Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपीला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

देवळाली गावातील गुलाबवाडी येथे आढळून आलेल्या पिस्तुल व इतर शस्त्रांच्या गुह्यातील फरार आरोपी दिलीप हरिशंकर धाकड (मूळ रा. मध्य प्रदेश) यास नाशिकरोड पोलिसांनी जेरबंद केले आहे.

गुलाबवाडीतील दिलीप हरिशंकर धाकड याच्या घरात काही दिवसांपूर्वी नाशिकरोड पोलिसांना दोन पिस्तूल, दोन जिवंत राउंडसह, कोयता, चाकू अशी शस्त्रे आढळून आली होते. परंतु, दिलीप धाकड हा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. या गुह्याशिवाय गुलाबवाडीतील काही तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी धाकडविरोधात नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल होता. नाशिकरोड पोलिस धाकडच्या मागावर होते. तो गुरुवारी दुपारी गुलबवाडी परिसरात आल्याची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक निरीक्षक जगदीश शेलकर यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने धाकडला ताब्यात घेण्यात यश मिळविले. त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाशिकरोड पोलिसांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समितीत भरेकरण्यांची गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या आठव्याही दिवशी सतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला नाही. किरकोळ विक्रीसाठी सकाळी भरेकरण्यांनी भाजीपाला आणला होता. शहरातील भाजीबाजारातील विक्रेत्यांनी तसेच सामान्य ग्राहकांनी हा भाजीपाला खरेदी केला.

गेली आठ दिवस भाजीपाला मिळालेला नसल्याने हा भाजीपाला हातोहात विकला गेला. या भाजीपाल्याला फारसे चढे दर मिळाले नाही. दुपारच्या आणि सायंकाळच्या लिलावसाठी भाजीपाला आला नाही. त्यामुळे नाशिक बाजार समितीतून इतर ठिकाणी भाजीपाला जाऊ शकला नाही. बाजार समितीत सकाळचा अपवाद वगळता गुरुवारी दिवसभर शुकशुकाट दिसून आला. रोज हजारो टन भाजीपाला नाशिक बाजारात येतो. मुंबईला सर्वात जास्त भाजीपाला पाठविणारे मार्केट म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे. येथून सुमारे ५० टक्के भाजीपाला एकट्या मुंबईला पाठविला जातो. त्या खालोखाल गुजरातला ३५ टक्के, पुणे आणि विदर्भात १० टक्के आणि नाशिकच्या स्थानिक भाजीबाजारासाठी ५ टक्के भाजीपाला पाठवतात.

पूरक घटकांची आर्थिक घडी विस्कळीत

पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्रीही बाजार समितीत भाजीपाल्याचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. मात्र, आठ दिवसांपासून बाजार समितीत भाजीपाल्याची आवक ठप्प झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. इतके दिवस बाजार समिती बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आली आहे. त्यामुळे व्यापारी, अडतदार, हमाल, मापारी या पूरक घटकांची आर्थिक घडी विस्कळीत झाली. नाशिक बाजार समितीत ३२५ अडतदार, १२०० व्यापारी आणि २५० पेक्षा जास्त हमाल व मापारी आहेत.आम्ही कोणत्याही क्षणी भाजीपाल्याचे व्यवहार सुरू करण्यास तयार असल्याचे अडतदारांचे म्हणणे आहे.

एका जुडीच्या दहा जुड्या

गुरुवारी शेतकरी थोड्या प्रमाणात भाजीपाला बाजारात घेऊन आले. अनेक भरेकरण्यांनी शेतात जाऊन भाजीपाला खरेदी करून विक्रीस आणला. यात पालेभाज्या जुड्या छोट्या करून विक्रीचा प्रयोग करण्यात आला. त्यात कोथिंबीरच्या एक जुडीच्या दहा जुड्या करण्याचा आणि ती एक जुडी १० रुपये किमतीत विकण्यात येत होती. किरकोळ भाजीपाला विक्री करणाऱ्या मार्केटमध्ये भाजीपाल्याचे सरासरी दर टोमॅटो ५०, वांगी ८०, कारली १००, गिलके ४०, बटाटे ३०, भोपळा ४०, दोडका ५०, काकडी ६०, वाल पापडी ५० रुपये प्रति किलो असे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रॅफाइड कंपनीत कामगाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर एमआयडीसीतील ग्रॅफाइड इंडिया लिमिटेड (कार्बन) कंपनीत पहिल्या शिफ्टमध्ये कामावरील कामगाराच्या अंगावर अवजड मटेरिल पडल्याने जीव गमविण्याची वेळ गुरुवारी आली. सहकारी कामगारांनी जखमी कामगाराला कामगार विमा रुग्णालयात तात्काळ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत सातपूर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

गॅफाइड इंडिया लिमिटड कंपनीत गुरूवारी कंत्राटी पद्धतीने काम करणारे शोभनारायण रामलक्ष्मण प्रजापती (४८) हे पहिल्या शिफ्टमध्ये कामावर गेले. काम करत असतांना अचानक त्यांच्या अंगावर अवजड मटेरियल पडले. या दुर्घटनेत प्रजापती यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना सहकारी कामगारांनी सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्रजापती यांच्या मृत्यूने त्यांच्या नातेवाइकांसह कामगारांनी विमा रुग्णालयात गर्दी केली होती.

कामगारांबाबत नेहमीच होणाऱ्या कंपन्यांमधील अपघाताकडे आरोग्य व सुरक्षा संचलनायाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कामगार विकाम मंचने केला आहे. अनेक कामगार कंपनी काम करत असतांना मोठ्या दुखापतींचा सामना करावा लागतो. यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना न्यायच मिळत नसल्याचे कामगार विकास मंचचे कैलास मोरे यांनी ‘मटा’शी बोलतांना सांगितले. तसेच कामगारांना होणाऱ्या दुखापतीबाबत शासनाच्या आरोग्य व सुरक्षा विभागाला निवेदनही दिले आहे. परंतु, कारवाई करण्यात येईल असेच सांगितले जाते.

एमआयडीसीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना अनेकदा झालेल्या घटनेत प्राण गमविण्याची वेळ आली आहे. याबाबत आरोग्य व सुरक्षा विभागाला निवेदनही दिले होते. मात्र, याकडे नेहमीच दुर्लक्ष केला जात असल्याने कंत्राटी कामगारांना न्याय कोण देणार असा प्रश्न आहे.
- कैलास मोरे, संस्थापक, कामगार विकास मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस कमिटीतर्फे जोडेमार आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मध्य प्रदेशातील शेतकरी कुटुंबांच्या सांत्वनासाठी भेट देण्यास निघालेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पुतळ्यास जोडेमार आंदोलन करण्यात आले.

एम. जी. रोड येथील कमिटीच्या कार्यालय आवारात गुरूवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून न घेता आंदोलकांना चिरडत आहे, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रभारी भाई जगताप, डॉ. उल्हास पाटील, डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, डी. जी. पाटील, हेमलता पाटील, शाहू खैरे, अश्विनी बोरस्ते, बबलू खैरे, रमाकांत म्हात्रे, देवेंद्र महाजन, वत्सला खैरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

जावडेकरांचाही निषेध

दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास आणि नियंत्रण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसची तुलना पाकिस्तानशी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचाही निषेध काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी जावडेकर यांच्याही पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंब्रिजविरोधात पालक आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालक शालेय फी भरत नसल्याचा कारणास्तव केंब्रिज इंग्लिश मीडियम स्कूलमधील ३३ विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हातात टेकवला. या विरोधात आक्रमक भूमिका घेत शाळेवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांनी गुरुवारी सकाळी महापालिका शिक्षणमंडळ गाठले.

शाळेच्या नियमबाह्य कारवायांना ताबडतोब लगाम लावावा, अशी मागणी दीडशे ते दोनशे पालकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्याकडे करत त्यांनाच घेराव घातला. दिवसभर चाललेले हे प्रकरण उपासनी यांनी शाळेला दिलेल्या पत्राने सायंकाळी थांबले.

शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून फी भरलेली नाही. केंब्रिज स्कूल बेकायदेशीर फी घेत आहे, ही भूमिका यामागे पालकांची आहे. तर दुसरीकडे काही पालक फी भरत नाही हे पाहून इतर पालकही फी भरण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शिक्षकांचे पगार करणेही कठीण झाल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शाळेबाहेरचा रस्ता शाळा प्रशासनानी दाखवत त्यांच्या हातात शाळा सोडल्याचे दाखले दिले. अशा नियमबाह्य पद्धतीने शाळेने घेतलेल्या या भूमिकेच्या विरोधात आक्रमक झालेल्या पालकांनी शाळेविरोधात ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी प्रभारी शिक्षणाधिकारी उपासनी यांनी पाच पालकांची समिती तयार करुन त्यांना शाळेशी चर्चा करण्यासाठी पाठवले. मात्र, फी भरा मगच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल या भूमिकेवर शाळा ठाम आहे. त्यामुळे वातावरण चिघळले. पालकांनी शिक्षणमंडळात ठिय्या करत ताबडतोब निर्णय देण्याची मागणी उपासनी यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत बसू देण्याची व त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास शाळा जबाबदार असेल, या आशयाचे पत्र सायंकाळी दिल्यानंतर हे प्रकरण तात्पुरते थांबले.

शाळेला सूचना

शाळेच्या फी निश्चितीबाबतचा प्रश्न विभागीय शुल्क नियामक समितीपुढे प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत फी भरली नाही या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्यांस शाळेबाहेर काढू नये, त्यांना नियमित वर्गात बसू द्यावे व शुल्क नियामक समितीकडून लवकर निर्णय प्राप्त करून घ्याव्यात, अशा सूचना केंब्रिज इंग्लिश शाळेला प्रशासनाने दिल्या आहेत.

पालकांनी २०१६-१७ व २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाची फी भरल्यावरच आम्ही त्यांना बसू देऊ. अनेकदा पालक शाळेत येऊन गोंधळ घालतात. त्याचा इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. शाळेतील महिला कर्मचाऱ्यांनाही अशा वादांचा सामना करावा लागतो. शाळेचे वातावरण खराब होत असल्याने पालकांनी कामकाजात व्यत्यय आणणार नाही, असे हमीपत्र द्यावे.
- सोमू नाडार, मुख्याध्यापक, केंब्रिज स्कूल

शाळा प्रशासनाशी चर्चा करूनही विद्यार्थ्यांना घेण्यास शाळा नकार देत आहे. त्यामुळे शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे दिला आहे. तसेच फी संबंधित बैठक घेऊन विभागीय शुल्क नियामक समितीकडून या प्रकरणाचा निकाल लवकर प्राप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- नितीन उपासनी, प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटीच्या गुन्ह्यात तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनचालकास धमकावून पिकअपसह ६९९ कोंबड्या लुटून नेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. भद्रकालीतील फुले मार्केट येथे पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले.

जफर लतीफ शेख, (२५, रा. भद्रकाली), सुमित जॉर्ज हिवाळे, (२३, रा. शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर) आणि सद्दाम खालील शेख, (२५, रा. वडाळा नाका) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी फिर्यादींच्या ताब्यातील पिकअपमध्ये पोल्ट्री फार्ममधून भरलेल्या ६८८ कोंबड्या (सुमारे दीड टन माल) भिवंडी येथे जात असतांना मुंबई-आग्रा रोडवर वेताळ माथा येथे तीन अज्ञात आरोपींनी त्यांना अडवले. विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर आलेल्या संशयितांनी फिर्यादीस धमकावून त्याचे ताब्यातील पीकअपसह माल जबरदस्तीने लुटून नेला. या प्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये ३९२,५०४,३४ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला. याबाबत पोलिस निरीक्षक किशोर नवले यांना माहिती मिळाली. जबरीने चोरून नेलेला माल शहरातील भद्रकाली भागात विक्री करण्यासाठी येणार असल्याने पोलिसांनी सापळा रचून तिघांना फुले मार्केट येथे अटक केली. त्यांच्याकडून ६८८ जिवंत बॉयलर कोंबड्या, एमएच १५ एफव्ही ०३८२ क्रमांकाची पीकअप तसेच एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, हवा बंडू ठाकरे, रवी वानखेडे, शिवाजी जुंद्रे, प्रीतम लोखंडे, संदीप हंडगे, सचिन पिंगळ यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिपाइं जिल्हाध्यक्षपदी पवन पवारची वर्णी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

भाजपमधून गच्छंती झालेले माजी नगरसेवक पवन पवार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची नाशिकरोड येथील ग्रेप सिटी हॉटेल येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत पवन पवार यांच्या नावाचा सर्वानुमते ठराव करण्यात आला. विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यावर राज्याची जबाबदारी देण्यावरही या बैठकीत सहमती झाली.

नाशिकरोड येथे झालेल्या आरपीआय पक्षाच्या पदधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ‘रिपाइं’च्या जिल्हा नेतृत्वात बदलाचे वारे येऊ घातले आहे. या बैठकिस उपस्थित पक्षाचे राष्ट्रीय सचिव शीला गांगुर्डे, राज्य उपाध्यक्ष आनंद गांगुर्डे यांच्यासह जिल्ह्यातील विश्वनाथ काळे, सुनील कांबळे, संजय भालेराव, सुनील वाघ, विनोद जाधव, माधुरी भोळे, ललिता भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा नेतृत्वबदलावर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध घटनांत नेहमीच वादग्रस्त ठरलेले व भाजपमधून गच्छंती झालेले पवन पवार यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीस जिल्हाभरातील विविध तालुक्यांमधील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षण गृहातून दहा मुले पळाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडी रोडवरील मुलांच्या निरीक्षण गृहातून दहा मुलांनी पोबारा केला. यातील आठ मुलांवर गंभीर गुन्हे दाखल असून, दोन मुलांच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. खिडकीचे गज कापून १० मुलांनी धूम ठोकली असून, यामुळे बाल निरीक्षणगृहाच्या सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, फरार मुलांचा शोध घेतला जात आहे.

उंटवाडीरोडवरील निरीक्षण गृहात अनाथ तसेच विविध प्रकारचे गुन्हे नावावर असलेल्या अल्पवयीन मुलांना ठेवले जाते. अर्थात, अनाथ आणि विधी संघर्षित बालकांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाते. बुधवारी सकाळी विधी संघर्षित बालकांच्या रूममधील खिडकीचे गज कापून मुले पसार झाली. यातील आठ मुलांवर बलात्कार, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी, चोरी, घरफोडी अशा प्रकाराचे गुन्हे पंचवटी, अंबड, गंगापूर, उपनगर, मालेगाव इत्यादी पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत. यात आणखी दोन मुलांचा समावेश असून, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. मात्र, त्यांच्या कुटुंबियाचा पत्ता नसल्याने त्यांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान, १४ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांनी हेक्सा ब्लेडच्या मदतीने खिडकीचे गज कापून पोबारा केला. विशेष म्हणजे या मुलांनी पध्दतशीरपणे खिडकीवर कपडे टाकले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर निरीक्षणगृह प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. मात्र, मुलांचा पत्ता लागला नाही. मागील आठवड्यातदेखील एका मुलाने सुरक्षा कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून पळ काढला होता. या दोन्ही घटनांबाबत मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पळ काढलेल्या मुलांचा शोध घेत आहेत.


हेक्सा ब्लेड आलेच कसे?

या मुलांकडे हेक्सा ब्लेड आलेच कसे, असा प्रश्न निरीक्षण गृहाच्या प्रशासनाला पडला आहे. गजांचा आकार आ​णि गज कापण्यासाठी मुलांना मिळणारा वेळ याचा विचार करता, ही मुले काही दिवसांपासून गज कापण्याचा उद्योग करीत असावीत. मात्र, सुरक्षा रक्षकांची कमी संख्या आणि निरीक्षण गृहातील खेळीमेळीचे वातावरण यामुळे मुलांना संधी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

५० मुलांमागे अवघे दोन केअर टेकर

उंटवाडी रोडवरील मुलांच्या निरीक्षण गृहातील ५० मुलांमागे अवघे दोन केअर टेकर आहेत. मुलींसाठी काम करणाऱ्या महिला कर्मचारी कधीच निवृत्त झाल्या असून, सातत्याने पाठपुरावा करूनदेखील येथील रिक्त पदे भरली जात नाहीत. मागील आठवड्यात एका मुलाने निरीक्षणगृहातून पलायन केले. आता १० मुलांनी खिडकीचे गज कापून धूम ठोकली असून, निरीक्षण गृहाच्या सुरक्षेच्या मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

उंटवाडीरोडवरील निरीक्षण गृहात अनाथ आणि विधी संघर्षित बालकांना ठेवण्यात येते. विधी संघर्षित बालकांमध्ये अगदी खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, चोरी, घरफोडी असे कृत्य करणाऱ्या मुलांचा समावेश असतो. या मुलांना चुकलेल्या वाटेवरून मूळ प्रवाहात आणण्यासाठी निरीक्षण गृहाचा मुख्यत्वे वापर होतो. चांगल्या वातावरणात मुलांचे पालन पोषण व्हावे यासाठी निरीक्षण गृहाकडून प्रयत्न केलर जातो. मात्र, अनेक वर्षांपासून निरीक्षण गृहाच्या रिक्त जागाच भरल्या गेलेल्या नाहीत. निवृत्त कर्मचाऱ्यांना सामाजिक संस्थेकडून पैसे दिल्यानंतर केअर टेकर उपलब्ध होतात. बुधवार सकाळपर्यंत निरीक्षण गृहात ५२ मुले होती. त्यातील १० मुलांनी निरीक्षणगृहातून पळ काढला. या ५२ मुलांसाठी चार केअर टेकरच्या जागा मंजूर आहेत. मात्र, आजमितीस निरीक्षणगृहाकडे फक्त दोन केअर टेकर आहेत. त्यातील एक केअरटेकर काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले असून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून विनंती करण्यात आल्याने त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. याबाबत बोलताना निरीक्षण गृहाचे मानद सचिव चंदूलाल शहा यांनी सांगितले की, अनाथ मुले आणि विधी संघर्षीत मुलांना वेगवेगळे ठेवण्यात येते. मुलींसाठी हाच नियम असून, आजमितीस तब्बल ३२ मुली येथे वास्तव्यास आहे. विध‌िसंघर्षित बालकांची संख्या मोठी असते. मुलांना जेवणासाठी तसेच टीव्ही बघण्यासाठी बाहेर सोडले जाते. याचा फायदा घेत काही मुलांनी खिडकीचे गज कापले. मुलांपर्यंत हेक्सा ब्लेड कसे आले, याचाही शोध घेतला जात असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. मुलांसाठी चार केअर टेकरची आवश्यकता असताना फक्त दोनच केअर टेकर आहेत. त्यातील एक सेवानिवृत्त असून, रिक्त जागा भरण्याबाबत शासनाकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे शहा यांनी सांगितले.

मुलींसाठी सारेच आयात

निरीक्षणगृहात ३२ मुली आहेत. त्यांच्यासाठी दोन महिला कर्मचारी व एक स्वयंपाकी अशा तीन जागा मंजूर आहेत. मात्र, सदर कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्या पुन्हा भरल्याच गेल्या नाहीत. सध्या, संस्थेचे पदाधिकारी खासगी महिलांकडून हे काम करून घेत असल्याचे शहा यांनी सांगितले.

पोलिस बंदोबस्त पण उपयोगच नाही

गंभीर गुन्हे नावावर असलेल्या मुलांना निरीक्षण गृहात ठेवण्यात येते. मात्र, सरकार येथे सुरक्षाच देत नसल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. सुरक्षा कर्मचारी नसल्याने पोलिस बंदोबस्त मागितला. पण, एकच पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आला. त्याचा तितकासा फायदा नाही. बुधवारी सकाळी पोलिस मागील बाजूस असताना मुलांनी पुढील बाजूने पळ काढला. कायमस्वरूपी चांगला पोलिस बंदोबस्त पुरवणे, तसेच रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. यात चालढकल होत असल्यास सरकारने विध‌िसंघर्षित बालकाची रवानगी बालसुधारगृहात करावी, असे चंदूलाल शहा यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बजेटमध्ये वाढीचे संकेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने बजेटला मंजुरी दिल्यानंतर महापौर रंजना भानसी यांच्याकडून बजेटला अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या बजेटमध्ये जवळपास दोनशे कोटींची वाढ होण्याचे सूतोवाच त्यांनी केले असून, वास्तववादी बजेटवर आपला भर राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बजेट दोन हजार कोटींवर स्थिरावणार आहे. दरम्यान, नवनिर्वाचित नगरसेवकांना पाऊण कोटींचा निधी दिला असतानाही दहा, पंचवीस व पन्नास कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर केले गेले आहेत. त्यामुळे प्रशासनही पेचात पडले आहे.

महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला १४१० कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. स्थायी समितीने त्यात ३८९ कोटींच्या कामांचा समावेश करीत ते १७९९ कोटींपर्यंत पोहोचविले होते. आता महासभेकडून मंजूर झालेल्या कामांचा त्यात समावेश होईल. महापौर भानसी यांनी सुमारे दोनशे कोटी रुपयांची भर पडून दोन हजार कोटी रुपयांपर्यंत यंदाचे बजेट पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तिजोरीच्या स्थितीचा अंदाज घेऊन बजेट वास्तववादी राहणार असल्याचे महापौरांनी सांगितले आहे. दुसरीकडे नगरसेवकांना पाऊण कोटींचा निधी दिला असताना त्यांनी अव्वाच्या सव्वा कामांचे प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात केली आहे. अंदाजपत्रक तयार करताना वास्तव परिस्थिती लक्षात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाऊण कोटीऐवजी दहा, पंधरा, वीस कोटींचे प्रस्ताव आल्याने प्रशासन बुचकाळ्यात पडले आहे.

---

कपाटासाठी प्रयत्न

गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक मुद्यावरून कपाटाचा प्रश्न रेंगाळळा आहे. हा प्रश्न सुटल्यास जवळपास दोनशे कोटी रुपये तिजोरीत जमा होणार आहेत. त्यामुळे कपाटाचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. शासनदरबारी पाठपुरावा करून त्या परवानग्या नियमित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाचदेखील त्यांनी केले आहे.

--

वृक्षसंवर्धन समिती रखडली

महापालिकेची निवडणूक होऊन चार महिने उलटले असून, मान्सूनही दाराशी आला आहे. पण, महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती अजूनही रखडल्याची स्थिती आहे. या महत्त्वाच्या समितीचे गठणच झालेले नसल्याने कुठलाही धोकादायक वृक्ष हटविण्याचा आदेश प्रशासन देऊ शकत नाही. या दिरंगाईमुळे जीवितहानी झाल्यास त्याला संपूर्ण प्रशासन व अधिकारी जबाबदार राहतील, अशा आशयाचे पत्र वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य संदीप भवर यांनी आयुक्तांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीची रचना कशी असावी व अशासकीय सदस्य नेमणूक आणि तज्ज्ञ समितीची नेमणूक कशा प्रकारे करावयाची आहे, याचे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांचे पालन व्हावे, अशी अपेक्षाही या पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या रचनेत लोकप्रतिनिधींची सदस्य संख्या सात असावी व अशासकीय सदस्यांची संख्या त्याच्या एकने कमी असावी, महापालिका आयुक्त पदसिद्ध अध्यक्ष असावेत, असे कायदा सांगतो.

वृक्ष प्राधिकरण समिती गठित करायचा अधिकार महासभेचा आहे. महासभेला फक्त लोक प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे, तसेच अशासकीय सदस्य व तज्ज्ञ समिती नेमणुकीचा अधिकार प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्त तथा अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण समिती यांना आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अशासकीय सदस्य व तज्ज्ञ समिती नेमणूक प्रसारमाध्यमांद्वारे जाहिरात देऊन करावयाची आहे. त्यात महासभा व नगरसचिव आणि वृक्ष प्राधिकरण यांच्यामार्फत अशासकीय सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव महासभेमार्फत करण्यात येऊ नये अन्यथा प्रशासनाला व महासभेला याचे उत्तर उच्च न्यायालयात द्यावे लागेल, असेही या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांना एक रुपयात शुध्द पाणी

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड स्थानकातील रेल्वे प्रवाशांना शुध्द पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्‍ड टुरिझम कार्पोरेशनकडून (आयआरटीसी) नाशिकरोडसह प्रमुख रेल्वेस्थानकांमध्ये अत्याधुनिक वॉटर व्हे‌ण्डिंग मशिन्स बसविण्यात आली आहेत. रेल्वेगाडीत एक लिटरची बाटली वीस रुपयांना मिळते. मात्र, या मशिनमधून पाच रुपयांत तब्बल वीस लिटर शुध्द पाणी मिळत आहे.

किडनीस्टोसह बहुतांश आजार पाण्याच्या माध्यमातून होतात. त्यामुळे शुध्द पाणी मिळण्यासाठी घरीच वाटर प्युरिफायर बसविण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे प्रवाशांना स्थानकातील अऩेक दिवस न धुतलेल्या जलकुभांचे पाणी प्राशन करावे लागते. रेल्वे प्रवासी स्थानिक नसल्याने ते तक्रार करत नाहीत. त्यांची मजबूरी लक्षात घेऊन आयआरटीसीने नाशिकरोडला दोन अत्याधुनिक व्हेन्डिंग मशिन्स बसवली आहेत.

मोहीम सुरू

पश्चिम रेल्वेच्या खार स्थानकात सर्वप्रथम व्हेन्डिंग मशिन बसविण्यात आले. त्यानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या 80 स्थानकात ही मशिन्स कार्यान्वित करण्यात आली असून आणखी 45 मशिन्स लवकरच सुरु केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वेस्थानकात जेथे पाणी उपलब्ध होते तेथे थुंकणे, कचरा टाकणे असे प्रकार होतात. तसेच हे जुलकुंभ नियमित साफ केले जात नाही. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना स्वच्छ पाणी पुरविण्याची जबाबदारी आयआरटीसीवर सोपविण्यात आली आहे.

असे मिळणार पाणी

या वाटर व्हेन्डिंग मशिनमध्ये पैसे टाकल्यानंतर पाणी उपलब्ध होते. एक ग्लास पाण्याची गरज असणा-यांना दोन रुपये मोजावे लागतील. पाच रुपयात प्रवाशांना एक लिटर पाणी मिळते. प्रवाशांकडे रिकाम्या बाटल्या नसल्यास नव्या बाटलीत हे एक लिटर पाणी आठ रुपयाला मिळेल. रेल्वे प्रवासात सध्या कंपन्या सध्या एक लिटर पाणी वीस रुपयांना विकतात. या मशिनमधून तेवढ्याच पैशात पाच लिटर पाणी मिळत आहे. ज्यांना मशिन हॅण्‍डल करता येणार नाही, त्यांच्यासाठी कर्मचारी उपलब्ध आहे. तो सुटे पैसेही देतो आणि रिकामी बाटलीही.

भुसावळ विभागात नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोल, शेगाव, खाटवा येथेही अशी मशिन बसविली आहेत. छोट्या स्थानकांनाही न्याय दिला जात आहे. नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील सात स्थानकांना वॉटर प्युरिफायरच्या सहाय्याने शुध्द पाणी देण्याचा श्रीगणेशा झाला आहे. त्यामध्ये घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव यांचा समावेश आहे. येस बँकेच्या मदतीने हे प्युरिफायर बसविण्यात आले आहेत. बँकेने एक वर्षाची देखभालीची जबाबदारी स्वीकारली आहे. प्युरिफायरला पाचशे लिटरची सिंटेक्सची टाकी जोडण्यात आली आहे.


असे आहेत दर

पाण्याचे प्रमाण- बाटली असल्यास- बाटली नसल्यास

३०० मिली - १ रुपया- २ रुपये

५०० मिली- ३ रुपये- ५ रुपये

एक लिटर- ५ रुपये- ८ रुपये

दोन लिटर- ८ रुपये- १२ रुपये

पाच लिटर- २० रुपये- २५ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पुणतांब्याहून सुरू झालेल्या शेतकरी संपाची धार तीव्र करीत आता सुकाणू समितीने निर्णायक आंदोलनाची हाक दिली आहे. भाजीपाला व दूधकोंडी करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याऐवजी सरकारी यंत्रणेला घेरण्याची रणनीती समितीने आखली आहे. सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा; अन्यथा राज्यभर धरणे व ठिय्या आंदोलनासह, रेल रोको, तसेच नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख शहरांची रसद टप्प्याटप्प्याने तोडण्याचा इशारा सुकाणू समितीने गुरुवारी सरकारला दिला.

शेतकरी संपाची सात दिवसांची डेडलाइन संपल्यानंतर शेतकरी आंदोलनासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीची बैठक गुरुवारी नाशिकमध्ये झाली. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली आहे. सुकाणू समितीने राज्य सरकारला इशारा देतानाच आंदोलनाचे तीन टप्पे निश्चित केले आहेत. पहिल्या टप्प्यात सरकारला चर्चेसाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दोन दिवसांत सरकार ताळ्यावर आले नाही, तर येत्या १२ जून रोजी राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर धरणे आणि ठिय्या आंदोलन, तर १३ तारखेला गनिमी काव्याने राज्यभर रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतरही सरकार बधले नाही तर तिसऱ्या टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करून थेट मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या मोठ्या शहरांची रसद तोडण्याचा निर्धार समितीने केला आहे. सोबतच सरकारमधील मंत्र्यांना कर्जमाफीपर्यंत राज्यात कुठेही सभा घेण्यास मज्जाव करण्याचे आवाहन समितीने केले आहे. त्यामुळे भाजपसह राज्य सरकारची कोंडी अधिकच वाढली आहे.

शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी कोअर कमिटीच्या सदस्यांनी विश्रामगृहावर आंदोलनाची निश्चित दिशा ठरवून ती बैठकीत जाहीर केली. खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, जयंत पाटील, अजित नवले, रघुनाथदादा पाटील, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, शेतकरी नेते माधवराव खंडेराव मोरे, डॉ. गिरधर पाटील यांच्यासह राज्यभरातील शेतकरी नेते या वेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी संबंधित राज्यातील सर्व संघटना बैठकीला उपस्थित होत्या. भाजीपाला व दूधकोंडीने सर्वसामान्य नागरिकच वेठीस धरला गेला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील शेतकरी संप सफल झाला नसल्याने कोअर कमिटीने आता या आंदोलनाची दिशा बदलली आहे. बैठकीत कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, वीज, सिंचन आणि पेन्शनच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

‘तिसरा टप्पा आक्रमक, हिंसक असेल’

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पहिल्या टप्प्यात सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यो दोन दिवसांत सरकारने कुणाशीही चर्चा करावी; पण निर्णय घ्यावा, असे आव्हान देण्यात आले आहे. सरकारने दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तीन टप्प्यांतील या आंदोलनाचा तिसरा टप्पा हिंसक आणि आक्रमक असेल, अशा इशाराही समितीने दिला आहे.

नाशिकसह मुंबईची रसद तोडणार

समितीने तयार केलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणाही या वेळी करण्यात आली असून, सरकारची लाडकी असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या बड्या लाडक्या शहरांची रसद तोडण्याचा इशारा दिला आहे. मुंबई शहराची रसद तोडली तर सरकार ठिकाणावर येईल, अशी सूचना आमदार जयंत पाटील यांनी केली. दूध, भाजीपाला बंदीसोबतच नाशिक व रायगडमधून होणारा मुंबईचा पाणीपुरवठा तोडण्याचा थेट इशाराच या बैठकीत देण्यात आला आहे. त्यानंतर एक तर सरकार असेल; नाही सातबारा कोरा असेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

मंत्र्यांना गावबंदी

सरकारी यंत्रणेला वेठीस धरण्यासोबतच सुकाणू समितीने भाजपचीही कोंडी करण्याचा निर्धार केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना शेतकरी गावांमध्ये फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. गावांमध्ये सभा घेण्यासाठी आलेल्या भाजपच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना कर्जमाफीचा जाब विचारा, असे सांगून सभा न होऊ देण्याचा इशाराच दिला आहे. त्यामुळे सरकारसोबतच भाजपचीही कोंडी केली जाणार आहे.

आत्महत्या न होण्याची हमी घेऊ

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा खरा आणि खोटा असा भेदाभेद चालवला आहे. त्यावरही बैठकीत टीकास्र सोडण्यात आले असून, कर्जमाफी दिली तर आत्महत्या थांबतील काय, असे सांगणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनाही सडेतोड उत्तरे देण्यात आली आहेत. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, याची हमी आम्ही घेतो; पहिले कर्जमाफ करा, असा प्रस्ताव सरकारला दिला. संभाजी बिग्रेडने कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याचे हमीपत्र आम्ही भरून देऊ, असा दावा केला.

‘कोणाचीही मदत घेऊ’

सुकाणू समितीच्या बैठकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीवर काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांना स्टेजवर जाण्यास विरोध करण्यात आला. त्यावर समितीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करत, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आमच्या सोबत जो येईल त्याला आम्ही सोबत घेऊ, असे शेट्टींसह कडू यांनी सांगितले. सरकारविरोधात जो असेल तो आमच्यासोबत असेल, अशी भूमिका नेत्यांनी स्पष्ट केली.

महिलेचा गोंधळ

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आयोजित केलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत मुंबईच्या कल्पना इनामदार या महिलेने गोंधळ घालत गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. माईकचा ताबा घेत, शेतकरी संप राजकारणविरहित असल्याचे सांगितले जात असताना खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू व्यासपीठावर कसे, असा प्रश्न या महिलेने विचारला. त्यामुळे एकच गोंधळ उडला. पोलिस आणि कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलेला घेराव घालत व्यासपीठाबाहेर नेले. भाजपच्या इशाऱ्यानेच ही महिला आल्याचा आरोप सभेतील नेत्यांनी या वेळी केला.

चर्चेचे दरवाजे उघड

राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर सुकाणू समितीने सरकारसाठी चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. सरकारला वाटत असेल त्यांच्याशी चर्चा करा; पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असे आवाहन या समितीने केले आहे.

अशी सुकाणू समितीची रणनीती

पहिला टप्पा ः सरकारला निर्णयासाठी दोन दिवसांची मुदत

दुसरा टप्पा ः १२ जूनला धरणे, ठिय्या, १३ जूनला रेल रोको

तिसरा टप्पा ः मुंबई, पुणे, नागपुरातील रसदकोंडीचा इशारा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस आला धावून; पूल गेला वाहून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि. ७ ) जूनला धुळ्यात पावसाने दमदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला होता. त्याचा फटका शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चारपदरी कामाला बसून, इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळील पूल वाहून गेला. यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका वगळता शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातदेखील पावसाचे आगमन झाल्याने जिल्ह्यात सरासरी २१.५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

धुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने सात जूनला हजेरी लावत तालुक्यातील कुसूंबा, मोराणे, नेर, उडाणे, मेहेरगाव, निमडाळे याठिकाणी चांगलाच दणका दिला. तर बुधवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसाचा फटका महामार्ग क्रमांक सहाला बसला असून, नवीन होणाऱ्या महामार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणी जुने पूल पाडून नवीन बांधण्यात येत आहेत. त्यांना या पावसाच्या पाण्यामुळे क्षती पोहोचली आहे. प्रशासनाकडून पूलावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

वाहतुकीची कोंडी

या पावसाने जिल्ह्यातील काही ठिकाणी महामार्गावरील रस्ते वाहून गेल्याने मध्यरात्रीपासून वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांच्या मदतीने ही कोंडी सोडविण्यात आली. तर सुरतकडून येणारी वाहणे कुसूंबा, मेहेरगाव मार्गे वळविण्यात आली आहेत. अवजड वाहनधारकांना मात्र गुरुवारी दुपारपर्यंत नंतर मार्ग काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २१.५ मिलीमीटर पावसाची नोंद प्रशासनाने केली असून, त्यात सर्वाधिक शिरपूर तालुक्यात ३७ मिलीमीटर, धुळे शहर व तालुका ३४ मिलीमीटर, शिंदखेडा १५ मिलीमीटर, साक्री तालुका शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर उद्या अनुभवणार ‘कलासंगम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या ‘कलासंगम’ला (आर्ट फेस्ट) अवघे २४ तास उरले असून, नाशिककर नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, संगीत, वारली या कलांचा संगम पाहण्याची संधी नाशिककरांना ‘मटा’ने उपलब्ध करुन दिली आहे.

नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त १० व ११ जून रोजी सकाळी १० वाजेपासून मविप्र आर्किटेक्ट कॉलेज, प्रसाद मंगलकार्यालयाजवळ या कलासंगमाचे (आर्ट फेस्ट) आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्रसिध्द व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित रहाणार आहेत.

नाशिकचे नामवंत शिल्पकार नीलेश ढेरे, यतीन पंडित, श्रेयस गर्गे, भूषण कोंबडे यात सहभागी होणार असून, ११ ते १ याकालवधीत त्यांची प्रात्यक्षिके पहायला मिळणार आहेत. दुपारी १ वाजेपासून चित्रकारांच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात होणार आहे. यात संजय दुर्गावाड, बाळ नगरकर, कैलास परदेशी हे चित्रकार सहभागी होणार आहेत. दुपारी ३ ते ४ या कालावधीत प्रभाकर झळके हे आपल्या कुंचल्याने कार्टून्सची मजा दाखवणार आहेत. त्यानंतर श्रध्दा कारळे या ४ ते ५ या कालावधीत वारली पेंटिंग सादर करणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता प्रफुल्ल सावंत हे लॅण्‍डस्केप पेंटिंग, तर राजेश सावंत हे क्रिएटिव्ह पेंटिंग सादर करतील. संध्याकाळी ६ वाजता प्रसाद पवार, समीर बोंदार्डे, संजय अमृतकर हे फोटोग्राफीविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. संध्याकाळी ६.३० वाजता नंदू गवांदे हे कॅलिग्राफी सादर करणार आहेत. नाशिककरांनी या आर्ट फेस्टला अवर्जून हजेरी लावावी, असे आवाहन ‘मटा’च्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मविप्रच्या आर्किटेक्ट कॉलेज आणि तेथील स्टाफने बहुमोल सहाय्य केले आहे.

नवनवीन प्रयोग मिळणार पहायला

नाशिकमधील परफॉर्मिंग आर्ट सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा व नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा उपक्रमाचा उद्देश आहे. दुसऱ्या दिवशी ( ११ जून) हौशी कलाकारांसाठी सकाळी १० ते ४ या कालावधीत व्यासपीठ खुले राहणार असून, त्यात आपली कला सादर करता येणार आहे. याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता नाशिकमधील प्रख्यात नृत्यांगना रेखा नाडगौडा, सुमुखी अथनी आणि कीर्ती भवाळकर नृत्य सादर करणार आहेत. नितीन वारे आणि नितीन पवार यांचे शिष्य तबलावादन करणार असून तबल्यातील कायदे, पलटे, चक्रदार, परण, तिहाई असे विविध प्रकार सादर करणार आहेत. यात सोलो व सहवादन या दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे. संध्याकाळी ६.१५ ते ६.४५ याकालावधीत बासरीवादक मोहनी उपासनी यांचे शिष्य बासरीवादन करणार आहेत. ७ ते ७.३० या कालावधीत अष्टूरकर आणि ग्रुप सतारवादन करणार आहेत. ७.४५ ते ८.४५ या कालावधीत तीनही नृत्यांगना व त्यांच्या शिष्य आपली कला पेश करणार आहेत. रात्री ९ ते ९.३० याकालावधीत नरेंद्र पुली आणि त्यांचे शिष्य गिटारवादन करणार आहेत.

झुंबा वर्कशॉप

महिलांसाठी झुम्बा वर्कशॉप होणार असून, या वर्कशॉपमध्ये नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन ठेवण्यात आले आहे. हे वर्कशॉप १३ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ याकालावधीत अखिल भारतीय मध्यवर्ती ब्राह्मण संस्था हॉल, पाण्याच्या टाकीजवळ येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंटेनन्समुळे उद्या पाणीपुरवठा नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणावरील पंप‌िंग स्टेशन येथील महावितरण कंपनीची एक्सप्रेस फिडर लाइनची देखभाल-दुरुस्ती व पाणीपुरवठ्याची विविध ठिकाणची कामे केली जाणार आहेत. या कामासाठी शनिवार १० जून रोजी वीज पुरवठा सकाळी १० ते रात्री ७ पर्यंत बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे शनिवारचा संपूर्ण नाशिक शहराचा (नाशिकरोडसह) दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल, असे पत्रक नाशिक महानगरपालिकेने प्रसिध्दीस दिले आहे.

यात शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रास पाणी पुरवठा करणाऱ्या पंपसेट्सचे व्हॉल्व दुरुस्ती करणे, ३३ केव्ही सबस्टेशनमधील दुरुस्ती, चेहेडी पंप‌िंग स्टेशन येथील उर्ध्ववाहिनीची दुरुस्ती, कालिका पंपिंग स्टेशनमधील नवीन पॅनलची व केबलची जोडणी, कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्ती, गंगापूर डॅम पंपिंग स्टेशन येथील ९०० म‌िमी व्यासाच्या रायझिंग मेनवरील व्हॉल्वची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँकेसाठी आज माघारीची मुदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची आज (दि. ९) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतरच निवडणूक रिंगणात किती उमेदवार व किती पॅनल उभे ठाकतात, हे स्पष्ट होणार आहे.

निवडणूक २५ जूनला असली तर उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे.

२१ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले होते. या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवारांनी सहकार आयुक्तांकडे दाखल केलेले अपिल फेटाळण्यात आले. सहकार व श्रीव्यापारी पॅनलच्या काही उमेदवारांची नावे निश्‍चित झाली आहेत. मात्र, अद्याप काही उमेदवारांबाबत निर्णय घेण्याचे बाकी आहे. श्रीव्यापारी पॅनलतर्फे काही विद्यमान संचालकांची नावे निश्‍चित झाली असून, तेथेही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. सत्तारूढ सहकारकडून सत्ता ताब्यात घेण्यासाठी श्रीव्यापारी पॅनलने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सहकार पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे करत असून, त्यांना शाम चाफळकर, रामदास सदाफुले, सुधाकर जाधव, मनोहर कोरडे, सुरेश गायकवाड, डॉ. प्रशांत भुतडा आदींची साथ मिळत आहे. श्रीव्यापारी पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे शहराचे लक्ष लागले आहे. आजी-माजी जिल्हाप्रमुखच एकमेकांविरुध्द उभे ठाकल्याने शिवसैनिक गोंधळात पडले आहे. प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. सहकार पॅनलने काल कोटमगाव, सामनगाव तसेच नाशिकरोडच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. श्रीव्यापारी पॅनलचे संभाव्य उमेदवार हेमंत गायकवाड, राजीव टर्ले, विलास पेखळे, सतीश मंडलेचा, सुदाम ताजनपुरे, अनिल ताजनपुरे, प्रकाश गोहाड, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, चंद्रकांत विसपुते, शांताराम घंटे, योगेश नागरे, शिरीष लवटे, शाम गोहाड, विक्रम खरोटे आदींनी जेलरोड परिसरात दौरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारचे पुढचे दिवस वाईट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लुटुपुटूच्या लढाया खूप झाल्या. आता आंदोलन असे करा की दिल्ली खडबडून जागी झाली पाहीजे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी नाशिकमध्ये केले. जेवढा शेतकऱ्यांना त्रास द्याल तेवढे सरकारचे पुढचे दिवस वाईट जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

शेट्टी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तुम्ही पक्षात इनकमिंगचा विचार करत आहात. परंतु, पक्षात आता काळे कुत्रे देखील येणार नाही. शेतकरी हितासाठी आयुष्यभर झटणाऱ्या माधवराव मोरे यांच्या शाळेतील आम्ही विद्यार्थी आहोत. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन उभे करण्यात आले. परंतु पोलिसांना हाताशी धरून सरकारने शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करणारे दमतात की, शेतकरी हे आता तुम्ही बघाच असा इशारा शेट्टी यांनी सरकारला दिला. आंदोलनात शेतकरी कोण आणि गुंड कोण हे आम्हाला माहीत असल्याचे वक्तव्य अल‌िकडेच मुख्यमंत्र्यांनी केले. आता तुम्हाला आम्ही गुंड दिसू लागलो का, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थ‌ित केला. गुन्हे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावून घ्यायचे आणि त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणायचा असा सरकारचा डाव असल्याचा आरोप शेट्टी यांन‌ी केला. तुम्ही इनकमिंगचा विचार करताय. परंतु पक्षातून आऊटगोईंग सुरू झाले आहे.

आंदोलकांच्या कुंडल्या आपल्याकडे असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा शेट्टी यांनी समाचार घेतला. मी कोल्हापूरच्या कुस्तीतला माणूस आहे. पहिले माझीच कुंडली बाहेर काढा. शेतकऱ्यांची चळवळ मोडण्याचा विचार केलात तर सरकारचे काही खरे नाही असा इशाराही त्यांनी आला.

मोदींना ‘स्वामीनाथन’ कळलाच नाही

गुजरातमध्ये अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी राज्यात कृषीक्षेत्राने प्रगती केल्याचे निवडणुकीपूर्वी सांगत होते. शेतकऱ्यांना शेती व्यवसायात स्थ‌िरस्थावर करू, असे आश्वासन मोदी यांनी निवडणूकीपुर्वी दिले. त्यांनी हे आश्वासन पाळले असते तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज नसते. देशाची अवस्था ‘मर जवान मर किसान’ अशी असल्याबद्दल शेट्ट‌ी यांनी खंत व्यक्त केली. मोदींना स्वामीनाथन आयोग समजलाच नसल्याची टीका यावेळी करण्यात आली.

गोळ्या झाडल्या तर थडग्यात घालू

सभेच्या सुरुवातीलाच आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि मध्यप्रदेशतील गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्प्ट झाले नाही. परंतु त्यांचे कर्ज दुप्पट झाले आहे. शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तर शेतकरी तुम्हाला थडग्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

भाजपचा प्रचार केल्याचा पश्चाताप

ज्या हातांनी तुम्हाला सत्ता दिली. ती सत्ता घालविण्याची ताकद मनगटात असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. भाजपचे सरकार सत्तेवर यावे यासाठी प्रचार केल्याचा पश्चाताप होतो आहे अशी जाहीर कबूली शेट्टी यांनी या सभेत दिली. शेतकऱ्यांना आतापर्यंत सर्वांनी वापरून घेतले. परंतु आता शेतकऱ्यांना पाठींबा दर्शविणाऱ्या सर्वांची मदत घेतली जाईल असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. २०१९ पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असेल किंवा सरकार पडलेले असेल. सरकारला लाल किल्ला विसरण्यास भाग पाडू, असा यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतिराजांच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींचे वटपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जरीची साडी, नाकात नथ, केसांत माळलेला गजरा, बांगड्या अशी आभुषणे परिधान करीत शहरातील सुवासिनींनी गुरुवारी मनोभावे वटपौर्णिमा साजरी केली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी कामना करीत पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींनी यावेळी प्रार्थना केली. शहरभरात ठिकठिकाणी सुवासिनींनी वटपूजन केले.

वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला दीर्घायुष्य असते तसेच पतीला दीर्घायुष्य लाभो व जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी प्रार्थना करीत वडाचे पूजन केले जाते. त्यामुळेच या सणाला महिलांच्या दृष्टीने विशेष महत्त्व असते. गुरुवारी नववधूंमध्ये तर या सणाविषयी अधिक उत्सुकता दिसून आली. एकमेकींच्या कपाळाला हळद-कुंकू लावत आंब्याचे वाण देऊन महिलावर्गाने हा सण साजरा केला.

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी या सणाच्या पूर्वसंध्येपासून, तर गुरुवारी सकाळीदेखील बाजारात सुवासिनींची लगबग होती. यंदा पौर्णिमा दुपारी ४.३० वाजेनंतर लागल्याने पूजा केव्हा करावी, याबाबत अनेकांच्या मनात संदिग्धता होती. परंतु, गुरुवारी वटपौर्णिमा साजरा करण्याला अनेकींनी प्राधान्य दिले. वडाच्या झाडाला वंदन करून त्यापुढे पान, सुपारी, फुले ठेवून पूजा करण्यात आली. आंबे व इतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

---

देवळालीत उत्साह

देवळाली कॅम्प : देवळाली परिसरात महिलांकडून वटपौर्णिमेनिमित्त अखंड सौभाग्यासाठी एकमेकींना हळदी-कुंकू लावून व ओटी भरून वटपूजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील महिलांत या सणाचा उत्साह दिसून आला.

देवळालीतील लामरोड परिसरात अनेक वटवृक्ष असून, अखंड सौभाग्यासह सात जन्मांच्या नात्यासाठी या वटवृक्षांना सात फेऱ्या मारत सुताचा धागा गुंडाळून महिलावर्गाकडून पूजन करण्यात आले.

---

सिडकोत वृक्ष लागवडीचा संकल्प

सिडको ः येथील श्रीराम मंदिरात महिलांनी अखंड सौभाग्यासह सात जन्मांच्या नात्यासाठी वटवृक्षाचे पूजन करून वृक्ष लागवडीचा संकल्प केला. विशेष म्हणजे यावेळी सर्व महिलांनी पौरोहित्य केले.

परिसरात ठिकठिकाणी वटपूजन झाले. उत्तमनगर येथील श्रीराम महिला मंडळाच्या सदस्यांनी विजया उपासनी यांच्या पौरोहित्याखाली वटपूजन केले. वृक्षांच्या घटणाऱ्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी झाडे लावा, झाडे जगवाचा संकल्प केला.

--

धार्मिक सण साजरे करण्यामागे निसर्गाचेही रक्षण केले जाते. आम्ही वटपौर्णिमा आधुनिक पद्धतीने साजरी करून वृक्षरोपणाचा संदेश दिला.

-विजया उपासनी, महिला पुरोहित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या रजिस्ट्रेशन नंबरने भुर्दंड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुझुकी मोटरसायकलच्या आरटीआे रजिस्ट्रेशनमध्ये दुसऱ्याचा गाडीचा चेसिस, इंजिन नंबर व उत्पादन तारीख आरसी बुकमध्ये आल्याने संबंधित शोरूमविरोधात ग्राहक न्यायमंचात तक्रार करणाऱ्या नवनाथ खरपुडे यांना दिलासा मिळाला आहे. या दुचाकी गाडीची रजिस्ट्रेशनची जबाबदारी स्पीड मशिन इंडिया या सुझुकी मोटरसायकलच्या संचालकांनी घेतली होती. पण, त्यांनी वारंवार चूक दुरुस्त करण्याची मागणी करूनही टाळाटाळ केल्यामुळे या संचालकांना दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

खरपुडे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सुझुकी कंपनीचे जीएस १५० हे वाहन स्पीड मशिन इंडियामधून विकत घेतले. त्यांनी वाहन आरटीआे रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानुसार १५ दिवसांनी त्यांनी आरटीआे रजिस्ट्रेशन केल्याचे आरसी बुक दिले. मात्र, या आरसी बुकमध्ये चेसिस, इंजिन नंबर वेगळा होता, तर उत्पादन तारीख वाहन विक्री केल्यानंतरची नमूद करण्यात आली होती. सदर चूक वाहनाच्या कर्जफेडीनंतर दुरुस्त करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यानंतर संपूर्ण कर्ज परतफेड केल्यानंतर कार्यवाही केली नाही. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस करून सेवा देण्यात कमतरता केली.

या तक्रारीवर न्यायमंचात बाजू मांडतांना स्पीड मशिनतर्फे सांगण्यात आले, की चूक करून देण्यास आम्ही सदैव तयार आहोत. आम्ही सेवा देण्यास कमी केलेली नाही.

---

असा दिला निकाल

न्यायमंचाने निकाल देताना म्हटले, की प्रत्यक्ष वाहन विक्री करण्यात आलेल्या व ताब्यात देण्यात आलेल्या वाहनाचा चेसिस व इंजिन नंबर, तसेच रंग, उत्पादन तारीख वेगळी आहे. झालेली चूक तत्काळ दुरुस्त करून देणे आवश्यक होते. मात्र, सेवा देण्यात कमतरता केली आहे. त्यामुळे स्पीड मशिनने आरसी बुकमध्ये स्वखर्चाने आरटीआेकडून दुरुस्ती करून द्यावी. त्याचप्रमाणे सात हजार रुपये शारिरिक त्रासापोटी व अर्जाचा खर्च तीन हजार रुपये द्यावेत. न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी हा निकाल दिला. खरपुडे यांच्यातर्फे अॅड. के. एस. शेळके यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना, भाजप आमदारांचा कर्जमाफी ठरावाला नकार

$
0
0

धुळे जिल्हा नियोजन बैठकीत आमदारांत शाब्दिक चकमक

म.टा.वृत्तसेवा,धुळे

शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात यावा, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. मात्र यावेळी भाजपचे आमदार अनिल गोटे व आमदार कुणाल पाटील यांच्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी कुसूंब्याला ट्रामा केअर सेंटरची जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी उभारण्यात यावी यावरूनही माजी आमदार प्रा,शरद पाटील व जिल्हा परिषद शिक्षण सभापती मधुकर गर्दे यांच्यातही जोरदार वाद झाला. या प्रकारामुळे बैठक दीड तासात गुंडाळण्यात आली.

धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. ७) झालेल्या नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला. यावेळी कर्जमाफीचा एक ओळीचा ठराव करण्यात यावा, अशी मागणी विरोधी आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, मधुकर गर्दे करीत असताना भाजप व सेना पक्षांतील सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हाती घेऊन शिवसेना जिल्हाभरात आंदोलने करीत आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार दादा भुसे, भाजपचे आमदार जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे यांनी या ठरावाला नकार दर्शविला. त्यामुळे हा सरकारचा ढोंगीपणा असल्याचे विरोधकांनी यावेळी सांगितले.

बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, आमदार डी. एस. अहिरे, आमदार कुणाल पाटील, आमदार काशिराम पावरा समितीचे सदस्य व जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कोणताच निर्णय नाही

या सभेला सुरुवात झाल्यानंतर आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठराव करण्याची मागणी केली असता यावेळी पालकमंत्री भुसे व रावल यांनी हा विषय मुख्यमंत्री घेऊन तडीस तेच लावतील, असे सांगितले. तर आमदार गोटे यांनी अक्कलपाडा प्रकल्प, शहर पाणी पुरवठा योजना, तसेच शहरातील अतिसंवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह अन्य विषयांवर चर्चा होऊन बैठक गुंडाळली. या सभेत महत्त्वपूर्ण कोणताही निर्णय झाला नसला तरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी आमदार कुणाल पाटील यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

कोट००

जिल्हा नियोजनाच्या बैठकीत शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवसेना आणि भाजपच्याच मंत्र्यांकडून याला नकार मिळाल्याने सरकारचा ढोंगीपणा समोर आला आहे. ते फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांना शेतकऱ्यांविषयी कोणतीही कळकळ नाही.

कुणाल पाटील ग्रामीण आमदार, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही जलआंदोलन सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सरकारने दोन दिवसांत योग्य तो निर्णय न घेतल्यास आम्ही दोन दिवसांनंतर अन्नत्याग करू आणि वेळ आल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला. या शेतकऱ्यांनी बुधवारपासून (दि. ७) साहूर गावालगत तापी नदीपात्रात आंदोलन सुरू केले आहे. बुधवारची रात्र आणि आता गुरुवारी सलग दोन दिवस आंदोलन सुरू असून, हे आंदोलनकर्ते तापी नदीच्या पात्रातून मागे हटण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयातून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत जलआंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images