Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चिमुकल्यांची ‘स्मार्ट’ चुणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोठ्या माणसांची कल्पनाशक्ती जेथे संपते अशा ठिकाणी लहान मुलांची सुरू होते, असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे सोमवारी तीन गटांत झालेल्या चित्रकला स्पर्धेत बच्चेकंपनीने आपल्या कल्पनेतील स्मार्ट सिटी चितारून या उक्तीचा प्रत्यय आणून दिला. स्पर्धेसाठी असलेल्या स्मार्ट सिटीसंदर्भातील विषयाला अनुसरून चिमुकल्यांनी आपल्या स्मार्ट कल्पनाशक्तीची चुणूकच जणू दाखवून दिली.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बच्चेकंपनीला खास स्थान देण्याच्या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकला वा. गो. कुलकर्णींपासून ते शिवाजीराव तुपे आदींपर्यंत प्रसिद्ध व दिग्गज चित्रकारांची परंपरा आहे. या परंपरेला सलाम करून शहरात चित्रकलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि लहानग्या कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सोमवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत मते लॉन्स, सावरकरनगर येथे झाली. स्पर्धेत शहरातील शाळांचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी नंदनवन लॉन्स हे व्हेन्यू पार्टनर होते.

स्पर्धेची सुरुवात नाशिक जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष द. वा. मुळे यांच्या मार्गदर्शनाने झाली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, की स्पर्धेत तुम्हाला पारितोषिक मिळाले नाही तरी चालेल, तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. चित्रे रेखाटण्याविषयीदेखील त्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुळे यांच्यासह अशोक धिवरे, राहुल मुळे, सुनील गवळी, विनोद जांभोरे, मिलिंद टिळे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी कलाध्यापक संघाचे पदाधिकारी महादेव जगताप, चेतना बैरागी आदींनी प्रयत्न केले.


स्वच्छ-हरित नाशिकवर भर

‘आपल्या स्वप्नातले नाशिक कसे असावे? स्मार्ट सिटी म्हणजे काय?’ असा विषय देण्यात आला होता. सहभागी विद्यार्थी चित्रकारांनी स्वच्छ नाशिक व हरित नाशिक या विषयावर चित्रे रेखाटली. आम्हाला स्मार्ट सिटी आवश्यक आहे. परंतु, आमचे गावपण टिकू द्या, असा संदेशही अनेकांनी आपल्या चित्रांद्वारे दिला. केवळ भौतिक विकास नको, तर हरित नाशिकचा विकास झाला पाहिजे, असेही अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे अमृताचे थेंब नाशिकमध्ये पडले, त्यामुळे येथे कुंभमेळा सुरू झाला असे म्हणतात, त्याचप्रमाणे विकासाचे थेंब नाशिकमध्ये पडू द्या व नाशिकची भरभराट होऊ द्या, हरित नाशिक, स्वच्छ नाशिक, स्वच्छ व चांगले रस्ते, उद्योगनगरी, रिंगरोड, पर्यावरण संतुलन आदी गोष्टींची नाशिकला आवश्यकता आहे, असे चित्राद्वारे विद्यार्थ्यांनी सांगितले.


विजेते जाहीर, आज पारितोषिक वितरण

पाचवी व सहावी (एक गट), सातवी व आठवी (दुसरा गट), नववी व दहावी (तिसरा गट) अशा तीन गटांत झालेल्या या चित्रकला स्पर्धेतील विजेते जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थसाठी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. पारितोषिक वितरण आज, मंगळवारी (दि. १३) दुपारी २ वाजता महाराष्ट् टाइम्सच्या ऑफिसमध्ये होईल. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, सेमिनार हॉल, चौथा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड.

स्पर्धेचे विजेते असे

पहिला गट (पाचवी ते सहावी) ः

प्रथम- सिद्धी साहेबराव गुंजाळ, सहावी, मराठा हायस्कूल, द्वितीय- सुजल सुनील धोत्रे, पाचवी, तृतीय- हिमानी विजय माळी, सहावी, सेंट फ्रान्सिस हायस्कूल, उत्तेजनार्थ - पूर्वा महाजन, पाचवी, आत्मजा भालचंद्र पवार, सहावी, होरायझन अॅकॅडमी

---

दुसरा गट (सातवी ते आठवी) ः

प्रथम- भूषण वसंत गायकवाड, आठवी, गुरू गोविंद सिंग हायस्कूल,

द्वितीय- कृष्णा दीपक गिरमे, आठवी, न्यू इरा इंग्लिश स्कूल,

तृतीय- सृष्टी नरेंद्र नेरकर, आठवी, रचना विद्यालय, उत्तेजनार्थ- रिद्धी अतुल कुकेकर, आठवी, अनुष्का रविकुमार गोसावी, निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल.

---

तिसरा गट (नववी ते दहावी) ः

प्रथम - श्रुती संजय बागूल, नववी, केंद्रीय विद्यालय, आयएसपी, नाशिकरोड, द्वितीय- अदिती अशोक फोफलिया, नववी, बॉइज टाउन पब्लिक स्कूल, तृतीय- प्रियंका दत्तात्रय कोठुळे, दहावी, श्रीराम विद्यालय, उत्तेजनार्थ- ऋषिकेश पाटील, दहावी, पिंपळगाव हायस्कूल, पिंपळगाव बसवंत, अंकिता देवीदास बाविस्कर, दहावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा जुलैमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेषा असोसिएट्सतर्फे नाशिक येथील स्वामिनारायण बँक्वेट हॉलमध्ये १८ ते २३ जुलैदरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. स्पर्धेला फिडे, एआयसीएफ, एएमसीए, स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडिया व नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेची (एनडीसीए) मान्यता आहे. स्पर्धेसाठी एकूण तीन लाखांची घसघशीत पारितोषिके देण्यात येणार असून, विविध वयोगटांसाठी एकूण ८२ पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजक अर्चना कुलकर्णी यांनी दिली.

राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून, नाशिकच्या नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळविण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. स्पर्धेत विविध वयोगटांसाठी एकूण ८२ पारितोषिके दिली जाणार असून, पहिल्या क्रमांकासाठी ६१ हजार, दुसरे ४१ हजार, तिसरे २५ हजार, चौथे १८ हजार तर पाचव्या क्रमांकासाठी १२ हजार रुपये अशी एकूण १८ मुख्य पारितोषिके आहेत. याशिवाय फिडे रेटिंग १४००, १८००, २१०० खालील खेळाडूंसह बालगट, प्रौढ गट, नाशिक ग्रामीण व शहर अशा विविध गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत.

मानांकित खेळाडूंचे डाव पाहण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी एलसीडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. त्यामुळे पटावरील चुरशीचे द्वंद्व सहजपणे पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. नाशिक जिल्याच्या खेळाडूंना १५ जून पर्यंत सहभाग नोंदविल्यास त्याना सुद्धा प्रवेशात विशेष सवलत देण्यात आली आहे . स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १२ जुलै सायंकाळी पाचपर्यंत असून, त्यानंतर प्रवेश स्वीकारले जाणार नाही. ऐनवेळी कोणाचेही प्रवेश स्वीकारले जाणार नसल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक चेसबोर्डचे आकर्षण

स्पर्धेत प्रथमच इलेक्ट्रॉनिक चेसबोर्ड रेषा असोसिएट्सतर्फे दरवर्षी फिडे रेटिंग स्पर्धेत नावीन्यपूर्ण बदल केले जात असून, यंदा इलेक्ट्रॉनिक चेस बोर्डवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. एकूण वीस चेस बोर्ड स्पर्धेत समाविष्ट केली जाणार आहेत. या बोर्डचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेत सुरू असलेले अव्वल मानांकितांचे डाव ऑनलाइन पाहता येऊ शकतील. ५०० चाली स्टोअर करण्याची या बोर्डची क्षमता असून, फिडेने या बोर्डला मान्यता दिलेली आहे. या चेस बोर्डचा वापर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत केला जातो. भारतात मुंबईनंतर प्रथमच नाशिकमध्ये हे चेसबोर्ड उपयोगात आणले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरीची तक्रार करा ऑनलाइन

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

वाहनचोरी झाल्यावर बऱ्याचदा पोलिस स्टेशनच्या चकरा मारून सामान्य नागरिक वैतागून जातो. तुम्हाला तुमच्या चोरीस गेलेल्या वाहनाची तक्रार पोलिस स्टेशनला न जाता करता आली तर? होय, आता वाहनचोरीची तक्रार तुम्हाला अॉनलाइनसुद्धा करता येणार असून, तक्रारीनंतरचे स्टेटसही पाहता येणार आहे.

वाहनचोरी झाल्यानंतर पोलिसांत जाऊन तक्रार केली, तरीही अनेक दिवस वाट पाहावी लागते. वाट पाहूनही वाहनचोरीची काही ठोस माहिती समोर येत नाही. पण, आता वाहनचोरीच्या तक्रारी नागरिकांना अॉनलाइन मांडता येणार असून, पोलिस दलाच्या या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना मात्र दिलासा मिळणार आहे. चोरीस गेलेल्या वाहनांची व सापडलेल्या वाहनांची सर्व माहिती या वेबसाइटद्वारे आपल्याला मिळू शकते. तुमच्या वाहनचोरीच्या तक्रारीचा मागोवासुद्धा या वेबसाइटद्वारे तुम्हाला घेता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेबसाइटचे मागील वर्षी १५ जूनला लाँचिंग झाले होते. गेल्या एक वर्षात या वेबसाइटला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

---

असे करता येईल रजिस्ट्रेशन

www.vahanchoritakrar.com या वेबसाइटवर जाऊन मेन्यू अॉप्शन निवडावा. त्यानंतर मोबाइल नंबर, इमेल आयडी, नाव, आधार क्रमांक, पासवर्ड अशी सर्व माहिती टाकावी. नंतर रजिस्टर अॉप्शन निवडल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी मोबाइल नंबर, पासवर्ड आणि सिक्युरिटी कोड टाकणे आवश्यक आहे.

---

गाडी चोरीला गेल्यानंतर सामान्य नागरिकाला मोठा त्रास सहन करावा लागतो. पण, आता या वेबसाइटमुळे त्यांना तक्रार घरबसल्याही नोंदवता येईल. पोलिस प्रशासनाचा हा उपक्रम खरोखर वाखाणण्याजोगा आहे.

-रुपेश घुगे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणची फसवणूक केल्यास कारवाई

$
0
0

रिडिंग एजन्सींना महावितरणकडून इशारा

म. टा. वृत्तसेवा सिन्नर फाटा

वीज बील रिडिंगकामी नेमलेल्या एजन्सीच्या चुकीच्या व अनियमित बिलिंगमुळे महावितरणला दरमहा कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यापुढे अशाप्रकारचे चुकीचे व खोटे रिडिंग घेतल्यास महावितरणची जाणीवपूर्वक फसवणूक केल्याप्रकरणी एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्याचा थेट इशारा महावितरणचे प्रभारी संचालक (संचालन) शंकर शिंदे यांनी रिडिंग एजन्सींच्या प्रतिनिधींना दिला आहे.

एकलहरे येथील महावितरणच्या प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात रिडिंग एजन्सीच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत शिंदे यांनी हा इशारा दिला. याप्रसंगी शिंदे म्हणाले की, वीज ग्राहकांच्या मीटरचे शंभर टक्के अचूक व नियमित रिडिंग आणणे एजन्सीजना बंधनकारक आहे. मात्र तसे होत नसल्याने महावितरणला दरमहा कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचा परिणाम महावितरणच्या व्यवसायावर होत असून, त्यासाठी सर्वप्रकारच्या वीज ग्राहकांच्या मीटर रिडिंग अचूक व नियमितपणे होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

यासाठी रिडिंग एजन्सीच्या कमिशनमध्येही नुकतीच वाढ करण्यात आली असून, अडचणीही जाणून घेत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. सभेस महावितरणचे नाशिक परिमंडलचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता शैलेन्द्र राठोड यांच्यासह अभियंता, उपविभागीय अभियंता, एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा धोकादायक पूल अवजड वाहतुकीस बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंडळाने नाशिक जिल्ह्यातील सहा धोकादायक पुलांवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख राज्यमार्ग, तसेच जिल्हा मार्गांवरील या धोकादायक पुलांच्या देखभाल दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून, सुरक्षेच्या कारणास्तव ही वाहतूक बंद करण्यात येत असल्याचे पत्र बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने दोन बसेससह काही वाहने वाहून गेली होती. या घटनेच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. या दुर्घटनेनंतर राज्यातील कमकुवत पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. अशा पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या वेळी दिले होते. नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व सुरक्षा कालावधी संपलेल्या पुलांचा मुद्दाही या घटनेनंतर चर्चेत आला. धोकादायक पुलांवरील वाहतूक बंद करा, अशी मागणीदेखील होऊ लागली. जिल्ह्यातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेण्यात आले. अशा धोकादायक पुलांची माहिती सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गेल्या वर्षी देऊनही ही माहिती सादर केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘महाराष्ट्र टाइम्स’ने अलीकडेच उघडकीस आणले होते. या विभागातील अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठविण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली होती. धोकादायक पुलांची माहिती १५ जूनपूर्वी सादर करा, असा अल्टिमेटम जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर आता काही धोकादायक पुलांवरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अन्य सरकारी कार्यालयांमार्फत आपत्तीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम मंडळाने जिल्ह्यातील राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गावरील सहा जुन्या धोकादायक पुलांवरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी चार पूल काही दिवसांपूर्वीच अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. त्यामध्ये निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील चांदोरी ते सायखेडा गावास जोडणारा पूल, सिन्नर तालुक्यातील दारणा नदीवरील भगूर गावाजवळील पूल, इगतपुरी तालुक्यातील घोटी गावाजवळील दारणा नदीवरील पूल आणि नांदगाव तालुक्यातील मनमाड गावाजवळील पांझण नदीवरील पुलाचा समावेश आहे. या पुलांच्या दुरस्तीचे काम सुरू असून, ते ३० जूनपर्यंत पूर्ण होईल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील सौंदाणे- कळवण -बोरगाव- सुरगाणा- उंबरठाण- बर्डीपाडा राज्य मार्ग क्र. २२ गावनाला नदीवरील दोन ठिकाणचे पूल आजपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या धोकादायक पुलांवरून अवजड वाहने नेण्यास बंदी आहे. जिल्हा प्रशासनानेही सर्व तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना पत्र देऊन याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. परिवहन अधिकारी कार्यालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

हे आहेत सहा धोकादायक पूल

१. निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील चांदोरी ते सायखेडा गावास जोडणारा पूल

२. सिन्नर तालुक्यातील दारणा नदीवरील भगूर गावाजवळील पूल

३. इगतपुरी तालुक्यातील घोटी गावाजवळील दारणा नदीवरील पूल

४. नांदगाव तालुक्यातील मनमाड गावाजवळील पांझण नदीवरील पूल

५ व ६. सुरगाणा तालुक्यातील राज्य मार्ग क्र. २२ गावनाला नदीवरील दोन ठिकाणचे पूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज नसल्यास टँकर बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील काही भागांत चांगला पाऊस झाला असून, टँकरग्रस्त गावे आणि वाड्यांवर गरजेपुरते पाणी उपलब्ध झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा काही गावांमधील टँकर कमी करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत असून, तहसीलदारांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हक्काचे साधन म्हणून टँकरचा पर्याय अवलंबला जातो. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील रहिवाशांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणेही पूर्ण क्षमतेने भरली. ग्रामीण भागातील विहिरी, तलाव आणि तत्सम जलाशयांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा उन्हाळा काहीसा सुसह्य झाला. मात्र, एप्र‌िलपासून काही भागात पाणीटंचाईची परिस्थ‌िती निर्माण झाली. ग्रामस्थांकडून टँकरची मागणी होऊ लागल्याने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून टँकरही सुरू करण्यात आले. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने यंदा दमदार हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे गरज नसेल तर टँकर का सुरू ठेवावेत, याचा विचार जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. तालुक्यात ज्या ज्या गावांमध्ये टँकर सुरू आहेत तेथील परिस्थ‌ितीची पाहणी करावी. गरजेपुरते पाणी उपलब्ध झाले असेल तर तेथील टँकर बंद करावेत, अशा सूचना तहसीलदारांना देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशीही सूचना करण्यात आली आहे.

७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यात सद्यःस्थ‌ितीत ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाकडील अहवालानुसार जिल्ह्यात ११३ गावे आणि १३३ वाड्या अशा एकूण २४६ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण कमी असल्याचे प्रशासनाने सांगितले. केवळ टँकरद्वारे पाणीपुरवठा शक्य नसल्याने काही गावांमध्ये ग्रामस्थांच्या सोयीसाठी प्रशासनाने विहिरीच अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात अशा एकूण १७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, एकट्या कळवण तालुक्यात १७ विहिरींची मदत घेतली जात आहे. विशेष म्हणजे या तालुक्यात एकही टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लंडनमध्ये जाणाऱ्यांना शेतकऱ्यांचा कळवळा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दरवर्षाच्या उन्हाळ्यात कुटुंबासह परदेशात फिरायला जाणाऱ्या आमदार कुणाल पाटील यांना शेतकऱ्यांप्रती खोटा कळवळा असल्याची टीका शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी केली आहे. त्यामुळे सेनेने काय करावे हे त्यांनी शिकवू नये असे पत्रकातून प्रा.पाटील यांनी नमूद केले आहे.

चार दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा ठराव करण्याची सूचना मांडतांना एकटे पडलेले आमदार कुणाल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केली. यावर माजी आमदार शरद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक काढून त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. या पत्रकात ज्यांच्या परिवाराने तालुक्यातील सहकारी संस्था लुटून बंद पाडल्या त्यामुळे सहकारी संस्थांमधील शेतकऱ्यांचे करोडोंच्या भाग भांडवलाचे मुल्य शून्य झाले त्यांना आता शेतकऱ्यांचा कळवळा येतो आहे, असा आरोप केला आहे. प्रत्येक उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकरी असंख्य प्रश्नांशी, दुष्काळाचा सामना करीत असताना आमदार कुणाल पाटील हे दरवर्षी कुटुंबासह महिनाभर परदेशी आराम करण्यासाठी जातात. यंदा त्यांचा मुक्काम लंडनमध्ये होता. त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना काय कळणार, असाही सवाल पाटील यांनी केला आहे.

चार दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीत शेतकरी कर्जमाफीचा ठराव करण्याची मागणी करणाऱ्या आमदार महोदयांचा मुळात अभ्यासच नाही. असे प्रश्न सभागृहात मांडायचे असतात. त्यावर संबंधित मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचे असते. परंतु, हे महोदय उपस्थित नसतात, असेही या पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओंनी घेतली झाडाझडती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच येवला दौऱ्यावर आलेल्या दीपककुमार मीना यांनी रविवारी येवला पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. पंचायत समिती तसेच झेडपीच्या येवला तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी अन् ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यांच्या तब्बल तीन तास चाललेल्या या आढावा बैठकीत ‘सीईओ’ मीना यांनी सविस्तर माहिती घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

कुठल्याही कामाच्या बाबतीत कुणाच्याही तक्रारी येता कामा नयेत, अशी तंबी देतानाच मीना यांनी प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ दीपककुमार मीना यांनी रविवारी येवल्यात पंचायत समितीची विशेष आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत मीना तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांकडून विकास कामांची सदयस्थिती, अडचणी जाणून घेत सूचना केल्या. मीना यांनी स्वच्छ भारत अभियान, घरकुल, पेयजल, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना आदी विविध योजनांसह पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी, बांधकाम, ग्रामपंचायत अशा अनेक विभागांचा आढावा घेतला. या बैठकीस येवला तालुक्यातील पंचायत समितीच्या विविध विभागांचे खातेप्रमुख व ग्रामसेवकांसह जिल्हा परिषदेतील अनेक महत्त्वाच्या विभागाचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होते. मीना यांनी विविध कामांबाबत येथील खातेप्रमुखांना जाब विचारला. घरकुल तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गतची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत त्यांनी दिल्या. स्वच्छ भारत अभियानांतंर्गत ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण येवला तालुका हागणदारीमुक्त करण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे असेही ते म्हणाले. मीना यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय कामांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत लोकसहभागातून किमान एक कक्ष तरी डिजिटल असेल याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, येवला पंचायत समिती सभापती आशा साळवे, उपसभापती रुपचंद भागवत उपस्थित होते.

अध्यक्षांनीही केल्या सूचना

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी अनेक सूचना दिल्या. पावसाळा सुरू असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने लोकप्रतिनिधींना बरोबर घेवून वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबवावा. तालुका हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने ग्रामसेवक व सरपंच यांच्या सोबत प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी व विस्तार अधिकारी यांनी जनजागृती करावी, असे आवाहन सांगळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांचे ज्वलंत विषय मांडणारे ‘फारमर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी हा खरे तर जगाचा पोशिंदा, परंतु आज त्याचेच खूप हाल सुरू आहेत. आत्महत्या करून घेण्याइतपत दु:खाने तो गांजला आहे. जगायचे तर त्यासाठी पैसा नाही, जमिनीत काही पिकत नाही, पिकते ते विकत नाही, अशा अनेक अडचणींचा डोंगर त्याच्यासमोर उभा आहे. त्यातून मार्ग काढायचा म्हणजे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. अशात सरकारही त्याच्या बाजूने नाही, अशा आशयाचे कथानक घेऊन शेतकऱ्यांवर प्रकाशित झालेल्या, तसेच अप्रकाशित साहित्यातून एका कलाकृतीची निर्मिती सचिन शिंदे यांनी केली. ‘फारमर’ ही ती कलाकृती.

कुसुमाग्रज स्मारकामध्ये सोमवारी ही कलाकृती सादर करण्यात आली. या कलाकृतीत विविध तुकड्यांचा कोलाज करण्यात आला होता. आयुष्यभर कष्ट करून हाती धुपाटणे आल्याने शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद झाल्या आहेत. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांनी त्यांना घेरलेले आहे. पाऊस आला नाही तरी पंचाईत आणि जास्त आला तरी अडचण अशा द्विधा अवस्थेत शेतकरी सापडलेला दिसतो. अशा वेळी त्यांना दिलासा असतो तो हमी भावाचा. मात्र, सरकार मालाला हमी भाव देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी अठराविशे दारिद्र्य असते. या आशयाला धरून काही कोलाज तयार करण्यात आले होते. त्यांचे सादरीकरण करण्यात आले.

प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना दत्ता पाटील यांची होती. दिग्दर्शन धनंजय गोसावी व राहुल गायकवाड यांचे होते. लेखन हेमंत टकले, दत्ता पाटील, प्रकाश होळकर, प्राजक्त देशमुख, कल्पना दुधाळ, विष्णू थोरे, संदीप जगताप, राजेंद्र उगले, अरुण इंगळे यांचे होते. संगीत राहित सरोदे, तर निर्मितीप्रमुख लक्ष्मण कोकणे होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित नाट्यसंस्कार कार्यशाळेतील सर्व गुणवंतांनी यात भूमिका निभावल्या.

या कलाकृतीनंतर ‘अद््भुत बाग’ हे बालनाट्य सादर करण्यात आले. लेखक सुजित जोशी, तर दिग्दर्शक उर्वराज गायकवाड होते. चिमुरड्यांच्या कल्पनेतील बाग यात साकारण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीने फुलला आनंदमळा!

$
0
0

टीम मटा, नाशिक

राज्य सरकारने शेतकरी आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्याही मान्य केल्याबद्दल जिल्हाभरात शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, वकील संघटनेसह भाजपनेही फटाक्यांची आतषबाजी करीत, तसेच पेढे, मिठाईवाटप करून जल्लोष केला.

वकील कृती समितीतर्फे आनंद

नाशिक ः शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याने शेतकरी बचाव नाशिक जिल्हा वकील कृती समितीतर्फे सोमवारी आयोजित केलेली बैठक स्थगित करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने सुकाणू समिती व शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या मान्य झाल्या, त्याची अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी व शेतकऱ्यांच्या संघटनांना कायदेशीर सहकार्य व मदत करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. पुढील दिशा ठरविण्यासाठी समितीची लवकरच बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक अॅड. वसंत पेखळे यांनी दिली.

येवल्यात भाजपचा जल्लोष

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याबद्दल भाजपचे येवल्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी पक्षाचे ध्वज फडकावत जल्लोष केला. शहरातील विंचूर चौफुलीवर फटाके फोडत आनंद व्यक्त करण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष करण्यात आला.

सायगावमध्ये जल्लोष

येवला ः येवला तालुक्यातील सायगाव येथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करण्यात आला. सायगावकरांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता एकत्र येताना वाद्याच्या तालावर फेर धरला होता. या वेळी गुलालाची उधळण करणाऱ्या शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजीही केली. एकमेकांच्या मुखात पेढा भरवत आनंद साजरा करण्यात आला. शिवाजी भालेराव, गणपत खैरनार, सुभाष पठारे, काशिनाथ सोनवणे, विलास उशीर, ज्ञानेश्वर भालेराव, एकनाथ भालेराव, रामभाऊ उशीर, रामनाथ रोकडे, सुभाष उशीर, शिवाजी दौंडे, अॅड. सुभाष भालेराव, अनिल दारुंटे, दत्तू उशीर, भाऊसाहेब रोकडे, भास्कर पठारे, बाबूराव पठारे, देवीदास जानराव, पोपट वालतुरे, शिवाजी उशीर आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.

मनमाडमध्ये आतषबाजी

मनमाड ः राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल मनमाड येथे सोमवारी भाजपतर्फे आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. या ऐतिहासिक कर्जमाफीचे श्रेय भाजप नेतृत्वाचे असल्याचे स्पष्ट करत याबद्दल मनमाड शहर भाजपच्या वतीने जिल्हा सरचिटणीस भाऊराव निकम, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, चिटणीस नारायण पवार, शहराध्यक्ष जय फुलवाणी यांच्या नेतृत्वात एकात्मता चौकात फटाक्यांची आतषबाजी करून मिठाईवाटप करण्यात आले. वयोवृद्ध शेतकरी शिवाजी नामदेव शेरेकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके फोडण्यात आले. ज्येष्ठ नेते नीळकंठ त्रिभुवन, भीमराव बीडगर, शहर सरचिटणीस अंकुश जोशी, शहर उपाध्यक्ष तिलोक संकलेचा, सतीशसिंह परदेशी, जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन आहेरराव, महेंद्र गायकवाड, डॉ. सागर कोल्हे आदी उपस्थित होते. अंकुश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

पिंपळगावात आनंद

पिंपळगाव बसवंत ः पिंपळगाव बसवंत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे फटाके फोडून जल्लोष केला आणि कर्जमाफीचे स्वागत केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव मोरे, भाजपचे प्रदेश चिटणीस सतीश मोरे यांच्या नेतॄत्वाखाली सोमवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथील निफाड फाट्यावर फटाक्यांची आतषबाजी केली. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजप सरकारचे समर्थन केले. इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी दिल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव मोरे, वैकुंठ पाटील, बापूसाहेब पाटील, प्रा. रवींद्र मोरे, प्रकाश घोडके, दत्तात्रेय काळे, किरण लभडे, परेश शहा, प्रशांत घोडके आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूकंपाच्या इशाऱ्यानंतर कर्जमुक्ती

$
0
0

शिवसेना खासदार संजय राऊतांचे वक्तव्य

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिवसेना पक्षाने भूकंपाची भाषा केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र भाजप सरकारने ही कर्जमाफी मनापासून दिलेली नाही. शिवसेनेचा दबाव होता त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी (दि. १२) धुळ्यात आयोजित शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांचे आंदोलन अजून संपलेले नाही, जर राज्यात भूकंप होऊ द्यायचा नसेल तर येत्या २५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. मोदी असो की, मुख्यमंत्री शिवसेनेला घाबरतात, असा इशाराही खासदार त्यांनी यावेळी दिला.

‘मी कर्जमुक्त होणारच’ या मोहिमेंतर्गत धुळे जिल्हा दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी शहरातील शाहू महाराज नाट्यमंदिरात शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना स्थानिक पक्षातील गटबाजी, भाजपचा विरोध यावरही भाष्य केले. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेशही शिवसैनिकांना त्यांनी दिले. या मेळाव्याला पालकमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख बबन थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख सतीश महाले, डॉ. माधुरी बाफना आदींसह शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.

पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होतील, त्यात उत्तर महाराष्ट्राचे मोठे योगदान असायला हवे, असे प्रतिपादन खासदार राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना केले. त्यामुळे आता राजकीय भूकंप जुलै महिन्यात होऊन कोण मुख्यमंत्री होईल, या चर्चेला तोंड फुटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनधारकांची पीएफ कार्यालयात गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

निवृत्त झालेल्या कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना भविष्य निधी कार्यालयात दरवर्षी मार्च महिन्याच्या आत हयातीचा दाखला सादर करणे गरजेचे असते. परंतु, अनेक पेन्शनधारकांचे हयातीचे दाखलेच पीएफ कार्यालयात जमा होत नसल्याने त्यांची पेन्शन बंद पडण्याची वेळ येत असते. यासाठी भविष्य निधी कार्यालयाने पेन्शन धारकांचा मेळावा सोमवारी (दि. १२) घेतला.

याप्रसंगी शेकडोच्या संख्येने पेन्शन धारकांनी तोबा गर्दी केली होती. याप्रसंगी पीएफ कार्यालयाचे अधिकारी बकरे यांनी हयातीचा दाखला आता डिजिटल प्रणालीद्वारे मिळणार असल्याबाबत धारकांना माहिती दिली. दरम्यान, पीएफ कार्यालयाकडून दरवर्षी ‘निधी आपके निकट’ हा उपक्रम राबविण्यात येतो. तसेच, ‘अधिकारी पेन्शनधारकांच्या दारी’ असाही उपक्रम माजी पीएफ आयुक्त जगदीश तांबे यांनी राबविला होता, असे असतानादेखील अनेक पेन्शनधारकांचा हयातीचा दाखलाच पीएफ कार्यालयाला मिळत नसल्याने पेन्शन बंद होण्याची वेळ येत असते. यासाठी पीएफ कार्यालयाने स्वतंत्रपणे पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला उपलब्ध करण्याबाबत माहिती दिली. तसेच मार्च महिन्याचा अगोदरच हयातीचे प्रमाणपत्र दाखल करण्याचेही सूचना अधिकाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने सरसकट पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. तथापि कर्जमाफीच्या निकषानंतरच या शेतकऱ्यांचा आनंद किती काळ टिकेल हे कळेल. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०१६ -१७ मध्ये या दोन पिकांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना १७१९ कोटींपैकी तब्बल १४१८ कोटी रुपये वाटप केले आहेत. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ८०७ कोटी, तर द्राक्ष उत्पादकांना ६११ कोटी रुपये पीक कर्ज देण्यात आले आहे. मात्र, या पीक कर्जाला माफी मिळेल किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांसह बँकाच संभ्रमात आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या परिपत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कांदा, द्राक्ष या दोन पिकांबरोबरच भाजीपाल्यासाठी ११७ कोटी, तर डाळिंबासाठी १११ कोटी रुपये पीक कर्ज म्हणून दिले आहे. त्या खालोखाल ऊस, तेलबिया, भात, बाजरी व कपाशीला पीक कर्ज दिले आहे. या वर्षाच्या पीक कर्जाबरोबरच ९०५ कोटी रुपये कर्जाची थकबाकीसुद्धा आहे. कांदा पिकासाठी एकरी २५ हजार रुपये शेतकऱ्यांना पीक कर्ज या वर्षी देण्यात आले होते, तर द्राक्ष शेतीसाठी एक लाखाची मर्यादा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला; पण कर्जफेड करण्याचे प्रमाण खूपच कमी होते.

शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी जिल्हा बँक पीक कर्जपुरवठा करते. मात्र, वसुली रखडण्यासोबतच बँकेला जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने बँकेचे व्यवहारदेखील ठप्प झाले. त्यात पुरेसा चलनसाठा नसल्याने बँकेच्या रोखीच्या व्यवहारांवर बंधने आली. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्जपुरवठा झाला नाही. त्यानंतर कर्ज मिळावे, यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले; पण त्याचाही फायदा झाला नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने जिल्हा बँकेला पीक कर्जासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज असताना सरकारने त्याकडे दुर्लक्षच केले; पण आता राज्य सरकारने सरसकट पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्याचा कितपत फायदा शेतकऱ्यांना होतो हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण निर्मूलन धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोविंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी छतावर कोसळलेल्या टॉवरच्या घटनेपासून बोध घेत अतिक्रमण निर्मूलन विभागाने कोणती कारवाई किंवा नियोजन केले, असा सवाल उपस्थित करीत नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागास स्थायीच्या सभेत धारेवर धरले.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. शहरात सोसाट्याचा वारा सुटल्यास किंवा काही आत्पकालीन प्रसंग उद्भवल्यास नागरिकांना धोका पोहोचू शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन विभागाच्या नियोजनावर शहाणे यांनी बोट ठेवले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने शहरातील होर्डिगबाजांची मनमानी प्रकाशझोतात आणली. दरम्यान, या प्रकरणी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असून, अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

शहरात अनेक ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच शेकडो होर्डिंग्ज विनापरवाना लावले जातात, अशी धक्कादायक माहितीही त्यांनी मांडली. परवानगी न घेता होर्डिंग लावले जात असल्याने महापालिकेचा मोठा महसूल बुडतो, असाही मुद्दा त्यांनी मांडला.

शहरातील होर्डिंग्जसंदर्भात परवानगीधारकांची माहिती मांडताना ६८८ जणांकडे होर्डिंगसाठी परवानगी असल्याची, तर १५८ जणांकडे परवानगी नसल्याची माहिती उघड झाली. शहरात एकूण ७० ठिकाणी दिशा पब्लिसिटीच्या ताब्यात होर्डिंगची ठिकाणे आहेत. दिशा पब्लिसिटीकडेही कराची सुमारे दीड कोटीची थकबाकी असताना त्यांना याबाबत विचारणा करणारी नोटीसही देण्यात आलेली नाही.

--

१५८ जणांना नोटीस

शहरात मोठ्या प्रमाणावर इमारतींवर होर्डिंग्ज लावलेले आढळून येतात. त्यासाठी इमारतीचे मालक मोठ्या प्रमाणावर पैसे आकारतात. मात्र, महापालिकेला यातील रुपयाही दिला जात नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती देताना आकडेवारीच्या मांडलेल्या तपशीलानुसार शहरात पूर्व भागात ११४, पश्चिम विभागात ३०६, पंचवटी विभागात ७७, नाशिकरोड विभागात ७४, तर सिडको विभागात ५१ ठिकाणी होर्डिंग्ज असून, यातील १५८ होर्डिंगधारकांना कर भरण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नोटीस देण्यात आलेल्या विभागांच्या विभागनिहाय माहितीनुसार पूर्व विभागात ९, पश्चिममध्ये ७०, पंचवटीत २८, नाशिकरोडला १९, सिडकोत १२, तर सातपूरमध्ये २० अशा सुमारे १५८ होर्डिंग लावणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

--

आवाससाठी तांत्रिक सल्लागार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या विकासकामांसाठी नवनिर्माण महिला बहुद्देशीय संस्था, अकोला या संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नाशिक महापालिकेने नियुक्ती केली आहे.

सोमवारी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय शहराच्या विविध भागांशी निगडित विषयही यावेळी सभेवर चर्चेसाठी मांडण्यात आले. यामध्ये अतिक्रमणे, सफाई कर्मचाऱ्यांची अपूर्ण संख्या, बेकायदेशीर होर्डिंग्ज, वडाळा गावातील भंगार बाजाराचा प्रश्न आदी मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

आवास योजनेसंदर्भात महापालिका आयुक्तांशी संवाद साधला असता ते म्हणाले, की शहरात झोपडपट्ट्यांचे महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणातील माहितीनुसार शहरात सुमारे १४३ झोपडपट्ट्या अस्तित्वात आहेत. यामध्ये एकूण ३६ हजार ४८९ झोपड्यांचा समावेश असून, सुमारे ४४ हजार ७८४ नागरिक यामध्ये निवासाला आहेत. याबाबत अहवाल लवकरच महापालिकेस सादर होणार असून, हा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.

पंतप्रधान आवास योजना ही राज्यातील एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली सर्व शहरे व सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये लागू करण्यात येणार आहे. राज्यात ५१ शहरांमध्ये हा निर्णय लागू होईल. झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविण्यात येणाऱ्या शहरांना यातून वगळण्यात आले आहे.

या योजनेकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारची वार्षिक उत्पन्न मर्यादा वार्षिक तीन लाख रुपये आहे. राज्य सरकारची ही मर्यादा अल्प उत्पन्न गट म्हणून १ लाख ८० हजार रुपये होती, तर अल्प उत्पन्न गटातील लाभार्थींसाठी केंद्राची मर्यादा ३ लाख ते ६ लाख रुपयांपर्यंत आहे. या गटासाठी राज्य सरकारची मर्यादा १ लाख ८० हजार ते ४ लाख ८० हजार आहे. केंद्राच्या नियमाप्रमाणे या योजनेसाठी या उत्पन्न मर्यादा राज्याने सुधारून घेण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला होता. नियोजित निकषांनुसार या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक बेट दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

$
0
0

बिटको चौक, दत्तमंदिर चौकात होतेय कोंडी; नागरिक वैतागले

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील फेम सिनेमागृह चौकातील वाहतूक बेटाला काही दिवसांपूर्वी कंटेनर धडकला होता. त्याला तीन महिने झाले आहेत. तरीही वाहतूक बेटाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी असलेल्या बिटको चौक, दत्त मंदिर चौकातील वाहतूक बेटांचीही दुरवस्था झाली आहे. त्यांनाही अवकळा असल्याने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. हायमास्ट लावून याठिकाणी होणारी वाहतूक कोंडीवरही तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिक-पुणे महामार्ग हा वर्दळीचा रस्ता आहे. व्दारकापासून सिन्नरफाट्यापर्यंत वाहतुकीची कोंडी होत असते. बोधलेनगर जवळील फेम चौकात वाहतूक बेट आहे. तेथून समर्थ रामदासांच्या टाकळीकडे रस्ता जातो. त्यामुळे या बेटात समर्थांचा सुविचार व स्तंभ आहे. त्याभोवती लोखंडी कठडे करण्यात आले आहेत. तीन महिन्यांपूर्वी ट्रक आणि कंटेनर यांचा विचित्र अपघात झाला. ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर वाहतूक बेटावर धडकला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहतूक बेटाचे मोठे नुकसान झाले. कठडे तुटल्याने बेटाचे सौंदर्य गेले असून, या मार्गावरून परराज्यातील व जिल्ह्यातील भाविक, पर्यटक प्रवास करत असतात. चौकात सिग्नल असल्यावर त्यांची वाहने थांबतात तेव्हा तुटलेल्या वाहतूक बेटाचे दर्शन होते. त्यामुळे या बेटाची त्वरित दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

सुशोभीकरण गरजेचे

द्वारका ते नाशिकरोड दरम्यान अनेक ठिकाणी वाहतूक बेटे आहेत. त्यांची दुरवस्था असून, काही बेटांमध्ये काटेरी झाडे वाढली आहेत. दत्त मंदिर चौकातील बेटात तर झाडांना पाणीच नाही. येथे नवीन झाडे लावण्याची गरज आहे. उपनगरच्या चौकातील बेटाचेही सुशोभीकरण गरजेचे असून, बिटको चौकातील बेटांचे सुशोभीकरण करून सौंदर्य खुलविण्यात आले आहे. तसेच अन्य बेटांचे करावे, अशीही मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात मान्सून ‘वर्षा’व

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला मान्सून अखेर नाशकात दाखल झाला आहे. शहर परिसरात सोमवारी दुपारनंतर पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळे नाशिककर सुखावले आहेत. मात्र, विजेचा लपंडाव आणि ठिकठिकाणी रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागला.

रविवारी सायंकाळपासूनच शहरात पावसाच्या सरी कोसळल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शहरात पाऊस सुरू होता. रविवारी रात्रीच्या सुमारास शहर परिसरात ३९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. मात्र, लख्ख ऊन पडल्याने पावसाच्या आशा धूसर झाल्या. दुपारच्या सुमारास पुन्हा काळ्या मेघांनी गर्दी केली. त्यामुळे पावसाच्या आशा पल्लवित झाल्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरात पावसाच्या सरींचे आगमन झाले. उपनगरांमध्ये या पावसामुळे काहीशी धांदल उडाली. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली. सायंकाळनंतर शहरात पावसाचा जोर वाढला. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने काही क्षणातच शहरातील रस्ते सामसूम झाले. सायंकाळी घरी परतणाऱ्या नोकरदारांचे पावसाने हाल झाले. दरम्यान, येत्या गुरुवारी शाळा सुरू होणार असल्याने शहरातील शालेय बाजारपेठ ग्राहकांनी गजबजून गेली होती. पावसाच्या आगमनामुळे या ग्राहकांचीही मोठी धांदल उडाली. परिणामी काही वेळातच बाजारपेठेत शांतता निर्माण झाली.

--

दोघांचा मृत्यू

सिडकोतील हनुमान चौकात राहणाऱ्या अनिल भुजबळ यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली, तर नाशिकरोड भागात इलेक्ट्रिक पोलला हात लागल्याने शरद बाबू या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

--

रस्त्यांवर पाणी साचले

शहरातील अनेक चौकांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. सातपूर विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी त्र्यंबकरोडवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जुने आणि नवीन सिडको परिसरात काही घरांमध्ये पावसाचे पाणी गेले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जुने नाशिकमध्ये अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने ऐन रमजान काळात मुस्लिम बांधवांची त्रेधातिरपीट उडाली.

--

विजेचा लपंडाव

पावसाचे आगमन होताच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नाशिककरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रविवारी रात्री वीजपुरवठा ठप्प झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी शहराच्या अनेक भागात वीज गायब झाली होती. त्यामुळे नाशिककरांना उकाडा सहन करावा लागला. सायंका‍ळी सगळीकडे अंधार असताना वीज उपलब्ध न झाल्याने शहरवासीयांना मेणबत्तीसह अन्य पर्यायांवर वेळ निभावून न्यावी लागली. सातपूर आणि नाशिकरोड परिसरातील नागरिक विजेच्या सततच्या लपंडावाने कमालीचे त्रस्त झाले आहेत.

--

अनेक घरांचे नुकसान

शहराच्या सहा विभागांत महापालिकेला एकूण ३९७ धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. या सर्व इमारतींच्या मालकांना महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पण, केवळ नोटिसा देऊन पुढे काहीही झालेले नाही. अनेक घरे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत, तर काही घरांमध्ये कुटुंबे राहत असल्याने तेथे मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी महापालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शहरात जोरदार पाऊस झाल्याने सिडको, सातपूर, जुने नाशिकसह काही झोपडपट्टीच्या भागात घरांचे नुकसान झाले.

--

जिल्ह्यातही जोरदार हजेरी

जिल्ह्यात कळवण, नांदगाव, सटाणा, चांदवड आणि त्र्यंबकेश्वरसह विविध भागात पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. कळवण तालुक्यात सप्तश्रृंगीगडावर भगवती मंदिर परिसरात पावसाच्या आगमनापूर्वी लहान-मोठे दगड कोसळले. संरक्षक जाळ्या बसविलेल्या असल्यामुळे कुठलीही दुर्घटना घडली नाही. मनमाड व चांदवड शहरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. हा पाऊस शेतीसाठी चांगला असल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये रविवारी दिवसभरात ६० मिलिमीटर पाऊस झाला.

--

विद्युत विभागातर्फे दक्षतेचे आवाहन

पावसाळ्यामध्ये शहरातील विविध ठिकाणी आपत्कालीन प्रसंग उद्भवून नागरिकांच्या जिवास धोका होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन महापालिकेच्या विद्युत विभागाने केले आहे. गेल्या काही वर्षांतील या प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण पाहता नागरकांनी अगोदरच सतर्क राहून संभाव्य आपत्ती टाळावी, यासाठी विद्युत विभागाने काही सूचनाही नागरिकांना दिल्या आहेत. पथदीपांच्या खांबांना पाळीव प्राणी बांधू नयेत, कपडे वाळत घालण्यासारख्या कारणांसाठी दोऱ्या बांधू नयेत, या पथदीपांजवळ साहित्य साठवून ठेवू नये, खांबांभोवतीचे पत्रे त्वरित हटवावेत, त्यावरील जाहिरातींचे बॅनर्स हटवावेत आदी प्रकारची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या चुकांमुळे अपघात घडल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असा इशाराही विद्युत विभागाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीककर्ज मिळणे अवघड

$
0
0

नाशिक जिल्हा बँकेकडे पैशांची चणचण

नाशिक : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबईत सरसकट कर्जमाफी व सोमवारपासूनच तातडीने नवीन पीककर्ज देण्याची घोषणा केली असली तरी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतून नवीन कर्ज मिळणे अवघड आहे. सरकारने माफ केलेल्या कर्जाचे पैसे किंवा नाबार्डने दोन हजार कोटींचे फेरकर्ज दिल्यानंतरच बँकेकडे पैसे उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर बँकेला पीककर्ज देता येणे शक्य होईल. रविवारी सरसकट कर्ज माफ करण्याची घोषणा झाली. या सरसकट कर्जमाफीत जर अल्प, मध्यम, बहूभूधारक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ केले तर जिल्हा बँकेच्या ३ लाख ६० शेतकरी सभासदांना त्याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत २०० कोटी रुपये कर्ज वसूल झाले आहेत. त्यामुळे नवीन पीककर्ज देणे बँकेला सरकारच्या मदतीशिवाय शक्य नाही. कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी त्याचा फायदा होण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

जिल्हा बँक थकबाकी - २४०८ कोटी, विविध कार्यकारी सोसायटी - २०० कोटी, एकूण शेतकरी सभासद - ३ लाख ८८ हजार, कर्जफेड केलेल सभासद - २५ हजार, कर्ज न घेतलेले सभासद - ९१ हजार, २०१६-१७ मध्ये वाटप केलेले पीककर्ज - १७१९ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा मार्केट पुन्हा गजबजले

$
0
0

टीम मटा

शेतकरी संपामुळे गेल्या अकरा दिवसांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्या सोमवारी सुरू झाल्या. आवक वाढूनही कांद्याच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. कांद्यासह इतर शेतमालाचेही जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले.

निफाड ः लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांदा लिलावाला पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे गेल्या बारा दिवसांपासून ठप्प असलेली बाजार समिती परिसर व लासलगाव व्यापार पेठ गजबजली होती. पहिल्याच दिवशी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक आली होती. विशेष म्हणजे संप कालावधीनंतर सोमवारी झालेल्या लिलावात कांदाभाव १०० रुपयांनी वधारले होते.

शेतकरी संपाच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्यामुळे हा फटका बाजार समितीसह स्थानिक दुकानदारांनाही बसला. बाजार समित्यामध्ये होणारी रोजची कोट्यावधींची उलाढाल थांबलेली असल्याने संपकाळाच्या दहा दिवसात दीडशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. आता बाजार समित्या सुरू असल्याने बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकरीवर्गावर अवलंबून असलेले इतर व्यावसायिकही आनंदात आहेत.

या संप काळात कांदा निर्यातही थांबलेली असल्याने आता बाजारात कांद्याची एकच गर्दी होऊन कांदा दर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कांद्याला अनुदान तसेच हमीभाव देण्याची मागणी शेतकरीवर्ग करत आहे. सोमवारी ७०० वाहने भरून कांदा लासलगाव बाजार समिती आवारात दाखल झाला होता. अधूनमधून पाऊस सुरू असल्याने कांदा लिलावात खंड पडत होता. त्यामुळे लिलावालाही उशीर होत होता. कमीत कमी अडीचशे आणि जास्तीत जास्त ६८७ तर सरासरी ५७० रुपये दर कांदा लिलावात निघाले होते. मात्र मे महिन्याच्या तुलनेत १०० रुपये कांदा वधारला होता. कांद्याची आवक वाढली तर दर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

सटाण्यात कांद्याचे नुकसान

सटाणा : गेल्या अकरा दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समितीमध्ये कांदा लिलावासाठी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. पावसामुळे कांदा ओला झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाजार समिती आवारात तब्बल ७०० हून अधिक ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी दाखल झाल्याने कांद्याचे दर ३०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल इतके होते.

देवळा, उमराणाही लिलाव सुरळीत

कळवण ः देवळा व उमराणा बाजार समितीतील कांद्याचे लिलाव सोमवारपासून पूर्ववत सुरू झाले. देवळा बाजार समितीत २०० ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली होती. उमराणा बाजार समितीत ४२५ ट्रॅक्टर कांद्यांची आवक झाली. देवळा बाजार समितीत सामेवारी २०० ट्रॅक्टर कांद्याची आवक होती. कांद्याला ३०० ते ६५० प्रमाणे व सरासरी ५५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याची माहिती देवळा बाजार समितीचे सचिव दौलतराव शिंदे यांनी दिली. उमराणा बाजार समितीत ४२५ ट्रॅक्टर कांद्यांची आवक होती. तेथे कांद्याला ४०० ते ७०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती सचिव नितीन जाधव यांनी दिली.

पिंपळगावात १४ हजार क्विंटल आवक

पिंपळगाव बसवंत ः शेतकरी संपामुळे तब्बल सलग अकरा दिवस बंद असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांदा लिलावास प्रारंभ झाला. सोमवारी येथील बाजार आवारावर ३७५ ट्रॅक्टर व १६६ जीपमधून १४ हजार ४०० क्विंटल कांद्याची आवक झाली. बाजारभाव किमान ३००, कमाल ७११ तर सरासरी ६११ रुपये क्विंटल इतका होता.

दरम्यान गत अकरा दिवसांपासून कांद्यासह इतर शेतमालाचे लिलाव बंद असल्यामुळे येथील बाजार समितीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. शेतकरी संप मागे घेतल्यामुळे पिंपळगाव बाजार आवारावर पुन्हा एकदा कांद्याचा आवाज दणाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डागडुजीच्या प्रतीक्षेत ‘मेनरोड’

$
0
0

दीपक महाजन, कळवण

शहरातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता म्हणून परिचित असलेला ‘मेनरोड’ अनेक समस्यांना तोंड देत आहे. लाखोंच्या खर्चाची झळ सोसूनही बारमाही तुंबलेल्या गटारी, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण, सर्वत्र साचलेली धूळ आणि कचऱ्यामुळे मेनरोडची अक्षरशः ‘वाट’ लागली आहे.

स्थानिक आमदारांनी मेनरोडसाठी सुमारे दीड कोटीच्या कामाचे थाटात उद‌्घाटन केले. मात्र नगरपंचायत व स्थानिक आमदारांच्या समन्वयाअभावी या रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याचे बोलले जात आहे. जर रस्त्याच्या कामाला प्रारंभच करायचा नव्हता तर उद‌्घाटन का केले, असा सवाल आता कळवणकर विचारत आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागकडून केवळ टेंडर प्रक्रियातच अडकलेले असेल तर ह्या समस्येतून सुटका कधी होणार, असा मुद्दा आता उपस्थित होत आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष

शहरातील पोल‌िसही मेनरोडवरील रहदारीच्या समस्येकडे लक्ष देत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला राजरोसपणे वाहने उभी केली जातात. अवैध व वैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांचा कोणताही अंकुश नाही. गणेशनगर भागात स्टेट बँकेजवळ वाहतूक कोंडी होते. कालीपिली व ट्रॅक्टर चालकांची अरेरावी नित्याची बनली आहे. दुभाजक असूनही वाहनधारकांना शिस्त नाही. रस्त्यावरील फेरीवाले, फळविक्रेत्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मोठी वाहने यांच्या येण्याजाण्याची गैरसोय होत असते. पर्यायाने धूळ वाढते. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. खोकला, सर्दी व श्वास घेण्यास अडथळे अशा अप्रिय व आरोग्यास घातक घटनांचा सामना करावा लागत आहे. मेनरोडच्या दुरुस्तीचे अथवा रस्त्याचे सुशोभीकरण लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या कामाला गती मिळणार तरी कधी? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
धुळीचा प्रश्न बिकट

शहराचा मुख्य आत्मा असलेल्या मेनरोडची अवस्था बिकट झाली आहे. वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने धूळ मोठ्या प्रमाणात उडते. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास उद्भवत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यावसायिकांनाही या धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

गटारींमुळे दुर्गंधी

रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या गटारींची अवस्था अत्यंत भयावह आहे. बारामहिने या गटारी तुंबलेल्याच असतात. असे असूनही बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. पाणी तुंबलेले असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर अधूनमधून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. मात्र मेनरोडला समस्यांपासून मुक्त करण्यासाठी कोणताही विभाग धजावत नाही.

कळवण-वणी रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. डागडुजी आणि इतर कामांना लवकरच सुरुवात होईल.

- ए. व्ही. भोसले, अभियंता,

सा. बां. विभाग, कळवण

कळवण मेनरोडवरील धुळीमुळे रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे. धुळीमुळे व्यावसायिकांना दिवसभरात दहा वेळा दुकान स्वच्छ करावे लागते. हॉटेल व्यावसायिक जास्त त्रस्त आहेत.

- चेतन शिंदे, व्यावसायिक, कळवण

कळवणच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत असतो. मात्र बहुतांशी निधी प्रस्तावित कामांवर खर्च होत नाही. याबाबतीत लोकप्रतिनिधींना दोष द्यायचा की अधिकारी वर्गाला, हा प्रश्न आहे.

- प्रवीण रौंदळ,

रा. यु. कॉ. तालुकाध्यक्ष, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

$
0
0

टीम मटा

कर्जमाफीच्या वृत्ताने आनंदित झालेला बळीराजा सोमवारी पावसाच्या आगमनानेही सुखावला आहे. निफाडसह, सटाणा, मनमाड, चांदवड, नांदगाव, मालेगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

निफाड ः तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी दुपारनंतर पावसाने कहर केला. भरवस फाटा, वाहेगाव, विंचूर व परिसरातील गावांना मुसळधार पावसाने झोडपल्याने शेतामध्ये तळे साचले होते. तर रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत होते. गेल्या तीन दिवसांपासून निफाड तालुक्यात ढगाळ वातावरण तसेच प्रचंड उष्मा जाणवत होता. मात्र पाहिजे तसा पाऊस झालेला. सोमवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान भरवस फाटा, विंचूर, नैताळे, शिवरे फाटा या गावांना मुसळधार पावसाने झोडपण्यास प्रारंभ केला. जवळजवळ दोन तास पाऊस सुरू होता.

पश्चिम भागात दावचवाडी, लोणवाडी, रौळस, पिंपरी या गावांसह तसेच नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चांदोरी व परिसरातील गावांनाही पावसाने झोडपले. पिंपरी ते कोठुरे रस्त्यावर झाड कोसळल्याने हा रस्ता बंद पडला होता. या पावसाने भरवस फाट्याजवळ शेतात पाऊस पाणी वाहत होते. लासलगाव, पिंपळगावमध्येही सायंकाळी पाऊस झाला.

सटाण्यातही दमदार

शहरासह परिसरात सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मूसळधार पावसाने आगमन झालेे. सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी दोननंतर संपूर्ण शहरासह परिसरात ढगाळ वातावरण तयार होवून अडीच ते तीन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अर्धा तास पाऊस सुरू होता.

मनमाड, चांदवडमध्ये हजेरी

मनमाड : मनमाड व चांदवड शहरात सोमवारी दुपारनंतर वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी दुपारी साडेचार पाच दरम्यान वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारक व पादचारी यांची मोठी गैरसोय झाली. चांदवड शहर व परिसरात सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह पावसाचे आगमन झाले. यावेळी जोरदार वाऱ्यासह पाऊस आल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अर्धा तास चांगला पाऊस झाला त्यामुळे हवेतील उकाडा कमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images