Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एसीपी अतुल झेंडे, बजबळे यांची बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) आणि पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) दर्जाच्या ९६ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश रविवारी निघाले. शहरातील दोन एसीपींसह महाराष्ट्र पोलिस अकादमीतील आठ आणि नाशिक ग्रामीणमधील एका डीवायएसपीची बदली करण्यात आली आहे.

परिमंडळ दोनचे एसीपी अतुल झेंडे यांची नाशिक ग्रामीणमध्ये डीवायएसपी म्हणून बदली झाली आहे. वाहतूक शाखेचे एसीपी जयंत बजबळे यांची पालघर विरार येथे डीवायएसपी म्हणून बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये कार्यरत कुंडलिक निगडे यांची पुण्यात, तर नम्रता अलकनुरे (राज्य गुप्त वार्ता, मुंबई), शकुंतला मैत्री, मिलिंद खेतले (मुंबई), मेघा कमलाकर (रायगड), अनिलकुमार लंभाते (खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र), राजेंद्रकुमार शेंडे (कोल्हापूर), दत्तात्रय निघोट (मुरबाड, ठाणे ग्रामीण) यांचा बदली झालेल्या अधिकाऱ्यांत समावेश आहे. नाशिक ग्रामीणमधील गजानन राजमाने यांची उस्मानाबाद येथे बदली झाली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयात संगमनेरचे डीवायएसपी अजय देवरे बदलून येणार आहेत.

बुरडेंच्या जागी कोण?

महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक म्हणून नियुक्ती जाहीर झालेल्या प्रशांत बुरडे यांची आता मुंबईचे सहआयुक्त म्हणून बदली करण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक नवल बजाज यांची कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून तर, कोकणचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांची अकादमीचे संचालक म्हणून नियुक्ती जाहीर झाली होती. मात्र बुरडे यांची आता मुंबईच्या सहआयुक्तपदी बदली केल्याचे समजते. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अकादमीत संचालक म्हणून कोण येणार याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योजकाच्या नावाने खोटी तक्रार

$
0
0

पोलिसांकडून तपास सुरू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लेटरपॅडची झेरॉक्स व खोटी सहीचा वापर केल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीविरुध्द सातपूर पोलिस स्थानकात उद्योजक सुभाषचंद्र छोरिया यांनी तक्रार केली आहे. अश्वमेध पॅकर्स या कंपनीविरुध्द एमआयडीसीमध्ये छोरिया यांनी तक्रार केलेली नसताना त्यांच्या नावाने तक्रार केल्यामुळे या उद्योगामागे कोण आहे, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

एमआयडीसीत होणाऱ्या गैर उद्योगामुळे अनेक तक्रारी होत असताना ही खोटी तक्रार करण्यात आल्यामुळे त्याबाबतचे गुढ वाढले आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीनेही या तक्रारीवरून अश्वमेध पॅकर्सला नोटीस पाठवली तर त्या तक्रारीची माहिती छोरिया यांना दिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. कोणीतरी हा खोडसाळपणा केला असला तरी त्यामागे नेमका उद्देश काय आहे, याबाबत शोध घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसीमध्ये तक्रार वॉर सुरू आहे. त्यामुळे एकमेकांविरुध्द तक्रार करून परस्पर काटा काढण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तक्रार कोणी केली याची शहनिशा करणे सुध्दा महत्त्वाचे आहे.

अश्वमेध पॅकर्स व छोरिया यांच्यात कोणताही वाद नाही. असे असताना छोरिया यांनी आपली तक्रार का केली याची विचारणा त्यांनी केल्यानंतर या गोंधळात वाढ झाली. छोरिया यांनी तक्रार केली नसल्याचे जेव्हा अश्वमधे पॅकर्संना कळाले तेव्हा त्यांनीही हा खोडसाळपणा कोणी केला याचा शोध घेणे सुरू केले आहे. अशाच प्रकारच्या आठ ते दहा तक्रारी केल्याचाही संशय असून, त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतल्यानंतरच त्यामागाचा उद्देश स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारवाड्यात उलगडले पेशवाईचे अंतरंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा सरकारवाडा वाडासंस्कृती अन् काष्ठशिल्पांच्या कलाकृतीचे शहराचा इतिहास, राजकीय, सामाजिक चळवळींचे प्रतिक आहे. ही वास्तू पेशवाईची शान दाखविते. पुण्यासाठी शनिवारवाड्याचे जसे महत्त्व आहे तसेच नाशिकसाठी सरकारवाड्याचे असायला हवे यासाठी नाशिककरांनी लोकचळवळ उभारत सरकारवाड्यासाठी लढाही दिला अन् आज या लढ्याला यश येऊ लागले आहे. हे पाहताना नाशिककर अंतर्मुख तर झालेच, पण गेल्या अनेक वर्षांपासून ज्या वाड्याबद्दल फक्त ऐकले जाते अथवा लांबून त्यांच्या पाहण्याचाच योग येतो, त्या वास्तूत ‘मटा हेरिटेज वॉक’निमित्त पेशवाईचे अंतरंगही उलगडून पाहता आले.

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे रविवारी आयोजित केलेल्या हेरिटेज वॉकमध्ये दोनशेहून अधिक नाशिककरांनी सहभाग घेतला होता. सकाळी साडेआठ वाजता वॉकमध्ये सहभागी झालेल्या अबालवृद्धांना सरकारवाड्याची इत्थंभूत माहिती करून देण्यासाठी ८५ वर्षांचे चिरतरुण अण्णा बेळे उपस्थित होते. खणखणीत आवाज अन् सरकारवाडा पुन्हा उभा रहावा, या तळमळीने त्यांच्या टीमने केलेले प्रयत्न अण्णांनी विषद केले. एवढेच नव्हे तर सरकारवाड्याचा इतिहास, काष्ठशिल्पांच्या वैशिष्ट्यांसह बारीकसारीक माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. हा संवाद थक्क करणारा होता. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी अण्णांच्या व त्यांच्या टीमचे कौतुक केले. त्यानंतर पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे यांनी पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात सरकारवाडा आल्यापासून पुन्हा नव्याने त्याची उभारणी कशा पद्धतीने झाली, लाकूडकाम, कारागीर, सरकारवाड्यातील दरबार हॉल याची माहिती देत भविष्यात कोठे काय काय करण्याची त्यांची कल्पना आहे हे देखील सांगितले. यावेळी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सहायक पुरातत्त्ववेत्ता अमोल गोटे, जतन सहायक रमेश कुलकर्णी, वास्तू विशारद कासार पाटील, सचिन पगारे, किशोर बच्छाव, सुनील गोराडे यांनीही उपस्थितांना सरकारवाडा फिरवून दाखवित मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याला अवकाळी, गारपिटीचा तडाखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात सटाणा, देवळा, नांदगाव, चांदवड, सिन्नर, येवला आणि निफाड या तालुक्यांना रविवारी वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस गारपिटीचा तडाखा बसला. काही ठिकाणी हलकासा शिडकावा झाला असला तरी सटाण्यासह आणखी काही ठिकाणी वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज अंगावर पडून कळवण आणि देवळ्यात प्रत्येकी चार आणि सटाण्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला, तर देवळा तालुक्यात सात जण जखमी झाले.

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना रविवारी पावसाची काहीशी चाहूल लागली होती. मात्र, तो धुव्वाधार बरसेल याचा अंदाज नसल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सटाणा तालुक्यात अवकाळीबरोबरच गारपिटीचाही तडाखा बसला. अवघ्या दहा मिनिटांत गारांचा खच साचला होता. नामपूर, कन्धाने परिसरात गारपिटीमुळे कांदा, डाळिंब, टोमॅटो, पपईसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. करंजाड, पिंगळवाड, निताणे, आसखेडा, वनोली, वीरगाव येथे शेती पाण्याखाली गेली. कोटबेल येथे दोन शेळ्या ठार झाल्या तर एका गावात घराचे पत्रे उडाले.

निफाड तालुक्यातील चितेगाव, चेहेडी, खेरवाडी या भागात वादळी वाऱ्यासह गारा पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे, तसेच चाळींमध्ये साठविलेल्या कांद्याचेही मोठे नुकसान झाले. द्राक्षबागांनाही पावसाचा फटका बसला. लासलगाव, विंचूर परिसरात कांदा, डाळिंब, उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उगाव, शिवडी, वनसगाव या तालुक्याच्या उत्तर पट्ट्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. देवळ्यातही धुव्वाधार पाऊस झाला असून, नुकसानीचा नेमका अंदाज येऊ शकलेला नाही. चांदवड शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली. मनमाडमध्ये दुपारी तीननंतर वादळी वाऱ्याने विक्रेते व ग्राहकांची धांदल उडवली. येवला शहर व तालुक्यात सव्वाचारच्या सुमारास काही ठिकाणी पाच मिनिटे पावसाचा हलकासा शिडकावा झाला. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे ढगाळ वातावरणामुळे धाबे दणाणले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

नाशिकमध्ये हलक्या सरी

शहरात दुपारपासून ढगाळ वातावरण होते. इंदिरानगर, सिडको परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर सायंकाळनंतर गारठा वाढला. पावसाच्या शक्यतेमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. उष्म्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले.

देवळ्यात तीन बालकांसह सात जखमी

देवळा तालुक्यात झिरे पिंपळे येथे वीज अंगावर पडून एकनाथ यशवंत सोनवणे हा तरुण जखमी झाला. याच गावात प्रमिला हिरामण आहेर (वय ३५), कुणाल हेमंत आहेर (७), कल्याणी हेमंत आहेर (५), माऊ दीपक आहेर (४) या एकाच कुटुंबातील चार घरांची भिंत अंगावर पडून जखमी झाले. तालुक्यात माधुरी पवार (२५) आणि सीमा सचिन जाधव (३५) यादेखील जखमी झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू विक्रीविरोधात त्र्यंबकेश्वरमध्ये मोहीम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिक ग्रामीण पोलिसांनी तळेगाव (अंजनेरी) येथे धाड टाकून गावठी दारूची भट्टी उद्‍ध्वस्त करीत हजारो रुपयांचे साहित्य जप्त केले. तसेच, त्र्यंबकेश्वर-अंबोली रस्त्यावर ठिकठिकाणी धाडी टाकत अवैध देशी दारू व्रिकी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

महामार्गालगत दारू दुकाने बंद झाल्याने अवैध दारू व्रिकीस जोर वाढल्याने पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. रविवारी स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक गिरी यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव, पोलिस हवालदार दिवटे, पोलिस शिपाई लगड आदींच्या पथकाने तळेगाव वाढोली आणि

त्र्यंबकेश्वर अंबोली रस्ता या भागात धडक मोहीम राबवली.

नाशिक तालुका पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी दूरध्वनीवरून त्र्यंबक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव ते वाढोली रस्त्यालगत गावठी दारूची भट्टी लावल्याची माहिती कळविल्यानंतर ही मोहीम आखण्यात आली. पोलीस पथक घटनास्‍थळी पोहोचले असता १५ लिटरचे २१ डबे भरलेले रसायण, १० लिटर तयार दारू भरलेले कॅन, पत्र्याचे डबे, ड्रम असे १५ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्र्यंबकेश्वर-अंबोली रस्त्यावर कृष्णा हॉटेलच्या बाजूस जांभळाच्या झाडाआड देशीदारू विक्री करीत असलेला पिंटू शिवाजी गायकवाड (वय २८, वेळुंजे) यास १४ देशीदारूच्या बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. अंबोली शिवारात अवैध दारू विकी करीत असलेला यादव पांडुरंग नवले (वय ५८, रा. वखारीचा पाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) यास अंबई शिवारात १५ देशीदारू बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरुध्‍द त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४० शॉर्ट फिल्म्सचे नाशकात स्क्रीनिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पर्यावरण, प्रदूषण व अंधश्रध्दा यांच्याविषयी जागृती व्हावी, यासाठी चित्रपटसृष्टीचा वापर करुन पर्यावरणसृष्टी वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी नाशिकमध्ये तब्बल १४० शॉर्टफिल्म्सचे ‌स्क्रीनिंग केले जात आहे. यासाठी महर्षी चित्रपट संस्थेने पुढाकार घेऊन तब्बल २५ जिल्ह्यांत आवाहन केल्यानंतर या शॉर्ट फिल्म्स आल्या आहेत. यातून तीन उत्कृष्ट फिल्मची निवड करुन त्यानंतर त्या उत्तर महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत दाखवल्या जाणार आहेत.
रविवारी या फिल्मच्या स्क्रीनिंग करताना छोटेखानी कार्यक्रमही पार पडला. त्यात करमणूक विभागाचे उपायुक्त प्रकाश वाघमोडे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील हे उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुकही केले. या फिल्म्समध्ये उत्कृष्ट शॉर्टफिल्म या चित्रपटगृहात दाखवण्याचा मनोदयही वाघमोडे यांनी बोलून दाखवला. महर्षी चित्रपट संस्थेचे अध्यक्ष सचिन बरेलीकर, सचिव कृष्णकुमार व विश्वस्त निशिकांत पगारे यांनी या सर्व उपक्रमाचे संयोजन केले.

दोन ते तीस मिन‌िटापर्यंतच्या या शॉर्ट फिल्म्समध्ये अनेक तरुणांनी आपली कल्पकता वापरली आहे. त्याचे परीक्षण चार दिवस शाल‌िमार येथील महात्मा फुले कलादालनात होणार आहे. त्यासाठी परीक्षक म्हणून ‘१९४२ः अ लव्ह स्टोरी’ या हिंदी चित्रपटाचे आर्ट डायरेक्टर तुषार गुप्ते व कादर खान यांचे सहाय्यक शिवकुमार हे काम करणार आहेत. चित्रपट हे माध्यम थेट परिणाम करणारे आहे. त्यामुळे पर्यावरणावर काम करणाऱ्यांनी हा मार्ग निवडला आहे. या फिल्म्सचा वापर करुनच व्हॉटसअॅप, यू ट्यूबसह इतर माध्यमांतून त्या पोस्ट केल्या जाण्याचाही मनोदय या संस्थेचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील तरुणांना लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुण्याहून आलेल्या तरुणाचा मोबाइल आणि रोकड दोन संशयितांनी हिसकावून नेला. शनिवारी मध्यरात्री शालिमारला हा प्रकार घडला. गंगाधर राजेंद्र परडे (वय २९, रा. फ्लॅट क्रमांक १०१, गोल्डन ड्रिम्स, गोंधळेनगर, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पहाटे पावणेचारच्या सुमारास ते पुण्याहून नाशिकमध्ये आले. त्यावेळी दोन संशयितांनी त्यांना अडविले. त्यांच्याकडील मोबाइल व रोख रक्कम असा १३ हजारांचा मुद्देमाल हिसकावून नेला. भद्रकाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पूर्ववैमनस्यातून मारहाण

दीड महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून दोन तरुणांना चौघा संशयितांनी बेदम मारहाण केली. सातपूर परिसरातील श्रमिकनगरध्ये शुक्रवारी (दि. २८) रात्री ही घटना घडली. रेणुका माता चौकातील जिजाई रो-हाऊसमधील रहिवासी समाधान जाधव हे रात्री साडेनऊच्या सुमारास मित्र शाहरूख शाह समवेत वास्तूनगरकडून पिंपळगाव बहुलाकडे मोटरसायकलवरून चालले होते. संशयित निखिल भावले, गुलाब, भावड्या व आणखी एकाने पवार संकुलजवळ थांबविले. जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांना दांडके, दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

भावावर चाकूने वार

जुन्या भांडणाची कुरापत काढून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार केले. शनिवारी (दि. २९) आगरटाकळी येथील नंदिनी पुलावर हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र वसंत धुमाळ (रा. आगरटाकळी) हे प्लंबिगच्या कामासाठी मोटरसायकलवरून चालले होते. नंदिनी पुलावरून नाशिककडे जाताना त्यांचा मोठा भाऊ शंकर धुमाळ याने त्यांना अडविले. जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत चाकूने गळ्यावर वार केले. रवींद्र धुमाळ यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काजी बंधूंना पोलिस महासंचालक पदक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पोलिस दलात निष्ठेने कर्तबगारी सिध्द करणाऱ्या दोन भावांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झाले आहे. हे दोन्ही भाऊ शहर पोलिस दलात कार्यरत असून, एकाच दिवशी दोघांचा सन्मान होणे नाशिककरांसाठी दुर्मिळ योग ठरला आहे. सोमवारी सकाळी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना एकावेळी पुरस्कार स्वीकारताना पाहणे हा कुटुंबीयांसाठी देखील अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.

सलिम फकीर महंमद काजी आणि अलिम फकीर महंमद काजी यांना त्यांच्या पोलिस दलातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे मानाचे पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनी (१ मे) पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांना मान्यवरांच्या हस्ते हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. सलीम काझी यांची नेमणूक अंबड पोलिस स्टेशनला असली तरी सध्या ते परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. २७ वर्षांच्या सेवाकाळात त्यांना २९१ बक्षिसे मिळाली आहेत. अलिम काझी यांची नेमणूक मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये असून, ते सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या कार्यालयात कर्तव्यावर असतात. त्यांना वीस वर्षांच्या कार्यकाळात २९८ बक्षिसे मिळाली आहेत. सलीम यांनी पंचवटी व नाशिकरोडसह विविध पोलिस स्टेशन्समध्ये

कर्तव्य बजावले आहे.

गुन्हे लेखनिक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. १९९६ व २००० मध्ये त्यांना पोलिस महासंचालकांकडून आगाऊ वेतनवाढ मिळाली होती. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन पदकप्राप्तीसाठी कारणीभूत असल्याचे हे बंधू सांगतात. कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या मार्गावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अलिम यांनी बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन केले होते.

दुर्गम भागातील निरीक्षकाचाही होणार गौरव

सुरगाणासारख्या अत्यंत दुर्गम भागात वरिष्ठ निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या लिलाधर कानडे यांनाही पोलिस महासंचालकांच्या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. नर्मदा बचाव आंदोलन त्यांनी कुशलतेने हाताळले आहे. २००६ ते २०११ या कालावधीत नाशिक एटीएसमध्ये कार्यरत असताना बिलाल बाबा या दहशतवाद्यास अटक करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. २६/११ दहशतवादी हल्ला, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जव्हेरी बाजार बॉम्बस्फोट तसेच मालेगाव बॉम्ब स्फोट-२००८ या गुन्ह्यांमध्ये त्यांनी सहतपासी अधिकारी म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैशाखात कोसळल्या धारा

$
0
0

टीम मटा

वैशाख मासात रणरणते ऊन, असह्य करणारा उकाडा अन् अंग भिजवून टाकणारा घाम असे वातावरण असते. मात्र, एप्रिल महिन्याचा अखेरचा रविवार नाशिक शहरासह जिल्हावासीयांसाठी धक्का देणारा ठरला. दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्याने नाशिक शहरात धुळीचे लोट उठविले, तर जिल्हाभरात विविध ठिकाणी अर्धा ते दोन तास अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकांसह पशुधनाचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने बळीराजापुढे संकट निर्माण झाले आहे.

चांदवड, मनमाडला हलक्या सरी

मनमाड : चांदवड शहरासह परिसरात रविवारी दुपारी सुमारे तासभर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरण शीतल झाले. उन्ह आणि घामाने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मनमाड शहरात दुपारी तीन वाजेनंतर ढगाळ वातावरण झाले. अचानक आलेल्या वादळाने रविवारच्या बाजारासाठी आलेल्या शेतीमाल विक्रेत्यांसह ग्राहकांचीही धावपळ उडाली. नांदगावमध्येही ढगाळ वातावरण होते.

गारांसह मुसळधार पाऊस

निफाड : तालुक्यातील चितेगाव, चेहडी, खेरवाडी या भागात काही ठिकाणी वादळ वाऱ्यासह गाराही पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी शेतात कांदे काढून साठवून ठेवले होते. कांद्याच्या चाळीतही पाणी शिरल्याने कांद्याचे नुकसान झाले. लासलगाव, विंचूर भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या भागातील कांद्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कळवणला अर्धा तास पाऊस

कळवण : कळवण परिसरात रविवारी सुमारे अर्धा तास पाऊस झाला. मात्र, दुपारपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. शेतकरी वर्ग प्लास्टिक कागद खरेदीला लागलेले दिसून आले. अचानक पावसाने आगमन केले. संततधार सुरू असल्याने शेतकरी, कष्टकरी वर्गाची मोठी तारांबळ उडाली.

वादळी वाऱ्यांमुळे आंब्याचे नुकसान

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटून ढगाळ हवामान तयार झाले. काही ठिकाणी वीजपुरवठा थोड्या वेळासाठी खंडित झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या कैऱ्या पडल्याने उत्पादकांचे नुकसान झाले आहे. नाशिकरोड, जेलरोड, शिंदे, पळसे, टाकळीरोड परिसरात शेतांमध्ये आंब्याचे भरपूर झाडे आहेत. जुन्या-नवीन कॉलन्यांमध्येही आंब्याची झाडे आहेत. वादळी वारा सुटल्याने अनेक ठिकाणी कैऱ्या पडल्या. तयार झालेल्या कैऱ्या बाजारात आणण्याचे नियोजन सुरू असतानाच हा फटका बसला.

‘अवकाळी’ने वाढली धास्ती

येवला : येवल्यास दुपारी तीन ते साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसान‍े शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकविला. मुखेड, पाटोदा, नगरसूल, राजापूर, अंदरसूल अशा सगळ्याच ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. रविवारच्या या निसर्गाच्या बदलेल्या कूसने आता पुढ्यात नेमकं काय वाढून ठेवल आहे? याची बळीराजाला चिंता लागली आहे.

देवळ्यात तिघे जखमी

कळवण : देवळा तालुक्यात दुपारी ३ वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी गारपीट व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विठेवाडी येथे दोन तर देवळा शिवारातील एका घराचे पत्रे उडून गेल्याने तीन जण जखमी झाले. प्रमिला हिरामण आहेर (३९), कुणाल हेमंत आहेर (६) आणि एकनाथ यशवंत सोनवणे (१९) अशी जखमींची नोवे आहेत. त्यांच्यावर देवळा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच उखा मोहन अहिरे यांच्या शेतातील पत्र्याचे शेड उडून विजेच्या तारांवर जाऊन पडले. शेतात काढून ठेवलेल्या कांद्यासह डाळिंब, मिरची, टमाटे, कोथंबीर, मेथी, कैऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान तहसीलदार कैलास पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांनी केली आहे.

देवळा मुसळधार, येवल्यात हलक्या सरी

देवळ्यातही धुव्वाधार पाऊस झाला असून, नुकसानीचा नेमका अंदाज येऊ शकलेला नाही. चांदवड शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली. मनमाडमध्ये दुपारी तीननंतर वादळी वाऱ्याने विक्रेते व ग्राहकांची धांदल उडवली. येवला शहर व तालुक्यात सव्वाचारच्या सुमारास काही ठिकाणी पाच मिनिटे पावसाचा हलकासा शिडकावा झाला. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे ढगाळ वातावरणामुळे धाबे दणाणले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

नाशिकमध्ये हलक्या सरी

शहरात दुपारपासून ढगाळ वातावरण होते. इंदिरानगर, सिडको परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर सायंकाळनंतर गारठा वाढला. पावसाच्या शक्यतेमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. उष्म्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले.

कांदा उत्पादक चिंतेत

निफाड : तालुक्यातील लासलगाव विंचूर परिसरात रविवारी अवकाळी पावसाने कहर केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याची स्थिती आहे अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान कांदा, द्राक्ष व डाळिंब पिकांचे झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धो-धो कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने जगाच्या पोशिंद्याच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. सरकारकडून तुटपुंजी मदत मिळत असतांना आता बँका, सरकारी, निमसरकारी संस्था, सोसायट्या यांच्याकडून शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे यांची चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे.

वादळी वाऱ्याचा जोर

निफाड : निफाड तालुक्यातील उगाव, शिवडी, वनसगाव भागात काही ठिकाणी पाऊस झाला. काही द्राक्ष उत्पादकांचे द्राक्ष काढणीचे काम सुरू होते. अचानक वादळ, वाऱ्यासह आलेल्या पावसमुळे त्यांची धावपळ झाली. सुमारे तीन तास सोसाट्याचा वारा वाहत होता. परिसरात वादळी रविवारी दुपारी दोन वाजेनंतर वाऱ्यासह ढगाळ हवामान होते. वेगवान वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले. सायंकाळी पाचच्या दरम्यान वातावरण निवळले. मात्र हवेचा झोत काही प्रमाणात सुरूच होता.

सातपूरला बत्ती गूल
सातपूर : सातपूर, अशोकनगर, श्रमिकनगर परिसरात सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान जोराचा वारा सुटला. पावसाच्या हलक्या सरी झाल्याने वातावरणात गारवा पसरला. महावितरण कंपनीने कोणतीही अनुचित घटना घडून नये म्हणून वीज पुरवठा खंडित केला. सायंकाळनंतर पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव चौफुलीवरील अपघातात दोन जण जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव चौफुलीवर दोन कंटेनर आणि स्विफ्ट कार यांच्यात रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अपघात झाला. कंटेनरच्या धडकेत रस्त्यावर ऑइल पसरल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. या अपघातात स्विफ्ट कार व दोन्ही कंटेनरचे नुकसान झाले असून, दोन जण जखमी झाले आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव चौफुलीवर कंटनेर (एमएच ४६ एएफ ३६७०, डीएन ०९ पी ९१९९) आणि ‌स्विफ्ट कार (एमएच १५, डीएम ७७७४) यांच्यात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले. कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने ऑइल रस्त्यावर पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच आडगाव पोलिस व अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहायाने रस्त्यावर पसरलेल्या ऑइलवर माती पसरविण्यात आली. दोन्ही कंटेनर ओझरकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ वक्तव्यावरून ‘सोशल’ गदारोळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

‘आरक्षणामुळे देशातील ब्राह्मण मुलं परदेशात जातात’, असे वक्तव्य पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात नुकतेच केले. त्यानंतर सोशल मीडियामध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत.

मुक्ता टिळक यांच्या या विधानाचा भारिप बहुजन महासंघ, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी निषेध केला आहे. टिळक यांचे विधान खोडसळपणाचे असून त्यातून समाजात तेढ निर्माण होईल, असे मत काही जणांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे, ब्राह्मण संघाने टिळक यांचे समर्थन केले आहे. टिळक यांनीही आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ मीडियाने लावल्याचे म्हटले आहे.

आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यावरून राज्यभरात मराठा, मुस्लिम, ओबीसी आदी समाजांनी मोर्चेही काढले. हे वातावरण शांत होत असतानाच टिळक यांच्या टिपणीनंतर मंथन सुरू झाले. टिळक यांच्या म्हणण्याचा आशय असा होता की, आरक्षण असल्यामुळे ब्राह्मण मुलांना भारतात रोजगार मिळत नाही. त्यांना परदेशात रोजगारासाठी जावे लागते. त्यावरच सोशल मीडियातून टीका झाली. भारतीय प्रशासन सेवेतील एकूणपैकी किती व्यक्ती ब्राह्मण समाजातील आहेत? एकूण मंत्र्यांपैकी किती मंत्री या समाजाचे आहेत? सरकारी संस्थांच्या एकूण अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी किती ब्राह्मण आहेत? आदी प्रश्न भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश डबरासे यांनी उपस्थित केले आहेत. तर आरक्षण वादी मंचने म्हटले आहे, की देशात आरक्षण राहणारच. टिळक यांनी पुणे महापालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा देऊन खुशाल परदेशात जावे. तसेच त्यांनी ‘Arctic Home of Vedas’ हे पुस्तक वाचावे. त्यात ‘ब्राह्मण भारतात परदेशीच आहेत’, असे म्हटले आहे.

लोकमान्य टिळकांनी कुणबी, तेली, तांबोळी यांना संसदेत प्रतिनिधित्व देण्यावरच प्रश्न उपस्थित केला होता, असे मत संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी मांडले आहे. मुक्ता टिळक यांनी या वक्तव्यातून आरक्षणाला छुपा विरोध केला आहे. आरक्षणाला विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध. हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. लोकमान्य टिळकांच्या मनातील सल महापौर टिळक यांनी बोलून दाखवली. त्यांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही टिळक यांच्यावर व्हिडिओच्याच माध्यमातून टीका केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये मुरतेय सूक्ष्म सिंचन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी मिळणाऱ्या अनुदानातून विभागातील नाशिक जिल्ह्यात सर्वांधिक शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर केला आहे. विभागातील १५ हजार २८१ पैकी निम्म्याहून अधिक म्हणजे तब्बल सात हजार ८७८ इतके लाभार्थी एकट्या नाशिक जिल्ह्यातील आहेत. या योजनेमुळे जिल्ह्यातील ५ हजार १४६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेले आहे.

शेतकऱ्यांना पाणी बचतीची सवय लागावी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून कमीत कमी पाण्यात पिक घेता यावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्याने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविली जाते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचा ६० व राज्याचा ४० टक्के इतका वाटा आहे. गेल्या वर्षात नाशिक विभागात या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती. नाशिक महसूल विभागातील मात्र स्वतंत्र कृषी विभाग असलेल्या नगर जिल्ह्यातही ९ हजार ६०५ इतक्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

कंपन्या मात्र नाखूश

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सूक्ष्म सिंचन संचाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येते. यापूर्वी मात्र ठिबक सिंचन संचाचे अनुदान व्यापाऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असे. त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी कंपन्यांनाच जास्त फायदा होत आला होता. सरकारने मात्र गेल्या वर्षापासून या योजनेचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी केल्याने ठिबक सिंचन संच उत्पादित करणाऱ्या कंपन्या नाखुष झाल्या आहेत. काही वर्षांपर्यंत ठिबकचा वापर वाढावा, यासाठी संबंधित कंपन्याच शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत होत्या. आता कंपन्यांनी यातून अंग काढून घेतले. तरीही सिंचन योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे.

सिंचन साक्षरतेत वाढ

विभागातील सर्वच जिल्ह्यातील शेतकरी सूक्ष्म सिंचनाला प्राधान्य देत असल्याचे या योजनेला मिळालेल्या प्रतिसादातून उघड झाले आहे. दरवर्षी हा प्रतिसाद वाढत आहे. दरवर्षी पाणी टंचाईचा कालावधी वाढू लागल्याने शेतकरी उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापरास प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्यांमधील सूक्ष्म सिंचनाची साक्षरता वाढत असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘न्यू स्टार’ने जिंकला आमदार सानप चषक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रभाग क्रमांक चारमध्ये आमदार बाळासाहेब सानप यांच्या सन्मानार्थ झालेल्या क्रिकेट स्पर्धेत न्यू स्टार इलेव्हन संघाने आमदार चषक जिंकला. ‘ओन्ली भाऊज्’ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी आयोजित या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच झाले. विजेत्या न्यू स्टार इलेव्हन संघाला १ लाख ११ हजार १११ रुपये व आमदार चषक देऊन सन्मानित करण्यात आले. उपविजेत्या ‘ओन्ली भाऊज्’ संघाला ७७ हजार ७७७ रुपये, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या आरसीसी संघाला ४४ हजार ४४४ रुपये व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी लक्ष्मण सावजी, नगरसेवक जगदीश पाटील, शांता हिरे, मच्छिंद्र सानप, पूनम सोनवणे, दामोदर मानकर, सचिन हांडगे, माजी नगरसेविका रुपाली गावंड आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सचिन पाटील, कुणाल पाटील, भारत पुराणिक, रोहित केणी, सचिन गायकवाड, नागेश मोरे, अनिल गायकवाड, दीपक कडाळे, हेरंभ मतवाड, कैलास पाटील आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ जणांना चावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महानगरपालिकेच्या निष्क्र‌िय कारभारामुळे उत्तमनगर परिसरात महाराष्ट्र दिनीच एका पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडून परिसरातील सुमारे पंधरा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. यात एका दीडवर्षीय बालकाचा समावेश आहे. यातील तिघा जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परिसरातील नागरिकांनी तब्बल सहा तास त्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला. ते हाती लागल्यानंतर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, सिडको विभागात वाढलेल्या या मोकाट जनावरांच्या व कुत्र्यांच्या प्रश्नाकडे ना नगरसेवकांचे लक्ष आहे, ना प्रशासनाचे. अशा प्रकारात एखाद्याचा जीव जाण्याची तर वाईट नगरसेवक व प्रशासन पाहत नाही ना, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सिडकोतील उत्तमनगर व राजरत्ननगर परिसरात सोमवारी एका कुत्र्याने मोठा धुमाकूळ घातला. अवघ्या सतरा महिन्यांची चेतना अशोक पाटील ही मुलगी, तिच्या दहावर्षीय चुलत बहिणीच्या कडेवर असताना अचानकपणे या कुत्र्याने चेतना ह‌िच्या पायाला चावा घेऊन त‌िला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेतनाच्या बहिणीने न डगमगता चेतनाची त्या कुत्र्यांपासून सुटका केली. यावेळी आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन या कुत्र्याला पळवून लावले. त्यानंतर या कुत्र्याने याठिकाणाहून पळ काढत परिसरातील प्राजक्ता प्रकाश कांबळे (वय ५ वर्ष), रोहित निंबा पाटील (७ वर्ष), हेमंत चंद्रहर्ष दोंदे (६ वर्ष), सोहम सचिन वाघ (४ वर्ष) यांना चावा घेवून गंभीर जखमी केले. या पिसाळलेल्या कुत्र्याने हाताला, पायाला अशा विविध ठिकाणी चावे घेतले असून, अन्य दहा बालकांनाही याच कुत्र्याने जखमी केल्याचे नागरिकांनी सांगितले. या कुत्र्याच्या चाव्यामुळे एखाद्याचा जीव सुद्धा जाण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात या कुत्र्याबद्दल प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अखेरीस परिसरातील नागरिकांनी नगरसेविका रत्नमाला राणे यांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी व भूषण राणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सिडको विभागात अशा प्रकारे अनेक मोकाट कुत्रे धुमाकूळ घालीत असून, यापुढे असे प्रकार होणार नाही यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

दहा वर्षांच्या अंकिताचे धाडस

अवघ्या सतरा महिन्यांची चेतना तिची दहावर्षीय चुलत बहीण अंकिता हिच्या कडेवर होती. यावेळी अचानकपणे या कुत्र्याने येऊन चेतना ह‌िच्या पायाला चावा घेऊन त‌िला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंकिताने अजिबात न घाबरता चेतनाला घट्ट पकडून ठेवले. यावेळी अंकिताने घाबरून चेतनाला सोडून दिले असते, तर कुत्र्याने तिला आणखी जखमी केले असते. यावेळी आसपासच्या लोकांनी धाव घेऊन त्या चेतनाची त्या कुत्र्यांपासून सुटका केली. त्यामुळे या चिमुकलीच्या धाडसाचेही कौतुक होत आहे.


नागरिकांची शोध मोहीम

राणे यांनी तातडीने महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोलवले. मात्र, तो कुत्रा सापडत नव्हता. नागरिकांनीही या कुत्र्याला पकडण्याचा संकल्पच केल्याने सुमारे दीड ते दोन हजार नागरिक अक्षरशः रस्त्यावर उतरून त्याचा शोध घेत होते. शेवटी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुत्र्यास पकडण्यात यश आले. कुत्रे पकडण्यासाठी हातात मिळेल ते दांडके, स्टम्‍प यांसारख्या वस्तू घेऊन नागरिक फिरत असल्याने याठिकाणी काही हाणामारीचा प्रकार झाला असावा असा संशय सुरुवातीला येत होता. अखेरीस त्या कुत्र्याला पकडल्यानंतर नगरसेविका राणे यांनी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे हे कुत्रे सुपूर्द केले.



चेतना व तिची चुलत बहीण अंकिता घराखाली खेळत होते. चेतना अंकिताच्या कडेवर असताना अचानक हे पिसाळलेले कुत्रे आले आणि चेतनला त्याच्याकडे ओढू लागले. अंकिताने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुत्र्याच्या जबड्यातून चेतनाचा पाय ओढण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. ही बाब नागरिकांच्या लक्षात आली आणि त्यांनी चेतनच्या पायाला कुत्र्याच्या जबड्यातून बाहेर काढले.

- अशोक पाटील, चेतनाचे वडील


सध्या सुट्टीचे दिवस असल्याने रोहित घराजवळ खेळत होता. अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्यावर हल्ला केला आणि त्याच्या पायाला चावा घेतला. रोहितच्या ओरडण्याने नागरिकांनी येऊन रोहितचा पाय कुत्र्याच्या जबड्यातून सोडविला. अशा मोकाट कुत्र्यांचा प्रशासनाने बंदोबस्त केला पाहिजे.

- रुपाली पाटील, रोहितची आई


सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेल्या या प्रकारावर अखेरीस पाच वाजेच्या सुमारास पडदा पडला. नागरिकांनी एकत्र येवून या कुत्र्यास पकडले. त्याने किमान सतरा ते अठरा लहानमुलांसह नागरिकांना चावा घेतल्याचे नागरिकांच्याच वतीने सांगण्यात आले आहे. कुत्र्याला पकडण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी वेळेवर धावून आले होते. मात्र ते सापडत नव्हते. प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी.

- भूषण राणे.

मटा भूमिका

पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एकाचवेळी तब्बल सतरा ते अठरा जणांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची घटना ही महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. बेवारस वा भटक्या कुत्र्यांचा विषय हा तसा सर्वव्यापी चिंतेचा बनला आहे. प्राणीमात्रांवर दया करणे वेगळे अन् सरसकट कोणत्याही भटक्या वा पिसाळलेल्या जनावरांना संरक्षण देणे वेगळे. दुर्दैवाने अलिकडे हे फॅडही जोमात आहे. भूतदयेच्या नावाखाली ही जमातही शेफारली असून त्याचा फटका बालगोपाळांना असा बसतो आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम पालिका नित्यनेमाने राबिवत असतानाही ही संख्या कमी होण्याऐवजी वाढतेय याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतेय. प्रशासनाने याबाबत अधिक दक्ष राहून या प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्फूर्तिगीतांनी नाशिकरोड चैतन्यमय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मंगल देशा पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असे वर्णन असलेल्या महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन व कामगार दिन शहरातील शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आदी ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभात फेरी, महाराष्ट्रगीताने परिसर दुमदुमला होता. ध्वजवंदनासह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांनाही अभिवादन करण्यात आले.

--

विभागीय आयुक्तालय

येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या आवारात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त रघुनाथ गावडे, उन्मेष महाजन, सुखदेव बनकर, नृसिंह मित्रगोत्री, प्रकाश वाघमोडे, तहसीलदार एस. डी. मोहिते, मंजूषा घाडगे यांच्यासह शिक्षण, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, भूजल सर्वेक्षण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

--

महापालिका विभागीय कार्यालय

महापालिकेच्या विभागीय कार्यालयात नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नगरसेविका ज्योती खोले, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, श्याम खोले आदींसह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

--

समाजकल्याण कार्यालय

नाशिकरोड ः समाजकल्याण विभागाच्या नंदिनी पुलाजवळील मुख्य कार्यालयात प्रादेशिक उपायुक्त काशीनाथ गवळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेंद्र कलाल, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर, नंदलाल पाटील, एस. बी. त्रिभुवन, आर. डी. देवरे, अनिल पाटील, गणेश पवार, नंदा रायते, सविता गवारे, सरिता रेड्डी आदी उपस्थित होते.

--

नाशिकरोड पोलिस ठाणे

येथे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सहाय्यक निरीक्षक सुदाम भुजबळ, मंगेश मजगर, उपनिरीक्षक राकेश शेवाळे, भीमराज गायकवाड आदींसह अन्य कर्मचारी, तसेच निवृत्त पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

--

आदर्श विद्यामंदिर

येथील समता समाज विकास संस्था संचालित आदर्श विद्यामंदिर या शाळेत संस्थेच्या ऑनररी सेक्रेटरी प्राचार्या मनीषा विसपुते यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थापक रमेशचंद्र औटे, शालेय सन्वयक रविकिरण औटे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

---

बिटको कॉलेज

नाशिकरोड ः येथे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपप्राचार्य डॉ. डी. जी. बेलगावकर, प्रा. सुरेंद्र घाटपांडे, प्रा. डॉ. सुनील जोशी, डॉ. दिलीप लोंढे, प्रा. विजय सुकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाशिकरोड केंद्रातील प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर व सीनिअर कॉलेजांतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांना उन्मेष या वार्षिक विशेषाकांचे वितरण करण्यात आले.

--

दराडे यांचा सत्कार

नाशिकरोड ः महापालिकेचे नाशिकरोडचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांना उत्कृष्ट कामकाजाबद्दल महाराष्ट्र दिनी गौरविण्यात आले. महापालिकेतील कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. आरोग्य विभागातील सर्वांच्या सहकार्याने नाशिकरोडला स्वच्छतेचे काम सुरू राहील, असे दराडे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मृत्यूनंतरही बळीराजाची सरकार दफ्तरी परवड

$
0
0

आत्महत्या महिलेची, दाखवली पुरुषाची

नाशिक : शेतकरी आत्महत्यांबाबत सरकारी यंत्रणा किती संवेदनशील आहे, याचा ‘आदर्श` वस्तुपाठच महसूल विभागाने राज्यासमोर उभा केला आहे. शेतकरी कुटुंबातील एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असताना चक्क पुरुषाने आत्महत्या केल्याचा अजब अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांच्या या कुचेष्ठेची जिल्हा प्रशासन काय दखल घेते याकडे आता लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात चालू वर्षात ३० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. करंजगाव (ता. निफाड) येथे २७ एप्रिल २०१७ रोजी अनिता अंबादास चव्हाण (वय ४३) या महिलेने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. चालू वर्षातील पहिलीच महिला शेतकरी आत्महत्या म्हणून तिची नोंद होणे अपेक्षित होते. परंतु, अनिता यांच्या नावाऐवजी चक्क अनिल अंबादास चव्हाण या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा अहवाल तलाठ्याकडून पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शेतकरी आत्महत्येची घटना घडली की तलाठी त्याबाबतची माहिती घेऊन प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयाला पाठवितो. हाच अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला जातो. या अहवालामध्ये अनिता ऐवजी अनिल असा नामोल्लेख केल्याने त्याच नावाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टंचाई शाखेतही करण्यात आली आहे. महिलेऐवजी पुरुषाच्या नावाची नोंद होत असेल, तर महसूलमधील यंत्रणा अशा प्रकरणांबाबत किती संवेदनशील आहे याचाच प्रत्यय येतो. या महिलेच्या एकत्रित कुटुंबाकडे सव्वा एकर जमीन आहे. महिलेच्या पतीचा दीड वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला असून, तिच्या पश्चात मुलगा आणि मुलगी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘मटाने चूक आणून दिली निदर्शनास

जिल्हा प्रशासनाच्या नोंदीमध्ये झालेली ही चूक महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधीच्या लक्षात आली. टंचाई शाखेतून अनिल अंबादास चव्हाण असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती मिळविण्यासाठी तहसीलदार विनोद भामरे यांच्याशी वारंवार संपर्क साधला. परंतु, भामरे यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. करंजगाव येथील सरपंचांकडून माहिती घेतली असता महिलेचे नाव पुढे आले. ही बाब निफाड तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्याबाबत खातरजमा केली. त्यानंतर तशी दुरुस्ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.

चार दिवस अनभिज्ञच!

अनिता चव्हाण यांची आत्महत्या २७ एप्रिलला झाली. घटना उघडकीस आल्यानंतर सहा ते १२ तासांत त्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेला प्राप्त होणे गरजेचे आहे. परंतु, चव्हाण यांच्या आत्महत्येची माहिती तब्बल चार दिवसांनतर जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाली. या चार दिवसांतही आत्महत्या पुरुषाची की महिलेची हे प्रशासनाच्या लक्षात येऊ नये, यापेक्षा दुसरी शोकांतिका ती काय असू शकते?

शेतकरी आत्महत्या (मे पर्यंतच्या)

२०१७ - ३०, २०१६- ४१, २०१५- १९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णांसाठी साहित्याचे वर्षश्राद्धानिमित्त वाटप

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिडको

वर्षाश्रद्धाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने धार्मिक विधी करण्यापेक्षा त्या पैशातून रुग्णांना उपयोगी ठरू शकणाऱ्या सिडकोतील जनकल्याण येथे रुग्णांसाठी विविध वस्तूंचे वाटप केले. मालेगाव तालुक्यात पिंपळगाव (दाभाडी) येथील कै. भास्करराव वसंतराव पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आला.

भास्कर पवार यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रमात धार्मिक विधीसाठी जेवणावळी करून पैसा खर्च करण्यापेक्षा रुग्णांसाठी काही मदत करता येते का? याचा विचार पवार कुटुंबीयांनी केला. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण येथे रुग्णांसाठी पाच व्हीलचेअर, पाच वॉकर, पाच कमोड चेअर या वस्तू देवून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. आयुर्वेदाचार्य डॉ. दिनेश पवार, त्याचे भावंडे व कुटुंबीय यांनी मिळून प. पू. देवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबिवला. या रुग्णोपयोगी वस्तू आपल्या वडिलांचे स्मरणार्थ भेट दिल्याने समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी श्याम अहिरे, दत्ताजी राळेगावकर यांनी वस्तू केंद्राच्या वतीने स्वीकारल्या. डॉ. पवार यांचा ‘बिल्वपत्र’ पुस्तक देऊन जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह मदन भंदुरे यांनी सत्कार केला. अनिल चांदवडकर यांनी पवार कुटुंबीयांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी चंद्रशेखर विंचूरकर, अशोक काकती, किरण क्षत्रिय, अभ्यासिकेच्या सुशीला आंदोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ भारत अभियानाला बँकांचा ठेंगा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिल्याने सर्वच वर्गातून त्याचे स्वागत झाले. यात हगणदारीमुक्त शहर, गाव अशी संकल्पनाच सरकारकडून राबविण्यावर भर दिला गेला. परंतु, या महत्त्वाकांक्षी अभियानाशी बँकांना काहीही देणेघेणे नाही, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.

शहरात असलेल्या अनेक सरकारी व खासगी बँकांमध्ये शौचालयांचीच व्यवस्था नसल्याने ग्राहकांची परवड होत आहे. विशेष म्हणजे सरकारी बँकांमध्ये पेन्शनधारकांना शौचालय उपलब्ध होत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. स्वच्छ भारत अभियानाचा आदेश सर्वच बँकांना लागू करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. स्वच्छ भारत अभियनाची सुरूवात पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर सर्वच क्षेत्रातून स्वागत करण्यात आले होते. यामुळे मेट्रोसिटीचे वेध लागलेल्या शहरांमध्ये आरोग्य विभागाकडून स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणीसाठी यंत्रणा जोमाने कामाला लागली. त्यात शहर व ग्रामीण भागातही शासकीय यंत्रणा हगणदारीमुक्त परिसर करण्यासाठी अथक प्रयत्न करतांना दिसत आहेत. असे असतांना मात्र सरकारी व खासगी बँकांना स्वच्छ भारत अभियान लागू नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात सरकारी व खासगी बँकांच्या अनेक शाखा आहेत. सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टीकोन ग्राहकांचा बदलल्याने सरकारी बँकांमध्ये रोजच गर्दी होत असते. परंतु, ग्राहकांना सरकारी बँकांमध्ये अधिक वेळ द्यावा लागत असतांना शौचालयाची व्यवस्थाच नसल्याने मनस्ताप सहन करण्याची वेळ येत असते. विशेष म्हणजे पेन्शनधारकांना अचानक शौचलयाची गरज पडल्यावर तात्काळ उपलब्ध होत नसल्याने अशा प्रसंगी जावे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होत आहे.

ज्येष्ठांची सर्वाधिक कोंडी

बहुतांश शासकीय योजनांसाठी सरकारी बँकांमध्ये खाते उघडणे अनिर्वाय झाले आहे. यामुळे सरकारी बँक ग्राहकांची संख्या वेगाने वाढली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यातील ज्येष्ठ नागरिकांना किमान नैसर्गिक विधीसाठी शौचालयांची सुविधा असणे गरजेचे आहे. मात्र, या गंभीर मुद्याकडे सरकारी बँकांची यंत्रणा लक्ष देत नसल्याने अनेकांना नैसर्गिक विधीसाठी वेळ काढण्यापलिकडे पर्यायच राहत नसल्याने त्यांची परवड होते. हगणदारीमुक्त शहर किंवा गाव योजना राबवितांना बँकांमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारी तसेच खासगी बँकांमध्ये ग्राहकांसाठी सुलभ शौचालयांची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करण्याची वेळे येते. शासकीय यंत्रणेने या प्रश्नी लक्ष घालण्याची गरज आहे.
- महेश कुलकर्णी, सरकारी बँकग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाकिस्तानची संपूर्ण जगाला डोकेदुखी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पाकिस्तानच्या कारवाया लक्षात घेऊन भारताने सतर्क राहणे गरजेचे आहे. केवळ भारतालाच नव्हेतर अन्य देशांनीही पाकिस्तानच्या कुरापतीचा त्रास होत आहे. १९४७ पूर्वी काहीही नसलेला पाकिस्तान आता संपूर्ण जगाला डोकेदुखी ठरत आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल व्ही. के. चतुर्वेदी यांनी केले. माजी सैनिक संघातर्फे झालेल्या माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते.

भारतीय माजी सैनिक संघाचे अध्यक्ष फुलचंद पाटील, इंद्रेशकुमार, गोविंदराव बस्ते, विजय पवार, नगरसेवक दिनकर पाटील आदी उपस्थित होते. चतुर्वेदी म्हणाले, की भारताला पाकिस्तान आणि चीनकडून अधिक धोका आहे. चीनने उत्पादित केलेल्या ५८ टक्के वस्तूंची भारतात विक्री होते. त्यामुळे चीनची ताकद कमी करायची असले तर ही बाजारपेठ चीनला मिळू देऊ नये. पाकिस्तानकडून अवैध धंदे, हरकती कायम सुरू असून त्यांच्या या हरकती कधीच थांबणार नाहीत, असे चिन्ह आहे.

इंद्रेशकुमार म्हणाले, माजी सैनिकांना येणाऱ्या अडचणी, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक पातळीवर त्यांचा सुरू असलेला संघर्ष यावर त्यांनी भाष्य केले. संघाच्या मान्यवरांनी माजी सैनिकांना येत असलेल्या अडचणी मांडल्या. राजलक्ष्मी चौधरी व दीपाली पवार यांनी सूत्रसंचालन केले. मेघश्याम सोनवणे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमनाने आडगावकर त्रस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव गावठाण व मळे परिसरामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने मध्यरात्री १२ ते पहाटे ५.३० या वेळेत भारनियमन केले जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळा असल्याने नागरिक अगोदरच उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. शिवाय मध्यरात्रीच्या वेळी चोऱ्या होण्याची भीती असते. त्यामुळे मध्यरात्रीचे भारनियमन बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दृष्टीने कामकाज सुरु आहे. महापालिका हद्दीत २४ तास वीजपुरवठा देण्याचे ध्येय असतांना आडगावमध्ये मात्र महावितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. पण हे भारनियमन सुरू असतांना सोमवार, मंगळवार, बुधवारी रात्री १२ ते पहाटे ५.३० या यावेळेत वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आलेला असतो. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

वीज नसल्याने नागरिकांना घरात झोपणे कठीण झाले आहे. अनेक नागरिक रात्री झोपण्यापूर्वी घरात फरशीवर थंड पाण्याचा शिडकावा करतात. त्यानंतर आंथरूण टाकून झोपतात. काही नागरिक घराच्या गच्ची किंवा गॅलरीत झोपतात. मात्र, अशा घरांमध्ये चोरट्यांकडून दरोडे टाकले जाण्याची भीती नागरिकांना सतावत आहे.

भारनियमनाच्या वेळा ठरलेल्या

याबाबत परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीच्या आडगाव कार्यालयात विचारणा केली. त्यावर ‘भारनियमनाच्या वेळा आमच्या वरिष्ठांनी निश्चित केलेल्या आहेत, त्यात आम्ही कोणताही बदल करू शकत नाही, असे उत्तर देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, महावितरणने रात्रीचे भारनियमन बंद करण्याची मागणी आडगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आडगावात रात्री सुरू असलेल्या भारनियमनामुळे सर्वच रहिवाशी त्रस्त झाले आहेत. रात्री अंधाराचा गैरफायदा घेत चोऱ्या, दरोडे यासारख्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. भारनियमनाला विरोध नाही पण ते मध्यरात्री करू नये.
- रवींद्र धारबळे, स्थानिक रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images