Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्ह्यात नवीन रेल्वे द्यावा

$
0
0

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील रेल्वेविषयक प्रश्नांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी भुसावळ-सुरत-मुंबई या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्याची मागणी केली. शिवाय मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याबद्दल रावल यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

रावल हे दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी नुकतीच याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली आहे. या भेटीप्रसंगी त्यांच्यासमवेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. यावेळी रावल यांनी जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यात भुसावळ-नंदुरबार-सुरत-मुंबई या मार्गावर ‘साने गुरुजी एक्स्प्रेस’ ही नवीन गाडी सुरू करण्याची मागणी केली. तसेच अमृतसर-सीएसटी एक्स्प्रेसला धुळ्यासाठी टू-टायर वातानुकूलित डबा जोडण्यात यावा. डेक्कन ओडिसी या विशेष गाडीत काय सुधारणा करता येईल, यावरही चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या वाढीसाठी महाराजा एक्स्प्रेसच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अशी गाडी सुरू करता येईल काय? याबाबत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांना अडचण येता कामा नये

$
0
0

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण येता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच खरीप हंगामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, कृषी विकास अधिकारी बी. व्ही. बैसाणे, मोहीम अधिकारी आर. एम. नेतनराव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक आर. डी. पाटील व तालुका स्तरावरील सर्व निरीक्षक उपस्थित होते. या वेळी पेरणी क्षेत्र नियोजन, बी-बियाणे पुरवठा नियोजन, रासायनिक खते पुरवठा नियोजन व खत विक्रीचे नियोजन याबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक सांगळे यांनी, जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७५ हजार ६०० हेक्टर असून, येत्या खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४ लाख ५८ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी कापूस, ज्वारी, बाजरी, भात, मका, मूग, सोयाबीन, उडीद, तूर व भुईमूग या प्रमुख पिकांसाठी एकूण ४७ हजार २४३ क्विंटल विविध पिकांचे व ९.८५ लाख कापूस बियाणे पाकिटे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाबीज संस्थेकडून १८ हजार ४२ क्विंटल विविध पिकांचे व खासगी कंपनीमार्फत २८८१६ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. तसेच कापूस बियाण्याच्या एकूण ९.८५ लाख पाकिटांची आवश्यकता असून, यामध्ये महाबीजकडून दहा हजार तर खासगी कंपनीकडून ९.७५ लाख पाकिटे पुरवठा करण्याचे नियोजन आहे, याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य शिबीर आजपासून

$
0
0

धुळे : राज्य सरकारतर्फे नंदुरबार शहरातील मोदी मैदानावर आज, रविवारी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. शिबिरात दोन हजार तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करणार आहेत. शनिवारी शिबिरस्थळी सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अधिकाऱ्यांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू

$
0
0

धुळे : धुळे तालुक्यातील कुसूंबा गावालगत असलेल्या भवानी माता मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत गावातील आठ तरुण शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी सागर उर्फ धर्मराज सूर्यकांत शिंदे (वय २०, रा. कुसूंबा ता. जि. धुळे) आणि कमलेश पंडित चौधरी (वय १९, रा. कुसूंबा ता. जि. धुळे) हे दोन्ही विहिरीत बुडून मृत झाले आहेत. मात्र, विजेचा शॉक लागल्याचा प्राथमिक अंदाज सोबत पोहत असलेल्या मित्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबारला लवकरच वैद्यकीय कॉलेज

$
0
0

महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; पहिल्या दिवशी विक्रमी गर्दीचा अंदाज

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहरात लवकरच शासकीय वैद्यकीय कॉलेज कार्यान्वित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे महाआरोग्य शिबिर ऐतिहासिक असून, नंदुरबार जिल्ह्यातील या शिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राज्याकडून वीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येत असून, केंद्राच्या माध्यमातून पन्नास खाटांचे रुग्णालयदेखील सुरू होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे आदिवासी जिल्ह्यातील नागरिकांना आता मुंबई, पुण्यात उपचार घेण्यासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

खान्देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, तसेच आदिवासी भागातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी दि. ३० एप्रिल ते २ मेपर्यंत तीनदिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मोदी मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद््घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघूवंशी, माजी वैद्यकीय मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदयसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले की, राज्यात आतापर्यंत झालेल्या महाआरोग्य शिबीरांपैकी नंदुरबार शहरातील आरोग्य शिबिर हे ऐतिहासिक झाले आहे. शिबिरात ज्या रुग्णांनी तपासणी केली आहे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक, मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरातील डॉक्टरांची आवश्यकता असल्यास सरकारकडून मोफत उपचार देऊन बरे केले जाईल. नंदुरबार जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या नागरिकांनी महाशिबीरात तपासणीसाठी हजेरी लावली आहे. या जिल्ह्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘संख्यात्मक आणि गुणात्मक आघाड्यांवर सर्वोत्तम’

खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य शिबिर हे संख्यात्मक आणि गुणात्मक या आघाड्यावर सर्वोत्तम ठरल्याचा दावा वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘मटा’शी बोलताना केला. त्यांनी सांगितले की, महाआरोग्य शिबिरात सकाळपासूनच गर्दी झालेली दिसून आली. आतापर्यंत राज्यात वीस जिल्ह्यांमध्ये असे शिबिरे घेण्यात आली मात्र सर्वात जास्त्‍ा प्रतिसाद हा सातपुडा भागातील लोकांनी दिला आहे. रविवारी (दि. ३०) सकाळी अकरा वाजेपर्यंत शिबिरात एक लाखांहून अधिक नागरिकांनी तपासणीसाठी हजेरी लावली. तर दोन लाख रुग्णांपेक्षा जास्त तपासणीसाठी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे गर्दीचा अंदाज लावणे कठीण होत आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याशेजारी असलेल्या गुजरात आणि मध्यप्रदेशातूनदेखील हजारो नागरिक शिबिरात तपासणीसाठी आले होते.

रुग्ण तपासणीचे नऊ डोम

याप्रसंगी २० प्रमुख आजारांबरोबरच ‘आयुष’मधील उपचार येथे असल्याने रुग्णांना आपल्या गरजेनुसार उपचार घेण्यासाठी त्या-त्या डोममध्ये गर्दी करत होते. आयुषसाठी असलेल्या डोममध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आदी वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहून रुग्णांना उपचार करत होते. यासाठी कर्मवीर व्यं. ता. रणधीर आयुर्वेद कॉलेज, शिरपूर, श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक कॉलेज आणि आर. डी. चोरडिया हॉस्पिटल, चांदवड (नाशिक) येथील डॉक्टर उपस्थित होते. प्रत्येक डोममध्ये प्रामुख्याने ग्रंथीविकार, मेंदुविकार, मनोविकारर, बीएमडी (हाडाचाठिसूळपणा) श्वसनविकार, हृद्यविकार, कर्करोग त्वचाविकार, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, मॅमोग्राफी, कान-नाक-घसा यासह शस्त्रक्रियासाठीच्या विविध आजारांसाठीच्या तपासणी करण्यात येत होत्या. यासाठी मुंबई मधील टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट, केईएम, जे. जे. हॉस्पिटल, हिंदुजा, लीलावती, पुणे, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव येथील नामांकित डॉक्टर, विविध जिल्हा रुग्णालयांची वैद्यकिय तज्ज्ञांचे पथक हजर राहून उपचार करत होते. कोट्यवधी रुपयांची औषधे कंपन्या व रुग्णालयांनी

उपलब्ध केल्याचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सांगितले. शस्त्रक्रिया नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे व त्याद्वारे कोणत्याही गंभीर व मोठ्या आजारांची निश्चिती झालेल्या रुग्णांची नोंद घेऊन त्याचा संगणकीय डाटा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दंतरुग्णांसाठी मोबाइल व्हॅन

येथील दंतरोग कॉलेज, धुळे, जिल्हा रुग्णालय धुळे, एसएमबीटी डेन्टल हॉस्पिटल संगमनेर (अहमदनगर) यांचे पथक दंत रुग्णांसाठी सज्ज होते. त्यासाठी विश्वास पाटील ओरल हेल्थ मोबाइल युनिट हजर होते. येथील ३ मोबाइल व्हॅनमधील दंत चिकित्सायंत्रणेद्वारे जवळपास २८ डेन्टीस्टचे पथक तात्काळ तपासणी व उपचार करत होते. याचबरोबर नेत्ररुग्ण तपासणीची व रुग्णांना मोफत चष्मा देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात दोनशे किलो भांग जप्त

$
0
0

धुळे : इंदूरकडून धुळ्याकडे खासगी कारमधून भांगची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वाहनाची तपासणी केली असता सोमवारी (दि. १) सायंकाळी एका इंडिगो (क्र. एमएच ३९ जे १४७८) कारमधून कोरड्या भांगची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या गाडीतून दोनशे किलो कोरडी भांग जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांकडून गाडीसह ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ रवींद्र राणा (रा. माधवपुरा पालाबाजार) आणि त्याचा जोडीदार राजेशभाऊ यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील राजेश हा पळून जाण्यात यशस्वी झाला. चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे प्रेमराज पाटील यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर लिपिक बेडसेंचे निलंबन

$
0
0

शिक्षण उपसंचालकांकडून कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रवींद्र बेडसे यांनी गेल्या काही वर्षापासून खासगी व्यक्तीची कार्यालयातील कामांसाठी नियुक्ती केली होती. तर गेल्या काही वर्षांपासून बनावट दस्तऐवज तयार करून शिक्षक नियुक्तीचे प्रस्ताव मंजूर केले होते. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक कागदपत्रांची अफरातफर करून आर्थिक फायदा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपिक बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘मटा’नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. तसेच बेडसे यांच्याविरोधात आमदार अनिल गोटेंसह शिक्षक संघटना व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी लिपिक रवींद्र बेडसे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या महिन्यात लाच प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कार्यालयातील लिपिक रवींद्र बेडसे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील पत्रव्यवहार, आमदार अनिल गोटे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केलेली तक्रार तसेच अनुसूचित जाती जमाती संघटना, नारायण पाटील, परशुराम पाकळे, संग्राम पाटील यांच्या लेखी तक्रारीची दखल घेत लिपीक बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नेमण्यात आले आहे.

बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून जयहिंद शाळेतील शिक्षिका पुष्पा पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणदेखील सुरू केले होते. याप्रकरणी बेडसे यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय खेळाडूंना सवलतीचे गुण मिळावेत

$
0
0

धुळे : सरकार निर्णयानुसार ४२ खेळांव्यतिरिक्त इतर शालेय खेळांना सवलतीचे गुण नाकारल्याने याबाबत इतर शालेय खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तरी सरसकट सर्व शालेय खेळाडूंनाही सवलतीचे गुण मिळावेत याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा प्रशासनाला खेळाडूंनी दिले आहे.

निवेदनात, इतर खेळाडूंप्रमाणे आम्ही शालेय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले आहे. सरावासाठी अभ्यासाचा वेळ खर्च केला आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर इतर मुले आमची अवहेलना करतील, यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे.

यावेळी निवेदन देतांना जिल्ह्यातील खेळाडू ममता फटकाळ, दिपाली जोहरी, हर्षदा पाटील, रोहित गायकवाड, अश्विन पाटील, सोनू राजपूत आदी खेळाडू तथा क्रीडा शिक्षक मिनलकुमार वळवी, पंकज पाठक, रविंद्र सोनवणे, राजेश शहा, प्रशिक्षक राकेश माळी, जगदीश वंजारी, जितेंद्र माळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिरपूर नगर परिषदेला ३ कोटींचे बक्षिस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरपूर नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ३ कोटी रुपयांचे बक्षिस देऊन गुरुवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांना मुंबई येथे गौरविण्यात आले.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली जात असून, सुरुवातीस संपूर्ण महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत शिरपूर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सातत्याने अतिशय चांगले काम नगर परिषदेमार्फत सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार दि. २० एप्रिलला नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. त्याबाबत पहिल्या

नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट ब वर्ग नगर परिषदांमधून शिरपूर वरवाडे नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते मुंबईला नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. याबद्दल शिरपूर शहरातील समस्त नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी माधवराव पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी धुळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (दि. १०) बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर धुळ्यात येत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासह पांझरा नदी काठावरील दुतर्फा रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. याशिवाय इतरही कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे.

साक्री रोडलगत सिंचन भवनामागे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच ७५ कोटी १६ लाख रुपये खर्चाच्या पांझरा काठावरील दोन्ही बाजूच्या रस्ते कामाचाही शुभारंभ यावेळी करण्यात येणार असल्याचे आमदार गोटे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातील डॉ. जगन्नाथ वाणींचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील विधायक चळवळीतील अग्रणी डॉ. जगन्नाथ वाणी (वय ८३) यांचे शनिवारी (दि. ६ मे) कॅनडामध्ये भारतीय वेळेनुसार सकाळी १०.२२ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. कॅनडामधील कॅलगरी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ केले यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

खान्देशात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांनी डॉ. वाणी सर्वांना परिचित होते. त्यांना २०१२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता. ‘देवराई’ या मराठी चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली आहे. काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यावर उपचारांनी मात करीत चार ते पाच वर्षे त्यांनी काढली. अशाही अवस्थेत ते मायदेशी येऊन संस्थेचे कामकाज पाहत होते. विविध सार्वजनिक कार्यक्रमांत ते हिरिरीने सहभागी होत असत. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी कमलिनी वाणी यांचे निधन झाले. डॉ. वाणी यांच्या आजारपणात त्यांची बहीण पुष्पलता शिरुडे आणि बंधू चंद्रकांत केले नुकतेच त्यांना कॅनडात जाऊन भेटले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच डॉ. वाणी यांनी जगाचा निरोप घेतला.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले

डॉ. वाणी हे राष्ट्रसेवा दलाचे सैनिक होते. त्यांच्यावर सेवा दलातून झालेल्या संस्काराचे त्यांनी सोने केले. परदेशात स्थायिक असूनही मायदेशाकडे अर्थात धुळ्याकडे त्यांचे नेहमी लक्ष असे. त्यांनी स्थापन केलेली वैशिष्ट्यपूर्ण संस्था ही त्याचीच पावती आहे. डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या रूपाने एक बहुआयामी व विधायक दृष्टीचे व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना खान्देशातून व्यक्त होत आहे.

डॉ. वाणींचा अल्प परिचय

- डॉ. वाणी यांनी शालेय शिक्षण धुळ्यात, उच्चशिक्षण पुण्यात व विद्यावाचस्पती ही पदवी कॅनडात घेतली.

- धुळ्यातील कृषी महाविद्यालय आणि पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमधील कालखंड सोडला तर त्यांची प्राध्यापक म्हणून कारकीर्द कॅनडातच गेली.

- १९९६ मध्ये ते कॅलगरी विद्यापीठातून निवृत्त झाले.

- २०१२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ या कॅनडाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही विमाशास्त्रीय विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी चालना दिली.

- मनोरुग्णांसाठी व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडात अनेक उपक्रम राबविले.

- का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, स्किझोफ्रेनिया सोसायटीची स्थापना त्यांनी पुण्यात केली.

- शारदा नेत्रालय, बधभ्र पुनर्वसन संस्था असे विविध उपक्रम सुरू केले.

- कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी संस्थेची स्थापना केली.

- कॅलगरीत जागतिक संगीत अभ्यासक्रमदेखील त्यांनी सुरू केला.

- कॅनडात महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली.

- जनजागृतीसाठी ‘देवराई’, ‘एक कप च्या’ आदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

- अनेक ग्रंथ प्रकाशन, अनेकविध पुरस्कार हे त्यांचे संचित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीवर शुक्रवारी अभिरूप न्यायालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध प्रकारच्या सार्वजनिक समस्यांची दखल घेत संवेदना मंचची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध विषयांवर अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. यातील पहिले आयोजन वृक्षतोडीवर करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. १२) हे अभिरूप न्यायालय वैराज कलादालन येथे होणार आहे.

काही महिन्यात शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. उन्हाचा वाढता तडाखा आणि वृक्षतोड या साऱ्या बाबी लक्षात घेत शहराच्या आगामी विकासाचा विचार करून संवेदना मंच या अभिनव संकल्पनेचा उदय झाला आहे. शहरातील विविध ज्वलंत आणि सार्वजनिक समस्यांवर अभिरुप न्यायालय भरविण्यासह विविध प्रकारच्या संकल्पना राबविण्याचा मंचचा प्रयत्न आहे. या उपक्रमांतर्गत सरकारी आधिकारी, रिक्षा युनियन, एसटी वाहनचालक, डेपो व्यवस्थापक, रेल्वे अधिकारी, पोलिस कमिशनर, मनपायुक्त आदींना थेट प्रश्न विचारण्याची संधीही मिळणार आहे.

वृक्षतोडीबाबत प्रश्न, सूचना पाठवा

संवेदना मंच आणि आर्किटेक्ट व इंजिनीअर्स असोसिएशन यांच्यावतीने शुक्रवारी (दि. १२) शरणपूररोडवरील वैराज कलादालन येथे अभिरुप न्यायालय होणार आहे. वृक्षतोडीबाबत आयोजित या न्यायालयात नागरिकांना सहभागी होता येईल. त्यासाठी १२ मेपूर्वी लेखी स्वरूपात आपले प्रश्न कळवावेत. आयत्या वेळी प्रश्न विचारता येणार नाहीत. तसेच हा कार्यक्रम जनसमुदाय व नागरी स्वरुपाचा असल्याने कोणताही राजकीय पुढारी व पदसिद्ध व्यक्ती यात असणार नाही, असे मंचचे अध्यक्ष अजित पतकी यांनी कळविले आहे.

प्रश्न पाठविण्यासाठी संपर्क

अजित पत्की अध्यक्ष, संवेदन मंच ९१४६२७८३५७,
ajitpatki@gmail.com
सचिन गुळवे-अध्यक्ष- आर्कीटेक्ट्स व इंजिनिअर्स असोसिएशन
president@aandenashik.org

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून रोकड लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ग्राहकाच्या कारची काच काढून चोरट्यांनी ६५ हजारांच्या रोकडसह महत्त्वाची कागदपत्रे चोरी केली. ही घटना जुना आग्रा रोडवरील कालिका मंदिरासमोर घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशिकांत दामोदर लडके (६३, रा. हुंडीवाला लेन) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री जेवणासाठी लडके मुंबईनाका भागात गेले होते. कालिका मंदिर परिसरात फोर्च्युनर कार (एमएच १५ ईडी ७८६०) उभी करून ते नजिकच्या हॉटेलमध्ये गेले असतांना चोरट्याने संधी साधली. लडके यांच्या कारच्या दरवाजाची काच उघडून चोरट्यांनी ही चोरी केली. चालकाशेजारील आसनावर बॅगेत ठेवलेली ६५ हजार रुपयांची रोकड आणि बँकेचे महत्त्वाची कागदत्रे तसेच घराच्या चाव्या चोरट्यांनी चोरी केल्या. एका दिवसापूर्वी आर्टीलरीरोडवर चोरट्यांनी वाहनाची काच फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली होती. आता या घटनेत चोरट्याने काच काढून चोरी केली. वाहनातील मुद्देमाल लंपास करण्याची नवनवीन शक्कल चोरटे लढवत असून, या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

उघड्या घरातून चोरी

कुटुंबीय घरकामात व्यस्त असल्याची संधी साधत चोरट्यांनी उघड्या घरात घुसून सव्वा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही धक्कादायक घटना बॉईज टाऊन शाळा परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रशांत कांतीलाल साखला (४९, रा. दत्तात्रेय दर्शन) यांच्या फिर्यादीनुसार, साखला कुटुंबीय २७ एप्रिल रोजी दुपारी घरकामात व्यस्त होते. यावेळी दरवाजा उघड होता. ही संधी साधत चोरट्यांनी चोरी केली.

वैद्यनगरला चेन स्नॅचिंग

पायी जाणाऱ्या महिलेस ढकलून दुचाकीस्वार भामट्यांनी तिच्या गळ्यातील पोत तोडून नेल्याची घटना पाटीदार भवन येथील वैद्यनगर परिसरात घडली. नीता अनिल पंडित (रा. ठाणे) यांच्या तक्रारीनुसार, त्या काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. रविवारी (दि. ७) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्या वैद्यनगर परिसरातून पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील ३४ हजार रुपयांची सोन्याची पोत ओरबाडून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

शिवाजीनगरला घरफोडी

सातपूर परिसरातील शिवाजीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. वैशाली सोमनाथ जाधव (३६, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. ५ ते ७ मे दरम्यान जाधव कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधली. त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील २० हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि एलईडी टीव्ही असा सुमारे ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

अपघातात चालक ठार

भरधाव वेगात दुभाजकावर आदळून वाहन पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची घटना शनिवारी (दि. ६) रात्री तपोवनातील लक्ष्मी नारायण मंदिरासमोर झाली. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

संजय सिद्धप्पा शिवंगी (३२, रा. क्रांतिनगर, संभाजी चौक, सिडको) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. संजय हे शनिवारी रात्री छोटा हत्ती (एम. एच. १५ डी. के. ५०६४) या वाहनातून तपोवनमार्गे प्रवास करीत असताना अपघात झाला. लक्ष्मी नारायण मंदिरासमोर त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे वेगात जाणारे वाहन दुभाजकावर आदळून वाहन पलटी झाले. यात चालक संजय गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ

सि‌व्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी नोंद केली असून, घटनेचा अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर वकिलीच करणार बंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कायद्याची पदवी घेतलेली नसताना वकिली करणाऱ्या तोतया वकिलांचा शोध घेण्याचे काम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बार कौन्सिलमार्फत सुरू आहे. आजपर्यंत आपल्या पदवीची माहिती सादर न करणाऱ्या वकिलांसाठी १५ मे पर्यंत शेवटची संधी असून, त्यानंतर संबंधितांवर थेट काम करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

बनावट कायद्याची पदवी धारण करून वकिली व्यवसाय करणाऱ्या भामट्यांमुळे न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर मोठा परिणाम होतो. पीडीत व्यक्तीला न्याय मिळतच नाही. मात्र, आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. नाशिकमध्येदेखील अशी तोतया वकिलांचा यापूर्वी पर्दाफाश झाला आहे. अशा काही घटनांच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने सर्व वकिलांची एलएलबीची पदवी बार कौन्सिलमार्फत विद्यापीठाकडून तपासून घेण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी दिले. २५ मे २०१७ पर्यंत संबंधित विद्यापीठाकडे बार कौन्सिल पदव्या पाठवणार आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे हे काम सध्या सुरू आहे. आजवर सादर झालेल्या पदव्यांची माहिती विद्यापीठांना सादर करण्यात आली असून, त्याचा अहवाल २५ जून २०१७ पर्यंत बार कौन्सिलला सादर होणार आहे. ज्या वकिलांनी व्हेरीफिकेशन फॉर्म किंवा घोषणापत्र आजपर्यंत भरलेली नाही. अथवा फार्म भरून डिग्री सादर केलेली नाही अशा वकिलांना ही शेवटची संधी असणार आहे.

उपरोक्त मुदतीत व्हेरीफिकेशन झाले नाही तर संबंधीत वकीलांना प्रॅक्टीसींग अॅडव्होकेटच्या यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या व्यक्तींना भविष्यात स्थानिक वकील संघ, राज्य वकील परिषदेच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेता येणार नाही.

१५ मेपर्यंत संधी

संबंधित वकिलांनी एलएलबीची पदवी, पासिंग सर्टिफीकेट, अंतिम वर्षाची गुणपत्रिका यासह २५ मेपर्यंत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे मुंबई, औरंगाबाद, नागपूर तसेच गोवा येथील कार्यालयात व्यक्तीशः अथवा प्रतिनिधीमार्फत सादर करणे बंधनकारक आहे. पोस्ट अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

जिल्ह्यात जवळपास चार हजार वकील असून, बहुतांश वकीलांनी अर्ज सादर केले आहे. उर्वरीत वकीलांनी शेवटीची संधी म्हणून त्वरीत अर्ज सादर करणे अपेक्षीत आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वकीली देखील करता येणार नाही.
- अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार कौन्सिल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमनाचा कृषिपंपाना चटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

विजेच्या पुरेशा उपलब्धतेअभावी महावितरणने कृषी ग्राहकांना करण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात आणखी दोन तासांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कृषी ग्राहकांना दिवसा व रात्री प्रत्येकी आठ तास असे दिवसाला १६ तास वीज पुरवठा केला जात आहे.

सध्या राज्यात वीजटंचाई निर्माण झाल्याने विजेची मागणी व पुरवठ्यात मेळ घालतांना महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महावितरणने सोमवारपासून कृषी ग्राहकांसाठी भारनियमन आणखी दोन तासांनी वाढविले आहे. आता नव्या नियोजनानुसार कृषी ग्राहकांना दिवसा आठ तास आणि रात्री आठ तास असे १६ तास वीजपुरवठा केला जाणार आहे. तर दिवसभरात आठ तास भारनियमन केले जाणार आहे. रात्री एक ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन टप्प्यांत अखंडित वीजपुरवठा केला जाणार आहे. परंतु, वीज उपलब्धतेचा प्रश्न सुटताच कृषिपंपांना दिवसा आठ तास व रात्री दहा तास अखंडित वीज पुरवठा केला जाणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी कळविले आहे.

वीजपुरवठा करा सुरळीत

देवळाली कॅम्प : शेतीला पाणी देण्यासाठी आवश्यक पुरेशी वीज मिळत नसल्याने संतापलेल्या लहवित, लोहशिंगवे परिसरातील शेतकऱ्यांना वीज महावितरण कंपनीच्या भगूर येथील सब-स्टेशनवरील प्रबंधक परिहार यांना नुकतेच निवेदन दिले. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामरक्षक दलाचा मद्यविक्रीवर ‘वॉच’

$
0
0



नाशिक : अवैध मद्य विक्री तसेच वाहतुकीचे प्रकार रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारने ग्राम सुरक्षा रक्षकांवर टाकली आहे. याबाबत ग्राम सुरक्षा रक्षकांची तक्रार आल्यास पोलिस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाला १२ तासात कारवाई करावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर एखाद्या मद्यपीकडून गोंधळ घातला जात असेल तर अशा माहितीची दखलही पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

ग्रामीण भागात सुरक्षेची मोठी जबाबदारी ग्राम रक्षक दलाच्या खांद्यावर आहे. जिल्ह्याचे क्षेत्र मोठे असून, मनुष्यबळाची कमतरता असल्याने जिल्ह्याच्या दुर्गम अथवा दुर्लक्षित भागात ग्रामरक्षक दलाची भूमिका महत्त्वाची ठरते. आता राज्य सरकारने एक अद्यादेश काढून ग्रामरक्षक दलाच्या खांद्यावर अवैध मद्य विक्री तसेच वाहतूक रोखण्याची जबाबदारी टाकली आहे. जिल्ह्यात ग्राम रक्षक दलाचे १७ ते १८ हजार सदस्य आहेत. विशेष म्हणजे यात तरुणांची संख्या मोठी आहे. अनेक छोटे-मोठे गुन्हे ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांकडून रोखले जातात. तसेच तपास कामातदेखील या सदस्यांची माहिती महत्त्वाची ठरते. ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांच्या माहितीमुळे गंभीर गुन्हे उघडकीस येतात. राज्य सरकारने नुकतेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीअंतर्गत येणाऱ्या अवैध मद्य विक्री, बाळगणे, वाहतूक करणे इत्यादी गुन्ह्यांबाबतची माहिती नजिकच्या पोलिस स्टेशन अथवा संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी देण्यासंदर्भातील तरतूद ग्राम रक्षक दल नियम, २०१७ मध्ये करण्यात आली आहे. या तरतुदींनुसार ग्रामरक्षक दलाच्या सदस्याने माहिती दिल्यास पोलिस अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना १२ तासांच्या आत कारवाई करून गुन्हा दाखल करावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर असे कृत्य करणाऱ्या संशयिताकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेऊन त्याच्याविरोधात प्रचलित कायद्यानुसार कारवाई होणार आहे. सराईत व्यक्तिविरोधात हद्दीपारीची कारवाई करण्याबाबत अद्यादेशात नमूद करण्यात आले आहे. तीन वेळेपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाल्यास संबंधित व्यक्तिविरोधात हद्दीपारीच्या प्रस्तावासाठी पोलिसांनी कालमर्यादा निश्चित करावी. ही कारवाई वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

कंट्रोलशी साधा संपर्क

याबाबत नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले की, या निर्णयाची अंमलबजावणी लागलीच सुरू झाली आहे. ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी नजिकच्या पोलिस स्टेशन अथवा थेट पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाच्या ०२५३-२३०९७०० या क्रमांकावर संपर्क साधवा. माहिती मिळाल्यानंतर लागलीच कारवाई केली जाईल. एखादा मद्यपी गोंधळ घालून शांतता भंग करीत असल्याची माहिती सदस्यांकडून मिळाल्यानंतरदेखील त्वरित कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ मेपासून पेट्रोलपंप रविवारी बंद!

$
0
0

कमिशन वाढवून मिळविण्यासाठी निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोल-डिझेलचे कमिशन वाढवून मिळावे, या मागणीसाठी १४ मेपासून दर रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय सीआयपीडी आणि फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनने घेतल्यामुळे वाहनधारकांचे हाल होणार आहेत. कमिशनच्या विषयावर निर्णय न झाल्यास दर रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहणार आहे. याबाबत २८ मे रोजी मुंबईत असोसिएशनची बैठक होणार आहे.

पेट्रोलपंपचालकांच्या या निर्णयामध्ये १० मेपासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवणे, तसेच १५ मेपासून फक्त दिवसभरच पेट्रोलपंप सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ राहणार आहे. त्यानंतर ते रात्री बंद ठेवण्यात येणार आहेत. नाशिक शहरात असेही रात्री पेट्रोलपंप बंद राहतात पण ते चार तास अगोदर बंद राहणार आहेत.

जिल्ह्यात त्याचा परिणाम होणार आहे. केंद्र शासनाने २०११ मध्ये अपूर्वा चंद्रा कमिटीची स्थापना करून पेट्रोल-डिझेलच्या कमिशनबाबत तोडगा काढण्यात आला. वर्षातून दोनवेळा कमिशन वाढविण्याचे ठरले. नाशिक जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल व हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांचे मिळून ३५० पेट्रोल पंप आहेत. नाशिक शहरात ७० पेट्रोलपंप आहेत. त्यामुळे हे सर्व पेट्रोलपंप १४ मेनंतर रविवारी बंद राहतील व इतर वेळी रात्री बंद राहण्याची शक्यता आहे.

१० मे रोजी खरेदी नाही

गेल्या दोन वर्षांपासून संघटना याविषयी लढा देत आहे. मात्र तेल कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पेट्रोल डिलर्स असोसिएशनने केला आहे. तसेच कंपन्यांनी वारंवार याबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून मागितली. ही मुदत ९ मे रोजी संपत असल्याने १० मे रोजी एकदिवस खरेदी बंद आंदोलन करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक संचालकांना सरकारी मदतीची आस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला शासनाने मदत करावी, यासाठी जिल्हा बँकेचे शिष्टमंडळ आज, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. याअगोदर दोनदा या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीविना रिकाम्या हाती परतावे लागले आहे. आता भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांनी मध्यस्थी केल्यानंतर ही भेट होणार आहे.

या भेटीत बँकेच्या एकूण आर्थिक स्थितीचे चित्र मांडले जाणार आहे. राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन प्रयत्नशील आहेत. सुमारे तीन हजार कोटींचे कर्ज थकल्याने जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज देण्यासाठी बँकेकडे दमडीही शिल्लक नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत शेतकरी व शिक्षकांनी बँकेला ताळे ठोकले. त्यातच राज्यात आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हा बँका शिखर बँकेत विलीन करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. त्यामुळे संचालक मंडळ धास्तावले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे.

प्रशासक नेमण्याच्या हालचाली

बँकेचे चेअरमन व व्हा. चेअरमन शिवसेनेचे आहेत. त्यामुळे मध्यंतरी बँकेची स्थिती खालावल्यानंतर भाजपकडून प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. बँकेवर आलेले संकट टाळण्यासाठी व आपले पद वाचवण्यासाठी भाजपाशी सलगी करण्याचा प्रयत्नही या भेटीमागे असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेरी’च्या अधिकारांना कात्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) या राज्यातील एकमेक संस्थेच्या अधिकाराचे काही नियंत्रण आता मुंबईतील ई-प्रशासन मंडळाला देण्यात आल्यामुळे मेरीला आता घरघर लागली आहे.

राज्यात धरणांचे संकल्पन, बांधकाम करण्यासोबत अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनाच्या उद्देशाने १९५९ मध्ये नाशिकमध्ये स्थापन झालेली मेरी संस्था दिंडोरी रस्त्यावर सुमारे दीडशे एकर जागेत उभी आहे. त्यातील रिसोर्स इंजिनीअरिंगचे काम आता ई-प्रशासन मंडळाच्या नियंत्रणात मुंबईला गेले आहे. नाशिकच्या मेरीमध्ये जलाशय गाळ सर्वेक्षण व सुदूर सर्वेक्षण, सामग्री चाचणी, संरचनात्मक संशोधन, महामार्ग संशोधन, भूकंप आघात सामग्री, सामग्री चाचणी असे आठ विभाग आहेत. त्यातील मेरीचे रिसोर्स इंजिनीअरिंग सेंटरचे नियंत्रण ई-प्रशासन मंडळाकडे देण्यात आले असून, महासंचालकाचे अधिकार कमी करण्यात आले आहेत. त्यासाठी शासनाने एक परिपत्रक काढले आहे. त्यात जलसंपदा विभागाव्दारे करण्यात येणाऱ्या विविध कामात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विभागाचे कामकाज कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी विविध स्तरावर वापरात असलेल्या सॉफ्टवेअर व माहिती संकलनाच्याबाबतीत एकसूत्रीपणा आणण्यासाठी ई-प्रशासन मंडळाची स्थापन करण्यात आली आहे. या मंडळाकडेचे हे अधिकार देण्यात आले आहेत. मेरीचे अधिकार नाशिकचे पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांच्या जलसंपदा विभागाने काढले आहेत.

धरण निगडीत कामांवर मुंबईतून नियंत्रण

या निर्णयामुळे धरणाच्या गाळ सर्व्हेक्षणासह धरणाशी निगडीत विषयाला मान्यता ई-प्रशासन मंडळ देणार आहे. याचे काम नाशिकच्या मेरीमध्ये होणार असले तरी त्यासाठी आता मुंबईच्या निर्णयाची वाट बघावी लागणार आहे. त्याचबरोबरच प्रत्येक वर्षाचे जुलै ते जून या दरम्यान गाळ सर्व्हेक्षण वार्षिक कार्यक्रम ई-प्रशासन मंडळ करेल. अशा रितीने तब्बल १० कामे ही नाशिकच्या महासंचालकाकडून काढून त्याचा निर्णय ई-प्रशासन मंडळ घेणार आहे. त्याचप्रमाणे पीकमोजणी क्षेत्र अभ्यासाची सुधारीत कार्यपध्दती सुध्दा मेरीकडून मान्यतेसाठी ई-प्रशासनाकडे गेली आहे.

अशी लागली घरघर

मेरीत धरणाशी संबंधित कामे येथे होत असल्यामुळे देश-परदेशातून येथे काम येत होती. नंतर संशोधन विभागात बाहेरील देशातून प्रतिकृती तपासणीची कामे बंद झाली. त्यानंतर राज्यातील धरणांची कामे येत नसल्याने हा विभागाला घरघर लागली. जलाशय गाळ सर्वेक्षण व सुदूर सर्वेक्षण हे दोन विभाग वगळता सामग्री चाचणी, संरचनात्मक संशोधन, महामार्ग संशोधन, भूकंप आघात सामग्री, सामग्री चाचणी अशा विभागांकडे फारशी कामे नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनप्रश्नी शिक्षक संघटना आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे वेतन गेल्या चार ते पाच महिन्यांपासून एनडीसीसी बँकेकडे थकीत आहे. शिक्षकांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा असूनही रोख रक्कम किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे मिळत नसल्याने शिक्षकांचे हाल होत आहेत. वारंवार आंदोलने करुनदेखील अद्याप परिस्थिती सुधारत नसल्याचे पाहता नाशिकमधील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत दोन दिवसांत निर्णय द्या, अथवा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाला दिले आहे.

चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतरच्या काळापासून शिक्षकांचे वेतन रखडलेले आहे. वेतन करण्यासाठी एनडीसीसी बँकेकडेच पैसे नसल्याचे उत्तर शिक्षकांना दिले जात आहे. मात्र यामुळे कुटुंबातील आजारपण, लग्न समारंभ, विमा हफ्ते, गृहकर्जाचे हफ्ते, मुलांची शैक्षणिक फी याबाबत खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणीमुळे शिक्षकांचे काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये सरकारविषयी प्रचंड असंतोष व संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेतल्यास सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images