Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'समृद्धी' विरोध तीव्र; दरपत्रकाची होळी

0
0

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारने क‌ितीही दर दिला तरी समृद्धी महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही, असा पवित्रा घेत संतप्त शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकांची शनिवारी होळी केली. सरकारने जमिनी संपादनाचा प्रयत्न केला तर तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाद्वारे त्यास उत्तर दिले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे समृद्धीचा लढा चिघळण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी सरकारला जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. परंतु वडिलोपार्जित जम‌िनी देण्यास शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने लढा सुरू केला असतानाच शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने गावनिहाय जिरायत जमिनींना दिल्या जाणार असलेल्या मोबदल्याचे दरपत्रक जाहीर केले. परंतु सरकार आणि जिल्हा प्रशासन आता पैशांचे प्रलोभन दाखवू लागल्यामूळे शेतकरी संतापले आहेत. दरपत्रक जाहीर झाल्यानंतरची भूमिका ठरविण्यासाठी शनिवारी दुपारी आयटकच्या सीबीएस येथील कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीला किसान सभेचे राजू देसले, अॅड. रतनकुमार इचम, सोमनाथ वाघ, कचरू डुकरे पाटील, भास्कर गुंजाळ, शहाजी पवार आदी उपस्थ‌ित होते. कुठल्याही परिस्थ‌ितीत सरकारला समृद्धी महामार्गासाठी जमिनी द्यायच्या नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

त्यानंतर सर्व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जमले. तेथे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जमिन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, देणार नाही देणार नाही समृद्धीसाठी जमिनी देणार नाही, सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. सरकारने जमिनी घेण्याचा प्रयत्न केलाच तर स्वत:ला संपविण्याची आणि इतरांनाही संपविण्याची तयारी असल्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला.

१२ जुलैपासून गावोगावी बैठका

सरकार आणि जिल्हा प्रशासनाने जमिनींसाठी जाहीर केलेले दरपत्रक अमान्य असल्याचे शेतकरी संघर्ष कृती समितीने जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत असे सांगणारे सरकार शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार, असा सवाल आंदोलकांनी उपस्थ‌ित केला आहे. १२ ते १४ जुलै या कालावधीत सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यामुळे समृद्धी विरोधातील लढ्याला बळ मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी संघटीत आहेत. पर्यायी मार्गाबाबतचे धोरण शेतकऱ्यांनी सरकारला सांगितले असून, त्याचा विचार व्हायला हवा. दरपत्रकाशी शेतकऱ्यांना घेणे देणे नाही. सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादीत करण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नये. - राजू देसले, समन्वयक जमिनी बचाव कृती समिती

हाय कोर्टात सिन्नर तालुक्यातील १५ आणि इगतपुरी तालुक्यातील १६ याचिका दाखल आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना दरपत्रक जाहीर करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत कुठलीही भूसंपादनाची कार्यवाही करू नये. - अॅड. रतनकुमार इचम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्ते, पार्किंगकोंडी फोडणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या महापालिकेतील कारकिर्दीला शनिवारी एक वर्ष पूर्ण होत असून, कृष्णा यांना गेल्या वर्षभरात शहर विकासाची कोंडी फोडण्यात यश आले आहे. शहराची विकास प्रक्रिया रोखलेल्या कपाट प्रश्नांची कोंडी त्यांनी वर्षभरात फोडली असून, कपाट घंटागाडी, खतप्रकल्पांसह जवळपास पंधरा प्रकल्प मार्गी लावले आहेत. तसेच त्यांच्याच कारकिर्दीत शहराची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली असून, शहर विकासाचा तुंबलेला बॅकलॉग त्यांनी वर्षभरात भरून काढला आहे. येत्या काळात पार्किंग, रोड सेफ्टी, फुटपाथ या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी `मटा`ला सांगितले.

गेल्या वर्षी ७ जुलै रोजी तत्कालीन आयुक्त आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली झाली होती. त्यांच्या जागेवर अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती झाली होती. कृष्णा यांचे आगमन होण्यापूर्वीच शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला कपाटांचा प्रश्न चिघळलेला होता. तर एनजीटीने शहरातील बांधकामांवर बंदी घातली होती. घंटागाडी, खतप्रकल्प, वृक्षलागवड, उद्याने असे महत्त्वाचे प्रश्न वादग्रस्त बनले होते. परंतु, प्रत्येक गोष्टीत सोल्यूशन असते अशी भूमिका कृष्णा यांनी पदभार घेताच व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी वर्षभरात काम करत विकास मार्गात अडथळा ठरणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावले आहेत. स्मार्ट सिटीतील समावेशापाठोपाठ घंटागाडी योजना, भंगार बाजार हटवणे, खत प्रकल्पाचे खासगीकरण, मालमत्तेचे सर्व्हेक्षण, उद्यानांची देखभाल दुरुस्ती, एकवीस हजार वृक्षलागवड व वृक्षगणना, ऑटो डीसीआर यंत्रणा, वेस्ट टू एनर्जी, कौशल्य विकास कार्यक्रम, मालमत्ता सर्वेक्षण, ऑनलाइन नागरी सेवा केंद्र, अमृत गार्डन, गोदावरी स्वच्छता, कपाट, असे शहर विकासाला चालना देणारे प्रकल्प मार्गी लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन ग्रामसेवक निलंबित

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

कर्तव्यात कसूर करत असमाधानकारक कामकाज केल्याचा ठपका ठेवत इगतपुरी तालुक्यातील तीन ग्रामसेवकांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले. तसेच तालुक्यांतर्गत बदल्यांचे समुपदेशक देण्यात येवूनही कार्यभार हस्तांतरित न केल्याचा ठपका ठेवत नऊ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी हे आदेश दिले.

म्हसुर्ली येथील ग्रामसेवक शिवाजी रौंदळ यांना ग्रामसभेस गैरहजर, आंगणवाडी बांधकाम न करता अपहार प्रकरणी, मुरंबीचे ग्रामसेवक सोमनाथ धूम यांना कुरुंगवाडी ग्रामपंचायतीचा कार्यभार हस्तांतरित न करणे, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कामे असमाधानकारक केले याप्रकरणी, तसेच लक्ष्मीनगर येथील ग्रामसेविका श्रीमती अनिता कुटेमाटी यांनी कर्तव्यात कसूर, ग्रीनआर्मी अंतर्गत केलेल्या कामाची नोंद न करणे आदींमुळे निलंबित करण्यात आलेे.

नऊ ग्रामसेवकांना नोटिसा

मे अखेरिस तालुक्यांतर्गत बदल्याचे समुपदेशन देवूनही कार्यभार हस्तांतरित न केल्याच्या कारणावरून टाकेदचे ग्रामविकास अधिकारी रामदास इंगळे यांच्यासह ग्रामसेवक संदीप वासवे (इंदोरे), प्रकाश कवठेकर (कोरपगाव), राजेंद्र जाधव (खैरगाव), सुभाष ठाकरे (धामणी), नलिनी घुले(अडसरे बु), अनिता कुटेमाटी (लक्ष्मीनगर), जयश्री भोईर (ओंडली), लता हिले (गरुडेश्वर) यांना कारणे दाखवा नोट‌सिा बजावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी गायकवाड

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड यांची, तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पाळदे यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखालील सहकार पॅनलने श्री व्यापारी पॅनलचा २०-१ असा पराभव करून सत्ता मिळवली आहे.

जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. अध्यक्षपदासाठी गायकवाड आणि उपाध्यक्षपदासाठी पाळदे यांचेच उमेदवारी अर्ज आले. त्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे करे यांनी जाहीर केले. अध्यक्ष व उपाध्यक्षांचा नीळकंठ करे यांच्या हस्ते करण्यात आला. माजी उपाध्यक्ष अशोक चोरडिया, संचालक निवृत्ती अरिंगळे, सुधाकर जाधव, मनोहर कोरडे, अशोक सातभाई, डॉ. दत्तात्रय पेखळे, डॉ. प्रशांत भुतडा, रामदास सदाफुले, कमल आढाव, रंजना बोराडे, श्रीराम गायकवाड, अशोक चोरडिया, रमेश धोंगडे, सुनील चोपडा, सुनील आडके, जग्गनाथ आगळे, वसंत अरिंगळे, प्रकाश घुगे आदी उपस्थित होते. बँकेच्या सभासदांनी जो विश्वास दाखविला त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. बँकेला लवकरच शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी सर्व संचालक प्रयत्न करतील, असे आश्वासन दत्ता गायकवाड यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवन पवार अखेर रिपाइंत ‘पावन’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माजी नगरसेवक पवन पवार यांना भाजपने नाकारल्यानंतर मित्रपक्ष असेल्या रिपाइंने शनिवारी पक्षात प्रवेश देऊन पुनर्वसन केले. अकरा महिन्यांपूर्वी अपक्ष नगरसेवक असलेल्या पवार यांना भाजपने प्रवेश दिला. मात्र, महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांची कोंडी झाली होती. पवार यांनी महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली. पण, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी रिपाइंत प्रवेश करण्यासाठी हालचाली केल्या. मात्र, येथेही त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. अखेर आज रिपाइंने त्यांना प्रवेश दिला.

महिनाभरापूर्वीच पवार यांच्या रिपाइंत प्रवेशाच्या चर्चेमुळे धुसफूस सुरू झाली होती. त्यावेळी प्रकाश लोंढे यांच्या विरोधकांनी एकत्र येत रिपाइंचे जिल्हाध्यक्ष म्हणून पवार यांच्या नियुक्तीचा ठराव करीत शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या होत्या. रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या वादावर पडदा टाकून जिल्हाध्यक्षपदी प्रकाश लोंढेच असल्याचे स्पष्ट केले होते. त्या वादावर आता पडदा टाकून पवार यांना प्रवेश दिला आहे.यावेळी काकासाहेब खंबाळकर, प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.


भूतकाळाशी देणेघेणे नाही

पवन पवार काल काय होते याच्याशी देणेघेणे नाही. त्यांनी आता रिपाइंत प्रवेश केला असून, ते लोकशाही मानणारे असतील, असे सांगत जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी आज केवळ पक्ष प्रवेश असल्याचे सांगितले. विरोधी पक्षाचे लोक वावड्या उठवत असून, रिपाइंची जिल्ह्यात जोरात घोडदौड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रिपाइंने पवन पवारबरोबरच देवळाली कॅम्प येथील जमील सय्यद व प्रा. प्रताप मेंढेकर यांनाही प्रवेश दिला. पवन पवार यांच्या प्रवेशासाठी नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशीर झाल्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५७ उमेदवारांचा फैसला मंगळवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक बार असोसिएन निवडणुकीस अवघे काही तास शिल्लक असून, आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने निवडणुकीचा फिव्हर चांगलाच वाढला आहे. या निवडणुकीसाठी ५७ उमेदवार नशिब आजमावत असून, तीन हजार ५६ मतदार उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. मंगळवारी मतदान होणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.७) जिल्हा कोर्टात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात निवडणूक लढवणाऱ्या सत्ताधारीसह विरोधकांनी एकत्र बसून आपआपले विचार मांडले. यावेळी दोन्ही बाजुंनी आश्वासनांचा पाऊस पडला. वकीलांच्या दैनंदिन समस्या सोडव‌ण्यिासह जिल्हा कोर्टास भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न, महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, अद्ययावत लायब्ररी, वकिलांसाठी बार रूम, नवीन वकिलांना सोयी-सुविधा याबरोबरच न्यायालयात मोफत वायफाय अशी विविध आश्वासने देण्यात आली.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष का. का. घुगे, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, माजी अध्यक्ष भास्करराव पवार, माजी जिल्हा सरकारी वकील वसंत पेखळे यांनी ही विशेष सभा आयोजीत केली होती. दैनंदिन समस्यांवरील उपाययोजनांबाबत मतदारांना माहिती देण्यात आली.

मतदारांना दिले आश्वासन

अध्यक्षपदासाठी उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांकडून पार्किंग प्रश्न, पोलिसांकडून मिळालेले जागेवर तयार होणाऱ्या इमारतींमध्ये वकिलांसाठी बाररुम, विमा, महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, नवीन वकिलांसाठी स्टायपेंड, नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. तर काहींनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत बदल घडवण्याचे आवाहन केले. दरम्यान, ही निवडणूक ११ जुलै रोजी पार पडणार असून, इच्छूक उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी सोशल मीड‌यिावरील संदेशांच्या वापराबरोबरच पत्रकांचा वापर करीत खासगी गाठीभेटींवर जोर दिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजबिलाचा ‘शॉक’

0
0

उपनगर वीज ग्राहकास वापर कमी असूनही जास्तीचे बील

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वीज मिटर रिडिंग चुकीचे झाल्याने घरगुती वीज ग्राहकाला भरमसाठ रकमेचे वीज बील देऊन महावितरणने संबधित वीज ग्राहकाला हाय व्होल्टेजचा शॉक दिला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात महावितरणच्या मोबाइल अॅपवर या प्रकाराविषयी वीज ग्राहकाने केलेल्या तक्रारीला महावितरणकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. चुकीचे वीजमिटर रिडिंगमुळे वाढीव वीजबील येणे व त्याबद्दलच्या वीज ग्राहकांच्या तक्रारींकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याची प्रचिती शहरात वीज ग्राहकांना वारंवार येत आहे.

उपनगर कॉलनीत वास्तव्यास असलेल्या विलास सोनार यांना महावितरणने जून महिन्यासाठीचे १३२० युनिट वापरल्याचे वीजबिलाचा मोबाइलवर एसएमएस पाठविला आहे. प्रत्यक्षात वीज मीटरमध्ये वापरलेल्या युनिटमध्ये मात्र मोठी तफावत दिसून आली. १३२० युनिट वापरल्याचा मेसेज पाहून विलास सोनार यांना जणू काही हाय व्होल्टेज शॉकच

बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ग्रामपंचायतींमधून स्वस्त धान्य वितरण

0
0

बचतगटांची मक्तेदारी लवकरच संपुष्टात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन धान्य दुकान वाटपाच्या नियमनात सरकारने आमूलाग्र बदल केले आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना रेशनची दुकाने चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बचतगटांची मक्तेदारी संपुष्टात येणार असून, नागरिकांनाही हेलपाट्यांपासून मुक्तता मिळणार आहे.

पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रेशन धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आधारसीडिंग, बायोमेट्रिक प्रणालीसारख्या उपाययोजना हाती घेतल्या असून, जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक पॉस मशिन्सही वितरीत करण्यात आले आहेत. एवढ्यावरच न थांबता सरकारने आता रेशन धान्य वितरण प्रणालीत असलेली बचतगटांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवठा विभागातर्फे ग्रामीण भागात वितरीत केले जाणारे धान्य प्राधान्याने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नोंदणीकृत स्वयंसहायता बचतगट तसेच, नोंदणीकृत सहकारी संस्थांकडेही धान्य वाटपाची जबाबदारी दिली जाऊ शकणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या संस्था तसेच, सरतेशेवटी महिला स्वयंसहायता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्थांना दुकानांचे वाटप करता येणार आहे.

सुप्रीम कोर्टानेही १० फेब्रुवारी रोजी दिलेल्या एका निकालात रेशन दुकानांचे जाहीरनामे काढताना त्यामध्ये क्रम ठरवून दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायतींना त्यामध्ये अग्रकम देण्यात आला आहे. बायोमेट्रिक तसेच, ग्रामपंचायतींवर सोपविलेली जबाबदारी यामुळे धान्याच्या काळ्याबाजाराला चाप बसणार आहे.

वितरण नवीन कायद्यानुसारच

जिल्हा पुरवठा विभागाने गतवर्षी जिल्ह्यातील रद्द झालेले, विविध कारणांनी बंद पडलेले किंवा राजीनामा दिलेले असे एकूण ३१९ रेशन दुकानांचे जाहीरनामे काढले. परंतु, त्यापैकी अवघ्या ११० दुकानांसाठी प्रशासनाला अर्ज प्राप्त झाले. अजूनही जिल्हास्तरीय समितीकडून दुकानांचे वाटप बाकी असून, त्यामुळेच अर्ज आलेली दुकाने वगळता अन्य दुकानांचे वितरण करताना पुरवठा विभागाला आता सरकारच्या नवीन कायद्याचा आधार घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैधमापन विभागाची ‘सोशल’ धूळफेक

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

जीएसटीच्या नावाखाली काही ठिकाणी छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारून फसवणूक केली जात आहे. असा प्रकार करणाऱ्याविरुद्ध ग्राहकांनी वैधमापन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन वैधमापन विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात वैधमापन विभागाने तक्रार दाखल करण्यासाठी जाहीर केलेला ई-मेलच अवैध असून, व्हॉट्सअॅप क्रमांक बंद, तर फेसबुक पेजवर कोणताच प्रतिसाद ग्राहकांना मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर काही व्यापारी जीएसटीच्या नावाखाली वस्तूंची जास्त रक्कम आकारत ग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याच्या अनेक घटना सध्या घडत आहेत. वस्तूंवर छापण्यात आलेल्या मूळ रकमेपेक्षा अधिक रक्कम आकारण्यात येत असल्याची बाब वैधमापन विभागाच्या लक्षात आली. त्यानंतर जास्त रक्कम आकारणाऱ्या व्यापाऱ्यांसंदर्भातील तक्रारी दाखल करण्यासाठी वैधमापन विभागाकडून सोशल मीडियाच्या आधारे तक्रार दाखल करण्याच्या सुविधा ग्राहकांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. यात ग्राहकांनी Legal Metrology Maharashtra Consumer Grievances या फेसबुक पेजवर, ९८६९६९१६६६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर अथवा वैधमापन विभागाच्या dclmms_complaints@yahoo.com या ई-मेलवर किंवा ०२२-२२६२२०२२ या हेल्पलाइन नंबरवर फोन करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन वैधमापन विभागाने ग्राहकांना केले आहे.

तुम्हीच सांगा तक्रार कशी करायची?

फेसबुक पेजला टॅग करीत पाणी बॉटल, अंडी, खाद्य पदार्थ, पॅकिंग किराणा माल, तसेच इतर वस्तू यावर मूळ रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सोबतीला बिलदेखील तक्रारदारांनी जोडले आहे. पण, विशेष बाब म्हणजे या तक्रारींना फेसबुक पेजवर वैधमापन विभागाकडून कोणतीही समाधानकारक प्रतिक्रिया मिळालेली नाही. ‘आपका व्हॉट्सअॅप नंबर बंद हैं, कंप्लेंट कैसे करे?’, ‘तुमचा ई-मेल नॉट फाउंड येतोय, तुम्हीच सांगा आम्ही तक्रार

कशी करायची?’ असा सवाल तक्रारदारांनी वैधमापन विभागाला फेसबुकवर विचारला आहे. वैधमापन विभागाने सोशल मीडियाच्या आधारे तक्रार दाखल करा, असे सांगून ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक केल्याची भावना तक्रारदारांमध्ये आहे.


तक्रारदारांचा होतोय हिरमोड

तक्रारींसाठी देण्यात आलेला ई-मेल उपलब्ध नसल्याचे दिसून आले असून, या ई-मेलवर तक्रार दाखल केल्यानंतर not found email address असे प्रत्युत्तर तक्रारदारांना येत आहे. तसेच, तक्रारीसाठीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकाचे लास्ट सीन ९ एप्रिल २०१७ असून, त्यानंतर हे व्हॉट्सअॅप उघडलेच गेले नसल्याचे समोर आले आहे. फेसबुक पेजवर अद्याप एकही तक्रार दिसत नसून, काही तक्रारदारांनी फेसबुक पेजला टॅग करत काही तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याचप्रमाणे हेल्पलाइन नंबर लागतच नसल्याच्या, तसेच उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तक्रारदारांचा हिरमोड होताना दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाण्यावरून वादावादी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात राज्यातून नव्हे तर देशातून कामगार वास्तव्यास आले आहेत. त्यातच सातपूर भागात झोपडपट्टी भागातील संख्याही मोठी आहे. लहान बोळींच्या असलेल्या गल्ल्यांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग होत असतात. स्वारबाबानगरमधील सांडपाण्याचा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला होता. संबंधित महिलांना सांडपाण्याचा नेहमीच त्रास सहन करावा लागत असल्याने पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. या झोपडपट्टी भागात किरकोळ कारणांवरून होणारे वाद पोलिसांनादेखील डोकेदुखी ठरत आहेत. स्थानिक नगरसेवकांनी किरकोळ वाद मिटवावे, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सातपूर भागात स्वारबाबानगर, महादेवनगर, प्रबुद्धनगर (सीपीटूल), संतकबीरनगर, संतोषीमातानगर, भीमनगर, कांबळेवाडी व जेपीनगर या भागांचा समावेश आहे. याठिकाणी राहणारे बहुतांश मिळेल ते काम करणारे कुटूंब आहेत. लहानशे घर करून राहणाऱ्या स्लम भागातील कामगारांनी टुमदार घरांची उभारणी केली आहे. यामुळे मोकळे असलेल्या रस्त्यांना बोळीचे रूप आले आहे. एकाने घर बांधले म्हणून दुसऱ्यांनी ते पाहून त्यांचेही घर बांधले. यात मोठे असलेल्या रस्तेच दिसेनासे झाले आहेत. साहजिक अरुंद झालेल्या रस्त्यांवरून सांडपाणी वाहताना घरासमोरूनच जात असते. महापालिकेने स्वतंत्र ड्रेनेजची व्यवस्थादेखील केली असून, सांडपाण्यावरून होणारे वाद नित्याचेच झाले आहेत.

वाद जागेवर मिटवा

विशेष म्हणजे संबंधित महिलांनी पोलिसांना गुन्हाच दाखल करण्याचा आग्रह धरला. महिलांचा आक्रोश पाहून पोलिसांनीही गुन्हा दाखल केला. परंतु, स्थानिक नगरसेवकांनी या भागात होणारे वाद जागेवर मिटवण्याची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक सायकलिस्टचे जसपालसिंग यांचे निधन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी (वय ३८) यांचे शनिवारी सकाळी सायकलिंग करीत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आजोबा गुरुदेवसिंग, वडील कुलजीत सिंग, काका प्रीतपाल सिंग, एक भाऊ, एक बहीण, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

नाशिक रँडोनर्स मायलर्स या उपक्रमात शनिवारी ते सहभागी झाले होते. नाशिक-मुंबई महामार्गावर पाथर्डी फाटा येथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी विर्दी यांना ताबडतोब जवळील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आपत्कालीन विभागात उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. शासकीय रुग्णालयात विर्दी यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी सिंग हाऊस, नाईस एरिया, सातपूर येथे ठेवण्यात आला. मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले.

जसपाल सिंग विर्दी यांच्याकडे नाशिक सायकलिस्टचे सारथ्य आल्यानंतर त्यांनी प्रत्येक महिन्यात एक सामाजिक उपक्रम राबवत सायकलिंगचा प्रचार केला. त्यांच्या अचानक व अवेळी जाण्याने नाशिकमधील सायकलिस्ट समुदायाला मोठा धक्का बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरपत्रकाची होळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारने क‌तिीही दर दिला तरी समृद्धी महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही, असा पवित्रा घेत संतप्त शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकांची शनिवारी होळी केली. सरकारने जमिनी संपादनाचा प्रयत्न केला तर तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाद्वारे त्यास उत्तर दिले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे समृद्धीचा लढा चिघळण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी सरकारला जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. परंतु वडिलोपार्जित जम‌निी देण्यास शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने लढा सुरू केला असतानाच शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने गावनिहाय जिरायत जमिनींना दिल्या जाणार असलेल्या मोबदल्याचे दरपत्रक जाहीर केले. परंतु सरकार आणि जिल्हा प्रशासन आता पैशांचे प्रलोभन दाखवू लागल्यामूळे शेतकरी संतापले आहेत. दरपत्रक जाहीर झाल्यानंतरची भूमिका ठरविण्यासाठी शनिवारी दुपारी आयटकच्या सीबीएस येथील कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीला किसान सभेचे राजू देसले, अॅड. रतनकुमार इचम, सोमनाथ वाघ, कचरू डुकरे पाटील, भास्कर गुंजाळ, शहाजी पवार आदी उपस्थ‌ति होते. कुठल्याही परिस्थ‌तिीत सरकारला समृद्धी महामार्गासाठी जमिनी द्यायच्या नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर सर्व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जमले. तेथे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जमिन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, देणार नाही देणार नाही समृद्धीसाठी जमिनी देणार नाही, सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. जमिनी घेण्याचा प्रयत्न केलाच तर स्वत:सह इतरांनाही संपविण्याची तयारी असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला.

१२ जुलैपासून गावोगावी बैठका

सरकार आणि जिल्हा प्रशासनाने जमिनींसाठी जाहीर केलेले दरपत्रक अमान्य असल्याचे शेतकरी संघर्ष कृती समितीने जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत असे सांगणारे सरकार शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार, असा सवाल आंदोलकांनी उपस्थ‌ति केला आहे. १२ ते १४ जुलै या कालावधीत सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यामुळे समृद्धी विरोधातील लढ्याला बळ मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी संघटीत आहेत. सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादीत करण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नये.

- राजू देसले, समन्वयक जमिनी बचाव कृती समिती

सिन्नर तालुक्यातील १५ आणि इगतपुरी तालुक्यातील १६ प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना दरपत्रक जाहीर करणे हा न्यायालयाचा अवमान आहे.

- अॅड. रतनकुमार इचम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् सरपंच मात्र सातवी पास

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

सध्याच्या शैक्षणिक कायद्यानुसार आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थाला नापास करायचे नाही, या निर्णयाची अंमलबजावणी २०१० मध्ये करण्यात आली. हा निर्णय माहिती असूनही सरपंचनिवडीसाठी उमेदवार सातवी पास असणेे अनिवार्य असल्याचा निकष नव्याने लागू केला गेला आहे. या निर्णयाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर सध्या चांगलीच खिल्ली उडविली जात अाहे.

‘आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही आणि सरपंच मात्र सातवी पास असणे अनिवार्य -शासनाचे अभ्यासू धोरण’ या आशयाखाली सोशल मीडियावर सरकारी निर्णयाची टर उडविली जात आहे. एकीकडे राज्यात सर्वच क्षेेत्रांत शिक्षणाला प्राधान्य दिले जात असताना दुसरीकडे संपूर्ण गावाचा कारभार पाहणारा सरपंच फक्त सातवी पास असला पाहिजे, असा निर्णय घेतला गेल्याने सोशल मीडियावर या निर्णयासंदर्भात चांगलीच चर्चा झड आहे. इतर राज्यांप्रमाणेे महाराष्ट्रातदेखील जनतेच्या बहुमताने सरपंच निवडला जावा हा निर्णय योग्य असला, तरीही सरपंचपदासाठी लावण्यात आलेले निकष हे त्या मानाने पटण्यासारखे नसल्याने विनोदाच्या माध्यमातून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बहुतांश नेट यूजर्सनी या निर्णायाची खिल्ली उडविताना त्याबाबत पुनर्विचार करण्याची गरजदेखील व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्टेंबरअखेर उड्डाण!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उडान योजनेंतर्गत सप्टेंबरअखेर नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे ही विमानसेवा सुरू करण्याला एअर डेक्कन विमान कंपनीने ग्रीन सिग्नल दिला आहे. नवी दिल्लीत झालेल्या विंग २०१७ सब उडो सब जुडो चर्चासत्रात एअर डेक्कनतर्फे यासंदर्भात आश्वासन देण्यात आले. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री राजू, जयंत सिन्हा, हवाई वाहतूक विभागाचे सचिव चोभे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष खुल्लर, केंद्रीय अधिकारी, प्रत्येक राज्यातील विमानतळ व हवाई वाहतूक अधिकारी, विविध विमान कंपन्यांचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.

उडान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काय सवलती दिल्या जातील याची माहिती प्रत्येक राज्याने दिली. महाराष्ट्राच्या हवाई वाहतूकच्या प्रधान सचिव वत्सला नायर सिंग यांनी महाराष्ट्र सरकार काय सवलती देणार हे सांगितले. त्या म्हणाल्या, की प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत नो एअरपोर्ट चार्जेस, लँडिंग, पार्किंग आणि टीएनएलसी माफ केले आहे. करपात्र मूल्य सेवाकर १० टक्क्यांच्या वर आकारला जाणार आहे. राज्य सरकार मोफत पोलिस आणि अग्निशमन सेवा देणार असून, वीज, पाणी, तसेच इतर सेवादेखील सवलतीच्या दरात दिल्या जाणार आहेत. विमान कंपनीतर्फे स्वतः ग्राउंड हाताळणी, एटीएफवर एक टक्का किंवा त्यापेक्षा कमी कर असल्यास त्या राज्य विमानतळासाठी आरसीएस कार्यान्वित होते.


चर्चेअंती झाला निर्णय

प्रधान सचिव नायर, यू. पी. ककाणे, खासदार हेमंत गोडसे व एअर इंडियाचे अधिकारी यांच्यात महाराष्ट्र व नाशिकमध्ये विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. नाशिक हे धार्मिक व औद्योगिकदृष्ट्या कसे आघाडीवर आहे याबाबत विमान कंपन्यांना माहिती देण्यात आली. विमानसेवा सुरू करण्यातील अडचणी सांगण्यात आल्या. नाशिक विमानसेवेसाठी एअर डेक्कनशी खास चर्चा झाली. ‘डीजीसीए’कडे परवानगीची व मुंबईला टाइम स्लॉट मिळण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. नाशिकच्या विमानसेवेसाठी पंधराशे ते अठराशे रुपयांदरम्यान भाडे असेल व सप्टेंबरअखेर विमानसेवा सुरू होईल, असे आश्वासन एअर डेक्कनने दिले.

या कंपन्यांचा सहभाग

चर्चासत्रात एअर एशिया, टाटा सिआ एअरलाइन्स, स्टार एअर, घोडावत एंटरप्राइज, ट्रू जेट, जेट एअरवेज, स्पाइसजेट, झेक्सस एअर सर्व्हिसेस, डेक्कन चार्टस, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट, इंडिगो आणि एअरलाइन अलाइड सर्व्हिसेस या दहा विमान कंपन्यांनी सहभाग घेतला. प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी महाराष्ट्राच्या पुढाकाराने ऑगस्ट २०१६ मध्ये एनसीपीएमध्ये आरसीएसअंतर्गत भारत सरकार, एएआय, जीओएम यांच्यात सामंजस्य करार झाला. नाशिक, शिर्डी, जळगाव, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे विमानतळ आरसीएसअंतर्गत राहणार आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती कळविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळा करूया सुकर

0
0

पावसाळा आला, की दर वर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ होते. परिसरातले दवाखाने हाउसफुल्ल होतात. रोगराई झपाट्याने पसरते. त्याला कारणेही अनेक आहेत. यामध्ये अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात आरोग्य निरोगी राखण्यासाठी घ्यावयाची दक्षता, आहारविहार नियोजन आणि अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या साथरोगांची लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर टाकलेला हा फोकस...

संकलन ः फणिंद्र मंडलिक

--

पावसाळ्याच्या दिवसांत परिसरात कचरा साचू न देता रोजच्या रोज स्वच्छता ठेवल्यास रोगराईला निश्चितच आळा बसू शकतो. या कालावधीत सूर्याची किरणे कमी प्रमाणात भूभागावर येतात. त्यामुळे वातावरणात असलेले जीवजंतू नष्ट होत नाहीत. परिणामी रोगराई फैलावते, असे तज्ज्ञांचे मत आहे. पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांची लागण होते. मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. डासांची उत्पत्ती जास्त झाल्याने अन्य रुग्णांमध्येही वाढ होते. त्यामुळे पुरेशी दक्षता घेतल्यास जीवजंतू, डासांमुळे फैलावणाऱ्या साथरोगांना आपोआपाच प्रतिबंध होऊ शकतो.

--

पाणी अन् आहाराबाबत राहावे दक्ष

पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याचे प्रमाण ‍वाढते. त्यामुळे या काळात सर्वांनी पाणी उकळून पिणेच श्रेयस्कर ठरते. एक चमचा मध व त्यानंतर पाणी, असे सर्वांनी घेतल्यास उपयुक्त ठरू शकते. आजारपणामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास लिंबू सरबत गरम पाण्यातून वारंवार घ्यावे. लिंबाचा व आल्याचा रस टाकून पाणी घेणेही लाभदायक असते.

--

असा असावा आहार

या दिवसांत मधुर आम्ल लवण रसाचे स्निग्ध पदार्थ, पचायला हलके व उष्ण पदार्थ घ्यावेत. भूक कमी असल्यास एक वेळच जेवावे. या ऋतूत अपचनामुळे विविध व्याधी संभवतात. पडवळ, भेंडी, वांगी, दुधी भोपळा, लाल भोपळा, गिलके, दोडके, कारले, सुरण यांचा आहारात समावेश करावा. मूग, गहू, ज्वारी, कोरडे वाल, जुने वाल, तांदूळ, राजगिरा वापरावे. लसूण, कांदा, आले, दूध, तूप, कोथिंबीर, पुदिना, हिंग यांचा वापर वाढवावा. कैरी, लिंबू, चिंच, सुके खोबरे, बीटही वापरावे. या ऋतूत वेगवेगळ्या खिरी खाव्यात. बेसन लाडू, टोमॅटो व विविध भाजांचे सूप, उकडीचे मोदक, आवळा व कैरीचा मोरवळा याचा उपयोग करावा.

--

हा आहार करावा वर्ज्य

पावसाळ्याच्या दिवसांत कोबी, सर्व पालेभाज्या, चणे, मटार, बटाटे, काकडी, आंबा, खव्याचे पदार्थ, सरबते, मका, सुके तळलेले मासे, मटकी, मिसळ, ब्रेड, फरसाण, नूडल्स, मैद्याचे तळलेले पदार्थ, तसेच उपवासासाठी शेंगदाणे, भगर खाणे टाळावे. अळूची भाजी, सातूचे पीठ खाऊ नये. थंड पाणी पिणे टाळावे.

--

भाज्यांबाबत जरा जपून...

फळभाज्या किंवा पालेभाज्या विकणाऱ्या व्यक्तीला जंतुसंसर्ग झाला असेल, तर त्या फळभाज्या व पालेभाज्यांतून जंतू घरात येतात. हे जंतू अन्न शिजविताना मरतात. ज्या पालेभाज्या न शिजवता कोशिंबीर करण्यासाठी वापरतात त्या भाज्या मिठाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे ठेवल्यास त्यातील अमिबा, जियार्डिया इत्यादी जंतू मरतात आणि जंतांची अंडी पाण्यावर तरंगतात. हे मिठाचे पाणी एका लिटरमध्ये सहा चमचे मीठ घालून तयार करावे. हे पाणी फेकून देऊन नंतर भाज्या स्वच्छ पाण्यात धुतल्या, तर जादा मीठही निघून जाते. त्यामुळे गृहिणींनी ही दक्षता घ्यावी. स्वच्छता म्हणजे निर्मळता, निर्जंतुकता, प्रसन्नता, टापटीपता, नीटनेटकेपणा हे लक्षात ठेवावे आणि ते अंमलात आणावे.

--

ही घ्यावी खबरदारी

-

-पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात झाकून ठेवावे. घरातील पाणी साचविण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत.

-भांड्यातून अस्वच्छ हाताने किंवा अस्वच्छ भांड्याने पाणी घेणे टाळावे. निर्जंतुक केलेल पाणीच वापरावे.

-पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी कपडे धुणे, अंघोळ करणे, जनावरे धुणे टाळावे.

-घराभोवती लहान मुलास शौचास बसवू नये. माशांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घ्यावी.

-केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावावी.

-घरातील अन्नपदार्थ झाकून ठेवावेत. हात स्वच्छ धुतल्याशिवाय काहीही खाऊ नये.

-शिळे, उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. जेवणापूर्वी, शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

-दात, जीभ व तोंड हे अवयव दररोज सकाळी उठल्याबरोबर चुळा भरून नियमितपणे स्वच्छ करावेत.

-नियमितपणे अंघोळ करावी. स्वच्छ कपडे वापरावेत. बोटांची नखे वाढवू नयेत.

-नेहमी उकळलेले दूध प्यावे.

-गृहिणींनी स्वयंपाकापूर्वी, तसेच बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

--

मलेरिया ः कारणे, लक्षणे अन् उपाय

मलेरिया (हिवताप) हा प्रामुख्याने डासांमुळे होतो. अॅनाफिलीस जातीचे डास चावल्यास याची लागण ताबडतोब होते. संक्रमण पसरविण्याच्या अवस्थेतील डास निरोगी माणसास दंश करतो, तेव्हा काही परजीवी त्वचेतील रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. तेथून रक्ताबरोबर ते यकृतामध्ये प्रवेश करतात. यकृतामधील पेशींना संक्रमित करून ते पुढील अवस्थेत विकसित होतात. या अवस्थेत ते पेशींना नष्ट करून रक्तप्रवाहात येतात.

--

रुग्णांमधील लक्षणे

थंडी भरून ताप येणे हे मलेरियाचे प्रमुख लक्षण आहे. जेव्हा रक्तपेशी फुटतात, तेव्हा हानिकारक तत्त्वे रक्तात मिसळण्यामुळे थंडी भरून ताप येतो. आजार प्रस्थापित झाल्यावर ही प्रक्रिया दर २४ किंवा ४८ तासांनी होते. औषधे लवकर सुरू केल्यास असा क्रम दिसण्याची शक्यता कमी होते. यकृताला इजा पोहोचल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात कावीळही होऊ शकते. ताप, यकृताला सूज येऊन रुग्णांमध्ये अशक्तपणा येतो. यातील मेंदूचा हिवताप घातक असतो. यामध्ये रुग्ण बेशुद्ध होणे, आकडी येणे आदी त्रास होऊन शेवटी मृत्यूही ओढावू शकतो. रक्तशर्करा कमी होणे, रक्तपेशी प्लेटलेट्ची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. अतितापामुळे गर्भवती स्त्रियांना, तसेच बाळाला धोका संभवतो.

--

प्रतिबंधात्मक उपाय

मलेरिया होऊ नये यासाठी डास न चावणे हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साचू न देणे हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. त्याचप्रमाणे मच्छर प्रतिबंधक औषधे, घराला जाळ्या बसविणे, फवारणी इत्यादींचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते.

--

डॉक्टरांचा सल्ला मोलाचा

एखाद्या व्यक्तीला मलेरिया झाला असल्याची लक्षणे दिसल्यास त्याला रक्त तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. रक्त तपासणीनंतर तो कोणत्या प्रकारचा आहे, त्याचे उपचार ठरतात. म्हणून रक्ताची तपासणी करणे अतिशय आवश्यक आहे. गुंतागुंतीच्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करणेच योग्य ठरते. यावर घरगुती उपाय न करता वेळ न दवडता रुग्णाला दवाखान्यात नेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत.

--

सर्व आजारांचे मूळ आहारविहार आणि विचारांत असते. त्यात नियमितता आणि योग्य व्यायामांची जोड असल्यास आजार दूर पळतात. इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्याचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात आजारांचा फैलाव होतो. या कालावधीत प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतल्यास, परिसराची स्वच्छता राखल्यास आजारांना प्रतिबंध होऊ शकतो. आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत. या काळात अतितेलकट, जड, तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

-वैद्य विक्रांत जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमद्या मनाचा तरुण गेल्याने नुकसान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी (३८) यांचे शनिवारी निधन झाले. अतिशय मनमिळाऊ आणि उमद्या मनाचा हा तरुण नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष झाल्यानंतर या संस्थेला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांच्या निधनाने नाशिककरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबाबत नाशिक सायकलिस्ट असोसिएशन आणि मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

नाशिकची मोठी हानी

कालच आम्ही सोबत होतो. नाशिक कलेक्टरकडे अडीच तास मीटिंग चालली. त्याच्यासारखा प्रेमळ माणूस शोधून सापडणार नाही. असामान्य आणि डिव्होटेड, प्रत्येकाची मदत करणारा, त्याने कधीही कुणाकडेही दुर्लक्ष केले नाही. सर्वांना एकत्र घेऊन चालणारा माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे. नाशिकची ही मोठी हानी झाली आहे, ती कधीही भरून न निघणारी आहे. त्याचे स्वप्न होते की नाशिकला आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल कॅपिटल बनवायचे. आता नाशिककरांनी हे स्वप्न पूर्ण करायला हवे. तिच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल.

-डॉ. राजेंद्र नेहते


हृदय हरपले

नाशिक सायकलिस्ट कम्युनिटीचे हृदयच हरपले आहे. नाशिककरांचे मोठे नुकसान झाले. जसपालसिंग खूप प्रेमळ व्यक्ती होता. कुणालाही न सांगता मदत करणारा, कोणत्याही गोष्टीचा कधीही अहंकार त्याने बाळगला नाही. त्याला नाशिककरांना निरोगी राहण्याची सवय लावायची होती. नाशिकला सायकल कॅपिटल करण्याचे त्याचे ध्येय होते. त्याची जागा भरून काढणे अवघड आहे. त्याची मदत करण्याची तऱ्हाच वेगळी होती. आणि हे केवळ जसपालच करू शकत होता. मनमिळाऊ मित्र हरवल्याची भावना आहे.

- डॉ. हितेंद्र महाजन

नाशिक सायकलिस्टचा शिवाजी
जसपाल हा नाशिक सायकलिस्टचा शिवाजी होता. लाखजण गेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगायला हवा म्हणतात ते त्याच्याबाबतीत खरे ठरायला हवे होते. नाशिक त्र्यंबक रस्त्याला सायकल हब बनविण्याचे त्याचे स्वप्न होते. अतिशय निःस्वार्थी, हाडाचा कार्यकर्ता आपण गमावला आहे. त्याचबरोबर मोठी सायकलिंग करायची असेल तर बेसिक तपासण्या करून घेणे गरजेचे आहे हे सर्वांनी ध्यानात घ्यायला हवे. हृद्याची तपासणी, बीपी, ईसीजी करून मगच मोठी सायकलिंग करावी. सिरियस व्यायाम करताना या बेसिक तपासण्या सर्वांनीच करणे गरजेचे आहे. तसेच बेसिक लाइफ सपोर्टचे ट्रेनिंग घेण्याचीही गरज आहे. असा एखादा प्रसंग आल्यावर त्या व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छ्वास देता आला पाहीजे त्यामुळे हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यात त्याची मदत होऊ शकते.

- डॉ. रमाकांत पाटील


अतिशय वाईट अशी ही घटना आहे. धक्कादायक आणि अविश्वसनीय असेच तिचे वर्णन करावे. अतिशय सभ्य तरूण आपल्यातून निघून गेला आहे. त्याने सायकलिंग मध्ये खूप काम केले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- राजीव जोशी

पोकळी न भरणारी

अतिशय दु:खद घटना आहे. दोन वर्षांपूर्वी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एका उंचीवर त्यांनी संस्थेला नेऊन ठेवले होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव होता. कधी कुणाला दुखावले नाही. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.

- शैलेश राजहंस


द्रष्टा तरुण पडद्याआड

सायकल कल्चर वाढविण्यासाठी त्यांना एक दृष्टी होती. कालच कलेक्टर साहेबांसोबत अडीच तास सायकल चळवळीवर चर्चा झाली. नाशिक ते त्र्यंबकेश्वर सायकल ट्रॅक होण्यासाठी त्यांनी प्रपोजल दिले होते.

- किरण चव्हाण


अतिशय दु:खद घटना आहे, नाशिकला व नाशिककरांना हा मोठा धक्का आहे.

- योगेश शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावर बसू नका...

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका प्रशासनाकडून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी तीन व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. आठवडाभरात गुड मॉर्निंग पथकाकडून एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

शनिवारी पालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, स्वच्छता निरीक्षक अमित सौदे आदींसह गुड मॉर्निंग पथक गस्त घालत असतांना संगमेश्वर भागात मोसम नदी किनारी सार्वजनिक ठिकाणी आकाश शेलार, भारत चव्हाण, राजाराम खैरनार हे उघड्यावर शौचास बसलेले आढळले. या तिघांना पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांना छावणी पोलिसांच्या हवाली केले. या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आधीदेखील एक महिलेसह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालिकेकडून अशा पद्धतीने पहिल्यांदाच कारवाई होत असल्याने मालेगावकरांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

दिंडोरीतही जनजागृती

दिंडोरी : शहर दुर्गंधी, रोगराईमुक्त करण्यासाठी नगरपंचायतीतर्फे नागरिकांना शौचालय वापराची सक्ती करण्यात येत आहे. नगरपंचायतीतर्फे गुड मॉर्निंग पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. दिंडोरी नगरपंचायतीतर्फे प्रत्येक कुटुंबासाठी शौचालय योजना राबविण्यात येत आहे. शहरात एक हजार शौचालय बांधण्याचे नियोजन आहे. मात्र अनेक ठिकाणी नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे गुड मॉर्निंग पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक पहाटेपासून उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना रोखत असून त्यांना समज देत आहे. शौचालयाचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाई तसेच शासकीय योजना लाभ दाखले मिळणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाकप उभारणार कर्जमाफीसाठी लढा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, त्यांना निवृत्ती वेतन, स्वामिनाथन शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्र सरकारने एक लाख कोटींचा स्थिरता निधी उभारावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महाराष्ट्रात सर्व जिल्हा व तालुका स्तरावर रास्ता रोको, जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय मनमाड येथे नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय राज्य बैठकीत घेण्यात आला.

भाकप राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य शमीम फैजी, राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो व ज्येष्ठ नेते माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील छोटा गुरुद्वारा कार्यालयात झालेल्या या बैठकीत पक्षाची पुढील कार्याची दिशा ठरविण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीच्या १० जुलैपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात व यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर देश बचाओ देश बदलो, या स्टुडंट व युथ फेडरेशनच्या १५ जुलै पासून सुरू होणाऱ्या देशव्यापी आंदोलनात भाकपचा सक्रिय सहभाग राहणार आहे. जीएसटीला पाठींबा देत असतांनाच केंद्राने पुरेशी तयारी न करता तो राबविण्याचा घेतलेला निर्णय निषेधार्थ असल्याचे मत भालचंद्र कानगो यांनी व्यक्त केले. राज्य कार्यकारिणीचे मनोहर देशकर, सुकुमार दामले, राजू देसले, तुकाराम भस्मे, सुभाष लांडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​नाशिक-धुळे एसटीला अपघात; २४ प्रवासी जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकहून धुळ्याला जाणाऱ्या विना वाहक बस व टँकर यांच्यात मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झाला. चांदवड टोल नाक्याजवळ दुपारी चारच्या सुमार हा अपघात झाला. यात २४ प्रवासी जखमी झाले. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

चांदवड नजीक आडगाव टप्पा येथे बसला ओव्हर टेक करून पुढे जाणाऱ्या टँकरची बसला धडक बसली. यामुळे हा अपघात घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपास धुळे बसचा चांदवडजवळ अपघात

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड नजिक भरवस फाट्याजवळ नाशिकहून धुळ्याकडे जाणाऱ्या विनावाहक (बायपास) बस आणि गॅस टँकरला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात २६ प्रवासी किरकोळ जखमी झाले. रविवारी दुपारी हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.

नाशिक येथून धुळ्याकडे जाणारी धुळे आगाराची बस (एमएच २० बीएल ३४६८) दुपारी तीन वाजेच्या सुमारास चांदवड नजिक हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर पुढे जाणाऱ्या पेट्रोलियम कंपनीचा भरलेल्या गॅस कंटेनर (एमएच ४३ वाय १८६७) यास पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बसचालक महिंद्र सनैट (३१, रा. धुळे) यांच्यासह बसमधील इतर २५ प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच येथील सोमा टोलवे कंपनीचा अपघात विभाग व चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने चांदवड उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना महामंडळाच्या विशेष बसने धुळ्याकडे रवाना करण्यात आले. याबाबत पोलिस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images