Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

१२ आठवड्यानंतरचे गर्भपात सिव्हिलमध्येच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी गर्भपात केंद्रांमध्ये होणाऱ्या गर्भपात प्रकरणात पारदर्शकता आणण्यासाठी आरोग्य उपसंचालक विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सहा ते १२ आठवड्यापर्यंतच्या गर्भपात प्रकरणी संबंधित स्त्रीरोग तज्ज्ञासह तेथील केंद्र प्रमुखावर जबाबदारी सोपवली आहे. तर, १२ ते २० आठवड्यापर्यंतचे गर्भपात अपवाद वगळता संबंधित सिव्हिल हॉस्पिटलमध्येच करण्यात यावेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपातप्रकरण समोर आल्यानंतर सिव्हिल प्रशासनाने विभागप्रमुखांची सद्दी संपवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः १२ ते २० आठवड्यापर्यंतचा गर्भपात करण्यासाठी सिव्हिल प्रशासनाने तब्बल चार डॉक्टरांवर जबाबदारी टाकली. हे डॉक्टर सर्व तपासण्यांचा विचार करूनच गर्भपाताचा निर्णय घेतील. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक लोचन घोडके यांनीदेखील अशा प्रकारचा नियम नाशिक विभागात लागू केल्याचे सांगितले. विभागात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो.

सर्व सरकारी गर्भपात केंद्रामध्ये यापुढे सहा आठवड्यापर्यंतच्या गर्भपाताबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ निर्णय घेऊ शकतील. सहा ते १२ आठवड्यापर्यंतचा गर्भ काढून टाकताना मात्र स्त्रीरोग तज्ज्ञांसह तेथील वैद्यकीय अधीक्षक अथवा प्रमुख नियंत्रकाची मंजुरी आवश्यक असेल. १२ ते २० आठवडे गर्भवती असलेल्या महिलांचा फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्येच गर्भपात केला जाईल.

खासगी हॉस्पिटलमध्ये सातत्याने तपासणी करणे आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या गर्भपातांचा आढावा घेऊन कामकाजातील पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

-डॉ. लोचन घोडके, आरोग्य उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरक्षणाच्या रक्षणासाठी एकजूट हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रस्थापित व्यवस्था सातत्याने मागासवर्गीयांचे आरक्षण धोक्यात आणण्याचा प्र्रयत्न करते आहे. सरकारी क्षेत्रासोबतच खासगी क्षेत्रातही या प्र्रकारचे प्रयत्न आता घडू लागले आहेत. समानतेची तत्त्वे प्रस्थापित करण्याऐवजी त्यांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तींपासून आरक्षणाच्या रक्षणासाठी एकजूट साधा, असे आवाहन निवृत्त न्यायमूर्ती अनिल वैद्य यांनी केले.

नाशिक जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे आयोजित अध्यापक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ‘मागासवर्गीय कर्मचारी गुणवत्ता व आरक्षणामागे घटनाकारांची भूमिका’ या विषयावर वैद्य बोलत होते. प. सा. नाट्यगृहात रविवारी दुपारी हा कार्यक्रम पार पडला.

व्यासपीठावर वैद्य यांच्यासमवेत शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, सहआयुक्त प्रकाश आंधळे, राज्य सरचिटणीस राजेंद्र म्हसदे, जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे उपस्थित होते. यावेळी ‘गुणवंत शिक्षक’ आणि ‘राज्य स्तरीय शैक्षणिक व्हीडिओनिर्मिती’ अशा दोन प्रकारच्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गुणवंत शिक्षक पुरस्काराचे मानकरी (कंसात तालुका)

विशेष पुरस्कार ः गुलाब संसारे (येवला), सूरज झाल्टे, (येवला) सुरेखा क्षीरसागर (बागलाण), अर्चना गरुड (मालेगाव), मालती पवार (त्र्यंबकेश्वर), समीना तांबोळी (आडगाव), तात्या मोरे (नाशिक), सतीशकुमार लाडे (त्र्यंबकेश्वर), नारायण गावित (दिंडोरी), दिलीप बोराडे, नामदेव साबळे (दोघेही इगतपुरी), केशव महाले (सुरगाणा), राजेंद्र खैरनार (नांदगाव), संगीता खंबाईत (दिंडोरी), अरुणा पटाईत (सिन्नर), सतीश बैरागी (निफाड), सुरेश खांडबहाले (नाशिक), अनिता अहिरे (कळवण), खंडू मोरे (देवळा), अमोल पवार (पेठ), सचिन सोर (नाशिक), किरण केदार (मालेगाव).

राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडीओनिर्मिती पुरस्काराचे मानकरी

प्रथम पुरस्कार- संजय गोरे (जिल्हा परिषद शाळा : चिंचणी, ता. खटाव, जि. सातारा), द्वितीय पुरस्कार- अमोल हंकारे (जिल्हा परिषद शाळा, खोत वस्ती, जि. सांगली), तृतीय- राजेंद्र गणवीर (जिल्हा परिषद शाळा घोडेगाव, देवळी, जिल्हा : वर्धा), उत्तेजनार्थ : सूरज शिकलगार (जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी, पलूस, जि. सांगली), उत्तेजनार्थ- समिरा बदीउद्दीन काझी (शेवगाव उर्दू मुलींची शाळा, जि. नगर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाट ओसरली पारा सामान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या बहुतांश भागाला तीव्र झळांनी भाजून काढणारी उष्णतेची लाट ओसरली आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान पाच अंशांनी घसरून ३५ अंशावर, तर मालेगावचे तापमानही ४० अंशाच्या खाली आले आहे. यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात नाशिकचे तापमान चाळीशी पार गेले होते. मालेगावचे तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले होते. उष्णतेची ही लाट रविवारी ओसरली. विदर्भातही सर्वत्र पारा ४२ ते ४३ अंशांसह सामान्य झाला. अमरावती व बुलडाण्यात तर तो ३७ अंशांपर्यंत घसरला आहे. विशेष म्हणजे, वर्षापूर्वीदेखील पारा असाच सामान्य होऊन त्यादिवशी लाट ओसरली होती. राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण व शुष्क वाऱ्यांमुळे आठवडाभरापासून उष्णतेची लाट होती.

तापमान स्थिर राहणार!

राज्यात पुढील तीन दिवसांत तापमानात बदल होणार नाही, तर मुंबईत पुढील चोवीस तासांत आकाश ढगाळलेले राहिल. कोकण व गोव्यात उकाडा कायम राहिल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिमान कामकाजासाठी ‘महावितरण’चे मंथन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महावितरण कंपनीचे दैनंदिन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शी आणि परिणामकारक बनविण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील तंत्रज्ञांशी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला.

तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांकडून आलेल्या सूचनांच्या आधारावर संजीव कुमार यांनी ग्राहकसेवेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश देतानाच सेवेत हयगय करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. तंत्रज्ञांशी थेट संवाद साधणारे संजीव कुमार हे ‘महावितरण’चे पहिलेच अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आहेत.

दर्जा सुधारण्यासाठी...

ग्रामीण ग्राहकांना मराठीतून एसएमएस पाठवावा, सर्व ग्राहकांचे मीटर रीडिंग प्रत्येक महिन्यात वेळेत करावे, नवीन वीजजोडणी, नावात बदल आदींच्या फॉर्ममध्ये सुटसुटीतपणा ठेवावा, नवीन वीजजोडणी ऑनलाइनद्वारेच देण्यात यावी, फोटो मीटर रीडिंग, मीटरचे छायाचित्र, फीडर व डीटीसी मीटर रीडिंग, नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा व इतर दैनंदिन कामे मोबाइल अॅपद्वारेच करण्यात यावीत, ही कामे करणाऱ्या संस्थेने यामध्ये हयगय केल्यास संबंधित संस्थेविरोधात कारवाई करावी, प्रत्येक ग्राहकाला वेळेत वीजबिल द्यावे, विजेसंबंधीचे महत्त्वाची कामे प्राधान्याने करावीत व देखभालीची ठरविलेली कामे ग्राहकांना पूर्वसूचना देऊन करावीत, प्रत्येक महिन्याला वीजबिलाच्या रकमेएवढी वसुली केली जावी, थकबाकी वाढू देऊ नये, ग्राहकाला त्रास होणार नाही, याकडे कटाक्षाने बघावे, प्रत्येक पातळीवर पारदर्शकता ठेवावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्याजवळ अपघातात तिघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा-मालेगाव रस्त्यावरील आराई फाट्यावर रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विप्ट डिझायर कारचे पुढील चाक निखळल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका युवतीसह तिघांचा मृत्यू झाला.

देवळा एज्युकेशन सोसायटी विद्यालयातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ. रामराव वामन आहेर (वय ६२) हे सातमाने (ता. मालेगाव) येथील त्यांचे व्याही विजय जाधव (वय ६५) व डॉ. आहेर यांची नात गौरी गोरख निकम (वय १३, रा. ढवळीविहीर आघार) हे तिघेही मालेगावकडून स्विप्ट कारने (एमएच ४१ व्ही ३७२१) देवळ्याला परतत होते. आराई फाट्याजवळ पुढील चाक निखळून पडल्याने कार समोरील एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील तिघेही जण जागीच मृत्युमुखी पडले. कार झाडावर आदळल्याने मोठा आवाज झाला. यावेळी परिसरातील रहिवाशांनी तातडीने धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. नगरसेवक राहुल पाटील, काकाजी सोनवणे यांच्यासह मित्रपरिवाराने तातडीने तिघांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिघांची प्राणज्योत मालवली होती. सटाणा पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालस्वास्थ्य’ ठरली संजीवनी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविला जाणारा राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यातील हजारो बालक व शालेय विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरला आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ७२० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात १६७ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया, तर उर्वरित ५५३ बालकांवर इतर आजारांशी संबंधित शस्त्रक्रियांचा समावेश आहे. या योजनेमुळे शेकडो बालकांना जीवनदान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एप्रिल २०१३ पासून अंगणवाडी व शालेय मुलांचे आरोग्यसंवर्धन व विकासासाठी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात आढळून आलेल्या आजारांवर वेळीच उपचार करणे व आजारांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. वय वर्षे ० ते १८ या वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी व त्यांच्या आजारांवर मोफत उपचार या कार्यक्रमातून केले जातात. नाशिक जिल्ह्यात सध्या ७५ पथके या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असून, १५० वैद्यकीय अधिकारी, ७५ औषधनिर्माता व ७५ परिचारिका अशा एकूण १५० कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. जन्मतःच व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासास विलंब व इतर आजार यांचे निदान व उपचार केले जातात.

--

अशी होते अंमलबजावणी

प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा, तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते. यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात, तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रुग्णालय अथवा राजीव गांधी जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो.

गरजूंना मिळाला लाभ

गेल्या शैक्षणिक वर्षी अंगणवाडी व विविध शाळांतील ७२० विद्यार्थ्यांवर या योजनेतून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यातील बहुतांश बालके आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कष्टकरी कुटुंबांतील आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षी दोन्ही टप्प्यांत अंगणवाडीतील ३४ हजार ९१७ बालकांवर किरकोळ, तर २ हजार ४९२ बालकांवर उच्चस्तरीय रुग्णालयांत उपचार करण्यात आले. शाळांतील ३३ हजार ६१६ विद्यार्थ्यांवर शाळांतच किरकोळ, तर ४ हजार ७०५ विद्यार्थ्यांवर पुढील उपचार करण्यात आले.

--

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जातो. या योजनेतून निदान झालेल्या आजारांवर आतापर्यंत शेकडो बालके व विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार झाल्याने त्यांच्यासाठी ही योजना संजीवनी ठरली आहे.

-डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी, योजना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वऱ्हाडींना मिळाले हेल्मेट गिफ्ट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मानपान आणि बडेजाव बाजूला ठेवून एका विवाहाच्या स्वागत समारंभात आलेल्या पाहुणे मंडळींना चक्क हेल्मेट वाटप करण्यात आले. शहरात रंगलेला हा छोटेखानी स्वागत समारंभाचा सोहळा चर्चेचा विषय ठरला.

डॉ. राजेंद्र आणि मायादेवी साबद्रा यांची कन्या प्रियदर्शना आणि नाशिकमधील उद्योजक हरीश आणि वंदना गोगड यांचा मुलगा ऋषभ यांनी १९ एप्रिल रोजी रजिस्टर पद्धतीने विवाह केला. जवळचे नातलग आणि स्नेहीजनांसाठी रविवारी गंगापूर रोडलगतच्या एका लॉन्समध्ये स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण सोहळ्यालाच सामाजिक बांधिलकी लाभल्याने हा सोहळा आगळावेगळा ठरला. जैन समाजात विवाह सोहळ्यांवर वारेमाप खर्च केला जात असला तरी वर आणि वधूकडील मंडळींनी या खर्चाला फाटा देऊन तो पैसा सामाजिक कार्यासाठी देऊ केला. या विवाह सोहळ्यात लग्नपत्रिकेचा खर्च टाळण्यात आला. निमंत्रितांना व्हॉट्सअॅपद्वारेच निमंत्रण पाठविण्यात आले. भूज भूकंपग्रस्तांसाठी काम करणाऱ्या पन्नालाल सुराणा यांच्या ‘आपले घर’ या सामाजिक संस्थेत सध्या २६८ मुले-मुली आहेत. त्यापैकी चार मुलींच्या लग्नाचा खर्च या लग्नात वाचविलेल्या पैशांमधून करण्यात येणार आहे. आज झालेल्या स्वागत समारंभासाठी आलेल्या ५०० निमंत्रितांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते हेल्मेटवाटप करण्यात आले. स्वागत समारंभात कोणताही गोड पदार्थ न ठेवता शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या द्राक्षाच्या पेट्या निमंत्रितांना वाटण्यात आल्या.

साबद्रा आणि गोगड परिवाराने राबविलेला हेल्मेटवाटपाचा निर्णय स्तुत्य आहे. इतरांनीदेखील असे उपक्रम राबवायला हवेत. ज्या निमंत्रितांकडे कार आहेत ते आपल्या वाहनचालकाला किंवा अन्य कुणाला हेल्मेट वापराबाबत प्रोत्साहन देऊ शकतात. दंडात्मक कारवाई हा पोलिसांचा उद्देश नाही, तर लोकांनी स्वसुरक्षेसाठी हेल्मेट वापरावे, असा आमचा आग्रह आहे.

- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ धरणे कोरडीठाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हावासीयांकडून दररोज होणारा पाण्याचा वापर आणि उन्हामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन यामुळे धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चालला आहे. जिल्ह्यातील २४ पैकी आठ धरणांमधील पाणी तळाला गेले असून, सर्व धरणांमध्ये मिळून अवघा २९ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर पुढील किमान ६८ दिवस जिल्हावासीयांची आणि शेतीची तहान भागवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी पाण्याची सर्रास उधळपट्टी सुरू असून, ती रोखणे महापालिका प्रशासनापुढे आव्हान ठरत आहे.

पाणी उपलब्धतेबाबत गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा चांगली परिस्थिती आहे. परंतु, पाऊस लांबणीवर पडला, तर पाण्याच्या नियोजनाचे गणित फसण्याची शक्यता बळावते. जून महिन्यात पाऊस हुलकावणी देत असल्याचा नाशिककरांचा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. या महिन्यात पाऊस झाला, तरी धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास त्याची फार मदत होत नाही. त्यामुळे जूनअखेरपर्यंतच्या पाण्याची भिस्त धरणांमध्ये सद्यःस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्यावरच अवलंबून असणार आहे.

नाशिक जिल्ह्यात गंगापूर, पालखेड आणि गिरणा धरण समूह मिळून २४ धरणे आहेत. या धरणांची साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट असून, सद्यःस्थितीत त्यामध्ये अवघा १९ हजार २०२ दशलक्ष घनफूट उपलब्ध पाणीसाठा शिल्लक आहे.

२३ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील धरणांमध्ये ७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या चार महिन्यांत तो सुमारे ५० टक्क्यांनी घटला आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठा २९ टक्के असून, तो आणखी किमान सव्वादोन महिने पुरवावा लागणार आहे. पालखेड धरणातून मंगळवारी (दि. २५ एप्रिल) रोजी निफाड, येवला, नांदगावसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पुढील दहा दिवस हा विसर्ग सुरू राहण्याची शक्यता असून, त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणखी कमी होणार आहे.

--

उधळपट्टी ; कारवाईची गरज

उन्हामुळे जिवाची काहिली होऊ लागली असताना शहरात नागरिकांकडून पाण्याचा वारेमाप वापर सुरू आहे. गतवर्षी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने शहरात पाणीकपातीचे धोरण अवलंबिले होते. यंदा पुरेसे पाणी उपलब्ध असले, तरी ते काटकसरीने वापरणे आवश्यक आहे. सिडकोसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात पाण्याचा गरजेपेक्षा अधिक वापर केला जात असल्याचे पाहावयास मिळते. वाहने, तसेच रस्ते धुण्यासाठी नागरिक पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. जिल्ह्याची आणि आता महापालिकेचीही धुरा सांभाळणारे राधाकृष्णन बी. पाण्याची उधळपट्टी रोखण्यासाठी ठोस कार्यवाही करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

--

जलसाठ्यावर दृष्टिक्षेप

दिनांक घटत गेलेला साठा (टक्के)

२३ डिसेंबर २०१६ ७८

२३ जानेवारी २०१७ ६७

२३ फेब्रुवारी २०१७ ५३

२३ मार्च २०१७ ३६

२३ एप्रिल २०१७ २९

--

तळाला गेलेली धरणे

---

धरण शिल्लक साठा (टक्के)

गौतमी गोदावरी १० टक्के

वाघाडमध्ये ७

केळझर ७

पुणेगावमध्ये ५

नांदूरमध्यमेश्वर ०

नागासाक्या ०

माणिकपुंज ०

--

जिल्ह्यातील धरणांची साठवण क्षमता : ६५,८१४ दलघफू

सध्या उपलब्ध साठा : १९,२०२ दलघफू

--

धरण समूहनिहाय उपलब्ध पाणीसाठा

धरण समूह उपलब्ध साठा (टक्के)

गंगापूर ४२

पालखेड २१

गिरणा ६८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अच्छे दिन’साठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे!

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

कामानिमित्त घराबाहेर पडलेला व्यक्ती परत येईपर्यंत भरदिवसा चोरटे लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करतात. रस्त्यावरून जाताना गळ्यातील दागिन्यांवर भामटे कधी डल्ला मारतील याचा नेम नाही. वाहनचोरी तर चोरट्यांच्या हातचा मळ झाला आहे. चोरीच्या घटनांकडे पोलिस दुर्लक्ष करून चोरट्यांना हिंमत देण्याचे काम करतात. गुन्हेगारी १०० टक्के कमी होईल, असे नाही. मात्र, झालेल्या गुन्ह्यांचा शोध तत्परतेने लागणे महत्त्वाचे! नागरिकांच्या चांगल्या दिवसांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने रामबाण उपाय शोधण्याची आवश्यकता आहे.

कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस दलावर मालमत्ता गुन्हे रोखण्याचे आणि झालेले गुन्हे शोधण्याची मोठी जबाबदारी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मालमत्तेशी संबंधित गुन्हे शोधून काढण्याची यंत्रणा कोलमडून पडली आहे. पोलिसांची इच्छाशक्ती घटनेतील ‘अर्था’वर भर देणारी असून, यात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठे बदल अपेक्षित आहेत. व्यक्तीनिहाय म्हणजे खून, हल्ला, फसवणूक असे गुन्हे पोलिस लागलीच शोधून काढतात. किंबहुना त्यातील संशयितांची माहिती तरी असते. मात्र, मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये तसे होत नाही. विशेष म्हणजे व्यक्तिकेंद्री गुन्ह्यांची ढाल करीत पोलिस मालमत्तेच्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मालमत्तेच्या गुन्ह्यात चटका बसलेल्या ७० टक्के नागरिकांना न्यायच मिळत नाही. याउलट पोलिस मात्र दागिने का घातले, इतके पैसे डिक्कीत का ठेवले, सोने बँकेत ठेवायचे असे फुकटचे सल्ले नागरिकांना देतात. सुरक्षेच्या दृष्टीने पुरेपूर यंत्रणा असलेल्या घरांमध्ये चोरटे घरफोडी करतात. सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरट्यांचे स्पष्ट चेहरे येऊनही ते पोलिसांना सापडत नाही. अनेकदा तर बँकेच्या लॉकरमधून घरी जाणाऱ्या दागिन्यांवरदेखील चोरटे डल्ला मारतात. सुरक्षेची हमी कोठेही नाही. त्यात मालमत्तेसंबंधी गुन्हे १०० टक्के बंद होतील, अशी शक्यता नाही. अशा वेळी पोलिसांनी गुन्हेगारांना त्वरित शोधून कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. दरवर्षी चोरट्यांची उलाढाल लाखो करोडोंत होते. कष्टाने कमवायचे अन् चोरट्यांनी पोलिसांच्या वरदहस्ताने डल्ला मारायचा, असा प्रकार सुरू आहे. यामुळे चोरटे गुन्हेगारीपासून परावृत्त होत नाहीत, किंबहुना पोलिसही अर्थकारणांमुळे तसे होऊ देत नाहीत. यात भरडला जातोय सर्वसामान्य नागरिक. मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालमत्ताविषयक गुन्ह्यांचा या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. किमान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमोशनसाठी मालमत्ता गुन्ह्यांच्या शोधांचा निकष अधिक कडक करायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर डॅमशेजारी मोनोरेल राईड्स!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर डॅम नजिकच्या परिसरात ग्रेप रिसॉर्टच्या कामास सुरुवात झाली असून न्यूझीलंडमधील मानव संचलित पॅडलिंग मोनोरेल राईड्स बसविता येण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली. सिटीझन फोरमच्या शिष्ट मंडळासोबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. याच परिसरात पर्यटन विभाग वॉटर स्पोर्टससाठीही प्रस्ताव मांडणार आहे.

सिटीझन फोरमच्या वतीने विविध प्रस्ताव ‘एमटीडीसी’कडे सादर करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक परिसरातील पर्यटन वाढीसाठी करायच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. हिरवाई, धबधबे, किल्ले, जलाशय यांची विपुल उपलब्धता असल्याने नाशिक-इगतपुरी-त्र्यंबक परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास तिकडे पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित करता येऊ शकतात. यासाठी नाशिक-इगतपुरी-त्र्यंबक अर्थात एनआयटी टूरिझम ट्रँगल विकसित करण्यासाठी सखोल अभ्यासाअंती विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी नाशिक सिटीझन्स फोरमच्या शिष्टमंडळाने ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांच्याकडे केली.

या शिष्टमंडळात एनसीएफचे अध्यक्ष सुनील भायभंग, संस्थापक अध्यक्ष विक्रम सारडा, उपाध्यक्ष हेमंत राठी आदींचा सहभाग होता. यावेळी एनआयटी ट्रँगलची संकल्पना मांडताना भायभंग म्हणाले की, नाशिक-इगतपुरी-त्र्यंबक या त्रिकोणात वर्षातील ९ महिने अतिशय आल्हाददायक वातावरण असते. त्यामुळे हा त्रिकोण वेलनेस हब म्हणूनही विकसित होऊ शकतो. योग, निसर्गोपचार अशा विविध थेरेपींची वेलनेस सेंटर्स येथे उभी व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकारी स्तरावरून सवलती असणारे धोरण स्वीकारल्यास अशी सेंटर्स उभारण्यासाठी लोक उद्युक्त होतील.

रामकुंडावर हवा रामायण आधारित शो

गंगापूर डॅमवरील बोट क्लब, रेस्टॉरंट आदी सुविधा लोकांसाठी खुल्या करून द्याव्यात, नाशिक ‘एमटीडीसी’ची वेबसाइट अद्ययावत करावी, अशी सूचना ‘एनसीएफ’च्या शिष्टमंडळाने मांडली. उत्तर महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रावर ‘एनसीएफ’ने तयार केलेल्या फिल्मचा प्रसार शासकीय स्तरावरून व्हावा, नाशिकच्या रामकुंडावर कायमच भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे तिथे रामायणावर आधारित लाईट अॅण्ड साऊंड शो सुरू करावा. गेल्यावर्षी पर्यटन आढावा बैठकीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी गोदावरी आरतीसाठी २० लाखांचा निधी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्याआधारे गोदावरी आरती कायमस्वरूपी होईल, अशी योजना आखून ती अंमलात आणली जावी, असे दोन प्रस्ताव भायभंग यांनी मांडले.

ब्रह्मगिरीसाठी हेलिकॉप्टर जॉय राईड

त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक मुक्कामी थांबतात. ते केंद्रस्थानी ठेवून त्र्यंबक परिसरात पर्यटनाची आकर्षणे निर्माण करावीत या प्रस्तावर मुंडावरे म्हणाले, की केंद्राच्या प्रसाद योजनअंतर्गत त्र्यंबकेश्वरचाही समावेश आहे. केंद्र सरकाची एक टीम त्र्यंबकला येऊन गेली आहे. त्र्यंबक येथून ब्रह्मगिरी आणि विविध किल्ल्यांचे विहंगम दृश्य दाखविणारी हेलिकॉप्टर जॉय राईड सुरू करण्यासाठीही पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्र्यंबक परिसरात एक हेलिपॅड उपलब्ध करून दिले जाईल आणि एजन्सी नेमून त्यांच्याकडे जॉय राईडचे काम सोपवले जाईल.


टूरिझन सर्किट विकसित व्हावे

पावसाळ्यात जिल्ह्यात दुगारवाडी (त्र्यंबक), विहिगाव (इगतपुरी), कळवण व हरसूल निसर्गरम्य ठिकाणी पायाभूत सुविधा द्याव्यात, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विचार करून टूरिझम सर्किटस् विकसित करावेत, त्र्यंबक सर्किट, नाशिक सिटी टूर, पक्षी अभयारण्य आणि वन्य जीवन दर्शन, येवला सर्किट, वणी भंडारदरा, नाशिक-इगतपुरी-त्र्यंबक (एनआयटी) मान्सून फेस्टीवल सर्किट, सायकल सर्किट, ट्रेकर्स सर्किट आणि मोटारसायकलिस्ट सर्किट आदींचा समावेश असावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त अधिकारी संदीप खडसेंबाबत निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील वादग्रस्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांची नागपूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर पुणे येथील जयंत चव्हाण रुजू झाले आहेत. परंतु, खडसे हे अद्यापही धुळ्यातच असल्याने त्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अॅड. अमित दुसाणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय लांडे यांना निवेदन दिले.

खडसे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हमरीतुमरी करणे, ओव्हरलोड गाड्यांच्या संदर्भात कारवाई न करता पैसे घेऊन सोडून देणे, आरटीओ कार्यालयातील १७ लाख रुपयांच्या अपहाराबाबत गुन्हा नोंदवताना हेतुपुरस्सर केलेली दिरंगाई, चुकीच्या पद्धतीने वाहनांची पासिंग करणे आदी कारणांमुळे वादग्रस्त ठरले आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

सरकारने त्यांची नागपूर येथे बदली केली असून, तसे आदेश धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयास १० एप्रिलला प्राप्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन अधिकारी जयंत चव्हाण रुजू झाले आहेत. तरीही खडसे हे येथील कार्यालयात वावरत आहेत.

खडसे हे नागपूर येथे जाण्यास इच्छुक नसून, मालेगाव किंवा जळगाव येथे जाण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी दुसाणे यांनी केली आहे.

नागपूर येथे बदली तर झाली आहे. मात्र, महिना संपल्यावर आणि पगार झाल्यानंतर कार्यालयीन प्रक्रिया पार पडेल. त्यानंतरच बदली झालेल्या ठिकाणी रुजू व्हावे लागेल.

- संदीप खडसे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिकेत होणार अरविंद-हेलन पाटील दिन!

$
0
0

जागतिक पातळीवर पाणी व्यवस्थापन या विषयात संशोधन करून तब्बल ७० पेटंट मिळवणाऱ्या मूळच्या नाशिकच्या व सध्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या अरविंद पाटील यांना नॉर्थकरोलिनामधील डेव्हिडसन शहराने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून २७ मार्च २०१७ हा दिवस अरविंद आणि हेलन पाटील दिन म्हणून उत्साहात साजरा केला गेला. डेव्हिडसनचे महापौर जॉन एम वूड्स यांनी या बहुमानाची घोषणा केली.

अरविंद पाटील ४४ वर्षांपासून सूक्ष्म घटक आणि रसायन या क्षेत्रात अमेरिकेत काम करीत असून, २० वर्षांपासून त्यांनी पाणीप्रक्रिया या विषयाला वाहून घेतले आहे. त्यांच्या पत्नी हेलन पाटील व ते दोघेही पीएच.डी.धारक असून, आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रातही कार्य करीत आहेत. ९-११ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याच्या बचावकार्यात या दोघांचाही मोलाचा वाटा होता. त्याचप्रमाणे कॅटरिना चक्रीवादळाच्या वेळी झालेल्या बचावकार्यात त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे काम केले आहे. आजपर्यंत अरविंद यांनी ७० पेटंट मिळविली असून, त्यातील २० पेटंट हे पाणीप्रक्रिया या विषयावर आहेत. पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते पाणी शुद्धीकरणाच्या उत्पादनांचे संशोधन करण्यात अग्रेसर राहिले आहेत. पाणी शुद्धीकरणातील रोगप्रतिकारक तंत्रज्ञान या विषयावर त्यांनी मोठ्या प्रमाणात संशोधन केले आहे. त्याचप्रमाणे पाण्यातील खनिज धातू कसे काढायचे, याचे कार्बन प्रक्रियावर आधारित संशोधन केले आहे. अमेरिकेतील पाणी व्यवस्थापन व पाणी गुणवत्ता संस्थांसाठी ते नेहमी सक्रिय असतात. १९९३ पासून नॉर्थ कॅरोलिना शहरात ते काम करीत असून, विविध संस्थांच्या माध्यमातून स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. डॉ. पाटील यांचा जन्म नाशिकमधील पगडबंद लेन येथे झाला असून, त्यांचे शालेय शिक्षण पेठे विद्यालयात झाले आहे. त्यांनी कॅनडा विद्यापीठातून मातीवरील संशोधन या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. शिक्षण घेत असतानाच हेलन यांच्याशी परिचय झाला व त्याचे रूपांतर विवाहात झाले. हेलन यांनी रसायन या विषयात डॉक्टरेट घेतली आहे. डॉक्टरेटनंतर दोघेही ऑस्ट्रेलियात गेले होते. तेथून पुन्हा अमेरिकेत येऊन संशोधन व नोकरी केली. त्याचप्रमाणे आरोग्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या रेडक्रॉस या संस्थेशीदेखील दोघेही निगडित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोडगेत शिक्षकांनी बँकेला ठोकले टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील जिल्हा बँकामधील चलन तुटवड्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या खातेदारांनी सोमवारी तालुक्यातील झोडगे येथील जिल्हा बँक शाखेला संतप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी टाळे टोकले.

झोडगा जिल्हा बँक शाखेत झोडगेसह परिसरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शेतकरी, पेन्शनर असे एकूण सुमारे अडीच हजार खातेधारक आहेत. सोमवारी सकाळपासूनच शिक्षकांनी पगाराची रक्कम मिळावी म्हणून रांगा लावल्या होत्या. मात्र दुपारपर्यंत रोखपालदेखील शाखेत आलेले नव्हेत. अखेर शाखाधिकारी यांनी बँकेत रक्कम नसल्याचे सांग‌ितल्याने संतप्त शिक्षकांनी शाखेस टाळे लावले. याबाबत शाखाधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

येवल्यात घेराव
येवला ः संतप्त शिक्षकांनी जिल्हा बँकेच्या येवला तालुक्यातील नगरसूल शाखेला सोमवारी दुपारी टाळे ठोकले. तसेच सायंकाळी शहरातील जब्रेश्वर रोड शाखेसमोर शेतकऱ्यांनी शाखा व्यवस्थापकांना घेराव घातला. शिक्षकांच्या खात्यावर दरमहा रक्कम जमा होवूनही गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ दोन हजार रुपये देण्यात येत असल्याकडे लक्ष वेधत संतप्त शिक्षकांनी सोमवारी सायंकाळी शाखाधिकारी गंगाधर मोरे यांना घेराव घातला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी मंडलेचा

$
0
0

महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी मंडलेचा

नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑप कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्‍ड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी नाशिकचे उद्योजक संतोष मंडलेचा यांची निवड करण्यात आली आहे. २०१७-१८ या दोन वर्षांसाठी ही निवड आहे. मंडलेचा हे दोन दशकांपासून चेंबरशी निगडीत आहेत. यापूर्वी ते वरिष्ठ उपाध्यक्ष होते. उपाध्यक्षपदी मुंबईच्या अमित कामत यांची निवड करण्यात आली आहे.

‘नामजप करा’

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ठिकाणी माता पार्वतीची मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याबाबत मोठा वाद झाला. त्यामुळेच येत्या १६ मे पर्यंत म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापणा होईपर्यंत दररोज १ हजार नामजप करा म्हणजे १६ मे पर्यंत ४० लाख नामजप झाले पाहिजे, असे फर्मानच अध्यक्षांनी काढले आहे. त्यामुळे विश्वस्त आणि व्यवस्थापक हे सारेच ‘सर्व मंगल मांगल्येचा’ जप करू लागले आहेत.

जिल्हा बँकेसाठी बैठक

नाशिक : वसुली रखडल्याने आणि जुने चलन पडून राहिल्याने जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडली आहे. बँकेला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवार नाशिकमध्ये दिली. आज (दि.२५) मुख्यमंत्र्यांकडे याबाबत बैठक घेतली जाणार असून, त्यामध्ये सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा असल्याचे ते म्हणाले. खरिप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे. तसेच, शिक्षकांनाही त्यांच्या हक्काच्या पगाराचे पैसे मिळणे गरजेचे असून, बैठकीत त्यावर निर्णय होईल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

बाळ पळवण्याचा प्रयत्न

नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागातून नवजात बालकाला पळवून नेण्याचा प्रकार सोमवारी रात्री उशिरा घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दोन महिलांसह एक व्यक्तीस ताब्यात घेतले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एक महिला प्रसूती विभागात पोहचली. तिथे तिने एक बालक उचलून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही बाब नवजात बालकाच्या आजीच्या लक्षात आली. तिने आरडाओरड केली असता, संशयित महिलेसह अन्य एक महिला आणि एका पुरुषास पकडण्यात आले. तिघा संशयितांना लागलीच सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आर्य संस्कृती, सम्राट अशोक, मगध संस्कृती, शक-विक्रम सवंत, परकीयांचे आक्रमण, भारताचा स्वातंत्र्य लढा या सर्व घटनांचा प्रवास यावेळी दाखविण्यात आला. नृत्यप्रकारांमध्ये महाराष्ट्रातील लेझीम, लावणी, गुजराथी गरबा, राजस्थानी घुमर, आसामचा बिहू, पंजाबचा भांगडा, कथकली, भरतनाट्यम, कथ्थक यांचे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे सरस्वती उपासना, बंगाली भाषेतील देशभक्तीपर गीत सादर करीत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळादेखील आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजू भुजबळ यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोद कुलकर्णी, अध्यक्ष नारायण दीक्षित आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नर्सिंग अभ्यासक्रमास आता एटीकेटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भारतीय परिचर्या परिषदेने नर्सिंग कॉलेजेसच्या अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्णतेसाठी दिलेल्या कमाल कालावधीच्या मर्यादेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अंशत: बदल करत नवे नियम सन् २०१५-१६ पासून लागू केले होते. या संदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत या अभ्यासक्रमांमध्ये एटीकेटीचा नियम मात्र परिषदेच्या निर्देशांनुसारच लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. यानुसार बीएस्सी. नर्सिंग व पोस्ट बीएस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमांच्या विद्यापीठाच्या उन्हाळी २०१७ च्या परीक्षेपासून एटीकेटीची रचना लागू करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले
आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित नर्सिंग कॉलेजेसद्वारे बीएस्सी. नर्सिंग व पोस्ट बीएस्सी. नर्सिंग हे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रम पूर्तीसाठी अनुक्रमे ८ आणि ४ वर्षांचा कालावधी देण्याचा निर्णय सन् २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाने घेतला होता. या संदर्भात कॉलेजेसना सूचनाही देण्यात आल्या होत्या.
ही मर्यादा लागू करताना विद्यापीठाने केंद्रीय परिषदेच्या एटीकेटीच्या नियमात अंशत: बदलही केले होते. मात्र, गेल्या महिन्यात परीक्षा मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत हा विषय पुन्हा चर्चिला जाऊन नवी शिफारस मांडण्यात आली होती. यानुसार या अभ्यासक्रमांचा एटीकेटी संदर्भातील नियम हा केंद्रीय परिचर्या परिषदेने घालून दिलेल्या नियमांनुसार लागू करण्याची शिफारस विद्यापीठाकडून करण्यात आली होती.


विद्यापीठाने दिल्या कॉलेजेसला सूचना

यंदाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेपासून एटीकेटीचा हा नियम लागू करण्यात यावा, अशा सूचना आरोग्य विद्यापीठाने संबंधित कॉलेजेसना दिल्या आहेत. यानुसार बेसिक बीएस्सीच्या पहिल्या वर्षात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला दुसऱ्या व पहिल्या वर्षाचे विषय देण्याची मुभा आहे, दुसऱ्या वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास त्याला तिसऱ्या नियमित वर्षासह राहिलेल्या द्वितीय वर्षातील विषय देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, राहिलेले विषय घेऊन चौथ्या वर्षात प्रवेश देण्याच्या सूचना असल्या तरीही या विद्यार्थ्याचे प्रथम ते तृतीय वर्षातील सर्व विषय उत्तीर्ण असल्याखेरीज त्याचा चतूर्थ तथा अंतिम वर्षाचा परीक्षा अर्ज विद्यापीठास सादर करता येणार नाही. या निर्णयाच्या परिणामी बहुतांश विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे. तर पोस्ट बीएस्सीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षातील राहिलेले विषय घेऊन अंतिम तथा द्वितीय वर्षात प्रवेश करता येईल. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षेस पात्र ठर ण्यासाठी विद्यार्थ्याला गत सत्रातील राहिलेले विषय उत्तीर्ण होणे गरजेचे असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याचा खासगी लिलाव बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मालाचे पेमेंट चेकने न करता रोख स्वरुपात अथवा NEFT द्वारे करावेत, या आदेशाला विरोध करत लासलगाव व निफाड येथील कांदा व्यापाऱ्यांनी खासगी मार्केटमध्ये कांदा खरेदी व लिलाव सुरू केले. मात्र यात हमाली आणि तोलाई मिळणार नसल्याने माथाडी कामगारांनी लासलगाव, निफाड येथेल खासगी मार्केटमध्ये सुरू झालेले कांदा लिलाव बंद पाडले.

गेल्या तीन ते चार दिवासांपासून बाजार समितीच्या आवारात वातावरण तापलेले आहे. निफाड येथे कांदा व्यापारी दीपक भूतडा, पुष्पक रूनवाळ, नंदू बोरा यांनी कांदा खरेदीसाठी विंचूर रोडवर खासगी कांदा मार्केट सुरू करून शेतकऱ्यांनी कांदा लिलावासाठी आणावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी माथाडी कामगार या ठिकाणी आले. त्यांनी या प्रक्रियेत हमाली आणि तोलाई खरेदी पट्टीत कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला. यावर व्यापाऱ्यांनी हमाली आणि तोलाई शेतकऱ्यांकडून रोख स्वरुपात घ्यावी, असे सांगितले. त्यावर माथाडी कामगार आणि व्यापारी यांची शाब्दिक बाचाबाची झाली. पोल‌िस निरीक्षक रणजित डेरे आणि सहकारी संस्था निबंधक यांनी हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. अखेर ४० ट्रॅक्टरची ३०० ते ५०० रुपयांपर्यंत खरेदी करून यापुढे पुढील कारवाई होईपर्यंत खासगी मार्केटचा कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. ३६ हमाल १६ मापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

कांदा उत्पादकांचे हाल

बाप जेऊ घालीना आणि आई भीक मागू देईना, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कांदा लिलावसाठी आणायचा कुठे, असा प्रश्न या उत्पादकांना पडला आहे. बाजार समितीने रोख पेमेंटचा आदेश काढल्याने खासगी मार्केट सुरू करायचा प्रयत्न माथाडी कामगारांमुळे शुभारंभाचा वेळीच बंद करण्याची वेळ आली. यामुळे कांदा उत्पादक संतप्त झाले आहेत. पिंपळगाव बाजार समितीत कांदा उत्पादकांना रोख किंवा NEFT ने पेमेंट अदा करायला सुरुवात केली असताना लासलगावच्या व्यापाऱ्यांना रोखीने व्यवहार करायला काय अडचण आहे, असा प्रश्नही पुढे आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपोवन परिसरातील प्रसाधनगृहांची दुरवस्था

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तीर्थस्थान आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध तपोवनात भाविक आणि पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. या वर्दळीच्या ठिकाण्‍ाी बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. त्याची अस्वच्छता आणि पावित्र्याला बाधा येऊ लागली आहे. दुर्गंधीमुळे येथे येणाऱ्यांच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

तपोवनातील शूर्पणखा मंदिराच्या दक्षिणेस गोदावरीच्या पात्राच्या लगत हे प्रसाधानगृह बांधण्यात आलेले आहे. येथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना त्याचा वापर करता यावा, असा याचा उद्देश असला तरी येथे पाऊल ठेवणेदेखील मुश्किल होत असल्याचे दिसते. येथील अस्वच्छतेमुळे कुणी त्यात जाण्याची धाडस करीत नाहीत. मध्ये गेले तर त्याचे दरवाजे तुटलेले आहेत. लोखंडी दरवाजे गंजून मोडून गेलेले असताना त्यांची दुरुस्ती करण्याचे कामदेखील करण्यात आलेले नाही. येथे पाण्याच्या नळाची व्यवस्था असून, त्या नळाला पाण्याची उपलब्धता असतानाही येथील स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे हा भाग अत्यंत गलिच्छ झालेला आहे. येथून मूत्र बाहेर जाण्याचा मार्ग थेट गोदापात्रात असल्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणात यामुळे आणखी भर पडत आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे ही स्थिती दिसत नसली तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे थेट वाहते.

पर्यटकांची गैरसोय

या प्रसाधनाच्या मागील भाग झाडाझुडपांनी वेढलेला आहे. त्यामुळे भिंतींना तडे गेले आहेत. भिंतींचीही पडझड झाली असून, अशी अवस्था असलेल्या या प्रसाधनगृहात येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना ओगंळवाणे दर्शन घेण्याची वेळ येत आहे. दुर्लक्ष झाल्यामुळे भाविक आणि पर्यटकांची गैरसोय होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​शिक्षकांचे मोर्चे स्थगित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांसंदर्भातील २७ फेब्रुवारीच्या परिपत्रकाविरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीने एकत्रित येत घेतलेला मोर्चाचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या सहविचार बैठकीत बदल्यांसंदर्भातील निर्णयात असलेल्या त्रुटी दूर करण्याचे आश्वासन मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारीला परिपत्रक जारी केले होते. या निर्णयात अनेक त्रुटी असून सर्वसमावेशकता नसल्याने या निर्णयात सुधारणा केल्याशिवाय बदल्या करू नये, अशी भूमिका राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांच्या समन्वय समितीने घेतली होती. याविषयी चर्चा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासनही देण्यात आले.

या मागण्या होणार पूर्ण
त्यामध्ये ५० वर्षावरील महिला शिक्षिका यांना बदलीत सूट देण्यात येणार आहे, दहा वर्षे सेवा झालेल्या बदलीपात्र शिक्षक यांना पसंतीच्या शाळा न मिळाल्यास दुसर्यांदा सर्व रिक्त शाळा दाखवून बदली मिळेल, दहा वर्षे सेवा झालेले व सर्वसाधारण भागातून पुन्हा सर्वसाधारण भागात बदली झाली तर पुढील तीन वर्षे बदलीस पात्र असणार नाही, नव्याने शिक्षक भरती करताना अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या सर्वसाधारण भागात करून नवीन नेमणूक देण्यात येतील, आंतरजिल्हा बदलीसाठी परवानगी देण्यात येणार, ऑनलाइन आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशा आश्वासनांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांच्या शाळा कचाट्यात!

$
0
0

नाशिक : दिव्यांग मुलांवर संस्कार करणाऱ्या राज्यातील १२३ कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची आश्वासने वारंवार देण्यात आली असली, तरी त्याच्या पूर्ततेसाठी कोणतीही पावले न उचलल्याने या शाळा मेटाकुटीस आल्या आहेत. अनुदानाअभावी या शाळांची स्थिती अत्यंत वाईट झाली असून, विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा भागविणेही शाळांना कठीण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातही अशा चार शाळा आहेत. सरकारी व्यवस्थेकडून केवळ आश्वासने दिली जातात. पुढे त्यावर कोणताही निर्णय होत नाही. अशा आश्वासनांवर आम्ही शाळा कशा चालवायच्या, असा प्रश्न दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

मार्च २०१५मध्ये राज्यातील दिव्यांगांच्या १२३ कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला दोन वर्षे उलटून गेली, तरी राज्य सरकारने या शाळांना अनुदान देण्याबाबत कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. गतिमंद, मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग आदींसाठी चालविण्यात येत असलेल्या या शाळांची परिस्थिती निधीअभावी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ही परिस्थिती दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी वेळोवेळी राज्य सरकारच्या नजरेस आणून दिल्यानंतर या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने, तसेच सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मार्च २०१५ साली घेतला होता. या निर्णयाला दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अजूनही अनुदान देण्याबाबत काहीही हालचाली झालेल्या नाहीत. या शाळांमधील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या आशेवर सेवा पुरवत आहेत. परंतु, अनुदानाच्या निर्णयावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने या शाळा कशा चालवायच्या व दिव्यांगांना सर्वसामान्यांप्रमाणे समाजात स्थान मिळवून देण्यासाठी कशी मदत करायची, असा प्रश्न या शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

--

आंदोलनातही आश्वासनेच

राज्यातील दिव्यांगांच्या शाळेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळीदेखील तोडगा काढण्याची आश्वासने देण्यात आली. परंतु, त्यातून काहीही ठोस हाती आले नसल्याचे नाशिक जिल्हा अपंग शाळा, कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. अशाच एका शाळेत कार्यरत असलेल्या एका तरुण शिक्षकाने पगारच मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची गंभीर घटनाही घडली आहे. त्यामुळे आता तरी न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

--

कोट्यवधींचे अनुदान थकित

नाशिक जिल्हा अपंग शाळा, कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार चाळीस विद्यार्थ्यांमागे दहा शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. अनुदानाच्या निकषानुसार दरमहा लाखोंच्या घरात हे अनुदान आहे. राज्यातील १२३ शाळांनुसार ही संख्या पाहता कोट्यवधींचे अनुदान थकलेले असल्याची बाब या संघटनेने स्पष्ट केली आहे.

--

दिव्यांगांबाबत सरकारी धोरण अतिशय विरोधाभासी आहे. या मुलांसाठी शाळा व शाळा चालविण्यासाठी अनुदानाची मोठी गरज असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिव्यांगांच्या शाळांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे.

-रवींद्र कांबळे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा अपंग शाळा, कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images