Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘त्या’ वृक्षांचा निष्कारण बळी

$
0
0

रस्त्यात अडथळा ठरणाऱ्यांऐवजी इतर डेरेदार वृक्षांवर कुऱ्हाड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर रस्त्याच्या मधोमध येणारी झाडे काढण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने नाशिक महापालिकेला दिली आहे. या संधीचा फायदा घेत महापालिकेने रस्त्याच्या दुभाजकांमधील झाडेसुध्दा तोडण्याचा सपाटा लावला आहे. सिटीसेंटर मॉलसमोर दुभाजकांना लागून असलेले डेरेदार वृक्ष महापालिकेने काढले असून, याबाबत परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. त्यामुळे महापालिकेचे हे नेमके काय चाललेय, अशी विचारणा नागरिकांमधून विचारणा होत आहे.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सर्वत्र रुंदीकरण करण्यात आले. शहराच्या बाहेरुन रिंग रोड साकारण्यात आले. हे रुंदीकरण करित असताना रस्त्याच्या मधोमध येणारी झाडे काढण्यास वृक्षप्रेमींकडून विरोध करण्यात आला. त्याबाबत कोर्टात जनह‌ित याचिका दाखल करण्यात आली. रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे काढली जावीत अशी महापालिकेच्यावतीने कोर्टाला विनंती करण्यात आली. रस्त्याच्या मध्ये किती झाडे आहेत, याची माहीती घेऊन ती कोर्टाला सादर करावी, असे आदेश महापालिका आणि पर्यावरणवादी संस्थांना देण्यात आले. १ हजार १४५ झाडे रस्त्यात येत असून, ती काढावीत असे आदेश महापालिकेला देण्यात आले. या आदेशानुसार गंगापूर रोड, पेठरोड परिसरातील अनेक झाडे काढण्यात आली. याच संधीचा फायदा घेत सिटीसेंटर मॉलसमोरील दुभाजकांमध्ये असलेली झाडे रविवारी काढण्यात आली. ही झाडे काढली नसती, तरी चालू शकले असते. परंतु, उद्याचे दुखणे आजच काढून टाकू, असे म्हणत महापालिकेने या वृक्षांवरही घाव घातला. ही झाडे दोन्ही रस्त्यांच्या मध्ये असलेल्या दुभाजकांना लागून होती. याचा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. या वृक्षतोडीचा फायदा नागरिकांना नाही मात्र परिसरातील काही व्यावसायिकांना होणार असल्याने ही झाडे काढून टाकल्याची चर्चा परिसरात होती. या झाडांप्रमाणेच त्र्यंबकरोडवर असलेली काही झाडेदेखील कोणताही त्रास नसताना काढण्यात येत आहेत. सिंहस्थाच्या कालावधीत त्र्यंबकरोडचे रुंदीकरण करण्यात आले. यावेळी हा पूर्ण परिसर ओसाड करण्यात आला होता. उरलीसुरली काही झाडे रविवारी काढण्यात आली. या वृक्षतोडीबाबत नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. सध्या नाशिकचे तापमान ४१ अंश सेल्सियस इतके गेले आहे. या वृक्षतोडीचा फटका नागरिकांना बसणार असून, शहरातील तापमान आणखी जास्त वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील विविध मुख्य रस्ते, रिंगरोड इत्यादीच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे करताना काही रस्त्यांच्या दुतर्फा रुंदीकरणामध्ये सुमारे एक हजार १४५ झाडे बाध‌ित होणार आहेत. ही झाडे काढण्यासाठी प्रस्ताव सादर केला असता, ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. महापालिकेने यातील ७७० वृक्ष तसेच ठेऊन ३७५ झाडे काढण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

उच्च न्यायालयात नाशिक नागरी कृती समिती यांनी नाशिक महानगरपालिका व अन्य विभाग यांचे विरुध्द जनहीत याचिका (४१/२००६) दाखल केली होती. या जनहीत याचिकेत उच्च न्यायालयाने २ मे २०१४ रोजी नाशिक महानगरपालिकेस काही निर्देश दिले होते. त्यानुसार रस्त्याच्या दुतर्फा बाध‌ित होणारी झाडे काढण्यासाठी उच्च न्यायालयात परवानगी करीता सिव्हिल अॅप्ल‌िकेशन (क्र. ९६/२०१४) सादर केले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निर्देशांनुसार नाशिक महानगरपालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीचे गठण केले आहे. त्याचबरोबर रुंदीकरणातील काढावयाच्या झाडांच्या बदल्यात सुमारे २१ हजार इतक्या १० फूट उंचीच्या वृक्षांची लागवड केली आहे. उच्च तंत्रज्ञान वापरुन संगणकीय पध्दतीने मनपा क्षेत्रातील वृक्षांच्या गणनेचे काम प्रगतीपथावर असून सुमारे ८.५० लक्ष वृक्षांची गणना पूर्ण करण्यात आली आहे. याबाबत मनपाच्या nashik municipalcorporation या वेबसाईटवरील Tree census या लिंकवरून वृक्ष गणनेबाबत नागरिकांना माहिती मिळवता येणार आहे. तसेच सुमारे २३२ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. सहा सदस्य संख्या असलेली तज्ञ समिती गठीत केलेली आहे. अशाप्रकारे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची पूर्तता नाशिक मनपाने केलेले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये प्रत्याक्षात १ हजार १४५ झाडे बाधीत होऊन तोडणे प्रस्तावित होते. तथाप‌ि उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार फेरसर्वेक्षण करून यापैकी ७७० वृक्ष वाचविण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत ३७५ इतकीच झाडे काढण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकला पाणीटंचाईच्या झळा

$
0
0

तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर पाण्याच्या टँकरची प्रतीक्षा

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीतील आणि दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीच्या उगमस्थानाजवळील त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यातील वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत.

तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव येण्यास प्रारंभ झाला असले तरी तालुक्यात अद्यापपर्यंत शासनाकडून एकही टँकर सुरू झालेला नाही. मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या महादरवाजा मेटसह बेरवळ ग्रामपंचायतीच्या आठ वाड्यांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पाण्याचे टँकर कधी सुरू होतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. े बेरवळ ग्रामपंचायतअंतर्गत पंगारपाणा, कुतरमाळ, टाकरशेत, वाघचौडा, उंबरदरी, कौलपोंडा, चामेणमाळ आदी वस्त्यांसाठी पाणीच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. या सर्व वाडीवस्त्या मिळून सुमारे दोन हजार ग्रामस्थांना प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. बेरवळच्या या वाड्यावस्त्या हरसूलच्या दुर्गम भागात आहेत.

या भागात राबविलेल्या पाण्याच्या उपाययोजना निष्फळ ठरल्या आहेत. बह्मगिरी पर्वतावर महादरवाजा मेट, सुपलीची मेट, गंगाद्वार, विनायक खिंड, पठारवाडी आणि जांबाची वाडी या वस्त्या आहेत. सर्व वस्त्या मिळून जवळपास दोन हजार ग्रामस्थांची वस्ती आहे. चाळीस ते पन्नास घरांच्या स्वरूपात विखुरलेल्या या सहा वस्त्यांची मिळून मेटघर किल्ला ग्रामपंचायत आहे. यामध्ये गंगाद्वार मेट येथील ग्रामस्थांना त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. सुपलीची मेट व विनायक खिंड येथे विह‌िरींना पाणी असून, उर्वरित वस्त्यांना मात्र पाणीटंचाई भेडसावत आहे.

शहरात दिवसाआड पाणी

त्र्यंबकेश्वर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातही कमी दाबाने व अत्यंत कमी वेळासाठी पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयदेखील पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. शहरासाठी तीन पाणीपुरवठा योजना असतांनाही नियोजनाचा अभाव असल्यामुळे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

पाडव्याचा मुहूर्त हुकला

गुढीपाडव्यापासून खासगी कंपनीच्या मदतीने त्र्यंबक नगरपालिकेने वाहनतळासह शहरात विविध ठिकाणी शुद्ध व थंड पाणी अल्पदरात पुरविण्याचे ठरविले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याला मुहूर्त लागलेला नाही.

पाण्यासाठी रान मांजराने गमावला जीव

निफाड : तीव्र कडक उन्हाळा असल्याने पाण्याची तहान भागविण्यासाठी माणसे हैराण झाले असतांनाच शोधार्थ लासलगावच्या लक्षी ऑइल मिलमधील टाकीत अडकून पडलेल्या दुर्मिळ जातीच्या दोन उदमांजरांना वाचविण्यात लासलगाव येथील तरुणांना यश आले आहे. तीनपैकी एक उदमांजर मृतावस्थेत आढळले. ही तीन उदमांजरे पाणी पिण्यासाठी पाच दिवसांपूर्वीच टाकीत उतरली असल्याचा अंदाज आहे. पाणी न मिळाल्याने व परत वर येता न आल्याने यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना लासलगाव येथील लक्ष्मी ऑइल मिलमध्ये झाली. दोन रान मांजरांना वाचविण्यात यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड शहराची तहान भागविण्यासाठी ओझरखेड धरण ते चांदवड शहरापर्यंत ४८ कि.मी. लांबीच्या स्वतंत्र पाइपलाइन व फिल्टर प्लांटसाठी ६४.०५ कोटी इतका निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती चांदवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी दिली.

चांदवड शहर व इतर गावांसाठी १९७२ मध्ये माजी आमदार जयचंदजी कासलीवाल यांनी ४४ खेडी पाणीपुरवठा योजना आणल्याने पाण्याची समस्या सुटली होती. परंतु, नंतरच्या काळात वाढती लोकसंख्या व दुष्काळामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला होता. मात्र आता राज्य शासनाच्या भरघोस निधीमुळे नवी पाणीयोजना कार्यान्वित होऊन चांदवडकरांची तहान भागेल, असे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी सांगितले. या योजनेत शहरात दरडोई १३५ लिटर्स प्रतिदिनप्रमाणे शुद्ध व मुबलक पाणी देण्याचा मानस असून, सदर पाणीपुरवठा २४ X ७ याप्रमाणे करण्यात येणार आहे. सदर योजना १५ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. लवकरच शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. तसेच चंद्रेश्वर महादेव मंदिर, रेणुका देवी मंदिर, गणेश मंदिर यांनाही सदर योजनेचा लाभ होणार आहे, असे नगराध्यक्ष कासलीवाल यांनी सांगितले.

अशी आहे स्वतंत्र पाणीयोजना

शहरांतर्गत वॉर्डनिहाय घरगुती तसेच शैक्षणिक संस्थांची, व्यावसायिक, इत्यादी सर्व पाण्याच्या मागणीची नोंद घेण्यात आली. शासनाच्या धोरणानुसार शहराच्या पुढील ३० वर्षांच्या मागणीचे नियोजन करण्यात आले आहे. नियोजित प्रकल्पांतर्गत शहराचे पाणी वितरणाच्या दृष्टीने आठ प्रभाग करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र जलकुंभ प्रस्तावित करण्यात आले आहेत. शहराची साठवण क्षमता वाढून २९, १०,००० लिटर इतकी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिबिराद्वारे पहिले ‌किडनी प्रत्यारोपण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विनामूल्य महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून किडनी प्रत्यारोपण करण्याची पहिलीच शस्त्रक्रिया नाशिक येथे हृषिकेश हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. नाशिक येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच शिबिरातील दीपक नाना बेलदार या रुग्णास किडनी विकार असल्याचे शिबिरादरम्यान आढळून आले. त्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. किडनीच्या या रुग्णास वडील नाना वना बेलदार यांनी आपली एक किडनी या रुग्णास दान करुन आपल्या मुलास पुनर्जन्म प्राप्त करुन दिला. ही शस्त्रक्रिया डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. नंदन विळेकर, डॉ. प्रतिक्षीत महाजन, डॉ. प्रणव छाजेड, डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. अनिरुध्द ढोकरे, डॉ.शाम पगार, डॉ. अनिरुध्द चिमोटे, डॉ. योगेश पाटेकर आदींनी यशस्वीपणे पार पाडली.

गरजू रुग्णाला अशा विनामूल्य महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नवजीवन मिळाल्यामुळे हॉस्पीटल परिसरातील कर्मचाऱ्यांनीदेखील आनंद व्यक्त केला. या शस्त्रक्रियेमध्ये शासकीय मान्यतेसाठी अवयवदान चळवळीचे प्रादेशिक प्रत्यारोपण समितीचे समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी समन्वय केला. बेलदार यांना वर्षभरासाठी लागणारा औषधोपचाराचा खर्च मोफत उपलब्ध केला जाणार असल्याचे रुग्णालयामार्फत सांगण्यात आले.
ऋषिकेश हॉस्प‌िटलने कमीतकमी खर्चात ही शस्त्रक्रिया सामाजिक जबाबदारीच्या भावनेने पार पाडली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सदर रुग्णाला केलेल्या मदतीबद्दल बेलदार परिवाराने समाधान व्यक्त केले. रामेश्वर नाईक आणि संदीप जाधव यांचे या शस्त्रक्रियेसाठी मोलाचे सहकर्य लाभले.

अर्ध्या किमतीत शस्त्रक्रिया

महाशिबिराच्या माध्यमातून बेलदार यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. परंतु, सदर रुग्णाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. भाऊसाहेब मोरे यांना सुचविले. त्यामुळे डॉ. मोरे यांनीही सदर शस्त्रक्रिया निम्म्या दरात करण्याचे कबूल केले. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले. तसेच सिध्दीविनायक चॅरीटेबल ट्रस्ट तसेच अन्य सामाजिक संस्थांकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षकाच्या निलंबनासाठी ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील रौंझाने येथे राजकीय वैमनस्यातून दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला होता. यात जखमी झालेले निंबा भामरे यांचा शनिवारी उपचारादरम्यान नाशिक येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी हाणामारीप्रकरणी गुन्ह्यांची नोंद करताना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर यांचे निलंबन करण्याची मागणी करीत रविवारी येथील तालुका पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले.

रौंझाने ग्रामपंचायतीत सरपंचपदावरील अविश्वास ठरावाच्या कारणावरून योगेश रमेश भामरे व पोपट विठ्ठल जाधव यांच्या परस्परविरोधी गटात हाणामारी झाली होती. ानंतर दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तसेच, ११ संशयितांना अटक केली होती. या हाणामारीच्या प्रकारात निंबा भामरे यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक बडगुजर यांनी तत्काळ खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल न करता संशयितांना अभय देण्याचा प्रयत्न व हलगर्जीपणाचा आरोप करीत त्यांच्या निलंबानाची मागणी केली. रविवारी तालुका पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. बडगुजर यांना निलंबित करीत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कारही करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस उपअधीक्षक अशोक नखाते यांनी बडगुजर यांची शनिवारी रात्रीच बदली करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाभिमुख बापूंची ‘नसती उठाठेव’!

$
0
0

दरवेळी कुणी ना कुणी यायचे आणि बापूंना म्हणायचे, काय हा माणूस नसती उठाठेव करतोय. याच नसत्या उठाठेवीचे आता शहरातील एका मोठ्या संस्थेत रुपांतर झाले असून, या संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या संस्थेचे खरे सूत्रधार आहेत ते प्रमोद कोतवाल, ज्यांना लोक आदराने बापू म्हणतात. आज वयाच्या ६३ व्या वर्षातदेखील त्यांची सामाजिक कार्याची धडपड तरुणांना लाजवणारी आहे.

बापू कोतवाल यांचा जन्म नंदुरबार येथे झाला. त्यांचे वडील पोस्टमन असल्याने अत्यंत तुटपुंज्या पगारात त्यांना पत्नी आणि ९ मुलांचा गाडा ओढावा लागायचा. वडील १९६२ साली सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना ४० रुपये पेन्शन मिळू लागली. या ४० रुपयांतील ३० रुपये घरभाडे जात असे अाणि उरलेल्या १० रुपयांत ९ भावंडे आणि आई-वडील यांचा खर्च भागवावा लागायचा. आपल्या वडिलांची होणारी अशी ओढाताण पाहून बापूंना स्वस्थ बसवले नाही. एका नगरसेवकाला निवडणुकीत मदत केल्याने त्याने बापूंना एक पायजमा, एक सदरा व पाणपोईवर पाणी वाटण्याचे काम दिले. या कामातून बापूंना दिवसाला तीन रुपये मिळू लागले. त्यामुळे कुटुंबाच्या खर्चाला हातभार लागत असे. याचदरम्यान तहानलेल्या व्यक्तींची तृष्णा भागत असल्याचे समाधान पाहताना बापूंचे मन हेलावून जायचे. या कामातील त्यांची तत्परता पाहून रोटरी क्लबनेही त्यांना काम करण्याची संधी दिली. यावेळी समाजातील दुःख जवळून पाहता आले. त्यामुळे आयुष्यात जेव्हा जेव्हा काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा तेव्हा बापूंनी आपल्या कमाईतील काही हिस्सा समाजासाठी राखून ठेवला. नंदुरबार येथून बी. कॉम.ची पदवी मिळवल्यानंतर बापू नाशिकच्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत स्टोअरकीपर म्हणून कामाला लागले. येथे काम करीत असताना ज्या ठिकाणी ते राहतात त्या भागातील गंगापूररोडवर असलेल्या पुरातन मारुती मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ ज्ञानयज्ञ व्हावा म्हणून सन २००२ पासून रामनवमी ते चैत्र पौर्णिमा यादरम्यान प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन केले. त्यात विश्वास साक्रीकर, प. वि. वर्तक, डॉ. यशवंत पाठक, प्रवीण दवणे, सच्चिदानंद शेवडे, हभप मिलिंदबुवा बडवे आदी अनेक नामवंत वक्त्यांनी हजेरी लावली आहे. यंदा त्यांच्या व्याख्यानमालेचे सोळावे वर्ष आहे. व्याख्यानमालेचे विषय निवडतानाही अाध्यात्मिक विषयांबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन असावा, हा त्यांचा आग्रह असतो. १६ वर्षांत या व्याख्यानमालेचा दर्जेदार श्रोतृवर्ग तयार झाला आहे. बापूंचे लहानपण गरिबीत गेल्याने त्यांना अनेक वेळा उपाशीपोटी झोपावे लागायचे. आपल्यासारखे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी बापूंनी पितरांचा महोत्सव ही कल्पना अंमलात आणली. पितृपक्षात लोक पितरांना जेवण म्हणून चार लोकांना घरी जेवायला बोलवतात. जेवायला येणारे पण काही आनंदाने येत नाहीत. आढेवेढे घेऊनच येत असतात. यातून बापूंनी समाजाला विनंती केली, कि पितरांचे जेवण घाला, पण त्याच वेळी समाजात जे एका घासाची वाट पाहत आहेत, अशा गरजू व गरीब लोकांना एक घास द्या. एक मूठ धान्य द्या. त्यांच्या पोटात अन्न गेले, तर ते खरोखर तृप्त होतील, या ध्यासाने त्यांनी धान्याचे संकलन सुरू केले. जमा झालेले धान्य अनाथाश्रम, वृद्धाश्रम, वेदाध्यायन करणारे विद्यार्थी, मूकबधिर अादींच्या संस्थांना दिले जाते. यंदाचे हे आठवे वर्ष आहे. या माध्यमातून दर सर्वपित्री अमावास्येला शंभर क्विंटलच्या वर धान्य व लाखो रुपये न जमा होतात. बापू म्हणतात, हे कार्य माझे एकट्याचे नाही. या कामासाठी परिसरातील प्रशांत काटकर, सुनील आहिरे, प्रवीण काळे, सचिन आहिरे, दिलीप कुलकर्णी,

सुनील पोफळे, रवींद्र जोशी, अनंत मोहाडीकर, विजय काटकर, अरुण कुलकर्णी, राजेश खाउसकर, राजा सूर्यवंशी, विठ्ठल सावंत आणि इतर अगणित व्यक्तींचे सहकार्य मिळत असते. त्यामुळेच ‘हा नसती उठाठेव’चा डोलारा उभा आहे. या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य चिकित्सा शिबिर, दिवाळी पहाट, विद्यार्थी दत्तक योजना अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. ज्या गरजूला मदत मिळते, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सर्व पुरस्कार मिळाल्याची भावना मनात येते.



नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक.

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५.

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गालगतचे रस्ते ‘सामसूम’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
सुप्रीम कोर्टाने महामार्गालगतची दारू विक्री करणारी हॉटेल्स व दुकाने बंद केल्याने काल पहिल्याच दिवशी मुंबई नाका ते पाथर्डी फाट्यापर्यंतचा रस्ता सामसूम दिसत होता. विशेष म्हणजे या बंदीमुळे हॉटेलांमध्ये तर शांतता होतीच, पण वाहनेसुद्धा सुरळीत सुरू होती. समांतर रस्त्यालगत असणाऱ्या सर्वच हॉटेल्सच्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी केली जात होती. या निर्णयामुळे इंदिरानगरसह सिडकोतील रहिवाशांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

महामार्गापासून पाचशे मीटरपर्यंत दारू विक्री करता येणार नसल्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यामुळे मुंबईनाका ते पाथर्डी फाट्यापर्यंतची हॉटेल्स पहिल्याच दिवशी या नियमांचे पालन केल्याने ओस पडलेले होते. सिडको आणि इंदिरानगरवासियांना या हॉटेल किंवा दारू विक्री करणाऱ्या दुकानांचा फारच त्रास होता. मुंबई नाका ते पाथर्डी फाट्यापर्यंत दोन्ही बाजूला सुमारे वीस ते पंचवीस मद्यविक्रीची हॉटेल्स व दुकाने आहेत. काल पहिल्याच दिवशी ही दुकाने बंद असल्याचे दिसून आले. हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेल्स उघडी ठेवली असली तरी त्याठिकाणी मद्यविक्री बंद ठेवण्यात आली हेाती. या निर्णयामुळे कोणत्याही हॉटेल्सच्या बाहेर वाहने उभी नसल्याने समांतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे दिसत होते. या निर्णयामुळे सिडको व इंदिरानगरमधील नागरिकांना समाधान व्यक्‍त केले असून या निर्णयामुळे रात्री-अपरात्री समांतर रस्त्यावरून वाहतूक करणे या हॉटेल्सच्या वाहनतळांमुळे जिक‌िरीचे होत होते. आता मात्र या नियमामुळे समांतर रस्त्यावरून प्रवास करणे सोयीचे होणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्‍त केले आहे.

अवैध मद्य‌विक्रीचे काय?
महामार्गापासून पाचशे मीटरवर असलेल्या हॉटेल्सवरील दारू विक्री शासनाने बंद केली असली तरी अवैधरित्या महामार्गालगत सुरू असलेल्या दारू विक्री, तसेच दारू पिण्याची साये असलेल्या ढाब्यांबाबत अथवा हॉटेल्सबाबत काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबड व इंदिरानगर पोल‌िस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अशाप्रकारे अवैधरित्या मद्यपान किंवा मद्यविक्री सर्रासपणे सुरू असल्याच्या तक्रारी होत असतात. आता मात्र ही अवैध विक्रीवर पोल‌िस काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना रोख पेमेंट!

$
0
0

येवला बाजार समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक व व्यापारी यांच्यात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत यापुढे बाजार समितीत शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख स्वरुपात शेतमालाचे पेमेंट दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची अर्थकोंडीतून सुटका होणार आहे.

बाजार समितीत विक्री केलेल्या शेतमालापोटी हाती पडलेले धनादेश बँकात वटण्यास लागणारा मोठा विलंब होता. यामुळे सभापती उषाताई शिंदे व त्यांच्या सहकारी संचालकांनी बाजार समितीमधील व्यापारी वर्गाशी समन्वय साधत शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्याचा दिलासादायक निर्णय घेतला आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलन तुटवडा निर्माण झाला होता. रोख चलन नसल्याने बाजार समितीमधील खरेदीदार व्यापारी गतवर्षीच्या १० नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांना शेतीमालाचे पेमेंट हे चेकने अदा करीत होते. मात्र, बँकांमध्ये हे चेक वटण्यास विलंब होत असल्याने शेतीमालाचे पैसे शेतकऱ्यांच्या हाती लवकर मिळत नव्हते. यामुळे शेतकऱ्यांची अर्थकोंडी होत होती. यादृष्टीने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य आवार बाजार व अंदरसूल उपबाजार येथील परवानेधारक खरेदीदार व्यापारी, बाजार समितीच्या सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांची संयुक्त बैठक बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट करण्याच्या निर्णयास सर्व खरेदीदार व्यापाऱ्यांनी संमती देताना त्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सभापती उषाताई शिंदे यांनी दिली.

येवला बाजार समितीत विक्री केलेल्या शेतमालाचे पेमेंट हे आता चेकने नव्हे, तर रोखीने दिले जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल. सोमवारपासून (दि.३) येवला मुख्य आवारातील लिलाव सुरू होत असून, अंदरसूल उपबाजार येथील लिलाव येत्या शुक्रवारपासून (दि.७) सुरू होणार आहेत.

- उषाताई शिंदे, सभापती, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तांत्रिक अडचणींमुळे प्लॅटफॉर्म वाया

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अनेक वर्षांच्या मागणीनंतर कुंभमेळ्यापूर्वी नाशिकरोड रेल्वेस्टेशनमध्ये चौथा प्लॅटफॉर्म बांधण्यात आला. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे त्याचा वापरच होत नसल्यामुळे ही गुंतवणूक वाया गेल्याचे चित्र आहे.

चौथ्या फ्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा असतानाही त्याचा वापरच केला जात नाही. त्यामुळे तो गरीब, भटक्या लोकांचे आश्रयस्थान झाला आहे. येथे रात्री मद्यपी बसतात. अन्य गैरप्रकारही सुरू असतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. नाशिकरोड रेल्वेस्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील वाहने आणि प्रवाशांची गर्दी कमी व्हावी आणि सिन्नरफाटा भागातून प्रवाशांना प्रवेश मिळावा, हा चौथ्या फ्लॅटफॉर्मचा खरा उद्देश होता. तथाप‌ि, नागरिक सिन्नरफाटा लांब पडतो म्हणून त्या प्रवेशव्दारातून येतच नाहीत. त्यामुळे तेथील तिकीटविक्री केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. चौथ्या फ्लॅटफार्मवर सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर नसल्याने तसेच पथदीपही बंद असल्याने रेल्वे स्थानकाला धोका निर्माण होऊ शकतो.

या आहेत अडचणी
रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, चौथा फ्लॅटफॉर्म सर्वात जास्त लांब म्हणजे ६२० मीटरचा आहे. चौथ्या फ्लॅटफॉर्मवर गाड्या नेण्यात कमी जागेमुळे अडचणी येते. लूपलाइनमधून गाडी नेताना जास्त वेळ जातो. या टर्न आऊटसाठी (एका रुळावरुन दुसऱ्या रुळावर गाडी नेणे) सुमारे आठ मिन‌िटे लागतात. रेल्वेने घालून दिलेले वेळ व सुरक्षेचे निकष पाळणे अवघड जाते. सिन्नरफाट्यावरील जुना पूल म्हणजेच रोड ओव्हर ब्रीज (आरओबी) ही दुसरी महत्वाची अडचण आहे. येथे गाडी ताशी ५० किमीपेक्षा जास्त वेगाने नेता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडे ठरताहेत अपघातास कारण

$
0
0


राजन जोशी, इंदिरानगर

वडाळा नाका ते पाथर्डी गावापर्यंतचा थेट रस्ता सुमारे पंधरा वर्षांपूर्वी बनविण्यात आलेला आहे. चौपदरी असलेला हा रस्ता वाहतुकीस योग्य असला, तरी या रस्त्यात येणाऱ्या काही झाडांमुळे अनेक अपघात झाले आहेत. वडाळा नाका ते पाथर्डी या नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या मधोमध असलेली झाडे अपघातांना निमंत्रण देत असून, काही झाडांच्या भोवती धार्मिक स्थळे निर्माण झाल्याने समस्येत आणखी भर पडल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांत शहराचा विकास झपाट्याने होतानाच ते चारही बाजूंनी विस्तारत आहे. त्यामुळे अनेक प्रमुख भागांप्रमाणेच इंदिरानगर परिसराकडेदेखील अनेकांचा वाढता कल असल्याने या भागाचा विकास जोमाने होताना दिसत आहे. नासर्डी ते पाथर्डी असे संबोधल्या जाणाऱ्या या भागात नागरी वस्ती वाढण्याबरोबरच अनेक मूलभूत सुविधाही बऱ्यापैकी मिळताना दिसत आहेत. मात्र, परिसरातील प्रमुख मार्गावर भररस्त्यातील झाडांमुळे अपघातांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पथदीपांनाही अडथळा

नागजी चौकापासून निघाल्यावर हाकेच्याच अंतरावर रस्त्याच्या मधोमध एक झाड असून, या ठिकाणी धार्मिक स्थळ उभारण्यात आले आहे. हे झाड अनेक वर्षांपासून असल्याने या झाडाची व्याप्तीही मोठीच आहे. त्यामुळे या ठिकाणी लावलेले पथदीप झाडात लपलेले दिसतात. त्यामुळे बऱ्याचदा या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य दिसून येते. त्याचबरोबर हे झाड भररस्त्यात असल्याने या झाडासंदर्भात ठोस उपाययोजना होणे आवश्यक बनले आहे.

झाडाभोवतीच वाहनतळ!

याच रस्त्यावर केंब्रिज शाळेच्या प्रवेशद्वारावरच अनेक वर्षांपासून असलेल्या झाडामुळे वाहतुकीस तर अडथळा होतोच, मात्र या झाडाचा फायदा घेऊन या ठिकाणी शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळी अक्षरशः वाहनतळच होत असतो. त्यामुळे या रस्त्यावरून ही शाळा सुटताना किंवा सुरू होताना वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हे झाड हटविण्यासाठी आजपर्यंत अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र, त्यावर कोणताही उपयोग न झाल्याने अखेरीस नागरिकांनी हे झाड हटत नसले, तरी या झाडामुळे वाहनतळ, तर उपलब्ध झाला, असा तर्क काढून महापालिका काढेल तेव्हाच बघू, अशी भूमिका घेतली आहे.

वेगामुळे अपघातांत वाढ

शहराच्या विकासात भर टाकणारे अनेक बांधकाम प्रकल्प सध्या पाथर्डी परिसरात होत असून ,या अत्याधुनिक प्रकल्पांच्या जवळच व गुरू गोविंद सिंग कॉलेजच्या शेजारी अशाच पद्धतीने रस्त्याच्या मधोमध झाडे दिसून येतात. ही झाडे खरोखरच जीवघेणी ठरत आहेत. वडाळा-पाथर्डीरोडवर रथचक्र चौकापासून वाहतूक बऱ्यापैकी तुरळक असल्याने या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जात असतात. मात्र, रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांमुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले आहेत.

धार्मिक स्वरुपाने वाढला तिढा

नव्या पद्धतीनुसार वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची पद्धत वापरण्यात येत असतानासुद्धा ही धोकादायक झाडे अद्याप या ठिकाणाहून का हलविली जात नाहीत, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. रस्ते मोठे झाले, परंतु त्यामध्ये असलेली अशी झाडे सध्याची डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या झाडांच्या परिसरात किंवा खोडाजवळ अनेक वेळा विविध धार्मिक देवदेवतांचे फोटो व मूर्ती ठेवल्या जात असल्याचे दिसून येते. अनेक वेळा परिसरातील नागरिक या मूर्ती किंवा फोटो उचलून त्यांचे विसर्जन करीत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी झाडांच्या मुळांजवळ मूर्ती किंवा फोटो ठेवण्याचे प्रकार या परिसरात सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे.

अलीकडे झालेले अपघात

वडाळा-पाथर्डीरोडवर असलेल्या नागजी चौकाजवळच्या झाडांमुळे अलीकडे तीन ते चार अपघात झाले आहेत. मात्र, केंब्रिज शाळा व गुरू गोविंद सिंग कॉलेजजवळ असलेल्या झाडांच्या लगत असलेल्या रस्त्याचे मागील वर्षीच रुंदीकरण झाल्याने या ठिकाणी अद्याप मोठा अपघात झालेला नसला, तरी किरकोळ अपघातांत मात्र वाढ झाल्याची स्थिती आहे. येथील झाडांबाबत लवकर निर्णय न झाल्यास जीवघेणे अपघात घडण्याची भीती वर्तविली जात आहे.


सुकलेली झाडे धोकादायक

इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डीरोडवर रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांपैकी काही झाडे अक्षरशः सुकून गेलेली आहेत. ही झाडे ना सावली देतात ना त्यांचा काही उपयोग होत आहे. मग, ही झाडे काढूनच का टाकली जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. वडाळा-पाथर्डीरोड हा पूर्वीपासूनच शेतीचा भाग असल्याने या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध किंवा वाहतुकीस अडथळा येणारी अनेक झाडे आहेत. बऱ्याचशा झाडांवर महापालिकेने पिवळ्या रंगाचे रेडियम लावले असले, तरी त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. वृक्ष काढूनच टाकण्यापेक्षा त्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याचा विचार प्रशासनाने करावा, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.


रस्त्यातील झाडांचे स्थलांतर करण्याची महापालिकेची अडीच वर्षांपूर्वीची घोषणा हवेतच विरली आहे. ही झाडे शिफ्ट करावीत किंवा तोडून तरी टाकावीत. एक झाड वाचविण्यासाठी महापालिका अनेक जिवांशी खेळताना दिसते. झाडे स्थलांतरीत करायची असतील तर आम्ही स्वखर्चाने ते काम करण्यास तयार आहोत.

-नीलेश साळुंके, सामाजिक कार्यकर्ता


रस्त्यांच्या मधोमध असलेली झाडे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करून कोणताही उपयोग होत नाही. महापालिकेने ही झाडे काढून या परिसरातील मोकळ्या जागेवर नव्याने वृक्षारोपण करावे. जुनी झाडे काढली, तरी नवीन झाडांचे रोपण होणेही आवश्यक आहे.

-हर्षद गोखले, शिवसेना ग्राहक मंच


जी झाडे खरोखर रस्त्यावर येतात त्यांना सेफ्टी रेडियम प्लेट्स् लावाव्यात व पुढे अडथळा आहे, असे फलक लावावेत. जेणेकरून अशा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सावधनतेचा इशारा मिळेल. त्याचबरोबर माणसाचे आयुष्य लक्षात घेऊन अगदीच धोकादायक झाडे असतील, तर ती काढावीत.

-अशोक धर्माधिकारी, निर्सगमित्र संस्था


झाडांचे पुनर्रोपण होऊ शकते, पण मनुष्याला पुनर्जीवन मिळू शकत नाही. धोकादायक झाडे रस्त्यातून काढलीच पाहिजेत. प्रशासन त्यावर रिफ्लेक्‍टर बसवित असले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. काही ठिकाणी अशी झाडे अर्धवट तोडल्याने अजूनच त्रास होत आहे. ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे.

-वैभव देवरे, सामाजिक कार्यकर्ता


वडाळा-पाथर्डीरोडप्रमाणेच राणेनगर रस्त्यावरसुद्धा वाहतुकीस अडथळा ठरणारे झाड आहे. या सर्वच झाडांचे पुनर्रोपण करणे गरजेचे आहे. ज्या झाडांमुळे अपघात होत असतील किंवा जीव गमवावे लागत असतील अशीच झाडे काढली पाहिजेत. काढलेल्या झाडाच्या परिसरात नव्याने वृक्षारोपण केले जावे.

-सतीश सोनवणे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’साठी विक्रमी मतदान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वादाची परिसिमा गाठलेल्या आणि अनेकांच्या राजकारणाने लडबडलेल्या यंदाच्या ‘सावाना’ निवडणुकीत तब्बल ५५.७५ टक्के विक्रमी मतदान झाले. १८ जागांसाठी ४५ जण‌ रिंगणात होते. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर हॉलमध्ये आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्र्रारंभ होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

गेल्या पंचवार्षिकसाठी ४० टक्के मतदान झाले होते. तर त्याआधीच्या पंचवार्षिकसाठी ४३ टक्के मतदान झाले होते. यावेळी किरकोळ वाद वगळता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. सावानाचे स्मार्ट कार्ड ओळखपत्र म्हणून गृहित धरण्यात येणार नाही, असे आधीच जाहीर केलेले असताना अनेकांनी ते कार्ड दाखविल्याने प्रारंभी त्यांना मतदान करण्यास नाकारण्यात आले होते. मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आजीव मतदान १११६, तर सर्वसाधारण मतदान ८७९ इतके झाले. एकूण ३५८० मतदार होते. १८ जागांसाठी ४५ जण‌ रिंगणात होते. आजीवसाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. त्यातुलनेने सर्वसाधारण मतदान कमी झाले.

दुपारपर्यंत निकाल लागणार!

मतदानानंतर आज, सोमवारी (३ एप्रिल) मतमोजणी होणार आहे. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर हॉलमध्ये सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्र्रारंभ होणार आहे. त्यासाठी ४० कर्मचारी तैनात ठेवण्यात आले असून, ७ ते १० टेबल मांडण्यात आले आहेत. प्रारंभी अवैध मते बाजूला काढले जातील. त्यानंतर २५-२५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार केले जातील. प्रथम कार्यकारी मंडळ सदस्य, नंतर उपाध्यक्ष व त्यानंतर अध्यक्ष या क्रमाने मतमोजणी केली जाईल. मतदानाप्रमाणेच मतमोजणीलाही पोल‌िस बंदोबस्त तैनात राहणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.

अतिशय शांततेत आणि उत्साहात मतदान झाले. साहित्याला शोभेसे वातावरण होते. वाढलेल्या मतदानाचा सर्वांनाच फायदा होणार आहे. मतदारराजाने जे दिले आहे ते दिसणारच आहे. मतदान ६० टक्के होईल असा अंदाज होता. - प्रा. विलास औरंगाबादकर, अध्यक्षपदाचे उमेदवार

सार्वजनिक वाचनालय हा नाशिकचा मानबिंदू आहे. आजपर्यंत कधीही इतके मतदान झालेले नाही. या जास्त झालेल्या मतदानामुळे १०० टक्के परिवर्तनाची लाट येणार आहे. आम्ही अतिशय वेगवेगळे उपक्रमही केलेले आहेत. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे.

- अरुण नेवासकर, उपाध्यक्षपदाचे उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चॉइस नंबर आरटीओला ‘लकी’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन वाहन हातात पडण्यापूर्वीच हौशी वाहनमालक चॉइस क्रमांकाच्या मागे लागतात. मनाप्रमाणे क्रमांक मिळावा यासाठी वाहनमालक कितीही पैसा खर्च करू शकतात. इभ्रत, अंकशास्त्र, जन्म तारीख, जुन्या वाहनाचा लकी नंबर अशा एक ना अनेक कारणांमुळे चॉइस क्रमांक घेण्यासाठी झुंबड उडते. प्रादेश‌िक परिवहन विभागाच्या (आरटीओ) तिजोरीत यामुळे मागील चार वर्षात तब्बल १६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात आरटीओला पाच कोटी रुपयांचे उत्पन्न यातून मिळाले.

लकी नंबर, अंकशास्त्र, इभ्रतीचा प्रश्न, जन्म तारीख, जुन्या वाहनांचा क्रमांक पुन्हा मिळावा म्हणून किंवा इतरांपेक्षा वेगळेपणा अशा कारणांमुळे पसंती क्रमांकांना वाढती मागणी आहे. अलिशान चारचाकी वाहनधारकांसह दुचाकी मालक देखील पसंती क्रमांकाकडे लक्ष ठेऊन असतात. चॉईस नंबरसाठी वाहनचालकांमध्ये चालणारी रेस आरटीओच्या महसूल वाढीला वर्षागणीक हातभार लावत आहे.

‘१’ हा क्रमांक तर चार लाख रुपयांना उपलब्ध होतो. १११ आणि ११११ हे दोन क्रमांकदेखील काही लाख रुपयांचा महसूल मिळवून देतात. तेच १००० आणि ९००९ हे क्रमांक ५० हजार रुपयांपर्यंत वाहनचालकाला मिळू शकतात. याव्यतिरिक्त आणखी काही क्रमांकांना वाहनचालकांकडून विशेष पसंती दिली जाते. यात १००८, ९९९७ तसेच ७००० या क्रमांकाचा समावेश होतो. प्रत्येक नवीन सिरीजमध्ये ‘युनिक’ म्हणून गणले जाणारे क्रमांक उपलब्ध असतात. रीतसर शुल्क भरून वाहनचालक हे क्रमांक घेऊ शकतात. आता तर ही सुविधा ऑनलाइनदेखील उपलब्ध आहे. पाच हजार रुपयांपासून ७० हजार रुपयांपर्यंत हे क्रमांक उपलब्ध आहेत. मात्र, जेव्हा एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्जदार समोर येतात, तेव्हा या क्रमाकांचा लिलाव केला जातो. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत वाहन विक्रीत फक्त १.९३ टक्के वाढ झाली होती. याउलट, चॉइस नंबरच्या विक्रीद्वारे तीन कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल आरटीओला मिळाला होता. पसंती क्रमांक घेणाऱ्यांच्या प्रमाणात तब्बल १७ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. २०१३-१४ या आर्थिक वर्षात चॉइस नंबरद्वारे तीन कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न आरटीओच्या हातात पडले होते.

वाहन विक्रीत मात्र घट

२०१६-१७ या आर्थिक वर्षात वाहन विक्रीमध्ये जवळपास सात टक्के घट झाली. साधारणतः एक लाख दोन हजारांच्या आसपास वाहनांची नोंदणी झाली. तेच २०१५-१६ या वर्षात एकूण एक लाख नऊ हजार ८०२ वाहनांची विक्री झाली होती. २०१६-१७ या वर्षात चॉइस क्रमांकाच्या माध्यमातून पाच कोटी पाच लाख ५९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर २०१५-१६ या वर्षात हेच उत्पन्न चार कोटी आठ लाख ५७ हजार इतके होते. म्हणजे गत आर्थिक वर्षात वाहन विक्रीत घट नोंदवली गेलेली असताना महसुलात मात्र एक कोटी रुपयांची भर पडलेली दिसते.

वर्ष- उत्पन्न

२०१३-१४ - ३ कोटी १८ लाख

२०१४-१५ - ३ कोटी ७४ लाख

२०१५-१६ - ४ कोटी ०८ लाख

२०१६-१७ - ५ कोटी ०५ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदपत्रे मागताच ‘त्याने’ रिक्षावर ओतले पेट्रोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फ्रंट सीट वाहतूक रोखून पोलिसांनी कागदपत्रांची मागणी करताच रिक्षाचालकाने रिक्षावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याबाबत सरकारवाडा पोलिसांनी रिझवान कादिर शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे. ढाकणे शनिवारी (दि.१ मार्च) रोजी जुने सीबीएस सिग्नल येथे वाहतूक नियमाचे कर्तव्य बजावत होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्वारबाबानगर परिसरातील जगतापवाडी येथे राहणारा रिझवान कादिर शेख (३७) हा रिक्षाचालक फ्रंट सीट प्रवाशी घेऊन जाताना ढाकणे यांना दिसला. त्यांनी शेखची रिक्षा (एमएच १५, ई. एच. ३३६१) थांबवली. मात्र, फ्रंटसीट वाहतूक करणाऱ्या शेखने थेट ढाकणे यांच्याशी वाद सुरू केला. माझ्या दोन रिक्षा पूर्वीच जमा असून, मी मानसिक त्रास सहन करीत असल्याचे सांगत त्याने पुढील कारवाई करण्यास ढाकणे यांना रोखले. मात्र, ढाकणे यांनी कायदेशीर कारवाई करावीच लागेल, असे स्पष्ट करताच शेखने रिक्षात बसवलेले सर्व प्रवाशी खाली उतरवून दिले. तसेच, रिक्षाच्या मागील बाजुस पेट्रोलने भरलेली बॉटल काढून ती स्वतःच्या रिक्षावर ओतली. सुदैवाने त्याच्याकडे काडीपेटी नव्हती. मात्र, आता रिक्षाच पेटवतो असे म्हणत तो आजुबाजूला काडीपेटी शोधू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला रोखले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वृक्षतोडीबाबत याचिका दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुप्रीम कोर्टाने नाशिक महापालिकेला दिलेल्या आदेशाचा गैरवापर होत असून, रस्त्यात अडथळा नसलेली झाडेदेखील महापालिकेकडून काढली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. याबाबत सोमवारी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून, त्याबाबत शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती वृक्षप्रेमी मानव उत्थान मंचचे जगबीर सिंग यांनी दिली.

त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर राखतो. जी धोकादायक झाडे आहेत ती जरुर काढावीत. त्याला आमचा विरोध नाही. परंतु, महापालिका सध्या जी झाडे काढत आहे, ती धोकादायक नसून ती ठेकेदारांच्या मर्जीतल्या लोकांची आहेत. अनेक झाडे रस्त्याच्या बाजूला आहेत. त्या झाडांचा कुणालाही त्रास नाही. पुढे काही कालावधीनंतरदेखील ती रस्त्यात येणार नाहीत, अशा झाडांची कत्तल सुरू आहे. जी झाडे तोडायची आहेत त्या झाडांची यादी महापालिकेने प्रसिध्द करावी. त्याबद्दल कुणाच्या हरकती आहेत का, ते विचारात घ्यावे. महापालिका ती यादी प्रसिध्द करीत नसल्याने यात मोठा घोळ होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. वड, पिंपळ यांसारखी झाडेदेखील कापली जात आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्याबद्दल बोलण्यास नकार दिला. न्यायप्रविष्ट बाब असून, आम्ही त्याविषयी बोलणार नाही, असे सांग‌ितले जाते. मात्र, कृती करताना मनमानी सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला जातो आहे. आयुक्तांनी याबाबत स्वतः लक्ष घालून जी झाडे तोडायची आहेत, त्याची यादी प्रसिध्द करावी. त्याबाबत हरकती मागून घ्याव्यात. मगच मोठ्या झाडांना हात लावावा. याबाबत मानव उत्थान मंचच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असून त्यांनीही याबाबत लक्ष घालावे अशी विनंती करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना व वनमंत्र्यांना निवेदने द्यावीत अथवा व्हॉट्सअॅपद्वारे माह‌िती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

आयुक्तांची तातडीने पाहणी

स‌िटी सेटर मॉल येथील दुभाजकाजवळ असलेली झाडे तोडण्यात आल्याची बाब ‘मटा’ने उजेडात आणली. त्याची तत्काळ दखल घेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स‌िटी इंजिनीअर, उद्यान अधीक्षक व अन्य महापालिका अधिकाऱ्यांसमावेत प्रत्यक्ष ठिकाणाला भेट दिली. तेथील परिस्थितीची पाहणी केली. वृक्षतोडीचे प्रकरण संवेदनशील असून, कोणतेही झाड तोडताना दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपाताची कसून चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपात प्रकरणाची सोमवारी राज्यस्तरीय कमिटीने कसून चौकशी केली. हा अहवाल महिला व बालकल्याण विभागाला सादर होणार असून, त्यानंतर या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या गर्भपात केल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला समजल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. २२ मार्च रोजी तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या पथकाने लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तिथे एका २४ आठवड्यांच्या गर्भवतीचा नुकताच गर्भपात करून तिला लागलीच डिस्चार्ज देण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी गर्भपात करणाऱ्या डॉ. वर्षा लहाडे यांनी हा आरोप फेटाळून लावत अतिरक्तस्रावामुळे गर्भपात करावा लागल्याचे स्पष्ट केले. वास्तविक २० आठवड्यांनंतर कोणत्याही स्थितीत गर्भपात करता येणार नाही, असे कायदा सांगतो. त्यातच या प्रकरणात संबंधित महिलेच्या कागदपत्रात काही खाडाखोडदेखील केलेली होती. त्यातच या महिलेस दाखल केल्यानंतर तिच्या कोणत्याही तपासण्या झाल्या नाहीत. गर्भपात झाल्यानंतर काही वेळातच तिला घरी पाठवण्यात आले. घटनेचे गांभीर्य पाहून सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य उपसंचालक आय. आर. घोडके यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. त्यांनी पाच सदस्यीय राज्य समिती नियुक्त केली. त्यात दोन गायनोकोलॉजिस्ट, धुळे येथील सिव्हिल सर्जन, एक रेडिओलॉजिस्ट, तसेच स्वतः आरोग्य उपसंचालक घोडके यांचा समावेश होता. या समितीने सोमवारी दिवसभर या प्रकरणातील आरोप, त्याची कागदपत्रे यांची कसून चौकशी केली. हा अहवाल लागलीच राज्य सरकारला सादर होणार असून, त्यातून सर्व तथ्ये बाहेर येतील. दरम्यान, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर डॉ. वर्षा लहाडे सुटीवर गेल्या आहेत.

कठोर कारवाईची मागणी

आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन या प्रकरणाची सर्व माहिती सिव्हिल सर्जन डॉ. जगदाळे यांच्याकडून समजून घेतली. सरकारी हॉस्पिटलमध्ये अवैध पद्धतीने गर्भपात झाला असल्यास हा प्रकार गंभीर ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी वेतन घेणारे डॉक्टर्स खासगी प्रॅक्टिस करीत असल्यास त्यातून हे प्रकार वाढीस लागतात, असा आरोप फरांदे यांनी केला. दरम्यान, डॉ. लहाडे यांचे मखमलाबाद रोडवर खासगी हॉस्पिटल असून, त्याचा आणि घटनेचा काही संबंध आहे काय हे तपासण्याबाबत आमदार फरांदे यांनी संबंधितांना निर्देश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी शैक्षणिक कक्षाची निर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर संशोधन स्तरावर तंत्रज्ञानाच्या समावेशाने अधिकाधिक सुलभता यावी यासाठी गतवर्षी संकल्पित ऑनलाइन इव्हॅल्यूएशन यंत्रणा विद्यापीठाने नव्या वर्षापासून लागू केली आहे. संशोधनातील ऑनलाइनच्या समावेशासोबतच विद्यापीठातील अधिकाधिक कामे ऑनलाइन पद्धतीने करण्यावरही विद्यापीठाच्या वतीने भर देण्यात येत आहे.

गतवर्षी ३१ एप्रिल २०१६ रोजी ‘मटा’ने ‘रिसर्च थेसिस’चे आता ऑनलाइन इव्हॅल्युएशन या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या विषयाची सद्यस्थिती जाणून घेताना विद्यापीठातील ऑनलाइन यंत्रणा सुरू करण्याचा संकल्प प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले.

ऑनलाइन यंत्रणेचा उपयोग विद्यापीठीय कामकाजात करण्यासंदर्भात यंदाच्या पदवीदान समारंभात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनीही अधिकृत घोषणा केली होती. आता विद्यापीठात सादर होणारे प्रबंध हे ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात येतील नंतरच्या टप्प्यात त्यांचे मूल्यमापनही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठीचे विशिष्ट सॉफ्टवेअरही विद्यापीठाने विकसित केले आहे. संशोधन प्रबंध सादरीकरण व मूल्यमापन प्रक्रियेतील ऑनलाइन यंत्रणेच्या सहभागासोबतच परीक्षा विषयक कामकाजातही हे तंत्र लवकरच वापरले जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजेसकडून इंटर्नल व प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण विद्यापीठाला पाठविण्यात अनेकदा उशीर होत असल्याची बाब विद्यापीठाच्या लक्षात आली. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या निकालाच्या वेळेवर होतो. निकालातील संभाव्य दिरंगाई टाळण्यासाठी आता वायवा, इंटर्नल व प्रॅक्टिकल परीक्षांचे गुणही विद्यापीठ ऑनलाइन पद्धतीने मागविते आहे. त्यासाठीही खास प्रणाली विकसित करण्यता आली आहे.

याशिवाय विद्यार्थी केंद्रीत कामकाजांनाही वेळेत गती मिळावी यासाठी इतर कामेही ऑनलाइन यंत्रणेच्या दृष्टीपथात आणण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकडून होणारी कॉलेज व इंटर्नशीपबाबतची मागणी, इंटर्नशीप सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट आदी सुविधांसाठी शैक्षणिक कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. दूरच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याद्वारे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची हेल्पलाइन सर्व्हिसेसची संकल्पना आहे. या सेवेला विद्यापीठात सुरुवात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या ‘आधार’साठी २७ पर्यंत मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात अजूनही १७ हजार ५५२ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होणे बाकी असून, २७ एप्रिलपर्यंत ही नोंदणी पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे सुटीच्या दिवशीदेखील शाळा आणि महाविद्यालये सुरू ठेऊन आधार नोंदणी करण्यात येणार आहे.

आतापर्यंत किती विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात आले हे जाणून घेण्यासाठी सोमवारी आढावा बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये ही बैठक झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांच्यासह शिक्षण विभागाचे तसेच संबंध‌ित अन्य अधिकारी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांची आधार नोंदणी प्राधान्याने करून घ्या, असे आदेश सरकारने दिले आहेत. विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक शाळेच्या रजिस्टरला नोंद राहणार असल्याने, एकच विद्यार्थी दोन-दोन शाळांत नावे ठेवणार नाही. यातून बोगस विद्यार्थी संख्या उघड होण्यास मदत होणार आहे. आधार कार्डामुळे समाजातील दूर्बल घटकांना महापालिकेच्या विविध योजनांतून मदत होते. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
शालेय विद्यार्थ्यांची कोणतीही शैक्षणिक कामे, परीक्षा, ऑनलाइन अर्ज भरायचे झाल्यास आधार क्रमांक देणे गरजेचे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधार नोंदणी सक्तीची आहे. दहावीचा परीक्षा अर्ज, शिष्यवृत्ती आदींसाठी आधार क्रमांक द्यावा लागत असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप आधार कार्ड नाही त्यांचे पालक व शिक्षकांना शैक्षणिक कामे करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार कार्डची नोंदणी अत्यावश्यक असल्याने विद्यार्थ्यांची आधार कार्ड नसल्यामुळे गैरसोय होते आहे.
या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांची अद्याप आधार नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी १५ मार्च ही मुदत देण्यात आली होत. ही मुदत उलटूनही १७ हजार ५५२ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे बाकी आहे. जिल्ह्यात इयत्ता पह‌िली ते बारावीचे आठ लाख ६५ हजार ६०८ विद्यार्थी असून, त्यापैकी आठ लाख ३२ हजार ७३२ विद्यार्थ्यांची आधार कार्ड काढण्यात आले आहेत. उर्वरीत कार्ड काढण्यासाठी आता २७ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शाळांना सुटी लागण्यापूर्वीच हे काम पूर्ण करावे लागणार असल्याने सुटीच्या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये आधार कार्ड काढले जाणार आहे. त्यासाठी १२५ कीटची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांची भरती करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आर्थिक निकष लागू होत नसल्याचे स्पष्ट करत, महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्याचे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी दिले आहेत. महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्यास त्याची अंमलबजावणी करण्याची शिफारस सफाई आयोग करेल अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली आहे. सोबतच लाड कमिटीच्या अंमलबजावणीविरोधात महापालिकेने महासभेच्या ठरावाच्या आधारे लागू केलेली तीन वर्षांची फिक्स पे पद्धती तत्काळ रद्द करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी सोमवारी महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या सुविधांसदर्भात आढावा घेतला. या वेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त विजय पगार, आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यासह सफाई कर्मचारी संघटनेचे सुरेश दलोड, विजय मारू, अनिल बेगसह कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. या वेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसदर्भात माहिती सादर केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी महापालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांसदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसदर्भात असमाधान व्यक्त केले. पालिकेत लोकसंख्येचा विचार करता, सफाई कर्मचारी कमी असल्याचा दावा पवार यांनी केला. सफाई कर्मचारी भरतीकरिता पालिका आर्थिक स्थितीचा करत असलेला दावा चुकीचा असून, सरकारच्या विविध आदेशाच्या आधारे सफाई कर्मचाऱ्यांची भरती करणे सहज शक्य आहे. महापालिकेने सफाई कर्मचारी भरतीचा प्रस्ताव सरकारला सादर केला तर आयोग भरती करण्यासाठी सरकारला शिफारस करेल, असे त्यांनी या वेळी सांगितले.

लाड कमिटीने वारशांना नोकरीची हमी दिली आहे. महापालिकेत मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसून, महासभेच्या चुकीच्या ठरावाच्या आधारे तीन वर्षांसाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या वारशांना फिक्स पेची नवी पद्धत तयार केली आहे. ही पद्धत अन्यायकारक असून, ती तत्काळ रद्द करावी व सरकारच्या लाड कमिटीच्या शिफारशीनुसार वारशांना सेवेत घ्यावे, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या आईवडिलांनाही पालिकेच्या विमा योजनेत समावेश करण्यास पालिकेने या वेळी संमती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त शिक्षकांचे होणार समायोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. सन २०१६-१७च्या संचमान्यतेनुसार अशा शिक्षकांची यादी तयार करण्यात आली असून अशा शिक्षकांना इतर शाळांमध्ये समायोजित करुन घेण्याची प्रक्रिया बुधवार (५ एप्रिल) पासून सुरू होणार आहे. पारदर्शी प्रक्रिया व्हावी, यासाठी ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जाणार असून ३१ मेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सन २०१६-१७च्या संच मान्यतेनुसार खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे काही शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त होत असल्याची तर काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे शिक्षकांची गरज निर्माण झाल्याचे संचमान्यतेतून दिसून आले. या बाबींचा विचार करून अतिरिक्त शिक्षकांना जागा रिक्त असलेल्या शाळांमध्ये समायोजित करणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार या प्रक्रियेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून ३१ मेपर्यंत ही प्रक्रिया आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या निकषांनुसार शैक्षणिक संस्थांनी पूर्ण करायची आहे.

या वेळापत्रकानुसार शिक्षक संवर्गाची १ जानेवारी रोजीची सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून अतिरिक्त शिक्षक निश्चित करणे, शाळांतर्गत, संस्थांतर्गत समायोजन करणे ही प्रक्रिया ५ ते १० एप्रिलदरम्यान राबविली जाणार आहे. त्यानंतर संस्थेकडील अतिरिक्त शिक्षक, आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदे आदी बाबींसाठी शिक्षणाधिकारी यांची मान्यता, निर्णय, रिक्त जागांची यादी प्रसिद्धी, अतिरिक्त शिक्षकांना लेखी कळविणे आदी बाबी केल्या जाणार आहेत. १६ ते २२ मे दरम्यान अतिरिक्त शिक्षकांना समायोजित शाळेत रुजू होण्यासाठी जुन्या शाळेतून कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया संस्थांमध्ये राबविली जाणार आहे. तर १७ ते ३१ मे दरम्यान अतिरिक्त शिक्षकांना समायोजित शाळेत रुजू करून घेणे, जॉईनिंग फॉर्ममध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाइन नोंद करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल मॅनेजमेंटसाठी १४ मे रोजी सीईटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी-एसएमसीटी) या अभ्यासक्रमाची सीईटी १४ मे रोजी होणार आहे. बारावीनंतर या चार वर्षांच्या पूर्ण वेळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परीक्षेची पद्धती, निकष राज्य सीईटी विभागाने जाहीर केले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून वेगळे क्षेत्र म्हणून हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची मोठी पसंती मिळते आहे. देशात मिळणाऱ्या विविध संधींबरोबरच थेट परदेशातही मोठ्या संधी या क्षेत्रातील व्यक्तींसाठी उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे कल वाढतो आहे. त्याबरोबरच हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे केवळ हॉटेल इथपर्यंतच मर्यादित न राहता ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझमची मोठी जोड या क्षेत्राला मिळाली आहे. या व अशा कारणांमुळे हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला चांगली पसंती आहे. www.dtemaharashtra.gov.in/hmct2017 या वेबसाइटवर विद्यार्थ्यांनी अर्ज भरता येणार आहेत.

अशी आहे परीक्षा पद्धती

ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. एमसीक्यू, वस्तूनिष्ठ पद्धतीने पेपर सोडवायचा असून केवळ इंग्रजी भाषेत प्रश्नपत्रिका असणार आहेत. इंग्रजी भाषा, रिझनिंग आणि जनरल नॉलेज अॅण्ड अवेअरनेस या विषयाचा अभ्यासक्रम सीईटीसाठी असणार आहे. जनरल नॉलेजमध्ये नॅशनल, इंटरनॅशनल अफेअर्स, कल्चर, ट्रेड अॅण्ड कॉमर्स, स्पोर्टस्, वैज्ञानिक शोध, ट्रॅव्हल अॅण्ड टूरिझम यांचा समावेश असणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दीड तासाचा वेळ मिळणार आहे. यामध्ये नकारात्मक गुणपद्धती नसून प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images