Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

योग प्रात्यक्षिकांनी जिल्हाभरात चैतन्य

$
0
0

टीम मटा, नाशिक

जिल्हाभरातील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांतर्फे योगासनांच्या प्रात्यक्षिकांसह विविध उपक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक संस्थांसह अन्य ठिकाणीही चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

मनमाड परिसर

छत्रे विद्यालयातर्फे महर्षी वाल्मीक क्रीडांगणावर प्रात्यक्षिके झाली. संस्थेचे पदाधिकारी दिनेश धारवाडकर, प्रसाद पंचवाघ, नाना कुलकर्णी, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे, उपमुख्याध्यापक आर. एन. थोरात, एस. व्ही. देशपांडे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला जोशी आदींच्या प्रमुख उपस्थितीत योग प्रशिक्षक सुनील ढमाले यांनी हजारो विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे धडे दिले. परिसरात अन्य संस्थांतर्फेही विविध उपक्रम झाले.

मालेगाव परिसर

मालेगाव ः मालेगाव शहर व परिसरात प्रात्यक्षिकांसह विविध उपक्रम झाले. पतंजली योग समितीतर्फे राधाकृष्ण मंदिर, टीव्ही सेंटर, मालेगाव कॅम्प येथे तीन दिवसीय योग शिबिर झाले. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, लायन्स क्लबच्या महिला सदस्या, आश्रमशाळा, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, बालविद्यानिकेतन शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संस्था, स्वामी विवेकानंद केंद्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेविका, योग विद्याधाम, क्रीडाभारती, योग्य साधक यांनी उपक्रमात सहभाग घेतला. अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, वन परिक्षेत्र अधिकारी कांबळे, विक्रीकर निरीक्षक मुळे उपस्थित होते. येथील र. वी. शाह विद्यालय, उज्ज्वल प्राथमिक विद्यालय व शिशुविहार, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, लिटल एंजल स्कूल, काकाणी विद्यालय, ल. रा. काबरा विद्यालय, गो. य. पाटील विद्यालय आदी शाळा, संस्थांमध्ये विविध उपक्रम झाले.

सटाणा, चांदवड, नांदगावला उत्साह

सटाणा ः येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे योग प्रात्यक्षिके सादर झाली. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी योगाचे महत्त्व विशद केले. राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी प्रा. तुषार खैरनार, डी. बी. ह्याळीज, सुभेदार नामदेव गुरव आदी उपस्थित होते. सटाणा परिसरात अन्य संस्थांतर्फेही विविध उपक्रम झाले.

चांदवड ः नेमिनाथ जैन संस्थेचे के. बी. जैन अभियांत्रिकी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे योगशिक्षक ए. बी. येवला यांनी योगासन प्रात्यक्षिके सादर केली. प्राचार्य डॉ महादेव कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय योग विद्या धाम चांदवड शाखा व स्वामी समर्थ अाध्यात्मिक केंद्रातर्फेही कार्यक्रम झाला. चांदवड परिसरातील नागरिकांना मोफत योग प्रशिक्षण देण्यात आले.

नांदगाव ः मविप्रच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रीडाशिक्षक प्रा. दिनेश उकिर्डे व प्रा. बी. पी. शिंदे यांनी योगाविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. आय. पटेल, उपप्राचार्य प्रा. संंजय मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. आर. टी. देवरे आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

महादेवपूर शाळा

येथील जिल्हा परिषद शाळेत योग दिनानिमित्त विशेष कार्यक्र झाला. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे मुलांना लहानपणीच योगाभ्यासाचा सराव व्हावा, या उद्देशाने मान्यवरांनी मार्गदर्शनपर माहिती विशद केली.

जि. प. शाळा, शिगवे बहुला

देवळाली कॅम्प ः शिगवे बहुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या योग प्रात्यक्षिकांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रारंभी शाळेचे क्रीडाशिक्षक संजय बोरसे यांनी मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. मुख्याध्यापिका कल्पना साळवे, बाळासाहेब टोचे, कैलास शेवाळे, माधवी साळुंखे, रत्नमाला बैरागी, संजय बोरसे आदी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा निर्यातीने मोडला विक्रम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा निफाड

मागील सात वर्षांच्या कांदा निर्यातीचा विक्रम मोडीत निघाला असून, जिल्ह्यातून प्रथमच देशातील कांदा निर्यातीमध्ये पहिल्यांदा ३५ लाख मेट्रिक टनांचा निर्यातीचा ऐतिहासिक असा विक्रम झाला आहे. जिल्ह्यातून प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होत असूनही कांदा उत्पादकांची झोळी रितीच राहत आहे. उत्पादन जास्त झाल्यामुळे दर कोसळतात त्यामुळे शेतकऱ्याला भाव मिळत नाही.

एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत देशाने ३५ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला आहे. निर्यातीचा हा आकडा 2015-16 च्या आर्थिक वर्षाच्या निर्यातीच्या तिप्पट आहे. नॅशनल अॅग्र‌िकल्चर को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९-१० आर्थिक वर्षात १८.७३ लाख मेट्र‌िक टन इतका कांदा निर्यात झाला होता.

या देशांत होते कांदा निर्यात

बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, कतार, कुवेत, मोरिशस, सौदी अरेबिया, बेहरिन, ओमान, व्हियेतनाम, सोशल रिपब्लिक, मालदीव, युनायटेड किंगडम, रियुनियन, थायलंड, ब्रुनेई, रशिया, ग्रीस, हाँगकाँग, पाकिस्तान, इटली, नेदरलँड, सेशल्स, कोमोरेझ, फ्रान्स, केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस् आदी देशांसह एकूण ७६ देशांना कांदा निर्यात केला जातो.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरपट्टी वसुलीत दुपटीने वाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने चालू वर्षात घरपट्टीची बिले वेळेत नागरिकांना पोहचवल्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत घसघशीत वाढ झाली आहे. पालिकेने सुरू केलेल्या सवलत योजनेचाही चांगला फायदा पालिकेला झाला असून, तीन मह‌िन्यांत पालिकेच्या तिजोरीत घरपट्टीपोटी ३५ कोटी ६४ लाख, तर पाणीपट्टीतून ५ कोटी १० लाख जमा झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत घरपट्टीची वसुली दुपटीने वाढली असून, पाणीपट्टीत एक कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत तिमाहीतच ४० कोटींची भर पडली आहे.

महापालिकेने चालू वर्षी घरपट्टीचे ११० कोटी तर पाणीपट्टीतून ५० कोटीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या वसुलीसाठी पालिका सरसावली असून, चालू वर्षी घरपट्टीच्या बिलाचे वेळेत वाटप करण्यात आले आहे. शहरातील मालमत्तांची संख्या ही चार लाखांच्या वर, तर नळ कनेक्श्नची संख्या ही दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या वर्षी निवडणूक कामांमुळे घरपट्टीची बिले नागरिकांना वेळेत मिळाली नाहीत. त्यामुळे वसुलीवर परिणाम झाला होता. परंतु, चालू वर्षी घरपट्टीची बिले नागरिकांना वेळेत पाठविण्यात आली. तसेच पालिकेने ग्राहकांसाठी सुरू केलेल्या सवलत योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पालिकेने एप्रिलमध्ये मालमत्ता कर भरल्यास ५, मेमध्ये भरल्यास ३ आणि जूनमध्ये भरल्यास २ टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

विकासकामांना आधार

चालू तिमाहीत २१ तारखेपर्यंत घरपट्टीतून पालिकेच्या तिजोरीत तब्बल ३५ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत १७ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले होते. यावर्षी वसुली दुपटीने वाढली आहे. चालू तिमाहीत पाणीपट्टीतून पालिकेच्या तिजोरीत ५ कोटी १० लाख रुपये जमा झालेत. गेल्या वर्षी चार कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे यावर्षी एक कोटी रुपये अधिक वसुली झाली आहे. पहिल्या तिमाहीत पालिकेच्या तिजोरीत जवळपास चाळीस कोटी रुपये जमा झाल्याने विकासकामांना मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान, पाणीपट्टी बिलांचे आऊटसोर्सिग करण्याचा विचार प्रशासनाने पुन्हा सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा घसरला अवघा सव्वा रुपये किलो

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी उन्हाळ कांद्याला १२५ रुपये प्रति क्विंटल म्हणजे सव्वा रुपये ‌किलो असा भाव मिळाला. या हंगामातील हा सर्वात नीचांकी दर आहे.

सोमठाण येथील भिका संपत पगार या शेतकऱ्याचा १२५ रुपये प्रति क्विंटलने म्हणजे १ रुपया २५ पैसे किलो या दराने विक्री झाला. या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. विक्रीसाठी आलेल्या २३ हजार क्विंटल विक्री झालेल्या कांद्याला कमाल ६५४ रुपये, किमान १२५ रुपये, तर सरासरी ५३४ रुपये इतका प्रति क्विंटल भाव मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाऊचा डबा होणार चविष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या चिमुकल्यांना दररोज डब्यात काय द्यावं, हा प्रश्न आता मिटणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या वतीने ‘आरोग्यदायी आणि चविष्ट खाऊचा डबा’ या अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वैविध्यपूर्ण, रुचकर आणि चिमुरड्यांना आवडणारे पदार्थ या कार्यशाळेत शिकायला मिळणार आहेत.

सकाळी लवकर उठून रोज पोळी भाजी किंवा फक्त पौष्टिक खाऊ देण्याचा शाळेचा नियम असला, तरी तोचतोचपणा मुलांसाठी कंटाळवाणा ठरतो. अशात मुलांच्या डब्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयांच्या मदतीला आला आहे. २५ जून रोजी ‘कल्चर क्लब’च्या वतीने आरोग्यदायी आणि चविष्ट खाऊचा डबा या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय.

येत्या २५ जून रोजी संध्याकाळी ३ ते ५ यावेळेत ही कार्यशाळा होणार असून, प्रिया करंदीकर यामध्ये खाऊचा पौष्टिक डबा बनवायला शिकवणार आहेत. ही कार्यशाळा सगळ्यांसाठी खुली असून, त्यासाठी प्रवेशमूल्य आहे. कल्चर क्लबच्या सदस्यांना प्रवेशमूल्यामध्ये सवलत मिळेल. कल्चर क्लबच्या सदस्यांना २०० रुपये तर सदस्य नसलेल्यांना ४०० रुपये प्रवेश मूल्य आकारले जाईल. अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था, पी. अँड टी. कॉलनी, हॉटेल सिब्बलजवळ, त्र्यंबक रोड येथे ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४ किंवा ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांझरा चौपाटीचे अतिक्रमण जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या काही वर्षांपासून धुळे शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या पांझरा चौपाटीवरील स्टॉलचे अतिक्रमण गाजत होते. याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकाही दाखल केली होती. त्यावर मंगळवारी (दि. २०) दुपारी कामकाज होऊन हे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. यावर प्रशासनाने लगेचच मंगळवारी मध्यरात्रीपासून पोलिस बंदोबस्तात स्टॉल हटविण्याची मोहीम सुरू केली. पांझरा नदीकाठावर आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या चौपाटीबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यापैकी ललीत वारुडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कामकाज होऊन कारवाईचे निर्देश मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

आमदार गोटे यांच्या प्रयत्नाने पांझरा नदीकिनारी चौपाटीजवळ खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सुमारे पन्नासहून अधिक स्टॉल उभारले होते. यातून बेरोजगारांना रोजगार मिळत होता. मात्र ही चौपाटी महापालिकेने बगीचासाठी आरक्षित केलेल्या जागेवर असल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आल्याने चौपाटी काढण्याचे आदेश झाले होते. त्यानंतर स्थगिती आदेश प्रशासनाला प्राप्त झाला होता. मात्र यावर पुन्हा औरंगाबाद खंडपीठात मंगळवारी न्यायालयाने चौपाटीवरील अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे रात्रीतून जिल्हा प्रशासनाने कारवाईला सुरुवात करीत सकाळी चौपाटीवरील अतिक्रमण जमीनदोस्त केले. ही कारवाई अपर तहसीलदार ज्योती देवरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे, मनपा उपायुक्त रवींद्र जाधव, अतिक्रमण निर्मूलन पथकातील नंदकुमार बैसाणे, मनपा बांधकाम अभियंता कैलास शिंदे व कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शहरातील पांझरा नदीकिनारी उभारण्यात आलेल्या चौपाटीवरील स्टॉल संदर्भात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयाचा आपण आदर करतो. मात्र चौपाटीवरील सर्व स्टॉल शासकीय जागेत असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे चौपाटीला लागून असलेल्या नानासाहेब उत्तमराव पाटील स्मारकाच्या जागेवर सर्व स्टॉल हलविण्यात येतील. या स्मारक समितीचा मी पदाधिकारी असून, ही जागा खासगी आहे.

- अनिल गोटे,

आमदार धुळे शहर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या ४५ सुविधा आता ऑनलाइन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांना विविध प्रकराच्या सुविधा एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी महापालिकेने १९ नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. या सुविधा केंद्रांनंतर पारदर्शक कारभाराच्या दिशेने पाल‌िकेने आणखी एक पाऊल टाकले आहे. जुलैपासून नागरिकांना महापालिकेकडून मिळणाऱ्या जवळपास ४५ नागरी सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. विविध करभरण्यासह, जन्म-मृत्यूचे दाखले, हॉस्प‌िटल परवाने, डॉग लायसन्ससह नगररचना विभागाच्या परवानग्यांसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. या परवानग्यांसाठी पालिकेचे उंबरठे झिजवण्याची आता आवश्यकता राहणार नाही. मुख्यमंत्र्याच्या हस्ते १ जुलैपासून या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर भरणा, विविध कर वसुली, नळजोडणी, डॉग लायसन्स, जन्म-मृत्यूचे दाखले, भोगवटा प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, बांधकाम परवानग्या, अग्निशमन दल परवाने, हॉस्प‌िटल्स नूतनीकरण दाखले अशा विविध प्रकारच्या ४५ सेवा दिल्या जातात. या प्रमाणपत्रांसाठी कागदपत्रे मुख्यालय किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी नागरिकांना या कार्यालयामंध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यातच या सेवांसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पैसे माग‌ितले जातात. त्यामुळे भ्रष्टाचारालाही वाव मिळतो. पारदर्शक कारभारासाठी नागरिक आणि महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील संवाद कमी करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शहरात येस बँकेच्या मदतीने १९ नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. त्यातून नागरिकांना एकाच छताखाली दाखले व परवानग्या दिल्या जात आहे. या केंद्रांना चागंला प्रतिसाद मिळत असून, जवळपास ७० हजार नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पारदर्शक कारभारासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.

जलद सेवा मिळणार

नागरिकांना दाखला मिळवण्यासाठी व अर्ज करण्यासाठी या केंद्रामध्ये यावे लागते. परंतु, आता अर्ज करण्यासह पैसे भरण्याचीही सुविधा ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे जलद सेवा मिळणार आहे. तसेच नगररचना, वैद्यकीय, आरोग्य विभागातील प्रमाणपत्रांसाठी पैशांची देवाणघेवाण होते. आता थेट संवादच होणार नसल्याने भ्रष्टाचारालाही चाप बसणार आहे.


पारदर्शक व गत‌िमान कारभारासाठी पालिकेचा कारभार डिज‌िटल करण्यात येणार आहे. ४५ सुविधा ऑनलाइन मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांसह पालिकेचाही फायदा होणार आहे.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीबी रुग्णाला आता औषधांसाठी अलार्म!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरात टीबीचा (क्षयरोग) पेशंट असला तर कुटुंबाला त्याच्या औषधोपचाराची चांगलीच काळजी घ्यावी लागते. रुग्णाला मोफत औषधोपचार मिळत असला तरी औषधोपचाराचे नियमित सेवन होत नसल्याने रुग्णांना प्रसंगी जीवही गमावावा लागतो. मात्र, नाशिक महापालिका आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून या रुग्णांच्या उपचार पद्धतीसाठी नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. या आयसीटी टूल सॉफ्टवेअरमुळे टीबीच्या रुग्णाला औषधोपचार थेट अलार्म घरबसल्या मिळणार आहे. सोबतच डॉट उपचारपद्धतीसाठी हे सॉफ्टवेअर अतिशय गुणकारी ठरणार असून, राज्यातील हा पहिलाच पायलट प्रोजेक्ट आहे. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास हा पॅटर्न देशभर लागू केला जाणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने टीबीच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी रुग्णांना मोफत औषधोपचार पद्धतीसाठी डॉट प्रोग्राम सुरू केला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी टीबीचा रुग्ण शोधून त्यावर उपचार करतात. सध्या हा औषधोपचार दिवसाआड केला जात आहे. मात्र, आता हा औषधोपचार दररोज करण्यात येणार आहे, तसेच रुग्णाला औषधांचे सेवन किती प्रमाणात कशा प्रकारे करायचे, यासाठी एका सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येत आहे. टीसीएस आणि महापालिकेच्या संयुक्त उपक्रमातून आयसीटी टूल सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून, यात थेट रुग्णांची परिपूर्ण माहिती ऑनलाइन साठवून थेट रुग्णाला औषधांसाठी अलार्म पाठविला जाणार आहे. त्यामुळे रुग्णाला वेळेवर औषधे घेता येणार असून, कोणती औषधे घ्यायची, याचीही माहिती पाठवली जाणार आहे. या सॉफ्टवेअरचे संशोधन अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर नाशिक शहरात सुरू केली जाणार आहे. सध्या शहरात दोन हजार टीबीचे पेशंट असून, त्यांच्यावर या सॉफ्टवेअरच्या मदतीने उपचार केले जाणार आहेत.

केंद्रीय पथकाची भेट

दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील टीबी रुग्णांसाठी आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या पाहणीसाठी केंद्राचे एक पथक दोन दिवसांच्या नाशिकच्या दौऱ्यावर आहे. या पथकाने गुरुवारी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला भेट देऊन टीबीच्या उपचारपद्धतीचा आढावा घेतला असून, पालिकेच्या कामकाजाला शाबासकीचे प्रशस्तिपत्र दिले आहे. पालिकेने झटपट निदानासाठी खरेदी केलेल्या सीबी नेट यंत्राचीही दखल पथकाने घेतली आहे. डॉट्स प्रोव्हायडर यांच्या उपक्रमाचीही दखल पथकाने घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबक नगराध्यक्षांचा राजीनामा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विजया दीपक लढ्ढा यांनी गुरुवारी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. शहराच्या विकास आराखड्यास आडकाठी होऊ नये म्हणून राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यासमवेत नगरसेवक संतोष कदम, धनंजय तुंगार, यशवंत भोये, स्वप्नील शेलार, नवनाथ कोठुळे, दीपक लढ्ढा कायकर्ते उपस्थित होते. विजया लढ्ढा यांच्या राजीनाम्याने उद्या शुक्रवारी त्र्यंबक नगरपालिकेत होणाऱ्या अविश्वास ठरावची सभा निरर्थक ठरणार असून, अविश्वास ठराव आणून शह देणाऱ्या विरोधकांचे मनसुबे फोल ठरले आहेत.

१७ जून रोजी नगरपरिषदेच्या १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन नगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष सभेची मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी, २३ जुलैला प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवली होती. मात्र अविश्वास ठरावाच्या आधीच लढ्ढा यांनी राजीनामा दिल्याने आता सभेचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नगराध्यक्षा भाजप असून, त्यांच्या विरोधातील नगरसेवकांचे गटनेते देखील भाजपचेच आहेत.

शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत निष्कारण वाद उपस्थित केले. माझ्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने आराखड्यात फेरबदल केल्याचे खोटे आरोप केले. विकासास आडकाठी नको म्हणून मी राजीनामा दिला आहे.

- विजया लढ्ढा, नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गानतंत्र’ला सप्तसुरांचा साज

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

वर्ल्ड म्युझिक डेनिमित्त महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे झालेली ‘गानतंत्र’ ही अनोखी स्पर्धा चांगलीच रंगली. नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले सर्वच स्पर्धकांचा उत्साह वाढविणारा ठरला. या अनोख्या स्पर्धेचा हा वृत्तांत...

या अनोख्या स्पर्धेची अंतिम फेरी बुधवारी (दि. २१) सायंकाळी ६ वाजता सेंट्रल मॉल, त्र्यंबक नाका येथे रंगली. त्यातील एकापेक्षा एक बहारदार गाण्यांनी नाशिककरांची सायंकाळ सूरमयी झाली. गोलमाल सिनेमातील ‘आनेवाला पल’ या गाण्याला प्रारंभ होताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. उदय कुलकर्णी यांच्या या गाण्याने स्पर्धेचा प्रारंभ झाला. त्यानंतर अनुजा ओढेकर यांच्या ‘सारा जमाना हसीनों का दिवाना’ या रिमिक्स व्हर्जनमधील गाण्याने प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला. स्मिता जोशी यांनी सुरेश भट यांची ‘रंगूनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ ही गझल सादर केली. अंतिम फेरीतील दहा स्पर्धकांनी त्यानंतर क्रमाक्रमाने गाणी सादर केली. यावेळी स्पर्धकांना मिरॅकी बँडची साथसंगत मिळाली.

सर्व स्पर्धकांच्या सादरीकरणानंतर परीक्षकांनी चार स्पर्धकांना पुन्हा एकदा गाण्याची संधी दिली. चार जणांच्या या मुखड्यानेही कार्यक्रमात आणखी रंगत आणली. त्यानंतर परीक्षकांनी सर्वांना उत्सुकता लागून राहिलेला स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला. गायिका सोनाली कुलकर्णी-वर्मा यांनी या अनोख्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. उदय कुलकर्णी यांनी द्वितीय, अनुष्का शहाणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर निशांत भोसले यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. त्यानंतर प्रेक्षकांच्या फर्माइशनंतर गानतंत्र स्पर्धेच्या विजेत्या सोनाली कुलकर्णी यांनी ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ हे गाणे सादर केले. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रथम तीन विजेत्यांना नंतर प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

---

परीक्षक म्हणतात...

शास्त्रीय संगीताला पर्याय नाही

प्रथमतः गानतंत्र स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन. सर्वांनीच उत्तम गाणे गायले, त्यामुळे विजेता निवडणे खरच खूप अवघड वाटत होते. प्रत्येक परीक्षकाचा स्वतंत्र अँगल असतो. पण, आम्ही मात्र एकमतानंतरच विजेते निवडले. गाणे गाताना स्केल आणि कोड्स यांचे महत्त्व ओळखून सराव केला पाहिजे. अन्य स्पर्धकांनी बक्षीस मिळाले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नये. शास्त्रीय संगीत प्रत्येकाने शिकले पाहिजे. शास्त्रीय संगीताला पर्याय नाही. गानतंत्र स्पर्धा पुढील वर्षीही आयोजित करावी, असे मला वाटते. सर्व विजेत्यांना व अंतिम फेरीत सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

-प्रा. अविराज तायडे, शास्त्रीय गायक

--

शास्त्रीय गायनातून अभ्यास गरजेचा

शास्त्रीय गायनातून स्वरांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शास्त्रीय संगीताचा जास्तीत जास्त अभ्यास केला, तरच सुगम संगीताची वाटचाल सुसह्य होते. कुठलीही कला आत्मसात करण्यासाठी मेहनत आवश्यक असते. शास्त्रीय संगीताचेही तसेच आहे. शास्त्रीय संगीत शिकताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबने आयोजित केलेली गानतंत्र ही स्पर्धा खरोखरच अप्रतिम होती. स्पर्धेतील विजेत्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

-रागिणी कामतीकर, गायिका

--

नवीन टॅलेंट ऐकायला मिळाले

अंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी उत्तम परफॉर्मन्स दिला. या स्पर्धेतून नवीन टॅलेंट पाहायला व ऐकायला मिळाले. उपस्थित प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसादही वाखाणण्याजोगा होता. ‘मटा’ने ‘गानतंत्र’सारखी स्पर्धा आयोजित करून युवा गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उत्तम प्रयत्न केला. ‘मटा’सोबत यापुढेही असे उपक्रम करायला आवडेल. स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचे रेकॉर्डिंग मी यूट्यूबवरदेखील टाकणार आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व ‘महाराष्ट्र टाइम्स’ला विशेष धन्यवाद!

-श्रीकांत नायर, प्रोग्रॅमिंग हेड, रेडिओ मिर्ची

--

गाणे मोजके व छान असावे

नाशिक शहरात सांस्कृतिक जडणघडण बळकट करण्याचे काम ‘महाराष्ट्र टाइम्स’ करीत आहे. केवळ बातम्या न देता नाशिककरांची सांस्कृतिक भूक भागवण्याचे कामही ‘मटा’ करीत आहे. उद्योग क्षेत्र असो वा राजकारण असो, सर्वच क्षेत्रांतील बातम्या निष्पक्ष पद्धतीने देण्याचा प्रयत्न ‘मटा’ने नेहमीच केला आहे. गाण्याच्या स्पर्धेला इतका प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. पण, स्पर्धेतील दोनशे एन्ट्रीज बघून आश्चर्य वाटले. गाणे मोजके व छान असायला हवे. जास्त हरकती न घेता पट्टी व सूर एकत्र ठेवत गाणे सादर केले पाहिजे.

-संजय गिते, संगीतकार तथा गायक

---

‘गानतंत्र’चे विजेते असे...

सोनाली कुलकर्णी-वर्मा (प्रथम क्रमांक)

उदय कुलकर्णी (द्वितीय क्रमांक)

अनुष्का शहाणे (तृतीय क्रमांक)

निशांत भोसले (उत्तेजनार्थ)

---

उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पर्धकांच्या सुरावटींचा उपस्थित प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. चीअर अप आणि टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण सेंट्रल मॉल दणाणला होता. गाण्यातील मुखड्यालाही उपस्थित रसिक दाद देत होते. नाशिककरांच्या सुरेल गायनाचा आस्वाद घेण्यासाठी यावेळी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केली होती. सेंट्रल मॉलचा पुढील पोर्च प्रेक्षकांनी तुडुंब भरला होता. ग्राहकही थांबून कार्यक्रमाचा आनंद घेत होते.

--

स्पर्धकांच्या गीतांना दाद

उदय कुलकर्णी, अनुजा ओढेकर, स्मिता जोशी यांच्यानंतर चंद्रशेखर देशपांडे यांनी ‘फुलों के रंग से, दिल की कलम सेे’, निशांत भोसले यांनी ‘मोह मोह के धागे’, ऋषिकेश सोनार यांनी ‘चंदा म्होरे’ ही गीते सादर केली. मनीषा पांडे यांनी ‘सँवार लू’ तर श्रेया पिसोळकर यांनी ‘ओ सजना बरखा बहार आयी’ हे परख सिनेमातील गाणे सादर केले. ‘रोलिंग इन दी डीप’ या अनुष्का शहाणे यांनी गायलेल्या इंग्लिश गीताला सर्वांनीच दाद दिली. स्पर्धेच्या विजेत्या सोनाली कुलकर्णी-वर्मा यांनी सादर केलेल्या मुसाफिर सिनेमातील ‘जिंदगी में कोई कभी आये ना रब्बा’ या गाण्यालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

--

२०० ते अंतिम ३...

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबने ‘गानतंत्र’ स्पर्धेसाठी इमेलद्वारे एन्ट्रीज पाठविण्याचे आवाहन केल्यानंतर तब्बल २०० इच्छुकांनी आपल्या एन्ट्री पाठवल्या. या सर्व एन्ट्रीजचे गायक निशांत गिते व सुमंत यांनी परीक्षण करून २० जणांची निवड केली. त्यानंतर या २० जणांचा स्डुडिओ राउंड १९ जूनला रेडिओ मिर्चीच्या स्टुडिओत पार पडला. या २० जणांमधून परीक्षक अविराज तायडे, श्रीकांत नायर व संजय गिते यांनी अंतिम फेरीसाठी १० जणांची निवड केली. याच १० स्पर्धकांतून मग अंतिम ३ विजेते निवडले गेले. अशाप्रकारे गानतंत्र स्पर्धेचा २०० ते अंतिम ३ असा प्रवास पार पडला.

---

विजेत्यांना रेकॉर्डिंगची संधी

परीक्षक संजय गिते हे विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या स्डुडिओत गाणे रेकॉर्ड करून देण्याची संधी देणार आहेत.

त्याचप्रमाणे श्रीकांत नायर हे स्पर्धकांच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग ‘यूट्यूब’वर टाकणार आहेत. त्यामुळे या अनोख्या स्पर्धेद्वारे नवोदितांना आणखी व्यासपीठ खुले झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारक महापालिकेच्या रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टी वसुलीसोबतच आता पालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे थकलेले भाडे वसुलीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. दोन हजार गाळ्यांपैकी ११७४ गाळेधारकांकडे भाडे थकले असून, त्यांच्याकडून चार कोटी ९ लाखांचे भाडे येणे बाकी आहे. महासभेने पारित केलेल्या वाढीव रेडिरेकनर दराप्रमाणे गाळेधारकांना थकबाकीच्या नोट‌िसा देण्यात आल्या आहेत. त्यांनी थकबाकी भरली नाही तर थेट गाळा जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पश्चिम विभागात बुधवारी १३० गाळेधारकांकडून ३५ लाखांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपायुक्त रोहीदास बहीरम यांनी दिली आहे.

महापालिकेच्या मालकीचे शहरात जवळपास दोन हजार गाळे आहेत. या गाळ्यांना नव्याने रेडिरेकनर दरानुसार भाडेआकारणी करण्यात आली आहे. परंतु ही भाडेवाढ जास्तीची असल्याचे सांगून ती भरण्यास गाळेधारकांनी नकार दिला होता. पालिकेने आता वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. दोन हजार गाळ्यांपैकी ११७४ गाळेधारकांकडे चार कोटी ९ लाखांची थकबाकी आहे. त्यात ५० हजाराच्या खाली थकबाकी असलेल्या गाळेधारकांची संख्या ३८६ असून त्यांच्याकडून १७ लाख ६३ हजारांची थकबाकी आहे. तर ७८८ गाळेधारकांकडे ५० हजाराच्यावर थकबाकी असून ही रक्कम ३ कोटी ९१ लाख ८० हजार एवढी आहे. वाढीव रेडिरेकनरप्रमाणे गाळेधारकांना थकबाकीच्या नोट‌िसा देण्यात आल्या असून, थकबाकी भरली नाही तर थेट गाळा जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. बुधवारी पश्चिम विभागात ही वसुली मोहीम राबविण्यात आली. १३० गाळेधारकांकडून ३५ लाख ६४ हजाराची रक्कम जप्त वसूल करण्यात आली. तसेच तीन गाळेही जप्त करण्यात आले. गुरुवारी पंचवटीत ११ गाळेधारकांकडून ९ लाख १० हजाराची वसुली करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’नंतरही मार्केट फीचा बोजा

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

येत्या १ जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवाकर प्रणाली (जीएसटी) लागू होणार आहे. देशाच्या एकीकृत बाजारपेठेत परिवर्तन करण्यासाठी होत असलेल्या या कर प्रणालीत एकच कर आकारणी होणार असली, तरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत घेण्यात येणारी मार्केट फीदेखील आकारण्यात येणार असल्यामुळे ‘जीएसटी’नंतरही व्यापाऱ्यांवर मार्केट फीचा बोजा राहणार आहे. ही फी रद्द करण्यात यावी, अशी मागणी सरकारदरबारी करूनही ती अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशिक बाजार समितीत असलेले अन्नधान्य किराणा घाऊक व्यावसायिक हे बाजार समितीच्या आवारात कोणत्याच मालाचे वजन करीत नाहीत, त्या मालाचा येथे लिलाव होत नाही. मग अशा मालाची मार्केट फी का आकारली जाते, हा व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे. हा माल दुसऱ्या बाजारातून खरेदी करताना व्यापाऱ्यांनी एकदा फी भरलेली असताना दुसऱ्यांदा या मार्केटमध्ये फी का भरायची, असाही व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे. ही पद्धत चुकीची, व्यापाऱ्यांची पिळवणूक करणारी, तसेच अवाजवी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दि. १५ जून रोजी नाशिक बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत शरदचंद्र मार्केट यार्डमधील अन्नधान्य विभागात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडील सेवा शुल्क वसुलीबाबतच्या विषयाचा समावेश करण्यात आला होता. त्यात व्यापाऱ्यांकडून एक टक्का मार्केट फी आकारली जाते, ती तशीच आकारायची की कमी करायाची, या विषयावर एकमत झाले नाही. व्यापाऱ्यांकडून दुहेरी सेस वसूल केला जात नाही, असे संचालकांनी सभेत सांगितले होते. सहकारमंत्र्यांकडे बैठक झाली. त्यात ठरवून दिल्याप्रमाणेच ही वसुली केली जाते, असे मत संचालकांनी मांडले होते.

राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांची राज्यव्यापी संघटनेचे पदाधिकारी राजू राठी, प्रफुल्ल संचेती, परेश बोधाणी, हेमंत पवार यांनी भेट घेऊन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती दुहेरी बाजार फी आणि प्रोसेस केलेल्या वस्तूंवर घेत असलेल्या मार्केट फीविषयी चर्चा केली. मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारची घेण्यात येणारी मार्केट फी रद्द करण्यात आली आहे. व्यापाऱ्याचा बाजार समितीत गाळा आहे, एवढी बाब लक्षात घेऊन त्याकडून ही फी आकारणे योग्य नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट होत आहे. अशा प्रकारची मार्केट फी बंद करण्याचा निर्णय पुणे येथे झालेल्या व्यापारी परिषदेत घेण्यात आला आहे. परिषदेच्या व्यापाऱ्यांनी शासनाला तसे पत्र दिलेले आहे. मार्केट फी दोनदा आकारल्यामुळे त्याचा भुर्दंड ग्राहकाला बसत आहे. या बाबीकडे परिषदेने लक्ष वेधले आहे.

- प्रफुल्ल संचेती, व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीला ‘स्टार्टर’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक म्युनिसीपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन कंपनीच्या कामकाजाला आता औपचारिकरित्या सुरुवात होणार आहे. गुरूवारी स्मार्ट सिटी कंपनीच्या झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्प सल्लागार संस्थेच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. दिल्लीस्थित केपीएमजी अॅडव्हायजरी सर्व्हिसेस या कंपनीवर आता नाशिकच्या विकासाची जबाबदारी राहणार आहे. सोबतच कंपनीच्या कामकाजासाठी पाच मुख्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीलाही बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीला स्टार्टर मिळाले आहे.

स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी स्मार्ट सिटी कंपनीची बैठक झाली. त्यात सिडकोच्या एमडी प्राजक्ता लवंगारे, आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शहर अभियंता यू. बी. पवार आणि प्रभारी सीईओ विजय पगार उपस्थित होते. या बैठकीत सर्वप्रथम प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट नियुक्तीचा विषय चर्चेला ठेवण्यात आला होता. या कामासाठी क्रिस‌िल, टीसीएससह पाच कंपन्यांनी कामाची तयारी दर्शवली. परंतु, संचालकांनी दिल्लीस्थित केपीएमजी अॅडव्हायजरी सर्व्हिसेस या कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब केले. संबंधित कंपनी मल्ट‌िनॅशनल असून, ती टेक्निकल आणि फायनान्शियल कामांसाठी स्मार्ट सिटी कंपनीला मार्गदर्शन करणार आहे. सल्लागार संस्थेच्या निवडीमुळे स्मार्ट सिटीच्या ढकलगाडीला आता वेग येणार असून, प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. शहर आराखड्याचा अभ्यास करून नव्या प्रोजेक्टची आखणी करण्यात येणार असून, डीपीआर तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी आदी कामांना वेग येणार आहे. स्मार्ट सिटीच्या कामातील हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती

कंपनीच्या गुरुवारच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या ‘की मॅनेजर’ पदांनाही मंजुरी देण्यात आली. त्यात कंपनी सचिव या पदावर महेंद्र शिंदे यांची तर आयटी हेडपदी प्रमोद गुर्जर यांची नियुक्ती करण्यात आली. चीफ फायनान्शियल ऑफ‌िसर पदावर बाबुराव निर्मळ यांना नियुक्त करण्यात आले. अर्बन प्लॅनर आणि मुख्य अभियंता या दोन पदांच्या भरतीलाही हिरवा कंदील देण्यात आला असून, ही पदे शासन सेवेतील प्रतिनियुक्तीवर भरली जाणार आहेत.

तीन कामांसाठी सात कोटी मंजूर

स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत शहरातील तीन नव्या कामांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. गुरुवारच्या बैठकीत महात्मा फुले कलादालनासाठी साडेतीन कोटी, नेहरू उद्यानासाठी सव्वा कोटी तर विद्युत शवदाह‌िनीसाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे सात कोटीच्या नव्या कामांना मंजूरी देण्यात आली असून पुढील आठवड्यात या कामांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. दरम्यान, या बैठकीत महाकवी काल‌िदास कला मंद‌िराच्या कामासाठी साडेनऊ कोटींच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. या कामाला १५ जुलैपासून प्रारंभ होणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात महाकवी काल‌िदास कला मंद‌िराच्या नूतनीकरण कामासह वर्कऑर्डरलाही मंजुरी देण्यात आली. या नूतनीकरण कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या २७ जून रोजी ई-भूम‌िपूजन केले जाणार आहे. शिवाय, महात्मा फुले कलादालनाच्या नूतनीकरणासाठी साडेतीन कोटी, नेहरू उद्यानासाठी सव्वा कोटी तर विद्युत शवदाह‌िनीसाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात या कामांच्या निविदा काढल्या जाणार आहेत.

दिनकर पाटील संचालक

दरम्यान स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने या नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे. विविध पक्षांच्या इतर सदस्यांचाही एक प्रतिनिधी या कंपनीवर संचालक म्हणून घेतला जाणार आहे. त्यांची निवड महासभेवर करण्यात येणार आहे.

पंडित कॉलनीत कार्यालय
नाशिक म्युनिस‌िपल स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कंपनीच्या जागेचा वनवास अखेर संपला आहे. पंड‌ित कॉलनीतील पश्चिम विभागाच्या इमारतीत कंपनीचे कार्यालय करण्यास कंपनीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. येत्या चार मह‌िन्यांत कंपनीचे कार्यालय तयार होणार असून, नव्या कार्यालयातून स्मार्ट सिटीचे कामकाज सुरू होणार आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नाशिकचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाला होता. नाशिकच्या निवडीनंतर स्मार्ट सिटीचा कारभार हाकण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीचे स्वतंत्र कार्यालय, तसेच कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी असणार आहेत. स्मार्ट सिटीचे स्वतंत्र कार्यालयही असणार आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू होता. गुरुवारी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंपनीच्या जागेवर चर्चा झाली. अध्यक्षांनी मुख्यालयात कार्यालय सुरू करण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रशासनाकडून तीन जागांचा पर्याय सुचवण्यात आला होता. यात गोल्फ क्लबच्या शेजारील पालिकेची जागा, दुसरी तारांगणाची तर पंड‌ित कॉलनीतल्या नाशिक पश्चिम कार्यालयाच्या इमारतीमधील जागा अशा तीन ठिकाणांचा विचार केला होता. कंपनीच्या बैठकीत पश्चिम विभागाच्या कार्यालयातील जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी स्मार्ट सिटीचे सुसज्ज कार्यालय तयार केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनस्थानतर्फे कलेचं ‘समर्पण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कथ्थक, तबलावादन, शास्त्रीय गायन या कला आपल्या अनोख्या शैलीच्या सादरीकरणातून दिवंगत तबलावादक प्रमोद भडकमकर यांना त्यांच्या मित्रपरिवाराकडून समर्पित करण्यात आल्या. निमित्त होते, जनस्थान या व्हॉट्स अॅप ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापनदिनाचे. या वर्धापनदिनानिमित्त तीन दिवसीय जनस्थान फेस्ट‌िव्हलचे आयोजन प. सा. नाट्यगृहात करण्यात आले आहे. याचे उद््घाटन गुरुवारी झाले. तबलावादक प्रमोद भडकमकर यांना वर्धापन दिनाचा पहिला दिवस समर्पित करण्यात आला.

जनस्थान या व्हॉट्स अॅप ग्रुपमधील सदस्य तबलावादक प्रमोद भडकमकर यांचे नुकतेच निधन झाले. तबला या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनोखे असून त्याला मानवंदना म्हणून या ग्रुपच्या वर्धापनदिनाच्या पहिल्या दिवसातील संपूर्ण कार्यक्रम ‘समर्पण’ या नावाने त्यांना अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात याठिकाणी आयोजित केलेल्या संभव या प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते व डॉ. मो. स. गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. भडकमकर यांची कन्या वैष्णवी भडकमकर हिने तबलावादन सादर केले. तिला ईश्वरी दसककर हिने साथसंगत केली. यावेळी यतीन पंडित व संदिप लोंढे यांनी भडकमकरांचे चित्र व शिल्प सादर करत त्यांना मानवंदना दिली. प्रमोद भडकमकर यांचा मरणोत्तर ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार पत्नी अर्चना भडकमकर यांच्याकडे डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कलेतून श्रद्धांजली

प्रमोद भडकमकर यांच्या मित्रपरिवाराने कलेतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये सुभाष दसककर, अनिल दैठणकर, मोहन उपासणी, शास्त्रीय गायक प्रा. अविराज तायडे, अभंग गायक प्रा. मकरंद हिंगणे, कथ्थक नृत्यांगणा विद्या देशपांडे, कथ्थक नृत्यांगणा किर्ती भवाळकर यांचा समावेश होता. त्यांना सतीश पेंडसे, सुजीत काळे, नितीन वारे, सुभाष दसककर, अनिल दैठणकर, दिगंबर सोनवणे यांनी साथसंगत केली.


संभवमधून विविध कलांचे दर्शन

सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच संभव या चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन पसामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये नाशिकमधील प्रफुल्ल सावंत, राजेश सावंत, नंदू गवांदे, अनिल माळी, सी. एल. कुलकर्णी, प्रसाद पवार, संदीप लोंढे, श्याम लोंढे, स्नेहल एकबोटे, श्रेयस गर्गे, यतीन पंडित, शीतल सोनवणे यांची चित्रे, शिल्प आदींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.


आज ‘सन्मान’

आज (२३ जून) ‘सन्मान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यात ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार प्रदान केले जातील. नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेवून ज्यांनी संगीत आणि अभिनय या कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवला त्या पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे आणि विद्या करंजीकर यांना यंदाचा जनस्थान आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी धास्तावला!

$
0
0

टीम मटा

गेल्या आठ दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला तालुक्यात पहिल्या पावसाने पेरणी झाली. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्यामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सर्वात जास्त पर्जन्य असणारे त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात मात्र अद्यापही दमदार पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी आस लावून बसले आहेत.

दमदार पावसाची आस मालेगावात कायम

मालेगाव ः शहर व तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणी सुरू केली. आतापर्यंत तालुक्यात २५ टक्के पेरणी झाली असली तरी पावसाने मात्र दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पावसाची सुरुवात चांगली झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात २० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मका पीक सर्वाधिक १० हजार हेक्टरवर, तर कापसाची आठ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने शेतकरी बांधवानी पेरणी केली असली तरी नंतर मात्र पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ येते की काय अशी चिंता व्यक्त होते आहे.

तालुक्यातील करंजगव्हाण, कळवाडी, सौंदणे आदी परिसरात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सरासरीच्या २८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात ४ हजार ८६९ दलघफु (२६ टक्के) इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हा साठा शून्य टक्के होता. शहरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून रमजान महिना सुरू असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे.

येवला तालुक्याला रोजच हुलकावणी

येवला ः यंदा मृग नक्षत्राने दमदार श्रीगणेशा करताना तालुक्यात खरिपाचे चक्र पुढे सरकले गेले असले, तरी गेल्या सहा दिवसांत तालुक्यात अगदी सर्वदूर वरुणराजाने पुन्हा दडी मारल्याने बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे. खरिपाची पेरण्या केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

एकीकडे मोठे अर्थसंकट उभे असतानाही शेतकऱ्यांनी कसाबसा पैसाआडका उभा करत पेरणी केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून दडी मारलेला पाऊस गुरुवारी (दि.२२) दुपारी दोनच्या सुमारास येवला तालुक्यात आर्द्राचे ढग काहीसे दाटून येताना आता बरसणार असे चित्र निर्माण झाले. मात्र वरुणराजाने क्षणार्धात पुन्हा पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
त्र्यंबक, इगतपुरीकडे फिरवली पाठ

त्र्यंबकेश्वर ः दरवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस होणारा त्र्यंबकेश्वर तालुका अद्याप कोरडाच आहे. शहरासह तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. वळवाच्या किरकोळ पावसानंतर अद्यापही या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. अधूनमधून एखादी सरी कोसळण्यापलीकडे तालुक्यात पावसाने कुठेही दमदार हजेरी लावलेली नाही. इगतपुरी तालुक्याकडेही यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या आठ दहा दिवसांपासून तुरळक सरींपलीकडे दमदार पाऊस झालेला नाही.
चांदवड, नांदगावात समाधानकारक पाऊस

मनमाड ः चांदवड, नांदगाव तालुक्यात १५ जून अखेर सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होऊन धरणांत मुबलक पाणीसाठा आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे येथील शेतकरीही चिंतेत आहे.

नांदगाव तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात १२० मी.मी. पाऊस झाला आहे. चांदवड तालुक्यात आठ दिवस आधी झालेल्या दमदार पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्यानंतर शेतीसाठी पोषक अशा दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच आहे. काही भागात पेरणी झाली आहे.


निफाडमध्ये समाधानकारक पाऊस

निफाड ः तालुक्यात पावसाने ७ जूनलाच हजेरी लावल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाऊस गायब असला तरीही सुरुवातीला झालेला मान्सूनपूर्व पावसामुळे निफाड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली असून, पुढील तयारीला लागले आहेत. गुरुवारी तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिल्याचे दिसत आहे. खते, बी-बियाणे दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांची सोयाबीन च्या पेरणीकडे ओढ आहे. त्या खालोखाल मक्यालाही काही गावांमध्ये पसंती आहे. तालुक्यात पाण्याचा मुबलक पुरवठा व सिंचनाच्या सोई उपलब्ध असल्याने द्राक्ष, कांदा, ऊस अशी पिके घेतली जातात. गेल्या आठवड्यात तालुक्यात लासलगाव, विंचुर, नैताळे, सोनेवाडी, खडकमाळेगाव, दावचवाडी, सायखेडा, चांदोरी या चारही भागातील गावांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या भागात पाऊसाचा जोर इतका अधिक असल्यामुळे द्राक्षबागांसह शेतामध्ये तीन ते चार दिवस पाणी साचून होते.

तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नांदूरमाध्यमेश्वर धरणातही पाण्याचा साठा असल्याने लासलगाव, विंचुरसह १६ व १२ गाव पाणीपुरवठा योजनेला काही भीती नाही. तसेच पिंपरी, रौळस, कुंदेवाडी या गावांना कादवा नदीला एप्रिलमध्ये आरक्षणाचे सोडलेले पाणी अजूनही नदीपात्रात आहे. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून दडी मारलेला पाऊस जर अजून लांबला तर चिंतेची बाब ठरू शकते. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
बागलाणमध्ये पिके सापडली संकटात

सटाणा ः मृग नक्षत्रापासून सलग तीन झालेल्या पावसाने खरिपाच्या आशा पल्लवित केलेल्या असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांची आशा धूसर झाली आहे.

दरम्यान पाऊस लांबल्याने तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न आ वासून उभा आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे तालुक्यातील केळझर धरण कोरडेठाक झाले आहे. परिणामी केळझर ते सटाणा नदीपात्रालगतच्या गावांना शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे आहे. मृगाच्या पावसाने धरणक्षेत्रात अद्यापही अवकृपा केल्याने सटाणावासीयांची झोप उडाली आहे. शहराला कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून आवर्तन मिळते. मात्र या धरणातील पाण्याचा जलसाठा जेमतेम असल्याने तेथील अपेक्षा फोल ठरली आहे. जूनच्या प्रांरभीच झालेल्या पावसाने तालुकावासीयांना दिलासा दिला होता. मात्र ७ जूननंतर पावसाने दांडी मारली आहे. ती अद्याप कायम आहे. जून महिन्याच्या प्रारंभी तालुक्यात अवघ्या २३ मीमी. इतका पाऊस झाला असला तरीही पेरण्या बाकी आहेत.

कळवण, देवळ्याकडेही फिरवली पाठ

कळवण ः गेल्या आठवड्याभरापासून देवळा, कळवण तालुक्यात पावसाने दांडी मारली आहे. पहिल्या पावसात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, ते संकटात सापडले आहेत. अजूनही काही भागात पेरणी झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवीदास पिंगळेंवर अविश्वास प्रस्ताव?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहा महिन्यांपासून अटकेत असलेले नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू झाल्या आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही सदस्यांनी गुरुवारी अविश्वास प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तांत्रिक माहिती घेतली आहे. या ठरावासाठी दोन तृतीयांश संचालक लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, अविश्वास येण्याआधी पिंगळे हे राजीनामा देणार असल्याचीही चर्चा आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ संचालक असून त्यातील बरेच संचालक हे भाजपच्या गोटात गेले आहेत. त्यामुळे अविश्वासबाबतच्या हालचाली गेल्या काही दिवासांपासून सुरू आहेत. सहा महिन्यांपूर्वी बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेच्या अपहाराप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंगळे यांना अटक केली होती. या कारवाईत बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या एका कारमधून ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांसह देवीदास पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पिंगळे यांच्या राजीनाम्याचीच चर्चा

देवीदास पिंगळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीचा राजीनामा दिला असल्याची चर्चा दिवसभर होती. पण जिल्हाधिकारी मुंबईला असल्यामुळे हा राजीनामा दिला नसल्याचेही बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवडीसाठी ‘रोपे आपल्या दारी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शतकोटी वृक्षलागडवीचे उद्द‌िष्ट साध्य करण्यासाठी सामाजिक वन‌ीकरण विभागाने आता ‘रोपे आपल्या दारी’ ही अनोखी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत विभाग थेट घरपोच रोपे देणार असून, वृक्षमित्रांना मानधन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सहभागी वृक्षमित्रांचा प्रमाणपत्राद्वारेही गौरव केला जाणार आहे.

वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात नियंत्रणाबाबत विचारमंथन सुरू आहे. त्याची तिव्रता व परिणामकारकता कमी करण्यासाठी सन २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवडीसाठी शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ग्रामीण भागात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे शक्य असून, शहरी भागात पाल‌िका, नगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायती अशा ठिकाणी निवासी नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. वन विभागाकडून २५ जून ते ५ जुलै या कालावधीत रोपे आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रम कालावधीचा पहिला टप्पा २५ ते ३० जून, दुसरा टप्पा एक ते पाच जुलै असा राहील. योजनेत निवडलेल्या शहराचे

व्याप्तीनुसार ३ ते ५

ठिकाणी वनविभागाकडून रोपे पुरविण्याकरीता वनमहोत्सव केंद्र उघडण्यात येणार आहे.

वृक्षमित्रांना मिळेल मानधन

मोठ्या प्रमाणात मागणी असल्यास वनविभागाचे वाहनाद्वारे रोपांचा पुरवठा करण्यात येईल. सदर पुरवठा करणाऱ्या वृक्षमित्राची ओळख निमार्ण होण्यासाठी कॅप व झेंडा पुरविण्यात येईल, प्रत्येक वृक्षमित्रास प्रतीदिन रुपये एक हजार प्रमाणे मानधन देण्यात येईल (इंधन खर्च व इ.सर्व खर्च/दुचाकी/रिक्षा उपलब्ध करुन घेण्यासह अंतर्भूत राहील). ज्या वन विभागामार्फत वृक्षमित्र काम करतील त्यांचेकडून वृक्षमित्रांना प्रमाणपत्र देण्यात येईल, वृक्षमित्राची निवड वनविभागामार्फत त्यांचे स्तरावरुन निकष ठरवून करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्याने' पोर्नसाइट्ससह ‘फोटो ट्रेडिंग’ केले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तरुणींचे अश्लिल फोटोग्राफ्स पोर्नसाइट्सवर टाकणाऱ्या अक्षय राव या संशयित आरोपीने फोटो ट्रेडिंग केल्याची धक्कादायक बाब पोलिसांनी शोधून काढली आहे. नाशिक नव्हे तर भारतात नवीन असलेला हा प्रकार मूळ धरू पाहत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणींचे अश्लिल फोटोग्राफ्स काढून ते पोर्नसाइटसवर व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये अक्षयविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात दोन तक्रारदार तरुणी समोर आल्या असून, पोलिसांनी अक्षयला अटक केली होती. पोलिस चौकशी झाल्यानंतर कोर्टाने अक्षयची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, अक्षयने जामीनासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, कोर्टाने फेटाळल्याने अक्षय सध्या नाशिक सेंट्रल जेलमध्ये आहे.

फोटो ट्रेडिंगबाबत सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले की, हा फोटो ट्रेडिंग हा इंटरनेटवरील आणि परदेशात वापरला जाणार प्रकार आहे. यात, इंटरनेटवरील ओळख झालेले परदेशातील व्यक्तीसमवेत एकमेकांचे फोटो शेअर केले जातात. अर्थात, हे फोटोग्राफ्स नको त्या अवस्थेतील असतात.

फोटो ट्रेडिंगमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार केला जात नाही. संशयित आरोपी अक्षयने जर्मनीतील काही व्यक्तींशी फोटो ट्रेडिंग केल्याचे स्पष्ट झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. अनेकदा याच पध्दतीने व्हिडिओदेखील शेअर केले जातात. फोटो ट्रेडिंगबाबत पीडित तरुणींना माहिती नव्हती. संशयित आरोपीस फोटो ट्रेडिंगची काही काळापूर्वी माहिती मिळाल्यानंतर त्याने हा उद्योग केला असे पवार यांनी स्पष्ट केले.
अक्षयच्या लॅपटॉपध्ये पीडित दोन तरुणींसह आणखी काही तरुणींचे फोटो सापडले होते. मात्र, हे फोटो इंटरनेटवरून डाउनलोड केल्याचे त्याने सांगितले होते. पोलिसांनी या फोटोआधारे तपास केला. तसेच, अक्षयच्या संपर्कात कोणी आलेले असल्यास पोलिसांना भेटण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, आजवर कोणी पुढे येऊन तक्रार केली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अक्षयचे पालक परदेशातून परत आले आहेत. आपल्या मुलाशी विवाह करण्यासाठी संबंधित तक्रारदार तरुणींनी असे आरोप केल्याचे अक्षयच्या पालकांनी पोलिसांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन्स अध्यक्षपदी जयक्रिश्रियांची वर्णी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

लायन्स वर्ष २०१७-१८ या कालावधीसाठी प्रवीण जयक्रिश्रिया यांनी लायन्स क्लब पंचवटीची अध्यक्षपदाची सूत्रे मावळते अध्यक्ष नीलिमा जाधव यांच्याकडून स्वीकारली.

गंगापूर रोड येथील पाम शेल्स येथे झालेल्या कार्यक्रमास सचिवपदी अरुण अमृतकर, खजिनदारपदी अभय नेरकर, उपाध्यक्षपदी रमेशभाई शाह यांनी पदग्रहण केले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वैद्य विक्रांत जाधव म्हणाले, की गाडे या शेतकरी कुटुंबातील लहान कन्येला शिक्षणासाठी दत्तक घेऊन नवा पायंडा पाडण्यात आला. महेश सोमाणी हे या मुलीच्या शिक्षणाचा खर्च करीत आहेत. दरम्यान, पर्यावरण रक्षणाच्या हेतूने तुळशीच्या बियांचे वाटप करण्यात येणार असून त्याचे उद्‍घाटन रमेश शाह यांच्या हस्ते झाले. यंदा दोन महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिनची वाटप करण्यात आले. मेरी येथील बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सुषमा कोठावदे, रोहिणी रक्ते, स्मिता देशपांडे, नीलिमा जाधव यांना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकष बदलाने वाढणार कृषी सिंचन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

चालू वर्षी खरीप हंगामापूर्वी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश राज्य सरकारने कृषी विभागाला दिले आहेत. खरीपापूर्वी या योजनेचे निर्देश प्राप्त झाल्याने दोन महिन्यांत विभागातील तब्बल ५ हजार ४७९ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.

वारंवार निर्माण होणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचनाचा शेतकऱ्यांनी वापर करावा या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्यात येते. मात्र, या योजनेचे निर्देश कृषी विभागाला मिळेपर्यंत सप्टेंबर महिना उजाडत असे. परिणामी हजारो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याची बाब गेल्या वर्षी ‘मटा’ने उजेडात आणली होती. या बातमीची प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक सिंचन योजना दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश दरवर्षी खरीप हंगाम उलटून गेल्यावर कृषी विभागाला प्राप्त होतात. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी निवडीचे सोपस्कार पार पाडेपर्यंत रब्बी हंगामही हातातून जात असे. परिणामी या योजनेच्या संपूर्ण निधीचा वापर होत नसे.

यंदा मेमध्येच निर्देश

यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठिबक सिंचन योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश राज्य सरकारकडून कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीत ५ हजार ४७९ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यंदा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ६२०.६७ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. विभागात गेल्या वर्षीही १४ हजार ६ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता.

ठळक वैशिष्ट्ये

पर ड्रॉप मोअर क्रॉप योजनेचा राज्यातील ३४ जिल्ह्यांना लाभ
अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना ५५ टक्के अनुदान
इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान
शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी व आधारकार्ड बंधनकारक
अनुदानाची रक्कम इएफटीद्वारे जमा होणार थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>