Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पिंपळगाव बसवंत दहशतीखाली

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत शहर परिसर गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडा, चोरी आदी घटनांमुळे चांगलाच हादरला आहे. त्यातच सोवारी घडलेल्या दोन घटनांमध्ये तिघांचा खून, एकाची आत्महत्या यामुळे संपूर्ण शहरासह परिसरावर दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिस यंत्रणा याविरुद्ध कठोर भूमिका कधी घेणार, असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गेल्या आठवड्यात शहरातील चिंचखेड रोड भागात आठ दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील दोघांना निर्दयीपणे मारहाण केली. काही घरांवर दगडफेक केली. हजारोंचा चोरून नेला. या घटनेला चार पाच दिवस उलटले तरीही पोलिसांच्या हातात अद्याप कोणताच पुरावा हाती आलेला नाही. दरोड्याच्या घटनेमुळे नागरिक दहशतीखाली असतानाच सोमवारी मध्यरात्री पिंपळगाव शहरात तीन खून झाले. यात दोन निष्पाप लहान मुलांचे बळी गेले. या घटना पिंपळगाव शहराला काळिमा फासणाऱ्या आहेत. शिवाय पोलिसांच्या कार्यक्षमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. लागोपाट खून दरोडा सारख्या घटना शहरात घडत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र पिंपळगाव शहरात निर्माण झाले आहे.

पिंपळगाव बसवंत सुस्कंकृत, शांतताप्रीय शहर आहे. येथे विविध धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळेच देशभरातील अनेक नागरिक व्यवसाय नोकरीनिमित्ताने येथे स्थायीक झाले आहेत. शहराची व्याप्ती वाढली. नवीन उपनगरे उद्यास आली आहेत.

मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील शांतता सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मोबाइल चोरी, चेन स्नॅचिंग, महिलांची छेडछाड असे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यातच आता खून, दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पिंपळगाव शहरासाठी हे प्रकार धोक्याची घंटा आहेत. परिसरात अनेक सधन शेतकरी मळ्यात, वस्तीवर राहतात. या घटनांमुळे मळ्यातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. शहरातील शांतता सुव्यवस्था लक्षात घेऊन पोल‌िसांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे, अशीच रास्त अपेक्षा आता नागरिक व्यक्त करीत आहेत.

पोलिसांचे हातावर हात

शहरात अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्यांचे पोलिसांशी साटेलोटे असल्यामुळे हा प्रकार सुरू आहे. या व्यावसायिकांकडून पोलिसांना मिळणाऱ्या हप्त्यांमुळे पोलिसांचेही हात बांधले गेले आहेत, अशी उघडउघड प्रतिक्रिया येथील नागरिक देत आहेत. पिंपळगाव बसवंत येथे बदली मिळावी म्हणून पोलिस निरिक्षकांची अक्षरश: स्पर्धा चालते, असेही काही पोलिस खासगीत सांगतात.

शहरात चोऱ्या सुरुच…

रवींद्र मोरे यांच्या घरावर दरोडा टाकून चार दिवस ऊलटत नाही तोच परिसरातील बंद घराचा फायदा घेत सोमवारी दिवसा घरफोडी करण्यात आली. उंबरखेड रोडवरील भिडे नगरातील गोरख सुभाष खैरनार सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेले असता, दुपारी घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साठ हजार रुपये लंपास केले. याच रोडवरील साईकृपा अपार्टमेंट मधील संजय शार्दुल यांच्या बंद घरातून तेरा हजार रुपये, दागिने चोरून नेले. तसेच दाते कुटूंब नोकरी निमित्ताने रोज बाहेर पडते. त्यांच्या घरातूनही पाच हजार रुपये व मोबाइलची चोरी केली आहे. तर रात्री मोहम्मद अमिर सिद्दगी यांचे तीनशे पत्रे व इतर सामानाची चोरी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विद्यार्थी मित्र’ ठरतेय मार्गदर्शक

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

डिजिटल इंडियात आता शैक्षणिक कोणतीही माहिती एका क्लिकवर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. विद्यापीठे, कॉलेजेस, कोर्सेस, एन्ट्रन्स एक्झामसोबतच करिअर कौन्सिलिंग असो किंवा हव्या त्या फॅकल्टीच्या एक्स्पर्टसोबतच बोलण्याची संधी, हे सर्व एकाच ठिकाणी मिळणे आता शक्य झाले आहे. ते म्हणजे ‘विद्यार्थी मित्र’ वेबसाइट. प्राथमिक शिक्षण घेण्याऱ्यांपासून पीएच.डी.पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ही वेबसाइट मार्गदर्शक ठरत आहे.

www.vidyarthimitra.org ही वेबसाइट राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. डिजिटल इंडियातील स्मार्ट विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. या वेबसाइटवर देशातील महत्त्वाच्या व नामांकित सर्व विद्यापीठांची व शैक्षणिक संस्थाची माहिती अपलोड करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी घरबसल्या ऑनलाइन स्वरूपात देशभरातल्या सगळ्या इन्स्टिट्यूट व विद्यापीठांच्या कोर्सची माहिती घेत तेथील प्रवेशप्रक्रिया व अभ्यासक्रम जाणून घेऊ शकतो. यासोबतच स्पर्धापरीक्षा, विविध विद्यापीठांच्या व कॉलेजच्या फॅकल्टी कोर्ससाठीच्या एन्ट्रन्स टेस्टची माहिती या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या वेबसाइटवर करिअर कौन्सिलिंगचाही पर्याय उपलब्ध आहे. विद्यार्थी अनेकदा करिअर निवडीबाबत संभ्रमात असतात. यासाठी करिअर कौन्सिलिंग हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. करिअर कौन्सिलिंग पर्यायाअंतर्गत एक्स्पर्टसोबत चॅट करण्याचा पर्याय या वेबसाइटवर देण्यात आला आहे. यामुळे एखाद्या प्रश्नाचे किंवा समस्येचे उत्तर घरबसल्या एक्स्पर्टकडून मिळवणे आता शक्य झाले आहे. विद्यार्थी मित्र या वेबसाइटवर सरकारकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकालही जाहीर केले जात आहेत. यासोबतच शिक्षण क्षेत्रातल्या बातम्यादेखील या वेबसाइटवर अपलोड केल्या जात आहेत. कॉलेजांच्या मेरिट लिस्ट, त्यांचे सर्टिफिकेट कोर्सेस यांची माहिती एका क्लिकवर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असल्याने ही वेबसाइट ‘टीचिंग गुरू’ची भूमिका पार पाडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेरोजगारांसाठी उद्या मेगा रोजगार भरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे सुशिक्षित बेरोजगारांसाठी एकूण १५९ रिक्त पदांसाठी गुरुवारी, २९ जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मेळावा होणार आहे. कॉलेज रोडवरील बीवायके कॉलेजमध्ये हा मेळावा होईल.

जिल्ह्यातील डेटामॅट्रिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि. नाशिक (ट्रेनी ५० पदे), धुमाळ इंडस्ट्रीज लि. सातपूर (ट्रेनी १७१ पदे), इपकॉस इंडिया प्रा.लि. सातपूर (ट्रेनी २० पदे), जनरल मिल्स इंडिया लि. माळेगाव सिन्नर (ईपीपी ट्रेनी १५ पदे), मे. शारदा मोटर्स इंडस्टीज लि. सातपूर ना‍शिक (ईपीपी वेल्डर, फिटर ३० पदे), सिप्रा इंजिनीअरिंग प्रा.लि. सातपूर नाशिक (मेन्टेनन्स इंजिनीअर १० पदे), जिंदाल सॉ मिल माळेगाव सिन्नर (ट्रेनी- ८, टर्नर/गाइडर, सीएनसी ऑपरेटर), डब्लूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि. इंदिरानगर (डाटा प्रोसेसिंग ऑपरेटर १० पदे) या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीला कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन निवड केली जाणार आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत असून, त्यांतर्गत ब्यूटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग, गारमेंट, अॅग्रीकल्चर बिझनेस अँड कॅामर्स, रिटेल अॅटोमोटिव्ह, प्लास्टिक प्रोसेसिंग, बँकिंग अँड अकौंटिंग, मेडिकल अँड नर्सिंग, प्रॉडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रीकल, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी आणि इतर क्षेत्रांतही रोजगारक्षम विनामूल्य कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. उद्योग व्यवसाय मेळाव्यात व स्वयंरोजगारासाठी कर्ज सहाय्यकरणाची शासनाची विविध महामंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विविध महामंडळांकडून कर्जसहाय्य घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची येथे नोंदणी करण्यात येणार आहे. या वेळी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, त्यासाठी शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा व उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, रेशनकार्ड अनुभव प्रमाणपत्र, व्यवसायासाठी जागा उपलब्धता इ. कागदपत्रे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे. इच्छुकांनी किमान पाच प्रतींत बायोडाटा, फोटो, आधारकार्ड, सेवायोजना नोंदणीसह मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदारांचे ना‘राजीनामास्त्र’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरिबांना स्वस्तात धान्य वितरित करणाऱ्या रेशन दुकानदारांना दरमहा ३० हजार रुपये मानधन द्यावे, २०१४ पासूनचे थकीत अनुदान मिळावे, अन्नसुरक्षा कायद्याप्रमाणे दुकानांपर्यंत माल पोहोच करावा आदी मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने जिल्ह्यातील ९० रेशन दुकानदारांनी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे सामूहिक राजीनामे सुपूर्द केले. एक जुलैपासून धान्य न उचलण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार महिनोन् महिने सरकारदरबारी हेलपाटे मारत आहेत. अन्न व पुरवठामंत्र्यांशी अनेकदा चर्चा करूनही आश्वासनांपलीकडे काही मिळाले नाही, अशी कैफियत त्यांच्याकडून मांडली जात आहे. त्यामुळे रेशन दुकानदार संघटनेने आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांवर प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांचे अर्ज भरून घेणे, आधारकार्डच्या झेरॉक्स घेणे यांसारखी कामेदेखील सोपविण्यात आली असून, त्यासही दुकानदारांचा विरोध आहे. सरकारी धान्य गुदामातून थेट रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, ती पाळली जात नाही. कमी केलेला घासलेटचा कोटा पूर्ववत करावा हीदेखील संघटनेची मागणी आहे.

पॉस मशिनवर प्रश्नचिन्ह

रेशनव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी करीत पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशिन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे शिधापत्रिकाधारकाच्या अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतरच त्यांना धान्य वितरित केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन दुकानदारांना मंगळवारी या मशिनचे वाटप करण्यात आले. दुकानदारांनी हे मशिन स्वीकारले, पण प्रलंबित मागण्यांसाठी ९० रेशन दुकानदारांनी परवान्याचे राजीनामे दिले. या राजीनाम्यामुळे पॉस मशिनच्या अंमलबजावणीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेशन दुकानदारांच्या संघटनाप्रमुखांशी जिल्हा प्रशासनाने चर्चा केली असून, लवकरच थेट त्यांच्या दुकानापर्यंत धान्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. थकित अनुदान देण्याबाबतही पाठपुरावा करण्यात येणार असल्याची ग्वाही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतातील उद्योग, व्यापार प्रामाणिक

$
0
0

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मुंबई

प्राचीन काळापासून भारताशी व्यापार करण्यासाठी अनेक देश जुळले गेले होते. याचे कारण म्हणजेच भारतातील उद्योग व व्यापार प्रामाणिक असल्याची जगात ख्याती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी केले.

महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत वालचंद हिराचंद यांच्या ४४ व्या स्मृतीदिनानिमित्ताने सरसंचालक भागवत यांचे ‘समाज परिवर्तनातून समर्थ भारत उभा करण्यात उद्योग व व्यापाराचे योगदान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. मुंबईत लोवर परेल येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चर नूतन अध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात सरसंचालक भागवत यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे नाशिकचे उद्योजक संतोष मंडलेचा यांनी मावळते अध्यक्ष शंतनू भडकमकर यांच्याकडून स्वीकारली. यावेळी व्यासपीठावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रामचंद्र भोगले, अनिलकुमार लोढा, ललित गांधी, अमित कामत, अरविंद जोशी आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना सरसंचालक भागवत म्हणाले, की संस्कृतमधून उद्योग, व्यापार व कृषीचे विविध दाखले देत भारत महाशक्ती नव्हे तर विश्वगुरू बनण्याकडे वाटचाल करीत आहे. भारतातील उद्योग, व्यापार व कृषी एकमेकांवर आधारीत आहेत. जगभरात अनेक देश समस्यांच्या गर्तेत सापडले असून, भारत मात्र त्याला अपवाद असल्याचे भागवत यांनी नमूद केले. सीएसआरचा कायदा आज आला असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेल्या संपत्तीतून समाजोपयोगी कामे उद्योजकांनी केली आहेत. भारतात अनेकविध धर्म, जात, पंत असले तरी एकसंघाने उद्योग व व्यापार वाटचाल करीत आहेत. इतर देशात मात्र वंशावरून वाद होत असल्याने त्याचा थेट परिणाम उद्योगांवर होत असल्याचेही भागवत म्हणाले.

भारतातील युवा शक्ती दुसऱ्या देशात जाऊन ज्ञानाचे काम मोठ्या जोमाने करीत आहे. युवाशक्तीमुळे भारताला कुठलीही शक्ती संपविण्याची हिमतच करणार नाही. जगण्याचे साधन किंवा नफा कमविण्यासाठी उद्योग, व्यापाराला महत्त्व न देता देशहिताला प्राधान्य दिल्यास देश खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होईल असेही भागवत म्हणाले. याप्रसंगी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, आयमाचे अध्यक्ष राजू आहिरे, निमाचे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, मनिष रावल, आशिष नहार, हर्षद ब्राह्मणकर, बाळासाहेब वाघ, उत्तम दोंदे, ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, नीलिमा पाटील, प्रज्ञा पाटील यांसह औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

शेतीमालाला हमी भाव हवा

शेतीवर निष्ठा असल्यानेच आजही शेतकरी टिकून आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यात कर्जमाफी शेतकऱ्यांना देणे हा पर्याय नसून, शेतीमालाला हमीभाव मिळण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी शासनासह इतरांनी देखील प्रगत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी देखील याबाबत विचार करावा, असेही सरसंघचालक भागवत म्हणाले.

डिफेन्स क्लस्टर उभारणार

सरंक्षण क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी डिफेन्स क्लस्टर उभारणार असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. यात नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद व नागपूर याठिकाणी केंद्र सरकार डिफेन्स क्लस्टर उद्योगांसाठी उभारण्यास प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलांसाठी रस्त्यांवरच ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आम्ही राहतो त्याच ठ‌िकाणी सरकारी योजनेतून घरे बांधून द्या, तेथे मुलभूत सुविधा पुरवून घरपट्टी लागू करा आदी मागण्यांसाठी गौतमनगर, शांतीनगर, साठेनगर आणि रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील रहिवाशी मंगळवारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य दोन्ही रस्त्यांवर त्यांनी ठ‌िय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ हे आंदोलन सुरू राह‌िल्याने भरपावसात नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
गौतमनगर, शांतीनगर, साठेनगर, रमाबाई आंबडेकर नगर आणि गरवारे पॉइंट परिसरात अनेक मागासवर्गीय तसेच गरीब कुटुंबे १९९२ पासून वास्तव्यास आहेत. आम्ही राहतो त्याच जागेवर सरकारने घरकुल योजना राबवावी, तेथेच मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी हे नागरिक १९९५पासून करीत आहेत. परंतु, त्यांच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत महापालिका रहिवाशांना शहराच्या बाहेर घरे देणार आहे. परंतु, त्यास या रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली असून, आता रहिवाशांना नोट‌िसा आणि धमक्या दिल्या जात आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा महापालिका तसेच जिल्हाधिकारी प्रशासनाला देण्यात आला होता. या रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. मात्र, तरीही प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने आंदोलक संतापले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. मेहेर चौक ते सीबीएस आणि सीबीएस ते मेहेर चौक अशा दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने परिसरातील सर्वच मार्गांवर वाहतुकीचा बोजवारा उडाला. ‘कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘घरकुल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ यांसारख्या घोषणा देऊन सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
वाहनधारकांना मनस्ताप
या आंदोलनामुळे मेहेर ते रेडक्रॉस, मेहेर ते अशोकस्तंभ, सीबीएस ते राजीवगांधी भवन, सीबीएस ते शालिमार यासह परिसरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुक व्यवस्था ठप्प झाली. ऐन पावसात हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने दूरच दूर वाहनधारकांच्या रांगा लागल्या. परिणामी त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी पर्यायी मार्गांनी वाहतूक वळविली. परंतु, त्यामुळे अन्य रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या.

आंदोलकांना घेतले ताब्यात

आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु, आंदोलकांना नियंत्र‌ित करण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे पहावयास मिळाले. सुरुवातीला रस्त्याच्या एकाच बाजूला आंदोलकांनी ठिय्या मांडला. त्यानंतर मात्र त्यांनी दोन्ही रस्ते अडविले. परिणामी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. समजूत काढूनही आंदोलक ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी जादा कुमक बोलावून घेतली. आदोलकांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊ शकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रथमच्या प्रसंगावधानामुळे बालकाची आईशी भेट!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

भाजीबाजारातील गर्दीत आईपासून हरवलेल्या एका चार वर्षाच्या रडणाऱ्या बालकाची आस्थेने चौकशी करुन त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्याचे धाडस येथील एका वृत्तपत्र विक्रेत्याच्या बारा वर्षाच्या मुलाने दाखवल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या मुलाचे नाव प्रथम सोनवणे असे असून, तो नाशिकरोड येथील वृत्तपत्र विक्रेते गौतम सोनवणे यांचा मुलगा आहे.
मंगळवारी सायंकाळी नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी दोन महिला आल्या होत्या. त्यातील एका महिलेसोबत राज चंद्रकांत वाघमारे (४ वर्षे) हा लहान मुलगाही होता. या महिला भाजीपाला खरेदी करीत असताना गर्दीत राज हरविला. रडणारा लहानगा राज आईच्या शोधात भाजीबाजारातील संपूर्ण गर्दी ओलांडून बिटको चौकापासून विभागीय आयुक्तालय रस्त्यापर्यंत आला. तेथे प्रथम सोनवणे हा मुलगा पेपर स्टॉलवर पेपर विक्री करीत होता. त्याने रडणाऱ्या राजला बघितले व त्याला जवळ घेत त्याची विचारपूस केली. परंतु, राजला काही सांगता आले नाही. लहानगा राज हरविला असल्याचे प्रथमच्या लक्षात आल्याने त्याने राजला त्याचे वडील गौतम सोनवणे यांच्याकडे नेले. त्यांनी राजला खाऊ देऊन शांत केल्यावर राजने त्याचे नाव सांगितले. परंतु, त्याला पत्ता सांगता आला नाही. केवळ हाताच्या इशाऱ्याने आईकडे जाण्यासाठी त्याने हट्ट धरला. त्यामुळे गौतम सोनवणे व त्यांचा मुलगा प्रथम याने भाजीबाजारात जाऊन चौकशी केली असता बिटको चौकाजवळ दोन महिला आपला मुलगा हरविला म्हणून ओक्साबोक्शी रडत असल्याचे त्यांना आढळून आले. या महिलांकडे गौतम सोनवणे यांनी राजला सोपविले. या दोन्ही महिला नाशिकच्या सिव्हिल रुग्णालय परिसात वास्तव्यास आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोट क्लब पर्यटकांसाठी खुला करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर येथील बोट क्लब व मेगा पर्यटन संकुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असतानाही ते अद्याप सुरू न झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी मंगळवारी या पर्यटनस्थळाची पाहणी केली. अपुऱ्या निधीअभावी काही कामे रखडली असून, पुरेशा निधीद्वारे ही कामे मार्गी लावावीत, अशी मागणी आमदार जयंत जाधव यांनी केली आहे.

नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी, तसेच पर्यटकांना शहरात अधिकाधिक वेळ घालविता यावा, या उद्देशाने तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून गंगापूर येथे मेगा पर्यटन केंद्र साकारण्यात आले. तेथे बोट क्लब, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा संकुल, कन्व्हेन्शन सेंटर व गोवर्धन येथील कलाग्राम आदींचा समावेश आहे. २०१४ मध्ये बोट क्लबचे काम पूर्ण झाले. मात्र, अजूनही ते सुरू झाले नाही, याकडे आमदार जयंत जाधव यांनी पर्यटन विकास महामंडळाचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर वाघमारे यांनी या पर्यटन संकुलाची पाहणी केली. या वेळी आमदार जाधव यांच्यासह नाशिक प्रादेशिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन मुंडावरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सरचिणीस संजय खैरनार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

गंगापूर धरणाच्या बॅक वॉटर भागात हा बोट क्लब असून, तेथे जेट्टी, प्रशासकीय इमारत, इक्विपमेंटकरिता देखभाल दुरुस्ती शेड, प्रेक्षकगृह, खुले सभागृह, वाहनतळ तयार करण्यात आले आहे. पर्यटकांना बोटिंग करता यावी यासाठी ४७ अत्याधुनिक बोटी धरणस्थळी दाखल झाल्या आहेत. पक्ष्यांच्या चित्रांचे दालन येथे असून, 'पर्यटक निवास' व 'लेक व्ह्यू नेचर्स रिसॉर्ट’चे कामही प्रगतिपथावर आहे.

‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर गोवर्धन येथे २०१४ मध्ये कलाग्राम उभारण्याचे काम एमटीडीसीकडून हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असले तरी पुरेशा निधीअभावी ते बंद पडले आहे. अपूर्ण कामांसाठी राज्य सरकारने एकरकमी निधी उपलब्ध करून द्यावा आणि कलाग्राम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी जाधव यांनी या वेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कोतवाल, गडाखची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्युनिअर गटासाठी सिद्धी कोतवालची, तर सबज्युनिअर गटासाठी कृष्णा गडाख याची पुणे येथे ३ ते ६ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सिद्धीने १७ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धेत ८००, १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला, तर १४ वर्षांखालील वयोगटात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मुलांमध्ये कृष्णा गडाखने १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात प्रथम क्रमाक मिळविला. कृष्णा प्रथमच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. याशिवाय अनुज कित्तूर याची वॉटरपोलोसाठी स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू भोंसला मिलिटरी स्कूलच्या साई सेंटरचे खेळाडू असून, शंकर मादगुंडी, घनश्याम कुंवर, विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ते येथील जलतरण तलावावर सराव करतात. भोंसला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरमध्ये शंभर किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरात मोकळ्या भूखंडांवर प्लास्टिकच्या पिशव्यांमधून कचरा टाकला जातो. यामुळे परिसरातील भूखंडांवर प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला दिसतो. यामुळे महापालिकेच्या सातपूर आरोग्य विभागाने प्लास्टिक मुक्त अभियना सुरू केले आहे. अभियानात भाजी विक्रेते, व्यावसायिकांकडून शंभर किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या.

महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून प्लास्टिक पिशव्या जप्ती मोहीम हाती घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय गांगुर्डे यांनी ‘मटा’शी बोलतांना सांगितले. दरम्यान, प्लास्टिकमुक्त अभियानात प्लास्टिकचा वापर टाळा, असे आवाहनही करण्यात येत आहे. सदर मोहीम सातपूर गाव, भाजी मंडई, सातपूर कॉलनी, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर आदी भागात राबविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवडाभरात कोटीची वसुली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील खासगी जागेवरील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण केल्यानंतर १५८ अनधिकृत होर्डिंग आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू केलेल्या या कारवाईतून पालिकेच्या तिजोरीतून एक कोटी सहा लाख ६६ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. सातपूर विभागाच्या कारवाईतून एवढा दंड वसूल झाला असून, सहा अनधिकृत होर्डिंग हटविण्यात आले आहेत. मंगळवारपासून पश्चिम विभागात कारवाईला सुरुवात झाली असून, या कारवाईतून पालिका मालमाल होणार आहे. दरम्यान ही कारवाई थांबवण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याची चर्चा अधिकारी आता खासगीत करीत आहेत.

महापालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू केली आहे. शहराच्या सहा विभागांत खासगी जागेवर अनधिकृतपणे १५८ होर्डिंग आढळून आली आहेत. त्यात सर्वाधिक ७० होर्डिंग पश्चिम विभागात आहेत. त्यानंतर पंचवटी २८, सातपूर २०, नाशिकरोड १९, सिडको १२, नाशिक पूर्वमध्ये ९ होर्डिंग आढळून आली आहेत. या सर्वांना नोटिसा देऊन दंड भरून होर्डिंग अधिकृत करून देण्याचे आदेश अतिक्रमण विभागाने काढले होते. मात्र, राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाने होर्डिंग हटवण्याची कारवाई सातपूरपासून सुरू केली. सातपूर विभागात आतापर्यंत सहा होर्डिंग काढण्यात आली असून, ११ होर्डिंग नियमित करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून ९ लाख ४८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सातपूरसोबतच शहरातील अन्य भागांतील होर्डिंगकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात १६ होर्डिंगधारकांनी पालिकेकडे दंड भरून होर्डिंग नियमित करून घेतले आहेत. त्यामुळे या कारवाईने पालिका आठवडाभरात कोट्यधीश झाली आहे. आठवडाभराच्या या कारवाईतून पालिकेच्या तिजोरीत एक कोटी ६ लाख ६६ हजार रुपये जमा झाले आहेत. पश्चिम विभागात मंगळवारपासून कारवाईला सुरुवात झाली आहे. पश्चिम विभागात सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग असून, त्यांच्यावरही कारवाई सुरू केल्याने दंडाची ही रक्कम कोट्यवधीच्या घरात पोहोचणार आहे.

होर्डिंगधारकांकडून राजकीय दबाव

शहरातील अनधिकृत होर्डिंग लावलेले एजन्सीधारक राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे पालिकेच्या या कारवाईने अनधिकृत होर्डिंगधारक बिथरले असून, त्यांनी मोहिमेत अडथळा आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणला जात आहे. मात्र, मोहीम सुरूच राहणार असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम यांची चौकशी लावण्यामागेही हाच गट असल्याची चर्चा आता पालिका वर्तुळात आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर कारवाई करू नये, यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

अनधिकृत होर्डिंगची संख्या

१५८ होर्डिंग अनधिकृत

७० पश्चिम विभागात

२८ पंचवटी विभागात

२० सातपूर विभागात

१९ नाशिकरोड विभागात

१२ सिडको विभागात

०९ नाशिक पूर्वमध्ये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटसचिवांचे ‘असहकार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विविध मागण्या राज्य सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित होत असल्याच्या निषेधार्थ गटसचिवांनी कामकाज बंद करून असहकार आंदोलन सुरू केले आहे. बागलाण तालुक्यातील गटसचिवांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी व कर्जमेळाव्यांवर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील सुमारे ६ हजार ८८० गटसचिवांच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनानेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटी हे सहकारातील कामकाजाचे मुख्य घटक आहे. या अनुषंगाने आगामी काळात शेतकरी कर्ज माफी व मेळावे घेण्यास शासनाकडून गट सचिवांवर दबाब वाढत असतांना गटसचिवांच्या मागण्या मान्य होईपर्यंत असहकार आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सटाणा तालुका गटसचिव संघटनेचे अध्यक्ष दिनेश मोरकर, तालुका प्रतिनिधी अनिल खरे, सुनील देवरे, प्रशांत सोनवणे, शामसुंदर सोनवणे, आनंदा साळुंके, प्रमोद पवार, जयवंत भामरे, किरण खैरनार, लक्ष्मण सोनवणे, सुनील हिरे आदींनी कामकाजावर बहिष्कार टाकून असहकार आंदोलन सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशास उद्यापर्यंत मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुसऱ्या टप्प्यातील अपूर्ण प्रवेश अर्जांची लक्षणीय संख्या लक्षात घेता अकरावीच्या प्रवेशांसाठी ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी होणे सोपे जावे यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत शिक्षण विभागाच्या वतीने उद्यापर्यंत (२९ जून) वाढवण्यात आली आहे. यामुळे अर्जप्रक्र‌िया अपूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी दोन दिवसांची संधी मिळणार आहे.
नाशिक शहरातील ५४ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सुमारे २४ हजार जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी मंगळवारी दुपारपर्यंत अर्जाचा पहिला भाग एकूण २८ हजार ९०४ विद्यार्थ्यांन पूर्ण केला आहे. तर दुसऱ्या भागामध्ये २५ हजार ३५० विद्यार्थ्यांनी माहिती पूर्ण भरली आहे. आता या प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने अकरावीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता ‌शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
मंगळवारी या प्रक्र‌ियेचा अंतिम दिवस असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू होती. दिवसाअखेर सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी अर्ज पूर्णत: भरण्याच्या प्रक्रियेपासून दूर राहिले होते. nashik.11thadmission.net या वेबसाइटवर उर्वरीत विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही मुदत वाढल्याने पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची तारीखही आता पुढे ढकलली गेली असून, ही यादी शुक्रवारी (३० जून) जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंगळेंचा ४ जुलैला फैसला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाचा फैसला आता ४ जुलै रोजी होणार आहे. बाजार समितीत नाशिकचे प्रांताधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार गणेश राठोड उपस्थितीत संचालकांची सभा होणार आहे. त्यामुळे पिंगळे सभापतिपदी राहणार की पायउतार होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंगळे यांना अटक केली होती. या कारवाईवेळी एका कारमधून ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली होती. पिंगळे यांच्यासह काही जणांवर म्हसरूळ पोल‌िस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. पिंगळे यांच्या कामकाजाबद्दल बाजार समितीचे अनेक आक्षेप आहेत. त्यामुळे शुक्रवारी, २३ जून रोजी काही संचालकांनी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. १८ पैकी १३ संचालकांनी या अविश्वास प्रस्तावाला पाठबळ दिले आहे. श्याम गावित, शिवाजी चुंबळे, संपतराव सकाळे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, संजय तुंगार, युवराज कोठुळे, चंद्रकांत निकम, जगदीश आपसुंदे, रवी भोये, संदीप पाटील, विमल जुंद्रे, भाऊसोब खांडबहाले आदी संचालक मंडळाने हा ठराव सादर केला आहे. अशा ठरावावर १५ दिवसांच्या आत सभा बोलवावी लागते. त्यानुसार ४ जुलै रोजी ही सभा बोलावण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

१४ जुलै रोजी सुनावणी

पंचवटी ः बाजार समितीच्या संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी ३ जून रोजी नोटिसा बजावल्या होत्या. या विषयासंदर्भात संचालकांना लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यासाठी १९ जूनपर्यंत मुदत दिली होती. १९ जून रोजी सुनावणी होऊ शकली नाही. ती २१ जूनला आणि नंतर २७ जूनला अशी पुढे ढकलण्यात आली. आता ही सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीत संचालकांना अजून काही अतिरिक्त म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार काही संचालकांना लेखी स्वरूपात त्यांचे म्हणणे मांडले. काही महिन्यांपासून विविध कारणांनी बाजार समिती गैरव्यवहारांच्या प्रकरणांनी गाजत असल्याने सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय घडामोडींना वेग

बाजार समिती सभापती निवडीच्या काळात अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजप यांनी पहिल्यांदा बाजार समितीच्या राजकारणात लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही पक्षांत काही संचालकांनी प्रवेश केलेला आहे, तसेच अविश्वास प्रस्ताव मांडण्यात काही पिंगळे समर्थकही असल्याने ऐनवेळी काहीही घडण्याची शक्यता वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईला दाखविणार सोनियाचा दिवस!

$
0
0

नाशिक : तिनं कधीही कोणत्या गोष्टीसाठी आईकडं हट्ट धरला नाही; किंबहुना हट्ट धरण्याची परिस्थितीच नव्हती. कधी पोटापुरतं मिळत होतं, तर कधी अर्धपोटीच रहावं लागत होतं. नातेवाईकांनी मदतीला धावून येण्याऐवजी हात वर केले, वडिलाचं छत्र लहानपणीच हरपलं...रहायला घर नाही, भाड्याच्या घरात इतर अडचणीच जास्त. अशावेळी तिनं उचल खाल्ली. या परिस्थितीतून बाहेर पडायचंय असं मनाशी ठरवलं. आईला सोन्याचे दिवस दाखवू या उद्देशानं प्रचंड अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलं. अशी आहे सोनिका चिंचोलेची कथा. आता तिचं स्वप्न खूप मोठं आहे, तिला चार्टर्ड अकाउंटन्ट व्हायचंय पण तिची ही बिकट शैक्षणिक वाट कशी सुकर होणार या विवंचनेत दोघी मायलेकी आहेत.

सोनिका १३ महिन्यांची असताना तिचं पितृछत्र हरपलं. तिच्या आईनं परिस्थितीला तोंड देत न डगमगता सोनिकाला शिकवून मोठं करायचं असा निश्चय केला. त्यासाठी लागेल ते कष्ट उपसण्याची तयारी ठेवली. सोनिकानं ९१.८० टक्के गुण मिळवून आपल्या आईच्या परिश्रमाचं चीज केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘व्यापारी’चा धुव्वा; ‘सहकार’चीच हवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेत सत्ताधारी सहकार पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकत श्री व्यापारी पॅनलचे पान‌पित करत हॅटट्रिक नोंदवली. व्यापारी पॅनलेचे नेते आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या पत्नी तथा भगूरच्या नगराध्यक्षा पराभूत झाल्या. गेल्या वेळी व्यापारी पॅनलला सहा जागा मिळाल्या होत्या. यंदा एकच जागा मिळाली. नगरसेवक रमेश धोंगडेंनी या पॅनलची लाज राखली. मात्र, ते जनरल गटात तळाला राहिले.
के. एन. केला हायस्कूलमध्ये रात्री साडेअकराला मतमोजणी पूर्ण झाली. एकूण २१ हजार (३३.६४ टक्के) मतदान झाले होते. पहिल्या फेरीतच सहकारच्या १९ उमेदवारांनी आघाडी घेतली. व्यापारी पॅनलचे आर. डी. धोंगडे, सुनील बोराडे, हेमंत गायकवाड हेच लढत देत होते. अंतिम तिसऱ्या फेरीत धोंगडेंनीच टिकाव धरला. व्यापारी पॅनलतर्फे गेल्यावेळी संचालक झालेले अशोक सातभाई आणि सुनील आडके यांनी सूज्ञपणा दाखवत यंदा सहकारची वाट धरली. ते विजयी झाले.
नगराध्यक्षांना धक्का
विजय करंजकर यांच्या पत्नी व भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर महिला गटात पहिल्या फेरीत शेवटच्या स्थानी होत्या. दुसऱ्या फेरीत चेहेडी, भगूर, देवळाली कॅम्पच्या पेट्या उघडल्यानंतर त्या तिसऱ्या आल्या. मात्र, त्यांचा पराभव झाला. सहकारचे नेते दत्ता गायकवाड हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तर विजय करंजकर हे विद्यमान जिल्हाप्रमुख आहेत. दोघांनी लढत प्रतिष्ठेची केली होती. दोन वाघांमधील झुंज अखेर गायकवाड यांनी जिंकली. पराभवाची चाहूल लागल्यामुळे करंजकर मतमोजणीच्या ठिकाणी आलेच नाहीत.
सहकार का जिंकले?
दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार पॅनलमध्ये शेवटपर्यंत एकी होती. प्रचार नियोजनबध्द होता. आरोपांपेक्षा बँकेची प्रगती व स्वच्छ कारभारावर त्यांनी भर दिला. शून्य एनपीए, बँकेला मिळालेले पुरस्कार, उघडलेल्या २४ शाखा, आधुनिकीकरण हे सहकारचे प्लस पाइंट होते. बँक या कारभाऱ्यांच्या हातीच सुरक्षित राहील, हा मुद्दा मतदारांना भावला. आत्महत्या केलेल्या ८८ शेतकऱ्यांच्या कुटंबियांना प्रत्येकी वीस हजारांची केलेली मदत, शेतकऱ्यांची एक लाखांपर्यंत वाढवलेली कर्जमर्यादा यामुळे ग्रामीण मतदार खूश झाला.
सहकारने विकासावर भर दिला. तर विरोधकांनी बँकेला बदनाम केले. ते सभासदांना रुचले नाही. नोटाबंदीतही बँकेने एटीएम बंद पडू दिले नाहीत. सभासद सूज्ञ व जागरुक आहेत. बँक कोणाच्या हाती सोपवायची हे त्यांना समजले. भपकेबाजीला ते भुलले नाहीत.
- दत्ता गायकवाड,
सहकार पॅनल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा संकुलाबाबत आमदार संतप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुका क्रीडा संकुलाचे बांधकामावरून सुरू असलेली टोलवाटोलवीची मंगळवारी आमदार अनिल कदम यांनी दखल घेतली. येथील विश्रागृहात अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेऊन येत्या महिनाभरात क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी चौधरी, प्रांताधिकारी महेश पाटिल, तहसीलदार विनोद भामरे, सां. बा. उपअभियंता महेश पाटील, क्रीडाशिक्षक सुभाष खाटेकर उपस्थित होते.

निफाड तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी ९१ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. तालुका क्रीडा संकुलात तातडीने क्रीडासाहित्य उपलब्ध करून महिनाभरात क्रीडा संकुल कार्यान्वित करण्याचे आदेश कदम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. क्रीडा संकुलाच्या इतर कामांचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचीही सूचनाही आमदार कदम यांनी केली. क्रीडा संकुलाबाबत दरमहा बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. वैनतेय विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सुभाष खाटेकर यांनी सदर क्रीडासंकुल देखभाल दुरुस्ती प्रस्ताव क्रीडा विभागाकडे दिला होता. त्यालाही यावेळी मंजुरी देण्यात आली. संकुलाचे क्रीडा प्रशिक्षक म्हणून सुभाष खाटेकर यांची नियुक्ति करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ५११ दुकानांत पॉस मशिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन धान्य वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशिन बसविण्यास सुरुवात झाली असून, त्यापैकी ५११ मशिन्स कार्यान्वित झाली आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत २,११६ पॉस मशिन प्राप्त झाल्याची माहिती पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी दिली. अंगठ्याचा ठसा घेऊनच आणि आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्याला धान्य वितरण करता यावे, यासाठी पॉस मशिन उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १,०९६ पॉस मशिन प्राप्त झाले. त्यानंतर आता पुन्हा १,०२० मशिन प्राप्त झाले आहेत. असे असले तरी मंगळवार, २७ जूनपर्यंत त्यापैकी ९६८ मशिन्सचे वाटप रेशन दुकानदारांना करण्यात आले आहे. नाशिक एफडीओ, नाशिक तालुक्यासह सिन्नर, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये सर्व रेशन दुकानांत पीओस मशिन बसविण्यात आले आहेत. बुधवारी पेठ, दिंडोरी, कळवण तालुक्यांना मशिन्सचे वाटप केले जाणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील १५१ रेशन दुकानदारांना १५१ ई–पॉस (इलेक्ट्रोनिक पॉईट ऑफ सेल पॉस) डिजिटल यंत्रांचे वाटप करण्यात आले. १ जुलैपासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दोष दूर करून पूर्ण व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी बॉयोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरीत केले जाणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना या यंत्रणेचा लाभ होईल व रेशन यंत्रणा सुटसुटीत होईल. रेशनीग पद्धतीतील बदलामुळे वादविवाद, तक्रारी, गैरसमज कमी होतील. दुकानदारांना ई पॉस मशीनचे वितरण करण्यात आले. या संदर्भात कुठलीही यांत्रिक अडचण येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांमुळे महिला भयभीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शिवाजीनगर, श्रमिकनगर व धृवनगर भागात टवाळखोरांच्या जाचामुळे महिला भयभीत झाल्या आहेत. याबाबत सातपूर व गंगापूर पोलिसांकडे महिलांनी निवेदन दिले आहे. तसेच सभागृहनेता दिनकर पाटील यांच्याकडेही लेखी तक्रार केली आहे. या महिलांनी पोलिस गुन्हेगारांच पाठीशी घालत असल्याचा आरोप केली आहे. उघड्यावर हत्यार घेऊन गुन्हेगार परिसरात दहशत पसरवत असतांना पोलिस कारवाई करणार कधी, असा सवाल महिला उपस्थित करत आहेत. त्यामुळे परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

सातपूर भागातील शिवाजीनगर, श्रमिकनगर व धृवनगर भागात टवाळखोरांचे अड्डे झाले आहेत. नेहमीच रस्त्यांवरून जाणाऱ्या महिला व तरूणींची छेड काढली जाते. यामुळे महिला व तरुणी भयभीत झाल्या असून, त्याबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु पोलिस महिलांनाच दोषी ठरवत गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा या आरोप या महिलांनी केला आहे. सोमवारी सायंकाळी पप्पू ढवळे नावाच्या सराईत गुन्हेगाराने महिलांच्या अंगावर धावून जात त्यांची छेड काढली. यानंतर भयभीत झालेल्या महिला सातपूर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या. पंरतु पोलिसांनी केवळ माहिती घेत महिलांना काढून दिले. सराईगत गुन्हेगारावर मात्र कुठलीच कारवाई केली नसल्याने महिलांनी न्याय कुन्हाकडे मागावा असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री सराईत गुन्हेगार ढवळे याने महिलांच्या अंगावर धावून जात छेड काढण्याचाही प्रयत्न केला. यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी थेट सातपूर पोलिस स्टेशन गाठत समस्या मांडली. परंतु महिलांच्या समस्येकडे पोलिसांनी पाठ फिरविल्याने अखेर नगरसेवक पाटील यांच्याकडे धाव घेतली.

नगरसेवक पाटील यांनी अगोदरच संबंधित गुन्हेगारांबाबत सातपूर व गंगापूर पोलिस स्टेशनला लेखी निवेदन दिले असल्याचे सांगितले. याबाबत पोलिस आयुक्तांकडे महिलांना घेत निवेदन देणार असल्याचे नगरसेवक पाटील यांनी सांगितले. त्यांनी महिलांना सोबत घेऊन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांची भेट घेत गुन्हेगारांबाबतच्या समस्या सांगितल्या.

भर रस्त्यात साजरे होतात वाढदिवस

कायदा व सुव्यस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचे वाढदिवस भर रस्त्यात श्रमिकनगर व शिवाजीनगर भागात साजरे केले जातात. रस्त्यावर कोणी हटकले तर त्याला धमकावले जाते. वाढदिवस साजरा करतांना रस्त्यावर उभ्या दुचाकीवर तलवारीने केक कापून मद्याच्या बाटल्या फोडल्या जातात. याबाबत स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिस केवळ पाहून निघून जात असल्याचा आरोपही महिलांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युत विभागाच्या नाकर्तेपणावर ताशेरे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नाकर्तेपणावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले. पंचवटी विभागात सर्वात जास्त तक्रारी या पथदीपांच्या संदर्भात आहे. प्रत्येक प्रभागाला विद्युत विभागाचे कर्मचारी नेमून दिलेले आहेत. मात्र, विद्युत विभागाची गाडी प्रभागात आठ दिवसांतून एकदा येते तेव्हाच हे कर्मचारी दिसतात. इतर दिवशी हे कर्मचारी कुठे असतात, असा प्रश्न विचारून खुद्द महापौर रंजना भानसी यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले. त्यावर अधिकारी काहीच उत्तर देऊ शकले नाहीत.

पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत साडे तेरा लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक दोनमधील विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रभागात पाठवून देण्यात आल्याने प्रभागातील एक हजारपेक्षा जास्त पथदीप बंद पडले आहेत. महापालिकेत एलईडी येऊन दोन महिने झाले तरीही त्यांची फिटिंग झालेली नाही. ज्या अधिकाऱ्यांची या प्रभागाच्या देखभालीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांनी अजून प्रभाग एकदाही बघितला नसल्याची तक्रार उद्धव निमसे यांनी केली.

उडवाउडवीची उत्तरे

प्रभागाच्या हद्दीचा वाद, गटारीच्या साफसफाईचे काम ड्रेनेज विभागाने करायची की बांधकाम विभागाने यावरील चर्चा चांगलीच रंगली. घंटागाडी नियमित येत नसल्याने काय कारवाई केली याची माहिती नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना विचारली असताना उडावाउडवीची उत्तरे मिळाली. सभागृहाच्या काचा स्वच्छ केल्या जात नसल्याने पुंडलिक खोडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images