Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

काँग्रेसने देशाला लुटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

काँग्रेसने राज्य करताना केवळ देशाला लुटण्याचे काम केले आहे. मोदी सरकार जनतेच्या पैशाची राखण करणारे सरकार आहे. त्यामुळेच सामजिक सुरक्षेच्या योजना देशभरात राबविल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्त्वामुळे भारताची मान उंचावली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. बुधवारीच मालेगाव महापालिकेवर काँग्रेसने शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. भामरे यांनी काँग्रेसवर श‌ाब्द‌िक हल्ला केला.

केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने मालेगाव ये‌थे ‘सर्वांची साथ सर्वांचा विकास’ या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. येथील अमेय लॉन्सवर हे संमेलन झाले. डॉ भामरे हे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन, विभाग संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हा प्रभारी सुनील बागुल, आमदार डॉ. राहुल आहेर, सुरेश निकम, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, अद्वय हिरे, तालुकाध्यक्ष दीपक पवार, संदीप पाटील उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, देशातील भ्रष्टाचार संपव‌िण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. तसेच काही वेळा कठोर निर्णय देखील घेतले. थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे ९२ योजनांचा थेट लाभ जनतेला होत आहे. भामरे यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने देशावर ६५ वर्ष राज्य केले. मात्र विकासाच्या नावाने केवळ देशाला लुटण्याचे काम या राज्यकर्त्यांनी केले. भामरे यांनी जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक केले.

पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक योजना राज्य शासनाने राबविल्या आहेत. कर्जमाफीबाबत सरकार आधीपासून सकारात्मक होते. मात्र कर्जमाफी ही केवळ मलमपट्टी असून, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, त्याची शेती शाश्वत झाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच जे शेतकरी सक्षम आहेत त्यांनी स्वतःहून कर्जमाफी घेणार नाही, असे जाहीर करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कर्जमाफीचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून, ते शेतकऱ्यांचे असल्याचे त्याने स्पष्ट केले.

या कार्यक्रमात उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरगुती गॅस वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष दादा जाधव, अद्वय हिरे यांनी नार-पार, जिल्हा बँक, मालेगाव जिल्हा निर्मिती, शेती हमीभाव आदी मुद्द्यांवर विचार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामदेवबाबांचा नाशिकमध्ये लवकरच प्रक्रिया उद्योग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष व टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकावर पतंजली योगपीठाचे योगगुरू रामदेवबाबा प्रक्रिया उद्योग सुरू करणार असून, त्यासाठी जागा पाहिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. येत्या पंधरा दिवसांत याबाबत मुख्यमंत्री व मी नियोजन करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

पिंपळगाव बसवंत येथे शिवार संवाद सभेत पालकमंत्री महाजन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शेतकरी वर्गाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. पिंपळगाव बसवंत येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप देशमाने यांच्या वस्तीवरील झाडाच्या पारावर या शिवार सभेचे आयोजन करण्यात आले. गिरीश महाजन यांचे सकाळी दहा वाजता आगमन झाले. ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय दराडे, आमदार राहुल आहेर, माजी आमदार दिलीप बनकर, प्रांत महेश पाटील, तहसीलदार डॉ. विनोद भामरे, वैकुंठ पाटील, सतीश मोरे आदी उपस्थित होते.

‘द्राक्ष उत्पादकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला’

कर्जमाफीबाबतीत सरकारने लावलेल्या निकषावर शेतकऱ्यांनी पालकमंत्री महाजन यांच्याशी संवाद साधला. सोमनाथ मोरे यांनी, कर्जमाफीमध्ये सरकारने लावलेले अनेक निकष शेतकऱ्याला मान्य नसल्याचे सांगितले. आम्हाला जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा करण्यात येतो. आज बँकेची स्थिती खूपच बिकट झाली आहे. बँकेचे आम्ही कर्ज भरले आहे, तसेच अनेक शेतकरी वर्गाचे या बँकेत पैसे अडकले आहेत. पैसे असून मिळत नाहीत. बँकेच्या बाबतीत दोषींवर कठोर कारवाई करावी; पण आम्हाला वेठीस धरणे योग्य नाही, तसेच द्राक्ष उत्पादकाला कर्जमाफीबाबतीत वेगळी वागणूक मिळण्याचे संकेत आहेत. द्राक्ष उत्पादकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, असे आवाहन मोरे यांनी केले. या वेळी संजय गोवर्धने, विनायक मोरे, कैलास कमोद, रावसाहेब चौधरी, सुरेश खोडे, दत्तू आथरे आदींनी कर्जमाफीबाबत लावलेले निकष हे शेतकरी वर्गाला बुचकळ्यात टाकणारे असल्याचे सांगितले.

पालकमंत्री महाजन म्हणाले, की यापुढे शेतकरी वर्गाला शाश्वत पद्धतीने शेती करण्याची आवश्यकता असून, पुढील काळात आधुनिक पद्धतीने शेती करणे काळाची गरज होणार आहे. शेतीमालाच्या भावाची चढ-उतार लक्षात घेता प्रक्रिया उद्योग गरजेचा आहे. कर्जमाफीच्या निकषावर महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले, की काही मोठे उद्योग करणारे व्यावसायिक निव्वळ कर वाचविण्यासाठी शेतीचा सहारा घेतात. उत्पन्न जास्त दाखवून कर चुकविण्यासाठी शेतीचा सहारा घेतात व शेतीवर लाखो रुपये कर्ज काढून ठेवतात. मग त्यांना का माफी द्यायची? महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणे आहेत. यासाठी सरसकट कर्ज माफ केले तर या लोकांना जास्त फायदा होईल. त्यासाठी काही निकष लावले गेले. शेतकरी वर्गाकडे चारचाकी वाहन असल्यास माफी नाही हा गैरसमज दूर केला पाहिजे. कारण चारचाकी वाहन ही गरज आहे. त्यात काही गैर नाही.

जिल्हा बँकेबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यातून योग्य मार्ग निश्चित काढला जाणार आहे. केवळ कर्जमाफीने अडचणी दूर होणार नाहीत, तर यापुढे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती केली तरच शेती व्यवसाय हा खरा व्यवसाय होईल, असे मत महाजन यांनी व्यक्त केले. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, निवृती धनवटे, सोमनाथ मोरे, सुरेश खोडे, भाजपचे जिल्हा संघटक बापू पाटील, संजय गाजरे, संदीप आहेर, विष्णू खोडे, रामभाऊ माळोदे, प्रशांत घोडके, चिंधू काळे, बाळासाहेब बनकर, संपत विधाते, सतीश देशमाने, दिगंबर सूर्यवंशी, बबन बनकर, कांता बनकर, गणपत मोरे, संदीप बनकर, शंकर बनकर, शंकर गायखे, शिवाजी गायकवाड आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदत नव्हे, थट्टाच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत राज्य सरकारने तातडीची आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांसदर्भातील अध्यादेशही सहकार व पणन विभागाने काढला आहे. मात्र या पैशांसाठी लावलेले निकष पाहता जिल्ह्यातील शेतकरी या मदतीपासूनही वंच‌ित राहतील असेच दिसत आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा उत्पादकांचे दहा हजारात काहीच होत नसताना, त्यात अनेक अटी असल्यामुहे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी या मदतीपासून वंचितच राहणार आहेत. त्यामुळे शासनाची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांनी केला आहे.

जिल्हा बँक डबघाईस गेल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आधीपासूनच संकटात सापडला आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी, त्याच्या अंमलबजावणीला अजून बराच वेळ आहे. कर्जमाफी होईपर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी दहा हजाराची तातडीची मदत करण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत आदेश बुधवारी राज्याच्या सहकार व पणन विभागाने अध्यादेश जारी केला आहे. परंतु हा आदेश सरकारने मदतीसाठी बनवला की, शेतकऱ्यांची थट्टा करण्यासाठी बनवला अशी प्रतिक्रिया उमटली आहे.

या आदेशात आजी माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका सदस्य यांना वगळण्यात आले आहे. सोबतच शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही वगळण्यात आले आहे. आयकर भरणारे, ठेकेदार व कंत्राटदार, विविध संस्थाच्या सदस्यांनाही या मदतीपासून दूर ठेवण्यात आले आहे. सेवाकर भरण्यासह ज्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांनाही मदत नाकारली आहे. शेतकऱ्याचे दुकान असेल व त्याची नोंदणी शासनाकडे असेल तर त्यांनाही मदतीपासून वंच‌ित ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे शासनाने ही मदत न देण्यासाठीच जाहीर केली आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सरकारच्या या अटींमुळे जवळपास ७० टक्के शेतकरी या मदतीपासून वंच‌ित राहण्याची शक्यता आहे. डाळिंब, द्राक्ष, कांदा या पिकांचा एकरी खर्चच मुळात तीस हजारांहून अधिक आहे. त्यातच शासन केवळ दहा हजार देत आहे. त्यासाठी लावलेल्या जाचक अटी पाहून शेतकऱ्यांनी ही मदत नकोच, अशी भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी अजून प्रतिज्ञापत्राची सक्ती करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन दाखल्यांत नाशिक राज्यात दुसरे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाविद्यालयीन व शालेय प्रवेशासाठी लागणारे आवश्यक दाखल्याबरोबरच इतर विविध दाखले ऑनलाइन देण्यात अहमदनगर जिल्ह्याने राज्यात पहिल्या क्रमांक पटकाविला असून, नाशिक जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जून महिन्यात शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सेतू व महा-ई-सेवा केंद्रावर दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी होते. याकाळातच १ जून ते १४ जून पर्यंतची आकडेवारी शासनाने जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यात या १४ दिवसात ६३ हजार ६२४ दाखले देण्यात आले आहे. प्रथम क्रमांकावर असलेल्या अहमदनगर जिल्ह्याची हीच आकडेवारी ७१ हजार ४१६ आहे.

जिल्ह्यात १५ तालुक्यात हे दाखले दिले जात असले तरी एकाच वेळीच दाखले घेण्याची गर्दी वाढल्यामुळे अनेकांना त्रासही सहन करावा लागत आहे. त्यात ऑनलाइन सेवेमध्ये गर्दी झाल्यामुळे वेबसाईट डाऊन होण्याचेही प्रकार वाढतात. त्यामुळे दाखले मिळण्यास उशीर होतो, अशा स्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त दाखले दिले आहे. सध्या महाविद्यालयीन प्रवेशाची लगबग सुरू आहे. प्रवेशासाठी आवश्यक ते दाखले मिळविण्यासाठी पालक आणि त्यांच्या पाल्यांची सेतू कार्यालय व महा-ई-सेवा केंद्रामध्ये गर्दी होते आहे. उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॅशनॅलिटीचे दाखले यासह तब्बल १६ प्रकाराचे दाखले यात दिले जातात. जून महिन्यात तर शहरातील विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी दररोज हजारच्या आसपास अर्ज दाखल होतात. त्यात मोठ्या संख्येने प्रकरणे प्रलंबित राहण्याच्या तक्रारीही असतात. त्यामुळे दाखले देण्यात जिल्हा प्रशासनाने यावेळेस जास्तीत जास्त दाखले देण्याचे प्रयत्न केले आहे.

जिल्ह्यात १९ सेतू कार्यालये

जिल्ह्यात विविध दाखले देण्यासाठी १९ कार्यालय आहे. त्यात नाशिक शहरात चार तर तालुक्याची ठिकाणी एक कार्यालय आहेत. त्याचप्रमाणे महा-ई-सेवा केंद्र ३२४ असून, या सर्व ठिकाणाहून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे ग्रामीण भागातही अनेकांना त्याचा लाभ होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवागतांनी गजबजल्या शाळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड परिसरातील सर्वच उपनगरांतील शाळा गुरुवारी नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजल्या होत्या. शाळांतर्फे विविध उपक्रम राबवून चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले.

मेहता हायस्कूल

येथे शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा झाला. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. प्राचार्या करुणा आव्हाड, भगीरथ घोटेकर आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

र. ज. चौहान हायस्कूल

येथे इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका संजीवनी धामणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ व पुस्तकांचे वाट्प करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वर्षारंभ उपासनाही केली.

के. एन. केला हायस्कूल

येथे योगा सप्ताहानिमित्त इंटरनॅशनल आर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशनतर्फे योगासने झाली. विद्यार्थ्यांनीही त्यात सहभाग घेतला. नगरसेविका सीमा ताजणे, मुख्याध्यापिका चैताली बिश्वास, योग शिक्षक शुभांगी रत्नपारखी, सुरेखा पगार, आरती साळवे आदी उपस्थित होते. होली फ्लावर स्कूल, अभिनव मराठी शाळा, जेलरोड टाकीवरील महापालिकेच्या तीन शाळा, उपनगरची इच्छामणी शाळा, महाराष्ट्र हायस्कूल, सेंट झेवियर आदी शाळांमध्येही विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

पंचवटीत ग्रंथ दिंडी

पंचवटी ः परिसरातील शाळांमध्ये नवीन व जुन्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, मिठाई व पुस्तके देऊन विविध उपक्रमांद्वारे स्वागत करण्यात आले. विडी कामगारनगर येथील महापालिका शाळा जनार्दन स्वामी विद्यालय क्रमांक ४५ व ६५ मध्ये ग्रंथ दिंडी काढून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गणेश आवनकर, नगरसेवक सुरेश खेताडे , पूनम सोनवणे, प्रकाश केकाणे, सुनील दराडे, दशरथ दिंडे आदी उपस्थित होते.

सीडीओ मेरी शाळा

येथे नवागतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका पूजा गायकवाड, उपप्रमुख राजश्री वैशंपायन, सहसचिव दिलीप अहिरे, पर्यवेक्षक कृष्णा राऊत, मुग्धा काळकर आदींच्या हस्ते पुस्तकावाटप झाले.

न्यू इंग्लिश स्कूल

आडगाव ः येथे मोफत पाठ्यपुस्तक वितरण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल बॉडी सदस्य भाई पुंजा माळोदे व माजी सैनिक दत्तात्रय मते होते. यावेळी पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे गंथपाल डी. के. नागमोते यांनी पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. दहावीतील गुणवंतांचा सत्कार झाला.

सातपूरला विविध उपक्रम

सातपूर ः परिसरातील सरकारी व खासगी शाळांमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांद्वारे स्वागत करण्यात आले. गंगापूररोडवरील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिरात मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्याध्यापिका गायधनी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठपुस्तके वाटप करण्यात आली. सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयात मुख्याध्यापिका सुलोजना गांगुर्डे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. महापालिकेच्या जिजामाता शाळेतही नगरसेवक तथा मनसे गटनेता सलिम शेख, नगरसेवक योगेश शेवरे यांनी नवागतांचे स्वागत केले.


देवळाली कॅम्प परिसरात उत्साह

देवळाली कॅम्प : येथील शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन उत्सलाहात स्वागत करण्यात आले. परिसरातील कॅन्टोन्मेन्ट बोर्ड हायस्कूल, कॅन्टोन्मेन्ट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळा, डॉ. गुजर सुभाष हायस्कूल, देवळाली हायस्कूल, नूतन विद्यामंदिर आदी शैक्षणिक संस्थांमध्ये नव्याने आलेल्या व सुटी संपल्यानंतर प्रथमच शाळेत दाखल होत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय पाठ्यपुस्तके, वह्या कंपास आदी साहित्याचे वाटप केले.

चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण

देवळाली कॅम्प ः सर्व शिक्षण अभियानांतर्गत शिंगवे बहुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येऊन त्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वैष्णव, मुख्याध्यापक कल्पना साळवे, शिवयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोजाड आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणीजवळ अपघातात तीन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

अहमदाबादहून अहमदनगरकडे जाणारी कार लखमापूर फाट्याजवळ झाडावर आदळल्याने तीन जण जागीच ठार झाले. दोन जण जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे हा अपघात झाला.

अहमदनगर जिल्ह्यातील वाकुडी फाटा येथील नवीन बबन कांडेकर (वय २२), मंगल बबन कांडेकर (वय ४२), आशा साहेबराव गावडे (वय ४५), छगन मांणकू कांडेकर (वय २५), चालक मानिष भाऊसाहेब गवळी (वय २३) हे सर्व कारने अहमदाबादहून अहमदनगर येण्यासाठी निघाले होते. दरम्यान लखमापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेच्या झाडावर कार आदळल्याने मंगल कांडेकर, आशा गावडे, छगन कांडेकर हे जागीच ठार झाले. चालक मनिष व नवीन कांडेकर हे दोघे जखमी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्याचे उपोषण; सिव्हिलमध्ये दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील उमेश भानुदास नागरे या कैद्याने दोन दिवसांपासून अन्नत्याग केल्याचा प्रकार घडल्याने अखेरीस त्याला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कारागृह सुरक्षाव्यवस्थेकडून होणाऱ्या जाचाविरोधात आपण हे पाऊल उचलले असल्याचे या कैद्याचे म्हणणे असले तरी कारागृह प्रशासनाने त्याचा हा आरोप फेटाळून लावला आहे. उमेश नागरे या कैद्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गैरवर्तनाची तक्रार केली म्हणून थेट तुरुंगाधिकाऱ्यांवरच हल्ला केला होता. त्यानंतर त्याने इतर कैद्यांनाही शिवीगाळ करून त्यांच्यातही रोष निर्माण करण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे उमेश नागरे याला कारागृह प्रशासनाने हाय सिक्युरिटी सेलमध्ये ठेवले होते. त्यानंतर याचा राग आलेल्या नागरे याने दोन दिवसांपासून जेवण घेणे बंद केले होते. यावर जेल प्रशासनासह इतर कैद्यांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही तो आपल्या मागणीवर अडून बसला होता. अखेरीस कारागृह प्रशासनाने त्याला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीचा वाद कृत्रिम’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र व कर्नाटक हद्द‌ीचा वाद हा कृत्रिम असून, आम्ही एकच आहोत. दोन्ही राज्यांतील साहित्यही हेच दर्शविते. या दोन्ही राज्यांत कितीतरी साम्यस्थळे आहेत. ती पाहता हद्दीचा वाद त्यापुढे गौण ठरतो. मराठी व कानडी या भाषा भगिनी आहेत व त्या दोन्हींमध्ये असंख्य साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत. त्याचा ऊहापोह करता एकमेकींनी भाषांतराच्या माध्यमातून आदानप्रदान केले पाहिजे, अशी भावना प्रख्यात कन्नड साहित्यिक तथा कवी, नाटककार, समीक्षक प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार डॉ. शिवप्रकाश यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. शिवप्रकाश पुढे म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकचे ऋणानुबंध खूप जुने असून, थेट विठ्ठलाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या दोन राज्यांत सीमारेषेचा वाद असूनही साहित्यात मात्र मराठी-कानडी असा कोणताही भेद नाही. मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती कानडीत भाषांतरीत झाल्या पाह‌िजेत. मराठीतील ज्ञानेश्वर कानडीत आले पाह‌िजे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कानडीत भाषांतर झाले पाह‌िजे. संत तुकाराम कानडीत आले पाह‌िजे व हे करतानाच आमचा हरिदास मराठीत आला पाह‌िजे, असेही शिवप्रकाश म्हणाले.

कुसुमाग्रज यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने आज माझ्या वाढदिवशी माझा पुनर्जन्म झाला आहे, असे भावनोत्कट उद््गार डॉ. शिवप्रकाश यांनी काढले. पसायदान हे विश्वाचे आर्त असून विश्वकवी ज्ञानेश्वरांनी ते ईश्वराकडे मागितले आहे. त्यामुळे हे मागणे दैवी ठरते असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासीपठावर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, मेनका धुमाळे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या डॉ. विजया पाटील उपस्थित होते.

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार व बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लातूरच्या मेनका धुमाळे यांना बाबुराव बागूल कथालेखन पुरस्कार प्राप्त झाला.

सत्काराला उत्तर देताना मेनका धुमाळे म्हणाल्या, स्रियांचे दुःख, वेदना, संवेदना शब्दांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचे प्रयत्न माझ्या साहित्यातून केले आहे. विद्यापीठाने दिलेल्या पुरस्कारामुळे ग्रामीण साहित्याचा गौरव झाला आहे. हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. जगणे व भोगणे यातील अंतर मी माझ्या लेखनातून व्यक्त करीत आहे. स्त्री व तिची दु:खे उमजण्याचा हा प्रवास आहे तो रेखाटण्याचा मी प्रयत्न केला आहे, असेही धुमाळे म्हणाल्या.
कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, निवड समितीने अतिशय योग्य प्रकारे निर्णय घेऊन योग्य व्यक्तीला पुरस्कार देण्यासाठी शिफारस केली याचा आनंद वाटतो. अमराठी साहित्यिकाच्या साहित्याचा सन्मान झाला याचा विशेष आनंद होत असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केली.

कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे होते. विद्यापीठातर्फे दिला जाणारा हा आठवा पुरस्कार होता. तर बाबुराव बागूल कथालेखन पुरस्काराचे रुपये २१ हजार रोख असे स्वरूप होते. प्रारंभी कुसुमाग्रज अध्यासनाच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राजक्ता देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

इंग्रजीचे आव्हान

डॉ. अक्षयकुमार काळे यावेळी म्हणाले, मराठीत अनेक दर्जेदार साहित्यकृती आहेत. मात्र त्यातील अनेक साहित्य दर्जेदार असूनही केवळ अनुवाद न झाल्याने सीमित राहिले. भारतीय साहित्यावर जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव पडत आहे. यामुळे भाषा आणि संस्कृतीचे नातेसंबंधात दरी निर्माण झाल्याचे सांगून स्थानिक भाषांपुढे इंग्रजी भाषेचे मोठे आव्हान ठाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवक मृत्यूप्रकरणी सातजण ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादामध्ये बुधवारी दुपारी गरीब नवाज कॉलनीत पाणीवाटपावरून झालेल्या हाणामारीत नगरसेवकाच्या झालेल्या मृत्युप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

माजी नगरसेवक शेख मोहम्मद आणि नगरपालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली, नगरसेविका पुत्र सैय्यद मुजफर अली, सैय्यद नासिर अली यांच्या गटात बुधवारी पाणीवाटपावरून तुफान हाणामारी झाली. यामध्ये सभापती सद्दाम तेलींचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस अजून काही दंगलखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान मयत सद्दाम तेली यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले असून, आता शहरात शांतता व चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिकांचा बाजार ‘बुडाला’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

शहरातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या सराफ बाजारात बुधवारी सायंकाळी दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने अनेक दुकानांत पाणी शिरल्याने सोनार, कापड व्यापारी, किराणा आणि इतर व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गुरुवारी येथे दिवसभर साफसफाई सुरू होती. त्यावेळी झालेल्या नुकसानीचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसून आले. जोरदार पावसाने येथील व्यावसायिकांचा बाजारच बुडाल्याने या परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अनेक व्यावसायिकांचे मागील वर्षी पुरामुळे झालेले नुकसान भरून येत नाही, तोच पुन्हा मोठे नुकसान पुन्हा मोठे नुकसान झाल्याने व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहे. पण, यावर्षी मात्र नालेसफाईच्या कामात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

गुरुवारी दिवसभर साफसफाई करून शिल्लक माल जमा करण्याचे काम येथे सुरू होते. ओली झालेली बिल बुके, कागदपत्र सुकण्यासाठी बाहेर टाकलेली होती. शिवाय काही ठिकाणी बेसमेंटमधील पाणी काढण्याचे काम अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू होते. स्मार्ट होणाऱ्या नाशिक शहरातील नालेसफाईचा बुधवारच्या पावसाने पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी तर नालेसफाई झालीच नसल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच शिल्लक नाही त्यामुळे सीबीएस, एम. जी. रोड, रविवार कारंजा या परिसरातील पाणी उतार असल्याने सराफ बाजारात जमा होत असल्याची स्थिती आहे. सराफ बाजारातील शुक्ल गल्लीतील स्वच्छतागृह अडथळा ठरत असल्याचे येथील व्यावसायिक सांगत. पूर्वी स्वच्छतागृह छोटे होती, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेजदेखील होते. पण, नवीन बांधकाम ड्रेनेजवर केल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे अगदी छोटी जागा शिल्लक आहे .



महापौरांची मॅरेथॉन भेट

महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी सराफ बाजाची पाहणी केली. सभागृह नेते दिनकर पाटील व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पण, ज्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचलेले होते व व्यापाऱ्यांचे नुकसान झाले, त्या ठिकाणी महापौर गेल्याच नाहीत.

--


गोदाकाठावर कचऱ्याने दुर्गंधी

पंचवटी ः बुधवारच्या आठवडेबाजारातील कचरा पडून राहिल्याने व बुधवारच्या जोरदार पावसामुळे गोदाकाठी दुर्गंधी पसरली आहे. गुरुवारी सायंकाळीही हा कचरा पडून होता. महापालिकेच्या सफाई कामगारांनी या कचऱ्याचे ढिगारे घालून ठेवले असले, तरी ते उचलले नाहीत, त्यामुळे हा कचरा पडून आहे. म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, गणेशवाडी रस्स्यावर कचरा पडून आहे.

--


सरस्वती नाल्याची व्हावी सफाई

काही वर्षांपूर्वी सरस्वती नदी म्हणून ओळख असलेल्या या नदीचे नाल्यात रुपांतर झाले. पण, या नाल्याची २० ते २५ वर्षांत कधीही साफसफाई झालेली नाही. अनेक वेळा मागणी करूनदेखील प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्वरित या नाल्याची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिक करीत आहेत.

--

आमच्या कपड्याच्या दुकानांत पाणी शिरल्याने दुकानातील सर्व कपडे, फर्निचर ओले झाले. त्यामुळे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. येथे ड्रेनेज लाइनची साइज वाढवावी.

- कल्पेश भंडारी, कापड व्यावसायिक

--

मागील वर्षी महापुराने मोठे नुकसान झाले होते. फर्निचर नुकतेच नवीन बनवलेले होते. पण, आता पुन्हा दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. कागदपत्रे, जुनी बिले सर्व भिजगेले.

-बाबूलाल चौधरी, सुवर्ण व्यावसायिक

--

सिडकोत नालेसफाईचा देखावा
राजन जोशी

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पावसाळ्यापूर्वी सिडको परिसरातील नाले किंवा पावसाळी गटारी दर वर्षी साधारणतः मे महिन्यांतच साफ केल्या जात होत्या. यंदा मात्र या नाल्यांची किंवा गटारींची सफाई केली असली, तरी ती देखाव्यापुरतीच ठरल्याचे बुधवारच्या पहिल्याच पावसात लक्षात आले आहे. दत्त चौक भागातील नाला तुडूंब भरून गेल्याने परिसरातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले होते. त्याचबरोबर सिडकोतील रस्त्यांच्या कामांचाही दर्जा या पावसाने जनतेसमोर आला असून, पहिल्याच मोठ्या पावसाने महापालिका प्रशासनाची कार्यतत्परता चव्हाट्यावर आली आहे.

अनेक ठिकाणी वाहून आलेला गाळा गुरुवारीसुद्धा प्रशासनाने हटविला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. घरात पाणी शिरल्यानंतर अनेक नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना याबाबतची समस्या कळविली. मात्र, कोणीही घटनास्थळी न गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

रस्त्यावर पडले भगदाड

कोकण भवनच्या मागे मटाले गोठयासमोर एक महिन्यापूर्वीच बनवलेल्या १०० फुटी रहदारीच्या रस्त्याच्या मधोमध ५ ते ६ फूट रस्ता खचून मोठे भगदाड पडले आहे. याबाबतची माहिती नागरिकांनी नगरसेवक श्यामकुमार साबळे यांना कळविल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले.दरम्यान, सभापतींनी केवळ स्वतःच्याच प्रभागात दौरा केल्याचे समजते.

--


सातपूर प्रभाग सभेत खडाजंगी

सातपूर ः महापालिकेच्या सातपूर प्रभागाची मासिक सभा गुरुवारी सभापती माधुरी बोलकर यांच्या उपस्थित झाली. त्यात बुधवारच्या पहिल्याच मोठ्या पावसामुळे विभागात दाणादाण उडाल्याने कामचुकारपणाच्या मुद्यावरून नगरसेवक व अधिकाऱ्यांत खडाजंगी उडाली. स्वच्छता मोहीम राबवूनदेखील आरोग्य व ड्रेनेज विभागाचे अधिकारी कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यादेखील महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कामावार नियंत्रण ठेवत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. सभागृहनेता दिनकर पाटील, नगरसेविका सीमा निगळ, गटनेता सलिम शेख, नगरसेविका हर्षदा गायकर, नगरसेवक भागवत आरोटे यांनी पावसाच्या पाण्यामुळे होत असलेल्या समस्येबाबत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विभागीय कार्यालयात पहिल्याच झालेल्या प्रभाग सभेला नगरसेवक तथा शिवसेना गटनेता विलास शिंदे, शशिकांत जाधव, संतोष गायकवाड, योगेश शेवरे, रवींद्र धिवरे, नगरसेविका अलका आहिरे, पल्लवी पाटील, नयना गांगुर्डे, हेमलता कांडेकर, डॉ. वर्षा भालेराव, दीक्षा लोंढे यांच्यासह महापालिकेच्या सर्वच विभागांतील अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीसाठी साहित्यिकांच्या आंदोलनाची गरज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अभिजात भाषेबाबतचे सर्व निकष पूर्ण करूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्राकडून विलंब होत आहे. मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर तिच्या समृद्धीसाठी येणाऱ्या ३०० की ५०० कोटी रुपयांची फिकर आम्हाला नाही तर मराठी अभिजात होणे हा आमच्या अस्मितेचा मुद्दा झाला आहे. त्यासाठी सर्व साहित्यिकांनी एकत्र येत आंदोलन करण्याची गरज आहे, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केले.

नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी आलेले असताना काळे यांनी ‘मटा’शी संवाद साधला. या वेळी त्यांनी साहित्याबाबतची मते परखडपणे मांडली.

प्राचीनत्व, दर्जेदार साहित्य, बहुभाषिकत्व हे सारेच निकष मराठी अभिजात होण्यासाठी गरजेचे सांगण्यात आले होते. हे निकष केव्हाच पूर्ण करण्यात आले असून, आता केंद्राकडून खीळ बसलेली आहे. ज्ञानेश्वरी ९०० वर्षांपूर्वी होती, त्याआधीदेखील मराठी साहित्य होतेच, असे दाखले मिळतात. त्याआधी दीड हजार वर्षांपूर्वी मराठी भाषा केवळ अस्तित्वात नव्हती तर समृद्ध होती. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा तिला मिळायलाच हवा, असेही काळे म्हणाले.

सकस साहित्य निर्माण होत नाही या प्रश्नाचे उत्तर देताना काळे म्हणाले, की साहित्यिक त्याच्या जाणिवांशी प्रामाणिक असला पाहिजे. त्याच्या अनुभवविश्वाशी तो प्रामाणिक असला तर त्याला लिहिणे अवघड जात नाही. अनुभवासोबतच त्या गोष्टीचे ज्ञानही गरजेचे असते. तो जोपर्यंत वेगळ्या साक्षात्काराबाबत लिहीत नाही, तोपर्यंत जीवनानुभूती प्रकट होणार नाही. साहित्य संमेलनात होणाऱ्या वादांबाबत ते म्हणाले, की वादाशिवाय सत्याकडे जाताच येत नाही. आपल्याला निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी वाद हा घालावा लागतो. दुसऱ्याशी वाद घालायचा नसेल तर स्वत:च्या मनाशी तरी वाद घातला पाहिजे. हल्ली समीक्षेकडे कुणी वळत नाही, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, की त्यासाठी व्यासंग लागतो. ललित, कथा, कादंबरी लिहिणे सोपे असते. समीक्षा ही फार अवघड बाब आहे. त्यासाठी अभ्यासोनीच प्रगटावे लागते. त्यामुळे या प्रांतात येणाऱ्यांची संख्या कमी आहे, तसेच समीक्षेकडे आजही एक प्रकारच्या तुच्छतेने पाहिले जाते. हा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत अभ्यासू समीक्षेकडे वळणार नाहीत.

समीक्षक कसा हवा, या प्रश्नाचे उत्तर देताना काळे म्हणाले, की समीक्षक परखडच असायला हवा. केवळ गुडीगुडी कौतुक कोणीही करेल आणि नको तितके ताशेरे कुणीही ओढेल; परंतु स्थिर समीक्षा करणारे आज कमी आहेत. एखाद्याला झोडायचे म्हणून झोडून काढतात आणि एखाद्याला डोक्यावर घ्यायचे म्हणून उचलून घेतात, असे न करता परखड भाष्य करता आले पाहिजे, असेही काळे म्हणाले.

साहित्यिक राजकीय लोकांच्या विरोधात बोलत का नाही, या मुद्द्यावर काळे यांचे मत विचारले असता, साहित्यिकाला असे वाटते, की त्याचे ज्या प्रश्नाशी नाते आहे, त्याचविषयी तो बोलतो. त्याला वाटले पाहिजे, की या देशातील प्रश्न त्याचे आहेत. ग्राम‌ीण, दलित, आदिवासी साहित्याने बऱ्यापैकी हा स्टँड घेतला आहे. लेखक नाटकी आहेत. त्यामुळे रटाळ साहित्य निर्माण होते आहे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे, असेही काळे म्हणाले.

‘कितीही खर्च होवोत, साहित्य संमेलन हवेच!’

विश्वसाहित्य संमेलन भरवायला हवीत का, या प्रश्नाचे उत्तर देताना काळे म्हणाले, की गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर, प्रादेशिक पातळीवर आणि विश्व पातळीवर संमेलन कोणतेही असो, भरवायलाच हवे या मताचा मी आहे. खर्च होईल ना, होऊद्यात. इतर ठिकाणी खर्च होतोच आहे. ऑलिम्पिकला कोटी रुपये खर्च होतात, परंतु ते आपण बंद करतो का? आणि असेही संमेलनाचा खर्च अमेरिकेतील भारतीयांकडून उचलला जात असेल तर काय हरकत आहे संमेलने भरवायला? त्यामुळे मराठीचाच झेंडा सातासमुद्रापार जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिला दिवस नवलाईचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँडचा गजर, वर्गशिक्षिकांनी केलेले औक्षण, गुलाबाच्या फुलाने झालेले स्वागत, पहिल्याच दिवशी हातात मिळालेली नवी कोरी पुस्तके अन् हा दिवस आणखी आनंदी करायला मिळालेला गोड खाऊ.. अशा चैतन्यमयी वातावरण शहरातील शाळा दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्यानंतर गुरुवारी, १५ जूनला उघडल्या. सुट्ट्यांमुळे शांत असलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजून गेल्या. नव्यानेच शाळेत गेलेल्या चिमुकल्यांना मात्र रडू कोसळले.
मोठ्या सुट्टीनंतर शाळा सुरू होणार असल्याने शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने आदल्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली होती. परिसरात पताका लावण्यात आल्या होत्या. शाळेच्या अंगणात रांगोळ्या काढण्यात आल्या. तसेच फळेही सजवण्यात आले होते. शाळा स्वच्छ करुन चकाचक करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आनंददायी करण्यासाठी शिक्षकांनी जोरदार तयारी केली होती. सुटीमध्ये अनेक शाळांनी रंगरंगोटीची कामेही पूर्ण केली होती. त्यामुळे आपली नव्या रंगांमधील शाळा पाहून तर विद्यार्थीवर्ग एकदम आनंदात होता.
नव्यानेच शाळेत घातलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेच्या पहिल्या दिवशी आवर्जुन उपस्थित होते. आपल्या मुलाचा, मुलीचा शाळेतील पहिल्या दिवसाचे साक्षीदार आपण व्हावे, या इच्छेने पालकांनी हजेरी लावली होती. तर पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांना सोडून एकटे जायचे असल्याने चिमुकल्यांना रडू कोसळले. कधी एकदा शाळेतून बाहेर पडू याची वाट पाहत त्यांनी शाळेचा पहिला दिवस पूर्ण केला. पहिलाच दिवस असल्याने सकाळ व दुपार सत्र दोन्ही शाळा अर्धा वेळच सुरू होत्या. आजपासून (१६ जून) अभ्यासक्रमाला नियमित सुरुवात होणार आहे.

पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस चालना देण्यासाठी पहिल्याच दिवशी त्यांच्या हाती पुस्तक देण्याचे नियोजन आखण्यात आले होते. त्यानुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके देण्यात आली. मुख्याध्यापकांनी प्रातिनिधीक स्वरुपात काही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमात पुस्तके दिली. त्यानंतर वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. याशिवाय, यशस्वी शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी मार्गदर्शनही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांकडून प्रशासनाची पाठराखण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळापूर्व कामांमध्ये प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बुधवारी शहर वेठीस धरले गेले असताना, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मात्र गुरुवारी प्रशासनाची पाठराखण केली. पावसामुळे शहरातील काही भागांत बिकट परिस्थिती ओढावली असताना गुरुवारी महापौरांनी अधिकाऱ्यांची बैठक घेवून या स्थितीचे खापर प्लास्टिक पिशव्या आणि पावसाळी गटार योजनेच्या वहनक्षमतेवर फोडले. भाजपचे गटनेते आणि सभागृहनेते नाले सफाईचे काम केले नसल्याचा आरोप करत असताना महापौर रंजना भानसी यांनी मात्र प्रशासनाला काम झाल्याची पावती दिली. त्यामुळे पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महापौरांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बुधवारी दोन तास चाललेल्या मुसळधार पावसाने शहराची चांगलीच धूळधाण उडाली. पावसाळापूर्व कामे पालिकेने केली नसल्याने शहरातील सखल भागासह जुने नाशिक, सराफ बाजार व पंचवटीतल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबून पुरासारखी स्थिती निर्माण झाली होती. दुकाने आणि घरांमध्ये पाणी घुसल्याने लाखोंचे नुकसान झाले. विशेष म्हणजे पालिकेने चारशे कोटी रुपये तयार करून उभारलेली पावसाळी गटार योजनाही कूचकामी ठरली आहे. शहरात निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील आणि गटनेता संभाजी मोरुस्कर, शहर अभियंता यू. बी. पवार, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वप्रथम पावसाळी गटार योजनेबाबत जाब विचारण्यात आला. तो यू. बी. पवार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलने टोलवला.
पावसाळी गटाराची वहन क्षमता ही तासाला २७.५० मिलिमीटर पाऊस वाहून नेण्याची आहे. प्रत्यक्षात बुधवारी ९२ मिलिमीटर पाऊस झाल्याने पाणी साचल्याचा दावा पवार यांनी केला. तर गटारींमध्ये व चेंबर्सवर प्लास्टिक पिशव्या अडकल्याने पाणी रस्त्यावरच तुंबल्याचा जावईशोध पवारांनी लावला. आरोग्य विभागाकडून पिशव्या उचलण्याचे काम सुरू असल्याचा दावाही यावेळी आरोग्य विभागाने केला. अधिकाऱ्यांच्या या उत्तराला महापौरांनीही मम म्हणत प्रशासनाला एक प्रकारे क्लिनचीट देऊन टाकली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दिनकर पाटील यांनी नियोजन नसल्याने जनतेचे हाल होत असल्याचा आरोप केला. पदाधिकारी प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत असताना महापौर अधिकाऱ्यांची पाठराखण करत असल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावले. पंधरा दिवसांपूर्वीच आपण नालेसफाई करण्याचे आदेश दिल्याचा दावा करीत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रशासन काम करत आहे ना, असा जप त्यांनी बैठकीत केला. बैठकीनंतर नुकसान झालेल्या सराफ बाजाराची पाहणी करून सोपस्कारही पार पाडले.

पदाधिकाऱ्यांमध्येच विसंवाद
सभागृहनेते दिनकर पाटील आणि गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी बैठकीतच नालेसफाई केली गेली नसल्याचा दावा केला. त्यावर यू. बी. पवार यांनी कामांचे फोटो दाखवतो असे सांगत पावसाळीपूर्व कामे केल्याचा दावा केला. उपमहापौर प्रथमेश गिते यांनीही परिस्थिती वाईट असल्याचे मान्य केले. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी मात्र कामे झाल्याचा दाखला देत, प्रशासनाला क्लिनचीट देऊन टाकली. त्यामुळे गटनेते व सभागृहनेतेही तोंडघशी पडले. महापौरांच्या या पावित्र्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या.

नालेसफाईचे गौडबंगाल
शहरात दरवर्षी पावसाळापूर्व कामे करण्यासाठी जाहीर निविदा काढून काम दिले जाते. यावेळी मात्र या प्रक्रियेला फाटा देण्यात आला. जवळपास तीने ते चार कोटींच्या कामांची प्रभागानुसार विभागणी करण्यात आली. आयुक्तांच्या अधिकारांमध्ये थेट प्रभागानुसार ठेका देण्यात आला. त्यामुळे ३१ ठेकेदार नियुक्त करण्यात आले. चार महिने सफाईचे काम सुरू राहणार असल्याचा दावा पवार यांनी केला. मात्र, प्रत्यक्षात शहरात कुठेच काम झाले नसल्याचा दावा सत्ताधारी नगरसेवक करत असताना प्रशासनाकडून मात्र काम झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे पावसाळापूर्व नालेसफाईच्या गौडबंगालाचे गूढ वाढले आहे.

नैसर्गिक नाल्यांवर मौन
पावसाळी गटार योजनेची वहन क्षमता नसली तरी, शहरातील नैसर्गिक नाल्यांचे काय झाले, असा प्रश्न विचारल्यावर महापौरांसह अधिकाऱ्यांचीही बोलती बंद झाली. अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवरच बांधकाम झाले आहे. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. नैसर्गिक नाले बंद झाल्याने आणि अवैध बांधकामामुळे पावसाचे पाणी गटारीत जाण्याऐवजी थेट रस्त्यावरच येऊन तुंबले. यावर महापौरांसह अधिकाऱ्यांनी मौन बाळगत प्लास्टिक व वहन क्षमतेची जपमाळ कायम ठेवली. विशेष म्हणजे शहरात किती नैसर्गिक नाले आहेत, याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध नव्हती.
पावसाळापूर्व कामांत भ्रष्टाचाराचा आरोप
पहिल्याच पावसात शहराचा तलाव झाला असताना, महापौरांकडून केली जाणारी प्रशासनाची भलामण संशयास्पद असून, पावसाळापूर्व कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. मे महिन्यातच पावसाळापूर्व कामे होणे अपेक्षित असतानाही ते झाले नसल्याचा दावा करत, या कामांची आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी बोरस्ते यांनी केली. पावसाळी पाण्याचा प्रश्नही प्रशासन सोडवू शकत नसल्याने सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील नाल्यांची सफाई पारदर्शक न झाल्याचा आरोप करत, महासभेत लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली.
बुधवारी शहरात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेली स्थिती सत्ताधारी व प्रशासन हाताळण्यास अपयशी ठरल्यामुळे शिवसेनेने गुरुवारी भाजपची कोंडी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपवर हल्लाबोल केला. पहिल्याच पावसात भाजपच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडल्याचे ते म्हणाले. पावसाळापूर्व कामे मे महिन्यातच होणे अपेक्षित होते. परंतु, ऐनवेळी ३१ प्रभागांत काम वाटून देण्यात आले. नालेसफाई, चेंबर्स दुरुस्तीसह स्वच्छतेचे विषय स्थायी समितीवर येऊन मंजूर केले गेले नाहीत. याउलट भूसंपादनासारखे मलिद्याचे विषय वारंवार स्थायीवर का आणले जातात, यावर त्यांनी आक्षेप घेतला. शहराचा तलाव होण्याची गोम यात असल्याचे सांगून स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना प्रशासन पावसाळी पाण्याचाही प्रश्न सोडवू शकत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याचा जाब प्रशासनाला विचाणार असल्याचे ते म्हणाले.

नालेसफाई ‘पारदर्शक’
यावेळी बोरस्ते यांनी भाजपच्या कारभारावर बोट ठेवले. शहराचा पहिल्याच पावसात तलाव झाला असताना प्रशासनाने नालेसफाई व स्वच्छता पारदर्शक झाली तर नाही ना, असा चिमटा काढला. प्रशासनावर अंकुश नसणे हे सत्ताधारी भाजपचे अपयश असून, भाजपचे आमदार नागरिकांना मदत करण्याऐवजी प्रशासनातील अधिकाऱ्यांना घेऊन फिरत होते असा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या या ‘पारदर्शक’ कारभाराचा जाब आपण विचारणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीची तक्रार
पावसाळापूर्व कामांवरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन शहरात तातडीने नालेसफाई व स्वच्छता करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार व नगरसेवकांनी पावसाळापूर्व कामे झालीच नसल्याचा आरोप करत तातडीने पावसाळी गटार योजनेची तपासणी आणि नालेसफाई मोहीम हाती घेण्याची मागणी केली. पावसाची तीव्रता जास्त असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे कारण आयुक्तांनी दिल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

तीन दिवसांत नालेसफाई करा
पहिल्याच पावसात शहराची दैना उडाल्यानंतर व प्रशासनाच्या कामावर चौफेर टीका झाल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. पावसाची तीव्रता जास्त असली तरी, सर्व परिस्थितीला पालिकाच जबाबदार असल्याची कबुली आयुक्तांनी दिली. तीन दिवसांत शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई तातडीने करण्याचे फर्मान त्यांनी काढले. दरम्यान, पावसाळी गटार योजनेवर अतिक्रमण झाले असून ते तातडीने काढण्याचे निर्देशही दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पहिल्या पावसात कचरा वाहून येत असल्याने चेंबर्स ब्लॉक होत असले तरी, परिस्थितीची जबाबदारी पालिकेची असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. हॉकर्स, गाळेधारकांमुळे पाणी अडवले जात असल्याने हे अतिक्रमण तातडीने काढण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रितपणे काम करून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले.

आयुक्तांना ठेवले अंधारात
सार्वजनिक बांधकाम विभागाने यावेळेस नालेसफाईचे एकत्रित काम देण्याऐवजी प्रभागानुसार काम दिले आहे. विभागाच्या या प्रकारावर आयुक्तांनीही संताप व्यक्त केला असून, असे उद्योग का करतात असा जाब विभागाला विचारला आहे. या सर्व कामांचे केंद्रीकरण करण्याऐवजी प्रभागानुसार वाटणी केल्यावरुन त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅप ओळखणार स्वभाव

$
0
0

नाशिक : नात्या-गोत्यांपासून तर सामाजिक आणि व्यावसायिक संबंधांवर प्रभाव टाकणाऱ्या मानवी स्वभावाचे सूक्ष्म विश्लेषण करणारे अनोखे अॅप नाशिकच्या वेदांशू पाटील या युवकाने विकसित केले आहे. ‘डिज‌िटल हॅण्ड रायटिं अँड ड्रॉईंग अॅनालिसीस’ असे या अॅपचे नाव आहे. माणसाच्या व्यावहारिक यशाचा समतोल साधण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणार असल्याचा वेदांशू याचा दावा आहे.

वेदांशू पाटील हा मूळचा अमळनेर येथील रहिवासी आहे. सध्या तो नाशिकमध्ये वास्तव्यास असून बिझनोफेअर्स या संस्थेचा तो संचालक आहे. सिंगापूरमधून त्याने व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील ‘इंटरनॅशनल इन्स्ट‌िट्यूट ऑफ ग्राफालॉजी’ या संस्थेतून त्याने ग्राफालॉजी या विषयाचा डिप्लोमा केला. या शिक्षणातून अक्षरविश्लेषणाच्या जडलेल्या छंदातून त्याने या अॅपची निर्मिती केली आहे.

मानवी स्वभावाचे गूढ कंगोरेही केवळ त्याच्या अक्षरातून उलगडले जाऊ शकतात. शास्त्राधारित अक्षर विश्लेषणातून माणसाच्या भूत, भविष्य अन् वर्तमान काळाविषयीही आडाखे बांधता येतात. या शास्त्राला कुठलाही पारलौकीक किंवा अध्यात्मिक विषयाचा आधार नसून केवळ अक्षर विश्लेषणाच्या तंत्रावर अन् संशोधनावर हे अॅप काम करते अशी माहितीही वेदांशू याने दिली. करिअरची दिशा, व्यवहार, मैत्री, राजकीय संबंध आदी आव्हानात्म प्रश्नांवर अक्षर विश्लेषणाव्दारे तोडगा काढता येऊ शकतो, असाही त्याचा दावा आहे.

डिज‌िटल फिल्म फेस्ट‌िव्हल भरविणार

अनोख्या अॅपच्या निर्मितीसोबतच वेदांशू वेगळ्या स्वप्नासाठी प्रयत्नरत आहे. अनेकदा सृजनात्मक कलाकृती व कलावंतांना योग्य व्यासपीठ न मिळाल्याने त्यांची कला जगासमोर येत नाही. या कलावंतांना ग्लोबल व्यासपीठ देण्यासाठी डिज‌िटल फिल्म फेस्ट‌िव्हल भरविण्याचा वेदांशू पाटील याचा प्रयत्न आहे. यासाठी त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व नेत्या सुप्रीया सुळे यांनाही या फेस्ट‌िव्हलच्या आयोजनासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीव्हीचा रिमोट न दिल्याने पत्नीची दगडाने ठेचून हत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | नाशिक

टेलिव्हिजन पाहण्याचं वेड माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतं याचं अंगावर काटा आणणारं प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलं आहे. टीव्हीचा रिमोट मागितल्यावर तो न दिल्याने पतीने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिकच्या सिडको भागात दत्तनगर येथे राहणाऱ्या शोभा पांडूरंग मनवत्कर (३२) या महिला घरी टीव्ही पाहात असताना तिच्या पतीने तिच्याकडून रिमोट मागितला. मात्र, शोभा यांनी नकार दिल्यानंतर झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिच्या हत्या केली. धक्कादायक गोष्ट अशी की घटना घडली त्यावेळी त्यांच्या तीन मुली घरातच होत्या. अंबड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला असून पहाटे चार वाजत्या सुमारास ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ते’ फोटो हटविण्यासाठी १४५ पोर्नसाइट्चा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रेमाचे आमिष दाखवत मुलींचे अश्लिल फोटो काढून ते पोर्नसाइट्सवर अपलोड करणाऱ्या संशयित आरोपीचे आणखी कारनामे समोर आले आहे. संशयिताने पीडीत तरुणीचे फोटो तब्बल १४५ पोर्नसाइट्सवर अपलोड केल्याचे पोलिसांनी शोधून काढले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोर्टात अर्ज सादर केला असून, सदर फोटो काढून टाकण्यासाठी इंडियन कम्प्युटर इर्मजन्सी रिसपॉन्स टीमची (सीईआरटी-इन) पोलिस मदत घेणार आहेत.

अक्षय श्रीपाद राव (२७, रा. खोडेनगर, आठवण हॉटेलजवळ, इंदिरानगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. बीसीएसचे शिक्षण घेतलेला राव आयटी कंपनीत कामास आहे. त्याचे आईवडील दुबई येथे असून, तो एकटाच नाशिकमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वी २५ वर्षीय तरुणीस विवाहाचे आमिष दाखवून घरी बोलावून तिचे फोटो छायाचित्रे काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रावला १३ जून रोजी अटक झाली होती. अटकेनंतर कोर्टाने त्यास १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, गुरूवारी (दि.१५) आणखी एका तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला. मूळ नाशिकची ही तरुणी मुंबईत नोकरी करते. एमबीएचे शिक्षण घेतलेल्या या तरुणीशी अक्षयने प्रेमसंबंध प्रस्थापित करीत लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. या दरम्याने त्याने मुलीचे अश्लिल फोटो काढले. परंतु नंतर दोघांत वाद झाला. लग्नास अक्षयने नकार दिल्याने त्या तरुणीने नाशिक सोडले. मात्र, अक्षय सतत फोन करून तिला पुन्हा घरी बोलवत होता. स्पष्ट नकार दिल्यानंतर अक्षयने आपल्याकडील तरुणीचे फोटो तब्बल १४५ पोर्नसाइट्सवर अपलोड केले. याची कुणकुण संबंधित तरुणीपर्यंत पोहचली. त्यातच पहिल्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अक्षयचा लॅपटॉप, मोबाइल आणि इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले. त्यातही अनेक गंभीर बाबी स्पष्ट झाल्या.

याबाबत सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की संशयिताच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार होती. तत्पुर्वीच आणखी एक तरुणीची तक्रार समोर आली. त्यानुसार, अक्षयच्या पोलिस कोठडीची वाढ करण्याची विनंती कोर्टाकडे केली. कोर्टाने अक्षयच्या कोठडीत सोमवारपर्यंत (दि. १९) वाढ केली आहे. संशयिताने सदर फोटो १४५ पोर्नसाइट्वर प्रसिध्द केले. आणखी शोध घेतला जात आहे. या पोर्नसाइट्सच्या संख्येत वाढ होऊ शकते.

कोर्टाचा आदेश अन् ‘सीईआरटी’ची मध्यस्थी
जगभरात पोर्नसाइट्ची संख्या लक्षावधी आहे. त्यावरील मजकूर हटवण्यासाठी स्थानिक कोर्टाचा आदेश महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीकोनातून पोलिसांनी कोर्टात अर्ज केला आहे. कोर्टाचा आदेश मिळाल्यानंतर तक्रारीची एक प्रत सोबत जोडून ती माहिती इंडियन कम्प्युटर इर्मजन्सी रिसपॉन्स टीमकडे (सीईआरटी-इन) पाठवण्यात येईल. ही संस्था माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अख्यात्यारित येते. कोर्टाच्या आदेशानुसार नोडल एजन्सी म्हणून सदर संस्था संबंधित वेबसाइट्सवरील फोटो किंवा व्हिडिओ काढून टाकण्याचे व्हर्चुअल आदेश संबंधित वेबसाइट्सला देते. दोन देशातील सामजस्य करारानुसार या संस्थेचे आदेश पाळले जातात.

संशयिताने संबंधित तरुणीचे जाणीवपूर्वक फोटो पोर्नसाइट्सवर टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसते. अशा प्रकारे त्याने आणखी कोणाची फसवणूक केल्याची शक्यता नाकरता येत नाही. असे असल्यास संबंधितांनी त्वरित सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधवा.
- अनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांना’ भोवणार ‘मानव विकास’ गैरव्यवहार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिमागास भागाचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मानव विकास कार्यक्रमात निधीचा गैरवापर केल्यास त्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा मानव विकास विभागाचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी दिली आहे. निधीचा गैरवापर करणाऱ्या मुख्याध्यापक आणि सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य, शिक्षण व उत्पन्नवाढीचा निर्देशांक वाढावा यासाठी जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, कळवण, दिंडोरी, बागलाण, नांदगाव या आठ तालुक्याची निवड केली. या कार्यक्रमातंर्गत आतापर्यंत ५६ बसेस व तीन वर्षात १३ हजार ९० मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे. तसेच आरोग्य व शैक्षणिक निर्देशांक वाढावा यासाठी नऊ योजनाही राबवल्या जात असून २०१६-१७ मध्ये यासाठी १८ कोटी २४ लाख रुपये खर्च करण्यात आले. या कार्यक्रमातंर्गत येणाऱ्या निधीतून तीन महिन्यात इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रक येथे अंगणवाडी बांधकामात अपहार केल्यामुळे सरपंचाविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील ४९ पात्र लाभार्थी मुलींना संस्थेच्या आडमुठेपणामुळे निधी वितरित करता न आल्यामुळे येथील मुख्याध्यापकावर कारवाई केली आहे. अशाच पध्दतीची कारवाई या योजनेच्या निधीत केल्यास किंवा त्याच्या वितरणात दुर्लक्ष केल्यास केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये वितरित केला जाणारा हा निधी त्याच कामावर व्हावा व त्यात गैरव्यवहार होऊ नये याची काळजी संबंधितांनी घ्यावी; अन्यथा त्याविरूध्द कडक कारवाई करणार आहे. या कार्यक्रमातंर्गत गर्भवती मातांची व बालकांची आरोग्य तपासणी करणे, दारिद्र्य रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरीचे वाटप करणे, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये सुरु असलेल्या अभ्यासिकांसाठी आवर्ती खर्च देणे, बालभवन विज्ञान केंद्रासाठी आवर्ती खर्च देणे, कस्तुरबा गांधी बालिका योजनेची व्याप्ती १० पर्यंत वाढवणे, आठवी ते बारावी पर्यंत गरजू मुलींना सायकल वाटप करणे, बससेवा सुविधा देणे, बीजभांडवल म्हणून अर्थसहाय्य करणे या योजनांचा समावेश आहे. या योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्या यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मागास भागातील मानव विकास निर्देशांक वाढावा यासाठी मानव विकास कार्यक्रम राबवला जातो. काही ठिकाणी या कार्यक्रमाचा निधीचा गैरवापर होतो. त्यात अद्यापपर्यंत एक प्रकरण समोर आले आहे. निधीचा गैरवापर केल्यास कडक कारवाई केली जाईल.

- प्रतापराव पाटील,
जिल्हा नियोजन अधिकारी, मानव विकास


तीन वर्षात सायकलसाठी वाटप केलेला निधी

शैक्षणिक वर्ष......शाळांची संख्या....लाभार्थी मुलींची संख्या.....वितरित निधी (लाखात)
२०१३-१४................२०८...........४,८५१......................१४५.५३
२०१५-१६................२०४...........३,९०१......................११७.०३
२०१६-१७................१९३...........४,३३८......................१३१.६१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदनचोरांची टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको/ देवळाली कॅम्प

पाथर्डीगाव परिसरात गस्त घालत असताना इंडिका कारमधून संशयितरित्या पळ काढणाऱ्या पाच जणांना इंदिरानगर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे जेरबंद केले. संबंधित पाचही जणांनी इंदिरानगरमधील विरोज सोसायटीसह देवळाली कॅम्पमधील लीलावती सॅनेटोरियममधील चंदनाच्या झाडांची तोड केली.

सेामनाथ मधुकर कुर्हाडे, सचिन मधुकर कुर्हाडे, गणेश भानुदास कुर्हाडे, कैलास भानुदास कुर्हाडे आणि अनिल अशोक कुर्हाडे अशी अटक करण्यात आलेल्या पाच संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विराज सोसायटीतील सिक्युरिटी संजय बाबुलाल भावसार आणि मोहनभाई गोहल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनुक्रमे इंदिरानगर आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची मध्यरात्रीच्या सुमारास पाथर्डी गाव-पाथर्डी रस्त्यावर गस्त सुरू होती. याचवेळी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कार (एमएच १६ एबी १६२३) संशयितरित्या जात असल्याचे पोलिसांना आढळले. त्यांनी कार अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कारचा वेग वाढवत भरधाव वेगाने निघून जाण्याची घाई केली. पोलिसांनीही पाठलाग करीत कार थांबविली. यावेळी कारमधील पाचही जणांनी गाडी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी मुसक्या आवळत त्यांना इंदिरानगर पोलिस ठाण्यात आणले. कारची तपासणी केली असता गाडीत पिस्तुलसह, दोन कुऱ्हाडी आणि झाडे कापण्याच्या करवती आढळून आल्या. संशयित पाचही आरोपींनी चंदनाच्या झाडाची कत्तल करून चोरी केल्याचे समोर आले.

सिक्युरिटी गार्डला मारहाण

विराज सोसायटीतील सिक्युरिटी संजय बाबुलाल भावसार यांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित पाचही जणांना विराज सोसायटीत चंदनाच्या झाडाची कत्तल करीत असल्याचे भावसार यांनी बघितले होते. त्यांनी झाड तोडण्यास मज्जाव केला. मात्र, संशयितांनी भावसार यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील आठशे रुपये काढून घेतले आणि इंडिका गाडीतून पळ काढला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

देवळालीवासीयांची सक्रियता

देवळाली कॅम्प : लामरोड भागातील लीलावती सॅनेटोरियममध्ये मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चंदनाचे झाड तोडले जात असल्याचे स्थानिक रहिवासी मंगेश शिंदोडे, नेताजी धुर्जड यांना आढळले. त्यांना याबाबत देवळाली कॅम्प पोलिसांना तातडीने कळविले. पोलिस ठाण्यात रात्रपाळीवर असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय राठोड, पोलिस हवालदार महेंद्र साबरेकर, गणपत मुठाळ, पोलिस शिपाई हांडोरे, सातपुते आदींनी चंदनचोरांचा पाठलाग केला. देवळाली कॅम्प पोलिसांच्या तावडीतून सुटू पाहणारे चंदनचोर अखेर इंदिरानगर पोलिसांच्या तावडीत सापडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगीचे दर्शन ४ दिवस राहणार बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर भगवती मंदिर परिसरात संरक्षक जाळीत अडकलेल्या दगडांना बाजूला करण्यासाठी रेस्क्यू टीम मंगळवापर्यंत येणार आहे. त्यामुळे बुधवार (दि. २०)पासून सलग चार दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेंज यांनी दिली. उत्तराखंडच्या टीमसह स्पेनहून काही तंत्रज्ञ या कामासाठी येणार आहेत.

सोमवारी (दि. १२) सप्तशृंग गडावर भगवती मंदिर परिसरात पावसाच्या आगमनापूर्वी दरड कोसळली. संरक्षक जाळ्या बसविलेल्या असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर १३ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध‌िकारी आणि मेकॅबरी कंपनीचे संचालक यांनी परिस्थितीची पाहणी केली होती. कोसळलेल्या दगडांना बाजुला काढण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार असून, या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा लागणार आहे. या कामात कुठलाही धोका पोहोचू नये म्हणून २१ पासून सलग चार दिवस सप्तशृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवावे लागणार आहे. याबाबत देवस्थान प्रशासन व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. उत्तराखंड येथून रेस्क्यू टीम निघाली असून, मंगळवारपर्यंत ही टीम कळवण येथे पोहोचणार आहे. त्यानंतर कामाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मंदिर ट्रस्टला मंदिर सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत कुठलीही सूचना मिळालेली नाही.

उत्तराखंड येथील टीम मंगळवारपर्यंत आली तर बुधवारपासून दगड बाजूला करण्यात येतील. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येईल. चार ते पाच दिवस हे काम सुरू राहू शकते.
- सुरेंद्र कंकरेंज, कार्यकारी अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणमध्ये पेरणीला वेग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरासह तालुक्यात गत सप्ताहापासून दमदार पाऊस सुरू असल्याने यंदा खरिपाच्या पेरण्या वेळेवर होण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे बी-बियाणे, खते आदींच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ओस पडलेल्या बाजारपेठा फुलल्या आहेत. दरम्यान, परिसरात मका, सोयाबीन लागवडीला प्रारंभ झाला आहे.

मृग नक्षत्रास सुरुवात होवून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतरही पावसास प्रारंभ न झाल्यासने यंदाही पेरण्यांना उशीर होतो की काय, अशी चिंता सतावत होती. गत शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत. गतवर्षी मृग व आद्रा नक्षत्र कोरडी गेल्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना तब्बल महिनाभर लांबल्या होत्या. कोरडवाहू क्षेत्रावरील पिकांची लागवड उश‌िरा झाली होती. पेरण्या उशिराने झाल्यामुळे साहजिकच खरिप पिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. मगृ नक्षत्रास प्रारंभ झाल्यानंतर पावसाने डोळे वटारल्याचा परिणाम बाजारपेठेत स्पष्ट दिसत होता. बी-बियाणे खरेदीसाठी शेतकरी येत नसल्याने विक्रेतेही हतबल झाले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. यामुळे ओस पडलेल्या बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. मूग, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजारी आदी पिकांचे बियाणे, त्यासाठी लागणारी खते, पेरणीसाठी मोगे, घरे, गोठे, कडब्यांच्या गंज्या झाकण्यासाठी प्लास्टिकच्या ताडपत्र्या, लोखंडी पत्रे आदी खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.

सोयाबीन, मकाला अधिक पसंती

सोयाबीननंतर मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. गेल्या हंगामात मक्याला समाधानकारक भाव मिळाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी मका लागवडीकडे वळला आहे. मका पेरणीस आणि त्यानंतर मजुरीही कमी लागते. त्यामुळे यंदा तालुक्यात मक्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

सटाण्यात मात्र पाणीटंचाई

नगरपालिकेकडून चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा उद्भव विहिरी आटल्याने तब्बल सात दिवसांआड होऊ लागला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात जेमतेम हंडाभर पाणी येत असल्याने ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेगोंडा येथील गिरणा नदीपात्रात विहीर आहे. मात्र सध्या नदीपात्र कोरडेठाक आहे. नदीपात्रात चणकापूर धरणातील आवर्तन संपुष्टात आले आहे. तर पुनदचे एकमेव आवर्तन शहरवासीयांनी मे अखेरीस घेतल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. शहरातील आरमनदीपात्र देखील कोरडेठाक झाले आहे. केळझर धरणातील आवर्तन संपुष्टात येवून धरण कोरडेठाक झाले आहे. त्यात शहरातील नदीपात्रातील विहिरींमधील उद्भवदेखील बंद झाल्याने शहराला पाणीपुरठा करणारे सर्व स्त्रोत ठप्प झाले आहेत. शहरावर पावसाळ्यात पाणीटंचाईचे ढग घोंगावत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर पुन्हा शहरात दिसू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images