Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाऱ्याच्या चाळिशीची हॅटट्र‌िक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेमध्ये नाशिक जिल्हाही होरपळला आहे. मार्च महिन्यातच तापमान ४०.३ अंश सेल्सिअसवर स्थिरावले असून, उन्हाच्या तडाख्यामुळे नाशिककरांची काहिली होत आहे. जिल्ह्यात तीन दिवस सातत्याने पारा ४०.३ अंश सेल्सिअसवर स्थिरावल्याने हॅटट्र‌िक झाली आहे. मालेगावचे तापमान सर्वाधिक ४३ अंशापार गेले असून, निफाडही चाळ‌िस अंशादरम्यान आहे. आगामी दिवसांत उष्‍णता आणखी तीव्र होणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.

यंदा राज्यभरात उन्हाळ्याला वेळेपूर्वीच प्रारंभ झाला आहे. राज्यभरात ३८ अंश सेल्सिअस व त्यापुढे तापमान बघायला मिळत आहे. साधारणपणे एप्रिलच्या मध्यावर उन्हाच्या तप्त झळा सोसाव्या लागत असल्याचे अनुभव दरवर्षी येतात. परंतु, यंदा रेकॉर्ड ब्रेक होत नाशिकने मार्च महिन्यातच पाऱ्याने चाळीशी पार करत ४०.३ पर्यंत तापमान वाढले. या वाढत्या चटक्यांचा सामना करता करता उष्णतेशी निगडित आजारांचा सामनाही नाशिककरांना करावा लागत आहे. आज, ३० मार्चपर्यंत उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यताही विभागाने वर्तवली आहे. प्रत्येक व्यक्तीने रोज सहा ते सात लिटर पाणी प्यावे व ११ ते ४ या वेळेत फिरणे टाळावे अशा आशयाचे प्रबोधनपर संदेशही सोशल मीडियावर पाठविले जात आहेत.

बाजारपेठेत शुकशुकाट

उन्हाच्या असह्य तप्त झळांमुळे नाशिककरांनी दुपारच्या वेळेत बाहेर न फिरणेच पसंत केले आहे. सकाळीही नऊ वाजेनंतरच उन्हाचे चटके बसत असल्याने महत्त्वाची कामे असल्यासच बाहेर जाण्यास प्राधान्य दिले जात आहे. याचा परिणाम शहरातील बाजारपेठांवर होत आहे. खरेदी करण्यासाठी कोणी फिरकतही नसल्याच्या प्रतिक्रियाही विक्रेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

अर्धीच भरा पेट्रोल टँक

वाढते तापमान पाहता गाड्यांमधील पेट्रोल टँक पूर्ण भरु नये, असा इशारा इंडियन ऑइल कंपनीने दिला आहे. तापमानाच्या तीव्रतेमुळे स्फोट होण्याची शक्यता असल्याने टँक अर्धेच भरुन उर्वरित जागा हवेसाठी मोकळी सोडावी, हा त्यामागील उद्देश आहे. नागरिकांनी या इशाऱ्याचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गंगापूररोड बनलाय मृत्यूमार्ग

0
0

सध्या शहरात प्रमुख समस्या आहे ती रस्त्यांच्या मधोमध उभ्या असलेल्या झाडांची. या झाडांमुळे अनेक अपघात होत असून, गेल्या काही वर्षांत अनेक व्यक्तींचा नाहक बळी गेला आहे. शहराच्या सर्वच भागात ही समस्या असून, ‘मटा’ या विषयी सातत्याने आवाज उठवीत आहे. रस्त्यातील झाडांची सर्वांत मोठी समस्या गंगापूररोडवरील जेहान सर्कल ते गंगापूर गाव या रस्त्यावर आहे. या ठिकाणी अपघात नित्याचेच झाले असून, महापालिकेला जाग यावी हीच यामागची भूमिका आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम करीत आहे. जनतेच्या समस्या मार्गी लावून त्या सोडविण्यासाठी ‘मटा’द्वारे सरकारदरबारीही प्रयत्न केले जातात. काही दिवसांपूर्वी शहरातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत ‘मटा’ने आवाज उठविला होता. त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत नाशिककरांना पाहायला मिळेल. नाट्यगृहांमध्ये अामुलाग्र बदल झाल्याचे अनुभवास येईल.

--


उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांचा भाग असलेला गंगापूररोड गेल्या काही वर्षांत मृत्यूमार्गच बनल्याची स्थिती आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांमुळे गेल्या सव्वाचार वर्षांत या रस्त्यावर तब्बल १३४ अपघात झाले आहेत. त्यात ३० जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे, तर १०४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये या रस्त्याविषयी धास्ती निर्माण झाली आहे. हे चक्र कधी थांबणार, असाच प्रश्न या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक उपस्थित करीत आहेत.

शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून गंगापूररोड ओळखला जातो. हा मार्ग म्हणजे एज्युकेशन हबचा आत्मा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी येथील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार रुंदीकरणसाठी ४४ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. परंतु, या मार्गावर झाडे येत असल्याने ती तोडण्यास काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, तरीही रुंदीकरण व्हावे यासाठी झाडांचा विषय बाजूला ठेवून तत्कालीन महापौर अॅड. यतीन वाघ व आयुक्त संजय खंदारे यांच्या कार्यकाळात या मार्गावरील जागांचे संपादन करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परिणामी या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली झाडे रस्त्याच्या मधोमध आली. महापालिका ती काढून घेण्यास तयार होती, परंतु वृक्षप्रेमी नागरिकांनी ती काढण्यास विरोध केला. या झाडांचे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्याने महापालिकेला काहीही कार्यवाही करता आली नाही. रस्त्याच्या मधोमध झाडे येत असल्याने या झाडांवर आदळून होणाऱ्या अपघातांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले व अनेक कुटुंबेदेखील उद््ध्वस्त झाली आहेत.

जेहान सर्कलपासून विचार केल्यास या मार्गावर भोसला मिलिटरी स्कूलचे गेट परिसर अपघातांचे केंद्रबिंदू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याच ठिकाणी बसस्टॉप असल्याने येथीस रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी, वाहनांची वर्दळ, फेरीवाल्यांचे अतिक्रमण अशा तिहेरी समस्येतून नागरिकांना वाट काढावी लागते. महापालिकेच्या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणात भोसला मिलिटरी स्कूलची जागा गेली आहे. परंतु, या संस्थेने ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित न केल्याने जेहान सर्कल ते श्री गुरुजी रुग्णालय हा मार्ग अत्यंत अरुंद झाला आहे.

आनंदवली गाव ते मंडलिक मळा या रस्त्यावर महापालिकेची शाळा आहे. त्याचप्रमाणे चांदशीकडे जाणारा रस्ता याच चौकातून जात असल्याने या ठिकाणी सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी रस्त्यातच झाडे असल्याने वाहने वळविणेदेखील कठीण होते. अशीच परिस्थिती पाइपलाइनरोडलगत असलेल्या चौकाची होते. येथेही वाहतूक कोंडीचा प्रकार नित्याचा झाला आहे. नवश्या गणपती चौक, सोमेश्वर मंदिर, बारदान फाटा, गंगापूर गावापर्यंत काहीअंशी अशीच परिस्थिती आहे.


तब्बल साडेचारशे झाडे

या मार्गावर कडुनिंब, बाभुळ, गुलमोहर, आंबा, शेवगा, जांभुळ, पपई, सुबाभुळ अशा प्रकाराची ४७५ झाडे आहेत. यातील १८ सुकलेली झाडे मध्यंतरी एका अपघातानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार तोडण्यात आली. त्याही वेळी काही पर्यावरणप्रेमी व्यक्तींनी आक्षेप घेतला होता. सुकलेली झाडे अंगावर पडल्याने झालेल्या अपघातांत दोन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाले होते. नागरिकांच्या ठाम भूमिकेनंतर पर्यावरणप्रेमींनी ही झाडे तोडण्यास परवानगी दिली.


झाडांवर रिफ्लेटरचा अभाव

जेहान सर्कल ते गंगापूर गाव या रस्त्यावर असलेल्या झाडांना लावलेले बहुतांश रिफ्लेक्टर निघाले आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पत्रे लावण्यात आले होते, तेदेखील अपघातांमुळे निघाले आहेत. परिणामी रात्री गाडी चालवताना झाडे दिसत नसल्याने झाडांवर वाहने आदळून अपघात होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत झाडे काढण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत झाडांना रिफ्लेटर लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


झाडांचा आधार घेऊन अतिक्रमण

या रस्त्यावर अनेक हॉकर्सने झाडांचा आधार घेऊन बस्तान बसविले आहे. या अतिक्रमणांमुळेदेखील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही झाडाखाली बसलो आहे, तुम्हाला झाडांचा त्रास होतो, की आमचा असा उलट सवाल ते विचारत आहेत. महापालिकेचा अतिक्रमण विभाग यांना उठवण्याची कारवाई करतो, परंतु तो केवळ फार्स ठरत आहे.


हॉटेल्सच्या पार्किंगचा प्रश्न

या रस्त्यावर अनेक हॉटेल्स आहेत. त्यातील बहुतांश हॉटेल्सना स्वतःचे पार्किंग नसल्याने या हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने कुठे लावायची हा प्रश्न रस्त्यावरील पार्किंगमुळे आपोआप सुटतो. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या भागात कार्यवाही होऊ नये, यासाठी कारस्थान रचले जाते. त्यामुळे ही झाडे काढू नयेत, यासाठी संबंधित घटकदेखील यामागे असल्याचे बोलले जाते.


२२० खेडी जोडणारा रस्ता

परिसरातून पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता असल्याने अनेक लोक येथून सातत्याने प्रवास करीत असतात. तब्बल २२० खेडी जोडणाऱ्या या रस्त्यावरून गुजरातकडे जाणारी काही खासगी वाहनेही रवाना होतात, तसेच या ठिकाणी अनेक शैक्षणिक संस्थाही आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसही या मार्गावरून धावतात. त्याचप्रमाणे शहरातून सातपूर एमआयडीसीत कामाला जाणारे अनेक कर्मचारी याच मार्गावरून जातात. मुक्त विद्यापीठ व परिसरातील वायनरींना भेट देण्यासाठी हाच रस्ता सोयीस्कर आहे. त्यामुळे हा रस्ता कायमच वर्दळीचा राहिला आहे.


२१ हजार झाडे लावली

या ठिकाणची झाडे तोडण्यासाठी महापालिकेने शहरात २१ हजार झाडे लावावीत, असा आदेश महापालिकेला दिला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ती झाडे लावली आहेत. ही झाडे लावून ठराविक उंचीपर्यंत जगवल्याचा दाखला मुख्य वनसंरक्षक यांच्याकडून घेऊन तो न्यायालयाला सादर करायचा होता. त्यानंतर न्यायालय ही झाडे तोडण्यास परवानगी देणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


पर्यायी मार्गात अडचणी

या मार्गावरील वाहतूक कमी व्हावी यासाठी महापालिकेन दोन पर्याय तयार केले आहेत. परंतु, या ठिकाणची कामे अर्धवट असल्याने ते वापरात येऊ शकत नाहीत. पहिला मार्ग हा बापू पुलाशेजारून नदीला समांतर रस्ता तयार करण्यात आला आहे. येथे अनेक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत आहेत. हा रस्ता तातडीने तयार झाल्यास हा पर्याय ठरू शकतो. त्याचप्रमाणे संत कबीरनगर येथील पाटाला लागून असलेल्या नवीन रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. या रस्त्याचे काम झाल्यास नाशिक शहरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या लोकांना चांगला पर्याय निर्माण होईल व सध्याच्या असलेल्या गंगापूररोडला चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकेल.


झाडांमुळे अंधार

या ठिकाणी झाडांच्या फांद्यांमुळे पथदीप झाकले गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर दिवे असूनही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे अंधार व रस्त्यात झाडे यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरची झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांच्या फांद्या छाटाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. परंतु, तिलाही केराची टोपली दाखविण्यात आली.


अपघाताची आकडेवारी

अपघाताचे वर्ष ...घटनास्थळी झालेले मृत्यू....जखमी....अपघातांची संख्या

२०१३ ६ २६ ३२

२०१४ ७ २२ २९

२०१५ १० १६ २६

२०१६ ५ २८ ३३

२०१७ २ १२ १४

एकूण...३०......१०४...१३४



अपघातप्रवण ठिकाणे


जेहान सर्कल

भोसला मिलिटरी गेट

हिराबाग

बेंडकुळे मळा

बॉबी हॉटेल

कडलग मळा

बळवंतनगर चौक

नवश्या गणपती रस्ता

हॉटेल विकी गार्डन


प्रशासनाची उदासीनता

ही झाडे काढावीत यासाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. स्थानिक नगरसेवक विक्रांत मते व विलास शिंदे यांनी सभागृहात हा प्रश्न वेळोवेळी मांडला. परंतु, त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. कायमच प्रशासनाकडून हेटाळणी केली गेली.


दुभाजक काढल्याने घटले अपघात

महापालिकेने गंगापूररोड रस्त्यावर दुभाजकांसाठी जागा सोडली. मात्र, परिणामी वाहने चालविणे चालकांना कठीण झाले. त्यामुळे भीक नको, पण कुत्रा आवार अशी काहीशी परिस्थिती गंगापूररोडवर झाली. याबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारही केली. त्याची दखल घेत महापालिकेने रस्ता दुभाजकासाठी सोडण्यात आलेल्या जागेवर पुन्हा डांबरीकरण केले. त्यामुळे वाहनचालकांचा त्रास कमी झाला आहे.


मानवी साखळी अभियान

या रस्त्यावरची झाडे तोडावीत यासाठी गंगापूररोड कृती समितीतर्फे मानवी साखळी आंदोलन छेडण्यात आले. तरीही प्रशासनाला फरक पडलेला नाही. एकीकडे असंख्य जीव जात असताना प्रशासन मात्र मूग गिळून आहे. या आंदोलनाच्या वेळी अनेक आयुक्त येऊन गेले, परंतु त्यांना या ठिकाणी अपघाताने होणाऱ्या मृत्यूंचे सोयरसुतक नसल्याचे आरोप होत आहेत.


पर्यावरणरक्षण महत्त्वाचे की, नागरिकांचे जीव?

महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर रुंदीकरणात बाधित होणारी झाडे तोडण्याची तयारी केली होती. केवळ जेहान सर्कल ते गंगापूर गाव या मार्गावरील साडेतीनशे झाडे तोडावी लागणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने झाडे तोडण्यास केलेली मनाई आणि त्यानंतर घातलेल्या अटी-शर्ती, तसेच विशिष्ट झाडे तोडण्यास नाकारलेली परवानगी यामुळे आजही गंगापूररोडचे रुंदीकरण पूर्ण झालेले नाही.


उच्च न्यायालयाला पाच हजार पत्रे

शहरातील गंगापूररोडसह अन्य ठिकाणी रस्ता रुंदीकरणात बाधित आणि अपघातांना कारणीभूत ठरलेली झाडे तोडावीत, यासाठी गंगापूररोड रस्ता कृती समितीतर्फे सुमारे पाच हजार पत्रे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पाठवून अभिनव आंदोलन करण्यात आले. गंगापूररोडसह अनेक भागात रस्ता रुंदीकरणातील काही प्रजातींची झाडे तोडण्यास मनाई केल्याने विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ता रुंदीकरण पूर्ण होत नाही, त्यातच झाडांमुळे अपघात होत असल्याने अशी अडथळा ठरणारी झाडे तोडावीत, यासाठी गंगापूररोड कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. मुख्य न्यायमूर्तींना म्हणणे पटवून देण्यासाठी पाच हजार पोस्ट कार्ड पाठविण्याचे समितीने ठरविले होते. त्यानुसार मुख्य टपाल कार्यालयात टपाल पाठवा आंदोलन करण्यात आले.


---

या मार्गावर रोज सरासरी दोन अपघात होत आहेत. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. महापालिकेचे उदासीन धोरण, पर्यावरणवाद्यांचा आडमुठेपणा त्यामुळे लोकांचे हकनाक जीव जात आहेत. पर्यावरणवाद्यांना झाडे महत्त्वाची, की लोकांचे जीव हेच समजत नाही.

-विलास शिंदे, नगरसेवक

--

गंगापूररोड कृती समितीतर्फे या प्रश्नावर अनेकदा आंदोलने छेडण्यात आली. महासभेत आवाज उठवण्यात आला. प्रत्येक वेळी न्यायालयाचा बागुलबुवा पुढे करण्यात आला. न्यायालयाने धोकादायक वृक्ष काढून टाकण्याचे आदेश दिले असतानाही कार्यवाही होत नाही. याविरुद्ध मोठे आंदोलन छेडणार आहोत.

-विक्रांत मते, माजी नगरसेवक

--

या ठिकाणी अपघात होऊन शेकडो बळी गेले आहेत. आणखी किती बळी जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे, हे समजत नाही. झाडांच्या त्रासामुळे लोक नवीन झाडे लावायलासुद्धा तयार नाहीत. काही पर्यावरणवाद्यांनी एक प्रकारची दहशत निर्माण केली आहे.

-मिलिंद कुलकर्णी, नागरिक

--

झाडांची फारच अडचण आहे. काही अपघात रेकॉर्डला येतात, काही येत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहोत. त्याला अद्याप यश आलेले नाही. आम्हालाही वृक्षप्रेम आहे. आम्ही कॉलनीत भरपूर झाडे लावली आहेत. ही झाडे काढण्याबाबत कुणी आडकाठी आणू नये असे मला वाटते.

-मंगल देवरे, गृहिणी

--

दररोजचे अपघात पाहून मन उद्विग्न होते. एखाद्या गोष्टीचा किती पाठपुरावा करावा यालाही मर्यादा असतात. गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासनाला जाग येत नाही, याला काय म्हणावे समजत नाही. त्यामुळे या समस्येसंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

अंजली बिवलकर, गृहिणी

--

महापालिकेची निवडणूक असल्याने हा विषय काही काळासाठी मागे पडला होता. या रस्त्यावरची झाडे काढण्याबाबत कोर्टाने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे. संबंधित यंत्रणांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

-सचिन मोरे, नागरिक

--

ही बाब न्यायप्रविष्ट आहे. मी माझे म्हणणे कोर्टात मांडले आहे. त्यामुळे जो निर्णय कोर्ट घेईल तो मला मान्य आहे. माझ्या म्हणण्यात तथ्य आहे, म्हणूनच गेल्या दहा वर्षांपासून कोर्ट माझे म्हणणे ऐकून घेत आहे. ज्याला जे म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी ते कोर्टात मांडावे.

-ऋषीकेश नाझरे, याचिकाकर्ते

--

गंगापूररोडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाडे लावण्यात आली आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात करणार आहोत. ८.५० लाख झाडांची गणतीदेखील पूर्ण झाली आहे.

-बी. यू. मोरे, उद्यान अधीक्षक, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूनम अग्रवाल यांचीही तक्रार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्टिलरी सेंटरमधील गनर रॉय मॅथ्यू यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली येथील पत्रकार पूनम अग्रवाल यांच्यासह निवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट अॅक्टसह (ओएसए) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम यांनीदेखील नाशिक पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार अर्ज केला असून, आर्टिलरी सेंटरमधील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.

रॉय मॅथ्यू यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह २ मार्च रोजी आर्टिलरी सेंटरमधील एका बंद बॅरेकमध्ये आढळला होता. २५ फेब्रुवारीपासून रॉय कर्तव्यावर अनुपस्थित होते. वेबसाइटच्या स्टिंग ऑपरेशनद्वारे जवानांची अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या पिळवणुकीवर प्रकाश टाकला होता. हा व्हिडीओ व्हायलर झाल्यानंतर तणावात असलेल्या मॅथ्यू यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. दिल्ली येथील दि क्यूंट पोर्टलच्या पूनम अग्रवाल यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले होते. पोलिसांनी त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर पुनम यांनी देखील नाशिक पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार अर्ज पाठविला आहे. पोलिसांनी मॅथ्यू याने आत्महत्या का केली हे शोधावे. त्याने अन्य सैनिकांची ओळख आपण लपविली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना इतरांकडून त्रास सुरू झाला. मॅथ्यू बेपत्ता झाल्यानंतर तशी तक्रार दाखल करू नका, असा दबाव त्यांच्या कुटुंबीयांवर आणला जात होता. घटनांच्या मुळाशी गेल्यास या गुन्ह्याची उकल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलच्या आवारात पार्किंग

0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील मध्यवर्ती कारागृह आवारात पे अॅण्ड पार्क योजना सुरू झाली असून, दुचाकींना पाच रुपये, तर चारचाकांनी दहा रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. ‘मटा’ने कारागृह आवारातील पार्किंगचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर येथे जेल प्रशासनाकडून पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नाशिकरोड कारागृहात टोळीयुद्धापासून गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना ठेवले जाते. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या या कारागृहात अडीच हजारांवर कैदी असून, हे कारागृह ओव्हर फ्लो झाले आहे. हे कैदी राज्यातील विविध भागांतील आहेत. त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून त्यांचे नातेवाईक येत असतात. कैद्यांना भेटण्याची वेळ व दिवस ठरलेला असतो. भेटीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे नातेवाईक अनेकदा खासगी वाहन भाड्याने ठरवून येतात. मोठ्या कैद्यांचे समर्थक वाहनांचा ताफा घेऊनच कारागृह आवारात येतात. तेथेच गाड्या पार्क करतात. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा, शिस्त धोक्यात आली होती. प्रशासनाने यावर उपाय म्हणून जेलरोडवर वाहन पार्किंगची सुविधा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यासाठी जेलरोडच्या कमानीजवळ कारागृहाचा कर्मचारी नेमण्यात आला होता. परंतु, त्याला दमदाटी करून लोक वाहने कारागृहाच्या आवारात नेत होते. राजकीय व्यक्तीला न्यायालयीन अथवा पोलिस कोठडी मिळाली, की त्यांचे समर्थक प्रचंड संख्येने येऊन शिस्त बिघडवतात. मुख्य रस्त्यावर वाहने उभी केल्याने वाहतूक खोळंबल्याचा प्रकार आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधींच्या सुटकेवेळी घडला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही त्रास झाला होता. राजकीय प्रभावामुळे या समर्थकांना शिस्त लावणे अवघड झाले होते. शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, तर अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असे. कारागृहाचे अधीक्षक म्हणून राजकुमार साळी यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पार्किंगला शिस्त लावतानाच कारागृह आवारात पे अॅण्ड पार्क सुविधेस प्रारंभ केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगीच्या दर्शनासाठी द्यावा लागणार कर

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांना दरडोई (प्रत्येक मानसी) कमाल दोन रुपये कर ग्रामपंचायतीला द्यावा लागणार आहे. यामुळे गड ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होऊन गडावरील प्राथमिक गरजांना पूर्ण करण्यास आधार मिळणार आहे. गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेल्या या कर मोहिमेसाठी ग्रामपंचायतीचे सहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत १५ हजारावर रक्कम जमा झाली आहे.

सप्तशृंग गडावर येणाऱ्या भाविकांना नागरी सुविधा देताना ग्रामपंचायतीला आर्थिक मर्यादा येत आहेत. उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून भाविकांच्या वाहनांवर व भाविकांवर कर आकारण्याची मूभा मिळावी, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या स्थाही समितीच्या बैठकीत झाली होती. याबाबत गड ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे जि. प. च्या स्थायी समितीने कर आकारण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आदेश गड ग्रामपंचायतीला दिले आहेत. गडावर भगवतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना सुविधा देताना ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न कमी पडत आहे. ट्रस्ट कडूनही ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी आर्थिक मदत दिली जात नाही. त्यातच शासनाकडून मिळणारा निधी अत्यल्प आहे. म्हणूनच भाविकांकडून दरडोई दोन रुपये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक वाहनातून आल्यास सूट

या कराच्या उत्पन्नातून भाविकांना सुविधा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहणार आहे. तसेच सार्वजनिक वाहन, एसटी बस, शासकीय वाहनातील प्रवासी, तसेच दिव्यांग व लहान मुलांना या करातून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदरचा कर हा खासगी वाहनातून येणाऱ्या वाहनातील प्रत्येक प्रौढ यात्रेकरूंकडूनच दरडोई दोन रुपये प्रमाणे आकारण्यात येणार आहे. तसेच कर दिल्यानंतर प्रत्येक यात्रेकरुस पावती देणे बंधनकारक राहणार आहे. गडावरील लग्न समारंभ, दुःखद घटनाप्रसंगी जे नातेवाईक येतील अशांना या करातून सूट मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

गड ग्रामपंचायत उत्पन्नच्या बाबतीत मागे आहे. मूलभूत सेवा व कर्मचारी पगार यांची सांगड बसणे अवघड झाले आहे. इच्छा असूनही विकास करता येत नाही. आता या कराच्या उत्पन्नातून विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. -राजेश गवळी,

ग्रा. प. सदस्य, सप्तशृंग गड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे महामार्गाची ‘वाटमारी’

0
0


नाशिक-पुणे महामार्गाचे द्वारकापासून दत्त मंदिरपर्यंत रुंदीकरण झालेले आहे. परंतु, त्यामुळे रस्त्याच्या कडेची झाडे काहीशी रस्त्यात आल्याने त्यांचा वाहतुकीस अडथळा होत आहे. गंगापूररोड किंवा अन्य रस्त्यांप्रमाणे या महामार्गावर रस्त्याच्या अगदी मधोमध झाडे नसली, तरी प्रचंड वर्दळ असलेल्या या रस्त्याच्या कडेच्या बाजूंनी अनेक ठिकाणी झाडे रस्त्यात अाल्याने वाहतूक कोंडीसह अपघातांचे प्रकारदेखील वाढले आहेत. त्याला झाडांच्या बाजूने झालेली अतिक्रमणे, बेशिस्तपणाही कारणीभूत ठरताना दिसतो. मात्र, या मार्गावरील वरील बहुतांश अपघात प्रामुख्याने झाडांमुळेच झाल्याची नोंद पोलिस स्टेशनमध्ये पाहायला मिळते. या मार्गावरची झाडे काढता येत नसल्याने रस्त्याच्या बाजूला पट्ट्या तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांची बोळवण केली. मात्र, रस्त्यातच येणाऱ्या झाडांमुळे हा रस्ता धोकादायक झाला असून, त्यासंदर्भात तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

--

झाडांमुळे रखडले रुंदीकरण

नाशिक-पुणे महामार्ग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला असून, त्याचे रुंदीकरण व्हावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. सिंहस्थाच्या कालावधीत साइडपट्ट्या तयार करून रुंदीकरण झाल्याचा फार्स करण्यात आला. मात्र, सध्या परिस्थिती पूर्वीप्रमाणेच आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करायचे झाल्यास दुतर्फा असलेली झाडे काढणे गरजेचे आहे. त्याशिवाय या ठिकाणी रुंदीकरण होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, काही वृक्षप्रेमींनी ही झाडे तोडू नयेत, असा पवित्रा घेतल्याने या मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. पुणे-मुंबई-नाशिक या कनेक्टिव्हिटीसाठी हा रस्ता तातडीने तयार होणे गरजेचे आहे. या महामार्गावर द्वारका ते दत्त मंदिरदरम्यान उड्डाणपुलाच्या कामाला केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने संमती दिली. या पुलाला लागणाऱ्या खर्चापैकी काही खर्च केंद्र सरकार व काही खर्च राज्य सरकार यांच्या माध्यामातून पूर्ण करावा, असे निर्देशही देण्यात आले.

पूर्ततेअभावी झाला उशीर

एकूणच या रस्त्याच्या कामाला राज्य सरकारनेही निधीची तरतूद करीत हिरवा कंदील देताच पहिल्या टप्प्यातील पुणे ते राजगुरूनगर हे काम पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात राजगुरूनगर ते सिन्नर हा मार्ग करण्यात आला. सिन्नर ते नाशिकरोड व नाशिकरोड ते द्वारका असे तिसऱ्या टप्प्यातील कामाचे स्वरूप होते. हे काम मंजूर होऊन बराच कालावधी झाल्याने व १४ जून २०१३ रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तेव्हापासून तिसऱ्या टप्प्यातील कामाला कधी सुरुवात होणार याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. हे काम सुरू करण्यासाठी लागणाऱ्या अनेक बाबींची पूर्तता होणे बाकी असल्याने त्याला उशीर झाला. पर्यावरण विभाग व भूसंपादनात अडचणी येत असल्याने कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्यांच्या जमिनी या रस्त्यात गेल्या त्यांना काही मोबदला दिला होता व काही रक्कम देणे बाकी होते.

--

दोन रस्ते वाढविणार

नाशिकरोड ते द्वारका या कामातील बहुतांश अडचणी दूर झाल्या आहेत. या रस्त्याची लांबी ५.५६९ किलोमीटर असून, ८.५७ कोटी रुपये खर्च येणार आहे. यात सध्याच्या असलेल्या चारपदरी रस्त्याला लागूनच येण्या-जाण्यासाठी आणखी दोन रस्ते वाढविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये संरक्षक जाळी बसविण्यात येणार असल्याने अपघात टळू शकणार आहेत. हे काम सुरू झाल्यापासून १३ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या रस्त्याची रुंदी ४५ मीटर होणार असून, जलवाहिन्या हलविण्यासाठी ६३ लाख, विजेचे खांब व लाइन्स हटविण्यासाठी ८८ लाख खर्च येणार आहे.

--

दुभाजक-झाडांतील अंतर घटले

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने झाडे न काढता उर्वरित रस्त्यावर डांबरीकरण केले. त्याचप्रमाणे महामार्गाच्या नवीन नियमानुसार रस्त्याच्या मध्ये दुभाजकही टाकण्यात आले. त्यामुळे रस्त्यातील झाडे आणि दुभाजक यांच्यातील अंतर कमी झाले. या रस्त्याने प्रवास करताना अचानक झाडे मध्ये येत असल्याने झाडाच्या डावीकडून जावे, की उजवीकडून जावे, असा प्रश्न नागरिकांना पडतो. काही ठिकाणी वाहनांनी धडक दिल्याने दुभाजक तुटले आहेत. त्यामुळे वाहन चालवणारा आणखी संभ्रमात सापडतो.

--

रिफ्लेक्टरची वानवा

सिंहस्थाच्या कालावधीत रस्त्यातील झाडांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. परंतु, काही दिवसांनंतर हे रिफ्लेक्टर पुन्हा काढून घेण्यात आले. त्यामुळे झाडांवर वाहने आदळून होणाऱ्या अपघातांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जुने विजय-ममता थिएटर व बिग बझार या ठिकाणी रोज एकतरी अपघात होताना दिसतो. मध्यंतरी सेंट झेविअर शाळेजवळ मोठा अपघात झाल्याने एका मुख्याध्यपकाला जीव गमवावा लागला होता.

--

सुकलेली झाडे एेरणीवर

बिटको कॉलेज हे नाशिकरोडमधील सर्वांत जास्त विद्यार्थीसंख्या असलेले कॉलेज आहे. या परिसरात एस. पी. कोठारी कॉलेज, के. जे. मेहता कॉलेज, जयरामभाई हायस्कूल, जे. डी. सी. बिटको हायस्कूल अशा शाळा व कॉलेजेस आहेत. परिसरात अंदाजे २५ ते ३० हजार विद्यार्थ्यांचा रोजचा राबता असतो. मात्र, या परिसरात अनेक सुकलेली झाडे असून, त्यातील एकतरी झाड दर पावसाळ्यात उन्मळून पडते. मागील पावसाळ्यात या ठिकाणी शाळा भरत असताना पोलिस चौकीसमोरील झाड उन्मळून पडले. हे झाड हटवावे म्हणून कॉलेज प्रशासनाने अनेकदा महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती. परंतु, या मागणीकडे हेतूपुरस्सर काणाडो‍ळा करण्यात आला. या ठिकणी अनेक विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत उभे राहत असल्याने एखादे झाड कोसळल्यास मोठा अनर्थ उद्भवू शकतो.

---

अपघातांवर दृष्टिक्षेप...

--

अपघाताचे वर्ष जागीच मृत्यू गंभीर जखमी अपघात

२०१४ ६ १४ ४२

२०१५ १० १५ ४६

२०१६ ११ १३ ५५

२०१७ १ २ ९

एकूण २८ ४४ १५२

--

अपघातप्रवण ठिकाणे

पौर्णिमा बस स्टॉप

बजरंगवाडी

आरटीओ कॉलनी

फेम थिएटर

शिवाजीनगर

गांधीनगर

उपनगर चौफुली

सेंट झेविअर शाळा

म्हसोबा मंदिर

शिखरेवाडी

बिटको कॉलेज

दत्त मंदिर सिग्नल

--

आठपदरी रस्त्याचा पर्याय

हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने याला दुसरा मार्ग हा पर्याय ठरू शकत नाही. या महामार्गावरून अवजड वाहने जात असल्याने ती दुसऱ्या मार्गाने वळविणे सोयीचे होणार नाही. त्याकरिता याच रस्त्याला समांतर रस्ता तयार करून त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहनांना परवानगी द्यावी. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेला सहापदरी रस्ता आठपदरी करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

--

झाडांच्या आड दुकाने

या रस्त्यावर झाडांचा आधार घेऊन अनेक विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून, गॉगल, मूर्ती, भांडी, पडदे, कपडे आदी विक्रेत्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडले आहे. या विक्रेत्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे नागरिक खासगीत बोलत आहेत. येथील विक्रेत्यांना हटविले तरीही चांगल्या प्रमाणात जागा उपलब्ध होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

--

कोंडीचे सुटेना कोडे

नाशिक-पुणे महामार्ग अत्यंत रहदारीचा आहे. या रस्त्यावरून पुण्याकडे जाणाऱ्या बाहेरगावच्या बसही धावत असतात. त्याचप्रमाणे अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मुंबईहून पुण्याकडे अवजड वाहनांना जुन्या मार्गावरून बंदी असल्याने ती वाहने नाशिकमार्गे पुण्याला वळविण्यात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात भर पडते. सकाळी व सायंकाळी या दोन्ही वेळांत या रस्त्यावरून पाच किलोमीटरचे अंतर कापायला पाऊणतासाचा कालावधी लागतो. झाडांमुळे रस्त्याचा वापर कमी झाला असल्याने मोठे वाहन रस्त्यातून जात असल्यास लहान वाहन जाणे अवघड होऊन जाते, अशी परिस्थिती या मार्गावर बहुतांश ठिकाणी होते.

--

फेमपासून अडथळे

या महामार्गावर द्वारकापासून पहिला अडथळा फेम थिएटरजवळ असलेल्या झाडांमुळे होताना दिसतो. टाकळीकडून नाशिकरोडकडे जाण्याच्या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यात उभी असून, रात्री ती दिसत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. डॉ. आंबेडकरनगर येथेही हीच परिस्थिती आहे. उपनगर नाक्यावर सिग्नल आणि झाडे यांच्यात वाहने उभी करावी लागत असल्याने सिग्नल सुटूनही गर्दीमुळे वाहने पुढे जाण्यास उशीर होत आहे. बिग बझार, दत्त मंदिरपर्यंत अशीच स्थिती दिसून येते.

---

रस्त्यातील झाडांमुळे उपनगर आणि परिसरात रोज एक अपघात होत आहे. येथे बस स्टॉप आणि झाडे यांच्या अडथळ्यामुळे एका जवानाला जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच घडली. यासंदर्भात महापालिका आणि हायवे अॅथॉरिटीकडे एकमेकांकडे बोटे दाखवित आहेत. त्यामुळे जबाबदारी नक्की कुणाची हे समजत नाही.

-विक्रम कदम, सामाजिक कार्यकर्ते

--

या महामार्गावर सध्या तरी वृक्षतोड करण्याची गरज नाही. या मार्गावरचे अतिक्रमण हटविले तरीही रस्ता मोठ्या प्रमाणात मोकळा होईल. ज्या ठिकाणी बॉटल नेक आहे अशा ठिकाणांचा अभ्यास केल्यास झाडांमुळे कमी, तर अतिक्रमणांमुळे जास्त ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

-शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी

--

सर्वच झाडांचा त्रास होत आहे, असे म्हणणे उचित होणार नाही आणि झाडांचा त्रासच होत नाही, असे म्हणूनही चालणार नाही. महापालिका व हायवेच्या अधिकाऱ्यांनी जी झाडे धोकादायक आहेत त्यांची छाटणी करावी व जी तोडणे आवश्यक आहे, त्या बदल्यात न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार झाडे लावावीत.

-संगीता गायकवाड, नगरसेविका

--

गरज नसताना विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल करणे महापालिकेने थांबविले पाहिजे. नाशिक-पुणे महामार्गावरील झाडे तोडण्याची गरज नाही. उच्च न्यायालयाने महापालिकेला झाडे लावण्याचा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केलेली असल्याची दिसत नाही.

-अश्विनी भट, याचिकाकर्त्या

--

पर्यावरण क्षेत्रातील जाणकार सोडून महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर प्रामुख्याने नेत्यांशी संबंधित व्यक्तीच आहेत. चांगल्या व्यक्ती या समितीवर घेतल्या असत्या, तर कोणती झाडे ठेवायची आणि कोणती काढायची याचा त्यांनी व्यवस्थित सल्ला दिला असता. त्यामुळे अपघात होऊन लोकांचे प्राण गेले नसते.

-जितेंद्र भावे, सामाजिक कार्यकर्ते

--

या रस्त्याने जाताना रोज एकतरी अपघात पाहायला मिळतो. या रस्त्यावरची सर्व झाडे काढू नका, मात्र रस्ता रुंदीकरणासाठी जी आवश्यक आहेत, ती झाडे तरी काढायला हवीत. माणसाच्या जिवापेक्षा काहींना झाडांचा जीव महत्त्वाचा वाटतो. झाडे परत लावता येतील, माणसांचे जीवन व उद्ध्वस्त झालेलं कुटुंब परत येणार नाही.

-बाळासाहेब दाणी, नागरिक

--

ही बाब न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे यावर काही बोलणे उचित ठरणार नाही. यातून मध्यम मार्ग काढून जी झाडे धोकादायक आहेत, ती काढण्याबाबत मध्यवर्ती तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, तो निष्फळ ठरला. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार कार्यवाही होईल.

-एस. टी. कोलते, एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, राष्ट्रीय महामार्ग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना निवडणुकीत ‘धर्मादाय’चा हस्तक्षेप नाही

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक कार्यक्रम खूप पुढे निघून गेल्याने आता त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. निवडणुकीनंतर चेंज रिपोर्ट येईलच. त्यानंतर या याचिकेचा विचार करण्यात येईल, असा निकाल सावाना याचिका प्रकरणी धर्मादाय उपायुक्तांनी दिला आहे.

५ मार्च रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मिलिंद जहागीरदार, स्वानंद बेदरकर आणि प्रा. विनया केळकर यांचे सभासदत्त्व कायमस्वरुपी रद्द करण्याचा ठराव झाला होता. या ठरावावर आक्षेप घेत मिलिंद जहागिरदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु त्यांनी ही याचिका धर्मादाय आयुक्तांकडे चालवावी अशी सूचना करून ३० मार्चच्या आत निकाल लावावा असे आदेश दिले होत‌े. त्यानुसार मिलिंद जहागीरदार यांनी धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. मात्र, सावानाचे वकील अॅड. अतुल गर्गे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, ९ मार्च रोजी प्रा. विनया केळकर यांच्या सहीने एक साधे पत्र या कार्यालयात दाखल आहे. त्याला रितसर दावा संबोधता येत नाही. २० मार्च रोजी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० कलम ४१ अ अन्वये दाखल अर्ज हा स्वतंत्र विषय आहे. धर्मादाय उपायुक्त राहुल मामू यांनी अॅड. अतुल गर्गे यांचा संपूर्ण युक्त‌िवाद व मुद्दे मान्य करून जहागीरदार यांचा अर्ज फेटाळला. कलम ४१ अ अन्वये अर्जदारांनी निवडणूक कार्यवाहीमध्ये हस्तक्षेप करून निवडणुकीच्या यादीमध्ये अर्जदाराचे नाव समाविष्ट करून त्यांना निवडणुकीमध्ये भाग घेऊ द्यावा, अथवा मतदान करू द्यावे असे निर्देश देता येणार नाही, असे निकालपत्रात स्पष्ट केले. निवडणुकीसंदर्भात निर्माण झालेले वाद कलम २२ खाली बदल अहवाल सादर केल्यानंतर त्यामध्ये कायद्यानुसार अपेक्षित चौकशी करून निर्णय घेण्यात येतात, असेही मामू यांनी स्पष्ट केले. धर्मादाय उपायुक्तांकडे प्रा. विनया केळकर यांनी दिलेले पत्र उच्च न्यायालय यांची दिशाभूल केली व कोर्टास माहिती दिली. त्यांनी केलेले कृत्य हे गंभीर व दखलपात्र आहे असा शेराही मामू यांनी निकालपत्रात मारला आहे.

सभासदत्त्व रद्द करू नये, त्यावर विचार करावा अशी ही याचिका होती. परंतु, या याचिकेवर निकाल देताना निवडणूक कार्यक्रम पुढे निघून गेला असल्याने त्यात आता हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही. निवडणुका होऊन गेल्यावर यावर विचार करू, असा निकाल मामू यांनी दिला. यावेळी जहागीरदार यांचे वकील उत्तम वाळुंज यांनी युक्त‌िवाद केला तर सावानाच्या बाजूने अतुल गर्गे यांनी भूमिका मांडली.

घटनेमध्ये मे, जून मध्ये निवडणुका घेण्याबाबत लिहिण्यात आलेले आहे. मात्र आम्हाला दाद मागता येऊ नये यासाठी मार्चमध्येच निवडणुका लावण्यात आल्या. मार्चमध्येच निवडणुका घ्यायच्या होत्या तर ५ मार्च रोजी मुदत संपत होती, त्याच दिवशी निवडणुका का जाहीर केल्या नाहीत? विशेष सर्वसाधारण सभासुध्दा बेकायदेशीर पध्दतीनेच घेण्यात आली. बेकायदेशीर पध्दतीने सावानाचे सभासदत्व रद्द केले.

-मिलिंद जहागीरदार, याचिकाकर्ता

जहागीरदार, केळकर व बेदरकर यांनी संस्थेच्या घटनेचे उल्लंघन करत केलेले बेकायदेशीर कामकाज आणि आर्थिक गैरव्यवहार यामुळे संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांच्याविरुध्द केलेली कारवाई योग्य व कायदेशीर तसेच संस्थेच्या हिताची आहे, हे या निकालावरून पुनश्च: स्पष्ट झाले आहे. आता तरी जहागीरदार यांनी माझ्याविरुध्दचा अपप्रचार थांबवावा आणि आत्मपरीक्षण करून संस्थेच्या‌ विधायक कामात अडचणी आणणे बंद करावे.

-प्रा. विलास औरंगाबादकर, अध्यक्ष, सावाना

साडेसहा लाख औरंगाबादकरांनीच ठरविले

औरंगाबादकर यांच्या ग्रंथमित्र पॅनलच्या पत्रकात बेछूट आरोप करण्यात आले आहेत. आर्ट कन्सल्टंट आनंद ढाकिफळे यांनीदेखील एक पत्रक प्रसिध्दीस दिले असून, सावानाच्या कामाच्या बदल्यात देण्यात आलेले साडेसहा लाख रुपये औरंगाबदाकरांनीच ठरवले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या हाती ग्रंथमित्रचे पत्रक आले. त्यात संपूर्ण चार पाने ही जहागीरदार यांच्याबद्दलच लिहिलेली असून, त्यात अनेक आरोप केले आहेत. परंतु, कुठल्याही आरोपाबाबत काहीही पुरावा दिलेला नाही. या पत्रकात माझ्यासंदर्भातसुद्धा काही आरोप केलेले आहेत. मी नुसत्या सावानाचा आर्ट कन्सल्टंट नाही. मी भारतात आणि भारताबाहेरही अनेक कामे केलेली आहेत. माझी साडेसहा लाख रुपये फी ही जहागीरदार यांनी ठरविलेली नाही. ते मला फुकट काम करा म्हणून म्हणत होते. पण माझी फुकट काम करण्याची पद्धत नाही. यापूर्वी मी सावानासाठी कामे केलेली आहेत. त्यातील काही कामे फुकटही केलेली आहेत. सावानासाठी पूर्वी केलेल्या काही कामांचे पैसे मला आजही मिळालेले नाहीत. मी या कामाची दहा लाख रुपये फी सांगितली. जहागीरदार चार लाखांवर अडून बसले. शेवटी विलास औरंगाबादकर आणि आनंद देशपांडे यांनी साडेसहा लाख रुपये घेण्याची मला विनंती केली आणि त्यांचा मान राखायचा म्हणून आणि सावानासाठी मी रुपये साडेसहा लाख मान्य केले.

सावानाने मला आर्ट कन्सल्टंट म्हणून नेमले होते. आर्किटेक्ट म्हणून नाही. सावानामध्ये नवीन बांधकाम काहीही करावयाचे नव्हते. जे पूर्वीचे बांधकाम होते त्यालाच सौंदर्यपूर्ण स्वरुप द्यावयाचे होते. मी आर्किटेक्ट नसल्याने कामामध्ये कुठे टेक्निकल अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी आर्किटेक्टची गरज भासणार होती. म्हणून जहागीरदारांनी विवेक जायखेडकरांना विनंती केली आणि ते सावानाशी संबंधित असल्याने त्यांनी ती विनंती मान्य केली. तेव्हा औरंगाबादकर दाखवितात तसे नाही. आर्किटेक्ट वेगळे होते आणि आर्ट कन्सल्टंट वेगळे होते. माझ्या सल्लाशुल्कामध्ये सावानाचे उत्पन्न वाढविण्याच्या जागा निर्माण करणे, हा एक भाग होता. त्या अनेक जागा मी निर्माण करून दिल्या आहेत. त्याचा उपयोग कसा करावा, हा सावानाचा प्रश्न आहे, असेही ढाकिफळे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीवर तिसऱ्या डोळ्याचा वॉच

सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीतील आरोप प्रत्यारोप लक्षात घेता मतदान आणि मतमोजणीच्या वेळी तिसऱ्या डोळ्याचा वॉच राहणार आहे. सावानाच्या इतिहासात प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यंदा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याने पावणेदोनशे वर्षातली पहिलीच ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे.

रविवार, २ एप्रिल रोजी सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक असून पॅनलप्रमुख व स्वतंत्र उमेदवारांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी बोलावली होती. यावेळी काही निर्णय घेण्यात आले असून, बैठकीत बरीच वादावादी झाली. उमेदवारांनी व पॅनलप्रमुखांनी प्रश्नांची सरबत्ती करीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच जाब विचारल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सुरुवातीला माधवराव भणगे यांनी उमेदवारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली. मात्र त्यांचे पूर्ण बोलणेही ऐकून न घेता उमेदवारांनी पोलिस बंदोबस्त आणण्याची व कॅमेरे लावण्याची मागणी केली. मात्र, भणगे यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. पोलिस व कॅमेऱ्यांची काहीही गरज नसल्याचे भणगे यांचे म्हणणे होते. मात्र त्याला उपाध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण नेवासकर यांनी कडाडून विरोध केला. राजरोसपणाने वाद होत असून निवडणुकीत इतके राजकारण झाले तर मतदानात किती होईल याकडे नेवासकरांनी लक्ष वेधले. सावानाला कॅमेऱ्यांचा खर्च परवडत नसल्यास आपण आपल्या खर्चाने कॅमेरे बसवू असेही नेवासकरांनी सांगितले. खडाजंगी झाल्याने भणगे यांनी अखेर नाईलाजाने या दोन्ही गोष्टींना परवानगी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाटकोंडी फुटली!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकाम व्यवसायाची मागील तीन वर्षांपासून झालेली कोंडी सुटण्यास आता सुरुवात झाली आहे. नुकतेच मंजूर झालेल्या शहर विकास नियंत्रण नियमावलीत नऊ मीटर रुंदीवरील रस्त्यांवर जादा एफएसआय देण्यात आला आहे. त्यामुळे नऊ मीटर रस्त्यावरील बांधकामातील कपाटांचा वाद नवीन नियमावलीतून सुटला आहे. आता नऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावरील इमारतींना बांधकाम पुर्णत्वाचे दाखले देण्याचे आदेश आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी दिले.

आता मोठ्या इमारतींमधील कपाटांचा प्रश्न जवळपास सुटला असल्याने बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील कपाटांवरून निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व शासनाला उपाय सूचवून त्या संदर्भातील प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यासंदर्भात गुरुवारी क्रेडाईचे प्रतिनिधी व आयुक्त यांची अंतिम बैठक झाली. आयुक्त कृष्णा यांच्यासह क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, आर्किटेक्‍ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप काळे, कृणाल पाटील यांच्यासह नगररचना विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. या वेळी मुख्यतः कपाटाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. डीसीपीआरमध्ये नऊ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावरील इमारतींना अतिरिक्त एफएसआय मंजूर झाला आहे. त्यामुळे एफएसआय आणि प्रीमियमचा वापर करून मोठ्या रस्त्यांवरील इमारतींच्या कपाटांचा प्रश्‍न निकाली काढण्यावर आयुक्त आणि क्रेडाईचे एकमत झाले. त्यामुळे नव्या नियमाप्रमाणे त्या इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याच्या सूचना आयुक्तांनी नगररचना विभागाला केला. आता जवळपास ४० ते ५० टक्के कपाटांचा प्रश्न मार्गी लागणार असून त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात होणार आहे. अशा प्रकरणांनी प्रस्ताव सादर करताना रिविजन अँड कम्प्लिशन प्लॅन म्हणून प्रस्ताव दाखल करण्याच्या आयुक्तांनी केली. त्यामुळे सदनिकाधारकांसह बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा मिळणार आहे. परवानगीचा मार्ग मोकळा झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रस्ताव सादर होणार असल्याने नगररचना विभागावर निर्माण होणारा ताण लक्षात घेऊन अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

सहा, साडेसात मीटरचा चेंडू सरकारकडे

सहा व साडेसात मीटर रुंदीवरील रस्त्यांना १.१० एफएसआय देण्यात आला आहे. मात्र, टीडीआर अनुज्ञेय नसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याने याबाबत सरकारकडे क्रेडाईने दोन पर्याय सुचविले आहेत. त्यामध्ये दहा टक्के शासनाने देऊ केलेला व बाल्कनीचा पाच टक्के असा एकूण पंधरा टक्के एफएसआयमधून काही प्रकरणे मार्गी लागतील. त्याव्यतिरिक्त रस्ता रुंदीकरणासाठी अंतर सोडून काहींना फायदा देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला जाणार आहे. येत्या ३ एप्रिल रोजी हा प्रस्ताव सरकारकडे पाठविला जाणार असल्याचेही क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी सांगितले आहे.

दीडशे कोटींचा महसूल

कपाटे नियमित करताना दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हार्डशीप प्रीमियमच्या माध्यमातून नवीन दराने दंड वसूल केला जाणार आहे. सध्या नऊशे रुपयांपेक्षा प्रति चौरस मीटर प्रीमिअमचा दर आहे. त्यामुळे या दंडाच्या रकमेतून पालिकेच्या तिजोरीत जवळपास दीडशे कोटींचा महसूल जमा होणार आहे. त्यामुळे पालिकेलाही मोठा दिलासा मिळणार असून, बांधकाम विभागाला उर्जा तर पालिकेला दिलासा मिळणार आहे. त्यामाध्यमातून पालिकेच्या तिजोरीत दीडशे कोटी रुपयांची भर पडण्याची शक्‍यता आहे. नवीन विकास आराखडा मंजूर होऊनही जुन्या आराखड्याप्रमाणे दाखल प्रकरणांना मंजुरी दिली जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोड कारागृहात भूषण लोंढेचा धुडगूस

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

खुनाच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेल्या भूषण प्रकाश लोंढे आणि त्याच्या साथिदाराने कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात भूषण लोंढे व त्याचा साथीदार सिद्धार्थ (आण्णा) राजू साळवे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारी कारवाया करुन शहरात दहशत निर्माण करणाऱ्या भूषणची थेट जेल कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेल्याने जेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर पोलिसात विविध गुन्हे दाखल असलेल्या भूषण प्रकाश लोंढे व सिद्धार्थ साळवे या दोघांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कारागृह सुरक्षा कर्मचारी प्रवीण सुभाष वाघमारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

सायंकाळचा टोल झाल्यावर सुरक्षा कर्मचारी प्रवीण यांनी सर्व बंदीवानांना आपापल्या बॅरेकमध्ये जाण्याची सूचना केली. याचा राग आल्याने भूषण याने प्रवीण यांना धमकावले. ‘तू आम्हाला ओळखत नाही का? आम्ही नाशिकचेच आहोत’ अशा प्रकारची उलट विचारणा करत दोघांनी प्रवीण यांच्यावर जीवघेणा हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात प्रवीण वाघमारे जखमी झाले. सरकारी कामात अडथळा आणणे, धमकावणे व जीवघेणा हल्ला केला म्हणून सुरक्षा कर्मचारी प्रवीण वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार भूषण लोंढे व सिद्धार्थ साळवे या दोघांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खुनासारखे गुन्हे करण्यात कुप्रसिद्ध असलेल्या भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदाराने चक्क जेलमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला केल्याने त्याची मुजोरी जेलमध्येही उघड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवठा कमी झाल्याने इमरजन्सी लोडशेडिंग

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वाढत्या तापमानामुळे जीवाची काहिली होत असतानाच लोडशेडिंगने कमबॅक केले आहे. मागणी आणि पुरवठा यामधील तफावत वाढल्यामुळे सध्या इमर्जन्सी लोडशेडिंग करण्याची वेळ महावितरणवर आली आहे. वीजटंचाई दूर करण्यासाठी महावितरण युध्दपातळीवर प्रयत्न करत असून, दोन-तीन दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे सूत्रांनी सांगितले.

राज्यात सध्या पारा चाळ‌िशीच्या पुढे गेल्यामुळे पंखे, कूलर, फ्रीज, एसी यांच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वीजेची मागणीही वाढली आहे. राज्याची वीजेची रोजची गरज १९ हजार मेगावॅट इतकी आहे. २९ मार्चला ९५० मेगावॅटने वीज पुरवठा कमी झाला. महावितरणने प्रयत्न केल्यामुळे ही तूट ३० मार्चला ५५० मेगावॅटवर आली. त्यामुळेच इमरजन्सी लोडशेंडिग करावे लागत आहे. नाशिकमध्ये काही ठिकाणी वीजपुरवठा खंड‌ित झाला. त्याचे कारण स्थानिक आहे. दोन-तीन दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे सूत्रांनी सांगितले.

वीजटंचाईचे कारण

राज्यात तात्पुरती वीज टंचाई निर्माण झाली आहे. त्याची तीन प्रमुख कारणे आहेत. त्यामध्ये महाजेनकोचे काही संच बंद पडले आहेत. केंद्राकडूनही वीजपुरवठा कमी होत आहे, तसेच खासगी क्षेत्रानेही हात आखडता घेतला आहे. राज्यासाठी वीजनिर्मिती महाजेनको करते. या कंपनीचे परळी, भुसावळ, चंद्रपूर, पारस, कोराडी येथे वीज निर्मिती संच आहेत. त्यातील अड‌िचशे मेगावॅट क्षमतेचे काही संच बंद पडले आहेत. भुसावळला तीन संच आहेत. त्यापैकी दोन चालू तर एक बंद आहे. एकलहरे येथील संच सुरू आहेत. वीजनिर्मिती पूर्ण क्षमेतेने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय पॉवर ग्रीडकडून राज्यांना वीज पुरवठा करुन त्यांची गरज भागविली जाते. सध्या केंद्राचे दोन पॉवर स्टेशन बंद आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही महाराष्ट्राला पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होत नाही. याशिवाय खासगी क्षेत्राकडून महावितरण वीज खरेदी करते. अदानी, टाटासारख्या खासगी वीज उत्पादकांकडून महावितरण एकूण नऊशे ते हजार मेगावाट वीज रोज घेते. मात्र, खासगी क्षेत्राकडून सध्या साडेपाचशे ते सहाशे मेगावॅट वीज मिळत आहे. त्यामुळेही वीजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुरेशा प्रमाणात वीज मिळवणे, तांत्रिक कारणाने बंद पडलेले वीज संच सुरू करुन वीजनिर्मिती वाढवणे आदी प्रयत्न सुरू आहेत. युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याने दोन-तीन दिवसांत लोडशेडिंग बंद होईल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.

परीक्षा काळात फटका

सध्या शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. महाविद्यालयांना विद्यापीठाकडून परिक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी ऑनलाइन प्रश्नपत्रिका मिळते. याचवेळी वीजपुरवठा खंड‌ित झाल्यास परीक्षेवर परिणाम होतो. रात्री वीजपुरवठा खंड‌ित झाल्यास अभ्यास करता येत नाही. वीज गेल्यास आईस्क्र‌िम विक्रेत्यांचे नुकसान होते. तसेच शेतकऱ्यांनाही शेतीला पाणीपुरवठा करता येत नाही. त्यामुळे सर्वच जण भारनियमन कधी कमी होईल, याची प्रतीक्षा करत आहेत. तथाप‌ि, पूर्वीसारखे सात-आठ तास भारनियमन करावे लागत नसल्याने नागरिकही महावितरणला सहकार्य करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एबीबी, जेहान’वर लवकरच सिग्नल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एबीबी आणि जेहान सर्कल येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २० एप्रिलपर्यंत ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात येणार आहे. सदर ठिकाणांची गुरुवारी वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

त्र्यंबकरोडवरील एबीबी सिग्नल आणि गंगापूररोडवरील जेहान सर्कल येथे सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. अनेकदा अपघातात वाहनचालकांचा मृत्यूदेखील होतो. दोन दिवसांपूर्वी या परिसरातील नागरिकांनी विशेषतः महिलांना एक मोर्चा काढून सिग्नल बसवण्याच्या कामात होणाऱ्या दिरंगाईचा निषेध नोंदवला होता. एबीबी सर्कलला येणाऱ्या प्रमुख चार रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच सिंहस्थादरम्यान गोविंद नगरकडे जाणारा रिंगरोड रूंद करण्यात आला. शिर्डीकडून येणारे बहुतांश वाहनचालक द्वारकेला पर्याय म्हणून या रस्त्याचा उपयोग करतात. जेहान सर्कलला संध्याकाळी मोठी गर्दी होते. वाहतूक विभागाने सदर ठिकाणी सिग्नल बसवण्याबाबतचा प्रस्ताव पूर्वीच सादर केला होता. त्यास मंजुरीदेखील मिळाली आहे. गुरुवारी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. २० एप्रिलपर्यंत दोन्ही सिग्नल्स कार्यन्वित होतील, अशी अपेक्षा महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या सर्कलवर सिग्नल बसवावा, अशी मागणी नगरसेवक समीर कांबळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

२१ पैकी दोन सिग्नल

वाहतूक विभागाने एकूण २१ ट्रॅफिक सिग्नल बसवण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेला दिला आहे. त्यातील हे दोन सिग्नल असून, आवश्यकतेनुसार इतर ठिकाणी सिग्नल बसवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्र्यंबक नाका ते सातपूर या मार्गावर त्र्यंबक नाका, तरणतलाव, शरणपूर पोलिस चौकी, उद्योग भवन असे सिग्नल्स कार्यन्वित आहे. त्यात, आणखी एका सिग्नल्सची भर पडणार आहे. सिबल हॉटेल, सातपूर गाव आणि पपया नर्सरी असे तीन सिग्नल प्रस्ताव‌ित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’विरोधात सिन्नरला मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या जमिनी संपादनविरोधात इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेले असतांनाच सिन्नर तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. गुरुवारी सिन्नर तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील एक इंचही जमीन देणार नसून यासाठी रस्त्यावर रक्त सांडले तरी बेहत्तर, मात्र या महामार्गासाच्या जमीन संपादनास आमचा विरोध आहे. हा महामार्ग होऊ देणार नसल्याचा निर्धार या मोर्चात व्यक्त करण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. महिलांचाही सहभाग मोठा होता.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध विकास कामांसाठी जमिनी दिल्याअसून यापुढे एक इंचभरही जमीन समृद्धी महामार्गासाठी देणार नसल्याच्या निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. यापार्श्वभूमीवर गुरुवारी सिन्नर तहसीलवर मोर्चाचे काढण्यात आला. प्रांत महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
सकाळी आकरा वाजता सिन्नर बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली. गणेशपेठ, शिवाजी चौक, वावी वेस मार्गे मोर्चा तहसीवर गेला. या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले. येथे समृद्धी महामार्गाच्या कामास विरोध असल्याचे सांगितले. तसेच सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रांत महेश पाटील यांना पाच महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले. राजाराम मुरकुटे, शांताराम ढोकणे, राजू देसले आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांनाही घ्यावे विचारात...

0
0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय प्राध्यापक संघटना (स्पुक्टो) जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. सतीश ठाकरे यांची पुढील दोन वर्षांसाठी नुकतीच निवड झाली. त्यानिमित्त प्राध्यापकांशी निगडित विविध मुद्यांवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

---

-दीर्घकालीन प्रयत्नांनंतरही नेट-सेटचा तिढा प्राध्यापकांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे...

गुणवत्तेसाठीचे सर्व निकष पूर्ण करण्यास प्राध्यापक तयार आहेत. मात्र, ज्यावेळी शासनाच्याच आदेशात संदिग्धता असेल, अशा वेळी विचार व्हायला हवा. विद्यापीठ अनुदान आयोगाने ४ एप्रिल २००० पूर्वी सेवेत रुजू झालेल्या प्राध्यापकांना नेट-सेटच्या निकषांमधून सूट दिलेली होती. शासनाला हे मान्य नसल्याने हा मुद्दा कोर्ट प्रक्रियेत आला. या मुद्यावर सध्या सुप्रीम कोर्टात आमचा संघर्ष सुरू आहे.

-नियमित प्राध्यापकांचे पगार हा चर्चेचा विषय असतानाही सातव्या आयोगाची अपेक्षा ठेवली जाते...

सातव्या वेतन आयोगाची अपेक्षा करणे अवास्तव नाही. शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्राध्यापकांकडून संपूर्ण आयुष्य पणाला लावले जाते. त्यासाठी ज्ञानार्जन करणे व अद्ययावत राहण्यासाठी तितकेच बौद्धिक श्रम करावे लागतात. शिक्षण आणि संशोधनासारख्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ भविष्यात आकर्षित करायचे झाल्यास सातव्या आयोगासारख्या सुविधा लागू कराव्या लागतील, तरच चांगले मनुष्यबळ या क्षेत्रात येईल.

-पदोन्नतीसारख्या प्रसंगातही संघर्ष करावा लागतो?

होय, विशिष्ट कालावधीत सेवा दिल्यानंतर पदोन्नतीसारख्या हक्कासाठी संघर्ष करावा लागणे, ही बाब क्लेशदायक आहे. पदोन्नती मिळविण्यासाठी प्राध्यापकांना अनेकदा कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र, तरीही शासन कोर्टाचे निर्देश अमलात आणत नाही. याशिवाय पदोन्नतीसाठी एपीआय (अॅकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर) ही नवी प्रणाली लागू केली आहे. पण, या प्रणालीच्या कार्यपद्धतीत संदिग्धता आहे. याबाबतची धोरणे अन् निकषच स्पष्ट नाहीत. या प्रणालीला प्राध्यापकांचा विरोध आहे.

-उच्च शिक्षणातील धोरणाकडून काय अपेक्षा आहेत?

उच्च शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात सरकारने सर्वांत पहिल्यांदा आर्थिक खर्चाची तरतूद वाढवून ती किमान सहा टक्क्यांवर न्यायला हवी. या धोरणांमध्ये उच्च शिक्षणाला म्हणावे तितकेसे प्राधान्य दिले गेलेले नाही. शिक्षण क्षेत्रात झालेल्या व्यापारीकरणावरही सरकारने कडक धोरणांच्या माध्यमातून रोख लावायला हवा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करताना प्राध्यापकांचाही विचार यात करायला हवा. प्राध्यापकांच्या संघटनांना या प्रवाहातून डावलले जाते.

-पे स्केल, पेन्शन योजनांसंदर्भात मागण्या प्रलंबित आहेत...

यूजीसीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पे स्केलचे फायदे प्राध्यापकांसोबतच प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनाही मिळायला हवेत. यामध्ये लायब्ररियन किंवा स्पोर्टस टीचरसारख्या पदांचा विचार केला जावा. सन २००४ पासून लागू करण्यात आलेली पेन्शन स्कीम थांबवून जुनीच स्कीम लागू करण्यात यावी.

-बायोमॅट्रिक सिस्टिमसारख्या नव्या प्रणालींबद्दल मत काय?

प्राध्यापकांवर अविश्वास दर्शविण्यासारखी ही बाब आहे. अनेकदा गरजेनुसार कार्यालयीन अपेक्षांपलीकडे जाऊन अभ्यासादी व्यासंगात प्राध्यापक स्वत:ला झोकून देतात. बायोमॅट्रिकसारख्या प्रणाली अशा प्राध्यापकांवरही अविश्वास दाखविणार आहेत. त्याएेवजी सरकारने रिक्त जागांवर अंशकालीन प्राध्यापक नेमून गुणवत्तेशी खेळ करण्यापेक्षा तेथे पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून दर्जा राखावा.

-उच्च शिक्षणासमोर भविष्यातील कुठली आव्हाने महत्त्वाची वाटतात?

परदेशी विद्यापीठांची पायाभरणी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे. ही विद्यापीठे इन्फ्रास्टक्चर, सुविधा, गुणवत्तेशी अजिबात तडजोड करणारी नाहीत. या स्थितीत आपल्याकडील विद्यापीठांनी वेळीच सजग होऊन या स्पर्धेचे आव्हान पेलण्यासाठी सक्षम बनायला हवे.

-नॉन ग्रँटेड प्राध्यापकांची स्थिती बिकट आहे...

या प्रश्नावरही संघटनेची संघर्षाची भूमिका कायम आहे. केवळ विनाअनुदान तत्त्वावरील अभ्यासक्रम किंवा कॉलेजेसना परवानगी देणे म्हणजे शिक्षणातील प्रश्न सोडविणे असे होत नाही. दीड दशकापासून अत्यल्प मोबदल्यात असे शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या मागण्यांचा विचार व्हायला हवा.

-संघटना पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे काय?

रास्त मुद्यांवर आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. आंदोलनासारख्या निर्णयावर मात्र आम्ही परिवारातील सर्व घटक संघटनांच्या विचारविनिमयानंतर येतो. केंद्रीय एम. फुक्टो संघटना यासाठी घटक संघटनांसोबत विचारविनिमय करते. सध्या जिल्हा दौरा करून स्थानिक स्तरावरील प्राध्यापकांचे प्रश्न केंद्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन.

(शब्दांकन ः जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याचे ‘पितळ’ उघडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतात नांगरणी करताना सोने सापडल्याची बतावणी करत नकली सोने एका जेसीबी चालकाच्या हाती टेकवून त्याला तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार येवला तालुक्यात समोर आला. हाती पडलेला ऐवज हा सोने नसून, चक्क पितळ असल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झालेल्या जेसीबी चालकाने येवला शहर पोल‌िसात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जेसीबीचे चालक म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराला सोन्याच्या हव्यासापोटी तब्बल तीन लाख रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिथुनकुमार सिताराम यादव (वय २४, रा. कुसाहान, जि. कोडारमा, झारखंड) हा गेल्या अनेक दिवसांपासून येवला तालुक्यातील एका जेसीबी मालकाकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. पिंपळगाव जलाल शिवारात काही दिवसांपूर्वी यादव याची सोमनाथ उर्फ सुनील पांडुरंग आहिरे (रा.येवला) तसेच रामदास (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर एक अशा तिघांची भेट झाली. या भेटीत तिघांनी त्याला आमच्या एका मित्राला शेत नांगरत असताना जमिनीत दहा किलो सोने सापडले आहे. त्यातील एक किलो सोने आम्हाला विकायचे आहे. महाराष्ट्रात नोटाबंदीमुळे सोन्याला घेण्यास कुणी तयार नसल्याने तुला आम्ही हे एक किलो सोने १२ लाख रुपयांना देतो, अशी बतावणी केली. मिथुनने झारखंडला जावून घरातील दीड लाख व मित्रमंडळीकडून उसने दीड लाख असे एकूण तीन लाख रुपये आणले. तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात २४ मार्च रोजी दुपारी तिघांनी मिथुनकडून ३ लाख रुपये घेऊन त्याच्या हाती अंगठ्या टेकवल्या. पैसे मिळताच यादवला दमदाटी करत तिघेही पसार झाले. आपल्या हाती टेकवलेल्या अंगठ्या पितळाच्या असल्याचे मिथुनच्या लक्षात येताच त्याने येवला शहर पोल‌िसात तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-पुणे महामार्गावरील फेम थिएटरजवळ चोरट्यांनी रिक्षात बसलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची वजनाची सोन्याची पोत तोडून धूम ठोकली. मंगला अर्जुन मोरे (रा. मोरेमळा, जेलरोड) यांच्या तक्रारीनुसार, या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात चेन स्नॅचिंगचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. चोरटे एक दिवसाआड महिलांना टार्गेट करीत असून, रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांचे स्त्रीधन लुटून नेणारी टोळी पोलिसांना आव्हान देत आहे. काही दिवसांपूर्वी रिक्षातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडताना महिला खाली पडून जखमी झाली होती. असाच प्रकार आता फेम थिएटरजवळ गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला आहे. बोधलेनगरकडून उपनगर नाक्याकडे जाण्यासाठी मोरे या रिक्षाने प्रवास करीत होत्या. फेम थिएटरसमोर सहप्रवासी उतरणार असल्याने रिक्षा थांबली. पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने मोरे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची वजनाची आणि ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून घेतली. मोरे यांनी आरडाओरड करण्यापूर्वी चोरट्यांनी भरधाव वेगात धूम ठोकली. दुचाकीला पाठीमागे नंबरप्लेट नव्हती. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एम. व्ही. श्रीराव करीत आहेत.

संशयितांना कोठडी

सिन्नर फाटा : सिन्नर फाटा येथील बजरंग फरसाण मार्ट या हॉटेलातील कामगार कृष्णा उत्तमराव नागे खून प्रकरणातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी नाशिकरोड कोर्टात शुक्रवारी हजर केले. कोर्टाने त्यांना सोमवार, ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कृष्णा उत्तमराव नागे या हॉटेल कामगाराचा मृतदेह गेल्या मंगळवारी (दि. २८) रोजी रात्री चेहेडीजवळील दारणा नदीवरील पुलालगत आढळून आला होता. या खुन प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी पवन बोरसे, अंकुश नाठे आणि अमोल सहाणे या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांना शुक्रवारी नाशिकरोड कोर्टात हजर केले होते. या तिघांनी कृष्णाचा खून आपणच केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुली झाल्याने विवाहितेचा छळ

मालेगाव : दोन मुली झाल्या म्हणून पतीने पत्नीस मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फरीन अहमद खान (२४, रा. रौशनबाद) या विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी विवाहित महिलेस दोन मुली झाल्या म्हणून तिच्या पतीने २०१४ पासून मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच माहेरून नवीन लुंम कारखाना टाकण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली तसेच माहेरच्यांना शिवीगाळ केली. याबाबत विवाहितेने सासरच्या मंडळीची समजूत काढत आपली ऐपत नसल्याचे सांगतले याचा राग आल्याने २९ मार्च रोजी आरोपीसह अन्य तिघांनी तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच ‘तिसरी मुलगी झाल्यास तुला तलाख देईल’ अशी धमकीही दिली.

तिघांची महिलेस मारहाण

मालेगाव : घरासमोरील मोटरसायकलवर पाणी फेकल्याने महिलेस मारहाण करून शिवीगाळ केली तसेच घराच्या पत्र्यांचे नुकसान केले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. फरजाना फैयाज अहमद (रा. पवारवाडी) या महिलेने फिर्याद दिली. फरजाना घरासमोर पाणी फेकत असतांना वाहिद अख्तर हा त्याच्या घरासमोर गाडी उभी करीत होता. पाणी गाडीवर येते असल्याचे तो बोलला. महिलने पाणी दुसरीकडे फेकत असल्याचे सांगिल्याने वाहिदला राग आला. त्याने महिलेस मारहाण केली.

अपहरण करून तरुणास मारहाण

ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयातून अपहरण करीत टोळक्याने तरुणास मारहाण केली. या प्रकरणी सहा जणांंविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसिंहनगर भागात राहणाऱ्या ललित अर्जुन शिंदे याने तक्रार दिली आहे. गुरूवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास शिंदे चैतन्यनगर रिक्षाथांब्यावर उभा असतांना त्यास गणेश पवार याने बोलावून घेतले. माझे लग्न मोडण्याचा प्रयत्न करतो का? असे विचारत शिवीगाळ केली. यावेळी सफ्या, रवी बोरसे, सचिन चव्हाण, अक्षय व अन्य एक अशा सहा जणांनी कारखाली उतरून मारहाण केली. त्यानंतर स्विप्ट कार (एमएच १५ ४३८६) मध्ये बसवून त्यास गंगापूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मारक येथील गार्डनमध्ये नेले.

लॅपटॉपसह मोबाइलची चोरी

वडाळानाका येथील रेणुका शॉपिंग सेंटरमधील फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने लॅपटॉप व सॅमसंगचा मोबाइल, असा ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. राज अनिल जोशी (रा. वडाळानाका) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे रेणुका शॉपिंग सेंटर या इमारतील फ्लॅट नंबर २ च्या उघड्या दरवाजातून अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून ही चोरी केली. जोशी कुटुंबीय कामात व्यस्त असताना चोरट्याने लेनोव्हा कंपनीचा लॅपटॉप व सॅमसंगचा मोबाइल असा ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.

पिंपळगाव बहुल्यात आत्महत्या

पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या प्रांगणात सातपूर कॉलनी येथील एका व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मधुकर रमाकांत दीक्षित (५०, रा. राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटी, सातपूर कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरूवारी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान दीक्षित पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या मैदानावर अत्यावस्थ अवस्थेत मिळून आले. रोगर नावाचे किटकनाशक सेवन केल्याने त्यांना सातपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत.

तीन दुचाकींची चोरी

शहर परिसरात तीन दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. पंकज श्रीराम क्षीरसागर (रा. फुलेनगर) हा युवक मंगळवारी दुपारी मुंबई नाका परिसरात गेला होता. मयूर प्लाझा इमारतीच्या पार्किंगमध्ये त्याने पार्क केलेली दुचाकी (एमएच १५ इसी ८७०५) चोरट्यांनी हातोहात लांबवली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत. वाहनचोरीची दुसरी घटना कॉलेजरोड भागात घडली. ओमहरी निवास येथे राहणारे प्रसाद रवींद्र महाले यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ डीझेड ३७४८) १३ मार्च रोजी सकाळी त्यांच्या बंगल्याच्या आवारात लावलेली असताना चोरट्यांनी चोरी केली. सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत. दरम्यान, जगदीश हनुमान लोहार (रा. गोकुळ अपार्ट. शिवाजीनगर) यांची दुचाकी (एमएच १५ बीझेड ४६३७) गत बुधवारी रात्री त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरी झाली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘झेडपी’त मार्चएण्डची लगीनघाई

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा परिषदेने जिल्हा कोषागारात सुमारे ७२ कोटीची बिले जमा केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. अगोदर ४ वाजेपर्यंत ही बिले जमा करण्याचे निर्देश दिले होते. पण त्यानंतर रात्री आठपर्यंत मुदत दिल्याने जिल्हा परिषदेत मार्चएण्डची लगीनघाई सर्वच विभागात सुरू होती.

जिल्हा परिषदेत दोन दिवसात वेगवेगळ्या लेखाशीर्षाखाली ६० कोटीचा निधी प्राप्त झाला. तो खर्चा करण्यासाठी सर्वच विभागाचा गोंधळ उडाला. त्यानंतरही १२ कोटीच्या आसपास निधी अखर्चित राहिल्याची चर्चा आहे. काही दिवसांपासून जिल्हा कोषागारात बिले जमा करण्याचे काम सुरू होते. गुरुवारी जिल्हा कोषागारात पाच कोटींची ४० तर शुक्रवारी सुमारे १२५ हून अधिक बिले जमा करण्यात आली. अखेरचा दिवस असल्याने विविध विभागाचा निधी खर्च करण्यासाठी प्रशासाना प्रयत्न होता. त्यामुळे दर अर्ध्या तासाला किती बिले सादर केल्याचा अहवाल घेतला जात होता. बुधवारी १२ कोटीची बिले जमा करण्यात आली. त्यानंतर हा आकडा ७२ कोटीच्या आसपास झाला. कोषागारात जमा केलेल्या बिलांमध्ये आमदार निधीचे अडीज कोटीचे बिले होती. तर नवीन रस्ते १४ कोटी, लघु पाटबंधारे २ कोटी ५० लाख, नावीन्यपूर्ण योजना ९ कोटी व इतर खर्चाचा समावेश होता.

इतर कामे बंद

मार्चएण्डमुळे इतर कामांना शुक्रवारी पूर्णविराम देत वित्त विभागाशी निगडीत कामेच करण्यात आली. इतर कामानिमित्त आलेल्यांना मात्र त्याचा फटका बसला. सर्वच विभाग मार्चएण्डच्या कामात गुंतल्यामुळे सोमवारी, तीन एप्रिल रोजी येण्याचा सल्ला सर्वत्र दिला जात होता.

असा आला निधी

जिल्हा परिषदेला बुधवारी (दि. २९) १८.८३ कोटीचा निधी प्राप्त झाला. त्यानंतर गुरुवारी (दि. ३०) विविध लेखाशिर्षाखाली ४१ कोटीचा निधी मिळाला. त्यामुळे हा ५९ कोटी ८३ लाखाचा निधी खर्ची घालण्यासाठी सर्वच विभागाची चांगलीच धावपळ झाली.

१२ कोटी अखर्चित!

सरकारकडून आलेल्या निधीचा वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असला तरी काही निधी खर्ची होत नसतो. त्यामुळे जिल्हा परिषदेतही १२ कोटीच्या आसपास हा निधी अखर्चित राहिल्याचे समजते. त्यात आरोग्य, बांधकाम, पशुसंवर्धन, अंगणवाडी या विभागांच्या निधीचा समावेश आहे.

जवळपास सर्व विभागाची बिले जिल्हा कोषागारात जमा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. रात्री ८ पर्यंत मुदत दिल्यामुळे दिलासा मिळाला.
- बो. ज. सोनकांबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाठीमागे येणाऱ्या मालट्रकच्या चाकाखाली सापडून आठ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी पाऊणे आठ वाजेच्या सुमारास पेठरोडवरील तवलीफाटा भागात घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ट्रकचालक शिवाजी रामचंद्र गायकवाड (रा. शंकरनगर) यास अटक केली आहे.

पूजा देविदास पागे (वय ८, रा. शंकरनगर, नवीन जकातनाका, पेठरोड) असे अपघातात ठार झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी पाऊणे आठ वाजेच्या सुमारास झोपेतून उठून पूजा अंगणाजवळ येऊन उभी होती. याच वेळी घराजवळ पार्क केलेला मालट्रक (एमएच १५ बीजे १२२२) चालकाने मागे घेतला. नेहमी प्रमाणे घराशेजारी लावलेल्या मालट्रकजवळ पूजा खेळण्यासाठी गेली. पूजा ट्रकजवळ आल्याची बाब चालकाच्या लक्षात आली नाही आणि हा अपघात झाला. अचानक मालट्रक मागे आल्याने पूजा पाठीमागील चाकाखाली सापडली. मालट्रकचे चाक तिच्या डोक्यावरच गेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. या प्रकरणी चालक शिवाजी गायकवाड यांच्याविरूध्द म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक जोपळे करीत आहेत.

अपघातात तरूण ठार

पंचवटी : नांदूरनाका येथे सिग्नलवर ट्रकची धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुण ठार झाला. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. संतोष चंद्रभान बोराडे (३१, रा. जऊळके शिवार, दहावा मैल) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नांदूरनाका येथील सिग्नलवर थांबलेला असतांना संतोष हा मोटारसायकलवरून (एमएच १५ ई जे ३६४६) खाली पडला. त्याचवेळी डांबराचा टँकर (एमएच ०४ एफ ८६११) जवळून जात होता. त्याचा धक्का बसल्याने संतोषच्या डोक्याला मार लागला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. अपघातानंतर नांदूरनाका परिसरात गर्दी झाली. गर्दीमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी टँकरचालक अशोक विठ्ठल खिल्लारे (रा. पोटेकर वाडी, पाथर्डी शिवार) याला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईच्या वाढल्या झळा

0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मार्च महिन्यात तापमानाचा पाऱ्याबरोबरच नाशिक विभागातील पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मार्चमध्येच अशा गावांची संख्या १२ वरून २२ पर्यंत गेली आहे. या गावांना १५ शासकीय टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

नाशिक विभागातील ५४ पैकी ३९ तालुक्यांतील भूजलपातळीत गेल्या पाच वर्षांच्या भूजलपातळीच्या सरासरीच्या तुलनेत घट आली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालातूनच ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे येत्या एप्रिल व मे महिन्यात नाशिक विभागातील बहुतांश तालुके कोरडेठाक पडण्याची दाट शक्यता आहे. तापमानाचा पारा चाळिशी पार करू लागल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

२२ गावांमध्ये टँकरवारी

नाशिक विभागातील २२ गावांना सध्या टँकरद्वारे प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यातील सहा-सहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मार्चच्या अखेरीस आता टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत १० ने भर पडली असून आता टंचाईग्रस्त गावांची संख्या २२ वर पोहचली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व जळगाव या तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांचा समावेश आहे.

टँकरला मागणी

नाशिक विभागात सध्या २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी विभागातील अनेक गावांचे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. तपमानाचा चढता पारा बघता प्रशासनाकडूनही टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविण्यास प्राधान्य दिले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानात घट; नाशिककरांना दिलासा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळेल, असे वातावरण पुन्हा जाणवू लागले आहे. तापमानात गेले दोन दिवस सलग घट होत असून पुढील दोन दिवसांत हे तापमान आणखी कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

यंदाचा उन्हाळा नाशिककरांना हैराण करून सोडणार हे निश्चित आहे. मार्च अखेरलाच तापमानाने चाळिशी पार केली. वाढत्या तापमानाने नाशि‌ककरांना दुपारी घरांमध्येच बंदिस्त करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. असा उन्हाळा कधी अनुभवला नव्हता असे नागरिक आतापासूनच बोलू लागले आहेत. चार दिवसांपूर्वी नाशिकमध्ये तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली. उन्हाच्या तप्त झळांनी नागरिकांना नको नको करून सोडले. त्यामुळे दुपारी नाशिकचे रस्ते ओस पडू लागले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमानाचा पारा काही अंशांनी खाली उतरू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना किंचितसा दिलासा मिळतो आहे. गुरूवारी नाशिकचे कमाल तापमान ३९.९ अंश सेल्सियस नोंदविले गेले. शुक्रवारी ते आणखी कमी म्हणजेच ३९.७ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. विदर्भ वगळता अन्य राज्यात येत्या दोन दिवसांत तापमानाचा पारा आणखी कमी होईल असा अंदाज आहे.

मालेगाव होणार थंड

मालेगाव : शहर व तालुक्यात आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र, शुक्रवारी या तापदायक उन्हामध्ये काहीशी घट झाली. गेले पाच दिवसा सातत्याने ४३ अंशांवर राहणारा तापमानाचा पारा शुक्रवारी एक अंशाने खाली आले. आगामी आठवडाभरात तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत खाली येऊ शकतो, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. येत्या आठवड्यात नागरिकांना उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळू शकतो.

मार्चच्या अखेरीलाच तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. राज्यातील उच्चांकी तापमान असलेल्या शहरात मालेगावचाही क्रमांक होता. उन्हाचा पारा ४३ अंश इतका उच्चांक गेल्या पाच दिवसात तापमानाने गाठला. त्यामुळे अनेक आजारही बळावले. शुक्रवारी या तापमानात एक अंशाची घट दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिग्री हवीय, इंटर्नशिप करा!

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता इंटर्नशिप अनिवार्य करण्यात येणार आहे. इंटर्नशिप केली तरच डिग्री दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना जॉब मार्केटच्या पात्रतेचे बनविण्यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहेत. केवळ नावाला डिग्री न देता त्यासोबत क्वॉलिटी एज्युकेशन आणि मुख्यत: वर्क नॉलेज देण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे.

मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी इंजिनीअरिंग कॉलेजमधून पासआऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणाऱ्या या निर्णयासंदर्भात राज्यसभेत माहिती दिली. इंटर्नशिपच्या धर्तीवर इंजिनीअरिंग कॉलेजेसच्या अभ्यासक्रमात त्यानुसार बदल केली जाण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव ‘एआयसीटीई’ने पास केला आहे. याबाबत जावडेकर यांनी राज्यसभेत माहिती सादर केली आहे.

गेल्या काही वर्षात इंजिनीअरिंगचे विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात काम करताना पुरेसे प्रशिक्षित नसल्याची टीका वारंवार होताना दिसते. त्यामुळे या पदवीधारकांपैकी केवळ ३५ ते ४० टक्के विद्यार्थ्यांना दरवर्षी नोकरी मिळते. विद्यार्थ्यांमधील प्रॅक्टिकल नॉलेज कमकुवत असल्याने इंजिनीअरिंगची डिग्री घेऊनही ते कंपन्यांना पुरेसा न्याय देत नसल्याचे उद्योग समूहांकडून मत व्यक्त केले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमातही बदल केला जाण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारची इंटर्नशिप अनिवार्य नव्हती. त्यामुळे कंपन्यांना नेमके काय हवे असते, तेथील कामाचे स्वरुप कसे असते, याचा कोणताही अंदाज विद्यार्थ्यांना येत नव्हता. केवळ अभ्यासक्रमांमधून येणे शक्य नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे. दरम्यान, अजूनपर्यंत या निर्णयाची माहिती कॉलेजांपर्यंत पोहोचली नसून त्याची प्रतीक्षा असल्याच्या प्रतिक्रिया राजेंद्र नाठे व मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य गजानन खराटे यांनी दिली आहे.

इंटर्नशिपचे वेगळे गुण

इंजिनीअरिंगच्या पाचव्या, सहाव्या व सातव्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना ही तीन ते २४ महिन्यांची इंटर्नशिप करायची आहे. जेणे करून डिग्री मिळेपर्यंत विद्यार्थी औद्योगिक कंपन्यांसाठी तयार होतील. विशेष म्हणजे इंटर्नशिपचे वेगळे गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.

कॉलेजस्तरावरही उपक्रम

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या पुरेशा संधी मिळाव्यात, यासाठी कॉलेज स्तरांवरही विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, त्यातून ठराविक विद्यार्थीच पुढे येत असल्याने उर्वरित विद्यार्थी मागे राहत आहे. हे चित्र बदलण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

एक्सटर्नल एजन्सीज ठरणार दुवा

कंपन्यांची संख्या व विद्यार्थी संख्या यांचे गुणोत्तर जुळणारे नसल्यामुळे एआयसीटीई काही एक्सटर्नल एजन्सीज दुवा बनविणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images