Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

त्र्यंबकला आता दररोज पाणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नियमीत सुरू करण्यात आला आहे. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी कार्यभार स्वीकारताच हा निर्णय घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच सोमवारी (दि.३) महाराष्ट्र टाइम्सने ‘धरण भरले, मात्र पाणी दिवसाआड’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला.

नगराध्यक्षा धारणे यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. त्याच दिवशी हे वृत्त प्रकाशित झाल्याने त्यांनी दखल घेत नागरिकाना पाणीटंचाईतून मुक्त केले.

पावसाळा सुरू झाला तरीही त्र्यंबक परिसराकडे यंदा पावसाने सुरुवातीला पाठ फिरवली होती. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे शहरालगतचे अहिल्या धरण भरले तरीही शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे धारणे यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला आणि नियमीत पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना संबंध‌ित विभागास दिल्या.

दरम्यान, शहरालगतचे ओव्होरफ्लो झालेल्या आहिल्या धरणाचे जलपूजन नगराध्यक्षा तृप्ती धारणे आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी केले. त्र्यंबक शहराच्या काही भागास या धरणातून पाणीपुरवठा होत असतो. ब्राह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या या धरणात पर्वतराईतून खळाळणारे धबधब्यांचे पाणी जमा होते. त्यामुळे हे धरण लवकर भरते. जलपूजन प्रसंगी नगराध्यक्षा धारणे यांच्या समवेत गटनेते योगेश तुंगार, गटनेते रवींद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव, ललीत लोहगावकर, यशोदा अडसरे, अलका शिरसाठ, अंजनाबाई कडलग, सिंधुबाई मधे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाणा बाजार समितीत सहा जागांवर संक्रांत

0
0

कैलास येवला, सटाणा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आगामी काळात राज्य सहकारी निवडणूक प्राध‌‌ीकरणाच्या माध्यमातून होणार आहेत. सद्यस्थितीत सटाणा बाजार समिती संचालक मंडळावर २१ सदस्यीय संचालक असतांना तब्बल सहा जागांवर संक्रांत येणार आहे. अवघ्या १५ सदस्यांसाठी येत्या काळात निवडणुका होणार असल्याने अनेकांचे स्वप्न भंगणार आहे.

सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीवर २१ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. विकास सेवा सहकारी सोसायटी गटातील संचालक, ग्रामपंचायत गटातील संचालक यासह कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समित्यांची सदस्यांनी निवडून दिलेले सदस्य तसेच पंचायत समिती व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य, व्यापारी, आडते, हमाल व मापारी यांच्यातील सदस्यांचा समावेश होता. परिणामी सर्वच घटकांना यात प्रतिनिधीत्त्व मिळत होते.

शेतकरी प्रतिनिधींना महत्त्व

नव्या अध्यादेशानुसार बाजार समित्यांवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्त्व देण्यात आले आहे. यासाठी किमान १० गुंठे इतकी जमीन धारण करणारे, बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात वास्तव करणारे, बाजार समितीत गेल्या पाच वर्षांत किमान तीन वेळा ज्याने आपल्या कृषी उत्पन्नांची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्यांनाच निवडणूक लढविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

व्यापारी, हमालांना स्थान नाही

शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार पंधरा सदस्य निवडणूक लढविणार असून, यात १० सदस्य खुल्या पद्धतीने निवडून द्यावयाचे आहेत. दोन महिला, एक इतर मागास प्रवर्ग, एक विमुक्त भटक्या जातीमधील व एक अनुसुचित जाती जमाती या प्रवर्गातील असणार आहेत. यामुळे व्यापारीगट, हमाल मापारी गट, तसेच प्रक्रिया उद्योग या गटातील सदस्यांवर संक्रांत आली आहे. सोसायटी गटातील सर्व सभासदांना यापूर्वी मतदानाचा अधिकार होता. तो या अध्यादेशामुळे रद्द झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक होणार स्टार्टअप व्हिलेज!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
संरक्षण, शेती, मनोरंजन, उद्योग या क्षेत्रांशी संबंधित गुंतवणूक करण्यास नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वाव असल्याने, नाशिकमध्ये स्टार्टअप व्हिलेज स्थापन करण्याच्या खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या मागणीला राज्याच्या प्रधान सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकही लवकरच स्टार्टअपच्या नकाशावर विराजमान होणार आहे. स्टार्टअपच्या नकाशावर स्थान मिळविण्यासाठी राज्यातील नागपूर व औरंगाबाद ही शहरेही नाशिकचे मुख्य स्पर्धक आहेत.

औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य असले तरी येत्या काळात या क्षेत्रात इतर राज्यांची स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळे नव्या योजनांची आखणी करुन त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक बनले आहे. भारत सरकारनेही नीती आयोगाच्या माध्यमातून ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारखे उपक्रम हाती घेतले आहेत. गुजरातसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान व केरळ या पाच राज्यांनी स्वतःचे ‘स्टेट स्टार्टअप अँड इनोव्हेशन पॉल‌सिी’ अंमलात आणली आहे.

नीती आयोगाची मार्गदर्शक तत्वे व महाराष्ट्रातील सर्व भागधारकांची मते लक्षात घेता शासनाकडून ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी-२०१७’ तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई-पुणे येथे स्टार्टअप इकोसिस्टीम उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे नागपूर व औरंगाबाद येथेही मुंबई-पुण्याप्रमाणे स्टार्टअप इकोसिस्टीम विकसित केली जाणार आहे. नाशिकमध्ये मात्र स्टार्टअप इकोसिस्टीम अगोदरच तयार आहे. नाशिक शहरात डिज‌टिल इम्पॅक्ट स्क्वेअर आणि नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर येथे इन्क्युबेशन सेंटर अस्तित्वात आहे. त्यामुळे नागपूर आणि औरंगाबादपूर्वी नाशिकमध्ये अॅक्स‌लिरेटर स्थापन करणे शक्य असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या निदर्शनास आणून दिले. नाशिक येथे अॅक्स‌लिरेटर विकसित करण्याची मागणी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ सादर करतेवेळी केली होती. या अॅक्सिलरेटर कार्यक्रमासाठी पात्र ठरलेले स्टार्टअप्स विविध वित्तिय संस्थांकडून गुंतवणुकीस पात्र ठरतात. किंबहुना असे स्टार्टअप्स बहुतेक वेळा असे अॅक्सिलरेटर उपलब्ध असलेल्या ठिकाणीच आपले उद्योग उभारणीस प्राधान्य देतात. साहजिकच स्थानिक लोकांना रोजगारप्राप्तीसाठी याद्वारे संधी निर्माण होते.

सरकारने नाशिकचा अॅक्सिलरेटर कार्यक्रमात समावेश केल्यास येथे आपोआप विविध स्टार्टअप्सची गुंतवणूक वाढण्यास हातभार लागेल. पर्यायाने नाशिक स्टार्टअप व्हिलेज तयार होईल. रोजगार उपलब्धतेचे प्रमानही आपोआप वाढेल.
- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८ उमेदवार निवडणूक लढण्यास अपात्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा खर्च जिल्ह्यातील तब्बल ३८ उमेदवारांनी मुदतीत सादर न केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे.

जिल्ह्यातील मनमाड, सिन्नर, भगूर, नांदगाव, नगरपालिकांच्या नोव्हेंबर २०१६ मध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये उमेदवारी करणाऱ्या मनमाडमधील २६, सिन्नरमधील ५, भगूरच्या तीन तर नांदगावच्या चार अशा एकूण ३८ उमेदवारांनी सहा महिने उलटूनही निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील सादर केलेला नाही. त्यामुळे या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील तीन वर्षांसाठी नगरपरिषदांच्या निवडणुका लढविण्यास अपात्र ठरविले आहे. अशा उमेदवारांमध्ये मनमाडच्या बेबी पवार, रोनावाला सबीहा, सविता पाटील, हिराबाई आहिरे, सुनील पगारे, प्रभाकर आहिरे, चंद्रकांत गरुड, शशीकांत दाभाडे, दिपाली चव्हाण, राजू निरभवणे, सुरेश गायकवाड, कांचन धिवर, वैशाली पगारे, शैला गायकवाड, दुगार्बाई मोरे, अनिता भालेराव, उमेश झोडपे, अनिल वाघ, सचिन मोरे, दयाबाई पवार, नंदा देवरे, रुक्म‌णिी आहिरे, रेश्मा बनसोडे, सचिन दराडे, भाऊराव भालेराव, कुसुम दराडे, तसेच शोभा लोंखडे, अनुसया रणमाळे, योगेश क्षत्रीय, ईश्वर लोणारे, ज्ञानेश्वर पवार (सिन्नर), सत्यभामाबाई मोजाड, प्राजक्ता बागडे, सुरेखा मोहीते, (भगूर), इंदिरा बनकर, संगिता उगले, शशिकला बागुरे, आशाबाई पाटील (नांदगाव) या उमेदवारांचा समावेश आहे.

ज्यांच्यावर कारवाई झाली ते सर्व निवडणूक लढविणारे उमेदवार आहेत. त्यापैकी कुणीही नगरसेवक नाही. तीन वर्षांसाठी ही अपात्रतेची कारवाई असून, या कालावधीत कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक त्यांना लढविता येणार नाही.

डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाथर्डी परिसरात विजेचा लपंडाव

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

ऐन पावसाळ्यात पाथर्डी गावासह परिसरातील नागरिकांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत. पाथर्डी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

पाथर्डी गावासह परिसरातील पिंपळगाव खांब, दाढेगाव व इतर भागात मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. काही वेळेस दिवसा तर प्रसंगी रात्री केव्हाही वीजपुरवठा बंद होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत.

विहिरीवरील पाणी विजेच्या सहाय्याने पंपाद्वारे पिण्यासाठी, इतर कामांसाठी लागत असते. परंतु, गरजेच्या वेळीच वीज गायब होत असल्याने पाणी मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. या बाबतीत सबस्टेशन केंद्रावर अधिकारी व वायरमन यांना फोन, भ्रमणध्वनीद्वारे, प्रत्यक्ष जाऊन तक्रारी देण्यात येऊन काही फायदा होत नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

रात्रीची वीज गेल्याने शेतातील राहणार्‍या शेतकऱ्यांना, महिलावर्गास विषारी जनावरांची भीती वाटत असते. पावसाचे दिवस असल्याने घरातील लहान मुलेसुद्धा अंधारात बाहेर पडायला घाबरत आहेत. विद्यार्थ्यांचेही यामुळे नुकसान होत आहे. तरी संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी तात्काळ लक्ष घालून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी होत आहे. ही मागणी मान्य न झाल्यास परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा सोमनाथ बोराडे, अंकुश भोर, संदीप जाधव, संतोष बोराडे, बाळासाहेब बोराडे, संजय बोराडे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईचे आदेशावर आदेश

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नालेसफाईच्या कामांच्या चौकशीबाबत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या दबावानंतर महापौर रंजना भानसी यांनी चौकशीबाबतचा आपला निर्णय पुन्हा बदलला आहे. नालेसफाईच्या कामांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी भानसी यांनी आयुक्तांना पत्र लिहले असून, या कामांतील अनियम‌तितेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीही पत्राची दखळ घेत, अतिरिक्त आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पावसाळी गटारीचे कामे पूर्ण झाल्यानंतर चौकशीला आता उश‌रिाने सुरूवात होणार आहे. तर या चौकशीमुळे शहर अभियंता यू. बी. पवार यांच्यासह ठेकेदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शहरात गेल्या १४ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे वेळेत न केल्याने शहराचे नुकसान झाल्याचा ठपका विरोधकांनी ठेवून महासभेत लक्षवेधीही लावली होती. महापौरांनी सभा गुंडाळत चौकशीला अभय दिले होते. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी टीका केल्यामुळे या कामांच्या चौकशीची घोषणा महापौरांनी करावी लागली होती. परंतु आठच दिवसात त्यांनी घुमजाव करत, आपणच चौकशी करणार असल्याचा दावा केला होता. एक प्रकारे नालेसफाईच्या कामालाच त्यांनी क्लिनचीट दिली होती. त्यामुळे भाजपच्या पारदर्शक कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

दिनकर पाटील यांनी पुन्हा पत्र देवून नालेसफाई व पावसाळी गटार सफाई कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली. तर शिवसेनेनेही भाजपच्या पारदर्शक कारभारावर शंका उपस्थित केली. त्यामुळे महापौरांनी नमते घेत, या कामांच्या चौकशीची तयारी दर्शवली आहे. बुधवारी त्यांनी याबाबत आयुक्तांना पत्र देवून सदस्यांच्या भावनांचा व मागणीचा विचार करून या कामांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनाही तातडीने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात होणार आहे.

पाणी वाहून गेले…

दरम्यान, या प्रकरणावर महासभा होताच चौकशी लावली असती तर नगरसेवकांच्या आरोपात काही प्रमाणात तथ्य आढळले असते. परंतु अतिवृष्टी होवून तीन आठवडे झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले असून, चौकशीत काय आढळणार याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन रुपयांवरून मारहाणीत तरुण ठार

0
0

म.टा.वृत्तसेवा, धुळे

शहरातील साक्रीरोडलगत असलेल्या भीम नगराजवळील राजीव गांधी नगरात मंगळवारी (दि. ४) रात्री गुटखा पुडीच्या दोन रुपयांवरून झालेल्या भांडणात तरुणाला बेदम मारहाण करीत ठार करण्यात आल्याची घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, तर ठार मारणाऱ्या आरोपीच्या घराला आग लावल्यानंतर याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

राजीवगांधी नगर साक्रीरोड येथे गुटखा पुडीचे दोन रुपये कमी दिल्याच्या कारणावरून किराणा दुकानदाराशी झालेल्या भांडणातून संदीप विजय ठाकूर (वय २१) या तरुणाचा खून करण्यात आला. दुकानदार चंद्रकांत भालचंद्र चव्हाण यांच्यासह त्यांचे आई-वडील आणि पत्नीने केलेल्या मारहाणीत संदीप हा जबर जखमी होऊन मरण पावला. याप्रकरणी मृत तरुणाची आई रमाबाई विजय ठाकुर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चंद्रकांत भालचंद्र चव्हाण यांच्या किराणा दुकानावर गुटखा पुडी घेण्यासाठी गेलेला असताना त्याच्याकडून दोन रुपये कमी दिले व त्याची मागणी केल्याने सरिता चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, भालचंद्र चव्हाण, संदीप चव्हाण यांनी संदीप ठाकूरला मारहाण करीत त्याच्या डोक्यावर वार करीत जिवे ठार मार मारले असल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे.

त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर साक्रीरोडवर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तर संदीप ठाकूर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. चव्हाण कुटुंबीयांचे घर संदीप ठाकूर यांच्या नातेवाईकांनी दगडफेक करीत जाळले. यावेळी परिस्थिती हाताळण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिनकर पाटलांचा विरोधकांवर पलटवार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौर आणि सभागृह नेत्यांमधील विसंवादावरून भाजपवर आरोप करणारे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि काँग्रेसच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांच्यावर सभागृहनेते दिनकर पाटील यांनी टीकास्र सोडले आहे. तसेच फोटोसाठी बजेट रखडले नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

आपण पावसाळी गटार योजनेतील लक्षवेधीत पाटील आणि बोरस्ते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले नसल्याचा खुलासा पाटील यांनी केला. तसेच बोरस्ते आणि पाटील यांनी भाजपवर खोटे आरोप करू नये. महापौर व सभागृहनेत्यांमध्ये कोणताही वाद नसून कोणीही त्यात नाक खुपसू नये, असा टोमणाही त्यांनी मारला आहे. महापौर, उपमहापौर, सभागृहनेता आणि गटनेत्यांमध्ये संवाद नसून, नेमका कारभार कोण पाहत आहे, असा टोमणा विरोधकांनी मारला होता. बोरस्ते यांनी अंत्यसंस्काराच्या ठेक्यावरून भाजपला कोंडीत पकडले, तर हेमलता पाटील यांनी पालिकेतील सत्ता नेमकी कोणाकडे आहे, असा सवाल उपस्थित केला होता. त्यांची टीका भाजपला चांगलीच झोंबली आहे. भाजपवरील आरोपांचा खुलासा करण्यासाठी सभागृह नेता दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे आणि गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी पत्रकार परिषद घेवून विरोधकांचे आरोप खोडून काढले. बोरस्ते आणि पाटील यांनी खोटे आरोप करू नये, असा सल्ला पाटील यांनी दिला आहे. तसेच आपल्या फोटोसाठी बजेट थांबले नसल्याचा खुलासा पाटील यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंध्र प्रदेशला भावली ३८ गावे योजना!

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कुठलीही सार्वजनिक पाणीपुरवठा योजना म्हटली, की हमखास समोर येते ती त्या योजनेची दुरवस्था. बऱ्याच ठिकाणी पाणी योजनांना अखेरची घरघर लागलेली असते. मात्र, येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना याबाबतीत अपवाद ठरताना कौतुकास्पद ठरली आहे. त्यामुळेच या योजनेची आंध्र प्रदेश राज्याने दखल घेतली. मंगळवारी आंध्र प्रदेशातील शासननियुक्त चाळीस सदस्यीय समितीने या योजनेला भेट दिली. या योजनेचे समितीने कौतुक केले आहे.

जागतिक बँकेने गेल्या आर्थिक वर्षात केलेल्या देशातील पाणीपुरवठा योजनांच्या सर्वेक्षणात भारतातील ज्या तीन योजना अग्रक्रमाने निवडल्या होत्या त्यातील एक म्हणजे येवला तालुक्यातील ३८ गांवे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना. उत्कृष्ठ नियोजन आणि नफ्यात असलेली ही एकमेव योजना आहे. या योजनेचे आजवर अनेकांकडून कौतुक झाले. आता चक्क आंध्र प्रदेशला या योजनेने आपल्याकडे आकर्षित केले. ते‌थील प्रशासनाने तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या धर्तीवर राज्यात योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी तेथील ४० जणांच्या एका समितीने मंगळवारी येवल्यातील या योजनेची पाहणी करून योजनेची सविस्तर माहिती घेतली.

विशाखपट्टणम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ए. आप्पाराव, कृषी सभापती के. दामोधरराव, जिल्हा परिषद सदस्य गंगा भवानी, जलसंधारणाचे उपअभियंता ए. सावित्री, शाखा अभियंता के. रामास्वामी यांच्यासह आंध्रातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा या समितीत समावेश होता. या भेटीत या समितीने ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या तालुक्यातील बाभूळगाव येथील जलशुद्ध‌िकरण केंद्र, अनकाई येथील एम. बी. आर. येथे भेट दिली. तालुक्यातील अनकुटे भेटीदरम्यान गावातील प्रत्येक घरी भेट देवून योजनेचे पाणी कसे पोहचते आणि वसुली कशी केली जाते, याची माहिती जाणून घेतली. यावेळी पाणी पुरवठा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, पंचायत समिती माजी सभापती संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे, संजय बनकर यांच्यासह योजना व्यवस्थापनातील उत्तम घुले, सतीश बागुल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी मालामाल!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंढरपूर येथील आषाढी यात्रेतून सहा दिवसात राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीला ९१ लाख ५७ हजार ६४५ रुपये उत्पन्न मिळाले आहे.

नाशिकहून पंढरपूरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक एसटीने प्रवास करत असल्यामुळे त्याचे नियोजन अगोदरच करण्यात आले होते. तब्बल ७५३ फेऱ्या करत या सहा दिवसात एसटीच्या बसेसने २ लाख ३६ हजार किलोमीटर अंतर पार केले आहे. अद्याप ही यात्रा १० जुलैपर्यंत आहे. ३० जून ते १० जुलै अशा ११ दिवसाच्या या यात्रेच्या सहा दिवसाचे आकडे आले असून त्यात एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातून एसटीने तब्बल तीन हजार ६८७ जादा बसेस सोडल्या. त्यात नाशिकच्या बसेसचाही समावेश होता. नाशिक जिल्ह्यातून १७ आगारातून या बसेससे नियोजन अगोदर करण्यात आले. गेल्या वेळी या काळात मिळालेल्या उत्पन्नापेक्षा या सहा दिवसातले उत्पन्न जास्त आहे. या यात्रेसाठी एसटीने भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी बसचे आरक्षण, आगाऊ आरक्षण तसेच प्रत्यक्ष बसस्थानकावर तात्काळ आरक्षणाची सुविधा प्राप्त करून दिली. तसेच ग्रुप असल्यास त्यांना थेट बस उपलब्ध करून देण्याची सेवासुध्दा होती. त्यामुळे एसटीला प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. नाशिकमधून १९३ पेक्षा अधिक बसेस पंढरपूर यात्रेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.

तात्पुरते स्थानक
पंढरपूर येथे मुख्य बसस्थानकातून काही अंतरावर विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे तात्पुरते स्थानक उभारण्यात आले. तेथे नाशिकहून येणाऱ्या भक्तांसाठी जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या नव्या स्थानकात भाविक-प्रवाशांच्या सोयीसाठी प्रसाधनगृहे, उपाहारगृहे, विश्रांती कक्ष, झुणका-भाकर केंद्र, अखंडित वीजपुरवठा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

परतीचा प्रवास एसटीनेच
पंढरपूर यात्रेसाठी राज्यातून लाखो भाविक पंढरपूर येथे दाखल होतात. त्यापैकी बहुतांश येताना पायी दिंडीने येतात पण आषाढी यात्रा झाल्यानंतर व्दादशीला म्हणजे बुधवारी, ५ तारखेला अनेक भाविक परतीच्या प्रवासासाठी एसटी बसने निघतात. या पाच तारखेचा आकडाच एसटीने दिला आहे. त्यातून एसटीला चांगले उत्पन्न मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्विन झळकेने दिले १३ व्यक्तींना जीवदान!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रक्तदान हे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. पण आता अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रक्तामुळे एका जणाला जीवदान मिळते, तर अवयवदानाने अनेक जणांना. नाशिकमध्ये अपघातात ब्रेन डेड झालेल्या अश्विन झळके या युवकाचे अवयव दान करण्याचा, त्याच्या नातेवाईकांनी घेतलेल्या निर्णयामुळे तब्‍ल १३ लोकांना जीवदान मिळाले आहे.

जेलरोड येथील अश्विन झळके अपघातात ब्रेन डेड झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांच्‍या परवानगीनंतर अवयव दानाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी ऋषिकेष हॉस्पिटलच्या १४ डॉक्टरांची टीम मेहनत घेत होती. ऋषिकेष हॉस्पिटलमध्ये बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपासून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

अश्विन राहणार अवयवरुपाने जिवंत

जेलरोडवासीय अश्विन बाळासाहेब झळके हे कामानिमित्त नाशिक-पुणे रोडवरून जात असताना आंबेडकरनगर येथे गाडी घसरून त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात इजा झाली. ब्रेन डेड झाल्याने अश्विन यांचे अवयव दान करण्याचा नातेवाइकांना समजविण्यात आले. त्यांची पत्नी विजया व त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या परवानगीमुळेच अश्विन यांचे अवयवदान करणे शक्य झाले.

अपघात झाल्यानंतर त्यांना बोधलेनगरमधील सुविचार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. येथे त्यांचा ब्रेनडेड झाल्याचे निष्पन्न झाल्याची कल्पना त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली. अशा अवस्थेत ते कितीही वर्षे राहू शकतात, असे त्यांना सागण्यात आले. यावर त्यांचे अवयव काही लोकांच्या कामाला येऊ शकतील, अशी कल्पना त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली. नातेवाइकांनाही आपल्या घरातील व्यक्तीच्या स्मृती अवयव रुपाने जतन रहाव्यात यासाठी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. अवयवदानाचा निर्णय झाल्यानंतर झळके यांचा देह गंगापूर रोडवरील ऋषिकेश हॉस्पिटल येथे आणण्यात आला. तेथे बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. कोणत्या रुग्णालयाला कोणत्या अवयवांची गरज आहे हे पाहून त्या ठिकाणी ते अवयव पाठवण्यात आले. त्याची त्वचा ही नाशिकच्याच राजेद्र नेहते यांच्या हॉस्पिटलला देण्यात आली. त्याचे हृदय हे रुबी हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकमधून प्रथमच एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून हृदय पाठवण्याची मोहीम राबविण्यात आली. मार्गावर बंदोबस्त तैनात करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई विद्यापीठात मालेगावचे तिघे टॉपर

0
0

नाशिक ः मालेगावच्या कै. भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट संचलित बांद्रा येथील बी. व्ही. हिरे आर्किटेक्चर कॉलेजचे तीन विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या आर्किटेक्चर विद्याशाखेत अव्वल आले आहेत.

एकाच आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांकावर मुंबई विद्यापीठात झेप घेण्याची अभिमानास्पद घटना विद्यापीठाच्या इतिहासात अपवादानेच असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे यांनी म्हटले आहे. मुंबई विद्यापीठाच्या वतीने आर्किटेक्चर विद्याशाखेची पदवी परीक्षा एप्रिल २०१७ मध्ये झाली. यात डॉ. हिरे कॉलेजचे विद्यार्थी प्रणील विलास चित्रे (९.४ सीजीपीए) , स्वरूपा सतीश गोडबोले (९.१ सीजीपीए) आणि निनाद संजय संसारे (८.९८ सीजीपीए) यांनी विद्यापीठात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त शिवार’कासवगतीने

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची नाशिक विभागातील कामे कासवगतीने सुरू आहेत. विभागातील निवड झालेल्या ९०० पैकी सुमारे साडेतिनशे गावांमध्ये योजनेतील ५० टक्केही कामे पूर्ण होऊ शकलेली नाही. विभागातील पाचही जिल्ह्यांमधील पूर्ण झालेली एकत्रित २२५ गावांमध्ये मात्र या योजनेला फळ आल्याचे दिसत आहे.

जलयुक्त शिवाय अभियानांतर्गत २०१६-१७ या वर्षासाठी आलेल्या कामांचा विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात झालेल्या गाव आर्थिक विकास आराखडा बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागात झालेल्या कामांची माहिती सादर करण्यात आली. २०१९ पर्यंत सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र या उद्देशाने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी उपाययोजनांवर खर्च केला जात आहे. प्रत्येक वर्षी ५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या अभियानाला प्रशासकियदृष्ट्याही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

नाशिक विभागात गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानासाठी ९०० गावांची निवड झाली. विभागीय आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महेश झगडे यांनी या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. जलयुक्त शिवारच्या कामांच्या पूर्णत्वासाठी ३० जूनचा अल्टीमेटम देण्यात आला होता. मात्र, तरीही सन २०१६-१७ या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या सर्व ९०० गावांतील जलयुक्तची कामे पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त या प्रश्नावर काय निर्णय घेतात, याकडे प्रशासकीय यंत्रणांचेही लक्ष लागलेले आहे. जलयुक्तची विभागातील ३४५ गावांमध्ये सुमारे ८० टक्के तर २६७ गावांमध्ये ५० टक्के काम पूर्ण झाली आहेत. विभागातील ६३ गावांमध्ये तर या योजनेची अगदीच प्राथमिक स्वरुपाची म्हणजे केवळ ३० टक्के कामे झाल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात घ्या बाइकची काळजी

0
0


‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने वर्कशॉपचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात बाइकची काळजी कशी घ्यावी या विषयावर महाराष्ट्र टाइम्सतर्फे वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप शनिवार १५ जुलै रोजी त्र्यंबकरोडवरील मोहरीर यामाहा शोरूममध्ये होणार आहे. शनिवारी ११ ते १ या वेळेत होणारे हे वर्कशॉप कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे.

पावसाळा आला की तरुणांना सर्वात जास्त चिंता सतावते ती आपल्या बाइकची. बाइक म्हणजे तरुणांचा जीव की प्राण. बाइक पावसात भिजल्यावर सर्वात जास्त अडचण निर्माण होते ती बाइक स्टार्ट करताना. कधी गाडी स्ल‌िप होते तर कधी इंजिनमध्ये पाणी जाते, त्यामुळे गाडी बंद पडते. अशी एक ना अनेक कारणे गाडी बंद पडण्यासाटी कारणीभूत ठरतात. अशा वेळी काय करावे सुचत नाही. गाडी गॅरेजला नेण्याशिवाय पर्याय नसतो. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी बाइक मेन्टेनन्सचे वर्कशॉप. यात तुम्हाला जाणून घेता येईल की पावसाळ्यात आपल्या बाइकची देखभाल कशी करायची? हे वर्कशॉप कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे तर इतरांसाठी २०० रुपये आकारण्यात येणार आहेत. मात्र, या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशनसाठी ७०४०७६२२५४, ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यामाहा बाइकसाठी ऑफर

जर तुमची यामाहाची बाइक असेल आणि तुम्ही कल्चर क्लब सदस्य असाल, तर तुम्हाला रेग्युलर बाइक सर्व्हिसिंगवर २० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. ही सूट ३० जुलैपर्यंत राहील. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेंट्रल एक्साइज’चा घोळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीसाठी शहरातील कामटवाडे परिसरातील सेंट्रल एक्साइज, सर्व्हिस टॅक्स व कस्टम कार्यालयने गेले काही महिने जोरदार तयारी केली. मात्र, या कार्यालयाचे जुने फलक अजूनही जैसे थे आहेत. या आयुक्त कार्यालयाने चार मजली इमारतीवर वस्तू एवं सेवा कर आयुक्त कार्यालय असा मोठा फलक लावलेला असला, तरी या कार्यालयाच्या मुख्य गेटवर जुन्या बोधचिन्हासह असलेला फलक अजूनही कायम आहे. त्याचप्रमाणे लिफ्टजवळ असलेले फलकही, तसेच असल्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे फलकावरील काही अधिकाऱ्यांचे दालनही बदलले आहे.

गेले काही दिवस या कार्यालयात सॉफ्टवेअर अपडेट करण्यापासून विविध साहित्याचे शिफ्टिंग करण्यात आले. कर्मचाऱ्यांचे जीएसटीचे ट्रेनिंग, विविध क्षेत्रांतील व्यापारी, उद्योजकांच्या कार्यशाळा या कार्यालयात अजूनही सुरू आहेत. नाशिकमध्ये असलेल्या कार्यालयात एका आयुक्तांसोबत ऑड‌टि व अपिल विभागाच्या आयुक्तांनी आपला पदभार सांभाळत कामाला सुरुवात केली आहे. पण, कार्यालयाने जीएसटीच्या तयारीत आपल्या फलकाकडेच दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही बदलाची सुरुवात ही फलकापासून करणे आवश्यक असताना या कार्यालयाने त्याकडे कसे दुर्लक्ष केले, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

कामटवाडे येथे सेंट्रल एक्साइजचे कार्यालय असून, त्यात ४० दालने आहेत. त्यातील सर्व कार्यालये बदलली आहेत. या कार्यालयात आयुक्तांसह विविध अधिकारी, कर्मचारी आहेत. वस्तू व सेवाकराच्या तरतुदी जिल्हा आणि ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम या कार्यालयात सुरू आहे. मात्र, येथील फलकांकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिव्हिल इंजिनीअर्सतर्फे कार्यशाळा

दरम्यान, नव्या आर्थिक वर्षात सुरू झालेल्या जीएसटी व महारेरा या दोन विषयांवर असोसिएशन अॉफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअर्स, नाशिक शाखेतर्फे नुकतीच कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत सीए विशाल पोतदार यांनी जीएसटीवर व सीए परेश बागरेचा यांनी महारेरावर मार्गदर्शन केले. तिडके कॉलनीत झालेल्या या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल व नरेश कारडा यांच्यासह अभियंते, बिल्डर, ठेकेदार, आर्किटेक्ट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या अडचणींविषयी उपस्थितांनी प्रश्न विचारले. दोन्ही वक्त्यांनी संबंधितांचे शंकानिरसन केले. चेअरमन पुनित राय यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास एसीसीईचे विजय सानप, ज्ञानेश्वर गोडसे, संदीप जाधव, सचिन भागवत, समाधान गायकवाड, हर्षद भामरे, जयेश घिया, हर्षल धांडे आदी उपस्थित होते. मॅनेजिंग कमिटी सदस्य अमित अलई यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अनिल कडभाने यांनी आभार मानले.


गोंधळ टा‍ळण्याची निकड

केंद्राचा व राज्याचा जीएसटी यामुळे अगोदरच गोंधळ अाहे. त्यात दोघांची कार्यालये वेगवेगळी आहेत. त्यामुळे वन नेशन वन टॅक्स असे जरी सांगण्यात येत असले, तरी दोन टॅक्सचा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. त्यामुळे अगोदरच गोंधळात असलेल्या व्यापारी व उद्योजकांचा गोंधळ फलकाद्वारे होऊ नये यासाठी हे फलक बदलण्यासाठी प्राथमिकता द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदाधिकाऱ्यांचे वाहनसौख्य लांबणीवर!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी नव्या वाहनांची खरेदी जीएसटीच्या गणितामुळे बिघडली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांसाठी पाऊण कोटींची वाहने खरेदी करायला मंजुरी मिळाली असली तरी, जीएसटीमुळे या वाहनांच्या किमती बदलल्याने खरेदी थांबली आहे. जीएसटीसंदर्भात शासनाचे नवीन कॉन्ट्रक्ट येण्यास अवधी असल्याने या वाहनांची खरेदी सध्या तरी करता येणार नाही. त्यामुळे सभागृहनेत्यांसह, स्थायी समिती अध्यक्ष व समित्यांच्या सभापतींना नव्या वाहनांच्या हौसेसाठी थोडावेळ अजून वाट पहावी लागणार आहे.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही सत्ताधाऱ्यांनी नव्याने निवडून आलेल्या दहा पदाधिकाऱ्यांसाठी दहा नव्या गाड्या खरेदीला मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती आणि सभागृहनेत्यांसाठी ‘मारुती सियाझ’ ही महागडी कार खरेदी केली जाणार आहे, तर इतर सभापतींना स्विफ्ट डिजायर ही गाडी खरेदी केली जाणार आहे. त्यात शहर सुधार, विधी व आरोग्य या तीन नव्या समित्यांसह चार प्रभाग समित्यांनाही वाहने दिली जाणार आहेत. त्यासाठी ७४ लाखांच्या खर्चाला मंजुरीही दिली आहे. प्रशासनाकडून या गाड्या खरेदीची तयारीही सुरू झाली आहे. परंतु, एक जुलैपासून जीएसटी लागू झाल्याने या गाड्या खरेदीचे बजेट बदलले आहे. जीएसटीमुळे स्विफ्ट डिजायर स्वस्त झाल्या असल्या तरी, सियाझ ही गाडी एक लाखाने महागली आहे. त्यामुळे खरेदीसाठी वाढीव खर्च येणार असल्याने प्रशासनाने खरेदीला तूर्तास ब्रेक दिला आहे.

नव्याने प्रस्ताव

दहा वाहनांसाठी मंजूर झालेला पाऊण कोटींचा निधी जीएसटीच्या बदललेल्या पार्श्वभूमीवर पुरेसा नाही. त्यामुळे नव्याने वाढीव खर्चाचा प्रस्ताव सादर करून तो महासभा आणि स्थायी समितीवर सादर करावा लागणार आहे. या प्रक्रियेला पुन्हा दोन ते तीन मह‌िने लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारत-इस्त्रायल मैत्री फायदेशीर’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सद्यस्थितीत जगासमोर दहशतवादाचे खडतर आव्हान आहे. संरक्षण वा भौगोलिकदृष्टया भारत आणि इस्त्रायल या देशांसमोरील प्रश्नही बऱ्याच अंशी समान आहेत. भारताची बुध्दिमत्ता आणि इस्त्रायलचे तंत्रज्ञान नव्या मैत्रीपर्वात हातात हात घालत आहे. याचा सर्वाधिक फायदा दोन्ही देशांमधील लोकशाही आणि संस्कृती संवर्धनासाठी होईल, असा विश्वास इस्त्रायलचे कॉन्सुल जनरल डेव्हीड अकोव यांनी व्यक्त केला.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ‘भारत इस्त्रायल आंतरराष्ट्रीय संबंधांची आगामी दिशा’ या विषयावर त्यांनी मत मांडले. अकोव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीमुळे सहकार्य आणि मैत्रीच्या नव्या पर्वास सुरूवात झाली आहे. यावेळी व्यासपीठावर इस्रायल वकिलातीतील अनय जोगळेकर, संस्थेचे नाशिकचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, प्राचार्य डॉ. सुचेता कोचरगावकर उपस्थित होते.

ते म्हणाले, संरक्षणासारख्या मुख्य विषयासोबतच अन्नसुरक्षा, जलसुरक्षा आणि उद्योजकतेच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांना चांगली संधी निर्माण झाली आहे. भारतासमोरही पाणीटंचाई , कृषी, दहशवादाचे आव्हान आणि दुसरीकडे स्टार्ट अप उद्योजकतेचे वाढलेले महत्त्व अशी स्थिती आहे. काही अंशी या प्रश्नांमधील साम्य दोन्ही देशांमध्ये असल्याने सोबत काम करण्यास दोन्हीही देशांना वाव आहे. ठिबक सिंचन, हरितगृह आणि विद्राव्य खते यातील इस्रायली तंत्रज्ञान भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जात असले तरीही भविष्यात त्यादृष्टीने अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. यावेळी भोसला मिलिटरी कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी, संस्थेचे पदाधीकारी उपस्थित होते.

संरक्षणावर मांडले मत

अकोव म्हणाले, संरक्षणात देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग गरजेचा आहे. दोन्ही देशांच्या संबंधामुळे चारित्र्य निर्माण, तंत्रज्ञानातील प्रगती आणि आर्थिक समृद्धी याला हातभार लागणार आहे. जे नागरिक अत्यंत कठीण परिस्थितीत देशाच्या संरक्षण सेवेत जबाबदारी पार पाडतात ते लोकशाही प्रक्रियेसह सामाजिक आणि राजकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. माझे सपूर्ण कुटूंब हे लष्करी सेवेचा भाग आहे, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र महिला कारागृह

0
0

नाशिकरोडला उभारणी सुरू

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात महिला कैद्यांसाठी स्वतंत्र कारागृह उभारण्यात येत आहे. तटाचे काम बाकी आहे. महिला कैद्यांसाठी महिला डॉक्टर व मानसोपचार तज्ज्ञही लवकरच उपलब्ध केला जाईल, अशी माहिती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी म. टा. ला दिली.

मुंबईच्या महिला कारागृहातील मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिकरोड कारागृहातील स्थितीबाबत अधीक्षक साळी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वरील माहिती दिली. नाशिकरोड कारागृहात ३२३५ बंदी आहेत. त्यामध्ये १२८ महिला आहेत. या १२८ पैकी ६८ पक्के (शिक्षा सुनावलेले) तर ६० कच्चे महिला बंदी आहेत.

महिला डॉक्टर हवा

या कारागृहात महिला बराकींची क्षमता ६० बंद्याची आहे. परंतु, दुप्पट महिला कैदी असल्याने नवीन कारागृह बांधण्यात आले आहे. सव्वातीन हजार कैद्यांसाठी दोन पुरूष डॉक्टर आहेत. रात्रपाळीला डॉक्टर नसतो. राज्य सरकारकडे महिला तज्ज्ञ डॉक्टरांची मागणी करण्यात आली आहे. तसेच, उच्च न्यायालयाने महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

सतर्क महिला रक्षक

कारागृहाच्या भिंतीवरून मोबाइल आत फेकण्याचे तसेच कैद्यांच्या नातेवाईकांकडून मोबाइल आत जाण्याचे प्रमाण वाढल्याने महिला कर्मचाऱ्यांना गेट आणि मुख्य जागी नियुक्त करण्यात आले आहे. कारागृहाचे मनोरे आणि भिंतीवर त्यांना तैनात करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातांचे ग्रहण सुटेना

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबकेश्वररोड हा शहरातील वर्दळीच्या रस्त्यांपैकी प्रमुख रस्ता मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्र्यंबकरोडला अपघातांचे जूण ग्रहणच लागल्याची स्थिती दिसून येत आहे. या रस्त्यावर झालेल्या अपघातांत जायबंदी होण्यासह अनेकांना प्राणदेखील गमवावे लागले आहेत. त्यातच महापालिकेच्या हद्दीत असलेल्या रस्त्याला अनेक ठिकाणी पंक्चर ठेवण्यात आल्याने त्या ठिकाणी रोजच अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह सातपूरकरांनी गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी पुढाकार घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

महापालिकेने सन २००२ मधील सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वररोडचे रुंदीकरण केले होते. त्यानंतर गेल्या कुंभमेळ्यातदेखील दुभाजकांसह डांबरीकरणाचे काम महापालिकेने केले. या रस्त्यावरून त्र्यंबकेश्वरला भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांची रोजच मोठी वर्दळ असते. त्यातच एज्युकेशन हब म्हणूनही त्र्यंबकरोडची ओळख झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मात्र, त्यामुळे त्र्यंबकेश्वररोडवर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रोजच एकतरी अपघात त्र्यंबकरोडवर होतच असल्याची स्थिती आहे. त्यामुळे गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांसह रहिवाशांकडून अनेकदा केली जात आहे. परंतु, त्याकडे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे नाशिक महापालिकेच्या हद्दीत केवळ सात किलोमीटर असलेल्या रस्त्यावर तब्बल ३६ पंक्चर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वेगाने जाणाऱ्या वाहनांना पंक्चरमुळे अडथळा निर्माण होत अाहे. यात अनेकदा अपघातही झाले आहेत. रोजच किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येते. नुकत्याच झालेल्या एका अपघातात चारचाकीने दुचाकीला उडविले. परंतु, सुदैवाने दुचाकीस्वारास केवळ मुका मार लागला. अशा अपघातांमुळे पंक्चरच्या ठिकाणी रोजच अपघात होत असल्याने गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.


दुभाजक टाकणार कोण?

त्र्यंबकरोडवर पवार पेट्रोलपंपासमोर नेहमीच अपघात होत असल्याने रहिवाशांच्या आंदोलनानंतर त्या ठिकाणी पोलिसांच्या लोखंडी जाळ्यांचे दुभाजक टाकण्यात आले होते. त्यानंतर रहिवाशांनी कायमस्वरूपी दुभाजक व गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. याकडे स्थानिक नगरसेवकांसह महापालिकेने दुर्लक्षच केले आहे. दरम्यान, पोलिसांनी लावलेल्या दुभाजकातील जाळ्या नेहमीच पेट्रोलपंपावरील कर्मचारी हटवत असल्याने अपघातांना आमंत्रणच दिले जात आहे. स्थानिक नगरसेवकांनी दुभाजकांसह गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.


महापालिकेच्या हद्दीत असलेल्या त्र्यंबकेश्वररोडवर रोजच अपघात होत आहेत. त्यामुळे गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकले पाहिजेत. सात किलोमीटर अंतरासाठी ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले पंक्चरही कमी करण्याची गरज आहे.

- गणेश निगळ, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाला मिळणार जागा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई हाय कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिस मुख्यालयाच्या अखत्यारीत असलेली अडीच एकर जागा जिल्हा कोर्टाच्या विस्तारासाठी देण्याबाबत मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हाय कोर्टाच्या आदेशानुसार पोलिस विभागाच्या मालकीची अडीच एकर जागेची मोजणी करण्यात आली आहे. ती जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने कोर्टासाठी देण्याची तरतूद करावी, असे दाखील आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

जनहीत याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला. यामुळे जिल्हा कोर्टाच्या विस्तारीकरणाला मदत मिळणार आहे. जुने सीबीएसच्या लगत असलेल्या जिल्हा कोर्टाच्या विस्तारीकरणासाठी जागा मिळावी, अशी मागणी नाशिक, मुंबई व महाराष्ट्र बार असोसिएशनने राज्य सरकारकडे केली. गेल्या १५ वर्षांपासून त्यासाठीचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. २००२ मध्ये शिष्टमंडळाने तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेत न्यायालयाच्या जागेचा मुद्दा उपस्थित केला हेता. याची दखल घेत कोर्टासाठी पोलिस मुख्यालयातील अडीच एकर जागा देण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले. परंतु तत्कालिन अधिकाऱ्यांनी त्याचे पालन न केल्याने कोर्टासाठी जागा मिळू शकली नाही.

याचिकेची घेतली दखल

१८८५ सालापासून या कोर्टाला जागा मिळू शकलेली नाही. आता कोर्टाचे कामकाज वाढले आहे. जिल्हा कोर्टात सध्या तीन हजाराहून अधिक वकील कार्यरत आहेत. कोर्टाच्या आवारात विविध प्रकारची ३५ न्यायालये आहेत. या सर्व बाबींची दखल घेत अॅड. का. का. घुगे यांनी जनहित याचिका दाखल केली.

असा केला युक्त‌िवाद

कोर्टाच्या जागेच्या प्रश्नावर समिती नेमण्यात आली. त्या समितीनेही कोर्टाला पोलिस मुख्यालयाच्या अखत्यारीतील जागा देवू नये अशी भूमिका घेतली. कोर्टासाठी त्र्यंबकरोडवरील दूध डेअरीची ११ एकर जागा देण्यास राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी मान्यता दर्शविली. पण, हा प्रस्ताव गैरसोयीचा ठरेल, अशी भूमिका अॅड. घुगे यांनी मांडली. सद्यस्थितीत पोलिस मुख्यालयाची जागा पडून आहे. तेथील नाशिक ग्रामीण मुख्यालय आडगाव येथे हलविले आहे. नाशिक शहर पोलिसांना या जागेची सध्या गरज नाही, असा युक्तिवाद अॅड. संदीप शिंदे यांनी केला. अखेरीस याचिकाकर्त्यांनी विस्तृत आराखडा सादर करावा, असे आदेश कोर्टाने दिले. त्यानुसार तो सादर करण्यात आला. न्यायमूर्ती अभय ओक आणि सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने ही अडीच एकर जागा विस्तारीकरणासाठी देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.
कोर्टाच्या आवारात न्यायाधिशांनाही बसायला जागा नव्हती. या निर्णयामुळे सर्व प्रश्न मार्गी लागतील. नाशिक वकील संघ व त्यांचे पदाध‌िकारी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. विस्तारीकरण झाल्यामुळे शहराच्या विविध भागात असलेली एकूण ५० हून अधिक कोर्ट एकाच ठिकाणी येतील. त्यात कामगार, औद्योगिक, कौटुंबिक अशा विविध कोर्टाचा समावेश असेल.

-अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, वकील संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images