Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बाजार समिती बरखास्त करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची निराशा केल्याचा आरोप करत किसान शिखर मंचने नाशिकमध्ये बैठक घेऊन पुन्हा शेतकऱ्यांना संघटित करून लढा उभारण्याचा बिगूल वाजवला. या बैठकीनंतर मंचाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुकाणू समितीने कर्जमाफीच्या विरोधात ठरवलेल्या संघर्षयात्रेत व आंदोलनात सहभाग न घेण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, शेतकऱ्यांची तत्त्वतः कर्जमाफी व कर्जमाफीचे निकष किसान शिखर मंचाला मान्य नाहीत. शेतीशी संबंधित मूलभूत प्रश्न सरकारने तातडीने सोडवणे गरजेचे असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

राजू शेट्टींना महाराष्ट्रात अपयश आल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरू केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्याचप्रमाणे सरकारमध्ये प्रतिनिधी ठेवायचा व सरकारशी संघर्ष करायचा, यावरही या नेत्यांनी बोट ठेवत टीका केली. राज्यभरातील शेतीप्रश्नावर लढणाऱ्या नेत्यांनी एकत्र येत औरंगाबाद येथे प्राथमिक बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी नाशिकमध्ये त्यात दिशा ठरवण्यात आली. सुकाणू समितीने ९ जुलै रोजी नाशिकमध्ये बैठक होणार आहे. बैठकीनंतर ९ जुलैपासून नाशिक येथून संघर्षयात्रा काढण्यात येईल. पुणे येथे २३ जुलै रोजी या यात्रेचा समारोप होईल. तत्पूर्वीच किसान शिखर मंचने बैठक घेऊन त्याला विरोध सुरू केला. पत्रकार परिषदेत शेतकरी एकत्रीकरणासाठी पुढाकार घेणारे माजी अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी सांगितले, की नुकत्याच कर्जमाफीसाठी झालेल्या शेतकरी आंदोलनावेळी सुकाणू समितीचे सदस्य व अन्य नेते अपुरे पडत असल्याचे दिसून आले. त्याचे कारण दिवंगत शरद जोशी यांच्या कृषी अर्थशास्त्राची पुरेशी वैचारिक बैठक आंदोलनाला नाही, असे लक्षात आल्यानंतर जगभर चर्चा झालेल्या शेतकरी संघटनेच्या संबंधित नेत्यांशी महिनाभर चर्चा होत होती. औरंगाबादला एक प्राथमिक बैठकही झाली. त्यानंतर नाशिक येथे किसान शिखर मंच बैठक घेण्याचे निश्चित झाले. सध्याच्या अडचणीच्या काळात शिखर मंच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा दिलासा राज्यभरातील शेतकऱ्यांना देणे आणि शेतीशी संबंधित मूलभूत प्रश्नांवर दीर्घकालीन लढाईची दिशा ठरविणे हा या बैठकीचा उद्देश होता. सरकारने केलेल्या कर्जमाफीचे निकष आणि केलेली कर्जमाफी सरसकट की तत्त्वतः, सातबारा अजून कोरा नाही, ३० जून २०१६ पर्यंतच कर्जमाफी अशा जाचक अटी असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकच्या गोल्फ क्लब विश्रामगृहावर ही बैठक झाली. यावेळी बैठकीत विधानसभेचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, अजित नरदे, डॉ. गिरिधर पाटील, खेमराज कोर, भगवान बोराडे, सुनील पवार, देविदास पवार, सुरेखा ठाकरे, शांताराम जाधव, शंकर पूरकर, रामनाथ ढिकले, अर्जुन बोराडे आदी उपस्थित होते. किसान शिखर मंचच्या या बैठकीतच शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक नागपूर येथे १६ व १७ जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर विभागवार दौरे, मेळावे व त्यानंतर राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांची खरीपकोंडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात मेअखेर जिल्हा सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांने फक्त ९,१९० शेतकऱ्यांना १६८ कोटी १४ लाख रुपयांचे कर्जवाटप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व ३४ बँकांना २८०६ कोटींचे उद्दिष्ट सरकारने दिले होते. मात्र, त्यातून केवळ ५.९९ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. गेल्या वेळेस खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ३ लाख ३ हजार ६९६ शेतकऱ्यांना २७८३ कोटी ७८ लाख रुपयांचे कर्जवाटप केल्यामुळे त्याची टक्केवारी ११८ टक्के झाली होती. त्यात जिल्हा बँकेने सर्वाधिक १७१९ कोटी १८ लाख कर्ज दिले होते.

यंदा नाशिक जिल्हा मध्यवर्ती आर्थिक अडचणीत आली व शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. या आर्थिक अडचणीमागे ३४२ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा, पीक कर्ज न मिळणे व बँकेची वसुली रखडणे ही कारणे होती. त्यामुळे बँकेला मोठा दणका बसला. गेल्या वेळेस बँकेने उद्दिष्टापेक्षा ४६२ कोटी अधिक पीक कर्ज खरिपासाठी वाटप केले होते. मात्र, यंदा बँकेने फक्त ३८ कोटी कर्जवाटप केले. त्यांना ११०१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या बँकेबरोबरच राष्ट्रीयीकृत बँकांना १६९१ कोटी २६ लाख रुपये उद्दिष्ट होते, तर ग्रामीण बँकांना ६ कोटी ८८ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. त्याचबरोबर खासगी बँकाना ६ कोटी ९४ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यात स्टेट बँकेने २६ कोटी ५७ लाख, बँक ऑफ महाराष्ट्रने ३० कोटी ७५ लाख, तर बँक ऑफ बडोदाने ११ कोटी १० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे, तर इतर बँकांचा आकडा फारसा समाधानकारक नाही.

पावसाळ्यात खरीप हंगामासाठी खरं तर मार्चनंतर कर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होतो. मात्र, यंदा नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले, तर कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचाही परिणाम या कर्जवाटपावर झाला आहे. जूनमधील आकडा अजून समोर आला नाही. त्यातून या बँकेकडून काय दिलासा मिळेल हे स्पष्ट नाही. जिल्हा बँकेची स्थिती खराबच असल्यामुळे त्यात खूप वाढ होण्याची शक्यता नाही.

कर्जमाफीचा काहींना दिलासा

सरकारच्या दीड लाख रुपये कर्जमाफीच्या घोषणेनंतर काही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याची संख्याही खूप कमी आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना बँकेकडून फारसा दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकाराकडून कर्ज काढून किंवा स्वतःचे पैसे टाकूनच पीक काढावे लागणार आहे. त्यासाठी काहींनी पेरणीला सुरुवातही केली आहे. त्याचा आकडा या महिन्यात ३४ टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाला पुन्हा लाभला ‘राम’स्पर्श

$
0
0

डॉ. ताकवलेंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ टाकतेय कात

ना‌शिक : उखाळ्या-पाखाळ्या, जातीय राजकारण, कर्मचाऱ्यांचे न सुटणारे प्रश्न या विळख्यात सापडलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला तारण्याचा रामबाण उपाय म्हणून विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना पाचारण करण्यात आले आहे. मुक्त विद्यापीठाला पुन्हा एकदा त्यांचा परिसस्पर्श लाभला असून, त्यांच्या प्रगल्भ अन् अनुभवी ज्ञानाचा फायदा विद्यापीठाला होणार असल्याने मुक्त विद्यापीठ कात टाकणार आहे.

मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र शासनाने निर्मित केलेले पहिले मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १ जुलै १९८९ ला करण्यात आली. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन मुक्त विद्यापीठ दूरशिक्षणाचे यशस्वी काम करीत आहे. तसे पाहिले तर मुक्त विद्यापीठ म्हणजे एकप्रकारे पांढरा हत्तीच. तो पोसणे ही अवघड बाब परंतु, ही बाब लिलया पेलून दाखवली होती ती डॉ. राम ताकवले यांनी. मुक्त विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाद्वारे देण्यात येणाऱ्या पदव्या इतर पारंपारिक विद्यापीठाच्या समकक्ष आहेत. मात्र मुक्त विद्यापीठ आणि मुक्त शिक्षण प्रणाली हा विषयच नवीन असल्यामुळे काही मंडळी विद्यार्थ्यांच्या पदवीच्या समकक्षतेबाबत शंका उपस्थित करतात. अशावेळी मुक्त विद्यापीठ रूजविण्याचे काम डॉ. राम ताकवले यांनी केले.

डिजिटायजेशनवर भर

डॉ. राम ताकवले यांचा भर डिजिटायझेशनवर आहे. डिजिटल लोकविद्यापीठ व्हावे अशी त्यांची इच्छा असून, त्यादृष्टीने ते पावले टाकत आहेत. विद्यापीठाने पारंपारिक जळमटे दूर सारून तंत्रज्ञानावर भर द्यावा, अशी त्यांच‌ी शिकवण असून, त्यादृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. आज (१ जुलै) विद्यापीठाचा वर्धापनदिन आहे, आणि अशातच विद्यापीठाला डॉ. राम ताकवलेंसारखा समर्थ हात दिशादर्शक म्हणून लाभणे ही सुखकारक बाब आहे.

डॉ. राम ताकवले हे आमच्यासाठी आदर्श आहेत. डॉ. ताकवले यांच्याशी सुहृदयतेचे संबंध असल्याने ते आम्हाला प्रत्येक गोष्टीत दिशा दाखवतात. सध्या त्यांच्याच मार्गदर्शनाने विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे आणि ते मुक्त विद्यापीठाला एका उंचीवर नेऊन ठेवतील, असा विश्वास आहे.

- डॉ. ई. वायुनंदन, कुलगुरू, मुक्त विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्या. रानडेंचे दुर्मिळ ‘फोटोदर्शन’

$
0
0

सुनील कुमावत, निफाड

ब्रिटिश काळात आपल्या विद्वतेने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमट‌विणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निफाड येथे भव्य स्मारक होत आहे. या स्मारकात आता त्यांचे दुर्मिळ फोटोही पहायला मिळणार आहेत. न्या. रानडे यांच्या पणती व पणतूने ही अमूल्य भेट श्री माणकेश्वर वाचनालयाकडे सुपूर्द केली आहे.

न्या. रानडे यांचा जन्म झालेल्या निफाड येथील जागेवर न्या. रानडेंचे भव्य स्मारक उभे राहत आहे. या स्मारकाच्या उभारणीत न्या. रानडेंचे पणतू रमाकांत विद्वांस, पणती डॉ. वसुधा आपटे, राधा ठाकूर यांनीही सहभाग घेतला आहे. नुकताच त्यांच्या वंशजांनी न्या. रानडे व त्यांच्या परिवारातील शंभर वर्षांपूर्वीचे दुर्मिळ फोटो माणकेश्वर वाचनालयाच्या स्वाधीन केले. हे दुर्मिळ फोटो साधारण ११५ वर्षांपूर्वीचे आहेत. तसेच, या स्मारकात लावण्यात येणाऱ्या न्या. रानडेंच्या अर्धपुतळ्याचा खर्चही डॉ. वसुधा आपटे यांनी केला आहे.

फोटो शंभर वर्षांपूर्वीचे

विद्वांस परिवाराने वाचनालयाला चार फोटो दिले आहेत. या फोटोंमध्ये डॉ. रानडेंची मानसकन्या सखूबाईंनी एक फ्रेम स्वतः आपल्या कलाकुसरीने तयार केली आहे. न्या. रानडेंचा फोटो १९०१ या वर्षांतील आहे. दुसरा एक फोटो रमाबाई रानडेंचा आहे. तिसरा फोटो न्या. रानडे व त्यांच्या समवेत असलेल्या परिवाराचा आहे. रानडे यांचे हे दुर्मिळ फोटो स्मारकात लावण्यात येणार आहेत.

न्या. रानडे यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करताना नामदार गोपाळ कृष्ण गोखले व रमाबाई रानडे असे दोन उत्तुंग व्यक्तिमत्व घडवले. मात्र स्वातंत्र्योत्तर भारतात न्या. रानडेंच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेतली नाही. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांना जो सन्मान मिळायला हवा तो मिळाला नाही, अशी खंत आम्हा रानडे, विद्वांस परिवाराला आहे.

- डॉ. वसुधा आपटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते दुरवस्था पोलिस ठाण्यात!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पावसामुळे देवळाली कॅम्प शहरात सध्या सुरू असलेल्या भूमिगत गटारींच्या कामामुळे अनेक रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याविरोधात येथील वॉर्ड क्रमांक २ चे नगरसेवक भगवान कटारिया यांनी थेट देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात निवेदन देत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

देवळाली शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे काम वॉर्ड क्रमांक ७, ४, ३, २, १ मध्ये सुरू आहे. त्यामुळे गटारीचे पाइप भूमिगत करण्यासाठी रस्ते मधोमध खोदण्यात आले होते. आता पाइप टाकून बऱ्याच अंशी काम पूर्ण झाले आहे. मात्र, खोदण्यात आल्याने बहुसंख्य रस्त्यांवर माती-दगड शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता पावसाने या मातीचे चिखलात रूपांतर झाले आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाल्याची स्थिती असल्याचा आरोप केला जात आहे. त्यात सर्वाधिक रस्त्यांची दुरवस्था वॉर्ड क्रमांक ४ व ७ मध्ये झाली आहे. रस्त्याने ये-जा करताना हमखास एखादा नागरिक तास-दोन तासांनी घसरून पडत असल्याने शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब नगरसेवक भगवान कटारिया यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाच्या नजरेस वारंवार आणून दिली, तरी प्रशासन आपले आडमुठेपणाचे धोरण सोडत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, कनिष्ठ अभियंता विलास पाटील, आरोग्य अधिकारी सतीश भातखळे व संबंधित कंत्राटदार खिल्लारी यांच्याविरोधात कटारियांनी पोलिसांत तक्रारच दाखल केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने हा सारा चाललेला प्रकार थांबविण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

अधिकारी रजेवर, जनता वाऱ्यावर

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झालेली असताना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ विलास पवार गेल्या तीन-चार दिवसांपासून सुटीवर गेले असल्याने कुठलाही निर्णय घेणे इतर अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. नागरिकांची गैरसोय राहिली एका बाजूला, त्यात सीईओंनी ‘रस्त्याच्या कामासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे’ अशा आशयाचे आवाहन जाहीर नोटीस प्रसिद्ध केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे शहराचा कुठल्याही पद्धतीचा विकास आराखडा नसून, सुरू असलेले भूमिगत गटारीचे काम पूर्णपणे वाया जाणार आहे.

-विश्वनाथ काळे, ज्येष्ठ नेते, रिपाइं

--

सध्याच्या कामांमुळे रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास कॅन्टोन्मेंट प्रशासनालाच जबाबदार धरण्यात यावे.

-भगवान कटारिया, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन महोत्सवासाठी मालेगावात जागर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य शासनाच्या वनमंत्रालयाकडून १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत मालेगाव वनपरिक्षेत्रात एकूण ९ लाख ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. याबाबत जनजागृतीसाठी शुक्रवारी येथील वन विभाग, पोल‌िस प्रशासन, महापालिका व आम्ही मालेगावकर या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शहरात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

वृक्षदिंडीप्रसंगी पालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, पोल‌िस उपअधीक्षक गजानन राजमाने, उप-विभागीय वन अधिकारी जगदीश येडलावर, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, वन परिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे, मनपा उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, उपस्थित होते.

वृक्षदिंडीचा प्रारंभ राष्ट्रीय एकात्मता चौक येथून करण्यात आला. शहरातील र. वी. शाह विद्यालय, काकाणी विद्यालय, काकाणी कन्या विद्यालय, या. ना. जाधव विद्यालय, ल. र. काबरा विद्यालय, के. बी. एच. विद्यालय, विनय मंदिर शाळा, साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर आदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीत सहभाग घेतला. काही विद्यार्थिनींनी हिरव्या साड्या परिधान केल्या होत्या. तर काही पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत ताल, मृदृग, चिपळ्याच्या तालावार ठेका धरला होता. सकाळी आठ वाजता राष्ट्रीय एकात्मता चौकातून दिंडीस सुरवात झाली. मोसम पूलमार्गे दिंडी निघाली. वन विभाग कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान मालेगाव युवा संघटना, साई आर्ट क्लासेस, महादेव सेवा समिती, हभप वडगे माऊली यांच्यातर्फे खाऊचे वाटप करण्यात आले. वृक्ष लागवड व संगोपन कार्यात बहुमोल योगदान देणाऱ्या सुनील माधवराव देवरे व अझहर जमील अन्सारी यांना आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती च्या वतीने ‘वृक्षमित्र पुरस्कार २०१७’ देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांसमोरच फुटला विकासकामांचा फुगा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको विभागात झालेल्या विकासकामांची पाहणी थेट मनपा आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी केल्यानंतर अनेक विकासकामे झालीच नसल्याची धक्‍कादायक बाब समोर आली. आयुक्‍तांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात उपस्थित नगरसेवकांनी आयुक्‍तांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. महानगरपालिकेच्या रुग्णालयाची पाहणी करताना डॉक्‍टरच उपस्थित नसल्याचे समोर आले, तर पेलिकन पार्कचीही पाहणी आयुक्‍तांनी केली.

महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर प्रथमच मनपा आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी सिडकोतील पाचही प्रभागांमधील विकासकामांची पाहणी केली. यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर, मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, छाया देवांग, रत्नमाला राणे, प्रवीण तिदमे, किरण दराडे, दीपक दातीर आदी उस्थित होते. अचानक ठरलेल्या या दौऱ्यामुळे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसाळ्यापूर्वी पावसाळी नाले व गटारींची सफाई झाल्याचे सांगण्यात येत असतानाही पुन्हा या ठिकाणी घाण किंवा कचरा कसा आला, असा प्रश्न आयुक्‍तांनीच उपस्थित केल्यावर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. रस्त्यांवर साचलेले पावसाचे पाणी, अस्वच्छता या सर्व गोष्टी पाहून नगरसेवकांनी आयुक्‍तांसमोर नाराजी व्यक्‍त केली. आयुक्‍तांनी पाहणी केलेल्या कामांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या असल्या तरी यावर काही उपाययोजना होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


डॉक्टर अनुपस्थित

सिडकोतील मोरवाडी येथे असलेल्या स्वामी समर्थ रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आयुक्‍त गेले असता त्याठिकाणी डॉक्‍टरच उपस्थित नसल्याचे समोर आले. पावसाळ्यामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ झालेली असताना डॉक्‍टरच याठिकाणी उपस्थित नसल्याचे समोर आल्याने नगरसेवकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. त्यानंतर जवळच असलेल्या पेलिकन पार्कचीही पाहणी आयुक्‍तांनी केली. मात्र, या ठिकाणी असलेली अस्वच्छता पाहून आयुक्‍त थक्‍क झाले.

आयुक्तांनी दखल घ्यावी

सिडकोत यंदा सर्वाधिक नवीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या भागात वारंवार आयुक्‍तांनी पाहणी करून येथील कामांबाबत माहिती घेतली पाहिजे, असे मत यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केले. सिडकोत बऱ्याच ठिकाणी यंदा पावसाळापूर्व कामे योग्य पद्धतीने न झाल्याची तक्रार नगरसेवक करीत आहेत. आगामी काळातील पावसाचा विचार करून ही कामे आता तरी पूर्ण करावीत, असेही नगरसेवकांचे म्हणणे आहे.

सिडकोतील काही नगरसेवकांनी कामांची पाहणी करण्याची मागणी केली होती. ज्या-ज्या ठिकाणी कामात दिरंगाई किंवा दर्जाबाबत शंका वाटली, त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

- अभिषेक कृष्णा, मनपा आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकत्याच राबविलेल्या एका विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये येवला शहर व परिसरातील अनेक चोऱ्यांचा छडा लागला आहे. या धडक मोहिमेतील तपासात एलसीबीच्या पथकाने पाच सराइत चोरांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील चार पोल‌िस अधिकारी आणि तब्बल ४० पोल‌िस कर्मचाऱ्यांच्या पथकाने रात्रभर येवला शहर, पारेगाव रोडसह कनकोरी (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथे विशेष ऑपरेशन राबवून छापे घातले. यात किरण उर्फ शिवा छगन सोनवणे, (रा. पेठ रोड), सागर गुलाब पवार, शंकर ज्ञानेश्वर कुमावत (दोन्ही रा.पारेगाव ता. येवला), चांगदेव भानुदास निकम (रा.कनकोरी ता. गंगापूर) या पाच जणांना पथकाने ताब्यात घेतले. या चोरट्यांनी येवला शहरातील म्हसोबानगर, पाबळेनगर, बाजीराव नगर, लोणारी नगर, विठ्ठलनगर, वल्लभनगर, निवारा कॉलनी, नीलांबरी कॉलनी, पारेगाव रोड, कोटमगाव रोड अशा ठिकाणी घरफोड्या करून लाखो रुपये, दाग‌िने, टीव्ही, कम्प्यूटरसह इतर महत्त्वाचे साहित्य चोरून नेले होते. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण ५ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.१२ घरफोडी व दोन चेन स्नॅच‌ींग व दोन मोटारसायकल चोरी व इतर दोन असे एकूण १६ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर नवले, गजेंद्र पाटील, अरूण पगारे आदींनी ही कामगिरी पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जखमी हरणाला जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील कासारखेडे शिवारात अज्ञात वाहनाने अडीच ते तीन महिन्यांच्या गरोदर हरणीला धडक मारल्याने तिचे मागील दोनही पाय तुटले. रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेली ही हरीण रस्त्याच्या कडेला तडफडत असतानाच या मार्गावरून जाणारे येवल्यातील ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांनी या जखमी हरणाला येवल्यातील पशू वैद्यकिय दवाखान्यात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. बनकर यांच्या समयसूचकतेमुळे एका हरणासह तर दोन वन्यजिवांचे प्राण वाचले.

येवला तालुक्यात हजारो हेक्टर वनक्षेत्रात अगदी हरीण, काळवीट आदी वन्यजीवांचा संचार आहे. बऱ्याचदा हे वन्यजीव वनक्षेत्र सोडून नागरी वाड्यावस्त्या अथवा शेतशिवाराकडे थडकतात. त्यात कधी रस्ता ओलांडताना त्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू होतो, तर कधी ते मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडून आपले प्राण गमावतात.

येवला-मनमाड रोडवरील येवला तालुक्यातील कासारखेडे शिवारातील जाधव वस्तीजवळ गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अंबादास बनकर हे येवल्याकडून मनमाडकडे जात होते. अशातच त्यांचे लक्ष रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या हरणाकडे गेले. त्यांनी तातडीने हरणाला पाणी पाजून पायातील रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्रयत्न केले. जाधव वस्तीजवळील बाळू शेलार यांना बोलावून बनकर यांनी त्यांच्या वाहनाने जखमी हरणाला येवला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथू डॉ. व्ही. आर. बाऊसकर, डॉ. सतिश कुऱ्हे, परिचर संदीप रक्ताटे यांनी भूल देवून शस्त्रक्रिया करून हरणाला वनविभागाकडे देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बससाठी खासगी कंपन्या इच्छुक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिटी बस सेवेला ताब्यात घेण्यासाठी येथील एका खासगी बस कंपनीने प्रयत्न सुरू केले असून, त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. ही बससेवा ताब्यात घेण्यासाठी अद्याप एसटी महामंडळाने कोणताही निर्णय घेतला नसला, तरी खासगी बस कंपन्यांच्या फेऱ्या नाशिकला वाढू लागल्या आहे. पुणे येथील एका खासगी बस कंपनीने जळगावच्या कंपनीबरोबर संयुक्तपणे ही बससेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी या कंपनीने एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अभ्यास करुन नंतर प्रस्ताव एसटी महामंडळासमोर ठेवणार आहे.

राज्य परिवहन महामंडळातर्फे शहरात सुरू असलेल्या सिटीबसला सहा वर्षांत तब्बल १२५ कोटींहून अधिक तोटा झाला आहे. त्यामुळे महामंडळ या बस चालवण्यास इच्छुक नाही. त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेने ही सेवा ताब्यात घ्यावी, असा प्रस्तावही दिला. पण महानगरपालिकेने हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर एसटीने अनेक मार्गांवरील बससेवा कमी करत आपला तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांची ओरडही वाढली. या सर्व कारणांमुळे अनेक खासगी बस कंपन्या एसटी महामंडळाकडे संपर्क करू लागल्या आहेत. पण त्याबाबत ठोस कोणताच प्रस्ताव अद्याप मिळालेला नाही व एसटीचाही कुठलाही निर्णय झालेला नाही.

सिटी बस सेवेचा वर्षभरात पाच कोटींहून अधिक प्रवासी लाभ घेतात. त्यामुळे ती किती महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन खासगी कंपन्यांचा कल नाशिकला वाढला आहे. पण, दुसरीकडे गेल्या पाच वर्षांत १०८ कोटी रुपयांचा तोटा एसटीला झाला. या आर्थिक वर्षातही १७ कोटी ७९ लाख ६२ हजारांची त्यात भर पडली. त्यामुळे हा आकडा आता १२५ कोटींपर्यंत गेला आहे. यावर्षी सिटी बसच्या माध्यमातून एसटीला ६५ कोटी ११ लाख ५५ हजार रुपये उत्पन्न मिळाले, तर खर्च ८२ कोटी ३१ लाख ४४ हजार झालेला आहे. त्यामुळे खासगी बस कंपनी ही सेवा ताब्यात घेऊन कशी फायद्यात, ठरेल हा प्रश्न मात्र कायम आहे.

नागरिकांचा विरोध?

एसटी महामंडळ चांगली सेवा देत असले तरी अनेक मार्गांवर त्यांच्या बस नाहीत. त्यामुळे त्या सुरू कराव्या ही नागरिकांची मागणी आहे. पण तोट्यात चाललेल्या सिटी बसससाठी हे अवघड आहे. त्यामुळे खासगी बस कंपनीने ते ताब्यात घ्यावे असे काहींचे मत असले तरी अनेक शहरांमध्ये खासगी बससेवेचा अनुभव तितकासा चांगला नाही. त्यामुळे नागरिकांचा याला विरोध असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौरीला व्हायचंय आयटी इंजिनीअर

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

वडिलांना चार बहिणी, आईलाही चार बहिणी, आईला पहिली मुलगी झाली, दुसरीही मुलगीच झाली. यामुळे आईचं फारस प्रेम मिळालं नसलं तरी आजीनं तिला मोठं केलं. ही मुलगी प्रचंड हुशार, मेहनती, जिद्दी निघाली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना तिने कुठलाही क्लास न लावता इयत्ता दहावीत चक्क ९६.४० टक्के गुण मिळविले. तिचे नाव आहे गौरी जाधव. तिला आयटी इंजिनीअर व्हायचं आहे. यासाठी तिला आर्थिक पाठबळ हवं आहे.

पंचवटीतील गौरी जाधव हिने दहावीत ९६.४० टक्के गुण मिळविले. विशेष म्हणजे हे सर्व गुण अभ्यासाचेच आहेत. त्यात क्रीडा किंवा इतर अतिरिक्त गुण नाहीत. गौरीचे वडील मेनरोड येथे रस्त्यावर पथारी टाकून सॉक्स विकण्याचा व्यवसाय करतात. त्या कमाईतून कसेबसे कुटुंबाच्या गरजा भागविण्यात कसरत करतात. आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने तिच्यापुढे पुढील शिक्षणाचा प्रश्न पडला आहे. आता तिला तिच्या पुढच्या शिक्षणासाठी व स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाकडून आर्थिक पाठबळ हवं आहे.

रुपाली आणि रवींद्र जाधव यांची गौरी ही दुसरी मुलगी आहे. रुपाली या दहावीपर्यंत तर रवींद्र यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. रुपालीच्या भावाच्या फ्लॅटमध्ये सध्या त्यांचे वास्तव्य आहे. वडील मेनरोड येथे रस्त्यावर पथारी टाकून सॉक्स विकण्याचा व्यवसाय करतात. त्या कमाईतून कसेबसे कुटुंबाच्या गरजा भागविण्यात कसरत करतात. मोठी मुलगी पंचवटी कॉलेजमध्ये बीसीएसचे शिक्षण घेत आहे. तिच्या फी ची त्यांना नेहमी काळजी पडते. त्यात आता एवढे गुण मिळवून गौरीला चांगले शिक्षण देण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

वडिलांची गरिबी बघून गौरीने कधीही क्लासचा आग्रह धरला नाही. शाळेत जे शिकविले जाई ते लक्षपूर्वक ऐकायचे, घरीच तासनतास अभ्यास करायचा एवढंच ती करीत होती. स्वतःच्या बळावर तिने ९६.४० टक्के गुण मिळविले आहे. तिला पुढे इंजिनीअर व्हायचे असा निर्धार तिने केला आहे. दररोज सात ते आठ तास अभ्यास करून मिळविलेल्या या यशाला पुढे नेण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. गौरीला तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने तिने कधी कुठली हौस पुरविण्याचा हट्ट धरला नाही. मात्र, अभ्यासासाठी लागणारी सर्व पुस्तके पुरविण्यासाठी वडील इतर जीवनावश्यक गोष्टींना फाटा देत तिला देण्याचा प्रयत्न करतात. तिला ९६ टक्के गुण मिळाले, पण पुढच्या शिक्षणाचा भार कसा पेलायचा, असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. या काळजीने तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू जमा होतात. श्रीराम विद्यालयात शिक्षण घेतलेल्या गौरीला तिच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. आता तिला तिच्या पुढच्या शिक्षणासाठी व स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाकडून आर्थिक पाठबळ हवं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविरत सेवाव्रती...

$
0
0



उपचारांद्वारे रुग्णाला जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांचे महत्त्व अनन्यसाधारणच. काळाच्या ओघात डॉक्टरीपेशा बदलला असला, त्याला नवे आयाम लाभले असले, तरी आजही असंख्य डॉक्टर्स सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आदिवासी, तसेच ग्रामीण भागात सुशृषा करणारे, मोफत किंवा अत्यल्प दरात आरोग्यसेवा देणारे डॉक्टर्स व त्यांच्या सेवाभावी संस्था आजही सेवारत आहेत. आरोग्यसेवेतूनच ईश्वरसेवेचा ध्यास घेणारे हे डॉक्टर्स त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा देत आहेत. काहींनी मोठे यश संपादन केले आहे, तर काहींनी आदर्शवत कार्याचा वास्तुपाठच घालून दिलेला आहे. नीतिमूल्ये सांभाळून आणि सामाजिकतेद्वारे अविरत सेवाव्रत जोपासणाऱ्यांच्या कार्यावर डॉक्टर्स डेच्या निमित्ताने टाकलेला हा प्रकाश...

--

संकलन ः फणींद्र मंडलिक, प्रवीण बिडवे, अश्विनी कावळे, डॉ. बाळकृष्ण शेलार, रामनाथ माळोदे, नवनाथ वाघचौरे

--

फोटो ः पंकज चांडोले, विजय चव्हाण

--

सामाजिक कार्याचा भक्कम ‘आधार’वड

समाजकार्याविषयी जिद्द, समाजाप्रति निर्माण झालेली ओढ काहींना कोणत्याही परिस्थितीत शांत बसू देत नाही. आपले जीवन गरजूंच्या कामी यावे, आपल्या कार्याचा लाभ कोणाच्या तरी जीवनास व्हावा, अशी इच्छा त्यामागे असते. ही इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती अस्वस्थ असते. डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे हेदेखील त्यापैकीच एक. १९८३ सालापासून आजपर्यंत आधाराश्रमामार्फत समाजसेवेसाठी ते झटत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असले, तरी आधाराश्रमाच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. घरोघरी जाऊन आधाराश्रमासाठी निधी जमा करण्याबरोबरच निराधार महिलांचे जीवन उभे करण्यापर्यंत अनेकांना त्यांनी आधार दिला आहे.

डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांना तरुणपणापासून समाजसेवेची आवड. लायन्स क्लब, जेसीज्, इंडियन मेडिकल असोसिएशन अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये सभासद होऊन डॉ. पूर्णपात्रे समाजसेवेचे काम करीत होते. त्यांच्या पत्नी शशी यांना मात्र डॉ. पूर्णपात्रे यांनी एकाच संस्थेला वाहून घेत समाजसेवा करावी, असे वाटत असे. ज्यावेळी ते आधाराश्रमात गेले तेव्हा तेथील काम पाहून ते प्रभावित झाले. त्यांच्या पत्नी शशी यांनीही ‘जर आधाराश्रमाच्या कार्याला पूर्णपणे वाहून घेणार असशील तर माझाही पूर्ण पाठिंबा असेल’, असा शब्द त्यांना दिला. त्यानंतर लगेचच म्हणजे १९८३ सालापासून आजतागायत आधाराश्रमासाठी डॉ. पूर्णपात्रे कार्य करीत आहेत.

आधाराश्रमाचा औषधांवरील खर्च खूप होतो आहे हे लक्षात घेऊन लहान मुलांच्या डॉक्टरांकडून सॅम्पल गोळा करण्यास सुरुवात करून त्यांनी कामाला सुरुवात केली. संस्थेच्या इमारती जुन्या झाल्या होत्या. त्या पाडून नवीन इमारती उभ्या करण्याचे काम लोकसहभागातूनच करवून घेणे गरजेचे होते. अशावेळी घरोघरी जाऊन ते लोकांना सांगायचे, की आमची संस्था बघायला या. संस्थेची गरज लक्षात घेत निधीसाठी अनेक हात पुढे आले. असे करीत करीत निधी गोळा करून इमारत बांधली गेली. आधाराश्रमातील बालकांसाठी हक्काचा व कायमस्वरूपी निवारा यातून उभा राहिला. आजपर्यंत या संस्थेच्या प्रत्येक कार्यात डॉ. पूर्णपात्रे यांचा सहभाग आहे. याबरोबरच निराधार महिलांचे विवाह करवून देण्याचे, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले. आजपर्यंत ५९ मुलींचे विवाह लावून देत त्यांना स्थिरस्थावर केले आहे.

सामाजिक कार्य करताना कौटुंबिक, व्यावसायिक बाबींकडे काहीसे दुर्लक्ष झाले असले, तरी या कार्यातून मोठे समाधान मिळाल्याची भावना ते व्यक्त करतात. संस्थेचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अनेक निःस्वार्थी कार्यकर्ते, ध्येयवादी तरुण आजही काम करण्यासाठी स्वतःहून आमच्याकडे येतात. या मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मार्गदर्शन मिळाल्यास सामाजिक कार्यासाठी कधीही हात कमी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

--

वैद्यकीय समाजसेवेतला पथदर्शी ‘यशवंत’

काही व्यक्ती वयाची पर्वा न करता समाजसेवेसाठी झटत असतात. काही वेळा समाजसेवा कारायची म्हणून व्यवसायही त्याच स्वरूपाचा निवडतात. नाशिकमधील डॉ. यशवंत बर्वे हे त्यातीलच एक म्हणावे लागतील. डॉ. बर्वे यांचा परिचय एकाच वाक्यात करायचा झाला, तर सामाजिक बांधिलकी मान्य करून झटणारा डॉक्टर, असा करावा लागेल.

व्यवसायाने डॉक्टर असल्याने रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची जी जी संधी मि‍ळाली, ती तर त्यांनी पूर्ण केलीच; पण त्या पलीकडे जाऊन समाजसेवेसाठी त्यांनी अनेक दालने उघडली. त्यांच्या जीवनकार्यावर व विचारसरणीवर विनोबा भावे, साने गुरुजी, बाबा आमटे अशा समाजसेवकांच्या विचारांचा प्रभाव पडला आहे. तोच वारसा घेऊन डॉ. बर्वेंनी निरनिराळ्या माध्यमातून समाजसेवेस प्रारंभ केला. त्यांच्या कार्याला राष्ट्र सेवा दलापासून सुरुवात झाली. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळाल्यानंतर त्यांनी नांदगाव येथे खासगी व्यवसाय सुरू केला. समाजसेवेचे पाईक असल्याने या व्यवसायात ते तेथे स्थिरावले. वैद्यकीय व्यवसायाकडे अर्थार्जन म्हणून न पाहता रुग्णांना मदत करण्याची संधी म्हणून त्यांनी पाहिले. रात्री-अपरात्री पेशंटसाठी उठणे, पैशाची फिकीर न करता त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करणे याचाच नेहमी त्यांनी विचार केला. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यांतून त्यांच्याकडे पेशंटचा ओढा वाढला. वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही काम करण्यास सुरुवात केली. वि. जे. हायस्कूल, ना. शि. प्रसारक मंडळ, आयुर्वेद सेवा संघ, आर्टस, कॉमर्स कॉलेज अशा शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी कामास सुरुवात केली. त्यातही सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कामचा ठसा उमटवला. त्यानंतर त्यांनी लायन्स क्लबसारख्या संस्थांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. या संस्थेत उत्साहाने काम करून त्यांनी उत्कृष्ट लायन म्हणून प्रतिमा निर्माण केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारच्या वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून नाशिकच्या आधाराश्रम, आयर्वेद सेवा संघ, महाराष्ट्र सेवा समाज अशा संस्थांच्या कार्यकारी मंडळाचे ते सभासद आहेत. सध्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आदिवासी विभागात वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे, नाशिक परिसरातल्या आदिवासी खेड्यांमध्ये नाशिकमधील इतर डॉक्टरांना एकत्र करून नियमितपणे शिबिरे घेण्याचे काम ते करीत असतात. काही खेड्यांमध्ये त्यांनी वाचनालयेदेखील सुरू केली आहेत. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, बालमेळावे आदींचे आयोजन ते सातत्याने करीत असतात. वयाच्या ८० व्या वर्षाकडे वाटचाल करताना त्यांचा कामाचा उरक वाखाणण्यासारखा आहे. डॉ. बर्वे यांना त्याच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले गेले आहे. ‘यश सुमनांच्या अंतरंगी’ हा त्यांचा आत्मकथा संग्रहही प्रकाशित झालेला अाहे.अखंड समाजसेवेचा संकल्प त्यांनी केला आहे.

--

गोरगरिबांना मोफत सेवा पुरविणारा ‘धन्वंतरी’

सेवावृत्तीने व प्रसंगी रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आजकाल तसे दुर्मिळच. पण, रुग्णसेवा एक व्रत समजून गेल्या ३९ वर्षांपासून अत्यंत सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करीत आलेल्या देवळालीगावातील डॉ. काशीनाथ दादानाथ बुवा यांनी आजकालच्या वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींपुढे एक अनोखा आदर्श उभा केला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी अत्यंत तळमळीने व प्रेमाने दिवस-रात्र काम करणारे डॉक्टर म्हणून त्यांचा परिसरात नावलौकिक आहे. आज वयाची ६३ वर्षे पूर्ण केली असली, तरी एखाद्या तरुणाला लाजवणारी त्यांची कार्यक्षमता बघून आपल्याला आपल्या जीवनशैलीबद्दल संकोच वाटल्याशिवाय राहत नाही. हा मातृहृदयी धन्वंतरी आजही शेकडो गोरगरीब रुग्णांची मोफत सेवा करीत आहे.

डॉ. के. डी बुवा म्हणून शहरात परिचित असलेल्या डॉ. बुवा यांच्या घराण्याला मोठा आध्यात्मिक वारसा आहे. त्यांचे आजोबा विठ्ठलनाथ व वडील दादानाथ मोठे अाध्यात्मिक प्रस्थ होते. नाथपंथी गोसावी असलेल्या या कुटुंबाने निःस्वार्थीपणे अनेक पिढ्यांपासून सामान्य गोरगरिबांची मनोभावे सेवा केल्याचे आजही डॉ. बुवा आभिमानाने सांगतात. देवळालीगावाचा कारभार पूर्वी त्यांचे वाडवडीलच चालवत होते. गावातील कौटुंबिक अथवा सार्वजनिक भांडणे असोत, की काही दुखले-खुपले असो, त्यावर हमखास उतारा मिळण्याचे ठिकाण म्हणजे बुवा डॉक्टरांचे वडील होते. आध्यात्मिक साधनेमुळे त्यांना राज्यभर शिष्य परिवार लाभला होता. समाजातील गोरगरिबांवर बुवा डॉक्टरांचे वडील वैद्यकीय उपचारही करीत असत. स्वतःची शेती असूनही त्या शेतीचा त्यांनी कधी लोभ धरला नाही. उलट गावात भिक्षा मागून या कुटुंबाची गुजराण चालत असे. कवडीची माया जमविण्याचा विचारही या कुटुंबाला कधी शिवला नाही. त्यातूनच डॉ. के. डी. बुवा यांना मिळालेल्या सेवाभावी संस्कारांची खोली समजते.

वडिलांचाच वसा त्यांनीही पुढे कायम करण्यासाठी नाशिकच्या धन्वंतरी मेडिकल कॉलेजमधुन १९७८ साली बीएएमएस केले. या कॉलेजमध्ये त्यांना डॉ. वि. म. गोगटे यांच्यासारखे निःस्पृह वृत्तीचे गुरु लाभले. त्यांच्या सहवासात बुवा डॉक्टरांचे व्यक्तिमत्त्व आणखी सेवाभावी झाले, ते आजपर्यंत कायम आहे. बुवा डॉक्टरांची खासीयत म्हणजे ते रुग्णांकडून केवळ एक रुपया फी घेत. कित्येक वर्षे त्यात त्यांनी बदल केलाच नाही. नव्या पिढीतील डॉक्टरांनी त्यांना समजावले व फी वाढविण्यास सांगितले. घडले मात्र उलटे, फी वाढविली खरी; परंतु कोमलहृदयी बुवा डॉक्टर शेकडो गोरगरीब रुग्णांवर मोफतच उपचार करीत आहेत. अाध्यात्मावर त्यांची नितांत अन् अढळ श्रद्धा आहे. डॉक्टर झाल्यावर जवळ एक फुटकी कवडीही नव्हती. परंतु, वडिलांच्या राज्यभरातील शिष्यांनी एका रात्रीत आर्थिक मदत उभी केली अन् देवळालीगावात त्यांच्या दवाखान्याची वास्तू उभी राहिली. आजही बुवा डॉक्टर या वास्तूचा वापर निःस्वार्थीपणे रुग्णसेवेसाठी करीत आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

--

निरलस रुग्णसेवा पुरविणारे रविवार कारंजा मित्रमंडळ

सण आणि उत्सवांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या रविवार कारंजा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून रुग्णसेवेचे व्रत अविरतपणे सुरू ठेवण्यात आले आहे. रविवार कारंजा येथे सिद्धिविनायक धर्मार्थ दवाखाना सुरू करून अत्यल्प दरात रुग्णसेवा देण्याचे काम येथे करण्यात येत आहे.

रविवार कारंजा मित्रमंडळाचा सिद्धिविनायक हा चांदीचा गणपती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंडळाचा गणेशोत्सव हा शहरातील सर्वांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय असतो. भव्य चलतचित्रांचा देखावा करणाऱ्या या मंडळाचा इतरही उत्सवांत सक्रिय सहभाग असतो. एवढ्यावर न थांबता विविध प्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाने संस्थापक नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून १९९९ मध्ये सिद्धिविनायक धर्मार्थ दवाखाना सुरू केला. सुरुवातीच्या काळात सात ते आठ रुग्णच या सेवेचा लाभ घेत होते. हळूहळू या दवाखान्याच्या सेवेची माहिती झाल्यानंतर शहर परिसरातील विविध भागातील रुग्णही येथे येऊन उपचार करून घेऊ लागले. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळी येथे रुग्णसेवा केली जाते. सध्या डॉ. नीतेश चौधरी हे येथे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्याचे काम करीत आहेत. रोज सुमारे ८० पेक्षा जास्त रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. मंडळाच्या माध्यमातून सेवा पुरवित असताना कधी आर्थिक मदतीची गरज भासल्यास मंडळाने स्थापन केलेल्या सिद्धिविनायक बॅंकेच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो.

या दवाखान्यात सर्वच प्रकारचे रुग्ण तपासणी करण्यासाठी येत असतात. किरकोळ स्वरूपाचा आजार असलेल्यांना तपासणी करून येथेच औषधे देण्याची व्यवस्था केली जाते. गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, आयुर्वेद रुग्णालय किंवा मेडिकल कॉलेज रुग्णालय आदी ठिकाणी पाठविण्याची व्यवस्था केली जाते. ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली असते अशा रुग्णांना खासगी रुग्णालयांची नावे सुचविण्यात येतात. येथील डॉक्टर, परिचारिका आणि मदतनीस यांच्याकडून मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे सकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळेस येथे तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत असते. विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असणाऱ्या रविवार कारंजा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे दाखविले जाणारे सामाजिक आरोग्यभान अनेकांना तंदुरुस्त ठेवण्यास उपयुक्त ठरत असल्याने त्याबाबत कौतुकाची भावना व्यक्त होताना दिसते.


--

हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी ‘ते’ ठरताहेत देवदूत!

हिमोफिलिया या क्लिष्ट आणि दुर्मिळ आजाराचे देशभरात १५ हजार, तर नाशिकमध्ये ४२५ नोंदणीकृत रुग्ण आहेत. या आनुवंशिक आजाराच्या रुग्णांवरील उपचारपद्धती काहीशी गुंतागुंतीची आणि खर्चिक असल्याने असंख्य रुग्ण उपचारांपासून वंचित राहण्याचा धोका असतो. नेमकी हीच बाब हेरून उपनगर येथील डॉ. तापस कुंडू हे नाशिकमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून हिमोफिलियाच्या रुग्णांवर काही संस्थांच्या मदतीने मोफत उपचार करीत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांसाठी ते जणू देवदूतच ठरले आहेत.

हिमोफिलियाच्या एका रुग्णाला वर्षाला सुमारे किमान दहा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. नाशिकसारख्या शहरात अनेक रुग्णांना तो खर्च पेलवणे अवघड असल्याची बाब हेरून डॉ. तापस कुंडू यांनी डिसेंबर २००७ पासून होमिओपॅथी इन हिमोफिलिया हा मोफत शिबिर-प्रकल्प सुरू केला. प्रारंभी हा प्रकल्प उपनगर येथे होता. आता अशोक स्तंभावरील अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूमध्येही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी मोफत शिबिर होते.

नाशिकमधील शिबिरात हिमोफिलियाच्या रुग्णांवर उपचार होत असून, त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा समावेश आहे. नाशिकमध्ये हिमोफिलियाचे नोंदणीकृत ४२५ रुग्णांपैकी शंभर जण या शिबिरात येतात. उर्वरित त्यांच्या वेळेनुसार उपनगर किंवा अशोक स्तंभावर येतात. काही जण ऑनलाइन उपचार घेतात. त्यांना औषधे कुरिअर केली जातात. डॉ. कुंडू यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथी इन हिमोफिलिया प्रकल्प नाशिकप्रमाणेच परळ (मुंबई), सुरत, अमरावती, ठाणे, नागपूर येथे मोफत राबविला जातो. आतापर्यंत सहा केंद्रांत मिळून ३१४ शिबिरे झाली आहेत.

विविध शिबिरांतर्गत उपचारांचा खर्च दोन संस्था करतात. अशोका बिल्डकॉनने शिबिरासाठी जागा दिली असून, इमर्जन्सी औषधांचा खर्चही अशोका देते. नाशिक रन ही दुसरी संस्था असून, ती पन्नास रुग्णांचा खर्च दोन वर्षांपासून देत आहे. त्यामध्ये महिनाभराची औषधे, इमर्जन्सी मेडिसीन किट, ड्रेसिंग मटेरिअल, रक्तस्त्राव थांबविण्याचे औषध, फिजिओथेरपी व सायकोलॉजिकल कौन्सिलिंगचा खर्च याचा समावेश आहे. डॉ. तापस कुंडू यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अफरोज शेख, डॉ. आफिया शेख, डॉ. हिरल शहा, डॉ. ओमकार कुमट, डॉ. अपर्णा नलवडे हे उपचार करतात. त्यांनी घेतलेल्या शिबिरांची दखल इंडिया बुक ऑफ रेकार्डसमध्ये झाली आहे. वारंवार रक्तस्त्राव झाल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन रक्त घ्यावे लागते. रक्त घेण्यामुळे कावीळ, एड्स यांसारखे रोग होण्याची भीती असते. त्यामुळे यासंदर्भात समाजात व्यापक जनजागृती करून अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यादृष्टीनेदेखील डॉ. कुंडू पुढाकार घेत आहेत.

--

आदिवासी बांधवांच्या विकासाचा ‘संकल्प’

गेली सात-आठ वर्षे आदिवासी भागातील बांधवांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या श्री गुरुजी सेवा संकल्प समितीने आता पुढचे पाऊल टाकले आहे. आदिवासी पाड्यांवरील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समितीने गतवर्षीपासून आश्वासक कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. तो नियोजनबद्धरीत्या राबविला जात असून, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांतील १५ ते २० हजार कुटुंबांना त्याचा लाभ होत आहे. आदिवासी बांधवांना केवळ मोफत वैद्यकीय सुविधा पुरविल्या, तरी त्यांच्या समस्या कायमस्वरूपी संपणार नाहीत. त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर सर्वांगीण दृष्टीने त्यांचा विकास घडविण्याचा संकल्प समितीने केला आहे. आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक दृष्टीने त्यांचा विकास करण्यासाठी ठोस कार्यक्रम समितीने हाती घेतल्याची माहिती समन्वयक डॉ. राजेंद्र खैरे यांनी दिली. हे लोक तीन महिने गावाकडे राहतात, तर उर्वरित नऊ महिने रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतरीत होतात. त्यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहाते. या लोकांचे स्थलांतर थांबवायचे असेल, तर त्यांना त्यांच्या गावात किंवा आसपासच्या परिसरात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न समितीने सुरू केले आहेत. पोषणमूल्ये असलेले अन्नधान्य सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील तज्ज्ञ आदिवासी भागात जाऊन मार्गदर्शन करतात. पेठ तालुक्यातील करंजखेड आणि पाहूची वाडी, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ आणि कोटुंबी येथे चार केंद्रे तयार करून तेथे महिन्यात दोन कार्यशाळा घेतल्या जातात. शेतीविषयक सर्व मार्गदर्शन त्यामध्ये केले जाते. भात व नागली ही येथील मुख्य पिके असून, त्यांच्या या उत्पादनाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून चांगले दाम मिळवून देण्याचे काम समिती करीत आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांनाही रोजगार मिळवून देण्यात आला आहे. येथील अनेक गावांमधील जलस्रोत स्वच्छ करून पाइपलाइनद्वारे थेट गावापर्यंत पाणीपुरवठा करण्यात आल्याने महिलांची वणवण थांबली आहे. सांडपाणी जलस्रोतांमध्ये मिसळू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुलांसाठी मूल्य शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जानेवारीत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून दोन हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोनशे गरजूंवर मोफत शस्त्रक्र‌यिा व तत्सम उपचार करण्यात आले. शहरातही प्रबुद्धनगर आणि आम्रपालीनगर येथे नियमित वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत असून, डॉ. मोरेश्वर राठोड, सचिन देवरे आणि सहेली सेवा मंडळ ही संस्था हे उपक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाचा आज वर्धापनदिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन आज (१ जुलै) रोजी होत आहे. त्यानिमित्ताने विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समारंभात माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

समाजातील वंचित घटकांपर्यंत ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेस १ जुलैस २८ वर्षे पूर्ण होत आहेत. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. राम ताकवले प्रमुख पाहुणे असतील. आमदार हेमंत टकले, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे यांची विशेष उपस्थिती असेल. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन अध्यक्षस्थानी असतील. सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ध्वजारोहण करण्यात येईल, रक्तदान शिबिराचे उदघाटन, विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात येईल. याबरोबरच सुरक्षा व कामगार महिला सुविधा केंद्राचे उदघाटन, विद्यार्थी, कर्मचारी सेवेच्या नवीन वाहनाचे उदघाटन होईल. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित अभिवादनही केले जाणार आहे. याप्रसंगी प्रा. राम ताकवले यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानही शैक्षणिक इमारत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान देवून विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा प्रचार आणि प्रसार विविध प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी दिल्याबद्दल माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांचा प्रा. राम ताकवले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले आहे.

मनमाडमध्ये निषेध

मनमाड ः सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीसोबत केलेल्या वाटाघाटीत शेतकऱ्यांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता ठेवल्याची टीका महाराष्ट्र किसान सभेच्या बैठकीत करण्यात आली. कर्जमाफी, समृद्धी महामार्ग या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा किसान सभेने शुक्रवारी मनमाडमध्ये देण्यात आला. या वेळी कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसांकडून चक्का ‘जॅम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमजीरोडवर बेशिस्तपणे पार्क होणाऱ्या चारचाकी वाहनांना आवर घालण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केली. दुपारपर्यंत ६० वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. रात्रीपर्यंत कारवाईचा आकडा १०० पर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात होती. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस कारवाई झाल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एमजीरोडवर शेकडो दुकाने आहेत. दुर्दैवाने येथील इमारती बांधताना पार्किंगचा विचार करण्यात आलेला नव्हता. किंबहुना जागेच्या किमतीचा विचार करता असलेल्या जागा हडपण्यात आल्या. त्यामुळे व्यावसायिकांसह येणाऱ्या ग्राहकांना रस्त्यावरच वाहने पार्क करावी लागतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पार्क होणाऱ्या वाहनांमुळे धावणाऱ्या वाहनांसाठी फारच कमी रस्ता उपलब्ध होतो. त्यात पार्क केलेल्या वाहनांपैकी एखादे वाहने पुन्हा जाण्यासाठी निघाले की वाहतूक कोंडीला सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अचानक रस्त्यावर पार्क झालेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई सुरू केली. त्यात काही दुचाकींचाही समावेश होता. गुरुवारी दिवसभरात तब्बल ८० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या कारवाईबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, दुपारपर्यंत जवळपास ६० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. संध्याकाळपर्यंत हा आकडा १००च्या घरात पोहचेल. या रस्त्यावर नो पार्किंगबाबत फलक लावण्यात आले असून, सर्वांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे. इमारतीत पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्यास संबंध‌ितांनी मोठे वाहन आणताना विचार करावा, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

विरोध मोडून कारवाई

शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू करताच काही व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी कळवावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी ही मागणी फेटाळून लावत कारवाई करण्याचे आदेश दिले. रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग करण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तसेच रस्त्यात वाहने लावण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम असून, सुरळीत वाहतुकीसाठी नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

कॉलेजरोडवर धावपळ
संध्याकाळच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी आपला मोर्चा कॉलेजरोडकडे वळवला. ३० ते ४० कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रस्त्यावर पार्क झालेल्या चारचाकी वाहनांना जॅमर बसवून दंडात्मक कारवाई केली. दुसरीकडे ओव्हर स्पीड, बेशिस्त पार्किंग आणि हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे आता स्वतंत्र वृक्षधोरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वृक्षतोड, छाटणी, पुर्नरोपणासंदर्भात वारंवार होणारे न्यायालयीन वाद टाळण्यासाठी महापालिका आता पुणे महापालिकेच्या धर्तीवर स्वतंत्र वृक्षधोरण तयार करणार आहे. याबाबत शुक्रवारच्या वृक्ष प्राध‌िकरण समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. वृक्षधोरण तयार करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती तयार केली जाणार आहे. या समितीत मेरी, के. के. वाघ कॉलेज, मुक्त विद्यापीठ, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी व वनविभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. या वृक्षधोरणामुळे वृक्षतोडीसंदर्भातील वाद टळणार असून, शहरातील झाडांचेही संतुलन करता येणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.
आयुक्त कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी वृक्ष प्राध‌िकरण समितीची बैठक झाली. या बैठकीत वृक्षतोडीचे ८० प्रस्ताव होते. याशिवाय नाशिकरोड येथील नाट्यगृहाच्या ३६ वृक्षांचाही समावेश होता. ८० वृक्षतोडीच्या प्रस्तावांची समितीमार्फत पुन्हा पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बोरगड एअरफोर्स येथील दोन वृक्षांच्या तोडीला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत वृक्षधोरण तयार करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. शहरात सध्या वृक्षतोडीचे प्रस्ताव आल्यानंतर त्यासंदर्भात हायकोर्टात धाव घेतली जाते. वृक्षतोड, छाटणी, पुनर्रोपण यासंदर्भात वाद कायमचे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामांसह विकासकामेही अडखळतात. यासंदर्भात निश्चित धोरण तयार केल्यास हे वाद टळणार आहेत. वृक्षधोरण तयार करण्यासाठी एक छानणी समिती प्रथम तयार करण्यात येणार आहे. ही समिती एका तज्ज्ञ समितीची रचना तयार करेल. समिती सर्वंकष धोरण तयार केल्यानंतर ते छाननी समितीला सादर करेल. छाननी समितीने हे धोरण तयार केल्यानंतर ते वृक्षप्राध‌िकरणामार्फत महासभेला सादर केले जाईल. त्यानंतर सरकारची मान्यता घेतली जाईल. त्याला मंजुरी दिल्यानंतर मनपाची घटना तयार केली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाकडे गेलेले काही अधिकार महापालिकेला मिळणार आहेत. यामुळे वृक्षांसंदर्भात होणारे वादविवाद पालिका स्तरावरच मिटवले जाणार आहेत.
वृक्षलागवडीचे संतुलन
सध्या महापालिकेच्या वतीने जेथे जागा कमी, तेथे वृक्षलागवड केली जाते. परंतु, वृक्षसर्वेक्षणात शहरातील प्रत्यक्ष वृक्षांची संख्या समोर येणार आहे. कोणत्या भागात किती वृक्ष आहेत, याचाही आकडा समजणार आहे. त्याचा फायदा वृक्षधोरणाला होणार आहे. यामुळे कोणत्या भागात वृक्षलागवडीची आवश्यकता आहे, त्याची निश्चिती केली जाणार आहे.
नाट्यगृह रखडले
नाशिकरोड येथील प्रस्ताव‌ित नाट्यगृहाच्या जागेवर असलेल्या ३६ वृक्षांच्या तोडीला प्राध‌िकरणाने मंजुरी दिली आहे. परंतु, या वृक्षतोडीपूर्वी ठेकेदाराला एका वृक्षाच्या बदल्यात १० वृक्षांची लागवड करावी लागणार आहे. हे वृक्ष दहा फूट लांबीचे असावेत अशी अट आहे. या कामाची माहिती संबंधित ठेकेदाराने हायकोर्टात सादर करावी. हायकोर्टाने मंजुरी दिली तर कामाला सुरुवात करावी असी सूचना कमीटी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करवाढीनंतरच ७५ लाखांचा विचार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक स्थिती खराब असल्याने नगरसेवकांना ७५ लाख निधी देण्यास आयुक्तांनी नकार दिल्यानंतरही महापौर रंजना भानसी ७५ लाखांवर ठाम आहेत. नगरसेवकांना प्रत्यक्ष ७५ लाखांचा निधी देण्यासाठी महापौरांनी घरपट्टी करात १४ तर पाणीपट्टी करात ५ टक्के करवाढ करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ७५ लाखांचा नगरसेवक निधी हवा असेल, तर त्यांनी करवाढीचा प्रस्ताव स्थायी समिती व महासभेत मंजूर करून प्रशासनाला द्यावा. त्यानंतर आर्थिक स्थितीचा विचार करून ७५ लाखांचा निधी देऊ, असे स्पष्टीकरण आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे. दरम्यान, मालमत्ता सर्व्हेक्षणातून पालिकेला ५० कोटी रुपये अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना महापौरांनी स्थायी समितीने मंजूर केलेला नगरसेवक निधी ४० लाखांवरुन ७५ लाख केला होता. परंतु, प्रशासनाने आर्थिक स्थिती चांगली नसल्याने नगरसेवक निधी ४० लाख रुपयेच देण्याची घोषणा केली होती. तथापि, महापौर ७५ लाखांवर अडून बसल्या आहेत. नगरसेवक निधीसाठी घरपट्टी व पाणीपट्टी करात वाढ करून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यावर प्रशासनाच्या वतीने आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता व पाणीपट्टी करात वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती व महासभेत मंजूर करून तो प्रशासनाला द्यावा. त्यानंतर आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन ७५ लाखांचा निधी देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे कृष्णा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील वर्षापासून नाशिककरांवर करांचा बोजा अटळ झाला आहे.


सर्वेक्षणातून ५० कोटी

महापालिककडून सध्या मालमत्ता सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत सातपूर आणि पश्चिम विभागात १ लाख ६८ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास ३६ हजार मालमत्ता नव्याने सापडल्या आहेत. शहरात सध्या चार लाख मालमत्ता आहेत. या सर्वेक्षणात जवळपास २० टक्के मालमत्ता नव्याने नोंदणीकृत होणार आहेत. त्यातून पालिकेच्या तिजोरीत जवळपास ४० ते ५० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. नव्याने रेकॉर्डवर आलेल्या मालमत्तांना लगेच ब‌िले अदा केली जाणार असल्याने मालमत्ता सर्वेक्षणातून पालिकेला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रार निवारण समिती जमेची बाजू

$
0
0

तक्रार निवारण समिती जमेची बाजू

खासगी डॉक्टरांविरोधातील तक्रार कुणी ऐकतच नाही, ही भावना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अधिक अस्वस्थ करते. कोर्टाची पायरी चढल्यास रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दरी अधिकच वाढत जाते. म्हणूनच आयएमएने पुढाकार घेऊन पेशंट तक्रार निवारण समिती स्थापन केली. डॉक्टरांबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत आणि रुग्णांवर अन्याय होत असेल, तर त्यांनाही न्याय मिळावा हा यामागचा उद्देश असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी दिली.

---

-आयएमए सध्या काय करतेय?

-आयएमएचा पदभार स्वीकारला तेव्हापासून डॉक्टर्स, तसेच समाजातील अन्य घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आयएमएचे शालिमार येथे कार्यालय असून, ते अद्ययावत करण्यात आले. तेथे अनेक कार्यक्रम, बैठका होतात. त्याची माहिती, आयएमएच्या हॉलचे शुल्क याबाबतची इत्थंभूत माहिती विविध घटकांना समजावी यासाठी आयएमएची वेबसाइट अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे आयएमएविषयीची माहिती तेथे लोकांना उपलब्ध होऊ लागली आहे. डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यातील संवाद वाढावा हाच आयएमएचा मुख्य उद्देश आहे.

--

-डॉक्टरांवरील हल्ले वाढताहेत, काय सांगाल?

-काही महिन्यांपूर्वी तशी परिस्थ‌िती होती. परंतु, आता हे प्रकार बरेच कमी झाले आहेत. डॉक्टरांवरील हल्ले वाढत असल्यामुळे सेफ डॉक्टर फॉर सेफ सोसायटी हा उपक्रम आयएमएने हाती घेतला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याशी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत व‌िचारमंथन करण्यात आले. एप्र‌िलमध्ये पदभार स्वीकारल्यानंतरही असे एक-दोन प्रसंग शहरात घडणार होते. पोलिसांची तत्काळ मदत मिळाल्यामुळे हे प्रसंग आयएमएने टाळले. डॉक्टरांवरील तणाव वाढत असल्याने त्यांच्यासाठी उपक्रम राबविले जात आहेत.

--

-डॉक्टरांच्या आरोग्यासाठी संघटना काय करीत आहे?

-डॉक्टरांचेही दैनंदिन जीवन धकाधकीचे झाल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक तणावाखाली वावरावे लागत आहे. डॉक्टरांचे आयुर्मान कमी होत असून, त्यांचे आरोग्य जपले जावे यासाठी आयएमएने एप्र‌िलच्या शेवटच्या आठवड्यात हास्य क्लबची स्थापना केली. या क्बलद्वारे गेल्या तीन महिन्यांत दोन सत्रं घेण्यात आली. त्यामध्ये २०० हून अधिक डॉक्टर्स सहभागी झाले. त्यांना सुषमा दुगड यांचे मार्गदर्शन लाभले. डॉक्टरांसाठी योगाचा मार्गदर्शन वर्गही घेण्यात आला.

--

-डॉक्टरांची नवीन पिढी कार्यरत होतेय, त्यांच्यासाठी काय?

-वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांची नवीन पिढी दमदार पावले टाकत आहे. उपचारपद्धती विकसित होत असून, त्यासाठीची साधनेही बदलत आहेत. त्याची माहिती व्हावी म्हणूनच जुलैमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय जेरिकॉन कॉन्फरन्स नाशिकमध्ये होणार आहे. राज्यातून एक हजारहून अधिक डॉक्टर्स सहभागी होतील. उतारवयात होणारे आजार व उपचार यावर त्यामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. नवीन उपचारपद्धती, त्यासाठीचे नवीन मोबाइल अॅप्स, संसाधनांमध्ये झालेला बदल याची माहिती त्यामध्ये मिळेल. आपल्याकडील सरासरी आयुर्मान वाढविण्यासाठी येथील मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.

--

-आयएमएच्या सोशल अॅक्टिव्हिटीबद्दल सांगा?

-आयएमएने ट्रेकिंग क्लब स्थापन केला असून, हे ट्रेकर्स दर रविवारी किल्ल्यांना भेट देतात. किल्ल्यांची साफसफाई आणि संवर्धनात योगदान देतात. सायकलिंगबाबतचा अवेअरनेस वाढविण्याच्या कामात आयएमए योगदान देत असून, अलीकडेच रमाकांत पाटील व डॉ. राजेंद्र नेहते यांच्यासह डॉ. श्र‌ीनिवास बोकोळनार यांनी सायकलिंगमध्ये गौरवास्पद कामगिरी केली आहे. अॅँटी टोबॅको दिन, तसेच कॅन्सर अवेअरनेस परिषदेद्वारे जनजागृती केली. नो हॉर्न डेमध्ये सक्रिय सहभागी झालो. आता डब्ल्यूएचओच्या मानांकनानुसार मानसिक आजारांबाबतचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी लेटस टॉक (चला बोलूया) हा उपक्रम हाती घेत आहोत. ज्यामध्ये नागरिक आपल्या समस्या खुलेपणाने मांडू शकणार आहेत.

--

-डॉक्टर्स आणि पेशंट्समधील संवाद कसा वाढविणार?

-केवळ संवाद नव्हे, तर सुसंवादावर आमचा भर आहे. डॉक्टर्सविरोधात कुणी कोर्टात जाऊ नये, रुग्णालाही मनःस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये, हा यामागील उद्देश आहे. आयएमचे सुमारे दोन हजार सदस्य आहेत. त्यापैकी कुणाविषयी तक्रार असेल, तर अशा तक्रारींची दखल घेण्यासाठी एक विशेष चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉक्टर व रुग्ण यांच्यात सुसंवाद राखण्याचा प्रयत्न ही समिती करते. अशा दोन-तीन प्रकरणांचा समितीने निपटारा केला आहे.

(शब्दांकन : प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी विभाग आजपासून बंद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात एक कर समान प्रणाली अर्थात जीएसटी लागू होत असताना महापालिका जीएसटीबाबत अजूनही अंधारातच आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसंदर्भात अद्याप पालिकेला कोणतेही मार्गदर्शन आलेले नाही. त्यामुळे जीएसटीतून किती निधी मिळणार याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रमावस्था वाढली आहे, तर जीएसटीमुळे शनिवारपासून एलबीटी विभाग पूर्णपणे बंद होणार असला, तरी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पालिकेतील एलटीबी विभाग सहा महिने सुरू राहणार आहे. दरम्यान जीएसटीतून महापालिकेला सरकारकडून दरमहा किमान ७५ कोटींचे अनुदान अपेक्षित आहे.

देशभरात शनिवारपासून जीएसटी करप्रणाली लागू होत आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांना करवसुलीचे अधिकार राहणार नाहीत. त्यामुळे पालिकेचा एलबीटी विभाग आता बंद होणार आहे. सध्या महापालिकेला ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडून ३५ कोटी, तर सरकार ३५ कोटींचे अनुदान देत आहे. मुद्रांक शुल्कातून पाच कोटी मिळत आहे. सरकारने जूनपर्यंतचे एलबीटी अनुदान पालिकेकडे जमा केले असून, जवळपास तीन महिन्यांत १८० कोटी रुपये जमा झाले आहेत. केवळ ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांकडून जून महिन्याचे ३५ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे जूनपर्यंत आर्थिक खर्चाचा गाडा ओढला जाणार आहे.

सध्या एलबीटी व मुद्रांक शुल्कातून पालिकेला दरमहा ७५ कोटी रुपये अनुदान मिळते. आता हेच अनुदान जीएसटीतून मिळणार आहे. मात्र, जुलैपासून हे अनुदान कसे मिळणार, याबाबत सरकारकडून कोणतेही मार्गदर्शन आलेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनच संभ्रमात पडले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा साधारण ४० कोटी रुपये द्यावे लागतात. जीएसटी अनुदान जुलैचे मिळाले नाही तर वेतन कसे करायचे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे प्रशासनाला जीएसटी गाइडलाइनची प्रतीक्षा लागली असून, सध्या तरी पालिका पूर्णपणे अंधारातच आहे.

एलबीटी विभाग सुरूच

एलबीटीची वसुली शनिवारपासून पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे पालिकेतील एलबीटी विभागही बंद पडणार आहे. या विभागात सध्या ५० कर्मचारी कार्यरत आहेत. एलबीटीचे प्रलंबित न्यायालयीन निवाडे आणि अभय योजनेच्या सुनावणीसाठी सध्या तरी सहा महिने हा विभाग सुरूच राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी एलबीटी बंद झाली तरी मागील वसुली बंद होणार, असा समज करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्कलकुवा बसला सटाण्यात अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीनजीक बस आणि ट्रक अपघात झाला. शनिवारी सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाला. ही बस नाशिकहून अक्कलकुवाला जात होती. या धडकेमुळे बस चालकाच्या बाजूने कापली गेली असून, बसमधील १३ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये ५८ प्रवासी होते. जखमींवर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अक्कलकुवा आगाराची बस (एमएच २० बीएल ३०२४) नाशिककडून ५८ प्रवाशांना घेवून अक्कलकुव्याकडे पहाटे साडेपाच वाजता निघाली होती. सटाणा बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ बस आली असता सटाण्याहून देवळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने (एम एच १९ जे ४५२३) बसला धडक दिली. यामुळे बसचे मागील दोन्ही चाके निखळून पडली. तर अपघातग्रस्त ट्रक थेट बाजूच्या शेतात घुसला. सटाणा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक फरार आहे.
00000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाच्या कठड्यांची दुरवस्था

$
0
0

पिंपळगाव बहुला पूल बनला धोकादायक

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणा-या पिंपळगाव बहुला गावातील पूल धोकादायक बनला आहे. नेहमीच रहदारी असलेल्या पिंपळगाव बहूला पुलावर अनेकदा अपघातही झाले आहेत. गेल्यावर्षी स्कॉर्पिओ गाडी थेट पुलावरून खाली पडल्याने तरुण उद्योजकाचा मृत्यू झाला होता. यानंतर महापालिकेने केवळ नावालाच डागडुजी करत लोखंडी पोल बसविण्याचे काम केले आहे. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. हा पूल वर्दळीचा असल्याने पुलाच्या कठड्यांचीही दुरवस्थेकडेही महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.

शिवशंकर महादेवाचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरला जाताना लागणार्‍या पिंपळगाव बहुला पुलाची दुरवस्था झाली आहे. नेहमीच वाहनांची वर्दळ असलेल्या पुलाचे स्तंभ जुने झाले आहेत. या पुलाच्या बाजूलाच शाळा आहे. त्यामुळे वाहनांसह शाळकरी विद्यार्थ्यांची यावरून दररोज ये-जा असते. अशा परिस्थितीत पुलावर भविष्यात मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असाही सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पिंपळगाव बहुला गावातील जुन्या पुलाला महापालिकेने समांतर पूल उभारला होता. परंतु, जुन्या असलेल्या पुलाची देखभाल करण्यात आली नसल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. त्यातच नव्याने उभारण्यात आलेल्या पुलासाठी दुभाजक महापालिकेने टाकले होते. दुभाजक वाहनचालकांना दिसत नसल्याने अनेकदा अपघातही झाले आहेत. महापालिकेने पिंपळगाव बहुला गावातील जुन्या पुलाची

दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images