Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आकडेवारी फसवी!

$
0
0

राष्ट्रवादीसह सुकाणू समिती सदस्यांचा दावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात सुमारे ४.५ लाख शेतकरी हे कर्जबाजारी असताना सरकारच्या निकषांमुळे फक्त २८ टक्के म्हणजेच १ लाख ३६ हजार ५६९ इतक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचे सरकारी यंत्रणेने जाहीर केले आहे. त्यामुळे इतर सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी सरकारने सर्व निकष बाजूला ठेऊन तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केली आहे. तर कर्जमाफीची आकडेवारी फसवी असल्याचा आरोप सुकाणू समितीच्या राजू देसले यांनी केला आहे.

सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी ३० जून २०१६ पर्यंतचे थकीत असलेले दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाने कर्जमाफी मिळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी यातील तारखेची अट बदलून ती ३०जून २०१७ करण्यात यावी, अशी मागणीदेखील अॅड. पगार यांनी पत्रकात केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता तत्त्वत:, निकष असे शब्दांचे खेळ तसेच तारखेबाबतची अट घातल्याने शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला नाही. कर्जमाफी योजनेतील शेतकरी कुटुंब हा निकष तातडीने रद्द करण्यात यावा. तसेच कर्जमाफीत फक्त राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना दिलेले शेतीकर्ज माफ करण्याचा निकष सरकारने निश्चित केला आहे. परंतु, शेतकऱ्यांनी स्थानिक नागरी बँका, पतसंस्था व तत्सम वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाचा देखील कर्जमाफीत समावेश करावा, अशी मागणीही अॅड. पगार यांनी केली आहे. या मागण्यांसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. ६ जुलै) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.

आकडेवारी फसवी : देसले

राज्यभरात सराकरने जिल्हानिहाय आकडेवारी कर्जमुक्ती संदर्भात जाहीर केली आहे. विकास सोसायटीच्या गटसचिवांनी कर्जमुक्तीच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला असताना ही माहिती आली कुठून असा सवाल सुकाणू समितीच्या राजू देसले यांनी केला आहे. जिल्ह्या बँकेत २०१६ अखेर दीड लाखांच्या आत फक्त ५० हजार शेतकरी आहेत व ते निकषात बसतात की नाही तेही विकास सोसायटी अहवाल आल्याशिवाय सांगू शकत नाही. म्हणून एक लाख १२ हजार शेतकऱ्यांना लाभाची यादी फसवी आहे, असा आरोप राजू देसले यांनी केला आहे. ७० हजार शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखापेक्षा अधिक आहे. वरील रक्कम व निकषात किती बसतील सांगता येत नाही. शासन लाखाचे आकडे सांगून आंदोलन उभे राहू नये म्हणून दिशाभूल करीत आहे, असे देसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रतीक्षाला व्हायचंय लष्करात अधिकारी!

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

ती गरीब शेतमजुराची पोर. जिद्द मात्र आकाशाला गवसणी घालण्याची. हलाखीच्या परिस्थितीला तोंड देतच ती मोठी झाली. तिला आईवडिलांना मोठ्या घरात न्यायचंय, खूप चांगले दिवस दाखवायचे आहेत. तिला स्वतःला नव्हे, तर देशाला लष्करी महासत्ता करायचे आहे. म्हणूनच इतर मैत्रिणींप्रमाणे डॉक्टर, इंजिनीअर न होता लष्करात अधिकारी होण्याचा संकल्प तिने सोडला आहे. प्रतीक्षा शरद गायकवाड हिचे हे ध्येय साध्य करण्यासाठी साथ हवीय समाजाच्या दातृत्वाची.

जेलरोडचा गोरेवाडी या रहिवासी भागाचे नाव जरी घेतले तरी तेथील लोकॅलिटी, प्रतिकूल परिस्थिती, अठराविशे दारिद्र्य समोर येतं. अशा गोरेवाडीच्या गायकवाड मळ्यातील पत्र्याच्या घरात प्रतीक्षा गायकवाड राहते. दहावीत ९५.४० टक्के गुण मिळवून ती कोठारी कन्याशाळेत पहिली आली आहे. आवडीच्या गणितात ९९, विज्ञानात ९८, तर संस्कृतमध्ये तिला ९७ गुण आहेत. असे बेस्ट रेकॉर्ड असतानाही तिला डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचे नाही. संरक्षण दलाचे प्रशिक्षण देणाऱ्या पुण्याच्या एनडीए (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी)मध्ये जाऊन तिला लष्करात अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी बारावी सायन्स ही अट असल्याने त्या दिशेने तिने तयारी सुरू केली आहे.

प्रतीक्षा शाळेत पहिलीपासूनच हुशार होती. मूळचे देवळाली गावातील असलेले तिचे वडील शरद गायकवाड यांचा चेहेडीजवळ जमिनीचा छोटा तुकडा आहे. मात्र, त्यात भागत नसल्याने ते इतरांच्या शेतात मजुरी करतात. आई संगीता दहावी शिकल्या असून, त्याही मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. या कुटुंबाच्या घरी लक्ष्मी पाणी भरत नसली तरी सरस्वतीचा वरदहस्त मात्र पहिल्यापासूनच आहे. स्वतःला मोठं करण्याऐवजी देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प प्रतीक्षाने सोडला आहे.

प्रतीक्षाने शाळेत पहिला नंबर कधीच सोडला नाही. तिने अनेक क्षेत्रांत बक्षिसे मिळवली. प्रतीक्षाची बहीण वैष्णवी हीदेखील कोठारी शाळेत यंदा दहावीत आहे. तिला नववीत ९२ टक्के मिळाले आहेत. ती चांगली चित्रकार आहे. भाऊ संदेशदेखील हुशार असून, त्याला डॉक्टर व्हायचे आहे. मात्र, आर्थिक अडचण ही या कुटुंबापुढील सर्वांत मोठी समस्या आहे. म्हणूनच सर्व कुटुंबाची मदार आहे ती फक्त प्रतीक्षावर.

घरच्या गरिबीची लहानपणापासून जाण असल्याने प्रतीक्षाने जिद्दीने वाटचाल केली. बालहट्टाला तिलांजली दिली. पहिली ते आठवीपर्यंत तिने अभ्यासात ए ग्रेड सोडली नाही. नववीत तिला ८६ टक्के मिळाले. त्यामुळे नाराज न होता यापासून प्रेरणा घेत तिने झोकून देऊन दहावीचा अभ्यास केला. पावसाळ्यात कधी पायी चिखल तुडवत, तर थंडी-उन्हात सायकलवर शाळा, क्लासला जाऊन तिने दहावीत बेस्ट परफॉर्मन्स दिला. गोरेवाडीचे वातावरण हे अभ्यासाला पोषक नसले तरी माणसं मात्र जिवाला साथ देणारी आहेत. सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने गोरेवाडीची ही लेक आता संरक्षण दलात ऑफिसर होऊ पाहते आहे, याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. तिच्या मजूर आईवडिलांची मान तर अभिमानाने ताठ झाली आहे; पण पाय मात्र जमिनीवरच आहेत. प्रतीक्षा पहाटे चारला उठून दहावीचा दोन तास अभ्यास करायची. नंतर फ्रेश होऊन पुन्हा दोन तास अभ्यास करून मगच शाळेत जायची. शाळेतून सायंकाळी आल्यावर घरची कामे आटोपून साडेनऊ ते अकरापर्यंत अभ्यास करायची. रात्री झोप यायची तेव्हा नोट्स काढायची. तिच्या गुणांचे व जिद्दीचे शाळेलाही कौतुक आहे. आता तर तिने स्वतःला मोठं करण्याऐवजी देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प सोडल्याने शाळेतील शिक्षक, मैत्रिणी यांनाही तिचे खूप कौतुक वाटत आहे. देशाच्या रक्षणाचा ध्यास घेणाऱ्या प्रतीक्षाला पुढील वाटचालीसाठी साथ हवीय समाजाच्या दातृत्वाची.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात माऊलीचा जागर

$
0
0

धुळे : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये मंगळवारी भाविकांची विठ्ठलाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री दहा वाजेपर्यंत रांगा लागल्या होत्या. तर मंदिर परिसरात आरती, महाप्रसाद, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी यंदाही कायम होती. आषाढी एकादशी निमित्त शहर परिसरातील मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. अनेक व्यावसायिकांनी लहान मुलांच्या खेळणी, पाळणे, मिठाईची दुकाने लावली होती. तसेच फुलं-फळ, हार, नारळ तसेच इतरी वस्तू विक्रेत्यांचा यावेळी समावेश होता. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मालेगाव रोडवरील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल केला होता. त्यानुसार पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली. मंदिर परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस दलानेही पोलिस बंदोबस्त तैनात केले होता. शहरातील कमलाबाई कन्या शाळेतील बाल मंदिराच्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थिनींनी आषाढी एकादशीनिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय स्तरावर मिळावे क्रीडा प्रकारांना महत्त्व

$
0
0

वैभव देशमुख, मटा सिटिझन रिपोर्टर

शाळा सुरू होऊन आता महिनाभराचा कालावधी पूर्ण होत आला आहे. शालेय दिनक्रमात लहान मुले वर्षभर पुस्तके, ट्यूशन याच चक्रात दर वर्षीप्रमाणे गुंतून जातात. पण, या मुलांना वेगवेगळे खेळ खेळण्याची पुरेशी संधीच मिळत नसल्याचे दिसते. भरघोस फी भरूनदेखील कोणीही याबद्दल साधी चौकशी करताना दिसत नाही. यंदाही तसेच दिसून येत आहे.

खेळात नैपुण्य मिळावे, अशी इच्छा प्रकट करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसंदर्भात पालक अन् शाळा प्रशासनही उदासीन दिसते. खरोखर जर जिल्हा परिषदेच्या शाळा, तसेच सर्व खासगी शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे प्रामाणिक पावले उचलली, तर शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतून अनेक गुणवान खेळाडू निर्माण होऊ शकतील. आजही साहित्य, सुविधा, योग्य मार्गदर्शन आदी प्राथमिक बाबींचा अभाव असूनही मैदानी, तसेच सांघिक खेळांत अनेक विद्यार्थी जिल्हा, राज्य, तसेच देशाचे प्रतिनिधीत्व करताना दिसतात. किमान अशा प्राथमिक सुविधा जरी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यापासून अन्य लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करण्यासंदर्भात तत्परता दाखविली, तर निश्चितच आणखी गुणवान खेळाडू पुढे येऊ शकतील. संबंधितांनी असे खेळाडू घडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा एक नागरिक म्हणून ‘मटा’मार्फत मी व्यक्त करीत आहे. असे झाल्यास कविता राऊत, मोनिका आथरे यांच्यासारखे अाणखी दर्जेदार खेळाडू नाशिक जिल्ह्याच्या मातीतून निर्माण होतील, यात शंकाच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय विभागाचीच सर्जरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बिटकोसह पालिकेच्या मालकीच्या व नियम‌ित वादात राह‌िलेल्या रुग्णालयांचेच ऑपरेशन आता आयुक्तांच्या आदेशाने वैद्यकीय विभागाने सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून एकाच हॉस्प‌िटलमध्ये ठाण मांडून बसलेल्या ४४ डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर चारही हॉस्प‌िटल्सच्या विभाग प्रमुखांसह संपूर्ण विभागातील नर्स, लॅब टेक्निशियन, मेट्रन, फार्मासिस्ट यांच्याही बदल्या प्रस्ताव‌ित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभागातल्या या मोठ्या ऑपरेशनमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, चारही हॉस्प‌िटल्सच्या त्रुटी या बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा विभागाच्या मदतीने दूर करण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून, सर्व विभागांना त्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेची हॉस्प‌िटल्स आणि वाद हे ठरलेले समीकरण आहे. विशेषतः बिटको आणि डॉ. जाकीर हुसेन हॉस्प‌िटलच्या कामकाजावरून नियम‌ित वाद होत असतात. महापालिकेच्या हॉस्प‌िटल्समध्ये कार्यरत असलेले डॉक्टर्स आणि खासगी प्रॅक्टीस करत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जातो. बिटको रुग्णालयात उपचार व सुविधांवरून नेहमीच वाद होतात. सोमवारी नाशिकरोड सभापती व नगरसेवकांनी केलेल्या पाहणीत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. बिटकोसह डॉ. जाकीर हुसेन, मोरवाडी, इंद‌िरा गांधी हॉस्प‌िटलमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी या आल्या होत्या. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत, वैद्यकीय विभागाचेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. विजय डेकाटे यांनी त्याची अंमलबजावणी करत वैद्यकीय विभागातील सर्व ४४ डॉक्टरांच्या बदल्या केल्या आहेत. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी हे डॉक्टर्स ठाण मांडून बसले होते. त्यामुळे त्यांच्या कामकाजात शिथ‌िलता आली होती. या सर्व डॉक्टरांच्या बदल्या करून त्यांना दुसऱ्या हॉस्प‌िटलमध्ये पाठवले जाणार आहे. त्यामुळे हॉस्प‌िटलमधील कर्मचाऱ्यांशी तयार झालेले सुमधूर संबंध तुटून कामकाज सुधारणार आहे. सोबतच बिटकोचे प्रमुख डॉ. जयंत पुलस्कर, कथडाचे डॉ. राजेंद्र भंडारी, इंद‌िरा गांधी रुग्णालयाचे डॉ. गणेश गरुड, मोरवाडीचे डॉ. प्रशांत थेटे यांच्याही बदल्यांचा प्रस्ताव आहे. या हॉस्प‌िटलमध्ये कार्यरत असलेले फार्मासिस्ट, नर्स, लॅब टेक्निशियन अशा सर्व ५१४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. वैद्यकीय विभागात मोठी साफसफाई मोहीम राबविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बदली झालेल्या डॉक्टरांना सात तारखेपर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चार हॉस्प‌िटल्सच्या तपासण्या

बिटकोसह पालिकेच्या सर्व चार हॉस्प‌िटल आणि ३० शहरी आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी बांधकाम, विद्युत, भुयारी गटार, पाणीपुरवठा विभागांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी या चारही विभागांना पत्र देऊन त्यांच्याकडून त्रुटी शोधून दूर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. सहा विभागांच्या सहा अभियंत्यांमार्फत या हॉस्प‌िटल्सची तपासणी मोहीम सुरू करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझे चित्त तुझे पाया। मिठी पडली पंढरीराया।।

$
0
0

टीम मटा

शहर परिसरातील विविध विठ्ठल मंदिरे अन् घराघरांत मंगळवारी भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. शहर परिसरातील शाळांमध्येदेखील बालवारकऱ्यांच्या दिंड्या अन् विविध उपक्रमांद्वारे विठुनामाचा गजर करण्यात आला. शहरातील नामदेव विठ्ठल मंदिर, काझीपुऱ्यातील नामदेव विठ्ठल मंदिर, हुंडीवाला लेनमधील ज्ञानदेव विठ्ठल मंदिर, आकाशवाणीशेजारील विठ्ठल मंदिर, तसेच अतिप्राचीन असलेले गोदाघाटावरील विश्वनाथ विठ्ठल मंदिर, विहितगाव येथील प्रतिपंढरपूर समजले जाणारे विठ्ठल मंदिर, देवळाली कॅम्प, विहितगाव, सातपूर येथील विठ्ठ्ल मंदिर आदी ठिकाणी विठ्ठ्ल-रखूमाईचे विधिवत पूजन करण्यात आले. ठिकठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही झाले.

---

विहितगावला भाविकांची मांदियाळी

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा।

झाला अरुणोदय सारली निद्रेची वेळा ।।

म्हणत विहितगावच्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भल्या पहाटे काकडा आरतीचे स्वर गुंजत होते. पहाटेपासूनच पंढरपूरला न जाऊ शकलेल्या वारकऱ्यांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मंदिरात,

तुज पाहता सामोरी। दृष्टी न फिरे माघारी।।

माझे चित्त तुझे पाया। मिठी पडली पंढरीराया।।

असा उत्कट भाव मनात ठेवून आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठुरायाचरणी माथा टेकविला. पहाटे ४ ते ७ वाजेदरम्यान खासदार हेमंत गोडसे, त्यांच्या पत्नी अनिता गोडसे, नगरसेविका सुनीता कोठुळे व उत्तम कोठुळे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीस महाअभिषेक करून महापूजा करण्यात आली. आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक केशव पोरजे, अरुण जाधव आदींच्या हस्ते तुळशीचा हार अर्पण करण्यात आला. दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान महिलांचे भजन, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, रात्री ९ वाजता हभप अनिल महाराज तुपे यांचे हरिकीर्तन झाले. दिवसभर पंचक्रोशीतील भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना खिचडी व केळी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. दिवसभर विविध गावच्या भजनी मंडळांकडून सुश्राव्य अभंगांवर आधारित भजनाचे कार्यक्रम झाले. नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी यंदा स्वखर्चातून मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी हांडोरे,दिनेश हांडोरे,सोमनाथ कोठुळे,उद्धव हांडोरे,आत्माराम हगवणे,विजय हांडोरे,बाळासाहेब कोठुळे,विष्णू हांडोरे,रोहित मते,संपत हांडोरे,प्रकाश हगवणे,सोपान हांडोरे,संजय हांडोरे आदींसह गावकरी प्रयत्नशील होते.


देवळालीत दिंडी सोहळा

देवळालीगावातील १२० वर्ष जुन्या विठ्ठल मंदिरात पहाटे वाघुळकर कुटुंबीय व पांडुरंग झोंबाड, कैलास गोडसे, सतीश वाघुळकर, सुरेश वाघुळकर, नगरसेविका प्रभावती धिवरे, प्रभाकर लोणे, रामकिसन गोडसे यांच्यातर्फे अभिषेक करण्यात आला. यावेळी देवळालीकरांच्या उपस्थितीत महाआरती झाली. सकाळी ९ वाजल्यापासून प्रसादाचे वाटप झाले. दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम झाले. सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान भव्य पालखी सोहळा झाला. लामरोडवरील भैरवनाथ मंदिरात श्री भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळातर्फे सामूहिक भजनसंध्या झाली. आज, बुधवारी (दि. ५) सिंधी पंचायत हॉल येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. चेहेडी पंपिंग स्टेशन, चेहेडी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही विधिवत पूजनासह भजनादी कार्यक्रम झाले.

पृथ्वी मित्रमंडळ

देवळालीगावातील पृथ्वी मित्रमंडळातर्फे विठ्ठल मूर्ती सजविण्यात आली होती. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, अॅड. शांताराम कदम, नयना घोलप आदींनी पूजा केली. योगेश शिंदे, दिनेश शिंदे, नीलेश भोईर, विजय आर्या, पुरुषोत्तम केला, नंदू खैरे, पवन विसपुते, किरण डहाळे, चंदू महानुभव, विकास गिते आदींनी संयोजन केले.

---

सातपूरला विठुनामाचा गजर

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

आषाढी एकादशीनिमित्त सातपूर परिसर मंगळवारी विठुनामाच्या गजराने दुमदुमला होता. विठ्ठल मंदिरासह महापालिका व खासगी शाळांमध्येही विविध कार्यक्रम झाले. समृद्धनगर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दिवसभर कीर्तनाचेही आयोजन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पेहरावात परिसरातून दिंडी काढली.

विश्वासनगर येथील महापालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसरात दिंडी काढली. विद्यार्थी वारकऱ्यांच्या भूमिकेत होते, तर विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस घेत दिंडीत सोहळ्यात सहभाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, वारकऱ्यांची वेशभूषा केलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हनुमान मंदिराच्या प्रांगणात रिंगण तयार केले होते. मध्यभागी पालखी ठेवत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीदेखील रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला.

---

दिंडी सोहळ्याने फुलले शालेय आवार

--

सावित्रीबाई फुले विद्यामंदिर

पखालरोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात आषाढी एकादशी दिंडी काढून भक्तिमय वातावरणात साजरी झाली. प्रारंभी विठ्ठलाच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. विठ्ठलाच्या आरतीबरोबरच अभंगही सादर झाले. ज्योती महाले यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विशद केले. वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी व डोक्यावर तुळस घेतलेल्या नऊवारी साडीतील विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाल्या होत्या. प्रसाद जॉन, जेनी प्रसाद, शाळेचे मुख्याध्यापक सुनील शेवाळे उपस्थित होते. सुनील शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. मोहन माळी यांनी सूत्रसंचालन केले. संगीता महाजन,विद्या महाजन, जयश्री पवार, वैशाली राजभोज, प्रकाश खैरनार, प्रशांत गवळी, नीलिमा फडोळ, लक्ष्मण काशिद आदींसह पालक उपस्थित होते.

--

के. के. वाघ प्रायमरी स्कूल

आडगाव ः सरस्वतीनगर येथील शाळेत दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या वेशभूषेतील चिमुकले त्यात सहभागी झाले होते. हर्ष पानसरे व सौरभ मोहिते यांनी विठ्ठलाची, तर ईश्वरी आहेर व समृद्धी पोकळे यांनी रुक्मिणीची वेशभूषा साकारली होती. प्राचार्य अश्विनी पवार यांनी पालखीचे पूजन केले. अनुराधा ढवण, माधुरी निफाडे, सरिता जाधव, चैताली पिंगळे, अनुराधा पैठणकर आदी उपस्थित होते.

--

अभिनव बालविकास मंदिर

नाशिकरोड ः जेलरोडच्या गणेश धात्रक शिक्षण संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व डीएफडी माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात झाली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीसह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत निवृत्तिनाथ आदींची वेशभूषा केली होती. संस्थापक संचालक दत्तात्रय धात्रक, रंजना धात्रक, एंजल स्कूलच्या प्राचार्या मनीषा दराडे, आनंद महाराज कॉलेजच्या सुलभा डांगे, डॅफोडिल्सच्या मुख्याध्यापिका पायल पंजाबी, प्राथमिक विभागप्रमुख जयश्री सरोदे, वैशाली पाटील उपस्थित होते. माधुरी निमसे यांनी अभंग सादर केले. शीतल भामरे यांनी सूत्रसंचालन केले.

--

(फोटो ः सतीश काळे, पंकज चांडोले, प्रशांत धिवंदे, नामदेव पवार, डॉ. बाळकृष्ण शेलार, अभिजित राऊत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीमुळे नाट्यव्यवस्थापक सापडले कात्रीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जीएसटीमधून वगळावे अशी सर्वच क्षेत्रातून मागणी जोर धरू लागलेली असतानाच मनोरंजनाच्या क्षेत्रावर मात्र खूपच अन्याय झाल्याची भावना नाशिकच्या नाट्य व्यवस्थापंकामध्ये आहे. भलेही जीएसटी भरू; परंतु, त्यात थोडी शिथिलता यावी असे येथील नाट्यव्यवस्थापकांचे म्हणणे असून, याबाबत उच्चस्तरावर भेटीगाठी तसेच निवेदने देणे सुरू आहे.
नाटकाचे तिकीट आधीच जास्त असल्याची प्रेक्षकांची तक्रार असताना आता त्यात वाढ करून चालणार नसल्याने जीएसटीबाबत काय भूमिका घ्यावी अशा संभ्रमात सध्या नाट्यव्यवस्थापक आहेत. नाटकाचे तिकीट सरासरी २५० रुपये आहे. २५० रुपयांच्या पुढे १८ टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे त्यापुढे तिकीट वाढवले तर त्याचा प्रेक्षकांवर परिणाम होणार आहे. नाटकाचे तिकीट ३०० रुपये केले तरी त्यातून १८ टक्के म्हणजेच ५४ रुपये सरकारला द्यावे लागणार आहेत. मग तिकीट २५० रुपये ठेवले तर फरक काय पडतो, असाही विचार नाट्य व्यवस्थापक करीत आहेत. नाटकाचे तिकीट ५०० रुपये केले तर नाटक पहायला प्रेक्षक येणार का, असाही सवाल करण्यात येत आहे. सध्या नाटक पाहण्यासाठी चाळीशीची जोडपी येऊन बसतात. हा प्रेक्षकवर्ग तरुण असावा यासाठी नाटकाच्या निर्मितीतूनही प्रयत्न सुरू असताना आता जीएसटीचे भूत मानगुटीवर बसलेले आहे. त्यातही जीएसटीच्या निर्णयानंतर कालिदास कलामंदिराचे भाडे मात्र वाढविण्यात आले आहे. त्यामुळे २५० रुपये तिकीट कसे परवडणार हा मोठा प्रश्नच असल्याचे नाट्य व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.
याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा सुरू असून जीएसटी कमी करण्याबाबत त्यांना निवेदन देण्यात आले आहे. जीएसटी बंद नाही तर कमी करावा अशी ती मागणी आहे, त्यामुळे त्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता असल्याचे नाट्यव्यवस्थापकांनी सांगितले. तसे झाल्यास एकूणच परर्फार्मिंग आर्टला त्याचा फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणावासीयांची भागेना तहान!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरासह परिसरात नगरपालिकेकडून होणारा नळपाणीपुरवठा तब्बल दहा दिवसांआड होऊन देखील नळांना पुरेसे व मुबलक पाणी येत नाही. शहरातील पिण्याच्या पाण्याची आणीबाणी लक्षात घेऊनदेखील पालिका प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केळझर धरणातील जलसाठा संपुष्टात आला आहे. यामुळे आरम नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. तसेच, शहरातील आरम नदीपात्रालगतच्या पाणीपुरवठा करण्याऱ्या विहिरीचे उद्भव बंद झालेले आहेत. परिणामी जून महिना उलटूनदेखील शहराला ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रदेखील कोरडेठाक झाले आहे. चणकापूरमधील पाण्याचे आवर्तन सुटल्यावर गिरणा नदी दुथडी भरून वाहते. त्यावेळी सटाणा शहराला दिलासा मिळतो. मात्र यावेळी १५ जूनचे आर्वतन मालेगावकरांनी उशिरा घेण्याचा निर्णय घेतल्याने शहरात जून महिन्यापासून पाण्याची आस लागून आहे. मालेगाववासीय ज्या वेळेस चणकापूरचे आवर्तन घेतील, त्यावेळी शहरवासीयांना पाण्याचा लाभ मिळणाार असला तरीही सद्यस्थितीत शहरात तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहरात बहुतांश भागात विंधन विहिरी असल्याने मध्यवर्ती गावात दुष्काळसदृश स्थिती जाणवत नाही. मात्र शहरातील नववसाहत परिसरात नळकनेक्शन अद्याप पोहचलेले नाहीत. मात्र, काही ठिकाणी नळकनेक्शन असूनही जलकुंभ भरत नसल्याने पाणीपुरवठा करणे अशक्य झालेले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांवर खासगी टँकर विकत घेणे अथवा पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पालिका प्रशासनाने शहरातील जलकुंभनिहाय विभाग करून दहा दिवसांआड तब्बल नऊ लक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला असला तरीही तो तोकडा पडत आहे.

नामपूरला भूजल पातळीत घट

नामपूर शहर परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने भूजल पातळीत घट होऊन विहिरींना तळ गाठला आहे. मोसम नदीकाठावरील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने शहराला तब्बल दहा ते अकरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासगी टँकरद्वारा नागरिक आपली तहान भागवत आहेत. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईची धग वाढली आहे.

शहरातील जनतेला विभागनिहाय पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचा प्रयत्न सुरू असला तरीही चणकापूरचे आवर्तन लांबल्याने टंचाई जाणवत आहे. आवर्तन सुटल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

- सुनील मोरे, नगराध्यक्ष स.न.पा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत असताना चांदवड तालुक्यातील दह्याणे येथील अशोक दिनकर भवर (वय ३९) या शेतकऱ्याने मंगळवारी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्यामागे वडील, भाऊ, आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एकत्र कुटुंबातील भवर कुटुंबप्रमुख होते. त्यांच्या नावावर तीन लाख ३० हजार, भाऊ भरत त्यांच्या नावे चार लाख २० हजार, तर आई ताराबाई यांच्या नावे ३ लाख ५७ हजार असे एकूण १२ लाख ४२ हजार रुपये सोसायटीचे कर्ज आहे. कर्जमाफीचा फायदा न झाल्याने भवर यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्मविश्वासानेच स्वप्नपूर्ती शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेमिना मिस इंडिया २०१७ या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविणे केवळ प्रयत्नांतील सातत्य, महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावरच साध्य झाले. ही त्रिसूत्री तुम्हीही बाळगा, यश नक्की मिळेल, असा सल्ला फेमिना मिस इंडिया स्पर्धेची उपविजेती प्रियांका कुमारी हिने तरुणाईला दिला.
के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने प्रियांका हिच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. फेमिना मिस इंडियाची उपविजेती प्रियांका ही नाशिकच्या के. के. वाघ वाघ इंजिनीअरिंग कॉलेजची माजी विद्यार्थिनी आहे. त‌िने २०१३ मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग या विषयात पदवी घेतली आहे. येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त‌िला टीसीएस कंपनीत करिअरची संधी मिळाली होती.
यावेळी सत्काराला उत्तर देताना तिने कॅम्पसमधील तरुणाईशी संवाद साधला. प्रियांका कुमारी म्हणाली, ‘मिस इंडियासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणे आणि फेमिना मिस इंडिया २०१७ चे उपविजेतेपद पटकाविणे हा प्रवास अविस्मरणीय होता. यासाठी कुटुंबातील पार्श्वभूमी नव्हती. संशोधक वृत्ती आणि चांगल्या निरीक्षण क्षमतेचाही फायदा महाविद्यालयीन जीवनात झाला. एकदा या क्षेत्रात करिअर करण्याचे ध्येय ठरल्यानंतर प्रत्येक गोष्ट कठीण वाटत होती. मात्र, स्पर्धेच्या कालावधीत मिळालेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाने आत्मविश्वासात दुप्पट वाढ झाली. दुर्बल आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या निरागस लहान मुलांसाठी भविष्यात चांगले कार्य उभारण्याचा मानसही प्रियांका हिने यावेळी बोलताना व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नांदूरकर आणि मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. मुरुगकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त अशोक मर्चंट, डॉ. शाहबादकर, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावची प्रभाग रचना गुगलद्वारे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीत या वर्षाअखेरीस निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुगलद्वारे नकाशा तयार करून प्रभाग रचना केली असल्याचे मंडळ अधिकारी एस. ए. शेख यांनी स्पष्ट केले. कोणत्याही नेत्याच्या सल्ल्याने किंवा दबावाने प्रभाग रचना केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. तरी अनेक इच्छूक उमेदवारांसाठी सदर आरक्षण गैरसोयीचे झाल्याने संबंधित इच्छुक उमेदवार प्रभाग रचना व आरक्षणावर हरकत घेणार असल्याचे समजते.

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीची निवडणूक या वर्षअखेर होत आहेत. निवडणुकीची वॉर्ड रचना आणि जागेचे आरक्षण मंडळ अधिकारी एस. ए. शेख यांनी ग्रामसभेत जाहीर केले. या निवडणुकीसाठी सहा प्रभाग आणि सतरा जागांचे नियोजन असून, नव्याने रचना केलेल्या प्रभागाची व जागांच्या आरक्षणाची ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयासमोरील आवारात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, विस्तार अधिकारी आर. के. सदगिर, तलाठी संजय गांगुर्डे आदींसह भास्कर बनकर, सरपंच महेंद्र गांगुर्डे, गणेश बनकर आदी, किरण लभडे, प्रशांत घोडके, आशिष बागुल, राजा गांगुर्डे, सुधाकर मेंगाने, कांतीलाल भंडागे, चंद्रकांत बनकर, संदीप बनकर, महेंद्र साळवे, अशोक शिंदे, तानाजी खोडे, उमेश बनकर, रामकृष्ण खोडे, नकुल शिंदे, विलास हानफोडे, उपस्थित होते.

११ जुलैपर्यंत हरकती

ओबीसी पुरूष, ओबीसी स्त्री, एस. टी. स्त्री, एक जागा सर्वसाधारण स्त्री याप्रमाणे सहा प्रभागातील १७ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आरक्षणानूसार ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. दरम्यान, या प्रभाग रचना व जागेच्या आरक्षण संदर्भात नागरिकांच्या काही हरकती असल्यास ४ ते ११ जूलै या दरम्यान निफाडचे तहसीलदारांकडे हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

असे आहे आरक्षण

प्रभाग क्र १ (तीन जागा)

एस. टी. पुरूष, एस. सी. स्त्री, ओबीसी स्त्री

प्रभाग २ (दोन जागा)

सर्वसाधारण पुरूष, सर्वसाधारण स्त्री

प्रभाग ३ (तीन जागा)

एस. टी. पुरूष, सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री

प्रभाग ४ (तीन जागा)

एस. सी. पुरूष, सर्वसाधारण पुरूष, सर्वसाधारण स्त्री

प्रभाग ५ (तीन जागा)

ओबीसी पुरूष, ओबीसी स्त्री, एस. टी. स्त्री

प्रभाग ६ (तीन जागा)

ओबीसी पुरूष, एस. टी. स्त्री, सर्वसाधारण स्त्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंत्यसंस्काराचा ‘पारदर्शक’ ठेका वादात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या सत्ताकाळात पालिकेत पारदर्शक कामकाज होईल, अशा अपेक्षेत असलेल्या नाशिककरांची निराशाच होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्मशानभूमीतील मोफत अंत्यसंस्काराच्या दीड कोटींचा ठेका निविदा न काढताच देण्याची तयारी पालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. भाजपच्या या ‘पारदर्शक’ कामकाजावर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बोट ठेवत हा ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कामकाज पद्धतीवर निशाणा साधला जात असल्यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

गेल्याच आठवड्यात नालेसफाईच्या चौकशीवर पाणी लोटल्यानंतर आता शहरातील स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यसंस्काराचा दीड कोटींचा ठेका हा निविदा न देण्याची तयारी भाजपच्या चांगलीच अंगलट येत आहे. ५० हजाराचे कोणतेही काम हे इ-निविदा पद्धतीने देणे बंधनकारक असतांना मोफत अंत्यसंस्काराच्या नावाखाली चक्क दीड कोटीचे काम अभिस्वारस्य प्रस्तावाद्वारे देण्याची घाई आरोग्य विभागाला झाली असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. विशेष म्हणजे महासभेनेही या ‘लगीन घाई’ला मंजुरी दिल्याने भाजपच्या पारदर्शक कामकाजाचे पितळ उघड झाल्याचा आरोपही बोरस्ते यांनी केला आहे. या ठेक्याला मंजुरी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शहरातील स्मशानभूमींमध्ये मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी दरवर्षी एक कोटी ५० लाख ६२ हजार रुपयांचा प्रस्ताव महापालिका आणि स्थायी समितीत नुकताच मंजूर करण्यात आला. मात्र निविदा काढण्याऐवजी ठेकेदारांच्या अभिस्वारस्य प्रस्तावाद्वारे हे काम करण्याचा उल्लेख करण्यात येणार आहे. विभागनिहाय पारंपरिक मक्तेदारांकडूनच हे काम करून घेण्याची तयारी आरोग्य विभागाने केली असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे.

पालिकेतील ५० हजार रुपयांवरील कोणतेही काम हे इ-निविदा पद्धतीने करण्याचे बंधनकारक आहे. परंतु दीड कोटीच्या कामात निविदा न मागवताच निवडक ठेकेदारांच्या भल्यासाठी ठेका दिला जात आहे. इ-निविदेत स्पर्धा होवून पालिकेला त्याचा आर्थिक फायदा होवू शकतो. परंतु अभिस्वारस्य प्रस्तावाद्वारे ठेका देवून पालिकेचे आर्थिक हित डावलले जात असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. यापूर्वीच्या ठेकेदारांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. तरीही केवळ ठेकेदाराचेच हित जपले जात असल्याबद्दल बोरस्ते यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच मंजूर डॉकेटची अंमलबजावणी न करण्याची मागणी केली आहे.

-

ठेकेदारांवर मेहरबानी

मोफत अंत्यसंस्काराच्या ठेक्याचा वाद हायकोर्टापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे ठेकेदार बदलणे आवश्यक असतांना आरोग्य विभाग मात्र त्याच ठेकेदाराचे हित जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. ठेका संपल्याच्या तीन महीने अगोदर नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश असतांनाही आरोग्य विभाग या ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडाळा भागात पाण्यासाठी वणवण

$
0
0

पाणीपुरवठा करण्याची रहिवाशांकडून मागणी

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पावसाळा सुरू होऊन महिना झाला असून, मागील आठवड्यापासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तरीही वडाळा गावात मात्र नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रस्त्यांवर चिखल आणि पाण्याचे डबके असताना घरात मात्र पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नसल्याचे चित्र सध्या वडाळा गावात बघावयास मिळत आहे. बुधवारी (दि. ५) याबाबतच्या समस्येची पाहणी परिसरातील नगरसेवकांसह महापालिका अधिकाऱ्यांनी केली.

इंदिरानगर भागातील वडाळागाव परिसरातील मेहबुब नगर परिसरात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत असतात. यावर उपाय म्हणून नगरसेवकांनी थेट महापौरांसह बैठकीचे आयोजन केले होते. मात्र त्यानंतर वडाळा गावात उन्हाळ्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र नंतर पावसाळा सुरू झाल्याने हे टँकर बंद करण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याचे लक्षात आले. पाऊस पडत असला, धरणात पाणी असले तरीसुद्धा नागरिकांच्या घरात पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी यासंदर्भात नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वन्यजीव’मध्ये पुढाऱ्यांचा जीव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने वन्यजीव क्षेत्रातही सोयीच्या मंडळींची वर्णी लावण्याचा घाट घातल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख आणि अमित खरे या दोघांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या विश्वरुप राहा यांचा पत्ता कट करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्य सरकारच्यावतीने वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली जाते. राज्याच्या महसूल व वनविभागाने या संदर्भातील नियुक्त्या विशेष कार्य अधिकारी स्वप्निल देशभ्रतार यांच्या स्वाक्षरीने जाहीर केल्या आहेत. आगामी तीन वर्षांसाठी राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये वन्यजीव रक्षक जाहीर करण्यात आले आहेत. वने आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी मदत होण्याकरिता या नियुक्त्या केल्या जातात.

वनविभागाला योग्य तो सल्ला लाभावा, मार्गदर्शन मिळावे, लोकसहभाग वाढावा, वनविभाग आणि नागरिक यांच्यात संवाद वाढावा, संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना व्हावी, या हेतूने मानद वन्यजीव रक्षक ही संकल्पना राबविण्यात येते.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच आगामी तीन वर्षांसाठी मानद वन्यजीव रक्षकांची यादी घोषित केली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये विकास देशमुख आणि अमित खरे यांची नावे आहेत. देशमुख भाजपशी संबंधित असल्याने राजकीयदृष्ट्या त्यांची याठिकाणी वर्णी लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर, यापूर्वी नाशिकमध्ये मानद वन्यजीव रक्षक म्हणून तब्बल १६ वर्षे काम पाहिलेले विश्वरुप राहा यांचे नाव यंदाच्या यादीत नाही. त्यामुळे त्यांना डावलून देशमुख आणि खरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप वने आणि वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी केला आहे.

राहा यांनी बोरगड क्षेत्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. गंगापूर धरणाच्या ठिकाणी येणारे पक्षी असो, की शहर परिसरातील वनांचे संरक्षण याबाबत त्यांचे मार्गदर्शन मोलाचेच ठरले आहे. असे असताना त्यांना डावलण्यात आल्याने पर्यावरण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.

काय फायदा होणार?

नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. हे वनक्षेत्र टिकविण्यासाठी आणि त्यात वाढ करण्यासाठी देशमुख आणि खरे यांचे योगदान लाभणार का? तसेच जिल्ह्यातील बिबट्यांचा मानवी वस्तीकडे असलेला ओढा, त्यातून वाढलेला मानव-वन्यप्राणी संघर्ष यावरही या दोघांचा सल्ला, मार्गदर्शन फलदायी ठरणार का, असा प्रश्न वन आणि पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावस्त्राला फटका!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

स्त्री मनाला भुरळ घालतानाच अगदी सातासमुद्रापार पोहोचलेल्या भरजरी, जरतारी नक्षीदार अशा महाराष्ट्राचे महावस्त्र पैठणीला ‘जीएसटी’चा फटका बसणार आहे. देशभरात एकच करप्रणालीसाठी केंद्र शासनाने आणलेल्या या ‘जीएसटी’त यापूर्वी कोणताही कर नसलेल्या हातमाग उद्योगातील रेशीमवर पाच टक्के कर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य विणकरांची मोठी पंचाईत झाली आहे. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरातील असंख्य विणकरांना हा ‘जीएसटी’ चांगलाच तापदायक ठरणार असल्याने विणकरांमध्ये चिंता पसरली आहे. विशेषतः येथील बहुसंख्य विणकरांची उलाढाल वीस लाखांच्या आत असल्यामुळे त्यांना जीएसटी रज‌िस्ट्रेशन असणार नाही, पर्यायाने त्यांना जीएसटीचा परतावाही मिळणार नसल्याने साहजिकच येत्या काळात रेशमी धाग्याची ही पैठणी महागणार आहे.

येवला शहरामध्ये जवळपास आठ हजारांच्या आसपास हातमाग असून, त्यावर सुमारे दहा हजारांहून अधिक विणकर हे पैठणी वस्त्र विणण्याचे काम करतात. यापूर्वी पैठणी विणकामासाठी कुठलाही कर नसलेला कच्चा माल उपलब्ध होत होता. मात्र एक जुलैपासून पैठणीसाठीच्या विणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या रेशीमवर ‘जीएसटी’ लागणार आहे. रेशीमच्या कोष व कच्च्या धाग्यावर ‘जीएसटी’ नसला तरी तो या पैठणी विणकामासाठी लागणाऱ्या तीनतारी रेशीमवर पाच टक्के आकारण्यात येणार आहे. परिणामी रेशमाचे भाव वाढताना साहजिकच पैठणी देखील किंमतीच्या बाबतीत पूर्वीच्या तुलनेत अधिक भाव खाणार आहे. परिणामी पुढील काळात पैठणीवर नजर ठेवून असणाऱ्या स्त्र‌ियांना अधिकचे दाम मोजावे लागणार आहेत.

नोंदणी नसल्यामुळे परतावाही नाही

कोष व त्यापासून बनवलेल्या धाग्यावर जीएसटी नाही. मात्र, जो तीनतार बनवणार आहे त्याचेवर जीएसटी आहे. त्याचमुळे रेशमाचे भाव हे पाच टक्के वाढणार आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य पैठणी विणकरांना बसणार आहे. विणकरांची उलाढाल वीस लाखांच्या आत असल्याने त्यांचे जीएसटी रज‌िस्ट्रेशन नसणार व पर्यायाने त्यांनी रेशीम व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या रेशमावरील जीएसटीचा परतावा त्यांना मिळणार नसल्याचे आज तरी दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढदिवसाला अनोखा ‘भाई’चारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक
सातपूरला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवक योगेश शेवरे याच्या वाढदिवसाला गुन्हेगारी जगतातील अनेक ‘भाईं’नी हजेरी लावली. दस्तुरखुद्द मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा या कार्यक्रमाला हजर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शेवरे याचा वाढदिवस नुकताच त्र्यंबरोडवर महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला गुन्हेगारी प्रवृत्तींचाही भाईचारा दिसून आला. विशेष म्हणजे विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेले एकमेकांचे विरोधक ‘भाई’ वाढदिवसाला एकत्र आल्याने यातून पुढे नेमके काय घडणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विरोधात असलेले भाई विधायक कामांसाठी एकत्र येणे चांगली बाब आहे. परंतु, एखाद्याची खुन्नस काढण्यासाठी एकत्र येऊन अनुचित प्रकार तर घडणार नाही ना, याबाबत पोलिसांनीच सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सातपूर प्रभागाचे नगरसेवक योगेश शेवरे यांचा वाढदिवस नुकताच छोटेखानी कार्यक्रमात साजरा करण्यात आला. पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेल्या शेवरे यांचा पहिल्यांदाच उघडपणे वाढदिवस साजरा झाल्याने एकमेकांच्या विरोधातले भाई एकत्र येत वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. सभागृहनेता दिनकर पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची यादी दिली होती.

वाढदिवसामुळे ट्रॅफिक जाम

त्र्यंबक रोडवरील महिंद्रा सर्कलच्या बाजूला साजरा होत असलेल्या वाढदिवसामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. पाहुण्यांनी रस्त्यातच वाहने उभी केल्याने काही काळ वाहनचालकांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली होती. पोलिसांनीही संबंधित कार्यक्रमाकडे डोळेझाक केल्याने ट्रॅफिक जामचा सामना करण्याची वेळ आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७३ हॉस्पिटल्स होणार नियमित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
निवासी क्षेत्रात बांधण्यात आलेल्या आणि नगररचनासह फायर सेफ्टी आदेशाची पूर्तता करू न शकलेल्या हॉस्प‌िटल्सबाबत तोडगा काढण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने उपाययोजना सुचवल्या आहेत. त्या पालिका आणि आयमाने स्वीकारल्या आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील २७३ हॉस्प‌िटल्सची फायर सेफ्टीसह नगररचनाच्या जाचातून मुक्तता होण्याची शक्यता आहे. पंधरा बेड हॉस्प‌िटल्समधील पाच बेड अत्यावश्यक सेवेसाठी राखीव ठेवण्यासह दहा टक्के हार्डश‌िप प्रीम‌ियम आकारून त्यांना परवानगी दिली जाणार आहे. तसेच फायर सेफ्टीतील काही अटी शर्तीमध्ये या रुग्णालयांना दिलासा मिळाला आहे. परंतु, ज्या हॉस्प‌िटल्सकडे २०१३ पूर्वीचे पूर्णत्वाचे दाखले असतील, त्यांनाच हा लाभ होणार आहे. सुपर स्पेशाल‌िटी हॉस्प‌िटल्ससाठी नियम कायम राहणार आहेत.
महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर निवासी क्षेत्रात हॉस्प‌िटल्स उभे राह‌िले आहेत. सन २०११ मध्ये आरोग्य सेवा संचालनालयाने हॉस्प‌िटल्ससाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला सक्तीचा केला. तसेच प्रचलित अग्निशामक कायद्यानुसार परवानगी बंधनकारक केली. त्यामुळे शहरातील हॉस्प‌िटल्स, नर्सिंग होम आणि प्रसुतीगृहांची अडचण निर्माण झाली. या हॉस्प‌िटल्सच्या परवानगीचा वाद गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू होता. सध्याच्या हॉस्प‌िटल्समध्ये बदल करता येत नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर हॉस्प‌िटल्स विनापरवानाच सुरू होते. आयमा संघटनेकडून याबाबत तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली होती. त्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी तत्का‌लीन अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, नगररचनाचे आकाश बागूल, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने अहवाल सादर केला असून, त्यावर आयुक्तांच्या उपस्थितीत आयमाचे अध्यक्ष डॉ. मगेश थेटे, डॉ. किरण शिंदे, डॉ. संदीप कोतवाल, डॉ. आरती चिरमाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीत दहा आणि पंधरा बेड हॉस्प‌िटलचा तिढा सोडविण्यात आला असून, स्ट्रक्चरच्या बाबतीत काही मुभा देण्यात आली आहे. दहा प्लस पाच अत्यावश्यक सेवेसाठी बेड धरून त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. पाच बेडसाठी अतिरिक्त केलेल्या बांधकामावर अतिरिक्त बांधकामाच्या रेडीरेकनर दरानुसार दहा टक्के हार्डशीप प्रीम‌ियम आकारून त्यांना मंजुरी दिली जाणार आहे.
सिंगल विंडो क्लिअरन्स
या अटी व शर्तींचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी पालिकेत एक खिडकी सुरू केली जाणार असून, हॉस्प‌िटल्सनी नगररचना विभागात आणि फायर विभागात दोन स्वतंत्र प्रस्ताव सादर करायचे आहेत. या दोन्ही विभागांची परवानगी घेतल्यानंतर वैद्यकीय विभागाची परवानगी मिळणार आहे.

या आहेत नवीन अटी

g दहा बेडपर्यंत दीड मीटर ज‌िन्याची अट आता १.२ मीटरपर्यंत शिथ‌िल
g रहिवाशी क्षेत्रात अपार्टमेंटचा नाहरकत दाखला आवश्यक
g व्यावसायिक इमारतीत हॉस्प‌िटल्सला लिफ्ट असेल तर तिसऱ्या मजल्यापर्यंत परवानगी
g मिश्र वापराची इमारत असल्यास दुसऱ्या मजल्यापर्यंत हॉस्प‌िटल्सला परवानगी
g नर्सिंग होमसाठी पार्किंग व्यवस्था नसेल तरी पाच बेडपर्यंत परवानगी
g जादा बांधकामासाठी अतिरिक्त दहा टक्के हार्डश‌िप प्रीम‌ियम
g तळमजल्यावर हॉस्प‌िटल असेल तर फक्त अग्निनिर्वाणके व सूचनाफलक पुरेसे
g दहा बेडपेक्षा जास्त हॉस्प‌िटलसाठी आगशोधक व सूचना यंत्रणा आवश्यक

पाच बेडखालील हॉस्पिटल्सची नोंदणी

सध्या पालिकेत पाच बेडच्या वर असलेल्या हॉस्प‌िटल्सनाच परवानगी दिली जाते. परंतु, ही अटही शिथ‌िल करण्यात आली असून, दोन ते पाच बेडपर्यंतच्या हॉस्प‌िटल्सना परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे शहरातील डॉक्टर्स व नर्सिंग होमना मोठा दिलासा मिळणार असून, शहरातील हॉस्प‌िटल्सची संख्या वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड गुरांना आंदण!

$
0
0

आय. टी. पार्कमधील बंद कारखान्यांच्या जागेवर अतिक्रमण

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक विकास महामंडळाने खास आयटी पार्कसाठी अंबड एमआयडीसीत जागा आरक्षित केली होती. याठिकाणी वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या या आपल्या शाखांसाठी जागा घेत आहेत. मात्र सद्यस्थितीत याठिकाणी आय. टी. कंपन्यांनी विकत घेतलेल्या भूखंडांवर काठेवाडींनी आपली गुरे चरायला सोडली आहेत. त्यामुळे मोकळ्या जागेवर कंपन्या नावावरच दिसत असल्याचे समोर येत आहे. यामुळे तातडीने याबाबत कारवाई करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.

अनेक अडचणींचा सामना करत शहरात येणाऱ्या आय. टी. कंपन्यांसाठी नुकतीच बदली होऊन गेलेले प्रादेशिक अधिकारी यांनी उद्योजकांना भुखंड वितरित केले होते. परंतु, त्यांना देण्यात आलेल्या भूखंडांवर केवळ नावालाच कारखाने टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या आयटी पार्क कारखान्याच्या हिरवळीवर काठवाडींनी जागा घेतली आहे. यात त्यांच्याकडून बंद असलेल्या कारखान्यांच्या जागेवर गुरांचा मुक्त संचार हिरवे गवत खाण्यासाठी होत आहे. जागेवरील संबंधित कारखाना जरी बंद असला तरी परिसरात असलेल्या गवताचा उपयोग तर गुरांसाठी झाला असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत कोणतीही ठोस भूमिका एमआयडीसी प्रशासनाने घेतलेली दिसून येत नाही.

याठिकाणी अनेक कारखाने केवळ नावालाच सुरू आहेत. तसेच आयटी पार्कच्या मोकळ्या जागेवर काठेवाडींनी सहारा घेतला आहे. या कारखान्यांच्या परिसरात त्यांच्या गुरांना हिरवेगार गवत खाण्यासाठी उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे आयटी पार्कच्या नावावर ऑटोमोबाइल्स उत्पादन घेतले जात असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, बदलून गेलेल्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची चौकशी संबधित भूखंडांच्या वितरणाबाबत सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यातच एमआयडीसीच्या अभियंता विभागाकडे संबंधित भूखंडांबाबत माहितीच नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांचे नेमके काम काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

नाशिक एमआयडीसीत आय. टी. पार्कच्या जागेवर नोंदणी केलेल्या मात्र जागा मोकळ्या ठेवलेल्या कंपन्यांबाबत आता पाऊले उचलण्याची गरज आहे. याने नाशिक एमआयडीसीच्या आय. टी. पार्कच्या जागेवर होणारे अतिक्रमण थांबेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात चार हजार किलो मांस जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंबई-आग्रा महामार्गावर टेहेरे श‌िवारात पोलिसांनी मुंबईकडे गोवंश जातीचे मांस नेणाऱ्या दोघांना अटक केली. त्याच्याकडून ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४ हजार किलो जनावरांचे मांस जप्त केले. पिकअपमधून हे मांस वाहून नेत होते.

पोल‌िस उपधीक्षक अजित हगवणे यांचे नेतृत्त्वाखाली भूषण खैरनार, संदीप गुरव, हरीश कोळी यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे टेहरे शिवारात ही कारवाई केली. भारत पेट्रोल पंपासमोरील स्पीडब्रेकरजवळ सापळा रचून मालेगावहून-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपला (एमएच ४१ एजी २२१६) अडव‌िले. वाहनाची तपासणी केली असता त्यात जनावरांचे मांस आढळले. वाहतूक करणारे शेख कुतुबुद्दीन शेख जैनूद्दीन (वय ३० रा. हिरापुरा, मालेगाव), अतिक अहमद मोह. रफिक (वय ३०, रा. सरकार नगर, मालेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. जनावराचे मांस मालक बाबू मुंडी (रा. अयुब्ब नगर मालेगाव) याचा पोलीस शोध घेत आहेत. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर छापा

शहरातील संगमेश्वर व सोयगाव भागातून मंगळवारी अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मंगळवारी सांडावा पुलाजवळील पान टपरीलगत अवैधरित्या दारू विक्री करणारा कुणाल राजेंद्र गायकवाड (वय २१ रा. नवनाथ नगर) यास अटक केली. त्याच्याकडून ५ हजार ७१५ रुपयांच्या विविध कंपनीच्या ३६ विदेशी दारू बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी छावणी पोल‌िसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत सोयगाव भागातील इंदिरानगर येथे पोल‌िस पथकाने छापा टाकला. या कारवाईत गावठी दारू विक्री करणारी महिला सरला तेली हिला पोलिसांच्या पथकाने अटक केली. या महिलेच्या विरोधात कॅम्प पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध रॉकेल, देशी-विदेशी दारू जप्त

विशेष पोल‌िस पथकाने मंगळवारी तीन ठिकाणी छापा टाकून अवैध रॉकेल, देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या पथकाने दुपारी धान्य वितरण अधिकारी व्ही. डी. शिंदे यांच्यासह मुन्शी शबाना नगर येथे छापा टाकला. एकूण १३ हजार ९८ रुपये किमतीचा अवैध रॉकेलसाठा जप्त केला. आरोपी हमीद खान शाहा मोह. खान यास ताब्यात घेतले. रावळगाव येथे छापा टाकून चार हजार रुपयांची देशी-वेदेशी दारू जप्त केली. चेतन चव्हाण व सुनील ठाकरे या दोघांना अटक केली. दाभाडी येथील छाप्यात एकूण दीड हजार रुपयांची देशी दारू जप्त केली. आरोपी सुनील पवार फरारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांनाच ‘पावतेय’ पावती!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
शहरातील हॉकर्स झोननिहाय लायसन वितरणासाठी महापालिकेच्या बाजार करवसुली विभागाने करभरणा केल्याच्या २५ पावत्या जमा करण्याचा अजब फतवा काढून हॉकर्सना वेठीस धरले जात आहे. या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जुन्या तारखेच्या एकत्रित पंचवीस पावत्यांच्या बदल्यात शेकडो रुपयांचा ‘मलिदा’ स्वतःच्या खिशात घालण्याचा सर्रास प्रकार येथील पालिकेच्या विभागीय कार्यालयात घडला आहे. या प्रकारामुळे सन २०१३-१४ पासून बाजार करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांनी पालिकेला लाखो रुपयांचा चुना लावल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
पालिकेच्या वतीने नाशिकरोड शहरात ५२ हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. या हॉकर्स झोनसाठी सन २०१३-१४ साली शहरातील हॉकर्सचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार आता शहरातील सर्व हॉकर्सला पालिकेकडून व्यवसायासाठी झोननिहाय लायसन दिले जाणार आहे. या कामाचा ठेका पालिकेने एका खासगी संस्थेला दिला आहे. हॉकर्स लायसन मिळविण्यासाठी प्रथम सन २०१३-१४ साली झालेल्या सर्वेक्षणातील हॉकर्सचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया नुकतीच राबविली आहे.
हॉकर्स लायसनसाठी अर्ज भरणाऱ्या हॉकर्सकडे बाजार करवसुली विभागाचे कर्मचारी यापूर्वी पालिकेकडे बाजार कर भरणा केल्याच्या पंचवीस पावत्यांची मागणी करीत आहेत. परंतु, बहुतांश हॉकर्सकडे बाजार कर भरणा केल्याचा जुन्या पावत्या उपलब्ध नसल्याने या विभागातील कर्मचारी अतिरिक्त पैसे आकारुन संबंधित हॉकर्सला पंचवीस पावत्या देण्याची व्यवस्था करीत आहेत. त्यापोटी शेकडो रुपयांचा ‘मलिदा’ या कर्मचाऱ्यांनी खिशात घातला आहे.

रक्कम तिजोरीत पोहचलीच नाही

सन २०१३-१४ सालच्या सर्वेक्षणानुसार यादीत नाव असलेल्या हॉकर्सना प्रथम अधिकृत लायसन दिले जाणार आहे. परंतु, यातील बहुतांश हॉकर्सना बाजार कर वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कर भरल्याची पावतीच दिलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून हा गोरखधंदा खुलेआम सुरू असल्याने हॉकर्सकडून वसूल झालेल्या कराची रक्कम हिशोबात न आल्याने ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत पोहचली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात सध्या हॉकर्सची संख्या काही हजारांच्या घरात आहे. याचा अर्थ बाजार कर वसुली विभागात लाखो रुपयांचा गफला झाला असण्याची दाट शक्यता आहे.

शहरातील ५२ हॉकर्स झोनसाठी लायसन नोंदणी सुरू आहे. त्यासाठी केवळ तीनशे रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पावत्या जमा करण्याचे पालिका प्रशासनाने आदेश दिलेले नाहीत.
-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, नाशिकरोड

हॉकर्स लायसनसाठी बाजार करवसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बाजार कर भरल्याच्या पंचवीस पावत्यांची मागणी केली जात आहे. काही हॉकर्सना बाजार कर विभागातील कर्मचाऱ्यांकडून जागेवर पंचवीस पावत्या दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनेक हॉकर्सना बाजार कर भरणा करूनही पावत्या मिळालेल्या नाहीत.
-गौतम सोनवणे, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images