळू लागली आहे. घोटी, वैतरणा मार्गावरील हॉटेल्समध्येही असे प्रकार वाढू लागले आहेत. परिसरात पर्यटकांचा उपद्रव वाढला आहे. त्याबाबत स्थानिक रहिवाशांमध्येही कमालीची नाराजी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टीज या परिसरात नित्याच्या झाल्या आहेत. परंतु, त्याची पोलिसांना कानोकान खबर होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर नाशिकरोडला उतरविले सिमेंट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मध्य रेल्वेच्या खेरवाडी रेल्वे स्टेशनवर सिमेंट खाली करण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यावर येथे उतरविण्यात येणारे सिमेंट नाशिकरोड येथील रेल्वे मालधक्का येथे उतरविण्यात आले. मात्र सिमेंट उतरविण्यास उशीर झाल्यामुळे सिमेंट कंपनीला आर्थिक फटका सहन करावा लागला. दरम्यान, दगडफेकप्रकरणी नाशिकरोड लोहमार्ग व सायखेडा पोलिस ठाण्यात कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मंगळवारी रात्री खेरवाडी येथील शेतकऱ्यांनी सिमेंटमुळे स्थानिक शेती नापिक होत असल्याच्या कारणास्तव खेरवाडी येथे सिमेंट उतरविण्यास सकत विरोध केला होता. याप्रसंगी जमावाने सिमेंट घेण्यासाठी आलेल्या वाहनांवर दगडफेक केल्याने काही वाहनांचे नुकसानही झाले होते. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सिमेंटचा हा रॅक खेरवाडी रेल्वे स्टेशन येथून नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील मलधक्का येथे आणला. बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील मालधक्का येथे सिमेंट उतरविण्यात आले.

भाडे व डॅमरेज चार्जेसचा भुर्दंड

खेरवाडी रेल्वे स्टेशनवर सिमेंट उतरविण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध झाल्यावर २१ वॅगनचा हा मिनी रॅक खेरवाडी रेल्वे स्टेशनवर मंगळवारी दिवसभर उभा होता. त्यामुळे कंपनीला ६६१५० रुपयांचा डॅमरेज चार्जेसचा भुर्दंड बसला. तर खेरवाडी येथुन सिमेंट नाशिकरोड येथे वाहून आणावे लागल्याने वाहतूक भाड्यापोटी २ लाख ७२९ रुपयांचा दणका बसला. रात्री साधारणपणे अकरा वाजता सिमेंटचा रॅक नाशिकरोड रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर आला तेंव्हा मालधक्का कामगारांची सुट्टी झाली होती. त्यामुळे येथेही कंपनीला डॅमरेज चार्जेसपोटी ९४५० रुपयांचा फटका बसला. बुधवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत रॅक खाली होणे आवश्यक असतांना सकाळी १०.३० वाजता रॅक खाली झाला. या तीन तासाचे डॅमरेज चार्जेस कंपनीला भरावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images