Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘नीती आयोगाचे पुनर्गठण करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नीती आयोगावरून दीड शहाण्या तज्ज्ञांना हाकला आणि नीती आयोगाचे पुर्नगठन करावे आदी मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी जोरदार निदर्शने केली.

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. केंद्रात नवीन सरकार सत्तारुढ झाल्यावर सरकारी धोरणे व कारभाराची नव्याने मांडणी करताना मोदी सरकारने जुना योजना आयोग गुंडाळून त्या जागी नीती आयोग निर्माण केला. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिग इंडिया (नीती) असे आकर्षक नाव या संस्थेला देण्यात आले. पूर्वीचा आयोग ‘टॉप टू बॉटम’ या पध्दतीने काम करीत होता. पण ती संस्था मोडीत काढून त्याऐवजी खालून वर म्हणजेच ‘बॉटम टू टॉप’ असा विचार करणारी संस्था निर्माण करण्यात आली. नीती आयोगाची फेररचना करावी, विवाद्य धोरण ठरविणाऱ्या आयोगातील शहाण्यांना हाकलून द्यावे आणि देशाच्या वस्तुस्थितीशी परिचित असणारे व आस्था असणारे लोक तेथे नेमावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कामगार कायद्यात सुधारणा करताना आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) पुरस्कृत केलेले निकष व शिफारशींचे अवलंबन करावे, कामगार क्षेत्राविषयीचे धोरण ठरव‌तिाना त्रिपक्षीय चर्चेची पध्दती अंमलात आणावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर अध्यक्ष गोविंद चिंचोरे, विजय मोगल, सुरेश चारभे, लक्ष्मण शिंदे, दुर्गा घेवारे, वि. गो. पेंढारकर, ज्योती वाघ, राजेश पगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

भाजपला घरचा आहेर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापन केलेल्या भारतीय मजदूर संघाने नीती आयोगाच्या कारभारावर टीका करून भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर साशंकता व्यक्त केली आहे. संघाच्या आंदोलनाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. यावेळी १३ संचालक उपस्थ‌ति होते, असा दावा संचालक मंडळातील सूत्रांनी केला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार सहा महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पिंगळे यांना अटक केली होती. या कारवाईवेळी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या एका कारमधून ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली होती. काही कर्मचाऱ्यांसह पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोल‌सि स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. पिंगळे यांच्या कामकाजाबद्दल अनेक आक्षेप असल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव सादर करण्याच्या हालचाली काही दिवसांपासून गतिमान झाल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ संचालक आहेत. त्यापैकी १३ संचालकांनी अविश्वास ठरावाला पाठबळ दिल्याचा दावा करण्यात आला आहे. शाम गावित, शिवाजी चुंबळे, संपतराव सकाळे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, संजय तुंगार, युवराज कोठुळे, चंद्रकांत निकम, जगदीश आपसुंदे, रवी भोये, संदीप पाटील, विमल जुंद्रे, भाऊसोब खांडबहाले आदी संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे

पिंगळे यांच्यावरील अविश्वासाबाबतचा ठराव सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी हा ठराव दाखल करून घेतल्याची माहिती संचालक मंडळातील सूत्रांनी दिली. ५८ लाखांचा अपहार तसेच संचालक मंडळाला विश्वासात न घेताच कामे करणे यांसारखे काही आक्षेप या अविश्वास ठरावात नोंदविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत भरदिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून भरदिवसा सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. पंचवटी परिसरात गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी सव्वा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला.

राजेश प्रभाकर देशपांडे (४६, रा. केवडीबन, पंचवटी) यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ते कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्याने बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. सोने-चांदीचे दागिने आणि तीन हजार रुपयांची रोकड असा दोन लाख ३६ हजारांचा ऐवज चोरून नेला.

विषारी औषध सेवनाने मृत्यू
विषारी औषध सेवन केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. गुरूवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली. दीपक जगन सापरे (२२, रा. महात्मा फुलेनगर, पंचवटी) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्प‌टिलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पंचवटी पोलिसांनी आकस्म‌कि मृत्यूची नोंद केली आहे.

दुकानातून रोकड चोरीस
पाणी पिण्याच्या बहाण्याने आलेल्या चार महिलांनी टायर दुकानातील ८१ हजारांची रोकड लांबविली. सिन्नर फाटा परिसरात हा प्रकार घडला. मधुकर भिकाजी शिंदे (३७, रा. जेलरोड) यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सिन्नर फाटा परिसरात त्यांचे यश टायर्स नावाचे दुकान आहे. ते बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी चार महिला दुकानात आल्या. दुकानातील गल्ल्यातून ८१ हजारांची रोकड चोरून त्यांनी पोबारा केल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

एलसीडी टीव्ही चोरास अटक
चोरीचा एलसीडी टीव्ही विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील डिसुझा कॉलनीतून हा एलसीडी टीव्ही चोरीस गेला होता. महेश बळीराम शिरसाठ (२२, बाबासाहेब पुतळ्याजवळ, गंगापूर गाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ३२ इंची एलसीडी टीव्ही, रिमोट आणि चादर असा २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महेशचा साथीदार दीपक खैरनार (रा. प्रबुध्दनगर,सातपूर) हा फरार झाला आहे. हे दोघेही संशयित सराईत गुन्हेगार आहेत. जयदीप दौलतराव निकम (रा. धनलक्ष्मी सोसायटी, डिसुझा कॉलनी, गंगापूर रोड) यांच्या घराचा ३० मे रोजी कडी कोयंडा तोडून ही चोरी करण्यात आली होती.

गॉगल विक्रेता खून; एकास अटक
वेद मंदिर परिसरातील गॉगल विक्रेत्याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी सज्जन गंगाराम कळासरे उर्फ सचिन काळे याला अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल, दोन जिवंत काडतुसे तसेच चॉपर हस्तगत करण्यात आले आहे.
गॉगल विक्रेता खून प्रकरणात काळे याच्यासह गणेश भिमनाथ, विकी किरण काळे, तुषार सूर्यवंशी, लेफटर त्रिभुवन यांचा पोलिस शोध घेत आहेत. तपोवन परिसरात संशयितांचा शोध घेत असताना काळे औरंगाबाद महामार्गावरील नीलगिरी बागेजवळ मिळून आला. मुंबई नाका पोलिसांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया ‘एफडीए’ अधिकारी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंत्रालयातून आलेली तक्रार मिटविण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया फुड अॅण्ड ड्रग्ज अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सूरज सुरेश काळे (३५, रा. सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी रतन पुनाजी चौधरी (३५, रा. लवाटेनगर, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. ते त्यांच्या सागर स्वीटस या दुकानात असताना त्यांना बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास फोन आला. मी ‘एफडीए’च्या वांद्रे येथील कार्यालयातून सुरेश पाटील बोलत असल्याचे सूरजने सांगितले. तुमच्या दुकानातील मिठाई खाऊन एक जण आजारी पडला असून त्याने मंत्रालयात तक्रार केल्याची बतावणी सूरजने चौधरी यांच्याकडे केली. कारवाई न करण्यासाठी सूरजने ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, चौधरी यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी संशयित काळे याला सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षद सपकाळवर बलात्काराचाही गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो असे आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या हर्षद आनंद सपकाळ याच्यावर आता इंद‌रिानगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या समवेत राहणाऱ्या एका तरुणीनेच बलात्काराची फिर्याद दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

चित्रपट सृष्टीतील अनेक मातब्बरांशी आपला परिचय असून चित्रपटात काम मिळवून देतो, असे आमिष हर्षद उर्फ हॅरी सपकाळ तरुणी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना दाखवित होता. त्यासाठी बक्कळ पैसे घेऊन त्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. पैसे घेऊनही चित्रपटात काम मिळवून न दिल्याने त्याचे बिंग फुटले. शरद संपतराव पाटील (५४, रा. दीपालीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आणखी काही तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता बळावली आहे. सध्या पोलिस कोठडीत असलेल्या हर्षदविरोधात एका तरुणीने बलात्कारासह फसवणुकीची फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत पाथर्डी फाटा, सापूतारा येथे वारंवार आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचे या तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

हर्षदने आपल्याला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन प‍्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेळोवेळी आपल्यावर बलात्कार केला. मराठी चित्रपटात काम मिळवून देतो, असे सांगून पैसे घेऊन फसवणूक केली. इतकेच नव्हे तर लोकांकडून पैसे वसूल करण्यासाठी आपला तसेच माझ्या बँक खात्याचा वापर केला. फेसबुकवर माझ्या नावाचे फेक अकाऊंट तयार करून त्यावर अश्लील मेसेजेस टाकून बदनामी केल्याचे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या तरुणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’मुळे कट ऑफ वाढण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेडिकलच्या प्रवेशांसाठी केंद्र पातळीवर घेण्यात आलेल्या ‘नीट’ म्हणजेच नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट या परीक्षेचा निकाल सीबीएसईकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आला. सीबीएसईच्या वेबसाइटवर हा निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी या वेबसाइटकडे आपले लक्ष शुक्रवारी दुपारनंतर केंद्रित केले होते. यंदा या परीक्षेचा निकाल चांगला लागला असून त्यामुळे कटऑफ वाढण्याची शक्यता यानिमित्त या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आल्या.

देशभरात ७ मे रोजी नीट परीक्षा पार पडली होती. देशभरातून ११ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. इंग्रजी भाषेबरोबरच हिंदी, तेलगू, आसामी, गुजराती, मराठी, तामिळ, बंगाली, कन्नडा, ओरिया या प्रादेशिक भाषांमध्येही परीक्षा घेण्यात आली. प्रादेशिक भाषांची काठिण्यपातळी इंग्रजी भाषेच्या तुलनेत कमी असल्याचा दावा करत एका विद्यार्थ्यानी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या परीक्षेचा निकाल स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.

यांनी मिळविले यश

नाशिक शहरासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. नीट परिक्षेत यश मिळविलेल्यांमध्ये हर्ष चोरडिया, नेहा झाजेरिया, सुचित वालिया या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हर्षला ६०५ गुण, नेहाला ६०० तर सुचितला ५७१ गुण मिळाल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील एक पंप ‌सील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोलपंपाच्या मशिनमधील पल्सरमध्ये टेम्परिंग व शोल्डरिंग करून त्यातील आयसी पार्टच्या सहाय्याने प्रत्येकी पाच लिटरमागे २०० मिलीची चोरी करण्याचा प्रकारातून शुक्रवारी नाशिकमधील एका पेट्रोलपंपाचे एक युनिट सील करण्यात आले आहे. तसेच द्वारका येथील पंपावर लिटरमागे १० मिली पेट्रोल कमी आल्याचे आढळले आहे.

ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेने दोन दिवसात शहरातील चार पेट्रोलंपाची तपासणी करण्यात आली. त्यात दोन पेट्रोलपंपावर गडबड असल्याचे आढळले तर दोन पेट्रोलंपावर काहीच आढळले नाही. राज्यभर मापात पाप करणाऱ्या पेट्रोलपंपावर धडक कारवाई केली जात आहे. नाशिकमध्ये ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाचे पथक दाखल झाले असून ते धाड टाकतांना गोपनियता पाळत असल्यामुळे नाशिक येथील स्थानिक अधिकाऱ्यांनाही त्याचा थांगपत्ता नसतो. धाड टाकल्यानंतर वैद्यमापन शास्त्र, पुरवठा विभाग व ऑइल कंपन्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत ही कारवाई केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या कंपन्याचे ३६० हून अधिक पेट्रोलपंप आहे. त्यातून काही पेट्रोलपंपात चोरी होत असल्याचा संशय असून त्यामुळे या कारवाईने वेग घेतला आहे. एकिकडे ठाणे गुन्हे शाखेने कारवाईचे सत्र सुरू केल्यानंतर वैद्यमापन विभागही या पेट्रोलपंपावर होणाऱ्या चोरीचे प्रकरणाचा शोध घेत आहे. त्यामुळे पंपचालकांचे धाबे दणाणले आहे.

यापूर्वी जिल्ह्यात सोमवारी नाशिक-चांदवड महामार्गावरील दोन पेट्रोलपंपावर कारवाई करून हे पेट्रोलपंप सील केले होते. त्यानंतर या कारवाईने वेग घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलपंपावर चिप आणि रिमोटच्या सहाय्याने होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्यात आली होती. नाशिक विभागामध्ये ३२२ वितरकांची चौकशी करून २००० पंप तपासण्यात आले. त्यातही दोन पंप दोषी आढळल्याने बंद करण्यात आले. तर दोघा वितरकांविरोधात खटला दाखल झाला आहे. या कारवाईनंतर आता पुन्हा कारवाईने वेग घेतला आहे.

चोरीमुळे ग्राहक संतप्त

पंपांवर इंधन भरतांना मीटरवर झिरो बघून पेट्रोल घ्यावे यासाठी ग्राहक नेहमीच दक्ष असतात. पण ते बघूनही पंपचालकांकडून चोरी होण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप आहे. अनेक जणांना पेट्रोल भरल्यानंतर गाडीतल्या पेट्रोलचा काटा पूर्ण क्षमतेने फिरलेला दिसत नाही. त्यामुळे त्यांचा संशय बळावला आहे. या घटनेमुळे राजकीय पक्षांनी सुध्दा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या चोरीचा प्रकार ग्राहाकांमध्ये संताप निर्माण करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कारला धडक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उड्डाणपुलावर चारचाकी वाहनांमधील अपघातातील जखमींना घेऊन जाणाऱ्या अंबड पोलिसांच्या पीटर कारला भरधाव वेगात व लाईट बंद असलेल्या ट्रकने धडक दिली. यात दोन पोलिसांसह पाच जण जखमी झाले. या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान रवींद्रकुमार रमेशचंद्र पंचाळ (३२, रा. हरी व्हिला रोड, अहमदाबाद, गुजरात) हे त्यांच्या पत्नी नीमिषा पंचाळ यांच्यासमवेत राणेनगर उड्डाणपुलावरून वाहनाने (जी. जे. ०१ आर एल ७८८१) जात होते. त्यांच्या कारला सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट (एम एच १२ एफ के ९९४६) कारला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारचालकही जखमी झाला. पांचाळ दाम्पत्यासह तिघे जण जखमी अवस्थेत अंबड पोलिस स्टेशनमध्ये आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक खडके यांच्यासह चालक व कर्मचाऱ्यांनी पांचाळ कुटुंबीयांना हॉस्पिटलमध्ये उपचारास नेण्यासाठी पोलिस पीटर मोबाइल कारमध्ये (एमएच १५ एए २३२) बसविले. परंतु, याच वेळी पाथर्डी फाट्याकडून मुंबई नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (एम एच ०५ एएम ७७२७) भरधाव वेगात जात असताना पोलिस पीटर कारला जोरदार धडक दिली. ट्रकचे हेडलाइट बंद होते. पोलिस पीटर गाडीतील तिघा जखमींना अधिकच मार लागला. तसेच गाडीतील सहाय्यक पोलिस निरीक्षक खडके व पोलिस शिपाई फुलमाळी हेदेखील जखमी झाले. पोलिसांसह सर्व जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी ट्रकचालक रमेश यशवंत गोरडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुटीच्या दिवशीही पॉलिटेक्निकचे प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील प्रथम वर्ष पॉलिटेक्निकची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्राथमिक माहिती ऑनलाइन पद्धतीने www.poly2017.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर भरून नोंदणी सुविधा केंद्रातर्फे करता येणार आहे. याशिवाय येत्या रविवारी २५ जून रोजी तसेच सोमवारी रमजान ईदची सुटी असली तरीही प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती के. के. वाघ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. प्रकाश कडवे यांनी दिली आहे.

दहावी परीक्षांचे मार्कशीट मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मूळ मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला शाळांमधून मिळाल्यानंतर इतर कागदपत्रांची तयारी करून घेणे आवश्यक असणार आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व सुविधा केंद्रांवर अर्ज निश्चिती करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १ जुलै रोजी विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल मेरीट यांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध असणार आहे. तर २ ते ४ जुलै दरम्यान अर्जांमध्ये काही त्रुटी असल्यास योग्य ते बदल सुविधा केंद्रावर जाऊन करायचे आहेत. फायनल मेरीट लिस्ट ५ जुलै रोजी विद्यार्थी लॉगइनमध्ये उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाघ कॉलेजमध्ये सुविधा केंद्र उपलब्ध

के. के. वाघ. पॉलिटेक्निक कॉलेज या सुविधा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरणे, अॅप्लिकेशन किट विक्री, ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरणे, कागदपत्रांची पडताळणी या सुविधा करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. एसएससीबरोबरच सीबीएसई, आयजीसीएसई, आयसीएसई आदी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही या अर्ज सुविधा केंद्रावर कागदपत्रांची पडताळणी करून घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकवीस कोटींची कामे रडारवर

$
0
0

जिल्हा परिषदेने घाईघाईत मंजूर केलेल्या कामांची होणार तपासणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागाचा सुमारे २१ कोटी निधी जिल्हा परिषदेने घाईघाईने खर्ची केलेल्या निधी व कामांच्या मंजुरीची तपासणी केली जात असल्याचा निर्वाळा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिला आहे. ही कामे स्थगित केली नसून, त्याचा वापर योग्य पद्धतीने केला जातो की नाही याची तपासणी केली जात असल्याचे सावरा यांनी सांगितले. त्यामुळे या कामांमधील गडबडी समोर येण्याची शक्यता असून, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची मिली-जुली उघड होणार आहे. दरम्यान, परिसर सेवा संस्थेने आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी दिलेल्या सूचनांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या विविध कामांचा व योजनांचा आढावा विष्णू सावरा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकील आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, आदिवासी विकास महामंडळाचे एमडी जगदाळे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना सावरा यांनी परिसर सेवा संस्थांकडून आदिवासी आश्रमशाळांमध्ये त्रुटी शोधण्यासह काही सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी विभागाकडून केली जाणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे टाकून त्यांना अधिकाधिक सेवा दिल्या जाणार असल्याचे सावरा यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या २१ कोटींच्या रस्ते व पुलांच्या वादग्रस्त कामांना स्थगिती दिली नसल्याचे स्पष्टीकरण सावरा यांनी दिले आहे. निधी परत जाणार असल्याने नियोजन विभागाने या कामांना घाईघाईत मान्यता दिली आहे. त्यामुळे ही कामे नियमानुसार मंजुरी झाली, की नाही याची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार चव्हाणांसोबत दिलजमाई

आदिवासी मंत्री सावरा आणि भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यात फारसे सख्य नव्हते. आदिवासी विभागातील नोकरभरतीत तीनशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. त्यावरून दोघांमध्ये बरेच मतभेद तयार झाले होते. परंतु, शुक्रवारच्या बैठकीत चव्हाण हे सावरा यांच्यासोबत होते. त्यामुळे सावरा यांनी चव्हाण आणि आपल्यात दिलजमाई झाल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला कडाडला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

वळवाच्या पावसाचा तडाखा, त्यानंतर पावसाने मारलेली दडी, ढगाळ वातावरणामुळे रोग-कीडींचा वाढलेला प्रादुर्भाव आणि जोराचा सुटलेला वारा याचा एकत्रित परिणाम फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. मागणी चांगली असल्यामुळे भाजीपाल्याला चांगले दर मिळू लागले आहेत. भाजीपाला महागल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. गावठी कोथिंबिरीची एक जुडी ५० ते १०० रुपयांपर्यंत विकली जात असून, इतरही भाज्या तीस रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.

यंदाच्या उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात भाजीपाल्याची लागवड झाली होती. साधारणतः उन्हाची तीव्रता वाढलेल्या वेळेत भाजीपाल्याचे पीक घेणे अवघड असल्यामुळे पॉलीहॉऊस आणि शेडनेटचा वापर करून ही पिके घेण्यात आली. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात भाजीपाल्याची आवक कमी असल्यामुळे भावात वाढ होते. मात्र, तरी या काळात वादळ, वारा, जोराचा पाऊस यांच्यामुळे पिके धोक्यात येत असतात. नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात यंदा वळवाचा पाऊस जोरदार बरसला. त्या पावसाने ही पिके झोडपली. त्यानंतर पावसाने एकदमच उघडीप दिली. ढगाळ वातावरण कायमच राहिल्याने पिकांवर रोग-कीडींचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला. त्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आणखी भर पडली ती सुटलेल्या जोराच्या वाऱ्याची. या वाऱ्यामुळे पिकांची फुले आणि कळ्या पडू लागल्यामुळे उत्पादनात आणखी घट आली.

मॉन्सूनची प्रतीक्षा

खरीपाच्या मोसमात लागवड होण्यासाठी मान्सूनची प्रतीक्षा आहे. ही लागवड होऊन तो भाजीपाला बाजारात येण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना भाजीपाला विकत घेताना खिशाला झळ पोहचणार आहे.


फळभाज्यांचे दर प्रति क्रेट रुपये

वांगी- ६०० ते ७००

दोडका - ४०० ते ८००

ढोबळी मिरची - ३०० ते ४००

कारली - ३०० ते ४०० रुपये

टोमॅटो २५०ते ३०० रुपये


कोथिंबिर- ५० ते १०० रुपये प्रतिजुडी

मेथी- ४० ते ६० रुपये प्रतिजुडी

कांदापात- ३० ते ४० रुपये प्रतिजुडी

फ्लॉवर- २० ते ४० रुपये प्रतिकिलो

कोबी- ४० ते ६० रुपये प्रतिकिलो

हिरवी मिरची - ४० ते ६० प्रतिकिलो

वालपापडी - ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रायसोनी’च्या ठेवीदारांचे मालेगावात उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील भाईचंद हिराचंद रायसोनी सोसायटीत शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी अडकल्या आहेत. सोसाटीच्या संचालकांसह सल्लागार मंडळावर गुन्हा दाखल झालेला असतांनाही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे संबंधितांना अटक करून ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी ठेवीदार ज्येष्ठ नागरिकांनी शुक्रवारी मालेगावात उपोषण केले.

पतसंस्थेच्या मालेगाव शाखेत शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक सल्लागार मंडळाच्या आश्वासनांवर गुंतवणूक केली. लाखो रुपयांच्या ठेवी असतांना शाखेकडून कुठलाही परतावा मिळाला नाही. आता तर शाखाही बंद आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आर्थिक फटका बसला आहे. या संदर्भात छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोन वर्ष उलटले तरीही संशयीतांना अटक झालेली नाही. त्यामुळे याकडे शासन व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी भर उन्हात उपोषण केले . या आंदोलनात अन‌िल पाठक, गोविंद राजपूत, सुनील आहीरे, अरुण भावसार, यागेश मोरे, शरद देवरे, गुलाब पाटील, मनोहर हिरे सहभागी झाले आहेत.
0000
पिंपळगावात दरोडा

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत/निफाड

पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड रोड लगत राहणाऱ्या रवींद्र रामदास मोरे यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडा पडला. चोरट्यांनी मोरे कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला असून, रवींद्र मोरे व त्यांच्या वहिनी शीतल मोरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोरट्यांनी दहा हजार रुपये, मंगळसूत्र लंपास केले. या घटनेमुळे परिसरात भीती पसरली असून, पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

चिंचखेड रोडलगत असलेल्या मोरे बंगल्याच्या स्वयंपाकघराचा दरवाजा तोडून दरोडेखोर आत घुसले. शीतल मोरे यांनी चोरट्याना पाहताच आरडाओरड केली. त्यामुळे रवींद्र मोरे यांना जाग आली. त्यांची दरोडेखोरांशी झटापट झाली. दरोडेखोरांनी लाकडी दांडक्यांनी रवींद्र मोरे यांच्या डोक्यात वार केला. त्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांनी शीतल यांनाही मारहाण केली. घरातील लहान मुलांनाही एका खोलीत बंद केले. घरातील दहा हजाराची रोकड व शीतल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून घेतले. सर्व दरोडेखोर हिंदीत बोलत असल्याचे मोरे कुटुंबियांनी सांगितले.

इतर घरांवरही दगडफेक

चोरटे मोरे यांच्या घरात असताना त्यांचे दोन साथीदार बाहेर उभे होते. मोरे यांच्या घरात सुरू असलेला प्रकार समोर राहणारे दीपक शिंदे यांना कळताच त्यांनी मित्रांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोरे यांच्या घराबाहेर असलेल्या दोघांच्या हे लक्षात येताच त्यांनी शिंदे यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर सोमनाथ निकम यांनी पोल‌िस स्टेशनला फोन केला. परंतु फोन उचलला गेला नाही. नंतर पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर व अग्निशमन दलाचे कार्यकर्ते येथे आले. तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.

पोलिसांना पोहोचण्यास उशीर

पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली, तरी पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच पोलिस स्टेशनमध्ये फोन केला असता तो कुणीही घेतला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवडीचा श्रीगणेशा

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

पावसाळा सुरू झाल्याने शहर परिसरात वृक्ष लागवडीसाठी बीज संकलनाच्या आवाहनास लाभलेल्या उदंड प्रतिसादानंतर आता हरितविश्व ग्रुपने यंदाच्या प्रत्यक्ष वृक्ष लागवड मोहिमेस प्रारंभ केला आहे. शहरातील आयुर्वेदिक डॉक्टर्सची हरितविश्व आणि या उपक्रमाचा मीडिया पार्टनर ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे यंदाच्या वृक्ष लागवडीसाठी बीज संकलनाचे आवाहन करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर परिसरात ही वृक्ष लागवड सुरू झाली असून, त्यासाठी डॉक्टरांची विविध पथकेही सज्ज झाली आहेत.

वृक्षसंवर्धनासाठी सध्या सर्वच स्तरांवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. विद्यार्थी, नागरिक, तसेच डॉक्टर्स वृक्षसंवर्धनासाठी पुढे आले आहेत. नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर्स ‘हरितविश्व’च्या छताखाली नाशिक व जवळपासच्या परिसरात वृक्ष लागवडीचे कार्य करीत आहेत. ‘हरितविश्व’मार्फत नाशिक व जवळपासच्या डोंगराळ भागात वृक्ष लागवडीचे कार्य सुरू असून, गेल्या दोन महिन्यांपासून नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर्स वेगवेगळ्या तुकड्यांमध्येे वृक्ष लागवड करीत आहेत. ‘हरितविश्व’तर्फे ब्रह्मगिरी येथे आतापर्यंत एक हजार औषधी वृक्षांची लागवड झाली आहे.

‘हरितविश्व’तर्फे नाशिक व जवळच्या भागात सीड बॉल्सद्वारे वृक्षारोपण करण्यात आले आहे. बीजांना बॉल्सचे स्वरूप देऊन त्यांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती हरितविश्वचे डॉ. राहुल चौधरी यांनी दिली. उत्तम स्वरूपाचे बीज, गोमूत्र, शेण, जैविक कीटकनाशकांचा वापरदेखील केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणेे यापुढे बेळगाव ढगा ते ब्रह्मगिरी डोंगर रांग या भागात वृक्षारोपण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पांडवलेणी, भास्करगड, हरिहर किल्ला या परिसरातील डोंगराळ भागातदेखील वृक्षारोपण होणार असल्याचे डॉ. राहुल चौधरी यांनी सांगितले. वृक्षारोपणाच्या ठिकाणी सर्व डॉक्टर्स एकत्रित येऊन नागरिकांच्या मदतीने वृक्षारोपण करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉक्टर्स, नागरिकांचा पुढाकार

वृक्षारोपणासाठी नाशिकमधील विविध ठिकाणी डॉक्टर्स आणि नागरिक काम करीत आहेत. डॉ. संदीप अहिरे, डॉ. संदीप पाटील, प्रसाद झेंडे, सागर जोशी, अमोल साळुंके, चंदन उमाळे, केतन पाटील, रवीभूषण सोनवणे, देवेंद्र बच्छाव, मुकुंद खानापुरे, तुषार निकम, रोहिणी पाटील यांनी यासाठी योगदान दिले आहे.

अन्य ग्रुप्सही सरसावले

ग्रीन रिव्हॉल्युशन ग्रुपतर्फे चुंंचाळे शिवार येथे पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, तसेच सोशल नेट्वर्किंग ग्रुपतर्फे पाचशे झाडे लावण्यात आली आहेत. पंचवटी डॉक्टर्स ग्रुपतर्फे पाचशे झाडांची लागवड करण्यात आली आहे, तर मानव ग्रुपतर्फे गेल्या महिन्यात पाचशे झाडांची लागवड करण्यात आली आहे.

या झाडांची झाली लागवड

हरितविश्वतर्फे हिरडा, बेहडा, आवळा, आंबा, चिंच, करवंद, बांबू, मोह, फणस, साग, शिंदळ, भोकर, सीताफळ, बाभूळ, कडुनिंब, शिरीष, बोर यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.


हा परिसर बहरणार

बेळगाव ढगा ते ब्रह्मगिरी डोंगररांग, पांडवलेणी, दुधाळा, महिरावणी, सासाळा, तळेगावच्या पाच्या, अंजनेरी, वाढोलीचा धामणगड, कारवी, कोथळा, रांजनगड, सरड्या, ब्रह्मा, नागफणी, कोधला-मोधला, आठवा, सोलावा, भास्करगड, हरिहर, नाशिक आजूबाजूची लहान गावे, किल्ले यांसारख्या डोंगराळ भागात वृक्षारोपण होणार असल्याची माहिती ‘हरितविश्व’चे डॉ. राहुल चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गावितांसह अधिकारी गोत्यात?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या न्या. एम. जी. गायकवाड चौकशी समितीचा सीलबंद अहवाल उघड करण्याची मागणी विभागाने केली आहे. हा अहवाल हायकोर्टात असून, तो उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर यातील दोषींवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोप ठेवलेले माजी मंत्री व भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावितांसह बड्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. दरम्यान, आदिवासी विकास महामंडळातील नोकरभरती प्रकरणाचा चौकशी अहवाल हा विधी व न्याय विभागाकडे अभ्यासासाठी गेला असून, विभागाच्या सल्ल्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सावरा यांनी दिली आहे.

सावरा यांनी शुक्रवारी आदिवासी विकास आयुक्तालयात विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरा यांनी विभागाने भ्रष्टाचार रोखण्यासाठी आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वस्तूंऐवजी थेट डीबीटीचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे तक्रारी आणि भ्रष्टाचार कमी झाल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत ६० टक्के मुलांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. सोबतच वसतिगृहातील मुलांना प्रवेश मिळाला नाही तर तालुका स्तरावरही शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांना आता थेट रोख रक्कम दिली जात आहे. त्याचा सर्व खर्च भागावा यासाठी त्याच्या खात्यात पैसे जमा केले जात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आदिवासी विभागातील न्या. एम. जी. गायकवाड समितीच्या चौकशी अहवालातील दोषींवरील कारवाईसंदर्भात बोलताना सावरा यांनी समितीने दिलेला अहवाल अजूनही सीलबंद आहे. हा सीलबंद अहवाल उघड करण्याची परवानगी आम्ही मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही. या समितीने जवळपास ७३ कोटींचा भ्रष्टाचार शोधून काढला असून, माजी मंत्री डॉ. गावितांसह चार अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर ठपका ठेवला आहे. त्यामुळे अहवाल उघड झाल्यास डॉ. गावितांसह सर्व अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याने डॉ. गावितांचे राजकीय भवितव्यही पणाला लागणार आहे.

नोकरभरती विधी विभागाकडे

दरम्यान, आदिवासी विकास महामंडळातील तीनशे कोटींच्या नोकरभरती घोटाळ्याची चौकशीही पूर्ण झाली असून, या चौकशी अहवालाची छाननी करण्यासाठी हा अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सावरा यांनी दिली आहे. या विभागाच्या अभिप्रायानंतर यातील दोषींवरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे महामंडळाच्या नोकरभरती घोटाळ्यातील तत्कालीन बड्या अधिकाऱ्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीच या घोटाळ्याची तक्रार केली होती. तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवलेंनी या प्रकरणी चौकशी केली असून, दोषींवरील कारवाईची प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्मा स्मारक टाकणार कात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील हुतात्मा स्मारकाच्या दुरवस्थेसंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल तयार केला असून, येथील कामांची पाहणीदेखील केली आहे. येथील दुरुस्तीच्या कामांसाठी टेंडर काढण्यात आले असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांनी दिली. हुतात्मा स्मारकाची दुर्दशा झाल्याच्या आशयाचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार स्वातंत्र्यसैनिक संघटनेने पुढाकार घेत नाशिक महापालिकेला निवेदन दिले होते. या ठिकाणी ज्या उणिवा आहेत किंवा जी दुरुस्ती करायची आहे, त्याबद्दलची माहिती महापालिकेचे अधिकारी यू. बी. पवार व गांगुर्डे यांना कळ‍विली होती. त्यानुसार या दोन अधिकाऱ्यांसह पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून काम करण्याला मान्यता दिली आहे.

स्मारकाच्या मुख्य इमारतीबरोबरच परिसराचाही विकास केला जाणार आहे. या ठिकाणचे वायरिंग जुने झालेले आहे. परिणामी अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना व कार्यक्रमासाठी येणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याकरिता जुनाट झालेले वायरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बाहेरील बाजूस असलेले पेव्हर ब्लॉक काही ठिकाणी खाली-वर झाले आहेत. त्यांचेदेखील सपाटीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी फरशा उखडल्या आहेत. काही फरशांना तडे गेले आहेत. त्या फरशा दुरुस्त करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दरवाज व खिडक्या जीर्ण झाले आहेत. ते तातडीने बदलण्यीच गरज असून, काही ठिकाणी दुरुस्ती करावी लागणार आहे. हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे टॉयलेटचेही काम हाती घेण्यात आले आहे. त्याचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपायुक्तांसह अधीक्षकांची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि विविध कर वसुलीच्या कामांत अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, स्थायी समिती सदस्यांनी विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम आणि सहायक अधीक्षक सुरेश आहेर यांची चौकशी करून निलंबन करण्यात यावे, अशी मागणी केली. अतिक्रमण काढणे, अनधिकृत होर्डिंग काढणे, जाहिरात कर वसुली करणे आदींमध्ये दोघांनी हयगय केल्याचा ठपका सदस्यांनी पत्रात ठेवला आहे. त्यामुळे सभापतींनी दोघांच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती नियुक्त केली. या समिताला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्थायीच्या सर्व पंधरा सदस्यांनी सभापती शिवाजी गांगुर्डे यांना पत्र देवून बहिरम व आहेर यांची चौकशी व निलंबनाची मागणी केली. शहरात अनधिकृत जाहिरात फलक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. जाहीरात कर वसुलीतही भ्रष्टाचार केला जात आहे. अतिक्रमणाला अभय दिला जात आहे. तसेच घरकूल योजनेतही घोळ असल्याचे आरोप करण्यात आला. बहिरम व आहेर यांनी आर्थिक अनियम‌ितता करत कोट्यवधींची माया जमविल्याचा आरोपही सदस्यांनी केला आहे. कारवाई झाली नाही तर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सदस्यांनी दिला आहे.

तीन महिन्यांत निकाल?

बहिरम यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी सदस्यांच्या भावना तीव्र असल्याने गांगुर्डे यांनी त्यांच्यासह आहेर यांची चौकशी करण्याची घोषणा केली. दोघांच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. संबंधित समितीत मुख्य लेखापरिक्षक महेश बच्छाव, सदस्य शशिकांत जाधव, सूर्यकांत लवटे, जगदीश पाटील, मुशीर सैय्यद, डी. जी. सूर्यवंशी, मुकेश शहाणे यांचा समावेश आहे. ही समिती तीन महिन्यांत चौकशी करून स्थायी समितीला अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे बहिरम आणि आहेर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका बजेट फुगवले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदतीचे हात वर केलेले असतानाही सत्ताधारी भाजपने कोटीच्या कोटी उड्डाने घेण्याचे सुरूच ठेवले आहे. प्रशासनाने सादर केलेल्या बजेटमध्ये स्थायी समितीने ३८९ कोटींची वाढ सुचवल्याने बजेट १७९९ कोटींवर पोहचले होते. महासभेनेही त्यात ३७४ कोटींची वाढ केल्याने बजेट दोन हजार कोटींचा टप्पा ओलांडून २ हजार १७३ कोटींवर पोहचले आहे. त्यात शासनाकडून तीनशे कोटींच्या मदतीची अपेक्षा करण्यात आली आहे. या बजेटच्या अंमलबजावणीचे खडतर आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या बजेटचा महासभेचा ठराव नगरसचिव विभागाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने स्थायी समितीला १४१० कोटींचे व सहा कोटी शिलकी बजेट सादर केले होते. स्थायी समितीने यात ३८९ कोटींचा वाढ केली होती. महापौरांनी बजेटचा सादर केलेल्या ठरावात ३७४ कोटींची वाढ केली.

असे वाढले बजेट

खेडे विकासासाठी दहा कोटी, महापौर निधी पाच कोटी, उपमहापौर निधी तीन कोटी, स्थायी समिती सभापती तीन कोटी, सभागृहनेता दोन कोटी आणि विरोधी पक्षनेत्यासाठी एक कोटींचा निधी गृहीत धरण्यात आली आहे.
0000

जिल्हा बँकेच्या २१ संचालकांना नोटिसा
नोकरभरती, सीसीटीव्ही खरेदीप्रकरण भोवणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही कोट्यवधी रुपयांचे सीसीटीव्ही व तिजोऱ्या खरेदी तसेच नोकरभरती केल्याचे प्रकरण आता अध्यक्षासंह संचालकांच्या अंगलट आले आहे. ही खरेदी आणि नोकरभरती प्रकरणात जिल्हा बँकेचे आर्थिक नुकसान झाले म्हणून सहकार कायदा अधिनियम १९६० च्या कलम ८८ नुसार अध्यक्षांसह सर्व संचालकाना जिल्हा उपनिबंधकाना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. येत्या १० जुलै रोजी संचालकांच्या नोटिंसावर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह संचालकांच्या अडचणी वाढणार आहेत.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बेकायदेशीर कामकाजप्रकरणी सहकार विभागाकडे

अनेक तक्रारी झाल्या आहेत. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह संचालकांनी जवळपास चारशे कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती केली आहे. सोबतच कोट्यवधी रुपयांची सीसीटीव्ही खरेदी आणि तिजोरी खरेदी केल्या आहेत. यासाठी सहकार विभागाच्या नियमांचीही पायमल्ली केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे झाल्या आहेत. त्यानुसार या संचालकांनी चौकशीही करण्यात आली असून, त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी या संचालकांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सर्व संचालकांना जबाबदार धरण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांना येत्या १० जुलैपर्यंत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या संचालकांच्या अडचणीत भर पडली आहे. या आधी नोटाबदली प्रकरणात काही संचालक चौकशीच्या फेऱ्यात आले होते. त्यातून सही सलामत सुटले असतानाच आता थेट ८८ नुसार अपात्रतेच्या नोटिसा मिळाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कठोर कारवाई करा

जिल्हा बँकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळाने गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी विविध खरेद्यांमध्ये रस घेतला होता. सीसीटीव्ही, तिजोऱ्या खरेदीची आवश्यकता नसताना त्या खरेदी करण्यात आल्यात. तर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची क्षमता नसतांना आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी त्यांनी लावली होती. त्यामुळे जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी बँक डबघाईस गेली. त्यामुळे या

बँकेच्या संचालकांना अपात्र ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अविश्वास’ची नामुष्की टळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी अविश्वास ठरावापूर्वीच राजीनामा दिल्याने शुक्रवारी झालेली विशेष सभा कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव न मांडता तहकूब करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षपद रिक्त झाले असून, सध्या उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव हे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळणार असल्याचे समजते. लढ्ढा यांनी राजीनामा दिला नसला तरी आज अविश्वास ठराव दाखल करणारच होतो, असे विरोधी गटाने यावेळी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून डीपीच्या घोळामुळे त्र्यंबकेश्वर नगरपरषिदेच्या कारभारावर बोट ठेवण्यात आले होते. त्यामुळे शहराच्या विकासाच्या आड येणार नाही असे सांगून गुरुवारी दुपारी विजया लढ्ढा यांनी नाशिक येथे उपजिल्हाधिकारी शश‌िकांत मंगरूळे यांच्याकडे राजीनामा दिला होता. मात्र अविश्वास ठरावाची सभा पूर्वनियोज‌ीत दिवशीच होईल, असे प्रशासनाने तेव्हाच स्पष्ट केले होते. त्यानुसार त्र्यंबक नगरपरिषद कार्यालयात शुक्रवारी मोठा पोल‌िस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपालिका परिसरात ११ वाजून ४० मिनीटांनी अज्ञातस्थळी रवाना असलेले १३ नगरसेवक वाहनाने पोहोचल्यानंतर सभेला सुरुवात झाली.

पालिकेच्या सभागृहात बारा वाजता प्रांताधिकारी राहुल पाटील, नायब तहसीलदार मोहन कनोजे आणि मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांनी सभा सुरू केली. सभेस गटनेते योगेश तुंगार, रवींद्र सोनवणे, तृप्ती धारणे, अनघा फडके, अभिजीत काण्णव, यशोदा अडसरे, अलका शिरसाठ, अंजनाबाई कडलग, सिंधू मधे, आशा झांबाड, रवींद्र गमे, शकुंतला वाटाणे, स्वीकृत सदस्य माधुरी जोशी, राहुल फडके उपस्थित होते.

विजया लढ्ढा आणि त्यांच्या समर्थक गटातील धनंजय तुंगार, संतोष कदम, यशवंत भोये हे चार सदस्य अनुपस्थित होते. दरम्यान सभा सुरू होताच पिठासन अधिकारी राहुल पाटील यांनी सभा ज्या उद्देशने बोलावण्यात आली आहे त्या नगराध्यक्षांनी आधीच राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूरही झाल्यामुळे ही सभा कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव न मांडता आणि मतदान न घेता संपली, असे जाहीर केले.

आम्ही लढाई जिंकलो...

सभागृहातून बाहेर आल्यानंतर गटनेते योगेश तुंगार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. नगराध्यक्षांनी राजीनामा दिला नसता तरी देखील १३ नगरसेवकांनी एकजुटीने अविश्वास प्रस्ताव पूर्ण केला होता. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावेच लागले असते. आम्ही त्यांना नेतृत्त्व दिले, मात्र त्यांनी शहर विकास आराखड्यात स्वतःच्या मर्जीने बदल केले. त्यांचे पती दीपक लढ्ढा कामकाजात हस्तक्षेप करीत होते. त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा मागीतला. त्याला सुरुवातीला त्यांनी नकार दिला. मात्र नगरसेवक एकत्र झाल्यावर त्यांनी अविश्वासाची नामुष्की टाळण्यासाठी राजीनामा दिला. भ्रष्ट कारभाराविरूध्द आमची लढाई होती. ती आम्ही जिंकली आहे, असे योगेशे तुंगार म्हणाले.

तुप्ती धारणे यांच्या नावाची चर्चा

नगराध्यक्षपद रिक्त झाल्याने उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव हे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळणार असल्याचे समजते. अर्थात लवकरच नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. भावी नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या तृप्ती धारणे यांचे नाव चर्चेत आहे. सर्वच नगरसेवकांचा त्यांना पाठींबा राहील असे दिसते.

...यांच्याकडून राजीनाम्यासाठी दबाव

नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडण्यापासून ते त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात गटनेते योगेश तुंगार यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष शांताराम बागुल, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख नितीन पवार, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, शिवसेनेचे कल्पेश कदम, संजय हरळे, काँग्रेस शहराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, पहिलवान पिंटू काळे आदींसह राजकीय सामाज‌िक वर्तुळातील अनेकांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑलिम्पिक सप्ताहानिमित्त धावले विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे एक किमी अंतराची ‘ऑलिम्पिक डे रन’ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौर रंजना भानसी व अर्जुन पुरस्कारप्राप्त ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत, डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते ऑलिम्पिक स्पर्धांचे जनक बॅरन पिअर द कुबर्टिन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संस्थेने मराठीत तयार केलेल्या ऑलिम्पिक गीताची धून वाजवून ऑलिम्पिक ध्वजारोहण करण्यात आले.
‘वर्ल्ड ऑलिम्पिक डे रन’ला संस्थेचे सर्वोत्कृष्ट खेळाडू सागर गाढवे, निकीता संभेराव, पायल पळसकर, हर्षल शार्दूल, गौरव लांबे, प्राजक्ता बोडके, स्नेहल विधाते, शरयू पाटील, अंजली मुर्तडक यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करुन सुरुवात करण्यात आली. यावेळी मविप्र मॅरेथॉन चौक ते व्ही. एन. नाईक चौक व पुन्हा मविप्र मॅरेथॉन चौक असा एक किमी अंतराची रन करण्यात आली. यामध्ये नाशिक जिल्हा स्केटिंग, रोईंग, अॅथलेट‌िक्स, कॅनोइंग, हँडबॉल, आर्चरी, योग असोसिएशन, सॉफ्टबॉल तसेच संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी, शिक्षक, खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
यानिमित्त ऑलिम्पिकविषयी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक होरायझन अॅकेडमीच्या ओम लवांड याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय रुचिता आहिरराव तर तृतीय क्रमांक जनता विद्यालयाच्या हर्ष गुंजाळ याने मिळवला. या कार्यक्रमाला महापौर रंजना भानसी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मविप्रच्या सरचिटणीस नील‌िमा पवार, आमदार जयंत जाधव, माजी महापौर अशोक मुर्तडक, अजय बोरस्ते, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य अशोक दुधारे आदी उपस्थित होते.

आठवडाभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
क्रीडा साधना संस्था, कै. के. एन. डी. मंडळ आणि नाशिक क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त क्रीडा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सलग ११ वे वर्ष होते.
नाशिकच्या प्राचीन आणि प्रसिद्ध काळाराम मंदिरापासून क्रीडा रॅलीला सुरुवात झाली. ऑलिम्पियन कविता राऊत हिच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
ही रॅली पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, टिळक रोड आणि महात्मा गांधी रोडमार्गे यशवंत व्यायाम शाळा येथे समाप्त करण्यात आली. यशवंत व्यायाम शाळेत रॅलीचे स्वागत नाशिकमधील छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक साहेबराव पाटील, छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू स्नेहल विधाते आणि यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या वतीने करण्यात आले. यानंतर सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद खरे यांनी केले. ऑलिम्पिक सप्ताहाचा हा उपक्रम गेल्या ११ वर्षांपासून राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. जयप्रकाश दुबळे म्हणाले, की अशा उपक्रमांमुळे दर्जेदार खेळाडू तयार होण्यास मदत होते. यासाठी शासनाचेही संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी साहेबराव पाटील यांनीही मार्गर्दर्शन केले. सूत्रसंचलन अशोक दुधारे यांनी केले.
३० जून रोजी दुपारी चार वाजता या सर्व स्पर्धांचा एकत्रित पारितोषिक वितरण समारंभ कालिका मंदिर हॉल येथे होणार आहे. या समारंभासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक समितीचे पदाधिकारी उपास्थित राहणार आहेत, अशी माहिती या सप्ताहाचे समन्व्ययक नितीन हिंगमिरे यांनी दिली. यावेळी क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, आनंद खरे, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, नितीन हिंगमिरे, राजू शिंदे, कुणाल अहिरे, विक्रम दुधारे, चिन्मय देशपांडे, मकरंद सुखात्मे आदी उपस्थित होते.

मराठा हायस्कूलचे ३५० खेळाडू धावले
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. आधुनिक ऑलिम्पिकचे जनक बॅरन पियर दि कुबर्टिन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून शाळेत ‘वर्ल्ड ऑलिंपिक डे’चे ध्वज लावून वातावरणनिर्मिती करण्यात आली. तसेच शाळेतील सर्वच खेळांतील सुमारे ३५० खेळाडूंनी एक किमी सद्भावना ऑलिम्पिक दौड यातही सहभाग घेतला.
याप्रसंगी शाळेच्या क्रीडा विभागाच्या वतीने घोषवाक्य, ऑलिम्पिक पोस्टर्स, स्टिकर्स, प्रकल्प स्पर्धा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयाच्या मुख्य कार्यक्रमात ऑलिम्पिक दिवसाचे महत्त्व व आधुनिक ऑलिम्पिकचे जनक बॅरन पियर दि कुबर्टिन यांच्या योगदिनाविषयीची माहिती क्रीडा विभागाचे प्रमुख सोपान वाटपाडे यांनी दिली. ते म्हणाले की, २३ जून १९८४ रोजी पॅरीस येथे दिडशे देशांच्या प्रतिनिधींसमोर बॅरन पियर दि कुबर्टिन यांनी आपली योजना मांडली व सन १८९६ च्या अथेन्सच्या ऑलिंपिक स्पर्धेच्या रुपाने आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाले. म्हणून २३ जून हा दिवस संपूर्ण जगात जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून संपूर्ण साजरा केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदी पासपोर्टची छपाई ना‌शिकला

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
केवळ इंग्रजीमध्येच छापला जाणारा पासपोर्ट आता राष्ट्रभाषा हिंदीतही उपलब्ध होणार आहे. पासपोर्ट छपाई फक्त नाशिक प्रेसमध्ये होते. वर्षाला दीड कोटी इंग्रजी पासपोर्ट छपाई करणाऱ्या नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसलाच हिंदीतील पासपोर्ट छपाईचे काम दिले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘मटा’ला दिली आहे. ई-पासपोर्टचीही छपाईही लवकरच होणार आहे.
पासपोर्टमधील व्यक्त‌िगत माहिती ही इंग्रजीतच छापली जाते. अनेक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत परराष्ट्र मंत्रालयाकडे तक्रारी केल्या होत्या. अरब देशांचे पासपोर्ट हे अरबी भाषेत आहेत. जर्मनी आणि रशिया देखील त्यांच्या भाषेतच पासपोर्ट छापतात. त्यामुळे भारतातही हिंदीत पासपोर्ट हवा अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे.
आठ वर्षांखालील मुले आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठांना पासपोर्ट फीमध्ये दहा टक्के सवलत देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणीही केली जाणार आहे. अधिकृत ओळखपत्र आणि भविष्यातील गरज म्हणून पासपोर्ट काढण्याकडे कल वाढतच आहे.
आता हिंदीतही पासपोर्ट तयार होणार आहे. ई-पासपोर्टही येथे छापला जाणार आहे. त्यामुळे नाशिकच्या प्रेसकडे पासपोर्ट छपाईचे काम वाढणार आहे.
पासपोर्ट मिळणे सोपे पासपोर्ट देताना पोलिस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्यामध्ये भरपूर वेळ जातो. चंडिगढ, गुजरात, गोवा राज्यात आठवडाभरात व्हेरिफिकेशन होते. महाराष्ट्रात मात्र वेळ लागतो. अन्य अनेक अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी सरकारने तत्काळ पासपोर्ट देण्याचे ठरवले आहे. अर्जदाराने आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्राची साक्षांकित प्रत आणि त्यासोबत आपल्याविरुध्द कोणतीही गुन्हेगारी स्वरुपाची तक्रार नसल्याचे स्वतःच्या सहीचे पत्र दिल्यास तत्काळ पासपोर्ट दिला जाणार आहे.

हिंदीमध्ये पासपोर्ट छपाईचे आदेश दिले असल्यास तो येथील प्रेस कामगारांवर सरकारने दाखवलेला मोठा विश्वास आहे. नवीन आव्हान स्वीकारण्यास आमचे मेहनती कामगार तयार आहेत. या आधीही कामगारांनी त्यांची गुणवत्ता सिध्द केली आहे.
- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images