Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चेंबर तुंबल्याने परिसरात दुर्गंधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

पंचवटी परिसरातील गणेशवाडी मधील चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पण या पावसाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक ठिकाणी चेंबर तुंबले आहे. गणेशवाडी येथील चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात वाहत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय हे पाणी वाहून रस्त्याच्या कडेला व गणेशवाडी परिसरात जमा होत आहे. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डबक्यांमध्ये पाणी साचल्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय रस्त्यावर कायम वर्दळ असते. त्यामुळे आरोग्य विभागाने त्वरित दखल घेऊन या चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे परिसरातील चेंबर तुंबलेले आहे. गणेशवाडी येथील चेंबरमधून चार पाच दिवसांपासून पाणी वाहत आहे. स्थानिक नगरसेवक व प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.

- दीपक फलटणे, स्थानिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्व्हिस रोड समस्यामुक्त कधी होणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

द्वारकापासून आडगावपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सर्विस रोड अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक थांबे यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोल‌सि यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानीक नागरिक करीत आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा या हेतूने द्वारकापासून आडगावपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सर्विस रोड साकारण्यात तयार करण्यात आले आहेत. पण सर्विस रोड अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतूक थांबे यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या समस्येबाबत मागीलवर्षी ‘मटा’ वृत्त प्रसिद्ध केले होते. पण वर्षभरात अधूनमधून केवळ नावापुरती कारवाई आली. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

शिवाय त्यात भर म्हणून सहा महिन्यांपासून एसटी बसची वाहतूक देखील सर्व्हिस रोडने सुरू झाल्याने प्रवाशीदेखील या मार्गावर उभे राहतात. परिणामी रिक्षादेखील सर्व्हिस रोड धावतात. सर्विस रोडवरील द्वारका, स्वामीनारायण परिसर, के. के. वाघ कॉलेज जवळील परिसर जत्रा हॉटेल कोणार्क परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट, अनधिकृतपणे थाटलेली दुकाने, टपऱ्या, हॉटेल, गॅरेज आदींनी बस्तान मांडले आहे. काही व्यावसायिकांच्या दुकानाजवळ पार्किंगसाठी जागाच नसल्याने वाहने सर्विस रोडवर अनधिकृतपणे उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शिवाय रोज छोटेमोठे अपघातही होतात.

या रोडवरून जाताना दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकांमध्ये तर रोजच वाद होतात. या समस्येकडे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधरकांमध्ये संताप होत आहे. कारवाई न करण्यामागे पोलिस आणि पोलिकेचेच या व्यवसायाला पाठबळ असल्याचे सर्वसामान्य नागरिक आरोप करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक निधीला कात्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे स्थायी समितीने सुचवलेला ४० लाखांचा नगरसेवक निधी महापौरांनी आपल्या अधिकारात ७५ लाखांपर्यंत नेला होता. परंतु, महापौरांनी केलेल्या या लाखोंच्या उड्डाणाला आता आयुक्तांनी जमिनीवर आणले आहे. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने नगरसेवक निधी हा ४० लाख रुपयेच मिळेल, असे स्पष्टीकरण आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे. या ४० निधीसाठी कामांचे प्राधान्यक्रमही ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक कुवतीचा अंदाज घेऊनच नगरसेवकांनी कामे सुचवावीत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापौरांसह सत्ताधारी भाजप नगरसेवकांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. भांडवली कामांसाठी केवळ १३० कोटी रुपये शिल्लक असतानाही सत्ताधाऱ्यांनी बजेटचे उड्डाण बावीशसे कोटींपर्यत नेले आहे. त्यातच चालू वर्षाचा स्पीलओव्हर हा साडेसहाशे कोटींवर गेला असून, सध्या १२० कोटींचे कर्ज पालिकेवर आहे. त्यातच विविध योजनांमध्ये पालिकेचा हिस्सा देणे बंधनकारक असल्याने याची जुळवाजुळव करण्यात प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. दुसरीकडे नव्याने सत्तारुढ झालेल्या नगरसेवकांना विकासकामांची घाई झाली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नगरसेवक निधी मिळावा यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकला आहे. स्थायी समितीने नगरसेवकांसाठी ४० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. परंतु, हा निधी कमी असल्याचा दावा नगरसेवकांनी करत, त्यात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात महापौर रंजना भानसी यांनी आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून नगरसेवक निधीत ३५ लाखांची घसघशीत वाढ करत तो ७५ लाख रुपये घोष‌ित केला होता. त्यामुळे नगरसेवकांनी निधी घोषित होताच कोट्यवधींच्या कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले होते. नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी दिल्यास तिजोरीवर तब्बल ९७ कोटींचा भार येणार आहे. परंतु, ४० लाख दिल्यास जवळपास ४७ कोटींची बचत होणार आहे. ४० लाखांप्रमाणे केवळ ५० कोटी रुपये नगरसेवक निधीसाठी लागणार आहेत.

वाढदिवस भेट निष्फळ
गेल्या सोमवारी महासभेत महापौरांनी नगरसेवक निधी ४० लाखांवरून ७५ लाख करत वाढदिवसाची भेट दिली होती. परंतु, ती अल्पायू ठरली. महापौरांनी तिजोरीचा अंदाज घेतला नाही. आता महापौर विरुद्ध प्रशासन संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणे दोन लाखांचा सटाण्यामध्ये दरोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बंगल्याच्या खिडकीचे ग्रील कापून प्रवेश करून चोरट्यंनी कपाटातील रोकडसह पावणे दोन लाखांचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार सटाणा शहरातील मोरेनगर शिवारातील पाकळेवस्तीत बुधवारी सकाळी उघडकीस आला.

पाकळेवस्तीत नागेश पांडुरंग पाकळे हे शेतीनिमित्त कुटुंबीयांसह बंगल्यात वास्तव्यास आहेत. ते बाहेरगावी गेलेले असताना मंगळवारी (दि. २७) मध्यरात्री चोरट्यांनी बंगल्याच्या मागील खोलीच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. खोलीचा दरवाजा आतून बंद केला. चोरट्यांनी लोखंडी कपाट तोडून आतील तीन तोळ्याची सोन्याची पोत, ८५ हजारांची रोकड असा पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. पाकळे त्यांची सून सुनीता सकाळी सहा वाजता खोली उघडण्यास गेली असता दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आल्यानंतर चोरी झाल्याचे उघडक झाले. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी पाकळे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक घायवट करित आहेत. चोरट्यांनी नागेश पाकळे यांच्या बंगल्यात चोरी करण्यापूर्वी आत्माराम पाकळे यांच्या मालकीच्या चार दुचाकी घराजवळ लावलेल्या होत्या. अंधाराचा फायदा घेत नव्या चोरण्यात आली.

रजेचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार

मालेगाव ः रमजान ईदनिमित्त मालकाकडून हक्क रजेचे पैसे मागितले असता मालकाला राग आल्याने अतिशय कमी रक्कम देऊन मालकाने कामावरून कमी केले. त्यामुळे आपल्यावर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार येथील कामगार अधिकारी यांच्याकडे यंत्रमाग कामगाराने केली आहे.

रमजान अहमद रफिक अहमद (रा. फार्मसी नगर, मालेगाव) असे संबंधित कामगाराचे नाव आहे. शहरातील बिलाल अहमद खलील अहमद यांच्या नुमानी चौकातील पॉवरलूममध्ये ते काम करीत होते. रमजान ईदनिमित्त सोमवारी (दि. २६) मालकाकडून हक्क्याच्या रजेचे पैसे मागितले असता मालकाला राग आला. त्याने २१ जून रोजी मुकादमाद्वारे दोन हजार इतकी रक्कम दिली. सरकारी परिपत्रकाप्रमाणे जाहीर रकमेपेक्षा ती अतिशय कमी असल्याने रमजान यांनी पैसे मुकादमाकडे परत केले. याचा मालकाला राग आला. त्याने ‘तू कामाला येऊ नको’, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासह गुन्हेगारांवर वचक निर्माण करून इंदिरानगर परिसरात असलेल्या अवैध धंदे बंद करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी बुधवारी पहाटे पाच वाजेपासून कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी रेकॉर्डवर असलेले १३ संशयित पोलिसांना आढळून आले.

इंदिरानगर भागातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या हेतूने कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सकाळी पोलिस उपायुक्‍तांच्या श्रीकृष्ण कोकाटे मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्‍त अशोक नखाते व पोलिस निरीक्षक फुलदास भोये, सहाय्यक निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यासह पोलिस कर्मचारी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी रेकॉर्डवर असलेले १३ संशयित पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी भंगार बाजाराच्या सात गुदामांची तपासणी केली. तसेच वाहन कायद्यांतर्गत पोलिसांनी सुमारे अडीच हजाराचा दंड वसूल केला.

मद्यपींवर व्हावी कारवाई

अनेक वर्षांनंतर इंदिरानगर भागात झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारीवर वचक निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील अन्य पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही अशाच प्रकारे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पाथर्डी फाटा ते वडनेर मार्गावर सुरू असलेल्या अवैध मद्यविक्रीसह मद्यपींवरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरला गंडवले

$
0
0

म. टा. प्रतिन‌धिी, नाशिक

परदेशात नोकरी मिळवून देतो असे सांगून एका इंजिनीअरला ३० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी निशांत विष्णूपंत नागरे (रा. अमृत गार्डन, पिंपळगाव बहुला, सातपूर) यांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निशांत यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांना ऑनलाइन संकेतस्थळावरून ‘सूरज डेनिझ इरिटीकारेट लि. स्टी या इस्तंबूल देशातील जहाजावर फोर्स इंजिनीअर पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी त्यांनी २१ ते २७ जून या कालावधीत ३० हजार रुपयेही भरले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली.

भरगर्दीत लुटले

एखाद्याला निर्जन रस्त्यावर लुटल्याच्या घटना शहरात घडत असल्या तरी आता रविवार कारंजासारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशा घटना घडू लागल्या आहेत. मारहाण करून त्याच्याकडली ३० हजार रुपये लुटून नेल्याची तक्रार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. निकित सुनील शहा (रा. टिळकवाडी, शरणपूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. शहा सायंकाळी सातच्या सुमारास रविवार कारंजावरील विधाते फुल भांडार येथे थांबले असताना बाइकवरून तिघे संशयित आले. त्यांनी मारहाण करीत शहा यांच्याजवळील ३० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली.

जुगार अड्डयावर छापा

वडाळा रस्त्यावरील भारतनगर परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. अड्डा चालविणाऱ्यासह २१ हजार रुपयांची रोकड यावेळी जप्त करण्यात आली. भारतनगरमधील शिवाजीवाडीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई नाका पोलिसांच्या पथकाने मंगळवारी दुपारी तेथे छापा टाकला. संशयित जुबेर शेख शफी (२९, रा. अमृतवर्ष कॉलनी, इंदिरानगर) यास अटक करण्यात आली.

तलवार बाळगणारे ताब्यात

ठक्कर बाजार आणि रविवार कारंजा परिसरात तलवार जवळ बाळगणाऱ्या तिघा संशयितांना सरकारवाडा पोल‌सिांनी ताब्यात घेतले. विशाल काकड (१९, रा. अभोणकर गल्ली, रविवार कारंजा), शेखर नुनासे (३५, रा. शनिगल्ली, रविवारपेठ) व सिध्देश नवले (१८, रा. बेलदार गल्ली, हेमलता टॉकिजजवळ) अशी तिघांची नावे आहेत. काकड मंगळवारी दुपारी तलवार घेऊन ठक्कर बाजारकडून मेळा बसस्थानकाकडे जात होता. दुसऱ्या घटनेत संशयित नुनासे व नवले हे दोघे हेमलता टॉकिजच्या मागील रस्त्याने तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

महावितरणच्या रोहित्रातून चोरले ऑइल

गंगापाडळी येथील महावितरण कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या रोहित्रातील ४० हजारांचे ऑइल चोरट्याने चोरून नेले. उमेश किशोर खारवे (रा. सावतानगर, सिडको) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. महावितरणच्या गंगापाडळी येथील विभागीय कार्यालयाजवळील गुदामालगत २५ केव्हीए क्षमतेचे नादुरूस्त रोहित्र आहे. त्यामधील ४० हजार रुपयांचे ऑइल काढून चोरट्याने पोबारा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकरोडला घरफोडी

जयभवानी रोडवरील अपार्टमेंटमधील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सोमनाथ किसन क्षीरसागर (रा. शिवम अपार्टमेंट) यांनी फिर्याद दिली आहे. क्षीरसागर कुटुंबीय रविवार ते मंगळवार बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडला. आत प्रवेश करून सोन्याच्या पाच अंगठ्या, दोन चैन, एक ठुसी, कानातील झुबे असा एक लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोल‌सि स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छळाला कंटाळून कामगाराची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कंपनीतील सहकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कामगाराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अशोक बाबुराव चव्हाण (३८, रा. अली बाबा मळा, पॉवर हाऊस, अंबड) असे या कामगाराचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामुळे कंपनीतील त्यांच्या आठ सहकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम अंबड पोलिस स्टेशनमध्ये सुरू होते.

चव्हाण हे अंबड एमआयडीसीतील मेट्रो पॉलिमर्स कंपनीत कामास होते. त्यांचे सात ते आठ सहकारी त्यांना मानसिक त्रास देत असत. यामुळे त्रस्त होऊन त्यांनी दुपारी घरी गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला होता. चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामध्ये कंपनीत त्रास देणाऱ्या सहकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. त्यामुळे पोलिसांनी संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांना अटक; बाइक, मोबाइल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात बाइक, मोबाइल चोरीसह जबरी चोऱ्या करणाऱ्या संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय प्रदीप कुरकुरे (१९, रा. शिवशक्ती चौक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या बाइक, मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना बारदान फाट्याकडून शिवाजीनगरच्या दिशेने दोन बाइकवरील चार मुलांना पोलिसांनी हटकले. त्यापैकी दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या संशयितांनी नंतर बाइक चोरीची असल्याची माहिती दिली. पाच बाइक, दहा मोबाइल, कॉम्प्युटर, टीव्ही, होम थ‌िएटर चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी चौघांकडून तीन लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देविकर यांच्या मागदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. व्ही. कोल्हे, पोलिस हवालदार एम. टी. गायकर, विष्णू उगले, पोलीस नाईक दत्तू गायकवाड, शिपाई तुषार देसले, नितीन नेटारे, सुरेश जाधव आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेनरोडवरील लॉजवर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गजबजलेल्या मेनरोड बाजारपेठेतील एका लॉजवर पोलीसांनी बुधवारी दुपारी छापा टाकला. अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तीन पुरूष व तीन महिलांना ताब्यात घेतले.

बाळू रामचंद्र बोडके (५७, रा. रामशेत आशावाडी, ता. दिंडोरी), नागेश भानुदास मोरे (२६, रा. वाल्मिकनगर, पंचवटी) आणि बाळासाहेब काशिनाथ खरोटे (४४, रा. शिवाजीनगर, जेलरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तसेच या ठिकाणी आढळलेल्या तीन महिलांनाही पोल‌िसांनी ताब्यात घेतले आहे.

मेनरोडच्या ड्रिमलॅन्ड लॉज या ठिकाणी अनैतिक व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोल‌िस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार तेथे छापा टाकला. संशयित बोडके हा काही महिलांकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलिस निरिक्षक रोहकले, सहायक निरीक्षक अहिरराव, उपनिरिक्षक विलास देशपांडे, आदिनाथ मोरे, रवींद्र पानसरे यांच्या पथकाने लॉजवर सायंकाळी छापा टाकला. संशयितांकडून नऊ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. संशय‌ितांवर पिटा कायद्यान्वये सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीबाबत महापौरांचा यू टर्न!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नालेसफाईच्या कामांवरून महासभेत साडेचार तास चाललेले घमासान आणि सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केलेल्या आरोपांवर महापौर रंजना भानसी यांनी अखेर पाणी फिरवले आहे.
नगरसेवकांच्या आरोपानंतर नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्याची करणाऱ्या महापौरांनी आठ दिवसांत या चौकशीवरून घूमजाव केले आहे. नालेसफाईमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी नव्हे तर माहिती मागवल्याचा दावा महापौरांनी केल्याने संशय बळावला आहे. आता पाणी साठल्यास जाब विचारू असा युक्त‌िवाद करत महापौरांनी एक प्रकारे नालेसफाईच्या भ्रष्टाचाराला क्लीनचीट दिली आहे. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी आपण कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महापौरांच्या या पारदर्शक क्लिनचीटची चर्चा आता पालिका वर्तुळात रंगली आहे.
१४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकची दैना उडाली होती. शहराच्या सखल भागातही पूरस्थिती निर्माण होवून सराफ बाजारात लाखोंचे नुकसान झाले होते. नालेसफाईची कामे वेळेत न झाल्यानेच शहराला या संकटाचा सामना करावा लागला होता. विरोधकांच्या दबावानंतर महापौरांनी नालेसफाईच्या कामांच्या चौकशीची घोषणा केली होती. महापौरांनी आता आठ दिवसानंतर चौकशीच्या घोषणेवर घूमजाव केले आहे. आपण चौकशीसाठी समितीची घोषणा केलीच नसून स्वतःच चौकशी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नालेसफाईच्या कामाची आपण माहिती मागवली आहे. तसेच यापुढे कुठे पाणी साचले तर अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. पावसाळापूर्व कामे झाल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.

नालेसफाईतील भ्रष्टाचार दाबण्यासाठी प्रथम महासभा गुंडाळली. आता चौकशीवरून महापौरांनी घूमजाव केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाला पाठीशी घातले जात आहे.
- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवनखेड ग्रामपंचायत ठरली विजेती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत दिले जाणाऱ्या २०१६-१७ या वर्षासाठीचे विभागस्तरीय पुरस्कार विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी बुधवारी जाहीर केले. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हिवरेबाजार (ता. जि. नगर, १० लाख) या ग्रामपंचायतीस तर द्वितीय क्रमांकाचा आठ लाखांचा पुरस्कार दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. याशिवाय मलांजन (ता. साक्री. जि. धुळे) या ग्रामपंचायतीला सहा लाख रुपयांचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात बुधवारी दुपारी विभागीय आयुक्तांनी या पुरस्कारराप्त ग्रामपंचायतींची नावे जाहीर केली. याप्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुदर्शन कालिके, सहायक मुख्य अभियंता विष्णू वाघमोडे, उपायुक्त (विकास) एन. मित्रगोत्री, उपायुक्त (प्रसासन) सुखदेव बनकर, आदी उपस्थित होते. या पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना लवकरच या पुरस्काराने राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कारवितरण समारंभ पंढरपूर येथे होण्याची शक्यता आहे. या पुरस्कारप्राप्त तीन ग्रामपंचायतींपैकी प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय समितीमार्फत तपासणीकरण्यात आली.

यांना विशेष पुरस्कार

माळेगाव (ता. सिन्नर, नाशिक-स्व वसंतराव नाईक पुरस्कार-पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचे व्यवस्थापन), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा जि.नंदुरबार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार-सामाजिक एकता), लोणी बु (स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार).

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत गावांची अत्यंत पारदर्शिपणे तपासणी करून गुणदान केले गेले होते. मी स्वतः यापैकी काही ग्रामपंचायतींना भेट दिलेली आहे. स्पर्धा मोठी असल्याने या ग्रामपंचायतींना अजूनही काम करण्याची संधी आहे. अवनखेडचा पुरस्कार जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे.

- महेश झगडे,

विभागीय आयुक्त, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णसुविधा नाममात्रच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

महापालिकेत समावेश असलेल्या गंगापूर गावात भव्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. गंगापूर गाव परिसरातील रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या हेतूने रुग्णालय बांधण्यात आले होते. परंतु, सुसज्ज असलेल्या रुग्णालयात सुविधा मात्र नाममात्रच दिल्या जात असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. यामुळे महापालिकेचा लाखो रुपये खर्च करून बांधलेली इमारत धूळ खात पडून असल्याची स्थिती आहे.

गंगापूर गावातील रुग्णालयात केवळ किरकोळ आजारांची तपासणी केली जात असल्याने गरोदर तसेच दीर्घ आजार असलेल्या रुग्णांना दुसरीकडे जाण्याची वेळ येत असते. महापालिकेने गंगापूर गावातील रुग्णालयात पुरेशी व्यवस्था निर्माण करून गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महापालिकेच्या सातपूर विभागात मायको रुग्णालयानंतर सर्वात मोठे रुग्णालय गंगापूर गावात उभारले आहे. परंतु, रुग्णालयाला लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध असतानादेखील केवळ तात्पुरतेच औषधोपचार दिले जातात. विशेष म्हणजे सुसज्ज ऑपरेशन थिएटर, रुग्णांसाठी सुसज्ज बेड्स, डॉक्टरांसाठी स्वंतत्र ओपीडी कक्ष व नर्सेससाठी सर्व सुविधा असतानाही लाखो रुपये खर्चून उभारलेले रुग्णालय धूळ खात पडून आहे. दुसरीकडे कमी जागेत मायको कंपनीने उभारलेल्या रुग्णालयात नेहमीच महिला रुग्णांची गर्दी होते. यात गंगापूर गावातील गरोदर महिलांनादेखील मायको रुग्णालयाचा सहारा घेण्याची वेळ येते. स्थानिक नगरसेवकांनी अनेकदा महापौर व आयुक्तांना गंगापूर गावातील रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार देण्याबाबत मागणी केली होती. यानंतर महापौरांनीदेखील रुग्णालयाची पाहणी करत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासने दिली. परंतु, आजतागायत या रुग्णालयात सुविधा नसल्याने गरोदर महिला रुग्णांना सातपूरच्या मायको रुग्णालयात जाण्याची वेळ येते. जवळ असलेल्या रुग्णालयात महिलांसाठी डॉक्टरांची नेमणूक केल्यास महिलांची समस्या मार्गी लागणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महापालिका आयु्क्तांनीही सुसज्ज अशा गंगापूर गावातील रुग्णालयाला सुविधा पुरवाव्यात अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणतात, मात्र मनपाकडून या गंगापूर गावाच्या या रुग्णालयात केवळ सुविधा नावांसाठी देण्यात आल्याचे चित्र आहे. वेळोवेळी याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले मात्र तरीही सुरुवातीस देण्यात आलेल्या सेवा आता मिळत नसल्याने रुग्णांची वाणवा होत आहे. रुग्णसुविधा नाममात्रच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूजा सांगळेला व्हायचंय डॉक्टर!

$
0
0

नाशिक : पितृछत्र हरवलं तेव्हा ती अवघ्या साडेतीन वर्षांची होती. सरस्वतीच्या प्रसन्नतेमुळं तिच्यातली प्रज्ञा लपून राहिली नाही. अखेर आत्याने पुढाकार घेतला आणि तिला आपल्या घरी प्राथमिक शिक्षणासाठी आणलं. शिक्षकांना तिच्यातली चमक दिसल्यामुळेच चितं माध्यमिक शिक्षणही आपसूकच झालं. कुठलाही क्लास न लावता इयत्ता दहावीत तिनं घसघशीत ९१.८० टक्के मिळविले आहेत. तिचं नाव आहे पूजा सांगळे. आता तिला प्रश्न पडला आहे तो तिच्या यापुढील शिक्षणाचा.

‘माझं शिक्षण फक्त आठवीपर्यंत झालं असलं तरी माझी पोरगी फार हुशार आहे. परिस्थितीची तिला फार जाणीव आहे. त्यामुळंच तिने आजवर कुठला हट्ट केला नाही. दहावीचं वर्ष असलं तरी क्लास लावून दे असा आग्रह केला नाही. तिच्यातले गुण पाहूनच शिक्षकांनी आजवर तिच्या शिक्षणाचा खर्च केला आहे. एवढे मोठे ९१ टक्के मिळाले. पण, काय करू. कसं करू पुढचं शिक्षण. त्यात ती म्हणते डॉक्टर व्हायचं. आपल्यासारख्या गरिबांची सेवा करायची. तुम्हीच सांगा दादा तिला कसं बनवू डॉक्टर’ असे सांगता सांगता पूजाची आई सीमा ही धाय मोकलून रडते. त्रिमूर्ती चौकातील पेठे विद्यालयात दहावीचे शिक्षण घेतलेली पूजा शिक्षकांची लाडकी आहे. साधा पेन असो की वही कुठलाही खर्च पूजाला किंवा तिच्या आईला करावा लागला नाही. होतकरू आणि कष्टाळू पूजा पुढे गेलीच पाहिजे या हेतूने शिक्षकांनी आजवर तिच्या शिक्षणाचा खर्च केला आहे. आता तिला पुढच्या शिक्षणासाठी व स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाकडून आर्थिक पाठबळ हवं आहे.

एकीकडे पोरीची हुशारकी आणि दुसरीकडे जगण्याची कसोटी कसं काय करणार? पूजाचे वडील गेले तेव्हा ती साडेतीन वर्षांची होती, तर तिची लहान बहिण आरती एक वर्षांची. सासरच्या मंडळींची वागणूक काही वेगळीच होती. पोटचा गोळा असल्याने आम्ही तिला माहेरी घेऊन आलो, असे सांगताना पूजाचे आजोबा सीताराम लोधे अतिशय भावूक होतात. जावयाच्या पश्चात मुलगी आणि नातींचं काय होईल, कोण मदत करील, असा विचार करीत १२ वर्षांपासून आईसह दोघी लेकी आमच्याकडे आहेत. दोन्ही पोरींची जिद्द फार मोठी आहे. तिला कसं बळ द्यायचं? आज महागाई एवढी आहे? कसा पेलवणार शिक्षणाचा खर्च? आजोबांच्या या प्रश्नांनी मोठं काहूर माजतं. पण, भगवंत आहे. तो करेल काही तरी. दाखवेल काही तरी मार्ग, असे म्हणत हे कुटुंब आशेच्या किरणांकडे डोळे लावून आहेत. सरस्वतीसोबत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ते आसुसलेले आहेत. दोन वर्षांपूर्वी लहानग्या आरतीला डेंग्यू झाला. वेळीच उपचार झाला नाही म्हणून आजार बळावला. तिच्या उपचारासाठी मुंबई गाठलं. पण, थोडेथोडके नाही तर तब्बल तीन लाखांहून अधिक खर्च आला. पूजाच्या दोन्ही मामांनी आणि इतरांनी मदत केली. अखेर आरती बरी झाली. पण, या घटनेमुळं कुटुंबाच्या हालापेष्टा आणखीन वाढल्या. पूजाची आई सीमा या धुणीभांडी, स्वयंपाक, शिवणकाम करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. आपली मुलगी शिकेल, मोठी होईल आणि आपल्यालाही सुखाचे दिवस येतील, या खात्रीनं त्या कठोर मेहनत करीत आहेत. पूजाच्या या हुशारीला आणि धडपडीला बळ हवं आहे. घराशेजारीच मोठा क्लास चालतो. याच क्लासचालकांकडे सीमा या स्वयंपाक बनविण्याच काम करतात. पूजाची गुणवत्ता पाहूनच क्लासचालकांनी पूजाला अभ्यासात मदत केली, तिला मार्गदर्शन केले. आज दहावीला ९१.८० टक्के गुण मिळवून पुढे वैद्यकीय शिक्षण घेण्याचा पूजाचा निर्धार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक निधीसाठी करवाढ अटळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेत, नगरसेवक निधी ७५ लाखांवरून ४० लाखांवर आणला असताना, महापौर रंजना भानसी मात्र ७५ लाखांच्या हट्टावर कायम आहेत. प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी आग्रह धरला असल्याने नगरसेवक निधीसाठी प्रसंगी करवाढ करण्याची तयारी महापौरांनी दर्शवली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी नगरसेवकांची हौस पूर्ण करण्यासाठी नाशिककरांवर करवाढीचा बोजा टाकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण करात १४ टक्के, तर पाणीपट्टीत ५ टक्के करवाढ अटळ मानली जात आहे. निधीसाठी महापौर हट्टालाच पेटल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्षाची ठिणगीही पडली आहे.

महापौरांनी महासभेत नगरसेवक निधी ४० लाखांवरून थेट ७५ लाखांवर नेला होता. पालिकेची आर्थिक परिस्थिती नसतानाही, महापौरांनी केलेल्या या घोषणेमुळे प्रशासनाची अडचण वाढली होती. परंतु, आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन नगरसेवकांना केवळ ४० लाखांचाच निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, महापौर रंजना भानसी मात्र ७५ लाख रुपये निधी देण्याच्या हट्टावर कायम राह‌िल्या आहेत. आपण अद्याप महासभेचा ठराव आयुक्तांकडे पाठविलेला नाही. आयुक्तांनी कदाच‌ित स्थायी समितीच्या ठरावावरूनच ४० लाखांचा निधी देण्याची तयारी दर्शवली असेल, असा खुलासा महापौरांनी केला आहे. ७५ लाख रुपये नगरसेवक निधीचा ठराव आपण आयुक्तांना गुरुवारी पाठवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रशासनाने उत्पन्न वाढीचे स्रोत वाढविण्यावर दिला आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवून दिल्यास निधी देवू अशी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महापौरांनी नगरसेवक निधीसाठी आपण करवाढ करण्यासही अनुकूल असल्याचे स्पष्ट केले आहे. करवाढीसंदर्भातील सुधारीत प्रस्ताव नव्याने सादर करण्याचेही आदेश दिल्याचे त्यांनी सांग‌ितले. या डॉकेटवर महासभा व स्थायी समितीत सर्व पक्षांना एकत्र करून करवाढीचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांच्या हट्टासाठी महापौरांनी करवाढ लादण्याची तयारी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासनाने आता आपला यशस्वी डाव खेळत सत्ताधाऱ्यांना करवाढीसाठी अनुकूल केले आहे. सर्वसाधारण करात १४ टक्के तर पाणीपट्टीत ५ टक्के वाढ अटळ मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध फी वसुलीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
विनापावती वसूल करीत असलेली सहा हजार रुपये फी परत करावी, या मागणीसाठी के. के. वाघ ‌इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तब्बल सात तास गेटवर आंदोलन केले. अभाविपच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षांनी फी परत करण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील नामांकित असलेल्या के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजकडून तीन ते चार वर्षांपासून सेमिनार व क्लब चार्जेसच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडून तब्बल सहा हजार रुपये वसूल केले जात आहेत. मागील वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना कच्ची पावती दिली जात असे. पण या वर्षीपासून प्रवेश पावतीवर सहा हजार रुपये रिस‌िव्हड असे लिहून सही करून दिली जात असून, हीच पावती असल्याचे कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगितले गेले. हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या लक्षात येताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्राचार्यांना लेखी स्वरुपात १६ जूनला निवेदन देण्यात आले. मात्र, प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.

त्यामुळे बुधवारी सकाळी १० वाजता के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी संस्थेच्या विरोधात घोषणाबाजी करून कॅम्पस दणाणून सोडला. प्राचार्यांच्या खुर्चीला नोटांच्या माळा घालण्यात आल्या. संस्थेच्या अध्यक्षांचे छायाचित्र असलेले व्यंगचित्र दाखवत व संस्थेच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

सुरुवातीला संस्थेचे सचिव व प्राचार्य केशव नांदूरकर यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण सहा हजार रुपये परत करण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी आग्रही भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. प्राचार्य व सर्व शिक्षकदेखील आंदोलनस्थळी उपस्थित होते. सकाळी १० वाजेपासून ५ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. तब्बल सात झालेल्या आंदोलनानंतर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून सहा हजार रुपये परत करण्याचे तोंडी आश्वासन दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पण आठ दिवसांत विद्यार्थ्यांना पैसे परत न दिल्यास पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोतील भुलभुलैय्या कायमच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महानगराच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सिडको या गृहनिर्माण संस्थेने नाशिक शहरात सहा योजना उभारल्या आहेत. या सहाही योजनांचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्यात आले असून, सिडकोतील घरांच्या क्रमांकांबाबत अद्यापही संभ्रम निर्माण झालेला आहे.

सिडकोने घरांचे नंबर किंवा वसाहत उभारताना मराठी महिन्यांचे नावे देऊन घरांचे नंबर निश्चित केले आहेत. त्यातच हे नंबर खुपच मोठे असल्याने नवख्या माणसाला हे नंबर लक्षात ठेवणे तर जड जाते मात्र सिडकोत येऊन एखादी घर शोधणे म्हणजे त्यांच्यासाठी परीक्षाच ठरते. महापालिकेकडे या योजना हस्तांतरण झाल्याने महापालिकेने आता याचे नंबर बदलण्यात काहीच हरकत नसून, यासाठी मात्र कोणताही राजकीय पक्ष पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिडकोकडून या सहाही योजनांना मराठी महिन्यांचे नावे देऊन त्या पद्धतीचे सेक्टर तयार केले आहेत. या सेक्टरला चैत्र, वैशाख, आषाढ अशा पद्धतीने नावे दिली आहेत. सिडकोच्या कागदोपत्री मराठी महिन्यांच्या नावांचे सेक्टर दिसून येतात. त्याचबरोबर घरांना नंबर देतानासुद्धा मराठी महिन्यांच्या सुरुवातीचे अक्षर इंग्रजीत घेऊन त्यात सेक्टर नंबर, चाळ नंबर व घर नंबर यांचा समावेश करून मोठे नंबर सिडकोने या घरांना दिले आहेत. सिडकोने त्यावेळी या अनोख्या पद्धतीचा वापर करून नंबर दिले असले तरी ते लक्षात ठेवणे व शोधण्यासाठी अत्यंत कठीण जात असतात.

लोकप्रतिनिधी गप्प का?

महापालिकेने तयार केलेली नावांची योजना बंद पडल्यानंतर त्याबाबत एकाही नगरसेवक किंवा राजकीय नेत्यांनी पाठपुरावाच केला नसल्याने पालिकेच्या जुन्या योजना बंदच झाल्याचे यावरून दिसत आहे. सिडकोच्या सर्वच योजना जर पालिकेकडे हस्तांतरित झाल्या आहेत. तर आता सिडकोच्या नंबर्स ऐवजी नवीन नंबर देण्याची तयारी महापालिका का दाखवत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिडकोतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन याबाबत ठोस भूमिका घेतली तर त्यात बदल होऊ शकतो हे मात्र निश्चितच आहे.

घरपट्ट्यांवरील नंबर द्यावे

सिंहस्थाच्या काळात महापालिकेने अनेक ठिकाणी नव्याने दिशादर्शक फलक लावले आहेत. मात्र सिडकोत तशा पद्धतीचा सेक्‍टरनुसार फलक का लावण्यात आले नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

या समस्येबाबात विविध उपाय केले तर ती समस्या दूर होईल, असेही काही रहिवाशांनी सांगितले. त्यात नव्याने खासगी मिळकतीवर विकसित होणाऱ्या कॉलनी भागात ज्या पद्धतीने नकाशे लावले जातात. त्याचपद्धतीने सिडकोतही कोणते सेक्टर कोठे आहे याचे फलक लावले पाहिजे. त्याचबरोबर जुन्या नाशकात ज्या पद्धतीने घरांना किंवा वाड्यांना नंबर आहेत तसे नंबरही आता महापालिकेने या घरांना दिले पाहिजे, अशीही मागणी होत आहे. सिडकोच्या घरांच्या घरपट्ट्यांना जे नंबर दिले आहेत तेच नंबर घरांना दिले तर निश्चित हे सोयीचे होणार आहे.

---------------------

सिडको प्रशासनाने घरांना दिलेले क्रमांक हे अतिशय किचकट आहेत. यावर उपाय म्हणून महापालिकेच्या माध्यमातून हे क्रमांक बदलण्याबाबत ठरावानुसार काही प्रमाणात काम सुरू झाले होते. मात्र पाठपुरावा न झाल्याने ही योजना बारगळली. सिडकोचे सध्याचे घर क्रमांक हे फक्त सिडकोच्या कागदोपत्री व्यवहारासाठी ठेवावे व महापालिकेने दिलेले नंबर्स व्यवहारात वापरले तर निश्चितच सोयीचे होईल.

- डॉ. सुभाष देवरे, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकाने उघडणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-त्र्यंबक रोड आणि नाशिक-दिंडोरी रोडवरील ४२ दारू दुकाने उघडी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिल्यामुळे तीन महिने बंद असलेली ही दुकाने आता पुन्हा उघडणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने महिनाभरापूर्वी नाशिक-त्र्यंबक रोड आणि नाशिक-दिंडोरी रोड महापालिकेकडे हस्तांतर केल्याचा आदेश काढला होता. जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी या बंद दुकानांचा मार्ग मोकळा केला. आता राज्य उत्पादन शुल्क विभाग या दुकानांचे नुतणीकरणाचे प्रस्ताव मागवणार असून, त्यानंतर मंजुरी देणार आहे.

या रस्त्यावर देशी दारूची चार, सात वाइन शॉप, २८ परमीट रुम व तीन बिअर शॉपी अशी दुकाने आहेत. आता या दुकानांचा रस्ता मोकळा झाल्यामुळे येथे तळीरामांची गर्दी वाढणार आहे. सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर मद्य दुकानांना बंदी केल्यानंतर त्यातून सवलत मिळवण्यासाठी वेगवगेळया क्लुप्त्या वापरण्यात आल्या. त्यातूनच ही दारू दुकाने सुरू होणार आहेत.

विशेष म्हणजे महापालिकेची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असतानाही राजकीय नेत्यांच्या दबावापायी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे दोन रस्ते पालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. नाशिक-त्र्यंबक आणि नाशिक-दिंडोरी या दोन राज्यमार्गांची देखभाल व दुरुस्ती महापालिकेकडे आहे. त्याचाच आधार घेण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे दोन्ही रस्ते पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नाशिक जिल्ह्यातील १ हजार ११६ दुकानांपैकी ७६३ दुकाने बंद झाली होती. या आदेशामुळे केवळ ३५३ दुकाने सुरू होती.

आता त्यात ४२ दुकानांची भर पडणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दारू दुकान बंद झाल्यामुळे सरकारच्या महसुलातही घट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरला विजेचा लपंडाव सुरूच

$
0
0

परिस्थिती हाताळण्यात महावितरणाला अपयश

म. टा. वृत्तसेवा इंदिरानगर

मागील आठवड्यापासून शहरात पावसाचे वातावरण तयार झाले असून, अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून इंदिरानगर भागात विजेचा चांगलाच लपंडाव सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मंगळवारी (दि. २७) साधारणपणे पाच ते सहा तास विद्युत पुरवठा बंद झाला होता. तर बुधवारीसुद्धा सकाळपासूनच या भागातील विद्युत पुरवठा बराच काळासाठी बंद करण्यात आला होता. विजेच्या या लपंडावावर कायमस्वरूपी उपाय का काढला जात नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

इंदिरानगर भागात मंगळवारी आणि बुधवारी या दोन्ही दिवशी विजेचा लपंडाव सुरू होता. मंगळवारी तर सकाळी दहा वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला तो थेट सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरू करण्यात आला. याबाबत महावितरण कंपनीकडे विचारणा केली असता तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, त्यावर काम सुरू असल्याचे उत्तर देण्यात आले. मंगळवारी तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाला असला तरी बुधवारीसुद्धा सकाळपासूनच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत. वारंवार पावसाळी वातावरण झाले तरी महावितरण कंपनीचा विद्युत पुरवठा खंडित का केला जातो, याचे उत्तर अद्यापही नागरिकांना मिळालेले नाही. विजेचे बील एक दिवस उशिराने भरल्यास थेट विज तोडणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सुरळीत विद्युत पुरवठा का करण्यात येत नाही, असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण काढताना तणाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी संगमेश्वर भागातील सांडवा पुलालगत असलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर चालवला. यावेळी पोल‌िस व पालिका प्रशासनाला अतिक्रमणधारकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या भागातील एका वाइन शॉपवर देखील दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राष्ट्रीय व राज्य मार्गावरील पाचशे मीटरच्या आतील मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. त्यानुसार शहरातील प्रमुख रस्त्यालगत असलेली वाईन शॉप, मद्याची दुकाने बंद करण्यात आली आहेत. मात्र संगमेश्वर भागातील सांडवापुलासमोरील वाइन शॉप या नियमातून सुटत असल्याने गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरातील तळीरामांची या शॉपवर झुंबड उडत आहे. यामुळे हा परिसर तळीरामांचा अड्डा बनला आहे. वाइन शॉपवर होणाऱ्या गर्दीमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. तसेच परिसरातील काही व्यावसायिकांनी या मद्यपींना पूरक खाद्य पदार्थ व जागा दिल्याने मद्यपींचा दिवसभर वावर वाढला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मद्यपींमध्ये हाणामारीचे प्रसंगदेखील घडल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. दरम्यान, याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे व मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन मद्यपींना जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

निवेदनाची दखल घेत बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोल‌िस बंदोबस्तात या भागातील अतिक्रमण काढले. दुपारी दोन वाजता या कारवाईला सुरुवात झाली. सांडवा पुलालगत असलेल्या १० ते १५ अतिक्रमण व पत्रा शेड उद‌्ध्वस्त करण्यात आले. दरम्यान या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची चांगलीच धांदल उडाल्याने काहींनी दुकानातील सामानाची आवराआवर सुरू केली.

वाइन शॉपमुळे दगडफेक

कोणतीही पूर्वसूचना न देता ही करवाई करण्यात आल्याने संतप्त झालेल्या अतिक्रमण धारकांनी यास विरोध करायला सुरुवात करीत कारवाई बंद पाडली. तसेच ज्या वाइन शॉपमुळे या भागात मद्यपींची गर्दी होते ते वाइन शॉपबंद करावे, अशी मागणी करीत संतप्त जमाव वाइन शॉपसमोर धावून गेला. जमावतील काहींनी शॉपवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती
नियंत्रणात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरोजगार निर्मितीला खीळ

$
0
0

नामदेव पवार, सातपूर

उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योग संघटनांच्या पुढाकाराने ‘मेक इन नाशिक’साठी प्रयत्न सुरू असतांना शहरातील ‘मदर इंडस्ट्री’ असा नावलौकिक असलेल्या काही बड्या कंपन्यांमध्ये अनेक दिवसांपासून नवी नोकरभरती ठप्प झाली आहे. तसेच या कंपन्यांमधील कायमस्वरुपी कामगारांची संख्याही वेगाने घटत आहे. अशा परिस्थितीत उद्योगवाढीला प्रोत्साहन कसे मिळणार? असा प्रश्न आता रोजगार व उद्योग क्षेत्रातील जाणकारांना पडला आहे.

शहरात सातपूर आणि अंबड एमआयडीसीमध्ये १९७८ नंतर काही बड्या उद्योगांच्या गुंतवणुकीमुळे कारखान्यांचे मोठे जाळे पसरले. बॉश (मायको), महिंद्रा, क्रॉम्प्टन, एबीबी, एप्कॉस, व्हीआयपी, सीएट यासारख्या बड्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्याही वाढत गेली. मात्र, या कंपन्यांमध्ये आता पूर्वीसारखे रोजगार संधी राहिलेल्या नाहीत. या कंपन्यांमधील हजारो कामगार निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर कायमस्वरूपी कामगारांना संधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, बदलत्या उत्पादन पद्धती व वाढत्या कंत्राटीकरणामुळे या कंपन्यांमध्ये दिवसेंदिवस रोजगार कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. बदलत्या कामगार कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कावर गदा येत असल्याचेही मानले जात आहे. तसेच कंपन्यांमधून निवृत्त होणाऱ्या कायमस्वरूपी कामगारांच्या जागेवर तात्काळ नव्याने कामगार भरती होण्याची गरज रोजगार क्षेत्रातील जाणकार व्यक्तींकडून व्यक्त केली जात आहे.

सातपूर आणि अंबड एमआयडीसीमधील केवळ बड्याच नव्हे तर शंभरपेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या मध्यम व लघु उद्योगांमधील कामगार निवृत्त होत आहेत. निवृत्त कामगारांची संख्या हजारोच्या संख्येने कमी होत असतांना त्यांच्याजागी कायमस्वरूपी कामगारांची संख्या वाढू शकलेली नाही. निवृत्त कामगारांच्या जागेवर तात्काळ नवीन कामगार भरती करावी अशी मागणी कामगारनेते डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे. तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेल्या कुशल कामगारांना मोठ्या उद्योगांनी कायस्वरूपी कामगार म्हणून घ्यावे, अशीही मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images