Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नोंदणी विलंबाचा गुन्हेगारांना फायदा!

0
0

दिलीप सांगळे, मटा सिटिझन रिपोर्टर

सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून होणारी नवीन वाहनांची नोंदणी ही अतिशय विलंबाने होत असल्याने नवीन वाहनांना रजिस्ट्रेशन नंबर उशिरा मिळतो. तोपर्यंत ती वाहने विक्रेत्याने दिलेले पिवळे स्टिकर लावून सर्रास वापरली जातात.

अशा नवीन गाडीला रजिस्ट्रेशन नंबर नसल्याने त्या वाहनांचा वापर गैरकामांसाठी होतो. त्यात चेन, मंगळसूत्र पळविणाऱ्या गुन्हेगारांकडून या वाहनांचा वापर करण्यात येतो. मध्यंतरी शहरात अशी विना नंबरची गाडी १००० रुपये तासाने भाड्याने घेऊन चेन स्नॅचिंग केल्याची घटना झाल्याचे वृत्तपत्रात वाचले होते. मी स्वत: गेल्या महिन्यात नवीन दुचाकी घेतली.

परंतु, मला वाहन घ्यायला महिना उलटला अद्याप त्या नवीन वाहनाला नोंदणी विभागाकडून रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला नाही. तेव्हा परिवहन कार्यालयाने या समस्येबाबत तातडीने सुधारणा करणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून शहरातील गुन्हेगार वृत्तीचे समाजकंटक या वाहन नोंदणी विलंबाचा गैरफायदा

घेणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज अपघात टाळण्यासाठी दक्षता घ्या

0
0

महावितरण मुख्य अभियंता कुमठेकरांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, नाशिक रोड

पावसाळ्यात विजेमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढते. नागरिकांनी दक्षता घ्यावी, वीज सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

पावसाळ्यात वीज तारा तुटणे, खांब वाकणे किंवा पडणे, डीपी स्ट्रक्चर वाकणे किंवा पडणे, वीज तारांवर झाड पडणे असे प्रकार होतात. तुटलेल्या विजेच्या तारा, वीज खांब, स्टे वायर, वितरण रोहित्र आदींसह वीजपुरवठा यंत्रणेतील कोणत्याही उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते. नागरिकांनी अशा तारांना स्पर्श करणे टाळावे व संबंधित लाइनमन अथवा महावितरणच्या नजिकच्या कार्यालयास कळवावे, असेही कुमठेकर यांनी सांगितले.

वादळी पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेतात. तो खंडित झाल्यास नागरिकांनी महत्त्वाच्या कारणाशिवाय तत्काळ संबंधित उपकेंद्रास संपर्क करणे टाळावे. या वेळेत उपकेंद्रचालक संबंधित लाइनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतो. पावसाळ्यात झालेल्या नुकसानानंतर त्यांच्यात दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत पुरवठा चालू किंवा बंद करण्यासंदर्भात सूचनांचे आदानप्रदान सुरू असते. एखादा ग्राहक उपकेंद्रचालकास घटना किंवा धोक्याबाबत सूचना देण्याचा प्रयत्न करीत असतो.

अपघाताची कारणे

घरातील पाण्याच्या अर्थिंगविरहित वीज मोटारीला स्पर्श, कपडे वाळत घालण्यासाठी वीज खांब अथवा वीज प्रवाहित होईल, अशा ठिकाणी बांधलेली विद्युत संवाहक तार (कापडी वा विद्युत रोधक दोरी वापरावी), घरातील लोखंडी खिडकी, दरवाजा, ग्रिल, फ्रिज, कुलर, मिक्सर इस्त्री, गिझर आदी विद्युत उपकरणे, शेतात ओल्या हाताने मोटार चालू करताना, तुटलेल्या वीज तारेच्या स्पर्शाने, मोटारीसाठी वापरलेल्या आवरणरहीत वायरचा स्पर्श, वाहनाच्या टपावर, मालवाहू ट्रक किंवा ट्रॅक्टरवर बसल्याने विद्युततारांना स्पर्श ही अपघाताची प्रमुख कारणे असून याबाबत काळजी घेणेही आवश्यक आहे.

वीज तारांखाली थांबू नये

जनावरे, गुरे-ढोरे विजेच्या खांबास तसेच विजेच्या खांबाजवळ अथवा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. शेतीपंपाला वीजपुरवठा करणारी व अर्थिंगची वायर ही अखंड असावी. पाऊस चालू असताना विजेचा पंप चालू अथवा बंद करणे टाळावे. पाऊस चालू असताना रोहित्र, खांबाजवळ किंवा वीज तारांखाली थांबू नये, असेही आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदावर पेग घटले; पोटात मात्र रिचले!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सुप्रीम कोर्टाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री सुरू करण्यास बंदी घातल्यानंतर जिल्ह्यात देशी, विदेशी दारू, बिअर व वाइन विक्रीत घट झाली आहे. या बंदीनंतर दोन महिन्याचे आकडे समोर आले असून, त्यात देशी दारुत १५ टक्के, विदेशी दारुत २३ टक्के, बिअरमध्ये ३३ तर वाइनमध्ये अवघा एक टक्का घट झाली आहे. विशेष म्हणजे एकीकडे लायसन्स असलेल्या दुकानातून ही घट असली तरी अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जूनमध्ये तब्बल ७७ गुन्हे दाखल करुन ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यातील १११६ पैकी तब्बल ७६३ मद्यविक्री दुकाने बंद झाल्यामुळे ३५३ दुकानाच्या विक्रीत एप्रिल व मेमध्ये ही घट झाली आहे. वाइन विक्रीत एप्रिलमध्ये वाढ झाली होती. पण दोन्ही महिन्यांच्या आकडेवारीनंतर फक्त एक टक्का घट झाली आहे. राज्यात सरकारचा वर्षाला किमान १० हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे बोलले जात असून, जिल्ह्यातही त्यात घट झाली आहे. दारू दुकाने सुरू व्हावीत यासाठी सरकारने अनेक नियम शिथील केले आहेत. त्याचप्रमाणे नाशिक शहरातही अनेक दुकाने सुरू करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे पुढील काळात या विक्रीत वाढ होणार आहे.

बिअर व वाइनला फटका

देशी, विदेशी दारुबरोबरच मे महिन्यात बिअरच्या विक्रीतही २७ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी १५ लाख ५७ हजार ५०२ लिटर बिअर विकली गेली ती यावर्षातील या महिन्यात ११ लाख ४० हजार ८१२ लिटर विकली गेली. त्यात ४ लाख १६ हजार ६८० लिटरने घट झाली आहे. एप्रिलमध्ये वाइन विक्रीत वाढ झाली होती. पण मे महिन्यात १३ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी ४१ हजार ६०५ लिटर विक्री झाली होती. पण यावर्षात ३६ हजार १६४ लिटर विक्री झाली आहे.

एप्रिलमध्ये वाइनविक्रीत वाढ

जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये १६ लाख ६६ हजार ७९८ लिटर देशी दारुची विक्री झाली होती. या वर्षात एप्रिलमध्ये १३ लाख ८० हजार ८१२ लिटर झाली आहे. विदेशी दारू गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ७ लाख ४२ हजार ७० लिटर विकली गेली होती. या वर्षी एप्रिलमध्ये ती ५ लाख १५ हजार ९९९ लिटर विकली गेली आहे. गेल्या एप्रिलमध्ये १४ लाख ६४ हजार १६५ लिटर बिअर विकली गेली. तिची विक्री यंदाच्या एप्रिलमध्ये ८ लाख ९६ हजार ८३८ लिटर इतकी झाली. तसेच वाइनची गेल्या वर्षी ४२ हजार ६८ लिटरची विक्री झाली होती. ती यावर्षी ४७ हजार ३०६ लिटर झाली आहे.

मेमध्ये देशी, विदेशी विक्रीत घट

जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात मेमध्ये १६ लाख ४९ हजार ९७३ लिटर देशी दारुची विक्री झाली होती. आता तीच या वर्षात मेमध्ये १४ लाख ५१ हजार १४७ लिटर झाली आहे. यात १२ टक्के घट झाली असून, त्याचा आकडा १ लाख ९८ हजार ८२६ लिटर आहे. विदेशी दारू गेल्या वर्षी मे महिन्यात ७ लाख ५१ हजार ५४९ लिटर विकली गेली या वर्षात हाच आकडा ६ लाख २८ हजार ६२६ लिटर होता. त्यात १६.३६ टक्के घट झाली असून मे महिन्यात १ लाख २२ हजार ९२३ लिटरने त्यात घट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा काँग्रेसला ‘हात’

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी पार पडली. महापौरपदी काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके यांची निवड झाली आहे. सत्तास्थापनेसाठी काँग्रेस व शिवसेनेने युती केल्याने भिवंडी पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे.

बुधवारी महापालिका सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेना व काँग्रेस एकत्र आल्याने तसेच एमआयएमने तटस्थ राहण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेसला सत्तास्थापनेत यश आले आहे. प्रारंभी महापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. महापौर पदासाठी काँग्रेसचे रशीद शेख, ताहेरा शेख तर राष्ट्रवादीचे नबी अहमद, जनता दलाचे बुलंद इकबाल हे रिंगणात होते. ताहेर शेख व बुलंद इकबाल यांनी माघार घेतली. मात्र काँग्रेसचे रशीद शेख व राष्ट्रवादीचे नबी अहमद यांचा अर्ज कायम राहिल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात रशीद शेख याना ४१ मते तर नबी अहमद यांना ३४ मते मिळाल्याने शेख यांचा सात मतांनी विजय झाल्याने ते महापौरपदी विराजमान झाले. यानंतर उपमहापौर पदासाठीची निवड पार पडली. उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे सखाराम घोडके, भाजपचे सुनील गायकवाड, मालेगाव महागठबंधन आघाडीचे अन्सारी मन्सूर शब्बीर अहमद हे रिंगणात होते. दरम्यान भाजपचे सुनील गायकवाड यांनी माघार घेतल्याने घोडके व आघाडीचे अहमद यांच्यात मतदान झाले. यात घोडके यांना ४१ तर अन्सारी अहमद यांना २७ मते मिळाल्याने घोडके यांचा १४ मतांनी विजय झाला.

पालिकेबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

दरम्यान, पालिकेच्या आवारात काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांनी गर्दी केली. यावेळी पालिकेच्या महाद्वारावर काँग्रेस व शिवसेनेचा ध्वज एकत्र फडकत होतो. महापौर रशीद शेख व उपमहापौर सखाराम घोडके यांनी महापालिका प्रवेशद्वाराजवळ येवून हात उंचावून समर्थकांचे आभार मानले. यावेळी काँग्रेस व सेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात शेख व घोडके यांची मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका परिसरात अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, शहर उप-अधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांच्या नेतृत्त्वाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काँग्रेसच्या कोट्यातून संधी

पालिकेच्या इतिहास पहिल्यांदाच काँग्रेस व सेना यांच्यात युती झाल्याने शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. काँग्रेसने देखील सत्तेत कमबॅक केले आहे. एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने काँग्रेस-सेनेचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. आगामी काळात याची परतफेड म्हणून एमआयएमचे महानगराध्यक्ष माजी नगरसेवक अब्दुल मलिक यांना काँग्रेस कोट्यातून स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जावू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची दैना!

0
0

दोन तासांत ९२ मि.मी. पाऊस; सखल भाग जलमय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरवासीयांना ज्याची प्रतीक्षा होती असा धो धो पाऊस बुधवारी कोसळला. विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या पावसाने नागरिकांचे प्रचंड हाल केलेच, त्याचबरोबर गतवर्षीच्या पुराच्या आठवणीदेखील ताज्या केल्या. सखल भागात पाणी शिरल्याने पावसापुढे महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले. गोदाघाटावरील बुधवारचा बाजार तसेच सराफ बाजारातील व्यावसायिकांची या पावसाने दाणादाण उडवली. बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने जोरदार बॅटिंग केली असून, बळीराजा सुखावला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दमदार हजेरी लावणारा आणि काही तालुक्यांमध्ये जूनची सरासरी पहिल्या पंधरवड्यातच ओलांडणारा पाऊस अखेर बुधवारी दुपारनंतर शहरातही बरसला. विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या पावसाने सर्वांनाच धडकी भरवली. तब्बल दोन तास पावसाने धुव्वाधार बॅटिंग करीत नाशिककरांची धांदल उडवली. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले. यामुळे रिक्षाच उपलब्ध होत नसल्याने त्र्यंबकेश्वर मार्गे सिडको, सातपूरपर्यंत होणारी प्रवासी वाहतुकीसह शहरातील अनेक भागातील वाहतूक सुमारे दोन तासाहून अधिक काळ ठप्प झाली.

शहरात पाच ठिकाणी झाडे पडल्याने त्याचाही परिणाम वाहतुकीवर झाला. सराफ बाजार तसेच गंगेवरील भाजीबाजारात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे काही ठिकाणी वाहने वाहून जाण्याचे प्रकार घडले, तर बुधवारच्या बाजारातील विक्रेत्यांचा भाजीपालाही पावसात वाहून गेला. मेनरोडसह मुख्य बाजारातील अनेक रस्ते या पावसात पाण्याखाली गेले. त्यामुळे नागरिकांना, नोकरदारवर्गाला घराकडे परतणेही मुश्क‌िल झाले. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत १६ मि.मी. पाऊस पडला. दोन तासांत ९२ मि.मी पावसाची नोंद झाल्याची माह‌िती जिल्हाधिकारी प्रशासनाने दिली.

दीडशे कर्मचारी कामाला

शहर जलमय झाल्यानंतर नागरिकांच्या रोषाचा अंदाज आल्यानंतर पालिकेची यंत्रणा खडबडून जागे झाली. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केले असून, रात्रभर शहरात युद्धपातळीवर मोहीम राबवली जाणार आहे. नाले सफाईसह तुंबलेल्या भागातून पाणी काढण्यासाठी टँकरही लावण्यात आले आहेत.

जिल्ह्यातही जोरदार हजेरी

शहरात पावसाने दैना उडवली असताना ग्रामीण भागात अनेक ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावली. चांदवड तालुक्यात सुमारे दोन तास पाऊस पडला. मालेगाव, सटाणा, निफाड तालुक्यांमध्येही तासभर दमदार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, हिरवे स्वप्न फुलण्याची आशा व्यक्त होऊ लागली आहे.


२४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत नाशिकसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर त्यास तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ प्रभागात होणार कचरा विलगीकरण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात घनकचरा विलगीकरणासह खत प्रकल्पावरील कामांमध्ये सुधारणा झाल्याचा दावा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केला आहे. घनकरचा विलगीकरणाची अमंलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाने नऊ प्रभांगाची निवड केली असून, जून अखेरपर्यंत या प्रभागांमध्ये शंभर टक्के कचरा विलगीकरण होणार असल्याचा दावाही कृष्णा यांनी केला आहे. सोबतच डेब्र‌जि उचलण्यासाठी प्रत्येक विभागात एक घंटागाडी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांग‌तिले.

महापालिकेच्या वतीने शहरात सध्या घनकचरा विलगीकरण मोहीम राबवली जात आहे. त्या अंतर्गत नागरिकांना ओला व सुका कचरा दोन डस्‍‍्टबीनमध्ये देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घंटागाड्यांमध्येही तशी सुविधा करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत कचरा विलगीकरणासाठी नऊ प्रभागांची निवड करण्यात आली असून, त्याचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. प्रभागांमध्ये जून अखेरपर्यंत शंभर टक्के कचरा विलगीकरण केले जाणार आहे. शहरात साचणारे डेब्रिजचे ढीग नष्ट करण्यासाठी पालिकेच्या सहा विभागांमध्ये आता प्रत्येकी एक घंटागाडी दिली जाणार आहे. या गाड्या डेब्रिज खतप्रकल्पावर टाकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाने सरकारला फटकारले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांतील दयनीय स्थिती सुधारण्याचे वारंवार आदेश देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे हाय कोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी असलेला निधी नोकरशहांना सोडवत नसल्याचे खडेबोलही सुनावले. आश्रमशाळांमध्ये मृत्यू झालेल्या मुलांच्या पालकांना भरपाई देण्यासाठी निधी नसल्यावरून कानउघाडणी करत दोन आठवड्यात खुलासा करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

आमश्रशाळांमध्ये मृत्यू पावलेल्या मुलांच्या पालकांना भरपाई मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तळपे यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मुलांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दशकात सर्पदंश, विंचूदंश, ताप आणि किरकोळ आजारांनी ७९३ मुलांचा मृत्यू झाल्याची बाब यावेळी अॅड. उदय वारूंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची गंभीर दखल घेत आश्रमशाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी असलेला पैसा नोकरशहांना सोडवतच नसल्याचा टोला न्यायालयाने हाणला. थंड पाण्याने अंघोळ घेतल्यामुळे, अन्नातून विषबाधेमुळे, स्पर्शदंश आदी कारणांमुळे मुलांचा मृत्यू होत असल्याचे सहनच केले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने सुनावले. मरण पावलेल्या ३४० मुलांच्या पालकांना भरपाई देण्यासाठी शासनाजवळ पैसा नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. त्यावर न्यायाधीशांनी सरकारच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले. तसेच राज्य सरकारला दोन आठवड्यांत प्रतिसाद देण्यास सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार तालुक्यांत सरासरी ओलांडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात जूनच्या सुरूवातीलाच मान्सूनपूर्व आणि पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यांत जून महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर उर्वरित तालुक्यांमध्ये जूनच्या सरासरीच्या ७० टक्के पर्जन्यमान झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

सन २०१३ चा अपवाद वगळता गत पाच वर्षांमध्ये पावसाला जिल्ह्यात सरासरी गाठता आली नाही. अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये तर मागील पाचही वर्षी सरासरी पाऊस पडू शकला नाही. जिल्ह्यात २०१४ मध्ये केवळ ७९ टक्के तर २०१५ मध्ये अवघा ६१ टक्के पाऊस झाला. सलग दोन वर्षे पाऊस कमी झाल्याने गतवर्षी जिल्हावासीयांना दुष्काळी परिस्थ‌तिीचा सामना करावा लागला. गतवर्षी मात्र पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. १०२ टक्के पावसाची नोंद झाल्याने पाणी उपलब्धतेची चिंता मिटली. मध्यम व मोठ्या २३ धरणांपैकी १६ धरणे शंभर टक्के तर सहा धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली.

यंदाही जूनच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १५५ मिलीमीटर एवढे आहे. येत्या आठवड्याभरात पर्जन्यमान वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आश्चर्यम; ९५ टक्के स्कूलबसची तपासणी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन महिन्यांच्या सुटीनंतर आजपासून (१५ जून) शाळा पुन्हा गजबजणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेसाठी वाहन तपासणी सक्तीची केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार १० वाहनांपैकी ९५५ वाहनांची तपासणी झाली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मे महिन्यात सक्तीने तपासणी करावी, असे आदेश महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागातर्फे जिल्ह्यातील आरटीओला दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात स्वतंत्र्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील १ हजार १० वाहनांपैकी ९५५ वाहनांची तपासणी झाली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. यातील ५५ वाहनमालकांनी फिटनेस तपासणी केली नसल्याचे उघडकीस झाले आहे. या ५५ वाहनांना रस्त्यावर फिरण्याची परवानगी देण्यात येणार नसून, अशा वाहनांचे फिटनेस परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात १०१० शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने आहेत. या वाहनमालकांना सांगून १ ते ३१ मे या कालावधीत महिन्यात स्वतंत्र्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ९५ टक्के बसेस आणि व्हॅन्सची तपासणी करण्यात आली आहे.

तपासणीसाठी आलेल्या वाहनांची वेग चाचणी, ब्रेकची तपासणी, आपत्कालीन मार्ग आहे की नाही, प्रथमोपचार पेटी आहे की नाही हेही तपासण्यात आले.

- भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षांवर अविश्वास?

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेत सत्तांतराचे नाट्य सुरू झाले असून, नगरसेवकांचा एक गट अज्ञातस्थळी रवाना झाला आहे. नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांच्यावर अविश्वास दाखल करण्याच्या वावड्या खऱ्या ठरतात की काय, याबद्दल तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. गतकाही दिवसांत सत्तेत असलेल्या भाजपात पडलेली दरी सांधण्यात जिल्हा नेत्यांना अपयश आल्याचे दिसत आहे. जे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे भाजपचे गटनेते योगेश तुंगार यांचा दावा आहे.

त्र्यंबक नगरपालिकेत काही दिवसांपासून अशांतता निर्माण झाली आहे. नगराध्यक्षांच्या पतीने हस्तक्षेप केला म्हणून मुख्याधिकारी चेतन केरूरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारूप शहर विकास योजनेचा ठराव रद्द करण्या बरोबरच विजया लढ्ढा यांना अपात्र करावे असा अर्ज केला. तो अर्जच या संघर्षाची नांदी ठरली. तेव्हाच लढ्ढा यांचे सदस्यत्त्वही रद्द करा असे पत्र १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते.

दरम्यान, वादग्रस्त ठराव रद्द झाला. मात्र डीपीचा प्रवास थांबल्याने शहरात नाराजी निर्माण झाली. लढ्ढा यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायचा, २०१२ मध्ये भाजपच्या चिन्हावर बिनविरोध निवडलेल्या तृप्ती धारणे यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्षपदाची संधी द्यायची, असा एक सूर नाराज नगरसेवकांनी लावून धरला आहे.विशेष म्हणजे धारणे यांना नगराध्यक्ष करण्यासाठी १७ पैकी १३ नगरसेवक राजी असल्याचे सांगण्यात येत आहे. नोव्हेंबरमध्ये पालिकेची निवडणूक होत आहे. थेट नगराध्यक्ष आणि ते देखील सर्वसाधारण आरक्षण आल्याने अनेकांनी तयारी केली आहे.

आपल्यासोबत १७ पैकी १३ नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष आमच्या नगरसेवकांना विश्वासात घेत नाही. वरिष्ठही यात लक्ष घालत नाही. त्यामुळे नगरसेवकांचा एक गट तयार करून दबाव टाकण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले.

- योगेश तुंगार, भाजप गटनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी कारचालकाने चार जणांना उडविले

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मद्यधुंद कारचालकांने विविध ठिकाणी चार जणांना धडक देऊन जखमी केल्याची घटना जेलरोड परिसरात बुधवारी रात्री घडली. युवकांनी पाठलाग करून चालकाला पकडून उपनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

योगेश संजय पाडोळे (मंगल मूर्तीनगर, जेलरोड) हा कोहिनूर वाघमारे (लोखंडेमळा,जेलरोड) या मित्रासह बुधवारी (दि. १४) रात्री आठच्या सुमारास क्वालिस कारने (एमएच १५ ए ३२४७) जात होता. नारायणबापूनगर चौकात कारने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. नागरिकांनी आरडाओरड केल्याने कारचालकाने कारडा कन्स्ट्रक्शनच्या दिशेने गाडी पळवली. तेथे एका इमारतीसमोर चारचाकी वाहनाला धडक दिली. दोन अपघातानंतरही पाडोळेची मद्याची धुंदी उतरली नव्हती. त्याने माजी नगरसेवक संपत शेलार यांच्या घरासमोर जया जाधव (५५, चंपानगरी) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र (३२) यांना जोरदार धडक दिली. यात जया जाधव गंभीर जखमी झाल्या. शेलारमळा येथे नागरिकांनी कारचा पाठलाग सुरू केला. जेलरोडची टाकी ओलांडून पवारवाडीच्या दिशेने पाडोळेने कार नेली. म्हाडाच्या इमारतीजवळ झाडावर गाडी आदळल्यानंतर पाडोळे व त्याचा मित्र वाघमारे मक्याच्या शेतात धावले. युवकांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांनीच फसविले डॉक्टरला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स (इएसआयसी) आणि महाराष्ट्र पोलिस कुटुंब योजनेबाबत करार झालेला असतांना चौघा डॉक्टरांनी मिळून एका डॉक्टरची तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसांनी सोहम हॉस्पिटलच्या चौघा डॉक्टरांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. अजय चंदनसिंग परदेशी, डॉ. विजय मुरलीधर थोरात, डॉ. भरत पंढरीनाथ पाटील आणि डॉ. प्रशांत मोहिनीराज जोशी (रा. सर्व नाशिक) अशी फसवणुकीचा आरोप असलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. सुप्रिम किडनी केअर डायलिसिसचे संचालक डॉ. देवदत्त श्रीपाद चाफेकर (रा. सहजीवन कॉलनी, कॅनडा कॉर्नर ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. डॉ. चाफेकर यांच्या तक्रारीनुसार, सुप्रिम किडनी केअर डायलिसिस सेंटर आणि सोहम हॉस्पिटल यांच्यात डिसेंबर २०१४ ते ऑक्‍टोबर २०१५ या काळात करार झाला होता. या करारानुसार, सरकारच्या एम्पॉलईज स्टेट इन्श्‍युरन्स कॉपोर्रेशन (ईएसआयसी) आणि महाराष्ट्र पोलिस कुटुंब योजनेतील (एमपीकेवाय) पेशंटला सेवा देण्याचे ठरले होते. करारानुसार सुप्रिम किडनी केअर डायलिसिसचे संचालक डॉ. देवदत्त चाफेकर यांनी सोहम हॉस्पिटलमार्फेत आलेल्या पेशंटला सेवा दिली. उपरोक्त कालावधीत ईएसआयसी योजनेच्या पेशंटचे सुमारे १४ लाख ६३ हजार ५८१ रुपये तर पोलिस कुटुंब योजनेच्या लाभार्थींनुसार सात लाख ६१ हजार ८८८ रुपये अशी एकूण २२ लाख २५ हजार ४८९ रुपयांची बिले तयार झाली. डॉ. चाफेकर यांनी ही बिले सोहम हॉस्पिटलकडे दिली. डॉ. चाफेकरांच्या तक्रारीनुसार सरकारकडून सोहम हॉस्पिटलने सर्व बिल वसूल केली. मात्र, करारानुसार चाफेकर यांचा मोबदला देण्यात आला नाही. संशयितांनी परस्पर सर्व रकमेचा अपहार केला. वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर चाफेकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चारही संशयित डॉक्टरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पीएसआय मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्सारी हत्या प्रकरणी तीन आरोपींना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गॉगल विक्रेता ऐतेशाम इरशाद अन्सारी याच्या हत्येप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी आणखी तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. खूनाच्या गुन्ह्यात आतापर्यंत सात जणांना अटक झाली असून, आणखी तिघे पोलिसांच्या रडारवर आहेत. दरम्यान, अटक केलेल्या सर्व सात संशयितांची गुरूवारी (दि. १५) मल्हारखान झोपडपट्टीत पोलिसांनी वरात काढली. संशयितांच्या घरांची तपासणी करीत पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे शोधून काढले.

जितेंद्र भगवान काळे (रा. घनकर लेन), मुकेश चंद्रकांत साळवे (रा. मल्हारखान झोपडपट्टी) आणि मनीष रेवर (रा. रामवाडी) अशी हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत (दि. १९) पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याच गुन्ह्यात मंगळवारी (दि. १३) रोजी पोलिसांनी चेतन यशवंत इंगळे आणि अजिंक्य प्रकाश धुळे यांना अटक केली होती. या दोघांना आश्रय देणाऱ्या विशाल अशोक निकम (रा. दहावा मैल) आणि योगेश चंद्रकांत धांडे या संशयितांनाही पोलिसांनी अटक केली. निकम आणि धांडे यांनी दोघांना आश्रय देत पोलिसांची चाहूल लागल्यानंतर पळवून लावले होते. या चौघांना कोर्टाने १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फुकट चष्मा घेण्याच्या वादातून वरील संशयितांनी आणखी काही साथिदारांसह चष्मा विक्रेता ऐतेशाम इरशाद अन्सारी (२३, रा. मेहबूबनगर, वडाळारोड) याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्र्यंबकरोडवरील वेदमंदिराजवळ शनिवारी (दि. १०) हा प्रकार घडला होता. उपचारा दरम्यान अन्सारी मृत्यूमुखी पडला.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत इंगळे आणि धुळेसह त्यांना आश्रय देणाऱ्यांना अटक केली. आणखी काही हल्लेखोर चाळीसगाव येथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर एक पथक तेथे रवाना झाले. मात्र, तोपर्यंत काळे, साळवे व अन्य दोघे नाशिककडे निघाल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, ठक्कर बाजार येथे पोलिसांनी सापळा रचला. बसमधून चौघे उतरताच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. या गुन्ह्यात आणखी काही संशयित अटक होण्याची शक्यता मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी सांगितले.


पोलिसांची ‘हाऊस सर्च’ मोहीम

या गुन्ह्यातील मूळ मल्हारखान झोपडपट्टीत दडले आहे. घटनेच्या दिवशी दोन ते तीन संशयितांचा फुकट चष्मा घेण्यावरून अन्सारीशी वाद झाला होता. त्यानंतर त्यांनी इतरांना पाचारण केले. दुचाकी तसेच स्कॉर्पियोमध्ये आलेल्या संशयितांनी अन्सारीवर हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना घेऊन हाऊस सर्च केले. यावेळी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पोलिसांनी एक चारचाकी व दुचाकी जप्त केली. संशयितांची वरात पाहण्यासाठी नागरिकही गोळा झाले होते.

अन्सारी हत्या प्रकरणात आणखी तीन ते चार जणांना अटक होण्याची शक्यता आहे. संशयित गुन्हेगारांना आश्रय देणे हा देखील गुन्हा ठरतो. त्यामुळे या गुन्ह्यात दोघांना अटक झाली असून, इतरांबाबतही हाच नियम लागू पडणार आहे.
- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा वर्षीय बालकावर तरुणाचा लैंगिक अत्याचार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या १० वर्षीय बालकावर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेतील संशयित आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

लैंगिक अत्याचाराचा घृणास्पद प्रकार गुरूवारी (दि. १५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरात घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा फुलेनगर झोपडपट्टी परिसरात राहतो. गुरूवारी सकाळी तो परिसरात खेळत असताना २० ते २२ वयोगटातील दोघे तरुण दुचाकीवर तिथे आले. त्यांचा संबंधित बालकाचा परिचय होता. त्यांनी बालकाची विचारपूस केली. तसेच त्याला दुचाकीवर सोबत घेतले. हे तिघे मार्केट यार्ड परिसरात गेले. तिथे यातील एका तरुणाने १० वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केले. पीडित बालक घरी पोहचल्यानंतर त्याने आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर बालकाच्या पालकांनी लागलीच पंचवटी पोलिस स्टेशन गाठून माहिती दिली. मात्र, प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचल्याची कुणकुण लागल्यानंतर संशयित फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित बालकाची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या अहवालानुसार पोलिस कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिवांना सक्तीची रजा

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत सचिव अरुण काळे यांच्या कामकाजावर संचालकांनी आक्षेप नोंदविला. गेल्या वर्षाच्या बाजार समितीच्या हिशोबाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी नोटिसा बजावल्या आहेत, कामकाजाविषयी सचिवांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्यांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. प्रभारी सभापती श्यामराव गावित यांनी सचिव काळे यांना आणखी दोन महिन्यांची मुदत द्यावी असा आग्रह धरला. संचालकांच्या रोष बघून सचिव काळे यांनी सभेतून काढता पाय घेतला.

बाजार समितीच्या कार्यालयात प्रभारी सभापती श्यामराव गावित यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना यांच्याकडील मार्केट फी ही नियमानुसार सुरू ठेवावी. पणन संचालक आणि राज्य सरकार यांच्या नियमांनुसार अंलबजावणी करावी, असे संचालक शिवाजी चुंभळे यांनी सांगितले. बाजार समितीच्या आवारातील साफसफाई कामाची मुदत ३० जूनला संपत असल्याने नवीन मक्त देण्याविषयी टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्नधान्य विभागात साखरेचे व्यापाऱ्यांकडील सेवा शुल्क हे शासन नियमाप्रमाणेच घ्यावे. पेठरोडच्या मार्केटमधील गटार व पाणी पुरवठाची दुरुस्ती करण्यावर मंजुरी देण्यात आली. बाजार समितीच्या आवारात मद्यप्राशन करून तेथील व्यापाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार संदीप पाटील यांनी केली. असे प्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, असे ठरविण्यात आले.

नोकरभरतीच्या मुद्यावरून वादंग

फेब्रुवारी २०१६ मध्ये नेमणूक केलेल्या कनिष्ठ लिपीक, शिपाई, पहारेकरी यांची नेमणूक गरज नसताना केली आहे. ही भरती रद्द करावी, असा मुद्दा उपस्थितीत केल्याने श्यामराव गावित, तुकाराम पेखळे, शिवाजी चुंभळे यांनी ही नेमणूक रद्द करता येणार नाही, अशी भूमिका मांडल्याने सभेत गदारोळ माजला.


महत्त्वाचे मुद्दे

- नाशिकरोड, लाखलगाव येथील आठवडे बाजार सुरू करावेत.
- हरसूल येथील बाजाराच्या शेडची दुरुस्ती करावी.
- २९ एप्रिल २०१७ च्या सर्वसाधारण सभेत सचिवांच्या कामकाज समाधानकारक नसल्याबाबत लेखी अर्ज दिला होता. त्यावर संचालकांनी चर्चा करीत सचिव बदलण्याची भूमिका मांडली.
- निलंबित सेवकांचा विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे तो विषय तहकूब करण्यात आला.
- कामाचे मूल्यमापन केल्यानंतर कर्मचाऱ्यांना वाहतूक व महागाई भत्ता देण्यात यावा.
- चव्हाण ट्रेडिंग कंपनीचे लायसन्स रद्द करण्याचा आलेला अर्ज त्यांच्याकडील सर्व बाबींची माहिती घेऊन लायसन्स रद्द करावे.
- जय तुळजाभवानी व्हेजिटेबल कंपनीला लोखंडी शेडऐवजी त्यांना बांबूचे शेड उभारण्यास संचालकांनी मान्यता दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवप्रकाश योजनेला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषिग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेत सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेस यामध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली असून ग्राहकांना प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. शिवाय वीजजोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर संबंधित ग्राहकाला थकीत देयकाची किती रक्कम भरावयाची आहे, याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जेथे इंटरनेटची सुविधा नसेल अशा ग्राहकांना त्यांच्या थकबाकीचा तपशील उपलब्ध करून दिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

आयडीबीआय या राष्ट्रीयकृत बँकेतून जिल्हाभरातील शिक्षकांच्या वेतनाला नुकतीच मंजुरी मिळाली. त्यामुळे येत्या २७ जूनपर्यंत जिल्हाभरातील सुमारे १९ हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आयडीबीआय बँकेत खाते उघडण्यास प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सोमवारी (दि. १९) गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या जिल्ह्यातील मुख्याध्यापक सभेत सर्व शाळांचे आयडीबीआय बँकेत काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व गुरुजींना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याच्या मागणीला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच मंजुरी दिल्याने राज्य शिक्षक परिषद, ग्रंथालय शिक्षक परिषद व मनसे शिक्षक सेनेच्या पदाधिकारी व प्रभारी शिक्षणाधिकारी नितीन उपासणी, आयडीबीआय बँकेचे क्षेत्रिय प्रमुख अखिलेश शर्मा, माध्यमिक विभागाचे वेतन पथक अधीक्षक गणेश फुलसुंदर, प्राथमिक विभागाचे वेतन पथक अधीक्षक एस. आर. चव्हाण, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शिक्षण निरिक्षक शिवाजी शिंदे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शिक्षणाधिकारी कार्यालयात पार पडली. यात शिक्षकांचे आयडीबीआय या बँकेत वैयक्तिक खाते उघडणे, त्यांना बँकिंग विषयक विविध सुविधा देणे, त्याविषयीचे करार करणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी शिक्षक परिषदेचे विभागीय कार्यवाह डी. यू. अहिरे, जिल्हाध्यक्ष दत्ता वाघे पाटील, शंकर सांगळे, संजय सावंत, सचिन मेधने, संजय पवार, बी. बी. शेलार, हेमंत पाटील, शशिकांत पाटील, अमृतराव सांगळे, मनसे शिक्षक सेनेचे पुरुषोत्तम रकिबे, ग्रंथालय शिक्षक परिषदेचे विलास सोनार आदी उपस्थित होते. बँकेशी करावयाच्या कराराचा नमुना तयार करण्याची जबाबदारी वेतन पथक अधीक्षक गणेश फुलसुंदर व एस. आर. चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली.

या मुद्द्यांवर सहमती
- झिरो बॅलन्सवर उघडली जाणार शिक्षकांची खाती
- प्रत्येक कर्मचाऱ्यास मिळणार पाच लाखाचे अपघाती विमा संरक्षण
- निव्वळ वेतनाच्या पाच पटीचा ओव्हरड्राफ्ट
- मोफत आंतरराष्ट्रीय गोल्ड एटीएम सुविधा
- प्रती दिवसाला ७५ हजाराची रोख रक्कम काढता येणार
- गृहकर्जाच्या प्रोसेसिंग फिसह व्याजदरात विशेष सवलत
- १९ जूनला मुख्याध्यापक सभेत शाळांचे खाते काढली जाणार
- २७ जूनपर्यंत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची खाती काढणार
- बँक सुविधा शाळेच्या दारी उपक्रम राबविणार
- वेतन यादी इमेलवर पाठविण्याची सुविधा देणार
- प्रत्येक कर्मचाऱ्यास १२० चेक मिळणार मोफत
- खाते उघडल्यावर एटीएम कार्ड, पिन, चेकबुक, पासबुक तात्काळ मिळणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकबाह्य विद्यार्थ्यांनाही संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावीसाठी ऑनलाइन व केंद्रीय पध्दतीने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा शुक्रवारपासून (दि. १६) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी २६ जूनपर्यंत त्यांचे प्रवेश अर्ज अचूकपणे भरावेत, असे आवाहन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केले आहे. याशिवाय नाशिक बाहेरील विद्यार्थ्यांनाही नाशिकमध्ये अकरावी प्रवेश घेण्याची इच्छा असल्यास त्यांच्यासाठीही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया खुली करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन प्रक्रियेची अंमलबजावणी अचूकपणे व्हावी, यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कॉलेजरोडवरील डॉन बॉस्को स्कूल येथे मुख्याध्यापक व प्राचार्यांसाठी कार्यशाळा गुरुवारी झाली. यात शिक्षण विभागाच्या उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जाधव बोलत होते. दोन टप्प्यात अकरावी प्रवेशाचा अर्ज भरायचा आहे. यापैकी ऑनलाइन प्रक्रियेचा दुसरा टप्पा शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

अशी असेल शाळांची भूमिका

प्रवेश अर्जासाठी शाळांकडून प्रतिअर्ज १५० रुपये शुल्क आकारण्यात येईल. २६ जूनपर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. २७ जून रोजी विभाग प्रमुखांनी दिलेल्या वेळेत वेळापत्रकानुसार शिक्षण विभागाकडे प्रवेशाची आकडेवारी आणि हिशेब सादर करायचा आहे.

- ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्जाची भाग क्रमांक १ हा अप्रूव्ह झालेला असेल तेच विद्यार्थी भाग क्रमांक २ पूर्ण करू शकतील.
- माध्यमिक शाळांच्या ‘लॉग इन’ ला verified candidate list >>>view complete list या पाथवर आपल्या शाळेच्या इंडेक्स नंबरवर ऑनलाइन प्रवेश अर्जांचा भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिसेल.
- यानुसार आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग १ भरल्याची खात्री संबंधित शाळांनी करावी व अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
- कल्चर व स्पोर्टस कोट्यातील प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन करण्यात यावे.
- जनरल कॅटेगिरीच्या ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही आरक्षणाचा लाभ लागू नसेल तर त्यांचे अर्ज व्हेरिफाय करण्याची आवश्याता नाही. मात्र त्याच्या required document status मध्ये काही कागदपत्रे नमूद असल्यास अशा विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरीफाय करावे.
- प्रवेश अर्जाच्या प्रिंटवरील Version हे केवळ Edit केल्यानंतरच बदलते.
- याशिवाय required document status मध्ये status : Approved हा पर्याय तपासावा.
- इन हाऊस, मॅनेजमेंट कोटा, बायफोकल, मायनॉरिटी कोटा अंतर्गत येणारे प्रवेश ज्युनिअर कॉलेजेसच्या स्तरावर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्जांचा भाग एक भरला आहे, अशाच विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे द्यावेत.

ग्रामीण विद्यार्थ्यांनाही मिळणार शहरात प्रवेश

नाशिक महापालिका किंवा देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बाहेरील विद्यार्थ्यांनाही शहरातील कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी संधी खुली करून देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी व्ही. एन. नाईक कॉलेज (कॅनडा कॉर्नर), सीएमसीएस कॉलेज (गंगापूर रोड), भोसला कॉलेज (गंगापूर रोड), बीवायके कॉलेज (कॉलेजरोड), पंचवटी कॉलेज (औरंगाबाद रोड), श्रीराम विद्यालय (पंचवटी), केएसडब्ल्यू कॉलेज (सिडको), सुकदेव विद्यालय (इंदिरानगर), नाशिकरोड कॉलेज (नाशिकरोड), एसव्हीकेटी कॉलेज (देवळाली कॅम्प), नूतन विद्यामंदिर (भगूर) या केंद्रांवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा-शाळांत रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल दोन महिन्यांच्या सुटीनंतर गुरुवारी (दि. १५) शहर परिसरातील बहुसंख्य शाळांचे आवार चिमुकल्यांच्या लगबगीने गजबजून गेले होते. शाळांचे आवार चकाचक करून सजावटीसह नव्या-जुन्या विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वच शाळांनी केली होती. रंगेबेरंगी फुग्यांनी सजलेली शाळा, बोलके फळे, गुलाबपुष्प देत वेलकम म्हणणारे टीचर्स, तर काही ठिकाणी औक्षणही अशा वातावरणात एकीकडे अनेक चिमुकले मोठ्या उत्साहाने शाळाप्रवेश करताना दिसत होते, तर दुसरीकडे अनेक चिमुकल्यांना मात्र पालकांपासून दुरावताना रडू कोसळले होते. विविध शाळांच्या परिसरात गुरुवारी असा धम्माल माहोल दिसून आला…

सावित्रीबाई फुले विद्यामंदिर

पखालरोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुभाष सोनवणे होते. प्रा. एन. जे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुनील शेवाळे यांनी केले.

बिटको बॉइज हायस्कूल

येथे मुख्याध्यापिका रेखा काळे यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना यावेळी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. परिसर रांगोळ्या काढून, फुले लावून सजविण्यात आला होता. संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले, उपमुख्याध्यापक पेंढारकर आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होता.

सागरमल मोदी प्राथमिक शाळा

शाळेचा पहिला दिवस येथे उत्साह साजरा झाला. करण्यात आला. मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांच्या हस्ते सरस्वतीपूजन झाले. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पुस्तके देऊन व औक्षण करून स्वागत झाले. ज्येष्ठ शिक्षिका नेहा देशपांडे, अलका तुपे, मंगला बनकर, वैशाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.

केबीएच विद्यालय

येथे गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांनी कॅनडा कॉर्नर, शरणपूर, विसे मळा, कॉलेजरोड परिसरातून प्रभात फेरी काढली. नंतर शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तक व गणवेशवाटप करण्यात झाले. ए. डी. पवार अध्यक्षस्थानी होते.

शिशुविहार व बालक मंदिर

मराठी माध्यम शाळेत ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राम मंदिरात नेण्यात आले. नंतर पेढा देऊन औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. नवागतांनी आपला परिचय करून दिला. विद्यार्थ्यांना श्लोकांचे पुस्तक देण्यात आले.

जु. स. रुंग्टा हायस्कूल

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून करण्यात आली. शाळेत सकाळी ७ वाजता उपासनेला प्रारंभ झाला. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले. मिलिंद काचोळे, प्रसाद कुलकर्णी यांचीप्रमुख उपस्थिती होती.

खदेव मराठी विद्यामंदिर

इंदिरानगरच्या शाळेत नवागतांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे व वर्गशिक्षिका मनीषा बोरसे यांनी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून चॉकलेट, तसेच नवीन पाठ्यपुस्तके देऊन शाळेत स्वागत केले. चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल

नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे बँडच्या गजरात स्वागत करण्यात आले. वर्षारंभ उपासनेद्वारे विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोकांचे अर्थ समजावून सांगण्यात आले. पालकांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक प्रतापसिंग ठोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोडून पडला संसार तरी...

0
0

मोडून पडला संसार तरी...

नाशिकमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात गंगेवरील आठवडेबाजार, तसेच शहरातील इतरही भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अर्ध्या तासातच अनेक विक्रेत्यांचा भाजीपाला वाहून गेला, सराफ बाजारातही पाणी शिरले, तर पावसापासून बचावासाठी थांबलेल्या ग्राहकांची कोंडी झाली. वीर सावरकर पथ, मधली होळी, बडी दर्गा, मोदकेश्वर मंदिर, भद्रकालीकडे जाणारे सर्वच रस्ते प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे जलमय झाल्याचे चित्र होते. पाऊस थांबल्यानंतर काळजीत गेलेली रात्र अन् गुरुवारची सकाळ डोळ्यात भरून आलेली दिसली. झालेले नुकसान सोसत दुकानांमध्ये साचलेला गाळ व पाणी काढण्यात व्यावसाय‌कि दंग झाले होते. दर वर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत दिवसभर व्यावसायिकांचे हात राबताना दिसले. समाजसेवकांनीही महापालिका प्रशासनाच्या कारभारावर कोरडे ओढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images