Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘फडणीस’च्या महिला संचालकास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जादा व्याज अमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पुणे येथील फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर व फडणीस ग्रुपच्या महिला संचालक भाग्यश्री गुरव यांना आर्थिक गुन्हे शाखेने पुण्याहून अटक केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांच्या कोर्टाने तिला २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने संचालक विनय फडणीस याला यापूर्वी विक्रोळी येथून अटक केली होती. सध्या तो नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. शहरातील ४६० गुंतवणूकदारांनी आतापर्यंत गुन्हे शाखेकडे कंपनी विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. फसवणुकीची रक्कम देखील सुमारे १८ कोटींपर्यंत पोहोचली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातील फडणीस ग्रुपच्या कार्यालयावर सोमवारी छापा टाकला. संचालक भाग्यश्री सचिन गुरव हिला तेथून अटक करण्यात आली. तिला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले.

फडणीस ग्रुपच्या अन्य काही संचालकांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) फसवणुकीचा गुन्हे दाखल आहे. कंपनीविरोधात पुण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून कंपनीतील महत्त्वाचे दस्तऐवज व संगणक पुणे पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतला आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी गुन्हे शाखेने कोर्टात एस्क्रो खात्यासंदर्भात अर्ज केला आहे. त्यावर ७ जूनला सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी संपासाठी मतपेरणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यभर १ ते १० जून दरम्यान होणाऱ्या शेतकरी संपात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी होणार आहेत. त्यासाठी तालुकानिहाय बैठका होत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शांततेच्या मार्गाने हा संप करण्याचे ठरविण्यात आले आहे.

तालुक्यातील गिरणारे येथे बुधवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. संप काळात शेतकऱ्यांनी आपल्या घरांवर काळे झेंडे लावून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्याचा निर्णय घेतला.

या संपासाठी गावागावात शेत वस्तीवर पत्रके वाटणे, फ्लेक्स बोर्ड लावणे, मोटारसायकल रॅली काढणे, गाव परिसरात शेतीमाल विक्री १०० टक्के बंद ठेवणे, बाहेरून येणारा शेतीमाल विक्रीला प्रतिबंध करणे, भाजीपाला विक्रीला १०० टक्के प्रतिबंध करणे यासारखे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या संपाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या संपकाळात लग्न कार्यातील चालीरितींनाही कात्री लावण्यात आली आहे. त्यात हळद कार्यक्रमातील जेवणावळी, लग्नातील टोपी फेटे बंद, साखरपुडा, बस्ते घरगुती साधे पद्धतीने करण्याचा ठराव करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा संप शांततेने करून यशस्वी करण्याचा निर्धारही व्यक्त केला जात आहे. शेतकरी संपात फूट पाडणारे शेतकरी द्रोही ठरतील असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. गिरणारे येथील बैठकीत पुंडल‌कि थेटे, निवृत्ती घुले, बाळासाहेब हांडोरे, परसराम गायकर, भिकाभाऊ थेटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

रसद तोडण्याचा निर्णय

पंचवटी : शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातून भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदींची विक्री बंद करण्यात येणार आहे. नाशिकहून मुंबई आणि गुजरातमध्ये जाणारा शेतमाल पाठविणे बंद करावा, यासाठी शेतकऱ्यांना नाशिक कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रबोधन करण्यात आले.

शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी समिती स्थापन करून फलक लावणे, पत्रके पोहचविण्याचे काम करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. विष्णुपंत म्हैसधूणे, सचिन पिंगळे, राम खुर्दळ, भाऊसाहेब ढिकले आदी उपस्थित होते.

उपस्थितांनी राजकीय जोडे बाहेर काढून संपात सहभागी व्हावे. शेतकऱ्यांविषयी लोकप्रतिनिधींना कळवळा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संप करण्याची वेळ आली आहे. या संपासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये जागृती झाली आहे. मात्र शहराजवळच्या भागात २० ते २५ किलोमीटरच्या भागातून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो या भागातील शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. गावाकडून शहराकडे जाणारे मार्ग गाव पातळीवरच बंद करण्यात यावे. शहरातील रसद बंद करावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा संप होत असल्याने शेतकरी या संपात सहभागी होणार आहेत.

संपाच्या काळात शेतकऱ्याच्या वाहनांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. दूध उत्पादन करणाऱ्याचे प्रबोधन करताना दुधापासून विविध पदार्थ तयार करण्याची तयारी ठेवण्याची मानसिकता तयार करावी. या संपाच्या तयारीसाठी लागणारा खर्च मराठा क्रांती मोर्चाच्या उरलेल्या पैशातून करावा, अशी सूचना करण गायकर यांनी केली.

वकील संघाचा पाठिंबा

येवला ः एक जूनपासून सुरू होणाऱ्या शेतकरी संपाला येवला वकील संघाने पाठिंबा जाहीर केला आहे. वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश गायकवाड यांनी या पाठिंब्याबाबत माहिती दिली. नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी आदी समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे त्याने हक्कांसाठी लढणे योग्य आहे. या संपकाळात जर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तर येवला वकील संघ मोफत न्यायालयीन लढा देणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानाला गालबोट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या ८३ जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी अल्प प्रतिसाद, दुपारी शांतता आणि सायंकाळी प्रचंड गर्दी प्रत्येक मतदान केंद्रावर पहावयास मिळाली. सायंकाळी साडेपाच वाजताही मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. शहरात दोन ते तीन ठिकाणी हाणामारी, बाचाबाची झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. ६० ते ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

निवडणुकीमुळे आधीच वातावरण गरम झालेले असताना बुधवारी तापमानाचा पाराही ४४ अंशापर्यंत गेला. त्यामुळे मतदान केंद्रांवर दुपारनंतर शुकशुकाट होता. मात्र चार वाजेनंतर मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाली. शेवटच्या दीड तासात मतदानाची टक्केवारी वाढण्याचा अंदाज आहे. शहरातील पश्चिम भागात संगमेश्वर, सोयगाव, कॅम्प, आय. टी. आय. कॉलेज येथील मतदान केंद्रांवर सर्वाधिक गर्दी होती. काही मतदान केंद्रांवर साडेपाच वाजताच केंद्राचा दरवाजा लावून घेण्यात आल्याने मतदार व केंद्राध्यक्ष यांच्यात बचावाची झाली. मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान केंद्रावर असलेल्यांना क्रमांकाच्या चिठ्ठ्या देण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरु असल्यामुळे सरासरी ६५ ते ७० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रभाग २१ मध्ये सायंकाळी साडेपाचपर्यंत ७० टक्के इतके मतदान झाले होते.

पोलिसांकडून लाठीमार

दुपारनंतर शहरातील वेगवेगळ्या भागात हाणामारीचे प्रकार घडल्याने गालबोट लागले. शहरातील पश्चिम भागात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. तर पूर्व भागात एमआयएम, राष्ट्रवादी व काँग्रेस उमेदवार आणि पोलिसांमध्ये बचावाची झाली. संगमेश्वर भागात सेनेचे सखाराम घोडके व भाजपचे नरेंद्र सोनावणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमारही केला. दरम्यान सोनवणे व घोडके यांनी परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली असून सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पूर्व भागात नांदेडी स्कूल येथे काँग्रेस उमेदवार इस्त्राईल कुरेशी, राष्ट्रवादीचे आरिफ शेख व एमआयएमचे डॉ. खालिद युनुस शेख हे मतदान केंद्रावर वारंवार ये जा करून मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करीत असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. पो उपाधिक्षक गजानन राजमाने व त्या तिघांमध्ये हाणामारी झाली. तर प्रभाग २१ मधील मोहनबाबा नगर येथे आमदार असिफ शेख यांचे कार्यकर्ते अब्दुल रहमान यास एमआयएमचे कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

मतदारांसाठी सुविधा

मतदारांना अनुक्रमांक, मतदान केंद्र क्रमांक तत्काळ माहिती व्हावा यासाठी मतदान केंद्रांबाहेर मतदार सहाय्यता केंद्र उभारण्यात आले होते. तसेच दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर तसेच दिव्यांग सहायता वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्राबाहेर उमेदवार त्यांचे समर्थकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ नराधमाला फाशी द्या!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सिन्नर फाटा येथील एका चार वर्षे वयाच्या बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ व या घृणास्पद घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी गवळी समाजबांधवांनी नाशिकरोडमध्ये शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. या मोर्चात गवळी समाज बांधव हातात निषेधाचे फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नाशिकरोडमधील सिन्नर फाटा येथे काही दिवसांपूर्वी एका फरसाण कारखान्याच्या मालकाने आपल्या कारखान्यात कामाला असलेल्या महिला कामगाराच्या चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेतील पीड‌ित बालिकेच्या अंगावर आरोपीने ठिकठिकाणी चावे घेतले होते. या अमानवी व पाशवी घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी बुधवारी सकाळी गवळी समाजबांधवांनी येथील विभागीय महसूल आयुक्तालयावर शांतता न्याय मोर्चा काढला. या मोर्चात सर्व समाजबांधव सहभागी झाले. सकाळी साडेअकरा वाजता दुर्गा मंदिर येथून या मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा मुक्त‌िधाम, बिटको चौकामार्गे मेनगेटने विभागीय महसूल आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर आला. या ठिकाणी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना रोखले व प्रशासनाला निवेदन देण्यासाठी पाच मुलींना आयुक्तालयात जाण्यासाठी परवानगी दिली. उपायुक्त उन्मेष महाजन यांनी यावेळी निवेदन स्वीकारले. जगन गवळी, बापू निस्ताणे, मंदा गवळी, सागर गवळी, सोमनाथ हिरणवाळे, विजय घुले यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. ‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’, ‘लैगिक अत्याचाराचा निषेध असो’ अशा आशयाचे फलक या मोर्चात सहभागी महिला व पुरुषांच्या हाती होते. मोर्चेकऱ्यांनी दंडावर काळ्या फितीही बांधलेल्या होत्या. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बिजली, सुदाम भुजबळ, मंगेश मजगर आदींनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. यावेळी महाराष्ट्र राज्य गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष किसन हुंडीवाले, प्रांताध्यक्ष हिरामण गवळी, उमाकांत गवळी, अनिल कोठुळे, जगन गवळी यांनीही प्रशासनाला निवेदन दिले.
मोर्चेकऱ्यांच्या मागण्या
खटला जलद न्यायालयात चालविण्यात यावा. सरकारी वकील म्हणुन अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, पुराव्यांत कसूर होऊ नये, पीड‌ित बालिकेचे तिच्या कुटुंबियांसह पुनर्वसन व्हावे, आरोपीस फाशी व्हावी इत्यादी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग सभापतींकडून मायकोची पाहणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सर्वसामान्य महिलांसाठी असलेल्या मायको रुग्णालयात अनेक समस्या आहेत. यात काही दिवसांपासून पिण्याचे पाणीच उपलब्ध होत नसल्याने ‘मायको रुग्णालयात पाणीबाणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून ‘मटा’ने लक्ष वेधले होते. यानंतर सातपूरच्या सभापती माधूरी बोलकर यांनी मायको रुग्णालयाचा पाहणी दौरा केला.

याप्रसंगी बोलकर यांनी डॉक्टरांना गरज लागतील त्या बाबी तात्काळ नगरसेवकांना कळवा, अशा सूचना केल्या. तसेच पिण्याच्या पाण्याची नादुरूस्त पाइपलाइनदेखील दुरूस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मायको रुग्णालयात रोजच शेकडो गरोदर महिलांची तपासणीसाठी गर्दी होत असते. यात मात्र गेल्या काही दिवसांपासून पिण्याचे पाणीच रुग्णालयात नसल्याने महिलांची गैरसोय होत होती. याबाबत ‘मटा’ने लक्ष वेधल्यावर सातपूरच्या प्रभाग सभापती बोलकर यांनी तात्काळ रुग्णालयास भेट देत पाहणी केली. यावेळी अनेक समस्या सभापती बोलकर यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच रुग्णालयाच्या परिसरात नियमित स्वच्छता ठेवण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आदेश केले. याप्रसंगी नितीन निगळ यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते.


मायको रुग्णालयात येणाऱ्या महिला सर्वसामान्य कुटुंबातील असतात. यात रुग्णालयात पाण्याची सुविधा नसल्याने तात्काळ पाहणी दौरा केला. या वेळी अनेक समस्या रुग्णालयात दिसून आल्या. याबाबत डॉक्टर व महापालिकेच्या संबंधित विभागांना कळविण्यात आल्या आहेत.

- माधूरी बोलकर, सभापती, सातपूर प्रभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दानवेंचे स्वागत शिवसेना स्टाइलने’

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, धुळे

राज्यातील शेतकऱ्यांबद्दल अपशब्द बोलून त्यांची चेष्टा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आज (दि. २५) नंदुरबार जिल्ह्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या रावसाहेब दानवेंना नंदुरबार शहरात फिरकू देणार नाही, असा इशारा शिवसेना नंदुरबार तालुकाप्रमुख रमेश पाटील यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धपत्रक दिले आहे. या देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात भाजप सरकारला अपयश येत असले, तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द बोलून त्यांची चेष्टा केली आहे. असे असतानाही दानवे हे महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत. ते आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना नंदुरबारात पाय ठेऊ देणार नाही. ते शहरात फिरकल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या पत्रकाद्वारे शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा कंपन्यांना बंदच्या नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोठे उद्योग नाशिकमध्ये यावेत यासाठी ‘मेक इन नाशिक’चे भव्य आयोजन केले जात असतानाच जिल्ह्यातील सहा मोठ्या कंपन्यांवर बंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणावरुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्ह्यातील जिंदाल, राजाराणी स्टील, गरीमा, गोंगलु, एव्हरेस्ट व मॉन्टेक्स ग्लास या सहा कंपन्यांना उद्योग बंदचे आदेश दिले आहेत. यामुळे या दोन्ही उद्योगांचे वीज व पाण्याचे कनेक्शन तातडीने बंद होणार आहे. मंडळाच्या या कारवाईमुळे उद्योग जगतात खळबळ उडाली आहे.
मंडळाने केलेल्या कारवाईत जिंदाल, राजाराणी स्टील (सिन्नर) व गरीमा (सातपूर) या कंपन्यांवर प्रदूषणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर गोंगलू (चांदवड), एव्हरेस्ट (दिंडोरी) व मॉन्टेक्स (अंबड) या कंपनीचे संमतीपत्रक (लायसन्स) नाकारल्यानंतरही उत्पादन सुरू ठेवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील ३० कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात पंधरा कंपन्या नवीन, असून पंधरा कंपन्या आधीच बंद आहेत. बंद असलेल्या पंधरा कंपन्यांना ‘नॉट टू रिस्टार्ट’च्या नोट‌िसा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील मधुकर सहकारी कारखान्यालाही संमतीपत्रक नाकारल्यानंतर उत्पादन सुरू ठेवल्यामुळे कारखान बंद करण्याची नोटीस दिली आहे.
एकाचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेली ही कारवाई मोठी असून, त्यामुळे उद्योगजगत चांगलेच हादरले आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या कंपन्यांनी पूर्तता केली असून त्यांना स्टे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वरिष्ठ अधिकारी रजेवर असल्यामुळे त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेच्या प्रदूषणाची कारवाई ही तक्रारीवरुन केली असून, इतर कंपन्यांची कारवाई अगोदरच केलेली आहे. पण त्यांनी उत्पादन सुरू केल्यामुळे त्यांनी ही कडक पावले उचलली आहेत. ‘मेक इन नाशिक’ हा कार्यक्रम ३० व ३१ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. त्याअगोदर उद्योगांवर ही कारवाई केल्यामुळे उद्योजकांमध्ये संताप आहे. या नोट‌िसा दिल्यानंतर मंत्रालयातील अधिकारी व नेत्यांना फोनाफोनी सुरू झाल्यामुळे हा विषय सध्या उद्योगवर्तुळात खळबळ निर्माण करणारा ठरला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई एकदम होत नाही. त्यासाठी वेळोवेळी नोटीसा दिल्या जातात. त्या नोट‌िसांवरुन पूर्तता केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

या कायद्याखाली झाली कारवाई

जलकायदा १९७४ च्या कलम ३३ (अ) अन्वये व हवा कायदा १९८१ च्या कलम ३१ (अ) अन्वये उत्पादन बंद करण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत. याबरोबरच पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांना २४ तासांत या कंपन्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याचे तसेच वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठात सेंद्रिय आंबाविक्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने कृषीविज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील आंबा (पिकण्यायोग्य कैऱ्या) विकण्याचा निर्णय घेतला असून ३० रुपये किलोने तो विकला जाणार आहे. याअगोदर निविदा काढून हा आंबा विकला जात होता. पण विद्यापीठाने आता स्वतःचेच केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे नाशिककरांना चांगल्या दर्जाचे व माफक दरात हे आंबे उपलब्ध होणार आहेत. विद्यापीठीच्या या आंबा निर्मितीत रासायनिक खतांना फाटा देऊन पूर्णत: सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
मुक्त विद्यापीठाच्या सुमारे १५० एकर क्षेत्रापैकी कृषी विज्ञान केंद्राने १०० एकर क्षेत्रावर अत्याधुनिक पद्धतीने विविध फळबागांची लागवड करण्यात आलेली आहे. त्यात आंबा, चिकू, फणस, द्राक्षे, नारळ, आवळा, सीताफळ, लीची यासारख्या फळ झाडांची लागवड केली आहे. त्यापैकी १५ एकर क्षेत्रावर आंब्याच्या केसर, रत्ना, सिंधू, हापूस, बंगणपल्ली, आम्रपाली, दुधपेढा अशा विविध वाणांचे उत्पादन घेतले जाते.तेच आता विकले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुंदरनगर नावालाच ‘सुंदर’

$
0
0

नादुरूस्त सार्वजनिक शौचालय वाऱ्यावर

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

देवळाली गावातील सुंदरनगर हे नावालाच सुंदर आहे. कारण याठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या शौचालयांची नीट देखभाल करून पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.

देवळाली गावातील प्रभाग क्रमांक २२ मध्ये सुंदर नगरचे सुलभ शौचालय आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तेथे स्वच्छता नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे पाण्याची सुविधा नाही. मोटर असूनही ती वापरात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. येथे सुमारे सातशे लोकांची वस्ती असून, ते सर्व गरीब व कष्टकरी आहेत. एकीकडे स्वच्छ भारत अभियान सरकार राबवत असताना दुसरीकडे नागरिकांसाठी असलेल्या सुविधा अपुऱ्या आहेत. नागरिकांना घरांमध्ये शौचालय बांधणीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र देवळाली गावात अनेक नागरिकांना दहा बाय दहाचेही घर नाही. त्यामुळे ते शौचालय बांधू शकत नाही. तसेच या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाही.

नागरिकांची गैरसोय

सुंदर नगरमधील शौचालयांची नियमित स्वच्छता केली जात नाही. मुख्य म्हणजे पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना अन्य शौचालयांचा आधार घ्यावा लागत आहे. रात्री ज्येष्ठांचे हाल होतात. लहान मुले उघड्यावरच बसत आहेत. पावसाळ्यात ही समस्या गंभीर होणार आहे. शौचालयाची व्यवस्था बघणारे प्रत्येक कुटुंबाकडून महिन्याला शंभर रुपये शुल्क घेतात असे नागरिकांचे म्हणणे आहे. शौचालयांचे ढापेही तुटले असल्याने त्यातून उग्र वास येतो.

या प्रभागात चार नगरसेवक आहेत. त्यापैकी एकाने तरी सुंदरनगरची सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था दूर करून दिलासा द्यावा. पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागणार आहे. महापालिकेने त्वरित उपाययोजना करावी.

- किशोर वाघ, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरचा ‘ईगल’ कचऱ्याच्या साम्राज्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात अनेक ठिकाणी वाहतूक बेटे किंवा खुल्या जागेत काही मूर्ती उभारून शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्मार्ट सिटीकडे जाण्याची वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरातील अनेक सौंदर्य किंवा वाहतूक बेटे कचऱ्या कुंड्यांचे साम्राज्य झाले आहेत. अशीच दुरवस्था इंदिरानगर येथील ईगलची झाली असून, याठिकाणी ईगलची प्रतिमा होती की नव्हती अशी परिस्थिती काही दिवसांत निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये.

नाशिक महापालिकेने इंदिरा नगरचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे महापालिकेने रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका जागेवर पृथ्वी व त्यावर गरूड पक्षी असलेली मूर्ती उभारली आहे. प्रवेशद्वारावर हे असल्याने यापूर्वी या बेटाकडे सर्वांचे लक्ष जात होते. काळाच्या ओघात याठिकाणी वाहतूक वाढली अशातच हे वाहतूक बेट होते की नव्हते, अशी परिस्थिती झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील महामार्गावरील बोगदा हा तर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीची कोंडी होत असल्याने चर्चेचा विषय बनली आहे. या बोगद्याच्याजवळच हे सौंदर्य बेट महापालिकेने उभारले असून, आज या सौंदर्य बेटाला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या बेटाला अनेक वर्षांत रंगरंगोटी न झाल्याने त्यावर धुळीचे थर निर्माण झाले आहेत. यातच पूर्वी याठिकाणी लावण्यात आलेली हिरवळ तर पूर्णपणे नष्ट होऊन त्याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य झाल्याचे दिसत आहे. याठिकाणी अनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने हे सौंदर्य बेट नसून, अडगळीचे साम्राज्य असलेले बेट झाले आहे. तरी महापालिकेचे त्याकडे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘सुंदर स्वच्छ शहर’ अशी घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा अशा सौंदर्य बेटांकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या बार असोसिएशनला ‘आयएसओ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्हा अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वकील बांधवांच्या या संघटनेला ‘आयएसओ ९००१-२०१५’ चे मानांकन मिळाले असून, असा बहुमान मिळविणारी ही देशातील पहिलीच वकील संघटना ठरल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी बुधवारी नाशिकमध्ये केला.

गुणवत्ता, एकसंघता आणि पारदर्शकता यांसारखी वैशिष्ट्ये जपणाऱ्या संस्थांना आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक संघटना, संस्था, आणि खासगी आस्थापनांनी अशा प्रकारचे मानांकन प्राप्त केले आहे. परंतु, वक‌िलांच्या संघटनेला अद्याप आयएसओ मानांकन प्राप्त नव्हते. नाशिक जिल्हा अॅडव्होकेट बार असोसिएशनने त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. हे मानांकन देण्यापूर्वी या संघटनेचे पाच ते दहा वर्षांपूर्वीच्या आर्थिक व्यवहारांचे ऑड‌िट झाले. संघटनेचा एकंदरीत कारभार तपासण्यात आला. वक‌िलांसाठी संघटना कोणकोणते उपक्रम राबविते, याची माहिती घेण्यात आली. वक‌िलांमधील सहकार्याची भावना, सन्मान वाढविणे, वक‌िलांच्या हक्कांचे रक्षण करणे यांसारख्या बाबी तपासल्यानंतर हे आयएसओ प्रदान करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी दिली. जिल्हा कोर्टात‌ील जुन्या लायब्ररीत झालेल्या छोटेखानी सोहळ्यात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते मानांकनाचे प्रमाणपत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ठाकरे यांच्यासह उपाध्यक्ष बाळासाहेब आडके, सचिव सुरेश निफाडे, खजिनदार हेमंत गायकवाड, सहसचिव जालिंदर ताडगे आदी उपस्थ‌ित होते.

यावेळी ढवळे म्हणाले, ‘वक‌िलांच्या संघटनेलाही अशा प्रकारचे मानांकन मिळू शकते, हे माहीत नव्हते. नाशिक जिल्हा अॅडव्होकेट बार असोसिएशन या एकमेव संघटनेला देशात पहिल्यांदाच हे मानांकन मिळाले याचा अभ‌िमान वाटतो. संघटनेच्या कामाची पावती म्हणून हे मानांकन मिळाले. संघटनेने वक‌िलांना प्रशिक्षण देऊन त्यातून चांगल्या दर्जाचे न्यायाधीश घडविले आहेत. असे कार्य यापुढेही सुरू ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. बार असोसिएशनने सभासदांसाठी बनविलेल्या ओळखपत्रांचे यावेळी प्रातिनिध‌िक स्वरुपात वाटप करण्यात आले.

संघटनेची लवकरच वेबसाइट

बार असोसिएशनने सभासदांची माहिती असलेली वेबसाइट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या वेबसाइटवर वक‌िलाचे नाव, छायाचित्र, त्याचे शिक्षण, पत्ता, तो कोणत्या स्वरुपाची वक‌िली करतो याबाबतची इत्थंभूत माहिती असेल. पक्षकारांना तसेच अन्य नागरिकांनाही वक‌िलांबाबतची, तसेच बार असोसिएशनची माहिती सहजगत्या मिळावी हा यामागचा उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई प्रवेशांबाबत शाळांचीच परीक्षा

$
0
0


राज्यभरात राबविण्यात येणारी शिक्षणहक्क (आरटीई) प्रक्रिया नाशिक जिल्ह्यात आता पूर्णत्वाकडे पोहोचली आहे. जिल्हाभरात ३५५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकले आहेत, तर अद्याप २८२३ जागा रिक्त आहेत. एकीकडे ही प्रक्रिया पूर्ण होत असताना दुसरीकडे मात्र यातील घोळ, गोंधळ आदी बाबीही समोर येत आहेत. या बाबींची शहानिशा करण्यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षणसमितीच्या वतीने शाळांचे डिटेल ऑपरेशन सुरू करण्यात आले असून ५० शाळांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित शाळांची तपासणी प्रक्रिया सुरू आहे. यातील काही शाळांनी आरटीई प्रवेशासाठी सरकारी नियमांची हद्द पार केली असेल किंवा बोगस प्रवेश आढळून आल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

आर्थिक दुर्बलांसाठी आरटीई

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९नुसार अनुदानित खाजगी शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली व पूर्वप्राथमिक वर्गात २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांबरोबरच सीबीएसई, आयबी, आयसीएसई व आयजीसीएसई अशा स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित यातील पात्र शाळांमध्ये पूर्व प्राथमिक (नर्सरी) व प्राथमिक म्हणजे इयत्ता पहिलीसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असते. या प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच त्यात अधिकाधिक पारदर्शकता यासाठी मागील वर्षापासून ही प्रक्रिया ऑनलाइन सुरू करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात या प्रक्रियेला राज्यभरात सुरुवात झाली. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात ही प्रक्रिया लवकर सुरू झाली होती. जिल्ह्यातील शाळांची नोंदणी पूर्ण होणे हे त्यामागील कारण होते.

प्रवेशप्रक्रियेतील गौडबंगाल

इंदिरानगर येथील केम्ब्रिज शाळेने शिक्षणहक्काच्या प्रवेशांबाबत केलेला घोटाळा नुकताच समोर आला आहे. २५ टक्के राखीव जागांमध्ये आर्थिकदृष्ट्या सधन कुटुंबातील बालकांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून फी घेऊन, तसेच सरकारी अनुदान लाटण्याचा प्रकार शाळा करीत आहे. सरकारी व्यवस्थेची फसवणूक करीत असल्याच्या आरोपाखाली केम्ब्रिज शाळेचे शिक्षणहक्काचे अनुदान रोखण्याचा प्रस्तावही उपासनी यांनी सुपूर्द केला आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत महापालिका शिक्षणसमितीचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी इंग्रजी शाळांचे डिटेल ऑपरेशन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणासाठी नेमलेल्या समितीमार्फत हे काम सुरू आहे. सेंट फ्रान्सिस शाळेपासून तपासणी सुरू करण्यात आली असून, शहरातील ज्या शाळांबाबत साशंकता आहे, अशा शाळांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ५० शाळांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. तर उर्वरित शाळांची तपासणी प्रक्रिया सुरू आहे. यातील किती शाळांनी आरटीई प्रवेशासाठी सरकारी नियमांची हद्द पार केली आहे, याचे गौडबंगाल समोर येणार असून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.


तंबीनंतर सहकार्य

शिक्षणहक्क प्रक्रियेची ओळख आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेत मदतकेंद्र उभारण्याच्या सूचना प्रत्येक शाळेला देण्यात आली होती. मात्र, शहरातील केम्ब्रिज, होरायझन आणि न्यू इरा या शाळांनी सुरुवातीला ही केंद्रे उभारली नव्हती. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे समोर आले. मनपा शिक्षणसमितीने या शाळांना तंबी दिल्यानंतर त्यांनी सहकार्य केले, असे प्रशासनाधिकारी उपासनी यांनी सांगितले. होरायझन शाळेने एका विद्यार्थ्याचे आधारकार्ड असूनही त्याला प्रवेश नाकारल्याची तक्रार मनपा शिक्षणमंडळाकडे दोन दिवसांपूर्वी आली असून त्याची शहानिशादेखील सुरू असल्याचे ते म्हणाले.


६५ शाळांमध्ये एकही अर्ज नाही.

गेल्या वर्षी शिक्षणहक्क प्रक्रियेत ३७४ शाळांचा समावेश होता. यंदा ८४ शाळांची वाढ होऊन ४५८ शाळांची नोंदणी यामध्ये करण्यात आली. त्यामुळे साहजिकच जागाही वाढल्या. गेल्या वर्षी ५ हजार ९०० जागांसाठी राबविलेली ही प्रक्रिया या वर्षी ६ हजार ३८० जागांसाठी राबविण्यात आली. मात्र, शाळांची व प्रवेशसंख्या वाढली असली तर जिल्हाभरातील ६५ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने अर्ज केला नाही. सुरुवातीला १११ शाळांचा यात समावेश होता. कालांतराने यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र, उर्वरित ६५ शाळा या शेवटपर्यंत आरटीईच्या प्रवेशांविनाच राहिल्या आहेत. यामध्ये शाळांची नावे पालकांना माहित नसणे, नव्याने मान्यता मिळालेल्या शाळा असल्याने पालकांनी त्यास पसंती दिली नसल्याचे समोर आले. तसेच शहरातील नावाजलेल्या शाळांमध्ये प्रवेशसंख्येच्या तिप्पट अर्ज प्राप्त झाल्याचे चित्रही दिसून आले. सुरुवातीपासून पालकांची ठराविक शाळांना असलेली पसंती यामुळे दिसून आली.

१७९ विद्यार्थी रिजेक्ट

पालकांनी अपूर्ण अर्ज भरले, अर्जांमध्ये त्रुटी असणे, कागदपत्रांमधील गोंधळ यामुळे १७९ विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले. प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा, भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत, सामाजिक वंचित घटक, पालकांचा जातीचा दाखला अनिवार्य, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रुपये १ लाखापेक्षा कमी उत्पन्न), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक होती. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने १७९ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. तर निवड झालेल्या ९६४ विद्यार्थ्यांनी इतर शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत.


प्रक्रिया वेळेत करण्याचे आव्हान

गेल्या दोन वर्षांत मे-जूनमध्ये सुरू होणाऱ्या या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला विलंब होत होता. इतर विद्यार्थ्यांचा पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम अर्ध्यावर यायचा, तेव्हा या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचे. यामुळे २५ टक्के राखीव जागांतर्गत प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेता या वर्षीपासून डिसेंबर महिन्यापासूनच नियोजन आखण्यात आले होते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यापासून या प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत या प्रक्रियेच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या असून सहाव्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे व नव्या शैक्षणिक वर्षापूर्वीच विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे होते.


शैक्षणिक वर्ष २०१७-१८साठी जिल्ह्यातील सहा फेऱ्यांमधील निवड व प्रवेश

सोडत विद्यार्थ्यांची निवड प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

पहिली ३१३७ २८२२

दुसरी १०६३ ४०२

तिसरी ३५९ १७०

चौथी १३४ ६९

पाचवी ५६ २६

सहावी २४ शुक्रवारपर्यंत मुदत


२५ टक्के राखीव जागांतर्गत मागील वर्षांमध्ये झालेले प्रवेश

शैक्षणिक वर्ष शाळा संख्या प्रवेश प्रवेश पद्धत

२०१२-१३ ८८ ७४४ ऑफलाइन

२०१३-१४ १३८ १२११ ऑफलाइन

२०१४-१५ २०८ २३५४ ऑफलाइन

२०१५-१६ २७६ २०८४ नाशिक शहर ऑनलाइन, नाशिक ग्रामीण ऑफलाइन,

२०१६-१७ ३७४ २०७६ नाशिक जिल्हा ऑनलाइन

२०१७-१८ ३९३ ३५५२ (पाच फेऱ्यांपर्यंत) ऑनलाइन



केम्ब्रिज शाळेमुळे शिक्षणहक्काच्या प्रवेशांतर्गत होत असलेल्या गैरप्रकारांमुळे डिटेल ऑपरेशनची गरज निर्माण झाली आहे. आतापर्यंत ५० शाळांची तपासणी केली असून येत्या सोमवार, मंगळवारदरम्यान आणखी ३० शाळांची तपासणी केली जाणार आहे. यातील प्रवेशांची पडताळणी करुन कारवाईची दिशा ठरवली जाईल.

- नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षणमंडळ

संकलन- अश्विनी कावळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

$
0
0

बाजार समितीतील जलकुंभांची दुरवस्था

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पिण्याची समस्या गंभीर आहे. येथे उभारण्यात आलेल्या जलकुंभांची दुरवस्था झालेली आहे. ज्या भागात सायंकाळी पालेभाज्यांच्या लिलाव होतात, तेथे असलेल्या एका जलकुंभात पाणी आहे, मात्र या जलकुंभाची आणि त्याच्या आजूबाजूला असलेली अस्वच्छता लक्षात घेऊन या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जात नाही.

या जलकुंभाला बसविण्यात आलेल्या जाळ्यांमुळे पाणी घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काहीजण शक्कल लढून प्लास्टिक बाटल्या कापून बाहेर पाणी काढण्याचा प्रयत्न करतात. पिण्यापेक्षा हात, पाय आणि तोंड धुण्यासाठीच या पाण्याचा वापर केला जात आहे.

पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत कायम गजबजलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील बाजारात समस्यांची वाणवाच नाही. येथे दिवसभर लाखोंच्या संख्येने शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी, ग्राहक, वाहनधारक, कर्मचारी यांची वर्दळ असते. शहरात सर्वात जास्त गजबज असलेला आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या भागात साधे पिण्याचे पाणीही मिळत नाही. पाण्यासाठी जलकुंभांची व्यवस्था धड नाही. जे आहेत त्यांच्यातून पाणी घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दलातील ३६६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांच्या कारकिर्दीतील पहिला दणका जिल्हा पोलिस प्रशासनाला मिळाला आहे. तब्बल १२ वर्षे शहरात ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची शहराबाहेरील पोलिस ठाण्यात बदली केली आहे. एकाच पोलिस ठाण्यात पाच वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यांतर्गत ३६६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अधीक्षकांनी सोमवारी (दि. २२) रात्री उशिरा काढले आहेत.

पोलिस दलात मे महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. त्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, पोलिस नाईक व पोलिस शिपाई अशा दर्जाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात प्रथम पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियोजन हाती घेतले. त्याचा सुक्ष्म अभ्यास करून त्यांनी सोमवारी, रात्री सुमारास बदल्यांचे आदेश काढले. यात ३०८ कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव, विनंतीवरून १४ तर तैनात असलेले ४४ कर्मचारी अशा एकूण ३६६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या केल्या आहेत. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक देविदास गवळी यांची पोलिस अधीक्षकांच्या दालनात संयुक्त बैठक झाली.

एलसीबीला अधिकारी नाही

जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारीपदी कोणाची वर्णी लागते, याकडे पोलिसांचे लक्ष लागून आहे. या विभागात अधिकारी नसल्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास थंडावला आहे. या विभागाचे निरीक्षकांची बदली झाल्यापासून त्यांचे पद रिक्त आहे. या पदावर वरिष्ठ स्तरावरून काय आदेश येतात, याकडे लक्ष लागून आहे. तर राज्यात नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे रवींद्र देशमुख यांची नाशिक शहरात, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे संदीप गोंडाणे यांची लोहमार्ग नागपूर आणि दोंडाईचा पोलिस ठाण्याचे संतोष इंगळे यांची अमरावती परिक्षेत्र येथे बदली झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाई विरोधात काँग्रेसचा आज एल्गार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महागाईविरोधात काँग्रेसने गुरुवारी धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. आजी-माजी खासदार, आमदार व नगरसेवक व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी सकाळी ११ ते २ दरम्यान आंदोलन करण्यात येणार आहे. वाढती महागाई, पेट्रोलचे चढे दर आदी प्रश्नांमुळे काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. यावेळी काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वत्सला खैरे, माजी नगरसेवक मक्षमन जायभावे, अॅड. श्रीधर माने, रमेश पवार, गोपाळ जगताप उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे उद्या आंदोलन

नाशिक : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तारूढ होऊन २६ मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत.

या तीन वर्षाच्या कार्यकाळात जनतेला दिलेली कुठलीही आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली नसल्यामुळे नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिली.

अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ व दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची तीन ते चार पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, कर्जबाजारी झाला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, हे रोखण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने सरकारने त्यांच्या शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, शेतपंपाची वीज बील माफी करावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी २६ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्यावतीने मोठे आंदोलन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजपासून भाजपचा शिवार संवाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक

केंद्र व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे २५ ते २८ मे अशा चार दिवसात राज्यभर प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत.

नाशिक जिल्ह्यातही या संवाद सभेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात आमदार, नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीष महाजनही या संवाद शिवारात सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. गुरुवारी चार हजार गावांमध्ये चार हजार सभा होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा नियोजनचा पालकमंत्र्यांकडून आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन आराखड्यातून मंजूर करावयाच्या कामांचे प्रस्ताव ३१ मेपर्यंत सादर करा असे आदेश देवूनही बहुतांश यंत्रणांनी या आदेशाला केराची टोपली दाखविली. प्रस्ताव सादर करण्यास यंत्रणा उदासिन असून ३ जून रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक होणार आहे.

मागील आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेसाठी ३१९ कोटी, आदिवासी उपाययोजनांसाठी ४६४ कोटी तर अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी ८४ कोटी रुपयांच्या आराखडयास मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सर्वसाधारण क्षेत्रासाठी ९९.९६ टक्के, आदिवासी उपाययोजनेचा ९७ टक्के, तर अनुसूचित जाती उपाययोजनेचा १०० टक्के निधी खर्च झाला. पदवीधर मतदारसंघ निवडणूक, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कामे रखडल्याचे सांगितले जात होते. आचारसंहीता संपताच प्रस्ताव सादर करून मान्यता घेण्यासाठी विविध यंत्रणांनी घाई केली. यंदा असे होऊ नये यासाठी ३१ मे २०१७ पर्यंत सर्वच विभागांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश देण्यात आले. यंदा सुमारे ९०० कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. मात्र अद्याप यंत्रणांनी आपल्या कामांचे प्रस्तावच सादर केले नसल्याची माहिती योगेश चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे आरक्षण कार्यालयात चोरी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

येथील रेल्वे स्थानकातील रेल्वे आरक्षण कार्यालयातून दुपारी एक लाख रुपयांची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य पर्यवेक्षक केशव पराते यांनी लोहमार्ग पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी मनमाड रेल्वे आरक्षण कार्यालयात ते व त्यांचे सहकारी एच. डी. ठाकूर हे टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक लाख ६ हजार रुपये आणि कॅश मेमो ठेवून फ्रेश होण्यासाठी गेले. यावेळी कार्यालयात खिडकीवर ड्युटी करत असलेल्या एस. एच. के. जैन यांनी सहकारी एस. के. जयस्वाल यांना आवाज देऊन कोणीतरी अनोळखी इसम कार्यालयात येऊन ड्रॉवर मधील रक्कम घेऊन पळत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीचा जयस्वाल यांनी पाठलाग केला. मात्र ती व्यक्ती रिक्षा स्टँडच्या दिशेने पळून गेली. या व्यक्तीने एक लाखाहून आधिक रक्कम चोरून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

झाडावरून पडल्याने मुलाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील बारीमाळ या हरसूल ठाणापाडा भागातील गावात आंबे तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या मुलाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. मुळवड प्राथम‌िक आरोग्य केंद्रात वेळीच औषोधोपचार न मिळाल्याने मुलाचा जीव गेला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

बारीमाळ येथील भगवान नानू आहेर (वय १६) हा सुटीत गावी आला होता. मंगळवारी दुपारी दोनच्या दरम्यान तो मित्रांसोबत आंबे तोडण्यासाठी झाडावर चढला. त्याचा तोल गेल्याने तो २५ फुटावरून खाली पडला. मित्रांनी त्याला मूळवड आरोग्य केंद्रात दाखल केले.

मूळवड केंद्राकडून सहकार्य नाही?

भगवान नानू आहेरवर मूळवड आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कुठलेही उपचार न करता त्याला हरसूल येथील रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तसेच तेथील रुग्णवाहिकेची चावीही चालक बाहेर घेऊन गेल्याने गैरसोय झाली. वेळेवर उपचार न मिळाल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात येईपर्यंत भगवानचा मृत्यू झाला, असा आरोप करत नातेवाईकांनी शव ताब्यात घेण्यास नकार दिला. तहसीलदार महेंद्र पवार यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. वैद्यकीय उपचार वेळवर न मिळाल्याने यापूर्वी तालुक्यातील तीन नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात लवकरच सफारी गार्डन

$
0
0

आमदार अनिल गोटेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुख्यमंत्र्यांनी धुळ्यात येऊन पांझराच्या पात्रात घेतलेल्या सभेत धुळेकरांना दिलेला शब्द पाळला असून, लवकरच शहरालगत अडीचशे एकर जमिनीवर सफारी गार्डन होणार आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. ते आपल्या जन्मदिनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या गार्डनचे काम किसान ट्रस्टच्या माध्यमातून केले जाणार असून, येत्या दोन महिन्यांत कामाची सुरुवात होणार आहे. तसेच वर्षभरानंतर धुळेकरांसाठी सफारी गार्डन खुले होईल, अशी माहितीही आमदार गोटे यांनी दिली.

हे गार्डन २५० एकरांवर होणार असून, त्यासाठी पर्यावरण खात्यापासून वन्यजीव संरक्षण कायद्यापर्यंतच्या सर्व बाबींचा विचार, अभ्यास करून सफारी गार्डनचे काम सुरू केले जाणार आहे. सफारी गार्डनसाठीच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जवळपास पाच वर्षे लागणार आहेत. पर्यावरण खात्यापासून प्राणी आणण्यापर्यंत कामासाठी ज्या परवानग्या लागतात त्यालाच अनेक वर्ष जातील म्हणून प्रथम पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी, निर्माण करण्यासाठी किसान ट्रस्ट भाडेतत्त्वावर ३० वर्षांच्या करारावर जागा आपल्या ताब्यात घेणार आहे, अशी माहिती आमदार गोटे यांनी दिली. वाघ, सिंह, पोपट यांच्यासह जे प्राणी वन्यजीव कायद्यात येतात ते वगळता इतर प्राणी, पक्षी सफारी गार्डनमध्ये आणले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटकॉइनचे व्हिएतनाम कनेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बिटकॉइन या इंटरनेटवरील व्हर्चुअल करन्सीचे व्हिएतनाम कनेक्शन समोर आले आहे. व्हिएटनाम आणि मलेशिया शेजारी राष्ट्र असून, या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढली आहे. दरम्यान, गुरूवारी (दि.२५) सर्व संशयितांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी नाशिकरोड येथील सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली.

बिटकॉइन या इंटरनेटवरील व्हर्चुअल चलनाच्या वापरावर भारतात बंदी आहे. मात्र, परदेशात अनैतिक कामांसाठी सदर चलनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ड्रग्ज, हत्यारे खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये या चलनाचा विशेष वापर होता. राज्याच्या पुणे, नागपूर, शिर्डी, औरंगाबाद या शहरांसह नाशिकमध्ये बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीस उद्युक्त करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी नुकतेच अटक केली. संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरूवारी संपल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यात निशेद महादेवजी वासनिक (२९, रा. वसिम प्राईड, सोसा. आराधनानगर, दिघोरी-खार्बीरोड, नागपूर), रोमजी बिन अहमद (जलान ईदाह-२, तमन सेताजी ईदाह, केदाह, मलेशिया), आशिष शंकर शहारे (२८, द्वारावती रेसिडन्सी, कोपरगाव, जि. अहमदनगर), दिलीप प्रेमदास बनसोड (२९, फाळके प्राईड अपार्ट. पाथर्डी फाटा), कुलदिप लखू देसले (३८, रा. सुरेश बापू प्लाझा, खुटवडनगर, नाशिक) यांचा समावेश आहे. यातील रोमजी अहमद हा मलेशिया येथील रहिवाशी आहे. तो www.futurebit.com या वेबसाइटच्या मदतीने राज्यात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करीत होता. future bit ही कंपनी व्हिएतनाम येथे काम करते.

शिर्डीत चौकशीसत्र
मलेशिया आणि व्हिएतनाम शेजारी राष्ट्र असून, या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असल्याचे सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले. या टोळीने नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अनेक बैठका घेऊन गुंतवणुकदारांना गुंतवणुकीसाठी उद्युक्त केले. शहर पोलिस सध्या शिर्डी येथे चौकशी करीत असल्याने आणखी काही नवीन बाबी समोर येऊ शकतात, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images