Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दारणा नदीत युवक बुडाला

$
0
0

देवळाली कॅम्प : शेणीत परिसरातील दारणा नदीकिनारी हातपाय धुण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

कौसलेंद्र राघवेंद्रसिंहा गौर हा (१७) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. कौसलेंद्र काही मित्रांसोबत पट्टा किल्ला परिसरात फिरण्यासाठी गेला होता. नदीपात्र दिसल्याने उन्हाच्या हात पाय धुण्यासाठी उतरलेल्या सहा जणांपैकी कौसलेंद्र बुडाला. तो राजपूत कॉलनी, रायगड नगर, वडनेर दुमाला येथील रहिवासी आहे. घटनेनंतर जीवरक्षक दलासह कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन यंत्रणेची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र, सांयकाळी उशिरापर्यंत कौसलेंद्र आढळून आला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी देवळाली कॅम्प पोलिसांनी नाशिक येथून विशेष बोटदेखील मागविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेसबुकच्या माध्यमातून साडेआठ लाखांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेसबुकवरील ओळख आणि नंतर सततच्या चॅटिंगमधून विश्वास संपादन करीत वृध्दास स्वस्तात वस्तू देण्याचे अमिष दाखवण्यात आले. फेब्रुवारीपासून चार एप्रिलपर्यंत भामट्यांनी तब्बल साडेआठ लाख रुपये उकळले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून, सोशल मीडियाचा दुरपयोग मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पुढे येत आहे.

या प्रकरणी मुंबई नाका परिसरातील कालिका दर्शन सोसायटीत राहणाऱ्या अरुणकुमार जगन्नाथ पाटील (६३) यांनी तक्रार दिली आहे. काही महिन्यापूर्वी पाटील यांची फेसबुकच्या माध्यमातून हॅप्पीनेस डेव्हिड एक्स्प्रेस इलाईट सर्व्हिस या कंपनीच्या एजंटशी संपर्क झाला. कंपनीतील भामट्यांनी पाटील यांच्याशी चॅटिंगच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित केला. यात आरोपींनी पाटील यांना स्वस्तात महागड्या वस्तू देण्याचे अमिष दाखविले. रोजच्या संपर्कामुळे पाटील यांनी भामट्यांवर विश्वास ठेवला. तसेच २४ फेब्रुवारी ते १८ एप्रिल २०१७ या काळात कंपनीच्या एजंट, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध बँकांच्या खात्यांमध्ये तब्बल आठ लाख ३२ हजार रुपये जमा केले. डीडी जमा करूनही पुढील काम होत नसल्याने पाटील यांना फसवणूक झाल्याची शक्यता वाटली. त्यानुसार, त्यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. लहाडेंच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवैध गर्भपात प्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ. वर्षा लहाडे यांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने एका दिवसाची वाढ केली. डॉ, लहाडे तपासात सहकार्य करत नसल्याचा मुद्दा सरकारी पक्षातर्फे कोर्टात मांडण्यात आला.

न्यायालयीन कोठडीमुळे सेंट्रल जेलमध्ये असलेल्या डॉ. लहाडे यांना ९ मे रोजी म्हसरूळ पोलिसांनी कोर्टाच्या मंजुरीने ताब्यत घेतले होते. तपासासाठी कोर्टाने डॉ. लहाडेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी लहाडेला कोर्टात हजर करण्यात आले. डॉ. लहाडे तपासात सहकार्य करीत नसल्याचा मुद्दा सरकारी पक्षाने कोर्टाने सप्रमाण उपस्थित केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने डॉ. लहाडेच्या कोठडीत एका दिवसाने वाढ केली. डॉ. लहाडेविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अवैध गर्भपात प्रकरणी तर म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये बेकायदा हॉस्पिटल सुरू करून प्रॅक्टिस करणे तसेच औषधे व मशिनरी ठेवणे या संदर्भांत गुन्हा दाखल आहे. सरकारवाडा पोलिसांनी डॉ. लहाडेकडे चौकशी केली असून, या प्रकरणी कोर्टाने डॉ. लहाडेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या म्हसरूळ पोलिस डॉ. लहाडेकडे चौकशी करीत आहेत. प्रयाग हॉस्पिटलमध्ये कोणत्या डॉक्टरांचा संपर्क येत होता. गर्भपाताच्या औषधांचा वापर कोणावर व कसा झाला तसेच सोनोग्राफी मशिनसह इतर मशिनरींचे गौडबंगाल पोलिसांना शोधून काढायचे आहे.

‘त्या’ भूलतज्ज्ञाच्या चौकशीची मागणी

प्रयाग हॉस्पिटलशी सतत संपर्कात येणाऱ्या डॉ. साहेबराव झिरवाळ यांची चौकशी करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील केदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सिव्हिलमध्ये अवैध गर्भपात होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. लहाडेंना अटक झाली. मात्र, यात मोठे रॅकेट असून, त्यात सहभागी होणाऱ्या इतर पांढरपेशा व्यक्ती समोर येणे आवश्यक आहे. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असले तरी डॉ. झिरवाळ यांचा प्रयाग हॉस्पिटलशी सतत संपर्क येत होता. लहाडे प्रकरण समोर आल्यापासून डॉ. झिरवाळ यांचे वर्तन संशयास्पद आहे. त्यांच्याविराधात अनेक तक्रारी असून, त्यांनी घेतलेल्या पदव्यादेखील संशयास्पद असल्याचा दावा केदार यांनी केला आहे. या प्रकरणी सिव्हील प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केदार यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर ‘मटा’ने सर्वप्रथम प्रकाश टाकला होता. त्यानुसार, सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी एक कमिटी स्थापन केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, डॉ. झिरवाळ यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलेनगर परिसरातून सराईत गुंड जेरबंद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खूनाच्या गुन्ह्यात तब्बल वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत संशयितास क्राइम ब्रँचच्या युनिट एकने फुलेनगर येथून जेरबंद केले. या पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताच्या माहितीनुसार सदर संशयित पकडण्यात आला. त्याने लासलगाव येथे सोनाराचे दुकान फोडल्याची कबुली दिली. संशयितांकडून गावठी कट्ट्यासह काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. संशयितास शुक्रवारी कोर्टाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सागर इश्वर खैरनार, असे संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने लाखलगाव परिसरातील गौरव पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याचा छडा लावला आहे. या गुन्ह्यातील सात जणांच्या टोळक्याने अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून सागर खैरनारच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पंचवटी हद्दीत २०१४ मध्ये झालेल्या एका खुनातील प्रमुख संशयित म्हणून सागरवर आरोप आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी हायकोर्टाने त्याचा जामीन रद्द केला. मात्र, यानंतर तो फरार झाला. पोलिस त्याच्या मागावर होते.

लाखलगाव दरोड्यातील संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पंचवटीतील फुलेनगर भागात पोलिसांनी सागरला जेरबंद केले. गावठी कट्टा घेऊन सागर फिरत असल्याच्या माहिती पोलिसांना होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्यास पकडले. अंगझडतीत त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतुसे आढळले. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने शहर तसेच जिल्ह्यात घरफोडी, मोबाइल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग असे अनेक गुन्हे केले असून, यातील एका एका गुन्ह्याची माहिती समोर येते आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपायुक्त विजय मगर व युनिट एकचे निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एन. एन. मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, सुभाष गुंजाळ, संजय पाठक, जाकिर शेख, हवालदार चंद्रकांत सदावर्ते, अनिल दिघोळे, निर्मला हाके, संजय सूर्यवंशी, फरिद शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयिताच्या कुटुंबीयांना चोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चार वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताच्या कुटुंबियास संतप्त जमावाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी जिल्हा कोर्टाच्या आवारात घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यामुळे जिल्हा कोर्टात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

सिन्नर फाटा येथील फरसाण कारखान्यात कामाला असलेल्या महिलेच्या चार वर्षांच्या मुलीवर कारखाना मालकानेच क्रूरपणे अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. मुलीच्या आईला काम सांगून संशयिताने महिलेचे घर गाठले. यानंतर पीडित मुलीला सोबत घेऊन स्वत:च्या घरी अत्याचार केला. ही माहिती समजल्यानंतर संतप्त जमावाने ओढारोड येथील वृंदावन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुभाष प्रकाशचंद झंवर (५१) या संशयितास बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांनी झंवरला अटक करून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दरम्यान, संशयितास कोर्टात शुक्रवारी हजर करण्याची शक्यता गृहीत पकडून पीडित मुलीच्या नातेवाईकांसह नाशिकरोड परिसरातील काही कार्यकर्ते कोर्टात पोहचले. यात १५ ते २० महिला आणि पुरुषांचा समावेश होता. यावेळी संशयिताची पत्नी, मुलगा आणि भाऊ हेदेखील आले. पीडित मुलीला भेटण्याऐवजी, संशयितास वाचवता काय? असा प्रश्न करीत संतप्त जमावाने झंवरच्या कुटुंबातील या तिघांना मारहाण केली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत जमावाला दूर नेले. यामुळे कोर्ट परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पीडित मुलीच्या अंगावर अनेक गंभीर जखमा असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अमानवीय प्रकारामुळे गुरूवारीदेखील कोर्ट परिसरातील मोठा जमाव जमा झाला होता. मात्र, संशयिताला कोर्टात हजर करण्यात आले नव्हते. संशयित आरोपीवर उपचार सुरू असून, त्यास शनिवारी (दि. १३) कोर्टात हजर केले जाऊ शकते.

झंवरचा कारखाना लक्ष्य

सिन्नर फाटा : सिन्नर फाटा येथील नेहे मळा परिसरातील चार वर्षीय बालिकेवरील बलात्कार प्रकरणातील संशयित सुभाष झंवर या नराधमाच्या कारखान्याला संतप्त जमावाने लक्ष्य केले. फरसाण बनविले जात असलेल्या शेडची जमावाने तोडफोड केली. बालिकेवरील बलात्कार प्रकरणाची बातमी पसरताच शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही नेहे मळा भागातील संतप्त नागरिक कारखान्याकडे चालून आले. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान, बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

फाशीच्या शिक्षेची मागणी

देवळाली कॅम्प : सिन्नर फाटासह मालेदुमाल, तळ्याच्या पाडा (ता. दिंडोरी) अशा घटनांमध्ये चिमुरड्या मुलींसह युवतींवर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनांमधील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी केली आहे. संघटनेतर्फे बलात्काराच्या घटनांचा शुक्रवारी तीव्र निषेध करण्यात आला. नाशिकरोड पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दरम्यान, प्रेरणा बलकवडे व शिष्टमंडळाने पीडित चिमुरडीची बिटको हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत विचारपूस केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालक, नातेवाईकांची कर्जवसुली करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी धडपडणाऱ्या संचालकांना सरकारकडून मदत मिळवून घेण्यात अपयश आल्यानंतर संचालक मंडळाने हातपाय मारण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याचा व टॉप टेन थकबाकीदारांची यादी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संचालक व त्यांच्या नातेवाईकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच अधिकाऱ्यांना वसुलीची डेटलाइनही देण्यात आली असून, मुदतीत वसुली केली नाही तर कारवाईचाही इशारा संचालक मंडळाने दिला आहे.
जिल्हा बँक संचालक मंडळाची मासिक बैठक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शेतककऱ्यांना खरीप हंगामासाठी करायवयाच्या कर्जपुरवठ्यावरही चर्चा झाली. बँकेची आर्थिक स्थिती पाहता खरीप कर्जपुरवठ्यासाठी यापूर्वी शेतकऱ्यांकडे असलेली अडीच हजार कोटींची थकबाकी वसूल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही वसुली वाढविण्याचे निर्देश अध्यक्षांना अधिकाऱ्यांना दिले. येत्या महिनाअखेर बिगर शेती कर्ज घेतलेल्या थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई करावी असे निर्देश दिलेत. जिल्हा बँकेला कोणत्याही परिस्थितीतून आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा निर्धार यावेळी संचालक मंडळाने केला. नवीन कर्जवाटप करताना शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच नियम व अटी लागू करा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

संचालकांचे राजीनामा नाट्य
जिल्हा बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एकीकडे अध्यक्षांसह काही संचालक प्रयत्न करत असताना, भाजपच्या दोन संचालकांनी मात्र राजीनामे देऊन धक्का दिला आहे. डॉ. अपूर्व हिरे व डॉ. अद्वय हिरे या दोन्ही संचालकांनी बँकेचे कामकाज असमाधानकारक असल्याचे सांगत, आपले राजीनामे संचालक मंडळाकडे भिरकावले. संचालक मंडळानेही त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. जिल्हा बँकेबाबत सभासदांमध्ये तीव्र संताप आहे. बँकेच्या ध्येय उद्दिष्टांस हरताळ फासण्याचे काम केल्यानेच बँकेवर ही वेळ आल्याची टीका त्यांनी राजीनामा पत्रात केली आहे. बँकेच्या असमाधानकारक कामकाजामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिरे कुटुंबियांच्या संस्थांकडे बँकेची पाच ते सहा कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे अशा संकटसमयी त्यांच्याकडून बँकेला मदतीची गरज असताना, त्यांनी दिलेल्या राजीनाम्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सहकार मंत्र्यांकडून उपदेशाचे डोस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्रशासनाला मदतीऐवजी त्यांच्या उपदेशाचेच डोस एकावे लागले. जिल्हा बँकेला बिकट आर्थिक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी पाचशे कोटींचा कर्जपुरवठा करावा, अशी मागणी बँकेच्या वतीने करण्यात आली. कर्ज पुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, जिल्हा बँकांनी त्यांच्याकडील आपली थकीत पीककर्जाची वसुली तत्काळ करावी, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या पदरीही निराशाच हाती आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोलाविलेल्या राज्यातील अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीस राज्य बँकेचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे, कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड, सहकार सचिव संधू, आयुक्त पाटील यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणसं जोडणारा माणूस

$
0
0

वंदना अत्रे

अनुलोम विलोम प्राणायाम करीत असताना उजव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन तो फुफ्फुसा पर्यंत पोचलाच नाही तर... तर कदाचित माणसाचा श्वास कायमचा थांबू शकेल.. पण असे घडते ते सामान्य माणसाच्या बाबतीत. जेव्हा भीष्मराज बाम नावाच्या माणसाचा हा श्वास त्यांच्या फुफ्फुसापर्यंत पोचत नाही तेव्हा काय होते नेमके? तेव्हा अनेक माणस निराधार होतात, त्यांच्या पायाखालचा आधार जातो. कोण आहेत ही माणस? नाशकात मोनाली गोऱ्हे सारखी एखादी शूटर, शंतनू गुणे सारखा एखादा शिक्षणात काम करणारा माणूस, डॉ. भरत केळकरांसारखा एखादा जगभरात वैद्यकीय सेवा देण्यासाठी लागणारी हिम्मत मिळवणारा डॉक्टर आणि माझ्यासारखी एखादी सतत कॅन्सरशी लढत असलेली सामान्य स्त्री किंवा तिकडे ह्या सगळ्यांच्या पलीकडे आणि लौकीकाने खूप मोठी असलेली एखादी अंजली भागवत किंवा गगन नारंग ही आणि अशी लाखो...! भारतात आणि बाहेरच्या आडव्या-उभ्या जगात बाम सरांनी जोडलेली.

एकदा भेटल्यावर त्यांना हक्काने भेटणारी, घरी नेणारी, आपले छोटे-मोठे प्रश्न घेऊन भक्तीने त्यांच्याकडे जाणारी... हे प्रश्न कधीच फक्त खेळातील नसत, कोणाच्या मुलीचा घटस्फोट,, कोणाच्या करीयर मध्ये आलेले भांबावलेपण, कोणाला एकाग्रतेचा प्रश्न, योगाचे, अभ्यासाचे, ध्यानाचे, साधनेचे आणि ह्या प्रत्येक प्रश्नाला जोडून असलेल्या जगण्याचे सुद्धा. समोर असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बाम सरांकडे मिळेल असा विश्वास कुठून येत होता? ठाऊक नाही पण तो होता. प्रत्येकाला. आणि त्यासाठी वेळी अवेळी सरांकडे जाण्याची, त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलण्याची मुभा कशी होती सर्वांना? ती बाम सर आणि काकूंनीच दिली होती, त्याच्या वागण्यातून, पाया पडतांना डोक्यावर पडणाऱ्या वत्सल आशीर्वादातून आणि त्याच्यामध्ये असलेल्या कमालीच्या, अतिशय दुर्मिळ असलेल्या साधेपणातून.... हा साधेपणा किती? आजारी रुग्णाला भेटण्यासाठी त्याच्या घरी, हॉस्पिटलमध्ये कुठे जाण्यास ते तयार. खेळाच्या, अभ्यासाच्या अगदी पहिल्या पायरीवर असलेल्या नवशिक्या विद्यार्थ्यांना दोनदोन तास बोलण्यास ते जसे तयार तसे भगवद्गीता किंवा उपनिषद ह्यावर बोलता बोलता ज्युलियस सीझर ते हॅरी पॉटर असा मोठा पल्ला सहज पार करणार... कुठे कमवले हे सगळे त्यांनी आणि कधी? ठाऊक नाही. पोलिस दलात काम करता-करता आणि रंगा बिल्ला सारख्या माणसांना हाताळताना बाबा आमटे आणि पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांच्यामधील मोठेपण जाणून त्यांच्या कामाशी स्वतःला जोडून घेण्याची संवेदनशीलता कशी सांभाळली त्यांनी? ठाऊक नाही... एकाच वेळी अनेक माणसांच्या आयुष्यात राहण्याचे आणि तरीही ह्या जगण्याच्या पलीकडे असलेल्या चैतन्याबद्दल चिंतन करण्याचे दुर्मिळ योग सामर्थ्य त्यांच्या ठायी होते. बाम सर आपल्याशी मनातील बोलतात, जिव्हाळ्याने बोलतात असे त्यांच्याजवळ असलेल्या प्रत्येकाला वाटत होते, ते खरे नव्हते, प्राणायाम करता-करता ते असा झटकन निरोप घेणार हे ठाऊक असते तर ती सभा ठरवलीच गेली नसती... आमचा आक्रोश तुम्हाला ऐकू येतो आहे ना?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये राबवा रेनवॉटर हार्वेस्टिंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाणीटंचाईची समस्या मनमाडकरांना वर्षानुवर्षे भेडसावत आहे. त्यामुळे या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी शहरवासीयांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबवावा. असे केल्याने शहरातील पाणीटंचाईची समस्या दूर होईल, असे प्रतिपादन क्लायमेट रिअॅलिटी प्रोजेक्ट इंडियाचे प्रणेते कर्नल शशिकांत दळवी यांनी केले.

मनमाड नगरपरिषद तसेच संस्कार खेळवाडी संस्कार प्रज्ञा जयोस्तुते प्रतिष्ठान संकल्प संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भगीरथ प्रयास २०१७’ या चर्चासत्रात उपक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष पद्मावती धात्रक चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या. या चर्चासत्रात

कर्नल दळवी यांच्यासह, स्वामी कंठानंद, निखील झंवर आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मनमाड पालिका, तेल कंपन्या, औद्योगिक प्रतिष्ठान, शासकीय कार्यालय आदींनी रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घ्यावा, असे अवाहन प्रमुख वक्त्यांनी या चर्चासत्रात केले. सराफ असो.चे सुरेश लोढा, अरुण सोनवणे, मनमाड अर्बन बँकेचे संजय वडनेरे, हॉटेल व्यावसायिक राजू रॉय, संकल्प संस्थेचे तुषार गोयल आदींनी मार्गदर्शन केले. किशोर कुडाळ, अमोल देव, मनोज नलावडे यांनी संकल्पना, उद्देश समजावून सांगत या उपक्रमाची गरज स्पष्ट केली. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक गणेश धात्रक, प्रमोद पाचोरकर, विनय आहेर, महेंद्र शिरसाठ, विलास कटारे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

संस्कार खेळवाडी, संस्कारप्रज्ञा संस्था, श्री संकल्प बहुऊद्देशीय सेवाभावी संस्था यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता डाळिंबाचीही अमेरिकावारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कोकणचा राजा हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया व इतर देशात निर्यात केल्यानंतर लासलगावच्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमधून डाळिंबाचीही यशस्वी निर्यात सुरू झाली आहे. येथून अमेरिकेला प्रथमच चार मेट्रिक टन डाळिंब निर्यात करण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात द्राक्षांसोबतच डाळिंब बागांची संख्या गेल्या काही दिवासांत वाढली आहे. नाशिकसोबतच सोलापूर, अहमदनगर, सांगली, पुणे, सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. बुलढाणा, जालना, बीड, औरंगाबाद, जळगाव या जिल्ह्यांतही डाळिंबाची लागवड वाढत आहे. लासलगाव येथील भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये प्रथमच डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करून चार हजार किलो डाळिंब अमेरिकेला निर्यात करण्यात आले आहेत.

आंब्यांची ऑस्ट्रेलियाला निर्यात

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या आंब्यांची युरोप, अमेरिका नंतर आता ऑस्ट्रेलियालासुद्धा निर्यात सुरू झाली आहे. देशातील पहिली आंब्यांची कन्‍सायमेंट लासलगाव येथून प्रक्रिया होऊन ऑस्ट्रेलियासाठी रवाना करण्यात आली आहे. यामधून १२२४ किलो केशर आंबे भाभा अणू संशोधन केंद्राच्या लासलगाव येथील रिसर्च सेंटरमधून प्रक्रिया होऊन मुंबईमार्गे ऑस्ट्रेलियासाठी रवाना करण्यात आला. ४०८ बॉक्सेसमध्ये हे केशर आंबे असून, एका बॉक्समध्ये तीन किलो आंबे आहेत. जूनअखेरपर्यंत १०० टन आंबा हा निर्यात होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी लासलगाव येथे आंब्यांवर विकिरण होत होते. मात्र यावर्षी डाळिंबावरही विकिरण प्रक्रिया करून पहिल्याच वेळी चार मेट्रिक टन डाळिंब अमेरिकेला पाठविण्यात आले आहेत.

- प्रणव पारेख, प्लांट इंचार्ज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हताश शेतकऱ्यांनी गुरांपुढे टाकला कांदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलनटंचाईच्या झळा सहा महिने उलटूनही बसत आहेत. बागलाण तालुक्यातील ताहाराबादसह परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे कांद्याने भरलेल्या खळ्यात शेळ्या-मेंढ्या सोडल्या. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा जनावरांपुढे टाकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर डाळिंब बागांवर कुऱ्हाड चालविण्यायह कांदा, टोमॅटो रस्त्यावर टाकण्याची वेळ ओढावली आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाला तोंड देत कसाबसा पिकविलेला कांदा तरी खिशात दोन पैशांचे दान टाकेल, अशी अपेक्षाही आता फोल ठरत आहे. दरवर्षी कुठल्यातरी संकटात अडकून कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होत आहे.

गेल्या वर्षी शासनाच्या नियमानुसार घेईल त्याची आडत पद्धतीवरून निर्माण झालेल्या वादात कांदा फसला. शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी करायला नकार दिला. त्यामुळे दीड ते दोन महिने कांदा बाजार ठप्प झाला आणि चाळीत ठेवलेला कांदा खराब व्हायला सुरुवात झाली. त्यातच लाल कांदाही बाजारात दाखल झाल्याने कांद्याचे दर आणखीन घसरले. त्यात गोणी पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या क्विंटलमागे वाढ व्हायला सुरूवात झाली.

कांदा बदलत्या हवामानानुसार खराब व्हायला सुरूवात झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा जनावरांपुढे म्हणून टाकायला सुरुवात केली आहे. ताहाराबाद परिसरात अनेक खळ्यांमध्ये गुरांपुढे हा कांदा टाकला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक हतगड

$
0
0

ऐतिहासिक हतगड
- रमेश पडवळ



नाशिकच्या अंगणात असंख्य किल्ले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे ६२ हून अधिक गडकिल्ले नाशिकला लाभले आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी पुरेशे प्रयत्न व्हायला हवेत. मात्र यासाठी आपल्या किल्ल्यांबाबत तसेच त्याच्या इतिहासाबाबत बालमित्रांना माहिती करून घेणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटीदरम्यान जिंकलेला हतगड या किल्ल्यांमध्ये असाच सुंदर अन् ऐतिहासिक किल्ला आहे. नाशिकहून सापुताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताला आडवा पहुडलेला एक पाषाण आपल्याला आकर्षित करतो. हा पाषाण म्हणजेच हतगड. हतगडाचे मूळ नाव हतगरू म्हणजे हद्दीवरचा गड आणि हस्तगिरी असेही म्हटले जाते. हा गड महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आहे. हतगडावरून सापुताऱ्याचा रम्य परिसर पाहण्यासारखा आहे. बागूल राजांचा कवी रूद राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम या ग्रंथात बागूल राजे हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. बागलाणात बागूल राजांची कारर्किद १३०० ते १७०० अशी आहे. तर रूद्र कवीने १५९६ मध्ये राष्ट्रौढवंशम् हे महाकाव्य लिहिले. हतगडावरील शके १४६९ (सन १५४७) मध्ये कोरलेला शिलालेख बागूल राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याची साक्ष देतो. या शिलालेखात भैरवशहा या राजाच्या कामगिरीचा उल्लेख आहे. त्यापूर्वी हतगड निजामशाहीत होता. बागूल राजाकडून तो पुन्हा निजामशाहीत गेला. दिल्ली बादशहाच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असाही केल्याचे दिसतो. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्यांपैकी एक. दख्खनच्या मोहिमेसाठी शके १५८५ (सन १६६३) मध्ये सुरगणा परिसरात पाठविले होते. यावेळी हतगड किल्ला आदिलशाहाचा सुभेदार शुराबखान हा किल्लेदार होता. गोगाजीराव मोरे यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला शके १५८६ (सन १६६३) मध्ये ताब्यात घेतला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीपूर्वी हा किल्ला ताब्यात घेतला होता. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरेंचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपतींनी त्यांना हतगड परिसरातील बारा गावांची देशमुखी दिली होती. दिल्लीच्या अकबर बादशहाच्या सांगण्यावरून सय्यद अब्दुल्ल यांचा मुलगा हसन अली याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी स्वारी केली. त्यावेळी किल्लेदार गंगाजी मोरे या किल्लेदाराने निकराचा लढा दिला. मात्र मोरेंचा पराजय झाला. तेव्हा किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला. हसन अलीने किल्ला जिंकला हे सांगण्यासाठी दिल्ली बादशहाला ९ ऑगस्ट १६८८ रोजी हतगडची सोन्याची प्रतिकृत चिन्ह सादर केली होती. यावेळी बादशहाने हसनअलीला ‘खान’ ही पदवी बहाल केली. हतगडच्या पायथ्याशी गंगाजी मोरे या किल्लेदाराची समाधीही आहे. हतगडचे चढन अगदी सोपे असून, वरपर्यंत गाडी जाते. हतगडचे प्रवेशद्वार, शिलालेख व गडावरील इमारतींचे अवशेष तसेच धान्य कोठारे व पाण्याचे टाके पाहण्यासारखे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रीडाभीष्म’ हरपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, कविता राऊत आदी खेळाडूंच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम (वय ७९) यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणोत्क्रमण झाले. महात्मानगर येथे व्याख्यान देत असतानाच ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुले नरेंद्र व अजित असा परिवार आहे. पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदांवर काम केल्यानंतर त्यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी, १३ मे रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

क्रीडा क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे. क्रीडा मानसोपचार या विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. मानसिक तणावाखाली आलेल्या खेळाडूंना उभारी घेण्याचे बळ बाम यांच्या मार्गदर्शनातून मिळते, असा त्यांचा लौकिक होता. इंडियन ऑलिम्पिक टीमचे ते मार्गदर्शकही होते. त्र्यंबकेश्वर येथील योगविद्या गुरुकुलमधील साधकांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, सुमा शिरूर, अंजली भागवत, गगन नारंग, गीत सेठी, कविता राऊत यांच्यासारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण दिले होते. क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानामुळे राज्य सरकारने त्यांना २०११-१२ मध्ये ते शिवछत्रपती पुरस्कार, तर २०१४ मध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरविले होते. पोलिस महासंचालकपदी असताना त्यांना राष्ट्रपतिपदकानेही गौरविण्यात आले होते.

उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी प्रथम श्रेणीतून बीएची पदवी मिळवली होती. अॅप्लाइड मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक हा त्यांचा विषय होता. १९६३ मध्ये डेप्युटी सुपरिटेंन्डेंट ऑफ पोलिस या पदावर ते राज्याच्या पोलिस दलात दाखल झाले. १८ वर्षे त्यांनी प्रत्यक्ष पोलिस दलात काम केले. त्यानंतर गृहमंत्रालयात त्यांची डेप्युटेशनवर बदली झाली.

बाम यांची ग्रंथसंपदा

पोलिस दलातर्फे प्रकाशित होणाऱ्या दक्षता मासिकाचे ते दोन वर्षे संपादक होते. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरच्या वृत्तपत्रांत ते सातत्याने लिखाण करीत होते. त्यांनी क्रीडा मानसोपचार या विषयावर अनेक पुस्तके लिहिली. ‘मना सज्जना’ आणि ‘मार्ग यशाचा’, ‘विजयाचे मानसशास्त्र’ ही त्यांची सर्वांत जास्त लोकप्रिय ठरलेली पुस्तके होय. त्यांचे ‘विनिंग हॅबिट’ हे पुस्तक हिंदी मराठी, तामिळ, पंजाबी भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. सध्या ते नॅशनल रायफल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅप्पी स्ट्रीट्स’चा उद्या नाशिकरोडला धमाका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांच्या चर्चेत असलेला ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ उपक्रम यंदा पुन्हा नाशिकरोडकरांना अनुभवायला मिळणार आहे. रॉक बॅण्ड, गिटार, पोलिस बॅण्‍डसह विविध खेळ, पेंटिंग अशा धम्माल मौजमस्तीची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे.

बिटको चौक ते कोठारी कन्या शाळा या मार्गावर १४ मे रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत ‘हॅप्पी स्ट्रीट सीझन ३’ ला सुरुवात होईल. सुरुवातीला झुंबा आणि विविध प्रकार सादर होतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. केवळ धमाल करायची आहे. ही धमाल करण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. आजी-आजोबांनी आपल्या सुना-मुलं आणि नातवांसह हजेरी लावली तरी चालणार आहे. आपल्या प्रतिभेला चालना देण्यासाठी हा उपक्रम निश्चित महत्वाचा ठरणार आहे.

जेलरोडला होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीट्समध्ये राजू दाणी आणि ग्रुपतर्फे, नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहेत. यावेळी उपस्थितांना हे प्रकार करून घेता येतील. यावेळी नाशिकरोडकरांसाठी खास रॉक बॅण्‍ड शोचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी इंड‌ियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल गीतांचे प्रकार सादर केले जाणार आहेत. कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे नागरिकांना यातील बारकावे समजावून सांगणार आहेत. त्याचप्रमाणे ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर करायचा, याची माह‌िती देणार आहेत. मोहन उपासनी व रवींद्र जोशी हे बासरी वादन करणार आहेत. प्रतीक हिंगम‌िरे आणि अर्चना पेखळे हे झुम्बाचे प्रात्यक्षिक दाखवून नागरिकांकडून करुन घेणार आहेत. मंदार यांचे फोटो एक्झिब‌िशन होणार असून, अनिकेत जाधव रॉक बॅण्‍ड शो सादर करणार आहे. हर्षल शिंदे हे ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवणार आहे. नरेंद्र पुली आणि त्यांचा शिष्यगण यावेळीही गिटार वादन करणार असून यावेळी जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश करणार आहेत. सौरभ हे टॅटू आर्टिस्ट उपस्थितांना टेम्पररी टॅटू काढून देणार आहेत. त्याचप्रमाणे विविध शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी स्ट्रीट पेंटिंग करणार आहेत. तसेच विविध ग्रुपद्वारे ग्रुप डान्स सादर करण्यात येणार असून, यावेळी वेस्टर्न व बॉलीवूड डान्समधील नवीन प्रकार हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. प्रेमदा दांडेकर या उपस्थितांना रांगोळीचे विविध प्रकार दाखवणार आहेत. विजयराज हे जादूचे प्रयोग, हरीश- कॅरीकेचर, उमेश मार्शल आर्टस, दंडे ज्वेल्सचे संचालक मिं‌लिंद दंडे यांच्यातर्फे महिलांचे ढोल पथक आपली कला पेश करणार आहे. ‘मटा’च्या उपक्रमाला नाशिककर वाचकांनी नेहमीच भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यावेळीदेखील असाच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मटातर्फे करण्यात आले आहे.


कलाकारांनी येथे संपर्क साधावा

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे, महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डीसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइलवर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. योग्य कलाकृती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध समित्यांवर फुलणार ‘कमळ’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शहर सुधार, विधी व आरोग्य या तीन समित्यांवरील सदस्यांची निवड गुरुवारी (दि. १८) होणाऱ्या महासभेच्या बैठकीत केली जाणार आहे. भाजपला अतिरिक्त तीन सभापती व तीन उपसभापती अशा सहा जणांना या समित्यांवर संधी देता येणार आहे. त्यामुळे भाजपचे महापालिकेवरील वर्चस्व अधिक वाढणार आहे. प्रत्येक समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याने २७ सदस्यांना या समित्यांवर जाण्याची संधी मिळणार आहे.

शहरात प्रभाग समित्या अस्तित्वात असतानाही सत्ताधारी भाजपने अधिकाधिक सत्तेची पदे निर्माण करण्यासाठी अट्टाहास सुरू ठेवला आहे. गेल्या महासभेत शहरात नव्याने शहर सुधार, विधी व आरोग्य अशा तीन समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण, शिक्षण समितीच्या धर्तीवर या तीन समित्या राहणार आहेत. शहर सुधार समितीमुळे शहर विकासाला चालना मिळणार आहे, तर विधी समितीमुळे महापालिकेचा फायदा होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. या समित्यांची सदस्यसंख्या नऊ राहणार आहे. भाजपचे महापालिकेत बहुमत असल्याने या समित्यांवरही भाजपचाच वरचष्मा राहणार आहे. या समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी गुरुवारी होणाऱ्या महासभेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहेत. त्यात संख्याबळानुसार भाजपचे ५, शिवसेनेचे ३ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा एक सदस्य जाणार आहे. भाजपला तीन सभापती व तीन उपसभापतिपदे मिळणार आहेत. त्यामुळे भाजपमधील १८ सदस्यांना या समितीवर जाण्याची संधी मिळणार आहे.

--

भाजपचे प्राबल्य वाढणार

महापालिकेत असलेल्या प्रभागसह विविध समित्यावंर भाजपचे प्राबल्य निर्माण होणार आहे. शहरातील सहापैकी तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे सभापती होणार आहेत. त्या पाठोपाठ महिला व बालकल्याण समितीवरही भाजपचेच सभापती व उपसभापती असणार आहेत. शिक्षण समितीतही भाजपचेच वर्चस्व राहणार आहे. त्या पाठोपाठ आता नव्याने निर्माण होणाऱ्या तीन समित्यांवरही भाजपचेच सभापती राहणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापालिकेतील समित्यांवर भाजपचा झेंडा राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीसाठा २१ टक्क्यांवर

$
0
0

जिल्ह्यातील २४ पैकी १२ धरणांनी गाठला तळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा आता २१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नाशिक शहरासह आसपासच्या बहुतांश परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही आजमितीस ४१ टक्के पाणी शिल्लक असून, निम्म्या धरणांनी तळ गाठला आहे.

अंगाची काहिली करणाऱ्या मे महिन्यातील उन्हाने नागरिकांना नको नको करून सोडले आहे. तप्त उन्हाच्या झळांमुळे पाण्याची गरजही वाढू लागली आहे. शहरवासीयांसह जिल्हावासीयांची पाण्याची गरज भागविण्याचे काम २४ धरणे करतात. परंतु, या धरणांमधील सात महिन्यांपूर्वी ९० टक्क्यांच्यावर असलेला पाणीसाठा आता अवघ्या २१ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच तो सुमारे ७० टक्क्यांनी खाली गेला आहे. जिल्ह्यात गंगापूर, पालखेड आणि गिरणा धरण समूहांपैकी पालखेड धरण समूहातील पाणीसाठा १५ टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. या समूहात सर्वाधिक १३ धरणे असून, उपयुक्त पाणीसाठा दोन हजार ७७४ दशलक्ष घनफूट आहे. गंगापूर धरण समूहात चार धरणे असून, त्यापैकी गौतमी गोदावरी आणि आळंदी या दोन धरणांनी तळ गाठला आहे. गंगापूर आणि कश्यपीत मुबलक पाणी असून, तीन हजार ५७१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण २३ धरणांमध्ये १३ हजार ६५५ दलघफू म्हणजेच २१ टक्के पाणी शिल्लक आहे.

गतवर्षीपेक्षा तिप्पट पाणी

गतवर्षी मे महिन्याच्या पंधरवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा सात टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. २४ धरणांमध्ये एकूण चार हजार ७६१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. गंगापूर धरणात २५ तर धरण समूहात अवघा १७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गौतमी गोदावरी, मुकणे, नांदूरमध्यमेश्वर, भोजापूर, नागासाक्या आणि गिरणा ही धरणे कोरडीठाक पडली होती. यंदा मात्र तुलनेने समाधानकारक स्थिती असून, पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जाऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अटींमुळे झाली अडचण

$
0
0

प्रभागात होणार दोन अशासकीय सदस्यांची निवड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांवर प्रत्येकी दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या असून, त्यामुळे १२ जणांना संधी मिळणार आहे. या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करतांना संबंधित व्यक्ती राजकारणाशी संबंधित नसावा तसेच तो शासकीय सेवेत नसावा, अशा दोन महत्त्वपूर्ण अटी आहेत. त्यामुळे प्रभाग समितीवर वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावणाऱ्या राजकारण्यांच्या महत्त्वाकांक्षेला आता ब्रेक लागला आहे. या नियमातून सुटका करून घेण्यासाठी प्रसंगी पक्षाचे राजीनामे देण्याची तयारी काही इच्छुकांनी सुरू केली आहे.

महापालिकेत भाजपने सत्तेवर येताच शहर विकासाला चालना देण्याऐवजी पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना अधिकाधिक सत्तेची पदे देण्यावर भर दिला आहे. तीन विषय समित्यांपाठोपाठ आता प्रभाग समित्यांवर नगरसेवकांव्यतिरिक्त बाहेरील दोन सदस्यांना नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू केला आहेत. अद्यापपर्यंत महापालिकेत असे प्रयोग झाले नाही. परंतु, भाजपने आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी अशासकीय सदस्यांचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे. मुंबई सार्वजनिक अभिन्यास १९५० अन्वये ज्या व्यक्तीची सदस्य म्हणून नियुक्ती करायची आहे, त्या व्यक्तीची संस्था नोंदणीकृत असावी, त्या संस्थेचे तीन वर्षे लेखापरीक्षण झालेले असावे, लेखा परीक्षण विवरण पत्र कामांचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला असावा, नगरपालिकांशी संबंधित एक प्रकल्प त्या इच्छुक सदस्याने तीन वर्षांत पूर्ण केलेला असावा, ती व्यक्ती महापालिकेच्या सेवेत नसावी व राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसावा या प्रमुख अटी आहेत. त्यामुळे अनेकांच्या इच्छांना ब्रेक लागला आहे. या अटींची पूर्तता केलेल्या संस्था व त्याचे पदाधिकारी शोधणे सध्या तरी अशक्य दिसत आहे. राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती नसावी ही अट असली तरी पक्षाच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा देऊन प्रभाग समितीवर सदस्य म्हणून नियुक्त होता येणे शक्‍य असल्याने त्यादृष्टीने पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याची कसरत सध्या सुरू आहे. तसेच, काही ठेकेदारांना या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपमध्ये आतापासूनच लॉबिंग सुरू झाले आहे.

संख्याबळानुसार निवड

महापालिकेच्या सहा प्रभाग समित्या आहेत. प्रत्येक समितीवर नगरसेवकांव्यतिरिक्त दोन अशा १२ अशासकीय सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यांना समित्यांमध्ये मतदानाचा अधिकार राहणार नाही. प्रभागामधील बलानुसार या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे तीन समित्यांमध्ये भाजपचे सहा सदस्य जवळपास निश्चित आहेत. सिडकोत शिवसेनेचे सदस्य निवडले जातील. ज्या व्यक्तीला सदस्य म्हणून नियुक्त व्हायचे आहे, त्या व्यक्तीचा अर्ज त्याच्या नोंदणीकृत संस्थेमार्फत विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. विभागीय अधिकाऱ्यांकडून छाननी झाल्यानंतर विभागीय समितीच्या बैठकीत नगरसेवकांसमोर प्रस्ताव ठेवला जाईल. त्यात सदस्याची नियुक्ती जाहीर केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांची संपेना चलन प्रतीक्षा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये पुन्हा नोटांची टंचाई जाणवत असून, आजमितीस स्टेट बँक ऑफ इंडियाकडे केवळ ४० कोटींचे चलन शिल्लक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अन्य बँकांमध्येही नोटांचा खडखडाट असून, मंगळवारपर्यंत जिल्ह्याला ८० कोटींचे चलन प्राप्त होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर नाशिककरांनी चलनटंचाई अनुभवली. ही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आल्यानंतर आता पुन्हा चलनटंचाईच्या झळा नाशिककरांना बसू लागल्या आहेत. शहरातील बहुतांश एटीएम सेंटर्समध्ये नोटांचा खडखडाट असून, पैसे मिळतील अशा एटीएमची शोधाशोध नागरिकांना करावी लागत आहे. एक ना अनेक बँकांचे एटीएम सेंटर्स धुंडाळूनही पैसे ‌मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तातडीने पैशांची आवश्यकता असलेले नागरिक बँकांमध्ये धाव घेऊ लागले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहर शाखांकडे १० कोटी, तर ग्रामीणमधील शाखांकडे ३० कोटींचे चलन आहे. बँकेचे शहरात १३६, तर ग्रामीण भागात १०० एटीएम सेंटर्स आहेत. यापैकी बहुतांश एटीएम सेंटर्समध्ये नोटांचा खडखडाट आहे. अन्य बँकांकडेही फारसे चलन नसण्याची शक्यताच अधिक आहे.

लवकरच होणार चलनप्राप्ती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंगळवार (दि. १६ मे) पर्यंत ८० ते ९० कोटींचे चलन प्राप्त होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत उपलब्ध चलनावरच समाधान मानावे लागणार असल्याने नागरिकांना चलनटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शनिवार आणि रविवारी बँकांनादेखील सुटी असल्याने नागरिकांची अधिक गैरसोय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली कॅम्पमधील ९७ टक्के करभरणा रोखीने!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

सरकार सर्वच सरकारी कार्यालयांचा कारभार डिजिटल व कॅशलेस करण्याचा प्रयत्न असतानाच देवळालीत मात्र केवळ २ ते ३ टक्के नागरिकच ऑनलाइन पद्धतीचा वापर करत असल्याची स्थिती दिसून येत आहे. देशातील सर्वांत मोठ्या क्षेत्रफळात विस्तारलेले एकमेव कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणून लौकिक असलेल्या या शहरात कॅशलेसकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. देवळालीत नागरिकांना अजूनही विविध प्रकारचा करभरणा करण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.

५४ हजार लोकसंख्या असलेल्या देवळाली कॅन्टोन्मेंटचा करभरणा वर्षअखेरीस तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यापैकी केवळ दोन ते तीन टक्के करभरणा ऑनलाइन पद्धतीने होतो. मात्र, उर्वरित ९७ टक्के करभरणा थेट रोख स्वरूपाचा होत असल्याने नागरिकांना हा कर भरण्यासाठी दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. अशा वेळी आणखी एखादे काउंटर भरणा करण्याकरिता सुरू करावे किंवा डेबिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे. प्रशासनातर्फे करभरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी पावले उचलली जात असताना कॅशलेस होण्याबाबत मात्र उदासीनता दिसून येत आहे. एखाद्या बँकेमार्फत जर करभरणा करता आला, तर अधिक सोयीचे होणार असल्याने तसा प्रयत्नही प्रशासन का करू पाहत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

वेबसाइटबाबत अनभिज्ञता

देवळालीतील नागरिकांना करभरणा करण्यासाठी www.cbdeolali.org.in या वेबसाइटवर सुविधा उपलब्ध आहे. मात्र, तरीही नागरिक ऑनलाइन सुविधेचा वापर केवळ २ ते ३ टक्के एवढाच करतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाइन करभरणा करण्याकरिता या वेबसाईटचा वापर वाढविण्याकामी प्रबोधनाची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, २४ मेपर्यंत मुदत असल्याने नागरिकांनी करभरणा करून बोर्डास सहकार्य करण्याचा आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

अनेक नागरिक व्यवसायानिमित्त दिवसभर घराबाहेर राहतात. अशा वेळी रक्कम काढून कोणाच्या हातात देऊन करभरणा करावा लागत आहे. बोर्डाने याबाबत सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.

-डॉ. जगदीश कागदे, नागरिक

--

कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून लवकरच खासगी किंवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या आधारे स्वॅप मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे.

-विलास पवार, सीईओ, बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनमंत्री रावल आज नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल शनिवारी नाशिक जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. तान, ऑल इंडिया वायनरी असोसिएशन तसेच हॉटेल असोसिएशनशी संबंधित समस्या ते समजून घेणार असून, जिल्हा परिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत.

पर्यटनस्थळांची पाहणी करून विकासाला गती देण्यासाठी रावल शनिवारी (दि.१२ मे) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता ते सप्तशृंगी गडावरील फ्रॉनिक्युलर ट्रॉलीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या ट्रस्टींशी चर्चा करणार आहेत. दुपारी अडीच वाजता हॉटेल गेट वे येथे तान, नाशिक हॉटेल असोसिएशन, ऑल इंडिया वायनरी असोसिएशन तसेच इगतपुरी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. गंगा आरती सुरू करण्याबाबत ते पुरोहित संघाशी चर्चा करणार आहेत. दुपारी पावणेचारच्या सुमारास ते आंबा महोत्सवाला भेट देणार आहेत. त्यानंतर तपोवनात शुर्पनखा मंदिर, पंचवटीतील कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, रामकुंडाची पाहणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिसेस इंडिया’मध्ये मानसी उपविजेत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रच्या कन्या मानसी भावसार-अरबट्टी यांनी पुण्यात झालेल्या मिसेस इंडिया २०१७ स्पर्धेत द्वितीय क्रमांक व मिसेस टॅलेंटेड किताब पटकावला. प्रथम क्रमांक मुंबईतील मॉडेल अंजली राऊत यांनी पटकावला. शेवटच्या राउंडला २५ स्पर्धक पोहोचले होते. या प्रत्येक स्पर्धकांच्या वेगवेगळ्या फेऱ्या घेण्यात आल्या. त्यात मानसी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

मिसेस इंडिया ही विवाहित महिलांसाठी अनोखी स्पर्धा असून, केवळ सौंदर्यापेक्षा व्यक्तिमत्त्व, गुणवत्ता आणि संस्कृती आदी निकष यात प्राधान्यक्रमाने येतात. मानसी यांचे शिक्षण नवरचना हायस्कूल व धुळे येथील जय हिंद विद्यालयात झाले आहे. मानसी यांनी संगणक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली असून, त्यांचा आयटी कन्सल्टिंगचा व्यवसाय आहे. नाशिक-धुळे येथील बांधकाम व्यावसायिक दिलीप भावसार व तेजस्विनी महिला मार्गदर्शन केंद्राच्या पदाधिकारी संगीता भावसार यांच्या त्या कन्या असून, मुंबई येथील स्पाइन सर्जन डॉ. निखिल अरबट्टी यांच्या त्या पत्नी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images