Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हिरवळीवर दाटल्या ‘पार्कातल्या कविता’

0
0

हिरवळीवर दाटल्या ‘पार्कातल्या कविता’

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज स्मारकातील हिरवळ... कोंडाळं करून कवी बसलेले... एकेक कवी आपल्या कविता ऐकवतो आहे. त्याला दाद देण्यासाठी पार्कात रसिकांचीही गर्दी जमलेली आहे. वाह! क्या बात है, म्हणून प्रत्येकाला दाद मिळतेय... त्यामुळे कवींचा उत्साहदेखील वाढतोय. अशा माहोलमध्ये आगळ्यावेगळ्या पार्कातल्या कवितांची मैफल पार पडली.

मुंबई, ठाणे, पुणे येथील आपले प्रयोग गाजवून ‘पार्कातल्या कविता’ या आगळ्यावेगळया काव्यमैफलीचा सहावा प्रयोग शनिवारी कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता. मुळात एखादी कविता ही त्या कवीकडून सादर होताना ऐकणे हा रसिकांना मुग्ध करणारा अनुभव असतो. हाच अनुभव नाशिककरांना मिळाला.

पार्कातल्या कविता या बहारदार काव्यमैफलीची संकल्पना स्वरूपा सामंत आणि विजय उतेकर यांची होती. निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय अनौपचारिक पद्धतीने ही काव्यमैफल निवडक कवींच्या काव्य सादरीकरणाने खुलली. त्यात कमलाकर देसले, सुप्रिया जाधव, प्रथमेश पाठक, जयश्री कुलकर्णी, सत्यजित पाटील, नीलेश गायधनी, अभिजित शिंदे, आकाश कंकाल, तसेच संतोष वाटपाडे या कवींनी स्वरचित दोन दोन रचना सादर केल्या. गझल उन्मेष पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध गझलकार सदानंद बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकेचा महावितरणला शॉक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या विरोधात फसवणुकीचा खटला दाखल करणाऱ्या महावितरण कंपनीलाच शॉक देण्याची तयारी बँकेने सुरू केली आहे. जिल्हा बँकेकडे जमा होणारा वीजबिलांचा भरणा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असतानाही महावितरणने जिल्हा बँकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कराराचा भंग झाला नसतानाही महावितरणने जिल्हा बँकेची बदनामी केली असल्याचा ठपका जिल्हा बँकेने ठेवला असून, आता महावितरणविरोधातच कारवाईची तयारी सुरू केली आहे. महावितरणने जिल्हा बँकेची बदनामी केली म्हणून जिल्हा बँकेकडून मानहानीचा खटला दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरण आणि जिल्हा बँकेतील संघर्ष वाढणार आहे.

नाशिक जिल्हा बँक सध्या आर्थिक अडचणीत असून, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासही पैसा नाही. जिल्हा बँकेकडे खाते असलेल्या शिक्षकांचे पगारही थकले आहे. त्यातच महावितरणच्या ग्राहकांचा वीजबिल भरणा जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये केला जातो. आर्थिक अडचणींमुळे जिल्हा बँकेकडे जमा झालेला ३३ कोटींचा वीजबिल भरणा बँकेला महावितरणाला वेळेत देता आला नाही. मार्च व एप्रिल अशा दोन महिन्यांची रक्कम थकल्याने महावितरण कंपनीने जिल्हा बँकेविरोधात थेट पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारेच जिल्हा बँक अध्यक्षांसह तिघांवर फसवणुकीचे दोन गुन्हे मुंबई नाका पोलिस स्टेशनला दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अडचणींत वाढ झाली आहे.

महावितरण आणि जिल्हा बँकेत झालेल्या करारानुसार महावितरणाचा भरणा जिल्हा बँकेला भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असल्याचा दावा जिल्हा बँकेने केला आहे. त्यामुळे करारानुसार पैसे चुकविण्यासाठी जिल्हा बँकेला अजून मुदत असतानाही महावितरणने उतावळेपणा करीत जिल्हा बँकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची बदनामी झाल्याचे सांगत अध्यक्ष नरेंद्र दराडे आणि सीईओ यशवंत शिरसाट यांनी बैठक घेऊन महावितरणविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महावितरणच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे.

...तर वसुली थांबवणार

जिल्हा बँकेने जिल्ह्यातील ७३ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत. एक हजार शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाईही सुरू केली आहे. जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी केला आहे. राज्य सरकारने जिल्हा बँकेला काही प्रमाणात आर्थिक मदत केली, तर शेतकऱ्यांकडील वसुली थांबवली जाईल, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. त्यामुळे शासनाकडे आमचा पाठपुरावाही सुरू असल्याचा दावा दराडे यांनी केला आहे.


मुख्यमंत्र्यांची मंगळवारी भेट

जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळविण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ आतापर्यंत तीनदा मुुख्यमंत्र्यांकडे जाऊन आले. परंतु, मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ मिळत नसल्याने संचालक माघारी फिरले. संचालकांना भेटण्यासाठी शनिवारचा वेळ दिला होता. परंतु, शनिवारीही बोलावणे आले नाही. आता जिल्हा बँकेच्या संचालकांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंगळवारचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

०००

शिक्षकांचे उपोषण स्थगित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुमारे चार ते पाच महिन्यांपासून जिल्हा बँकेत शिक्षकांचे अडकून पडलेले वेतन मिळावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांतर्फे जिल्हा बँकेसमोर सुरू असणारे बेमुदत उपोषण आश्वासनाअंती अखेर स्थगित करण्यात आले आहे.

आमदार सुधीर तांबे यांनी शनिवारी उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनाही ते भेटले. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्नी शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी येत्या आठ दिवसांत रखडलेले वेतन राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी हे उपोषण सध्या स्थगित केले आहे.

शिक्षक कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या या वेतनामुळे आयकर विभागाचे चेक, पॉलिसी, गृहकर्ज आदींचे हप्ते, शालेय पोषण आहाराची रक्कम आदी व्यवहार ठप्प झाले आहेत. घरातील आजारपण, लग्नकार्य, शालेय प्रवेश आदी गरजेच्या कामांसाठीही शिक्षकांची परवड होते आहे. या मुद्याचा सातत्याने पाठपुरावा करूनही शिक्षकांच्या हाती केवळ आश्वासनेच पडली आहेत. त्यामुळे ४ एप्रिलपासून विविध संघटनांनी एक होत बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, शनिवारी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या भेटीनंतर शिक्षकांनी हे उपोषण स्थगित केले आहे. यावेळी आमदार डॉ. तांबे यांच्यासह कोंडाजीमामा आव्हाड, फिरोज बादशहा, सायली कुलकर्णी, तारा घोटेकर, स्नेहल आपटे, संजय पाटील, बी. के. सानप, किशोर पालखेडकर, आर. टी. जाधव आदी उपस्थित होते.

या उपोषणात शशांक मदाने, आर. डी. निकम, के. के. अहिरे, साहेबराव कुटे, दिनेश अहिरे, नीलेश ठाकूर, सुभाष भामरे, अरुण जाधव आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण राज्य सध्या कडक उन्हाच्या चटक्यांमुळे होरपळून निघाले असून, नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीही तशीच आहे. शहरात शनिवारी ३९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यापासून तापमानाने सातत्याने चढता क्रम धरला असून, वाढत्या तापमानाचा फटका नाशिककरांना बसत आहे. वाढत्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारी रस्तेही निर्मनुष्य होत असल्याचे चित्र शहरात आहे.

हिवाळा संपल्यानंतर मार्चअखेरीसच शहर तप्त होण्यास सुरुवात झाली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जरासे कमी झालेले तापमान हळूहळू चढत गेले. त्यानंतर तापमानाची चाळिशी उलटून नाशिककरांना पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. या परिस्थितीनंतर मे महिन्याच्या सुरुवातीपासून ३८ अंशांच्या पुढे तापमान वर चढत आहे. हे तापमान ५ मे रोजीदेखील चाळिशी पार करून ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. शनिवारी (दि. ६) ३९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लहान-मोठ्या आरोग्याच्या समस्यांनीही यामुळे डोके वर काढले आहे.

दैनंदिन व्यवहार मंदावले

सध्या लग्नाच्या तिथी असून, खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. परंतु, उन्हामुळे दुपारची वेळ टाळली जात आहे. सायंकाळी ऊन कमी झाल्यावर खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. व्यवसायिकांवरही त्याचा होत असून, दुपारच्या वेळी कोणी फिरकतही नसल्याने व्यवसाय ठप्प असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.

पक्ष्यांचे हाल

प्रखर उन्हामुळे पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अपुऱ्या पाणीसाठ्यांअभावी त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, त्यासाठी नागरिकांनी गच्चीवर, खिडकीत पाणी ठेवावे, असे आवाहन अनेक सामाजिक संस्थांकडून केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर तेच छेडिता, चित्र उमटले नवे...

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्यासह ९ चित्रकारांना प्रत्यक्ष मॉडेलवरून व्यक्तिचित्रण लाइव्ह साकारताना पहाण्याची दुर्मिळ संधी शनिवारी नाशिककरांना मिळाली. सतारवादन करताना उद्धव उष्टुरकर आणि तबलावादन करताना नितीन पवार यांचे व्यक्तिचित्र वासुदेव कामत यांच्यासह दोघा कलाकारांनी चितारले. नाशिककरांच्या दृष्टीने हा दुर्मिळ योग होता. अष्टुरकर आणि पवार आपापली वाद्ये वादन करीत होते आणि चित्रकार त्यांची चित्रे काढत होते असे हा योग जुळून आला होता.

पोट्रेट आर्टिस्ट ग्रुपच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुर्तकोटी शंकराचार्य न्यास येथे हा कार्यक्रम झाला. सकाळी १० वाजता ज्येष्ठ शिल्पकार अरूणा गर्गे यांच्या हस्ते सोहळ्याचे उद‌्घाटन झाले. यावेळी वासुदेव कामत यांनी वास्तव व्यक्तिचित्रणाकडे बघण्याचा चित्रकारांचा दृष्टीकोन हळूहळू लुप्त होत चालला असून त्यामुळे चित्रकला वेगळ्याच दिशेने जात असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. सकाळी ज्येष्ठ चित्रकार वासूदेव कामत, मनोज सकळे व स्नेहल पागे हे तीनही चित्रकार अनोख्या थिमवर आधारीत लाइव्ह पोट्रेट पेंटिंग प्रत्यक्ष साकारले. तर सायंकाळी ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या संतजीवनावर आधारीत ‘मोगरा फुलला’चित्र माल‌िकेचा व्याख्यानपर स्लाईड शो प्रदर्शित झाला.

आजचे कार्यक्रम

रविवार, ७ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजता या वर्षाचे दर दोन महिन्यात निवडल्या गेलेल्या सहा चित्रकारांच्या अंतीम फेरीचे लाइव्ह पोट्रेटस साकारण्यात येणार आहेत. सायंकाळी. ४ ते सायंकाळी ६ वाजता वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम येणाऱ्या चित्रकारास ग्रॅण्डप्राईज चे स्मृतीचिन्ह व ७५००० रूपये, व्दितीय विजेत्यास ५०,००० रूपये तर तृतीय विजेत्यास २५००० रूपये आणि उर्वरीत तीन चित्रकारांना प्रत्येकी १५००० रूपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातील डॉ. जगन्नाथ वाणींचे निधन

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील विधायक चळवळीतील अग्रणी डॉ. जगन्नाथ वाणी (वय ८३) यांचे शनिवारी (दि. ६ मे) कॅनडामध्ये भारतीय वेळेनुसार सकाळी १०.२२ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. कॅनडामधील कॅलगरी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ केले यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

खान्देशात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांनी डॉ. वाणी सर्वांना परिचित होते. त्यांना २०१२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता. ‘देवराई’ या मराठी चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली आहे. काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यावर उपचारांनी मात करीत चार ते पाच वर्षे त्यांनी काढली. अशाही अवस्थेत ते मायदेशी येऊन संस्थेचे कामकाज पाहत होते. विविध सार्वजनिक कार्यक्रमांत ते हिरिरीने सहभागी होत असत. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी कमलिनी वाणी यांचे निधन झाले. डॉ. वाणी यांच्या आजारपणात त्यांची बहीण पुष्पलता शिरुडे आणि बंधू चंद्रकांत केले नुकतेच त्यांना कॅनडात जाऊन भेटले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच डॉ. वाणी यांनी जगाचा निरोप घेतला.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले

डॉ. वाणी हे राष्ट्रसेवा दलाचे सैनिक होते. त्यांच्यावर सेवा दलातून झालेल्या संस्काराचे त्यांनी सोने केले. परदेशात स्थायिक असूनही मायदेशाकडे अर्थात धुळ्याकडे त्यांचे नेहमी लक्ष असे. त्यांनी स्थापन केलेली वैशिष्ट्यपूर्ण संस्था ही त्याचीच पावती आहे. डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या रूपाने एक बहुआयामी व विधायक दृष्टीचे व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना खान्देशातून व्यक्त होत आहे.

डॉ. वाणींचा अल्प परिचय

- डॉ. वाणी यांनी शालेय शिक्षण धुळ्यात, उच्चशिक्षण पुण्यात व विद्यावाचस्पती ही पदवी कॅनडात घेतली.

- धुळ्यातील कृषी महाविद्यालय आणि पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमधील कालखंड सोडला तर त्यांची प्राध्यापक म्हणून कारकीर्द कॅनडातच गेली.

- १९९६ मध्ये ते कॅलगरी विद्यापीठातून निवृत्त झाले.

- २०१२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ या कॅनडाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही विमाशास्त्रीय विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी चालना दिली.

- मनोरुग्णांसाठी व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडात अनेक उपक्रम राबविले.

- का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, स्किझोफ्रेनिया सोसायटीची स्थापना त्यांनी पुण्यात केली.

- शारदा नेत्रालय, बधभ्र पुनर्वसन संस्था असे विविध उपक्रम सुरू केले.

- कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी संस्थेची स्थापना केली.

- कॅलगरीत जागतिक संगीत अभ्यासक्रमदेखील त्यांनी सुरू केला.

- कॅनडात महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली.

- जनजागृतीसाठी ‘देवराई’, ‘एक कप च्या’ आदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

- अनेक ग्रंथ प्रकाशन, अनेकविध पुरस्कार हे त्यांचे संचित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानामध्ये ‘कवितालय’चे दालन खुले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या १७६ वर्षांमध्ये अनेक कवींच्या कारकीर्दीने गाजलेले सार्वजनिक वाचनालय त्यांच्या कवितांना मात्र इतके दिवस पारखे होते. या कवींच्या कविता आजपर्यंत कधीही सार्वजनिक वाचनालयाच्या अंगणात खेळल्या नाहीत, परंतु, आता मात्र या कवींसह शहरातील कवींसाठी वाचनालयाने नवे दालन खुले करून दिले असून, ‘कवितालय’ या शीर्षकाने या शोकेसचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

वाचनालयाच्या देवघेव विभागात ‘कवितालय’ या शोकेसमध्ये शहरातील कवींच्या कविता दर आठवड्याला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. सावानाच्या कार्यकारिणी सभेत या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार बालकवींच्या स्मृतिदिनी ज्येष्ठ कवी शरद पुराणिक यांच्या हस्ते या शोकेसचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमात शहरातील कवी उत्स्फूर्तपणे सहभागी होतील, असे प्रतिपादन यावेळी पुराणिक यांनी केले. उपाध्यक्ष किशोर पाठक यांनी उपक्रमाची माहिती दिली. दर आठवड्याला निवडक चार ते पाच कविता प्रसिद्ध केल्या जातील. कवींनी आपल्या कविता सावानात आणून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते करुणासागर पगारे, अॅड. अशोक बनसोडे, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष अॅड. अभिजित बगदे, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, शंकरराव बर्वे, अॅड. भानुदास शौचे आदींसह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

या कविता झळकल्या

उपक्रमाच्या प्रारंभी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ‘जाग’ व ‘क्रांतीचा जयजयकार’, कवी चंद्रशेखर गोरे यांची ‘गोदागौरव’, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘सागरास’, बाबूराव बागूल यांची ‘वेदांआधी तू होतास’, तर बालकवींची ‘औदुंबर’ या कविता शोकेसमध्ये लावण्यात आल्या आहेत.

काव्यसंग्रह प्रकाशित करणार

‘कवितालय’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या कवितांचा वर्षाअखेरीस कवितासंग्रह काढणार असल्याचे सूतोवाच यावेळी कवी किशोर पाठक यांनी केले. कवी पाठक हेच या कवितासंग्रहाचे संपादन करणार असल्याने तो संवाद दिवाळी अंकाइतकाच अंक दर्जेदार राहील, असा आशावाद व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस मार्गांवर सिटी बस बंद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तोट्यात चालेल्या सिटी बस बंद करण्याचा निर्णय राजकीय दबावापोटी एसटीने मागे घेतला असला, तरी ही सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या निर्णयावर महामंडळ ठाम आहे. एसटीने आता शहरातील विविध मार्गांवरून धावणाऱ्या १८० बसपैकी ४० बस बंद केल्या असून, २५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात बदली केली आहे. दिवसभरात ४२ हजार किलोमीटर धावणाऱ्या या बस आता शहरातून केवळ ३३ हजार किलोमीटर धावणार असल्यामुळे सिटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

गेल्या सहा वर्षांत १२५ कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने याअगोदर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा तोटा भरून द्यावा, असे सांगत १ फेब्रुवारी रोजीच ही सेवा बंद करण्याचे नाशिक महापालिकेला कळविले होते. त्यानंतर अडीच महिने उलटूनही यावर काहीच निर्णय न झाल्यामुळे एसटीने पुन्हा हालचाली केल्या व १ मेपासून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजकीय दबाव वाढला, तर महापालिकेने हात झटकले. नंतर एसटीने एकाच वेळी सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला. पण, टप्प्याटप्प्याने ही सेवा बंद करून तोटा कमी करण्याचा प्रयत्न एसटीने सुरू केला आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे.

एसटीने बंद केलेल्या या बसेसमुळे शहरातील तोट्यात चाललेल्या मार्गांवरील वाहतूक यामुळे बंद होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी बसपासचा विषयसुद्धा उपस्थित होणार आहे. आज शहरात ३५ हजार पासधारक आहेत. त्यातील कोणते कमी होतील, याचा आकडा एसटीने अद्यापपर्यंत दिला नसला, तरी बंद झालेल्या मार्गांवरील पास यापुढे दिले जाणार नसल्याचे स्पष्ट आहे.

--

‘त्या’बस धावणार जिल्ह्यात

बंद केलेल्या ४० सिटी बसेस आता जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवर धावणार आहेत. त्यात काही बदल केल्याचे बोलले जात आहे. या बसेसमधून काही बसेस नाशिक तालुक्यात, तर इतर बसेस या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांकडे वळविण्यात आल्या आहेत.

---

१८० बसपैकी ४० बस कमी केल्या असून, २५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात बदली केली आहे. दिवसभरात ४२ हजार किलमीटर धावणाऱ्या या बसचे अंतरही कमी होणार आहे. जे मार्ग तोट्यात होते, तेथील सिटी बस आता धावणार नाहीत.

-यामिनी जोशी, विभाग नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्याने साडेचार हजार शौचालये

0
0

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीसाठी महापालिकेला प्राप्त झालेल्या १० कोटी ४१ लाख निधीपैकी ३ कोटी ३८ लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासनाने शहरातील सर्वेक्षणात डिमांड आलेल्या साडेचार हजार नागरिकांना शौचालय उभारणीसाठी निधी देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या सर्वांना पहिला सहा हजारांचा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांची संख्या दहा हजारांच्या वर जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरात ६,४४६ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा सर्वेक्षण केले असता त्यात ४,६९४ शौचालयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वांना शौचालय मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेकडे शिल्लक असलेल्या साडेतीन कोटींमधून त्यांना पहिला हप्ता दिला जाणार आहे. दुसऱ्या सर्वेक्षणात पंचवटीतून सर्वाधिक १६२० शौचालयांची मागणी आली आहे. त्यापाठोपाठ सातपूर ७५०, नाशिकरोड ७३८, सिडको ३४८, नाशिक पूर्व १२०, नाशिक पश्चिम ३१८ शौचालयांची डिमांड आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहायक कक्ष अधिकाऱ्यास अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहिती अधिकार अधिनियमानुसार द्वितीय अपीलाची सुनावणी सुरू असताना सदर केस अपीलात काढण्यासाठी तसेच केसचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी १० हजाराची लाच घेणाऱ्या सहायक कक्ष अधिकाऱ्यास धुळे येथील अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने अटक केली. राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठातच हा प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

रवींद्र शामराव सोनार (३४) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सहायक कक्ष अधिकारी असलेल्या सोनार यांच्याकडे सध्या प्रभारी कक्ष अधिकारीपदाचे काम सोपवण्यात आले आहे. लाचखोरीबाबत तक्रार करणाऱ्या तक्रारदार धुळे येथील शाळेत प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम पाहतात. त्यांच्या शाळेसंदर्भात राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठात सुनावणी सुरू आहे. माहिती अधिकाराच्या अनुषंगाने द्वितीय अपील खंडपीठात पोहचले आहे. मात्र, सदर प्रकरणात २५ हजार रूपयांचा दंड न ठोठवता हे प्रकरण निकाली काढण्यासाठी तसेच निकाल तक्रारदार मुख्याध्यापिकेच्या बाजुने देण्यासाठी प्रभारी कक्ष अधिकारी सोनार यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली. सतत पैशांची मागणी होत असल्याने तक्रारदार मुख्याध्यापिकेने धुळे एसीबीकडे तक्रार केली. ५ मे रोजी एसीबीने नाशिक खंडपीठात पडताळणी केली. त्यात, सोनर यांनी मुख्याध्यापिकेकडे तडजोडीअंती १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पण झाले. शनिवारी (दि. ६) सकाळी खंडपीठाच्या इमारतीच्या मुख्य प्रवेश द्वारावराजवळ एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पंच साक्षिदार आणि एसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर १० हजार रुपयांची रोकड घेतल्यानंतर लागलीच संशयित सोनार यांना अटक करण्यात आली. उप अधीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवन देसले व धुळे एसीबी पथकाचे कर्मचारी हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅथलेटिक्स संघटनेकडून हल्ल्याचा निषेध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर शुक्रवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ६ मे) सकाळी धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे यांच्यासह शेकडो खेळाडूंनी निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांनी काळे कपडे परिधान केले, तसेच यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, अशी मागणी करण्यात आली.

प्रशिक्षक काळे शुक्रवारी सकाळी गोदापार्कमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रशिक्षण देत होते. त्या वेळी गंगापूरमधील नयूश कडलग आणि म्हसरूळ परिसरातील समीर कांबळे या दोन टवाळखोरांनी मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. काळे यांच्यासमोर हा प्रकार घडल्याने त्यांनी लागलीच हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला, तसेच याबाबत संशयितांकडे जाब विचारला. मात्र, दोन संशयितांनी मिळून काळे यांच्यावर थेट चाकूहल्ला केला. पोटावर आणि डोक्यावर जबरी वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेने निषेधसभेचे आयोजन केले. या सभेला नाशिक सायकलिस्ट ग्रुप व क्रीडाप्रेमींनी हजेरी लावून तीव्र निषेध नोंदवला.

या वेळी आमदार सीमा हिरे, संघटनेचे अध्यक्ष राजीव जोशी, उपाध्यक्ष हेमंत पांडे, राजीव जोशी, दत्ता जाधव, धावपटू कविता राऊत, विजेंद्र सिंग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन दिवसांची कोठडी

संशयित आरोपी कडलग आणि कांबळे यांना शुक्रवारीच पोलिसांनी अटक केली. त्यांना शनिवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. बचाव आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने दोन्ही संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयितांविरोधात यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत काय, याचाही तपास सुरू आहे.

गस्त आणि बॅरिकेडिंग

गंगापूर रोड भागातील गोदापार्क परिसरातील मोकळ्या जागेत दररोज शेकडो नागरिक हजेरी लावतात. सकाळी, तसेच संध्याकाळी अबालवृद्धांची मोठी गर्दी असते. या गर्दीत टवाळखोरांची संख्यादेखील लक्षणीय असते. काळे यांच्यावर थेट जीवघेणा हल्ला झाल्याने पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सतत पेट्रोलिंग, चेक पॉइंट, तसेच बॅरिकेडिंगद्वारे परिसरात येणाऱ्या टवाळखोरांना अटकाव करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयाची लगेच अंमलबजावणीही झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अर्पण रक्तपेढीतर्फे आज समर चॅलेंज

0
0

नाशिक ः मेमध्ये रक्ताचा तुटवडा भासून रुग्णांसमोर संकट उभे ठाकते. यावर उपाय शोधण्यासाठी अर्पण रक्तपेढीतर्फे रविवारपासून (७ मे) २१ मेपर्यंत समर चॅलेंज हा उपक्रम होणार आहे. या निमित्ताने रविवारी सिटी सेंटर मॉल येथे थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नाटिका, रक्तदान शिबिर होणार आहे.

आज हास्य दिंडी

नाशिक ः जागतिक हास्यदिनाचे औचित्य साधून मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हास्य दिंडी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. हास्य योग समितीतर्फे रविवारी (७ मे) सकाळी आठ वाजेपासून या निमित्त विविध उपक्रम होणार आहेत. नवीन आडगाव नाका परिसरातील लुंगे मंगल कार्यालयात हे उपक्रम होणार आहेत. या वेळी हास्यस्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. हास्यचळवळीत विशेष योगदान देणाऱ्या दोन व्यक्तींना हास्य श्रीमान आणि हास्य श्रीमती या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ध्यानयोग शिबिर ९ पासून

नाशिक ः श्री स्वामी समर्थ योग विद्यालयातर्फे ९ आणि १० मे रोजी निवासी ध्यानयोग शिबिर होणार आहे. लव्हाटेनगरमधील लक्षिका मंगल कार्यालयात हे शिबिर होईल. यामध्ये श्वसनपद्धती, प्राणायाम, तणाव आणि ध्यानमुद्रा, मुद्रांचा उपयोग, सकारात्मक दृष्टिकोन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. इच्छुकांनी विद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८४ जागांसाठी ७८१ अर्ज

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापलिका निवडणुकीसाठी शनिवारी (दि ६) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. पालिकेच्या ८४ जागांसाठी दिवसअखेर तब्बल एकूण ७८१ अर्ज दाखल झाले असून अखेरच्या दिवशी ४४६ अर्ज दाखल झाले आहेत.

महापालिकेसाठी २९ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पहिल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत निरुत्साह पाहायला मिळाला. मात्र तिसऱ्या दिवसांपासून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. अर्ज दाखल करण्यास अखेरचे दोन दिवस शिल्लक असताना राजकीय पक्षांनी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नव्हती. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली होती. अनेकांनी ऐनवेळी धावपळ नको म्हणून अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी केंद्रावर गर्दी केली होती. दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. बंडखोरीच्या भीतीने अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेच अधिकृत उमेदवारांसाठी एबी फॉर्म दिले.

उमेदवारीबाबत धाकधूक

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी संपली. सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरीच्या भीतीने अधिकृत उमेदवारांबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या उमेदवारीबाबत धाकधूक आहे.
शिवसेना

शिवसेनेने अधिकृत २६ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात सर्वच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, विद्यमान नगरसेवकांना डच्चू देण्यात आला आहे.

भाजप

भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारांची यादी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. भाजपकडून सर्वच जागांवर उमेदवार देण्यात आले असून ५० हून अधिक मुस्ल‌िम उमेदवारांचा त्यात समावेश आहे.

काँग्रेस

काँग्रेसकडून ७२ जागांवर उमेदवार निश्चित झाले असून, उर्वरित जागी पुरस्कृत उमेदवार देणार असल्याची माहिती आमदार असिफ शेख यांनी दिली.

राष्ट्रवादी-जनता दल

जनता दल व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागा वाटपात जनता दलाला १६ जागा देण्यात आल्या असून, उर्वरित जागांवर राष्ट्रवादी उमेदवार देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनात सापडली १० लाखांची रोकड

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापलिका निवडणुकीची धामधूम सुरू असून, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथक नेमण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा मालेगावनजीक टेहरे फाट्यालगत भरारी पथकाने स्विफ्ट कारमध्ये १० लाख ७५ हजार रोकड सापडली, अशी माहिती आचारसंहिता कक्षाचे अधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली.

पारोळा येथील भिकन प्रभाकर अमृतकर, शांताराम पाटील, विठ्ठल देवराम पाटील या तिघा शेतकऱ्यांनी दोन ट्रक कापूस गुजराथ येथील कडी येथे विक्रीसाठी नेला होता. सदर कापूस हा आठ शेतकऱ्यांचा होता. कापूस विक्री नंतर आलेली रक्कम घेवून तिघे शेतकरी स्विफ्ट कारने (एमएच १९ एपी ३३००) पारोळा येथे परतत होते. दरम्यान मालेगाव महापालिका निवडणूक सुरू असल्याने शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर भरारी पथकाद्वारे वाहनांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. या तपासणीत शुक्रवारी रात्री ही कार तपासण्यात आली. या रकमेबाबत शेतकरी योग्य खुलास करू न शकल्याने सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे. शनिवारी तिघांनी या रकमेबाबत कापूस विक्री केल्याच्या नोंदीची कागदपत्रे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे सादर केली असून, आयकर विभागाकडून याबाबत योग्य खुलास झाल्यानंतर सदरची रक्कम संबंधिताना परत करण्यात येणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मानगरला चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी ओरबोडून नेले. ही घटना महात्मानगर परिसरातील एस्सार पेट्रोलपंपासमोरील दयाळ अपार्टमेंटसमोर ५ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वल्लभ हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या भारती आशुतोष काळे (४०) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी काळे रस्त्याने पायी जात असताना चोरट्याने संधी साधली. काळ्या पल्सरवर आलेल्या चोरट्याने काळे यांच्या गळ्यातील तब्बल ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पीएसआय वर्मा करीत आहे.

स्त्री अर्भक सापडले

स्त्री जातीचे मृत अर्भक फेकल्याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंदिरा गांधी विकासनगर येथील अमरधामच्या पाठीमागे असलेल्या सुलभ शौचालयाजवळ कचराकुंडीत मृतदेह आढळून आला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनचे कर्मचारी ढवळे यांनी मृत अर्भकाच्या आईविरोधात फिर्याद दिली. याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून कुजलेल्या स्थितीत असलेले अर्भक पंचनामा करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले. भटक्या कुत्र्यांनी अर्भकाचा शरीराचा वरचा भाग खाल्ला होता. शवविच्छेदन अहवालानंतर सदर अर्भक स्त्री जातीचे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्त्री भ्रूण हत्येचा विषय सध्या शहरासह राज्यात गाजतो आहे. या पार्श्वभूमीवर मयत स्त्री भ्रूण कचरा कुंडीत फेकून देण्याचा प्रकार समोर आले. हे प्रकरण अनैतिक संबंधातून पुढे आले आहे की यामागे अवैध गर्भपाताचे काही धागेदोरे आहेत काय याचा तपास नाशिकरोड पोलिस करीत आहे.

कार फोडून रोकड लंपास

कारची काच फोडून चोरट्याने आत ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना आर्टिलरी सेंटररोडवरील साई श्रध्दा हॉस्पिटल येथे शनिवारी (दि. ६) सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. महेशकुमार गंगाधर मोरे (३०, औदुंबरनगर, अमृतधाम) यांच्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी कामानिमित्त आर्टिलरी रोड परिसरात गेलेल्या मोरे यांनी साईश्रध्दा हॉस्पिटल येथे त्यांची कार (एमएच १५ एफएफ ७२३८) उभी केली होती. चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून आत प्लास्टिक पिशवीत ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.

आडगावला घरफोडी

टेरसच्या उघड्या दरवाजातून घरात घुसरेल्या चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाइल असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना हॉटेल मिरची मागे असलेल्या साई स्नेह रो हाऊसमध्ये घडली. या ठिकाणी राहणाऱ्या विष्णू शिवाजी थोरात यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. ६) पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. थोरात यांच्या रो हाऊसचा टेरेसचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा चोरट्यांनी घेत घरात प्रवेश केला. चोरट्यांनी सॅमसंग ए ७, जे ७ एक नोकियाचा मोबाइल, १७ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ६ ग्रॅम सोन्याचे लॉकेट, लहान मुलीच्या चांदीच्या तोळबंद्या असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, घटनेचा अधिक तपास पीएसआय माळी करीत आहे.

सातपूरला घरफोडी

सातपूर एमआयडीसीतील हिमांशु प्रिंट अॅण्ड पॅक या कंपनीत मध्यरात्रीच्या सुमारास घुसून चौघांनी मिळून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. सुरेखा जयंतीलाल शहा (४९) यांच्या फिर्यादीनुसार, सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहा यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास विनोद माधव कुलकर्णी व त्यांच्या तीन साथिदारांनी कंपनीत प्रवेश केला. तसेच डेल कंपनीचा लॅपटॉप, पंचिंग मशिनचे कंट्रोल पॅनल बोर्ड आणि एक टूल बॉक्स असा मुद्देमाल चोरी केला. घटनेचा अधिक तपास हवालदार पवार करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेप

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उपनगर येथील तरुणाच्या खूनप्रकरणी कोर्टाने पाच जणांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये वडिल आणि मुलाचा समावेश आहे.

उपनगर येथील योगेश शुद्धधन पवार या २१ वर्षीय तरुणाची २४ सप्टेंबर २०१५ रोजी उपनगरच्या भाजीबाजारात रात्री साडेअकरा वाजता दगड घालून आणि चाकूचे वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी किरण चंद्रकांत सुरवाडे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी उपनगर येथील अक्षय दीपक चावरिया, सनी राजेश लोट, अभिजित सुनसाना, मनीष मुकेश मोहिते आणि दीपक राजेंद्र चावरिया यांना तातडीने अटक केली होती. पोलिस निरीक्षक अशोक भगत तसेच तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. कोर्टकामी हेडकान्सटेबल काशिनाथ गायकवाड, पोलिस नाईक लासूरकर आदींनी सरकारी वकील योगेश कापसे यांना मदत केली. दीपक राजेंद्र चावरिया आणि त्याचा मुलगा अक्षयने अन्य तिघांच्या मदतीने योगेशचा खून केल्याचा आरोप होता. आरोपींना अटक करावी या मागणीसाठी उपनगर नाक्यावर योगेशचा मृतदेह ठेऊन नातेवाइकांनी आंदोलन केले होते. खूनाचे कारण किरकोळ होते.

न्या. वैष्णव यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. खूनाच्या कलमाखाली आजन्म सश्रम कारावास, कलम ३०७ खाली पाच वर्षे कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, कलम १४३ खाली सात महिने कारावास आणि प्रत्येकी पाचशे रुपये दंड तर कलम ५०६ खाली एक वर्ष कारावास आणि प्रत्येकी पाचशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांच्या हस्ते मोहिते यांचा सन्मान

0
0

देवळाली कॅम्प ः भगूर येथील रहिवासी व नाशिकरोड वीजवितरण पोलिस स्टेशनमध्ये सहायक उपनिरीक्षक विलास मोहिते यांना ‘पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह’ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल उपस्थित होते.

पोलिस महासंचालक सतीश माथूर यांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र व बोधचिन्ह देऊन मोहिते यांना गौरविण्यात आले. मोहिते हे १९८३ पासून पोलिस दलात आहेत. मालेगाव छावणी पोलिस स्टेशनपासून त्यांनी सेवेस प्रारंभ केला. त्यांनी गोधन हत्यापथक, पोलिस उपअधीक्षक कार्यालय, शहर सहाय्यक पोलिस आयुक्त, नाशिकरोड पोलिस ठाणे, उपायुक्त गुन्हे विभाग शाखा, सिंहस्थ कुंभमेळा शाखा अशा विविध विभागात उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी लुटली ‘सही रे सही’ची मजा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. ७) ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाची मजा लुटली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी नाटकाचे आयोजन केले. कालिदास कलामंदिर येथे दुपारी नाटक पार पडले.

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाढत्या ताणाबाबत सर्वच स्थरातून चिंता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे कामाच्या राहडगाड्यात पिचलेल्या पोलिसांचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने हा प्रयोग राबवला जात असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले. नाटकाच्या सुरुवातील डॉ. सिंगल यांनी एकदंत फिल्मचे अमित कुलकर्णी तसेच अभिनेता भरत जाधव यांचा सिंगल यांनी सत्कार केला. गतवर्षी १८ ऑक्टोबर रोजीदेखील शहर पोलिस दलातील २०० पोलिसांना आरोग्य तपासणीनंतर थेट मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा दाखविण्यासाठी नेण्यात आले होते. यानंतर, पुन्हा अशी संधी मिळेल की नाही, या विचारात असताना काही दिवसातच साता समुद्रापार पोहचलेला ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाची मेजवाणी पोलिसांनी लुटली. यानंतर दंगल पिक्चरसह शिर्डी सहलीचा अनुभव पोलिसांनी कुटुंबीयांनी घेतला. कामाचा ताण हलका व्हावा, यादृष्टीने शक्य तितके उपक्रम हाती घेण्यात येतील. मात्र, अशा विरंगुळ्यानंतर पोलिसांच्या एकूण कार्यपध्दतीत सुधारणा होऊन सर्वांनी मन लावून काम करणे अपेक्षित असल्याचे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिक वादातून तिघांना जबर मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव दिंडोरी येथील नितीन स्टोन मेटल या खडीक्रशर प्रकल्पात व्यावसायिक वादातून तिघांना जबर मारहाण झाली. या प्रकरणी ओझर येथील एका महिलेसह पाच जणांवर दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पाथर्डी फाटा परिसरात राहणारे भावेशकुमार कालरिया यांचा बांधकाम साहित्य पुरवठा आणि रस्ते ठेकेदारीचा व्यवसाय आहे. तळेगाव शिवारातील गट क्रमांक ३५०-९-१० मध्ये नितीन स्टोन मेटल क्रशरचा नवीन प्रकल्प बसविण्याचा ठेका कालरिया यांनी डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. हे काम एक कोटी ४३ लाख रुपयात ठरले. मात्र, संशयित आरोपींनी काम सुरू झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७ पासून पैसे दिले नाही. २ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भावेश कालरिया आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार संदीप खंदारे तसेच सागर श्रवण हे तिघे तळेगाव येथील खडी क्रशरवर काम पाहणीसाठी आले. तेथे संशयितासमवेत उर्वरित पैशांबाबत चर्चा सुरू असताना नीता महाजन, पवन भिमराव अवचार, रवी कांबळे (सर्व रा. ओझर) यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर संशयितांनी कालरिया यांच्याकडून खडी क्रशरसाठी दिलेले ३५ लाख रुपये, खडी क्रशरचे सामान आणि दोन ट्रक त्यांना देत असल्याचे लेखी लिहून घेत त्यावर बळजबरीने कालरियासहीत दोघांची स्वाक्षरी घेतली. या प्रकरणी दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये पाचही संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, घटनेचा अधिक तपास हेडकॉन्सटेबल अरुण आव्हाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काठे गल्लीत दागिन्यांची लूट

0
0

नाशिक ः वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या पती-पत्नीला रस्त्यात अडवून चोरट्यांनी त्यांच्याकडील तब्बल तीन लाख १० हजार रुपयांचे दागिने लुटून नेले. काठेगल्लीत रात्री आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या प्रकरणी प्रदीपसिंह विठ्ठलसिंह राजपूत (४७, रा. फ्लॅट क्रमांक ४, सागर सुमन अपार्ट. दत्त मंदिराजवळ, काठेगल्ली) यांनी भद्रकाली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ५ मे रोजी रात्री मेव्हुणीच्या मुलीच्या वाढदिवस असल्याने राजपूत दाम्पत्य घरातून बाहेर पडले. रात्री आठ वाजेच्या सुमारास शंकरनगरकडे कार्यक्रमासाठी जात असतांना काठेगल्लीतीलच लुनावत यांच्या घरासमोर दोघे चोरटे पल्सरवर आले. चोरट्यांनी राजपूत यांच्या पत्नीच्या ताब्यातील पर्सवर डल्ला मारला. या दाम्पत्याला काही समजायच्या आत चोरटे राजपूत यांची पर्स घेऊन पसार झाले. पर्समध्ये सुमारे पाच तोळ्याचे सोन्याचे एक ब्रेसलेट, एक लॉकेट, दोन हजार रुयांच्या तीस नोटा, राजपूत दाम्पत्याचे पॅनकार्ड, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असा तीन लाख १० हजारांचा मुद्देमाल होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, चोरट्यांनी वर्दळीच्या ठिकाणी डल्ला मारल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्री कोम्बिंग; दिवसा नाकाबंदी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी शनिवारी रात्री कोम्बिंग तर रविवारी सकाळी नाकाबंदी मोहीम राबवली. यात, गुन्हेगार तपासणीसह बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

घरफोडीसह मालमत्तेच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून शहर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत दोन पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, १३ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ३२ अधिकारी आणि १४४ कर्मचारी सहभागी झाले. शहराच्या विविध भागात एकाच वेळी पोलिसांनी गुन्हेगार चेक केले. तब्बल ४७ सराईत गुन्हेगारांची या तपासणी मोहिमेदरम्यान चौकशी झाली. याबरोबर, १४४ रिक्षांची तपासणी करून दोषी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ४८ हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी झाली. सहा तडीपारांचा शोध घेत पोलिसांनी ८३ टवाळखोरांवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई केली. दरम्यान, शनिवारी (दि. ६) रात्री ११ वाजेपर्यंत ही मोहिम सुरू होती. रविवारी (दि. ७) सकाळी पोलिसांनी शहरच्या विविध भागात नाकाबंदी राबवली. प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी नाकाबंदी होती. विशेषतः चेन स्नॅचिंग होणारी ठिकाणांना प्रामुख्याने लक्ष करण्यात आले. या दरम्यान, प्रत्येक पॉइंटवर वाहनांची तपासणी करीत पोलिसांनी ३० हजार रुपयांपेक्षा दंड वसूल करीत एक दुचाकीदेखील जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images